बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

घडविते हात': "संस्कृतीकारणाचे अध्वर्यू":

 "घडविते हात':

"संस्कृतीकारणाचे अध्वर्यू":

महाराष्ट्र टाईम्स मधील "महामुंबईचे षडदर्शन" हे नियमित येणारे सदर मी नेहमी वाचतो. आज दिनांक ३० डिसेंबर'२१ रोजी या सदरामध्ये 'घडविते हात'

"संस्कृतीकारणाचे अध्वर्यू" या शीर्षकाखाली श्री दिनकर गांगल आणि त्यांच्या 'ग्रंथाली' ह्या वाचक चळवळीचा धावता आढावा अरुण जोशी आणि सुदेश हिंगलासपूरकर ह्यांनी समर्पक शब्दात घेतला आहे. वाचनसंस्कृतीवर प्रेम करणार्यांनी हा लेख मुळापासूनच संपूर्ण वाचण्याजोगा आहे. 

त्यामधील काही अंश मला भावले आणि कदाचित माझ्याशीही त्यांचा वैयक्तिक संबंध असल्यामुळे, मी ते इथे देत आहे:

"माणसे वाचणे, ती जोडणे त्यांच्यातून काही ज्ञान जोखणे त्यांना बोलायला-लिहायला उद्युक्त करणे, त्यासाठी पूर्ण वेळ देणे-दिशा देणे आणि काहीतरी नव्याने सादर करणे हे त्यांचे काम अव्याहत सुरूच आहे. दगडाच्या आत मूर्ती दिसणारा आणि अनावश्यक भाग तासून ती साकारणारा हा शिल्पकार साहित्य-संस्कृतीच्या विश्वात गेली पाच दशके सजगपणे वावरतो आहे. आजही काही सुचले लिहावेसे वाटले की दिनकर गांगल यांचा विचार घ्यावा असे वाटणारे अनेक आहेत. वयाच्या ८३ व्या वर्षी तोच उत्साह आणि उत्तम ते जतन करण्याचा व नवं ते घडवण्याचा त्यांचा प्रयत्न वर्धिष्णू आहे."

"ग्रंथालीने जी पुस्तके प्रसिद्ध केली यापैकी ८० टक्के पुस्तकांचे लेखक पहिल्यांदा लिहिते झाले होते, यामागे गांगल यांना विविध गोष्टींबद्दल असणारे कुतुहूल आणि त्या त्या व्यक्तींमध्ये विषयांमध्ये दिसलेला स्पार्क हाच धागा होता."

माझ्या वैयक्तिक जीवनात श्री दिनकर गांगल यांचे म्हणूनच मोठे योगदान आहे त्यांनीच माझ्यातील लेखनगुण आणि रंगभूमी व करमणूक क्षेत्र यावरील माझे प्रेम ध्यानात घेऊन, महाराष्ट्र टाईम्स मध्ये "शिवाजी मंदिरच्या कट्ट्यावरून" ह्या रंगभूमीविषयक सदराची संधी त्यांनी मला दिली. तेथूनच 'रंगांच्या दुनिये'तील लेखनाची माझी मुशाफिरी जी सुरू झाली, ती आजतागायत. 

त्यांचे योगदान एवढ्यावरच माझ्यासाठी पुरे होत नाही. कालांतराने पुढे मी विविध क्षेत्रांवर, विशेषत: व्यवस्थापन क्षेत्रातही लेख लिहित होतो आणि कार्पोरेट क्षेत्रातील माझी अनुभवाची शिदोरी त्यांनी अचूक हेरली. "ग्रंथाली" तर्फे मला लिहायला लावले. त्यांना पसंत पडेल इतका मजकूर मला सुधारायला लावला. त्याचेच फलित म्हणजे महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून त्या वर्षी पारितोषक मिळालेले "प्रगतीची क्षितिजे" हे माझे पहिलेवहिले पुस्तक, त्यांनी ग्रंथाली तर्फे प्रसिद्ध केले. 

फेसबुकवरील "रंगांची दुनिया" हा माझा समूह कदाचित याच पायावर उभा राहिला असे म्हणता येईल. सहाजिकच मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.

धन्यवाद

सुधाकर नातू

"एक छोटीसी बात":

"एक छोटीसी बात !":

छोट्या पडद्यावर सहसा जाहिरातींशिवाय कोणताही कार्यक्रम आपल्याला पहायला मिळत नाही. मग तो मालिका, कथाबाह्य कार्यक्रम असो, नाटक, चित्रपट असो वा बातम्या जाहिरातींच्या महापूरात बुडवून टाकणारा असतो ! परंतु, त्या रात्री नवलच घडले. सहज चॅनेल सर्फिंग करताना, "लीडर्स" या शीर्षकाच्या कार्यक्रमाने लक्ष वेधून घेतले आणि पहाता पहाता अर्धा तास कसा निघून गेला, ते अक्षरशः कळलेही नाही. श्री निलेश खरे व अमोल पालेकर ह्यांच्या, त्या उद्बोधक मुक्तसंवादात कोणत्याही जाहिरातींचा अडथळा नव्हता.....

मोजक्या शब्दात श्री निलेश खरे यांनी टोकदार प्रश्न व गोटीबंद मुद्दे मांडले आणि त्याला अनुषंगून, तर्कशास्त्राला पटेल, अत्यंत स्पष्टपणे, संयत बुद्धीने मोजक्या, अचूक शब्दात प्रत्येक विषयाचा योग्य तो मागोवा, अमोलजींनी घेतल्याचे जाणवले. कोणत्याही माणसाची विचारधारा व द्रुष्टिकोन, हा तो सभोवताली काय घडतंय, त्याकडे डोळस बुद्धीने पाहणारा आणि कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास करणारा ह्यावर अवलंबून असतो. असे बोलणे जसे मनाला पटते, तसाच ते आनंददायी व अनुकरणीय भासते. ती कला अमोल पालेकरांनी निसर्गत: आत्मसात केली आहे, याचा प्रत्यय सातत्याने येत होता.

या मुक्त संवादातून यशस्वी चित्रकार, अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता अशा विविध रंगी आणि विविधरंगी प्रतिमांमधून अमोल पालेकर हा एक श्रेष्ठ,
आदरणीय व अत्यंत बुद्धिमान मनस्वी कलावंत आहे असेही जाणवून गेले.

# 'लीडर' अमोलजींचे निवडक बोल:

# "लहानपणापासून मला चित्रकलेची आवड एसएससी नंतर चित्रकला मला पुढे शिकायची होती आणि त्यासाठी माझ्या आई-वडिलांचा प्रथम विरोध होता कारण चित्रकलेतून मी उपजीविका करू शकणार नाही याची जाणीव मला त्यांनी करून दिली पण मी माझ्या विचाराशी ठाम होतो हे बघून त्यांनी मला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले. मला त्यांच्या या संस्कारांचा खरोखर खूप उपयोग झाला. आपण जो निर्णय घ्यायचा, त्याचे परिणाम आपण स्वीकारले पाहिजेत हे माझ्या मनात त्यांनी रुजवले. त्यांच्या या दृष्टिकोनाचे मला आभार मानायला हवेत आणि कौतुक वाटते."

# " सत्तेच्या वा प्रभावी वर्तुळात मला यश मिळाले नाही आणि त्यापासून मी वंचित राहिलो असे म्हणणे चूक आहे. कारण जर एखाद्या गोष्टीची मला अपेक्षाच नसेल, तर ती नाही मिळाली तर मी वंचित कसा असू शकतो? मला कुठल्याही राजकीय वर्तुळात सामील व्हायचे नव्हते, मी अलिप्त होतो. माझी तेथून कोणतीही अपेक्षा नव्हती. म्हणूनच मी डाव्या पासून उजव्या विचारसरणीच्या पर्यंत सर्वांच्या बाबतीत मला जर काही पटले नाही, तर मी माझा विचार स्षष्टपणे मांडत आलो आहे."

# "नाट्यक्षेत्रात मी अपघातानेच आलो. सत्यदेव दुबे यांच्या छबिलदास मधील नाट्य वर्तुळात मी टाईमपास म्हणून जात असे. तेव्हा त्यांच्या नजरेला मी आल्यावर, त्यांनी मला नाटकात काम करशील कां, असे विचारले मी अचंबित झालो. त्यावर त्यांनी जे सांगितले ते महत्त्वाचे: 'तू काही मोठा कलावंत आहेस किंवा होशील असे मला वाटले म्हणून मी तुला निवडले नाही, तर तू टाईम, वेळ फुकट घालवतोयस, येथे थोडा वेळ सत्कारणी लागेल, म्हणून तुला निवडले आहे. असा मी नाट्यक्षेत्रात शिरलो."

# "भूमिका" चित्रपटामध्ये मला केशव दळवी हीच भूमिका करावयाची होती आणि तसे मी निर्माते श्याम बेनेगलना सांगितले. खरं म्हणजे "छोटीसी बात" "रजनीगंधा" आणि "चित्तचोर" ह्या माझ्या तीन चित्रपटांच्या यशस्वी रौप्यमहोत्सवांमुळे, मी लोकप्रिय नायक म्हणून यशस्वी झालो होतो. अशावेळी मी केशव दळवी सारखी या चित्रपटातली खलनायकी भूमिका स्वीकारणे तसे धोक्याचे आणि निर्माते श्याम बेनेगलनादेखील मीच त्या भूमिकेला योग्य आहे असे वाटणे, हा सुयोग जुळून आल्यामुळे, माझ्या करियर मधली ही भूमिका मला मिळाली व ती म्हणजे मैलाचा एक दगड आहे असे मला वाटते"

# " चित्रपटाने वा नाटकाने मार्केटमध्ये किती गल्ला जमवला यावरून त्यांचे मोजमाप करणे गुणवत्तेच्या दृष्टीने चूक आहे असे मला वाटते. "थोडासा रुमानी हो जाए" हा अगदी आगळा-वेगळा असा चित्रपट आणि त्यामधील नाना पाटेकर यांची त्याच्या अँग्री यंग मॅन या भूमिकेला विरुद्ध अशी रोमँटिक भूमिका हा जो योग जुळून आला. त्या चित्रपटाने मला स्वतःला जे जे आत्मसमाधान मिळाले, त्याची तुलना चित्रपटाने मिळवलेल्या माफक गल्ल्याशी करता येणार नाही."
.......
............
त्या छोटेखानी कार्यक्रमांतून मी माझ्या मनमंजुषेत वेचलेले अमोलजींचे हे निवडक बोल, हा 'सुखी माणसाचा सदरा' (हे त्यांचेच शब्द) बाळगणारा एक बुद्धिमंत, जातीवंत कलावंत समाजभान असलेली व्यक्ती आहे, हेही जाणवेल. अशी आपल्या पाठीच्या ताठ कण्यावर, विचारधारेच्या मजबूत पायावर ठाम उभी असलेली मंडळी आता दुर्मिळ होत चालली आहेत, हे आपणा सर्वांचे दुर्दैव !

केवळ अर्ध्या तासात चित्रकला, चित्रपट, नाट्यसृष्टी आणि एकंदरच सध्याच्या संक्रमणशील, अस्वस्थ करणार्या माहोलासंबंधी, जो विस्तृत पट ह्या विचारगर्भ कार्यक्रमात मांडला गेला, तो नि:संशय आनंददायी व दुर्मिळ अनुभव होता. त्याबद्दल श्री निलेश खरे आणि अमोल पालेकर ह्यांचे अभिनंदन व धन्यवाद.

ही 'छोटीसी बात', 'चित्त' चोरुन गेली, मनाला 'रजनीगंधा'त भिजवून गेली.

सुधाकर नातू

"Social Media: Funny Game of Views/likes !":

 "Social Media: Funny Game of Views/likes !":

It all starred with my posting on social media:

"फेसबुक किंवा व्हाट्सअप वर आपल्याला मेसेज आला आहे की नाही हे बघण्याची तुमची फ्रिक्वेन्सी काय असते?
माझी पंधरा मिनिटे ते अर्धा तास !"

अ१६
-------------
👍
To which I got few responses like:

R1 " अशी काही ठराविक वेळ नाही. सकाळी-१० ते १५ मिनिटे, दुपारी व संध्याकाळी अंतर जास्त असते.

R2 "😀 मी फेसबुकवरचे संदेश मुख्यतः बातम्यांसाठी आणि विविध विषयावरील माहीतीसाठी बघतो , त्यामुळे ते साधारणतः १/१.३० तासांनी पाहातो. फेसबुकवरचे लेख मात्र मी एक पटकन दृष्टिक्षेप टाकुन वाचतो , त्यावरच्या लोकांच्या प्रतिक्रिया विशेषतः आवर्जून वाचतो कारण त्यातुन लेखकाला व प्रतिक्रिया देणार्‍या लोकांना त्या विषयाची किती जाण आहे याचा अंदाज येतो. बहुतेक वेळेला दोघेही गोंधळलेले आणि भरकटलेले असतात.

व्हॉट्स अॅपवर मात्र मी लक्ष ठेऊन असतो कारण माझ्या मुलींचे, नातवंडांचे, मित्रमंडळींचे विविध विषयावरचे संदेश सतत येत असतात. देवाणघेवाण चालुच असते. काही विषयविशेष ग्रुप असले तरी त्यातल्या अनेकांबरोबर स्वतंत्र संवाद, वादविवाद चालुच असतो. नविन माहीती आणि विषय कळतात, त्यांचे वेगवेगळे दृष्टिकोन कळतात. लोकांचे विविध विषयावरचे ज्ञान, अभ्यासु वृत्ती पाहुन चकित व्हायला होते. बरेच काही शिकायला मिळते. मेंदु , मन , शरीर ताजेतवाने राहाते 👍🏽👍🏽"
👍
My reaction to these:
"👍Thanks for an honest response. The purpose of this, was to understand where do I stand in the crowd of my contacts. Bottom line is your online social media time spent should have a definite goal & it should be in line with that, well balanced."

But , with yet another one, the interactive dialogue was lengthy & interestingly thought provoking !:

R3:
"It depends what i am doing
mid nothing is being done and just watching TV and phone is next to me then it pops up so you look at. but if working or busy or walking or driving etc then less frequency.

but still today itself i was talking to anjali that i want to see if i can curtail my WA and limit to morning and late evening. During day i will only look into certain groups that i have to respond as i am these days asked questions about travel protocols rt pcr as people are desperately wanting to know from me the procedures.

still i am not like todays youngsters who are on phone all the time (WA FB insta twitter and some more apps they only know).

bottom line may be a new year resolution for me is to curtail WA further (i have a feeling you are going to steal my resolution and write a small write up on this as if yours😎)

in your case, i see no reason to curtail WA or reduce frequency. for you it perfectly alright and i would say you should keep watching WA FB except not get into viewer count and so on. may be your new year resolution could be to curtail to be constantly focused on count of viewers. Great Authors write and not worry who reads!!!!
👍
Me: "can you tell me how to get over my habit of not worrying about the likes/no of views for my inputs on social media?
👍
R3: "Temptation !":
is not easy to remove which is why it is something that you are tempted to do. it is human nature! this is why world has run for better or worse: so nothing wrong in having desire to know the count of viewership.

first bare that in mind that it is usual and it is not a dicease until you turn it into.

if your hands start going automatically every few minutes to check the count and on top getting thrilled or dejected based on count is when you should realize that the desire has turned into a temptation.

A habit is good if you control it than it controls you.
There lies the answer how to overcome it.

Let it be a desire and set that desire for a daily knowledge than each minute desire. continuous desire is temptation.

Technically in order to control that habit a simple set of rule is set a time to check; once in morning and then after 12 hours once in evening. only two times a day. set that rule. in between desire tried to turn into temptation remind your mind to let it remain as a desire and about set time. Do NOT click those buttons or look at counts. best is do not bring up prior writing in front of you except these two times; that way it does not automatically pops up. even if pops up move to a brand new writing or reading.

Next one step to control is difficult for you as i know your nature. you have expectations from others to honor your actions. intellectually understand that others do not owe you anything.

I had informed you last few days before i came about my ultimate theory : the sorrow or sadness in world is 90% due to two things only "expectations and dependency";

Do not keep expectations: what count you get is a thank you to God. you did your writing and your are done! Did Bapu did poems and showed to others? he kept on writing.

Another advantage in this approach of writing and not writing for others to respond is your writing will become intense and not the showy or flowery only. you have an amazing great talent in many areas including one stroke writing then write more than chasing popularity. what are you going to achieve at age you are at by count being 10 or 100.
"Sidhhi peksha prasaidhhi mithi hote tenva manasachi bahuli banate. "
you are getting trapped in the temptation and becoming a puppet than a man who can write beautiful.

