"सोशल मिडीयावरील माझी मुशाफिरी-१ !":
सोशल मिडीयावर मी नेहमी स्वनिर्मित संदेश पोस्ट करतो. आज त्यासंबंधीच्या जुन्या आठवणी पहात असताना, मला विशेष नोंद घ्यावेत, असे माझे निवडक संदेश ह्या लेखात उलगडत आहे. आठवणींची ही साठवण वाचकांना आवडेल, अशी मला आशा आहे.......
# "आजचा विचार:
माणसाचा स्वभाव अनाकलनीय असतो. व्यक्ती तशा प्रकृती किंवा स्वभाव ! संसारात दोन वेगळ्या स्वभावाची माणसे जोडीने रहाताना मतभेद किंवा वाद होणे सहाजिकच असते. दुसरा असेच का वागतो, ह्याचा विचार त्याच्या दृष्टिकोनांतून समजून घेवून मगच आपण वागले, तर संसारात गोडी येते. आपला संसार सुखाचा करणे, हे अखेर आपल्याच हातात असते. हा सारीपाट खेळणे मोठेच आह्वान असते. तडजोड, समंजसपणा आणि त्याग हया तीन बाजू प्रत्येकाने संभाळल्या तर हा खेळ मनाजोगती फळे देतो.
----------------------------
# "एक उनाड, उजाड दिवस":
एखादा दिवस असा येतो की एका पाठोपाड गोष्टी बिघडू लागतात. सकाळी पाहुणे गावी जाणार तर धो धो पाऊस सरू झाला. वहान मिळणे कठीण झाले. घरी गँस सिलीडर रिकामा झाला व नवीन लावला तर त्याचा गँस लिक होत होता. मेकँनिक आला व वाँल्व्ह लिक होत आहे, हा सिलीडर वापरु नका असे सागून गेला. डिलरला फोन करुन करुन थकलो, तेव्हा कुठे नवीन सिलीडर घेवून माणूस आला. हे सारे ठीक होईतो कपडे धुण्याचे मशिन बिघडले, त्याचा मेकँनिक येतो कधी ती वाट पहावी लागली. विसावा म्हणून चहा गरम करायला घेतला, तर ओव्हनचा नन्ना. काही कामाचे कागद छापायला गेलो तर कार्ट्रीजची शाई सपलेली. अखेर कुणाला तरी फोन करावा तर फोनची बँटरी आऊट व चार्ज करताना फोन गरम.....
संकटे एकटी येत नाहीत, हा विचित्र अनुभव त्या उनाड दिवशी मला आला.
-----------------------------
# "संसाराचा सारीपाट !":
माणसाचा स्वभाव अनाकलनीय असतो. व्यक्ती तशा प्रकृती किंवा स्वभाव ! संसारात दोन वेगळ्या स्वभावाची माणसे जोडीने रहाताना मतभेद किंवा वाद होणे सहाजिकच असते. दुसरा असेच का वागतो, ह्याचा विचार त्याच्या दृष्टिकोनांतून समजून घेवून मगच आपण वागले, तर संसारात गोडी येते. आपला संसार सुखाचा करणे, हे अखेर आपल्याच हातात असते. हा सारीपाट खेळणे मोठेच आह्वान असते. तडजोड, समंजसपणा आणि त्याग हया तीन बाजू प्रत्येकाने संभाळल्या तर हा खेळ मनाजोगती फळे देतो.
----------------------------
# "अती तेथे माती":
मालिकेकडे नुसती करमणूक म्हणून पहाणे असा काही प्रकार नसतो. कारण मालिकेत एक जीवंत वास्तवाचे चित्र उभे होत असते. सहाजिकच तर्काला मान्य न होणारे, असंभाव्य अतिशयोक्त असेल तर त्यावर टीका करण्यात काय चूक? हल्ली बहुतेक मालिका काही काळानंतर लांबविण्याच्या अट्टाहासापायी भरकटत जातात. त्या तुलनेत पूर्वी, मर्यादित भागांच्या मालिकांमध्ये मनाला वास्तवतेचे पटेल असे बरेच काही असावयाचे. त्यामुळे त्यातील बर्याच विश्वासार्ह व स्म्रुतीत रहावयाच्या. टी२० स्पर्धांप्रमाणे आता लौकरात लौकर तशा आटोपशीर मालिकाच येणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर प्रेक्षक मालिकाच पहाणे सोडून देतील.
----------------------------
👍👍"दाद व दादागिरी !":
दाद देण्यासाठी जशी नीरक्षीर विवेकबुद्धी गरजेची तसाच दिलदारपणाही हवाच हवा. त्यातून योग्य त्या व्यक्तीला अनुरुप योगदानासाठी दाद देण्यासाठी सूक्ष्म काकद्रुष्टीही आवश्यक.
सध्याच्या मनस्वी, वेगवान स्पर्धेच्या माहोलांत अहम् भावाला कमालीचे प्राधान्य असताना अशी अचूक "दाद(दा)गिरी जवळजवळ दुर्मिळच!
----------------------------
👌👌"माझे अध्यात्म":
# वाचन हा श्वास,
# लेखन हा निश्वास,
# मालिका पहाणे हा ध्यास.
# घडामोडींचा विचार हा अभ्यास,
#सोशल मिडिया वापरणे हा विकास?
# प्रवास करणे हा त्रास, आणि
# आरोग्य राखणे हा प्रयास
----------------------------
"जुळवू, जोड्या मालिकांच्या":
१.
तुझ्यांत जीव रंगला,
जीव झाला, वेडा पिसा!
२.
अग्ग बाई सासुबाई,
अस्सं सासर सुरेख बाई!
३.
स्वामीनी,
दामिनी!
४.
या गोजिरवाण्या घरात,
काय पाहिलेस तु माझ्यात!
५.
गुंतता, हृदय हे,
जावई विकत घेणे आहे!
६.
आई, कुठे काय करते,
कळत, नकळत!
७.
रंग, माझा वेगळा,
पसंत, आहे मुलगी!
८.
अवघाची संसार,
वादळवाट!
९.
अनामिका,
श्वेतांबरा!
१०.
समांतर,
दिल, दोस्ती दुनियादारी!
आणि,
११.
आभाळमाया,
????
----------------------------
"टेलिरंजन?":
मनू आणि मल्हारच्या अवखळ प्रेमाच्या गोष्टीत त्यांचे पुढे काय होणार, ही उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, मीरा व आदिराजच्या शिळ्या प्रेमाच्या कढीची उगाचच मध्ये लुडबुड नकोशी आणि अनाकलनीय, अविश्वसनीय वाटते. सोनी मराठी वाहिनीवर "आता बरसात नाही रे !
----------------------------
#"संशयकल्लोळ !":
संशयातीत वर्तन ज्यांच्याकडून कायम अपेक्षित आहे, त्यांच्याबद्दल जेव्हा कुणी संशय निर्माण करतात,
तेव्हां दोघांची मोठी कसोटी असते.
आणि....
शेवटी....
"# "श्रेय घ्यायला नेहमी, पुढे येणार्यांनी,
वेळीच
आपली जबाबदारी मान्य करुन,
झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत असे वर्तन ठेवावे."
----------------------------
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा