सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२०

"ह्रदयसंवाद-३३": "राजकारण व निव्रुत्ती":

 


"ह्रदयसंवाद-३३": "राजकारण व निव्रुत्ती":

नेहमी मला बुद्धिला चालना देणारे, विचार करावेसे वाटतात. इथून तिथून मी त्यासाठी विविध घटनांचा, कल्पनांचा शोध घेत असतो. ते गवसल्यावर सुरू होते, चिंतन-स्वगत-विचारमंथन. पुढची पायरी असते, हे सारे योग्य तर्हेने नेटक्या शब्दांत व्यक्त करण्याची. हा सगळा नवनिर्मितीचा सोहळा मनाला आंतरिक समाधान देतो. तीच माझी "खरी कमाई" असते !

नुकताच एका नामवंत वयाने जेष्ठ नागरिक असलेल्या राजकारणी नेत्याचा पक्षबदलाचा कार्यक्रम झाला. विजनवासांतून सुटका होऊन आपले बस्तान व पुनर्वसन व्हावे ह्या इच्छेपोटी असे सत्तेच्या शोधातले, पक्षबदल हल्ली नवीन राहिले नाहीत. त्या घटनेला अनुसरून एक संदेश मला सोशल मीडियावर वाचायला मिळाला. त्याचा सारांश असा होता की, वयाने ज्येष्ठ असलेल्या राजकारणी नेत्यांनी, आपलं वय झाल्यावर इतर क्षेत्राप्रमाणे निवृत्त होऊन, कुठलीही अभिलाषा न बाळगता, केवळ
समाजसेवेसाठी उरलेले आयुष्य घालवावे, अशा अर्थाचा प्रतिसाद या घटनेला होता.

त्यामुळे माझ्या विचारांना चालना मिळाली. स्वातंत्र्यपूर्व राजकारण आणि उत्तरोत्तर विशेषतः एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस राजकारणाचा पोत पूर्ण बदलून गेलेला आपल्याला पहायला मिळाला. केवळ सत्तेसाठी आणि आपल्या स्वतःच्या कुटुंब व निकटवर्तीय गटाच्या संपन्नतेसाठी राजकारण करण्याचा प्रघात सुरु झाला. या पद्धतीचा माहोल पाहता-पाहता उजाडला. स्वातंत्र्या पूर्वी देश स्वतंत्र व्हावा म्हणून जी माणसं स्वतःच्या स्वार्थाचा त्याग एवढंच काय पण संसारिक सुखाचाही त्याग करून केवळ देशसेवेसाठी आपले आयुष्य वेचायचे आणि साधी राहणी उच्च विचार अशा जीवनशैलीला, त्याकाळात मानसन्मान होता. कष्ट आणि शक्यतोवर आपला व्यक्तीगत फायदा राजकारणातून न करणे, अशा प्रवृत्तीच्या माणसांची मोठी मांदियाळी त्या वेळेला होती. त्यामुळे लोकोत्तर असे अनेक नेते आपल्याला मिळाले.

मात्र दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर चित्र हळूहळू पालटत गेले. अशा वेळेला मनात येते की, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जर प्रथम समाज सुधारणा करत, योग्य आदर्श नागरिक बनवण्याची सुधारक मंडळींची जी ईर्षा होती, तिला जर प्राधान्य दिले गेले असते, तर कदाचित पुढचा सगळा इतिहास बदलला गेला असता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्या मनात विचार आला की, राजकारण व निव्रुत्ती ह्या विषयावर जणू काही एखादा ऑपिनियन पोल घ्यावा. म्हणून मी एक संदेश सोशल मीडियावर प्रदर्शित केला व त्याला मला जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून जनमानसाची राजकारणाकडे पाहण्याची आजची प्रातिनिधिक दृष्टी दिसून येते.
माझा तो संदेश असा:

# "राजकारणात देखील निव्रुत्तीचे वय असावे कां? हो उत्तर असेल तर किती असावे? नाही उत्तर असेल तर ते कां?"

त्यावरील प्रतिसाद पहाः

"निव्रुत्तीचे वय नाही. संपत्तीवर मर्यादा असावी कारण राजकारण हे आता धंदा झालं आहे."

"६० वर्ष"

"भा ज प मध्ये काम करता येतं तोपर्यत
इतर सर्व पक्षात पैशे खाता येतात तोपर्यंत."

"राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान सोडून सर्वांना मिळणारे निवृत्ती नंतरचे भत्ते, सुविधा, सवलती संपूर्णपणे काढून घेतल्यास आणि सर्व नगरसेवक, आमदार, खासदारांच्या ते पदावर असतानाच्या सर्व सवलती त्यांचा फेरविचार व अभ्यास करून कमी केल्यास राजकारण हा सुखसंपंन्न धंदा राहणार नाही. या क्षेत्रात तेच लोक येतील, ज्यांना समाजसेवा करायची आहे. त्याने राजकारणांत निवृत्ती केव्हा असावी हा प्रश्नच निकालात निघेल. देशात दलालांनंतर या राजकारण्यांची आणि त्यांच्या मुलांच्या बेकारीची समस्या मात्र नक्कीच ऊभी राहील.

" 60 करावे..compulsory."

"80 पण तोपर्यंत मानसिक स्थितीचा अंदाज घेऊन सारासारविवेकबुद्धी व संस्कृती व स्मृती यांचा अंदाज घेऊन निरीक्षण करून त्यापूर्वी."

"मोदी सरकारने सुरूवात केली आहे की. ७० च्या नंतर बाहेर."

"Age and property must be restricted in politics."

"७५"

"हे मेल्यानंतर सुद्धा म्हणतील मला खुर्ची सकट जाळा."

"निवृत्ती चे वय 60 असे निश्चित करावे तसेच सर्व राजकारण्यांना पेंशनमुक्त करावे 2005 नंतर सरकारी नोकरीत पेन्शन बंद केले तसे."

"निवृत्तीचं वय असावंच, शिवाय
१-एका लोकप्रतिनिधी ला केवळ दोनदाच टर्म मिळावी.
२-घराणेशाहीपेक्षा गुणवत्ता, कामं करण्याची हातोटी, कामं सोपे करुन समाजाभीमुख निर्णय ठामपणे घेण्याची क्षमता, यावर इच्छुकांच्या लेखी मुलाखती घेऊन पुढील लोकप्रतिनिधी ठरविला जावा..अशा बर्याच बाबी आहेत की ज्यामुळे तत्पर सरकार निर्माण होऊ शकेल."

"60 असावे, कारण तुम्ही 60 नंतर नोकरी पण नाही करू शकत, तर राजकारण पण Allowed नाही केला पाहिजे. तसेच पक्षांतर केल्यावर ही 2 टर्म निवडणुक न लढवणे बंधनकारक असावे. कारण पक्षांतर हे फक्त आणि फक्त स्वतःच्याच आर्थिक फायद्यासाठी केले जाते सामाजिक फायद्यासाठी नाही."

"नक्की असायलाच हवे."

"तिरडी बांधे पर्यंत असेल ते."

"65 पर्यंत ठिक आहे. तसा कायदाच करावा.
ते काय म्हणतात ना, कबरीत पाय लटकले वा मसनात लाकडे गेली, तरी मीच उभा रहाणार आणि समजा हा थेरडा मेला, तर तो बायकोला नाही तर मुलांना ऊभे करणार असतो."

"निवृत्तीचे वय ठरवायचे नसते .
तर पद किती वेळा एका व्यक्ति कडे ठेवायचे याचे निकष ठरवायचे असतात.
युएसएचे अध्यक्ष पद दोन वेळा प्राप्त करता येते, तसेच भारतातसुद्धा पद प्राप्त करण्यास कालमर्यादा घातली पाहिजे.
भारताचे प्रमुख नेते होते त्यांनी हे संकेत निर्माण केले पाहिजे होते. जसे युएसए चे पहिले अध्यक्ष यांनी हा संकेत विहित केला आहे.

पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री खासदार आमदार महापौर नगराध्यक्ष सरपंच ही पदे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्यत्व पण किती वेळा प्राप्त करायचे याचे निकष निश्चित केले पाहिजेत.
दोन तीन वेळा भुषविता येईल.
तसेच शासकीय महामंडळे व पक्षातील पदे ही काल मर्यादित केली पाहिजेत.
परंतु भारतात कायदे केल्या शिवाय काही सुधारणा होत नाहीत.

विशेष म्हणजे कायदा चुकीचा ' त्रुटीपूर्ण दोषपूर्ण अन्यायकारक व अव्यवहार्य असला तरी भारतीय जनता त्याचा स्विकार करते हे इतिहासात आहे व आजही आहे.
उदा.
१. अपत्य मर्यादा ही स्था स्व सं सदस्य यांना लागू आहे, परंतु विधानमंडळ व संसद सदस्य यांना लागू आहे.
२. विधान मंडळ व सदस्य आरोप मुक्त असला पाहिजे. परंतु न्यायालयाने आरोपपत्र दाखल करून घेतले तरी निवडणुकीला उभे राहता येते. सदस्य होता येते व मंत्री पण होता येते.
अनधिकृत बांधकाम केले व पाठीशी घातले तरी स्था. स्व. संस्थेमधील सदस्यत्व रद्द होऊ शकते .
विशेष म्हणजे संरपंच पदावरील व्यक्तिची जि.प अध्यक्ष यांचेकडून चौकशी करता येते, तसा नियम आहे. परंतु असा नियम मंत्री पदासाठी विहित नाही. म्हणजे राज्याच्या मंत्री महोदय यांची चौकशी राज्यसभा किंवा लोकसभा येथील सदस्य समिती कडून करणे तसेच मुख्यमंत्री यांची चौकशी राज्यसभा सदस्य समिती कडून करणे असा नियम असला पाहिजे."

"होय..कुठलेही पद दोन वेळा निवडून आल्यानंतर त्याला ते पद बंदीच. वय 60 पेक्षा जास्त नाही कारण सर्व ठिकाणी हे निवृत्तीचे वय आहे."

"there should be retirement age for MPs /MLAs/ and all other elected leaders from top to bottom from gram panchyat to rajyasabha & retirement age should be same as central government employee i.e. 60 years."

"tyapeksha shikshnachi condition havi. ani 5 yrs army training."

"वय नसाव. पण तो सुशीक्षित असावा मतदार संघाची सामाजिक वभोगोलिक चागली माहिती असावी. आठ दिवसात एकवेळा मतदार संघात भेट असावी. तीन वेळा निवडणूक लढवावी. एक वेळ तरी खात्याचा मंत्री असावा, जर खात्याचा मंत्री नसेल तर नंतर कोणतेहि लाभ देऊ नयेत."

सारांश राजकारण व साधनशुचिता, तसेच निव्रुत्तीचे निकष अशा अनेक विषयांवर राष्ट्रीय महाचर्चेची व त्यानुसार आदर्श आचारसंहिता व सुविहीत कायदे त्यांची प्रामाणिक अंमलबजावणी व्हायला हवी.

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
दोनशेहून अधिक प्रेरणादायी लेख.......
नेहमी वाचण्यासाठी...........
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडा..........
संग्रही ठेवा....शेअरही जरुर करा.....

http://moonsungrandson.blogspot.com

ह्या शिवाय...
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चँनेल Subscribe ही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

"टेलिरंजन-५": काही ही हं!:

 "टेलिरंजन-५": काही ही हं!:

माणसाचं आयुष्य म्हणजे जणू आगगाडीचा प्रवास असतो मुंबई पासून दिल्ली पर्यंत. पण इथे जेव्हा तुम्ही गाडीत शिरता, तेव्हाच तुम्हाला जिथे उतरायचं त्या स्टेशनचं तिकीट दिलं जातं. ते तुमच्या जवळ असतं, पण तुम्हाला ते दिसत नाही.

आज ती आठवण व्हायचं कारण म्हणजे टेलिव्हिजन वरच्या मालिका त्या सुरू होतात पण संपणार कधी, हे खरं म्हणजे त्या वेळेला माहीत नसतं. पण फारच थोड्या वर्ष-दोन वर्ष तर काही पाच पाच वर्ष टिकून राहतात. अल्पजीवी मालिका देखील असतात. आता हे असं कां? ह्या प्रश्नाला उत्तर काही मिळत नाही.

मालिकांचा आयुष्य हे खरं म्हणजे प्रेक्षकांच्या मर्जीवर आणि जाहिरातदारांच्या निर्णयावर अवलंबून असतात. त्यामुळे काही मालिका टिकतात, तर काही मालिका लवकर संपवलल्या जातात. आता व्यवसाय म्हणून मालिका जास्तीत जास्त टिकाव्यात, म्हणून लेखक आणि इतर टीम ना काही त्याच्यामध्ये नवनवीन कल्पनारुपी धो धो पाणी घालतात. मात्र व्याधी दूर होऊन, आजार्याचे आरोग्य सुधारावे म्हणून, डॉक्टर जसे औषधोपचार करतात तशी प्रेक्षकांची नस कळली तरच मालिका आवडतील. अशी ही माणसाची आणि मालिकांची गंमत आहे.

प्रत्यक्षात मात्र वेगळेच माथी मारले जाते, बिचार्या प्रेक्षकांच्या.

मराठी मालिकांमध्ये नेहमी तर्काला किंवा व्यवहारात अशक्य असेल किंवा कोणालाही मनाला पटणार नाही अशाच तर कां दाखवतात, काही कळत नाही.."अग्गबाई सासुबाई" मध्ये इतकी वर्ष वैधव्यांत काढून असावरी मुलाचं लग्न झाल्यानंतर म्हातारचळ लागल्यासारखं चक्क अभिजीत राजेंच्या यांच्या प्रेमात काय पडते आणि त्यानंतर त्यांचे काही बाष्कळ पोरखेळ चालतात, ते सर्व खरोखर न पटणारे असेच. "माझा होशील ना? ही मालिका चांगली रंगतदार बनत असताना, अचानक आदित्य आणि सई यांचं आदित्यच्या आईच्या वाढदिवसानिमित्त आश्रमात गेल्यापासून, नंतर जे जे काही घडत जातं, ते केवळ मूर्खांचा बाजार असल्यासारखंच. त्याचे साहेब लोक त्याला वेटर काय बनवतात, आँफीसमध्ये नशा पार्टी काय करतात किंवा वेड्यासारखी सई त्याने दिलेली रातराणी ईअरिंगची भेट हरवली म्हणून, कचऱ्यात काय शोधत बसते, सारे काही न पटण्याजोगे. नावाजलेली मालिका देखील अपवाद नाही. "आई कुठे काय करते" मधे देखील असंच काहीतरी न पटणारं दाखवतात. आपला नवरा व्यभिचार करतोय हे कळूनही अगदी कडेलोट होईपर्यंत त्याची पत्नी आप्पा आणि सासूबाईंना त्याचे नालायक प्रताप सांगायचे सोडून, इतरच काही सांगत बसते हे पटत नाही. तसंच इतक्या हुशार सासूबाईंना देखील संजना आणि अनिरुद्ध काही झालं असेल म्हणून ती अशी वागत असेल हे कळत नाही !

प्रेक्षकांना अक्षरशः संताप येईल अशा तर्‍हेचंच काहीतरी दाखवत बसणाऱ्या या मालिकांचा इतका उबग आला की, शेवटी मी सोशल मीडियावर एक संदेश प्रदर्शित केला. तो प्रेक्षकांना मालिकांसंबंधी काय वाटते, ते सांगायला लावणारा होता, जणु एखादा ओपिनियन पोल असल्यासारखा. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. तो येथे देतो त्यामुळे टीव्हीवर काही ही हं दाखवलं जातं, त्याची कल्पना येईल:

# माझा संदेशः
"निरर्थक, पोरकट व बाष्कळ असं, कसंही, काही ही हं, दाखविणार्या "अग्गबाई सासूबाई", "माझा होशील ना?", "माझ्या नवर्याची बायको" अशा मालिकांमुळे झी मराठी वाहिनीचा दर्जा वेगाने घसरत चालला आहे, असं वाटतं कां?°
"झी मराठी वाहिनी ला दर्जा म्हणजे काय तेच माहीत नाही. प्रेक्षकांना ही ते आपल्याच तोडीचे समजतात".

त्याला आलेले हे प्रातिनिधीक प्रतिसाद:

"झी च कशाला, एकंदरच सगळा आनंदी आनंद आहे, मराठी चॅनेल म्हणजे."

"मी तर म्हणतो, या मालिकांमुळे ती वाहिनीच बंद करायला पाहिजेत. मराठी मालिका इतक्या पांचट असु शकतात... प्रेक्षकांचा अगदी अंत पाहतात या मालिका ... माझ्या तोंडुन चटकन शिवी निघून जाते मालिका लागल्या बरोबर... वाहिनीवर खटला दाखल करावासा वाटतो..."

"ते निर्लज्ज आहेत. टीआरपी घसरला की अॅड कमी होतात मग एका फटक्यात बंद करतील.राक्षसाचा प्राण पोपटात असतो तसा यांचा जाहीरातीत असतो. हे दरीद्रीच आहेत. ईतर ठिकाणी 'सावित्रीज्योति' 'बाबासाहेब' 'आई कुठे काय करते?' गर्दी खेचत आहेत.तसही नीट बघीतल, तर कित्येक वर्ष ते एकच कथा नांव बदलुन दाखवतात. खेडेगाव शेलार नाहीतर गायकवाड घराणं, भांडण कट कारस्थान वेड लागणं, स्मृती जाणं, स्वयपाकात मीठ. दागिन्याचा डबा ..भंगार.वाईट म्हणजे 'अलटी पलटी' ती फारच भिकार होती.

"आपल्या सर्वांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. एक साधा आणि सोपा उपाय आहे. झीे मराठी वाहिनी पाहूच नये. मी आता तेच केलेय कारण एवढेच आपली हातात आहे."

"झी असे नाही, तर कुठलेही चॅनेल घ्या. high profile dhanda kasa karava hech shikvtat"

"हे सगळं योग्य ठिकाणी पोहोचवा आणि सांगा सुखाने जगु द्या प्रेक्षकांना."

