बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

"राहू व केतूच्या आगामी राश्यंतराचे राशीनिहाय परिणाम":

 "राहू व केतूच्या आगामी राश्यंतराचे राशीनिहाय परिणाम":


गेल्या वर्षी २३ मार्च'१९ रोजी राहू केतूचे राश्यंतर अनुक्रमे मिथून व धनु राशींमध्ये झाल्यानंतर आतापर्यंत अनेक संकटांच्या मालिकांना आपण सर्व तोंड देत आहोत. आता ह्या वर्षी १९ सप्टेंबर'२० रोजी राहू-केतू चे पुनश्च राश्यंतर होत आहे.

१९ सप्टेंबर'२० रोजी राहू मिथूनेतून वक्री होत, व्रुषभ राशीत आणि केतू धनु राशीतून व्रुश्चिकेत प्रवेश करणार आहे. ही राहू केतूची स्थिती १६ सप्टेंबर २०२२ पर्यंत राहणार आहे. ह्या कालखंडातमध्ये राहू केतूच्या ह्या राश्यंतराचा एकंदर राशीनिहाय परिणामांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. 

हे राश्यंतर, कोणाला चांगलं, कोणत्या राशीला वाईट आणि कोणत्या विशिष्ट अशा विषयांवर वाईट, ह्याचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे आणि तो असा करायला लागेल की जणू काही चंद्र कुंडली धरून त्या राशीच्या कोणत्या स्थानी हे ग्रह होते आणि आता कोणत्या स्थानी ते येणार आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. अशा विचारधारेवर प्रत्येक राशीचा अभ्यास केला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हे निष्कर्ष काढता येतील:

१ मेष:

मेष राशीला आता काय होणार तर, त्यांच्या धनस्थानात आणि अष्टम स्थानात राहु आणि केतु येणार. धनस्थानात म्हणजे आर्थिक चणचण भासू शकेल खर्च जास्त होतील. हेच कुटुंबाचे स्थान आहे म्हणजे कौटुंबिक कलह वा काहीतरी नव्या जबाबदाऱ्या वाढू शकतील. केतू अष्टम स्थानी म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे काही त्रास वा मोठे अचानक नुकसान, प्रवासात अपघात वा गोंधळ, अशा तऱ्हेचे अनुभव येतील.

२ व्रुषभ:

व्रुषभ राशीचा जर विचार केला, चंद्राबरोबर म्हणजे तुमच्या डोक्यावर राहू आणि सप्तम स्थानात म्हणजे जोडीदार वा भागीदारीच्या स्थानात केतू ,त्यामुळे महत्वाचे विचार करताना संभ्रम निर्माण होऊ शकतील. चुकीचे निर्णय वैवाहिक जीवनांतील परस्परसंबंधात काहीना काहीतरी वितुष्ट अशा तऱ्हेचे फळे मिळू शकतात. तुमच्या वागण्याच्या पद्धतीला सुधारावे लागेल. तसेच जोडीदाराशी मतभेद टाळावे लागतील. व्यवसाय नोकरीसाठीच्या दशम स्थानापासून राहू चौथा असल्यामुळे तेथूनही तुम्हाला जास्त अपेक्षा करता येणार नाहीत. थोडक्यात व्रुषभ राशीला हे संक्रमण तेवढे फलदायी नाही.

३ मिथून:

मिथून राशीच्या व्ययांत राहु तर शत्रुक्षेत्री केतू, अशी स्थिती या कालखंडात राहणार आहे. विवाहस्थान केतू व शनीच्या पापकर्तरीयोगात असल्याने तो जुळविताना, काही अडचणी अथवा चौकशी अधिक करावी, नाहीतर फसगतीची शक्यता. तर विवाहितांमध्ये वादविवाद होतील. तसेच आरोग्यासंबंधीची काळजी वेळीच घ्यावी. पोटाचे विकार अथवा डोकेदुखी संबंधी काही समस्यांचे निरसन करणे गरजेचे ठरेल. प्रवासामध्ये किरकोळ अपघात, अडचणी हे ग्रहयोग सुचवतात. थोडक्यात तारेवरची कसरत करण्याचा काळ आहे.