This does not mean not care of writing quality or desire to get acknowledgement but let that be a milestone on the road while you travel on road of writing than stopping your car to check what mile it is. set your goal is to achieve a tranquility of writing and getting peace out of that only than chasing mind wondering around counts. one thing keep in mind the count for you is not going to go beyond certain number (may be 25 50 100) it is not going to be 10000 ever. then why to get drowned in shallow water of small counts.

I always say any decision should be made intellectually than emotionally.

In this case, see what i said, acknowledge and accept with your brain and not mind what it is about and mainly intellectually accept and decide your step to take to control it.

Temptation is a function of mind and not brain.

There lies the key. make the process based on intelligence acceptance. if you do that then every time you have urge (mind) your brain will bring you back (if you really adopt it intellectually means understand agree implement with brain).

It will slowly change and you are so great that you may speed up.

Start congratulating when you have Plus day (ie you saw count only twice a day and also not get impacted with the number). start noting down negative days when you do not. make a tally. inspect tally at the end of the day which will automatically tell you what you should do next day in order to get a plus day. 3-4-5 days a week to achieve and then full marks.

What i said is not just true for counts but anything in life!!!"
👍
Me: "I do understand that I cannot compel others to act the way I expect them to act on my inputs. Hence it's futile to even think about number of views, likes. And I wonder how am I perfectly ok with my wife, who is just not bothered about what I do with Social media !-1
However for others, it means I have other yardstick for the responses ! -2

Hence solution is obvious, try that 2 above is equal to 1 !!
I don't know how much time period would lapse for me to achieve 2=1."
👍
R3:
"You are too good and talented
once you decide you do it
so this also you will achieve in short time.

Lottery winning :
unless you buy a ticket your chances of winning is absolute zero.

get it!!!"
👍
Moral of the ongoing story is well said in Bhagvat Geeta !":
"कर्मण्ये वाधिकारास्ते, मा फलेशु कदाच न !"

धन्यवाद
सुधाकर नातू
------------------------

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

"मुंबईचे षडदर्शन":

 "मुंबईचे षड्दर्शन !":

"मुंबईचे षड्दर्शन" ही म.टा. मधील लेखमाला, मी नियमितपणे वाचतो. खास तज्ञांनी लिहीलेल्या प्रत्येक लेखामध्ये, मुंबई, तिच्या नजिकच्या इतिहासावर प्रकाश टाकत, इथे घडून गेलेल्या महत्त्वपूर्ण घटनांवर मांडलेली माहिती उत्कंठा पूर्ण आणि उपयुक्त अशीच असते.

काय,काय घडून गेले आणि त्याचे काय परिणाम झाले व पुढे काय होतील अशा पद्धतीचे निरीक्षणही या अभ्यासपूर्ण लेखांमध्ये असते. त्यामुळे लेखकांचे अभिनंदन आणि ही अभिनव संकल्पना वाचकांच्या हितासाठी राबविल्याबद्दल म.टा.चे कौतुक व शुभेच्छा. 

म.टा. २३ डिसेंबरच्या अंकामध्ये विचक्षण आणि साक्षेपी अशी कीर्ती असणाऱ्या, संपादक तत्वाचे अनेक पैलू अंगी असणाऱ्या, 'श्रीपु' अर्थात श्री. पु. भागवतांचे 'सत्यकथा' मासिक व मौज प्रकाशनाच्या रुपाने मराठीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांचे योगदान आहे. 'सत्यकथा' मासिकाच्या संपादनाची मुहूर्तमेढ करून 'श्रीपुं'नी साहित्य विश्वात जे पाऊल टाकले, ते खरोखर वामनावताराप्रमाणे मराठी साहित्यविश्वाला व्यापून गेले. 'सत्यकथे'ने, पुढे नामांकित झालेले अनेकानेक दिग्गज लेखक घडवले ही एक त्या विश्वातील अभिमानास्पद व आनंददायी गोष्ट आहे. तिचा लेखाजोखा साक्षेपी व्रुत्तीने सादर करणारा हा लेख, प्रत्येक मराठी प्रेमीने वाचावा असाच आहे. 

त्या लेखातील वेचक व वेधक गोषवारा असा आहे:

"संपादन एक दृष्टी असते, कथा कवितेतील नव्या प्रतिभावंतांच्या प्रयोगशील निर्मितीला आग्रहाने स्थान देणारी आणि त्याचा पुरस्कार करणारी समीक्षाही प्रकाशित करणे, हे संपादकाचे आद्य कर्तव्य असते. मराठी साहित्यवर निरतिशय प्रेम करणारे, लेखकांच्या जडण-घडणीत स्वतःला झोकून देणारे, नवसाहित्य घडवून आणणारे आणि साहित्यिक बांधिलकीचे व्रत घेऊन जाणारे असे संपादक म्हणजे 'श्रीपु' होय. 

संपादक हा लेखक घडवतो हे मान्य न करता, प्रतिभावान लेखकच संपादकाला नकळत घडवत असतो, असे म्हणणारा विचक्षण व साक्षेपी संपादक म्हणजेच श्री पु भागवत !"

सारांश,

ही 'मुंबईचे षड्दर्शन' लेखमाला म्हणजे जणू काही, मुंबईकरांसाठी उघडलेला तिसरा डोळाच म्हणावा लागेल.

धन्यवाद

सुधाकर नातू

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

"Out of the Box Random Thoughts":


# "What's Life?":

Life is a roller coaster ride. It's only for few days, not going generally, beyond single digit, that u feel that there r no problems on your slate to tackle. All of a sudden, these gooddy, gooddy feelings get shadowed by the entry of an uncertain problem, thus making room for his 'fellow-brothers' to enter the fray.

Then on, you struggle not, for just few days but for months, with an ocean of worries to tackle and swim thru'. But 'Lo', Life being a wheel of fortune, some magic wand appears on the scene and cleans the clouded slate, swiftly and you, then again have a clear blue 'sky' with the bright, shining 'Sun' of hope and joy.

That's, what Life is, for one and All. Amen...

# "Disastrous Moral & Ethical Downfall !":

It is really required at this stage of morally and ethically poor
scenerio, to seriously and scientifically probe, investigate the reasons, causes for such a moral downfall, generations after generations over the years gone by.

Add to that there is a growing tendency not to follow set rules/laws or systems and 'Hum Kare so, Kayada' mentality is seen ever now and then. Meaning of it in nutshell is "हम नही सुधरेंगे !" Let's find what went wrong.

Despite present generations' better economic status, we would get ashamed if we examine & compare what was the Model, honest generation a century ago was and what pathetic we are today. It is just not easy to find the answer.

Is it due to 'LPG' factor or any genetic change over all these years , or is it that our priorities, outlook towards the way we should lead life has dramatically changed as economic, scientific advancement went on improving or is it that due to our rapid growth of comforts increased over the last century, there has been our moral degradation?

Thus Qs are plenty,
I believe this is a crucial Turning Point for all of us, as we walk fast
to future years of this century and such a meaningful probe is
the most desirable right now.

Remember the menace, monster of corruption and craze for easy fast prosperity, due to which all our Noble values are getting eroded. It is hence, high time that the genetic scientists, social thinkers/ reformers, economists come together to probe about the Mission Moral Revival of the coming Generations. Other wise I am afraid anarchy won't be fae away.

Sudhakar Natu

शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

"टेलिरंजन ? नव्हे, हे तर चिंताजनक नैतिक अध:पतन !":


 "टेलिरंजन ? नव्हे, हे तर चिंताजनक नैतिक अध:पतन !": 

टीव्हीवरील बहुतेक मालिका प्रथम खूप उत्सुकता वाढवणाऱ्या असतात परंतु त्यांचा कथेचा जीव इवलासा असल्यामुळे त्यानंतर मालिका वाढवण्यासाठी काहीही, कसंही दाखवलं जातं. प्रेक्षक जणु मूर्ख आहेत त्यांना डोकं नाही अशा पद्धतीने मालिका कसेही, काहीही दाखवत पुढे नेली जाते. मी अशावेळेपासून ती भरकटत जाणारी मालिका पहाणे सोडून देतो.

"येऊ कशी मी नांदायला !": नकोच येऊस!:

नव्याने आलेली काही अंशी उत्सुकता निर्माण करणारी अशी ही मालिका, मात्र हा एक हास्यास्पद पोरकटपणा आहे, हे लौकरच जेव्हा मालविका लिव्ह ईन सहचराला अक्षरश:कुत्र्यासारखे साखळीला बांधून फिरवते तेव्हाच लक्षात येते. 

ह्या मालिकेमध्ये परिस्थितीने गरीब असलेली लठ्ठ मुलगी-स्वीटू देखण्या श्रीमंत तरुणा-ओमबरोबर बिनदिक्कत प्रेमाचे चाळे करते आणि हे सगळं तिच्या आईला काही केल्या लक्षातही येत नाही. 

न पटणार्या ह्या जोडीच्या आंधळ्या प्रेमात दोघांचे भेटणे प्रेमाचे चाळे चालूच असलेले दाखवतात. घरातल्या आई वडिलांना किंमत न देणारी आणि ज्याच्याबरोबर लिव इन रिलेशनशिप मध्ये आहे अशा नवऱ्याला कुत्र्यासारखे वागवणारी, नोकराला केव्हाही थोबाडीत देणारी अशी मालविका म्हणजे न पटण्याजोगी व्यक्तिरेखा आहे. तिला कसे शोधून काढता येत नाही की, तिचा भाऊ ओम, स्वीटूबरोबर काय काय उद्योग स्वीटूबरोबर करतोय ते. त्याचप्रमाणे त्यांची जर एवढी गडगंज श्रीमंती आहे तर त्यांचा खरोखर काय उद्योग असतो, हे कळायलाही मार्ग नाही. अशा या कंटाळवाण्या मालिकेने छोट्या पडद्यावर यापुढे नांदूच नये. स्वीटूचे ओमशी लग्न न होता, त्यांच्या उद्योगातील नोकराशी होते, त्यानंतर मी ती मालिका पहाणे

सोडून दिले.

"रंग माझा वेगळा-काळा, काळा !":

ह्या मालिकेमध्ये तर सौंदर्या ही सासू असलेली खलनायिका काळ्या रंगाची पराकोटीची नफरत करते. त्यामुळे काळ्या रंगाच्या सुनेच्या-दीपाच्या मागे ती अक्षरशः हात धुऊन मागे लागते आणि तिचे हाल-हाल होईल इतका त्रास देते. दीपाची सावत्र बहीण श्वेताचा दीपाच्या नवऱ्यावर-डॉ कार्तिकवर डोळा असल्यामुळे, त्यांच्या घरात प्रवेश मिळावा ह्या हेतूने, बिनदिक्कत त्याच्या धाकट्या भावाशी विवाह काय करते. नंतर गर्भवती राहिलेल्या दीपाच्या बाबतीत ती तर नको ते भयानक कृत्य करते. 

तिच्या मध्ये आणि तिचा नवरा कार्तिक यांच्यात दुरावा व्हावा म्हणून कार्तिकला मूलबाळ होणारच नाही अशा तऱ्हेचा खोटा रिपोर्ट तयार करण्यामागे तिचा हात असावा हे काय म्हणायचे? पुढे तर दीपा घर सोडून गेल्यावर मालिका कशीही भरकटत जाते. भरीला भर म्हणून मध्येच एंट्री घेतलेल्या डॉ कार्तिकच्या डॉक्टर मैत्रिणीचे खलनायकी उद्योग वेगळेच. थोडक्यात ह्या मालिकेचा रंगच मुळी काळाकुट्ट. काय साधतं हे असले नकारात्मक चित्रण दाखवून? त्यानंतर मी ही मालिका पहाणेच

सोडून दिले.

"स्वाभिमान?: हा तर गुंडाचा आखाडा !":

"स्वाभिमान" मालिकेमध्ये तर अक्षरशः सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत शैक्षणिक संस्थेमध्ये नाही केला पल्लवीला वर्गातील टारगट मुले त्रास देतात आणि वर्गातच जवळजवळ रात्रभर कोंडून ठेवतात तेवढे पुरे झाले नाही म्हणून की काय त्या मुलांना नंतर काहीच शिक्षा होत नाही तीच मुले काही दिवसानंतर तर याच्या पुढची मजल घाटात स्टोअर रूम मधून काहीतरी पल्लवीला आणायला लावून तिथे अशी व्यवस्था करतात की तिचा पाय लागल्यावर मोठा स्फोट होईल, शॉर्टसर्किटमुळे आग लागेल. तरीही त्या मुलांना त्या भीषण क्रुत्याबद्दल ना पुढे काही जाब विचारला गेला, ना या प्रकरणाचा शोध घेतला गेला. दुसरे असे की आदिती मॅडम आणि त्यांचा मुलगा शांतनु यांच्यामध्ये जे हाडवैर आहे ते तर खरोखर अनाकलनीयच. मुलाची इतकी दुश्मनी आईबद्दल दाखवून काय साध्य होते?

त्यापेक्षाही कमाल म्हणजे पल्लवीचे वडील आदिती मॅडमच्या वरील प्राणघातक हल्ल्याला जबाबदार असल्याचे कळूनही, या मॅडम खटला मागे घेतात आणि त्यांना सोडून देतात. म्हणजे इथे गुन्हे एकामागोमाग घडतात, मात्र त्या आरोपींना शिक्षा होत नाही. शैक्षणिक संस्था आहे की गुंडांचा बाजार असं देखील वाटतं ! इतके पुरे नाही, म्हणून पल्लवीचा मेव्हणा तिच्यावर अतीप्रसंग काय करतो! ह्या तर्‍हेची घ्रुणास्पद गुन्हेगारी क्रुत्ये दाखवून, स्वाभिमान नावाखाली दाखवून काय साधलं जातं ते त्यांचं त्यांनाच ठाऊक. ओढून ताणून चंद्रबळ आणत ही मालिका अशीच भरकटत चालली आहे.

आपली भूषणावह परंपरा आपले नीतिमूल्ये आणि एकंदर आपली संस्कृती आपली कुटुंब व्यवस्था याकडे पूर्ण दुर्लक्ष करून मराठी मालिका जे जे काही दाखवत आहेत ते तिटकारा उत्पन्न करणारे आणि निश्चितच अयोग्य असे आहे. गुन्हेगारी स्वरूपाचे अनेक प्रसंग नकारात्मक अशा तर्‍हेची कृत्ये करायची आवड असलेली पात्रे यांचा सुळसुळाट, हेवे दावे, कटकारस्थाने या सगळ्यांमधून टीआरपी मिळवायचा अट्टाहास हे निश्चितच निंदनीय आहे. आपल्या लेखकांना झाले काय आहे?

यापेक्षा आपले जे चांगले साहित्य आहे त्यामधील चांगल्या कथा निवडून किंवा कादंबऱ्यांमधून उत्तम उत्तम असे नाट्यमय मालिका तयार करता येतील याकडे कोणाचेच लक्ष नाही. करमणूकीच्या बुरख्याखाली हा सारा समाजाला रसातळाला नेणारा उद्योग ताबडतोब थांबला पाहिजे, असेच कुणाही समंजस माणसाला वाटेल. त्या करताच ह्या सगळ्या करमणुकीच्या एकंदर प्रयोगांवर सेंन्सारशिप येणे आवश्यक नव्हे कां?

अखेरीस....

ह्या विचार मंथनाला "प्रेक्षकांनी रिमोट वापरावा", असे साळसूद उत्तर नको, उलट प्रेक्षकांना रिमोटला उलट हातच लावायची वेळ येणार नाही, अशा उत्तमोत्तम मालिका बनवल्या जाव्यात.

त्याकरिता.....

"मालिकांचे 'महाभारत':

भरकटत, 'पाणी' टाकून लांबलचक मालिकांना नांवे ठेऊन अक्षरशः उबग आला. ह्या द्रुक् शाव्य माध्यमाचा अधिक चांगला उपयोग व्हायला हवा. म्हणून हे मनोगत:

१ जुन्या चावून चोथा झालेल्या आणि कथानकात काहीही नाविन्य न उरलेल्या मालिका पुढे दाखविल्या जाऊ नयेत.

२ ह्या पुढे तरी शक्यतोवर टी-20 सामन्यांप्रमाणे मर्यादित भागांच्या आणि निश्चित कथानकाचा शेवट असलेल्या मालिकाच दाखविल्या जाव्यात.

३ त्या अनुषंगाने कुठल्याही मालिकेत प्रचलित कायद्यांच्या विपरीत असे काहीही दाखवले जाणार नाही ना, असे यापुढे तरी त्यांच्यावर सेन्सॉर नियंत्रण ठेवले जावे.

४ ज्याप्रमाणे महाभारत मालिकेमध्ये प्रत्येक भागाच्या शेवटी त्या त्या भागातील कलाकारांचा सहभाग असे, त्यांच्या नावाची श्रेयनामावली दाखवली जायची, तीच पद्धत यापुढे मालिकांमध्ये सुरू केली जावी.

याशिवाय

काय?....काय?... काय?...

जे तुम्हाला वाटते ते प्रतिसादात जरूर लिहा.

धन्यवाद

सुधाकर नातू

"The Turning Points in Life.":

 "The Turning Points in Life.":

There are Victory Points, as well as Turning Points in Life. Victory Points are the successful fights against the odds & challenges and mostly are achievable due to out of box thinking & sustained efforts. 

On the other hand, in the course of the journey of Life, one does encounters many a Turning points which ultimately change his path and possibly Future too. This is because TPs have the Power to generate all together different options & probabilities- that can turn out bad or good.  It is interesting at least sometime in Life; one must review his past & to review the VPs & TPs gone by.

Whenever you recall & introspect; while VPs would focus on your wins, most likely the TPs happen to be your losses. It is further exciting to review the TPs & try to imagine the possibilities, if at all, these TPs have not occurred, a different picture of what Life would or could have been would emerge. 

Thus you would get a kaleidoscope of dynamic images of variety of possibilities in your Life resulting into a different position as on Present. 

Answer to the Qn why at all these TPs  come in our Lives, is very difficult & possibly impossible. On the hindsight, TPs are results of few factors, not in our hands-hence uncontrollable; while there could be those culminating from our own Decisions then, on optional choices available. 

These Decisions are mostly dependent on our beliefs & values as well as the way we want to lead Life based on our Character. Such very decisions & actions that appear to be the Most correct, right at that moment of time, mostly in future get viewed as the wrong ones; for short term satisfaction then; we have missed the road to a much better, comfortable future.

In the ultimate analysis, we Should & Must accept these TPS as they were, without any remorse or repentance and get ready to look forward to more such fresher TPs in the unknown Future. 

Honestly & Frankly, this Monologue is only for my own self-expression & self satisfaction & I don’t have the courage to imagine their acceptance/rejection when read.

But I do take the Liberty to mention that these are for Posterity. Thank You.

बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

"एक 'वाचलेला' दिवस !':

 "एक वाचलेला दिवस !":

शीर्षक मोठं गमतीशीर आहे, असं तुम्हाला वाटत असेल. 'एक उनाड दिवस' असा मला वाटतंय लेख किंवा 'एक उनाड दिवस' चित्रपट तुम्ही पाहिला असेल. परंतु माझा कालचा दिवस हा एक 'वाचलेला' दिवस होता असं आता मला जाणवतंय.

त्याचं असं झालं, माझ्या लक्षात आलं की मी विशेषकरून मोबाईल हातात धरून सकाळपासून झोपेपर्यंत "तू माझा सांगाती" सारखा मोबाईल मध्ये वेळ घालवत आलेलो आहे. व्हाट्सअप बघ, फेसबूक बघ, ई-मेल बघ अशा तऱ्हेने अधुनमधुन मोबाईलमध्ये डोकवायची माझी सवय घातक आहे हे मला जाणवलं. ठरवलं, आता मोबाईल वापराचा उपास करायचा. परंतु संपूर्ण २४ तास ते मला जमणार नाही, असं वाटल्यामुळे मी ठरवलं की, सकाळपासून सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत मोबाईलला हात लावायचा नाही. माझी वाचनाची सवय त्यावेळी कामाला आली.

पुष्कळ दिवस काहीच वाचलं नव्हतं. रविवारनंतरचे पेपर वाचायचे राहिले होते. त्यामुळे म. टा. आणि लोकसत्ता हातात घेतला आणि वाचनाचा माझा रतीब, मी चालू केला. त्यातूनच मला हा 'वाचलेला' दिवस सापडला ! वेगवेगळ्या तऱ्हेचे मजेशीर अनुभव त्या वाचनातून माझ्यासमोर उभे राहिले.

पहिला लेख होता, तो आपल्या घरातील देवाच्या पूजेच्या मूर्ती किंवा पोथ्या किंवा धार्मिक पुस्तकं तसबिरी इ.इ. यांचं घर बदलताना किंवा बदल्या होताना बऱ्याच वेळेला आपण काही शकत नाही. या समस्येवर प्रकाश पाडणारा तो लेख होता. या समस्येच्या मुळाशी जाऊन कुणी ना कुणीतरी प्रयत्न करतोय याचा तेथे उलगडा होता. पुण्यातील आणि नाशिक मधील संस्था व व्यक्ती यांच्याकडून अशा तर्‍हेचा पुढाकार घेतला गेला आणि त्यातून कितीतरी धार्मिक साहित्य योग्य मार्गाने, कुणाची मनं न दुखवता व्यवस्थापित केले गेले. खरंच किती वेगळा अनुभव होता हा !

तो अनुभव वाचून होतो नाही, तोच नव्या जगाची प्रगती व दिशा दाखवेल असा लेख वाचनात आला आणि तो मनाला अधिकच उभारी देऊन गेला. सध्या ट्विटरवर 'सीईओ' म्हणून पराग अगरवाल या भारतीयाची नेमणूक झाल्याचा तो लेख होता. आज जगामध्ये अग्रगण्य कंपन्यांमध्ये अनेक भारतीय सर्वोच्च पदी आहेत हे आपण पाहतच आहोत. आज जगामध्ये अग्रगण्य कंपन्या आहेत त्यांचे असेच उच्चाधिकारी बहुतांश 'आयआयटी' पदवीधारक आहेत, ही भारताला ललामभूत अशीच गोष्ट आहे. त्यासंबंधीचा त्या लेखातून भारतीयांच्या बुद्धिमत्तेची पताका संपूर्ण जगभर कशी आज योग्य तर्‍हेने फडफडते आहे याचे दर्शन झाले आणि मला खरोखर क्रुतक्रुत्य झाल्या सारखे वाटले.
आज ज्यांना उगाचच नावे ठेवली जातात, त्यांच्याच द्रष्टेपणासारख्या निर्णयामुळेच 'आयआयटी' सारखी संस्था भारतभर योग्य त्या ठिकाणी स्थापली गेली. त्याचेच उत्तम परिणाम, आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आर्थिक साम्राज्याचं आधिपत्य करतोय, हे त्या वाचनातून ध्यानात आलं.

ह्या नंतर चक्क पुराणातली एक गोष्ट वाचायला मिळाली. पराभूत आणि नैराश्याने ग्रासलेल्या आपल्या मुलाला संजयाला, त्याची आई विदुला कशी प्रेरित करते त्याबद्दलची ! ही गोष्ट कृष्ण कुंतीला आणि नंतर ती पांडवांना सांगते. तिचा मतितार्थ हा की, तुम्हीदेखील निराश न होता आपल्यावरील अन्यायासाठी कायम ठाम निश्चयाने उभे रहा, व लढा. त्याचे ते स्फूर्तिदायक चित्र होते. प्रत्येकाने आपला जो धर्म आहे, म्हणजे आपल्या त्या त्या वेळेची जी जीवनाची इतिकर्तव्यता आहे, ती प्राधान्याने पूर्ण करावी, हा विचार मांडणारा लेख अथवा ती गोष्ट खरोखर प्रत्येकालाच मार्गदर्शक आहे. कसे जगावे, आपण जे हातात घेतो किंवा परिस्थितीवश आपल्यासमोरचे कर्तव्य पार पाडणे, ही आपली पहिली आणि एकमेव प्रायोरिटी असायला हवी. हा वेगळ्या प्रकारचा अनुभव त्या वाचनातून मिळाला.

एवढंच पुरे नाही, म्हणून मला माझ्या आजोळची, जे कोकणात आहे, त्या कोकणातील शांतूदादाची गोष्ट वाचायला मिळाली. त्यावेळच्या एकंदर परिस्थितीचे, माणसांच्या जीवनशैलीचे त्यांची गरिबी आणि एकंदर परिस्थितीला तोंड देऊन कुटुंबियांना आपल्या परीने योग्य तऱ्हेने न दुखावता आपली प्रगती करणारा, शांतुदादा अखेरीला गावी आपलं घर बांधायचं हे स्वप्न पार पाडायला जातो, तेव्हा ही प्रगतीची कमान कशी उतरत जाते याचं ते हृदयंगम चित्र होतं. माणसाचे जीवन किती अगम्य आणि अतर्क्य असंच असतं ! केव्हां कसे दिवस येतील काहीच सांगता येत नाही. माणूस कोणत्या वेळी कोणता निर्णय घेईल आणि त्यामुळे त्याचे काय काय बरे वाईट परिणाम होतील ते सांगणे, तर्कापलिकडचे असते.

सध्याच्या अस्वस्थ करणार्‍या अशा काळाची जी काही कहाणी आहे तीचे समर्पक विडंबनात्मक दृष्टीने मांडणारा, "दीड दमडी" हा लेख देखील मनाला एका वेगळ्याच जगात घेऊन गेला. आणि त्याच वेळेला एकीकडे अनिश्चित अस्वस्थतेचा माहोल आपल्या सभोवती घोंघावत असताना, शाळेतली एक कविता आठवली:

"सरिता करीते कां कधी खंत,
सरिता करीते कां कधी खंत !"

थोडक्यात सध्याच्या काळात "कुठल्याही तर्हेची खंत बाळगू नये" हाच तो त्या 'दीड दमडी' मधून मला लाभलेला मार्ग होता. अशा तऱ्हेने त्या दिवशीच्या वाचनांतून, अजून दोन-चार गोष्टी सांगता येतील. परंतु त्यांचा मतितार्थ एवढाच की,
"ज्याची चलती आहे, त्याच्या मागे लोक धावत जातात आणि जर तो मागे पडला तर त्याला कचर्यासारखा बाजूला फेकून देतात !"

असं करता करता, केव्हा दुपारचे चार किंवा पाच वाजले कळलच नाही. आणि आपोआपच मला जाछवले की खरंच आपला तो दिवस खरोखर "वाचला" असं मला वाटलं ! लगेच हात सवयीप्रमाणे मोबाईलकडे गेले आणि आमची गाडी मूळ पदावर आली !. पण त्यातून मला जे जे लाभलं ते ते मी तुमच्यापुढे इथे सारांशाने मांडलं.

असाच "वाचलेला" दिवस तुमच्याही जीवनात यावा असं मला वाटतं.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.

रसिक वाचकांसाठी,
अमूल्य संधी !:
💐💐💐💐💐💐💐💐💐
"सुधा"
"डिजिटल दिवाळी अंक-'२१":
"नवलोत्सव"
💐💐💐💐💐💐💐💐💐
शिवाय,
"जुने ते सोने" ही खास अर्थपूर्ण पुरवणी
वर्ष चौथे....

मानधन फक्त रू.१००/-.......
आँनलाईनने......

सर्वात महत्वाचे.......
खास दिवाळी भेट:
"Digital Management Musings"
किंवा डिजिटल "नियतीचा संकेत" ह्यातील तुमच्या पसंतीचा एक उपयुक्त लेखसंग्रह विनामूल्य.....

ताबडतोब......
प्रतिसादात अंकाची मागणी प्रतिसादात
तुमचा ईमेल आयडी
वा whatsapp no. देऊन नोंदवा....

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

"काळाचा महिमा !: "आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार !":

 "काळाचा महिमा !":

"आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार":

आपणच आपल्या करणीची फळे भोगत असतो. आपला र्हास किंवा आपला विकास, हा नेहमी आपण काय काय केले, समस्यांकडे कशा दृष्टीने बघितले आणि त्यांतून मार्ग कसा काढला, ह्यावर अवलंबून असतो. रडत राऊंवर कायमच तसे रहाण्याची वेळ येण्याचा धोका असतो.

संकटातून प्रतिकूल परिस्थितीतून देखील संधी शोधणारे, आपली प्रगती करून घेत असतात. त्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. पण ते न करता, आपण अपयशी ठरलो व मागे राहिलो, ह्याचेच केवळ दुःख बाळगत, त्याचे अवडंबर माजवत, अनुकंपा मिळवण्यासाठी झगडत रहाणे, शूरवीरांना शोभत नाही. आपली शक्ती, दयेची क्रुपेची पोटतिडकीने याचना करण्यात वाया घालवणे योग्य नव्हे. त्यापेक्षा आपण आपले प्रामाणिक, आत्मपरीक्षण करून, कुठे चुकले, काय चुकले अन् काय करायला हवे होते आणि आता काय पुढे केले पाहिजे याचा शोध घेणे आवश्यक आहे. नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की, समस्यांना विघ्ने आणि आपली सर्व शक्ती त्या समस्या दूर करण्यासाठी वापरणे जास्त श्रेयस्कर असते.

कोणे एके काळी वैभवात लोळणारे आणि समुदायाचे आपआपल्या गांवाचे नेतृत्व करणारे, केवळ त्यांच्या ऐतखाऊपणामुळे, निष्क्रियतेपायी अथवा आपल्या अहंकारापायी स्वतःचेच नुकसान करून घेणारे सापडतात. जिथे फुले वेचली, तिथे गोवऱ्या वेचायची वेळ कां व कधी आली, ह्याचे भान त्यांना राहत नाही.

केवळ आपल्याच श्रेष्ठत्वाच्या गुर्मीत मग्न राहून जर वेगाने बदलत्या परिस्थितीचा योग्य तो आढावा घेऊन, त्यातून मार्ग काढला नाही, तर आपली वेगाने पिछेहाट होणे अपरिहार्य असते. अनुकंपा मिळवण्यासाठी झगण्यापेक्षा, तशी वेळ आपल्यावर येणारच कशी नाही, ह्याचा सारासार विचार करून त्या मार्गाने जाण्यात, आपले तन मन धन वेचणे गरजेचे असते. ज्यांना असे शहाणपण सुचते, तेच योग्य तो मार्ग चोखाळून नेहमीच आघाडीवर राहतात, आपला विकास भरभराट करत राहतात. अशीही अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. तसे जे वागत नाहीत, त्यांच्यावर दुसऱ्यांच्या कृपेवर जगण्याची पाळी येणे अपरिहार्य असते.

काळाचा महिमा हा असाच असतो. असाच रहाणार.
-----------------------------
"सब कुछ, नया नया !"
नयी सोच, नयी खोज.
नयी रात, नयी बात.
नया रास्ता, नयी मस्ती.
नया वास्ता, नयी भूल.
नया सपना, नया छिपना.
नयी नोट, नयी लूट.
नयी कतार, नयी शिकार.
नया वादा, नया सौदा.
नयी अदा, नयी फिदा.
नया कानून, नयी सजा.
सब कुछ नया, नया,
आयी नयी,नयी दुनिया.
'सुदिना' २९/११/'१६

धन्यवाद
सुधाकर नातू

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

"हार जीतचा हा लपंडाव !":

 "हार जीतचा हा लपंडाव !":

क्रिकेट हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आणि अत्यंत आवडीचा विषय. गल्लीबोळात क्रिकेट खेळणे बालपणापासून जे सुरू होते ते अगदी प्रौढत्व येईपर्यंत. त्यातून आमच्या वेळी क्रिकेट मॅच बघायला न जाता प्रत्यक्ष मॅच बघायला मिळाल्याचा आनंद देणारा टीव्ही नव्हता. त्यामुळे रेडिओ वरच विजय मर्चंट डिकी रत्नगर आदींच्या कॉमेंट्रीज् ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो.

मी साधारण दहा वर्षाचा असतानाची आठवण अशी की, आमच्या पंचक्रोशीतील कुठल्याशा संमेलनात मी इंग्रजीमध्ये क्रिकेटची रनिंग कॉमेंट्री अगदी विजय मर्चंट यांच्या अविर्भावात सादर केली होती. इंग्रजी मुळाक्षरे नुकतीच गिरवायला लागलेल्या मला त्या प्रयत्नाबद्दल बक्षीस व कौतुक प्राप्त झाले होते. योगायोगाने नोकरीत असताना प्रत्यक्ष विजय मर्चंट यांच्याशीही पत्रव्यवहार आणि नंतर त्यांच्या मिलमधील आलिशान ऑफिसमध्ये प्रत्यक्ष भेट देखील होऊन गेल्याचे स्मरते. दुसरी आठवण: आमच्या स्नेहसंमेलनाचे वेळी क्रिकेट मॅचेस व्हायच्या आणि त्यामध्ये मला आठवते की, एका संमेलनात बक्षीस समारंभात तर, सर्वोत्कृष्ट बॉलर म्हणून मला चक्क प्रमुख पाहुणे असलेल्या रुबाबदार व देखण्या श्री फरुक इंजिनियर यांच्या हस्ते बक्षीसही मिळाले होते. तो फोटोही माझ्या संग्रही आहे. या अशा मधूर आठवणी संभाळत आम्ही लहानाचे मोठे कधी झालो ते कळलेच नाही.

पहाता पहाता कदाचित आता मी हा प्रवाहाविरुद्ध जाणारा बनलोही असेन आणि त्याचे कारणही तसेच आहे. क्रिकेटची एवढी क्रेझ आता माझ्यापुरती तरी उरली नाही हेच खरे. त्याला कारण एक म्हणजे आमच्या वेळेला फक्त पाच दिवसांची ब्रेबाँर्न स्टेडियमवरची क्रिकेट टेस्ट मॅच नाँर्थ स्टँडमधून बघणे वा इतर ठिकाणच्या कॉमेंट्रीज् ऐकणे एवढाच क्रिकेटचा बोलबाला होता.

पण आता काळ बदलला आणि क्रिकेटला बाजारू स्वरूप आले आहे वा जाणीवपूर्वक आणले गेले आहे. टी ट्वेंटी आयपीएल आयसीसी वर्ल्ड कप अशा अनंत प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊन, त्यांतून पैशांचा पाऊस पडण्या व्यतिरिक्त खरंच काय वेगळं साधलं गेलं कळतच नाही. म्हणूनच कदाचित आता माझी ही अशी क्रिकेटची आवड कमी झाली असेल.

त्यातून टीवीवर क्रिकेट मॅच बघणे हा प्रकार मला तितकासा आवडत नाही. त्या तुलनेत बॅडमिंटन किंवा टेनिस वा फुटबॉल यांच्या मॅचेस बघणे अधिक उत्कंठा पूर्ण असते. जवळजवळ प्रत्येक क्षणाला पारडे बदलत असते आणि ती जी काही गंमत असते ती अवर्णनीयच. लंडनच्या वास्तव्यात चक्क विम्बल्डन स्पर्धेचा खेळ मला टीव्हीवरून बघायला मिळाला होता व तोअनुभव न विसरण्या जोगा असाच होता. T20,ओडीआय आणि टेस्ट मॅच हे सर्व क्रिकेटचे प्रकार किती झालं तरी वेळ काळ काढू आणि थ्रील न निर्माण करणारेच. आणि क्रिकेट म्हटलं, तर मला फक्त भारताबरोबर कुठल्या देशाची मॅच असली, तरच बघाविशी वाटते. इतर देशांच्या मॅचेस कारण नसताना मी सहसा बघतच नाही.

अर्थात इतरांना आयपीएल t20 वर्ल्ड कप इ.इ. अशा स्पर्धात्मक मॅचेस बघायला खूप खूप आवडतात, आणि म्हणूनच मी म्हटलं मी प्रवाहाविरुद्ध जाणारा आहे हे कदाचित सांगत असेन. तरुण व मध्यमवर्गीयांचे सोडा, शाळकरी, नातवंडं शोभतील अशा मुलांना तर आजकाल प्रत्येक मॅच बघायला हवीहवीशी वाटते. गंमत अशी की, त्यांना बहुधा सर्व देशांच्या, सर्व खेळाडूंचा पूर्ण कारकीर्दीचा इतिहास माहीत असतो. आता या वयात आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना ते काही ध्यानात ठेवणे अशक्यच असते.

अजून एक मुद्दा प्रामाणिकपणे सांगायचा तर, भारताबरोबर जर इतरांची मँच चालू असेल, तर शक्यतोवर मला भारताची बॅटींग बघायला आवडते आणि प्रतिस्पर्धी संघाचे बॅटिंग जर जिंकण्याच्या दिशेने जात असेल, असा जर खेळ चालू असेल. तर मी ती बॅटिंग नंतर बघतच नाही. आज सारं हे आठवायला कारण म्हणजे कालची भारत पाकिस्तान मधील World cup मधील, टी-20 ची सलामीत, मी फक्त भारताची अडखळत ठेचकाळत जाणारी बँटिंग पाहिली आणि नंतर पाकिस्तानची पहिली जोडी जेव्हा 50 धावा झाल्या तरी आऊट झाली नाही, ते पाहून मी चक्क टीव्ही बंद करून झोपी गेलो.

माझा मागचा एक अनुभव बरोबर उलटा होता, तो आठवला. अशाच स्थितीत भारत असताना व आपल्या विजयाची शक्यता कमी आहे असे वाटून मी टीव्ही बंद केला होता. पण दुसऱ्या दिवशी खरोखरच चमत्कार घडला आणि अशक्य असा भारताचा विजय खेचून आणला गेला होता. तसेच काही तरी आता घडेल असे मनोरथ करीत, काल
मी झोपी गेलो.

आज सकाळी उठताना, तसाच काहीतरी चमत्कार घडेल असे वाटून, मनात धडधडत बातम्या बघायला गेलो खरा आणि आपला दारुण पराभव झाला, हे कटू सत्य उमजले व माझे मन निराश झाले. भूतकाळात न गुंतता, वर्तमानात घट्ट पाय रोवूनच उज्वल भविष्य घडविता येऊ शकते, ह्याची जाणीव झाली. हार जीत हा तर जीवनातील व खेळांतील लपंडाव तर असतो, हे देखील मनाला पटले. नेहमी आपलीच जीत होईल असे मांडे खाणे योग्य नव्हे हे पटून गेले.

एक मात्र खरे, आपण काल नंतर मॅच बघितली नाही हे बरे झाले असेच वाटून गेले.

सुधाकर नातू

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

वाचाल, तरच वाचाल !" आणि लिहाल, तर सावराल !":

 "वाचाल, तरच वाचाल !" आणि लिहाल, तर सावराल !":


वाचनासारखा दुसरा कुठला छंद नाही. वाचता वाचता आपणही स्वत:शी संवाद कळत, न कळत करत रहातो, आपलेही अनुभव पडताळून पहातो. नवीन माहिती वा ज्ञान तर मिळतेच, पण माणसांचे स्वभाव, भावभावना ह्यांचेही चित्र, विविध वाचनातून उभे रहाते.

पण आज संगणक, मोबाईल ह्यामुळे माहितीचा महासागर, बोटाच्या एका क्लिकवर मिळत असल्याने, हातात एखादे पुस्तक घेवून ते वाचायचे कुणी कष्ट घेत नाही. शिवाय जीवन अधिक धकाधकीचे, स्पर्धेचे झाले आहे. सहाजिकच सारे वेगाने, झटपट हवे असते आणि ते नवतंत्राच्याद्वारे मिळू शकते. वर्तमानपत्रे,पुस्तके, काय अडले, ते ते संगणक वा मोबाईलवर उपलब्ध असते. म्हणूनच आजकाल वाचनालयांचे सभासद प्रौढ माणसेच असलेली दिसतात. फेसबूक, वाँटस्अँप इ.इ... अशांसारख्या सोशलमिडीयांमुळे तर सर्वांना अक्षरश: वेड लावले आहे. सहाजिकच वाचनसंस्क्रुती हळू हळू कमी होत चालली आहे, हे चांगले नव्हे. माणसाला स्वतंत्रपणे विचार करायला लावणारी वाचनाची सवय इतिहासजमा होण्याचा धोका आहे.

"सिंहावलोकन":

गेल्यावर्षी मार्चनंतर कोरोना महामारी आल्यामुळे वाचनासारखा आपल्याला दुसरा कुठलाच विरंगुळा नव्हता. कर्मधर्मसंयोगाने दिवाळीनंतर व आसपासच्या काळात, माझ्याकडे दहा/बारा दिवाळी अंक तसेच बरीच पुस्तके माझ्या मुलाने मला उपलब्ध करून दिली होती. त्यांची मी नोंद घेतली होती. आज मागे वळून पाहताना काय वाचले आणि अजून काय वाचावयाचे राहिले, ते याप्रकारे आहे. खरंच वाचनाची मला जर आवड नसती, तर हा पावणेदोन वर्षांचा काळ कसा गेला असता, कुणास ठाऊक. म्हणून म्हणतो "वाचाल तरच वाचाल !":

माझी नोंद:
पुस्तके /दिवाळी अंक # - वाचलेले
पुस्तकाचं नांव:
# 1 आठवणींचे असेच असते # वाचले
लेखक संपादक अरुण शेवते
2 पुस्तकाचे नांव:आनंद पर्व
लेखक: गुरूमाऊली भागवत
# 3आपण यांना ओळखता # वाचले
बिपिनचंद्र ढापरे
# 4 इसापनीतील छान छान गोष्टी वाचले
बाबा भांड
5 आसपासच्या गोष्टी
भारती पांडे
# 6 इंडस्ट्री 4 नव्या युगाची ओळख # वाचले
डॉक्टर भूषण केळकर
7 गुरुचरित्र कथासार
जितेंद्रनाथ ठाकूर
# 8 किस्से शास्त्रज्ञांचे # वाचले
प्राध्यापक सुनील विभुते
# 9 एकशे एक प्रेरणादायी कथा
जी फ्रान्सिस झेवियर# वाचले # वाचले
# 10 कर्हेचे पाणी-खंड 7
मीना देशपांडे
# 11आनंद योगी पुल # वाचले
ना धो महानोर
# 12 युगंधर नेते यशवंतराव चव्हाण
संपादक वा ह कल्याणकर
13 बिल गेट्स
डॉक्टर अनंत लाभसेटवार
14 खरं सांगायचं तर, (स्मरण रंजन)
माधव खाडिलकर
# 15 शहाण्या माणसांची फॅक्टरी
डॉक्टर सलील कुलकर्णी
# 16 सुखाचा शोध # वाचले
वि स खांडेकर
# 17 कर्म सिद्धांत # वाचले
हिराभाई ठक्कर

# सर्वच वाचले "दिवाळी अंक-२०२०"
ऋतुरंग, पद्मगंधा, लोकमत उत्सव, महाराष्ट्र टाइम्स, मौज, दीपावली, मणी पुष्पक, अक्षर, कालनिर्णय,
अंतर्नाद, ग्रहांकित, जय जप तप.

--------------------------
हे सर्व वाचता वाचता दिवाळी अंक व पुस्तकांच्या बाबतीत हे जाणवले की पुस्तके वाचली की आपण घरातच न ठेवता इतरांना देत जावी. त्यामुळे
वाचनसंस्कृती वृद्धिंगत होऊ शकते. तेव्हापासून मी शक्य होईल तशी, पुस्तके अथवा दिवाळी अंक इतरांना वाचल्यावर देत आलो आहे. त्यातही मला आनंद व समाधान मिळवून गेले आहे......

"लिहाल तर सावराल !":
वाचण्याप्रमाणे मला घेण्याचाही चांगला धंदा आहे आणि आतापर्यंत माझे अनेक लेख विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत स्मार्टफोन मिळाल्यापासून मी उत्तरोत्तर प्रगती करत स्वतःचा ब्लॉग आणि व्हिडिओ चॅनेल, युट्युबवर, त्याचप्रमाणे ऑडिओ अर्थात ध्वनिफिती बनवणे यात देखील माझा उपलब्ध वेळ उपयोगात आणत गेलो. त्यामुळे ह्या कसोटी पहाणार्या काळात, कधीही निराशा तर आली नाहीच, परंतु नवनवीन कल्पना सुचत, उत्साह आणि आनंद व्रुद्धिंगत होत गेला.

लिहिण्यासारखा देखील उपयुक्त आणि अंतर्मुख होऊन, स्वतःची स्वतःला ओळख करून देणारा दुसरा कुठलाही छंद नाही. त्यामध्ये तुम्हाला तुमची निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती यांना चांगल्यापैकी उपयोगात आणून अनुभवसंपन्न, नवनिर्मिती करता येते आणि झालेली नवनिर्मिती, कविवर्य विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे, "घेता घेता, देणाऱ्याचे हात हजार घ्यावेत", तसेच आपण आपले हे विचारधन आणि अनुभवधन अनेकांना सोशल मीडियाच्या साहाय्याने देऊ शकतो आणि त्यांच्या भावभवतालाला अधिक समृद्ध करू शकतो.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....

खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......

ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......

आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....

धन्यवाद
सुधाकर नातू

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

"Noble Thoughts":

 °Noble Thoughts":


# "Unparallel Determination":

Stones, Mountains, buildings and all the non-living beings have size, shape and mass but they don’t have Life. What they have is unparallel determination to be stationary and remain where they are for ages. We must take that unparallel determination from them.

# "Be Firm to your Roots" :

The Trees have roots, enabling them to remain put, firmly and solidly there and then, come rain or storm, all their Lives. We, human beings should take a lesson from them and must remain firm to our roots-i.e. values and virtues. The World would be really, a heavenly place to live in and cherish.

# "Knowledge is Power":
In the modern World today, no one can afford to be illiterate and every one for his survival needs to know how to read, write and to comprehend. Further on, the computer literacy to be a MUST is now the need of the hour in 21st Century.

On similar lines, to understand the probable Road map of one’s own Life & to face the ever changing challenges appropriately, one must be literate with basic knowledge of Astrology. Such an unawareness would enable him to build up a responsive Mindset from Time to Time, to face the good or bad experiences as they come along.

Unfortunately, very few accept this reality & are prepared themselves, while all others walk Life blindly. In line with this ideology, as a hobby, I have been trying to understand Indian Astrology for the last few decades.
With Moral Power virtually being a thing of the Past, now unfortunately, only the Money Power & Muscle Power rule.

# With Moral Power virtually being a thing of the Past, now unfortunately, only the Money Power & Muscle Power rule.

# "Wonder of Self Motivation":

I was always wondering why an audio clip can't be uploaded on Face book page. Therefore I sought advice on whatsapp and I was guided by one of my friends to use Google drive to create a link of an audio clip.

I followed the steps in the advise given and to my surprise I was able to create the link for my one year old audio file. As a coincidence the clip happens to be on Self Motivation.

Moral of the story is 'After all, Inquisitiveness leads to an urge for self learning, which culminates into some Achievement & that further triggers of Self Motivation.'

# "Motivation &
Inspiration":

The meanings of the two words, Inspiration and Motivation appear to be look a like but they do have a difference. While Inspiration is a force that triggers creative ideas, the Motivation is an inner urge to take actions to convert those ideas, into reality. Thus the Concept herein is an outcome of Inspiration and apt explaination
Of it, is the child of the Motivation.

# It is high time now, that the Responsibility and Accountability get the Priority and Place, they deserve.

# "Unfulfilled ambitions haunt till the end & the person doesn't bother about adverse consequences of his actions."

# "Elections-Reforms !":
To get the correct picture of the opinion of the people in Elections, Voting must be made compulsory and one's Vote should have a value according to his age group.

If the life expectancy is assumed to be 70 years then value of Vote for age group-61 to 70 + onwards to be 1, for age group 51 to 60 it should be 1.1, for 41 to 50 it should be 1.2, for 31 to 40 it should be 1.3, finally for the youngest group upto 30 it should be 1.4;

This is because the future of younger group is more at stake than the older one.
Any takers/responses?.....

( 👍N.B. These have been few of my Select Postings on Social Media.👌)

Thank you
Sudhakar Natu

"अजून काय काय भयानक होणार, हा यक्षप्रश्न !":

 अजून काय काय भयानक होणार ? हा यक्षप्रश्न !"


"यक्षप्रश्न":
धकाधकीच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जीवनामध्ये, विरंगुळा म्हणून करमणुकीचे काही चार क्षण प्रत्येकालाच हवे असतात यात वाद नाही. सुखदुःखे नेहमीचे ताण-तणाव यापासून काही क्षण असे समाधानाचे मिळणे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असते. विविध माध्यमांतून आपल्या कलाविष्कारातून कलाकार आपआपल्या परीने दर्शकांचे समाधान करत असतात. त्यामुळे त्यांना कदाचित अवाजवी प्रसिद्धीही मिळते, तसेच त्यांचे एकंदर आर्थिक आर्थिक जीवनमानही पूर्वीपेक्षा, पुष्कळच चांगल्या दर्जाचे आहे. त्यामुळे सेलिब्रिटी म्हणून कलाकारांचे नांव नेहमीच अग्रणी असते.
पण कदाचित आज-काल अशा सेलिब्रिटींच्या मागे वेड्यासारखे धावणे आणि त्यांना माध्यमांनी ही अवास्तव असे महत्त्व व प्रसिद्धी देणे हे योग्य आहे कां, याचा सगळ्यांनीच विचार करायला हवा. निकोप समाजमनाचे हे निश्चितच लक्षण नव्हे.

