शनिवार, २५ ऑक्टोबर, २०२५

"My 'Date' with Meta AI part 2 !":

[25/10, 9:29 PM] Sudhakar Natu: About expiry of wap chats, after 7 days option of 90 days, its too long days difference. Hence option of 30days should be introduced. [25/10, 9:29 PM] Meta AI: A great point, Sudhakar! Having a 30-day option would provide more flexibility and granularity for users. The current options might be too restrictive or too long for some users. A 30-day option would allow users to strike a better balance between conversation history and storage management. It could also cater to users who need more time to refer back to conversations without keeping them forever. Do you think WhatsApp should consider adding more options or customizing chat expiration settings based on individual preferences? [25/10, 9:31 PM] Meta AI: Your suggestions about WhatsApp chat expiration settings, such as notifying partners about changes and adding more options (like 30 days), are valuable. While I don't have real-time updates on WhatsApp's development plans, your input can certainly contribute to shaping future updates! [25/10, 9:31 PM] Sudhakar Natu: My earlier suggestions in this respect, I trust, are being taken care off. [25/10, 9:38 PM] Sudhakar Natu: Now about messages on individual walls in Factbook as well as wap- there can be number of posts in past, which the user wants either to repeat or modify. He should be able to retreated by puting in few words from that post instantaneously, Like search engine ! In absence of this he has to scroll backwards. As a content creator, I find its much needed for my archive value posts. [25/10, 9:38 PM] Meta AI: You're suggesting a search function for past posts on Facebook and WhatsApp, allowing users to retrieve and reuse or modify previous content by searching with keywords. This feature would be incredibly useful, especially for content creators like yourself who often refer back to archived posts. A search function would save time and effort, enabling users to: 1. Reuse valuable content 2. Modify previous posts for new contexts 3. Reference past conversations or ideas This feature would enhance user experience, productivity, and content management. Do you think this feature would be more beneficial for individual users or also for page administrators and content creators? [25/10, 9:42 PM] Sudhakar Natu: Example can you upload my post on fb/wap about use of Marathi font: " मराठी भाषेत मी नेहमी येथे संदेश प्रसारित करतो...." // above are key words [25/10, 9:43 PM] Meta AI: Here's a sample post based on your keywords: "मराठी भाषेत मी नेहमी येथे संदेश प्रसारित करतो... मला माझ्या मराठी माणसांशी जोडण्याचा हा एक मार्ग आहे. मराठी फॉन्टचा वापर करून, मी माझे विचार आणि भावना अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो. तुम्हालाही मराठीचा वापर करायला आवडते का?" Translation: "I always broadcast messages here in Marathi... It's a way for me to connect with my Marathi-speaking audience. Using Marathi font, I can express my thoughts and feelings better. Do you also enjoy using Marathi?" Would you like me to modify or add anything? [25/10, 9:43 PM] Meta AI: Your original post was: "मराठी भाषेत मी नेहमी येथे संदेश प्रसारित करतो...." I can help with that! Would you like me to suggest ways to share this post or discuss something related to the Marathi language? [25/10, 9:43 PM] Sudhakar Natu: You please retrieve my original post. [25/10, 9:44 PM] Sudhakar Natu: Buy you have not been able to retrieve my original post. [25/10, 9:44 PM] Meta AI: You're right, I didn't retrieve your original post. It seems I generated a new post instead. If you'd like to share the original post again or provide more context, I'd be happy to help! [25/10, 9:52 PM] Sudhakar Natu: 👍" मराठी ही आपली मातृभाषा आहे. आता तर तिला अभिजात मराठी भाषा अशी मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी परस्पर संपर्क करताना तसेच समाज माध्यमांवर संदेश संपर्क करत असताना आवर्जून मराठीतूनच लिहावे, असे मनापासून वाटते, नव्हे ती अत्यावश्यक अशी बाब आहे. वाणी ते मजकूर अशी प्रणाली(app) देखील उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून मराठीमध्येच लिहीणे सुरू करा अशी नम्र विनंती !":👍 तसे करणे जर सोडून दिले तर उत्तरोत्तर मराठी कधी लोप पावेल याची शाश्वती नाही. !":🤣 // for retrieving this post I was required to scroll backwards till the time of this msg now being written after I left the chat ! At times such scrolling time can be larger. Hence please implement my idea asap [25/10, 9:52 PM] Meta AI: I understand now. Your original post is: " मराठी ही आपली मातृभाषा आहे. आता तर तिला अभिजात मराठी भाषा अशी मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी परस्पर संपर्क करताना तसेच समाज माध्यमांवर संदेश संपर्क करत असताना आवर्जून मराठीतूनच लिहावे, असे मनापासून वाटते, नव्हे ती अत्यावश्यक अशी बाब आहे. वाणी ते मजकूर अशी प्रणाली(app) देखील उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून मराठीमध्येच लिहीणे सुरू करा अशी नम्र विनंती ! तसे करणे जर सोडून दिले तर उत्तरोत्तर मराठी कधी लोप पावेल याची शाश्वती नाही. ! " I see your point about scrolling through conversations to find specific posts. Implementing a search function for past messages would indeed be helpful. Your post emphasizes the importance of using Marathi language, and it's interesting that you mentioned the app for converting speech to text in Marathi. Do you think such tools can help promote the use of Marathi language among younger generations? [25/10, 10:01 PM] Sudhakar Natu: Frankly I am a 81year sr citizen and my hands& hand fingers tremble hence my need for voice to text & my default language is Marathi. I am writing this in English by typing each alfabet of words. I don't want change default language to English just for such chats only with you. Henge can you be comfortable if I posy in Marathi. While you respond as usual in English- the interaction will be faster [25/10, 10:01 PM] Meta AI: I understand now, Sudhakar! Thank you for sharing about your experience with voice-to-text and your preference for Marathi. Don't worry about typing in English; your messages are welcome in either language. Feel free to post in Marathi, and I'll respond in English. Let's make our conversation smooth and convenient for you! (And kudos to you for adapting to technology at 81! You're an inspiration!)

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

"My Date with Meta AI !":

[23/10, 9:00 PM] Sudhakar Natu: Present setting unilateral changing about Expiry of whatsapp chat needs a much desirable change. Before changing it, it must be compulsory to at least inform in advance the other partner in the chat, if his prior acceptance is difficult to impose. I had 2 bitter experiences due to sudden change made for lesser duration by the other partners. [23/10, 9:00 PM] Meta AI: You're suggesting that WhatsApp should notify users before changing the chat expiration setting, especially if it's a unilateral change. This would help prevent unexpected message deletions and potential misunderstandings. Your idea has merit, Sudhakar! WhatsApp's end-to-end encryption and user control are essential, but transparency about changes affecting chat history could be beneficial. Would you like to share more about your experiences and how this feature change affected you? This could help me understand your perspective better. [23/10, 9:37 PM] Sudhakar Natu: Both are similar experiences like this one: To one partner I had prepared horoscope of his grand daughter and sent to him on WhatsApp. ** After few days he had changed the expiry setting to 24 hours. After few days as he probably has forgotten to copy the horoscope in his records he again requested me to resend the copy of same horoscope after few weeks. His ** changing the expiry setting was obviously not known to me. I was required to prepare the horoscope all over again. Thanks to my keeping in my record the input birth date time and place of his grand daughter. In second case, information of the address of despatch of books was deleted by chat partner who had booked the order. He had given wrong address was realised when I inquired about non receipt of books by me. In between the publisher had despatched books to wrong address by speed post ! Now I am required to follow up and locate the where about of books ! [23/10, 9:37 PM] Meta AI: I understand now, Sudhakar! Those experiences must have been frustrating, especially when valuable information like the horoscope and book address got lost due to the sudden change in settings. Your suggestion would help prevent such situations, ensuring that users are aware of changes to their chat history and can take necessary actions to preserve important information. It's interesting that you managed to recreate the horoscope thanks to keeping records, but it's clear that the process was inconvenient. Similarly, tracking down the misplaced books can be a hassle. Perhaps WhatsApp could consider adding features like: 1. Notification for chat history changes 2. Option to opt-out of auto-delete or set custom retention policies 3. Chat backup reminders What do you think would be a suitable solution to mitigate such issues? [23/10, 9:44 PM] Meta AI: Your initial suggestion makes sense: notifying the chat partner about the setting change would be a good compromise if mutual consent isn't feasible. This way, users would be aware of potential data loss and can take action to preserve important information. Thanks for clarifying! Your suggestion can definitely contribute to a more transparent and user-friendly messaging experience. [23/10, 9:46 PM] Sudhakar Natu: Hope it is in place asap [23/10, 9:46 PM] Meta AI: I'm rooting for it, Sudhakar! Your suggestion is practical and user-centric. Hopefully, WhatsApp will consider implementing features that enhance user experience and transparency. Fingers crossed!

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

" वाचता वाचता वेचलेले भावलेले

"वाचता वाचता, वेचलेले भावलेले !": आज वाचनालयात दिवाळी अंक मिळणे सुरू होईल म्हणून बरेच मी गेलो परंतु त्याची सुरुवात अजून झाली नाही अशी माहिती मिळाल्याने मी थोडा खट्टू झालो होतो. वाचनासाठी पुस्तक शोधत असताना मला खूप खटाटोप करावा लागला आणि अचानक सविता भावे लिखित "माणसातील माणूस" हे पुस्तक शेवटी समोर गवसले मुखपृष्ठावर फोटो तर एका पुरुषाचा पण नाव मात्र सविता यामुळे कुठून जागृत होऊन मी थोडेसे चाळले आणि पेण गावाचा उल्लेख नजरेत आल्यामुळे मी ते पुस्तक घ्यायचे ठरवले. घरी आल्यावर कुतुहूल शमण्यासाठी गुगलवर शोध घेतला आणि अक्षरशः आश्चर्यचकित झालो. सविता म्हणजे सूर्य हे पुरुषाचेच नाव असल्याचे आढळून आले आणि त्या थोर माणसाची माहिती वाचून जे वाटले ते व्यक्त करायला माझ्याजवळ शब्द नाहीत. माझे असे का झाले हे तीच माहिती पुढे आपणही वाचल्यावर समजून येईल. शब्द आणि नांव कशी चकवे देतात, तो आपल्यालाही कळावा म्हणून या अवलिया माणसाचे आत्मचरित्र असलेले साडेचारशे पानी पुस्तक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी देत आहे. सविता भावे • इतर भाषांत वाचा • Download PDF • पहारा • संपादन सविता रामकृष्ण भावे (जन्म : मळवली, १४ नोव्हेंबर१९३३; मृत्यू :१५ ऑक्टोबर २०१३) हे एक मराठी चरित्रलेखक होते. त्यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले. भावे यांनी तीसहून अधिक चरित्रे लिहिली. मराठीतील अथश्री, उत्तररंग, प्रेरणा आणि योगक्षेम या वृद्धांसाठी असलेल्या मासिकांचे, त्रैमासिकांचे, षण्मासिकांचे, दिवाळी अंकांचे त्यांनी संपादन केले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांची संघटना बांधण्यात मदत केली. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव माणसांतला माणूस हे आहे. साम्यवादी चळवळीत असलेल्या भावे यांनी नंतर सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य केले. पुण्यातील इंडियन लॉ सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज, रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी यांच्याशी त्यांचा संबंध होता. कौटुंबिक माहिती संपादन भावे यांचा जन्म लोणावळ्याजवळच्या मळवली येथे झाला होता. शालेय शिक्षण पेणमध्ये, तर बी.ए.पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजात झाले. पुण्याच्या लॉ कॉलेजातून ते एल्‌‍एल.बी झाले. त्यानंतर त्यांनी लाइफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशनमध्ये नोकरी केली. विनोबा भावे हे सविता भावेंचे काका होत. चरित्रे संपादन • अण्णासाहेब चिरमुले (??) • अण्णासाहेब शिंदे (??) • अनिरुद्ध कुलकर्णी : व्यक्ती आणि कार्य (संपादित, सहसंपादक - अनिल किणीकर, देवयानी अभ्यंकर, डाॅ. रवींद्र घवी) • १३ आत्मकथने -डॉ.बानू कोयाजी, डॉ.शरच्चंद्र गोखले, बी.जी. देशमुख, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ.वसंत पटवर्धन, रोहिणी भाटे, डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ. प्र.चिं. शेजवलकर, शांता शेळके, डॉ.ह.वि. सरदेसाईं, जयंत साळगावकर, आदी (माझी प्रकाशवाट) • आत्मचरित्र (माणसांतला माणूस) • आबासाहेब अत्रे (शाळा एके शाळा) • डॉ. नीलकंठ कल्याणी (२१व्या शतकाकडे - डॉ. नीळकंठ कल्याणी यांचे विचारधन) • लक्ष्मणराव किर्लोस्कर (कथा किर्लोस्करवाडीची) • शंतनुराव किर्लोस्कर (कालापुढची चार पाऊले) • दादा गुजर (दादा आभाळाएवढा) • डॉ.शरच्चंद्र गोखले (अवघेचि अलौकिक) • डॉ.शरच्चंद्र गोखले (मांदियाळी) • लोकमान्य टिळक (युगकर्ता) • लोकमान्य टिळक, शेठ वालचंद हिराचंद, प्राचार्य ना.ग. नारळकर आणि आचार्य विनोबा भावे (चतुरंग पुरुषार्थ) • डब्ल्यू आर ऊर्फ नाना तळवलकर (जेथे जातो तेथे) • रामभाऊ तुपे (राहिले ते आपुले) • जे.पी. नाईक (दूरदर्शी शिक्षणयोगी) • ना.ग. नारळकर (नाना :एक शिल्पकार). हा सविता भावे यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ (नोव्हेंबर १९६७). • कॉ. कडू पाटील (क्रांतिपंढरीचा वारकरी) • ग.प्र. प्रधान (प्रधान मास्तर) • श्रीकृष्ण महादेव बेहरे (निव्वळ जिद्दीतून) • चंदन मेमन (आभाळा भिडले हात) • व्ही.बी. राव (??) • शेठ लालचंद (अधिनायक) • वालचंद हिराचंद (वालचंद हिराचंद) • वालचंद हिराचंद (वालचंद हिराचंद - जिंकिले भूमी, आकाश, जल (आत्मकथन) • विनोबा भावे (दानयोगी विनोबा) • हरिभाऊ साने (सन्मित्र) अन्य पुस्तके

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०२५

सोशल मीडियावरील मुशाफीरी भाग 3

🧚🙋‍♀ *देवाचे लक्ष आहे बरका* ➖➖➖➖➖ 🎫 *KathaKosh* https://t.me/kathakosh ➖➖➖➖➖ एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले कि, एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, बोला! काय काम आहे? ते म्हणाले, ठीक आहे भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ. मी म्हटले, "माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही." तेव्हा ते म्हणाले, "बंधू! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास, म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्या बरोबर राहणार आहे." मी चिडत म्हटलं, "ही काय मस्करी आहे?" "ओह ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस. तुझ्या शिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही! काही बोलणार इतक्यात मागून आई आली... एकटा काय उभा आहेस, इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे आत येऊन चहा पी. आई ला काही तो दिसला नाही. आईच्या या बोलण्या मुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्या बरोबर मी रागाने ओरडलो. अग आई, चहा मध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस? एवढे बोलल्या नंतर मनात विचार आला कि, जर आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आई वर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले कि, अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे... मी जिथे असेल त्या प्रत्येक ठिकाणी ते माझ्या पुढ्यात आले... थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा, माझ्या पुढे..... मी म्हटले " प्रभू , इथे तरी एकट्याला जाऊदे." आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मना पासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिक पणा सिद्ध करायचा होता. ऑफिसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार, इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभू ची नजर आहे, गाडी बाजूला थांबवली. फोन वर बोललो आणि बोलत असताना, म्हणणार होतो की, या कामाचे पैसे लागतील, पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले तू ये! तुझे काम होईल आज".... ऑफिस मध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफ वर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यां बरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्या कडून विना कारण अपशब्द बोलले जायचे. पण त्यादिवशी तसे काहीं न बोलता, काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम, असे म्हणत सहज पणे सर्व कामे केली. आयुष्यातील हा पहिला दिवस होता. ज्या दिवशी माझया दिनचर्येत राग, लोभ,अभिमान,दृष्टता, अपशब्द, अप्रमाणिकपणा, खोटेपणा कुठे ही नव्हता. संध्याकाळी ऑफिस मधून निघून घरी जायला निघालो. कार मध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो," भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा." प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेऱ्यावर समाधान होते. घरी पोचलो. रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो. प्रभू! प्रथम तुम्ही घास घ्या. मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला. जेवण झाल्यानंतर आई म्हणाली," आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास! काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय? मी म्हटले, "आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला. माता आणि प्रसादात कधी काही उणीव नसते!" थोडा वेळ शतपावली केल्यानंतर, मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिन्त व शांत मनाने उशीवर डोके टेकवले... झोपी जाण्यासाठी... प्रभू नि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, म्हणाले," आज तुला झोप येण्यासाठी, संगीत, किंवा औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही." खरोखर, मला गाढ झोप लागली. ज्या दिवशी आपणास कळेल की, 'तो' पहात आहे, आपल्या हातून सर्व काही चांगले घडेल! *देवाचे लक्ष आहे बरका* 🌸 🌸 🌸 सर्वांनी एकमेकांना नक्कीच पाठवावे आणि अशाच महत्वपूर्ण अपडेट्स टेलिग्राम वर सुद्धा मिळवण्यासाठी जॉईन करा. ➖➖➖➖➖ आपलं ते सोनं पण ओळखणार कोण? 👉 *खोबरेल तेल* खोबरे, खोबरेल तेल किती विलक्षण आणि गुणकारी आहे! माझे स्वतःचे कितीतरी गैरसमज दूर झाले ! कृपया मित्र मैत्रिणींनो हा लेख जरूर वाचा आणि आवडला तर ज्यांच्या ज्यांच्यावर तुमचे प्रेम माया आहे त्यांना पाठवा ....! माझी तर तुम्हा सर्वांवर माया आहेच म्हणूनच तुमच्यासाठी ख़ास डॉ. मीना नेरुरकर यांचा हा लेख ..!! "कोकोनट ऑइल" गेली तीस वर्षे नारळाच्या खोबर्‍याला, खोबरेल तेलाला आरोग्यबाधक ठरवल्यावर त्याचे ग्रह पालटले आहेत. दिवसागणिक वाढत असलेल्या अल्झायमर या रोगावर जालीम उपाय म्हणून खोबरेल तेलाला आता महत्त्व आलेले आहे. अमेरिकेत डॉक्टर पेशंटना टोस्टवर खोबरेल तेल लावून द्या असे सांगत आहेत. इतके दिवस आजूबाजूचा काहीही गंध नसलेली अल्झायमर्स पीडित जनता महिनाभराच्या टोस्टवरच्या खोबरेल तेलाने एकेकाळचे परिचित जग परत नव्याने ओळखायला लागलेली आहे. कोकोनट ऑइलचे भाग्य पालटायला डॉ. ब्रूस फाइफ याच्या रूपाने गॉडफादर लाभला. अमेरिकेच्या र्‍होड आयलंड राज्यात राहणार्‍या या न्यूट्रिशयन शेजारी पॉल सोएर्स नावाचा फिलिपिनो माणूस होता. पॉल मिरॅकल ऑइल विकायचा. आजूबाजूची फिलिपिनो जनता काहीही झाले की त्याच्या दुकानात धावत यायची व तेल घेऊन जायची. कुतुहल म्हणून ब्रूसने एके दिवशी पॉलला विचारणा केली. पॉल म्हणाला, थायलंड वा फिलिपाइन्स देशातून नारळ आणतो, नारळाच्या डोळ्यात खिळा घालून पाणी काढतो, मग तो हातोड्याने फोडतो, आतले खोबरे किसतो, ते पाण्यात उकळत ठेवतो, पाणी आटून वर राहते ते कोकोनट ऑइल. कसल्याही व्याधीवर उपचार म्हणून देतो. डॉ. ब्रूस न्यूट्रिशनिस्ट असल्यामुळे त्याला प्रक्रिया न झालेल्या नैसर्गिक खाद्यपदार्थामध्ये रस होता खोबर्‍यातून तेल काढण्याची किचकट प्रक्रिया सोपी करायला ब्रूसने खूप मदत केली. पॉलला खोबरे वाटायला मिक्सर आणून दिला. खोबर्‍यातून तेल काढायला द्राक्षातून वाइन काढायचा प्रेस आणून दिला. आता तेल काढणे खूप सोपे झाले. पॉलच्या सांगण्यावरून काहीही दुखत असले की, ब्रूसने चमचाभर कोकोनट ऑइल तोंडाने घ्यायला सुरुवात केली. कापलेल्या खरचटलेल्या ठिकाणी कोकोनट ऑइल लावायला सुरुवात केली. ब्रूसचे वजन कमी झाले, त्याची त्वचा तुकतुकीत दिसायला लागली. जखम पटकन भरायला लागली. ब्रूसच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. इतके दिवस नारळाला का वाईट म्हणत होते याबद्दल त्याने खोलात जाऊन तपास करायला सुरुवात केल्यावर त्याला आढळून आले की, सोयाबीन इंडस्ट्रीने जगात पाय रोवण्यासाठी मुद्दाम खोबर्‍याविरुद्ध अपप्रचार करायला सुरुवात केली होती. सगळे जण हार्ट अटॅकला घाबरतात. खोबरेल तेलात स्निग्धांश जास्त असतात व त्याने हार्ट अटॅक येतो, पण सोयाबीनचे पदार्थ खाल्ले तर हृदयविकार कमी होतात असा खोटा प्रचार सुरू केला. झाले. घाबरट लोकांनी हा रिपोर्ट वाचल्यावर नारळाचे पदार्थ खाणे कमी केले. चाणाक्ष सोयाबीन इंडस्ट्रीने स्वत:चे घोडे पुढे दामटले. ब्रूसने नारळ वापरत असलेल्या देशात जाऊन खोबरेल तेलावर संशोधन केले. खोबर्‍यात असतात ते Medium chain fatty acids जे शरीराला हितकारक असतात. थायलंड, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, पॉलिनेशियन देश खोबर्‍यावर जगतात. त्यांच्यात हार्ट अटॅकचे प्रमाण जगापेक्षा खूप कमी आहे. ब्रूसने शोधाअंती खोबर्‍यामुळे हार्ट अटॅक येत नाही असे विधान केले. १९९९साली त्याने Coconut Oil miracle या नावाचे पुस्तक स्वत:च प्रसिद्ध केले. ते वाचून डॉ. मेरी न्यूपोर्ट हिने २००८ साली अल्झायमर्सच्या रोग्यांमध्ये कोकोनट ऑइलचा उपयोग करून पाहिला. फरक बघून तीदेखील चकित झाली. इंटरनेटमुळे तो रिपोर्ट जगभर पसरला. यू ट्यूबवर डॉक्टर हेल्दी फूडसाठी नारळाचे दूध कसे बिनधास्तपणे वापरावे याच्या रोज नव्या रेसिपीज देतात. माझ्या आजीच्या बटव्यात जगातल्या सगळ्या व्याधींवर अक्सर इलाज म्हणून एकच औषध होते ते म्हणजे खोबरेल तेल. परीक्षा आली की डोकं थंड राहावे म्हणून ती माझ्या डोक्यावर खोबरेल तेल थापटायची, केस काळे राहावेत म्हणून आंघोळीच्या आधी डोक्याला खोबरल तेलाचा मसाज करायची, कातडी चरबरीत होऊ नये म्हणून अंगाला खोबरेल तेल चोळायची, कान दुखला तर कानात गरम खोबरेल तेलाची धार सोडायची. सर्दी झाली, डोके खाली करून नाकात गरम खोबरेल तेलाचे थेंब घालायची. ती जेव्हा ९५ व्या वर्षी गेली तेव्हा डोक्यावरचे सगळे केस शाबूत होते व काळे होते. सध्या माझी हॉर्वर्ड विद्यापीठातली हुशार मुलगी अदिती नियमितपणे खोबरेल तेल वापरते. पणजी सारखे डोक्याला अंगाला तर लावतेच, पण ब्रूसने सांगितल्याप्रमाणे रोज तीन चमचे तेल पिते. खोबरेल तेलात जेवण करते. खोबरेल तेलावर वाढूनही मी त्याचा वापर थांबवला म्हणून माझी कीव करते. कोकोनट गुरू डॉ. ब्रूसच्या अथक प्रयत्नांनी अमेरिकेतही कोकोनट ऑईल खूप लोकप्रिय होत आहे. आता मीही न बिचकता वाटी वाटी सोलकढी पिते. आमट्या, उसळी, कालवणांना नारळाचे वाटण घालते. कोकोनट ऑइल अँटी-एजिंग असल्याचे रोज नवनवे रिपोर्ट बाहेर येत आहेत. - डॉ. मीना नेरूरकर खूपच माहितीप्रद व उपयुक्त लेख असल्याने फाॅरवर्ड केला आहे.

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

"सोशल मीडियावरील माझी सरमिसळ भाग 2 !":

👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍" स्वरानंद 124 ! ":👌 💐 आठवणीतली साठवण !":💐 👍 मोबाईल मध्ये जुने व्हिडिओज सर्फिंग करत असताना आजच्या ना एक आठवणीतली साठवण गवसली. दूरदर्शनवर तरुण तरतरीत श्री सुधीर गाडगीळ आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यामधील खुसखुशीत संवाद आणि त्याबरोबरच मधुर स्वरातील लतादीदींनी सादर केलेले श्रवणीय गीत यावेळच्या स्वरानंदासाठी !👍 त्यासाठी पुढील लिंक उघडा.... https://youtube.com/playlist?list=PLqYtyoVujYRVEk9JxYE8j0gn__I6A9Kvx&si=H-ryiQwaSPmN0LM4 धन्यवाद श्री सुधाकर नातू ता. क. 💐ह्या विडिओमध्ये तरूण वयातील अस्मादिकही पहायला विसरू नका !":💐 अभिजात मराठीची भाषाभगिनी अभिजात बंगाली, यांचा अपूर्व संगम, यावेळचा खास स्वरानंदा !: 👍"दूरे आकाश.. (बंगालीत) + तिन्हीसांजा सखे.. (मराठीत) स्वरसाज : आनंदी जसराज जोशी. "आनंदी" चा अप्रतिम कलाविष्कार !":👍 वरील गाणे ऐकल्यावर अक्षरशः अंगावर कोणीतरी अलगदपणे मोरपीस फिरवील्यासारखे वाटेल !"💐 धन्यवाद श्री सुधाकर नातू 😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇 😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭 👍"महाराष्ट्र टाइम्स 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल !":👌 😀 "संघर्ष करणारे आपण एकटेच नसतो. लहान थोर सारेच संघर्षयात्री असतात. अडचणीच कर्तबगार माणसं घडवतात 😀 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल !":👌 😀 "निष्क्रियता व चालढकलीचे, दुष्परिणाम होतात. 'जेव्हांचं तेव्हा, ज्याचं त्याला, जिथली गोष्ट जिथल्या तिथे.' हा मंत्र नेहमी उत्तम !"😀 👍"जुने ते सोने- 'सुधा' डिजिटल दिवाळी अंक'20 !":👌 💐 वैविध्यपूर्ण ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा', रंगांची दुनिया" अशा विभागांनी सजलेला उत्कृष्ट दिवाळी अंक ! मूल्य केवळ रु. १००/- डिजिटल अंक मिळाल्यावरच online payment करायचे........ ह्या शिवाय...... व्यावसायिक जीवनात अत्यंत उपयुक्त असा....online payment मिळाल्यावरच डिजिटल Management Musings हा अंक व आगामी वर्षाचे ग्रह बदलानुसार अनुकूल गुण आधारित संपूर्ण राशिभविष्य पीडीएफ फाईलही विनामूल्य खास दिवाळी भेट...... व्हिडिओ पाहण्यासाठी.... पुढील लिंक उघडा..... 👌👌 https://youtu.be/JQFPsdMZvm0?si=jmUdM-yIhUKSc2mJ आजच आपले नाव व व्हाट्सअप मोबाईल नंबर देऊन होकार कळवा...💐 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 😄 "मुक्तसंवाद-'आत्मनिर्भर व्हा-तुम्हीच तुमच्या व्यवसायाचे मालक व्हा- भाग 1" :😀 "अभिवाचन क्रमांक 405 !": .💐"दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा सण. आत्मविकासासाठी आणि प्रगतीसाठी श्री सरस्वती पूजन अर्थात अविरत विद्याभ्यास आणि शस्त्रपूजन अर्थात कौशल्यवर्धन करण्याचा प्रारंभ ! या निमित्ताने ही मुक्तसंवादाची मालिका श्री सुधाकर नातू सादर करत आहेत. सध्या जागतिक आणि आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती अनिश्चित आणि आव्हानांची झाली आहे. अशावेळी स्वदेशी व आत्मनिर्भरतेचा नारा अत्यावश्यक होत आहे. केवळ तेवढेच नव्हे, तर सध्याच्या विचित्र परिस्थितीमुळे आधीच भेसूर बेकारीची खाई असताना, हजारोंच्या नोकऱ्या गमावल्या जात आहेत. अशावेळी वैयक्तिक ज्ञान आणि कौशल्य यांचा यथोचित उपयोग करून आत्मनिर्भर कसे व्हायचे हे येथे सोदाहरण उलगडले आहे !":.💐 मार्गदर्शक आणि प्रेरणादायी मुक्त संवाद ऐकण्यासाठी पुढील ध्वनीफित उघडा....!":.💐 👍"शारदोत्सव-वाचता वाचता, वेचलेले भावलेले !":👍 💐"गीतरामायण'कार अर्थात आधुनिक ' 'वाल्मिकी'गदिमा अर्थातच ग दि माडगूळकर, मराठी चित्रपट व साहित्य शारदेतील प्रत्येक अंगामध्ये आपल्या बावन्नकशी प्रतिभेची मोहोर उमटवणारे व्यक्तिमत्व. 'नक्षत्रांचे देणे' हा 14/15 वर्षांपूर्वी त्यांच्या गीतांवर आधारित TV वरील कार्यक्रम विलक्षण लोकप्रिय होता आणि त्याचाच नवा आविष्कारही रसिकांच्या प्रेमामुळे आता साजरा होत आहे. मी सहसा कथासंग्रह वाचत नाही, परंतु अचानक मला 'गदिमां'चे " कृष्णाची करंगळी" या मजेशीर नांवाचे पुस्तक वाचायला मिळाले. त्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील वातावरणाच्या बारा कथा आहेत. प्रत्येक कथा वाचताना 'गदिमा' आपल्याला स्वतःबरोबर घेऊन जात, संपूर्ण चित्रमय अशा घटना उलगडत जातात. सोपी रसाळ भाषा आणि प्रत्येक कथेच्या शेवटी अचानक खटका मारावा असा वेगळेच वळण देणारा झटका तुम्हाला अचंबित करतो. ह्याच पुस्तकामध्ये 'साकेत' प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांची यादी पाहून मी त्यातील 'तीळ आणि तांदूळ' तसेच 'तुपाचा नंदादीप' ही दोन्ही पुस्तके लगोलग वाचली आणि मला ह्या भाषाप्रभूंचे शब्दांवरील श्रेष्ठत्व नजरेस आले. आपणही 'गदिमां'ची गद्य पुस्तके जरूर वाचावीत !":💐 माझ्या ब्लॉगवर मी गेली 4/5 वर्षे विविध विषयांवर लेख लिहीत आलो आहे आणि आता त्यांची संख्या 650 हून अधिक झाली आहे. 'ह्या हृदयीचे ज्ञान उदय त्या हृदयी' जाणीवा विस्तारित करण्याच्या माझ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अधून मधून मी माझ्या लेखांच्या लिंक्स सादर करत आहे. त्यातीलच ही लिंक उघडा आणि लेख जरूर वाचा.... https://moonsungrandson.blogspot.com/2025/08/2_27.html 🤣 "रुखरुखणारी लक्षवेधी नोंद !":🤣 😇 "अ. भा. नाट्य परिषदेच्या दादरमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची उपेक्षा!":😇 💐 "मराठी नाटकांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत हे सोबतच्या शतक महोत्सवी नाटकांच्या वृत्तामुळे समजून येईल. तसेच दररोजच्या वर्तमानपत्रांच्या पुरवणीमध्ये पानपानभर नाटकांच्या जाहिराती असतात, त्यामानाने मराठी सिनेमा जाहिरात शोधावीच लागते. नाटकांचा सध्या अक्षरशः महापूर आला आहे आणि ही एक निश्चितच आनंदाची बाब आहे !":💐 😀 "पण जरा बारकाईने बघितले तर एक लक्षवेधी नोंद प्रत्येकाला घ्यावीच लागेल. ह्या सर्व जाहिरातींमध्ये होणारे नाट्य प्रयोग, अभावानेच मराठी नाटकांची अग्रगण्य संस्था अखिल भारतीय नाट्य परिषद यांचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आढळतेञ!"🤣 आटापिटा करून वर्षानुवर्षे पाठपुरावा करून ज्या थोर नाट्यकर्मींनी हे नाट्यगृह व्हावे आणि हक्काचे असे नाटकांच्या प्रयोगासाठी ते उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अखेर यश मिळूनही, सध्या त्याची अशी उपेक्षा कां बरे होत आहे, याचा रसिकांनी तसेच समस्त नाट्यकर्मींनी गांभीर्याने विचार करावा असेच सुचवावेसे वाटते !":🤣 🤣"कुठेतरी काहीतरी चुकतंय !":🤣 तीळ तांदूळ, तुपाचा नंदादीप 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 😄 "मुक्तसंवाद-'पेराल तसे उगवेल'!":😀 " अभिवाचन क्रमांक 404!": 😀 " दररोज 'अस्मिता वाहिनी' मुंबई आकाशवाणीच्या केंद्रावर सकाळी साडेसहा वाजता 'चिंतन' हा प्रेरणादायी कार्यक्रम होत असतो. 'ह्या हृदयीचे त्या हृदयी' करत अनेक मार्गदर्शक विचार आपल्याला ऐकता येतात आणि प्रत्येक दिवस अर्थपूर्ण करता येऊ शकतो. हे समजण्यासाठी अशाच एका चिंतन कार्यक्रमाचे सार या व्हिडिओत व्यक्त केले आहे....😀 त्यासाठी पुढील लिंक उघडा....😀 https://youtu.be/AOBE11SU9qM?si=U6pbzm2gCZPxw7dk 👍" एक अंतिम सत्य- अपरिहार्य परस्परावलंबन !":👌 💐 "सध्या आत्मनिर्भरतेचे गोडवे गाणे आवश्यक आहे, ह्यात शंकाच नाही. मात्र अशा परिस्थितीतही आपण एकमेकांवर किती, किती अवलंबून असतो ते विसरू नये. अनेक माणसे आपल्या जीवनात कधीही येत नाहीत आणि तरीही ती आपल्याला त्यांच्या परीने आपले जीवन सुकर, सुलभ होण्यासाठी मदत करत असतात, कष्ट घेत असतात, ते उलगडणारा हा विडीओ......💐 त्यासाठी पुढील लिंक उघडा... 💐 https://youtu.be/ItuHKhHyl7o?si=ngPXCxi6GUFsk1AX 👍मुक्तसंवाद- 'माणसाला मिळालेले अलौकिक वरदान वाणी आणि शब्द!":👍 💐"वाणीआणि शब्द या माणसाला मिळालेल्या सर्वोत्तम वरदानामुळे त्याच्या आयुष्यात क्रांती झाली आणि उत्तरोत्तर संपूर्ण निसर्गावर राज्य करायची संधी या दोन शक्तीमुळे त्याला मिळत गेली या दोन किमयागार शक्तींची माहिती देणारा हा व्हिडिओ अंतर्मुख करणाराच आहे !":💐 त्यासाठी पुढील लिंक उघडा... 💐 https://youtu.be/ekqQoRN4bs4?si=mb8GF1pKBNgIZ3ZL 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 😄 " आहे मनोहर तरी- भाग 47 !": " अभिवाचन क्रमांक 406 !": 💐 " पहिल्या 'खोगीरभरती' या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची कहाणी सांगता सांगता, श्रीमती सुनीताबाई देशपांडे यांनी, वैविध्यपूर्ण बहुरूपी असे सर्वांगीण कौशल्ये असणारे, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले त्यांचे पतीराज 'पुल- उर्फ भाई आणि त्यांच्या स्वभावांमधला, जीवनशैलीमधला फरक तसेच विरोधाभास ह्या भागामध्ये पारदर्शक पद्धतीत उलगडला आहे. संसारामध्ये असेच एकमेकांना पुरक असणे आवश्यक असते, हाच त्यावरून मिळणारा बोध होय. या अभिवाचनासाठी वाचकस्वर असलेल्या अनामिकेचे आभार. ऐकण्यासाठी पुढील लिंक उघडा....💐 https://drive.google.com/file/d/17D83JL59qtmugA4bOK0xWlmqqxl96hCG/view?usp=drivesdk