४. कर्क:

कर्क राशीला राहू लाभात येत असल्यामुळे शुभ फले देऊ शकतो. मात्र त्याच वेळेस केतु पंचम स्थानात असल्यामुळे काही निर्णय चंचलतेमुळे चुकू शकतात. त्यामुळे नोकरी व्यवसायात नुकसान होऊ शकते याचे भान ठेवायला हवे. केतू पंचमात असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चलबिचल अथवा अपेक्षित यश विद्यार्थ्यांना न मिळणे आणि संतती विषयक काही समस्या वडीलधाऱ्यांना येऊ शकतात. एकंदर हा काळ संमिश्र आहे असेच म्हणावे लागेल.

५. सिंह:

सिंह राशीला दशमात राहू आणि चतुर्थात केतू यामुळे हा काळ कसोटीचा जाऊ शकतो. माता-पित्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल- त्यांच्याकाही अनारोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबात महत्त्वाच्या स्थावरविषयक प्रश्नावर मतभेद होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात ताणतणाव वाढेल आणि जबाबदाऱ्या योग्य वेळेला न पूर्ण झाल्यामुळे वरिष्ठांची बोलणी खावी लागतील. धंद्यात आर्थिक नुकसानीचा फटका बसू शकतो. इतरांच्या तुलनेत तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका आणि प्रयत्न मात्र वाढवा असेच या कालखंडाचे सांगणे आहे.

६. कन्या:
कन्या राशीच्या बाबतीत केतू पराक्रमात तर राहू भाग्यस्थानात अशी स्थिती आहे. त्यामुळे संमिश्र फळे मिळतील. भाग्यस्थानातील राहुमुळे तुमच्यापुढे आलेल्या संधी, काही अडचणी आल्यामुळे त्यांचा फायदा विलंबाने होईल. प्रवासात वाद विवाद किंवा इतर काही अडचणी विलंब ह्यांची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भावंडांशी मतभेद होऊ शकतात. एकंदर हा काळ प्रतिकूल आहे त्यामुळे सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

७. तुळा:

तुळा राशीचा विचार करता या राशीला राहू आठवा आणि केतू दुसरा असल्यामुळे सर्व राशींमध्ये जास्त कसोटीचा काळ जाऊ शकतो. अचानक आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेला बाधा येईल अशा घटना घडू शकतील. कौटुंबिक जीवनामध्ये अडी अडचणींचा हा काळ असू शकतो. पंचमाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे निर्णयशक्ती योग्य तऱ्हेने काम करेल असं नाही. स्पर्धात्मक परिक्षांत अपेक्षाभंग, त्याचप्रमाणे संतती विषयक काही समस्या निर्माण होऊ शकतात. अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेऊन संयमाने या कालखंडात आपल्याला येणाऱ्या परिस्थितीशी धैर्याने मुकाबला करावयाचा आहे.

८. व्रुश्चिक:
व्रुश्चिक राशींत केतू असल्यामुळे मानसिक चांचल्य वाढण्याची या कालखंडात शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे जोडीदाराच्या स्थानात राहु असल्यामुळे मतभेद अथवा सांसारिक जीवनात जबाबदाऱ्या वाढल्यामुळे होणारे एकंदर ताणतणाव अशा तऱ्हेचा अनुभव या कालखंडात येईल. चतुर्थ स्थान त्याच्या केंद्रात राहू असल्यामुळे मातुल घराण्यातील वडीलधार्‍या मंडळींची काळजी, त्याच प्रमाणे स्थावरासंबंधी योग्य निर्णय न होणे, मानसिक चिंता अशी फळे मिळू शकतात.

९. धनु:

धनु राशीच्या व्ययांत केतू आणि षष्ठ अर्थात शत्रू स्थानात राहू असा संमिश्र कालखंड आहे. षष्ठातील राहू उत्साह वाढवू शकतो तसेच समोर येणाऱ्या कठीण प्रसंगांना विरोधाला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता निर्माण करू शकतो. मात्र व्ययातील केतू द्वितीयस्थानातील शनीच्या पापकर्तरीयोगात असल्याने, तुमच्या उत्सवावर पाणी पडू शकैल. त्याचप्रमाणे बंधू-भगिनींशी मतभेद किंवा इतर अनुचित अनुभव येऊ शकतात. प्रवासातही विलंब आणि गोंधळाला तोंड द्यावे लागेल.

