मंगळवार, ३१ मार्च, २०२०

"Management Musings-3: "The Diamonds are for ever.":


"Management Musings-3:
"The Diamonds are for ever.":

This Gudhi Padwa day, happened to be really turning point in my life because on this day at the Tea time, I got hold of my very old diary, which contained a Treasure of Management thoughts, that were written by me almost 15 years back. At that time, I used to read a number of management subject books by various top authors and had a regular practice to write down whatever understood, as an extract of the same.

Hence, a completely new Avenue got opened up for me for an interesting activity of sharing such as Management Musings with those who you are interested.

This is the third article in this series, which takes you to the Treasure of Diamonds & Gems of Great Management Thinkers.

# Problems cannot be solved within the Framework they were created.
Albert Einstein

# Whenever you see a successful business, someone once made a courageous decision.
Peter drucker

# The silly question is the first intimation of some totally new development.
AN Whitehead.

# The ultimate solutions to the problems are rational; the process for thinking them is not.
Unknown.

# The greater the emphasis on perfection, the further it receds.
Haridas Chowdhari.

# You see things and say, why? but I dream the things, that never were there and say, why not?
George B Shaw.

# Creativity is the ability to see relationships, where none exist.
Thomas Disch.

# If you have built castles in the air,
your work need not be lost, that is where they should be; now put the foundations under them.
H D Thorean.

# If you can dream it, you can do it.
Walt Disney.

# All discoveries are made by people whose feelings run ahead of their thinking.
CH Oakhurst.

# One of the most profitable wishes was made by the daughter of
Dr. Edwin Land, founder of Polaroid Corporation. She once wished that she did not want to wait to get the pictures developed. That lead to the absurd idea of a film that would develop itself on the spot, the rest is history.

# Analysis kills spontaneity, the grain once ground into flour, springs and germinates no more.
HF Amiel.

# An invasion of Army can be resisted but not of an idea whose time has come.
Victor Hugo.

# Discovery consists of looking at the same thing as everyone else and thinking something different.
AS Gyorgy.

# Think before you speak, is criticisms' moto; speak before you think, Creators.
EM Foster.

# We don't see things as they are, we see things as we are.
A Nin

# Chop your own wood and then you get warmed up twice.
A Proverb.

# Launching a breakthrough idea is like shooting skit, people's needs change, so you must aim well ahead of the target to hit it.
Raymond Kurzweil.

# Half the failures in life come from pulling one's horse, as it is leaping.
Julius Hare.

# Never forget that only dead fish swim with the stream.
Malcom Muggeridge.

# Many ideas grow better when transplanted into another mind than in the one, where they sprang up.
OW Holmes.

# Everything that irritates us about others, can lead us to an understanding of ourselves.
Carl Jung.

# People cannot discover oceans until they have the courage to lose the site of the Shore.
Anon.

# There is nothing more difficult to carry out, nor normal doubtful of success, nor more dangerous to handle, than to Institute a new order.
Machiavilli.

# People who are good with the hammer, see every problem as nail.
Abraham Maslow.

# Everything you see and touch was an invisible idea until someone chose to bring it being. Any powerful idea is absolutely fascinating and absolutely useless until we choose to use it.
Richard Bach.

# Everyone has talent what is rare is the courage to follow the Talent to the dark place where it leads.
Erica Jong.

# Risk and Reward travel side by side, avoid one and the other will also pass you by.
Anon

In the ultimate analysis, Imagine the potential still hidden within you and within your organisation.

Compiled by
Sudhakar Natu

रविवार, २९ मार्च, २०२०

"ह्रदयसंवाद-१६": "घटका गेली पळे गेली........:


"ह्रदयसंवाद-१६":
"घटका गेली पळे गेली........:

"घटका गेली पळे गेली, तास वाजे ठाणाणा, आयुष्याचा खेळ होतो, राम का रे म्हणाना!"

आज ही गोष्ट किंवा हे म्हणणं, आठवण्याचे कारण म्हणजे सध्या आपण 'कोरोना'च्या महासंकटामुळे आप आपल्या घरांमध्ये बंदिस्त राहून, एक प्रकारे 'लिमिटेड ओव्हर्स'ची (जीवघेणी?) मॅच' खेळत आहोत. त्यामुळे वेळ कसा गेला, ह्यापेक्षा वेळ आपण कसा वापरला, याचा विचार कधी नव्हे, तो अधिक करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.'
हा विचार मला आज सकाळी झोपून उठण्या पूर्वी आला.

नेहमी मला झोप पूर्ण झाल्यावर, काही वेळ असंच अंथरुणात लोळण्याची सवय आहे. त्यावेळेस मला नवनवीन कल्पना सुचत असतात. आज हीच कल्पना मला सुचली की, आपण आताच्या काळात वेळ कसा वापरत आहोत, ते पाहण्याची! त्यासंबंधीत गंमतीशीर गोष्टी मी इथे तुमच्याकरता सांगणार आहे.
मला वाटतं ही कल्पना तुम्हीही उचलून धराल आणि अंतर्मुख होऊन आपण काय काय रोज करत आहोत, याचा आढावा घेत राहाल.

माझी वेळ घालवण्याची, नव्हे चुकलो, वेळ उपयोगात आणण्याच्या अनेक तर्हा आहेत. विशेषतः झोपेमध्ये मला बऱ्याच वेळा अधूनमधून केव्हाही जाग येते. आणि त्यावेळी मी नवनवीन गोष्टी आठवत असतो, वेगळेच विचार करत रहातो. त्यापैकी एक म्हणजे माझ्या जीवनात वेगवेगळ्या काळात कोणत्या महत्त्वाच्या व्यक्ती आल्या आणि त्यांच्याबरोबर माझे संबंध कसे होते, ते किती काळ, कां टिकले आणि जर कुणाचे बिघडले, तर ते कशामुळे? तो विचार करता करता आपोआप झोप लागूनही जाते.

काही वेळा, मी झोपेतून असा जागा झालो, तर मी ज्योतिषी असल्यामुळे, मला ज्ञात असणाऱ्या व्यक्तींच्या पत्रिका आठवतो आणि
त्यांच्या जीवनातील आरोग्य, आर्थिक स्थिती, कौटुंबिक सौख्य, जोडीदार आणि शिक्षण अशा विविध बाबींचा, पत्रिकेतील विविध स्थानातील ग्रहांचे योगांवरून काय ताळमेळ लागतो ते शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे झोप जरी आली नाही तरी, तो वेळ असा बुद्धीला चालना देण्यात जातो आणि असं करता करता आपोआप पुन्हा झोप लागते.
ब्लॉगवर 'लिहिलेला आठव्या शनीचे प्रताप' अशा झोपे'मधील'(?) अभ्यासाचे उदाहरण आहे.

हे झाले काही प्रकार झोपेतून मधल्या अवेळी, वेळ कसा जातो त्याचे. सगळ्यात गंमत येते ती पहाटे साखर झोपेतून जाग येण्यापूर्वीची. अशावेळी मला नेहमी नवनवीन कल्पना सुचतात कारण जवळजवळ झोप सुखाने पूर्ण झालेली असते मन अत्यंत प्रसन्न असते आणि मग मला नवीन काही शब्द, काव्य, लेख कल्पना सुचत जाऊन, काहीतरी नवीन मार्ग मिळत जातो. अशा वेळेला मला नेहमी वाटत आलं आहे की, झोपेमध्ये बरोबर पेन आणि कागद बाजूला ठेवावे, त्यामुळे त्यावेळेला जे सुचते मनात आपोआप उतरून ठेवावे! कारण झोपेतून जागे झाल्यावर ते शब्द न् शब्द सुचतातच असे नाही. मात्र जी काही संकल्पना मनामध्ये आकार घेते त्याप्रमाणे मी पुढचा दिवस त्यावर लेख लिहिण्यात निश्चितच घालवतो. अशाच साखरझोपेतील चाळ्यांमुळे माझे लेख विविध प्रकारचे होत गेले. उदाहरणार्थ "रंगांची दुनिया"-नाटक चित्रपट मालिका.."ह्रदयसंवाद"-ह्या ह्रदयीचे त्या ह्रदयी... वाचनीय साहित्यावर रसास्वाद "शारदोत्सव"... किंवा आपल्या जुन्या नोंदी असतील त्या ट्रेझर बुकमधल्या गोष्टींसाठी 'आजोबांचा बटवा'... अथवा एखादे संस्मरणीय साहित्य वाचलं तर त्यातील निवडक, उत्तम नोंदवताना "वाचा आणि फुला, फुलवा" किंवा वाचा, तरच 'वाचाल' अशासारखे शीर्षके आणि त्यामागच्या संकल्पना नेहमी मला साखरझोपेच्या आसपासच सुचतात. त्यामुळे माझा पुढचा जागेपणीचा दिवस इतका गडबडीत जातो की कळतच नाही.

"करोना"? डरो ना, यह पढों ना", हा सध्याच्या कसोटीच्या काळावर ज्योतिष चिकीत्सा करणार्या लेखाचे शीर्षक अशाच 'कातरवेळी(?) मला सुचले!

याव्यतिरिक्त कधीमधी माझ्या यु ट्युब चँनेलसाठी 'व्हिडिओ' बनवणे असतेच. परंतु सगळ्यात मजा येते, ती सोशल मीडियावर, वेगवेगळ्या प्रकारची खुसखुशीत पोस्टिंग लिहिण्याची! माझ्यामते हा जो संदेश स्वतंत्रपणे बनविण्याचा, काही खेळ आहे, तो माझ्या चिकित्सक वृत्तीला,
निरीक्षणशक्तीला आणि एकंदर कल्पनाशक्तीला योग्य ती दिशा देत शब्दरचनेवर प्रभुत्व मिळवण्याची कला साधण्याचा मार्ग देतो.

म्हणजे असे की, व्हाट्सअपवर अथवा
फेसबुकवर काही संदेश आपल्याला येतात, त्यातील काही संदेश कधीमधी, मला थबकवतात. मला यावर काही अक्कल दाखवत, चपखल प्रतिसाद देता येईल असा माझ्या मनात विचार येतो. मग मी त्यावरच सारं मन बुद्धी कल्पना शक्ती एकाग्र करतो. त्यानंतर यथोचित प्रतिसाद लिहिणे, ही जी काही माझी प्रक्रिया असते, ती मला आनंद तर देतेच, परंतु अशा बहुतेक संदेशांना दादही मिळत जाते. फेसबुकवरच 'माझं पान' जे बऱ्याच वेळेला पुष्कळ जण वाचतात. त्यावरील माझे संदेश हे असेच प्रतिक्रिया म्हणून दिलेले खेळ असतात. तशी दोन उदाहरणे बघा पुढे, त्यावरुन मी काय सांगू इच्छितो ते कळेल:

"ह्रदयी धरा हा बोध खरा":
'कोरोना'च्या महासंकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पूर्वापार रुढ परंपरा व जीवनशैलीचा उदो उदो करणारे संदेश, सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहेत. ही एक चांगली गोष्ट असली, तरी ते
आपल्याही डोळ्यात अंजन घालणारे, एक सत्य नक्कीच आहे, हे विसरून चालणार नाही. निदान आतातरी आपण आपल्या पद्धती व परंपरा ह्या वैयक्तिक व समाजोपयोगी आरोग्य निकोप रहावे, ह्या द्रुष्टीने बनविल्या गेल्या होत्या हे मान्य करायला हवे.
( हा परिच्छेद ही सूक्ष्म निरीक्षण व चिकीत्सा नव्हे कां?)

पण तसे करताना, ह्या टप्प्यावर त्याकरीता फुका अभिमान बाळगणे, असंयुक्तिक नाही कां? कारण आपणच मोठ्या ऐटीत west-word बनत जाण्यात, गेली काही दशके आनंद मानत गर्वाने जगण्याचा मार्ग स्विकारत गेलो, नाही कां?
( वरील परिच्छेद हा खरा Rejoinder नाही कां?)

सारांश हाच की नीर क्षीर विवेक करत, आपण आता योग्य तो जीवनशैलीचा मार्ग कटाक्षाने धरला पाहिजे.

"सुदिना"
----------------------------

आमच्या whatsapp ग्रुपवर कुणीतरी कल्पना मांडली की, तुमच्या खिडकीतून बाहेरचे निसर्गाचे फोटो शेअर करा. ते मांडले जात असताना, दुसर्‍या एकाने मध्येच जणु (खवचट) प्रश्न केला, तो असा:

"When was last, we really looked at outside nature with such feel!!"

त्यावर तोडीस तोड मी नीट विचार करून संदेश हा टाकलाः

"Reproducing my unanswered post of 20th March:

"सकाळी घराच्या खिडकीतून बाहेर बघितलं की, उगवणारा सूर्य असा दिसतो, त्याप्रमाणे ह्या झाडावरुन त्या झाडावर किंवा इकडून तिकडे कुठेही झेप घेणारे कावळे व चिमण्या नजरेस येतात. नेहमी मला नवल हे वाटते की, त्यांचे एवढे बारीक डोळे आणि त्याचा उपयोग ठरवून ते कुठे जायचं तो मार्ग कसा काय निवडतात व तेथे पोचतात हा यक्षप्रश्न !
त्याचे उत्तर काय आहे कोणी सांगेल कां?"

यांत प्रतिसादात मूळ विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर उत्तर होतेच, पण त्याचबरोबर शेवटचा अनुत्तरीत प्रश्न बहुधा हे सांगत होता की, तुमच्यापैकी कोणीच काही कधी बाहेर कधी बघत नाही!
--------------------------
समाज माध्यमांवर मी जो असतो तो असा! त्याची आचारसंहिता मी अशाच तर्हेने बनवून प्रकाशित केली होती. मला लेखक म्हणून काही ना काही मिळते कां हे मी नेहमीच पहात राहतो. आलेले मी कुठलेच संदेश पुढे सहसा पाठवत नाही, फोटो व्हिडिओ जर कशाबद्दल आहेत ते लिहिले नसते तर न बघताच सारे डिलीट करतो.

फेसबुक व व्हाट्सऍप, ही माझी लेखक म्हणून मला घडवणारी एक प्रकारची जिम्नॅशियम आहे असे मी मानतो. गेल्या दोन तीन वर्षात तर ह्या जिम मध्ये मी खरोखर 'घाम' घालतोय आणि तो तुम्हाला माझ्या ब्लॉग मधील दीड-दोनशे लेखांमधून समजतोय!
जाताजाता ब्लॉग ची लिंक देऊन जातो:

एकसे बढकर एक शंभराहून अधिक लेख..... वाचण्यासाठी.......
ही लिंक उघडा.......
आपल्या wapp group मध्ये शेअरही करा:

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू.

ता.क.
हा लेख प्रदर्शित केल्यावर.....
खुसखुशीत पोस्टिंग करण्याच्या विषयासंबंधी एक आव्हान म्हणून एका ग्रुप वर सद्यस्थितीत कोरोनाबद्दल माहिती देताना कोणती भाषा आवश्यक आहे, ते उलगडणारा व्हिडिओ बघायला मिळाला. तो विख्यात मानसतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचा होता.
ते मी असे स्विकारून हा वादग्रस्त (?)
संदेश पहाता पहाता बनवत गेलो.
"बिंब-प्रतिबिंब" असे हे बौद्धिक कोड्याचे उत्तर समजावे ही विनंती:

डॉक्टर साहेबांनी जे विचार अत्यंत संयमितपणे व सध्याच्या काळात एक मानसशास्त्रज्ञ डॉक्टर म्हणून नैराश्य येऊ नये, याकरता जे विचार मांडले आहेत. ते वास्तवाचे दर्शन, उगाचच भीती वाटू नये अशा तऱ्हेने व्यक्त कसे करायचे ते समजणार्या भाषेत मांडले आहेत. निश्चितच ते अनुकरणीय आहेत यात वादच नाही.

परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, यातील विचार जर प्रत्यक्षात आणायचे असतील, तर ते सर्वसामान्यांना समजतील, त्यांच्यावर हवा तो परिणाम करतील, असे असायला हवेत. याबाबतीत जर सखोल विचार केला तर, अशा संयमी बाळबोध अशा शब्दरचनेमुळे, 'कोरोना'चे जे संकट आ वासून उभे आहे, त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची आवश्यकता पाळली जाण्याची शक्यता कित्पत असेल?

आपण सध्या गर्दी करून सर्वसामान्य हातावर पोट असणारी मंडळी, कशा भयानक धोकादायक तर्हेने वागत आली आहेत, हे पाहतच आहोत. म्हणूनच कदाचित हेही खरे की, सध्याच्या भेदक वेधक अशा शब्दातील दिल्या जाणार्या माहितीमुळेही, ही धायकुतीला येण्याची स्थिती त्यांच्या मनात निर्माण झाली असेल. पण शब्द असे सौम्य ठेवून ह्या विषयाचे गांभीर्य कित्पत राखले जाऊ शकेल ह्याचा विचार अधिक महत्वाचा ठरावा !"


सुधाकर नातू

शनिवार, २८ मार्च, २०२०

"Management Musings-2": "The Empires of Mind":


"Management Musings-2":
"The Empires of Mind":

First, A Happy Gudhi Padwa and my best wishes for the New Year.