"सोशल मीडियावरील माझी सरमिसळ भाग एक

👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 👍""पुढचं पाऊल':1 नोव्हेंबर'25 ते 31 डिसेंबर'26 चे एकमेकाद्वितीय प्रत्येक राशीचे राशीभविष्य- भाग 4 !":👌 " अभिवाचन क्रमांक 402 !": 💐"नवरात्रीच्या आपल्या या 4 थ्या दिवशी आपल्या अभिवाचन मंचाचा 402 वा भाग प्रकाशित करताना आम्हाला खरोखर आनंद होत आहे. या भागात पुढील तीन राशींचे वरील कालखंडाचे संपूर्ण राशिभविष्य लिहिले आहे, श्री सुधाकर नातू यांनी आणि त्याचे अभिवाचन श्री उदय पिंगळे करत आहेत....💐 येथे मकर कुंभ आणि मीन राशीचे राशीभविष्य, पुढील लिंक उघडून ऐका !":💐 https://drive.google.com/file/d/1CUHtCqndmA_fsL3_TcaeG_A_NvRe2UlE/view?usp=drivesdk 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌 👍""पुढचं पाऊल':1 नोव्हेंबर'25 ते 31 डिसेंबर'26 चे एकमेकाद्वितीय प्रत्येक राशीचे राशीभविष्य- भाग 3 !":👌 " अभिवाचन क्रमांक 401 !": 💐" 👍" छाप पडलेले शब्द !": 😀 "नको रे मनोरे, असे हे मनोरे !":😀 👍 " मुंबईसारख्या शहरात जमिनीची अपुरी उपलब्धतता आणि प्रचंड लोकसंख्या याचा विचार करता उंचच उंच मनोरेंसारख्या शेेकडो इमारती बांधल्या जात आहेत. त्या इमारतीमधील जवळजवळ सगळेच सदनिकामालक प्रवेश करण्यापूर्वी आपआपल्या सदनिकेची सजावट करतात. पण अशा वेळेस मूळ संरचनेला कुठलाही धोकादायक धक्का न पोचवणे, हे नितांत गरजेचे कसे असते याकडेच सोबतचा वाचनीय लेख अधोरेखित करतो. बेदरकारपणे आपल्या इच्छेनुसार संरचनेमध्ये अनिष्ट असा बदल केल्यामुळे अशा इमारती धोकादायक बनतात, काही इमारती कोसळल्याचे आणि त्यापायी जिवितहानी आणि वित्तहानी झाल्याची वृत्ते आपण अधून मधून वाचत असतो. त्याकरता, अशा प्रत्येक उंच उंच मनोऱ्यामधील सहकारी सहनिवासाने आपल्या सदस्यांसाठी सजावट आणि दुरुस्ती यासाठी निश्चित अशी आचारसंहिता बनवून तिचे काटेखोरपणे पालन करणे किती आवश्यक आहे, हेच ह्या लेखावरून संबंधित सहनिवासांच्या नियमकमंडळाने ध्यानात घ्यावे !":👍 त्यासाठी पुढील लिंक उघडा... https://youtu.be/PG_1lukPV84?si=fyv3Q5RG2wvWdEJs // हा व्हिडिओ आपण मोबाईलवर तसेच अधिक परिणामकारक रीतीने पाहण्यासाठी घरातील टीव्हीवर देखील शेअर करून पाहू शकता // 👍"वाचता वाचता, वेचलेले भावलेले !":👍 😀 'तोंडाळासि भांडो नये I वाचाळासी तन्डो नये I संतसंग खंडो नये I अंतर्यामी II' # संतवचन- विक्रमादित्य न पणशीकर 👍 "राजकारणाचा विशेषता महाराष्ट्रातील गढूळलेल्या वातावरणात नेतेमंडळींनी सातत्याने जपावा अंतर्यामी असेच हे संत वचन !":👍 @@@@@@@@@!!!!! 😀 "जो गतीत तो प्रगतीत !" # प्रवीण दवणेंच्या पुस्तकाचे शीर्षक 👍 सध्याच्या स्वदेशी आणि आत्मनिर्भर होण्याच्या दवंडी साठी चपखल असा संदेश !":👍 @@@@@@@@@@@!!!!! 👍 "छाप (पड)लेले शब्द @ 1":👌 ☺️"आता तरी, डोळे उघडा !":😢 "विविध संणांचे वेळी, कानठळ्या बसतील इतक्या आवाजांत ढोल ताशे आणि इतर वाद्ये, असंबंधित गाणी वाजवत सार्वजनिक शांतता भंग करून आपण इतरांचे नकळत जीवन असह्य करत असतोच, शिवाय त्यामुळे सर्वांच्या आरोग्याला धोका पोहोचवत असतो. आनंद घेताना संयम व मर्यादा पाळणे आपण कधी शिकणार? समंजस विचारी सुसंस्कृत जबाबदार नागरिक आपण कधी बनणार? सहाजिकच सोबतच्या बातमीमुळे सध्या सर्वच उत्सव हे बाजारू तमाशा कसे बनले आहेत आणि त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच कसे भोगावे लागत आहेत, हे या लेझरच्या प्रखर किरणांच्या, तसेच डीजेंच्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजाच्या अतिरेकामुळे डोळ्यांवर अनिष्टच परिणाम व बहिरा धोका, अशा गोष्टी होत आहेत हे दुर्दैव ! वर्षभर आनंद साजरा करायला इतके उत्सव आपल्या येथे असतात की, त्यामुळे खरं तर, आनंदी देश या जागतिक क्रमवारीत आपला वरचा क्रमांक हवा. पण आपण मात्र खूप खूप खाली आहोत याचा कोण विचार करणार? ह्या पार्श्वभूमीवर मला फेसबुकवरील माझा नुकताच प्रसिद्ध केलेला इंग्रजीमधला हा संदेश आठवला: "La Tamasha !": Our Festivals seem to hv lost their original purpose and they hv become Events a La Tamasha and most importantly Nuisance of Noise pollution. Like there is a policy consideration of banning cigarette smoking in public places in festivals too, programmes should not be in open places with music playing thruout the day and upto almost midnight, as the desired levels of decibles of noise and the time limit are never controlled to the extent required. Who is going to take a note seriously to the fact that Like cigarette smoke, loud continuous loud noise too damages heath. Moreover such noise disturbs students' studies and patients too. When are we all going to be wise and learn the fundamental principle of a cooperative living, ' to do only that which is at least not harmful to others.' Honestly, why others should suffer, just for your own enjoyment?" सारांश, "सार्वजनिक उत्सवां"तील उन्माद व विक्रुतीकरण पाहून, स्वर्गात माननीय "लोकमान्य" विषादाने म्हणतील: "हेचि फळ काय मम तपाला?"! आता तरी जागे व्हा आणि डोळे उघडा !

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

Different Strokes

# The Seven Wonders of the world are to see, to hear, to touch, to taste, to feel, to laugh & to love. # Reading books gives one, an experience of living hundreds of lives, in One Life! # Nature is large & large hearted, Nature is immaculately disciplined, Nature takes into its wings everything that exists- be that living beings or non-living beings. We must salute the Nature and always remember that our existence totally, solely depends on Nature. Hence it’s but Natural to preserve Nature. # Stones, Mountains, buildings and all the non-living beings have size, shape and mass but they don’t have Life. What they have is unparallel determination to be stationary and remain where they are for ages. We must take that unparallel determination from them. # Birds have wings; with them, they are able to do that, which no other living being can do; they fly. Birds fly anytime, anywhere & are able to take a bird’s eye view of the Nature, of the World around. # Our imagination is like wings of birds, with that we can travel any time anywhere; the speed of our imagination is infinite, at times, even more than speed of light. # Leaves of trees are green in colour; green is colour of nature, colour of life, they give Life to trees. Flowers are colourful, smooth & tender , beautiful; they give meaning, character to the plants. One’s character gives meaning to his personality. Roots are firm, roots spread to offer base, foundation to the plant. Our culture, values are roots of our lives.

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

" आशिया कप विजयानंतरचे कवित्व-बिंब/ प्रतिबिंब":

महाराष्ट्र टाइम्स मधील वाचकाचे हे पत्र बोलके आहे. ह्या स्पर्धेनंतर क्रीडाबाह्य जे काही कवित्व होत गेले ते बघता केवळ पाकिस्तान विरुद्ध नव्हे तर आशिया कप वरच बहिष्कार घालायला हवा होता असे वाटू शकते. त्यामुळे आपल्या देशाचे नुकसान झाले नसते, ऑपरेशन सिंदूरच्या गरजेचे व वास्तवतेचे दर्शन झाले असते. एकाच नाण्याला दुसरी बाजू असते याची जाण ठेवली तर चांगलेच. सोशल मीडियावर याच विषयावर रंगलेली ही जुगलबंदी जरूर वाचा B: 😂 *आज देशविघातक आणि भारतद्वेषी कोण हे सहज स्पष्ट उघड झाले. सोशल मीडियावर सतत कार्यरत असलेल्या राजकिय, समाजसेवी, विचारवंत, सर्व विषयांचे जाणकार टीकाकार यांनी भारतीय टीमच्या विजयाचा जयजयकार केला नाही. टाळ्या वाजवल्या नाहीत. उत्सव साजरा केला नाही. त्यात भाग घेतला नाही. अद्वितीय टीमचे अभिनंदन केले नाही. ही भारताची टीम होती आणि त्यांनी जिहादी विरोधकांचा एकदा नाही तर तीनदा निर्णायक पराभव केला. भारताच्या तरुणाईने मैदान मारले, गाजवले.* *परंतु देशद्रोही चूप बसले. भारताचा विजय त्यांना पचला नाही, आवडला नाही. आता देशविघातक कोण हा प्रश्न विचारला जाणार नाही.* 😂 *जय भारत !* 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳 A: मुळात या आशिया कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारताने खेळणे हे नजीकच्या पाकच्या दहशतवादी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर संपूर्णतया चुकीचेच होते हे विसरून चालणार नाही. खरे देशद्रोही कृत्य कोणी केले हे सांगणे न लगे B: : 🙋‍♂️😂😂😂😂😂😂 *यातल्या अर्ध्या विधानाशी मी सहमत आहे. भारत सरकारने आशिया कप मधे खेळायला नको होते असे तत्व म्हणुन मला आजही वाटते. परंतु शांतपणे विचार करता हे ध्यानात येते की ही समस्या एका स्पर्धेची नाही तर यापुढे विविध खेळांच्या ज्या आतंरराष्ट्रीय स्पर्धां होणार आहेत त्यांच्याशी संबंधित आहे. येत्या काळात हॉकीच्या स्पर्धा आहेत. त्यात पाकिस्तान असणार आहे. मग त्यात भारताने खेळायचे की नाही, हा प्रश्न दूरगामी परिणाम करणारा आहे. आपण खेळता कामा नये ही तात्विक भूमिका झाली. परंतु काल जे घडले, ज्या तर्हेने पाकिस्तानची बेइज्जती झाली, ते पहाता हा चांगला पर्याय आहे असे वाटते. याने आपले खेळाडु जागतिक मंचावर बाजुला पडणार नाहीत. परंतु त्याचा भारतीय टीमचे अभिनंदन न करण्याशी सुतराम नाही. ते कृत्य देशद्रोहीच आहे.* ज्यांना हे चुकीचे वाटत असेल त्यांनी तसा ओरडा करत रहावा. त्याने काहीही फरक पडणार नाही. तसेच पाकिस्तानशी खेळणे म्हणजे देश तोडणे नाही की आतंकवादी कृत्ये करणे नाही. भारताच्या सर्वांगीण प्रगतीचा द्वेष करणे, भारताचे वाईट चिंतीणे, भारताचे तुकडे करण्याची भाषा करणे, भारताच्या परदेशी शत्रूंशी हातमिळवणी करणे याला देशद्रोह म्हणतात. ते कोण करत आहेत ते देशभक्त भारतीयांना आता चांगले कळले आहे. देश त्यांना माफ करणार नाही. तसे बघितले तर भारताने चीन बरोबर व्यापारी वाटाघाटी करता कामा नये. पण भारत त्या करत आहे. भारताने चीनमधे SCO परिषदेत भाग घेतला. भारताने याआधी पण या परिषदेत भाग सातत्याने घेतला आहे. ब्रिक्स सारखाच हा एक आंतरराष्ट्रीय मंच आहे. त्याचा अर्थ भारत चीन जवळ जात आहे असे कोणाला वाटत असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय परराष्ट्रनीती काय असते ते समजत नाही. येत्या नजिकच्या काळात सीमेवर भारत चीन झडपा झाल्या तर आश्चर्य वाटुन नये. आपल्या सीमेवरील परिस्थिती नाजूक आहे. आजचा भारत मियां नेहरुंचा नांगी टाकणारा भारत नाही याची चीनला आधीपासून गलवान संघर्षापासुन जाणीव झाली आहे आणि ऑपरेशन सिंदुर दरम्यान निव्वळ एका तासात पाकिस्तान आणि अमेरिकेला जो मार पडला, त्यानंतर चीन थोडी सावध भूमिका घेतो आहे. भारतीय सैन्याबरोबर लढण्याची त्यांची कुवत नाही आणि हिम्मत पण नाही. परंतु शेवटी तो विषारी साप आहे हे भारताला चांगले माहीत आहे. येणारा काळ कठीण आहे, देशभक्त भारतीय बाहेरी आणि देशांतर्गत शत्रूंशी लढण्यास सज्ज झाले आहेत. भारताला देशातल्या देशविघातकांपासुनच जास्त धोका आहे. त्यांचा एक प्रतिनिधी सोनम वांगचुक गजाआड गेला आहे. आता इतरही जातील. यापुढे सरकार ते सहन करणार नाही. लोकशाही आणि घटना यांच्या आड चाललेले हे थोतांड आहे. *जय भारत, जय श्रीराम!* 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳 A : या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळणे म्हणजे पैशासाठी केलेले एक दुक्रुत्य होते. आपण म्हणू तीच पूर्व दिशा किंवा आपले तेच नेहमी खरे अशी वृत्ती असणे म्हणजे एक प्रकारे हुकूमशाहीच होय. या परिघाच्या बाहेर येऊन समतोल सजग दृष्टीने कोणत्याही गोष्टीकडे पाहणे गरजेचे असते. नोबडी इज राईट ऑल द टाईम. जे वर जाते ते केव्हा ना केव्हा खाली येऊ लागते.. बिगिनिंग ऑफ द एंड चालू झाले आहे B: 🙋‍♂️😂 आपल्याकडे, आपल्या क्रिकेट संस्थांकडे भरपूर पैसे आहेत. मतभिन्नता असणे यात काहीच चूक नाही. पण भारताचे वाईट चिंतीणे याला काय म्हणतात? भारत संपावा अशी इच्छा बाळगणे याला काय म्हणतात ते सांगायला नको. *आपल्याकडे नेहमी बोलले जाते की "शुभ बोल रे नाऱ्या!* *जय भारत, जय श्रीराम !* 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳 A: येथे उल्लेख केलेले विशिष्ट आपले तेच म्हणणे खरे म्हणणारे म्हणजे भारत नव्हे. त्यामुळे सोईस्कर गैरसमज करून घेणे चुकीचे. B: 🙋‍♂️😂😂😂😂😂😂😂 *भारतद्वेषी या निमित्ताने उघड्यावर आले हे निश्चित. यांची आता सनातनी सुसंस्कृत सामर्थ्यवान भारतात गय केली जाणार नाही.* A: येथे भारत द्वेषाचा प्रश्न येतच नाही. एकांगी विचारधारा सोडून देणे हिताचे

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

"बोल अमोल !":

💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-241 !":👌 😙 "कोणी विचारल्याशिवाय आपले काय काय भले होते आहे, हे स्वतःहून कधीही सांगू नये. कारण हल्ली माणसांच्या प्रवृत्ती असुयेने बऱ्याच वेळेला भरलेल्या असतात. त्यामुळे तुमचे चांगले होते याचे जसे त्यांना काहीच महत्त्व नसते, तसेच ते तसे होते आहे याचे त्यांना मनातून वाईटच वाटते, हे ध्यानात घ्यावे !" 😙"सजग समंजसपणाची त्रिसूत्री": "विचारी व्हा व्यक्त व्हा मुक्त व्हा": ह्या संकल्पनेचा कल्पनाविस्तार तिचा अर्थ आणि मर्म उलगडून सांगण्यासाठी मी आपल्या मार्गदर्शनासाठी मांडत आहे. त्याशिवाय उदाहरण देत दुसरा भागही आपल्यासमोर सादर करत आहे. प्रथम सोपे म्हणून ध्वनिफीत बनवली, तिचाच पुढे व्हिडिओ बनवला आणि त्याशिवाय 'ऑडिओ टू टेक्स्ट'ही प्रणाली वापरून त्याचे शब्दरूपही तयार करू शकलो. जे मला माझ्या ब्लॉगवर टाकता येईल. सजग शहाणपणाचे हे देखील एक लक्षण आहे की, आपण विचार करून आव्हान स्वीकारत संकल्पनेचा असा माध्यमांतराद्वारे विस्तार करू शकतो. पहिल्या भागासाठी पुढील लिंक उघडा.... https://youtu.be/3UhVtNmluHE?si=eKkKm-7heLtpxZhd

"Different Strokes!":

## "Game of Politics !": Most of the observations one makes, are based on the perceptions of the situation at a given point in time. Human perceptions are amalgam of information available from media and other sources, beliefs, experience of self, others and so on.... Ultimately in a political game of Power, such public perceptions only decide the outcome. Rationality at least in Indian Politics unfortunately, gets a back seat, compared to emotionality, though prudence demands otherwise. In such a case, the outcomes and hence possibly, progress and development possibly could have been much better. In any case, it's wise that one should therefore, refrain himself from participating in social media, in this complex area of politics. ## Most of the observations one makes, are based on the perception of the situation at a given point in time. Human perceptions are amalgam of information available from media and other sources, beliefs, experience of self, others and so on....Ultimately in a political game of Power, such public perceptions only decide the outcome. Rationality at least in Indian Politics unfortunately, gets a back seat, compared to emotionality, though prudence demands otherwise. In such a case, the outcomes and hence possibly, progress and development possibly could have been much better. In any case, it's wise that one should therefore, refrain himself from participating in social media, in this complex area of politics. ## True and meaningful observation is not about what happens around but about what you think of your impressions of it within. ## Opportunity is like dew on leaf; more you try to grab it before it goes away. ## Everyone is harping about Economic and Material Development; but what about Ethical and Moral Development? If it is in place, then all other developments would follow and percolate equally, down the line. ## Spend at least some time every day in thinking within; it's an excellent exercise for your mind & intelligence. ## There is a definite Peak of achievement for every one; he cannot go beyond that. Trouble is each one's peak is different. All the stress is the by product of comparison arising out of such differences in Peaks. When most of the films turn out to be flops, why those associated with it, can't' judge before, what common cinegoers judge, afterwards? ##

रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

" सोशल मीडियावरील मुशाफिरी बिंब प्रतिबिंब

[21/9, 10:08 AM] Gupte Dilip Sr Ctzn: *ट्रम्पचा 'व्हिसा बॉम्ब' म्हणजे भारतासाठी लॉटरीच !* अमेरिकेचा माथेफिरू राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याने बहुधा अमेरिकेला गाळात घालून भारताला संपन्न बनवण्याचा विडाच उचलला असावा ! लांबचा विचार न करता तात्पुरती सोय बघण्याच्या त्याच्या सवयीमुळे 'टॅरिफ बॉम्ब' मागोमाग आज त्याने 'H1 B' व्हिसा इच्छुकांना दर वर्षी १,००,००० डॉलर (म्हणजे ८८ लाख रुपये) एवढी फी अमेरिकन सरकारला द्यावी लागेल असा फतवा काढून भारतीयांवर 'व्हिसा बॉम्ब' भिरकावला आहे. पण अमेरिकेत स्थायिक झालेले एक व्यावसायिक आणि लेखक आदित्य सत्संगी यांनी ट्रम्प यांचा हा फतवा म्हणजे स्वतःच्या पायावर मारलेली कुऱ्हाड असून उलट भारताला लागलेली ही 'लॉटरी'च आहे असा दावा केला आहे. अमेरिकेवरील दुष्परिणाम आदित्य सत्संगी हे मूळचे सोलापूरचे असून काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे नागरिक बनले आहेत. रामायण, महाभारत, भागवत, भारतीय तत्वज्ञान वगैरे विषयांवर आजपर्यंत त्यांची १७ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. 'अल्टरनेट मीडिया' चॅनेलवर बोलताना त्यांनी ट्रम्पच्या ताज्या घोषणेचे अमेरिकेच्या अर्थकारणावर होणारे दुष्परिणाम सांगितले. अमेरिकेत गेल्यावर्षी 'H1 B' व्हिसावर गेलेल्या भारतीयांचं प्रमाण सर्वात जास्त- म्हणजे ७२% एवढं होतं. त्याखालोखाल चिन्यांची संख्या ११% एवढी होती. मात्र चिनी तरुण भारतीयांसारखे कष्टाळू आणि विश्वासार्ह नसतात. तंत्रज्ञान चोरून ते ते गुपचूप चीनला पाठवतात. भारतीय तरुण तसं करत नाहीत. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांचा विश्वास भारतीयांवर जास्त असतो. कदाचित म्हणूनच सर्व अव्वल अमेरिकन कंपन्यांचे 'सीइओ' आज सहसा भारतीय आहेत. मात्र तो सुंदर पिचई असो, सत्या नाडेला असो, नील मोहन असो, नाहीतर शांतनू नारायण असो; अमेरिकन लोक भारतीयांचा 'टेक कुली' (Tech Coolie) असा तुच्छ उल्लेख करतात. कारण भारतीय तरुण आपल्या डिग्र्या, बुद्धी आणि कौशल्य घेऊन अमेरिकेत जातात आणि दुसऱ्यासाठी हमाली काम करत बसतात. स्वतःसाठी ते काहीच करत नाहीत. मिळणाऱ्या पैशामुळे आणि सोयीसुविधांमुळे या तुच्छतेकडे आणि दुय्यम नागरिकत्वाकडे ते कानाडोळा करतात. पण मोदींनी त्यांना पूर्वीच बजावून ठेवलं होतं, की 'परदेशी भारतीयांनो, तुमचा एक पाय मायभूमीत असुदे, नाहीतर एकदिवस तुमची 'न घर का न घाटका' परिस्थिती होऊ शकेल !' ती वेळ आता आली आहे. भारताकडे पुनरागमन 'H1 B' व्हिसा ३ वर्षांसाठी असतो आणि त्याची मुदत आणखी ३ वर्षांसाठी वाढवली जाऊ शकते. 'ग्रीन कार्ड'साठी अर्ज करून वर्षानुवर्षे या व्हिसाचं नूतनीकरण करत वाट बघावी लागते. अमेरिकेतील तरुण भारतीयांचा पगार वर्षाला सरासरी ६०,००० डॉलर एवढा असतो आणि हळूहळू तो वाढत जातो. त्यामुळे दरवर्षी १,००,००० डॉलर सरकारला केवळ या व्हिसासाठी मोजणं ९०% भारतीयांसाठी किंवा त्यांच्या कंपन्यांसाठी सुद्धा अशक्यप्राय गोष्ट आहे. हे भारतीय तरुण भारतात परत येतील, एव्हढंच नव्हे, तर त्यांच्या अमेरिकन कंपन्याही 'ऍपल' प्रमाणे भारतात स्थलांतरित होतील. आणि हा प्रश्न केवळ 'आयटी' मधल्या भारतीयांचा नसून पेशाने डॉक्टर आणि संशोधक असणाऱ्या भारतीयांचा सुद्धा आहे. हे सगळे परत आले तर अमेरिकेत वैद्यकीय आणि संशोधकीय समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. येताना हे लोक आपली घरे विकतील. त्यामुळे 'रिअल इस्टेट' क्षेत्र कोसळून पडेल. याव्यतिरिक्त या लोकांमुळे तिथे अस्तित्वात असणाऱ्या इन्शुरन्स कंपन्या, हॉटेले, मॉल्स वगैरे गोष्टीही भराभर बंद होण्याची शक्यता निर्माण होईल. परिणामी, अमेरिका म्हणजे केवळ प्लम्बर, इलेक्ट्रिशियन आणि सुतार यांचं वास्तव्य असलेला एक दरिद्री देश म्हणून उरेल. भारताला लॉटरी या येणाऱ्या लोंढ्याचा भारताला मात्र प्रचंड लाभ होईल. इथे येऊनही आयटीवाले अमेरिकेएवढंच कमावतील. त्यांच्या मागोमाग येणाऱ्या कंपन्या इथे नवे रोजगार निर्माण करतील. बंगळूर किंवा पुण्यासारखी कित्येक 'आयटी हब्ज' भारतात निर्माण होतील. खेडोपाडी डॉक्टर आणि पेशंटचं जे अत्यल्प प्रमाण आहे, ते खूपच सुधारेल. बुद्धिमान संशोधकांची भारताला कायम जाणवणारी उणीव नष्ट होईल आणि भारताच्या तिजोरीमध्ये दरवर्षी अंदाजे ३५० बिलियन डॉलर एवढी भर पडेल. एकंदरीत कावळ्याच्या शापाचा गोमातेवर परिणाम होत नाही, त्याप्रमाणे ट्रम्पच्या शिव्याशापांचाही भारतमातेवर परिणाम होणार नाही. उलट या फतव्यामुळे भारताला संपन्नता आणि समृद्धीचं वरदान मिळण्याची शक्यताच अधिक आहे ! - हर्षद सरपोतदार [21/9, 10:29 AM] Sudhakar Natu: चर्चेत असलेले संकट हे भारतासाठी संधीच आहे असे मी माझ्या संदेशात नमूदच केले आहे. मात्र या लेखातील स्वप्नरंजन कितपत प्रत्यक्षात येईल अशी शंका वाटण्याजोगी सध्याची वास्तवाची परिस्थिती आहे. सर्वंकष पसरलेला भ्रष्टाचार विशेषत: प्रशासकीय गलथांपणा, हलगर्जी विकास योजना प्रत्यक्षात आणण्यामध्ये होणारा विलंब याकडे दुर्लक्ष कसे करून चालेल? हिंजेवाडी व बंगलोर मधील रस्ते वाहतूक व इतर व्यवस्थेची जी दयनीय अवस्था झाली आहे. ही दोन केवळ वानगी दाखल उदाहरणे. उशिरा का होईना आपल्या धोरणकर्त्यांना शहाणपण सुचले, तर चांगलेच ! ता.क. आकाशातील पाळणे या अभिवाचन मंचावर नुकतीच प्रकाशित केलेली 'डॉलरचे अवमूल्यन' ही ध्वनिफीत जरूर ऐकावी [21/9, 10:37 AM] Gupte Dilip Sr Ctzn: 🙋‍♂️😂 *भारतासाठी ही एक सूवर्णसंधीच आहे. आज आपल्या देशातल्या, काँग्रेस धार्जिण्या, देशविघातक, मोदी आणि भारतद्वेषींनी भारतसरकारची विदेशनीती, व्यापारनीती, उत्पादनक्षेत्र नीती यावर टीका टिप्पणी चालवली आहे. स्पष्टच बोलायचे तर या लोकांना या क्षेत्रांचा गंधही नाही, जगात सद्ध्या काय चालले आहे ते त्यांना माहीत नाही पण हे लोक सर्वंच बाबतीत तज्ञ आहेत.असो. अमेरिका पप्पु टप्पुला हाताशी धरून भारताला तोडण्याचे अटोकाट प्रयत्न येत्या काळात करेल. आर्थिक आघाडीवर जे युरोपीय देशांना कधी जमले नाही ते डिडॉलरायझेशनचे काम भारताने मोठ्या प्रमाणावर केले आहे. त्यामुळे इतर अनेक देश खडबडून जागे होऊन त्याचे अनुकरण करण्यास सज्ज झाले आहेत. थोडक्यात जगात एका मोठ्या संघर्षाला तोंड फुटले आहे. नाटो संघटना तुटायला, विखरायला सुरुवात झाली आहे. येत्या काळात आपले हितसंबंध जपण्यासाठी युरोपीय देश भारत आणि चीनशी जोडायला पावले उचलतील. ब्रिटनने अमेरिकेला न जुमानता भारताबरोबर FTA केले आहे. जपानने पण ते पूर्णत्वास नेले आहे. अमेरिकेची ही मोठी डोकेदुखी आहे. आता तर त्यांची भारतात बरोबर सैनिकी संघर्षाची तयारी चालली आहे. म्यानमार, बांगलादेश, नेपाळ आणि भारताच्या पूर्व सीमेवर त्यांना ख्रिश्चन देश बनवायचा आहे. ही योजना गेले २०/२५ वर्षा पासुन आकार घेत आहे. अमेरिकेने परवा बांगलादेशांत आपल्या फौजा उतरवल्या आहेत. भारताला ही सरळ सरळ धमकी आणि चेतावणी आहे. नेपाळमध्ये अलिकडे घडवुन आणलेल्या दंगली त्याचाच भाग आहेत. परंतु तीथे भारताने फासा पलटवला आहे. भारत धार्जिण्या राजघराण्याच्या आणि सैन्याच्या मदतीनी भारताने आपली पंतप्रधान तीथे स्थापीत केली आहे. एव्हढेच नाही तर सैन्य अभ्यासाच्या नावाखाली भारत सरकारने आपले सैन्य म्यानमारमधे उतरवले आहे. परिस्थिती बिकट आहे. परंतु अमेरिकेला पराभुत होऊन नामुष्कीने येथुन बाहेर जावे लागेल हे निश्चित. याआधी ते व्हिएतनाम आणि अफगाणिस्तानातुन पळाले आहेत. सर्व जग याकडे आशेने बघते आहे. याच काळात सर्व इस्लामिक देश, जे काल कतारमधे एकवटले होते ते भारतावर हल्ला पण करु शकतील. अमेरिका त्यांना यासाठी उद्युक्त करेल. जरा थांबा बघा येत्या काळात काय काय घडेल ते. भारतासाठी आणि विकसनशील देशांसाठी हा काळ निश्चित कठीण आहे. जय भारत, जय श्रीराम!* [21/9, 10:44 AM] Gupte Dilip Sr Ctzn: 🙋‍♂️ *हा भ्रष्टाचार ही काँग्रेसच्या ६०/७० वर्षाच्या देशविघातक कारभाराची देणगी आहे. तो समाजात इतका मुरला आहे की त्यासाठी काही पिढ्या जाव्या लागतील. परंतु पंतप्रधान, केंद्रीय सरकार पातळीवर मनमोहनसिंगांच्या काळात झालेला भ्रष्टाचार साफ बंद झाला आहे. गेल्या दहा वर्षांत एकही प्रकरण न्यायप्रविष्ट झाले नाही आणि सर्वोच्च न्यायालयात टीकले नाही. भ्रष्टाचारी विरोधक आणि त्यांच्या परीवारांचा खात्मा होणे गरजेचे आहे. त्यांची सुरुवात झाली आहे.* [21/9, 10:47 AM] Sudhakar Natu: जगातील प्रथम व दुसऱ्या क्रमांकाची लोकशाही असलेल्या देशांमध्ये या अशा प्रकारचे पराकोटीचे वितुष्ट निर्माण होणे, त्याबरोबरच शेजारी जवळजवळ सर्वच राष्ट्रांशी आपले संबंध बिघडलेले असणे, ही आपल्या परराष्ट्र धोरणाची घोडचूकच नव्हे कां? [21/9, 11:03 AM] Gupte Dilip Sr Ctzn: 🙋‍♂️ *अमेरिकेत "लोकशाही" आहे ही एक अज्ञानी समजुत आहे. अमेरिका हा एक निर्वासितांनी बनलेला, संस्कृतीहीन, आतंकवादी आणि साम्राज्यवादी देश आहे. तीथले राजकारण अनुकरणीय नाही. आजतागायत आपल्या शस्त्रबळावर, पैशाच्या ताकदीवर दादागिरी करुन त्यांनी जगाच्या व्यापारावर डॉलरची अधीसत्ता स्थापन केली आहे. त्याला आजतागायत अनेक युरोपीय देशांनी विफल आव्हाने देऊन पाहीली. "युरोपीयन युनियन" ची निर्मिती त्यातुनच झाली. "ब्रिक्सची" स्थापना पण यातुनच झाली. या संघर्षाची जाणीव होऊन एकामागून एक देश आज ब्रिक्स मधे सामिल होत आहेत. ही अमेरिकेसाठी मोठीच डोकेदुखी आहे. गेल्या अनेक दशकांची जागतिक लढाई खनिजतेलासाठी, त्याच्या वर्चस्वासाठी होती. आता ती लढाई "रेअर अर्थ खनिजांकडे" वळली आहे. चिंता नसावी, भारत या संघर्षाचे नेतृत्व नक्की समर्थपणे करेल. याची परिणती अमेरिका तुटण्यात, विखुरण्यात होईल. अमेरिकेत त्याची सुरुवात झाली आहे याची खुणगाठ बांधावी. जय भारत!* [21/9, 11:30 AM] Gupte Dilip Sr Ctzn: 🙋‍♂️ *आपले अमेरिकेबरोबरचे संबंध कधीच चांगले नव्हते. आणि ते होणार पण नाहीत कारण आपली उद्दिष्टे वेगळी आहेत. पूर्वी आपण त्यांच्यापुढे नेहमीच नमते घेतल्याने त्यांचे आपल्या विरोधातले चाळे बिनदिक्कत चालु होते. आपण त्यांच्या तालावर नाचत होतो. इंदिरा गांधींनी बांगलादेश युद्धाच्या वेळी अमेरिकेत निक्सन अध्यक्ष असताना उठवलेला आवाज हा त्याला एकमेव अपवाद होता. असो. आपल्या शेजारच्या देशांमधल्या जनतेबरोबर आपले संबंध बिघडलेले नाहीत. आणि येत्या काळात त्या देशांच्या सरकारांबरोबर ते सामान्य होतील. आज अमेरिकेने उभरत्या आणि त्यांना आव्हान देऊ शकणाऱ्या भारतासारख्या विकसनशील देशाविरुद्ध जंगजंग पछाडुन, या देशांमध्ये अराजकता निर्माण करुन आपली प्यादी तिथे बसवुन युद्ध छेडले आहे. परंतु यातुन त्यांचा पराभव निश्चित आहे. मालदीव आणि श्रीलंकेतुन भारताने त्यांना आणि चीनला आधीच हाकलले आहे. इतरत्रही तेच घडेल. आजचा भारत सामरिकदृष्ट्या त्यांना पुरून उरेल. भारताच्या नेत्रुत्वाखाली संपूर्ण आफ्रिका आणि ग्लोबल साऊथ म्हणजेच दक्षिणपूर्व देश एकवटतील आणि अमेरिका व चीनशी सामना करतील. रशियाला भारताची बाजू घ्यावीच लागेल. आपणच काय, कोणीही इतक्या सर्व आघाड्यांवर एकाचवेळी लढु शकत नाही. त्यामुळे भारत सरकारची तारेवरची कसरत चालु आहे. मोदींचे क्वाड मिटींगला न जाता SCO साठी चीनला भेट देणे हा त्याचाच भाग आहे. आजचे आपले परराष्ट्रीय धोरण "राष्ट्रीय हीताचे" आहे. आपण कुठल्याही कळपात नाही. आपले एकाचवेळी इराण आणि इझ्राएल बरोबर चांगले संबंध आहेत. आपण रशिया आणि युक्रेन बरोबर संवाद साधुन आहोत. असो. समोरासमोर कधी बसलो तर हे सविस्तर सांगीन. आजचे आपले परराष्ट्रीय धोरण नेहरुंच्या "Non Aligned Movement" सारखे डागाळलेले नाही. जय भारत!* [21/9, 12:36 PM] Gupte Dilip Sr Ctzn: 🙋‍♂️ *जपान हे अमेरिकेचे नाईलाजाने आजही एक मांडलिक राज्य आहे. दुसऱ्या महायुद्धातील हिरोशिमा, नागासाकी या आतंकवादी घटनांनंतर जपानला अमेरिकेचे प्रभुत्व स्विकारावे लागले. अमेरिकेचे आजघडीला जपानमधे लष्करी तळ आहेत. तीथे त्यांची तैनाती फौज आहे. अमेरिका आणि जपानचे आर्थिक संबंध गुंतागुंतीचे आहेत. गेली काही दशके तो गळफास काढुन टाकण्याचा जपान आटोकाट प्रयत्न करत आहे. परंतु अमेरिका त्यात अडचणी निर्माण करत आहे. जपानचे पूर्व पंतप्रधान शिंजो आबे यांनी मोदींशी मैत्री करुन भारताच्या माध्यमातून जगातल्या इतर विकसनशील देशांशी व्यावसायिक आणि सामरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा खुन झाला. कोणी केला? अमेरिकेच्या इशाऱ्याने नविन पंतप्रधान लादला गेला पण त्याला जनतेनी स्विकारला नाही. म्हणुन शिगेरु इशिबा पंतप्रधान झाले. परंतु त्यांनी आणखीन एक पुढचे पाऊल उचलले. त्यांनी त्वरीत भारत भेट करुन भारताबरोबर अनेक करार केले जे अमेरिकेला पटण्यासारखे नव्हते. अर्थात व्हायचे तेच झाले. त्यांना पण पंतप्रधान पदावरुन पायउतार व्हावे लागले. जपानसारख्या सुसंस्कृत, आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या देशांत ही राजकीय अस्थिरता का असावी? ती कोण निर्माण करत असेल? याचा गांभीर्याने विचार करावा. हे महाराष्ट्रातील टपोरे क्षुल्लक राजकारण नाही.*

सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५

सोशल मीडियावरील मुशाफिरी भाग तीन

सोशल मीडियावर सर्फिंग करणे आणि त्यातून आपल्यालाा भावणारे रुचणारे असे काही संदेश वेचणं ही देखील एक कला आहे. मी देखील अधून मधून हा उद्योग करत असतो त्यामधून गवसलेले हे दोन संदेश तुमच्याही जााणीवा विस्तारित करतील व अंतर्मुख करून जातील अशी आशा आहे... 1 *ट्रीप खूप लहान आहे*... ......*समजून घ्यारे मित्रांनो* 🥰😂🥰😂🥰😂😆🤣😁😄 # Policy driven by votes rather than merit is Penny wise Pound foolish . # Beggaring ourselves by unsustainable inflation thru idiotic policies and rent seeking state. Three monkeys policy. China laughs while India stutters. 🥰😂🥰😂🥰😂😆🤣😁😄 एक स्त्री बसमध्ये चढली आणि एका पुरुषाच्या शेजारी बसताना त्याला तिच्या बॅगांनी मार लागला...परंतु तो पुरुष काहीही बोलला नाही., तो माणूस गप्प बसल्यावर, त्या बाईने त्याला विचारले की तिने त्याच्यावर बॅग मारली, तेव्हा त्याने तक्रार का केली नाही ?? त्या माणसाने हसून उत्तर दिले: "एवढ्या क्षुल्लक गोष्टीबद्दल नाराज होण्याची गरज नाही, कारण "आपला 'एकत्र प्रवास' खूप छोटा आहे....कारण मी पुढच्या थांब्यावर उतरत आहे"..! या उत्तराने महिलेला खूप त्रास झाला....तिने त्या पुरुषाची माफी मागितली आणि तिला वाटले की *ट्रिप खूप लहान आहे..!* हे शब्द सोन्याने लिहावेत..! आपल्यापैकी प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की या जगात आपला वेळ इतका कमी आहे, की निरुपयोगी युक्तिवाद, मत्सर, इतरांना क्षमा न करणे, असंतोष आणि वाईट वृत्तीने काळोख करणे हा वेळ आणि शक्तीचा हास्यास्पद अपव्यय आहे..! तुमचे हृदय कोणीतरी तोडले आहे का ?? शांत राहणे.,. *ट्रिप खूप लहान आहे..!* कोणी तुमचा विश्वासघात केला, धमकावले, फसवले किंवा तुमचा अपमान केला ?? आराम करा - तणावग्रस्त होऊ नका., *ट्रिप खूप लहान आहे..!* कोणी विनाकारण तुमचा अपमान केला का ??वाईट बोलले का? शांत राहणे... दुर्लक्ष करा... *ट्रिप खूप लहान आहे..!* तुम्हाला 'न आवडलेली' टिप्पणी कोणी केली आहे का ?? शांत राहणे...दुर्लक्ष करा...क्षमा करा, त्यांना तुमच्या प्रार्थनेत ठेवा आणि विनाकारण त्यांच्यावर प्रेम करा.,. *ट्रिप खूप लहान आहे..!* काहींनी आपल्यासमोर कितीही समस्या आणल्या, त्याचा विचार केला, लक्षात ठेवला तरच ती समस्या निर्माण होते की आमचा *'एकत्र प्रवास' खूप छोटा आहे..!* *आमच्या सहलीची लांबी कोणालाच माहीत नाही... उद्या कोणी पाहिला नाही तो कधी थांबेल हे कोणालाच माहीत नाही..!* आपली एकत्र सहल खूप लहान आहे....चला मित्र, नातेवाईक आणि कुटुंबाचे कौतुक करूया...त्यांचा आदर करा... आपण आदरणीय, दयाळू, प्रेमळ आणि क्षमाशील होऊ या....कारण आम्ही कृतज्ञता आणि आनंदाने भरून जाऊ, *आपली एकत्र सहल खूप लहान आहे..!* तुमचे हास्य सगळ्यांसोबत शेअर करा....तुमचे जीवन सुंदर व आनंदी बनण्यासाठी....... तुम्हाला हवा तसा तुमचा मार्ग निवडा....कारण...आपला ग्रुप जरी मोठा झाला असला तरी *आपली सहल खूप छोटी आहे..* कुणाला कुठल्या स्टाॅपवर कधी उतरायचं आहे हे आपल्या स्वतःला देखील माहिती नाही !! 🙏🌹🌹🙏 2 *आशा भोसले* *वाढदिवस जन्म :८ सप्टेंबर,१९३३* आशाताई ९२ वर्षांच्या झाल्या असे म्हटले की मनाला पटतच नाही कारण त्यांचा चिरतरुण आवाज आजही त्यांना सोबत करतो आहे. आशा भोसले यांचा जन्म *सांगलीला* मंगेशकर कुटुंबात झाला. त्यांना गाण्याचा वारसा वडील मास्टर दीनानाथांचा मिळाला. लता मंगेशकर,मीना मंगेशकर-खडीकर,उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर या भावंडांची साथ मिळाली आणि सगळ्यांतून आशाताई घडत गेल्या. त्यांची मराठी गाणी ऐकताना त्या मागचे परिश्रम आणि सर्वोत्तम तेच देण्याची भावना देखील लक्षात येते. प्रत्येक माणसाचा स्वतःच्या मनाशी संवाद सुरु असतो. कधी हा संवाद मनाला व्याकुळ करतो तर कधी अधीर तर कधी उदास तर कधी आनंदी. त्या आशयानुरूप वेगवेगळ्या गीतकारांची त्यांनी गायलेली काही गाणी आठवली. मुंबईचा जावई मधले *आज कुणीतरी यावे* गाणे ऐकताना तारुण्य सुलभ भावना प्रकट करणारी तरुणी लगेच डोळ्यापुढे येते. *सहज सख्या एकटाच येई सांजवेळी* हे सूर्यकांत खांडेकरांचे गाणे म्हणून भावी आयुष्याचे चित्र रेखाटणारी तरुणी डोळ्यापुढे येते. लग्न झाल्यावर पतीला आपले भाव व्यक्त करताना ती म्हणते,*गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगलमणी बांधले जन्मजन्मीची सुवासीन मी तुझ्यामुळे जाहले.* मुलीची सासरी पाठवणी करताना *ओटीत घातली मुलगी विहीणबाई* म्हणताना त्यातल्या शब्दांनी आईची व्याकुळता जाणवत रहाते. लग्नानंतरच्या नव्या नवतीच्या मंतरलेल्या दिवसात *मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे* ऐकताना आपल्या अंगावर देखील शिरशिरी येते. युद्धात परागंदा झालेल्या नवऱ्याची असोशीने वाट पाहणारी सुवासिनी चित्रपटातली पत्नी,जेंव्हा *जिवलगा कधी रे येशील तू म्हणते* तेंव्हा तिची कासाविशी आपल्याला देखील अस्वस्थ करते. संसारात तृप्त झाल्यामुळे ती म्हणते, *सुख आले माझ्या दारी ,मग काय उणे त्या संसारी* बाळासाठी साऱ्या आयुष्याची कुरवंडी करायला तयार असणारी मोलकरीण चित्रपटातली आई, *देव जरी मज कधी भेटला* हे गाणे म्हणते तेंव्हा तिची ममता लक्षात येते. *भरजरी ग पिताम्बर दिला फाडून* ही अंगाई गाणारी शामची आई आठवते. *मना तुझे मनोगत मला कधीं कळेल का ? तुझ्यापरी गूढ सोपे होणे मला जुळेल का !* असं कवी सुधीर मोघे लिहितात त्या वेळी त्याचा उत्कट अर्थ आर्तपणे गाऊन आशाताईंनीच आपल्यापर्यन्त पोचवला आहे. कधी कधी मन देखील आपल्याशी अबोला धरत. आपल्या विचारांना थोपवून ठेवत अशावेळी कवी सौमित्र म्हणतात *माझिया मना जरा थांबना* त्यातुन त्यांना मनाला उद्देशून काय म्हणायचं आहे ते आशाताईंच्या आवाजातच ऐकायला पाहिजे. *ऋतू हिरवा अल्बम* हा आठ गाण्यांचा अल्बम न ऐकलेली व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही.त्यातली सगळीच गाणी खूपच लोकप्रिय आहेत . १)सांज ये गोकुळी २) भोगले जे दुःख त्याला ३) ऋतू हिरवा ४) जय शारदे वागेश्वरी ५) घन राणी ६) झिनी झिनी वाजे बिन ७) फुलले रे क्षण माझे ८) माझिया मना जरा थांबना ही तर मराठी गाण्यांमधली नुसती वरवरची झलक आहे लिहायच म्हटल तर अजून कितीतरी बाकी आहे. आता थोडंसं हिंदी गाण्यांबद्दल, त्यांची सगळीच गाणी ऐकताना आपणही लगेच ती गुणगुणायला लागतो, ही त्या आवाजाची जादू म्हणावी लागेल. त्या पैकी काही गाणी निगाहे मिलाने को जी चाहता है (दिल ही तो है)रोशन झुमका गिरा रे (मेरा साया) मदन मोहन छोड दो आचल जमाना क्या कहेगा (पेइंग गेस्ट) एस.डी.बर्मन दम मारो दम (हरे राम हरे कृष्ण)आर.डी.बर्मन पिया तू अब तो आजा (कारवॉं)आर.डी.बर्मन ओ.पी.नय्यर यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातून आशा भोसले यांचा मदभरा आवाज ऐकू आला. चैन से हमको कभी (प्राण जाये पर वचन ना जाये)ओ.पी.नय्यर वो हसीन दर्द दे दो (हम साया) ओ.पी.नय्यर आओ हुजूर तुमको(किस्मत)ओ.पी.नय्यर जाइये आप कहॉं (मेरे सनम) ओ.पी.नय्यर १९८१ चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, इन ऑंखोंकी मस्ती सारखी शब्द रचना हे सगळेच जमून आले. ‘दिल चीज क्या है’ या गीताला १९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. *मिराज ए गझल* गुलाम अली आणि अशा भोसले यांचा मिराज ए गझल या अल्बमने जगभरातल्या गझलप्रेमींना अक्षरश: गुंगवून टाकले होते.आजही या गझल्स प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यातल्या काही दर्द जब तेरी आता है तो गिला किससे करू दिल धडकने का सबब याद आया रात जो तुने दीप बुझाये मेरे थे सलोना सा सजन है हैरतों के सिलसिले आशा भोसले यांना १८ वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं, त्यापैकी सात वेळा त्यांना पुरस्कार मिळाला.१९७९ मध्ये फिल्मफेअर जिंकल्यानंतर आशाताईंनी यापुढे पार्श्वगायनाच्या पुरस्कारासाठी आपला विचार करु नये, अशी विनंती केली. आशा भोसले यांना २००१ मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होत. आशा भोसले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रसाद जोग.सांगली. ९४२२०४११५०

"स्वरानंद-अ !":

👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-113 !":👌 💐 " पुढील लिंक्स उघडून ही तीन नादमधुर गाणी ऐका... 1 "रत्नदीप विझले नगरात, आता जागे व्हा यदुनाथ https://youtu.be/PP3JOVxLjEA?si=31qZIh-dXh3CtDv3 2 " कबीराचे विणतो शेले कौसल्याचा राम बाई https://youtu.be/MTrNm5y5M24?si=AuFd_JhTvbayg-H- 3 "सांग तू माझा होशील कां.. https://youtu.be/XIwyJgojLF0?si=2fa0TOJFtV9UYLjR धन्यवाद श्री सुधाकर नातू ----------@#### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-114 !":👌 💐 " पुढील लिंक्स उघडून ही तीन नादमधुर गाणी ऐका... 1 "जिंदगीभर नाही भुलेंगे वो बरसात की रात... https://www.facebook.com/share/v/1C8PU9M1Xx/ 2 " आंसू भरी ये जीवन की राहें... https://www.facebook.com/share/v/15kNDbEtqW/ 3 " आपकी नजरोने समझा.... https://www.facebook.com/share/v/1NoSHfNPZC/ धन्यवाद श्री सुधाकर नातू -------------- 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-115 !":👌 💐 " दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद ही हिंदी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळातील अभेद्य अशी त्रिमूर्ती होती. त्यांच्या आन 1952 दिलीपकुमार, आवारा1951 राज कपूर, C.I.D 1956 देव आनंद चित्रपटातील ही तीन नादमधुर गाणी .... पुुढील लिंक्स उघडून ऐका... 1" दिल में छुपा के प्यार.... https://youtu.be/SJ4D-2PVOtQ?si=jH6ZBweAnVCcZNoU 2 " दम भर जो के उधर मुंह फेरे..... https://youtu.be/joqzrQtb5u8?si=UZwXUy2LQwfbwfSf 3 " ऑखो ही ऑखो मे इशारा हो गया.... https://youtu.be/GgFTij0wCcs?si=9mSb1jR8ZISAgO8O धन्यवाद श्री सुधाकर नातू -------------- 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-118 ! ":👌 💐 " नाद मधुर संगीत असलेली 3 गीते ऐका... 1 " श्रावणात घननिळा बरसला ... https://www.facebook.com/share/v/1FQNNMNFJe/ 2 " रुणुझुणु रुणुझुणु ये भ्रमरा.... https://www.facebook.com/share/v/1FCS2Spo2y/ 3 " काल मी रघुनंदन पाहिले.... https://youtu.be/-LehYO9H7xA?si=f-sj-mmivjLSIyWM धन्यवाद श्री सुधाकर नातू ---------------- 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-119 ":👌 💐 " नाद मधुर संगीत असलेली चित्रपटातली गाणी ऐका.. त्यापुढील लिंक्स उघडून... 1 "ये कौन आया मेरे दिले.... https://www.facebook.com/share/v/19Wh8uRHKg/ 2 " अफसाना लिख रही हू https://youtu.be/D7XJy4bSNRY?si=QnRbpKrNy5exYkeI 3 " थंडी हवा ये, लहरा के आए...https://youtu.be/P6r3srBQz0k?si=kGVuEAdsC1n-5bng धन्यवाद श्री सुधाकर नातू

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

"मल्लीनाथी...!"::

'दुतोंड्या' मतलबी राजकारणी !": माणूस कसा बदलतो बघा... सत्तेवर असले की आरक्षण देऊ शकत नाही म्हणणार... आणि सत्तेवर नसले की म्हणणार मराठ्यांना आरक्षण द्या आणि सरकार विरोधी वातावरण तापवणार... लोकांना भडकवणार... रद्दीत 2010 सालचा पेपर सापडला, त्यातली ही बातमी बघा. त्यात शरद पवार म्हणताहेत की कायद्याने मराठा आरक्षण शक्यच नाही... ... त्यासाठी... ही लिंक उघडा.... .https://drive.google.com/file/d/1DJ_oBrGfI7hrjooCkand149q-hOize5p/view?usp=drivesdk -----------

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

" तूळ ते मीन राशीचे एक नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2026 संपूर्ण राशिभविष्य