१०. मकर:

मकर राशीसाठी, राशीस्वामी शनी व केतू एकमेकांना लाभस्थानी आणि पंचमात राहु अशी संमिश्र स्थिती आहे. एकीकडे नोकरी-व्यवसायात चांगले आर्थिक लाभ आणि संधी, वाढता उत्साह तर दुसरीकडे आपल्या निर्णयामधील चांचल्य असा विरोधाभास अनुभवाला येईल. तसेच संततीविषयक काही महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल. कारण त्यांत चूक होण्याची शक्यता अधिक आहे. धनस्थानाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे आर्थिक बाजू सांभाळून मगच पुढे जावे लागेल, कौटुंबिक वादविवाद टाळावे लागतील. एकंदर कुछ खट्टा कुछ मीठा असा ह्या राशीला अनुभव यावा.

११. कुंभ:

कुंभ राशीच्या दोन केंद्र स्थानात राहू-केतू अशी योजना या कालखंडात येत असल्यामुळे एकीकडे मानसिक विचित्र अवस्था व स्थावरासंबधी कटकट, तर दुसरीकडे नोकरी-व्यवसाय त्याचबरोबर माता पित्यांसाठु हा अनिष्ट काळ असणार आहे. त्यांच्या आरोग्याची व अडचणींकडे वेळीच लक्ष द्या. सहाजिकच ह्या सार्या गोष्टींमुळे तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीशी तोंड द्यावे लागणार आहे. प्रसंगी नुकसानही संभवते. मानसिक असमाधान वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. संयम ठेवा. कष्ट वाढवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

१२ मीन:

मीन राशीच्या पराक्रमात आता राहू येणार आहे. त्यामुळे उत्साह वाढता राहील आणि इतके दिवस करावयाची महत्वाची कामे पूर्ण होऊ शकतील. प्रवास लाभदायक. आपल्या जबाबदाऱ्या हिंमतीने पार पाडाल. मात्र केतू भाग्यस्थानात असल्यामुळे एकंदर अधिक अपेक्षा आपल्या भाग्योदयाच्या करू नका. जी काही फळे मिळतील नोकरी-व्यवसायात, त्यात समाधान माना. आतापर्यंत चौथा राहू असल्यामुळे मानसिक असमाधान होते, ते मात्र आता नियंत्रणात राहील, भावंडांकडून मात्र थोडाफार त्रास होऊ शकतो किंवा त्यांच्याबरोबर मतभेद होऊ शकतात. इतरांच्या तुलनेत, मीन राशीला हा कालखंड अधिक चांगला जाऊ शकेल.

ह्याप्रमाणे आम्ही राहू-केतू यांच्या राश्यंतराची फळे मांडायचा प्रयत्न केला आहे. तो करताना हे पाप ग्रह, कोणत्या राशीला कोणत्या प्रकारची फळे देणाऱ्या स्थानात त्यांचा प्रभाव आहे, ह्याचा प्रामुख्याने विचार केला आहे. ज्योतिषाकडे अभ्यासपूर्ण दृष्टीने बघण्याचा हा एक प्रयत्न आहे. आम्ही मांडलेली निरीक्षणे ही ज्याची त्याने तपासून घ्यावी आणि एकंदर आपल्या अपेक्षा आणि प्रयत्न यांच्यात समतोल साधून समाधान मिळवायचा प्रयत्न करावा.

धन्यवाद
सुधाकर नातू.

ता.क.
१ मी वैयक्तिक ज्योतिष सल्ला वयोमान झाल्यामुळे बंद केले आहे, ह्याची नोंद घ्यावी.

२ माझा you tube channel
moonsun grandson
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........
moonsun grandson Channel link:

https://www.youtube.com/user/SDNatu

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

"राहू व केतूच्या आगामी राश्यंतराचे दूरगामी परिणाम":

 "राहू व केतूच्या आगामी राश्यंतराचे दूरगामी परिणाम":

गेल्या वर्षी २३ मार्च'१९ रोजी राहू केतूचे राश्यंतर अनुक्रमे मिथून व धनु राशींमध्ये झाल्यानंतर आतापर्यंत अनेक संकटांच्या मालिकांना आपण सर्व तोंड देत आहोत. आता ह्या वर्षी १९ सप्टेंबर'२० रोजी राहू-केतू चे पुनश्च राश्यंतर होत आहे.

१९ सप्टेंबर'२० रोजी राहू मिथूनेतून वक्री होत, व्रुषभ राशीत आणि केतू धनु राशीतून व्रुश्चिकेत प्रवेश करणार आहे. ही राहू केतूची स्थिती १६ मार्च २०२२ पर्यंत राहणार आहे. ह्या कालखंडातमध्ये राहू केतूच्या ह्या राश्यंतराचा एकंदर काय परिणाम आम्ही ह्या खास लेखात मांडत आहोत.