खरं म्हणजे करमणूक हा फक्त जीवनाचा एक छोटासा भाग, त्यासाठी कलाकारांना इतके
डोक्यावर चढवणे, निश्चितच अनिष्ट व अप्रस्तुत म्हणायला हवे. दुर्दैवाने काळाचा महिमा असा की, कोणे एके काळी घरातून पळून गेलेली माणसे नाटक सिनेमातून कलाकार होत असत, परंतु त्यांना आजच्या कलाकारांएवढी प्रसिद्धी ,आमदनी आणि मानसन्मान खचितच मिळत होता. त्या तुलनेत आजकाल जे चालले आहे, त्याचा निश्चितच गांभीर्याने सगळ्यांनीच विचार करायला हवा आहे. शास्त्रज्ञ, प्राध्यापक, उद्योगपती असे इतर कितीतरी समाजातील घटक हे आपापल्या परीने समाजहितासाठी योगदान देत असतात. परंतु एकंदर
समाजमनाच्या महत्त्व, प्राधान्य देण्याच्या उतरंडीमध्ये, त्यांचे स्थान कलाकारांइतके तर नसतेच, नसते. उलट कलाकार हे अगदी वरच्या पायरीवर मांडलेले आपल्याला दिसतात. समाजाची एकंदर विचारसरणी व नीतीमत्ता यांच्यात नको असा हा आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसत आहे.

हे सारे आपल्याला कुठे नेऊन ठेवणार, याचा कोणी विचारच करत नाही. त्या जोडीला,नित्यनवीन घोटाळे, गुन्हेगारी वा अनाचार, भ्रष्टाचार आदी जे जे अयोग्य आणि अनिष्ट तेच सातत्याने घडत असते आणि दिवसेंदिवस "हे कलियुग आहे", असे सामान्यजनांनी म्हणत राहून येणारा दिवस पुढे ढकलावयाचा, हे वास्तव भयावह नव्हे कां?

उद्या काय आणि कसे होणार हा यक्षप्रश्नच आहे.

###################### ##

"प्रेक्षकांची ऐशी की तैशी !!":
मोठ्या सुनेला पुढे शिकू न देणारी जहांबाज हम करे सो कायदावाली, जीजीअक्कासारखी सासू आणि तिच्या समोर नेहमी नांगी टाकणारे सारे कुटुंबीय, नाना क्लुप्त्या वापरत, येनकेन प्रकारेण स्टार प्रवाह मालिकेतील "फुलांचा सुगंध" शाबूत ठेवण्याचा आतापर्यंत आटोकाट प्रयत्न करत होते खरे, पण आता अवतारी बाबा की बुवांचे आगंतूक पात्र आणून अंधश्रद्धेच्या पोरखेळांमुळे बहुधा त्याची माती करणार असे दिसते ! त्याचे दोन फायदे-एक तर मालिकेला वळण देत लांबवता येते आणि दुसरा कामाच्या शोधात असलेल्या बुजुर्ग कलाकारांचा मीटर बंद होत नाही, हे जरी खरे, तरी "प्रेक्षकांची ऐशी की तैशी" हेही तितकेच खरे !!

प्रसिद्धी माध्यमांनी देखील अशा आगांतुक बुवाबाजी पात्रांना अवास्तव महत्व न देता उल्लेखाने त्यांना टाळणे इष्ट नव्हे का मालिकांमध्ये उगाचच पाणी घालून त्या लांब होणार्‍या अशा पद्धतीला त्यामुळे प्रोत्साहन दिले जाते.
###################### ##

फेसबुकवरील....
मेघना वैद्य ह्यांचा हा संदेश:

"कलाकारांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याबद्दल गंभीरतेने विविध पातळीवर विचार करण्याची वेळ आली आहे असं वाटतं. Rather it's high time. काम आणि पैसे मिळण्याबाबतची असुरक्षितता हे सगळं स्वीकारूनच तुम्ही या व्यवसायात येता ना? हा प्रश्न कलाकारांच्या तोंडावर फेकणं सोप्पं आहे. पण तरीही Reality shows / Serial shootings चे
1)hazardous working hours (14 to 16 hrs per day 😦)
2) त्यातून कमी विश्रांती मिळाली तरी चेहरा नीट फ्रेश दिसला पाहिजे याचा येणारा ताण.
3) हे करत असताना पैसे वेळेवर मिळेपर्यंत वाटणारी anxiety

यामुळे त्या कलाकाराची आणि पर्यायाने त्याच्या कुटुंबाची न भरून येणारी हानी होत असते म्हणून हा प्रश्न ऐरणीवर येणं गरजेचं आहे.
काय वाटतं तुम्हाला?

ह्यावर माझा प्रतिसाद:
"कलाकारांच्या कामकाजाविषयी येणाऱ्या अडचणींची ही बाजू जरी विचारात घेण्याजोगी असली तरी, त्यांना अनाहुतपणे मिळणाऱ्या फायद्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सर्वसाधारणपणे कोणत्याही नोकरी-व्यवसायात वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी अथवा आव्हाने असणे हे स्वाभाविक असते. परंतु कलाकारांना त्यांच्या कामगिरीमधून जी विशेष प्रसिद्धी आणि आत्मसन्मान मिळतो, तसेच कलाविष्काराला दाद मिळाल्याने आत्मसमाधान मिळते, त्या प्रकारचा अनुभव इतर नोकरदार व व्यावसायिकांना येतोच असे नाही..

सहाजिकच देणाऱ्या या अधिकच्या फायद्यांकडे कलाकारांना दुर्लक्ष करता येणार नाही. आपण व्यक्त केलेल्या व्यथेची दुसरी बाजू म्हणून हे म्हणणे मी मांडले. चुकभूल द्यावी घ्यावी घ्यावी."

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच इतरही अनेक उत्तमोत्तम लेख......
वाचण्यासाठी........
ही लिंक उघडा...........

https://moonsungrandson.blogspot.com

लेख आवडले तर.......
लिंक शेअरही करा..........

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

"मुक्तसंवाद-जन्मगांठी, कडू गोड, बर्या वाईट की, गुळपीठ?":

 "मुक्तसंवाद-'जन्मगांठी, कडू गोड, बर्या वाईट की, गुळपीठ?":

मागच्या मुक्तसंवादात "टेलीरंजन" मधून जन्मगांठ म्हणजे एकमेकांच्या फसवणुकीचा लपंडाव कसा असते ते मराठी मालिकांचे उदाहरण घेऊन दाखवले होते. आता या व्हिडिओमध्ये जन्मगांठी काही कडू काही बऱ्या वाईट किंवा विचित्र वा गुळपीठासारख्या असू शकतात, ते मराठी मालिकेमधील जोडप्यांच्या उदाहरणावरून उलगडणार आहे.

प्रथम आपल्याला सध्या गाजत असलेल्या "आई कुठे काय करते" मध्ये आढळलेली जोडपी पाहू या. पहिलं आम्हाला जोडपं नजरेसमोर येतं ते म्हणजे शेखर आणि संजनाचं. ती एक सुशिक्षित, सुस्वरूप व महत्वाकांक्षी आधुनिक स्त्री आहे. ती कदाचित अयोग्य माणसाच्या प्रेमात पडते आणि शेखरसारखा काहीसा कमी शिकलेला, चांगले कामधाम नसलेला व रावडी असलेला असा जोडीदार प्रेमात आंधळे होऊन तिने केला आहे. दुसरं उदाहरण आपल्याला अनिरुद्ध व अरुंधतीचे दिसते. अनिरुद्ध संजनाच्या सौंदर्याला भाळून तिच्याशी बारा वर्ष गुपचूप संबंध ठेवतो. संजनाचे व आपल्या नवऱ्याचे अनैतिक संबंध आहेत हे अरुंधतीच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी तिच्या लक्षात येते व तिचा भ्रमनिरास होतो, ती अक्षरशः उन्मळून जाते. साधी भोळी अरुंधती, ग्रहक्रुत्यदक्ष आणि सुस्वभावी स्त्री त्याउलट अनिरुद्ध बुद्धिमान पण बेरकी लंपट स्वतःचा सार्थ बघणारा पुरुष अशीही विचित्र जोडी.

अनिरुद्धचा धाकटा भाऊ अविनाश आणि नीलिमा यांचा संसार तर असाच धेडगुजरी किंवा तितकासा सुसंवाद जोडीदारांमध्ये नसलेला असा. कारण अविनाश तसा साधा सरळ मार्गी, मेहनती आईवडिलांची गरज जाणणारा, स्वाभिमानी तर बायको निलीमा आळशी, पक्की स्वार्थी उधळी परिस्थितीची जबाबदारीची जाणीव नसणारी आपमतलबी स्त्री. ही अशी विजोड जोडी म्हणजे मारून मुटकून संसार करणारी जोडी.

याउलट एकमेकांशी समजून-उमजून संसार करणारं जोडपं म्हणजे अर्थात अप्पा माणिक कांचंनच. त्यांनी आपला पन्नास वर्षांचा संसार गोडीगुलाबीने व खेळीमेळीच्या वातावरणात केला आहे आणि तो एक खरोखर आदर्श असाच म्हणून समजला जावा. कदाचित जी माणसं सरळ मार्गी असतात त्यांच्या बाबतीत हे असे समजूतीने व शहाणपणाने केलेले संसार असू शकतात. नशिबाने आई-वडिलांचं अनुकरण करणारी त्यांची मुलगी आणि त्यांचा समंजस जावई यांचं जोडपे तसंच अनुरूप आणि
मध्ये कारण नसताना संसारात संशयाचे वादळ येऊनही एकमेकांना सांभाळून घेणारं.

एकाच मालिकेत दिसणारी ही आगळीवेगळी जोडप्यांची उदाहरण बघून तुम्हाला पटलं असेल की दोन माणसं का एकत्र येतात कुणास ठाऊक ! ती एकमेकांशी जुळवून घेतात की नाही हेही कोणी आधी सांगू शकत नाही. साग्रसंगीत कांदे पोहे प्रोग्रॅम करून म्हणा किंवा प्रेमात पडून म्हणा विवाह केला तरी जोडीदारांना एकमेकांच्या सार्‍या व्यक्तिमत्वाची ओळख होतेच असं नाही. त्याबद्दलचं एक छान उदाहरण एका नाटकामधून आता नजरेस आणतो. ते म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानामुळे एकमेकांच्या प्रेमात पडलेले "व्हाईट लिली आणि नाइट रायडर" या नाटकातील जोडपे. माहितीच्या मायाजालात गुरफटून ओळखी होऊन परस्पर एकमेकांच्या प्रेमात ही जोडी पडते खरी,पण विवाह करण्यापूर्वी लिव्ह-इन-रिलेशनशिप सारखं आयुष्य जगायचं असं जेव्हा ती ठरवतात, तेव्हा कुठे त्यांना एकमेकांची व्यक्तिमत्वे किती विभिन्न आहेत आणि एकत्र संसार करणे किती कठीण आहे हे त्यांना ध्यानात येते. अर्थातच नंतर त्यांचा संसार सुरू होण्यापूर्वीच मोडतो हे उघडच !

विवाहाच्या वेळेला तरूण तरुणी आंधळी कां होतात याला उत्तर नाही. कदाचित वास्तव अशा जीवनात नाटकांमधून म्हणा मालिकांमधून म्हणा आपल्याला असेच अनुभव येतात. याउलट सर्वांना आदर्श ठरावे असे दोन जोडप्यांचे मी अनुभव आता सांगतो. एक जोडपं ज्यांचा प्रेमविवाह झालेला, त्यातील तरुणाशी मी जेव्हा ह्यासंबंधी संवाद साधला तेव्हा तो म्हणाला "मी प्रेमात पडलो खरा, परंतु अशाच एका तरुणीच्या जी मला सर्वस्वी अनुरूप अशीच असेल आणि मी अशी निवड केली मी आहे की माझे आई वडील झालं तर मी नकार देऊ शकणार नाहीत ! त्याचे बोलणे अगदी खरे होते दोघेही एकाच व्यवसायातील हुशार बुद्धिमान आणि एकमेकांना दिसण्यात, आवडीनिवडी देखील समान अशी अनुरूप. त्याचप्रमाणे जातीचाही प्रश्न येणार नाही अशी. शिवाय पत्रिकाही जुळतात अशी. दुसराही प्रेमविवाह आणि ही जोडीही अगदी अशीच एकमेकांना सर्वस्वी अनुरूप अशीच !

अर्थात अशी उदाहरणे अपवादानेच आढळतात. इतर वेळेला मात्र अगदी विरुद्ध असे चित्र दिसत असते. एकमेकांना पाहून केलेला विवाह असो व प्रेमविवाह तो यशस्वी होईलच याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. कारण कदाचित जन्मगांठ हा जणू काहीही न समजणारा असा जुगारच जणु असावा. एकमेकांना समजून उमजून, गुणदोष स्वीकारून समंजस व शहाणपणाने संसार करणारी जोडपी विरळाच असतात. कारण अशा तर्‍हेचे ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण दिले जात नाही. प्रत्येकाने आपापल्या स्वभावाप्रमाणे संसाराचा हा सारीपाठ खेळायचा असतो वा उधळायचा असतो. "जन्मगांठी, कडू गोड, बर्या वाईट की, गुळपीठ?": साराच अगम्य असा हा नियतीचा खेळ दुसरं काय म्हणायचं ?

धन्यवाद
सुधाकर नातू

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

👍"Think, not to Sink !":👌

👍"Think, not to Sink !":👌


# "Perception is the Key":
Most of the observations one makes, are based on the perception of the situation at a given point in time. Human perceptions are amalgam of information available from media and other sources, beliefs, experience of self, others and so on....

Ultimately in a political game of Power, such public perceptions only decide the outcome. Rationality at least in Indian Politics unfortunately, gets a back seat, compared to emotionality, though prudence demands otherwise. In such a case, the outcomes and hence possibly, progress and development possibly could have been much better.

In any case, it's wise that one should therefore, refrain himself from participating in social media, in this complex area of politics.

# "Destiny":
# It’s said that you are the Driver
of your Destiny; but in reality,
you find Destiny drives you.

# "Ultimate Mukti' !":
Alzimer disease is on one side the 'Ultimate Mukti', and on the other it's the Worst punishment, one tends to get. Forgetting who u r, is virtually denying your very existance and that too, by your self.

# "The Real Truth":
The 'Real' conceptual Truth is hidden very deep and is the 'Gloden' or now 'Platinum' Treasure of a Human thought. V need to analyse, probe, think and dissect to get to its 'Route'. Surely, this is very interesting, well-Worth exercise, one can do from time to time. Even though, the Time, endlessly unfolds itself into unknown Future, if you get to the Route and Truth, it wld last for ever and ever.

# "Continuous Learning":
Being curious, and inquisitive is what for all living beings are born. The difference between them, and human beings is the better intellegence, application skills and above all, immence memory. Honestly, from my own experience, to be a student through-out out your life, is an unique self satisfying experience.

# "Creative Thoughts":
Meaningful & creative thinking emerges not only from a sensitive soul but from proper time and an inspiring place. Do you agree? For me, the time is very early morning and place appears to be London. What about you?

# "An art of adjustment":
In life, what one needs is to be always comfortable & be contented in any situation that one comes across; it’s a very difficult task and all one needs is an art of adjustment.

"Look Within":
Spend at least some time every day in thinking within;
it's an excellent exercise for your mind & intelligence.

# "Quiriosity and Inquisitivenss":
The journey of Human race from it's Primitive to Modern age, can be summed up in these mile stones: "Quiriosity and inquisitivenss, The path of search, Gathering and understanding the Mother Nature and surroundings, Exploring and experimenting, The learnt lessons, Innovating and adopting and so on.

As one looks back, he is bound to be astonished to note, where we were and where we all, are now. The inside out, almost total knowledge of the Human body and it's complex functions, has been accomplished and the search goes on and on....

Behind this gigantic voyage, at it's Nucleus is the Human Brain, a super, duper computer with feelings as well. It is high time that instead of fighting amongst ourselves, we ought to remember all those, who must have done value additions from time to time, and hence salute to them with Great Respect and Gratitude.

# "Think not to Sink !":
Decision needs to be taken only after reviewing all angles; many times, we tend to ignore one little point, because for no reason, it just goes out of our mind. The adverse effects of it, result only after action/s are taken based on the decision so made.

Thank you
Sudhakar Natu

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

"टेलिरंजन-एक लेखाजोखा !":

 "टेलिरंजन-एक लेखाजोखा !":


छोट्या पडद्यावर सर्वसामान्य आणि सर्वमान्य अशा काही बाबी किंवा गोष्टी आढळतात त्या प्रथम सांगतो.

एकच कल्पना अनेकांना एकाच वेळी सुचू शकते किंवा कदाचित कोणीतरी दुसर्याची कॉपी करतो, असंच काही मालिकांमध्ये अधून-मधून आढळून येतं. झी वाहिनीवरील "मन उडू उडू झालं" मधील दीपू आणि सोनी वाहिनीवरील "वैदेही" या दोन्ही मुली सारख्याच प्रसंगांना सामोर्या जाताना दिसतात. मध्यमवर्गीय कुटुंबातील या दोघी कर्तबगार आणि आपल्या कुटुंबाचे नेहमी हित साधावे म्हणून कष्ट आणि त्याग करणाऱ्या आहेत. मोठ्या बहिणीचे लग्न नीट पार पडावे म्हणून त्या आर्थिक जबाबदारीही घेतात.

दोन्हीकडेही मध्यमवर्गीय वडील आणि त्यांना तीन मुली, फरक इतकाच की, "वैदेही" मालिकूत एक भाऊ जो फुकट गेलेला आहे आणि त्याच्या चोरीमुळे घरात वादळ व संकट निर्माण होते. तर "उडू उडू" मध्ये मास्तर असलेले वडील, त्यांच्या फसवणुकीने दागिने चोराने चोरले जातात इतकेच. पण संकट व वरपक्षाकडील नको इतकी चालबाज मंडळी तशीच दोन्ही मालिकांमध्ये ! अशा कितीतरी साम्य स्थळांनी ह्या दोन्ही मालिका भरलेल्या आहेत. सारखीच दिसणारी एका व्यक्ती सारखी दिसणारी, पाच सहा माणसे जगात असतात असं म्हणतात किंवा "कल्पना एक आविष्कार अनेक", त्याचीच प्रचिती 'उडू उडू' आणि 'वैदेही' मालिकांमधून येते. प्रेक्षकांना उल्लू बनवण्याचा हा प्रकार नव्हे कां?

सोयीप्रमाणे केव्हाही, कोणत्याही पात्राची भूमिका करणारा कलाकार अचानक मालिकांमधून बदलला जातो. पूर्वी निदान आधी पूर्व कल्पना देत असत किंवा नव्या कलाकाराच्या प्रवेशा आधी, तशी कल्पना देत असत. आता तसं राहिलं नाही. अचानक कोणीतरी दुसरा कलाकार भूमिकेमध्ये आपल्याला दिसतो. "स्वाभिमान" मधली मोठी आई अशीच अचानक बदलली गेली आणि दुसरी अभिनेत्री तिथे आपल्याला दिसली. तर "जीव माझा रंगला" या मालिकेमध्ये मोठी बहीण श्वेता अशीच अचानक बदलली गेली आणि जवळजवळ तिच्यासारखी दिसणारी अभिनेत्री श्वेता म्हणून पुढे आली.

"यह हमे मंजूर नही !":
मालिकांमध्ये कधी कधी आपल्याला न पटणाऱ्या अशा गोष्टी दाखवल्या जातात. सर्वसामान्यपणे व्यावहारिक जीवनामध्ये कोणीही व्यक्ती, कशी वागेल याचे काही निकष असतात. त्या निकषांना तडा देईल, अशा तऱ्हेचे काही पात्र वागतात आणि ते आपल्याला पटत नाही. झी वरील "माझी-तुझी रेशीमगाठ" या मालिकेमध्ये उद्योगपतीचा नातू असलेला यश, रस्त्यावरील सिग्नलमुळे गाडी थांबली असताना बाजूच्या स्कूटर वरील मुलीला, केवळ ओझरते बघून तिच्या अखेर प्रेमात काय पडतो आणि तिच्यासाठी वाट्टेल ते करायची त्याची तयारी कशी होत जाते, ते काही केल्या पटत नाही.
तीच गोष्ट, स्टार प्रवाहवरील "आई कुठे काय करते" मध्ये संजनासारखी जणू सवत असलेली स्त्रीने आपल्या नवऱ्याशी विवाह केल्यानंतर, अरुंधती तिच्याबद्दल नको इतकी सहानुभूती कां दाखवते, तिच्या संकटात कां स्वतःहून पुढाकार घेते, वेळोवेळी मदत करण्यासाठी कां झटत असते, तो काही कळत नाही. हा म्हणजे चांगुलपणाचा, आदर्शवादाचा अक्षरशः अतिरेक झाला. केवळ आईच्या भूमिकेतील नायिका, ही नैतिकदृष्ट्या अत्युच्च दाखवण्यासाठी, हा अट्टाहास मनाला काहीही पटत नाही. ही केवळ वानगीदाखल दोन उदाहरणे. अशाच तर्‍हेचे अनेक घटना, पात्रे व प्रसंग मालिकांमधून दाखवले जातात आणि प्रेक्षकांना गृहित धरले जाते.

सोनी वाहिनीवरील, मनू आणि मल्हारच्या अवखळ प्रेमाच्या गोष्टीत त्यांचे पुढे काय होणार, ही उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, मीरा व आदिराजच्या शिळ्या प्रेमाच्या कढीची उगाचच मध्ये लुडबुड नकोशी आणि अनाकलनीय, अविश्वसनीय वाटते. "आता बरसात नाही रे !

तसेच
"विनोदाची ऐसी तैसी":
😢😢 सोनी हास्यजत्रेचा अक्षरशः सततचा उबग आणणारा हास्यास्पद आविष्कार "अती तेथे माती" असाच आहे. 😢😢 "अति तेथे माती" वरून मला माझा एक जुना अनुभव आठवला. पुष्कळ वेळेला आपल्याला एखादे पदार्थ खायला खूप आवडतात, म्हणून ते नको इतके खाल्ले जातात आणि त्यामुळे पोट बिघडून चार-पाच दिवस बिछान्यावर पडायची वेळ येते. माझ्या बाबतीत हे असे अनेक वेळा झाले आहे. कारण नसताना जास्त खाऊन पोटावर ताण दिल्याने, ही वेळ आली. तीच गोष्ट 'हास्यजत्रे'च्या बाबतीत ठरते. करमणूक करणार्या मालिका अधून मधून दाखवायच्या ऐवजी हा जो बाष्कळ हास्याचा मारा, त्याच त्याच कलाकारांच्या आविष्कारातून दाखवण्याचा अट्टहास केला जातो, तो कां ते खरंच कळत नाही. प्रोग्रॅमिंग करणारे जे कोणी असतील ते याचा विचार करतील, तर चांगलं. कदाचित त्यांच्याकडे मालिकांचा तुटवडा असू शकतो.

झी वरील "चला हवा येऊ द्या" च्या बाबतीतसुद्धा अगदी हेच असेच चालू आहे. विनोदाचा अतिरेक किती करायचा, कां आणि कसा करायचा, याचे तारतम्य सुटले ही पूर्वी लोकप्रिय असलेला हा कार्यक्रम सहाजिकच, आता बहुसंख्य प्रेक्षकांच्या मनातून उतरत चालला असेल.

सरते शेवटी....

"जुने ते सोने, हेच खरे !":
दर रविवारी नेहमीप्रमाणे कार्यक्रम, छोट्या पडद्यावर नसतात, हे लक्षात न आल्यामुळे वेगवेगळ्या कमर्शिअल वाहिन्यांवर सर्फिंग करून झाले. तिथे आठवड्याच्या मालिकांचा रतीब मनपसंत नसल्यामुळे, सहज चुकून सह्याद्री वाहिनीवर रिमोट नेला गेला आणि अवचित आश्चर्यकारक नवल घडले ! तिथे माननीय विद्याधर गोखले आणि भालचंद्र पेंढारकर या मराठी संगीत रंगभूमीला पुनरूज्जीवन देणाऱ्या असामान्य जोडीच्या योगदानाचा, परिचय करून देणारा "एकमेवाद्वितीयौ" हा अप्रतिम कार्यक्रम पहायला मिळाला. जुन्या काळात आणि संगीतमय वातावरणात घेऊन जाणारा तो मंगलमय कार्यक्रम, ज्ञानेश पेंढारकर आणि शुभदा दादरकर यांनी समर्थपणे सादर केला होता. शिवाय त्याबरोबर नवीन तरुण गायक गायकांनी संगीत नाटकांमधील मधुर नाट्यसंगीते गाऊन, श्रोत्यांचे कान त्रुप्त केले. खूप दिवसांनी एक आनंदमयी संगीत कार्यक्रम पाहायला मिळाला हे आमचे भाग्य. दूधात साखर अशी की, त्यापाठोपाठ "मैत्र हे शब्दसुरांचे" हा कार्यक्रम देखील असाच नाट्यसंगीतावर बेतलेला होता.

शेवटी "जुने ते सोने" हेच लक्षात येते आणि कमर्शियल वाहिन्यांपेक्षा, मुंबई दूरदर्शन अर्थात सह्याद्री वरील कार्यक्रम बहुशः कां दुर्लक्षिले जातात हे कळत नाही.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच वाचनीय लेख वाचण्यासाठी........
ही लिंक उघडा...........

https://moonsungrandson.blogspot.com

लेख आवडला.......
तर लिंक शेअरही करा.......

शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

"सोशल मिडीयावरील शब्दकोडे !":

 "शब्द कोडे":

काही शब्द आपण बरेचदा  जोडीने वापरतो. खाली काही अशा शब्दांचं पहिलं आणि शेवटचं अक्षर दिलं आहे. मधल्या जागा. *-*   ने दर्शवल्या आहेत. ते शब्द ओळखून  लिहा. 

उदाहरणार्थ : न - - ले . नदीनाले. 

१. मा - - - ती 

२. चि - - री 

३. द - - - का 

४. चि - - -  टी 

५. मा - - ड 

६. झा - - - पे 

७. भा - - - री

८. प - - - - - के

९. वि - - डी

१०. सु - - रा 

११. ख - - - ळ. 

१२. हा - - रे 

१३. त - - - ग्गा

१४. मा - - क 

१५. बा - - - ली 

१६. च - - - टी 

१७. छि - - - डा 

१८. कु - - - ल्ली 

१९. प - - - - त्री 

२०. का - - - ळी 

२१. पी - - णी 

२२. सा - - ळी 

२३. वे - - णी 

२४. इ - - डा 

२५. खी - - री

--------------------------------------------------------

👍उत्तर हे आहे:


सोशल मिडीयावरील शब्दकोड्याचे उत्तर:

1 माणिक मोती

2 चिरी मिरी

3  दगा फटका

4 चिठी चपाटी

5 मारझोड 

6 झाडेझुडपे

7 भाजी भाकरी

8 परकर पोलके

9 विडि काडी 

10 सुई दोरा

11 खण नारळ

12 हात वारे ,हारतुरे 

13  तबला डग्गा

14  मार झोड

15 बाळबाटली

16 चमचा वाटी 

17 ??

18 कुलूप किल्ली

19 पळीपंचपात्री

20 काळी सावळी

21 पिकपाणी

22  साडी चोळी

23 वेणी फणी 

24 इडापिडा 

25 खिरपुरी

------------------------------------------

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

"सोशल मिडीयावरील माझी मुशाफिरी-२ !":

 "सोशल मिडीयावरील माझी मुशाफिरी-२ !":


सोशल मिडीयावर मी नेहमी स्वनिर्मित संदेश पोस्ट करतो. आज त्यासंबंधीच्या जुन्या आठवणी पहात असताना, मला विशेष नोंद घ्यावेत, असे माझे निवडक संदेश ह्याही लेखात उलगडत आहे. आठवणींची ही साठवण वाचकांना आवडेल, अशी मला आशा आहे.......

# "कोड़े: कधीही न सुटणारे !":
-----------------------
माणूस मरतो, तेव्हाच कां मरतो? कुणी जन्मत:च, तर कुणी बालपणी वा कुणी एेन तारूण्यांत, तर काही प्रौढपणी, तर काही वृद्धापकाळी हे जग सोडून जातात. प्रत्येकाचे मरतेवेळी वय भिन्न असते, असे कां?

आगगाडीतील प्रवास करताना जसा जो तो आपले स्थानक आले की उतरून जातो, तसाच हा सारा प्रकार असतो ! पण आपले 'तिकीट कुठपर्यंतचे आहे ते कुणालाच माहीत नसते. आयुष्य हे क्षणभंगूर आहे ह्याची जाणीव, कुणी मरण पावल्याची बातमी कानी येते, तेंव्हाच होते.

ह्या जगांत प्रत्येकाचे काही विशिष्ट प्रयोजन असावे, तेव्हढे झाले की त्याला 'राम' म्हणावा लागतों ! पुष्कळ वेळी सारी कामे वा आकांक्षा पूर्ण न करता, माणसाला येथून निरोप घ्यावा लागतो. थोडक्यात, जीवन आणि मरण हे कधीही न सुटणारे कोडे आहे !
--------------------------

# 'जादू?:
नुकताच एक संदेश येथे वाचायला मिळाला, हा माणूस लिहीतो: 'मी कधीही छोट्या पडद्यावरच्या मालिकाच बघत नाही, परवा,थोड्या वेळासाठी केवळ अर्धा एपिसोड कसाबसा पाहिला आणि टीवी बंद केला' हे वाचून मी मात्र, अक्षरश:
आश्चर्यचकीत झालो, कारण ह्या मालिकाच, माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाचा दररोजचा अत्यावश्यक असा खुराक आहेत. सायंकाली ७ ते १० जणु रात्रपाळी असल्यासारखा मी टीवी समोर मालिकाच पहा़त असतो. मालिकांचा आणि माझा संबंध 'तुंझे माझे जमेना आंणि तुझ्यावाचून करमेना' असा आहे !

व्यसनी माणसाला उमजत असते की आपण जे करतो, ते योग्य नाही, हानिकारक आहे, पण तो जसा तरीही व्यसन काही केल्या सोडू शकत नाही, तसेच माझे मालिका पहाण्याच हे वेड मला सोडता येत नाही !

' कॅथार्सिस' मध्ये जसा वेदनेतून आनंद मिळतो, तसाच काही तरी अनुभव मला मालिका पहाताना होतो. मालिका उगाचच लांबलचक केल्या जातात, त्यात 'पाणी' घातले जाते, त्यातील पुष्कळ गोष्टी निरर्थक असतात::::वगैरे वगैरे दुषणे लावत, लावत न चुकता परत मी मालिका पहातच रहातो. कुठे तो मालिकाच न बघणारा किंवा घरी बिलकुल टीवीच न घेणारा आमचा एक दोस्त आणि कुठे रोज़ रोज़ रतीब घातल्यासारखा मालिका पहाणारा मी ! असा वेळ वाया घालवण्यापेक्षा तोच वेळ, दुसर्या एखाद्या विधायक कामात घालवावा, हे पटूनही, काही केल्या वळत नाही, ही माझी खंत आहे ! कोणी सागेल कां ह्या ईडीयट बाॅक्समधे अशी कोणती जादू आहे?
-----------------------------
# "एक सच्चा रयतसेवक ! ":
'अंतर्नाद'आॅगस्ट'१६ मधील 'एक सच्चा रयतसेवक' हा कै. कर्मवीर भाऊराव पाटील हयांच्यावरील हृदयस्पर्शी लेख वाचून मन भरून आले. त्यातील भाऊरावांनी घेतलेल्या दोन शपथांची आठवण, ह्या पहाडाएवढ़या अद्भुत माणसाचे थोरपण दाखवून गेली.

पहिली शपथ, महात्मा गांधीजींपासून प्रेरणा घेऊन जीवनभर, ऊंची कपडयांचा त्याग व अनवाणी चालण्याची शपथ आणि दुसरी, एका ग़रीब, अगतिक महिलेच्या तळतळाटामुळे, जीवनभर बाहेर कधीही दूध न मागण्याची शपथ ! संपूर्ण हयातभर, हया महान कर्मवीराने शिक्षणाची गंगा तळागाळापयँत पोहोचावी, हया हेतूने रयत शिक्षण संस्थेचा सर्वदूरवरचा पसारा ज़िद्दीने उभा केला.
कुठे त्या वेळचे समर्पित भावनेने शिकविणारे शिक्षक व साधे सरलमार्गी विद्यार्थी आणि कुठे आताचा शिक्षणसम्राटांचा विद्यादानाचा बाजार !