As luck would have it, on the morning Tea Time of that day, I happened to
go through the last few pages from my old note book of around 15 years ago, wherein I used to write significant extracts from various books on Management, read by me then. Therein were the notes from a book aptly titled:
'The Empires of Mind', written by Denis Waitly.
For your benifit, I am sharing very useful inputs from the same here:

# Global competition makes yesterday's World Records, today's entry level requirements.

# You must welcome change as the rule but not as a your ruler.

# The source of power has shifted from capital resources to human resources, from natural resources to the knowledge resources, from position status to relationship process, from share owner clout to customer clout.

# Some of us are doing the right things at wrong time, some are doing wrong things, all the time!

# Throughout our lives, we use only a fraction of our thinking ability.

# You must continue to gain expertise but avoid thinking like an expert.

# Lifelong learning, once a luxury for the few, has become vital and almost essential for continued success.

# You must accept responsibility for your actions but not the credit for your achievements.

# Case after case has demonstrated that responsible self-control leads to sound mental health.

# Have willingness to work hard today for a better tomorrow and for the sake of tomorrow's better rewards.

# So far, we have been dealing with the symptoms, the Secret is changing the cause.

# Reading, writing, arithmetic and responsibilities are the most important 4 'R's, today.

# You must stick to your convictions but be ready to abandon your assumptions.

# Conventional wisdom is nothing more than consensus of opinion, until someone replaces it with something better.

# Management by command and control is the thing of the past, it's now time for empowering others.

# My rewards in life will reflect, my service and contribution.

# If you really want to do your best, you must continuously re-examine what you need for that and what you have to offer.

# Learning about something is a far cry, from actually doing.

# Life is like a field of newly fallen snow, where I choose to walk, every step will show.

# You must consider the bottom line but make the integrity before profit.

# You must view performance as reflection of value but not a measure of it.

# Sense of belonging, individual identity, worthyness, control & competance are the four senses, one has to be concerned about.

# You must feel worthy of the best but not more worthy than the rest.

# The Diamond is within us, waiting to be discovered and shaped and polished.

# The trendsetting organisations are open to new ideas and committed to giving their employees latitude to make decisions.

# You must fulfill your expectations but they may not be, what you want.

# Chase your passion, not your pension.

# You must get money to chase you, but never let it catch you.

# The passion of knowing what you want to do and where you want to go puts you, halfway down the road to the Empire in your mind.

# You must look within for value but must look beyond perspective.

# You must participate in person but lead invisibly.

# Nothing can really substitute job satisfaction, the prime motivator of employee loyalty and performance.

# You must yield authority but gain strength in the process.

# If you don't tolerate experimentation, you avoid two things-failure and success.

Thank you
Compiled by
Sudhakar Natu

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

"Management Musings-1": 'Looking Within":


"Management Musings-1":
'Looking Within":

Corona crisis has been one of the greatest threat mankind has ever faced in its History. But with a positive state of mind, it can be looked upon as an opportunity because it is giving all of us a total new experience and making time available to explore ourselves and find out what we best at and what therefore, we should do.

While I was thinking on those lines in the morning today as per my regular habit at the morning Tea Time, I just opened my Treasure book of management notes which I had compiled after reading a number of books from management experts almost 15 years ago. Now today I am going to share with you, the page, which I opened and started reading it, is about knowing yourself, what you are and what you should be and what you can be.

The management notes go on like this:

"In today's knowledge economy where people are the only resource, self knowledge is the key for Organisational and personal transformation. You must look at you as a brand and for that you must be aware of your beliefs and values, feelings, vision and your levels of self acceptance, self expression, your self confidence about your unique contribution.

At the core of honest expression is the self expression. Everyone is unique and you are, what your parents and what experience you went through so far. Your future depends upon your present personal responsibilities and on how well you shoulder the same.

You must first have a clear definition of success in life. It is the outcome of your purpose: why you are, what you are. The purpose tends to define the boundaries of quality of life, you wish to strive at and enjoy. A successful person becomes an inspirational brand.

Find out what is the reason for you, to work :to get money, to get name and fame, to enrich yourself and grow or any other. What kind of work environment and people characteristics you are comfortable with and enjoy.

0ur thinking system is a five step pyramid:
1 Beliefs and Values,
2 Thoughts and Expectations,
3 Emotions,
4 Behaviour and
5 Actions.

Please remember:
Behaviour is, how you do,
Action is, what you do.

Building beliefs is like learning to drive, as you learn to drive, it becomes habit and you are not conscious about how to drive.

Values define what is most important to me what are my specific priorities outside work and at work.

You need to find out white kind of change you intend to have in the context of variety of issues such as:

Meaningful work, security, love, family, competition status,
personal growth, health,
community service, adventure
Peace of Mind, Wealth,
Making a difference, Power Happiness, Integrity, Recognition Respect, Loyalty,
Independence, Wisdom, Team work
Leasure, Variety

Just to know, where you are now on your next birthday, please try to imagine what following three persons would say about you:
1 A family member
2 A Friend
3 Former colleague

Also try yourself to answer:
1 What are your thinking and How & Why?
2 How are you feeling?
3 What are your insights for today and future.

And finally...
Seven introspectIve thoughts:
1 Don't be rich Money wise-Time poor.
2 Have full faith/pride in what you do.
3 Put family first, before your career. 4 Be a Dream Catcher.
5 Identify your 'X' Factor.
6 Don't lose the common touch.
7 Don't settle for success but for significance.

By R Parsons.
---------------------------------------
So friends that's all for the day.
I do hope it's valuable to you.



Thank you.
Compiled by
Sudhakar Natu

बुधवार, २५ मार्च, २०२०

"हृदय संवाद-१५": "आत्मा प्रेरणा-आत्मविकास ते आत्मसमाधान":


"हृदय संवाद-१५":
"आत्मा प्रेरणा-आत्मविकास ते आत्मसमाधान":

आजपर्यंत मला रोज काल मी काय काय महत्वाचे योगदान मी केलं हे नोंद करून ठेवायची सवय आहेत. परंतु आता तर कोरोनाच्या या महान संकटामुळे कायम घरातच बसून राहायची वेळ आल्यामुळे, उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करायचा असे मी मनाशी ठरवले आहे. सहाजिकच प्रत्येक दिवशी काल काय केले याची नोंद मी आवर्जून घेणार आहे आणि घेत आहे.

काल मी खरंच काय केले?
काल होता गुढीपाडवा, त्यामुळे तो अत्यंत महत्त्वाचा नववर्षारंभाचा दिवस.

१.
प्रथम माझ्या व्यवस्थापन शास्त्रावरील
वहीमधील अत्यंत उपयुक्त असे विचार मी ध्वनिफितीमध्ये रेकॉर्ड केले. आणि माझ्या
°एस एम डी पी° या ऑनलाईन ग्रुप वरील सभासदांना वितरीत केले.


दुसरी गोष्ट म्हणजे "आजोबांचा बटवा-२" हा एक विचार प्रवर्तक व ललित लेख लिहून मी पूर्ण केला व ब्लॉग वर टाकला.


त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे माझे तीन गुढीपाडवा विशेषांक-
"ह्रदयसंवाद", "रंगांची दुनिया",
आणि "वाचा फुला आणि फुलवा"
ह्यांची तीन वेगवेगळी रंगीत मुखप्रुष्ठे प्रथम बनवली. नंतर प्रत्येक अंकाच्या वर्ड फाईलही पीडीएफ मध्ये रूपांतरीत केल्या. प्रत्येक अंकामध्ये वेगळेपण यावे हा हेतु त्यामुळे पूर्ण झाला.

स्वत:च स्वतःला शिकवत ते काम मी केले हे एक आश्चर्य.

वर्ड फाईल पीडीएफ मध्ये रूपांतरीत करायची किमाया आता मला साधली, नाहीतर आजपर्यंत मी ते माझ्या मुलाकडून करून घेत असे. आपण स्वतःचे स्वतः कसे शिकायचे? ते अवघड वाटते खरे, परंतु ती प्रक्रिया ही एक मोठी गंमत असते हे मला ह्या अनुभवामुळे जाणवले. त्यामुळे यापुढे कुठल्याही अडचणी आल्या तरी, आपण डगमगून न जाता, कितीही तांत्रिक गुंतागुंत असली तरी, आपणच स्वतःचे स्वतः शिकायचे, हा विचार मी पक्का केला आहे. ह्यापुढील माझ्या आगामी डिजिटल अंकांची रचना व सुशोभीकरण, मी माझ्या मुलाला त्रास न देता स्वतः करायची ही जिद्द मला गवसली.
ही आजची मोठी कमाईच, नव्हे कां!

४ व ५
हे सर्व अंक तयार झाल्यावर मी ते ज्यांना हवेत त्यांना वितरित केले. त्यासंबंधीचे प्रचार पत्रक मी काही कालच विविध लोकांना सोशल मिडीया वरून पाठवले होते. आजही ते आणखी पुष्कळांना पाठविण्याचे कामही मी पूर्ण केले. दिवस अखेर जवळजवळ २५ हून अधिक अशा इच्छुक वाचकांना हे तीनही अंक मी पाठवले.

ह्यापुढील काही दिवस, मला जसे इच्छुक वाचकांचे होकार येत जातील तसे ते अंक पाठवण्याचे आनंददायी काम मिळणार आहे !

तेव्हा, ही होती माझी गुढीपाडव्याच्या दिवशीची कमाई.

"आत्मा प्रेरणा-आत्मविकास ते आत्मसमाधान":
नववर्षाचा आरंभ असा चांगला झाला, याचा मला मनापासून खूप आनंद होत आहे.
ह्या अनुभवावरून मला कळून चुकले आहे की, आत्मप्रेरणा ही एक महत्त्वाची भावना आहे. तुम्हाला आपण काही ना काही तरी नवीन करावे अशी इच्छा निर्माण होणे आणि त्याप्रमाणे उद्युक्त होऊन तुम्ही ती कृती करायला लागणे, ही जी काही प्रक्रिया आहे, ती आत्मप्रेरणा होय. ती प्रक्रिया तुम्हाला नवनवीन कामे सहजपणे करून देण्यास उद्युक्त करते.

जसजसे तुम्ही आपल्याला हवे ते ध्येय पार करत जाता, त्याला आपण अचीवमेंट achievement वा accomplishment असे म्हणतो. तर "अचीवमेंट मोटिवेशन" हे आपोआपच त्यामुळे तुमच्या मनात, उत्साहाची नवी ऊर्जा निर्माण करते आणि पाहता पाहता तुमचा आत्मविकास करण्याचा मार्ग खुला होतो.

सारांश, आत्मप्रेरणा म्हणजे ठरावीक ध्येयपूर्तीची इच्छा, त्यामुळे योग्य कृती, त्यामधून ध्येयपूर्ती. ती पूर्ण झाल्याचे आत्मसमाधान तुम्हाला मिळणे स्वाभाविक होते. ह्या सार्यामुळे तुमचा आत्मविकास आणि आत्मविकास जसजसा अधिकाधिक होत जाईल तसतशी तुमची
आत्मप्रेरणा अधिकाधिक निर्माण होत जाईल असे हे तुमच्या जीवनात अव्याहत चालणारे चक्र, एकदा कां निर्माण झाले की, तुम्ही मागे वळून पाहत नाही. कुठल्याही प्रसंगाला, सभोवतालचं वातावरण किती जरी प्रतिकूल, निराशाजनक असलं, तरी तुम्ही "With Back to the Walls" अशा जिद्दीने पुनश्च उभे राहून इतरांना चकित करू शकतील अशीही कामे व योगदान देऊ शकता.

असा हा अविस्मरणीय अनुभव मला गुढीपाडव्याच्या दिवसाने दिला आणि तो मी फक्त इथे तुम्हाला पुन्हा वाटला. मला आशा आहे की, ज्या मनोभूमिकेत-Mindset मध्ये मी आहे, त्याच मनोभूमिकेत तुम्हाला देखील प्रवेश करता येईल. या आत्म प्रेरणेच्या चक्रावर तुम्हीदेखील आरूढ होऊन आपला आत्मविकास ते आत्म समाधान साधू शकाल अशी मी आशा करतो.

नववर्षाच्या मनःपूर्वक पुनश्च शुभेच्छा.

जाता जाता, आज हा लेख, अशा तऱ्हेने पहाता पहाता सहजगत्या लिहिला जाणं, ही देखील एक आत्मप्रेरणा ते आत्मसमाधानाची गोष्टच !
-------------------------------
असेच शंभराहून अधिक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......
wapp grp वर शेअरही करा......

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू
२६/३/२०२०
ता.क.
To this article, I was extremely happy to receive
from one of the SMDP participants, a Comment and a Question, I feel honoured to share them here with you with my responses. I am sure you would find them enjoyable.

Comment:
👍
Farch structured, focused working

My Response:
"Thanks. Honestly, today, after a while, there was nothing else to do, I just looked back, at what did I do y'day and lo, magic happened, like a waterfall, words flowed and rest is with you now to see and follow."
-------------------------
👍
Question:
Where do you get the energy?.....

My Response:
"Frankly, probably I am the laziest person in my family and relatives. My father sarcastically used to call me "जांभूळलोट्या !"-म्हणजे असा माणूस जो आडवा पडला आहे, त्याच्या ओठांवर एक जांभूळ विसावलेले आहे आणि ते तोंडात ढकलण्यासाठी तो दुसर्या कुणाला तो बोलावतो असा मुलखाचा आळशी माणूस!

But yes, may be I happen to be more a thinker than a doer, a philosopher critic. So, there is an inbuilt urge, whatever little I must do, must be different and meaningful. That's what must have imbibed in me the much needed, Achievement motivation.

आपल्या जवळ जे जे चांगलं विचारधन, इतरांना उपयुक्त असं काही असलं, तर ते देत रहावं, हा माझा मार्ग मी चालण्याचा यत्न करत आहे.
And the rest is here in the form of SMDP."

Sudhakar Natu


"आजोबांचा बटवा-२":


"आजोबांचा बटवा-२":

"जन्मगाठ":
जीवनामध्ये जन्म गाठी स्वर्गात बांधल्या जातात असा एक समज आहे. त्यासंदर्भात मी सहज काही वाचायला मिळते कां, ते पाहत असताना माझ्या ट्रेझर बुक मध्ये ही नोंद आढळली:

"शक्यतोवर जोडीदारांचे जमणे दुर्मिळ असते, हे नेहमी ध्यानात ठेवावे. कारण प्रत्येकजण वेगळ्या स्वभावाचा असतो. शक्यतो आपल्या वाट्याला जो माणूस किंवा जोडीदारा आला आहे, त्याच्या स्वभावाशी मिळतेजुळते घेण्याचा ज्याने-त्याने आवर्जून प्रयत्न केला, तर उत्तम विवाहसौख्य मिळण्याची शक्यता असते. विवाह ही स्त्री पुरुषांची एक अपरिहार्य गरज आहे, शारीरिक गरजेपासून सुरू झालेले सहजीवन भावनिक मानसिक व सांस्कृतिक गरजांमुळेही हवेहवेसे वाटत असते. विवाहासाठी म्हणूनच वयाचे बंधन नाही, ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. सर्वसाधारण कोणत्याही नियमांत विवाह जोडीदाराची निवड, या गोष्टीला बसवता येत नाही. मूल होणं वा न होणं, हे ज्याचं त्याचं प्राक्तन असतं. एखादं मूल दत्तक घ्यावं की नये हे ज्याचं त्याने ठरवावं. आपल्या जवळच्या नात्यातील एखाद्या मुलाला दत्तक किंवा मुलीला दत्तक घेणंही चांगला. प्रेम ही आंतरिक उमाळ्याची बाब ठेवा, ती दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालावा इतकी असोशी गाठते, तेव्हा ती त्या जोडीदाराची कसोटी ठरते. माणसांनी शक्यतो रिस्पान्सिव्ह असावे, रिएक्टिव असू नये. मैत्री ही मनमोकळी निर्मळ व निरपेक्ष मैत्री असावी, त्यात अपेक्षांच्या अटींची शक्यतो असू नये अर्थात अशी निखळ मैत्री विरळाच आणि कठीणच."
--------------------------

"सुविचार":
# कोणाच्यातरी मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहावे.

# केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे.

# आपल्या सुखाचे निर्माते आपणच असतो.

# सतत नाविन्याचा ध्यास घ्यावा, सतत काही नवे शिकण्याची आत्मसात करण्याची किमया साधावी.

# फक्त ध्येय व उद्दिष्ट उराशी बाळगून चालत नाही, त्यासाठी अविरत कष्ट हवेत.

# आपली दुर्बलता हाच आपल्या आयुष्यातील मोठा दोष आहे.

# कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यासाठी जिभेवर मध व डोक्यावर बर्फ हवा.

# दुसऱ्याचे वाईट चिंतून, आपले कधीही बरे होत नाही.

# "भावनांचे सामर्थ्य":
जाणून घ्या, भावना एक अदृश्य शक्ती आहे. माणसाच्या जीवनाचा सुखदुःखाचा मार्ग भावनांच्या खेळामुळे ठरतो.
--------------------------
"अवधान एकले दीजे":
महाराष्ट्र टाईम्स: सगुण-निर्गुण
लेखिका-डॉक्टर मंगला वैष्णव

"लक्ष असणं महत्त्वाचं आहे. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या माध्यमातून आजही आपणास सर्वांना सहज अवधानाचे महात्म्य सांगितलं आहे.