मात्र ह्या राहू केतू संक्रमणानंतर हे जग जवळ जवळ ठप्प करणारे कोरोना महासंकटात काय अनुकूल बदल होऊ शकेल ह्याचा अंदाज करायला हवा. मागील वर्षी जेव्हा राहू-केतू चे राश्यंतर झाले, तेव्हा पुढे काय होईल याची कल्पना कोरोनाचे महासंकट आल्यानंतरच आली. त्यानंतरच विविध ग्रह बदलांचा अभ्यास करून तर्क लावून या संकटाची मींमासा करण्यात आली. हे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणणे असा प्रकार होता. म्हणूनच तीच चूक पुन्हा होऊ नये, ह्यासाठी पुढील वर्षातील इतर ग्रह बदलांचाही विचार होणे आवश्यक आहे.

त्यानुसार आगामी वर्षात महत्वाच्या ह्या ग्रहस्थितीचा गांभीर्याने विचार व्हावा:

"परिणामकारक गुरुबदल":
गुरु 20 नोव्हेंबर 2020 मकरेत. नंतर गुरु 5 एप्रिल 2021 मध्ये कुंभ राशीत. त्यानंतर परत तो उलटा १४ सप्टेंबर 2021 मकरेत. नंतर 20 नोव्हेंबर 2021 कुंभेत.

ह्याचा अर्थ राहू केतू स्थित्यंतर १९ सप्टेंबर'२० ते गुरु मकरेत २० नोव्हेंबर'२० ला जाईपर्यंत गुरु राहूला षडाष्टकात व शनी केतूच्या पापकर्तरी योगांत अशी अनिष्ट स्थिती राहील. त्यामुळे सध्याच्या महामारीच्या महासंकटाची तीव्रता ह्या काळात अधिक चिंता वाढविणारी ठरेल की काय, त्याचा ज्योतिष अभ्यासकांनी सखोल विचार करावा.

२० नोव्हेंबर'२० रोजी गुरू मकरेत गेल्यानंतर ३ जानेवारी'२१ हा कालखंड आशादायी मार्ग दाखवू शकेल. ह्याच काळात बहुधा चातकासारखी जिची वाट पाहिली जात होती, ती कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होऊ शकेल. तसे खरोखरच घडले तर चांगलेच. कारण त्यानंतर सर्व महत्वाचे ग्रह राहू केतुच्या अर्धवर्तुळाच्या एका बाजूला येणार असल्याने कालसर्प हा अनिष्ट कुयोग होणार आहे.

"कालसर्पयोग":
3 जानेवारी 2021 ला शुक्र धनुमध्ये प्रवेश केल्यावर निर्माण होणारीकालसर्पयोग सदृश्य परिस्थिती ही १३ एप्रिल 2021 ला मंगळ मिथूनेत जाईपर्यंत रहाणार आहे.

म्हणून वरील कालखंडात परिस्थिती अधिकाधिक बिकट बनू शकेल कां ह्याची चिकित्सा होणे गरजेचे आहे. Worst is Yet to come ह्याची प्रचिती कदाचित ह्या कालखंडात येऊ शकेल. कारण २०२० मधील कालसर्प योग कालखंडात महामारीच्या संकटाने उग्र रूप दाखवले होते.

त्यपुढील १३ एप्रिल'२१ ते १४ सप्टेंबर'२१ ह्या काळात गुरु कुंभेत असून शनी त्याच्या बाराव्या ह्या अनिष्ट स्थानी मकरेत व राहू केतू त्याच्या केंद्रयोगात रहाणार आहे. हा कालखंड देखील चढ उतारांचा विशेषतः अर्थव्यवस्था खालावू शकण्याचा असू शकतो. मकरेत गुरु १४ सप्टेंबरमध्ये गेल्यावर पुढील २० नोव्हेंबर'२१ हा काळ विसकटलेली घडी सावरता येण्याजोगा ठरेल.

मागच्या राहू केतूच्या स्थित्यंतरानंतर आलेल्या एकंदरच विविध संकटांना तोंड देत शेवटी सार्या जगाला जणु बंदिस्त करणारे कोरोना रुपी भस्मासूराने काय काय प्रताप दाखविले त्याचा अनुभव आपण सारेच घेत आलो आहोत. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने म्हणूनच आगामी वर्षात राहू केतूच्या 19 सप्टेंबर 20 रोजीच्या स्थित्यंतर आनंतर होणाऱ्या विविध ग्रहस्थिती नुसार आम्ही काळाची योग्य ती विभागणी अभ्यासून या लेखात करण्याचा प्रयत्न केला आहे.

