"ह्रदयसंवाद-७":
"ह्रदयी धरा, हा बोध खरा":
सोशल मिडिया हे लेखनाला प्रेरणा देणारा अत्यंत उपयुक्त माध्यम असल्याचा मी आनंदाने अनुभव घेत आहे. दररोज मनातले जनात पोहचविण्यासाठी ह्यासारखे दुसरे साधन नाही. माझ्या संग्रहातून निवडक वाचनीय विचार मौक्तिके येथे मांडत आहे:
# "आजचे मुद्दे व गुद्दे!":
स्वातंत्र्यपूर्व काळात, समाज व देशहित सापेक्ष राजकारण, हे प्रामुख्याने त्याग व सेवाभावी व्रुत्ती असे होते. तर स्वातंत्र्यानंतर ते उत्तरोत्तर अधिकाधिक व्यक्तिहित, व्यक्तिपूजा सापेक्ष असे स्वार्थाने सर्वांगीण भ्रष्टाचाराने माखलेले आपण पहात आहोत. जणु सारेच इथून तिथून सारखेच भ्रष्टाचाराने बरबटलेले!
अशा वेळी स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा विरुद्ध राजकीय सुधारणा ह्या द्वंदात राजकीय सुधारणावाद्यांचा झालेला उदय व विजय आता कमालीचा महाग पडतो आहे. माणूस म्हणून, समाज म्हणून नितीमत्तेला प्राधान्य देत सुधारणा प्रथम पूर्ण होणे गरजेचे होते, असेच सध्याचा दिशाहीन, अर्थहीन भरकटत चाललेला भयावह भवताल पाहून वाटते.
एका न परतीच्या अंध:कारमय वाटेवर आपण आता फरफटत तर चाललो नाहीत?..............
# "गेले ते दिन, गेले!":
ही "ईडीयट बाँक्स नव्हती, तेव्हां किती शांती, सामंजस्य अन् जिव्हाळा होता!
# "एक कटू सत्य":
"गुन्हेगारी विश्वात जशी प्रवेश केल्यावर बाहेरची वाट नाही,
तसंच काहींसाठी,
सोशल मिडीयांत
एकदा प्रवेश केल्यानंतर परतीची वाट नसते!"
# "जे 'सोशल मिडीया' वर दिवसेंदिवस
गैरहजर राहू शकतात,
ते
आजच्या युगाचे जणु "मर्यादा पुरुषोत्तम"!
"वास्तव":
# "पोट संभाळता आलं,
तर अर्धी लढाई जिंकली, अन् मनं संभाळता आली, तर जीवनात सार्थकता आलीच, आली!"
# "यश व प्रसिद्धी कायम टिकतीलच असे नाही. अंगभूत दोष पहाता, पहाता रंग दाखवतात, ध्यानात येतातच, येतात.
सर्वगुणसंपन्न कोणीही नसतो."
# 'आजचा दिवस,
कालच्यापेक्षा चांगला होता,
असे उद्या वाटायला हवें.'
# "हवे, कर्तव्याचे उत्तरदायित्व":
"सद्दस्थिती चिंताजनक अशीच झाली आहे. एकीकडे नित्य वाढत्या अपेक्षा, दुसरीकडे संधींचा दुष्काळ आणि त्यांत भर म्हणून मतलबी स्वार्थी राजकारण, हेही पुरेसे नाही म्हणून की काय, अनियंत्रित नोकरशाही, ढासळती प्रशासकीय गुणवत्ता व कारभार अशा चक्रव्यूहात शास्वत, सर्वसमावेशक विकास पुरता अडकला आहे.
जो पर्यंत सर्वच क्षेत्रात, समस्त स्थरांवर विहीत कर्तव्ये आणि त्यासाठीचे प्रत्येकाचे उत्तरदायित्व समाधानकारकरित्या पूर्ण करण्याची ईर्षा निर्माण होत नाही, तोपर्यंत उत्तरोत्तर भवितव्य अंध:कारमय होत जाणार हे निश्चित.
# गुणवंत व निष्ठावंत कार्यक्षम प्रामाणिक माणसांची कमतरता
हे पिछेहाटीचे
आणि
अनागोंदी कारभाराचे महत्वाचे कारण असते.
# "मुखवटे आणि चेहेरे"!:
विचार, उच्चार आणि आचार ह्यामध्ये, एकवाक्यता ठेवणे, सगळ्यांना जमतेच असं नाही. ते जमण्यासाठी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि निस्पृहता असे मूल्याधिष्ठित गुण अंगी असावे लागतात.
# चंगळवाद आणि "अर्थ हाच सर्वार्थ" मानणाऱ्या आजच्या युगात, सहाजिकच हे सारे गुण दुर्मिळ होत चालले आहेत.
सहाजिकच आपल्याला सभोवताली दिसतात, वावरतात, ते मुखवटे आणि चेहेरे, चित्रविचित्र अन् विश्वास न ठेवण्या जोगे!
"कालाय तस्मै नमः" दुसरं काय?!
धन्यवाद
सुधाकर नातू
विचार, उच्चार आणि आचार ह्यामध्ये, एकवाक्यता ठेवणे, सगळ्यांना जमतेच असं नाही. ते जमण्यासाठी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि निस्पृहता असे मूल्याधिष्ठित गुण अंगी असावे लागतात.
# चंगळवाद आणि "अर्थ हाच सर्वार्थ" मानणाऱ्या आजच्या युगात, सहाजिकच हे सारे गुण दुर्मिळ होत चालले आहेत.
सहाजिकच आपल्याला सभोवताली दिसतात, वावरतात, ते मुखवटे आणि चेहेरे, चित्रविचित्र अन् विश्वास न ठेवण्या जोगे!
"कालाय तस्मै नमः" दुसरं काय?!
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा