गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

"My universe of Social Media !-1 ":

 "My universe of Social Media !-1 ":


For me social medium is an open Platform for polishing one’s innovative creative ability & 
I call the social media as a Gymnasium for Lateral thinking..

I am therefore pleased to share here few Gems of my innovative & interesting thinking from my SM postings and I am sure they too would make you think & introspect.....

1
"God bless the commoners !":
It's a fact that not every one can be famous with name, fame and glory and only minuscule get such previlege.

But ordinary mortals need not be sad, need not feel inferior or repent for not achieving that status. This is because, it is absolutely due to the acceptance, praise and putting these Idols, who happen to be in minority, on higher platform by the majority million minions, that they occupy such popular position.

While we, the minions, can exist without these achievers, they simply don't have place without us! More-over simpletons' lives are more free and open compared to their closed in cage plight, with burden of infinite anxiety of losing the high ground, torturing them all the while !

God bless the commoners; pity the Heroes!!
(My FB post of 24th Feb'18)

2

"Mystery of Life and Death":
It's solace, that no advance information is given to any one and dark tentacles of death take a living life, dear to many, away to nowhere, in oblivion, never ever to return.

Wonder, really, what is the unknown mistery of MR. Death and it's timing. Is it, that the exact numbers of heart bits and the number of breaths fixed and unchangeable, at the time of one's birth? Who, how does some one unknown , determines and fixes it.

Even the life-spans of every one, even those of the siblings born to the same parents are different. No answers to that. Who will find them, or will any one ever would be able to find them??

That's then is the mystery of Life and Death.
(FB post 17th Feb'19)

3
"That's Life":
Life is a continuous, ongoing experience that goes on and on and only some day suddenly, you get quenched in the out of the world experience that makes your day.

It can be in any form- reading, writing, film, drama, event, awareness about noble virtues, flow of emotions and so on.

All you need, is a vision to look for, a sensitive mind to feel for. Once you know you have these, then the Life is a Fun, a Run to identify such fulfilling experience.
(FB post of 19 Feb'15)

4
"The Times, gone by":
If you are curious and a liking to understand many an unknown pockets of our radical transformation in the fields, like education, literature, social service, trends/traditions, from our recent history of the last around 150 years, please do read a classic book, 'Gatkal' by Dr. Anant Deshmukh.

These are about 50 researched write ups, that open up our introspective, curious minds with spicy, critical narrations of the life and times of well-known personalities, who brought about such turn- arounds in our recent history.

I finished this book of over 250 pages and now I am richer to know, what I didn't know so far, and with that my thirst, my curiosity about times gone by, has increased multy-fold. This is just to share my experience, that made my day!

Please, Do go and get to read the copy of 'Gatkal'-the times gone by!!
(FB post of 19 Feb'15)

5
"Elections-Reforms !":
To get the correct picture of the opinion of the people in Elections, Voting must be made compulsory and one's Vote should have a value according to his age group.

If the life expectancy is assumed to be 70 years then value of Vote for age group-61 to 70 + onwards to be 1, for age group 51 to 60 it should be 1.1, for 41 to 50 it should be 1.2, for 31 to 40 it should be 1.3, finally for the youngest group upto 30 it should be 1.4;

This is because the future of younger group is more at stake than the older one.
(FB post of 19 Feb'12)
Any takers/responses?.....

6
"Competing Intensities":
'Saw the film, 'Apala Manus', understandably a remake of Drama 'Katkon Trikon' and it triggered in my mind an out of box idea of comparing a series of Marathi Artists with competing intensities, in similar roles:
1. Dr Mohan Agashe and Shri Nana Patekar
2 Vikram Gokhale and Late Vinay Apte
3 Atul Kulkarni and Sachin Khedekar
4 Prashant Damle and Mohan Joshi
5 Swapnil Joshi and Aniket Vishwasrao
6 Dilip Prabhawalkar and Pushkar Shrotri
7 Abhijit Khandkekar and Lalit Prabhakar
8 Prasad Oak and Vaibhav Mangle
9 Pradip Velankar and Rajan Bhise
10 Makarand Anaspure and Late Laxmikant Berde
And that leaves one and only one, Unique, Ashok Saraf and who?? Amitabh Bacchan ???.............
(My FB post-१२-२-२०१७)7

7

From Darkness to Light":
'Learning is an exploration from darkness to Light, from the unknown to known, from unawreness to awareness; thus expanding your 'World', broadening your horizons.

Our five sense organs that enable us to see, to smell, to hear-listen, to feel and to think, are the tools for this learning process and also to our critical appreciation ability.

What one does, when he sees a scene, a picture, a film or a drama, or reads literature,or interacts with others, etc. he likes it or hates, or avoids it and differentiates between what's good and what's not.

Thus critical appraisal is an advance application of the unique Learning Process.'
( My FB post of 1March'2015 )

8

"A Relook, at Festivals"
1. While appreciating our noble traditions of the Festivals, after Festivals, rejoicing merrily, with ultra-high decibel levels of noise, time has now come to seriously review, how much of it is really correct and essential, in the changed World of 21st century.
2. Further, while doing so, what is the proportion of waste of valuable productive time thus, V/S the quantum of productive time really brought to use in a year.
3. Without such course correction, our dream of becoming a Super Power in the World would be very difficult, if not impossible. And the terrifying trouble is,if it would be so, despite having the enviable advantage of the highest percentage of youths on our side.
(My FB post of 6th March'2015 )

Now some thing nostalgic......

9

"Alas, those were the Days!:
More often than not, I happen to see Ghisi Piti' films and some forgettable stage-drama, hence I am scared to go to the theaters for such useless waste of my precious time, energy and money.

May be, my growing age is responsible or my taste, primarily, nourished on the Golden Era of Films/ Dramas, is responsible for such total reluctance to tolerate just mauj masti, foolish comedy or dances, revenge, fights etc. which the generation- next probably likes and craves for.

The real creativity, imaginations, emotions and tender relationships seem to have no place in the fast moving 21st century Life-styles. Like in the Democracy, people get the type of Government, they truly deserve; in the entertainment World too, the Society gets what it's character really is. Now people like me are left with no choice but to be eternally Nostalgic- saying 'Alas those were the days of sense and substance.
(FB post of 22 Feb'18 )


Thank you,
Sudhakar Natu

P.S.
To see.....
Over 50 interesting videos...
On my moonsun grandson
Channel on you tube.....
Pl. Open this link.....

https://www.youtube.com/user/SDNatu

If you like them....
Pl. Do share the link.....

"वार्षिक राशीभविष्य-'२०/'२१-माहवार राशीनिहाय अनुकूल गुण":





गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

"माझा सोशल मिडीयावरील 'संसार'!-२": "चित्रदर्शन":

 "माझा सोशल मिडीयावरील 'संसार'!-२": "चित्रदर्शन":

आठवणींची गोडी मोठे गमतीशीर असते. आता सोशल मीडियावर सहभागी होऊन मला दहा वर्ष लवकरच पूर्ण होतील. त्यामुळे तेव्हापासून सोशल मीडियावर माझ्या स्वतःच्या वैचारिक कल्पना मांडायला मी सुरुवात केली.

सोशल मीडियाचा हा वैचारिक संसार सुरू केला, त्यातील निवडक वेचक-वेधक विविध विषयांवरील असे संदेश, या लेखमालेचे द्वारे मांडत आहे, त्यातील हा दुसरा प्रयत्न:

चुकभूल द्यावी घ्यावी !

"प्रेरणादायी दिशादर्शक 'आनंदी गोपाळ'":

"आनंदी गोपाळ" हा चित्रपट बघितला. पाल्हाळ न लावता, पहिलाच मुद्दा सांगतो की, हा चित्रपट इतका सर्वांगसुंदर आहे की, तो भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात यावा.

"त्या" वेळची माणसं, आणि "त्या" वेळचे वातावरण, तसेच कर्मठ समाजाची परंपरागत मनोधारणा, अशा माहोलात गोपाळराव जोशींसारख्या एका विक्षिप्त म्हणवल्या जाणाऱ्या माणसाने, स्त्रियांच्या परावलंबित्वातून निर्माण झालेल्या अगतिकतेवर उपाय म्हणून, आपल्या बायकोला काहीही करून सुशिक्षित करावयाचे हा घेतलेला अट्टाहास, पाहिलेले ते स्वप्न, हा खरोखर जगावेगळा वेडेपणा होता. कारणपरत्वे आपले मूल योग्य तर्हेची लक्षणांची जाणीव, व सत्वर उपाय न मिळाल्यामुळे व डॉक्टर वेळेवर न मिळाल्यामुळे मरण पावले, या विषण्ण करणार्या जाणिवांतून आनंदीबाईंच्या मनात तर, भावी समाजाच्या भल्यासाठी, डॉक्टर होण्याचे स्फुल्लिंग निर्माण होते हीच बाब अतुलनीय! त्या आदर्शवत् ध्येयाचा पाठपुरावा, हे अद्वितीय जोडपे, अनेक अडचणी संकटे येऊनही कसे पूर्ण करते, त्याचे ह्रदयंगम चित्रण हा बोलपट प्रभावीपणे करतो.

अशा जीवघेण्या कसोटी पहाणार्या धडपडीमुळेच, आनंदीबाई जोशी, ह्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आणि तेही केवळ २२ वर्षांच्या अल्पायुष्यात, एखादी ग्रीक ट्रँजेडी शोभावी अशा दुर्देवी तर्हेने. चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारा असला, तरी आजपर्यंत, ज्या ज्या स्रीयांनी विविध क्षेत्रांत, असे चाकोरीबाहेरचे 'पहिल्यात पहिले', असे योगदान दिले, त्या सार्यांची मांदियाळी रूपेरी पडद्यावर झळकते व ती पहात पहात सारे प्रेक्षक ताठ मानेने व भारावून जावून चित्रपटग्रहाबाहेर पडतात.

हा चित्रपट खरोखर उत्तम अभिनय योग्य असे संवाद आणि कार्यकारणभाव पटेल, परिणाम आणि कृती यांचा मेळ घालता येईल असे प्रसंग, त्याचबरोबर योग्य त्या पार्श्वभूमीचे चित्रण, त्या जोडीला अनुरूप असे संगीत ह्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. प्रमुख योगदान अर्थातच नायक ललित प्रभाकर आणि नायिकेच्या रूपात भाग्यश्री मिनिंग यांनी दिले आहे. प्रथम पत्नीच्या सासुबाई झालेल्या श्रीमती कुलकर्णींचेही खरोखर वैशिष्ट्यपूर्ण असे काम झाले आहे. एकूणच सर्वच पात्रे आपाआपली व्यक्तिरेखा चपखलपणे सादर करत असल्यामुळे, हा चित्रपट एक चविष्ट असा हवाहवासा मसाला बनलेला आहे. हे सारे घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून, श्री. समीर विद्वांस ह्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

उत्क्रांती हा सर्व सजीवांचा मूलभूत असा आविष्कार आहे, नव्हे त्यांची ती गरज आहे. सहाजिकच हजारो वर्षे स्त्रियांना जाणीवपूर्वक शिक्षणापासून दूर ठेवल्यामुळे, त्यांच्यावर जी परावलंबित्वाची, एक प्रकारच्या गुलामीची वेळ आली होती, ती द्रष्ट्या अशा अनेक समाजसेवकांच्या कामगिरीमुळे दूर झाली. त्यामध्ये गोपाळराव जोशी या माणसाचा सिंहाचा वाटा होता हे आपल्याला मान्य करावेच लागेल.
आज आपल्या भोवती स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर काम करताना दिसतात. त्याचे मूळ गेल्या शतका दीडशतकातील क्रांतिकारक अशा समाजसुधारणांत आहे.

हा चित्रपट बघितल्यामुळे प्रत्येकच व्यक्तीला, विशेषतः स्त्रियांना वाटेल की आज माझी जी परिस्थिती आहे, ती मी काही करून अधिक उत्तम बनविण्यासाठी कष्ट घेईन; तसेच पुरुषही स्वतःची प्रगती करता करता, आपल्या कुटुंबातील समस्त स्त्रीवर्गालाही, योग्य ते प्रोत्साहन देऊन त्यांच्या गुणांना योग्य तो मार्ग दाखवत प्रगतीसाठी साधू शकतील. अशा तऱ्हेची प्रेरणा देणारा चित्रपट खरोखर दुर्मिळच! म्हणूनच सुमार चरित्रपटांच्या भाऊगर्दीत "आनंदी गोपाळ" हा चित्रपट एखाद्या कोहिनूर हीर्यासारखा मुकूटमणी म्हणून शोभतो.

धंदा कला आणि विचार अशा त्रिवेणी संगमातून निर्माण केली जाणारी करमणुकीची कलाकृती ही नेहमीच असामान्य मानली जाते. त्या तुलनेत "आनंदी गोपाळ" चित्रपटाने ह्या गुणत्रिवेणीचा यथोचित समतोल साधून, वेगळी दिशा दाखवण्याचे महत्कार्य केले आहे. म्हणूनच पुन्हा सांगतो की, हा चित्रपट ऑस्कर मिळविण्याच्या लायकीचा आहे. प्रत्येकाने तो बघावाच अशी माझी कळकळीची सुचना आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू.

ता.क.
हा लेख आवडला तर....
ही माझ्या ब्लॉगची लिंक शेअरही करा.....

https://moonsungrandson.blogspot.com

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१

"माझा सोशल मिडीयावरील 'संसार'!-१ ":

 "माझा सोशल मिडीयावरील 'संसार'!-१ ":

आठवणींची गोडी मोठे गमतीशीर असते. आता सोशल मीडियावर सहभागी होऊन मला दहा वर्ष लवकरच पूर्ण होतील. त्यामुळे तेव्हापासून सोशल मीडियावर माझ्या स्वतःच्या वैचारिक कल्पना मांडायला मी सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत माझा ह्या माध्यमातून जो प्रगतीपर प्रवास झाला, तो आपल्याला अनेकानेक स्वतंत्र संदेश, ब्लॉगवरील लेख, विविध डिजिटल अंक आणि विडीओज् याद्वारे माहीत झाला आहे.

आज सहज सर्फिंग करताना एक अंतर्मुख करणारा संदेश, माझ्या वॉलवर नजरेस
आल्यावरून कल्पना सुचली की, गेल्या दशकात ज्या संदेशांद्वारे आपण सोशल मीडियाचा हा वैचारिक संसार सुरू केला, त्यातील निवडक वेचक-वेधक विविध विषयांवरील असे संदेश, या लेखमालेचे द्वारे मांडावेत.
म्हणून हा पहिला प्रयत्न:
चुकभूल द्यावी घ्यावी !


"कुठे लंडन, कुठे शांघाय आणि कुठे मुंबई!"

खड्डयात गेलेले रस्ते, अपरंपार अनधिक्रुत बांधकामे, घाणीचे साम्राज्य असलेल्या झोपडपट्ट्यांचा विळखा, कचर्यामुळे रोगराई, नीट चालता न येऊ शकणारे फुटपाथ, अंधारी, असुरक्षित भुयारी रस्ते, नाहक बांधलेले निरुपयोगी स्कायवाँक, अपुरी दुर्लक्षित सार्वजनिक वहातूक, पार्कींगची जटील समस्या, जागोजागचे ट्रँफिक जँम, फेरीवाल्यांचे अडथळे, रिक्षावाल्यांचा हैदोस अशा अनेक तर्हेच्या मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबत जाणार्या समस्या, ह्यामुळे हया आर्थिक राजधानीची अवस्था from bad to worst अशी दुर्दैवाने, वेगाने होत आहे.

कुठे ते अप्रतिम लंडन आणि कुठे हे ब्रिटीशांनी प्रती लंडन बनविण्याचे स्वप्न पाहिलेले, तसेच इथल्या मतलबी राजकारण्यांनी, ज्याचे शांघाय बनविण्याचे 'गाजर' दाखविलेले हे मुंबई शहर! अधोगतीची किती ही परीसीमा !! दूरद्रुष्टिचा अभाव, फसलेले दिशाहीन नियोजन आणि अकार्यक्षम, गलथान अंमलबजावणी; हे कमी नाही म्हणून की काय भीषण भ्रष्टाचार आणि बोकाळलेला कामचुकारपणा ह्यापायी, आणखी दुसरे काय होणार होते?
(फेबु-१६-२-२०१७)

"नगरभक्षक?":
सन्मान्य अपवाद वगळता, अपेक्षित कामे न करता, केवळ 'मलिद्या'ची अपेक्षा बाळगून, 'सेवे'चे सोंग घेत सत्तेची हाव ठेवणार्यांना काय म्हणायचे? 'नगरसेवक' की 'नगरभक्षक'?
(फेबु-१६-२-२०१७)

Nobody is indispensable":
काळाच्या तात्कालिक गरजेप्रमाणे, काळाच्या ओघात, नेहमीच समर्थ पर्याय निर्माण होत असतात. Nobody is indispensable. अमूकच व्यक्ती पर्याय होईल, ह्याची कुणालाच कधीही खात्री देता येत नाही, आजवरचा इतिहास हेच सांगतो. भाबडी आशा बाळगण्याखेरीज, आपण काहीही करू शकत नाही. जे जे जसे जसे घडत रहाते, त्याचाच परीपाक उद्या घडत असतो आणि हे चक्र अव्याहतपणे चालू रहाणे हा निसर्गनियम आहे. अखेरीस, सुयोग्य परिस्थितीच अपेक्षित पर्याय पुढे आणते.
(Whatsapp-७-१-२०२१)

"नशिबाचा फेरा !":
"एखादा, काही वर्ष अक्षरश: डोक्यावर घेतला जातो, जिकडेतिकडे त्याचा उदोउदो होतो. परंतु बघता-बघता काळ बदलतो आणि डोक्यावर होता तो आता पायदळी तुडवला गेल्यासारखा, कुठेतरी अंधःकारमय दुनियेत फेकला जाऊन विसरलाही जातो...... 

घरी दारीही तोच अनुभव पहायला मिळतो. घरांमध्ये दोन तीन मुलं असली तर त्याच्यातला एखादा तरी फुकट जातो, बाकीचे थोडेफार यशस्वी होतात. म्हणजे उडदामाजी काळे-गोरे हा जो काही स्थायीभाव आहे, तो सातत्याने आपल्या नजरेस येतो...........

हे असं का होतं ते समजण्यासाठी......
ही लिंक उघडा...........

https://moonsungrandson.blogspot.com/2019/08/blog-post_8.html

हा लेख आवडला तर.....
लिंक शेअरही करा.......
(Whatsapp ३१-१-२०२१)


"नियतीचे खेळ!":
गरज ही शोधाची जननी, तशी वेदना ही नवनिर्मितीची, प्रतिक्षा ही फळाची, मीमांसा ही टीकेची, अन्याय वा उपेक्षा प्रतिशोधाची, बंधने ही मुक्ततेची, स्फूर्ती ही प्रतिभेची माता होय. देणे-घेणे, सोसणे-पुसणे, करणे-भरणे, रूसणे-हसणे, उमलणे-फुलणे-कोमेजणे असे नियतीचे खेळ हे सारे चालती अव्याहत!
(फेबु-१६-२-२०२१)

"सत्तेचे गुलाम !":
निष्कलंक चारित्र्य हा सार्वजनिक जीवनात प्रवेश व वावर करण्यासाठी प्रमुख निकष असणे अत्यावश्यक आहे. नितीमत्ता व प्रचलित कायदा ह्यामधील दरी जोपर्यत मिटत नाही, तोपर्यत सार्वजनिक जीवनातील तथाकथित नेते सत्ता सहजासहजी सोडणे अशक्य.
(Whatsapp १५-१-२०२१)

प्रत्येकाच्या कर्तृत्वाला मर्यादा असतात;
जो आपल्या मर्यादा जाणतो,
त्यालाच समाधान मिळण्याची शक्यता अधिक असते.
(Whatsapp १२-२-२०२१)

"उबग आणणारा पोरखेळ!"
"माझा होशील ना!" ह्या मालिकेत दादामामा आजारी पडल्यापासून सुरु झालेला, आदित्य व सई ह्यांचा एकमेकांवरील प्रेमाचा लपंडाव, काही केल्या संपता संपतच नाही. जोडीला डॉ सुयश व मेघना ह्यांच्या अधूनमधून लुडबुडण्याने, प्रेमाचा त्रिकोण की, चौकोनाचा पोरखेळ, किती लांबवत न्यायचा ह्यावर काही धरबंधच उरलेला नाही. अक्षरशः उबग आला ह्या मालिकेचा.
(फेबु-७-१-२०२१)

"चारोळी":
"अग्गबाई, सासूबाई !"
"नक्को ग बाई, नक्को ग बाई",
"पुरे ग बाई, पुरे ग बाई",
"ऐक ग बाई, ऐक ग बाई":
(Whatsapp १३-१-२०२१)
१०
"कसेही, काहीही"!:
बहुतेक मालिकांमध्ये सहसा काहीच घडत नाही, नुसता कसाही टाईम पास केला जातो. मध्येच केव्हातरी जरा झटका देतात इतकेच.
हे असे कसेही, काहीही पाहिले जाते?
Whatsapp ३-१२-२०२०)
११
"अर्थशून्य भासे मजला...!":
मराठी मालिकांमध्ये नेहमी तर्काला किंवा व्यवहारात अशक्य असेल किंवा कोणालाही मनाला पटणार नाही अशाच तर कां दाखवतात, काही कळत नाही.

"अग बाई सासुबाई" मध्ये इतकी वर्ष वैधव्य काढणारी असावरी, आपल्या मुलाचं लग्न झाल्यानंतर म्हातारचळ लागल्यासारखं अभिजीत यांच्या प्रेमात काय पडते आणि त्यानंतर त्यांचे काय काय खेळ चालतात खरोखर न पटणारेच. असंच "माझा होशील कां" मालिका चांगली रंगतदार बनत असताना, आदित्य आणि सई यांचं त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्त आश्रमात गेल्यापासून त्यानंतर जे जे काही घडत जात, ते केवळ मूर्खांचा बाजार असल्यासारखं आहै. त्याचे साहेब लोक त्याला काय बनवतात किंवा वेड्यासारखी सई, त्याने दिलेली भेट कचऱ्यात काय शोधत बसते, काही न पटण्याजोगे.

नावाजलेली "आई कुठे काय करते" ही मालिकेत देखील असंच काहीतरी होतं. आपला नवरा बाहेरख्यालीपणा करतोय, हे कळूनही अगदी कडेलोट होईपर्यंत असावरी, आप्पा व कांचन म्हणजे सासूबाईंना त्याचे काही प्रताप सांगायचं सोडून इतरच काही सांगत बसते हे पटत नाही. तसंच इतक्या हुशार सासूबाईंना देखील संजना आणि अनिरुद्धमध्ये काही अनुचित झालं असेल हे कळत नाही.

प्रेक्षकांना अक्षरशः संताप येईल, अशा तर्‍हेचा तमाशा, दाखवत बसणाऱ्या या मालिकांचा मला इतका उबग आला की, शेवटी मी सोशल मीडियावर एक संदेश प्रदर्शित केला, त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यामुळे टीव्हीवर काहीही दाखवलं जातं त्याची कल्पना येईल.
(Whatsapp २६-१०-२०२०)
१२
"संक्रांती" सारख्या
गोड गोड बोलण्याच्या सणाला "संक्रांत"
म्हणणे हे नवलच,
कारण "संक्रांत" म्हणजे नको असलेली त्रासदायक गोष्ट!
(Whatsapp १३-१-२०२१)
१३
संकटातूनही संधी मिळते असे म्हणतात ते खोटे नाही. कोरोनासारख्या महामारीच्या बिकट परिस्थितीत ऑक्सी मीटर आणि स्टीम इन्हेलर या उपकरणांना सुवर्ण संधी मिळाली. वाईटातून चांगले निघते ते असे.
(फेबु-१८-११-२०२०)
१४
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर
माझा एकहाती
लेखन प्रयत्न असलेला
प्रसिद्ध झाला....
१ 'हृदय संवाद'-५७ प्रुष्ठे
२'आजोबांचा बटवा'-५१ प्रुष्ठे
३ 'रंगांची दुनिया'-५० प्रुष्ठे
आणि
४ 'नियतीचा संकेत'-६८ प्रुष्ठे
असे विभाग.

मानधन फक्त रु.१००/- तेही.......
online अंक मिळाल्यावरच करावयाचे....
शिवाय
"Management Musings Digital issue"
हा अंक विनामूल्य खास दिवाळी भेट......
त्वरा करा...
लगेच प्रतिसादात आपला होकार व whatsapp no द्या.
धन्यवाद
सुधाकर नातू
Mb 982063265
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
(Whatsapp-१५-११-२०२०)
१५
" येणार ते दिन, कधी येणार ?":
सोशल मिडिया नाही, तर किती शांती, सामंजस्य अन् जिव्हाळा !
(Whatsapp ९-१-२०२१)

हा वैचारिक मसाला कसा वाटला?
ही वरात अशीच पुढे पुढे जाणार.....

धन्यवाद
सुधाकर नातू

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

" वाचा, फुला आणि फुलवा-६": "आत्मसमाधानाचे रहस्य":

 "वाचा, फुला आणि फुलवा-६":


हल्ली कॅलेंडरचं अथवा दिनदर्शिकेचं एवढं काही महत्त्व उरलेलं नाही. येऊन जाऊन भिंतीवरती, एक "कालनिर्णय" असलं की झालं ! अशी किती तरी बरीच विविध कॅलेंडर्स आता निघाली आहेत. त्याकडे आपलं फक्त सण, मुहूर्त वा गरजेच्या सुट्ट्या कधी, संकष्टी विषयक माहितीसाठी
आपण फक्त प्रत्येक महिन्याचे पुढचं पान,
बघतो. त्याच्या पाठीमागच्या पानांकडे आपलं सहसा लक्षच जात नाही, असा माझा तरी अनुभव आहे.

मागील लेखात कालनिर्णय २०२० मधील विशेष लेखांचा रसास्वाद मी मांडला होता. आणि आता कालनिर्णय २०२१ ह्या दिनदर्शिकैमधून मला विशेष आवडलेल्या लेखांतून, काय गवसते ते मी ह्या लेखांत मांडण्याचा माझ्या परिने प्रयत्न करत आहे

"कालनिर्णय २०२१":

१ "भल्या माणसासाठी":
श्री ज्ञानेश्वर मुळे

हा लेख हा लेख वाचल्यानंतर त्यामधून मला काय गवसले त्याच प्रमाणे माझ्या मनात कोणती स्पंदने निर्माण झाली यांचा एकत्रित विचार येथे मी केला आहे.

"भला माणूस" खरोखर कसा असतो, ते चित्र "कथा", "रजनीगंधा" व "छोटीसी बात" ह्या चित्रपटांतील सरळमार्गी नायकांच्या रूपाने, रंजकपणे लेखकाने येथे उभे केले आहे.

सर्वसाधारणपणे सरळमार्गी, प्रामाणिक माणसं पुष्कळ वेळेला पापभिरू असतात. आपण बरे आणि आपले काम बरे, अशा तऱ्हेची त्यांची वृत्ती असते. अशी भली माणसे मात्र एकंदर जीवनात, इतरांवर प्रभाव पाडू शकत नाहीत, नेतृत्व दाखवू शकतातच असे नाही. नेतृत्व किंवा अधिकार गाजवायचा असेल, तर त्याकरता वेगळे असे व्यक्तिमत्व लागते. तिथे "ठेविले अनंते तैसेची रहावे" अशा तर्‍हेची प्रवृत्ती असून चालत नाही.

भल्या माणसाचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे किलिंग इन्स्टिगचा अभाव, तोडू या फोडू या वृत्तीचा अभाव. प्रामाणिकपणाचा, शिस्तीचा व सचोटीचा दंश यांना आयुष्यभर पुरतो. पण त्यामुळे अधिकार पद किंवा सरसेनापती पद मिळू शकते असं नाही. त्याकरता वेगळेच गुण असावे लागतात. भला व चांगला माणूस व्यावहारिक
जीवनात यशस्वी होतोच असे नाही.

यासंबंधी एक नामवंत राजनीतिज्ञ इटालियन निकोलो मेकीवँली याने १५५३ चालली लिहिलेल्या त्याच्या पुस्तकात राजा होऊ इच्छिणाऱ्या भल्या लोकांना मार्गदर्शन केले आहे. आपला जसा आर्य चाणक्य त्याचे जसे सामूहिक आणि वैयक्तिक राजकीय आणि इतर तत्त्वज्ञानाचे वेगवेगळे मार्गदर्शक पथदर्शक असे तत्त्वज्ञान, त्याचप्रमाणे मॅकीवँली याचं जे तत्व, त्यासाठी मँकीवँलीयन शब्दप्रयोग वापरला जातो. जे काही नियम किंवा चिंतन त्याने केले त्यातील काही मुद्दे खरोखर विचारात घेण्यासारखे आणि आश्चर्यकारक असे आहेत:

१ इतरांना तुमच्याविषयी भीती आणि प्रेम दोन्ही वाचणार नसेल, तर भीती वाटणे चांगले.
२ राजकारण व राजनीतीचा नैतिकतेशी काही संबंध नाही.
३ आकांक्षा मोठ्या असतील तर तुमच्या समस्या मोठ्या असू शकत नाहीत.
४ ज्याला अधिकार हवा असेल त्याला अधिकार गाजवता आला पाहिजे.
५ राज्यकर्त्यांच्या बुद्धिमत्तेची पहिली कसोटी त्याच्या आजूबाजूच्या सल्लागारांवरून कळते...
इत्यादी, इत्यादी

त्याचे असेच इतर नियम या लेखामध्ये वर्णिलेले आहेत आणि ते म्हणजे खरोखर समूह जीवनाला किंवा एखाद्या शासन व्यवस्थेला व्यवस्थित हाताळायचं असेल तर काय कराव लागतं ते मार्गदर्शन आहे. त्यातील एक शेवटचे त्याचे निरीक्षण डोळ्यात अंजन घालणारेच म्हणावे लागेल: "कोणत्याही राजाला आश्वासनांची पूर्ती न करण्यासाठी किंवा वचनभंग करण्यासाठी कोणत्याही कारणांचा तुटवडा पडत नाही." हे !

सर्वसामान्यांच्या जीवनापेक्षा वेगळ्या प्रकारचे असे जीवन या धोरणी चतुर कावेबाज माणसांचे असते. तशी माणसेच कदाचित समूहावर समाजावर प्रभाव पाडू शकतात आणि अधिकार पद त्यांनाच मिळू शकते. सर्वसामान्यांच्या आवाक्यात पलीकडचे हे सारे आहे. चांगुलपणा हा जणू काही आजकालच्या दिवसात नष्ट होत चालला आहे. एकंदर कलियुगाची जी काही मांडणी आहे, त्या वास्तवतेचे जणू हे वरील चिंतन किंवा नियम दिसते.

या पार्श्वभूमीवर पार्श्‍वभूमीवर वास्तवता इकडे जर बघितले तर असे लक्षात येते की, आदर्श असे जे वाटते, ते प्रत्यक्षात आणणे खरोखर कठीण असते हे नाकारता येणार नाही. मात्र एकंदर सर्वांगीण जनहितासाठी चांगुलपणा आणि उत्तम प्रशासन, तसेच योग्य त्या नीतिमत्तेची आवश्यक आहे यात वाद नाही.

भल्या माणसाचा हा असा ऊहापोह या लेखात केला आहे. भला माणूस बनणे तसे सोपे नाही. शक्यतोवर आपल्यामुळे आपल्या कृत्यांमुळे इतरांना जरी फायदा होत नसला, तरी इतरांना त्रास होऊ नये, एवढे तारतम्य जर सर्व समाजाने माणसांनी पाळले, तर कदाचित आदर्श असे एकंदर आपले स्वप्न प्रत्यक्षात यायला मार्ग दिसू शकेल. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे खूप कठीण आहे एवढेच शेवटी म्हणावयाचे.

२ "शिकवणी कोरोनाची":
दत्तप्रसाद दाभोळकर

कोरोना, या बकासूर वा भस्मासुररुपी संकटाने २०२० ह्या भयानक वर्षात जगावर जे काही संकट आणले, त्याचा उहापोह इतका काही झाला आहे की अजून काही नव्याने सांगण्यासारखे आहे की नाही असे वाटावे. कोरोनाचे जसे दुष्परिणाम झाले त्याचप्रमाणे त्यापासून काही धडे मिळाले आणि जवळजवळ प्रत्येकानेच त्यादृष्टीने आपल्यामध्ये सुधारणा केली हे आपण पाहत आहोतच.

या महत्वपूर्ण लेखा मधलं मला जर काही घ्यावस आणि वेगळं वाटत असेल तर ते म्हणजे लेखकाने तुकोबांच्या एका अभंगाची केलेली आठवण. "तरी बरे" अमूक वाईट नाही घडले" ह्या अर्थाचा तो अभंग आहे. त्याचा मतितार्थ असा की, जे जे काय घडलंय ते जरी वाईट असलं तरी याहून अधिक काहीतरी वाईट घडलं नाही, हे किती चांगलं हा. तो संदेश "तरी बरं", कोरोनामुळे फक्त प्रत्यक्ष आमने-सामने संपर्क आला, तरच काही बाधा होण्याची शक्यता निर्माण होत होती, पण समजा टेलिफोन घेताना, एकमेकांचे आवाज ऐकून, टीव्ही बघताना त्यामधून जर या भस्मासुर रूपी विषाणूचे संक्रमण झाले असते तर...? असा तो प्रश्न.

ह्याचा मतितार्थ, म्हणजे काय घडलं ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं आहे. निदान अजून वाईट काय निर्माण झालं असतं ते तर झालं नाही ना, असा तो विचार. उदाहरण: एखाद्या माणसाची वाचा जाते आणि अचानक त्याला दुःख होते. परंतु तो विचार करू शकतो, ठीक आहे मला बोलता येत नाही, पण मी स्वतंत्र हिंडू फिरू शकतो बघू शकतो, माझे रोजचे आवश्यक व्यवहार कोणावरही अवलंबून न रहाता, करू शकतो, असा तो विचार.

थोडक्यात, जे आहे त्यात समाधान माना हा मुद्दा या तुकोबांच्या अभंगाच्या रूपाने "तरी बरं" या रुपाने या लेखात मांडला आहे आणि तो खरच मनात कायम लक्षात ठेवण्याजोगा आहे.

हा लेख वाचल्यावर योगायोगाने मला
एक एक छानशी व्हिडिओ फिल्म सोशल मीडियावर बघायचा योग आला:

"त्यात एक मांजरी गॅलरीच्या बाजूला टेबलावर बसली आहे आणि तिच्या बाजूला खाली जमिनीवरून एक छोटे मूल गॅलरीच्या कठड्यावर जायचा प्रयत्न करत, दांडीवर हात ठेवून पुढे पुढे वर जाण्याची धोकादायक प्रक्रिया करत आहे. अशा वेळेला त्या मांजरीचे लक्ष कायम त्या छोट्या बाळाकडे, मुलाकडे जाते आणि त्याने गॅलरीच्या लोखंडी दांड्यावर हात ठेवला रे ठेवला, की ती ताबडतोब तो पुढे होऊन त्याला बाजूला करत असे. एवढेच काय तो जास्त धडपड करायला लागल्यावर तर ती मांजर दांडीच्या वरती स्वतः उभं राहून त्या बछड्याने पुन्हा सुरक्षित रहावं, म्हणून त्याचे हात बाजूला करून त्यांना खाली पाठवत असे."

हे द्रुश्य खरंच विचार करण्याजोगे. कशी गंमत आहे, धोका पुढे आहे, त्या धोक्यापासून सावध राहिले पाहिजे, ही उपजत प्रेरणा मुक्या प्राण्यांना देखील असते. एवढेच काय पण निष्पाप अशा त्या मुलाला, जगाची कल्पना नसल्यामुळे तो जी धडपड करतोय ती बघून, या मांजरीला वाटते की त्याला आपण वाचवावे ! हीच तर गंमत आहे. कोरोना सारखे संकट येऊन सुद्धा माणसाच्या याच उपजत प्रवृत्तीमुळे तो या महासंकटावर मात करत मार्ग शोधत राहिला. हा एक प्रकारचा नवाच धडा आपल्याला मिळाला.

३ "पत्ते आणि निसर्ग":

खेळातले पत्ते घेऊन आपण लहान थोर नेहमी टाईमपास किंवा विरंगुळा म्हणून विविध प्रकारचे पत्ते खेळतो. त्यामुळे वेळ तर जातोच, शिवाय एकंदर परस्पर संबंध अधिक दृढ होत जातात. आता हे ५२ पत्ते आणि दोन जोकर या मागे निसर्गाचा काही संबंध आहे, असं निदान मला तरी इतके दिवस माहित नव्हतं. परंतु या 'कालनिर्णय'२१ मध्ये मला एक अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिलेली आढळली. लेखक कोण ते लिहिलेलं नाही. परंतु त्यातून आपल्याला खूप खूप काही नवं असं समजतं हे खरं.

आता निसर्ग आणि पत्ते यांचा काय संबंध आहे ते बघा. साधारण प्रत्येकी तीन रंगीत पत्ते राजा राणी गुलाम, बदाम इस्पत सिल्वर किंवा चौकट अशा प्रकारात असतात व ते १२ आणि दुर्री ते दश्शी असे ४० मिळून, एकूण ५२ पत्त्यांचा संच तयार होतो. बदाम आणि चौकट या चिन्हांचा रंग लाल तर इस्पिक व किलवर यांचा काळा असतो. शिवाय संपूर्ण संचात दोन जोकर असतात.

हे 52 पत्ते म्हणजे निसर्गाशी काय समतोल साधतात, ते बघा किती गमतीशीर आहे. हे 52 पत्ते म्हणजे वर्षभरातील 52 आठवडे, तर चार प्रकारचे पत्ते म्हणजे चार ऋतू जसे शिशिर, उन्हाळा, वर्षा किंवा पावसाळ आणि शरद. प्रत्येक ऋतूचे 13 आठवडे म्हणजे प्रत्येक प्यकारातले १३ पत्ते. या सर्व पत्त्यांचे बेरीज केली तर भरते ३६४ यात एका जोकर धरला तर ३६५ अर्थात ते एक वर्ष होते. यात दुसरा जोकर मिळावला तर होतात ३६६. म्हणजे लीप वर्षाचे ३६६ दिवस ! एकूण ५२ पत्त्यांमधले १२ चित्रपत्ते म्हणजे बारा महिने. लाल आणि काळ्या रंगांचे संच, म्हणजे दिवस आणि रात्रीचे प्रतिनिधित्व करणारे रंग ! कमाल की बात आहे, नाही कां?

ज्या कोणी अनामिक माणसाने ही खेळांतील पत्त्यांची अजरामर संकल्पना मांडून प्रत्यक्षात आणली, त्यांना लाख लाख प्रणाम !

पुढे जाऊन अजून एक नवल वाटावी अशी माहिती येथे आहे. ती म्हणजे श्री शंकर महाराज यांना देखील पत्याची आवड होती. त्यांनी पत्त्यांचे जे विश्लेषण केले किंवा अर्थ सांगितला तो अक्षरश: सार्या भवतालाचि वेध घेणे होय:

"दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश, तिर्री म्हणजे ब्रम्हा विष्णू व महेश, चौवी अर्थात चार वेद अथर्ववेद सामवेद ऋग्वेद यजुर्वेद. पंजी म्हणजे पंचप्राण प्राण अपान व्यान उदान समान छक्की म्हणजे अर्थात षड्रिपू काम क्रोध मद मोह मत्सर लोभ. सत्ती, सात सागर, अठ्ठी, आठ सिद्धी. नव्वी, नवग्रह. दश्शी दहा इंद्रिये, तर गुलाम म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या वासना इच्छा. तर राणी म्हणजे माया, तर राजा सर्वांचा शासक, आणि hold your breath, सगळ्यात कडी म्हणजे एक्का अर्थात मनुष्याचा विवेक, माणसाची सारासार बुद्धी या सर्व खेळाला स्वाधीन ठेवणारा एक्का. तर समोरचा भिडू म्हणजे प्रारब्ध, त्याच्या हातातले पत्ते आपल्याला माहित नसतात, पण त्याच्या मदतीने आपण डाव जिंकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच जीवन जगतो. खरंच पत्त्यांचा डाव इतक्या वेळा खेळलो, पण त्यामागे हे असे जीवन म्हणजे काय निसर्ग म्हणजे काय ते उमजले.

ज्या कोणी हे खेळातले पत्ते निर्माण केला, त्याचे अभिनंदन व आभार कितीही वेळा केले तरी ते कमीच पडेल. त्या अनामिकाला लाख लाख प्रणाम. तीच क्रुतज्ञता कालनिर्णय सारखे जगातील सर्वाधिक खपाचे नियतकालिक निर्मिणार्यांसाठी.

ह्या वैचारीक अम्रुतमंथनामुळे अखेरीस मला उमजलेले......

"आत्मसमाधानाचे रहस्य":
जे आपल्याला आवडते, जे आपण चांगले करू शकतो, ते करायला मिळणे हे भाग्यच. अशा भाग्यामुळे, जे आत्मसमाधान लाभते ते अद्भुतरम्यच!

"पसंद अपनी अपनी" प्रमाणे ज्याने त्याने वरीलप्रमाणे आत्मपरीक्षण करून
आपआपला मार्ग निवडावा, म्हणजे श्रेयस व प्रेयस एका समयीच लाभते."

धन्यवाद
सुधाकर नातू

ता. क.

माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडून........
असेच वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........

https://moonsungrandson.blogspot.com

हा लेख पसंतीस आला तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....
I have you tube channel:
moonsun grandson 
With over 50 interesting videos uploaded so far........
To see them......... 
pl. this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

"वाचा, फुला आणि फुलवा-५": "भला जन्म हा तुला लाभला":

 "वाचा, फुला आणि फुलवा-५":


हल्ली कॅलेंडरचं अथवा दिनदर्शिकेचं एवढं काही महत्त्व उरलेलं नाही. येऊन जाऊन भिंतीवरती, एक "कालनिर्णय" असलं की झालं ! अशी किती तरी बरीच विविध कॅलेंडर्स आता निघाली आहेत. त्याकडे आपलं फक्त सण, मुहूर्त वा गरजेच्या सुट्ट्या कधी, संकष्टी विषयक माहितीसाठी
आपण फक्त प्रत्येक महिन्याचे पुढचं पान,
बघतो. त्याच्या पाठीमागच्या पानांकडे आपलं सहसा लक्षच जात नाही, असा माझा तरी अनुभव आहे.

म्हणून वर्षअखेरीस भिंतीवरुन कालनिर्णय दिनदर्शिका काढताना आणि नवीन वर्षाची दिनदर्शिका भिंतीवर लावण्यासाठी हातात घेताना, मला वाटलं बघूया तरी पाठीमागे काय काय आहे ते. आणि अहो आश्चर्यम् ! काय नव्हतं तिथे ? किती तरी विविध प्रकारची माहिती तर होतीच, शिवाय दिनमानाचे पंचांगासारखे नक्षत्र सूर्योदय इ.इ. अतिशय उपयुक्त माहिती देणारा मजकूर तिथे होता. ह्या व्यतिरिक्त, आपल्या ज्ञानात भर पाडणारे, आपल्या जाणिवांचा विस्तार करणारे, नवी दिशा जीवनाकडे बघण्यासाठी देणारे असे पुष्कळ पुष्कळ साहित्य लेखांच्या रूपात तिथे मला आढळून आले.

त्यामुळे मला खरोखर आनंद झाला. बाकी काही न करता ही पाठीमागची पाने मी मन लावून वाचली. त्या सर्व वाचनातून मला मिळालेला मोलाचा ऐवज, मी येथे तुमच्यासमोर उलगडणार आहे. मला खात्री आहे की तुम्हालाही तो आवडेल व उपयोगी पडेल. त्याचप्रमाणे तुमच्याकडे अशा तर्हेचे जे काही कॅलेंडर-दिनदर्शिका असेल तर त्याच्याही मागची पाने वाचा आणि बघा काय काय मिळते ते.

२०२० आणि २०२१ ह्या दोन वर्षांच्या 'कालनिर्णय' दिनदर्शिकांमधून मला विशेष आवडलेल्या लेखांतून, काय गवसते ते मी ह्या लेखांत मांडण्याचा माझ्या परिने प्रयत्न करत आहे:

# झेन हा जपानी अध्यात्माचा प्रकार,
# मँस्लोचा मानवी प्रेरणा काय असते आणि जीवनाकडे माणूस कसा बघतो यासंबंधीचा एक महत्त्वपूर्ण लेख,
# याशिवाय सुख म्हणजे काय असतं याबद्दलचे अतिशय उपयुक्त असे विवेचन,
# भीतीचा आपल्या जीवनमानाशी कसा संबंध
# वेळ आणि वेळेचे महत्व यासंबंधी अतिशय डोळ्यात अंजन घालणारा असा एक लेख,
इ.इ.इ.
असे कितीतरी चांगले साहित्य वाचून मी आनंदित झालो.
त्यामधून येथे मी प्रथम सादर करतोय.....
"कालनिर्णय'२० मधील विशेष लेख-रसास्वाद":

१ "झेन आनंदाचा एक झरा"
लेखकः डॉ उल्हास कोल्हटकर
झेन हा जपानी अध्यात्माचा प्रकार काय असतो, त्याचे उदाहरणांसह सुलभ समजण्याजोग्या भाषेत उलगडा ह्या वाचनीय लेखांत केला आहे. मानसिक शांतीसाठी, मन रिकामे करुन एकाग्र चित्त करून रहाणे, हा झेनचा हेतू आहे. ते समजण्यासाठी दोन द्रुष्टांतवजा गोष्टी इथे चपखल मांडल्या आहेत.

गुरुकडे झेनची माहिती करून घ्यायला आलेल्या शिष्याला कप भरुन चहा देताना, गुरू चहा ओततच रहातो. सहाजिकच शिष्य त्यांना सांगतो की चहा ओतायचे थांबविले नाही, तर त्याला चहाच पिता येणार नाही. तेव्हा गुरू उलगडा करताना सांगतो की झेन समजण्यासाठी ही युक्ती होती. चहा ओतणे थांबविल्याविना जसा चहा पिता येणार नाही, तसेच मन जोपर्यंत रिकामे करत नाही, तोपर्यंत झेन उमजणार नाही. मनाच्या
चहाचा कप रिकामा करा !

हीच संकल्पना डोक्यावरचे ओझे घेऊन पुढे पुढे चालत जाणार्या गुरूच्या मागे मागे झेन म्हणजे काय ते समजून घ्यायला आलेल्या शिष्याची गोष्ट: डोक्यावरचे ओझे अर्थात् मनांतले विचारांचे काहूर नाहीसे केल्याशिवाय झेन शिकवता येणार नाही, असा द्रुष्टांत मनात घर करतो.
सारांश प्रथम मन पूर्ण रिकामं करा,
निर्विकार निर्विचार शांत रहा, ध्यान करा.

हे लिहीत असताना योगायोगाने, whatsapp वर हा संदेश माझ्या नजरेत आला:

"मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला 'निवृत्ती', निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा 'ज्ञानदेव', ज्ञान प्राप्त झाले की जीवन मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा 'सोपान", ज्ञान सोप्या मार्गाने गेलो की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी 'मुक्ताई', निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई ही चार नावे म्हणजेच मानवी मनाच्या चार अवस्था.
(नुकतीच ज्ञानेश्वरी ला सातशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली.)

झेन संकल्पनेला पूरक असेच विचार हा संदेश सांगतो.

२ "आनंदाचे डोही आनंदतरंग"
जयराज साळगांवकर
या लेखामध्ये मानवी जीवनातील अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाच्या गोष्टीचा विचार केला आहे. माणूस नेहमी आनंद, समाधान आणि शांती मिळवण्याकरता धडपडत असतो. यामागे त्याच्या मनात निर्माण होणाऱ्या गरजा, या मूळ असतात. त्या गरजा पुरवल्या गेल्या की, त्याला समाधान मिळू शकते, आनंद मिळतो. परंतु बऱ्याच वेळेला आपण आपल्याकडे काय काय नाही, याचाच विचार करतो आणि स्पर्धेमध्ये वाहवत जाऊन, दुसऱ्याकडे जे आहे ते माझ्याकडे आलंच पाहिजे या ईर्षेने धावत राहतो, धडपडत राहतो, संघर्ष करत राहतो, त्यामुळे आनंद मिळणे दूरच, परंतु जीवनामध्ये ताण तणाव व दुःखच वाढत जाते.

जे आपल्यापाशी आहे ते समाधान कारक आहे, असे एकदा मानले तर तुम्हाला आनंद मिळू शकतो. परंतु ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही. विशेषतः एलपीजी: लिबरायझेशन, प्रायव्हेटायजेशन आणि ग्लोबलायझेशन झाल्यापासून तर, जो तो पैशाच्या मागे धावत चाललाय. पण पैसा हा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सुख देऊ शकतो, पण पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. कारण जर जास्त पैसा तर चिंता वाढतात, हे उघड आहे. त्यामुळे "ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असावे समाधान !" ही आपली पूर्वीची प्रवृत्ती होती, ती आठवते, तिलादेखील काहीतरी महत्व आहे, अर्थ आहे, हे जाणवते.

नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजेत.
त्याचप्रमाणे आपण कशापासून आनंद मिळवू शकतो, आपल्याला काय केल्यामुळे आनंद होतो, उत्साह वाढतो, त्याचा शोध घेतला पाहिजे. (अर्थात इथे वाईट व्यसने अर्थात अभिप्रेत नाहीत.) कुणाला लेखन, कोणाला गायला, कुणाला फिरायला, कुणाला खेळायला इ.इ. अशा तऱ्हेने आवडी असतात. आपली आवड शोधा, आपल्याला जे आवडतं ते, आपल्याला जे करून आनंद मिळतो ते, शक्यतोवर करायचं साधा. त्याचप्रमाणे परस्पर संबंध चांगले राहतील यासाठी धडपड करा तरच तुम्हाला आनंद मिळू शकेल.
समाधान मिळू शकेल.

"तुझे आहे तुजपाशी" त्याचप्रमाणे सुख समाधान शांती तुमच्यापाशीच आहे. मात्र त्यासाठी अतिरेक न करता Accept & Adopt असा जर तोल सांभाळलात, तर आणि आपल्या तब्येतीची काळजी घेतली, मनाने उगाचच चिंता केली नाही, तर, तुकोबा म्हणतात तसे
"आनंदाचे डोही आनंद तरंग"
"आनंदची अंग आनंदाचे !" या स्थितीला पोहोचता येईल, अशा तऱ्हेचा एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा हा जो काही लेखकाने उलगडा केला आहे, तो खरोखरच प्रत्येकाने विचारात घेण्यासारखा आहे, अंगिकारायला आवश्यक आहे.

३ "वेळ त्यांना कळली हो !"
संजीव लाटकर

हा वेळेचे महत्व विशद करणारा, तसेच योग्य वेळ कोणती ते उलगडणारा लेख वाचल्यावर, मला सोमिवर मीच प्रदर्शित केलेल्या ह्या संदेशाची आठवण झाली:

"One has to face either of these " Qs every day: How to spend The TIME? or How to spare the TIME?
Which one you can answer?"

कोण कशी वेळ वापरतो की, वेळ मारुन नेतो, ते ह्या संदेशावरून समजून घेता येईल.

वेळ ही एकच गोष्ट अशी आहे की, जी गरीब-श्रीमंत लहान-थोर सगळ्या सगळ्या लोकांना समान असते. ती धरून ठेवता येत नाही किंवा मिळवता येत नाही. ती नेहमीच अव्याहत पुढे पुढे जात असते. अशा वेळेला, वेळेचे महत्त्व जे जाणतात आणि उपलब्ध वेळेचा बरोबर विनियोग करतात, तेच आयुष्यात काहीतरी सकस, भूषणावह योगदान देऊन यश मिळवू शकतात, अशा तऱ्हेचा घोषवारा, आपल्याला हा लेख वाचून समजू शकतो.

आपण नेहमी आजची करायची गोष्ट, उद्या तर उद्याची परवा, अशीच चालढकल करत असतो. कां? तर आपल्याला वाटतं, ही वेळ योग्य नव्हे आणि योग्य वेळेची आपण नाहक प्रतीक्षा करत बसतो. ही चूक कधीही करू नये, जी वेळ तुमच्या हातात आत्ता आहे, तीच आणि तीच वेळ योग्य आहे, असे समजून कामाला लागा, हाच या लेखातून मला मिळालेला संदेश किंवा मार्गदर्शन.

"जिथली गोष्ट, जिथल्या तिथे; जेव्हाचे ते तेव्हा आणि ज्याचे त्याला" या वि. आ. बुवांनी दिलेल्या चौदा अक्षरी गुरुमंत्राची देखील मला आठवण हा लेख वाचल्यावर झाली.

जे जे करू ते प्रत्येक उत्तम तऱ्हेने आणि जसे हवे तसेच करू, असा जर आपण मनाशी द्रुढ निश्चय केला, तर प्रत्येक गोष्ट योग्य त-हेने होऊन तुम्हाला जे इप्सित आहे, जे अपेक्षित आहे, ते मिळू शकेल. त्यामुळे आपण किती वेळ वापरतो आणि त्यातून निष्क्रिय वेळ किती वाया घालवतो याचा आपण नेहमी लेखजोखा घ्यायला हवा.

सकस निर्मिती जर हवी असेल, तर वेळ चांगल्या तऱ्हेने वापरावी आणि वेळ ही क्षणभंगूर आहे हे ह्या म्हणण्याला चोख उत्तर द्यावे, तसेच ह्या लेखामध्ये प्रतिपादित केले गेले आहे. इतिहासात कीर्तिरूपे आपल्यात जे लोक आज उरतात, असे अनेक थोर, मान्यवर व संस्मरणीय कां झाले, तर त्यांना वेळेचे अंतरंग कळले होते. म्हणूनच अखेरीस असेच म्हणता येईल की "वेळ त्यांना कळली हो ! जसं आपण "जीवन त्यांना कळले हो" असं म्हणतो ना अगदी तसं.

थोडक्यात, कोणतीही वेळ, ही अवेळ नसते तर समोर येणारी प्रत्येक वेळ ही योग्य समजून कामाला लागा.

४ "जो डर गया सो...."
विठ्ठल नाडकर्णी

या लेखामध्ये भीती या भावनेचा ऊहापोह केला आहे. भीती ही मूलभूत अशी व प्रत्येकात निर्माण होणारी भावना आहे. लहानपणी 'बागुलबुवा'ची भीती दाखवतात, जरा मोठे मुलं मोठी झाली की, त्यांना भूताची भीती वाटते, याप्रमाणे कुणाला कशाची भीती वाटेल, हे काही सांगता येत नाही. कुणाला पाण्याची भीती वाटते, तर कुणाला प्रवासाची भीती वाटते, विमानात बसायची भीती वाटते, याप्रमाणे भीती ही भावना तुम्हाला जन्मापासून कायम साथ करते. भीती ही सापाची देखील सर्वांनाच वाटते आणि त्यामागे कारण उत्क्रांती असू शकतो असं येथे मांडला आहे कारण पिढ्यानपिढ्या संक्रमण होत असताना भीती या भावनेचे देखील तसंच संक्रमण होत गेले असेल.

दुसरे असे की, भीती वाईट नाही, कारण जे जीव अंधाराला घाबरत नसत, ती प्रजाती नष्ट झाली. त्या उलट जे अंधाराला घाबरून कुठेतरी लपत, त्यांचा जीव वाचून ती प्रजाती उत्क्रांतीमध्ये सामील होऊन प्रगतीची पुढची पायरी
गाठत गेले, असंही येथे मांडलेले आहे. भीतीमुळे जरी काही वाईट गोष्टी होत असल्या, तरी भीतीचाही फायदा होतो, अभ्यास करायची जी काही प्रेरणा आहे ती परीक्षेमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळाले नाही तर काय होईल, या भीतीपोटी मुलं अभ्यास करू लागतात.

सहाजिकच भीती ही कोणाला चुकलेली नाही. या लेखाचं शीर्षक आहे ते मात्र थोडं त्या उत्क्रांती विषयी विचाराला छेद देणारं आहे कारण शीर्षक आहे:
"जो डर गया सो... तिथे पुढे, सो मर गया" हे आपल्याला अभिप्रेत असते, परंतु त्या उलट जे घाबरले ते वाचले, हे आपण उत्क्रांतीच्या बदलांमधून बघितलं. म्हणून "जो डर गया, सो बच गया" असं शीर्षक हवं !

थोडक्यात एक नवीन दिशा, भीती या विषयाला ह्या लेखाने दिली आणि भीतीशिवाय सुटका नाही कोणाचीच, हा मुद्दा आपल्याला समजून आला.

५ मँस्लोचा सिद्धांत आणि मानवी प्रेरणा
अविनाश धर्माधिकारी
माणसाच्या गरजा या मूलभूत असतात आणि मानवी जीवन हे कायम त्या गरजा पुरवल्या जाण्याची धडपड करत असते. आपण जन्म घेतल्यापासून ह्या गरजांचा जो आविष्कार वेगवेगळ्या रूपात, आपल्या प्रत्येक माणसाच्या जीवनात होत जातो, त्यासंबंधी मँस्लो या मानववंश शास्त्रज्ञाने मानवी प्रेरणा कशा निर्माण होतात, त्यामागे गरजांचा काय हात असतो, त्यासंबंधी आपले विचार मांडले ते खरोखर अत्यंत मूलभूत आणि पटण्याजोगे आहेत.

एखाद्या पिरँमिड सारखी रचना, ज्यामध्ये मूलभूत गरजा या तळाला, त्या मूलभूत गरजा म्हणजे आपल्या शारीरिक, भौतिक, गरजा आणि त्याच प्रमाणे सुरक्षितता ह्या दोन गरजा पिरॅमिडच्या तळाला प्रत्येकाला अनुभवायला येतात. या गरजा भागल्यानंतर माणसाची भूक वाढते, आपल्यावर कोणीतरी प्रेम करावे, आपुलकीची नाती असावीत अशा तऱ्हेने समाजामध्ये राहण्याची त्याची प्रेरणा ही तिसरी गरज निर्माण होते.

ते झाले की, माणूस अधिक प्रगती करत आपल्या स्वतःचा शोध घेत, आपण इतरांसाठी काय योगदान करू शकतो, आपला आत्मगौरव कसा होईल, लोकांना आपलं कौतुक कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न करत राहतो. त्या प्रेरणेने मधून ज्याला आपण आपण मोटिवेशन असे म्हणतो, ज्यामुळे माणसं नवीन नवीन काही ना काही तरी वेगळं करू पाहतात आणि ती समाजापुढे आणतात. कलाकार किंवा लेखक किंवा गायक-वादक खेळाडू त्यांच्या आगळ्यावेगळ्या कौशल्याने आत्मगौरव मिळवतात. सेलिब्रिटी हे त्यातूनच निर्माण होतात. तर ही मनुष्याची चौथी गरज.

ही आत्मगौरवाची भूक भागूनही काही जणांना एवढं सगळं जरी झालं, तरी ते पुरत नाही. यापुढे माणू, शेवटी मी कोण आहे, जीवनाचे गूढ काय, हे जग काय आहे आणि ब्रह्मतत्व काय आहे, या दृष्टीने शोध घ्यायला लागतो. आणि त्या ध्यान मेडिटेशन किंवा समाधी लावून म्हणा याप्रमाणे प्रयत्न करतो आणि अंतिम सत्याचा शोध व बोध घेऊ लागतो. ज्याला आपण आत्माविष्कार किंवा एकंदर जगतातील ब्रह्मांडाचा शोध घेत, त्याच्याशी तादात्म्य पावण्याची त्याची जी उर्मी, ती सर्वोच्च पाचवी, शेवटची गरज. अशा तऱ्हेने मँस्लोने पाच वेगवेगळ्या अशा रूपामध्ये मानवी गरजांचे छान विश्लेषण केले आहे.

खरोखर आपल्या पूर्वजांचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! कारण या पार्श्वभूमीवर आपल्या पूर्वजांची आपल्याला जी देणगी आहे, ती खरोखर कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. त्यांनी देखील मानवी जीवनातील प्रेरणांमागे, पंचकोश ही संकल्पना मांडली. ती मँस्लोच्या तळातून वर जाणाऱ्या गरजांच्या सिद्धांताशी, कुठे तरी जुळताना दिसते.

आपले पंचकोश आहेत: अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय.
पंचकोशाची संकल्पना खरोखर पूर्वसूरींची कमाल आहे, यात शंकाच नाही आणि त्याच प्रमाणे ती अधिक व्यापक आहे असे म्हणता येईल. याशिवाय या लेखांमध्ये एक अजून महत्त्वाचा सिद्धांत मांडला आहे, युंग ह्या शास्त्रज्ञाचा. त्याने मांडले: "सामूहिक कर्म, सामूहिक जाणीव आणि सामुहिक कर्माचे फळ त्या त्या समाजाला भोगावे लागते." आपणही मानतो की, आपल्या कर्माची फळे जशी असतात, ती भोगावी लागून, त्याप्रमाणे आपल्या जीवनातील रचना होऊन जाते.

पुनर्जन्माची कल्पना ही या अशा पूर्व जन्मातील ज्या काही कर्मांच्या फळांची पूर्तता झाली नाही किंवा त्याची फळे मिळाली नाहीत, ते प्रारब्ध घेऊन माणूस पुनश्च जन्माला येतो. ही संकल्पना, या लेखामध्ये आपल्याला आपल्या जीवनासंबंधी मूलभूत विचार करायला लावते. आपण आपल्या एकंदर जीवनमानाकडे बघितले की, त्याची सत्यता सूचित होते. मूलभूत गरजा सर्वसाधारणपणे सर्वसामान्य माणसाला आपोआप मिळाल्यासारख्या दिसतात, पण कित्येक जणांना ह्या साध्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी धडपड करावी लागते, हेही खरे.

मानवी जीवध व प्रेरणा ह्यासंबंधी एक नवी प्रगल्भ दृष्टी आपल्याला श्री अविनाश धर्माधिकारी यांच्या या लेखामुळे मिळते.

म्हणून मला सांगावेसे वाटते:
" बा मानवा, 'भला जन्म हा तुला लाभला', साहजिकच त्याचे चीज करण्यासाठी, जे जे काही घेण्यासारखे आणि देण्यासारखे आहे ते ते बघण्याची, वेचण्याची दृष्टी ठेव आणि मुक्तहस्ताने इतरांच्या हितासाठी ते वाटत राहा हाच संदेश."

ह्या पुढचा लेख कालनिर्णय'२१ मधील विशेष लेखांचा रसास्वाद.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता. क.
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडून........
असेच वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........

https://moonsungrandson.blogspot.com

हा लेख पसंतीस आला तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....
I have you tube channel:
moonsun grandson
With over 50 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

"टेलिरंजन-८": "अब, जमाना बदल रहा है!':

 "टेलिरंजन-८": "अब, जमाना बदल रहा है!':

मालिकांसंदर्भात जुन्या आठवणींना उजाळा म्हणून माझा चार वर्षांपूर्वी लिहीलेला लेख येथे पुन्हा येथे प्रदर्शित करत आहे. खलनायकांपेक्षा आजही मराठी मालिकांमध्ये खलनायिकांचेच अधिक प्राबल्य दिसते आहे.

मराठी मालिकांमधील एक से बढकर एक खडूस खलनायिका: :

आतापर्यंत मुळूमुळू रडणार्या, आंतल्या आंत कुढणार्या आणि निमूटपणे, त्यांच्यावर होणार्या अन्यायाचे घांव सहन करत जगणार्या, सती सावित्री रूपातल्या नायिकाच मराठी मालिकांमध्ये पहायला मिळत असत. त्यांच्या पीडा जितक्या जास्त, जेवढे त्यांचे अश्रु अधिक तेवढा टीआरपी वाढणारच असे सारे गणित होते.

# बिनधास्त मोनिका:
पण आता जमाना बदलला आहे नायकाशी विवाह होऊनही मालिकेतली बायको नायिका नसून एक पोहोचलेली खलनायिकाच आहे, हे 'खुकखु' मालिकेतील मोनिकाने आपल्या बेछूट बिनधास्त वागण्याने दाखवून देत आहे. ती विवाहापूर्वीच गर्भवती असूनही बावळट, नेभळट नायकाच्याच नव्हे, तर सर्वच कुटूंबियांपासून हे पाप लपविण्यात ती यशस्वी झाली आहे. इतकेच पुरे नाही म्हणून ती मुलीला जन्म दिल्यानंतरही आपल्या खलनायिकी व्रुत्तीचा कडेलोट बिनदिक्कतपणे करते आहे, तेही नायकाने घटस्फोटाचा बागुलबुवा उभा केला असताना! माहेरची तर राहोतच पण सासरच्याही सर्व 'शहाण्या' (?) मंडळींनी जणु बुद्धि सारासार विचार गहाण टाकला आहे! डाँक्टर असलेल्या ह्या नायकाला साधी DNA टेस्टही, मामला रफादफा करण्यासाठी आठवत नाहीये, म्हणजे दर्शकांना ग्रुहित धरण्याची शर्थ झाली.

करणार काय, अब जमाना बदल रहा है, सोशिक पापभिरू नायिकांची जागा त्याहूनही अधिक 'ताकदी' (?)ने मालिकांमध्ये नायकांनी घेतली आहे. इथला विक्रांत त्याबाबतीतले किती विक्रम प्रस्थापित करतो, तेवढेच पहाणे आपल्या हाती आहे!!

# 'विभा': हेरा फेरी करून वडिलांना रस्त्यावर आणते!
'अस्सं सासर सुरेख बाई', मधली थोरली बहिण 'विभा' प्रथम आपल्या धाकट्या बहिणीच्या जुईलीच्या संसारांत जेव्हढी म्हणून विघ्ने आणता येतील, तेवढी पुरेशी नाहीत म्हणून चक्क सगळी मालकी, हेरा फेरी करून आपल्या वडिलांना व दुसर्या विवाहीत बहिणीला घराबाहेर काढून, जवळ जवळ रस्त्यावर आणते! 'टीआरपी'साठी खलनायिकेला हे असे दुष्ट उद्योग केवळ मालिकाच करू जाणे!

# धाकटी वहिनीच खलनायिका!
'तुझ्यात जीव रंगला' मध्ये धाकटी वहिनीच आपल्या हाती घरातील सारा कारभार व सत्ता रहावी, म्हणून भोळ्या सरळमार्गी पेहलवान असलेल्या थोरल्या दीराचे राणाचा विवाहच होऊ नये म्हणून अंजली व राणाच्या मैत्रीत काय काय विघ्ने आणते, ते पाहून प्रेक्षकांच्या कपाळावर आठ्ठया आणत रहाते. त्यासाठी आपल्या सासर्यांच्या डोळ्यांत धूळ तर फेकतेच, पण आपल्या नवर्याला मुठींत ठेवत, त्याचा ही खलनायिका बिनदिक्कत खेळण्यासारखा उपयोग करताना दिसते.

# तीन तीन खलनायिका!
काहे दिया परदेस मधील आपल्या मुलाचे-शिवचा विवाह मुंबईवाली गौरीशी होऊ नये म्हणून तिच्याच नणंदेला-निशाला हाताशी धरणार्या अम्मा-जौनपूरवाली कोणत्या कोणत्या युक्त्या करतात! निशा, त्याना साथ देता देता, आपल्याला व नवर्याला आँस्ट्रेलीयाला न जाऊ देणार्या सासर्याना-सावंतांना कशी छळत रहाते, तेही पुरे नाही म्हणून गौरीचा विवाह जुळविण्याच्या बहाण्याने ही सून आपल्या महा बिलंदर आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे रहाते घरच बेमालूमपणे ही खलनायकी निशा विकते! ह्या तीन तीन खलनायिका असल्यावर मालिकेची गाडी फाँर्मांत येणार नाही तर दुसरे काय होणार. आता सारेच डाव उलटल्यावर ही नाठाळ सून साळसूदपणाचा आव आणत सगळ्या कुटूंबियांची सहानुभूती मिळवत आहे खरी, पण जर गौरीच्या बनारस मधील सासरचे दिल अभी भरा नही स्टाईल बाबूजी व अम्मांचा उगाचच लांबत जाणारा दुरावा जर कंटाळवाणा होऊ लागला, तर ही भोळी भाबडी (?) निशा परत बदलेकी आग लावायला समर्थ आहेच!!

# ‘शयाना’: राधिकेच्या सुखी संसारावर निखारे:
'माझ्या नवर्याची बायको' मधील शयाना, नायक गुरूनाथला केवळ स्वार्थापोटी, मोहांत पाडून त्याच्या व राधिकेच्या सुखी संसारावर निखारे टाकते. एवढेच नव्हे, तर ती गुरूनाथला राधिकेला चक्क घराबाहेर काढायला लावते आणि बिनदिक्कत त्याच्याबरोबर त्याच्या घरांत राहू लागते. तारुण्य आणि सौंदर्य ह्या जोरावर ही खलनायिका आपला कार्यभाग साधत रहाते. तिला ह्या ना त्या प्रकारे मदत करणारी शेजारच्या नानाजींची सून व शयाना बरोबर मैत्री साधणारी तिची मैत्रिण ह्या दोघीही मिनी खलनायिकाच आहेत.

# सावत्र आई; खलनायिकाच.
सरस्वती मालिकेतही मोठ्या मालकीणबाई देखिल आपले अधिराज्य सरस्वतीच्या आगमनामुळे जाणार म्हणून तिच्या संसारात बिब्बे घालण्याचे नाना प्रयत्न करतच असते. शिवाय ती, मोठ्या मालकांच्या पित्याशी मतलब ठेवून विवाह केल्यानंतर, आपल्या भावाच्या मदतीने स्वत:च्या पतीचा कपटीपणाने अंत घडवून आणते, हे रहस्यच लपवण्याचे डाव खेळते. अर्थांत अखेर तिचा हा खलनायिकी मुखवटा सरस्वती केव्हा ना केव्हां उघडकीस आणेलच! सावत्र आईच्या रूपांतील ही खलनायिकाच.

# खलनायिकेच्या ट्रेंडचा पाया:
मराठी मालिकांमध्ये नायिका खलनायिकेच्या रूपात आपले दुष्ट कारनामे करण्याच्या अशा ट्रेंडचा पाया बहुदा विलक्षण गाजलेल्या व लांबलेल्या 'चार दिवस सासूचे...' मालिकेतील मोठी सूनबाई सुप्रियाने घातला. नवर्यालाच घरगडी बनविणार्या ह्या खलनायिकेने आपली एका मागोमाग एक क्रुष्णक्रुत्ये चालूच ठेवली होती. हाच अंधारमार्ग असावा अपुला स्वप्नांचा बंगला मधील नायिका कम खलनायिका अंकीताने लाज वाटतील असे अनेक उपद्व्याप करुन सजवला (?) होता!

दूरदर्शन सारख्या माध्यमातून खलप्रव्रुत्तीना हे असे महत्व व प्राधान्य मिळावे आणि नायक, नायिकांपेक्षा खलनायिकांच्या खांद्यांवर मालिकांचे यशापयश ठरावे, हीच दुर्दैवाने आजची वस्तुस्थिती आहे!

थोडक्यांत काय, अब जमाना बदल रहा है!........

धन्यवाद
सुधाकर नातू

ता. क.
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडून........
असेच वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........

https://moonsungrandson.blogspot.com

हा लेख पसंतीस आला तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....
I have you tube channel:
moonsun grandson
With over 50 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

रविवार, ७ फेब्रुवारी, २०२१

"वाचा, फुला आणि फुलवा-४":


"वाचा, फुला आणि फुलवा-४":
सोशल मीडियावर दररोज आपल्याला खूप खूप काही मिळू शकतं, फक्त त्याकरता दृष्टी हवी, विचारांची दिशा हवी आणि मोकळे मन हवे, तरच तुमच्याही असं काही ना काही पदरात पडू शकेल, हेच मला या लेखातून सांगायचे आहे......

सोशल मिडीयावरील वाचलेली ही एक पोस्ट, खरोखरच विचार करायला आणि अंगिकारायला लावणारी आहे:

"एकदा मी चालत घरी येत होतो.
रस्त्यात एका विजेच्या खांबावर एक कागद लावला होता. जवळ जाऊन बघितलं तर
त्यावर लिहिलं होतं,"ह्या रस्त्यावर काल माझी एक
पन्नास रुपयाची नोट हरवली होती. मला डोळ्यानं नीट्स दिसत नाहीये. ज्याला कोणाला पन्नास
रुपयाची नोट मिळाली असेल त्याने ती कृपया खालील पत्त्यावर आणून द्यावी.”
हे वाचल्यावर का कुणास ठाऊक त्या पत्त्यावर
जाण्याची इच्छा झाली. मी त्या पत्त्यावर गेलो, घरात कोणी आहे का, म्हणून विचारल्यावर एक म्हातारी काठीचा आधार घेत बाहेर आली.
घरात ती एकटीच राहत होती.

तिला डोळ्यानं नीट दिसत देखील नव्हतं. मी तिला म्हटलं,"आज्जी, तुमची हरवलेली ५०
रुपयाची नोट मला मिळाली, ती मी द्यायला आलो आहे." हे ऐकून ती म्हातारी रडू लागली.
म्हणाली,"बाळा,अजूनपर्यंत जवळजवळ ५०-६० लोक मला ५० रुपयाची नोट देऊन गेलेत.
मी अशिक्षित आहे. मला नीट दिसत देखील
नाही. माझी ही अशी अवस्था बघून मला मदत करण्याच्या उद्देशाने कोणी ते लिहिलंय
मला माहित नाही." खूप आग्रह केल्यावर
आज्जीने पैसे घेतले. पण मला एक विनंती
केली की,"बाळा,ते मी नाही
लिहिलंय. माझी दया आली असेल म्हणून कोणीतरी लिहिलं असेल. जातांना तू तो कागद फाडून टाक.”

मी हो म्हणून ते टाळलं खरं; पण माझं अंतर्मन मला सांगू लागलं की हेच ५०-६० लोकांना
पण तिने सांगितलं असणार. अद्याप कोणीच तो कागद फाडला नाही. ज्याने कोणी त्या वृद्ध
महिलेला मदत म्हणून हा उपाय शोधून काढला त्या व्यक्तीप्रती माझं मन कृतज्ञतेनं
भरून आलं.

एखाद्याला मदत करण्याचे अनेक मार्ग आहेत;
पण अशा प्रकारची सेवा करण्याची कल्पना
माझ्या मनाला स्पर्शून गेली. मी देखील तो कागद न फाडता घरी गेलो. मदत करण्याचे मार्ग अनेक आहेत; फक्त कर्म करण्याची तीव्र इच्छा हवी.!

(माझ्या वाचनात whatsapp वर आलेला अनामिक लेखकाचा सुंदर लेख मनात घर करून गेला.)🙏"

कधी कधी, मला असा चकीत करणारा अनुभव येतो, की मी सोशल मिडीयावर लिहीलेल्या संदेशाला समर्पक व नवी दिशा दाखविणारा प्रतिसाद येतो. त्याचीच ही दोन उदाहरणे:
माझा सोमिवरील संदेश:

"Nobody is indispensable":
काळाच्या तात्कालिक गरजेप्रमाणे, काळाच्या ओघात, नेहमीच समर्थ पर्याय निर्माण होत असतात. Nobody is indispensable. अमूकच व्यक्ती पर्याय होईल, ह्याची कुणालाच कधीही खात्री देता येत नाही, आजवरचा इतिहास हेच सांगतो. भाबडी आशा बाळगण्याखेरीज, आपण काहीही करू शकत नाही. जे जे जसे जसे घडत रहाते, त्याचाच परीपाक उद्या घडत असतो आणि हे चक्र अव्याहतपणे चालू रहाणे हा निसर्गनियम आहे. अखेरीस, सुयोग्य परिस्थितीच अपेक्षित पर्याय पुढे आणते."

ह्यावर आलेला अंतर्मुख करणारा प्रतिसाद:
"😀 हे खरे आहे , कुठल्याही परिस्थितीला आणि व्यक्तिला चांगले वाईट पर्याय हे नक्कीच असतात आणि भविष्यात ते वेळोवेळी पुढे देखिल येतात. पण नुसते भाबडे आशावादी राहुन, वैचारिक मंथन करुन, रामभरोसे सोडुन काहीही साध्य होत नाही. काळाच्या ओघात ध्येयनिष्ठ खंबीर पर्याय आपणहुन निर्माण होत नाहीत.

त्यासाठी आपल्याला, कोणालातरी समर्पित होऊन, ध्येयाने झपाटून हातपाय मारावे लागतात. जरुर पडल्यास सर्वमान्य लाटेवर आरूढ होऊन चालु असलेला आपला सुखासीन प्रवास त्याग करून प्रवाहाच्या विरुद्ध मार्गक्रमणा करावी लागते. आणि तेच सोपे नसते. त्यासाठी दुरद्रृष्टी आणि आपल्या ध्येयाशी बांधिलकी असावी लागते. पण आपण त्याची दखल घेत नाही. किंबहुना असे काही घडते आहे याची आपल्याला कल्पनाच नसते. आपली अनास्था, अनभिज्ञता , अज्ञान, बेपर्वाई वृत्ती आणि फाजील आत्मविश्वास त्यास कारणीभूत असतो.

कोणाच्या तरी ध्येयनिष्ठेतुनच खरेतर असे असंख्य चांगले, समर्थ, समृद्ध पर्याय निर्माण होतात. यालाच सामाजिक प्रबोधन आणि क्रांती म्हणतात. यासाठी प्रसिद्धी झोतात न येता समर्पित आयुष्य जगणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्था असतात. त्यांना पदे, पैसा , श्रेय यांच्याशी काही देणेघेणे नसते. आपली ध्येये साध्य करण्यासाठी मोबदल्याची अपेक्षा न करता ते अविरत झटतात, अनंत काळ धीराने कार्यरत राहतात. समाजाला अशा दीपस्तंभांची नितांत गरज असते. आणि अशा छोट्या मोठ्या दीपस्तंभांशी जेव्हा सामान्य भोंदू लोकांची गाठ पडते तेव्हा संघर्ष अटळ असतो तसेच त्याचा निकाल देखिल निश्चित असतो. ध्येयनिष्ठावानांचा विजय हा विधिलिखित असतो."
👍🏽👍🏽✌🏽✌🏽

माझा सोमिवरील संदेश:

""म्रुगजळ !":
सध्या तरी कोणत्याही एका पक्षावर विसंबून रहाण्याजोगी परिस्थिती दिसत नाही. राजकारण हे विचार केंद्री अथवा धोरण केंद्री न रहाता, ते अधिकाधिक नेत्रुत्व केंद्री आणि पर्यायाने व्यक्ती व आत्मकेंद्री बनत चालले आहे. पक्षापेक्षा शिखर नेत्रुत्वाचे महत्व आणि त्यालाच प्राधान्य मिळत चाललेले आपण पहात आहोत. एखाद दुसरा अपवाद वगळता सर्वच पक्षांचे अधिकार, धोरणे आणि वाटचाल शिखर नेत्रुत्व केंद्री झालेली दिसतात. पक्षांच्या तसेच दूरगामी जनहिताचे द्रुष्टिने हे असे होणे कितपत् योग्य ठरू शकेल हा एक यक्षप्रश्नच आहे.

त्रिशंकू वा आघाड्या काय दिवे लावतात अथवा एक हाती कारभारही कशी बेपर्वाई किंवा एकाधिकारशाही गाजवतो, त्याचा अनुभव गांठीशी आहेच. Benevolent, good Governance हे एक म्रुगजळच झाले आहे..............."

ह्याला आलेला,
विचारांना वेगळी दिशा दाखवणारा हा प्रतिसाद:
"😀 ६० वर्ष अराजकता शांतपणे सहन करुन आज जेव्हा उंदीर बिळातून बाहेर यायला लागले आहेत तेव्हा आपल्याला हे विचार सुचायला लागले आहेत हेच देशाचे दुर्दैव. आजवरचे नेते आणि पक्ष सत्तेत कां आले आणि त्यांनी देशासाठी, धर्मासाठी आणि स्वतःसाठी काय साध्य केले ? किती कमाई केली?"

थोडक्यात सोशल मीडियावर भाग तुम्ही कशासाठी घेता, केवळ टाईम पास हाच हेतु असला तर काहीच उपयोग नाही. पुस्तके मासिके नियतकालिके वाचून जे मिळणार नाही, ते इथे तुमच्याही पदरात पडू शकेल, फक्त ते वेचण्याची चोखंदळ जागरूकता मात्र हवी, हेच मला या लेखातून सांगायचे आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता. क.
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडून........
असेच वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........

https://moonsungrandson.blogspot.com

हा लेख पसंतीस आला तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....
I have you tube channel:
moonsun grandson
With over 50 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०२१

"वाचा, फुला आणि फुलवा-३":


"वाचा, फुला आणि फुलवा-३":
नववर्षाचा एक संकल्प म्हणून मी वाचलेल्या निवडक पुस्तकांचा रसास्वाद सादर करत आहे. आतापर्यंत "अबीर गुलाल" "झिम्मा" आणि "युगांत" इ.इ. पुस्तकांचा परामर्ष घेऊन झाला. आता हे पुस्तक:

"अचूक निदान' तर आरोग्य प्रदान":
डाँ. रवी बापट लिखीत 'अचूक निदान' हे पुस्तक हाती आले अन् ते वाचता वाचता, प्रथम आठवले की, ह्याच पुस्तकाच्या प्रकाशनसमारंभासाठी मला डाँ. साहेबांनी मला आमंत्रण देताना 'त्यामध्ये माझाही उल्लेख आहे' असे सांगितले होते ते ! काही कारणाने मी मात्र त्या समारंभाला जावू शकलो नव्हतो. सहाजिकच मोठ्या उत्सुकतेने व उत्साहाने मी पुस्तक वाचले.

कोणताही आजार बरा करण्यासाठी, त्याचे अगदी अचूक निदान होणे किती नितांत गरजेचे असते, ते प्रत्यक्ष अनुभवांतील विविध उदाहरणांचा दाखला देवून, ह्मा वाचनीय पुस्तकांत प्रभावीपणे मांडले गेले आहे.

रोग्याबरोबरचा दुखण्यासंबधीचा, त्याच्या मनाचा मागोवा घेत, केलेला मनमोकळा संवाद, नंतर त्याची आमूलाग्र शारिरीक तपासणी आणि शेवटी गरजे प्रमाणे चांचण्या करणे ह्या क्रमाने, सुयोग्य उपचार-निदान पद्धत सध्याच्या आरोग्यक्षेत्राच्या व्यापारीकरणांत कशी डावलली जाते आहे, त्याचेही विषण्ण करणारे चित्रण येथे आहे. ही अचूक निदान करणारी रीतच सातत्याने वापरून डॉ. बापटांनी, नाना तर्हेच्या दुर्धर व्याधीग्रस्तांना कसे बरे केले ते येथे समजते.

माणसाच्या शरीररचनेची गुंतागुंत आणि सर्वपरिचित दुखण्यांची कारणे व उपचार ह्यांचेही धडे वाचकाला पुस्तकातून मिळतात. 'Hit and Miss चा लपंडाव' करत रोग्याची प्रयोगशाळा बनवणार्या आजच्या जमान्यांत, डॉ. रवी बापटांसारखे अत्यंत प्रामाणिक, ध्येयवादी, सेवाभावी आणि निष्णात धन्वंतरीचे अनुभवाचे हे बोल खरोखर सर्वांनीच वाचावेत असेच आहेत. उगाच नाही केवळ तीन महिन्यांत 'अचूक निदान' पुस्तकाच्या तीन आव्रुत्त्या निघाल्या! सरते शेवटी, एक रोगी म्हणून नव्हे तर, एक हौशी ज्योतिषी मित्र म्हणून, माझा यथोचित उल्लेख मला पुस्तकात, अखेर १५७ व्या पानावर सापडला ! सुखद धक्का बसून, माझे मन भरून आले.

अखेरीस म्हणावेसे वाटते की, 'सर्वसाधारणपणे कोणीही डाँक्टर, माणसाच्या वर्तमानांतील दुरावस्थेचे अचूक निदान करण्याचा प्रयत्न करत, त्याला योग्य ते उपचार करत, बरे करण्यासाठी झगडतो, तर ज्योतिषी माणसाचे भूत, वर्तमान जाणत भविष्यातील अवस्थेचेही चित्र यथामती त्याच्यापुढे उभं करण्याचा प्रयत्न करतो'.

थोडक्यात,
वाचाल, तरच वाचाल!:
मराठी सम्रुद्ध होण्यासाठी जास्तीत जास्त माणसांनी वाचनाचा छंद मनापासून जोपासायला हवा. वाचनाच्या माझ्या छंदाला सहाय्य करण्यासाठी, मी विविध स्रोत तपासून काही वाचनीय पुस्तकांची माहिती गोळा केली:
लेखक: मिलिंद जोशी- 'प्राचार्य'
लेखक:ना. धो. मनोहर: वास्तुपुरुष
लेखक: ,शरदच़ंद्र चिरमुले: 'वास्तुपुरुष श्रीनिवास खळे: अंतर्यामी सूर गवसले'.
रवी अभ्यंकर: पन्नाशीचा भोज्जा
जयंत नारळीकर: 'चार नगरांतले माझे विश्व
सुरेश जाखडे: 'समर्थ चिंतन',
राघवेंद्र भीमसेन जोशी: गाणार्याचे पोर
नरेंद्र चपळगांवकर: 'मनांतली माणसे
रामदास फुटाणे: मुक-संवाद'
'मंडालेचा राजबंदी': अरविंद व्ही गोखले
'उन्हांत बांधलेली घरे' :संध्या देवरुखकर
झगमगत्या दुनियेत: सुधीर गाडगीळ
कुणा एकाची भ्रमणगाथा: गो. नी. दांडेकर
प्रथम पुरुषी एकवचनी: पु भा भावे
जीवलग: विजय पाडळकर
टिवल्या बावल्या: शिरीष कणेकर
जीनियस: अच्युत गोडबोले
कार्यमग्न: अनिल अवचट
आठवणींचे असेच असते: अरुण शेवते
अध्यात आणि मध्यात: हेमंत कर्णिक
अन्यथा: गिरीश कुबेर
विरामचिन्हे: वि.वा. शिरवाडकर-कुसुमाग्रज
काही आंबट, काही गोड: शकुंतला परांजपे
मुंबई, ब्रिटिशांपूर्वीची: माधव शिरवळकर

ह्या व्यतिरिक्त, आवर्जून वाचावीत, अशी ही तीन पुस्तके योगायोगाने माझ्या वाचनात आली:

१. 'जगले जशी':
लेखिका: लालन सारंग,
२. 'साहित्यिकांचे अंतरंग':
लेखिका:रत्नप्रभा जोशी.
३. 'एका स्टुडिओचे आत्मव्रुत्त': लेखक:प्रभाकर पेंढारकर.
रंगभूमी, चित्रपट आणि साहित्यविश्वातील आंबट ग़ोड जीवनानुभवांचं अनोखे दर्शन, ह्या तीन पुस्तकांच्या वाचनांतून तुम्हाला घडेल.
ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांनी ही पुस्तके जरुर वाचावीत.

"वाचा, फुला आणि फुलवा !

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच उत्तमोत्तम ललित लेख वाचण्यासाठी.....
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडा:

http//moonsungrandson.blogspot.com

हा लेख आवडला तर......
ही लिंक शेअरही करा......

ह्या शिवाय.....
I have you tube channel:
moonsun grandson
With over 50 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........


शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०२१

"वाचा, फुला आणि फुलवा-२":

 "वाचा, फुला आणि फुलवा-२":

सोशल मीडियावर आपल्याला खूप खूप काही अंगीकारता येईल असं आपण मिळवू शकतो, असा माझा अनुभव आहे. मात्र त्याकरता सोशल मीडियावरील आपण जे काही पाहतो, वाचतो त्याकडे योग्य त्या दृष्टीने पाहायची तयारी मात्र हवी. ज्याप्रमाणे पक्षी आपल्याला काय हवे ते बरोबर निवडून चोचीतून अचूक उचतात, त्याप्रमाणे आपल्याला सभोवताली सोशल मीडियावर जे-जे काही संदेश व माहिती दिसते त्याकडे बघायला हवं आणि नीरक्षीर बुद्धीने काय चांगलं काय उपयोगी काय मार्गदर्शक आणि काय अनुकरणीय असायला हवं ते ते. माझा नेहमी असाच प्रयत्न असतो. या पार्श्वभूमीवर नुकतीच एक अनुकरणीय शहाणपणाची संवय मला गवसली.

जेव्हा, एखादा माणूस आपल्याला अपेक्षित असलेले निर्णय घेत नाही व क्रुती करत नाही, तेव्हा मनस्ताप होऊन ताणतणाव वाढतो. त्यामुळे आपल्या विचारांचे केंद्र, ती व्यक्ती आणि तिचे आपल्या द्रुष्टीने विपरीत असलेले वागणे हेच होऊन, आपण त्याच त्या विचारांच्या भोवर्यांत सापडतो. आपले ताणतणाव सहाजिकच असह्य होतील इतके वाढत जातात. परस्पर संबंधांतही कटूता येते. भांडण तंटे, वितुष्ट शत्रुत्व ह्या त्या नंतरच्या अनिष्ट गोष्टी असतात. अपेक्षा भिन्नता, स्वभावां प्रव्रुत्तींमधले फरक ह्या सार्याच्या मुळाशी असतात. व्यक्तिगत, व्यावसायिक जीवनांत हे तर पुष्कळदा असेच घडत असते, घडत रहाते आणि राहील. सामंजस्य, परस्पर सहकार ह्यांची नितांत गरज आहे, हेच खरे. हा महत्वाचा शहाणपणा कसा असतो, त्याचे उदाहरण म्हणून ही सोशल मिडीयावर मी वाचलेली गोष्ट आहे:

ही आदित्य बिर्ला यांची आठवण, तेथे मांडली होती. आदित्य बिर्ला हे अत्यंत यशस्वी उद्योजक आणि एका मोठ्या उद्योग समूहाचे प्रमुख आणि त्यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर त्यांच्या 'आदित्य बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज'ला यशाच्या शिखरावर नेलं. त्यांच्या एका आस्थापनामध्ये एका उच्च अधिकाऱ्याची काही चूक झाली आणि त्या कंपनीला खूप मोठा नुकसानीचा फटका बसला. त्यामुळे त्या अधिकाऱ्याची यथोचित विचारपूस करण्यासाठी आदित्य बिर्लांनी, त्याला भेटायला बोलावलं होतं. साहजिकच इतर सर्व अधिकारीवर्ग समजून चालला की, आता साहेब त्याची चांगली खरडपट्टी करतील आणि कदाचित त्याला कंपनीतून काढतील सुद्धा. परंतु झाले वेगळेच ! आदित्य बिर्लानी त्या अधिकाऱ्याला भेटण्यापूर्वी, आपल्या समोर एक पॅड आणि पेन ठेवले, शांतचित्ताने या अधिकाऱ्याचे विशेष गुण आणि आतापर्यंतचे त्याचे योगदान, ते एका पाठोपाठ एक नोंदवत कागदावर गेले. हे सगळं नीट अभ्यासल्या नंतरच त्यांनी अधिकाऱ्याला आपल्या कचेरीत बोलावलं.

अखेर ती मुलाखत झाली. मात्र त्या वेळेला त्या अधिकार्याला, आदित्यजींनी, ना कंपनीतून काढलं, ना काही जास्त वेडंवाकडं बोलले. कारण ह्या माणसाने आतापर्यंत खूप खूप काही कंपनी व समूहाला मोलाचे योगदान दिले आहे, हे त्यांना समजलं होतं. त्यांची ही अशी अभिनव समजुतीने समस्या हाताळण्याची पद्धत खरंच किती दुर्मिळ, किती अभिमानास्पद व कौतुकापद !

कुणाला त्याच्या काही चुकांबद्दल वाटेल तसे बोल, लावण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या एकंदर सर्व गुणांचा योगदानाचा आढावा घेऊनच आदित्य बिर्लासाहेब त्याच्याशी बोलणी करत. खरंच ही माणसांना हाताळण्याची पद्धत अतिशय उपयोगी अशीच आहे. कारण आपण जेव्हा असे नुकसान होते किंवा कोणी एखादा विचित्र वागतो, तेव्हा आपला राग उतू जाऊन, आपण तोल सोडून नको नको ते त्याला बोलतो आणि कदाचित चुकीची कृती करतो. ते होऊ नये, योग्य तो न्याय त्या व्यक्तीला मिळावा, म्हणून ही आदित्य बिर्ला यांची पद्धत खरोखर अनुकरणीय अशीच आहे. हे त्या गोष्टीचे सार.

ही शहाणपणाची कहाणी वाचल्यानंतर अचानक मला भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या बालपणीची एक गोष्ट मी कुठेतरी वाचल्याचे आठवले.
तो प्रसंग असा: एकदा ते वडिलांसमवेत आणि भावंडांसमवेत जेवायला बसले असताना, सर्वांना लक्षात आले की, आईने बनवलेल्या स्वयंपाकात काही ना काही तरी चूक होती आणि भाजी किंवा कुठलाच पदार्थ चांगला झाला नव्हता. त्यामुळे त्यांना वाटले की, आपले वडील आता आईला खूप ओरडतील. पण तसं काहीही त्यांच्या वडिलांनी केलं नाही. उलट जणू काही, काहीच घडलं नाही, रोजच्या सारखा चांगला स्वयंपाक झाला आहे, अशा अविर्भावात त्यांनी संपूर्ण भोजन केले. त्यानंतर आईलाही जेव्हा कळलं की, आज आपल्या अमुक पदार्थ नीट झाला नव्हता.

आपले वडील आईला कां रागावले नाहीत, असा प्रश्न मुलांनी केला, तेव्हा वडिलांनी जे उत्तर दिलं ते खरोखर अनुकरणीय आहे. ते म्हणाले की, "तुमची आई दररोज कष्ट करून, नेहमी आपल्याला चांगला स्वयंपाक मन लावून करून वाढते, हे मी कसं विसरु शकेन? एखाद्या दिवशी काही कारणामुळे स्वयंपाक जमला नाही, म्हणून त्याकरता तिला रागे भरणे योग्य नव्हे. म्हणून मी तो स्वयंपाक आनंदाने प्राशन केला."

खरंच किती मार्गदर्शक आणि अनुकरणीय असे हे दोन्ही अनुभव आहेत.

आपणही नेहमी कुणाला बोलण्यापूर्वी, रागवण्यापूर्वी सारासार विचार करावा आणि त्या व्यक्तीचे सर्व गुण आणि एकंदर सर्वांगीण योगदानाची जाण ठेवून, नंतरच शांतपणे तिने जी चूक केली किंवा जे आपल्याला आवडले नाही ते सोप्या सौम्य शब्दात सांगणे हितकर असते. त्यामुळे परस्परसंबंध तर बिघडत नाहीतच शिवाय त्या व्यक्तीलाही आपल्यात सुधारणा करायला हवी याची अधिक जाण येते. आपण जर वेडेवाकडे बोललो तर नंतर आपल्यालाच खंत वाटू शकते वा आपले ब्लड प्रेशर वाढू शकते. हे जसे खरे एका बाजूला, त्याच प्रमाणे तशा बोलण्यामुळे आपले परस्पर संबंध तुटू शकतात हेही खरे.

सोशल मीडियावर दररोज आपल्याला खूप खूप काही मिळू शकतं, फक्त त्याकरता दृष्टी हवी, विचारांची दिशा हवी आणि मोकळे मन हवे, तरच तुमच्याही असं काही ना काही पदरात पडू शकेल, हेच मला या लेखातून सांगायचे आहे

धन्यवाद
सुधाकर नातू

ता. क.
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडून........
असेच वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........

https://moonsungrandson.blogspot.com

हा लेख पसंतीस आला तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....
I have you tube channel:
moonsun grandson
With over 50 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

"वाचा, फुला आणि फुलवा-१":"नटखट नट-खट मोहन जोशी":

 "वाचा, फुला आणि फुलवा-१":

नववर्षाचा एक संकल्प म्हणून मी वाचलेल्या निवडक पुस्तकांचा रसास्वाद सादर करत आहे. आतापर्यंत "अबीर गुलाल" "झिम्मा" आणि "युगांत" ह्या पुस्तकांचा परामर्ष घेऊन झाला. आता हे पुस्तक:

'नटखट नट-खट मोहन जोशी':
एक मनस्वी, तेजस्वी, यशस्वी कहाणी!
--–👌--------------👌--------------👌---------
हे श्री. जयंत बेंद्रे ह्यांनी शब्दबद्ध केलेले सुमारे 500 पानी आत्मनिवेदन, ह्या अत्यंत मनस्वी आणि कर्तबगार अभिनेत्याची एखाद्या कादंबरीपेक्षाही चित्तथरारक जीवनकहाणी नुकतीच वाचून झाली. अंगभूत गुणांना आणि कौशल्याला अपार जिद्द व कष्ट, निश्चित ध्येय आणि ह्या जोडीला थोडी नशिबाची साथ मिळाली, म्हणजे सामान्यांतून अचंबित करणारे यशस्वी कर्तुत्व कसे आकाराला येते त्याचे एखाद्या आशयघन चित्रपटासारखे दर्शन येथे घडते.

गरजूंना, अडचणीत सापडलेल्या अभाग्यांना सर्वशक्तीनिशी मदत करणारा हा माणूस, जेवणांत जर काही अन्न उरले तर ते वाया न जाऊ देता गरजू भुकेलेल्यांच्या तोंडी जाईपर्यंत स्वस्थ न बसणारा हा माणूस, एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की, मग कितीही अडचणी, संकटे आडवी आली तरी न डगमगता ती यशस्वीपणे पूर्णत्वाला नेणारा हा माणूस, आपले कुटूंबीय, पत्नी मुले ह्यांची काळजी घेणारा, जिव्हाळ्याने वागणारा हा माणूस, व्यावसायिक जीवनांत प्रामाणिकपणे आपल्यांतील कर्तुत्वाला सिद्ध करणारा हा माणूस इतक्या पोटतिडकीने आणि तटस्थ प्रांजलपणाने आपला जीवनपट येथे उलगडतो की थक्क व्हावे.

अनेक हिंदी, मराठी चित्रपट तसेच मालिका आणि नाटके करणारा, विविध पुरस्कार मानसन्मान मिळवणारा, हा गुणवंत अभिनेता सुरेल गीतेही गातो. अ. भा. नाट्यपरिषदेचा अध्यक्ष ह्या नात्याने ते करत असलेली रंगभूमीची सेवा तर आपण जाणतोच. अशा ह्मा माणसाने व्यावसायिक जीवनाची सुरवात मालवहातूकीच्या क्षेत्रांत एक वहानचालक-मालक म्हणून केली होती! जीवनसंग्रामात माणूस कुठे असतो आणि किती थक्क करणारी शिखरे पादाक्रांत करू शकतो ते ह्या पुस्तकावरून जसे समजले, तसेच कुणालाही नेहमी उपयोगी पडतील असे अनुभवाचे मंत्र येथे आहेत. काही लहान-मोठ्यांच्या मोठेपणाच्या जशा गोष्टी येथे आहेत, तसेच काही 'दिग्गजां' च्या 'छोटेपणा'चे जोशींना आलेले अनुभवही धक्का देणारे आहेत.

ह्या पुस्तकातील अनोखा आगळा वेगळा असा भाग म्हणजे, त्यांच्या पत्नीने एक प्रियकर पती म्हणून आणि दोन मुलांनी एक कर्तव्यदक्ष प्रेमळ वडील म्हणून आलेल्या सहवास क्षणांची केलेली ह्रदयंगम उजळणी होय. तसेच मोहन जोशींनीच स्वत:शीच स्वत:चा घेतलेला रोखठोक लेखाजोखाही ह्या आत्मनिवेदनाची उंची वाढवतो.

कुठेही कंटाळा न येता उत्सुकतेने वाचावी अशी ही आत्मसमाधान देत, आत्मपरिक्षणही करायला लावणारी, ५०० पानी जीवनगीता मला अवचितपणे वाचायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
हँटस् आँफ टू श्री मोहन जोशी व त्यांचे शुभचिंतन.

माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडून........
हा लेख जरूर वाचा........

https://moonsungrandson.blogspot.com

लेख पसंतीस आला तर....
लिंक शेअरही करा.....


सोमवार, १ फेब्रुवारी, २०२१

"ह्रदयसंवाद-३५": "हरवले, ते गवसले !":

 "ह्रदयसंवाद-35": "हरवले, ते गवसले !":

हरवलेली वस्तू मिळेल कां, मिळाली तर ती कुठे शक्यतो मिळेल, हे समजण्यासाठी काहीतरी मार्ग असतो. पंचांगात बघून, कुठल्या बाजूला एखादी हरवलेली गोष्ट आहे ती मिळेल की नाही, कधी मिळेल ह्याची काहीतरी कल्पना येऊ शकते. पण मला तर त्या विषयी काहीच माहिती नव्हती.

ह्या पार्श्वभूमीवर माझी पुण्यातील महत्वाचे फोन नंबर असलेली छोटी डायरी हरवली होती. ती शोधण्याचा मी खूप प्रयत्न करत होतो. पण व्यर्थ.
माझ्या ड्राँव्हरमधून मी काही नोंदी, नव्या कल्पना, हातावेगळी करायची कामे ही नोंद करण्यासाठी मी नेहमी कोचवर जिथे बसतो, तिथे हाताशी ठेवत असे व जमेल तेव्हा त्यांत लिहितही असे. पुढे काही दिवस गेले.

दररोज सकाळी चहा पिताना मला नेहमी काहीना काही वाचायला लागते. दिवाळी अंक, मासिके वर्तमानपत्र अशा प्रकारचं साहित्य हाताशी घेऊन, एकीकडे गरम गरम चहाचे घुटके घेत मी वाचत असतो. 'त्या' दिवशी काय झाले कोणास ठाऊक; मला वाचण्यासाठी काहीच पेपर वि अंक दिसला नाही, म्हणून माझी ही आताशी येणारी, डायरी हातात घेतली आणि चहा पिऊ लागलो.

गंमत अशी की, पहिलेच पान उघडल्यावर तिथे मला फोन नंबर आणि नांवे लिहिलेली दिसली. पहिली चार-पाच पानं भरून हा सारा नोंदीचा ऐवज दिसला. म्हणजे माझ्या ह्या फोननंबरच्या ज्या नोंदी होत्या, ती प्रुष्ठे सोडून मी त्या पुढच्या पानांपासून मी लिहीणे सुरू केले होते. हे इतके दिवस करताना माझे ह्या फोन नंबर्सच्या माहितीकडे लक्षच गेले नव्हते ! सहाजिकच अचानकपणे, हरवलेली आपली डायरी मिळाली याचा आनंद अवर्णनीय होता. "तुझे आहे तुजपाशी, परि जागा तू चुकलाशी" असं म्हणतात ते खोटं नाही. पंचांग न बघताच, मला माझी हरवलेली मिळाली होती.

अगदी असाच अनुभव मला लाँकडाऊनच्या काळात आला होता. मी खबरदारी म्हणून घराच्या बाहेर न जाता, महिनोन्महिने घरातच फेर्या मारुन आवश्यक असलेला चालण्याचा व्यायाम करत असे. एक दिवस माझ्या भाच्याने माझी ख्याली खुशालीची चौकशी करताना म्हटले होते, "मामा, तू सकाळी फिरायला जाताना कोवळ्या उन्हात थोडा वेळ उभा रहातोस ना? त्यामुळे डी जीवनसत्त्व मिळते आणि immunity अर्थात प्रतिकार शक्ती सुधारते."

तो हे बोलल्यानंतर दुसर्याच दिवशी सकाळी, माझे आमच्या खोलीत खिडकीजवळ उभा राहिल्यावर अचानक लक्ष गेले ते खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हाकडे !. मला आवश्यक असलेली ही इतकी जवळ मला उपलब्ध होती की आणि दुर्दैवाने मी आपला तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत होतो ! नववर्षापासून मी खाली सोसायटीच्या बागेत फिरायला जाऊन आल्यावर वा जाण्यापूर्वी, घरातच खिडकीपाशी दहा पंधरा मिनिटे बसून ती कोवळी उन्हे अंगावर घेत असतो, एक मौल्यवान खजिनाच गवसल्याचा आनंद मिळवत रहातो. "तुझे आहे तुजपाशी" हेच खरे नाही कां?
लॉक डाऊन च्या काळातला असाच अजून एक अनुभव. आमच्या सोसायटीत एक चांगली बाग आहे, याची जाण ह्याच काळामध्ये आम्हाला अचानक झाली. सभोवताली उंच अशी मजबूत झाडे, त्याच प्रमाणे वेगवेगळी फुलझाडे अशा तर्‍हेची चौकोनी बाग इतकी वर्ष दुर्लक्षितच होती. इथे अगदी मोजकीच मंडळी कधीतरी फिरत असत.

आम्ही मात्र नेहमी घरापासून थोड्या दूरवरच्या मोठ्या बागेत सकाळी फिरायला जायचो किंवा सभोवतालच्या परिसरात रस्त्यावर फिरायचो. परंतु लाँकडाऊनच्या काळात बाहेर जास्त जायचं नसल्यामुळे, कुणाला तरी हे लक्षात आलं की या बागेला चांगलं रूप देता येईल. त्याप्रमाणे लवकरच सुधारणा करून भोवताली ज्याला जुजबी जाँगींग ट्रँक म्हणता येईल, असा फिरण्याचा चौकोनी मार्ग तयार झाला. या बागेचं वैशिष्ट्य इतके दिवस आम्हा बहुतेकांच्या कसं काय दुर्लक्षित झालं ! बागेत अगदी बरोबर मधोमध डेरेदार वडाचं झाड देखील होतं की !

कमाल आहे खरंच माणसं, किती वेगवेगळ्या गोष्टी आपल्यापाशी असूनही त्या बघत नाहीत आणि मोठ्या संधीला मुकतात, त्याचा हा अनुभव. तेव्हापासून सकाळी अथवा संध्याकाळी ह्याच बागेमध्ये जमतील तशा मारून आमचं आरोग्य रक्षण करायचा प्रयत्न सुरू केला आहे. Better late than never. "तुझे आहे तुजपाशी" हे मी जे म्हणतो किंवा "हरवले ते गवसले" असं जे मला तुम्हाला सांगायचय ते हे उदाहरण.

जे जेव्हा घडायचे असेल, तेथे तेव्हा ते केव्हाही घडू द्या. जे काही घडेल तेव्हा, ते खुल्या दिलाने जसेच्या तसे स्वीकारा. ना खंत ना खेद अशी वृत्ती असू द्या. शक्यतोवर मनातील विचारांचे भेंडोळे दूर करून त्यापासून पूर्ण मुक्त व्हायचा प्रयत्न करा. ताणतणाव अपेक्षांचे ओझे त्यामुळे दूर होऊ शकेल. शक्यतोवर कमीत कमी विचार मनात यावेत. जे विचार मनात येतील ते सर्व बोलून दाखवू नयेत, तारतम्याने निवड करून मगच बोलावे. शक्यतो सकारात्मक नवनिर्मितीच्या मार्गाने जाणारे विचार करावेत. त्याप्रमाणे कृती व्हावी. असे जर तुम्ही वागलात, तर तुमचं तुम्हाला समाधान व शांती मिळू शकेल. या सगळ्या अनुभवांमधून मला जे काही गवसले ते हे असही.


खरंच बऱ्याच वेळेला, आपण आपल्याजवळ असलेली ही गोष्ट लक्षात घेत नाही, आयुष्यात जे आपल्याला मिळाले आहे, त्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो आणि नको तिथे आपले मन, नको त्या विषयांवर वेगवेगळी कल्पना किंवा आपल्या पाशी नसलेल्या गोष्टींबद्दल चिंता वा दुःख नाहक करत बसतो. तुमच्या जवळ काय आहे याचा विचार करावा, नाही त्या भलतीकडे मन जाऊच देऊ नये, असा धडा मी या दोन छोट्याश्या अनुभवांवरून घेतला.

नेहमी आपणही जवळ आहे त्यांत आनंद माना.

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
असेच अनेक विचारप्रवर्तक लेख वाचण्यासाठी 
माझ्या ब्लॉगची लिंक संग्रही ठेलवा......
अधूनमधून जरूर ती उघडा.......

http//moonsungrandson.blogspot.com

लेख आवडले तर.....
लिंक शेअरही करा..........