आमचे एकंदर निरीक्षण कदाचित योग्य ठरू शकेल किंवा त्यामध्ये काही बदल होऊ शकतात. इथे कुणालाही घाबरवण्याचा हेतू नाही. वस्तुस्थितीनुसार ज्योतिषाच्या आधारे अभ्यास केल्यानंतर कदाचित काय काय संभाव्य असू शकेल, याचा फक्त एक छोटासा मार्ग आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

ह्या लेखात आम्ही सर्वांगीण परिणामांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यासूंनी त्यावर अधिक सखोल विचार करून आपले मत बनवावे. सर्वसाधारण वाचकांनी ह्या निरीक्षणांकडे, एक दिशादर्शक अशा दृष्टीने बघून आपले प्रयत्न आणि अपेक्षा ह्यांची समन्वयता साधावी.

त्यातून जर हे महान संकट लवकरच दूर झाले तर चांगलेच, एवढे आम्ही सध्या म्हणू शकतो. थोडक्यात सर्वच ज्योतिषाने ह्या दृष्टीने राहू-केतू स्थित्यंतर आणि इतर महत्त्वाच्या ग्रहांची स्थिती यांचा अभ्यास करून त्याप्रमाणे मार्गदर्शक विचार मांडावेत असे आम्ही शेवटी सुचवितो.

ह्या पुढील लेखात आम्ही राहूकेतूच्या १९सप्टेंबर'२० मधील राश्यंतराच्या राशीनिहाय परिणामांची मीमांसा करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

धन्यवाद

सुधाकर नातू

ता.क.

१ मी वैयक्तिक ज्योतिष सल्ला वयोमान झाल्यामुळे बंद केले आहे, ह्याची नोंद घ्यावी.

२ my you tube channel
moonsun grandson

विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........

moonsun grandson Channel link:

https://www.youtube.com/user/SDNatu

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

"ह्रदयसंवाद-२५":"आयुष्याचा जमाखर्च":

 "ह्रदयसंवाद-२५": आयुष्याचा जमाखर्च":


# "आयुष्याचा जमाखर्च°:
-------------------
आयुष्यात जशी यशाची, प्रगतीची, असामान्य कर्तृत्वाची समाधान देणारी, अभिमानाने मान ताठ करणारी शिखरे-'Victory Points' असतात, तशीच केलेल्या चुकांची, फसलेल्या प्रयत्नांची वा निर्णयांची, अवहेलनांची, शरमेने मान ख़ाली घालायला लावणार्या वागण्याची आणि जीवघेण्या प्रसंगांची, पराभवांची खोल विवरेही असतात. जीवनाचा जमाखर्च वा हिशोब अशी शिखरे व विवरेच ठरवतात.

कालचचक्राच्या ओघांत आपल्या जीवनाला वळणे देण्याची किमया तीच करतात. 'हे' असे घडले वा घडले नसते तर', अशासारखी प्रश्नचिन्हे त्यामुळेच उभी होत रहातात. अधून मधून आपण प्रत्येकाने आपल्या अशा शिखरांचा व विवरांचा लेखाजोखा मांडावा आणि नीरक्षीर विवेकाने काय बरोबर, काय चूक; काय योग्य, काय अयोग्य ह्याचा मनाशी निवाडा करावा. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो, हे कधीही विसरू नये.

---------------------------

# "सोशल मिडीयाचा लेखाजोखा":

"फेसबुक, वाँटस् अँप इ.इ. सोशल मिडीया जेव्हा नव्हता, तेव्हा सारं लिमिटेड होतं तेच बरं होतं आणि आपले आयुष्य खूप सुखी होते. पण आता "सोमि"मुळे, सगळंच अनलिमिटेड झालंय.... आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालंय", हे असं म्हणणं कितपत रास्त आहे?