आपल्या जीवनात जे साध्य करावयाचे असेल, त्यासाठी अवधान देणे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीचं स्वभावाप्रमाणे स्थान अपेक्षेपेक्षा वेगळं असतं. पण कोणत्याही ध्येयासाठी, लक्ष देणे फार आवश्यक आहे. महाभारतातील अर्जुनाचा एक प्रसंग तुम्हाला माहिती आहे. त्या पक्षाचा डोळा, फोडावयाचा होता. द्रोणाचार्यांनी सर्व शिष्यांना काय दिसत आहे हे विचारले, प्रत्येकाने वेगळे उत्तर दिले, केवळ अर्जुन म्हणाला "मला फक्त पक्षाचा डोळा दिसत आहे" ही अवधानाची परिसीमा.

साधी गोष्ट आहे, शाळेत शिक्षक शिकवत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, त्यावेळी ज्या विद्यार्थ्यांचे लक्ष वर्गाबाहेर होते, तो गडबडला. शिक्षक म्हणाले ''कुठे लक्ष आहे तुझं?' याचा अर्थ आहे की, प्रत्येक ठिकाणी लक्ष असणे आवश्यक आहे. म्हणजे त्या गोष्टीचं आकलन होतं. पशुपक्षी एकावधानी असतात, पण मानव अष्टावधानी असतो. अष्टावधानी म्हणजे असा अर्थ अभिप्रेत असतो, की तो एका वेळी अनेक कामांकडे लक्ष देतो. अभ्यास करताना लक्ष नसेल, तर अभ्यास लक्षात राहत नाही. रस्त्यावर लक्ष विचलीत झालं तर अपघाताची भीती.

अध्यात्मामध्ये तर अवधान फार महत्वाचे. जप तप साधना करीत असताना, मन एकाग्र झालं नाही, तर समजून घ्यावं की लक्ष विचलित झाले आहे. विश्वामित्राची घोर तपश्चर्या मेनकेच्या न्रुत्यामुळे विचलित झाली. त्यांचं तपश्चर्येवरील अवधान डळमळलं आणि ते तिच्या मोहात पडले.

अवधानाचे महत्व सर्वकालिक आहे, याची जाणीव ठेवून प्रत्येक व्यक्तीने कार्य करावे. ते कार्य लहान आहे की मोठं आहे, हा प्रश्न गौण आहे. अवधान आणि कार्य समांतर असेल तर कार्य परिपूर्ण केलं जात असते. साध्या गोष्टीतून अवधानाचे महत्त्व आणि अर्थ कळला की ज्ञानेश्वरांच्या ओळीचा अर्थ लक्षात येईल, तो अर्थ जीवनाशी ताडूनही बघता येईल.
-------------------^-----

"सुविचार":
"यशाची मूलभूत सूत्रे"
श्री यशवंत भोगले (निर्लेप उद्योग)

# "कार्यमग्नता आणि जबाबदारीने काम करणे.

# दूरदृष्टी आणि चिकाटी दक्षता नीटनेटकेपणा आणि वेळेची किंमत बोलण्यापेक्षा प्रात्यक्षिक अधिक परिणामकारक लोकव्यासंग वाढवणे.

# स्पर्धा म्हणजे अविरत गुणवत्ता विकास

# व्यवसायातील फायद्यापेक्षा ग्राहकांचे समाधान व खात्री अधिक श्रेष्ठ.

# सचोटी पारदर्शक व्यवहार हवा.

# प्रश्न असा की, यापैकी किती आपण आत्मसात केले आहे व प्रत्यक्षात आणले आहेत हे पाहायला हवे.
----------------------------
असेच एकसे बढकर एक शंभराहून अधिक लेख..... वाचण्यासाठी.......
ही लिंक उघडा.......
आपल्या wapp group मध्ये शेअरही करा:

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू

रविवार, २२ मार्च, २०२०

"ह्रदयसंवाद-१४": "आजचा दिवस, माझा !":

"ह्रदयसंवाद-१४":"आजचा दिवस, माझा !":
नेहमी, मी रोज सकाळी, काल काय केलं, त्याची कित्येक दिवस एका वहीत नोंद करत आलो आहे आणि आता तर अशा उपक्रमाची आवश्यकता आहे. कारण आपण वेळेचा उपयोग अधिक चांगल्या कामासाठी करू शकतो, याची जाणीव बहुदा व्हायला हवी. कारण वेळच वेळ सगळ्यांना आता उपलब्ध आहे.

ह्या संवयीमुळे, आजचा दिवस, कालच्या पेक्षा चांगला कसा करायचा, हे त्यामुळे उमजेल, रोजच्या रोज!---------------------------"मुखवटे आणि चेहेरे"!:विचार, उच्चार आणि आचार ह्यामध्ये, एकवाक्यता ठेवणे, सगळ्यांना जमतेच असं नाही. ते जमण्यासाठी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि निस्पृहता असे मूल्याधिष्ठित गुण अंगी असावे लागतात.

चंगळवाद आणि "अर्थ हाच सर्वार्थ" मानणाऱ्या आजच्या युगात, सहाजिकच हे सारे गुण दुर्मिळ होत चालले आहेत.

सहाजिकच आपल्याला सभोवताली दिसतात, वावरतात, ते मुखवटे आणि चेहेरे, चित्रविचित्र अन् विश्वास न ठेवण्या जोगे!

"कालाय तस्मै नमः" दुसरं काय?!---------------------------"मतभिन्नता":एखाद्या व्यक्तीबद्दल अथवा घटनेबद्दल आपले जे मत असेल, तसेच दुसर्‍या कुणाचे असेलच असे नाही. त्याचे मत अगदी आपल्या विरुद्ध असू शकते.

आपले मतच बरोबर आहे, हे दुसऱ्याला त्यामुळे पटवून देणे कर्म कठीण असते, कारण "पिंडे पिंडे मतीर्भिन:!" दुसऱ्याच्या नजरेतून बघण्याचा चश्मा सहसा कुणाकडे नसतो. बहुतेक वाद-विवादांचे, मतभिन्नतेचे मूळ हेच असते.---------------------------"पक्षी जाती दिगंतरा!":सकाळी घराच्या खिडकीतून बाहेर बघितलं की, उगवणारा सूर्य असा दिसतो, त्याप्रमाणे ह्या झाडावरुन त्या झाडावर किंवा इकडून तिकडे कुठेही झेप घेणारे कावळे व चिमण्या नजरेस येतात. नेहमी मला नवल हे वाटते की, त्यांचे एवढे बारीक डोळे आणि त्याचा उपयोग ठरवून ते कुठे जायचं तो मार्ग कसा काय निवडतात व तेथे पोचतात हा यक्षप्रश्न ! त्याचे उत्तर काय आहे कोणी सांगेल कां?----------------------------"Look within and Introspect!":I believe in today's testing times, above saying is more than true and needs to be done by one and all, as never before such situation of "ample 'disposable Time' was available to us.
I came to the above conclusion, due to one of my facebook postings that briefly appreciates a Marathi drama "Selfi", now I reproduce here:
"Selfi":"I saw the drama 'Selfi'. With the accidental meeting of 5 ladies, unknown to one another, at a Railway waiting room, their individual plights of trauma and agony get unfolded, as they gradually open up their minds in this poignant drama.

The first one's almost failed marriage is due to her acid tongue and self imposed perfection, while the other's decision of undergoing abortion is because of her clinging to her super stardom; while the third's agony of childlessness is due to her being a blind follower of her husband's whims.

The remaining two, who happen to be the sisters are in turmoil, due to the loneliness of one and other's selfish lust.

True to the title 'Selfi' the obvious solutions, come into the light and practice, due to their Selfies i.e. looking within."
म्हणूनच "आजचा दिवस, माझा !" असं रोजच्या रोज अनुभवायचं असेल, तर जरूर मागे वळून पहायची संवय लावून घ्या.......--------------------------हे आत्ता सकाळी ९ वाजता लिहीता लिहीता,आजचा दिवस, माझा !" झाला की हो राव!!
असेच अनेक लेख
आवर्जून वाचा......ही लिंक उघडा..आपल्या wapp group मध्ये शेअरही करा
http//moonsungrandson.blogspot.com
धन्यवादसुधाकर नातू२३ मार्च २०२०



शनिवार, २१ मार्च, २०२०

"ह्रदयसंवाद-१३": "जीभेवर साखर अन् डोके ठेवा शांत":

"ह्रदयसंवाद-१३":
"जीभेवर साखर अन् डोके ठेवा शांत":

"कोरोना' सारख्या संकटामुळे आता घरीच बसण्याची वेळ पुष्कळांवर आली आहे. सर्वजण घरी असल्यामुळे आता सलोख्या ऐवजी वाद-विवाद होण्याची शक्यता अधिक आहे आणि घरातील शांतता त्यामुळे बिघडू शकते. काल मला माझा एक मित्र एक बातमी सांगत होता की, 'कुठल्यातरी देशात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर, जेव्हा लॉक डाऊन दूर करण्यात आला, त्यानंतर घटस्फोटांचे प्रमाण खूप वाढले !' ह्या गोष्टीचा आपण आत्ताच गांभीर्याने विचार करायला हवा.

मुळातच मी तसा घरकोंबडा, आपले घर बरे, आपण बरे अशी माझी व्रुत्ती आहे. त्यामुळे निवृत्त झाल्यावर शक्‍यतोवर घरातच बसण्याची वेळ मला जड गेली नाही. माझी जे काही छंद असतील त्यात आपले आपण गुंतत, माझा मी वेळ मी आपल्याच मस्तीत काढू शकत होतो. सहाजिकच, सध्याच्या "कोरोना" संकटापायी, मला असे आता घरात सक्तीने राहण्याचे एवढे काहीच वाटत नाही, उलट सध्याचे संकट ही एक संधीच आहे, असे मी मानतो.........

आजची सकाळ मी हा लेख लिहीण्यात व सादर करण्यात वापरतो आहे.......

"जीभेवर साखर अन् डोके ठेवा शांत":

पुष्कळदा, गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात, त्याला कारण आपल्या वागण्याचे असू शकते किंवा इतरांकडून आपल्या अपेक्षा पूर्ण न होण्याचे असू शकते. आता इथे इतर म्हणजे, व्यक्ती असू शकतात अथवा एखादी घटना वा सार्वजनिक व अपेक्षित अशीच सेवा असू शकते. त्यामुळे आपला राग संताप अनावर होतो आणि त्याचा परिणाम अतिशय अनिष्ट होतो. आपण रागाच्या भरात इतके काही बोलून जातो की, त्यामुळे परस्पर संबंधातही वितुष्ट येते, आपली मनःशांती ढळून जाते. नंतर आपल्याला कळतं, की असं वागायला नको होतं.

असे उद्वेगजनक अनुभव जेव्हा जेव्हा निर्माण होतात, तेव्हां मन अस्वस्थ होऊन खळबळ निर्माण होते. ती खळबळ टाळण्यासाठी काय करायला हवे, याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे गरजेचे आहे. आपल्या अपेक्षांप्रमाणे गोष्टी नेहमी घडत असतातच असे नाही, हे प्रथम ध्यानात ठेवायला हवे. प्रतिकूल तेच घडू शकते ही जाणीव ठेवावी. आपण जे काही निर्णय घेतो, क्रुती करतो, त्यांचे आपल्याला योग्य तसे परिणाम मिळतातच असे नाही. आपण नेहमी आपल्या कम्फर्ट झोनमध्ये गोष्टी घडाव्यात ही अपेक्षा करतो, ते बरोबर नाही. कारण अनेक घटना विपरीत होऊ शकतात. दुसरे असे की, आपण योग्य ते नियोजन करत नाही वा कोणत्या वेळी काय बोलावे, अपेक्षित प्रतिसाद मिळण्यासाठी खरोखर वागावे हे आपण समजू शकत नाही.

आश्चर्य हे आहे की, हे सारं समजूनही आपण पुन्हा त्याच त्याच चुका करत राहतो आणि अशा तऱ्हेचे उद्वेगाचे, रागाचे प्रसंग अजून मधून येतात. त्यापायी आपल्याला नैराश्य किंवा अतिरेकी संताप निर्माण होऊ शकतो. हे आपल्या प्रक्रुतीलाही योग्य नसते, शांत राहणे हे खरे गरजेचे असते. त्याकरता आपल्या अपेक्षांनुरुप योग्य ते नियोजन वेळेत करावे. इतरांचे स्वभाव व अपेक्षा आणि वागणे आपल्या हातात नसते. स्वतः होऊन कुणी आपल्यात सहसा बदल करत नाही, या सत्याचा जर आपण स्वीकार केलात तर बऱ्याच गोष्टी तसेच समस्या दूर होतील. आहे ती परिस्थिती जशीच्या तशी स्वीकारणे हे ज्याला जमते, तोच आनंदी आणि शांत राहू शकतो.

थोडक्यात जे आपल्याकडे आहे, पण इतरांकडे नाही, त्याचा विचार न करता, आपण नेहमी अशी व्यथा फक्त करत असतो, की दुसऱ्याकडे जे आहे ते माझ्याकडे का नाही! हीच आपली महान चूक असते.
"Accept, Adjust and Adopt"
हा मंत्र प्रत्यक्षात आणणे,आज प्रकर्षाने आवश्यक असे शहाणपण होय.

ह्या नंतरच्या कदाचित अनिश्चित काळापर्यंत बहुतेकांना घरीच बसण्याची वेळ अपरिहार्य व रास्त होणार असल्याने, माझे हे विचार उपयोगी पडावेत, अशी मला आशा आहे.
---------------------------
"सुसंगती सदा घडो":

"आजोबांच्या बटव्या"तील कालची कहाणी 'चांगुलपणाची साखळी' ही सर्वांना खरोखर आवडली. आज त्या गोष्टीचा विचार करताना असे वाटते की ही "चांगुलपणाची साखळी" नुसती हरवलेलीच नाही, तर कदाचित नामशेष झाली की काय, अशी परिस्थिती व आसमंतातील माहोल सध्या आहे. नैतिकता, वैश्विक मूल्ये म्हणून काही उरलेली नाहीत आणि सर्वस्तरांवरील गुन्हेगारी, अधमपणा स्वार्थ, अशा नकारात्मक गोष्टींचा अक्षरशः या कलियुगात धुमाकूळ चालला आहे.

अशामुळे कदाचित जे दुखावले जातात, फसवले, विविध प्रकारच्या नुकसानीत जातात, त्यांच्या मनातील उद्विग्नतेतून, प्रखर नकारात्मक
विचारलहरी निर्माण होत असतील. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरण व वातावरण बिघडून कदाचित कोरोनासारखे काही व्हायरस निर्माण होत असू शकत असतील कां? सर्वंकष जागतिक अपराधांची शिक्षा म्हणून, जणु सर्वांनाच आप आपल्या घरांमध्ये नजरकैदेत म्हणूनच बंदीवान व्हायची वेळ आली नाही ना? ह्याबद्दल सखोल शास्रीय संशोधन होणे जरुरीचे आहे.

आपल्या इथे "दृष्ट लागणे" हा जो प्रकार आहे, त्यामागे देखील हे असे नकारात्मक विचारलहरींचे अनिष्ट व वाईट परिणाम असतात, ही संकल्पना असू शकेल कां?

अशावेळी सहाजिकच आमच्या लहानपणीच्या प्रार्थनेतील या ओळी आठवतात:

"सुसंगती सदा घडो,
सुजनवाक्य कानी पडो,
कलंक मतीचा झडो,
विषय सर्वथा नावडो."
--------------------------

धन्यवाद
सुधाकर नातू
२२/३/२०२०
सकाळी १०-३०

गुरुवार, १९ मार्च, २०२०

"आजोबांचा बटवा": "चांगुलपणाची साखळी":


"आजोबांचा बटवा":
"चांगुलपणाची साखळी":

"कोरोना' सारख्या संकटामुळे आता घरीच बसण्याची वेळ पुष्कळांवर आली आहे. त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यातून आता करायचे काय, हा यक्षप्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण होणार आहे.........

मी तरी हे समजतो की, आता आलेले संकट ही एक संधीच आहे. आता मला माझ्या ब्लॉगवर दररोज नवनवे विचार व अनुभव मांडणारे लेख लिहीता जसे येतील, माझ्या चँनेलवरील विडीओज लोकांपुढे अधिकाधिक आणता येतील. ते लेख वाचण्यासाठी व विडीओज् पहाण्यासाठी कितीतरी जास्त संख्येने वाचक व प्रेक्षक उपलब्ध होतील....

तुम्हीही असेच आपल्यातील उपजत गुण व त्यापासून काही उपयुक्त योगदान देऊ शकता. छंद जोपासू शकता. कुटुंबातील मंडळींना अधिक वेळ देत परस्परांशी चांगले संबंध वाढवू शकता. ही वेळ कसोटीची आहे खरी, परंतु त्यातूनच आपला कस लागणार आहे. निराश होऊ नका आशावादी बना.