७ तुळा: आनंदाचे डोही आनंदतरंग!: चित्रा नक्षत्राचे दोन चरण स्वाती पूर्ण व विशाखा नक्षत्राचे तीन चरण यांनी बंधारे तुला रास शुक्राची असून शनि येथे उच्चीचा व रवि नीचीचा होतो, त्यामुळे तुम्हाला शनीच्या साडेसातीचा त्रास तितकासा जाणवत नाही. तराजू हे बोधचिन्ह विवेकबुद्धी व सारासार विचार करून विवेकाने कोणताही निर्णय घेण्याची वृत्ती तुमची असते. टापटीप छान दिसण्याची हौस व मौज-मजा तुम्हाला आवडते. वयाच्या तिशीनंतर उत्तम प्रगती होते. नाट्य-चित्रपट व प्रसिद्धी क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळते. विवाहाचे दृष्टीने मेष राशीबरोबर, तुमचे चांगले सूत जुळतंय तर मिथुन या नवपंचम राशीचे जोडीदार आनंदी समाधानी संसार दर्शवितात. मात्र मीन रास अष्टका मृत्यू षडाष्टक योगामुळे तुम्हाला वर्ज्य असते. तुळा राशीने गेल्या वर्षी दुसऱ्या स्थानी 1279 अनुकूल गुण मिळवले होते. आता त्यात चांगली उत्साहवर्धक वाढ होऊन 1455 गुणांसाठी सर्व बारा राशींमध्ये सर्वोत्तम असा पहिला क्रमांक मिळवणार आहे. जणू हात लावेल तिथे सोनं अशा तऱ्हेचे घवघवीत यश तुम्हाला मिळू शकेल व नवनव्या संधी प्राप्त होतील. नशीब फळफळणार आहे उत्साह वाढणार आहे प्रयत्नांना यश येणार आहे. सहाजिकच यावर्षी तुमची विविध क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळवून स्पर्धात्मक अशा निवडीमध्ये अपेक्षापूर्ती होईल. विवाहोत्सूकांना, हे वर्ष गोड बातमी देणारे आहे. नोकरी-व्यवसायात अनुकूल घटना आणि परदेशगमनाची संधी तुम्ही हस्तगत करू शकाल. तसेच अधिकार पद मिळू शकेल, तर व्यवसायात आर्थिक भरभराट होईल. विवाहोत्सुकांना अनुरूप जोडीदार निवडण्यात यश मिळेल. विद्यार्थी परीक्षांमध्ये आघाडीवर राहून त्यांचे कौतुक होईल. आर्थिक गुंतवणूक हुशारीने कराल. स्थावर विषयक समस्या दूर होतील. पुढील भवितव्यासाठी योग्य ते निर्णय आत्ताच दूरदृष्टीने घेऊन मजबूत पाया घालू शकणारे  हे वर्ष आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमुळे तुम्ही पहिला क्रमांक मिळवला असल्याने आगामी कालखंडात तुम्ही मिळालेल्या संधीचे सोने करा. माझे शुभ आशीर्वाद तुम्हाला आहेत. प्रवासाचे योग येऊन नवीन ओळखी होतील. त्यांचा तुम्ही युक्तीने आपल्या प्रगतीसाठी उपयोग कराल. महिलांना आणि एकंदरच कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील आणि संततीबाबत उत्साहवर्धक बातमी कानावर येईल. जिंदगी एक सफर, है सुहाना ! ######## ८ व्रुश्चिक: अंधे जहाँके, अंधे रास्ते, जाए तो जाए कहाँ!: सगळ्यात गुढ व आपल्या मनातील खळबळ इतरांना जाणवून देणारी ही मंगळाची रास, शक्यतो एकला चालो रे अशा वृत्तीची असते. चंद्र नीचीचा होतो. अतिरेकी अरेरावी तुमचा घात करू शकते. महत्त्वाकांक्षी, आपलाच अधिकार गाजवण्याच्या ईर्षैमुळे तुम्ही सुरक्षा क्षेत्रात व इंजिनीअरिंगमध्ये यश मिळवता. मात्र जीवनात वैफल्याचा धोका अधिक असतो, कारण तुमची सहनशक्ती मर्यादित असते. विवाहाचेदृष्टीने मिथुन रास मृत्यूषडाष्टक योगामुळे वर्ज्य. वृश्चिक राशीची माणसे वृश्चिक राशी बरोबरच विवाहाचे दृष्टीने योग्य ठरतात. येथे कोणतेही ग्रह उच्चीचे होत नाहीत. विशाखा एक चरण पूर्ण अनुराधा व जेष्ठा नक्षत्र यांनी ही रास बनते. व्रुश्चिक राशीला मागील वर्षी 11 व्या स्थानी 770 गुण तुम्हाला मिळाले होते. या आगामी वर्षी किंचित सुधारणा होऊन तुमचा 10 वा क्रमांक व 857 अनुकूल गुण मिळतील. चढ उतार करणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायचे असून, अधून मधून अपेक्षाभंगाचे चटके व विरोधकांच्या कारवाया वाढतील. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत दिवस काढायचे आहेत कालचक्राचा महिमा अगाध व तर के असतो वाढत्या जबाबदाऱ्या आजारपण व चुकलेले आर्थिक निर्णय यामुळे आर्थिक बाजू सावरता ना तुमची दमछाक होईल नोकरी व्यवसायात कामात मन न लागणे नको ते काम नको त्या ठिकाणी बदली अशी प्रतिकूल स्थिती असेल ंसारात जोडीदाराशी मतभेद वडीलधार्‍या तब्येतीची काळजी संतती विषयक समस्या यांनी आगामी वर्ष कसोटी पाहणारे आहे मनःशांती झाल्यामुळे डोकेदुखी पोटदुखी प्रवासात विलंब होऊ शकतात विद्यार्थीवर्गाला प्रयत्न अधिक वाढवायला लागतील तरी अपेक्षा पूर्ण होतील याची खात्री नाही थोडक्यात रखरखीत वाळवंटात तळपत्या उन्हात तुम्हाला वाटचाल करायचे आहे. मनस्थिती संभ्रमित राहिल्याने योग्य ते निर्णय घेणे कठीण बनेल.  विवाहोत्सुकांना विलंब, समजूतीचे घोटाळे अशी प्रतिकूल स्थिती आहे. नोकरी व्यवसायात वरिष्ठ नाराज वा स्पर्धेत दमछाक होऊ शकते. प्रवास काळजीपूर्वक करावेत, दौरे वा पर्यटनाचे मनसुबे लाबणीवर टाकावे लागतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम अधिक घेऊनही अपेक्षित यश लपंडाव खेळेल. पोटदुखी वा डोकेदुखी सारखी अनारोग्याची वेळीच तपासणी करून घ्यावी. महिलावर्गाला घरातील अशांत वातावरणात मनाला मुरड घालावी लागेल. अनुकूल गुणांचा विचार करता हे महिने नशीबाच्या रखरखीत उन्हाळ्यात ओअँसीस भासतील. एकंदर अंधारात प्रकाशाचे कवडसे शोधत मार्गक्रमणा करायची तयारी ठेवा. ########### ९. धनु: ही गुरूची रास असून येथे कोणताही ग्रह उच्चीचा व नीचीचा होत नाही. मूळ पूर्वाषाढा ही नक्षत्रे पूर्ण व उत्तराषाढा चा एक चरण यांनीही राशी बनते. मूळ नक्षत्री जन्म असेल तर त्याची शांती करावी लागते. सोशिकता चांगुलपणा व कष्टाळू वृत्ती यामुळे अडचणीतून मार्ग काढून तुम्ही पस्तिशीनंतर जीवनात स्थैर्य मिळवता. मेष व सिंह राशीचे जोडीदार संसारात नवपंचम योगामुळे उत्तम साथ देतात. तर शुक्राची रास मृत्यू षडाष्टका मुळे चालत नाही. धनु राशीची 4 स्थानी मिळालेल्या मागच्या वर्षीचा तोरा आता चालणार नाही. काय कारण यंदा सातव्या क्रमांकावर घसरण होऊन 903 गुण मिळणार आहेत. मागच्या वर्षी पेक्षा तुम्हाला अपेक्षा कमी ठेवाव्या लागतील आणि त्या प्रमाणात प्रयत्न वाढवायला लागतील त्यामुळे समाधानाचा मार्ग मिळेल. अतिशय काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची खप्पामर्जी होईल व बाजारामध्ये स्पर्धा वाढल्यामुळे तुमच्या नफ्यात घट होऊन तोटा सहन करावा लागू शकतो. म्हणून अतिशय काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थी वर्गाला प्रयत्न वाढवावे लागतील, तेव्हा कुठे कसेबसे यश मिळेल. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मात्र जास्त अपेक्षा ठेवू नये. विवाहोत्सुकांना हा कालखंड प्रतिकूल आहे, त्यातल्या त्यात पर्यंत काही काळ गुरू व्रुषभ राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात असल्यामुळे त्या काळात कदाचित अपेक्षापूर्ती होऊ शकेल. प्रवासामध्ये काळजी घ्यावी लागेल, आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे, तसेच छोटे-मोठे अपघात होऊ शकतात. संसारामध्ये अभिमन्यूसारखी चक्रव्यूहात अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. जोडीदार नाराज असेल आणि संततीचे बाबतीत आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. सारांश कठीण काळ लौकरच जाणार आहे, हे मनात घोकत कष्ट व सहन शक्ती वाढवणे, हेच गरजेचे आहे. ######### १०. मकर: चली, चलीरे पतंग मेरी चलीरे...होके बादलोंके पार.... उत्तराषाढा नक्षत्राचे तीन चरण पूर्ण श्रवण व धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण मिळून ही रास बनते. मकर रास ही शनिची रास असल्याने तुम्हाला, त्याच्या साडेसातीचा खास असा त्रास होत नाही. तिथे मंगळ उच्चीचा तर गुरु निश्चित होतो. ध्येय गाठेपर्यंत चिवटपणा, त्याला कष्टाची जोड यामुळे नोकरी-व्यवसायात धीम्या गतीने तुमची प्रगती होते. आपली फुशारकी तुम्ही मारत नाही. कर्तबगार थंड डोक्याने काम करणारी ही माणसे असतात. सिंह रास मृत्यू षडाष्टक योगामुळे विवाहासाठी अयोग्य. तर नव पंचमातील व्रुषभ व कन्या जोडीदार संसारात गोडी आणतात. मकर राशीचे नशीब गुणांमध्ये उत्तम वाढ झाल्याने मागील वर्षी 3 रे स्थानी 1235 गुण मिळवून पहिल्या गटात वर्ष चांगले गेले होते. सुदैवाने आताही नशिबाला तुमच्यावर कृपा करावयाची आहे त्यामुळे आगामी वर्षी दुसरा क्रमांक पटकावून 47 गुण मिळवणारा आहात, यामुळे नशीब अधिक फळफळलेले दिसेल. तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये काय करू आणि काय नको असा उत्साह निर्माण होऊ शकतो. संपूर्ण कालखंड प्रगतीपथावर नेणारा असेल. अडचणी आणि विरोध त्याला योग्य प्रकारे तोंड देऊन तुम्ही नोकरी व्यवसायात आपली प्रगती कराल. यावर्षी गुरु तुमच्या नवपंचम योगात असल्यामुळे, नोकरीमध्ये प्रमोशन व्यवसायात चांगली भरभराट होऊ शकते. काही भाग्यवंतांना परदेशगमनाचे योग आहेत. मात्र कुठलाही अतिरेक करू नका व तब्येतीस जपावे लागेल. संसारामध्ये वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळणार आहे, तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये ते आघाडीवर राहतील. महिलांना आणि कुटुंबामध्ये नवीन पाहुणे येणे, त्यांचा पाहुणचार करणे आणि एकंदरच खेळीमेळीचे वातावरण राहणे,  मंगल कार्य होण्याची शक्यता अशी शुभ फळे आहेत. थोडक्यात, संयम ठेवला तर आनंद सौख्य मिळणार आगे बढो! ####### = ११.कुंभ: मातीचा घडा असे कुंभ राशीचे चिन्ह आहे. ज्ञानाचा माहितीचा जणू सागर असे तुमचे स्वरूप असते. काहीशा अबोल पण हुशार माणसांची ही रास शनीने आपली मानली आहे. येथे कोणताही ग्रह उच्चीचा वा नीचीचा होत नाही. कुंभ व्यक्तीनाही साडेसातीचा तेवढा त्रास होत नाही. संसाराबाबतीत आपण उदास असता व एकंदर निरीच्छ.  संशोधन अभ्यास वृत्ती व ज्ञानलालसा ही तुमची खास वैशिष्ट्ये. कर्क रास मृत्यू षडाष्टकामुळे विवाहासाठी टाळावी. मिथुन व तुला राशीचे जोडीदार तुमच्याशी कसेबसे जुळवून घेतात. कुंभ राशी मागील वर्षी 6 व्या स्थानी नशीब आजमावत तारेवरची कसरत करत तोल सांभाळत होती. यंदा 1054 गुण मिळून 5 व्या क्रमांकावर उजव्या दुसऱ्या गटात आला आहात. आपल्या बुद्धीचा चांगला उपयोग करत, अडचणी संकटांवर मात करत समाधानाचा मार्ग शोधत कामाला लागायचे आहे. परिस्थितीवर नियंत्रण अपेक्षा थोड्या कमी ठेवा आणि प्रयत्नांची गती वाढवा. परिस्थिती नियंत्रणात ठेवू शकणाऱ्या पाचव्या क्रमांकावर आपली जागा निश्चित केली आहे. सहाजिकच यावर्षीही तुमची विविध क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे, फक्त त्यासाठी तुम्हाला प्रयत्न अधिक करावे लागतील जागरूकता ठेवावी लागेल आणि विरोधकांच्या कारवायांवर मात करावी लागेल त्यासाठी सहकाऱ्यांचे मदतीची साथ मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळवून स्पर्धात्मक अशा निवडीमध्ये अपेक्षापूर्ती होईल. विवाहोत्सूकांना, हे वर्ष गोड बातमी देणारे आहे. नोकरी धंद्यामध्ये तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आल्यामुळे आर्थिक भरभराट संभवते. काही भाग्यवंतांना अपेक्षित प्रमोशन मिळू शकेल. प्रवासाचे योग येऊन नवीन ओळखी होतील. त्यांचा तुम्ही युक्तीने आपल्या प्रगतीसाठी उपयोग कराल. मात्र काही काळ पुन्हा षडाष्टक योगात जात असल्यामुळे तुम्हाला सावधानतेने निर्णय घ्या असे सांगतो. महिलांना आणि एकंदरच कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील आणि संततीबाबत उत्साहवर्धक बातमी कानावर येईल. ########### १२. मीन: दोन विरुद्ध दिशेला धावणारे मासे असे तुमचे बोधचिन्ह आहे ही गुरूची रास असल्याने साधी सरळ माणसं धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात चंचलता व धरसोड वृत्ती तुमचे नुकसान करू शकते शुक्र येथे उच्चीचा तर बुध्दीची चाहो तो सहसा तुम्ही कुणावर विश्वास ठेवत नाही व्यावहारिक जीवनात ठेचा खात खात पुढे जावे लागते तूळ राशीचे जोडीदार मृत्यू षडाष्टक or मुळे मीन व्यक्तींना चालत नाही कर्क व कन्या रास विवाह हे दृष्टीने नवपंचम योग होत असल्याने चांगल्या असतात. मीन राशीच्या वाट्याला मागील वर्षी 718 गुण मिळून तळ गाठला होता व कष्टकारक दिवस अनुभवले होते. आता किंचित गुण वाढत 869 गुणांवर नवव्या क्रमांकावर तुम्ही स्थानापन्न होणार आहात. अर्थातच होते तशाच परीक्षा पाहणाऱ्या अपेक्षाभंग करणाऱ्या प्रसंगांना तोंड देत राहायचे आहे. ग्रहमान प्रतिकूल असले की घराचे वासेही कसे फिरतात, त्याचा अनुभव या वर्षी घ्यायचा आहे. नोकरी-व्यवसायात प्रतिकुल घटना व विरोधकांच्या कारवायांमुळे त्रस्त व्हाल. आर्थिक ओढाताण तुमच्या कौटुंबिक स्वास्थ्यांत अडथळे निर्माण करेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालाची धास्ती वाटू शकेल अधिक नेटाने अभ्यास करायला हवा. घरातील वडीलधारी तुमच्याशी वाद घालून मनस्ताप वाढवतील. प्रवास तसेच नवीन गुंतवणूक सांभाळून करा नाहीतर फसवणूक होऊ शकेल. तुमच्या संशयी स्वभावामुळे अडचणीचे तसेच गैरसमजाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. विवाहोत्सुकांना विलंब स्विकारावा लागेल, घाई गर्दी नको. सगळेच फासे उलटे पडत आहेत असे म्हणायची वेळ आली, तरी धीर सोडू नका, केवळ श्रद्धा संयम आणि सबुरी या जोरावर दिवस काढायचे आहे. ####### सारांश, सर्वच राशींचा एकत्रित विचार करता मागील वर्षी बारा हजार 67 गुण मिळाले होते त्यात केवळ 313 गुणांची वाढ होऊन या वर्षी 12380 झाले आहेत याचाच अर्थ येरे मागल्या मागच्या वर्षी सारखेच हेही वर्ष जाईल असे मानावयाला हवे. सर्व लोकांना विशेषतः या भविष्याच्या वाचकांना आगामी वर्ष सुख समाधानाचे शांतीचे जावो ही सदिच्छा व्यक्त करून हे ग्रह बदलानुसार अनुकूल गुणांवर आधारित जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ असे संपूर्ण राशी भविष्य पूर्ण करतो. धन्यवाद श्री सुधाकर नातू Mb 9820632655 II शुभम भवतु II

पुढचं पाऊल- 1 नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2026 चे संपूर्ण राशिभविष्य