"मराठी न्युज चँनल्स, मराठी सिरियल्स सगळ बोगस होत चालले आहेत. एकही मालिका अशी नाही की ज्यापासून आपल्याला चांगल काही शिकता येईल. भंगार, गलीच्छ, वाईट कसे आणि किती वागता येईल, याचेच पाठ असतात या सिरीयल्स मधे. आणि गम्मत म्हणजे आपल्या रीयल लाईफमधे आपण स्वतः कोणतीही नवीन गोष्ट करताना ह्यांना/अहों ना विचारून सांगते. अस वागतो. या भंगार सिरीयल्स मधे नवरा म्हणजे एकदम बावळट, त्याला काही ही समजत नाही किंवा तिच्या समोर बोलायचेच नाही. ती चुकीची वागत असली तरी. या सिरीयल्समधील बायकांनी नवर्याकडे नुसतं पाहीलं तरी तो लगेच मुग गिळुन बसतो. हे अजिबातच न पटणार आहे. ईतके मूर्ख कां दाखवतात पुरुषांना सिरीयल्स मधे?"

"असले विचार लिहिताना रोज किती खोटी वृत्ती दाखवली आहे, हे बघितल्याशिवाय कळतच नाही. ह्याचा अर्थ टीका करणारे रोज ह्या मालिका बघतात. आणि नंतर आज काय वाईट दाखवले, त्या वर चर्चा करतात. ह्यातच ह्या सर्व मालिकांचे यश आहे. बघणे बंद करा पहिले. मग काय विचार मांडणार. तेव्हा लिहितील आम्हाला खोटे लिहायला आवडत नाही, म्हणून बघतो."

"हिंदी किंवा मराठी भाषेत - काही चांगल्या मालिका, कुठल्या वाहिनीवर सुचवता येतील कां ?"

"पूर्वीच्या श्वेतांबरासारखं पाहिजे
फक्त १३ एपीसोड"

"मराठी वाहिन्यांना दर्जा कशाशी खातात, हे तरी माहिती आहे कां, असा प्रश्न पडतो. मग तो घसरायचा प्रश्नच येतो कुठे."

"आता सोज्वळ, सात्विक ,करमणूकप्रधान मालिका कौणत्याच वाहीनीवर नसतात. आठवा जुनी मालिका ,गंगाधर टीपरे, अग्नी हौत्र. ई.ई."

"प्रेक्षक हा मनोरंजनासाठी टिव्ही बघतो. परंतू असल्या खालच्या दर्जाच्या मालिका बघत असताना, त्याला फक्त मनस्तापच मिळतो. मालिका निर्मात्याची विचारांची पातळी किती घसरली आहे, हे असल्या मालिका बघत असताना लक्षात येते. असल्या मालिका बंद करायचे फक्त प्रेक्षक वर्गाच्याच हातात आहे. असल्या खालच्या स्तराच्या मालिकांवर बहिष्कार करुन, टिआरपी कमी होईल."

इ.इ.....
आता तरी मालिकांमध्ये वाममार्गाला प्राधान्य न देणारे, वास्तवाला धरून असणारे नेमके T20 सामन्यांसारखे आटोपशीर, मनोरंजन केले जावे
हीच अपेक्षा.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
दोनशेहून अधिक प्रेरणादायी लेख.......
नेहमी वाचण्यासाठी...........
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडा..........
संग्रही ठेवा....शेअरही जरुर करा.....

http://moonsungrandson.blogspot.com

ह्या शिवाय...
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चँनेल Subscribe ही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

"मोबाईल एक, कल्पना अनेक-३":

 "मोबाईल एक, कल्पना अनेक-३":

व्हाँट्सअँपवर आपल्याला अनेक संदेश येत असतात, अधूनमधून मी मोबाईल फोनमधले ते संदेश पुसून टाकत असतो. पुष्कळदा आलेले काही महत्वाचे व विशेष माहितीपूर्ण संदेश आपल्याकडून वाचले न जाता तसेच पुसलेही जात असतात. आज मात्र ह्या दोन तशा लांबलचक पण उत्कंठावर्धक संदेशांनी माझे लक्ष वेधले......

तेच, मनाला भिडणारे संदेश whatsapp वरचे पुढे देत आहे. दुसरा संदेश, पुढे पाठवलेला कुणा अनामिकाचा, तर पहिला संदेश श्री जयंत केशकामत ह्यांचा आहे. प्रथम ह्या दोन्ही संदेशजनकांचे मनःपूर्वक आभार...

१ "अबला न तू, आहे तू दुर्गा":
( हे शीर्षक मात्र मी दिले आहे.)

# "*हिंदूंचे कोणतेही ग्रंथ उघडून पाहा, अगदी वेदांपासून ते पुराणांपर्यंत - तुम्हाला एकही नायिका अबला आढळणार नाही, एकही नायिका Damsel In Distress आढळणार नाही.*
सीतेला अपह्रत केल्यावर तिने रावणासमोर हात नाही टेकले, तर बाणेदारपणे उभी राहिली रावणाच्या विरोधात. अंबाने आपल्यावरचा अन्याय निवारण्यासाठी कोणत्याही थराला जायचे बाकी ठेवले नाही. द्रौपदीने तर पांडव शिथिल होताहेत असे जरादेखील दिसू लागले तरीही सूडाचा अग्नि सातत्याने चेतवून धगधगता ठेवला आणि अखेरीस महाभारत घडवून आणले!! काय कारण असेल याचे?

*जगात संस्कृती एकतर पुरुषप्रधान असतात नाहीतर स्त्रीप्रधान! परंतु हिंदू संस्कृती ही जगाच्या पाठिवर एकमेव अशी संस्कृती आहे की जी 'समानता-प्रधान' आहे.*
प्राचीन काळापासूनच आमच्याकडे स्त्रियांना आणि पुरुषांना एकमेकांच्या बरोबरीने शिकवले गेले. सुसंस्कृत केले गेले! स्त्रीने उपलब्ध सुयोग्य वरांमधून आपला पती स्वतःच निवडण्याची स्वयंवरासारखी पद्धत केवळ याच देशाची देणगी आहे. युद्धप्रसंगी पुरुषाच्या बरोबरीने लढणाऱ्या किंबहूना पुरुषाहूनही सवाई पराक्रम गाजवून गरज पडल्यास त्याचे रक्षण करणाऱ्या सत्यभामा आणि कैकैयी येथे जागोजाग आढळतील तुम्हाला. गार्गी, मैत्रेयी यांच्यासारख्या बुद्धीशालिनी तर किती होत्या यांची गणतीच नाही! 'शिव' आहे तिथे 'शिवानी' आहेच. 'भव' आहे तिथे 'भवानी' आहेच. 'मृड' आहे तिथे 'मृडानी' आहेच. 'प्राण' आहे तिथे 'रयि' आहेच. लक्ष्मीशिवाय विष्णू अपुरा दिसेल. आणि 'इ' काढून घेतली तर 'शिव'ही 'शव' होऊन बसेल!

जसजसा काळ बदलला तसतसा संस्कृतीऱ्हास होऊ लागला. आधी इस्लामी आणि मग ख्रिस्ती शासनकाळात हिंदूंचे आचारविचार जबरदस्तीने बदलवले गेले. सतीसारखी ऐच्छिक प्रथा सक्तीची झाली ती ह्याच अंधारयुगात. जिथे घरात वावरणाऱ्या स्त्रियांनाही सुलतानाचे लोक कधी उचलून नेतील याचा नेम नसायचा, तिथे शिक्षण-बिक्षणाचा प्रश्नच कुठे येतो? मुसलमान शासक तर स्वतःच अडाणी आणि खुळ्या पोथीनिष्ठेपायी स्त्रिला भोग्यवस्तू समजणारे. इंग्रजांनी मात्र ठरवून आमच्या श्रद्धा, परंपरा आणि ज्ञान मारले. आमच्याकडचे चांगले तेवढे चोरुन नेले आणि इंग्रजी भाषा, कारकूनी इ. त्यांच्या फायद्याच्या पण मुळात सुमार दर्जाच्या गोष्टी आम्हाला शिकायला भाग पाडल्या. ह्या देशात, जिथे सगळे पुरुष नारीला देवी मानायचे आणि सगळ्या स्त्रिया पुरुषाला देव मानायच्या, जिथे अर्धनारीनटेश्वराची पूजा व्हायची, तिथे लिंगभेद जन्माला घातला गेला.

आज आसपास पाहा. काय दिसेल? स्त्रीपुरुष-समानतेच्या नावाखाली काही थोडे अपवाद वगळता 'स्त्रियांचाच तेवढा वरचढपणा' मागितला जातोय. मी माझी कर्तव्ये करणार नाही, मी स्वैर वागेन, My Choice चे गोडवे गाईन - पण तरीही तू मात्र माझा आदरच केला पाहिजे; ही वृत्ती वाढताना दिसेल. कारण, ह्या स्त्रीपुरुष-समानतेच्या वंचनासुद्धा पाश्चात्त्यांचीच देण आहेत! याउलट पाहा, आता ९ दिवसांचा मंगलोत्सव सुरु आहे - नवरात्री!! देवी त्या महिषासुराशी सलग ९ दिवस युद्ध करत होती. एकट्याने सैन्याचे नेतृत्त्व करत होती. आणि अखेरीस तिने तो दैत्त्य मारलाच! ही असते खरीखुरी स्त्रीशक्ती!! ही असते खरीखुरी Woman Empowerment!!!
*प्रत्येक स्त्रीमध्ये देवी पाहाणारा हा देश देवीला "शक्तीरुपेण", "बुद्धीरुपेण", "विद्यारुपेण" आणि "भक्तीरुपेण" संस्थिता मानतो, तिला आदिमाया-जगज्जननी मानतो. ह्या विचारांकडे पुन्हा एकवार जाण्याची आज गरज आहे. त्यासाठी परकीय विचारसरणींची भ्रांति सोडण्याची गरज आहे. आणि त्यासाठी स्त्रियांना पुरुषांनी देवी मानणे व त्याचबरोबर स्त्रीनेही आपले वर्तन देवीसमान ठेवण्याची गरज आहे!! तरच ही नवरात्री खऱ्या अर्थाने सुफळ संपूर्ण होईल.* नुसतीच सांकेतिक घटस्थापना काय कामाची?
...जयंत केशकामत
----------------------------

# "पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य"। ...

अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या कळल्या तर आपण अक्षरशः थक्क होतो. थिजून जातो. आज ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात, त्या अडीच/तीन हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांना कश्या काय निर्माण करता आल्या असतील हे प्रश्नचिन्ह मोठं होत जातं...
हिंदू तत्वज्ञानामधे पंच महाभूतांचे विशेष महत्त्व आहे. पाश्चात्य जगताने देखील ह्या संकल्पना मान्य केल्या आहेत. डेन_ब्राऊन सारखा लोकप्रिय लेखक सुध्दा या संकल्पनेचा उल्लेख करतो, त्यावर कादंबरी लिहितो.
ही पंच महाभूतं म्हणजे जल, वायू, आकाश, पृथ्वी आणि अग्नी. आपलं सारं जीवनचक्र या पंच महाभूतांच्या आधाराने गुंफलेलं असतं अशी मान्यता आहे.
आपल्या देशामध्ये या पंच महाभूतांची भव्य आणि वैशिष्ठ्यपूर्ण मंदिर आहेत हे आपल्यापैकी किती जणांना माहीत असेल ?
फार थोड्या लोकांना. त्यातून ते जर शंकराचे उपासक असतील तर हे माहीत असण्याची थोडी तरी शक्यता आहे. कारण ह्या पंच महाभूतांची मंदिरं म्हणजे शिव मंदिर,भगवान शंकराची मंदिर आहेत. पण यात काही मोठं वैशिष्ट्य किंवा रहस्य नाही.

* मग वैशिष्ट्य कशांत आहे...?
पंच महाभूतांच्या ह्या पाच मंदिरांचं वैशिष्ट्य किंवा रहस्य यात आहे की यातील तीन मंदिरं, जी एकमेकांपासून काही शे किलोमीटर लांब आहेत, ती एका सरळ रेषेत आहेत..!

होय. अक्षरशः एका सरळ रेषेत आहेत..!!

]]] ती तीन मंदिर आहेत [[[

श्री कालहस्ती मंदिर
श्री एकंबरेश्वर मंदिर,कांचीपुरम
श्री तिलई नटराज मंदिर,त्रिचनापल्ली

आपण पृथ्वीवर एखादी जागा ठरविण्यासाठी कोआर्डिनेटस चा उपयोग करतो, ज्याला आपण अक्षांश आणि रेखांश म्हणतो. यातील अक्षांश (Lattitude) म्हणजे पृथ्वीवर आडव्या मारलेल्या (काल्पनिक) रेघा. जसं विषुववृत्त, कर्कवृत्त वगैरे. आणि रेखांश (Longitude) म्हणजे उभ्या मारलेल्या (काल्पनिक) रेघा.

या तीन मंदिरांचे अक्षांश–रेखांश आहेत

१. श्री कालहस्ती मंदिर 13.76 N 79.41 E वायू

२. श्री एकंबरेश्वर मंदिर 12.50 N 79.41 E पृथ्वी

३. श्री तिलई नटराज मंदिर 11.23 N 79.41 E आकाश

यातील रेखांश हा तिन्ही मंदिरांसाठी 79.41 E आहे. अर्थात तिन्ही मंदिरं एका सरळ रेषेत आहेत. कालहस्ती आणि एकंबरेश्वर मंदिरांमधील अंतर सव्वाशे किलोमीटर आहे तर एकंबरेश्वर आणि तिलई नटराज मंदिरांमधील अंतर हे पावणे दोनशे किलोमीटर आहे. ही तिन्ही मंदिरं नक्की केंव्हा बांधली, ते सांगता यायचं नाही. या भूभागावर राज्य केलेल्या पल्लव, चोल इत्यादी राजांनी ह्या मंदिरांचे नूतनीकरण केल्याचे उल्लेख सापडतात. पण किमान तीन हजार वर्षांपेक्षाही जास्त, ही मंदिरं जुनी असतील हे निश्चितपणे म्हणता येईल.
आता इथे खरं आश्चर्य हे आहे, की साधारण तीन हजार वर्षांपूर्वी, इतक्या लांबच्या लांब अंतरावरील ही मंदिरं एकाच उभ्या सरळ रेषेत कशी बांधली असतील..?
याचा अर्थ, त्या काळात नकाशाशास्त्र इतकं प्रगत होतं की अक्षांश–रेखांशांच ज्ञान त्यांना होतं ? पण अक्षांश–रेखांशांचं परिपूर्ण ज्ञान असलं तरी एका सरळ रेषेत मंदिर बांधण्यासाठी नकाशा शास्त्रा बरोबरच कंटूर मेप चं ज्ञान त्यांना आवश्यक होतंच!
की
इतर कुठली एखादी पध्दत त्या काळात वापरली गेली, जी आज काळाच्या पडद्याआड गेलेली आहे..?

सारंच अतर्क्य.....!

ही गंमत इथेच संपत नाही, तर इतर दोन मंदिरांबरोबर जेंव्हा ह्या एका सरळ रेषेत असलेल्या मंदिरांना जोडलं जातं, तेंव्हा झालेल्या रचनेतून विशिष्ट कोण निर्माण होतात.

याचा अर्थ, त्या काळातली आपल्या वास्तुविशारदांची झेप लक्षात घ्या. जमिनीच्या, काही हजार चौरस किलोमीटर पसरलेल्या भूभागावर ते पंच महाभूतांच्या पाच शैव मंदिरांचा मोठा पट मांडतात. त्या रचनेतून आपल्याला काही_सुचवू पाहतात. आपलं दुर्भाग्य की आपण त्यांची ती ज्ञानाची कूट भाषा समजू शकत नाही.

या पंच महाभूतांच्या मंदिरांपैकी एक मंदिर आंध्र प्रदेशात आहे, तर उरलेली चार, तामिळनाडू मधे आहेत. यातील वायू तत्वाचं प्रतिनिधित्व करणारं, श्री कालहस्ती मंदिर, हे आंध्र प्रदेशातल्या चितूर जिल्ह्यांत, तिरुपतीहून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे. स्वर्णमुखी या लहानश्या नदीच्या तीरावर हे मंदिर उभारलेले आहे. हजारों वर्षांपासून ह्याला ‘दक्षिण कैलास’ किंवा ‘दक्षिण काशी’ म्हटले जाते.

हे मंदिर अत्यंत प्राचीन असले तरी मंदिराचा आतला गाभाऱ्याचा भाग पाचव्या शतकात तर बाहेरचा, गोपुरांचा भाग हा अकराव्या शतकात बांधलेला आहे. पल्लव, चोल आणि नंतर विजयनगर च्या राजांनी ह्या मंदिराची डागडुजी आणि बांधकाम केल्याचे उल्लेख सापडतात. आदी शंकराचार्य ह्या मंदिरात येऊन गेल्याचे उल्लेख अनेक साहित्यात मिळतात. खुद्द शं‍कराचार्यांच्या ‘शिवानंद लहरी’ मधे ह्या मंदिराचा आणि येथील ‘भक्त कणप्पा’ चा उल्लेख आहे.
हे मंदिर पंच महाभूतांपैकी वायू तत्वाचे प्रतिनिधित्व करते. याचे काही चित्तवेधक संदर्भ मिळतात/दिसतात.

या मंदिरातील शिवलिंग हे पांढरे असून ते स्वयंभू आहे असे मानले जाते. या शिवलिंगाला (हे वायुतत्व असल्यामुळे) कधीही स्पर्श केला जात नाही. मंदिराचे पुजारी सुध्दा ह्या मुख्य लिंगाला कधीच स्पर्श करीत नाहीत. अभिषेकासाठी आणि पूजेसाठी एक वेगळे उत्सव लिंग बाजूला ठेवले आहे. गंमत म्हणजे ह्या मंदिराच्या गाभार्‍यात एक दिवा सतत जळत असतो आणि तो सतत फडफडत असतो. हे थोडं नीट समजून घेतलं पाहिजे. कारण मंदिराचा गाभारा हा लहान असुन त्याला कोठेही हवा यायला जागा नाही. पुजाऱ्यांनी मुख्य द्वार बंद केलं तरी त्या दिव्याच्या ज्योतीचं फडफडणं चालूच असतं..! कुठलाही वारा नसताना, दिव्याची ज्योत फडफडत राहणं हे कां होतं ?
याचं कोणतंही शास्त्रीय कारण आजतागायत मिळू शकलेलं नाही.