ह्या पार्श्वभूमीवर मला माझ्या "ट्रेझर बुक"मध्ये- आताच ह्या अनमोल खजिन्याला "आजोबांचा बटवा" असे समर्पक शीर्षक सुचले ! त्यात ही अनमोल नोंद आढळली. ती तुम्हाला निश्चितच नवी द्रुष्टी व प्रेरणा देईल, अशी आशा आहे:

"चांगुलपणाची साखळी":
अचानक आपण कधी मधी, अडचणीत सापडतो. प्रवासात तर अशी वेळ खूप वेळा येते किंवा दररोजच्या जीवन संघर्षाच्या रहाटगाडग्यात निराश होतो, काय करावे ते सुचत नाही. अशा वेळी, आपला मार्ग सुलभ व्हावा म्हणून, अवचितपणे कुणीतरी ना कुणी उभा रहातो, न मागता व काहीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता मदत करतो व आपली अडचण व संकट व दररोजचा आटापिटा कमी होतो. यालाच चांगुलपणा म्हणतात. आपल्या जीवनात अशाच प्रकारची चांगुलपणाची साखळी असते. हे मांडणारा हा एक लेख माझ्या नुकताच वाचनात आला.

मग माझ्या मनात विचार आला की, असे चांगुलपणाचे अवतार मला वाटतं प्रत्येकाच्याच जीवनात कधी ना कधी येतच असतील. मी देखील माझ्या अनुभवांकडे वळून बघितलं आणि काही आठवणी जाग्या झाल्या, त्याही अशाच चांगुलपणाच्या:

# बालपणी शाळेत जाताना मला अधून मधून जवळ रहाणारे एक डॉक्टर, त्यांच्या काळ्या हिल्मन गाडीतून न चुकता, मला व त्यांच्या मुलाला शाळेत सोडत असत.

# पुढे एसएससीला असताना आमच्या इथल्या एका शिक्षकांनी मला विनामूल्य इंग्रजी शिकवले आणि कॉलेजमध्ये गेल्यावर दोन गुणवंत प्रोफेसरांनी मला गणित आणि कठीण विषय असलेला मशीन ड्रॉइंग शिकवला, तोही विनामूल्य, तेही स्वतः पुढाकार घेऊन ! माझे त्यामुळे भले झाले.

# मी नोकरी-व्यवसायात असताना मला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आमच्या क्षेत्रातील असोसिएशनच्या मासिक मुखपत्राच्या सल्लागार कमिटीवर माझं नाव सुचवलं आणि तिथे गेल्यावर तिथल्या संपादकांनी मला चांगलं प्रोत्साहन दिलं. माझ्या कल्पना उचलून धरत मला तीन प्रदीर्घ लेखमाला मुखपत्रात लिहायला उद्युक्त केलं. त्यामुळे माझ्यातील लेखक हळूहळू विकसित होत गेला.

# माझी शिकवायची आवड, व्यवस्थापन शास्त्रातील माझे ज्ञान आणि माझा कार्पोरेट क्षेत्रातील अनुभव ध्यानात घेऊन औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमधील एका अधिकाऱ्याने देखील माझ्या गुणांची पारख करून मला विविध ठिकाणी प्रशिक्षणाची देण्याची संधी दिली. हे सुध्दा चांगुलपणाचे उदाहरण होईल.

# तेव्हां मी विविध मराठी नियतकालिकांमध्ये, नियमित अनेक विषयांवर लिहित असे. ते बघून एका वरिष्ठ पत्रकाराने मला प्रोत्साहन देऊन, व्यवस्थापन शास्त्रावर मराठीमध्ये सोप्या भाषेत लिहायला आणि माझे निवडक लेख एकत्रित करून एक पुस्तक बनवायला प्रेरणा दिली. एधढेच नव्हे, तर पाठपुरावा करून अक्षरशः एखादा शिक्षक विद्यार्थ्याकडून जसा धडा पूर्ण करून घेतो, तसं पुस्तक लिहून घेतलं. त्या माझ्या पुस्तकाचं प्रकाशनही करण्याची त्यांनी व्यवस्था केली. ते पुस्तक म्हणजे "प्रगतीची क्षितिजे" आणि त्या पुस्तकाला त्या वर्षाचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून शिक्षण विभागातील पुरस्कार मिळाला.

अशा तऱ्हेने अनेक जणांनी चांगुलपणाची मला सावली दिली. त्याबद्दल मी ह्या सगळ्यांचे आभार मानतो आणि त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन.

# फार कशाला, प्रत्येकाच्या घरी, ग्रुहिणी दररोज न चुकता जे काही त्यांच कर्तव्य आहे, ते न चुकता न बोलता सहजतेने व आपुलकीने प्रेमाने करत उपजत चांगुलपणाने, आपआपला संसार समर्थपणे सांभाळत असतात.

आपणही आता ही चांगुलपणाची सावली व साखळी अशीच पुढे वृद्धिंगत करत नेऊया, एकमेका सहाय्य करत राहूया आणि सांप्रतच्या संकटावर यशस्वीपणे मात करू या.
ही सारी माणसंही चांगुलपणाच्या साखळीतील एक एक दुवाच नव्हेत कां? अशी सेवाभावी माणसं, आपल्या जीवनात येणं हा मोठा भाग्याचा योग असतो. अशा तर्‍हेची चांगुलपणाची उदाहरणं, मला वाटतं प्रत्येकच माणसाच्या जीवनात येत असतात. फक्त आपण तसे बघत नाही व त्यांची आठवणही ठेवत नाही, एवढेच.

तुम्ही विचार करा आणि आपल्याला आपण आता जिथे आहोत, तिथे येण्यासाठी, किती तरी ओळखीच्या वा अनोळखी माणसांनी कुठली ना कुठली मदत न मागता विनामूल्य दिली असेलच असेल हा. हीच ती चांगुलपणाची साखळी. माणसाचं हेच वैशिष्ट्य आहे की, त्याच्या जीवनात काही ना काहीतरी अनपेक्षित अशा चांगल्या घटनाही घडत असतात आणि त्यामागे ह्या चांगुलपणाच्या साखळीचा फार मोठा हात असतो.
----------------------------
"सुविचार":
# उत्साही माणसाला जगात काहीच कमी पडत नाही. ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास जाणवत नाही. जीवनेच्छा इच्छाशक्ती प्रबळ असेल तर, संकटांचे अडचणींचे डोंगर पार होऊ शकतात.

# मणभर चर्चेपेक्षा कणभर कृती श्रेष्ठ. अहंकार हा प्रगतीला अडसर होय.

# नशीब म्हणजेच आपण केलेल्या कष्टाला मिळालेली पावतीच होय.

# संकल्प नुसते करू नयेत, तर ते पूर्ण करण्याचा ध्यास घ्यावा.
-------------------------
"मुक्तांगण":
# वाट पाहू नका, जे जेव्हा घडायचे असेल, तेथे तेव्हा घडू द्या. जे जेव्हा घडेल तेव्हा ते खुल्या दिलाने जसेच्या तसे स्वीकारा. ना खंत ना खेद अशी वृत्ती असू द्या.

,# वेळेच्या घड्याळाच्या काट्यावर पासून पूर्ण मुक्त व्हायचा प्रयत्न करा, पुष्कळदा ताणतणाव आणि अपेक्षांचे ओझे त्यामुळे दूर होईल
-------------------------
"विचार कसे?":
# मनात कमीत-कमी विचार यावेत. जे विचार मनात येतील ते सर्व बोलून दाखवू नयेत. तारतम्याने निवड करून मगच त्यावर बोलावे. आपण जे बोलतो, त्या बोलण्याचा इतरांवर काय परिणाम होईल, याचा विचार करूनच बोलावे. जर अपायकारक असेल, तर बोलू नये.

# शक्यतो सकारात्मक नवनिर्मितीच्या मार्गाने जाणारे विचारच करावेत त्याचप्रमाणे कृती व्हावी.
--------------------------
आजचा चांगुलपणाचा धडा इथेच पुरे! उद्या असाच नवा नवा.....

आपणही असे अनेक लेख
आवर्जून वाचण्यासाठी....
ही लिंक उघडा..
आपल्या wapp group मध्ये शेअरही करा:

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू
१९/३/२०२०

मंगळवार, १७ मार्च, २०२०

वाचा, फुला आणि फुलवा-६" आणि माझे 'ट्रेझर बुक":


 वाचा, फुला आणि फुलवा-६"
आणि माझे 'ट्रेझर बुक":
"प्रास्ताविक":
कोरोना'सारख्या संकटामुळे आता घरीच बसण्याची वेळ पुष्कळांवर आली आहे. त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यातून आता काही काळासाठी, विविध चित्रीकरण थांबवण्याची सुरुवात होणार. जर टीव्हीही मनाजोगता बघायला मिळणार नसेल, तर करायचे काय, हा यक्षप्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण होणार आहे.........
हे विचार चालले असताना, मला मी पाच वर्षांपूर्वी एक संकल्पना अमलात आणली होती तिची मला आठवण झाली. तेव्हा मी मालिका बघणे कंटाळवाणे वाटल्यामुळे तो वेळ, जे जे काही चांगलं वाचलं जाई, त्याची कात्रणे बनवण्याची सुरुवात करून, ती कात्रणे एका ड्रॉईंग बुक मध्ये चिकटवण्याचे काम मी करत असे.... ....
थोड्याच दिवसात ५० पानी बहुमोल असे वाचनीय विचारधन असणारी पुस्तिका किंवा ट्रेझर बुक तयार झाले, वेळेचा सदुपयोग केल्याचा आनंद, विलक्षण आत्मसमाधान मला मिळून गेले......
आपणही आता विरंगुळा म्हणून असंच काही जरूर करण्यास सुरूवात करा....
त्याच ट्रेझर बुकमधील संस्मरणीय असे साहित्य
वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगवर, "वाचा, फुला आणि फुलवा"
हे सदर लिहीताना मला उपयुक्त ठरत आहे......
"मनाला भावणारे सगेसोयरे":
श्रद्धा बेलसरे-खारकर
महाराष्ट्र टाईम्स २६ ऑक्टोबर'१४:
"ज्यांच्यांशी भावबंध जुळले त्या त्या व्यक्तींची स्वभाववैशिष्ट्ये. त्यांचे गुण निरखता आले, अशांच्या सहवासातल्या रम्य सुखद आठवणींना उजाळा देणारे छोटेखानी पुस्तक म्हणजे "सोयरे". जो आपली सोय जाणतो तो 'सोयरा' ज्यांचे आपले ऋणानुबंध अससात ते आपल्या वागणुकीतून आपल्यावर काहीतरी होऊन सोडून जातात ते आपले सोयरे, खऱ्या अर्थाने! मनोगतात व्यक्त झालेल्या लेखिकेच्या या मताशी वाचक सहमत होतील. प्रस्तुत पुस्तक वाचण्यास प्रेरित होईल.....प्रत्येक व्यक्तीची जडणघडण सभोवतालच्या माणसांच्या सहवासातून होणाऱ्या संस्कारांमुळे होत असते. आपलं भावजीवन समृद्ध आणि श्रीमंत होण्यासाठी आपल्याला सहाजिकच त्यांचा हातभार लागलेला असतो, अशांना आपण विसरू शकत नाही""
---------------------------
"काही मजेशीर व्याख्या"
चौफेर दैनिक २७ ऑक्टोबर'१४:
अनुभव: सभ्य शब्दात मांडलेल्या चुका.

मोह: जो आवरला असता, माणूस सुखी राहतो. पण आवरला नाही तर अजून सुखी होतो!
शेजारी: तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते, तो.

सुखवस्तू: वस्तुस्थितीत सुख मानणारा.
वक्तृत्व: मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे.
लेखक: चार पानात लिहून संपणारं या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा.

फॅशन: शिंप्याच्या हातून झालेल्या चुका.

पासबुक: बँकबुक, जगातील सर्वोत्कृष्ट पुस्तकाचे नाव. (जर भरपूर बॅलन्स असेल तर)

गॅलरी: वरच्या मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा.

लेखणी: एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन.

छत्री: एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ.
कॉलेज: शाळा आणि लग्न यामधील, मुलींचा काळ घालवण्याचे एक साधन.

परीक्षा: ज्ञान तपासून घेण्याचे एक हातयंत्र.
परीक्षा: पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ.

दाढी: कुरुपपणा लपवण्याचे रुबाबदार साधन.

थाप: आजकाल 100% लोक ही फुकटात एकमेकांना देतात.

काटकसर: कंजूषपणाचे एक गोंडस नाव-प्यार वाली लव स्टोरी!
---------------------------------------------------
"Food for Thought:
Richard Tempelor चे बहुमोल विचार":
# आपण कुठे चाललो आहोत?
आपल्याला काय करायचे आहे?, चाकाला गती द्या. शांत रहा. लक्ष विचलित करू नका. गोंधळू नका. स्वतःला ओळखा. काय करू शकता, काय नाही, ते ठरवा.

# नेहमी सकारात्मक विचार करा, वेळ वाया घालू नका. दररोज कोणत्या वेळी मन लावून काम होते, ते शोधा.

# भीती वाटणारे काम त्वरित करा. अतिश्रम नकोत.

# आज वेळेची वेळेची गुंतवणूक ही उद्याची बचत.

# नीटनेटके रहा. विश्वसनीयता टिकवा. इतर बदलतील, हा भ्रम सोडा.

# थोडक्यात समाधान माना. चांगल्या सवयी अंगीकारा. कामाची शिस्त पाळा. अष्टावधानी व्हा. विसरले काय ते शोधा.

# सर्व गोष्टी स्वतः करू नका, कामे वाटा. जलद वाचन करा. योग्य ती पूर्वतयारी करा. योग्य निर्णय ठामपणे घ्या.

# सुसंवाद कौशल्य वाढवा. तुम्हाला जे सांगायचे, ते सांगा. शांत राहा, जरूर पडल्यास दहा आकडे मोजा.

# अग्रक्रम ठरवा. कोणती कामे तातडीची आणि कमी तातडीची महत्त्वाची कोणती, आणि कमी महत्त्वाची कोणती हे ठरवा. तहान लागल्यावर विहीर करू नका.

असे हे अतिशय उपयुक्त विचार मला वाचायला मिळाले. त्याची मराठींत मी नोंद ही अशी घेतली.
----------------------------------------------------------
"सुविचार":
अमृत मासिक:
-ओला बोळा, आठवणी पुसून टाका.
-आत्मसंतुष्ट रहा, स्वतःला योग्य वाटते ते करा.

-दुसऱ्याच्या दृष्टीकोन समजून घ्या, ज्याला जसे योग्य वाटते तसे त्याला समजून घेऊन वागा.
उगाच सल्ला देत बसू नका.

-विचार जितका कमी कराल, तेवढे मात्र निर्विचार निर्विकार मौनीव्रत उत्तम.
--------------------------------------------------
'मनोगत':
-ऐहिक संपत्तीपेक्षा उत्तम शरीरसंपदा
लाखमोलाची.
-निर्व्यसनीपणा हा मनोनिग्रहाचा दर्शक असतो.
-सत्ससंगतीमुळे आपणही चांगल्या विचारांच्या वातावरणात राहतो.
-उत्साह व आनंद म्हणजे जीवनातले खरे मित्र.

-परिस्थिती व वेळ पाहून वागणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.
-बदलत्या परिस्थितीचा स्वीकार करून तिच्या अनुरूप बदलावे.

-स्वतःच्या मर्यादा ओळखण्याची हुशारी हवी.