जाता जाता, मला अचानक आठवले-ह्याच सच्च्या रयतसेवका़च्या नांवे दिला जाणारा शैक्षणिक विभागांतील सर्वोत्तम पुस्तकाचा माझ्या एकमेव पुस्तकाला-'प्रगतिची क्षितीजे'ला मिलाळेला, काही वर्षांपूवीॅचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार !
हया लेखामुळे माझेही काही ऋणानुबंध, वंदनीय कर्मवीरांशी जोडले गेल्याचे समाधान मला मिलाले.
----------------------------

# "वाचा आणि विचार करा":
"जन्मगांठ?: "नव्हे फसवाफसवीचा लपंडाव?":
मनाविरुद्ध सहजीवनाचे नाटक आणि त्यामधील ताणतणाव सहन करत, किती जोडपी जीवन कंठत असतात, कोण जाणे ! एकाचा स्वार्थ, हा दुसऱ्याच्या दुःखाला कारणीभूत होतो, हे कोणी मुळी लक्षातच घेत नाही आणि फसवणूकीची ही वाटचाल अनेकानेक जन्मगांठीमधून कायम चालू रहाते............
हे निकोप समाजाचे लक्षण निश्चितच नव्हे..........
----------------------------
# " चिंताजनक सद्दस्थिती":

एकीकडे नित्य वाढत्या अपेक्षा, दुसरीकडे संधींचा दुष्काळ आणि त्यांत भर म्हणून मतलबी स्वार्थी राजकारण, हेही पुरेसे नाही म्हणून की काय, अनियंत्रित नोकरशाही, ढासळती प्रशासकीय गुणवत्ता अशा चक्रव्यूहात शास्वत विकास पुरता अडकला आहे. जो पर्यंत सर्वच क्षेत्रात, समस्त स्थरांवर विहीत कर्तव्ये आणि त्यासाठीचे प्रत्येकाचे उत्तरदायित्व समाधानकारकरित्या पूर्ण करण्याची ईर्षा निर्माण होत नाही, तोपर्यंत उत्तरोत्तर भवितव्य अंध:कारमय होणार हे निश्चित.
---------------- ------------
# "मनाचे कोडे":

आपले मन खरोखर कुठे असते, कसे असते, दिसते, माहीत नाही. पण मनांत काय असते, ते मात्र फक्त आपल्यालाच उमजत रहाते. X-ray, MRI CT scan वा सोनोग्राफी मुळे आपल्या शरीरात काय काय घडामोडी चालू आहेत ते दिसते, आपल्याला व इतरांनाही.
पण मनांतले असे इतरांना समजू, उमजू देणारे यंत्र निदान आजपर्यंत तरी अस्तित्वात नाही. ही जगातील, सर्वात महान क्रुपाच आहे. असे अद्भुतरम्य यंत्र जेव्हा केव्हा निघेल, तेव्हा काय हलकल्लोळ होईल, त्याची कल्पनाच करवत नाही.

शेवटी मन हे कोडे आहे आणि ते तसेच, कोडेच राहू दे!
-----------------------------
# "पैसा, ही पैसा !":
लक्ष्मी चंचल असते,तिची देवाण घेवाण सतत चालू असते. हे चक्र न थांबणारे असते. लक्ष्मी नेहमी स्वकष्टांतून,प्रामाणिक मार्गाने यावी. ग़ैर मार्गाने कष्टांशिवाय आलेली लक्ष्मी कधीही चांगली नाही;अशी लक्ष्मी सुख शांती देत नाही. हाच निसगॅ नियम आहे,जो Newton चा पहिलया नियमानुसार आहे. संध्याची अशांतता, ताणतणाव, हिंसा विध्वंसक वातावरण हा भ्रष्टाचाराने बरबटलेलया मार्गांनी येत असलेलया लक्ष्मीचा परिणाम आहे. कारण अशा व्यवहारांत एका बाजूला कर्तव्याचा विसर, फ़क़त हाव असते, तर दुसरया बाजूला अगतिकता असते. कोण, कसा केवहा थांबवणार भ्रष्टाचाराचा हा विदारक भस्मासूर?
----------------------------
# "शाश्वत तत्व":

"स्वार्थ सोडून, निस्वार्थ बुद्धिने चरितार्थ करायचे ठरवले,
तरच जीवनांत खराखुरा चिरस्थायी अर्थ निर्माण होऊ शकतो."

"जगाला फसवले तरी, कुणी
कधीही 
आपल्या मनाला फसवू शकत नाही. देहबोली मनातल्या भावभावना प्रकट करतच असते.

-----------------------------
# "फिरूनी नवीन जन्मेन मी-अर्थात् कर्म सिद्धांत !":
आपल्यामुळे दुसर्‍याचे नुकसान कधी होऊ नये, एवढे जरी व्रत, तुम्ही निष्ठेने जीवनामध्ये पाळले तर तुमच्याकडून अनिष्ट अशी कार्ये होणार नाहीत. त्याउलट शक्यतोवर आपल्यामुळे इतरांना काहीतरी हितकारक असे लाभ होऊ शकतील, अशा तऱ्हेचे जर तुम्ही प्रयत्न केलेत, तर तुमच्या पदरी चांगली कर्मे केल्याचे फळ मिळू शकते.

विज्ञानाचा विचार केला तर न्यूटनचा जो पहिला नियम आहे "अँक्शन इज इक्वल टू रिअँक्शन" तो म्हणजे आपला कर्म सिद्धांत असे थोडक्यात म्हणायला काय हरकत आहे?....
---------------------------

धन्यवाद
सुधाकर नातू

"सोशल मिडीयावरील माझी मुशाफिरी-१ !":

 "सोशल मिडीयावरील माझी मुशाफिरी-१ !":


सोशल मिडीयावर मी नेहमी स्वनिर्मित संदेश पोस्ट करतो. आज त्यासंबंधीच्या जुन्या आठवणी पहात असताना, मला विशेष नोंद घ्यावेत, असे माझे निवडक संदेश ह्या लेखात उलगडत आहे. आठवणींची ही साठवण वाचकांना आवडेल, अशी मला आशा आहे.......

# "आजचा विचार:
माणसाचा स्वभाव अनाकलनीय असतो. व्यक्ती तशा प्रकृती किंवा स्वभाव ! संसारात दोन वेगळ्या स्वभावाची माणसे जोडीने रहाताना मतभेद किंवा वाद होणे सहाजिकच असते. दुसरा असेच का वागतो, ह्याचा विचार त्याच्या दृष्टिकोनांतून समजून घेवून मगच आपण वागले, तर संसारात गोडी येते. आपला संसार सुखाचा करणे, हे अखेर आपल्याच हातात असते. हा सारीपाट खेळणे मोठेच आह्वान असते. तडजोड, समंजसपणा आणि त्याग हया तीन बाजू प्रत्येकाने संभाळल्या तर हा खेळ मनाजोगती फळे देतो.
----------------------------
# "एक उनाड, उजाड दिवस":
एखादा दिवस असा येतो की एका पाठोपाड गोष्टी बिघडू लागतात. सकाळी पाहुणे गावी जाणार तर धो धो पाऊस सरू झाला. वहान मिळणे कठीण झाले. घरी गँस सिलीडर रिकामा झाला व नवीन लावला तर त्याचा गँस लिक होत होता. मेकँनिक आला व वाँल्व्ह लिक होत आहे, हा सिलीडर वापरु नका असे सागून गेला. डिलरला फोन करुन करुन थकलो, तेव्हा कुठे नवीन सिलीडर घेवून माणूस आला. हे सारे ठीक होईतो कपडे धुण्याचे मशिन बिघडले, त्याचा मेकँनिक येतो कधी ती वाट पहावी लागली. विसावा म्हणून चहा गरम करायला घेतला, तर ओव्हनचा नन्ना. काही कामाचे कागद छापायला गेलो तर कार्ट्रीजची शाई सपलेली. अखेर कुणाला तरी फोन करावा तर फोनची बँटरी आऊट व चार्ज करताना फोन गरम.....

संकटे एकटी येत नाहीत, हा विचित्र अनुभव त्या उनाड दिवशी मला आला.
-----------------------------

# "संसाराचा सारीपाट !":
माणसाचा स्वभाव अनाकलनीय असतो. व्यक्ती तशा प्रकृती किंवा स्वभाव ! संसारात दोन वेगळ्या स्वभावाची माणसे जोडीने रहाताना मतभेद किंवा वाद होणे सहाजिकच असते. दुसरा असेच का वागतो, ह्याचा विचार त्याच्या दृष्टिकोनांतून समजून घेवून मगच आपण वागले, तर संसारात गोडी येते. आपला संसार सुखाचा करणे, हे अखेर आपल्याच हातात असते. हा सारीपाट खेळणे मोठेच आह्वान असते. तडजोड, समंजसपणा आणि त्याग हया तीन बाजू प्रत्येकाने संभाळल्या तर हा खेळ मनाजोगती फळे देतो.
----------------------------

# "अती तेथे माती":
मालिकेकडे नुसती करमणूक म्हणून पहाणे असा काही प्रकार नसतो. कारण मालिकेत एक जीवंत वास्तवाचे चित्र उभे होत असते. सहाजिकच तर्काला मान्य न होणारे, असंभाव्य अतिशयोक्त असेल तर त्यावर टीका करण्यात काय चूक? हल्ली बहुतेक मालिका काही काळानंतर लांबविण्याच्या अट्टाहासापायी भरकटत जातात. त्या तुलनेत पूर्वी, मर्यादित भागांच्या मालिकांमध्ये मनाला वास्तवतेचे पटेल असे बरेच काही असावयाचे. त्यामुळे त्यातील बर्याच विश्वासार्ह व स्म्रुतीत रहावयाच्या. टी२० स्पर्धांप्रमाणे आता लौकरात लौकर तशा आटोपशीर मालिकाच येणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर प्रेक्षक मालिकाच पहाणे सोडून देतील.
----------------------------

👍👍"दाद व दादागिरी !":
दाद देण्यासाठी जशी नीरक्षीर विवेकबुद्धी गरजेची तसाच दिलदारपणाही हवाच हवा. त्यातून योग्य त्या व्यक्तीला अनुरुप योगदानासाठी दाद देण्यासाठी सूक्ष्म काकद्रुष्टीही आवश्यक.

सध्याच्या मनस्वी, वेगवान स्पर्धेच्या माहोलांत अहम् भावाला कमालीचे प्राधान्य असताना अशी अचूक "दाद(दा)गिरी जवळजवळ दुर्मिळच!
----------------------------

👌👌"माझे अध्यात्म":
# वाचन हा श्वास,
# लेखन हा निश्वास,
# मालिका पहाणे हा ध्यास.
# घडामोडींचा विचार हा अभ्यास,
#सोशल मिडिया वापरणे हा विकास?
# प्रवास करणे हा त्रास, आणि
# आरोग्य राखणे हा प्रयास
----------------------------

"जुळवू, जोड्या मालिकांच्या":
१.
तुझ्यांत जीव रंगला,
जीव झाला, वेडा पिसा!
२.
अग्ग बाई सासुबाई,
अस्सं सासर सुरेख बाई!
३.
स्वामीनी,
दामिनी!
४.
या गोजिरवाण्या घरात,
काय पाहिलेस तु माझ्यात!
५.
गुंतता, हृदय हे,
जावई विकत घेणे आहे!
६.
आई, कुठे काय करते,
कळत, नकळत!
७.
रंग, माझा वेगळा,
पसंत, आहे मुलगी!
८.
अवघाची संसार,
वादळवाट!
९.
अनामिका,
श्वेतांबरा!
१०.
समांतर,
दिल, दोस्ती दुनियादारी!
आणि,
११.
आभाळमाया,
????

----------------------------

"टेलिरंजन?":
मनू आणि मल्हारच्या अवखळ प्रेमाच्या गोष्टीत त्यांचे पुढे काय होणार, ही उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, मीरा व आदिराजच्या शिळ्या प्रेमाच्या कढीची उगाचच मध्ये लुडबुड नकोशी आणि अनाकलनीय, अविश्वसनीय वाटते. सोनी मराठी वाहिनीवर "आता बरसात नाही रे !
----------------------------

#"संशयकल्लोळ !":
संशयातीत वर्तन ज्यांच्याकडून कायम अपेक्षित आहे, त्यांच्याबद्दल जेव्हा कुणी संशय निर्माण करतात,
तेव्हां दोघांची मोठी कसोटी असते.

आणि....
शेवटी....

"# "श्रेय घ्यायला नेहमी, पुढे येणार्यांनी,
वेळीच
आपली जबाबदारी मान्य करुन,
झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत असे वर्तन ठेवावे."
----------------------------

धन्यवाद
सुधाकर नातू

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

"वेचक आणि वेधक !":

 ।।श्री गणपती बाप्पा मोरया।।

"वेचक आणि वेधक !":

श्री गणेश ही विद्येची, ज्ञान-विज्ञानाची देवता. श्री गणरायाच्या कृपेने, हे काही वेचक-वेधक:

# कुठलाही अतिरेक नको. कारण 'अति तेथे माती' ! कुठे थांबायचे, केव्हा, कां आणि कसे थांबायचे, त्याचे नीट ज्ञान हवे. मध्यम मार्ग हा समतोल साधणारा मार्ग असतो.

# काळ नित्य बदलतो आहे, बदलणे हाच काळाचानैसर्गिक स्वभावधर्म आहे. बदलत्या काळाबरोबर जो स्वतःला जुळवून घेतो, तोच पुढे टिकतो, हे शाश्वत सत्य आहे.

# 'जिथली गोष्ट जिथल्या तिथे, जेव्हाचे, तेव्हा आणि ज्याचे त्याला' हा मंत्र जपला, तर कधीही गोंधळ होणार नाही आणि आणि सुलभतेने कामे होतील .

# जे जे चांगले व उपयुक्त, ते ते आपण कायम वेचित जावे, नेहमी नवे नवे ज्ञान मिळवत जावे आणि जे जे मिळवले, त्यातील योग्य ते इतरांना देत राहावे, हा चांगला मार्ग आहे.

# कोणत्याही प्रसंगाकडे, घटनेकडे अथवा संकटाकडे संयमीत, समंजस आणि डोळस दृष्टीने बघायला शिकणे, जरी कठीण असले, तरी ते आत्मसात करणे आजच्या काळात अत्यावश्यक आहे.

# जे आपल्याला मनापासून आवडते, जे आपण उत्तम तऱ्हेने करू शकतो आणि हे ज्यांना नेहमी करायला मिळू शकते, ते खरोखर भाग्यवान. कारण त्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाने जगायचा वस्तुपाठ निर्माण होतो.

# बुद्धीला चालना देणारे आणि उत्साह निर्माण करणारे असे काही ना काही आपण जर करत गेलो, तर ताण-तणावापासून आपली मुक्ती होऊ शकते.

# जे आपण बदलू  नाही, जे आपल्या बदलण्याच्या शक्ती बाहेर आहे, त्याचा कधीही विचार करू नये. मात्र जी गोष्ट आपण बदलू शकतो, याची आपल्याला खात्री आहे, ती बदलण्याचा अहर्निश प्रयत्न करत राहावा. अर्थात शहाणपणा तोच आहे हे की, या दोन्हीमधला फरक जाण्याचा ! आपण काय बदलू शकतो आणि काय बदलू शकत नाही, हे जाणण्याचा !

धन्यवाद

सुधाकर नातू

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

"कर्तबगारीची अविस्मरणीय 'लकाकी' !":

 " कर्तबगारीची अविस्मरणीय 'लकाकी' !":

"काळा पुढची पावले" हे कै. शंतनुराव किर्लोस्कर ह्यांचे चरित्र वाचले. त्यांच्या पिताश्रींनी 'लकाकीं' नी आपल्या उद्योगसमूहाचीसुरुवात कशी केली आणि अनंत अडचणी व संघर्षाला तोंड देऊन पुढील शंभर वर्षांत त्या बिजाचा वटवृक्ष कसा झाला, त्याचे उगवते चित्र ह्या पुस्तकातून नजरेसमोर उभे राहिले. एखादा माणूस पहाडाएवढा कसा मोठा होतो व आपल्या उण्यापुऱ्या साठ-सत्तर वर्षांच्या व्यावसायिक जीवनात हजारोंचा पोशिंदा कसा होतो, हे खरोखरच आश्चर्यजनकच ! शंतनूरावांचे हे असामान्य कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व जसे लोभस, तसेच आयुष्याच्या अखेरपर्यंत अनेक आघात सोसून ते ताजेतवाने कसे राहिले, हेही खरोखर एकमेवाद्वितीयच.