मात्र येथील शिवलिंग हे वायुतत्व असल्याने दिव्याची ज्योत सतत फडफडत असते, असं येथील लोकांचं म्हणणं आहे!!

या मंदिरापासून साधारण सव्वाशे किलोमीटर दक्षिणेला अगदी सरळ रेषेत पंच महाभूतांपैकी दुसरे मंदिर आहे – श्री एकंबरेश्वराचे मंदिर.

तामिळनाडूच्या प्रसिध्द कांचीपुरम मधे हे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे मंदिर आहे.
पृथ्वी तत्व असल्याने हे शिवलिंग मातीचे बनले आहे. असे मानले जाते की शिवशंकराच्या प्राप्तीसाठी एका आंब्याच्या झाडाखाली, पार्वती ने आराधना केली. आणि ती देखील मातीच्या शिवलिंगाच्या स्वरूपाची. म्हणूनच ह्याला एकंबरेश्वर म्हणतात. तामिळ मधे एकंबरेश्वर म्हणजे आंब्याच्या झाडाचा देव. आजही मंदिराच्या आवारात एक प्राचीन आंब्याचे झाड उभे आहे. कार्बन_डेटिंग ने ह्या झाडाचे वय साडेतीन हजार वर्षे निघाले आहे, असे म्हटले जाते. ह्या झाडाला चार वेदांचे प्रतीक समजले जाते. असं म्हणतात, ह्या झाडाला चार वेगवेगळ्या स्वादाचे आंबे लागतात.

हे मंदिर, ‘कांचीपुरम’ ह्या मंदिरांच्या शहरात आहे. कांचीपुरम हे ‘कांजीवरम’ साड्यांसाठी जगप्रसिध्द आहे. ह्या मंदिरात तामिळ, तेलगु, इंग्रजी आणि हिंदीत एक फलक लावलाय की हे मंदिर ३,५०० वर्ष जुनं आहे. नेमकं किती जुनं हे सांगता येणं कठीण आहे. पुढे पाचव्या शतकात पल्लव, नंतर चोल आणि पुढे विजयनगर च्या राजांनी ह्या मंदिराची डागडुजी केल्याचे उल्लेख आढळतात.

ह्या दोन मंदिरांच्याच अगदी सरळ रेषेत, दक्षिण दिशेत, ह्या एकंबरेश्वर मंदिरापासून साधारण पावणे दोनशे किलोमीटर अंतरावर पंच महाभूतांचे तिसरे मंदिर आहे – तिलई नटराज मंदिर. आकाश तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे हे मंदिर, तामिळनाडू च्या चिदंबरम या शहरात आहे.

खुद्द पतंजली ऋषींनी स्थापन केलेले हे अत्यंत प्राचीन असे मंदिर आहे. नेमके केंव्हा बांधले हे सांगणं कठीण आहे. मात्र पाचव्या / सहाव्या शतकात, पल्लव आणि चोल राजांनी याची डागडुजी आणि काही नवीन बांधकाम केल्याचे उल्लेख आढळतात. ह्या मंदिरात ‘भरतनाट्यम’ च्या १०८ विभिन्न मुद्रा दगडी खांबांवर कोरलेल्या आहेत. याचाच अर्थ, अत्यंत विकसित असं भरत नाट्यम हे नृत्य शास्त्र काही हजार वर्षांपूर्वी सुध्दा अस्तित्वात होतं, हे सिध्द होतं..!
----------------------------

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
ह्या शिवाय...
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चँनेल Subscribe ही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

"Social Medium: 'A Gymnasium for Lateral thinking-3.":

 

"Social Medium: 'A Gymnasium for Lateral thinking-3.":

For me social medium is an open Platform for polishing one’s innovative creative ability & 
I call the social media as a Gymnasium for Lateral thinking..

I am therefore pleased to share here few Gems of my innovative & interesting thinking from my SM postings and I am sure they too would make you think & introspect.....

# "Just read the Story-'Jyache Tyache Jag' of an old poor man and his rich, only son, in 'Antarnad' mag. It's an eye opening, touching, narration of emotional divide between two generations.

An enlightening truth emerged from it- ' each his own' and that 'every individual has his own virtual World, formed out of his own upbringing and lifestyle, as well as physical/social/cultural environment, he has experienced thru'. Congrats to the writer and the editor.

___________________________
"Making your Life, more memorable.":

# Input-Process-Output is the most common universal cycle that goes on continuously in the World in different forms. The process while converting ‘Input’ into ‘Output’ adds some more value to it. The processes differ according to a given need for the conversion of ‘Input’ into ‘Output’ & accordingly value added gets suitably differed.

Thus ‘Process’ is critical for a particular category of ‘Input’ to make it more Valuable.. With that perspective, look at Life at Birth to be our ‘Input’ and the way we lead Life-in good or not so good ways happens to be the our ‘Processes’ and the End of Life-the Death is our ‘Output’.

Hence we must utilize our intelligence & senses, to Lead Life in the most virtuous ways, so that our Final ‘Output’ is worth remembering. Hence Never ever burn your process of Leading Life in vices or misdeeds. Be Good to You & be Good to all others & make your own Life more valuable.

____________________________

# "*It is a strange windfall, that politics is an employment in India. In January 2018, Philippine President Rodrigo Dutarte came to India and after addressing the Indian Parliament, he started meeting Indian MPs and asked Indian MPs what do you do ?? (He asked two or three times)*

*Indian MPs did not understand what His Excellency the Philippines wanted to know.*

*Then he changed the question and asked what is your income source?*

*Almost all the MPs said that our income comes from politics, allowances, salary and pension are the only source of income.*

*Rodrigo Dutarte * was surprised that in a developing democratic system with such a large number of MPs, Ministers, Presidents are dependent only on salary and allowances and this money is collected from the public in tax.*

*He then smiled lightly and told the Indian MPs that he is a farmer by profession and the main source of his income is agriculture. He told that he reaches the farm every day at 5 in the morning and after settling his farm work, comes back at 9 o'clock and prepares for the office of the President and from 10 o'clock, the President of the country performs his duties.*

(Indian media never showed this news)
---------------------------
Under the above background,
Final Say:.....

# "The Politics of Family Dynasty":

"Bringing an end to rule of Family dynasty oriented political parties, with the hourable exception of BJP, seems to be the next right step forward for the political clean up, after bringing an end to alliance Raj in the country. It may take 2 or 3 more rounds of elections in the states, to happen.

But this is what's most desirable, considering the fact that no where in the World, is there a trend of dynastic Politics. Weaknesses of dynastic politics are obvious, as in that quality, capability and efficiency are compromised. Study of hierarchy shows that siblings of great personalities more often than not happen to be just mediocre and less worthy.

The driving forces, the undercurrents for the quest for development, continous improvement, in the long run are bound to make this happen in the nearest future. India's dream of being a Super Power in the World will not be then far away.

Sudhakar Natu
P.S.
Pl do open and read interesting articles..........

save and share
the following link of my blog.......
Of my blog

http://moonsungrandson.blogspot.com

And....
Subscribe My channel on you tube
moonsun grandson
Open this lInk
to see variety of videos......

https://www.youtube.com/user/SDNatu

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

"Social Medium: 'A Gymnasium for Lateral thinking-2.":

 "Social Medium: 'A Gymnasium for Lateral thinking-2.":


For me social medium is an open Platform for polishing one’s innovative creative ability & 
I call the social media as a Gymnasium for Lateral thinking..

I am therefore pleased to share here few Gems of my innovative & interesting thinking from my SM postings and I am sure they too would make you think & introspect.....

"The Victory Spots.":

"Successes and failures come and go, that's the way Life is all about. Failures need to be welcome because they are the best teahers for you, that compel you to fight back, to bounce back and in all the probabilities bring the very best in you to regain the lost grounds.

Your outstanding achievements, I call them as Victory Spots, need to be recalled once a while and re-experienced from time to time. That unique habit of mine has always kept me on tows, gjven the energy to walk that extra mile in the hour of tough challenges...

# "Puzzle of Marriage":

It's a Well said Fact that, 'Marriages are made in the heaven'. How come, otherwise, two aspiring youngsters come together like an unavoidable magnetic force from anywhere, to spend rest of their Lives together!

I am sure almost every husband/wife can introspect and wld confirm the above Fact about their marriage. On the hind sight, my observation to this puzzle is: 'Is it the unavoidable culmination of their unfulfilled passion and desire from the past birth/births, for one another?

# Multy Tasking?:

Happened to see a film recently. It was an attempt to focus on the wide gap between the two generations. 'Each his own freedom' seems to be forgotten by the head of this (broken) joint family.

While on seeing the film, I noticed few spectators contnueing on their mobiles and with the light rays creating nuisence to others. 'What kind of multy tasking' is this!

Most of such fellows appear to have forgotten the Noble Mantra-'If you can't do good of others, at list don't act to do harm to them'. And you find such fellows almost everywhere, no point in giving examples.

# "The Road Map.":

The message now is obvious and clear: Identify the very purpose of your Life; Don't disclose it to any one, keep it to all by yourself, Like your soul is within your body.

Have a Road Map to walk for it. Remember it's an ever ongoing journey now on to fulfill our existance, which would offer you peace, contentment and self-realization.

# Silence is Bliss. Slow and Steady wins the Race. But Alas, when one looks around, Every one seems to be in hurry- Looks like, it is a Mad, Mad World.

# "The Quality Time.":

Days come and Pass by-Time flies. But out of 24 hrs of a day, what is the Quality Time, v spend? QT is the time, which gives one, inner satisfaction and contentment. Reading, Entertainment Programs, Social Work, Travelling bewing with the dear ones, etc. are few such activities that can bring about QT for u.

After all, how long one lives, is not as important but how well, decides the Quality of Life.

# "Self Introspection: Looking Within":

Confusion & options are inversely proportional. The game of Expectations-Options-Confusion goes on in Life continuously. In a given environment, out of available options you make a choice & take action/s accordingly, Results occur.

While at any given situation, your specific expectation, the expected Results are definite but most of the times due to your confusion to make Right choice out of the options, you get some unwanted, unexpected Results.

To make a Right Choice out of options & to take Right Action/s at Right Time is an art and your rate of Success or Failure in Life is dependent on this very skill of making a Right Choice. For that you need to have confidence, conviction in your way of outlook & thinking.

Finally, remember, in all this ever changing environment Results are not in your Hands and that's what Luck is All about. And Your Thoughts determine your destiny, with some assistance from the Lady Luck !

Frankly, this kind of self introspection & thoughtful exploration of the experience of different events is my regular habit. This gets converted with such play of Words that serves as a creative exercise for me-the exercise, I find so essential for my engagement as Free Lance Writer. 

Sudhakar Natu

P.S.
Pl do open and read interesting articles..........

save and share
the following link of my blog.......
Of my blog

http://moonsungrandson.blogspot.com

And....
Subscribe My channel on you tube
moonsun grandson
Open this lInk
to see variety of videos......

https://www.youtube.com/user/SDNatu

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

"बहरलेला पारिजातक": "आनंद घ्या आनंद द्या":


°बहरलेला पारिजातक":
आनंद घ्या आनंद द्या":

योगायोगाची मला गंमत वाटते. कालच "हृदयसंवाद" या मालिकेमधील "सुख, सुख म्हणजे काय असतं? यासंबंधी एक व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आणि एक लेख माझ्या ब्लॉगवर प्रदर्शित केला होता. त्यांचा मतितार्थ एवढाच होता कीः
"सध्याच्या बदलत्या कसोटीच्या काळामध्ये, प्रत्येकाने आपल्यासाठी सुख आनंद वा समाधान म्हणजे काय असतं, हे ज्याचं त्याने शोधावं आणि मिळवावं हा."

आणि आजची गंमत अशी झाली की, मोबाईलमधील जुने whatapp वरील संदेश साफ करताना, एका व्हिडिओने माझे लक्ष वेधले. हा व्हिडिओ# मी कदाचित आधी उघडून बघितलाही नव्हता. म्हणून कुतूहलाने उघडला व पहातच राहिलो, अगदी शेवटपर्यंत. कुणाच्या रिटायरमेंटचे वेळी केलेले ते भाषण होते. वक्ता कोण आहे माहीत नाही. पण विचार छान मांडले होते. सर्वांनी आवर्जून बघावे, ते सर्व मुद्देसूद तर होतेच, पण भविष्यात सर्वांना उपयुक्त असंच पुष्कळ त्यात मला गंवसलं..! ☝🏻

त्यामधील ते दिलखुलास संभाषण, मला विलक्षण इतके परिणामकारक व प्रेरणादायी भासले की,
त्यामुळे मला वाटलं की, हा जो आनंद मला हे पाहताना आणि ऐकताना मिळाला, तो इतरांना द्यावा. ताबडतोब मी माझ्या संग्रहातील समवयस्क ज्येष्ठ व्यक्तींना मी तो विडीओ शेअरही केला. ते करत असताना मला जणु एखादे पुण्यक्रुत्यच आपण करत आहोत, असं काही वाटून गेलं. सहाजिकच या मनोगताचं शीर्षक "बहरलेला पारिजातक": "आनंद घ्या आनंद द्या" असं सुचून गेलं.

तुमचे कुतूहल जास्त न चाळवता ह्या विडीओतील सार येथे मांडण्याचा यत्न करतो:

"उपजीविका व जीविका ह्यांनी आपले जीवन बनते. आपण आपलं जीवन जगण्यासाठी, जे जे करतो ती उपजीविका, तर जीविका म्हणजे चवीने, समाधानानाने कसं जगावं, यासाठी जे जे करायचं अनुभवायचं ते म्हणजे जीविका. अर्थातच जीविका म्हणजे एखादी कुठलीही कला, ती जर तुमच्या अंगी असेल, तर तुम्हाला त्यामधून जे समाधान, जो आनंद मिळतो, तो अवर्णनीय असतो." हे मांडणारं ते संभाषण.

मी आत्तापर्यंत स्वतः निर्मिलेला संदेश लेख वा विडीओज् इतरांना वाटत आलो, ते ह्या हेतूने की, "जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना द्यावे" या उद्देशाने. पण अशा आगळ्यावेगळ्या व्हिडीओमुळे मला असं जाणवलं की आपल्याला असा इतरांच्या निर्मितीमधूनही जो आनंद मिळू शकतो, तो आनंददेखील इतरांमध्ये अधूनमधून वाटायला हवा, कारण यात एक वेगळेच सुख वा समाधान आहे.

कदाचित माझा हा त्या दृष्टीने दुसरा उपक्रम म्हणावा लागेल. पहिला जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सुमधुर वैभवशाली संगीताची सुरबहार एखाद्या अप्रतिम गीताद्वारे, शेअर करून मी 'गाए चला जा' ह्या माझ्या आनंद देण्याच्या प्रक्रियेत नुकतेच सुरू केला आहे.

सरते शेवटी मुद्दा हा की, सुख वा आनंद कुठे दुसरीकडे शोधायला लागत नाही, तर जे जे काही आपल्याबरोबर घडत असतं, आपण क्षणोक्षणी जे जे अनुभवत असतो, त्यातून आपल्याला मिळवता येतं. हा साक्षात्कार मला आज झाला. तो मी इथे असा उलगडला. तुम्ही देखील असेच तुम्हाला भावणारे सुखद क्षण असेच टिपायला शिका व ते वाटत जा. त्यामुळे ते द्विगुणित होतील, यात शंकाच नाही.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता. क. 

असेच प्रेरणादायी लेख.......
नेहमी वाचण्यासाठी...........
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडा..........
संग्रही ठेवा....शेअरही जरुर करा.....

http://moonsungrandson.blogspot.com

ह्या शिवाय...
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चँनेल Subscribe ही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

"हृदय संवाद-३२" "सुख, सुख म्हणजे काय असतं?:


"हृदय संवाद-३२" "सुख, सुख म्हणजे नक्की काय असतं?:

पुष्कळवेळा अचानक आपल्याला कुठेतरी काहीतरी वाचलेलं आठवतं आणि एकंदरच मनाची विचार करायची जी काही पद्धत असते ती आमूलाग्र बदलून जाते. माझं आज तसंच झालं. गेल्या आठवड्यात पेपरमध्ये वाचलेले, अचानक माझ्या ध्यानात आलं. प्रारंभीच त्याचा मला आठवणारा व मनापासून रूचलेला गोषवारा येथे सांगतो. त्याचा अंतर्मुख होऊन तुम्ही विचार जरुर करा:

"सर्वसाधारणपणे आपल्या सुखाच्या व्याख्या ह्या आजपर्यंत ठरलेल्या होत्या, सुख आनंद, आनंद म्हणजे काय तर भेटीगांठी, पार्ट्या व हॉटेलिंग करणे, चित्रपट वा नाटकाला जाणं किंवा एखाद्या लग्न, मुंज वाढदिवस समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमाला सहपरिवार जाणं किंवा पर्यटनाला एखाद्या चांगल्या नव्या ठिकाणी जाऊन निसर्गरम्यतेचा अनुभव घेणे, ही ठराविक पद्धती म्हणजेच सुखाचा अनुभव वा आनंदमयी जीवन अशीच आपली आतापर्यंत कल्पना झाली होती. ती तशीच मनात रुजून बसली होती.

पण भयानक असे कोरोनाचे महासंकट अवचितपणे आपल्याला विळखा मारुन बसले. त्यामुळे आता वर्तमानात सगळेच संदर्भ बदलल्यामुळे सुख म्हणजे खरं काय असतं, असूं शकतं हा विचार पुन्हा अगदी मनाची कोरी पाटी ठेऊन करावयाची वेळ आली आहे. कारण आपण आनंद म्हणून आत्तापर्यंत जे समजत वा करत होतो, ते जवळजवळ अशक्यच आहे, निदान नजिकच्या वर्षभरात तरी."

अशा तर्‍हेचा काही ना काही तरी अर्थ निघावा, असा तो त्या वर्तमानपत्रातल्या मजकूर होता. तो खरोखर न विसरण्याजोगाच व सध्याच्या काळात आपण प्रत्येकाने मनात ठेवावा असाच आहे असं मला वाटलं, अन् म्हणूनच आज मी इथे व्यक्त केला इतकेच.

खरंच सुख सुख वा आनंद म्हणजे काय? ते आता आपण आपल्या कुटुंबात चार भिंतीत कोंडून घेतल्यासारखे जीवन जगत असताना, शोधायला हवं, ही आपल्याला जणू काही नवी दृष्टी मिळाली आहे, असंच काहीतरी झालंय असं मला वाटतं. हा सुखाचा शोध तर नक्कीच घ्यायला हवा, की आपल्याला सुख म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? अर्थात हे ज्याचं त्याने आपापल्या परीने आपापल्या कुवतीप्रमाणे आणि आपल्या एकंदर जीवनानुभवाचे पार्श्वभूमीवर पहायला शिकायला हवे. आपले आपणच शोधायला हवे, पकडायला हवे असं मला वाटतं.

आता हे जे काही सारं, मी ओघाओघात लिहिलं आणि हे लिहिताना जी प्रक्रिया माझ्या मनाची झाली, तोही एक आनंददायी अनुभव आहे, असं मला नव्याने जाणवलं. कारण या साऱ्या शब्दमंथनातून काही ना काही तरी तुम्हाला नव्याने बघायला, वेगळा विचार करायला, मी कळत नकळत लावू शकलोय. हे व असेच नव्या द्रुष्टीचे, नव्या जाणीवांचे सुखाक्षण आपल्याला मिळत जाणार याची खात्री बाळगायला हवी.

सारांश, आज "फिरुनी नवे जन्मेन मी" हा विचार मनामनात मुरवायला हवा....

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच प्रेरणादायी लेख.......
नेहमी वाचण्यासाठी...........
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडा..........
संग्रही ठेवा....शेअरही जरुर करा.....

http://moonsungrandson.blogspot.com

ह्या शिवाय...
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चँनेल Subscribe ही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

"आजोबांचा बटवा-१२": "हा खेळ, सावल्यांचा !:

 "आजोबांचा बटवा-१२": "हा खेळ, सावल्यांचा !":

"स्टार प्रवाह" वरील "आई कुठे काय करते", ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.
संजना, अनिरुद्ध आणि अरुंधती ह्या त्रिकोणामधील एकमेकांच्या नात्याचे गुंते वाढत वाढत शेवटी अनिरुद्ध आणि संजनाचे अनैतिक संबंधांचे बिंग, अरूधंतीच्या देखत फुटल्यामुळे, परमोच्च बिंदू गांठलेल्या या मालिकेत खरोखर पुढे काय होणार याची उत्कंठा लागली आहे. मीही काही वेगळा नाही, त्यातून 'अरुंधती' 'अरुंधती' हे नाव त्यामुळे रोजच कानावर पडत असताना, मला अचानक लक्षात आलं, या नांवाशी माझा काहीतरी जुन्या एखाद्या आठवणीचा संबंध आहे.

सहाजिकच मला भूतकाळात थोडे डोकावून पाहावेसे वाटले आणि लक्षात आलं, मी
नागपुरहून बदली होऊन, जेव्हा चार दशकापूर्वी, मुंबईत परत आलो, त्यावेळेला नागपूरमधल्याच एका संपादकांकडून त्यांच्या 'अरुंधती' नांवाच्या मासिकासाठी चित्रपट, नाट्य अशा करमणूक क्षेत्रातील घडामोडी किंवा मुलाखती वा रसास्वाद विषयक काही लेखन नियमितपणे मी करावे असे सुचविणारे मला पत्र आले.

ही मला एक चांगली संधी वाटली आणि 'हा खेळ सावल्यांचा' हे माझे सदर त्या 'अरुंधती' मासिकात सुरू झाले. माझ्या एकंदर लेखन प्रवासाला नवी दिशा लाभली. तसे लहानपणापासून मला चित्रपटांचे प्रचंड वेड होते, मला आठवतं, किंग जाँर्ज शाळेत असताना दादरहून दर शनिवारी भारतमाता सिनेमा लालबाग, येथे असल्यामुळे
आणि तेथे मॅनेजर हे माझ्या आतेबहिणीचे यजमान असल्यामुळे, मी अधूनमधून शनिवारी शाळा सकाळची असायची किंवा दुपारची ती सुटल्यावर ट्राम किंवा बस पकडून भारत माताला जायचो. कारण आतेबहीणचे बिर्हाड थिएटरच्या मागेच होते. त्यामुळे मला शनिवारचा चित्रपट रविवारचा मॉर्निंग शो आणि पुन्हा थोडाफार दुपारचा पिक्चर बघून संध्याकाळी मी माझ्या घरी बसने येत असे, हा उपक्रम तीन-चार वर्षे तरी शाळेत असताना मी केला होता.

तेव्हापासून मला चित्रपटांचे जे वेड लागलं ते अगदी आत्तापर्यंत !. नंतर मी कॉलेजमध्ये असल्यापासून फिल्मफेअर, स्टारडस्ट इ.इ. फिल्मी नियतकालिकेच जास्त करून वाचायचो, तीही अगदी आत्ता आत्ता सत्तरीपर्यंत ! माझे इंग्रजी सुधारायला जसा Business Magazines नी हातभार लावला, तसाच ह्या फिल्मी नियतकालिकांनीही ! त्यामुळे चित्रपट, नाटक आदि एकंदर करमणूक क्षेत्राविषयी मला आवड निर्माण झाली ती कायमच. माझे ते "अरुंधती" मासिकातील नियमित सदरलेखन हा पुढील वाटचालीचा शुभारंभ होता.

त्या निमित्ताने मी नंतरही विविध मराठी मासिके, साप्ताहिके ह्यात चित्रपट नाट्य नंतर दूरदर्शन आल्यावर त्याविषयी विविध सदरलेखन तीन साडेतीन दशके करत आलो. ह्या क्षेत्रातील अनेक कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा मला योग आला. त्यापैकी दोन दिग्गज कलाकारांच्या मुलाखतींची आठवण खरोखर नोंद घेण्याजोगी आहे. कारण दोघांच्या मुलाखतीमधून त्यांचा करमणूक क्षेत्रातील सहभागाबद्दल जो विचार होता, तो खरोखर मार्गदर्शक व आदर्शवत होता. दोघांनीही मुलाखती दरम्यान योगाय़ोगाने म्हणालेले एक वाक्य माझ्या मनात अगदी ठसून गेलेले आहे. ते उदगार असे होते:

" मी व्यवसाय म्हणून ह्या करमणूक क्षेत्रात आहे, त्यामुळे माझी तब्येत आणि व्यक्तिमत्व सुदृढ उत्तम राखणं ही या क्षेत्रातील टिकाव धरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गरज आहे, नव्हे ते माझे कर्तव्य आहे. त्यामुळे नियमित व्यायाम खेळ आणि आरोग्य याची काळजी घेणं याला मी प्राधान्य देतो."

खरोखर कोणत्याही क्षेत्रातील माणसांनी विचार करावा आणि अंमलात आणावा असाच हा एकंदर दृष्टिकोन नाही कां? म्हणूनच मी तो आजतागायत विसरू शकलो नाही. 'you must first ask a question, "What business you are in" हे आपल्या व्यवस्थापन क्षेत्रातील महागुरु पीटर ड्रकर ह्यांचे वाक्य आहे. ते जणू काही ह्या दोन मान्यवर कलावंतांना माहीत असल्यासारखं त्यांनी आपआपल्या जीवनात अमलात आणलं होतं. दोघांचही करमणूक क्षेत्रातील असामान्य योगदान किती प्रदीर्घ आणि दर्जेदार होतं हे वेगळं सांगायला नको.

करमणूक क्षेत्रातील माझ्या साहित्यिक
मुसाफिरीबद्दल आठवण, 'अरुंधती' या नावावरून ही जशी झाली, अगदी तशीच एक पत्रव्यवहार विषयक आठवण ज्योतिष विषयावर माझं पुढील चार दशक जे लेखन झालं त्यासंबंधीही आहे. माझा विवाह विलक्षण योगायोगाने झाल्यानंतर, कां कशी कुणास ठाऊक, मला ज्योतिषाच्या अभ्यासाची गोडी लागली. तेव्हा मी नागपूरमध्ये होतो, अकोला येथील पंचांग कर्ते राजंदेकर
यांच्या व पुण्यातील भट ह्यांच्या ज्योतिष विषयावरील पुस्तकांवरून
तसेच बंगलोरहून प्रसिध्द होणार्या "Astrological Magazine किंवा इतर काही अभ्यास करून बर्‍यापैकी
ज्योतिषाचे ज्ञान, स्वतःचे स्वतः अभ्यास करून जणु एकलव्यासारखे मी मिळवू शकलो होतो. इंजिनिअरिंगमुळे माझा गणिताचा पाया पक्का असल्यामुळे पत्रिका बनवणे, महादशा काढणे वगैरे काही मला कठीण गेले नाही.

ह्या पार्श्वभूमीवर आता आपल्याला भरपूर काही ज्योतिषाबद्दल कळतं असं तेव्हा वाटून, मी पुण्याच्या "रोहिणी" मासिकाचे संस्थापक संपादक वसंत काणे यांना एक पत्र लिहिले की त्यांच्या मासिकातील वधुवर स्थळांना, एक उपयुक्त सेवा म्हणून पत्रिकाजुळणींचे मार्गदर्शन मी
त्यांच्यासाठी करू शकतो. त्या पत्राला, त्यांनी मला जे उत्तर पाठवले ते खरोखर मला नवी संधी देणारे ठरले. (त्यावेळेला इंटरनेट व इतर काही शीघ्र टपालसेवा नसल्यामुळे, ) त्यांनी पत्रोत्तरात लिहीले "माझी सुचना तशी चांगली आहे, परंतु व्यावहारिक दृष्ट्या, ती जमणे कठीण आहे, त्यापेक्षा तुम्ही रोहिणी मासिकासाठी ज्योतिषावर काही नियमीत मार्गदर्शक लिहित जा."

त्यानंतर "नियतीचा संकेत" ही अभ्यासपूर्ण लेखमाला मी रोहिणी मासिकात लिहीणे सुरू केले. तशीच १९७७ च्या रोहिणी दिवाळी अंकांमध्ये त्यांनी वार्षिक राशिभविष्य लिहिण्याची संधी मला दिली व नंतरही जवळ जवळ तीन दशके मी ते लेखन करत असे. त्याला नांवही मी समर्पक असेच दिले: "पुढचं पाऊल". तेव्हापासून आजतागायत, माझा ज्योतिषाचा अभ्यास आणि निमतकालिकांमध्ये राशिभविष्य लिहिणे, हा उपक्रम चालू आहे. त्यानंतर, मी व्यवस्थापनशास्त्र संख्याशास्त्र आणि ज्योतिष यांचा मिलाफ करून ग्रहबदलानुसार प्रत्येक राशीला, महत्त्वाचे ग्रह किती दिवस अनुकूल आहेत यावरून अनुकूल आधारित असे वस्तुनिष्ठ वार्षिक राशिभविष्य विकसित केले व ते उत्तरोत्तर लोकप्रिय होत आहे.

पत्र आणि त्यातून मला मिळालेल्या दोन गोष्टींच्या
संधी: "रंगांची दुनिया" करमणूक क्षेत्र आणि "नियतीचा संकेत" सारखं, वर्तमानात उद्याचा भविष्यकाळ काय?, हे आजमावणारं लेखनक्षेत्र मला खुलं झालं. ही "आठवणींची साठवण" जशी आहे, तशी मला वाटतं तुम्हालाही ती मनोरंजक वाटेल अशी आशा आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
विविध विषयांवरील, साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब save करुन ठेवा......

https://www.youtube.com/user/SDNatu

विडीओज् आवडले,
तर शेअरही करा.....

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

"मोबाईल एक, कल्पना अनेक-२":

 "मोबाईल एक, कल्पना अनेक-२":

व्हाँट्सअँपवर आपल्याला अनेक संदेश येत असतात, काही आवडतात, काही दुर्लक्षित केले जाऊ शकतात. त्यांतून एक अजून नवी कल्पना सुचली की आपल्या ब्लॉगवर लेखमाला सुरु करून त्यांत हे मनोज्ञ व विचारप्रवर्तक संदेश देणे मी सुरू केले. पहिला लेख भरघोस पसंतीचा ठरला, त्या बद्दल वाचकांचे आभार.
आता.......
वेळ कां घालवायचा?
शुभस्य शीघ्रम्....
आज हा त्या लेखमालेतील दुसरा लेख:
"मनाला भिडणारे forwrded संदेश whatsapp वरुन.......

( ज्या कुणी अज्ञात व्यक्तींनी हा संदेश निर्माण केला, त्यांना प्रथम प्रणाम व त्यांचे मनःपूर्वक आभार. )

1 अत्यंत अनमोल व संग्राह्य माहिती:

# *इसे पढ़े और सेव कर सुरक्षित कर लेवे। वाट्सअप पर ऐसी पोस्ट बहोत कम ही आती है।👇*
विश्व का सबसे बड़ा और वैज्ञानिक समय गणना तन्त्र (ऋषि मुनियो का अनुसंधान )
१.
"कालगणना:
■ क्रति = सैकन्ड का 34000 वाँ भाग
■ 1 त्रुति = सैकन्ड का 300 वाँ भाग
■ 2 त्रुति = 1 लव ,
■ 1 लव = 1 क्षण
■ 30 क्षण = 1 विपल ,
■ 60 विपल = 1 पल
■ 60 पल = 1 घड़ी (24 मिनट ) ,
■ 2.5 घड़ी = 1 होरा (घन्टा )
■ 24 होरा = 1 दिवस (दिन या वार) ,
■ 7 दिवस = 1 सप्ताह
■ 4 सप्ताह = 1 माह ,
■ 2 माह = 1 ऋतू
■ 6 ऋतू = 1 वर्ष ,
■ 100 वर्ष = 1 शताब्दी
■ 10 शताब्दी = 1 सहस्राब्दी ,
■ 432 सहस्राब्दी = 1 युग
■ 2 युग = 1 द्वापर युग ,
■ 3 युग = 1 त्रैता युग ,
■ 4 युग = सतयुग
■ सतयुग + त्रेतायुग + द्वापरयुग + कलियुग = 1 महायुग
■ 76 महायुग = मनवन्तर ,
■ 1000 महायुग = 1 कल्प
■ 1 नित्य प्रलय = 1 महायुग (धरती पर जीवन अन्त और फिर आरम्भ )
■ 1 नैमितिका प्रलय = 1 कल्प ।(देवों का अन्त और जन्म )
■ महाकाल = 730 कल्प ।(ब्राह्मा का अन्त और जन्म )

२.
सम्पूर्ण विश्व का सबसे बड़ा और वैज्ञानिक समय गणना तन्त्र यही है। जो हमारे देश भारत में बना। ये हमारा भारत जिस पर हमको गर्व है l
दो लिंग : नर और नारी ।
दो पक्ष : शुक्ल पक्ष और कृष्ण पक्ष।
दो पूजा : वैदिकी और तांत्रिकी (पुराणोक्त)।
दो अयन : उत्तरायन और दक्षिणायन।

३.
तीन देव : ब्रह्मा, विष्णु, शंकर।
तीन देवियाँ : महा सरस्वती, महा लक्ष्मी, महा गौरी।
तीन लोक : पृथ्वी, आकाश, पाताल।
तीन गुण : सत्वगुण, रजोगुण, तमोगुण।
तीन स्थिति : ठोस, द्रव, वायु।
तीन स्तर : प्रारंभ, मध्य, अंत।
तीन पड़ाव : बचपन, जवानी, बुढ़ापा।
तीन रचनाएँ : देव, दानव, मानव।
तीन अवस्था : जागृत, मृत, बेहोशी।
तीन काल : भूत, भविष्य, वर्तमान।
तीन नाड़ी : इडा, पिंगला, सुषुम्ना।
तीन संध्या : प्रात:, मध्याह्न, सायं।
तीन शक्ति : इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति, क्रियाशक्ति।

४.
चार धाम : बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम्, द्वारका।
चार मुनि : सनत, सनातन, सनंद, सनत कुमार।
चार वर्ण : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र।
चार निति : साम, दाम, दंड, भेद।
चार वेद : सामवेद, ॠग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद।
चार स्त्री : माता, पत्नी, बहन, पुत्री।
चार युग : सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग, कलयुग।
चार समय : सुबह, शाम, दिन, रात।
चार अप्सरा : उर्वशी, रंभा, मेनका, तिलोत्तमा।
चार गुरु : माता, पिता, शिक्षक, आध्यात्मिक गुरु।
चार प्राणी : जलचर, थलचर, नभचर, उभयचर।
चार जीव : अण्डज, पिंडज, स्वेदज, उद्भिज।
चार वाणी : ओम्कार्, अकार्, उकार, मकार्।
चार आश्रम : ब्रह्मचर्य, ग्राहस्थ, वानप्रस्थ, सन्यास।
चार भोज्य : खाद्य, पेय, लेह्य, चोष्य।
चार पुरुषार्थ : धर्म, अर्थ, काम, मोक्ष।
चार वाद्य : तत्, सुषिर, अवनद्व, घन।

५.
पाँच तत्व : पृथ्वी, आकाश, अग्नि, जल, वायु।
पाँच देवता : गणेश, दुर्गा, विष्णु, शंकर, सुर्य।
पाँच ज्ञानेन्द्रियाँ : आँख, नाक, कान, जीभ, त्वचा।
पाँच कर्म : रस, रुप, गंध, स्पर्श, ध्वनि।
पाँच उंगलियां : अँगूठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका, कनिष्ठा।
पाँच पूजा उपचार : गंध, पुष्प, धुप, दीप, नैवेद्य।
पाँच अमृत : दूध, दही, घी, शहद, शक्कर।
पाँच प्रेत : भूत, पिशाच, वैताल, कुष्मांड, ब्रह्मराक्षस।
पाँच स्वाद : मीठा, चर्खा, खट्टा, खारा, कड़वा।
पाँच वायु : प्राण, अपान, व्यान, उदान, समान।
पाँच इन्द्रियाँ : आँख, नाक, कान, जीभ, त्वचा, मन।
पाँच वटवृक्ष : सिद्धवट (उज्जैन), अक्षयवट (प्रयागराज), बोधिवट (बोधगया), वंशीवट (वृंदावन), साक्षीवट (गया)।
पाँच पत्ते : आम, पीपल, बरगद, गुलर, अशोक।
पाँच कन्या : अहिल्या, तारा, मंदोदरी, कुंती, द्रौपदी।

६.

छ: ॠतु : शीत, ग्रीष्म, वर्षा, शरद, बसंत, शिशिर।
छ: ज्ञान के अंग : शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द, ज्योतिष।
छ: कर्म : देवपूजा, गुरु उपासना, स्वाध्याय, संयम, तप, दान।
छ: दोष : काम, क्रोध, मद (घमंड), लोभ (लालच), मोह, आलस्य।

७.
सात छंद : गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, वृहती, पंक्ति, त्रिष्टुप, जगती।
सात स्वर : सा, रे, ग, म, प, ध, नि।
सात सुर : षडज्, ॠषभ्, गांधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद।
सात चक्र : सहस्त्रार, आज्ञा, विशुद्ध, अनाहत, मणिपुर, स्वाधिष्ठान, मुलाधार।
सात वार : रवि, सोम, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनि।
सात मिट्टी : गौशाला, घुड़साल, हाथीसाल, राजद्वार, बाम्बी की मिट्टी, नदी संगम, तालाब।
सात महाद्वीप : जम्बुद्वीप (एशिया), प्लक्षद्वीप, शाल्मलीद्वीप, कुशद्वीप, क्रौंचद्वीप, शाकद्वीप, पुष्करद्वीप।
सात ॠषि : वशिष्ठ, विश्वामित्र, कण्व, भारद्वाज, अत्रि, वामदेव, शौनक।
सात ॠषि : वशिष्ठ, कश्यप, अत्रि, जमदग्नि, गौतम, विश्वामित्र, भारद्वाज।
सात धातु (शारीरिक) : रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, वीर्य।
सात रंग : बैंगनी, जामुनी, नीला, हरा, पीला, नारंगी, लाल।
सात पाताल : अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताल।
सात पुरी : मथुरा, हरिद्वार, काशी, अयोध्या, उज्जैन, द्वारका, काञ्ची।
सात धान्य : उड़द, गेहूँ, चना, चांवल, जौ, मूँग, बाजरा।

८.
आठ मातृका : ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, ऐन्द्री, वाराही, नारसिंही, चामुंडा।
आठ लक्ष्मी : आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी।
आठ वसु : अप (अह:/अयज), ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्युष, प्रभास।
आठ सिद्धि : अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व।
आठ धातु : सोना, चांदी, ताम्बा, सीसा जस्ता, टिन, लोहा, पारा।

९.
नवदुर्गा : शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कुष्मांडा, स्कन्दमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री।
नवग्रह : सुर्य, चन्द्रमा, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु, केतु।
नवरत्न : हीरा, पन्ना, मोती, माणिक, मूंगा, पुखराज, नीलम, गोमेद, लहसुनिया।
नवनिधि : पद्मनिधि, महापद्मनिधि, नीलनिधि, मुकुंदनिधि, नंदनिधि, मकरनिधि, कच्छपनिधि, शंखनिधि, खर्व/मिश्र निधि।

१०.
दस महाविद्या : काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्तिका, धूमावती, बगलामुखी, मातंगी, कमला।
दस दिशाएँ : पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैॠत्य, वायव्य, ईशान, ऊपर, नीचे।
दस दिक्पाल : इन्द्र, अग्नि, यमराज, नैॠिति, वरुण, वायुदेव, कुबेर, ईशान, ब्रह्मा, अनंत।
दस अवतार (विष्णुजी) : मत्स्य, कच्छप, वाराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्कि।
दस सति : सावित्री, अनुसुइया, मंदोदरी, तुलसी, द्रौपदी, गांधारी, सीता, दमयन्ती, सुलक्षणा, अरुंधती।

उक्त जानकारी शास्त्रोक्त 📚 आधार पर... हैं ।
यह आपको पसंद आया हो तो इस महान भारतीय सनातन का ज्ञान भण्डार अपने बच्चों को समझाएं एंव अपने बन्धुओं को भी शेयर जरूर कर अनुग्रहित अवश्य करें यह संस्कार का कुछ हिस्सा हैं।
फिर देखो आनंद ही आनंद है।
---------------------------
हा हिंदी भाषेतील प्रदीर्घ संदेश आपल्या वैभवशाली इतिहासाची व विविध क्षेत्रातील योगदानाचा अभिमान वाटावा असाच आहे, नाही कां? मला तो गवसला हे माझे भाग्य.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चेनेल Subscribe ही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

त्यासंबंधी एक प्रातिनिधिक प्रतिसाद:
"तुमचे विडीओज् जरुर पाठवत रहा.
ते खूप छान असतात.
कोणालाही समजेल,
अशा सोप्या भाषेत असतात.
धन्यवाद."

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

"मोबाईल एक, कल्पना अनेक":

 "मोबाईल एक, कल्पना अनेक":

व्हाँट्सअँपवर आपल्याला अनेक संदेश येत असतात, काही आवडतात, काही दुर्लक्षित केले जाऊ शकतात. नंतर खूप दिवसांनी  व्हाँट्सअँपवर विविध प्रकारची माहिती फोटो विडीओज्, ध्वनीफिती ह्यांची नको इतकी गर्दी जमा होते. अशा वेळेला मला आढळले की, आपल्या मोबाईलमध्ये जेवढी माहिती साठवण्याची क्षमता आहे, ती कमी कमी होत जात आहे. त्यामुळे ती whatsapp chats वरील माहिती, अधूनमधून साफ करण्याचा उद्योग मी नुकताच सुरु केला.

आज तोच उद्योग करत असताना, मला लक्षात आले की, अतिशय उत्तम, मनाला भिडणारे असे काही काही संदेश आपल्याकडून दुर्लक्षिले गेले आहेत, ते आपण कदाचित पुढे पाठवलेही नाहीत. ते बिचारे तसेच पडून आहेत. त्यामुळे मला अचानक एक कल्पना सुचली की, अधूनमधून ही संदेशांची भाऊगर्दी साफ करताना असे निवडक व कालातीत संग्राह्य संदेश एकत्र करत जायचे आपल्या मोबाईलच्या नोट पॅडवर !

नंतर जेव्हा केव्हा आपला वेळ जात नसेल तेव्हां विरंगुळा म्हणून काही वाचायचं असेल, तेव्हा ते उपयोगी पडू शकतात, किंवा अर्थातच आपल्याला त्यातील एखादा संदेश आपल्याला योग्य वाटतील अशा व्यक्तींना व्हाँट्सअप वर पुढे पाठवू शकतो. ही कल्पना मला आवडली. बघा तुम्हालाही आवडते कां?

करा बरे प्रयत्न तुम्हीही!

बघा हाच एक पुढे पाठविण्याजोगा एक बर्यापैकी दखल घेतली जाण्याजोगा संदेशच तयार झाला....

एवढे लिहून होते नाही तोच, त्यांतून एक अजून नवी कल्पना सुचली की आपल्या ब्लॉगवर लेखमाला सुरु करून त्यांत हे मनोज्ञ व विचारप्रवर्तक संदेश द्यावयाचे......

वेळ कां घालवायचा?
शुभस्य शीघ्रम्....

""मनाला भिडणारे forwrded संदेश whatsapp वरुन...."
( ज्या कुणी अज्ञात व्यक्तींनी हे संदेश निर्माण केले, त्यांना प्रथम प्रणाम व आभार. )

आज निवडलेले दोन संदेश असे...
1
# "
*✍️मीच मला सांगतो✍️**
*******************

*झाली सत्तरी,येईल पंच्याहत्तरी*
*करत नाही मी चिंता*
*प्रत्येक दिवस मजेत जगतो*
*वाढवत नाही गुंता*

*वय झालं म्हातारपण आलं*
*उगीच बोंबलत बसत नाही*
*विनाकारण बाम लावून*
*चादरीत तोंड खुपसत नाही*

*तुम्हीच सांगा खेळायला जायला*
*वयाचा संबध असतो का ?*
*नेहमी नेहमी घरात बसून*
*माणूस आनंदी दिसतो का ?*

*पोटा पाण्यासाठी पोरं*
*घर सोडून जाणारच*
*प्रत्येकाच्या आयुष्या मधे*
*असे रितेपण येणारच*

*करमत नाही करमत नाही*
*सारखे सारखे म्हणत नाही*
*मित्रां सोबत दिवस घालवतो*
*घरात कुढत बसत नाही*

*घरातल्या घरात वा बागेत*
*हिंडाय-फिरायला जातो*
*वय जरी वाढलं तरी*
*रोमँटिक गाणं ऐकतो*

*गुडघे गेले , कंबर गेली*
*नेहमी नेहमी कण्हत नाही*
*आता आपलं काय राहिलं*
*हे बोगस वाक्य म्हणत नाही*

*पिढी दर पिढी चाली रीतीत*
*थोडे फार बदल होणारच*
*पोरं पोरी त्यांच्या संसारात*
*कळत नकळत गुंतणारच*

*तू-तू , मैं-मैं  , जास्त अपेक्षा*
*कुणाकडूनही करत नाही*
*मस्तपैकी जगायचं सोडून*
*रोज रोज थोडं मरत नाही*

*स्वतःलाच समजून घेतो*
*पुढे पुढे चालत राहतोे*
*वास्तू तथास्तु म्हणत असते*
*हे उमजुन मी जास्तीच जगत असतोb*


_*💐🙏(सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ मंडळींना समर्पित) 🙏💐*_
________________________
2.
# "एक राजाला चार राण्या होत्या, पहिली राणी इतकी सुंदर होती! कि तो तिला फक्त प्रेमाने बघत रहायचा?
❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!
❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा ?
❕चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!!
❕राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणी म्हणाला, "मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?"
❕राणी म्हणाली मी तुला इथेच सोडुन देणार आहे.
❕राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली, "मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही.
❕राजाला अपारं दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, "तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ?
❕तिसरी राणी म्हणाली, "मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे, तुमच्याजवळ रहाणार नाही.
❕आता मात्र राजाच्या दुखाःला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे पुर्ण जीवन घालवले! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ?
❕माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकटं वेळ, पैसा, आयुष्य खर्च केले?
❕तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हते? तिला अंगभर कपडे नव्हते की, तिच्या अंगावर मुठभर मांस नव्हते कि, दागिने नव्हते.
❕ती म्हणाली, "तुम्ही जाल तिकडे येईल. नरकात असो की स्वर्गात, कोणत्याही प्रकारच्या जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हास वचनं आहे.
❕राजा थक्कं होऊन समोर पहात राहिला, विचार करू लागला कि,जीला मी प्रेम सोडा, साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, ना पुर्ण आयुष्यात जिचा कधी एक क्षणभर काळजी केली.
❕ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे? राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्यागं केला.
❕कोण होता तो राजा? कोण होत्या त्या तीन राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला..?
❕त्या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही, पण तरीही एवढा त्याग का केला..
❕तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसुन स्वतः आपणच आहोत.
🔸आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरचं सोडते ते म्हणजे आपले *शरीर* ज्याला आपण आयुष्यभर बघत रहातो.
🔸आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते, ते आपली मुले, आप्तेष्ट, मित्र थोडक्यात *समाज.*
🔸आपली तिसरी राणी, जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते म्हणजे, *धन-पैसा* आपल्या मृत्युनंतर आपली
लगेच दुसऱ्याची होते.
🔸 आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे *पुण्यकर्म* जे आपण सदभावनेने नि:स्वार्थपणे,आणि विणा अहंकाराने केले. जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ नाही, तरीपण जन्मोजन्मी आपल्याबरोबर येतचं असते...!

एक चांगला विचार.....करा विचार !

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चेनेल Subscribe ही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

त्यासंबंधी एक प्रातिनिधिक प्रतिसाद:
"तुमचे विडीओज् जरुर पाठवत रहा.
ते खूप छान असतात.
कोणालाही समजेल,
अशा सोप्या भाषेत असतात.
धन्यवाद."

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

"वाचा फुला आणि फुलवा-९": "कल्पनाशक्तीची व्यायामशाळा !":

 

"सर्जनशील आविष्कार":
मी whatsapp व फेसबुक हे सोशल मिडिया म्हणजे कल्पनाशक्ती व्रुद्धिंगत करणारी व्यायामशाळाच आहे, असं मानतो.

मी सहाजिकच अशा 'शक्तीशाली' संदेश सातत्याने निर्माण करायचा उद्योग करत असतो. सिग्रेटची तल्लफ आल्यावर सिग्रेट ओढणार्याला जसं क्रुतक्रुत्य झाल्यासारखं वाटत असेल तसं काही तरी मी ह्या सर्जनशीलतेमुळे मिळवत बसतो. हा पुढील विविध 'शब्दच्छल' त्याच कक्षेतील:

# "तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार!":

आपणच, वेळोवेळी घेतलेले निर्णय व कृती ह्यामुळे, आपले चांगले वा वाईट करत असतो.

माझ्या एका मित्राची ही गोष्ट आहे. SSC नंतर Science ला पहिल्या वर्षाला ७७% गुण त्याने मिळवल्याने इंटरसाठी त्याचा अभ्यास अधिक चांगला व्हावा, म्हणून वडिलांनी त्याला हॅास्टेलवर ठेवले. पण तेथे तो अभ्यास न करता तासन् तास मित्रांशी गप्पा वा कुठला ना कुठला खेळ खेळणे ह्यात वेळ घालवाव़याचा. एवढे पुरे नाहीं म्हणून की काय, तो काॅलेजमधे गणिताचे तास बुडवायचा.

ह्या सार्याचा परिणाम ह्या हुशार मुलाला इंटरला जेमतेम दुसरा वर्ग मिळण्यात झाला. पुढे पदवीपरिक्षेत तर तिसरा वर्ग मिळून त्याच्यावर अखेर कारकुनी करायची वेळ आली. जे खरं म्हणजे, अंगभूत हुशारीने इंजिनिअरिंग पदवी मिळवून, त्याच्या लायकीचे उच्चस्तरीय जीवन त्याला मिळू शकले असते, ते जावून त्याचे जीवन खडतर बनले. वडिलांनी दिलेली सुवर्णसंधी त्याने आपल्या चुकीच्या वागण्याने मातीमोल केली, निराश होत नशिबाला बोल लावत तो दिवस ढकलत राहीला.

सिगरेट किंवा दारू अशा अनिष्ट व्यसनांमुळे अकाली मरण येऊन कुटुंबाची दुर्दशा करणारे अनेकजण आपण पहातो. पत्ते जुगार ह्यापा़यी सोऩ्यासारखे जीवन वाया घालवून, भीकेला गेलेली माणसेही दिसतात. वेळोवेळी आपल्या आरोग्याला न जपता, डाँक्टरकडे जाणे टाळल्यामुळे दुर्धर रोगाची शिकार झालेलीही उदाहरणे आपल्या माहितीची आहेत. तसेच नोकरीतही कामचुकारपणा वा आपल्या वागण्यामुळे करीयरचे नुक़सान करून घेणारे अशांचीही हीच कथा!

सारांश 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे कुणी म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. आपला वर्तमानकाळच आपले भवितव्य घडवत असतो!

# वाचनासारखा दुसरा कुठला छंद नाही. वाचता वाचता आपणही स्वत:शी संवाद कळत, न कळत करत रहातो, आपलेही अनुभव पडताळून पहातो. नवीन माहिती वा knowledge तर मिळतेच, पण माणसांचे स्वभाव, भाव भावना ह्यांचेही चित्र, विविध वाचनातून उभे रहाते.

पण आज संगणक,मोबाईल ह्यामुळे माहितीचा महासागर, बोटाच्या एका क्लिकवर मिळत असल्याने, हातात एखादे पुस्तक घेवून ते वाचायचे कुणी कष्ट घेत नाही. शिवाय जीवन अधिक धकाधकीचे, स्पर्धेचे झाले आहे. सहाजिकच सारे वेगाने, झटपट हवे असते आणि ते नवतंत्राच्याद्वारे मिळू शकते. वर्तमानपत्रे,पुस्तके, काय अडले,ते ते संगणक वा मोबाईलवर उपलब्ध असते. म्हणूनच आजकाल वाचनालयांचे सभासद प्रौढ माणसेच असलेली दिसतात. फेस बूक, वाँटस् अँप अशासारख्या सोशल मेडीयामुळे तर सर्वांना अक्षरश: वेड लावले आहे. सहाजिकच वाचनसंस्कृती हळू हळू कमी होत चालली आहे. हे चांगले नव्हे. माणसाला स्वतंत्रपणे विचार करायला लावणारी वाचनाची सवय इतिहासजमा होण्याचा धोका आहे.'

# तंत्रज्ञानाच्या किमयेमुळे मर्मबंधांतील दिग्गजांच्या, सुरेल सुमधुर स्वरांच्या ठेवी,
काळावर मात करून पुनश्च अनुभवता येतात!

# "निंदकाचे घर असावे शेजारी"!:
टीका करणे ही देखील उपयुक्त निर्मितीच नव्हे कां? कारण टीका करताना साधक बाधक दोन्हीचा विचार करून वास्तवतेचे पारदर्शी चित्र उभे केले जाते. जशी गरज, ही शोधाची अर्थात नवनिर्मितीची जननी, त्याचप्रमाणे टीका ही प्रगतीच्या बदलाची जननी असते.

टीका खुल्या दिलाने स्विकारणारेच सुधारणेचे नवनवे मार्ग खुले करू शकतात. दुर्दैवाने टीका पचविणारे दुर्मिळ असतात. म्हणूनच जैसे थे अथवा पिछेहाट अपरिहार्य असते. उगाच नाही, संत तुकाराम म्हणतात "निंदकाचे घर असावे शेजारी"!

# "कधी नव्हे ती आता सज्जन, संयमी, सुजाण व सुसंस्क्रुत नागरिक घडविण्याची अत्यावश्यकता अधोरेखीत होत आहे,
कारण तोच शाश्वत विकास!"

# अचानक त्या रात्री, स्वप्नात ‘तेयुश’ हा शब्द येत राहिला होता. जहाल तेजाब मधला ‘ते’ आणि आयु मधला ‘यु’ , प्रकाशातला ‘श’, हयांचा तो अदृश्य मिलाफ आहे हे जाणवले आणि वीज चमकावी तसे हे कोडे उलगडले़.

जीवनात सतत वरिष्ठवर्ग कनिष्ठांवर आपले विचार व निर्णय लादत आला आहे. बिचारा कनिष्ठ वर्ग निमूटपणे हा जाच सातत्याने सहन करत आला आहे. तेजाबातील जहालपणा घेऊन आपल्यावरील आजवरच्या होणार्या अन्यायाची जाणीव ही वीज चमकावी, अशी प्रकाशात आता येत आहे हा ‘तेयुश’ चा मतिता़र्थ असू शकतो.

विविध क्षेत्रात आर्थिक बौद्धिक वैचारिक भावनिक सामाजिक इ. इ. बाबतीत गुणात्मक असमानतेमुळे, अनेक उच्च कनिष्ठ गट निर्माण होत रहातात, भिन्न श्रेणी निर्माण होऊन वरचढपणाचे दबावाचे खेळही चालत रहातात. ह्यांचा अतिरेक झाला की, तो "तेयुश" अर्थात विद्रोह निर्माण करतो. सभोलताली जे घडत आहे त्याची ही पारदर्शी मीमांसा आहे.

"जगा आणि जगू देवूया", एकमेकांचा आत्मसम्मान जपूया. संयम आणि सहनशीलता अंगिकारूया. माणसामाणसांमधली कटूता दूर करून एकमेकांतली दरी मिटवूय. हाच ह्या विचारमंथनाचा संदेश आहे.

# ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, त्यांची अधिक चिंता न करणे शहाणपणाचे असते,
कारण
आपण ते बदल घडविणार्यांनाच बदलू शकतो!

# हलते फिरते,
अन् चालते बोलते रहाणं,
हे अती ज्येष्ठ नागरिकांचं,
खरंखुरं भाग्यच!

# कोणतंही काम, केव्हा व्हायचं असतं तेव्हाच ते पूर्ण होत असतं. हे आपण लक्षातच घेत नाही आणि उगाचच एखाद्या कामाबद्दल ते पूर्ण होईल की नाही, याची चिंता नेहमी वाहत असतो.

# प्रत्येकापाशी देण्याजोगे असे काही ना काही असतेच, असते.
जे देण्यामुळे आपल्याला आनंद होतो,
ते नेहमी देत रहावे.

# संशयातीत वर्तन ज्यांच्याकडून कायम अपेक्षित आहे, त्यांच्याबद्दल जेव्हा कुणी संशय निर्माण करतात,
तेव्हां दोघांची मोठी कसोटी असते.

# सत्य खरोखर काय आहे,
ते ज्याचे त्याला माहीत असते.
मुखवट्यांच्या आड,
ते एकमेकांपासून लपविण्याचा खेळखंडोबा मात्र नेहमीच चालतो!

# "असाही एक दिवस!":
एखादा दिवस असा येतो की, एका पाठोपाठ गोष्टी बिघडू लागतात. सकाळी पाहुणे गावी जाणार, तर धो धो पाऊस सरू झाला. वहान मिळणे कठीण झाले. घरी गँस सिलीडर रिकामा झाला व नवीन लावला, तर त्याचा गँस लिक होत होता. फोनाफोनी केल्यानंतर असाच कधीतरी एकदाचा, मेकँनिक आला व वाँल्व लिक होत आहे, हा सिलींडर वापरु नका असे सागून गेला. डिलरला फोन करुन करुन थकलो, तेव्हा कुठे नवीन सिलींडर घेवून माणूस आला. हे सारे ठीक होईतो कपडे धुण्याचे मशिन बिघडले. त्याचा मेकँनिक येतो कधी ती वाट पहावी लागली. विसावा महणून चहा गरम करायला घेतला तर ओव्हनचा नन्ना. काही कामाचे कागद प्रिंटरवर छापायला गेलो, तर कार्ट्रीजची शाई संपलेली. अखेर कुणाला तरी फोन करावा तर फोनची बँटरी आऊट व चार्ज करताना फोन गरम.....

# "बोल-अबोल":
बोलता येतं, म्हणून माणसं आयुष्यभर नको इतकं बोल बोल बोलतात. सहाजिकच, जग त्यांना बोल लावल्याशिवाय रहात नाही. आपल्याच करणीनं, अशी माणसं कमावलेलं गमावूनही जातात.

गरजेचं, जरूरीचं असेल, तेव्हांच व तेवढंच बोलायचं, हे ज्यांंना समजतं, अशी माणसं मात्र दुर्दैवाने शोधावी लागतात. बोलण्याचं महत्व, बोलती बंद झाल्याशिवाय कळत नाही. भावना, विचार व्यक्त करण्याची ही शक्ती नष्ट होणं, हे अंधत्वानंतरचं सर्वात मोठं दु:ख!

# जन्म आणि मरण ह्यांत,
असतं फक्त एका श्वासाचं अंतर.
तर, आवडणारा संदेश आणि दखलच न घेतला जाणारा संदेशामध्ये काय असूं शकतं?

# समस्या तसेच गरजा, नेहमी आव्हान उभे करतात. नवकल्पना निर्माण होतात,अशाच आव्हानांतून सुचतात. छोट्या बदलातून अधिक फायदा वा सोय कशी होईल, हे प्रयत्नपूर्वक शोधणे, हयाकरता आपण जरूर काही वेळ रोज द्यावा आणि येथे ती कल्पना शेअर करावी, ही विनंती. निरीक्षणशक्ति, विचार आणि बुद्धि, ह्या जोडीला कल्पकता वापरून दैनंदिन जीवनात अधिक सुलभता व सोयी त्यामुळे निर्माण होऊ शकतील. विचारमंथनाला नवी दिशा देत, ह्या संदेश माध्यमाचा चांगला उपयोग, हा हेतु आहे.

#संघर्ष करणारे आपण एकटेच नसतो.
लहान थोर सारेच संघर्षयात्री असतात.
अडचणीच कर्तबगार माणसं घडवतात.

# अनेक सुलभ अँपस् उपलब्ध असूनही काहींचा, "सोमि" वर मराठी,
धेडगुजरी इंग्रजीतून लिहीण्याचा अट्टाहास कां?
इतका आळस बरा नव्हे!

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चेनेल Subscribe ही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

त्यासंबंधी एक प्रातिनिधिक प्रतिसाद:
"तुमचे विडीओज् जरुर पाठवत रहा.
ते खूप छान असतात.
कोणालाही समजेल,
अशा सोप्या भाषेत असतात.
धन्यवाद."


"टेलिरंजन-४": "काही ही, हं!":

 "टेलिरंजन-४": "काही ही, हं!":

टेलिव्हिजनवर, एखाद्या गोष्टीचा अतिरेक, हाच बहुदा मराठी मालिकांचा स्थायीभाव दिसतो. 'रंग माझा वेगळा' मधील उद्योजिका सौंदर्याचा काळ्या रंगाची नफरत करण्याचा कमालीचा अतिरेक किंवा 'आई कुठे काय करते' मधील आई, अरुंधतीचा कमालीचा अतिरेकी भोळेपणा, 'अग्गबाई सासुबाई' मधील आसावरीची बबड्यावरची अतिरेकी ममता, 'स्वामिनी' मधील आनंदीबाईंची कायमची अतिरेकी कपट कारस्थाने करण्याची प्रर्व्रुत्ती, आपण निमूटपणे पहात आलोच आहोत.

आता त्या सार्यांना साथ द्यायला, अत्यंत संथगतीने पुढे जाणार्या 'शुभमंगल आँनलाईन' मधील शंतनुच्या आईचा, मुलाचे लग्न एकदाचे कधी होणार, ह्या ध्यासाचा अतिरेक, गेला आठवडाभर पाहून अक्षरशः वीट आला. ही मालिका त्यामुळे सलगपणे पहाणे, अशक्यच झाले होते. ह्या सुरवातीपासूनच कंटाळवाण्या वाटणार्या मालिकेचे, नायकाचा विवाह होणे, एवढाच इवलासा जीव असलेले, कथानक कशी, किती दिवस तग धरेल हा प्रश्नच आहे.

मराठी मालिकांमध्ये अजून काय असतं, माहिती आहे कां? कोणत्याही गोष्टीची, इतकी काही अतिशयोक्ती करतात की, आपल्याला जे पटत नाही तसेच दाखवलं जातं. 'स्वामिनी' मध्ये लहानपणची रमाबाई, नको इतकी खोडकर बोलघेवडी आणि वाटेल तेव्हा वाटेल ते बोलणारी, त्यामुळे कठीण प्रसंग निर्माण करून घेणारी चिमखडी रमा, मोठी झाली की, ती इतकी लाजाळू व भीत्रट की पुन्हा त्याचमुळे कठीण प्रसंगांमधून त्रास. परत तीच गोष्ट माधवरावांची, तरुणपणी आता, बालपणचे रमेवरचे नितांत प्रेम विसरून जातात आणि मी नाही बाबा, रमा मला नको बाबा, असं म्हणून 'नाही मी बोलतं', काय म्हणायचं, एवढेच नाही तर ती त्यांच्या समोरही तीन महिने नको, असा हट्ट काय करायचा! मालिकेत केवळ नाट्यमयता येण्यासाठी असं कसही, काही ही दाखवायचं कां?

"अग्गबाई सासुबाई" मध्ये सोहमचे वागणे न पटल्यामुळे त्याची पत्नी, शुभ्रा तिचे मंगळसूत्र काढून ठेवते परंतु घर सोडून जात नाही. मागे जेव्हा असेच सोहमचे उफराटे वागणे झाले होते, तेव्हा आपल्या आई-वडिलांना घेऊन ती आली होती. आता ती तसे काहीही करत नाही. आपला नवरा चांगला नाही पूर्ण वाया गेलेला आहे, हे समजूनही तिचा तिथेच राहण्याचा अट्टाहास, हे म्हणजे काही ही हं झालं. मुळात ती अशा नालायकाच्या प्रेमातच कां व कशी पडली, हा प्रश्नच आहे. पण प्रेम आंधळं असतं, म्हणायचं. शिवाय तिची सासूबाई आसावरी देखील तिला आपलं मानत नाहीत, कारण तिने बबड्या बरोबरचे नाते तोडले. तरीही केवळ मालिका पुढे जावी, म्हणून शुभ्रा तिथेच ठिय्या मारून बसते, हे देखील काही ही हं, नाही कां?

ह्याच मालिकेत, बबड्या मित्राच्या एका नको त्या बोलण्यामुळे, चिडून आईने केलेले सगळे आँर्डरचे पदार्थ नष्ट करतो. त्यामुळे ज्या बायकांनी ऑर्डर दिली त्यांचा तगादा, आसावरी गांवी गेल्यामुळे, आता शुभ्राच्या मागे लागतो. तेव्हा तिच्या विनंतीवरून अभिजीत राजे सारा फराळ करून द्यायला मदतीला येतात. तेव्हा बबड्या त्यांचा आवाज ओळखत नाही आणि तो कुणीतरी पैसे मागायला आले असे समजतो. त्याला स्वतःला कोणाकडून त्याने पैसे घेतले तेही आठवत नाही. नकली घेणेकर्याच्या रुपाने आलेल्या-अभिजित राजेंना घरात प्रवेश मिळावा याकरता, शुभ्रा त्याला बेडरूममध्ये लपायला काय सांगते! नंतर बायकांच्या आँर्डर्स पुर्या करण्यासाठी रात्री बबड्याला स्वयंपाकघरात ढकलून लाडू काय वळायला लावतात ही दोघं! हे सगळं सगळं अक्षरश: न पटण्याजोगे आणि अर्थातच काहीही हं!

"शुभमंगल ऑनलाइन" मध्ये देखील, भाजी मार्केट मध्ये भेटलेल्या शर्वरीला अनुपमा लगेच बरोबर ओळखते! खरं म्हणजे तिला केवळ एकदा डिलिव्हरी द्यायला आलेली तेव्हा पाहिलेलं. बरं तर बरं, तिच्याबरोबर घरी स्कूटरने आल्यावर तिला घरात घेऊन अनुपमाकडून आग्रहाने तिचा पाहुणचार काय केला जातो ! शर्वरीदेखील आपलं काम सोडून भाजी वगैरे न घेता, इतर कामे न करता, सरळ यांच्याकडे येते काय आणि बडबड करत सगळ्यांची धमाल उडवून देते काय, सारं नवलच. सगळ्यात कळस म्हणजे निरोप घेऊन बाहेर जाताना रांगोळीच्या जवळ, शंतनुला ती सेल्फी काढायला काय लावते, वारे वा! असं कधीतरी शक्य आहे कां? काही तरी दाखवायचं म्हणून किती क्रिएटिव्ह लिबर्टी घेणार, याला मर्यादा?

शेवटचे उदाहरण. 'माझा होशील ना'? मालिकेत तर ठायी ठायी अतिशयोक्तीचे प्रसंग आहेत. पण त्यांतील कळस म्हणजे सईचे आदित्यने बक्षिस म्हणून दिलेल्या व नंतर हरवलेल्या रातराणी इअरिंगचा कचर्यांत वेड्यासारखे झपाटून सगळीकडे घेतलेला शोध घेणे, हा अतिशयोक्तीचा कळसच. काही ही हं!

शेवटी "काही ही हं!", दाखवणं हाच तर मालिकांचा फंडा असतो. प्रेक्षकांची पर्वा कोण करतो? त्यांना जणू काही डोकंच नसतं! अरे जरा तरी तर्काला धरून दाखवा की.

शेवटी जाता जाता, सर्व चँनेलस् वर ब्रेकमध्ये सेंकंद ते सेकंद त्याच वेळेला जाहिराती दाखवल्या जातात आणि सहाजिकच प्रेक्षकांच्या हातातल्या रिमोटला कोणताच अर्थ रहात नाही. हा प्रेक्षकांवर केवळ व्यावसायिक फायद्याला प्राधान्य देऊन सर्व वाहिन्या सांघिक अन्याय करतात नाही कां?

जाहिरातींच्या भाऊगर्दीत, बातम्यांमध्ये सकारात्मक गुंजभर, 'असेही तसेही', 'कसेही काही ही हंं! दाखवणार्या मालिका डोकेदुखीच! पर्याय काय?

सुधाकर नातू

"वागावे कसे? असे, की तसे?"........

You tube वरील
माझ्या moonsun grandson
ह्या चँनेलला आता दोन वर्षे पूर्ण झाली........
त्या निमित्ताने.......
भरघोस स्वागत झालेल्या......
विडीओज् पैकी, हा खास तुमच्यासाठी.......
लिंक उघडा व पहा.......

https://youtu.be/OIzPGQi-q3o

आवडला, तर हा चँनेल जरूर
subscribe करा....

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

"आजोबांचा बटवा-११": "चांगुलपणाची ऐशी तैशी":

 "आजोबांचा बटवा-११": "चांगुलपणाची ऐशी तैशी":

प्रत्येक माणसाचे एक विशिष्ट व्यक्तिमत्त्वाचे असते, तशीच वागण्याची तर्हाही वेगवेगळी अशी चित्रविचित्र पद्धत असू शकते. प्रत्येकाच्या स्वभावाचे कंगोरे वेगळे असतात, कुणी अती बिनधास्त, तर कोणी चिकित्सक असतो. ह्याचे मनोरंजक दर्शन, खूप वर्षांपूर्वी मला "संवाद" हा ई टीव्हीवरील मुलाखत, चर्चावजा कार्यक्रम बघताना आला होता.

त्या कार्यक्रमात, देशपांडे नावाच्या एका लेखनिकाने, कै. बाबुराव पेंढारकरांच्या व्यवहारी दृष्टिकोनाविषयी जी आठवण सांगितली, ती खरोखर संस्मरणीय होती. तिचा मला जसा आठवतो तसा सारांश येथे प्रथम देतो:

"लेखनिक म्हणून देशपांड्यांना बाबूराव दर तासाला जाण्या-येण्याचे बसभाडे आणि शिवाय दोन तासांचे दहा रुपये देणार होते. जर देशपांडे येऊनही, काही कारणाने लेखनाचे काम झाले नाही, तर तासाचे अडीच रुपये दिले जाणार होते. हे इतके काटेकोर व्यवहार कमी आहेत म्हणून की काय, पण समजा एखाद्या दिवशी देशपांडे काही कारणामुळे, पेंढारकरांकडे येऊच शकले नाहीत, तरीही बाबुराव त्यांना अडीच रुपये देणार होते. हे न केलेल्या कामाचे अडीच रुपये कशा करता? या प्रश्नाचे बाबूरावांचे उत्तर खरोखरच मार्मिक व त्यांची व्यावहारिक दृष्टी दाखवणारे होते. "ते अडीच रुपये आपापसातील लेखनिक व लेखक ह्यांच्यामधील ऋणानुबंध जपण्यासाठी होते."

खरोखरच कमाल आहे ह्या माणुसकीची व चांगुलपणाची!

आज इतक्या वर्षांनंतर हा संदर्भ कां व कसा आठवला ते आता सांगतो.
कोरोना महामारीच्या महासंकटामुळे, लाँकडाऊनचे काळात घरोघरी घरकाम करणारे सेवक वा मोलकरणींना सुरक्षेच्या कारणास्तव बोलावले जात नव्हते. नंतर हळूहळू काही महिन्यांनंतर, ज्या वेळी त्यांना घरकाम करायला बोलावलं गलं, तेव्हा त्यांना ज्याने त्याने आपआपल्या मर्जीनुसार पूर्ण पगार वा निदान अर्धा पगार त्यांच्या गैरहजेरीबद्दल दिला.

अशी ही चांगुलपणाची साखळी आपण नेहमी पाहत असतो. कुणी ना कुणी कशा ना कशा प्रकारे एकमेकांना मदत करत असलेले आपल्याला दिसून येते. मात्र ह्याला छेद देणारी ही थोडीशी वेगळी गोष्ट आहे, अशाच एका जेष्ठ जोडप्याची. त्यांनी सहाजिकच आधीचे तीन चार महिने कोणताही धोका नको, म्हणून मोलकरणीला बोलावले नव्हते. परंतु नंतर तिची कामे करणे त्यांना वयोमानापायी अशक्य झाल्यावर, तिचा गैरहजेरीतील सर्व महिन्यांचा पगार दिला आणि त्याप्रमाणे ती काम करायला लागली. इतके महिने घरातली सगळी साफसफाई न झाल्याने ते काम आवश्यक होतं. साहाजिकच ती आल्यावर त्या जोडप्याने तिला पूर्ण घर साफ करायला सांगितले. तो महिना पूर्ण झाल्यावर नेहमीचा पगार तिला दिल्यावर, ती काय म्हणाली ते अगदी खेदजनक होते.

ती म्हणाली की "मला महिन्याचा पूर्ण पगार फक्त दिलात, पण सर्व घर साफ केलं त्याचे वेगळे पैसे तुम्ही दिले नाहीत!" खरे म्हणजे या जोडप्याने तिच्या गैरहजेरीचा पूर्ण पगार देण्याऐवजी तिला अर्धा पगार दिला असता, तरी चालण्यासारखे होते कारण लाँकडाऊन झाल्यावर तर ती सरळ गावालाच निघून गेली होती. तिच्या गैरहजेरीत, तिची कामे ह्या व्रुद्ध जोडप्यानेच केली होती. सहाजिकच अर्धा पगाराचीच तिने खरं म्हणजे अपेक्षा ठेवायला हवी होती. परंतु चांगुलपणा म्हणून त्या जोडप्याने सर्व महिन्यांचा पूर्ण पगार दिला होता, ह्याची थोडीतरी जाण तिने ठेवायला हवी होती.

ह्या गोष्टीतले तथ्य काय, तर अशा
मोलकरणीसारख्या काही लोकांना, फक्त त्यांच्या हक्कांची जाणीव असते, पण जबाबदारी वा कर्तव्याची नाही. खरं म्हणजे मालकाने गैरहजेरीबद्दल दाखविलेल्या चांगूलपणाची थोडीशी परतफेड समजून, आपले एक आवश्यक कर्तव्य म्हणून, तिनेही आपल्या वयोव्रुद्ध मालकाने सांगितलेले घर साफसफाईचे काम केल्यावर कसलीच अपेक्षा तिने ठेवायला नको होती. पण ती नको तेच बोलली, हे दुर्दैव्व. त्या ज्येष्ठ जोडप्याने दाखविलेल्या चांगुलपणाची ही अशी विपरीत परतफेड होती.

"चांगुलपणाची ऐशी की तैशी" असेच ह्या अनुभवावरुन म्हणायचे.

सुधाकर नातू

ता.क.
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चेनेल Subscribe ही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

"लाँकडाऊनचे कवित्व": "संसाराचा सारीपाट":

 "लाँकडाऊनचे कवित्व": "संसाराचा सारीपाट":

लाँकडाऊन सुरू होऊन नुकतेच २४ सप्टेंबरला सहा महिने पूर्ण झाले. कोरोनासारख्या महा संकटाने जगाला वेढा घातला असल्यामुळे, सारे जनजीवन ठप्प झालेले आपण पाहिले. जगाप्रमाणे आपल्या देशातही हा अनुभव खरोखर नवीन होता. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवसांचे कुतुहूल नाहीसे झाल्यावर, या सगळ्या प्रपाताचे काय काय भयंकर परिणाम होऊ शकतात, ते हळूहळू ध्यानात यायला लागले.( मास्कने )
तोंड दाबून (आणि चार भिंतींमध्ये कोंडून घेऊन)
बुक्क्यांचा मार, अशीच जणू स्थिती पाहता पाहता झाली. एक नवीनच जीवनशैली सगळ्यांनाच अंगीकारायला लागली. मास्क, सोशल डिस्टंसिंग, सँनटायझर, लॉंगडाऊन,
हेडशील्ड वा ppe असे अगदी नवीन शब्द तोंडी येऊ लागले आणि सगळ्यांच्याच पहाता अंगवळणी पडले.

कोरोनामुळे अत्यंत भयानक अशी अवस्था निर्माण झाली आहे की ज्येष्ठ नागरिक जणू असून नसल्यासारखेच होऊन गेले आहेत. कारण सगळ्यात जास्त धोका त्यांना असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी (कारण त्यांना बहुतेकांना काही ना काही प्रॉब्लेम काही ना काही तरी आणि ) त्यामुळे त्यांनी शक्यतो बाहेर जाऊ नये, अशीच अपेक्षा ठेवली जाते. जणू काही त्यांना तुरुंगात टाकल्यासारखे वाटू लागते. सहाजिकच म्हणून ज्येष्ठ नागरिक अक्षरशः जगाच्या दृष्टीने नकोसे झाल्यासारखे वाटायला लागतं.

आतापर्यंत बरं होतं, कुठेतरी कोपऱ्यात जगाच्या चक्री वादळाने नुकसान व्हायचं, किंवा कुठेतरी सुनामीमुळे हाहाःकार उडायचा, तर कुठे एखाद्या राज्यात देशात भूकंप अथवा इतर नैसर्गिक संकटांच्या बातम्या यायच्या. परंतु परदुःख शीतल याप्रमाणे फक्त बातम्या ऐकायच्या आणि काही दिवसांनी विसरल्या ही जायच्या. आपल्याला काय त्याचे, आपल्याला तर काही होत नाही ना, असं समजून बाकीचे जग पुढे जायचं. परंतु
कोरोनासारख्या महाविशाल महा संकटाने संबंध जगावर आपली काळी पाखर टाकल्यामुळे सगळे जण एकाच पातळीवर आणि समान अशा दुःखाच्या सागरात गटांगळ्या खात आहेत अशी अवस्था झाली आहे. त्यावर लस मिळत नाहीये किंवा तिला वेळ लागतोय, जालीम उपायाचे कुठलेही औषधही सध्या नाही. सर्वांवर त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती आलेली आहे.

समाजातील विविध स्तरावरील गटातील मंडळींची बिकट परिस्थिती आणि एकंदर आर्थिक विवंचना, त्याचबरोबर स्थलांतरित मजुरांचे हाल व
आपआपल्या गांवी त्यांचे जायचे प्रयत्न, ह्रदयाला पाझर फोडणारे होते. ती कष्टकारक चित्रे आपण बघितली. हळूहळू प्रत्येकजण बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ लागला.

माणूस हा खरोखर जात्याच झगडणारा आणि संकटांचा सामना करणारा प्राणी आहे, म्हणूनच जंगली अशा अश्मयुगांतून आजच्या आधुनिक युगापर्यंत तो येऊन पोचला आहे. परंतु जगाच्या इतिहासात कोरोनासारख्या अतिसूक्ष्म भस्मासूराचे हे पहिलेच असे उदाहरण असावे की, ज्याने पहाता पहाता साऱ्या जगावर आपले पाश फेकून त्याला अक्षरशः बंदीवान केले, त्याला आर्थिक दृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या मानसिकदृष्ट्या ही गलितगात्र केले.

अशा विदारक स्थितीपायी, एकंदर सर्वच वयोगटातील माणसांच्या जीवनात उलथापालथ झालेली आपण बघत आहोत. आपली आरोग्यव्यवस्था किती कमकुवत होती आणि आरोग्यासारख्या अति महत्त्वाच्या क्षेत्राकडे आपले गेल्या कित्येक वर्षात दुर्लक्ष झाले, त्याचे परिणाम आपण आता भोगत आहोत. दोन कोरोनाग्रस्तांनी सुरुवात झालेली, आता कोरोना ग्रस्तांची संख्या केवळ सहा महिन्यात देशात ६० लाखांच्या वर गेली आहे, लवकरच मरण पावलेल्यांची संख्या भारतामध्ये एक लाखाचा टप्पा पार पाडेल. सुरवातीला अगदी तळाला असलेला आपला देश, जगामध्ये लवकरच सर्वात जास्त कोरोनाग्रस्त अशा नागरिकांचा होईल अशी विचित्र चिन्हे दिसत आहेत. ह्या लेखात आम्ही विविध कौटुंबिक जीवनावर लाँकडाऊनचे आणि कोरोनाचे काय परिणाम झाले आहेत, त्याचा थोडक्यात आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे.

जन्मानंतर जर दुसरं काही वळण सगळ्यात महत्त्वाचं कुठलं असेल तर तो म्हणजे माणसाचा विवाह. दुसरी व्यक्ती त्याच्या जीवनात आल्यानंतर त्याच्या जीवनाचे रंग रूपच पूर्णपणे बदलून जाते आणि संसाराची जुगलबंदी सुरू होते.

संसारातली ही जुगलबंदी सुरु करण्यापूर्वी, माणूस जेव्हा विवाह करतो, त्या वेळेला फार तर पत्रिका, रंग रूप, शिक्षण नोकरी आर्थिक बाजू इत्यादी गोष्टी फार तर तपासतो आणि तो विवाह वेदीवर मोठ्या अपेक्षेने चढतो. जसजसे दिवस जातात तसतसे एकमेकांमध्ये जसे गुण आतापर्यंत लक्षात येतात, तसेच दोषही लक्षात येऊ लागतात. हा सर्व दूर सर्वकालीन सर्वांचाच अनुभव आहे.

सध्याच्या लॉकडाउनच्या काळामध्ये २४ तास एकमेकांच्या सहवासात राहायची वेळ आल्यामुळे, एकमेकांना समजून घेण्याची अधिक परीक्षा चालू आहे. विवाहापूर्वी काय पाहिले आणि अनेक काय पदरी पडले, याचा लेखाजोखा आपोआपच सगळ्यांना अगदी पारदर्शकतेने अनुभवायला मिळतोय. जीवनातले ताणतणाव वाढत जात असताना एकमेकांना सांभाळून कसे घ्यायचे, ही तारेवरची कसरत घरोघरी चालू आहे. अशावेळी विशेषतः जेष्ठ नागरिकांच्या संसारात तर तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, अशा अनेक घटना घडत असलेल्या दिसतात.

मात्र लाँक डाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थितीमुळे आता सारेच २४ तास घरातच असतात. पूर्वी निदान दोघं किंवा नवरा तरी नोकरीनिमित्ताने बराच वेळ बाहेर असायचा. दोघांच्या सहवासाचा मर्यादित असल्यामुळे असे वादविवाद व जुगलबंदी जास्त प्रमाणात होण्याची शक्यता कमी होती.

पण लाँकडाउनमध्ये काय काय होतं ते बघा: विविध ठिकाणची पती-पत्नीची वादविवादाची काही क्षणचित्रे:

"संसाराचा सारीपाट":
# ही बाई कायम जे धोकादायक आहे तशाच तर्हेने काम करत असते: असं नवऱ्याला लक्षात येतं की, ती काय करते गॅस चालू आहे, त्याच्या जवळच समजा गोड तेल भरायचं कसं, तर ते तिथेच जवळ उभी राहुन भरते. अर्थातच त्याचा तीळपापड होतो. तिला तो सांगू पाहतो, असे करू नको किंवा दुसरीकडे सुरक्षित जागी काम कर. तसेच कधी कधी, गँसवर दूध किंवा दुसरं काही ठेवलेलं असतं आणि कुठेतरी बाहेर जाऊन मैत्रिणींशी बोलत रहायची खोड, त्यामुळे पुन्हा वादावादी!

# दुसरं हे उदाहरण पहा: हा नवरा तिला रूचत नाही, म्हणून सिगारेट ओढण्यासाठी पूर्वी बाहेर जाऊन त्या ओढायचा, जेव्हा पाहिजे तेव्हा. पण आता लाँकडाऊनमुळे, सारखं सारखं दरवेळेला सिगरेटी फुकायला, हा बाहेर निघाला की तिची बोंबाबोंब सुरु. हा पण त्याला दूरूत्तरे देणार. झाला वाद सुरू. याच्या उलट ती कधी टीव्हीचा रिमोट हरवेल, मुलखाची विसरभोळी म्हणून कधी मोबाईल चार्जरच कुठेतरी टाकलेला असेल, अथवा घरातल्या खोलीतून बाहेर दुसऱ्या खोलीत जाताना, चालू असलेला पंखा बंद करणार नाही, तसाच ठेवून दुसरी कडे जाऊन फोनवर तासनतास गप्पा मारत बसेल. सहाजिकच नवरा ओरडणार! नवरा बायको चौविस तास घरातच असण्याचे हे दुष्परिणाम.

# हिला आपल्या आरोग्याची इतकी काळजी की, ती केव्हाही मनात येईल तेव्हा वेळेचं भान न ठेवता फँमिली डॉक्टरला फोन कर, त्याला काय होतय सांग, तो बिचारा कुठलं तरी औषध सांगणार. मग ही ताबडतोब नवर्याला बाहेरून औषध आणायला लावणार. कधी कधी तर, तिला ऍसिडिटीचा त्रास नेहमी असून देखील, तेलकट मसालेदार खायची तिला जास्त सवय, म्हणून नवरा नको नको म्हणत असताना देखील, डोसे किंवा पावभाजी असे न चालणारे प्रकार करत राहणार, खाणार व रात्री बेरात्री आजारी पडणार. पूर्वी एक वेळ ठीक होतं, परंतु आता लाँकडाऊनच्या काळात हे संभाळणं कठीणच होऊन बसतं. मग दोघांमध्ये वाद होतच रहात. थोडक्यात स्वभावांचे वेगवेगळे प्रकार या लाँकडाऊनच्या काळामध्ये घरोघरी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चिडचिड होते, कधी कधी काही घरांमध्ये कडाक्याची भांडणेही होतात.

# स्त्रियांवर हिंसाचाराच्या देखील घटना घडत आहेत. लहान मुलांचे विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलांचे तर विचारूच नका. त्यांचे प्रश्न वेगळे आणि त्यापायी विशेषतः आईला होणारा मनस्ताप व ताण वेगळाच. त्यांना बिचार्‍यांना बाहेर खेळायला जाता येत नाही, सारखं मोबाईल मध्ये किती डोकं लावून बसणार? अशात काही महत्त्वाच्या स्पर्धात्मक जीवनाची दिशा ठरविणार्या परीक्षा ज्यांच्या मुलांच्या आहेत, त्या कधी होणार, ह्या सातत्याच्या चिंतेने त्यांच्या घरचे तर स्वरूप एखाद्या युद्धभूमी सारखे पाच महिने राहीले होते. अखेर आता त्या घेतल्या जात आहेत हे बिचार्यांचे नशिबच. कुठे बाहेर जायचं तरी धोका. ह्या मुलांचा अभ्यास अशा तर्‍हेच्या वातावरणात खरोखर कसा झाला असेल व तशा कुटुंबांनी काळ कसा काढला असेल, त्याची कल्पनाच करता येत नाही.

म्हणूनच, लहान असो मोठे असो नवविवाहित मूलबाळ वाले असो अथवा फक्त दोघेच राहणारे ज्येष्ठ नागरिक असोत, सगळीकडे या
लाँकडाऊनमुळे खरोखर विविध प्रकारची भांडणे वाद-विवाद आता सुरू झाले आहेत आणि हा संकटाचा जो काळ आहे, तो कधी संपणार ते माहीतच नसल्यामुळे प्रत्येकजण अधिकच तणावात आहे. खरच कधी नव्हे अशी परीक्षा सर्वांची बघितली जात आहे, संसाराचा सारीपाट असा चालू आहे.

माणसाचा स्वभाव अनाकलनीय असतो. व्यक्ती तशा प्रकृति किंवा स्वभाव ! संसारात दोन वेगळ्या स्वभावाची माणसे जोडीने रहाताना मतभेद किंवा वाद होणे सहाजिकच असते. दुसरा असेच कां वागतो, ह्याचा विचार त्याच्या दृष्टिकोनांतून समजून घेवून मगच आपण वागले, तर संसारात गोडी येते. आपला संसार सुखाचा करणे आपल्याच हातात असते. हा सारीपाट खेळणे मोठेच आह्वान असते. तडजोड, समंजसपणा आणि त्याग हया तीन बाजू प्रत्येकाने संभाळल्या तर हा खेळ मनाजोगती फळे देतो. तर हे असे सगळे विचित्र वातावरण अनिश्चित काळापर्यंत सगळ्यांनीच पचवायला शिकायचे आहे.

आता सरते शेवटी.....

# "करावे तसे भरावे":
दुनियेतील अनंत पापांचा अखेर भरला घडा,
शिकवितो, निसर्ग कोरोनारुपी भस्मासुराचा धडा!
आता तरी व्हा शहाणे, अन् गिरवा मूल्यांचा पाढा,
पाळा नियम, घ्या काळजी, सुटेल संकटाचा वेढा!
आणि.....
अखेरीस........
# "अदभूत प्रेरणादायी संदेश......."

२७ सप्टेंबर'२० रोजी शारजा येथे IPLमधील, किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये झालेल्या चित्तथरारक सामन्याबद्दलचा सोशल मिडीयावरचा एक अविस्मरणीय संदेश, "लाँकडाऊनचे कवित्व" हा लेख पूर्ण करतेवेळी वाचनात आला. म्हणूनच, ह्या लेखाची सांगता करताना, त्याचा सारांश येथे मांडणे उचित ठरेल:

"ह्या iPL सामन्यामध्ये सतराव्या षटकापर्यंत संथ खेळणार्या, मॅच हातातून सुटतेय आणि पराभवाला आपण कारणीभूत ठरणार आहोत, हे फलंदाजी करणाऱ्या राहूल तेवतियाला समजलं नसेल कां? सगळं जग त्याच्यावर 'ब्लेमगेम' खेळत होतं. याने मॅच घालवली, पंजाब विरुद्धची मँच राजस्थान रॉयल्स हरली, असंच जणू ठरवून सारेजण मोकळे झाले होते.