-प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती त्याच वेळी
करावी.
-----------------------------------------
असेच आवर्जून वाचावेत असे शंभराहून अधिक
लेख......
ही लिंक उघडा..
आपल्या wapp group मध्ये शेअरही करा:
http//moonsungrandson.blogspot.com


धन्यवाद
सुधाकर नातू
१७/३/२०२०


रविवार, १५ मार्च, २०२०

"वाचा, फुला आणि फुलवा-५"::


"वाचा, फुला आणि फुलवा-५":
मी सहज माझा टेबलमधला खण आवरत होतो, आणि अचानक मला एक जुने नोटबुक दिसले. ड्रॉईंग बुक होते ते. ह्या बहुमोल ड्रॉईंग बुकची मला आठवणच गेले कित्येक वर्षे झाले नव्हती. हे ड्रॉईंग बुक म्हणजे जवळजवळ पाच वर्षांपूर्वी मी एक संकल्पना प्रत्यक्षात आणली होती, तिचेच प्रत्यक्ष स्वरूप होते.
टीव्हीवरील मालिका बघून कंटाळा आला आणि मग लक्षात आलं की आपण आपला बहुमूल्य वेळ वाया घालवतो. तर मी ठरवलं की, रात्री रोज आठ ते नऊ प्राइम टाईम मध्ये, मालिका बघायच्या नाहीत, त्या वेळेला आपल्याला जे काही उत्तम, संग्राह्य विचारधन, वेगवेगळ्या वाचनातून मिळतं, त्याची कात्रणे एका ड्रॉईंग बुकमधील कोऱ्या कागदांवर चिटकवायची ही ती संकल्पना. तिची मला खरोखर इतकी गोडी लागली की, जवळजवळ काही दिवसातच ५० पानांचा एक अतिशय बहुमुल्य विचारधन आणि साहित्य असणारं असं ट्रेझर बुक त्यामुळे बनलं. पाच वर्षांनी ते गवसलं आणि लक्षात आलं की माझं "वाचा, फुला आणि फुलवा" ह्या सदरासाठी ते संयुक्तिक आहे. त्या। सदरातील, पहिल्या काही लेखात, मी कविवर्य विंदा करंदीकर ह्यांचे "निर्वाणीचे गझल' सादर केले होते. तोच प्रकार इथे पुढे नेत, ह्या ट्रेझर बुकमधील विचारधन आता मला मांडता येईल. हे साहित्य त्या त्या लेखकाची खरोखर कमाल आहे, अशाच दर्जाचं आहे. आता त्यातीलच काही अंश या लेखात मी मांडणार आहे:
"असे वाटले तर.. ":
चालावे असे वाटले तर-सन्मार्गाने चाला.
पळावे कसे वाटले तर- दुर्गुणांपासून पळा.
धरावे तसे वाटले तर-चांगली संगत धरा.
सोडावे असे वाटले तर-दुर्व्यसन सोडा.
सोडावे असे वाटले तर-आळस सोडा.
गिळावे असे वाटले तर-राग गिळा.
द्यावे असे वाटले तर-प्रेम द्या.
घ्यावे असे वाटले तर-सद्गुणांच्या घ्या.
राहावे असे वाटले तर-समाधानाने राहा.
गावे असे वाटले तर-थोरांचे गुणगान गा.
-अनामिक
-------------------------
"अर्थपूर्ण":
मीरा सहस्त्रबुद्धे यांच्या दोन कविता
"अंतर्नाद" दिवाळी अंक २०११:
१ शैशव:
सानुल्या विश्वात माझ्या बासुरीचा सुर आहे.
जीवनाचा तो विसावा ब्रह्म मी त्यातून पाहे, उमलणारे मुक्त हसणे,
सुखावणारे गोड रुसणे.

आज त्यांच्या बोलण्याला चंदनाचा गंध आहे,
नजर भोळी भुलविणारी,
अंतरंगा फुलविणारी,
भाबड्या प्रश्नांतूनी त्या, अमृताचा पूर वाहे.
भास्कराचे तेज ह्यांचे,
वैनतेयाची भरारी,
चांदण्यांचे स्वप्न सुंदर, सोबतीला आज आहे.
पाहिला मी देव येथे,
पूजिले निष्पापतेला,
घनतमी ह्या जीवनाच्या, जागती ज्योत आहे.
मीरा सहस्त्रबुद्धे.
माझी टीप:
( आमचा चार वर्षांचा गोरापान देखणा लाडका नातू चिरंजीव आर्यनची मूर्तिमंत प्रतिमा मला यात दिसली. )
--------------------------
२.
"अखेरचा ज्ञानी"
पुन्हा अभ्यासली,
सारी वर्णमाला,
वेगळाचि बोध झाला मनी.
अकाराचे स्थान,
आरंभास असे.
परी ज्ञ तो वसे, सर्वा अंती,
आधी अहंकार,
ज्ञान ये नंतर,
ठेविले अंतर सुज्ञपणे.
ज्ञानात नकोरे,
अहंतेचा संग,
पुरता बेरंग अज्ञ करी.
नव्हे अहंकार,
धुमसे अंगार,
ज्ञान वारंवार शांतवी तया.
जीवासवे जन्मे,
जरी आधी कुणी,
अखेरचा ज्ञानी लावी दीप.
मीरा सहस्त्रबुद्धे
------------------------
"माझे एक निरीक्षण":
आपला मुलगा हा वयात आल्यानंतर, वाईट संगतीने वाया जाताना पाहणे, निवृत्तीकडे झुकणाऱ्या माणसांना जड जाते. त्यांच्या काळ्याकुट्ट भवितव्याच्या शक्यतेमुळे चांगल्या सुशिक्षित व सधन कुटुंबातील ही मुले वाया जातात आणि अभ्यास वगैरे सोडून व्यसनी कां बनतात हे कोडेच आहे. हे तरुण म्हणजे आपल्याच हाताने व कृतीने आपल्या आयुष्याची नासाडी करतात, खरोखर हे मोठे दुर्दैव होय. पुष्कळ कुटुंबांच्या गोतावळ्यात, ही अशी वाट चुकलेली मुले आढळतात. त्यांच्यामुळे सुरळीत चाललेल्या, त्यांच्या कुटुंबाचे दैनंदिन जीवन आणि भवितव्य अंधकारमय बनते.
यावर उपाय काय? ह्या प्रश्नाला उत्तर देणे कठीण आहे.
--------------------------
"नोद घ्यावे असे सुविचार":
# मनुष्याचा विवेक हाच त्याचा खरा मार्गदर्शक.
# सखोल विचार करून निर्णय घेणे ही एक उत्तम पायरी यशाची असते.

# आत्मविश्वास ही एक प्रभावी ताकद आहे, ज्यामुळे आपले प्रत्येक पाऊल पुढेच पडते.
# उच्चार विचार आचार यांचा एकत्र आविष्कार म्हणजे व्यक्तिमत्वाची ओळख होय.
# सतत कार्यमग्न राहावे, त्यातूनच अनुभवाची अमोल पूंजी निर्माण होते.
# हातात आलेली संधी कधीही वाया न घालवता, वेळेचा व संधीचा सदुपयोग करा.

# जिद्द असेल तर कठीण स्पर्धाही जिंकता येते.

# वाईट मित्रांच्या संगतीपेक्षा, एकटेपण उत्तम. आपण आपल्या मार्गाने चालत राहायचे, रस्ता कधी विस्तारला जाईल हे कळणारही नाही!
----------------------------
असेच एकसे बढकर एक शंभराहून अधिक लेख..... वाचण्यासाठी.......
ही लिंक उघडा.......
आपल्या wapp group मध्ये शेअरही करा:


http//moonsungrandson.blogspot.com


धन्यवाद
सुधाकर नातू

शनिवार, १४ मार्च, २०२०

"नियतीचा संकेत": "कोरोना?": 'डरो ना': "यह पढो ना!":


"नियतीचा संकेत":
"कोरोना?": 'डरो ना': "यह पढो ना!":

सध्या "कोरोना" सारख्या महाघातक संसर्गरोगाने सगळीकडे हाहा:कार माजला आहे. हे असे संकट येण्यामागचे कारण, ज्योतिष अभ्यासातून शोधण्याचा प्रयत्न मी येथे केला आहे.

२७ जानेवारी २०२० रोजी मी सोशल मिडीयावर हा संदेश लिहीला होता:

"नियतीचा संकेत":
गेल्या वर्षी, 23 मार्च 2019 ला राहू-केतूचे राश्यंतर झाल्यापासून आपण अनेक अनपेक्षित आणि खळबळजनक अशा घटनांचे पडसाद पाहिले आहेत. कधी कदाचित घडणारच नाहीत अशा अनेक चित्र विचित्र घटना घडून गेल्याचे आपण साक्षीदार ठरलो आहोत.....

आता 24 जानेवारी 2020 ला मौनी
अमावस्येच्या दिवशी, शनी स्वगृही मकर राशीत गेल्यावर, तो मिथुनेतील राहूला षडाष्टकात तर शनीच्या व्ययात धनु राशिमधला केतू अशी अनिष्ट परिस्थिती ह्यापुढे राहू-केतूचे पुनश्च राश्यंतर होईपर्यंत, म्हणजे 19 सप्टेंबर 2020 पर्यंत राहणार आहे......

सहाजिकच अजून काही खळबळजनक व अनपेक्षित निश्‍चिततेला आणि संकटांच्या वादळ वाऱ्यांना, आपल्याला कदाचित सामोरे जाऊ लागू शकते.........."

बहुधा, साधारण ह्या संदेशानंतरच, चीनमध्ये कोरोनाचा जो काही वेगाने प्रचार प्रसार होत गेला, त्याच्या बातम्या एकामागोमाग येत राहिल्या आणि आता तर तो आपल्या देशात आणि आपल्या राज्यात येऊन थडकला आहे. त्यामुळे सहाजिकच आपण त्याचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करण्यासाठी कटिबद्ध होऊन प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहोत. या पार्श्वभूमीवर हे भस्मासूरासमान संकट का बरे यावे, ह्याची मीमांसा ज्योतिषातील ग्रहांच्या योगांवरून करावी असे मनात आले आणि तोच प्रयत्न इथे आहे.

नजिकच्या काळात जे महत्त्वाचे ग्रह बदल झाले, त्यात ४ नोव्हेंबर'१९ ला गुरु धनु राशीत गेला हा होय. त्यामुळे गुरु आणि केतू हे धनु राशीमध्ये येणे, याच बरोबर मंगळाने तिथे ७ फेब्रुवारी२०२०ला धनु राशीत प्रवेश करणे, हे असू शकतात. मंगळ, गुरु आणि राहू यांच्या युतीला चांडाळ योग असे म्हणतात, हे तर आपल्याला माहित आहे. केतु, जो जणु राहूचा भाऊ आल्यामुळे, हा जणु तसाच चांडाळ योग आपण म्हणू शकतो. त्यानंतर आता या तीनही ग्रहांच्या धनु राशीमध्ये ह्यापैकी कोणकोणत्या ग्रहांच्या युत्या केव्हा झाल्या ते पाहू:
ते तपासले असतात थोडीशी या संकटाच्या वाटचालीची कल्पना येऊ शकते.

७ फेब्रुवारीला मंगळाचा धनु राशीत प्रवेश,
8 जानेवारीला गुरू केतू युती.
25 फेब्रुवारीला धनु राशी मध्ये असलेल्या मंगळाची केतू बरोबर युती.
त्यानंतर 20 मार्चला मंगळ आणि गुरू ची युती.

हे ग्रह बदल कोरोनाची झपाट्याने वाढ आणि नंतरची संभाव्य परिस्थिती यावर प्रकाश टाकू शकतात.
आणि ह्यानंतर अखेरीस 22 मार्चला मंगळ मकरेत जाणे महत्वाचे ठरू शकते.

22 मार्चनंतर मंगळ धनु मधून, पुढे मकरेत गेल्यामुळे कदाचित त्यानंतर कोरोनाची जी काही वाढ आहे, ती नियंत्रणात येऊ शकेल असं निदान आपण करू शकतो. त्यानंतर गुरु देखील धनु राशीतून काही दिवस कां होईना, २९ मार्च ते २९ जून ह्या कालखंडात मकरेत जाईल. तेव्हा कदाचित आणखीन त्यामधून सौम्यता निर्माण होऊ शकेल असे वाटते. तो अखेर २० नोव्हेंबर २०२० रोजी धनु राशीचा रामराम घेऊन मकरेत जाणार आहे. कर्मधर्मसंयोगाने राहू आणि केतू यांचे 19 सप्टेंबर 20 रोजी राश्यंतर होऊन ते
वृषभेत आणि वृश्चिक अनुक्रम प्रवेश करत असल्यामुळे यानंतर चांडाळ योग सदृश्य परिस्थिती संपेल. सांप्रतच्या जणु सगळ्यांना जखडून ठेवत, मानसिक शारीरिक त्रासाची व आर्थिक र्हासाच्या संकटाची दाहकता नियंत्रणात येऊ शकेल, अशी आपण आशा करू या.

अर्थात हे केवळ आडाखे आहेत. त्याचप्रमाणे होईल की नाही हे काळच ठरवेल. शेवटी आपण आपल्या शक्तीनुसार कोरोनाचा योग्य तो मुकाबला विविध उपायांनी करतच आहोत आणि म्हणूनच आम्ही म्हणतो कोरोना?: 'डरोना'!
त्यात आपल्याला यश यावेच यावे, ही सदिच्छा.

सुधाकर नातू
१५/३/२०२०

ता.क.:

हा लेख लिहून झाल्यावर, माझ्या लक्षात आलं की शनी मंगळ आणि गुरू हे तीनही आता मकर राशीत २९ मार्चनंतर असतील. मिथुन राशीतील राहू याचा षडाष्टक योग होऊ शकतो. त्यामुळे आगामी कालखंडात काय ग्रह बदल होतात त्याचा मी पुन्हा आढावा घेतला:

# मंगळ २२ मार्च मकरेत, तर ४ मे कुंभेत,
# शनी मकरेतच.
# गुरु २९ मार्चनंतर मकरेत, पुढे १४ मे रोजी वक्री होऊन २९ जूनला पुन्हा धनु राशीमध्ये.

या ग्रहबदलांमुळे, आता कोणाची युती आणि कोणाचा षडाष्टक योग होतो ते पाहिले:

# ३१ मार्चला मंगळ व शनी यांची युती आहे, हा अतिशय त्रासदायक रोग आहे. कारण दोन्ही ग्रह एकमेकांचे शत्रू आहेत. त्यामुळे सांप्रत संकट आहे, ते इतक्या सहजासहजी जाणार नाही असं वाटू शकतं. आपल्याला सर्वांना कठोर नियम व संयम राखत सामुहिक तारतम्य, सहकार्य व शहाणपण वाढवत ठेवावे लागेल.

# त्यानंतर ३ एप्रिलला मंगळ आणि राहू यांचा अंशात्मक षडाष्टक योग होत आहे. असा योग पापग्रहांमध्ये होत असल्यामुळे, तोही अनिष्ट फळे देणारा आहे.

# गुरू मात्र सहाय्यकारी न ठरता, एकला चालोरे, असा नीचीचा मकरेत प्रवास करत वक्री होत पुन्हा २९ जूनला धनु राशीत जाईल....

पुराणामध्ये भस्मासुर, ज्याला ज्याला स्पर्श करायचा त्याचे भस्म होऊन जायचे. आता कोरोनाच्या रूपाने आधुनिक जगातला भस्मासुर संपर्कात येईल तर.......
'को'न 'को'नको 'रो'ना आएगा, ये समझेगाभी नही!
ह्या भस्मासूराला नष्ट करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह लशीच्या रूपातील.......
'मोहिनी' आता कधी अवतार घेणार?

सामाजिक भान आणि उत्तरदायित्व यो
ग्य तर्‍हेने संभाळत वैयक्तिक आरोग्याचा यथातथ्य पाठपुरावा करत यंत्रणेला आपले काम आपल्या पद्धतीने करू देणे शक्य करत आपण शिस्तीने आणि मनोबला ने या संकटाचा सामना करू शकू असा आत्मविश्वास आपण ठेवूया ही आपली परीक्षा आहे आणि त्या परीक्षेला आपल्याला पास होण्यावाचून गत्यंतर नाही हेही लक्षात ठेवायला हवे .....

सावध रहा, अनावश्यक प्रवास व गर्दी कटाक्षाने टाळा, स्वच्छता राखा, स्वच्छ रहा आणि स्वस्थ बना......

तेव्हा शुभस्य शीघ्रम आणि शुभेच्छा.

धन्यवाद.
सुधाकर नातू
१९/३/२०२०

"रंगांची दुनिया-१३": "टेलिरंजन-२": "मराठी मालिका": काहीही हं !":

"रंगांची दुनिया-१३": "टेलिरंजन-२":
"मराठी मालिका": काहीही हं !":

"रंगांची दुनिया", या सदरामध्ये आत्तापर्यंत आम्ही साहित्य चित्रपट आणि नाटकं यांचा परामर्श अथवा रसास्वाद जितका घेत असतो, तितकं मराठी मालिकांबद्दल काही वेळ वाया घालवून लिहावे असे खरंच वाटत नाही. त्यामुळे ह्या सदरामध्ये आमचे मालिकांवरचे लेख दुर्मीळ आहेत.

आपले डोके गहाण ठेवून जे खेळखंडोबे किंवा कारनामे मराठी मालिकांमध्ये दाखवले जातात, त्यांच्यावर आपलं डोकं वापरून उगाचच काहीतरी खरडावं हे काही योग्य नव्हे, असंच आम्हाला वाटतं. पण आम्हाला वाटते म्हणून, त्यांचा जो काही संसार मालिकांचा चालू असतो तो काही बंद पडणार नसतो, सारखे पाणी घालत घालत कितीही दिवस आठवडे मालिका पुढे नेल्या जातात. म्हणूनच आम्ही आजच्या टेलीरंजन लेखाला "मराठी मालिका": काहीही हं!" असं शीर्षक दिले आहे.