शेवटी लाईफही लिमिटेड आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणूनच, सोशल मिडीयाचे असे दोष केवळ अल्पसंतुष्टता दर्शवितात. जाणीवांचे, सार्या भवतालाचे, ज्ञानाचे अन् बहुत जनांच्या तितक्याच अनेकविध अनुभवांचे, कर्तृत्वाचे विशाल विश्व आपल्यासमोर एका क्लिकने उलगडते. हा विश्वरूप दर्शनाचा आविष्कार असा अव्हेरण्यात काय अर्थ आहे?
---------------------------
# राजकारण हया शब्दांतच तयाचा मतिता़र्थ वा प्रयोजन दडलेले आहे. राज्य करणयासाठी अर्थातं सत्ता मिळविण्यासाठी करावयाचे कोणतेही,कसेही प्रयत्न महणजेच राजकारण होय असे प्रयत्न अनेकविध असतात: भावनिक आवाहनाचा, विकासाची स्वप्ने दाखवून, विविध आश्वासने देवून, विरोधी गटांवर टीकांची झोड उठवून सत्ता काबीज करण्याचे डाव खेळले जातात. सत्ता कुणाला नको असते? कारण सत्ता म्हणजेच इतरानी काय करावे वा काय करू नये, हे ठरविण्याची निर्णयशक्ती मिळविणे असते, आपण ठरवू ते आणि तेच बरोबर हे सर्वांना सांगण्याचा अधिकार!
-------------------------

# लोकशाहीत एकदा कां कसेही करून बहुमत मिळविणे, हाच सत्ता देणारा मार्ग असतो. मताधिकार न बजावणार्यांचे प्रमाण पाहिले, तर मिळविलेले बहुमत खर्या अर्थाने किती फसवे असते, ते ध्यानांत येईल. ह्याच पार्श्वभूमीवर, व्यक्तिपूजेवर,घराणेशाहीवर आजवर चाललेली सारी व्यवस्था सर्व सामान्याना अपेक्षित फले देण्यास अपुरी वा असमर्थ ठरलेली दिसत आहे.

दुसरे असे की सत्ता ही लोकहितापेक्षा, आपलेच हित व भरभराट कशी करू शकेल, असेच विचार व कृती करणारी मंडळीच राजकारणांत अधिक प्रमाणांत दिसतात, तसेच शिरतात. स्वातंत्र्य मिळविण्याच्या एकमेव ध्येयाने प्रेरीत होवून, स्वार्थ सोडून सर्वस्वाचा त्याग करणारी माणसे कुठे आणि आजचे बहुसंख्य राजकारणी कुठे! कर्तव्यापेक्षा आपलेच हक्क व फ़ायदे हयांना प्रधान समजणारी माणसेच जर कारभार करत असतील, तर जनतेला अपेक्षित असणारी कामे कशी होणार? सर्वांगीण विकास कसा केंवहा साधला जाणार?
-------------------------

# जोपर्यंत घराणेशाही नाहीशी होवून, केवळ गुणवत्ता नैतिकता आणि कार्यक्षमता हयाच निकषांवर व्यक्तींची निवड केली जात नाही; त्याच बरोबर विशिष्ट ध्येये,धोरणे,विचार प्रणाली ह्या व ह्याच पक्षांचा गाभा ठरत नाहीत; मतदानाची टक्केवारी वाढत नाही, तोपर्यंत सत्तेचा आजवरचा हा भूलभूलैया सर्व सामान्यांना हितकारी ठरणे कठीण आहे.
-------------------------
# " मौलिक विचार:

# जीवनशैली, माणसापाशी असलेल्या ऐहिक साधन संपत्तीच्या मोजमापावरून, कधीही ठरवली जाऊ नये; तर ती त्याच्या विचार, वर्तुणुकीवरुन, सभोवतालच्या जगाकडे बघण्याच्या, त्याच्या द्रुष्टिकोनांतून आजमावली जाणेच इष्ट आहे.

जीवनामध्ये तीच माणसे खरीखुरी सुखी व समाधानी, ज्यांना आपल्याला आवडणार्या गोष्टी, निर्धोकपणे सातत्याने करावयाची संधी मिळते. त्यांत कलावंत व खेळाडू ह्यांचा अग्रक्रम असतो.

# लक्षात ठेवा:
''आजचा दिवस,
कालच्यापेक्षा चांगला होता,
असे उद्या वाटायला हवें.'

# चंगळवाद, (प्रामुख्याने, प्रगत देशांच्या फायद्यासाठी असणाऱ्या)
खुल्या अर्थव्यवस्थेनंतर सुरू झाला:
पैसा व उपभोगाचे
हे दुष्टचक्र!
---------------------------
# सत्ता शक्तिने,युक्तिने किंवा भक्तिने जशी मिलविता येतें त्याच प्रमाने बुद्धि,विचार वैभवाचे जोरावर आणि मते मिलवुन प्राप्त होतें. शक्तिने जी सत्ता येते तिच्यात बलजबरी असते,भक्तीच्या सत्तेमध्ये प्रेम,तर युक्तिने आलेली सत्ता फसवी ठरू शकते. ह्या उलट बुद्धि आणि विचार वैभवाची सत्ता आदराने चिरंतन होते. मते जरी सत्ता देतात, परंतु ती टीकविणे कठीण असते.