कदाचित त्यालाही हे माहित नव्हतं की, आता अठराव्या ओव्हरला आपण गेम चेंज करणार आहोत. पण टप्प्यात आलेला बॉल आणि संधी त्याने अचूक हेरली आणि तेवतीया गेम चेंजर बनला. २०२० वर्ष आणि २०२० सामन्यातील तिवतीयाची ती न भूतो न भविष्यती इनिंग हाच संदेश देत आहे.
"पिच सोडू नका, स्वतःहून रिटायर्ड आऊट होऊ नका".

ध्यानात असू द्या, २०२० वर्षात एखादी गेम चेंजर ओव्हर प्रत्येकाच्या आयुष्यात आलीच आहे, नसेल, तर ती येणारच आहे. फक्त तोवर उभं राहायचं आहे. जीव तोडून प्रयत्न करायचा आहे. "क्यूकी पिक्चर अभि बाकी हैं मेरे दोस्त!"

२ टक्के जिंकण्याची शक्यता १०० टक्क्यांवर आणणारा तेवतीया, 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे चावून चावून चोथा झालेलं वाक्य प्रत्यक्षातही लागू होतं, हे त्याने दाखवलं आहे.

सध्या टीव्हीवर एक #जाहीरात दाखवत आहेत, "पता नहीं कैसे पर बडा ऑर्डर मिल गया! इस साल कुछ तो अच्छा होना ही था ना!"

२०२० सामन्यातील राहुल तेवतीयाचा ती खेळी, आणि २०२० वर्ष व कोरोना हा एक संदेश आहे बस तो समजून घ्यायला हवा. "स्वतःहून रिटायर्ड आऊट होऊ नका. दिवा तेवत ठेवा". *क्योंकि इस साल कुछ तो अच्छा होने ही वाला हैं !!!*"

सध्याच्या कसोटीच्या वेळी, असा मनाला भिडणारा व प्रेरणा देणारा संदेश लिहिणार्या त्या अनामिकाला साष्टांग नमस्कार!
🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹

धन्यवाद
सुधाकर नातू


ता.क.
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....

https://www.youtube.com/user/SDNatu

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

"Social Medium: 'A Gymnasium for Lateral thinking.":

 

"Social Medium: 'A Gymnasium for Lateral thinking.":

For me social medium is an open Platform for polishing one’s innovative creative ability & 
I call the social media as a Gymnasium for Lateral thinking.

I am therefore pleased to share here few Gems of my innovative & interesting thinking from my SM postings and I am sure they too would make you think & introspect.....

# Like the mother Nature, human body clock carries out its functions accuarately at its set Time 24by7. Each one must follow and do the required activities at the time sutable to him every day, 24by7. Then only he can have peace of mind and body. Hence the start of the Day comfortable to any one need not be 5 am but it will vary according to his Body Clock.

# Politics is a game more competitive & demanding than Chess. The policy makers at the Centre have Lady Luck, tricky brains & enormous patience
on their side. No wonder in the last one & year or so, they could demolish
Fearsome fasting fair, withered away the scaring scams & with do or die stand of fast track economic reforms agenda weakened out the opposition, making their path smoother & clear. Hats off.

# Nature is large & large hearted, Nature is immaculately disciplined, Nature takes into its wings everything that exists- be that living beings or non-living beings. We must salute the Nature and always remember that our existence totally, solely depends on Nature. Hence it’s but Natural to preserve Nature.

# Stones, Mountains, buildings and all the non-living beings have size, shape and mass but they don’t have Life. What they have is unparallel determination to be stationary and remain where they are for ages. We must take that unparallel determination from them.

# Birds have wings; with them, they are able to do that, which no other living beings can do; they fly. Birds fly anytime, anywhere & are able to take a bird’s eye view of the Nature, of the World around.
Our imagination is like wings of birds, with that we can travel any time anywhere; the speed of our imagination is infinite, at times, even more than speed of light.

# Leaves of trees are green in colour; green is colour of nature, colour of life, they give Life to trees. Flowers are colourful, smooth & tender , beautiful; they give meaning, character to the plants. One’s character gives meaning to his personality. Roots are firm, roots spread to offer base, foundation to the plant. Our culture, values are roots of our lives.

# The Trees have roots, enabling them to remain put, firmly and solidly there and then, come rain or storm, all their Lives. We, human beings should take a lesson from them and must remain firm to our roots-i.e. values and virtues. The World would be really, a heavenly place to live in and cherish.

# # Reading books gives one,
an experience
of living hundreds of lives,
in One Life!

# "जमाना बदल रहा है?":
The toughest Task of the current Times
seems to be:
'to remain absent from Social Media-SM,, like FB
and What's app, etc. etc.:

As I recall the history, I could be absent from SM for a full one week five years ago...
But what about Now?
"With great difficulty, now the other day, I was absent only for 11 hours from SM.
"जमाना बदल रहा है?":

# Our Festivals seem to hv lost their original purpose and they hv become Events a La Tamasha and most importantly Nuisance of Noise pollution. Like there is a policy consideration of banning cigarate smoking in public places, in festivals too, programmes should not be in open places with music playing thruout the day and upto midnight, as the desired levels of decibles of noise and the time limit are never controlled to the extent required.

Who is going to take a note seriously to the fact that Like cigatae smoke, loud continuous noise too damages heath. Moreover such noise disturbs students's studies and patients too. When are we all going to be wise and learn the fundamental principle of a cooperative living, ' to do only that which is at least not harmful to others.' Honestly, why others should suffer, just for your own enjoyment?
( Fortunately, due to present covId19 pandemic, we were ssved off from such Festive Hulla Gulla).

# Fed up & frustrated because of more and more advts every now & then in TV serials and news, as well, spoiling continuity of the contents which are also illogical in serials; besides, in news spots too, there are no fresh, current news, repeated bytes and same chats. 'Let The quality go to hell and let revenue giving advts prevail' seems to be the strategy for all the channels as they know the audience doesn't have a choice.

It is high time that poor helpless viewers wake up and stop seeing TV completely, till there is some improvement. Wonder, whether there is any statuary body to control the ratio of advts v/s ongoing contents. If at all it exists, really don't know what exactly are they doing. Now probably the audience only has the key to stop such nonsense on TV medium, as above. This key is the only tool in your hands that would give you more quality time to do more quality work. Till then, the free for all show will go on.

I hv observed the ratio of advts v/s contents is not controlled at all and advts cross that, timing too, is not commensurate with the type of product advts, the toilet cleaning ads r case in point; besides I wonder how come all channels have them at same time. The use of remote then becomes useless which is very irritating.

Finally, being a man from Publicity, really there is no clue how come advertisers can afford to spend so heavily? Thus v end up to buy the product at much higher pricing levels!

# Most of the observations one makes, are based on the perception of the situation at a given point in time. Human perceptions are amalgam of information available from media and other sources, beliefs, experience of self, others and so on....Ultimately in a political game of Power, such public perceptions only decide the outcome.

Rationality at least in Indian Politics unfortunately, gets a back seat, compared to emotionality, though prudence demands otherwise. In such a case, the outcomes and hence possibly, progress and development possibly could have been much better. In any case, it's wise that one should therefore, refrain himself from participating in social media, in this complex area of politics.

# The Most Apt Message on the Dasha Hara Day- The Vijaya Dashami: 'With messy, disastrous experience of the coalition Govt in the last decade at the center and 15 years at the state level, while on central level voters have become already wise to opt for a single party Govt at the center second time too, it's now expected on the State front, prudent voters should select only that candidate whose party has more probability to get single handedly the reqd majority.

The experience and capability to govern effectively, with a developmental vision is too important. Under that background, presently, there is a very pathetic experience of the a three party coalation; how long it would sustain the bonding is the Mute Qn. Naturally, in a possibly, five pronged race, as & when it takes place in unknown future, the obvious choice is wide open and definite:
And one can easily guess which party!

Sudhakar Natu

P.S.
My you tube channel:

moonsun grandson 

Pl open & save this link.......
to see interesting videos..........
on variety of topics.... .

https://www.youtube.com/user/SDNatu

"नियतीचा संकेत-८": 'दीर्घायुष्य कोणाला? कसे व कां?:


"नियतीचा संकेत-८": 'दीर्घायुष्य कोणाला? कसे व कां?:


हौशी ज्योतिषी म्हणून मी गेले चार दशके ज्योतिषाचा अभ्यास करत आहे आणि त्यातूनच अनुकूल गुणांवर आधारित प्रत्येक राशीचे माझे वस्तुनिष्ठ राशिभविष्य विविध दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध होत आले आहे. गेल्या चार दशकात, मी बरेच लेख अभ्यास करून ज्योतिषावर लिहिले आहेत. त्यातीलच एक वरील शीर्षकाचा लेख मला आज आठवला. त्यामध्ये, मी माणसाला दीर्घायुष्य कां मिळते, याचा पत्रिकेतील ग्रहयोगांवरून अभ्यास करून मांडले होते, त्याची आठवण झाली. हा लेख आता दुर्दैवाने कोणत्या मासिकात, कधी प्रसिद्ध झाला ते मला स्मरत नाही व त्या लेखाची स्थळप्रतही माझ्याजवळ नाही. कारण तितकी व्यवस्थित अशी नोंद आणि जपणूक माझ्या प्रकाशित साहित्याची ठेवणे, मला जमलेले नाही.

आता त्यातील मूळ मुद्दा व अभ्यासू निरीक्षण मात्र आठवत आहे. त्यामुळे मी तोच लेख वेगळ्या रुपात, माझ्या स्म्रुतीला काहीसा ताण देऊन, येथे उलगडण्याचा मी प्रयत्न करत आहे. ते मुलभूत निरिक्षण असे आहे:

जन्मलग्नपत्रिके मध्ये लग्न स्थान दुसरे, सहावे आठवे व बारावे स्थान व त्यातील ग्रहस्थितीचा अभ्यास, दीर्घायुष्य कां मिळते ह्या दृष्टीने महत्त्वाचा असू शकतो, या संकल्पनेवर तो लेख आधारित होता.

त्याकरता मी माझ्या संग्रहात असलेल्या दीर्घायुषी म्हणजे साधारण ८४ वर्षांहून अधिक आयुष्य लाभलेल्या मंडळींच्या पत्रिकांचा अभ्यास करून तो निष्कर्ष मांडला होता. ह्या स्थानांच्या ग्रहांचा एकमेकांशी संबंध किंवा एकमेकांच्या स्थानात असणे अथवा स्वगृही उच्चीचे असणे ह्यावर दीर्घायुष्य अवलंबून असते असा साधारण निष्कर्ष मी त्या लेखातून मांडला होता.

आता पुन्हा माझ्या पत्रिकासंग्रहातून (ज्या सुदैवाने मी सातत्याने एका खास डायरीत टिपून ठेवत होतो) काही उदाहरणे व पत्रिका विश्लेषण पुढे मांडत आहे:

१ सहसा कधीही आजारी न पडलेल्या ८९ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या स्रीची ही पत्रिका:
जन्मलग्न व्रुषभ- र बु द्वितीय-मं षष्ठ-गु
अष्टम-रिकामे बारावे-शु
लग्नेश शुक्र बाराव्या स्थानी, तर बाराव्या स्थानाचा मालक मंगळ, द्वितीय स्थानात. द्वितीय स्थानाचा अधिपती बुध लग्नात आहे. अष्टम स्थानाचा अधिपती गुरू षष्ठात आणि षष्टाचा अधिपती शुक् बाराव्या स्थानी. अशा पाचही स्थानांचे संबंध आले आहेत त्यामुळे या स्त्रीला ८९ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले.

२ धडधाकट व उत्तम आरोग्यसंपन्न शरीरयष्टी व स्थिर मनःस्थिती लाभून ८४ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या पुरूषाची ही पत्रिका:
जन्मलग्न-कन्या बु मं द्वितीय-रिकामे
षष्ठ-रिकामे अष्टम-गु बारावे-र
लग्नेश बुध उच्चीचा स्वगृही. प्रथम स्थानाचा अधिपती असा शुभ संबंधित उच्चीचा असला तर चांगले आरोग्य व दीर्घायुष्य मिळण्यासाठी हे उत्तम कारण असते. शिवाय इथेच अष्टमेश मंगळ आहे तर द्वादषेश रवि स्वगृही, अशा योगांमुळे या व्यक्तीला चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभले.

३ अत्यंत देखणे व्यक्तिमत्त्व व दीर्घोद्योगी असलेल्या, ८७ वर्षांचे आरोग्यसंपन्न जीवन लाभलेल्या पुरुषाची ही पत्रिका:
जन्मलग्न कन्या तेथेच र बु शु व श द्वितीय-गुरु षष्ठ-ह के अष्टम-रिकामे बारावे-रा व मं
या पत्रिकेतही लग्नेश बुध स्वगृही असून तो उच्चीचा कन्या राशीत आहे. लग्न स्थानाचा अधिपती असा शुभ संबंधित असला तर त्या व्यक्तीला चांगले दीर्घायुष्य लाभते याशिवाय बाराव्या स्थानाचा अधिपती रवी लग्नात आहे अष्टमेश व्ययात आहे, तर द्वितीय स्थानाचा अधिपती शुक्र लग्नी आहे. षष्ठेश शनी लग्नात आहे. अशा रीतीने पाचही स्थानांचे संबंध उत्तम झाल्यामुळे हा माणूस आयुष्यभर तरतरीत राहीला.

४ कर्तबगार धडाडीचे ८६ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या पुरुषाची ही पत्रिकाः
जन्मलग्न-कुंभ श द्वितीय-शु षष्ठ-चं के
अष्टम-गु बारावे-रा
लग्नेश शनी स्वगृही आहे. लग्नेश स्वगृही असणे हे दीर्घायुष्य मिळण्याचे प्रथम उत्तम कारण असते. द्वादषेशही तोच आहे. तर द्वितीय स्थानाचा अधिपती गुरु, अष्टमात, षष्ठेश चंद्र स्वग्रुही. फक्त अष्टमेश बुध, हा वेगळा चतुर्थ स्थानात मित्र क्षेत्री आहे, एवढाच काय तो फरक. बाकी पाचही स्थान शुभ संबंधित. त्यातून शुक्र उच्चीचा, अष्टम स्थानाचा अधिपती बुध ज्या राशीत आहे, त्याचा धनी शुक्र. अशामुळे या व्यक्तीला चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभले.

५ उत्साही व खंबीर व्यक्तीमत्व लाभलेल्या ८५ वर्षाच्या पुरुषाची ही पत्रिका:
जन्मलग्न-मकर रा द्वितीय-श षष्ठ-रिकामे
अष्टम चं ने बारावे-र बु शु
लग्नेश द्वितीय स्थानात स्वगृही, षष्ठेश बुध बाराव्या स्थानी तर अष्टमेश रवि बाराव्या स्थानी आहे. शिवाय शुक्र बाराव्या स्थानी असून त्या स्थानाचा अधिपती गुरू जो दशमात तुळेत आहे त्याच्याशी अन्योन्य योग करतो. अशा परस्पर संबंधांमुळे चांगले दीर्घायुष्य लाभले.

६ आरोग्यसंपन्न ९५ वर्षांचे जीवन लाभलेल्या स्रीची ही पत्रिका:
जन्मलग्न-व्रुश्चिक गु मं द्वितीय-रिकामे षष्ठ-रिकामे अष्टम-चं ह्या स्थानाचा अधिपती बुध हा पत्रिकेत, द्वादषेश शनीच्या राशीत आहे. बारावे-श
येथे लग्नेश मंगळ स्वगृही वृश्चिकेत असल्यामुळे बलवान आहे, द्वितीयेश त्याच्याबरोबरच आहे, षष्ठेश मंगळ स्वगृही प्रथमस्थानी असल्याने, ग्रहयोग पाचही स्थानांचे होऊन या स्त्रीला इतके दीर्घायुष्य लाभले.

७ विक्रमी शतकपूर्ती करुन १०५ वर्षांचे निरोगी निरामय आयुष्य लाभलेल्या पुरुषाची पत्रिकाः
जन्मलग्न-धनु रिकामे द्वितीय-ह षष्ठ-बु शु श अष्टम-चं मं ने बारावे-गु
लग्नेश गुरु व्ययात तर व्ययस्थानाचा अधिपती मंगळ, अष्टमात. अष्टमेश चंद्र स्वगृही. त्याचप्रमाणे षष्ठेश शुक्र स्वग्रुही व द्वितीय स्थानाचा अधिपती शनी, षष्ठात असे पाचही स्थानांचे संबंध या पत्रिकेमध्ये आढळून येतात. त्यातून षष्ठेश व अष्टमेश स्वगृही अशा बलवान योगांमुळे
शतकपूर्तीचे भाग्य या व्यक्तीला लाभले, असे मानू शकतो.

चांगले शरीरारोग्य आणि उत्तम दीर्घ आयुष्य यासाठी प्रथम द्वितीय षष्ठ अष्टम आणि द्वादश स्थाने यांचा आयुष्य लाभण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे योग एकमेकात असावे लागतात. त्यातून या पाचही स्थानाचे ग्रह जर याच पाच पैकी कुठल्याही स्थानात असले वा स्वगृही किंवा उच्चीचे असले, तर सोन्याहून पिवळे! दीर्घायुष्य मिळण्यासाठी ह्या दृष्टीने आम्ही अभ्यास केला.

अर्थात अजून यासाठी तशी अधिक उदाहरणे आपल्याला घ्यावी लागू शकतात. मात्र हां नियम व निरीक्षण अयोग्य ठरविण्यासाठी, असेच पाचही स्थानांचे अपेक्षित योग असूनही, अल्पायुषी वा कमी आयुष्य मिळणार्या माणसांची पुष्कळ उदाहरणे जर मिळाली, तरच या निरीक्षणाला कदाचित छेद जाऊ शकतो एवढेच आम्ही सध्या म्हणतो. ज्योतिषाचा सखोल अभ्यास व्हावा, यातून वेगवेगळ्या प्रकारची अशी निरीक्षणे मानवी आयुष्या बाबतची केली जावीत असेच मला अभ्यासकांना सांगणे आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......
आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....

https://www.youtube.com/user/SDNatu