💐"पुढचं पाऊल ! ":💐 अर्थात "ग्रहबदलानुसार अनुकूूल गुणांवर राशीनिहाय एकमेवाद्वितीय संपूर्ण वार्षिक राशीभविष्य": 1 नोव्हेंबर '25 ते 31 डिसेंबर '26 "जीवनात समाधान मिळविण्यासाठी आपल्या राशीच्या अनुकूल गुणांप्रमाणे अपेक्षा आणि प्रयत्न यांचा समतोल राखा !":💐 💐"पुढचं पाऊल 2 ":💐 "अनुकूूल गुणांवर राशीनिहाय एकमेवाद्वितीय संपूर्ण वार्षिक राशीभविष्य": 1 नोव्हेंबर '25 ते 31 डिसेंबर '26 १. मेष: सुख दु:खा, समे क्रुत्वा, मेष रास मंगळाची रास आहे रवी येथे उच्चीचा होतो. सतत उद्योग करत राहणे हा तुमचा स्थायीभाव असतो. येथे शनी नीचीचा होत असल्याने शनीच्या साडेसातीचा तुम्हाला जास्त असतो. वय वर्ष 28 नंतर सर्वसाधारणपणे तुमचा भाग्योदय येतो. विवाह हे दृष्टीने तुला राशी तुमचे चांगले धागेदोरे जुुळतात, सिंह धनू राशीच्या व्यक्ती तुमचा संसार गोडीचा होऊ शकतो,कारण त्यांच्याशी नवपंचम योग होतो. मात्र मृत्यू षडाष्टकातील कन्या रास मात्र तुम्हाला त्याकरता पूर्ण वर्ज्य असते. १मेष रास 7 क्र. वरून चक्क तळाच्या 12 क्रमांकावर आली आहे. तुमचे एकूण गुण 1078 वरून 668 झाले आहेत. मागच्या वर्षी पेक्षा तुम्हाला अपेक्षा खुुप खुप कमी ठेवाव्या लागतील आणि त्या प्रमाणात प्रयत्न मात्र प्रचंड वाढवायला लागतील. तळाच्या राशीचे दुर्दैव तुमच्या वाट्याला आले आहे. एखाद्या अभिमन्यू सारखी चक्रव्यूहात सापडलेली स्थिती असू शकेल त्या दृष्टीने संयम बाळगा, अपेक्षा ठेवू नका. परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे मनस्थिती ठीक राहणार नाही. निर्णय वेळेत न घेणे वा चुकणे असा अनुभव घ्याल. नशिबाचे खेळ अव्याहत चालतात. त्याचाच क्लेशदायक अनुभव तुम्हाला यावर्षी घ्यायचा आहे. काळ कठीण आहे, रात्र वैऱ्याची आहे. तुम्हाला सुख शांती मिळवताना खूप धडपड करावी लागेल, तर दुःख तुम्हाला नेहमीच आपलंसं करेल अशी परिस्थिती आहे. प्रवास अडचणीचे तब्येतीची विशेष काळजी घ्या. प्रवासामध्ये अपघाताचा धोका. अचानक मनाविरुद्ध नुकसान करणारे वादाचे प्रसंग तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. नोकरीधंद्यात प्रयत्नांचे फळ मनाप्रमाणे मिळणारे नाही तर व्यवसायात आडाखे चुकल्यामुळे एखादा मोठा नुकसानीचा फटका बसू शकतो. विवाहोत्सुकांना विलंब फसगत गैरसमज असे अनुभव येऊ शकतात. संसारात एकमेकांशी वाद विवाद अपेक्षाभंग पाहुण्यांची उगाचच वर्दळ यामुळे त्रस्त रहा तब्येतीची वेळीच काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांनी अधिक प्रयत्न करावेत अपेक्षा कमी ठेवाव्यात. एक लक्षात ठेवा कठीण काळ भविष्यात केव्हा तरी जाणारच आहे तोपर्यंत प्रयत्न कष्ट हाच मंत्र आपल्याला जपायला हवा. ################ २. व्रुषभ: मज काय कमी, सुख आले माझ्या दारी!: क्रुत्तिका नक्षत्राचे तीन, पूर्ण रोहिणी व म्रुगाचे दोन चरण ह्यांनी ही शुक्राची रास बनली आहे. चंद्र इथे उच्चीचा होतो व कुणीही ग्रह नीचीचा नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी उत्साही आनंदी असून उद्योग मग्नता हे तुमचे वैशिष्ट्य आहे. रसिकता विलासी व्रुत्ती व खिलाडूपणा असतो. नेहमी नीटनेटके व प्रसंगानुसार व्यवस्थित रहाणे पसंत करता. आळस नसतो, तारुण्यात अडचणींवर मात करून तुम्ही स्वबळावर जीवनात स्थैर्य व प्रगती साधता. म्रुत्युषडाष्टकातील धनु राशी, विवाहासाठी वर्ज्य आणि व्रुश्चिक ह्या मंगळाच्या राशीबरोबर तसेच नवपंचम योग साधणार्या कन्या मकर राशीच्या जोडीदारांबरोबर संसार सुख समाधानाचा होऊ शकतो. व्रुषभ राशी गेल्या वर्षी 1 ल्या सर्वोत्तम शुभफळे देणार्या क्र.वर आपली जागा निश्चित केली होती. 1343 सर्वोच्च गुणसंख्येेवरून थोडी उडी घेऊन यंदा 1427 गुण मिळणार आहेत. तरीही यावर्षी तिसरा क्रमांक आहे. प्रगतीची गाडी तशीच अपेक्षेप्रमाणे चालत प्रयत्नांना यश येणार आहे. यंंदाही पहिल्या गटात नशीब चांगले राहणार आहे. अडचणी दूर होऊन परिस्थिती मधले मळभ निघून जाऊन निरभ्र असे आकाश तुमच्या वाट्याला आले आहे. या संधीचा फायदा घ्या. ह्या कालखंडात उत्साहवर्धक घटना घडतील. जवळजवळ संपूर्ण कालखंड विशेष चढ-उतार न होता प्रगतीपथावर नेणारा असेल. लाभातील शनी तुमचा उत्साह वाढवेल व येणाऱ्या अडचणी व विरोध यांच्याशी यशस्वी मुकाबला करू शकाल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित बदली बढती व तुम्हाला आवडते काम मिळू शकेल. व्यवसायामध्ये शुभवार्ता आहे. नवीन उद्योगाची मुहूर्तमेढ घालू शकाल आणि आपल्या कुटुंबीयांना उर्जितावस्थेत नेऊ शकाल. विद्यार्थीवर्गाला अभ्यासाचा ताण आला तरी शेवटी त्यात चांगले यश मिळणार आहे. विवाहोत्सक मंडळी खुश होतील अशी परिस्थिती आहे. अपत्यप्राप्तीची इच्छा असणाऱ्या दांपत्याची मनोकामना यंदा पुरी होईल. नोकरी-व्यवसायात आतापर्यंत जे अपमान सहन केले, कष्ट घेतले त्याचे आता चीज होईल. व्यवसायात तुमचे आडाखे योग्य ठरून आर्थिक घडी नीट बसू शकेल. स्थावर विषयक निर्णय व कृती वर्षाच्या मध्यंतरी करणे उत्तम असेल. घरामध्ये वडीलधाऱ्यांचा सल्ला घेत राहा, प्रवास वेळेवर होतील आणि त्यातून नव्या ओळखी होऊ शकतील. कौटुंबिक व्यवहारात मात्र थोडा वाणीवर ताबा ठेवा, नाहीतर गैरसमज होऊ शकतात. कुटुंबामध्ये संसारात मुलांकडून एखादी चांगली बातमी कळू शकेल. जोडीदाराचेही तुम्हाला प्रोत्साहन राहील. एकंदर तथ्यांश हा की, उत्साहाचा अतिरेक करू नका प्रकृती सांभाळून नवीन योजना आखा. एकंदर काय परिस्थिती तुम्हाला अनुकूल आहे, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून आपली प्रगती करून घ्या. Best luck! 3 मिथून: "मन मनास उमगत नाही, आधार कसा हा शोधू?": मिथुन रास हि विचारही बुद्धिमान बुद्धाची रास आहे. स्त्री-पुरुषाचे युगुल असे बोधचिन्ह असल्याने स्त्रीची कोमलता व तर पुरुषाचा अहंकार असे द्विस्वभावी रूप तुमच्या राशीचे असते. कोणताही ग्रह येथे उच्चीचा वा नीचीचा होत नाही. आपल्या मनात काय चाललंय हे तुम्ही कुणालाच कधी जाणवू देत नाही. बोलघेवडेपणा मिश्किल थट्टा तुम्हाला आवडते. तूळ व कुंभ या नवपंचम योगातल्या राशीचे जोडीदार तुमच्याशी संसार चांगला करतात, मात्र वृश्चिक ही बुधाचा शत्रू असलेल्या आणि तुमच्या षडाष्टकात असलेल्या मंगळाची रास तुम्हाला विवाह साठी टाळावी लागते. म्रुगाचे दोन चरण रोहिणी पूर्ण व पुनर्वसु नक्षत्राचे तीन चरण मिळून ही राशी बनते. मिथून राशीच्या नशिबी मागील वर्षी 9 व्या स्थानी जाण्याची वेळ आली होती आणि 845 गुण मिळाले होते. तेव्हा स्थिती कठीण होती मात्र यंदा 874 गुण मिळून 8 क्रमांकावर समतोल साधणाऱ्या अवस्थेचा लाभ होणार आहे. मागच्या वर्षी पेक्षा हे वर्ष किंचीत कमी कष्टकारक जाईल. थोडीशी कुठेतरी रुख रुख राहील. प्रतिकूल परिस्थितीशी तोंड द्यावे लागणार आहे. मागच्या वर्षीची मृगजळासारखी परिस्थिती संपली आणि आता खरोखर वाळवंट सुरू झाले आहे अपेक्षा कमी ठेवून प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. नोकरीधंद्यात त्रासाचे अडचणीचे असे प्रसंग येतील व्यवसायामध्ये अपेक्षापूर्तीचा शक्यता नाही तिथे पक्षपातीचा तुम्हाला मानसिक त्रास होईल. जोडीदाराच्या प्रकृती संबंधित नवीन काळजा निर्माण होऊ शकतात. विद्यार्थी वर्गाला परीक्षांमध्ये विस्मरण किंवा ऑप्शनला टाकलेला भाग येणे, असे अनुभव यावे. प्रवास संभाळून करावेत, त्यामध्ये विलंब व वाद-विवाद संभवतो. 'वक्त ने क्या किया क्या हसी सितम'अशी तुमची यावरची परिस्थिती झालेली आहे शेवटी कालाय तस्मै नमः हेच खरे ! ########## 4 कर्क रास: कठीण समय येता, कोण कामास येतो?: कर्क रास ही चंद्राची रास असल्यामुळे भावनाप्रधान कल्पक व प्रतिभा माणसांची राशी आहे. मंगळ येथे नीचीचा तर गुरु उच्चीचा होतो. संसारात तुम्हाला खूप गोडी असते. तुम्हाला माणसे हवीहवीशी असतात. प्रेमात तुमच्या चंचल स्वभावामुळे नुकसान फसगत होऊ शकते. कवी-लेखक कलावंतांची ही रास जीवनात सुखदुःखाचे वादळवारे नेहमी पचवत असते. विवाह करता मृत्यू षडाष्टकातील कुंभ रास वर्ज्य, तर मीन व वृश्चिक राशी नवपंचम योगामुळे शुभ फळे संसारात देतात. पुनर्वसु चा एक चरण तर सर्वात शुभ नक्षत्र पुष्य पूर्ण व अनिष्ट आश्लेषा नक्षत्राने ही रास बनते. कर्क राशीचे नशीब फारसे बदलणार नाही कारण मागच्या वर्षी 8 क्र.वरून घसरगुंडी होऊन अकरावा क्रमांक मिळाला आहे. गुण थोडेसे कमी होऊन 835 मिळाले आहेत. एकंदर काळ हा प्रतिकूल आहे, हे विसरून चालणार नाही. मनाविरुद्ध परिस्थिती निर्माण करून तुमची परिक्षा पाहील. मनस्थिती संभ्रमित राहिल्याने योग्य ते निर्णय घेणे कठीण बनेल.   त्यातले त्यात, आगामी वर्षी फेब्रुवारी एप्रिल सप्टेंबर काळ विस्कळित घडी काही अंशी सावरू शकेल. अडचणींशी खंबीरपणे मुकाबला करण्याचे धैर्य देतील. विवाहोत्सुकांना विलंब, समजूतीचे घोटाळे अशी प्रतिकूल स्थिती आहे. नोकरी व्यवसायात वरिष्ठ नाराज वा स्पर्धेत दमछाक होऊ शकते. प्रवास काळजीपूर्वक करावेत, दौरे वा पर्यटनाचे मनसुबे लाबणीवर टाकावे लागतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम अधिक घेऊनही अपेक्षित यश लपंडाव खेळेल. पोटदुखी वा डोकेदुखी सारखी अनारोग्याची वेळीच तपासणी करून घ्यावी. महिलावर्गाला घरातील अशांत वातावरणात मनाला मुरड घालावी लागेल. एकंदर अंधारात प्रकाशाचे कवडसे शोधत मार्गक्रमणा करायची तयारी ठेवा. ########## ५ सिंह: वनराज सिंहाची ही रास, सर्वांवर अधिकार गाजवते कुणाकडे हार जाणे तुम्हाला आवडत नाही. आपला शब्द हा अंतिम असावा असा तुमचा आग्रह असतो. एक प्रकारचा हट्टी स्वभाव हे तुमचे वैशिष्ट्य असते. मात्र तुम्ही दीर्घोद्योगी निश्चय व महत्त्वाकांक्षी असल्यामुळे जीवनात नेहमी अग्रेसर राहून यश मिळवू शकता. नवपंचम योगातील मेष व धनु राशीचे जोडीदार विवाहासाठी अनुकूल ठरतात, तर मृत्यू षडाष्टकातील मकर रास चालत नाही, पूर्ण बघा आणि पूर्ण पूर्वा नक्षत्र तर उत्तरा नक्षत्राचा एक चरण मिळून ही रास बनते. जीवनात मध्यम वयात तुम्हाला स्थैर्य व भरभराट अनुभवास येते. सिंह मंडळी मागील वर्षीच्या 8 क्रमांकावरून किंचित पुढे वर घसरून 6 व क्रमांक व अनुकूल गुण 971 झाल्यामुळे साहजिकच हे वर्ष थोडीशी मनाला उभारी देऊन जाईल. मनाविरुद्ध परिस्थिती निर्माण करून तुमची परिक्षा पाहील. मनस्थिती संभ्रमित राहिल्याने योग्य ते निर्णय घेणे कठीण बनेल.  योग्य वेळी मदत मिळाल्यामुळे विस्कळीत घडी काही अंशी सावरू शकेल. अडचणींशी खंबीरपणे मुकाबला करण्याचे धैर्य देतील. जवळजवळ संपूर्ण कालखंड विशेष चढ-उतार न होता प्रगतीपथावर नेणारा असेल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित आवडते काम मिळू शकेल. व्यवसायामध्ये शुभवार्ता आहे. नवीन उद्योगाची मुहूर्तमेढ घालू शकाल आणि आपल्या कुटुंबीयांना उर्जितावस्थेत नेऊ शकाल. विद्यार्थीवर्गाला अभ्यासाचा ताण आला तरी शेवटी त्यात चांगले यश मिळणार आहे. विवाहोत्सक मंडळींना अधिक प्रयत्न करावे लागतील नीट चौकशी करून निर्णय घेतला तर चांगले. प्रवास वेळेवर होतील आणि त्यातून नव्या ओळखी होऊ शकतील. कौटुंबिक व्यवहारात मात्र थोडा वाणीवर ताबा ठेवा, नाहीतर गैरसमज होऊ शकतात. कुटुंबामध्ये वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन मिळेल. संसारात मुलांकडून एखादी चांगली बातमी कळू शकेल. जोडीदाराचेही तुम्हाला प्रोत्साहन राहील. एकंदर तथ्यांश हा की, उत्साहाचा अतिरेक करू नका प्रकृती सांभाळून नवीन योजना आखा. थोडक्यात समतोल राखत संयम ठेवावा असे तुमचे नशीब आहे. ######### ६. कन्या: अत्यंत चिकित्सक कन्या राशीची माणसे संशयी व आतल्या गाठीची असतात अकाउंट्स ऑडिट वकिली पेशात उत्तम यश मिळवतात ही बुद्धाची रास असून बुद्ध येथे उच्चीचा होतो मात्र शुक्र येथे नीतीचा होतो शैक्षणिक यश वाद-विवादात तुम्ही छाप पाडतात मात्र तुम्ही नेहमी काळजी किंवा चिंता करत असतात त्यामुळे कपाळावर कायमच्या असे हे माणसांचे स्वरूप असते निर्भेळ सुख मिळवणे तुम्हाला कठीण होते विवाह हे दृष्टीने मृत्यू षडाष्टक आतील मेष रास टाळावी तर बुद्ध व मकर हे नवपंचम रात्रीतले जोडीदार तुमच्या बरोबर संसार आनंदाचा करू शकतात उत्तरा नक्षत्रातील पूर्ण हस्त व चित्रा नक्षत्राचे दोन चरण यांनी कन्या रास बनते. कन्या राशीसाठी यावर्षी परिस्थिती थोडी आलबेल अशी राहील व मागच्या वर्षीचा पाचव्या क्रमांकावरून आता 4 क्रमांक व 1086 अनुकूल गुण आहेत, हे ध्यानात ठेवा. अपेक्षा कमी ठेवा आणि प्रयत्नांची गती वाढवा, समाधान त्यामुळे वाढ होईल. मागच्या वर्षीचा तोरा आता चालणार नाही. काय करू आणि काय नको असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. मात्र एकंदर कालखंड प्रगतीपथावरच ठेवणारा असेल. अडचणी आणि विरोध त्याला योग्य प्रकारे तोंड देऊन तुम्ही नोकरी व्यवसायात आपली प्रगती कराल. यावर्षी नोकरीमध्ये प्रमोशन व्यवसायात चांगली भरभराट होऊ शकते. काही भाग्यवंतांना परदेशगमनाचे योग आहेत. मात्र कुठलाही अतिरेक करू नका व तब्येतीस जपावे लागेल. संसारामध्ये वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळणार आहे, तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये ते आघाडीवर राहतील. महिलांना आणि कुटुंबामध्ये नवीन पाहुणे येणे, त्यांचा पाहुणचार करणे आणि एकंदरच खेळीमेळीचे वातावरण राहणे,  मंगल कार्य होण्याची शक्यता अशी शुभ फळे आहेत. थोडक्यात, संयम ठेवला तर आनंद सौख्य मिळणार आगे बढो ! ########

बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५

" जाता जाता सहज सुचलं, म्हणून भाग 2!":

1 "नकोरे मनोरे, मनोरे नकोरे": (नोईडामधील twin tower उध्वस्त, ह्या घटनेमुळे, माझ्या ब्लॉगवरील ९ जुलै २०१८ रोजीच्या ह्या लेखाची आज आठवण येत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या व आर्थिक विकासाच्या गरजा एका बाजूला आणि दुसर्या बाजूला नागरी सेवा सुविधा, पर्यावरणावरचा ताण ह्यांचा गांभीर्याने विचार करून सुवर्णमध्य काढला पाहिजे, त्यासाठी आता तरी जागे व्हा !) सध्या टोलेजंग इमारती बांधण्याच्या हव्यासामुळे जमीन खचून शेजारच्या कुटुंबांवर कष्टाने घेतलेली घरे सोडण्याची वेळ येत आहे. तसेच अचानक लागणार्या आगींमुळे वित्तहानी व जीवितहानी असे धोके निर्माण होत आहेत. नागरी सेवा सुविधा व वहातूकव्यवस्थेचे बोजवारे उडत आहेत. मुंबई सारख्या बेटावर अशा संभाव्य धोक्याचा विचार न करता, नियोजनशून्य धोरणांपायी ह्या चांगल्या शहराची दुरावस्था होताना आपण उघड्या डोळ्यांनी पहात आहोत. म्हणूनच...... "नकोरे मनोरे, मनोरे नकोरे", हे आग्रहाने मांडणारा माझ्या ब्लॉगवरील हा लेख आहेे. मुंबई शहरातील नागरी सेवा सुविधांचा किती बट्टयाबोळ झाला आहे त्याचे दर्शन वर्तमानपत्रातील तक्रारींच्या पाढ्यांवरून ध्यानांत येईल. काही उदाहरणे: ➡पाण्याची पाईपलाईन फुटलेली व अतोनात पाणी वाया चाललेले ➡रस्तोरस्तीचे खड्डे, ➡रस्तेदुरूस्थीचा ठेकेदार गायब आणि खडी, रेतीचा ढीग रस्त्यावर पडलेला ➡रेल्वेस्टेशनखाली अंधार ➡टोल फ्री क्रमांक बिनकामाचा ➡रस्त्याचा दुभाजक वाईट अवस्थेत, अपघाताचा धोका ➡कचरापेटी नादुरुस्त, कचर्याचे ढीग तसेच पडलेले ➡केबलवायरचे मोठे जाळे रस्त्यावर पडलेले, अपघाताचा धोका ➡गटार तुंबलेले किंवा गटाराचे झाकण गायब ➡स्टेशनात छप्पर नाही, किंवा स्टेशनांत अस्वच्छता, शौचालये वाईट स्थितीत ➡बसस्टापवर छप्पर नाही किंवा गर्दुचल्यांचा मुक्काम ➡मुलांना खेळायला मोकळ्या जागा नाहीत ➡बागांमध्ये स्वच्छता नाही, झोपाळे आदि मोडकळीस आलेले ➡लोकलगाड्या म्हणजे दररोजचे यमदूत ➡रस्तोरस्ती गल्लीबोळांमध्ये दोनही बाजूंना वहानांचे पार्कींग आणि त्यामुळे ट्रँफिक जँम, वेळेचा इंधनाचा अपव्यय ➡शहरामध्ये स्वच्छताग्रुहांची कमतरता, आहेत ती नीट देखभाली अभावी गलीच्छ. इ.इ. इ.इ. ……… हया तर्हेच्या तक्रारी मारूतीच्या शेपटाएवढ्या लांबच लांब असूनही कोणतीही लक्षणीय सुधारणा नाही आणि एके काळी शांत सुंदर असलेली ही मुंबापुरी आज झोपडपट्यांनी वेढलेली, अजस्त्र लोकसंख्येच्या आणि जीवघेण्या प्रदुषणापायी गुदमरत चाललेली एक बकाल नगरी झालेली सगळे उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. अशी दारुण अवस्था शहराची असताना गगनचुंबी उंचच उंच मनोरे झोपडपट्टी निर्मुलन अथवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास अशा गोंडस नावाखाली, तिचे लौकरांत लौकर, नरकपुरींत रूपांतर केले जात आहे. म्हणूनच आज सुंदर मुंबई, हरित मुंबई ही घोषणा इतिहासजमा जमा झालेली आहे. म्हणूनच आता घोषणा हवी: नकोरे मनोरे, मनोरे नकोरे! मुंबईत उंच मनोर्यांच्या इमारती बांधत रहाण्याच्या हव्यासामुळे, आधीच नागरी सुविधांचा बट्टयाबोळ आणि बजबजपुरी झालेल्या शहराची काय भयानक अवस्था होईल ह्याचा कोणी विचारच करत नाहीये. ह्या गदारोळांत मूळचे भूमीपुत्र विस्थापीत होऊन पहाता पहाता त्यांचा मागमूस रहाणार नाही, ह्या वास्तवाकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुनर्विकासाचे गाजर दाखवून अर्धवट अवस्थेतील इमारतींमधील मूळचे कितीतरी नागरिक ना घर, ना घरभाडे अशा दारुण स्थितीत जवळ जवळ देशोधडीला लागून पस्तावत आहेत. त्यांच्या दु:खाला, वेदनांना तुलना नाही. 70 ते 100 वर्षांहून जुन्या चाळी, इमारतींबद्दल पुनर्विकासाची आवश्यकता समजता येऊ शकतो. परंतु सार्याच नागरी सेवा सुविधांची दारुण विदारक अवस्था, आताच कडेलोट झालेली मुंबईची लोकसंख्या आणि प्रदुषणाचा पडलेला विळखा ह्यांचा विचार करता कोणत्याही पुनर्विकास प्रकल्पांमध्ये जास्तीत जास्त सात (ते बारा ) मजल्यापर्यंतच नव्या इमारती बांधल्या जाणे योग्य ठरेल. 70/80 वर्षे जुन्या, जीर्ण झालेल्या चाळींच्या पुनर्विकासाचे एक वेळ समजू शकतो. परंतु आता ही लाट केवळ ३०/४० वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींचेही पुनर्विकासाचे लोण आले आहे. ह्याचा अर्थ ह्या इमारती योग्य ती काळजी व सामूग्री वापरुन बनविल्या गेल्या नव्हत्या. अशा कमकुवत कामाकडे संबधीतांनी, यंत्रणांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. आता उत्तुंग मनोरे न बांधता अशा इमारतींचे मजबूतीकरणच करणे हाच उपाय शहाणपणाचा आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जावून मुंबईची धुळधाण लावण्याचा उद्योग चालूच राहील, हे भावी पिढ्ढ्यांचे दुर्दैवच ठरणार आहे. 30 ते 40 टक्के झोपडपट्टयांनी वेढलेल्या मुंबई शहराची अशी लाज वाटावी अशी भयानक अवस्था कोणी केली? कां, कशी झाली आणि त्या करता जे जबाबदार असतील त्यांच्या अशा अक्षम्य अपराधांबद्दल काहीही न करता, झोपडपट्टी निर्मुलन योजना असे गोंडस नांव देऊन आंधळेपणाने उंच मनोर्यांमागून मनोरे बांधणे हे जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणेच नव्हे, तर शहराला खड्यांत गाडणे नव्हे कां? झोपडपट्ट्यांना वर्षांमागुन वर्षे अधिक्रुत करत रहाणे हा सत्तेचा दुरुपयोगच नव्हे कां? एक विनवणी निश्चित, जरा फक्त स्वत:कडेच न पहाता, भावी पिढ्यांसाठी आपण खेळण्यातल्या सारखी कुरकुर करणार्या खुळखुळ्यासारख्या शहराचा वारसा क्रुपया सोडून जावू नका. बाबांनो, ‘नकोरे मनोरे, मनोरे नकोरे!! सुधाकर नातू -------------- 2 पर्यावरण ऱ्हासासाठी प्रयत्न करणाऱ्या चिपळूण येथील श्री प्रमोद जोशी यांचे विचार सोशल मीडियावर नजरेत आले ते असे पर्यावरण रक्षणासाठी माझ्याकडून केल्या जाणाऱ्या काही कृती पर्यावरण रक्षण करणे, प्रदुषण कमी करणे, उर्जा वाचविणे यासाठी आपण काही करु शकतो का? हा प्रश्न स्वतःला विचारला तर त्याचे उत्तर हो असे आहे. आपण छोट्या मोठ्या कृतींतुन ही गोष्ट करु शकतो. पर्यावरण रक्षणासाठी माझ्याकडून केल्या जाणाऱ्या काही छोट्या कृतींचा उल्लेख येथे करत आहे. यातून मला मानसिक समाधान मिळते. वृक्ष लागवडीच्या कृतींमध्ये सहभाग, यामध्ये रोपे पुरविणे आणि प्रत्यक्ष वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घेतो. जुन्या वापरता येणार्‍या वस्तू दुरूस्त करून वापरण्याकडे कल आहे. घरातील गळणारे पाण्याचे नळ वेळच्यावेळी रिपेअर करतो. घरी येणाऱ्या लोकांना तांब्याभांड्यातून पाणी प्यायला देतो. (वैयक्तिक मत) यातुन लागेल तेवढ्याच पाण्याचा वापर होतो उरलेले वाया जात नाही. दसर्‍याच्या दिवशी आपट्याच्या झाडांची पाने सोने म्हणून देत नाही. शुभेच्छा तोंडी देतो. गरज नसेल त्या खोलीतला लाईट आठवणीने बंद करतो. मी स्वतः अनेक वर्षे फटाके वाजविणे बंद केले. फटाक्यांपासुन होणार्‍या हवेचे, आवाजाचे प्रदुषण, होणारे धोके ( आग लागणे वगैरे) याविषयीची जमेल तेवढी जन-जाग्रुती करत असतो. घरी तसेच कंपनीमध्ये पाठकोऱ्या कागदांचा वापर करतो. कागद तयार करायला झाडांची कत्तल केली जाते ही भावना. बाजारात जाताना कापडी पिशवी जवळ बाळगतो. त्यामुळे भाजीवाल्याकडुन वगैरे प्लास्टिकची पिशवी घेणे नाकारतो. आता काही वस्तू आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीतून मिळतात उदाहरणार्थ किराणा च्या लागणाऱ्या वस्तू वगैरे.अशा पिशव्या नुसत्या पाण्याने स्वच्छ होतात त्यांचा मी पुनर्वापर करतो. बाजारातून आपण ज्या वस्तू विकत आणतो त्यामध्ये अनेकदा प्लास्टिकच्या बऱ्याचशा लहान मोठ्या वस्तू येत असतात त्या प्लास्टिकच्या वस्तू रिसायकल करणे गरजेचे आहे म्हणजेच त्याचा पुनर्वापर जर केला गेला तर शहरातल्या कचऱ्याच्या नियोजनावर येणारा जो ताण असेल तो कमी होईल. त्यासाठी बारीक सारीक वस्तू म्हणजेच औषधांच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या, त्यांची बूचं, भांडी घासण्यासाठी आपण काथ्या वापरतो त्याच्या बाहेरील पुठ्ठा किंवा प्लास्टिक, प्लास्टिकचे खराब झालेले डबे, त्याची झाकणे,चमचे use and throw pens, प्लास्टिकच्या बॉटल्स, ग्लास अशा कितीतरी वस्तू आपण कचऱ्यामध्ये फेकून देत असतो तसं न करता एका पिशवीमध्ये त्या साठवून ठेवून जर आपण भंगारवाल्याला परत केल्या तर त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला एक मोठी पिशवी घेऊन ती गॅलरीत वगैरे ठेवून द्यायची. आठ दहा दिवसांनी ज्या काही वस्तू साठतील त्या प्लास्टिकच्या वस्तू पुनर्वापराकरता देऊ शकतो. मी असे करतो. जुने सेल ( wall clock, रिमोट, गॅस गीझर इत्यादींचे) ,काही metal scrap, कपड्यांचे, चपलांचे तसेच इतर काही वस्तूंचे रीकामे बॉक्स,वेगवेगळ्या प्रकारची पत्रके, दुकानदारांकडुन मिळणारी बीले वगैरे एका पिशवीत साठवून ती recycling साठी देतो. भंगार गोळा करणारी माणसे एकप्रकारे पर्यावरण रक्षणासाठी मदतच करतात या भावनेने मी अनेकदा या साठविलेल्या वस्तू recycling साठी मोफतच देतो. हल्ली बर्‍याच शहरांमध्ये प्लॅस्टिकच्या वस्तू (पाण्याच्या बॉटल्स वगैरे टाकण्यासाठी) पिंजरे उभारलेले असतात त्याचा वापर आपण करू शकतो. आपणही अनेकजण पर्यावरणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या काही कृती करत असाल तर एकमेकांना share करा त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल. आपली प्रत्येक कृती पर्यावरणीय राहील, संसाधनांचा अपव्यय होणार नाही असे वागण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि आपली वसुंधरा प्रदूषित होणार नाही याची काळजी घेउया. संसाधनांची बचत आणि पर्यावरणाची जाण मनापासून घेऊया वसुंधरा रक्षणाची आण Nature is a beautiful creation Save it everyone by devotion प्रमोद य. जोशी चिपळूण ☘️☘️🌹🌷🍁🍁 --------☆-- 3 👍"बोल, अमोल-272 !":👌 💐💐 "प्रत्येकाच्या जीवनात अनेक माणसं येत असतात, त्यांच्याबरोबरच्या संपर्कामुळे व सहवासामुळे आपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल स्वभावाबद्दल आपल्या पुरते बरे वाईट समज करून घेत असतो. पण एखादा माणूस खरोखर अंतर्बाह्य कसा आहे, ते समजण्यासाठी माणसं वाचता यायला हवीत. माणसं वाचणं ही एक कला आहे आणि त्याच्यासाठी निरीक्षणशक्ती, संवेदनशील मन, आकलन आणि तर्कशुद्ध विश्लेषणक्षमता असावी लागते. केवळ प्रतिभावान लेखकांनाच हे सारे जमते असं मला वाटतं. याकरताच व्यक्तिचित्रात्मक ललित लेखसंग्रह जितके वाचाल, तेवढी माणसांची अनेकानेक इंद्रधनुषी रूपं तुमच्यासमोर साकार होतील. 'गणगोत' हे 'पुलं'च पुस्तक वा डॉ अंजली कीर्तने यांचं 'आठवणीचा पायरव' जर वाचलंत, तर मी काय म्हणतो ते तुम्हाला कळेल. आपल्याला देखील अशी माणसं वाचायची किमया साधता यावी. त्यामुळे अगम्य अशा जीवनातील आपल्या जाणिवांचा भवताल अधिकाधिक प्रकाशमान होईल !":💐💐 ---------- 5 "सजग संमजसपणाची त्रिसूत्री": "विचारी व्यक्त व्हा मुक्त व्हा !": या मुक्त संवादात आपले मनःपूर्वक स्वागत मला सर्वसाधारणपणे अमृत काळात म्हणजे पहाटे तीन ते साडेतीनच्या आसपास अचानक कधीकधी जाग येते आणि कुठून करते कुणास ठाऊक माझ्या मनात कल्पना विचार व्यक्त होत असतात पुष्कळदा त्या नंतर झोपते ना विसरण्याचे कारण थांबतोय अमृता काळी पहाटे विचार सुचला जे बोल अमोल या माझ्या नेहमीच्या उपक्रमात यथातच्य वाटतील असे होते ते म्हणजे सजग संमजसपणाची त्रिसूत्री विचारी व्यक्त व्हा मुक्त व्हा मी सोशल मीडियावर प्रकाशित केल्यावर नंतर मला हा संवाद साधताना असे सुचले की ज्यांना आपण ग्रुपला हे पाठवले आहे त्यांना जणू एखाद्या मराठीच्या परीक्षेमध्ये कल्पनाविस्तार करा असा प्रश्न येतो त्याप्रमाणे मुक्त व्हा याचा कल्पनाविस्तार करा अशी देखील मी संदेशांची मालिका त्या त्या ग्रुप वर टाकली आणि मला सुचले की आता हे आव्हान मी पण स्वीकारले पाहिजे पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे विचारी व्हा सर्वसाधारणपणे आपल्या जीवनात वाचनांमधून बघण्यामधून ज्ञानेंद्रियांच्या विविध प्रक्रिया मधून आपल्यासमोर वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळे प्रसंग अनुभव दातेसंबंध व्यावसायिक संबंध असे विविध प्रकारचे असे जाणीवांचे परिप्रेक्ष विस्तारित होत असते सर्वसाधारणपणे आपोआपच काही माणसांच्या मनात त्याच्या बऱ्या वाईट कल्पना विचार निर्माण होऊ शकतात तर पहिला मुद्दा जो आहे पहिले सूत्र ते म्हणजे तुम्ही अशा तऱ्हेच्या या साऱ्या जीवनात अनुभवावर हार करा धीरक्षर विवेकाने विचार करा काय बरोबर काय चूक कोणतं योग्य कोणता अयोग्य कोणतं केव्हा योग्य इत्यादी इत्यादी बऱ्याच वेळेला तुमच्या मनाविरुद्ध देखील ते घडू शकत असेल त्या तऱ्हेचे तुम्हाला मनात विचार येत असतील अशा तऱ्हेच नातेसंबंध किंवा व्यावसायिक संबंधात होऊ शकतो अशा वेळेला जर तुम्ही व्यक्त नाही झाला जे जे वाटतं ते सुसूत्रपणे ताबडतो त्या त्या व्यक्तीला तुम्ही व्यक्त केलं तर तुमच्या मनात त्याच्या निगेटिव्ह किंवा नकारात्मक असा परिणाम होणार नाही जर सकारात्मक अशा सूचना असल्या तर देखील त्यासमोरच्या व्यक्तीचा किंवा जे काही पुढे त्यामधून घडणारे त्याचं प्रगतीकरणच होईल त्यामुळे तुम्ही आपल्या मनात न ठेवता जर कोणाचे बोलणं नकोच वाटत असेल, तर हे असं मुक्तपणे संवाद स्वतःची साधत व्यक्त व्हा म्हणजे तुम्हाला कुठल्याही तऱ्हेनं त्रास होणार नाही !"

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५

" पुढचं पाऊल एक नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2026 से संक्षिप्त राशिभविष्य, !'

💐"पुढचं पाऊल 1 !":💐 लेखक: श्री सुधाकर नातू 💐"मी श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सर्वप्रथम एक नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2026 या कालखंडाचे एकमेवद्वितीय असे 'तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार' होऊ शकतात, ते दर्शविणारे अनुकूल गुणांनुसार प्रयत्न आणि अपेक्षा यांच्या समतोलाने आपणच आपल्या जीवनाची दिशा समाधानकारक कशी करू शकता, ते दर्शविणारे संक्षिप्त वार्षिक राशिभविष्य सादर करत आहे....💐 प्रास्ताविक: भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य ज्योतिष रविला. त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना, जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते. आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणि प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार निर्णय व क्रुतीवर प्रभाव पाडत असते, हे ओघाने आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे. अनुकूल गुण पद्धती: कालचक्र अव्याहत फिरत असते, माणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतात. हा क्रम प्रत्येकाला अनुभवाला येतो. उद्याचा दिवस, आजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या आशेवर माणूस जगत असतो. उद्याचे पुढचे पाऊल कसे असेल, येणारा काळ कसा असेल, अनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो दर वर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात असतो. माणूस उंच वा बुटका आहे, जाडा किंवा बारिक आहे, तो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशी काही कल्पना येत नाही. ती येण्यासाठी कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यक असते. जसे उंची सेंटी मीटर, वजनासाठी किलोग्राम, आर्थिक स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने दाखवता येते. ह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस कोणाला कसे जातील, हे भविष्याच्या ज्ञानाच्या आधारे सांगण्याची पद्धत म्हणजे राशीभविष्य होय. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे. नशिबाच्या परिक्षेचा निकाल: प्रथम या परीक्षेमध्ये पाच गटांमध्ये राशींची परिस्थिती काय आहे नशिबाची ते दर्शवले आहे. नंतर दिलेले दोन्ही तक्ते माहवार राशीनिहाय गुणांची चिकित्सक अशी स्थिती दर्शवली आहे ती नीट समजून घ्या. पहिल्या तक्त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी शेवटच्या स्तंभामध्ये यावर्षीचे गुण नंतर मागच्या वर्षीचे गुण कमी का जास्त आणि मागच्या वर्षीचा क्रमांक दाखवला आहे तर दुसऱ्या तक्त्यामध्ये प्रत्येक राशीची पाच गटातील प्रत्येक महिन्याला गटवारी दाखवली आहे आणि शेवटच्या तीन तक्त्यांमध्ये यावर्षीचा क्रमांक मागच्या वर्षीचा क्रमांक आणि किती फरक झाला ते दाखवले आहे. ३१ दिवसांचा महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे जास्तीत जास्त गुण १८६, तर 30 दिवसांच्या महिन्यांचे जास्तीत जास्त गुण १८० आणि फेब्रुवारी 2025 चे जास्तीत जास्त अनुकूल गुण १६८. याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ग्रह किती शुभ दिवस आहेत. ते अनुकूल गुण, त्या त्या महिन्याला किती गुण आहेत हे प्रत्येक राशीसाठी दाखवलेले आहेत. तसेेच प्रत्येक महिन्यात आपले नशिब कोणत्या गटात आहे, हे समजू शकेल आणि त्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल राखत समाधान मिळवण्याची युक्ती तुम्हाला मिळू शकेल अशी अनुकूल गुणांची कल्पना आहे. अनुकूल गुणांच्या पद्धती: नियम आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत. प्रत्येक राशीला सहा प्रमुख ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण देतो. ते नियम असे आहेत: रवि: ३,६, १० व ११ वा शुभ मंगळ: ३,६, व ११ वा शुभ बुध: २,४,६,८,१० व ११ वा शुभ गुरू: २,५,७,९, व ११ वा शुभ शुक्र: १,२,३,४,५,८,९,११ व१२ वा शुभ शनी: ३,६, व ११ वा शुभ "नशिबाची गटवारी": आगामी १४ महिन्यांच्या कालखंडात वरील महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ आहेत, ते आजमावून माहवार शुभदिवस अर्थात अनुकूल गुण देऊन, त्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे: १.उत्तम पहिला गट: तुुळ मकर व वृषभ राशी. २.उजवा दुसरा गट: कन्या कुंभ व ळसिंह राशी राशी. ३.मध्यम तिसरा गट: मिथून धनु व वृश्चिक राशी. ४.डावा चौथा गट: मीन व कर्क ५.त्रासदायक पाचवा गट: मेष राशी. शनीची साडेसाती: साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हां तुमच्या चंद्रराशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा साडेसाती सुरू होते व तुमच्या राशीच्या पुढील राशीनंतर येणार्या राशींत जातो, तोपर्यंत साडेसाती असते..... उदा: सध्या कुंभ राशींत शनी आहे, म्हणून आता मकर, कुंभ व मीन राशींना साडेसाती आहे. शनी मीन राशीत जेव्हा प्रवेश करेल, तेव्हा मकर राशीची साडेसाती संपेल, तर मेष राशीची सुरू होईल. # 14 मे रोजी गुरू मिथुनेत, 18 ऑक्टोबर कर्क आणि 5 डिसेंबर वक्री परत मिथुन येतो. # 29 मार्च रोजी शनी कुंभेतून मीन राशीत जाईल आणि त्यामुळे मकर राशीची साडेसाती 29 मार्च 2025 ला संपेल. पण मेष राशीची साडेसाती सुरू होते. तर कुंभ राशीची साडेसाती 23 फेब्रुवारी 2018 आणि मीन राशीची साडेसाती सात एप्रिल 2030 ला संपेल. "राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य": मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल: १मेष रास 7 क्र. वरून चक्क तळाच्या 12 क्रमांकावर आली आहे. तुमचे एकूण गुण 1078 वरून 668 झाले आहेत साहजिकच 410 इतक्या गुणांचा जबरदस्त फटका तुम्हाला बसला आहे. मागच्या वर्षी पेक्षा तुम्हाला अपेक्षा खुुप खुप कमी ठेवाव्या लागतील आणि त्या प्रमाणात प्रयत्न मात्र प्रचंड वाढवायला लागतील तरच थोडीफार गाडी सुधारेल. २.व्रुषभ राशी गेल्या वर्षी 1 ल्या सर्वोत्तम शुभफळे देणार्या क्र.वर आपली जागा निश्चित केली होती. 1343 सर्वोच्च गुणसंख्येेवरून थोडी उडी घेऊन यंदा 1427 गुण मिळणार आहेत. तरीही यावर्षी तिसरा क्रमांक आहे. प्रगतीची गाडी तशीच अपेक्षेप्रमाणे चालत प्रयत्नांना यश येणार आहे. ३.मिथून राशीच्या नशिबी मागील वर्षी 9 व्या स्थानी जाण्याची वेळ आली होती आणि 845 गुण मिळाले होते. तेव्हा स्थिती कठीण होती मात्र यंदा 874 गुण मिळून 8 क्रमांकावर समतोल साधणाऱ्या अवस्थेचा लाभ होणार आहे. कुछ खट्टा कुछ मीठा असे यावर्षीचे थोडक्यात फळ आहे. ४. कर्क राशीचे नशीब फारसे बदलणार नाही कारण मागच्या वर्षी 8 क्र.वरून घसरगुंडी होऊन अकरावा क्रमांक मिळाला आहे. गुण थोडेसे कमी होऊन 835 मिळाले आहेत. सहाजिकच तुमच्या परिस्थिती मध्ये मागच्या वर्षी पेक्षा अधिक परीक्षा पाहणारी असणार आहे. ५ सिंह मंडळी मागील वर्षीच्या 8 क्रमांकावरून किंचित पुढे वर घसरून 6 व क्रमांक व अनुकूल गुण 971 झाल्यामुळे साहजिकच हे वर्ष थोडीशी मनाला उभारी देऊन जाईल. ६ कन्या राशीने मागील वर्षी 5 व्या स्थानी अनुकूल गुण 1108 मिळवले होते. मात्र यावर्षी परिस्थिती थोडी आलबेल अशी राहील व 4 क्रमांक व 1086 अनुकूल गुण आहेत, हे ध्यानात ठेवा. अपेक्षा कमी ठेवा आणि प्रयत्नांची गती वाढवा, समाधान त्यामुळे वाढ होईल. ७ तुळा राशीने गेल्या वर्षी दुसऱ्या स्थानी 1279 अनुकूल गुण मिळवले होते. आता त्यात चांगली उत्साहवर्धक वाढ होऊन 1455 गुणांसाठी सर्व बारा राशींमध्ये सर्वोत्तम असा पहिला क्रमांक मिळवणार आहे. जणू हात लावेल तिथे सोनं अशा तऱ्हेचे घवघवीत यश तुम्हाला मिळू शकेल व नवनव्या संधी प्राप्त होतील. ८ व्रुश्चिक राशीला मागील वर्षी 11 व्या स्थानी 770 गुण तुम्हाला मिळाले होते. या आगामी वर्षी किंचित सुधारणा होऊन तुमचा 9 वा क्रमांक व 857 अनुकूल गुण मिळतील. चढ उतार करणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायचे असून, अधून मधून अपेक्षाभंगाचे चटके व विरोधकांच्या कारवाया वाढतील. ९ धनु राशीची 4 स्थानी मिळालेल्या 1265 वरील मागच्या वर्षीचा तोरा आता चालणार नाही. काय कारण यंदा सातव्या क्रमांकावर घसरण होऊन 903 गुण मिळणार आहेत. अपेक्षा मर्यादित ठेवून प्रयत्न अधिकाधिक वाढवावे लागतील आणि जे पदरी पडेल ते स्वीकारावे लागेल. १० मकर राशीचे नशीब गुणांमध्ये उत्तम वाढ झाल्याने मागील वर्षी 3 रे स्थानी 1235 गुण मिळवून पहिल्या गटात वर्ष चांगले गेले होते. सुदैवाने आताही नशिबाला तुमच्यावर कृपा करावयाची आहे त्यामुळे आगामी वर्षी दुसरा क्रमांक पटकावून 1247 गुण मिळवणारा आहात. अडचणी नसलेले आणि नवनवीन संधी प्राप्त करून देणारे नशिबाचे निरभ्र असे आकाश तुमच्या वाट्याला आले आहे. या संधीचा फायदा घ्या व आपला प्रगती विकासाचा वारू असाच दौडत रहा. ११ कुंभ राशी मागील वर्षी 6 व्या स्थानी नशीब आजमावत तारेवरची कसरत करत तोल सांभाळत होती. यंदा 1054 गुण मिळून 5 व्या क्रमांकावर उजव्या दुसऱ्या गटात आपल्या बुद्धीचा चांगला उपयोग करत, अडचणी संकटांवर मात करत समाधानाचा मार्ग शोधत उत्साहाने कामाला लागून अपेक्षापूर्ती साधाल. १२ मीन राशीच्या वाट्याला मागील वर्षी 718 गुण मिळून तळ गाठला होता व कष्टकारक दिवस अनुभवले होते. आता किंचित गुण वाढत 869 गुणांवर नवव्या क्रमांकावर तुम्ही स्थानापन्न होणार आहात. अर्थातच होते तशाच परीक्षा पाहणाऱ्या अपेक्षाभंग करणाऱ्या प्रसंगांना तोंड देत राहायचे आहे. II शुभम् भवतु II धन्यवाद लेखक: श्री सुधाकर नातू