माणूस मोठा होण्यासाठी व ते मोठेपण टिकवण्यासाठी, तसेच जीवन समृद्धपणे जगावे कसे, हे उमजून घेण्यासाठी, हे खरोखर चरित्र निश्चितच प्रेरणादायी व उद्बोधक ठरावे. जे गुणविशेष या पिता-पुत्रांच्या बाबतीत, त्या दृष्टीने मला आढळले ते असे: 'स्वतःला झोकून द्यावे असे ध्येय, त्या ध्येयपूर्तीसाठी अहर्निश कष्ट, विरोध पत्करायची व संघर्ष करावयाची तयारी, जे काम करावयचे, त्यावर निष्ठा, ते उत्तम व्हावे अशी स्वतःची ईर्षा व सर्वात महत्त्वाचे, ते काम मनापासून स्वतःला आनंद देणारे मानण्याची वृत्ती, तसेच माणसे जोडण्याची, लोकांमधील गुण ओळखण्याची गुणग्राहकता, पारदर्शक व्यक्तिमत्व व स्पष्टवक्तेपणा, घेतलेला निर्णय व कृतीमधून निर्माण होणाऱ्या परिणामांची संपूर्ण तयारी'... इत्यादी इत्यादी'.....

हे पुस्तक वाचून संपल्यावर जाणवले ते म्हणजे, हे असे व कौटुंबिक 'उद्योगवृक्ष' पुढील काही दशकांनंतर कां उतरणीला लागतात/ पुढच्या पिढ्यांमध्ये भाऊबंदकी वा विभिन्न विचारांच्या, जीवनशैलीच्या समस्येमुळे? कां इतर काही कारणामुळे? मूळ पुरुषाने उभारलेले जे स्वप्न असते, ते विरत कां बरं जाते, असं कां होतं? जास्तीत जास्त दोन किंवा तीन पिढ्यांनंतर, हा असा अनुभव, अशा पुष्कळशा कौटुंबिक उद्योगव्यवसायात आढळतो. एखादा शतकानुशतके चालू असलेला उद्योग समूह पहायला मिळणे विरळच.

दुसरे असे प्रकर्षाने जाणवले की, जीवनात नांव कमावणारी मंडळी अगोदर किती विविध समस्यांना कष्टदायक प्रसंगांना तोंड देत पुढे जात असतात असे प्रेरणादायी चित्र आपल्याला अनेक मंडळी मध्ये आढळते

अशा काही निवडक मंडळींची ही मांदियाळी पहा: डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पंडित जसराज, निळू फुले, 'चिपको' आंदोलन फेम सुंदरलाल बहुगुणा, अण्णा हजारे, धीरूभाई अंबानी मुकेश अंबानी, एन आर नारायण मूर्ती इ.इ....

ह्या सारख्या दिग्गज व्यक्तिंचे जीवनपट आपण अभ्यासपूर्ण रीतीने तपासले, तर त्यामागे एक तत्व आढळू शकते ते असे:

"आपण जेव्हा परिवर्तनासाठी काम करतो, तेव्हा आपल्या अपेक्षांमध्ये अशा एका शक्यतेसाठी ही जागा ठेवली पाहिजे की, कदाचित आपल्याला हवे असे, काही अपेक्षित बदल होणारही नाहीत, मात्र तरीही आपल्याला निष्ठा ठेवून आपल्या ध्येयाप्रमाणे काम करायचे आहे आणि ते आपण तनमन लावून करायचेच !"

हा जीवन मंत्र जो आहे तो ज्यांनी-ज्यांनी पाळला ते ते थोर तर झालेच, परंतु त्यांचे योगदान समाजासाठीही विलक्षण हितकारक, मार्गदर्शक आणि अर्थातच प्रगतीपर ठरले यात वाद नाही.

धन्यवाद
सुधाकर नातू

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

"पिंपळपान !":

 "पिंपळपान !":

पिंपळपान, आठवणीत जपून ठेवावे ते पिंपळपान ! जाळी असणारं, हृदयाच्या आकारासारखं, म्हणूनच बहुदा भावबंधांतील आठवणी या पिंपळपानासारख्या वाटतात, भासतात, पुन्हा पुन्हा पाहाव्या, आठवाव्या वाटतात.

माणसाचा डोळा हा जगातला सर्वोत्तम कॅमेरा असावा. कारण समोरची प्रतिमा, एवढंच काय, तर मनातील आठवणीतली कुठलीही प्रतिमा, तो हुबेहूब मनःपटलावर, अंतकरणावर क्षणार्धात उमटवू शकतो. पण जे डोळ्यांना जमतं, ते हाताना जमेलच असं नाही. नव्हे, बहुतेकांना ते जमतच नाही. केवळ काही हातांनाच आठवणी, प्रतिमा, दृश्ये हुबेहूब जशीच्या तशी कागदावर उमटवता येऊ शकतात. म्हणूनच चित्रकार हा एक श्रेष्ठ कलावंत, निसर्गाची तादात्म्य पाहणारा हा कलावंत, खरा भाग्यवंत !

जी गोष्ट प्रतिमा आणि चित्र यांची, तीच गोष्ट आवाजाच्या दुनियेतील वाणीची. ती आपल्याला मिळालेली एक श्रेष्ठ देणगी आहे आणि तिचा उपयोग, आवाज योग्य प्रकारे, शब्दांच्या रुपात काढून आपण आपल्या मनातील विचार व्यक्त करत असतो. तर त्या आवाजाला अधिक कसरतीने योग्य ते स्वरूप देऊन स्वर, सूर, ताल आणि लय यांच्या जोडीने मधूर श्रवणीय गायनाची कला काही मूठभर कलावंतांनाच अवगत असते. त्यांचे स्वर कानांना संतोष देणारे असतात, तसे इतर सर्वसामान्यांचे असत नाहीत, ते बेसूर वाटतात. म्हणजे इथे कान आणि रसना अर्थात वाणी यांचा जो अतूट संबंध आहे तो आपल्याला प्रकर्षाने दिसतो, जाणवतो. चित्रकला हातात असणाऱ्यांच्या नजरेत म्हणजे डोळ्यांमध्ये आणि हातांमध्ये, मेंदूच्या बुद्धीच्या साह्याने समन्वय साधला जातो, तो आणि तसाच !

निसर्गाने मानवाला ज्ञानेंद्रिये दिली आहेत, ती ही अशी अद्वितीय कामगिरी करू शकतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. याच दिशेने जर विचार करत गेलो, तर बुद्धी, मेंदू आणि प्रेरणा या जोडीने हात आणि पाय ह्यांचा जर अचूक लयबद्ध समन्वय साधला गेला, तर त्यातून उत्तमोत्तम क्रीडापटू व कसरतपटू होऊ शकतात, हे आपल्या ध्यानात येईल.

आता शेवटी राहता राहिली ती म्हणजे आंतरिक प्रतिभाशक्ती नवनिर्मिती करु शकणारी अशी सरस्वती देवीची देणगी म्हणजे विचार करणे योग्य त्या दिशेने सर्वांगीण विचार करण्याची समतोल बुद्धिमत्ता असणे आणि प्रतिभेच्या आंतरिक स्फुरण तिच्या जोरावर विविध प्रकारचे साहित्य मौलिक वेळ विचार यामुळे मानव जातीचे कल्याण होऊ शकेल किंवा इतरांना नवी दिशा, नवा मार्ग देता येऊ शकेल. प्रतिभावंत वक्ते, श्रेष्ठ गुरु वा संत, लेखक आणि कवी ही जी मांदियाळी आहे, ती अशा प्रकारची आंतरिक अद्भुत प्रतिभाशक्ती असणारी माणसं !

म्हणजे अनेक प्रकारचे गुण हे आपल्याच जवळ असतात फक्त त्याची जाणीव ज्याची त्याची, त्याला व्हायला हवी आणि आपण आपल्याला निसर्गाने एकूण सर्व सजीवांमध्ये सर्वश्रेष्ठ, एकमेवाद्वितीय असा जो मानव देह दिला आहे, त्यामधून आपल्याला काय काय साध्य करता येऊ शकतं, याचा लेखाजोखा जाणून घेऊन, आपल्यातील
शक्तीस्थळांचा विकास करणं, त्यांना जोपासणे हे गरजेचं आहे.

बघा कुठे होतं पिंपळपान आणि तिथून जी सुरुवात केली, तिला आपण कुठे आणून ठेवले !
पण त्यामधून एकंदर कला, गुणवत्ताविश्वाचं विश्वरूप दर्शन, जणु आपल्या समोर उभं आहे, असं म्हणता येईल.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.

"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....
खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......
ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......

आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....

धन्यवाद
सुधाकर नातू


रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

"पुढचं पाऊल": "संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य: '१ नोव्हे'२१ ते ३१ डिसेंबर'२२':

 'नियतीचा संकेत':  

"पुढचे पाऊल"
अर्थात संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य":
१नोव्हें’21 ते ३१ डिसें''22

प्रास्ताविक:

भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य
 ज्योतिष रविला. त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र 
ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली 
जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही 
राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना, जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते. 

आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणि प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार निर्णय व क्रुतीवर प्रभाव पाडत असते, हे ओघाने आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.

अनुकूल गुण पद्धती:

कालचक्र अव्याहत फिरत असते, माणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतात. हा क्रम प्रत्येकाला अनुभवाला येतो. उद्याचा दिवस, आजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या आशेवर माणूस जगत असतो. उद्याचे पुढचे पाऊल कसे असेल, येणारा काळ कसा असेल, अनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो दर वर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात असतो.

माणूस उंच वा बुटका आहे, जाडा किंवा बारिक आहे, तो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशी काही कल्पना येत नाही. ती येण्यासाठी कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यक असते. जसे उंची 
सेंटी मीटर, वजनासाठी किलोग्राम, आर्थिक 
स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने 
दाखवता येते. ह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस कोणाला कसे जातील, हे भविष्याच्या ज्ञानाच्या 
आधारे सांगण्याची पद्धत म्हणजे राशीभविष्य होय. 

नशिबाच्या परिक्षा: 

पहिल्या स्तंभात प्रत्येक राशीच्या खाली डाव्या बाजूला त्या राशीचा नशिबाचा ह्या वर्षीचा तर उजव्या बाजूस मागील वर्षीचा अनुक्रम दाखवला आहे.  

३१ दिवसांचा महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे जास्तीत जास्त गुण १८६, तर 30 दिवसांच्या महिन्यांचे जास्तीत जास्त गुण १८० आणि फेब्रुवारी २०22चे जास्तीत जास्त अनुकूल गुण १६८. याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ग्रह किती शुभ दिवस आहेत ते अनुकूल गुण दाखवले आहेत. त्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल राखत समाधान मिळवण्याची युक्ती तुम्हाला मिळू शकेल अशी अनुकूल गुणांची कल्पना आहे. 

अनुकूल गुणांच्या पद्धती: नियम
आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत. प्रत्येक राशीला सहा प्रमुख ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण 
देतो. ते नियम असे आहेत:

रवि: ३,६, १० व ११ वा शुभ
मंगळ: ३,६, व ११ वा शुभ
बुध: २,४,६,८,१० व ११ वा शुभ
गुरू: २,५,७,९, व ११ वा शुभ
शुक्र: १,२,३,४,५,८,९,११ व१२ वा शुभ
शनी: ३,६, व ११ वा शुभ

"नशिबाची गटवारी":

आगामी १४ महिन्यांच्या कालखंडात वरील महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ आहेत, ते आजमावून माहवार शुभदिवस अर्थात अनुकूल गुण देऊन, त्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे
१.उत्तम पहिला गट: व्रुश्चिक, सिंह, कुंभ व मीन राशी.
२.उजवा दुसरा गट: कन्या, धनु राशी. 
३.मध्यम तिसरा गट: मेष, व्रुषभ, कर्क राशी. 
 राशी.
४.डावा चौथा गट: तुला, मिथून व मकर राशी.
५.त्रासदायक पाचवा गट: कुणीही नाही.

शनीची साडेसाती:

साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हां 
तुमच्या चंद्रराशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा  
साडेसाती सुरू होते व  तुमच्या राशीच्या पुढील 
राशीनंतर येणार्या राशींत जातो, तोपर्यंत साडेसाती 
असते.
उदा: सध्या मकर राशींत शनी आहे, म्हणून आता 
धनु, मकर  कुंभ राशींना साडेसाती आहे. शनी कुंभेत 
जेव्हा प्रवेश करेल, तेव्हा धनु राशीची साडेसाती 
संपेल.
✴९. धनु▪ २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु झालेली असुन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.​
✴१०. मकर▪२६ जानेवारी २०१७ रोजी  सुरु 
झालेली असुन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.​
११. कुंभ:
शनीची साडेसाती २४ जानेवारी'२०२० पासून सुरु झाली, ती २३ फेब्रुवारी'२०२८ पर्यंत असेल.

"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":
सोबत राशीने हाय या संपूर्ण कालखंडातील माहवार अनुकूल गुणांचे कोष्टक दिले आहे प्रत्येक महिन्यामध्ये राशीचा नशीबाचा क्रमांक ही खाली दिलेला आहे वर्ष कालखंडाच्या अखेरीस मागच्या वर्षीच्या तुलनेत अनुकूल गुण तसेच क्रमांक नशिबाच्या बाबतीत कुठला ते देखील दिले आहे त्यावरून तुमचे तुम्हालाच समजू शकेल की आपले नशीब इतरांच्या तुलनेत कसे आहे. या पद्धतीमुळे आपण आपल्या अपेक्षा आणि प्रयत्न यांची सांगड घालून योग्य ते कृती करून आपल्या समाधानाचा मार्ग शोधू शकता तुमचे नशीब तुमच्या हातात असाच जणू काही हा एकंदर मार्ग.

मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल:

१मेष रास: ५ व्या क्र. वरून ७ व्या क्रमांकावर घसरलेली आहे.

२.व्रुषभ रास: तुमची देखील ६ व्या क्रमांकावरून आता ८ व्या पायरीवर नशीबाच्या परिक्षेत घसरण झाली आहे.

३.मिथून राशीच्या नशिबी मागील ८ व्या स्थानावरून आता ११ व्या स्थानी जाण्याची वेळ आली आहे.

४. कर्क राशीचे नशीब ११ क्र.वरुन आता थोडे सुधारुन ९ व्या स्थानी असेल. 

५ सिंह मंडळी नशीबवान असून तिसर्या स्थानावरून पुढे सरकत सर्व बारा राशींमध्ये दुसर्या क्रमांकावर दिसतील.

६ कन्या रास पाचव्या समतोल साधणार्या जागी, मागील कालखंडातील  कटकटी वाढवणार्या ९ व्या क्रमांकावरुन उडी घेतील.

७ तुळा राशीला ह्या वर्षीही दहाव्याच स्थानी कष्टकारक अनुभव पचवावे लागतील.

८ व्रुश्चिक रास सर्वात भाग्यवान ह्याही कालखंडात, कारण आता सुद्धा प्रथम क्रमांक मिळाला आहे, तुम्हाला नशिबाच्या परिक्षेत !

९ धनु राशीच्या गुणांमध्ये खूप घसरण झाल्यामुळे तुम्हाला तळागाळातील शेवटचा बारावा क्रमांक मागच्या कालखंडात स्विकारावा लागला होता. परंतु आता उत्साहवर्धक सुधारणा होऊन समतोल साधणार्या ६ स्थानी तुम्ही असाल.

१० मकर राशीचे नशीब गुणांमध्ये खूप घसरण झाल्यामुळे यंदा सातव्या क्रमांकावरून शेवटच्या बाराव्या स्थानी ढकललेले गेले आहे.

११ कुंभ राशीच्या गुणांमध्ये चांगली सुधारणा आहे, सहाजिकच मागील ४थ्या स्थानावरून तिसर्या क्रमांकावर तुम्ही रहाल.

१२  मीन रास सुखावह दुसर्या स्थानावरुन थोडे खाली सरकून चौथ्या स्थानी असेल.

वयोमानानुसार आता मी वैयक्तिक ज्योतिष सल्ला देणे बंद केले आहे, ह्याची क्रुपया नोंद घ्यावी.

सर्व वाचकांना आगामी कालखंड सुख शांती व समाधानाचा जावो ही मनःपूर्वक शुभेच्छा.

धन्यवाद
सुधाकर नातू

।। शुभम् भवतु ।।

ता.क.

"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....
खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......
ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......

आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....

धन्यवाद
सुधाकर नातू




माझे गॅलेक्‍सी मधून पाठविले