बहुतेक मालिकांमध्ये नायक आणि त्याची हक्काची बायको, या जोडीला त्याचे एक
प्रेमपात्र, कधीकधी अजून दुसरे किंवा आणखीही! अशाच कल्पनेभोवती मालिका कां गुंतलेल्या असतात कळत नाही! कदाचित प्रतिभाशक्ती उरलीच असावी किंवा समाजाची अभिरुची खालावत चाललेली असावी. उदाहरणार्थ "लग्नाची बायको आणि वेडिंगची वाइफ" असे उघड-उघड दोन बायकांचं नाव घेणारी मालिका, खरोखर इतकी अयोग्य वाटते की बोलायची सोय नाही. फॉरेनला फालतू ड्रायव्हर असलेला मदन त्याच्या प्रेम पात्राला इकडे इंग्लंडची राजकुमारी म्हणून आणून, संबंध गावाला नुसत्या कुटुंबालाच नव्हे तर चक्क गावाला फसवत राहतो. एवढंच काय तर सगळ्यांच्या देखत तिच्याशी वेडिंग म्हणजे विवाहही घडवून आणतो. तिच्या बरोबरचं हे असं नातं, सारखं, लपून-छपून अगदी सातत्याने प्रत्येक भागात संभाळत राहू शकतो. पण एवढे लोक बुद्दू आहेत की काय कळत नाही. केव्हा तरी ते उघडकीला येणार यात काही नवल नसतं.
शेवटी काय तर, "मराठी मालिका": काहीही हं !":

अगदी नावाजलेली सगळ्यांना आवडणारी अशी मालिकाही घेतली "आई कुठं काय करते?" तर तिथेही हीच कथा आहे. नायक (की खलनायक?!) तीन तरूण मुलांचा बाप, अनिरुद्ध आणि त्याची पत्नी साधी भोळी अरूंधती हे जोडपे, अन् इथेपण ऑफिस मधली संजना हे त्याचं ठेवलेलं प्रेमपात्र, या त्रिकोणात चालतेच आहे. खरं तर होती, ही तशी कौटुंबिक मालिका, पण फिरत जाते या दोन्ही बायकांना खेळवत. आता तर त्या दोघींचं एकाच दिवशी एकाच ठिकाणी अनिरुद्धशी लग्नही लावण्यात येणार आहे!
शेवटी काय तर, "मराठी मालिका": काहीही हं !":

वर्षांमागून वर्षे प्रेक्षकांचा अंत पहाणारी मालिका कोणती, तर "माझ्या नवऱ्याची बायको". तर त्यामध्ये गुरुनाथ ग्रहिणी असलेल्या पत्नीला- राधिकेला फसवून, शनायाच्या नादी लागतो हे तर केव्हाच आपण बघितलं, शेवटी कधी न होणारा घटस्फोट झाल्यावर तोच पुढे खेळ चालवत, आता जणु खो खो खेळासारखा तिसर्‍याच तरुण स्त्रीच्या प्रेमात पडून तो तिलाही लग्नाचं आश्वासन देताना प्रेक्षक अगदी उघड्या डोळ्याने बघत आहेत. अरे कायदा म्हणून काही आहे असे वाटतच नाही, ह्या मंडळीना! खरं म्हणजे असा अनैतिक तमाशा योग्य देखील नव्हे. सहाजिकच
सोशल मीडियावर नुकताच एक प्रश्न टाकण्यात आला होता की, कोणती मालिका ताबडतोब बंद झालेली तुम्हाला आवडेल? तर त्यामध्ये ही वर्षानुवर्ष जाणारी "माझ्या नवऱ्याची बायको" ही मालिका अग्रक्रम मिळवून गेली, यातच काय समजायचं ते समजा.
शेवटी काय तर, "मराठी मालिका": काहीही हं !":

म्हणूनच, मालिका मर्यादित भागांच्या हव्यात आणि त्यांना नियंत्रण म्हणून केल्या जाव्यात हे आग्रहाने प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे.

"सुखांच्या सरींनी मन बावरे" या मालिकेमध्ये तर कहर चालला आहे. कोणती पात्र मध्येच गायब होतील आणि कथा मात्र तशीच पुढे जात राहील ते मुकाट्याने पहायचे. श्रीमंत उद्योजक, नायक सिद्धार्थने खरोखर एखाद्या विधवा आणि आधी मूल होऊन गेलेल्या वयाने मोठ्या असणार्‍या गरिब घरातील अनुशी चक्क प्रेमात कां पडावे व विवाह कां कशासाठी करावा हा प्रश्न मनात असताना, त्याच्यावर एक तर्फी प्रेम करणाऱ्या खलनायिक सानवीने इथे कोणते कोणते, दिवे लावले आहेत ते बघून तिच्यासारखं आपल्यालाही वेड लागेल असं वाटतं. "डर" पिक्चरची आठवण व्हावी अशी एकामागून एक कृत्ये ती बिनविरोध करते, ती खरोखर अशक्यप्राय अशीच आहेत. यशस्वी उद्योजिका असलेली दुर्गा मध्येच गायब होते, नंतर निष्प्रभ वाटणारी एक अभिनेत्री त्या रूपात येऊन मालिका पुढे ढकलताना शेवटी या खलनायिकेलाच महत्त्व देत, नायिका अनुच परदेशात निघून गेल्याचे दाखवतात. म्हणजे प्रेक्षक गृहीत धरला जातो आणि सिद्धार्थ बायकोशी एकनिष्ठ असला तरी, इथे दुसरी डर चित्रपटातील खलनायकाची जणु काँपी असलेली एकतर्फी प्रेम करणारी सानवी ही तरुणी, त्याला मिळवण्यासाठी काय काय अमानुष व मुळीच न पटणारी क्रुत्ये करीत रहाते.
शेवटी काय तर, "मराठी मालिका": काहीही हं !":

असले, नको त्या पात्राच्या नादी लागण्याचे खेळ रात्रीतच चालतात, याचा प्रत्यय आणून देणारी "रात्रीस खेळ चाले" या मालिकेचे बद्दल तर बोलायलाच नको. उघड-उघड खलनायक असलेला इथला अण्णा, घरी हक्काची बायको आणि बाहेर चवचाल, मादक सौंदर्याचा अँटम बाँम्ब, प्रेमपात्र असलेली शेवंता, यांच्याभोवती ही मालिका चक्क दुसऱ्या भागाची मजल मारत पुढे जात आहे, यावरूनच प्रेक्षकांना आंबटशौकीपणा पहायला अधिकाधिक आवडत आहे, समाजाची अभिरुची रसातळाला जात हेच खरे.
शेवटी काय तर, "मराठी मालिका": काहीही हं !":

काहीही करून कुणाचं तरी पाऊल असं वाकडं पडलेलं सातत्याने दाखविल्याशिवाय मराठी मालिका जणू काही बनवताच येत नाही असाच संभ्रम या साऱ्या मालिकांवरून वाटतो.
शेवटी काय तर, "मराठी मालिका": काहीही हं !":
---------------------------
विरंगुळा व जिज्ञासा ह्यासाठी.....
आपल्या राशीचे संपूर्ण वार्षिक राशीभविष्य
व राहू केतूच्या राश्यंतराचे परिणाम जाणण्यासाठी.......
You tube वर जा. सर्चमध्ये लिहा:
माझ्या चँनेलचे नांव:

moonsun grandsun

आणि विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......

शंभराहून अधिक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......

wapp grp वर शेअरही करा......

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू

मंगळवार, १० मार्च, २०२०

"रंगांची दुनिया-१२": "शारदोत्सव-६":


"रंगांची दुनिया-१२": "शारदोत्सव-६":

"दिसामाजी काही ना काही नवनवे वाचत जावे, काही बघत वा ऐकत जावे आणि त्यातील मनाला भिडलेल्या निवडक मुद्दांवर नीरक्षीर विवेकबुद्धीने जसे जमेल तसे भाष्य करावे, अशी माझी प्रवृत्ती असल्यामुळे मी जेव्हा जमेल तेव्हा रसास्वाद लिहीत असतो. संपर्क संदर्भ मिळाल्यास लेखकाला देखील मी त्याची प्रतिसादात्मक पोचपावती देत असतो.
ह्या लेखात असाच दोन दिवाळी अंकांचा मी परामर्ष घेतला आहे:

१. "दीपावली" दिवाळी अंक'१९: रसास्वाद:

लेखक-श्री. गणेश मतकरी
"फेरा": लघुकथा
जीवाभावाच्या संबंधातील जोडीदारांचे एकमेकांशी असलेले नाते आणि परस्पर ऋणानुबंध कालानुरूप प्रसंग कसे बदलत जाऊन त्याची परिणती अखेर फारकत आणि वियोग यात होऊन जाते अन् मागे राहिलेल्या संबंधितांना त्याचे असह्य ताणतणाव कसे सहन करायला लागतात, ते आपण दीपावली दिवाळी अंक'१९ मधील 'फेरा' ह्या कथेमध्ये ओघवत्या भाषेत मांडले आहेत.

पुढे काय होणार याची हुरहूर, उत्सुकता कायम ठेवणारी ही कथा आहे. प्रथमपुरुषी
निवेदनशैलीमुळे, तिची परिणामकता अधिकच दाहक झाली आहे. त्यावरून एक मात्र जाणवले की, DNAs शारीरिक दृष्ट्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात, हे आता जगन्मान्य आहे, परंतु नशिबाचे अथवा प्रारब्धाचेही DNAs हे असे वडिलांकडून मुलीकडे जात असतात किंवा जावू शकतात, ह्या शक्यतेची जाणीव करून देणारी ही एक उत्तम कथा आहे. अभिनंदन व शुभेच्छा.
-------------------------
लेखक: श्री सुहास बहुलकर
ललित लेख:
"चित्रे भंगारात टाकलेली.. वाचलेली..वाचवलेली"

चारशे वर्षापूर्वीची शेक्सपियरसारख्या
जागतिक कीर्तीच्या नाटककाराची स्र्टँटफोर्ड अपाँन अँव्हनमधील, जन्माची जागा, घर आणि इतर चीजवस्तू, डोळ्यात तेल घालून, त्यांना जीवापाड जपत, लाखो पर्यटकांचे आकर्षण ठरणारं अशा म्युझियममध्ये रूपांतर करणाऱ्या ब्रिटिशांची खरोखर कमाल आहे. माझ्या सुदैवाने इंग्लंडमधील ती वास्तू आणि त्या अनमोल चिजा, प्रत्यक्ष बघायचा मला योग आला होता. त्याची आठवण, आज दीपावली दिवाळी अंकांमध्ये तुमचा "चित्रे भंगारात टाकलेली.. वाचलेली..वाचवलेली" हा लेख वाचताना आली.

अजरामर ठराव्यात अशा दिग्गज व्यक्तींच्या, अनेक नामवंत चित्रकारांनी चितारलेल्या कलाकृती, कधीही नीट जतन करून ठेवल्या नाहीत आणि त्यातील बऱ्याचशा भंगारात जाऊन नाहीशा झाल्या, हे वाचून मनाला चटका बसला. परंतु अशाही परिस्थितीत तुम्ही स्वतः अथक प्रयत्न करून, वेळप्रसंगी स्वतःच्या खिशाला चाट देऊन, जे काही प्रयत्न या सगळ्या अनमोल ठेव्याला शोधण्यासाठी व पुनश्च पुनर्स्थापित करण्यासाठी केलेत, त्याचे ओघवते वर्णन, आपण आपल्या ह्या लेखात केले आहे. ते खरोखर जसे वाचनीय आहे, त्याचप्रमाणे आपलीच आपल्याला लाज वाटावी अशा प्रवृत्तीची जाणीव करून देणारी देखील आहे. "कालाय तस्मै नमः" किंवा, "हम नही सुधरेंगे" हेच खरे. मात्र एक आवश्यक आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा असा लेख आपण लिहिल्या बद्दल आपले अभिनंदन व शुभेच्छा.
------------------------

लेखिका: वसुंधरा घाणेकर
कथा
"सापशिडी":

दीपावली"दिवाळी अंक'१९ वाचाताना, त्यामधील 'सापशिडी' ही तुमची कथा खरोखर चित्तथरारक आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा किती बुद्धिबळातील खेळा सारखी, एकमेकांवर मात करण्यासाठी टपलेली असते ते, मुसळधार पावसाच्या थैमानामुळे एकत्र आलेल्या
स्वामिनी, सोनाली आणि ओम या त्रिकुटाच्या आकांक्षा व प्रयत्न ह्यांच्या लपंडावातून दिसत रहाते. कथा कळत, नकळत अखेरपर्यंत उत्कंठा वाढवत नेते आणि कोण जिंकेल वा कोण हरेल ह्याचे उत्तर मिळाल्यावर, तर 'सापशिडी' हे नाव कथेला योग्य असल्याची खात्री पटते. अभिनंदन व शुभेच्छा.
------------------------
२.
"शब्द रुची" दिवाळी अंक'१८":

महान चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर ह्यांच्या जगमान्य योगदानाचे चित्र मांडणारा लेख
श्री. रंजन जोशी ह्यांनी ह्या अंकात लिहीला आहे.
त्यामध्ये त्यांनी विविध बिरुदे आणि त्यामागील सामाजिक मानसिकता ह्यांचा समग्र वेध घेतला आहे, तो नोंद घेण्याजोगा आहेः

"विविध बिरुदे आणि सामाजिक मानसिकता":

'अठराशे तीस नंतरच्या काळात रावबहादुर, लोकहितवादी, न्यायमूर्ती, महात्मा आणि लोकमान्य ही बिरुदे लोकोत्तर व्यक्तींना दिली जात असत. लोकहितवादी देशमुख हे इंग्रज सरकारच्या नोकरीत असून भारतीय समाजाला इंग्रजी राजवटीत आलेला आधुनिक विचार मानणारे होते. भारतीय रूढीग्रस्त मानसिकता त्यामुळे नाही शी होईल अशी त्यांची धारणा होती. महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी राजवटीचे समर्थक होते कारण भारतातील हजार वर्षे चार वर्ण आणि जातीव्यवस्थेचे उच्चाटन होऊन शूद्र म्हणून हिणवला गेलेला कष्टकरी मुक्त होईल, या हेतूने त्यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली. त्यातूनच लोकांनी महात्मा हे सन्माननीय विरोध त्यांना दिले. कोल्हापूरचे शाहू महाराज प्रजाहितदक्ष राजा म्हणून ओळखले गेले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे ब्रिटिशांच्या नोकरीत होते, तरी त्यांचे भारतीय समाज सुधारणांचे प्रामाणिक प्रयत्न लोकांनी अनुभवले. ते सर्वार्थाने न्यायमूर्ती म्हणून ओळखले गेले. लोकमान्य हे बिरूद बाळ गंगाधर टिळक यांना लोकांनीच लावले, कारण ते कष्टकरी तसेच अगदी सुशिक्षित वर्गात देखील देशपातळीवर स्वातंत्र्य चळवळीचे नेते मानले गेले. समाजसुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर ओळखले गेले. महर्षी म्हणून धोंडो केशव कर्वे यांच्या शिक्षण देण्याच्या कार्यामुळे समाजाने दिले. महात्मा गांधी अहिंसावादी सामाजिक व राजकीय विचारांच्या धोरणांनी नवयुगाची सुरुवात करणारे म्हणून त्यांची जागतिक पातळीवरही घेण्यात आली. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन करणारे म्हणून मान्यता पावले. अशी काही बिरुदे देशप्रेम व स्वातंत्र्य चळवळीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील लोकनायक जयप्रकाश नारायण अशा पद्धतीने मान्य झाले. नंतरच्या काळात ह्रदयसम्राट हे बिरूद उदयाला आले."

धला तुमचा लेख वाचला. रावबहादुर आणि थोर चित्रकार महादेव धुरंधर यांचा व्यक्ती म्हणून आणि चित्रकलेचा एक महान उपासक म्हणून, आपण संशोधनपूर्वक, अत्यंत अभ्यासपूर्ण असा जो हा लेख लिहिला आहे, तो खरोखर एखाद्या डॉक्टर पीएचडी साठी लिहिलेल्या प्रबंधाचा जणू सीनाँपसिस अथवा सारांश असावा इतक्या दर्जाचा झाला आहे. माहितीबरोबरच त्यांनी चितारलेली विविध पद्धतीची अशी प्रत्यक्षदर्शी चित्रे, आपण या लेखासोबत दिली आहेत. त्यामुळे या लेखाची शोभा वाढून दर्जा उच्च झाला आहे.

चित्रकला हा खरं म्हणजे आमच्यासारख्या सामान्यांच्या दृष्टीने एक ऑप्शनला टाकू शकणारा विषय. पण त्याचे इतके काही संदर्भ, रूपे आणि प्रकार असू शकतात, हे आम्हाला त्यामुळे कळले. शेवटी चित्रकार आणि लेखक यांच्यात काहीतरी साम्य आहे आणि तेही एक लेखक म्हणून मी जाणू शकतो. ही चित्रे जेव्हा त्यांनी काढली असतील, तेव्हा विचारांची त्यामागे बैठक मजबूत असणार, एवढे निश्चित. एक वाचनीय आणि चित्रकलेबाबत संपूर्ण नवी दृष्टी देणार्या, या
लेखाबाबत लेखकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
--------------------------
"शब्द रुची" दिवाळी अंक'१८ मधला श्री. दिलीप पांढरीपट्टे ह्यांचा "नव्या वाटा, नवे ठसे हा लेख वाचला आणि त्यांनी आपल्या जीवनप्रवासाची विशेषतः साहित्यिक आणि शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीचा लेखाजोखा अगदी मोजक्या शब्दात येथे मांडला आहे. गझल पासून सुरुवात करून विविध साहित्यिक योगदानाप्रमाणे, शैक्षणिक आणि व्यावसायिक अधिकारपद त्यांनी मिळवल्याचे त्यावरून समजले.

असाच आपआपल्या क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा संक्षिप्त आढावा ह्या अंकात रत्नाकर मतकरी डॉक्टर अविनाश सुपे रामदास भटकळ यांनी देखील घेतला आहे. त्यामुळे आपल्याला माणूस कसा असतो आणि तो अंगभूत गुणांच्या आणि परिश्रमांच्या जोरावर आपल्याला आवडीचे असे क्षेत्र कसे निवडतो आणि त्यामध्ये आपले गुण प्रदर्शित करत मान्यता कशी मिळवतो ते समजते त्यामुळे विविध अशा क्षेत्रांची तर माहिती होतेच परंतु त्या त्या लेखकाच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात आपल्याला प्रत्यवाय येतो.
-------------------------
जाता जाता,
"विरंगुळा व जिज्ञासा ह्यासाठी.....
आपल्या राशीचे संपूर्ण वार्षिक राशीभविष्य
व राहू केतूच्या राश्यंतराचे परिणाम जाणण्यासाठी.......
You tube वर जा. सर्चमध्ये लिहा:
माझ्या चँनेलचे नांव:

moonsun grandsun

आणि विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......

शंभराहून अधिक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......

wapp grp वर शेअरही करा......

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू

सोमवार, ९ मार्च, २०२०

"ह्रदयसंवाद-१२": "विचार आणि आविष्कारावर बोलू काही!":

"ह्रदयसंवाद-१२":
"विचार आणि आविष्कारावर बोलू काही !":
माणूस आणि इतर सजीव यामध्ये जर कुठला फरक असेल, तर तो म्हणजे माणसाजवळ केवळ जगण्यासाठी करावयाच्या विचारांच्या पलीकडे, विचार करायचं आणि शब्दांमध्ये ते व्यक्त करायचं सामर्थ्य! त्यामुळे त्याची जी उत्तरोत्तर प्रगती होत गेली, तिला तोड नाही. शिवाय अजून एक फरक म्हणजे, आपल्या मनात जे विचार येतात ते आणि त्याच्या अंगी असलेली कला याद्वारे विविध प्रकारचे आविष्कार करणं, मग ती चित्रकला असो, साहित्य, नाट्य न्रुत्य वा गायन आदि जणु ६४ कला. ही जी काही किमया आहे, ती केवळ माणसाकडेच आहे. या लेखामध्ये मी विचार आणि आविष्कार यांच्यामध्ये असणाऱ्या कलेचाही जाताजाता लेखाजोखा घ्यायचा अल्पसा प्रयत्न केला आहे. हा लेख म्हणजेही मनातील विचारांचा एक आविष्कारच आहे.
चित्रकला आणि लेखन यामध्ये बरंच साम्य आहे. चित्रकलेमध्ये विचार महत्त्वाचा असतो, तीच गोष्ट लेखनाचीदेखील असते. विचारांचेच पुढे योग्य त्या चित्रात रूपांतर करणं हे चित्रकाराचं काम, तर विचारांना कल्पनेचा आधार देऊन, लेखक आपले कौशल्य दाखवत असतो. चित्रकलेमध्ये जसे लँडस्केप किंवा अँबस्ट्रॅक्ट आर्ट रिअलिस्टिक असे वेगवेगळे प्रकार असतात, तशीच लेखनाची गोष्ट आहे: काव्य, कथा, कादंबरी, नाटक इत्यादी. अर्थात् याचा अर्थ असा नव्हे की, चित्रकार जो आहे, तो लेखकही होईल किंवा उलट. अर्थात् ह्याला सन्माननीय अपवाद आहेतच.
हाच मुद्दा असाच पुढे नेम आपल्याला नेला, तर असे आढळेल की फोटोग्राफी आणि चित्रकला ही जुळी भावंडे आहेत. इथे एक हाताने प्रत्यक्ष जे मनात आले, त्या विचारांप्रमाणे कागदावर उतरवतो; तर दुसरा डोळ्यांच्या माध्यमातून जे समोरचे मनात चितारले गेले, ते फोटोमधून जगापुढे आणतो. याचाच अर्थ असा की, कुठल्याही कलेचा वा आविष्काराचा विचार हा गाभा असतो, तसा तो असायला हवा. कौशल्य म्हणजे त्या विचाराला प्रत्यक्षात आणण्याची जी हातोटी, ती म्हणजे कला !
हाच विचारप्रवाह आपण अजून एका बाबतीत पुढे नेऊ शकतो, ते म्हणजे लेखक आणि दिग्दर्शक यांच्या बाबतीत. लेखक जसा आपल्या मनातील विचार आणि कल्पना यांचा संयोग घडवून एक नाट्यमय असे साहित्य कागदावर ठेवतो, तसेच दिग्दर्शक कागदावर जे उमटले आहे त्यावर विचार करून त्याला दृश्य रूपात कुठे कसं कुणाच्या माध्यमातून जगापुढे आणायचं, ह्याचा प्रत्यवाय आणून देतो आपल्या चित्रपटातून.
शास्त्रीय गायकाच्या बाबतीत देखील आपल्याला हाच निकष पुढे नेता येईल. ते असे की, आवाजाच्या दुनियेतील सूर स्वर लय आणि ताल यांचा योग्य तो लेखाजोखा घेत, विशिष्ट अशी निर्मिती, तो गायक जेव्हा आपल्याला नवा अनुभव ऐकवितो, तेव्हा त्यामागे त्याच्याकडे असलेली अंगभूत आवाज वाकवण्याची कला आहे. त्या कलेमध्ये तो आपला विचार मिसळतो तेव्हाच त्याला व आपल्याला हवे ते गवसत असते.
जेव्हा असाच विचार, मी डॉक्टर आणि ज्योतिषी यांच्या बाबतीत करू लागतो, तेव्हादेखील मला त्यामध्ये साम्य आढळते. डॉक्टर रोग्याचे काही निदान करतो, त्याला प्रत्यक्ष तपासणी बरोबरच विविध अशा रिपोर्टस् चा अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययोजना करतो. पण अमुकच झालं म्हणून तमुक दिल्यामुळे रोगी बरा होतो असं नेहमी घडतंच असं नाही. डॉक्टर आपल्या अंदाजाप्रमाणे सल्ला आणि सेवा देत असतो आणि रोगी बरा होतो किंवा नाही. निश्चित अशी खात्री मिळतेच असंही सहसा नाही. ट्रायल अँड एरर अशाच प्रकारचं काहीतरी वैद्यकीय सल्लामसलतीमध्ये चालू असल्याचा आपल्याला अनेक वेळा अनुभव येतो. ज्योतिषाचं देखील तसंच आहे. प्रत्यक्ष पहाणी चर्चा आणि त्याबरोबरच ग्रहांच्या पत्रिकांचे भेंडोळे, म्हणजे एक प्रकारे रिपोर्टस् यांचा अभ्यास करून तो आपले अंदाज मांडतो. त्याप्रमाणे पुष्कळदा फळे मिळतातही किंवा बिलकुल मिळतही नाहीत. ह्याचमुळे मला असं वाटतं की, डॉक्टर आणि ज्योतिषी यांच्यामध्ये पुष्कळ साम्य आहे. माझे हे म्हणण्याचा कदाचित कुणाला रागही येईल, पण जी तर्क व वस्तुस्थिती आहे ती मी माझ्या बुद्धी व विचारशक्तीप्रमाणे मांडले इतकेच.
सारांश काय, तर विचार व आविष्कार ह्यांचा लपंडावाचा खेळ माणसांच्या जगात नेहमी घडत असतो.
http//moonsungrandson.blogspot.com
Is the link of my blog, wherein you can read such more than 100 articles on diverse topics.
Please do share this link in your whatsapp groups....


धन्यवाद
सुधाकर नातू

शनिवार, ७ मार्च, २०२०

"रंगांची दुनिया-१२": "चित्रदर्शन-३":


"रंगांची दुनिया-१२": "चित्रदर्शन-३":
"थप्पड":
"पुरुषप्रधान संस्क्रुतीच्या डोळ्यात अंजन":

स्त्रीच्या आत्मसन्मानाचा कदाचित अतिरेक असणारा आणि तो राखण्यासाठी, प्रसंगी स्वतःचा चांगला संसारही मोडणार्‍या, आजच्या स्वाभिमानी स्त्रीचा समाजाच्या एकंदर विचार पद्धतीशी चाललेला झगडा दाखवणारा असा हा चित्रपट नुकताच पाहिला.

तो पाहताना आमच्यासारख्या ज्येष्ठांना त्यातील ग्रहिणी असलेल्या अन् पतीची मनापासून सेवा करणार्या, नायिकेने केवळ एका अनपेक्षित प्रसंगी मनावर ताबा नसलेल्या नवऱ्याने, लंडनला जायच्या निवडीसाठी योजलेल्या सेलिब्रेशन पार्टीमध्ये, मारलेली थप्पड तिला सहन होत नाही. त्यामुळे ती इतकी टोकाची भूमिका घेते की, संसार मोडून घटस्फोट घेते, अशा सारांशाचा हा चित्रपट आम्हाला काही केल्या पटला नाही.

कदाचित आमच्या जीवनशैली परंपरागत विचारांमुळे अथवा आम्ही ज्या प्रकारच्या वातावरणात वाढलो, त्यावेळेच्या संस्कारांचा परिणाम असेल, पण केवळ एवढ्या एका चुकीसाठी तिने संसार मोडावा हे आम्हाला काही केल्या पटले नाही. शिवाय एकंदर हा बोलपट इतके काही प्रसंग, इतकी काही भाराभर पात्रे आणि अतोनात असे तेच तेच प्रसंग, संवाद यामुळे बराचसा मनामध्ये प्रारंभी गोंधळ करतो. त्यामुळे हे चाललंय काय आणि ही एवढी अशी अतिरेकी भूमिका कां घेते हे शेवटपर्यंत मनाला पटत नाही. त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर मी माझ्या चाळीस-पंचेचाळीस मधील अशा विवाहित मुलाला आणि मुलीला प्रश्न विचारून या बोलपटा बद्दल त्यांचे काय मत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांनी मला वेड्यात ठरवले आणि तिचेच वागणे व निर्णय कसा बरोबर होता हे आग्रहाने पटवून दिले.

नवऱ्याची चूक झाली होती, एवढे खरेच. परंतु त्यामागची पार्श्वभूमी खरोखर नजरेआड करण्याजोगी नव्हती. परदेशगमनाची नितांत इच्छा असणाऱ्या, या दोघांना त्या प्रसंगाला किती विचित्र पद्धतीने सामोरे जायला लागले! त्याला जे आश्वासन कंपनीने दिले होते, ते तोडून त्याला दुय्यम भूमिका लंडनला दिली जाणार असल्यामुळे त्या पार्टीत सहाजिकच त्याचा तोल गेला आणि त्याने आपल्या पत्नीला जी मध्ये त्याला अडवायचा प्रयत्न करत होती, ते तसे बरोबरही होते, जोरात थप्पड मारली आणि सगळ्याचाच पुढे विचका होऊन जातो.

ही शारीरिक थप्पड आणि इतरांना सहन कराव्या लागणाऱ्या मानसिक थपडा यांचे वेगवेगळ्या जोडप्यांच्या वागण्या-बोलण्यांमधून मनोज्ञ चित्र येथे दाखवले आहे. कळत-नकळत नवरे कायम आपल्या पत्नीला घालून पाडून अपमानास्पद असे नेहमी बोलत असतात, त्याही एक प्रकारे थपडाच.

आपली परंपरा आणि संस्कार जे आहेत, त्यामध्ये स्त्रीने निमूटपणे हे सारे सहन करावे असेच मानले जात असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते. या चित्रपटाने जणू काही आपले डोळे उघडून असे जाणवून दिले आहे की, पुरुषप्रधान संस्कृतीचा हा जो काही वारसा आहे तो बदलत्या काळात अत्यंत अयोग्य असून, स्त्रीलाही स्वतःचा आत्मसन्मान पुरुषांइतकाच राखण्याचा अधिकार आहे. तो अधिकार गाजवण्यासाठी अथवा मिळवण्यासाठी, सध्याची तरुण स्री, पूर्णपणे सक्षम आहे असेच थप्पड या चित्रपटाने दाखवले आहे. यामुळे 'पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने' हे मानून ज्येष्ठांना जे वाटते, ते पुढील पिढीला तसेच वाटेल असे नाही, असे समजून आपण पुढे जायचे.

याच पार्श्वभूमीवर योगायोगाने मी "शब्द रुची दिवाळी अंक'१८ मधील 'अडसर' ही डॉ अपर्णा महाजन यांची लघुकथा वाचली. या कथेमध्ये नवविवाहीत नायिका, आपल्या नवऱ्याच्या अगदी मुलींसारख्या पेहरावात कधीमधी वागण्यामुळे प्रचंड नाराज आणि दुःखी होते. त्याक्षणी कदाचित तिच्या मनात संसार मोडायची वेळही आली असेल.

पण सुदैवाने त्याच वेळेला तिला नॉर्मल काय आणि अँबनॉर्मल काय हे तिची मैत्रीण, जी मानसशास्त्रज्ञ आहे ती पटवून देते. त्यामुळे ती त्याचा जो काही आनंद आहे, तोही आपण मानला पाहिजे, या निर्णयाप्रत येऊन संसार गोडीने चालू ठेवते. म्हणजे इथे महत्त्व कशाला आहे तर संसार टिकून ठेवणे हे. संसाराची दोन्ही चाके योग्य तऱ्हेने एकमेकांचा तोल व चुका सांभाळत जर वागत राहिली, तरच संसार सुखाचा होतो. त्यामुळेच या चित्रपटात नायिका, कशी सध्याच्या काळात योग्य वागली असं असलं, तरी तिनेही समजून घेऊन, संसार मोडायला नको होता असंच आम्हाला वाटलं.

समाजाच्या परंपरागत अशा पुरुषप्रधान जीवनदृष्टीला अक्षरशः थप्पड मारून जागे केले गेले आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आधुनिक एकविसाव्या शतकातील, प्रगत आणि स्वाभिमानी स्त्रीचे हे मनस्वी दर्शन "थप्पड" चित्रपटाने घडवले हेही नसे थोडके !

सुधाकर नातू

ता.क.
हे लिहील्यानंतर मी एका चाळीशीतील विवाहीत तरूणाबरोबर संवाद साधला. त्यात आम्हाला हा चित्रपट कसा बघायला हवा ते चपखलपणे दाखवून दिले.
-------------------------------------
"बाघी३":
"अमानुषतेचा थरार आणि भीमपराक्रमाचा कळस"

ऑनलाइन तिकीट बुकिंगचा कधीकधी काय व कुणाला फायदा होतो आणि कुणाची व्यथा कुणाच्या पदरात चांगलं माप टाकते, सांगता येत नाही. Baaghi3 हा चित्रपट पहायचा योग हा अशाच एका ऑनलाइन तिकीट बुकिंग करताना झालेल्या चुकीमुळे, आम्हाला आला.

त्याचे असे झाले की, माझ्या भाच्याने तिकीटे बुक करताना ज्या दिवसाचे तिकीटं बुक करायची, ते करायच्या ऐवजी, त्याच्या आदल्याच दिवसाची तिकीटं बुक झाली. सुदैवाने आम्ही मोकळे होतो आणि त्याने हा चित्रपट पहा, मी आँनलाईन whatsapp वर तिकीटे पाठवतो, असा आग्रह सकाळी पावणे अकराचा शो असताना, आम्हाला दहा वाजता फोन केला. कोणताही चित्रपट पहाण्याची आमची अती आवड, सहाजिकच आम्ही सतर्कतेने त्या संधीचा फायदा उठवला. लगेच त्याने ऑनलाईन तिकीटे आम्हाला पाठवली, कारण त्या दिवशी त्याला ऑफिस होते. धावतपळत वाहन जे मिळेल ते घेत, आम्ही थिएटरवर पोहोचलो.

खरं म्हणजे हा चित्रपट आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी पाहण्यासारखा नाही, याची कल्पना होती व त्याला नकार द्यायचा विचार मनात आलाही, परंतु त्याची कळकळीची विनंती व त्याची तिकीटे फुकट जाऊ नयेत, म्हणून आम्ही जायचे मान्य केले.

माझ्या नातवा कडून बाघी 2 किंवा बाघी या चित्रपटांबद्दल आणि टायगर श्रॉफच्या द्रुष्ट लागावी अशा बळकट शरीरयष्टी व जीवघेण्या स्टंटस्
बद्दल मी ऐकले होते. त्यामुळे त्याचा हा चित्रपट आपल्याला बघायचा आहे, अशी मनाची तयारी केली. चित्रपटात अक्षरशः मनाची धडकी भरवणारी, सातत्याने ढिशूम-ढिशूम अशा तऱ्हेची आधुनिक जगातील भयानक संग्रामाची चित्र सातत्याने या चित्रपटात बघायला मिळतात.

वडील पोलीस अधिकारी असलेल्या दोन भावांची ही कथा. मोठा नेभळट तर धाकटा अत्यंत धडाडीचा. जेव्हा जेव्हा मोठा अडचणीत असेल त्या त्या वेळेला धावणारा हा छोटा भाऊ, त्याच्या मागे पहाडासारखा कसा उभा राहतो हे दाखवणारा हा चित्रपट आहे. नेहमी संकटात सापडत जाणार्या मोठ्या भावाला जणु वाचवणारा श्रीकृष्णच.

परदेशातील टोळीने ओलीस ठेवलेल्या मोठ्या भावाला, त्या क्रूरकर्मा टोळीशी व तिच्या खूनशी कप्तानाशी एकट्याने पराक्रमी सामना करत, दहशतवादाची पाळेमुळे खणायला निघालेला त्याचा हा शूर भाऊ, ह्याची ही अजिबोगरीब चित्रकथा आहे. यातील एक थरारक आणि मनाला व्यथित करणारी गोष्ट म्हणजे माणूस क्रूरतेने माणसांचाच जीव कसा घेतो कां घेतो हा निर्माण होणारा प्रश्न.

दहशतवादाची कल्पनाच करता येणार नाही, असे भेसूर चित्र या चित्रपटात जे दाखवले आहे. ते तसे जर खरोखर असेल तर माणसाच्या
राक्षसीपणाचा तो कळस असेच म्हणावे लागेल. संपूर्ण कुटुंबांना बळजबरीने पकडून परदेशात नेऊन व ओलीस ठेवून तिथे त्यांच्यातील कुणा ना कुणा माणसांना धमकावून आत्मघातकी क्रुत्ये करायला भाग पाडत, स्यूसाईड बाँबर्स बनवणे ही अत्यंत विघातक संकल्पना या चित्रपटात दाखवली आहे. ती खरोखर काळजाचा ठोकाच चुकवणारी आहे. म्हणजे हा 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' असाच प्रकार झाला.

नराधम दहशतवादाच्या नायकाला आपल्या चित्रपटाचा नायक एकट्याने राँबिंन हूड किंवा टारझन स्टाईल कसा नामशेष करतो त्याचे थरारकपण येथे आहे. जागोजागी पेरलेल्या भूसुरूंगांचे स्फोट, तीन तीन हेलिकॉप्टर्समधून हल्ला, ती तीन हेलिकॉप्टर एकमेकांशी आदळून त्यावर स्वार होणारा, ह्या चित्रपटाचा नायक व त्याची प्राणघातक स्टंटबाजी, आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना बघणे कठीणच होते. पण हे सारे तरुण पिढीला, विशेषतः जी मंडळी
आपले उद्याचे भवितव्य घडवणाऱ्या तरुणांपुढे असे चित्रपट जर येत असतील आणि त्यांना ते मनापासून आवडत असतील, तर आपले काही खरे नाही, हेच खरे!

मानवाचा दयाळूपणा, माणुसकी, माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वागावे, हे सारे विसरून जात, आता माणूस माणसांचाच जीव अखेरीस घेत राहीला, तर पुढे काय काय आपल्यासमोर आणून ठेवणार आहे, हा विचार येऊन खरोखर मन सुन्न झाले.


सुधाकर नातू

शुक्रवार, ६ मार्च, २०२०

"अर्धवट, अर्थवत् (?) कथा!": 


"अर्धवट, अर्थवत् (?) कथा!":

आतापर्यंत आपण दीर्घकथा लघुकथा आणि अगदी छोट्या असलेल्या अणुकथा वाचल्या असतील.

पण मला आज एक कल्पना सुचली, अशा कल्पना, मला नेहमीच पहाटे सुचतात. कल्पना अर्धवट कथेची आहे. ती अर्थवत् कशी बनवायची ते, मी तुमच्यावर सोडतो.

पहिली अर्धवट कथा अशी:

एक विवाहित मुलगी नाट्यगृहाच्या इथे गेलेली असते. ती, तिथून आपल्या वडिलांशी फोनवर बोलते:

ती: 'बाबा मी अमुक अमुक नाटकाचे तिकीटं काढायला आली आहे'.

बाबा: हो कां? मग असं कर, आमचीही दोघांची तिकीटं काढ, मात्र पहिल्या पाच रांगेत असली तरच. तिकिटाचे पैसे आपण भेटल्यावर, आम्ही देऊ किंवा असं समज की, आपल्या आईबाबांसाठी तू तिकीटं काढलीस!'

आता भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ कल्पून ती घटना घडली असेल, तेव्हां मुलीचे उत्तर काय असेल, ते तुम्ही प्रतिसादात देऊन
ही कथा पूर्ण करा.

बघा जमतंय कां? माझं उत्तर याच जागी, याच वेळी, उद्या.
धन्यवाद
सुदिना

ता.क. हाच जर मुलगा असेल, तर...?
त्याचे काय उत्तर?!!.....
----------------------------

" कालच्या अर्धवट अर्थवत् कथेचा उत्तरार्ध":
ती विवाहित मुलगी बाबांना काय उत्तर देईल, याची माझ्या दृष्टीने कल्पना मी पुढे मांडत आहे.
अर्थात् "पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने" याप्रमाणे प्रत्येकाचे मत वेगळे असेल. फक्त मी इथे माझ्या दृष्टिकोनातून जे काही होऊ शकेल ते मांडून, ही कथा अर्थवत् करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोणत्याही प्रसंगात त्यावेळचा काळ सामाजिक स्थिती आणि जीवनशैली यांचे प्रतिबिंब पडत असते, हे दर्शविणारी ही अर्धवट कथा, तिची उत्तरे मिळाल्यावर माझ्या कल्पनेप्रमाणे अर्थवत् होऊ शकते.

प्रत्येकाच्या अपेक्षा, एकमेकांकडून पूर्ण होणाऱ्या इच्छा या काळाप्रमाणे आणि इतरही सामाजिक वैयक्तिक जीवनशैली आणि वातावरण जसजसे बदलत जाईल, तसे बदलत जाते. हेच या कथेचे सार आहे. तसे आपआपल्या मनांतील उत्तरांवरून ती अर्थवत् होईल अशी मला आशा आहे.

'भूतकाळ':
या काळात मुलगी मुळात तिकीट काढायला जाणार नाही. गेलं कोणी, तर तिचे यजमान म्हणजे जावई जातील आणि ते असा काही फोन सासर्यांना करण्याची शक्यता नाही. त्यातून जर मुलगी गेली तिकीट काढायला,
तर ती उत्तर देईल: "बाबा मी माझ्या यजमानांना किंवा ह्यांना विचारून कळवते."

"वर्तमान काळ":
आजच्या काळात मुलगी असे उत्तर देऊ शकते: "बाबा आपण भेटू, तेव्हा पैसे दिले तरी चालतील". जर फटकळ मुलगी असेल,
तर ती म्हणू शकेल: "बाबा पाच रांगातच तिकीटं कशाला?"

"भविष्यकाळ"
कदाचित ही मुलगी असा काही फोनच करणार नाही आणि फोन जर झालाच,
तर ती सांगू शकेल "बाबा, आमच्या दोघांमध्ये तुम्हाला यायलाच कशाला हवं? घरीच बसा !"
किंवा तिने तिकीट जर काढलंच,
तर ती सांगू शकेल: "बाबा, ऑनलाइन पैसे पाठवून द्या!

शतकानुशतके उंबरठ्याच्या आंत असलेली स्त्री, अनेक थोर समाजसुधारकांच्या अथक् प्रयत्नांमुळे आता बाहेरच्या जगात, खरोखर स्वसामर्थ्याने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत प्रबळ होत, प्रभाव पाडत चालली आहे, हे खरोखर अभिमानास्पद लक्षण आहे.

अशा तर्‍हेचा कल्पक अर्धवट कथेचा उपक्रम, मला असाच जमेल तेव्हा चालू ठेवता येईल. आता तुमची उत्तरे व प्रतिकार प्रतिसाद येऊ शकतील. याचीही मला कल्पना आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

गुरुवार, ५ मार्च, २०२०

"Just Think it over wisely !":

 "Just Think it over wisely !":

Recall of My post on FB 5 years ago:
1. While appreciating our noble traditions of the Festivals, after Festivals, rejoicing merrily, with ultra-high decibel levels of noise, time has now come to seriously review, how much of it is really correct and essential, in the changed World of 21st century.

2. Further, while doing so, what is the proportion of waste of valuable productive time thus, V/S the quantum of productive time really brought to use in a year.

3. Without such course correction, our dream of becoming a Super Power in the World would be very difficult, if not impossible. And the terrifying trouble is, if it would be so, despite having the enviable advantage of the highest percentage of youths on our side."

Two responses to above, then:
1 "Noise is phenomena created by the uncouth, Music and dance is the lifeline of majority of populace !"

2 "What is this life if full of care , not a moment to stand and stare"words worth(?).! We cant have all work and no play..Only to the extent our noise level hurts, (or other boisterousness ) we should tolerate."

My Rejoinder to above, then:
"Not withstanding the fact that most of the festivals, one after the other are becoming marketing bluff for the political parties, only future would determine whether the caution about the much needed course correction, was timely or not. And obviously, the course correction doesn't imply abandoning the festivals all together but have a critical review."

Fast forward to the Current scenerio:

It's irony that it required the deadly threat of Monstrous Corona virus, to compell the toning down drastically the participation in the festival of Holy & Dhulvad !

Now, Just Think it over wisely!

Sudhakar Natu

सोमवार, २ मार्च, २०२०

"रंगांची दुनिया-११": "शारदोत्सव-५":

"रंगांची दुनिया-११": "शारदोत्सव-५":

२७ फेब्रुवारी २०२० ह्या मराठी भाषा दिनी Whatsapp वर आमच्याकडे आलेले, एक परिक्षा पहाणारे कोडे:

"मित्र-मैत्रिणींनो नमस्कार,
आज एक खऱ्या अर्थाने मेंदूला छान खुराक देणारे कोडे तयार केलेले आहे. खाली दिलेल्या शब्दांची दोन उत्तरे द्यायची आहेत. दोन्ही उत्तरे ३ अक्षरी आहेत. पहिल्या उत्तराचे शेवटचे (तिसरे) अक्षर बदलून त्याजागी चपखल अक्षर घातले की दुसरा शब्द आपोआप मिळेल. आणि ही कोड्याची अटही आहे.
उदा: धष्टपुष्ट / बिनवासाचे फूल
उत्तर आहे : *तगडा /तगर* (दोघांमध्ये पहिली २ अक्षरे समान आहेत.)

०१ प्रीत /ओंकार
०२ सहाय्य /अनंग
०३ खटाटोप /प्रस्थान
०४ जुळे /एक शब्दालंकार
०५ इंद्रदेव /हाव
०६ बैठकीची खोली/ दिव्यांचा सण
०७ श्रीफळ /एक मुनी
०८ आंदोलन/ वसुधा
०९ चंदेरी /परीट
१० अरण्य/ न हलणारे
११ साधारण /वस्तू
१२ थारा /मठ
१३ सरसरीत /वाईट कृत्य
१४ अपप्रचार, विष /नड
१५ संकोच /एक ऋतू
१६ बनावट/अपऱ्या नाकाची
१७ कावीळ/ इच्छा
१८ वपन /शीर्ष
१९ कसब /ठोकायचे साधन
२० सर्व /जाण
२१ चिखल/ देेवकेळी
२२ सहाय्य /जीभ
२३ ललाट /काढून टाकणे
२४ आड /मुलामुलीची सासू
२५ भागाचा उपभाग /वदंता
२६ हा प्राण्यांचा असतो/ माथा
२७ सोटा /पुजारी
२८ भयंकर/ सौदा
२९ असमान / म्लान
३० दानशूर / खिन्न

*प्रत्येक योग्य ओळखलेल्या शब्दाला १ गुण. असे एकूण ६० शब्द ओळखायचे आहेत.*
*अधिक गुण मिळण्याची _एकच_ संधी : कोड्यातील एकूण विचारलेल्या ३० प्रश्नांमध्ये तशाच प्रकारच्या आणखी एका प्रश्नाची (उत्तरासह) भर घातल्यास त्यासाठी अधिकचे ५ गुण मिळतील.*
*_कोड्याचे एकूण गुण ६५._*

मिळालेल्या गुणांच्या आधारे खालीलप्रमाणे शेरा मिळेल

*०० ते ०५ - मराठीचा अभ्यास नितांत गरजेचा.*
*०६ ते १२ - अतिसामान्य.*
*१३ ते २१ - सामान्य.*
*२२ ते ४० - बरा*
*४१ ते ५४ - उत्तम*
*५५ ते ६५ - प्रज्ञावंत*

*तर मग लावा आपला उजवा मेंदू कामाला... आणि जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. खूप खूप शुभेच्छा.....*

त्याचे आमचे उत्तर:

बुद्धीला चालना देणारे कोडे पाठवल्यबद्दल आभार.
२५ व २७ आले नाही.
०१ प्रीत /ओंकार प्रणय/ प्रणव
०२ सहाय्य /अनंग मदत/ मदन
०३ खटाटोप /प्रस्थान प्रयास/प्रयाण
०४ जुळे /एक शब्दालंकार यमल/यमक
०५ इंद्रदेव /हाव वासक/वासना
०६ बैठकीची खोली/ दिव्यांचा सण
दिवाण/दिवाळी
०७ श्रीफळ /एक मुनी नारळ/ नारद
०८ आंदोलन/ वसुधा धरणे/धरती
०९ चंदेरी /परीट रजत/रजक
१० अरण्य/ न हलणारे जंगल/जंगम
११ साधारण /वस्तू सामान्य/सामान
१२ थारा /मठ आश्रय/आश्रम
१३ सरसरीत /वाईट कृत्य पातळ/पातक
१४ अपप्रचार, विष /नड गरळ/गरज
१५ संकोच /एक ऋतू शरम/शरद
१६ बनावट/अपऱ्या नाकाची नकली/नकटी
१७ कावीळ/ इच्छा कामला/कामना
१८ वपन /शीर्ष कपात/कपाळ
१९ कसब /ठोकायचे साधन हातोटी/हातोडा
२० सर्व /जाण समस्त/समज
२१ चिखल/ देेवकेळी कर्दम/कर्दळ
२२ सहाय्य /जीभ रसद/रसना
२३ ललाट /काढून टाकणे कपाळ/कपात
२४ आड /मुलामुलीची सासू विहीर/विहीण
२५ भागाचा उपभाग /वदंता प्रभाग/प्रभाव??
२६ हा प्राण्यांचा असतो/ माथा कळप/कळस
२७ सोटा /पुजारी ?? /भटजी
२८ भयंकर/ सौदा कराल/करार
२९ असमान / म्लान विषम/विषण्ण
३० दानशूर / खिन्न उदार/उदास

बुद्धीला चालना दिली तर एकच कां असे अनेक शब्द मांडता येतात...
ओळखा:
३१ सोपे/कापसाचं बी सरल/सरकी
३२ प्रगती/अर्थव्यवहाराचे माध्यम चलती/चलन
३३ काक/हंडा कावळा/कावड
३४ बावळट/विहीर बावळा/बावडी
३५ पवित्र/एक कडधान्य पावन/पावटा
--------------------------
मराठी भाषेचे शब्दभांडार ह्या कोड्यामध्ये लक्ष केंद्रीत केल्याने विस्तारेल अशी आशा आहे.
ज्या कोणा अभ्यासू व्यक्तीने हे परिश्रमपूर्वक रचले, त्याचे कौतुक व अभिनंदन करावे तितके थोडेच आहे.

अकराव्या लेखानंतर "रंगांची दुनिया" हा साहित्य, नाटक, चित्रपट आणि मालिका अशा करमणूक प्रधान मनोरंजक माध्यमांत वरील लेखसंग्रह आपल्याला आवडला असेल अशी मला आशा आहे. अशी अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणताना मला देखील खुपच समाधान लाभले.

"नाटक, चित्रपट साहित्य व अंतर्मुख करणारे ह्रदयसंवाद ह्यांवर....
एकसे बढकर एक लेख वाचण्यासाठी.....

log on to my blog:

http//moonsungrandson.blogspot.com

Save and
Share this link on
your whatsapp grps..."

------------------------
"संपूर्ण वार्षिक राशीभविष्य",
"समाधान मिळविण्याचे सात सोपे उपाय"......
"राहू व केतुच्या राश्यंतराचे राशींवर परिणाम"....
"निराशेच्या अंध:कारातून चैतन्याच्या प्रकाशाकडे"...
"पुणे तिथे काय उणे"....
"मनांतले जनात, आयुष्याचा जमाखर्च"......
"परस्परसंबंध सुधारण्यासाठी वागायचे कसे?.....
असे एकाहून एक सरस...
तीसाहून अधिक......
विडीओज पहाण्यासाठी....
You tube वर
search करा माझा चँनेल....

moonsun grandson

हा चँनेल subscribe
ही करा......

-------------------------
धन्यवाद
सुधाकर नातू