सत्तेचा माज चांगला नव्हे, त्याच्यामुळे केंव्हा होत्याचे नव्हते, होईल काही सांगता येत नाही. हा सत्तेचा खेळ घरीं, दारी आणि सर्वत्र नेहमी चाललेला दिसतो.
--------------------------
'कोंबडं कितीही झाकलं, तरी सूर्य ऊगवायचा थांबत नाही'. पदोपदी थापा व बाता मारून सत्य, कितीही लपवायचा प्रयत्न केला, तरी केव्हां ना केव्हा, सत्य सूर्यप्रकाशासारखे प्रत्यक्षात येतेच, येते.
तशीच, आपली (नसलेली) कुवत, कार्यक्षमता, छाती फुगवून, कितीही वाढवलेली दाखवली, तरी ती केव्हां, ना केव्हा, आपली जागा इतरांना दाखवतेच, दाखवते. अशा वेळी, अपेक्षित 'सुशासन' हे एक म्रुगजळच ठरते.
---------------------------

# "एका संसारी स्त्रीचे अध्यात्म"
संसारात राहून देखील परमार्थ साधता येतो.
जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांना द्यावे ही वृत्ती म्हणजेही परमार्थ.
शेजाऱ्यांना जेष्ठ दांपत्याला बँकेचे व्यवहार करण्यात मदत करणे, हाही परमार्थ..
आजारी हॉस्पिटलमधल्या रोग्याच्या सोबतीला राहणे....हाही परमार्थ..

"एका संसारी स्त्रीचे अध्यात्म:"
संसारात आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडणे हा परमार्थ.
विवेकसंपन्न रहाणे गरजेचे.

"एका संसारी स्त्रीचे अध्यात्म:"
मी माझे असे कधी करू नका.
अनाठायी आसक्ती सोडा.
स्वतःला इतरांच्या जागी समजून संयमाने वागा.
संत एकनाथांचा आदर्श ठेवा.
"एका संसारी स्त्रीचे अध्यात्म:"
ही लिंक उघडा व पहा.......

https://youtu.be/4-W_sYfi9E0

-------------------------

# "जीत्याची खोड" : 'कुणी कधीही कसे वागू नये', हे सांगणारी गोष्ट":
"इतरांच्या भावनांची पर्वा न करता इतरांना व स्वतःच्या पत्नीलाही जिव्हारी लागेल असे कायम वर्षानुवर्षे बोलणार्या बेमूर्वत माणसाच्या पत्नीचे हे भावचित्र.
"जीत्याची खोड" :
मेल्याशिवाय जात नाही.
स्वभावाला औषध नाही.

ही लिंक उघडा व पहा......

https://youtu.be/VaWlNZ5tRt8

----------------------------

# "सासूवास आणि सूनवास":
"व्यक्ती तितक्या प्रक्रुती, म्हणायचे दुसरं काय?"
ही लिंक उघडा.......

https://youtu.be/i0SKi_V1wfU

----------------------------

# माझा you tube channel
moonsun grandson

विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........

moonsun grandson Channel link:

https://www.youtube.com/user/SDNatu

चँनेल subscribe करा..

-------------------------

# सध्या बाजार (की, बाजारू?) संस्कृतीची लाट आहे, सहाजिकच आपल्या उत्सवांमागून उत्सवांचे बाज़ारीकरण होत चालले आहे. त्यामधे मतलबी नेते आपली पोळी भाजून घेणे हिलाच जणु आपली संस्कृती समजत आहेत.
'आयजीच्या जीवावर बायजी उदार' असा हा खेळ आहे. अशा वेळी, सामान्य जनतेने 'नीर क्षीर' विवेकाचा मार्गच अंगिकारणे, हाच शहाणपणा आहे.
--------------------------

"सोशल मिडीयाचा लेखाजोखा":

"फेसबुक, वाँटस् अँप इ.इ. सोशल मिडीया जेव्हा नव्हता, तेव्हा सारं लिमिटेड होतं तेच बरं होतं आणि आपले आयुष्य खूप सुखी होते. पण आता "सोमि"मुळे, सगळंच अनलिमिटेड झालंय.... आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालंय", हे असं म्हणणं कितपत रास्त आहे?

शेवटी लाईफही लिमिटेड आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणूनच, सोशल मिडीयाचे असे दोष केवळ अल्पसंतुष्टता दर्शवितात. जाणीवांचे, सार्या भवतालाचे, ज्ञानाचे अन् बहुत जनांच्या तितक्याच अनेकविध अनुभवांचे, कर्तृत्वाचे विशाल विश्व आपल्यासमोर एका क्लिकने उलगडते. हा विश्वरूप दर्शनाचा आविष्कार असा अव्हेरण्यात काय अर्थ आहे?

---------------------------

धन्यवाद
सुधाकर नातू

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

"रंगांची दुनिया-१४": "आठवण: 'चाळीस वर्षांपूर्वीची 'नांदी' "!

 "रंगांची दुनिया-१४":                                                                                                                "आठवण: 'चाळीस वर्षांपूर्वीची 'नांदी' "!


"नाटक- एक जिव्हाळ्याची गोष्ट":
नाटक एक रोमांचक अनुभव आहे. धंदा, कला विचार या त्रिमूर्तीचा अपूर्व संगम करण्याची कुवत असलेले ते एक अनोखे विश्व आहे. मानवी जीवनामध्ये साहित्याबरोबर करमणुकीची देखील अतिशय आवश्यकता असते. संगीत, नाट्य, नृत्य आदि कलांमध्ये मध्ये माणूस रंगून जाऊ शकतो. मराठी माणसाला तर नाटक ही एक जिव्हाळ्याची अशी गोष्ट आहे. तो जेव्हा समोरच्या स्टेज वरील जे जे काय घडत जाते, ते बघतो, त्या जिवंत अनुभवांमुळे तो त्या नाट्याशी एकरूप होऊन बाहेरची दुनिया विसरून जातो. म्हणूनच आपल्या मराठी रंगभूमीची दीडशे हून अधिक वर्षांच्या वैभवशाली परंपरेचा त्याला सार्थ अभिमान आहे.

"नाट्यसृष्टीतील महत्त्वाच्या घडामोडी":
आज मी गेल्या वर्षातील-१९८० सालातील नाट्यसृष्टीच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे नजर फिरवणार आहे. पहिली अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे रंगभूमीकडे आणि एकंदरच कलाक्षेत्राकडे,
दुर्दैवाने साक्षात यमराजांची वळलेली वाकडी विखारी नजर. शांता जोग, जयराम हर्डीकर सतीश दुभाषी हे नाट्यकलावंत, तर मोहम्मद रफी सारखा जणु चित्रपट संगीतात, इंद्रपद मिळवणारा हिंदी चित्रपट सृष्टीतला गायन हिरा, पु भा भावे ह्यांच्यासारखा प्रतिभासंपन्न मनस्वी व तेजस्वी लेखक, तर साहीर लुधियानवीसारखा भावनासंपन्न व अर्थपूर्ण गीतलेखक आणि किशोर साहूंसारखा निर्माता-दिग्दर्शक हे सारे दिग्गज या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. नावे किती आणि कशी आठवावी? मृत्यूच्या या गूढ कोड्याकडे पाहिल्यावर मती कुंठीत होते आणि आपण इथे येतो कुठून? येतो तेही कशाला? काही काही म्हणून उलगडा होत नाही. अशा समयी परमेश्वराच्या चरणी लीन होणे, हाच विचार प्रामुख्याने आपल्या मनात येतो.

इथला शेर संपला की जायचे, मात्र कुठे जायचे ते माहीत नसते. कुठे माणूस जातो ते कधीही कळत नाही. त्यातून कलावंताला अपमरणाचा शापच मिळालेला जणु असतो. आविष्काराच्या ह्या दुनियेत अपरंपार ऋद्धी-सिद्धी प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासापोटी कलावंत जीवाचे रान करतो. कोणी ना कोणी, मग क्वचित एखाद्या जीवघेण्या व्यसनाचा कलावंत आपणहून आधीन होतो व आपण आपल्याच हाताने अल्पायुष्यात मरण ओढवून घेतो. खरोखर आहे कां त्याला अजून उत्तर?

१९८० ह्या सालातील मुंबई येथे रूपारेल कॉलेजच्या नयनरम्य पटांगणात झालेले हीरक महोत्सवी नाट्य संमेलन हा एक माझ्या स्मृती कोशातला एक जिव्हाळ्याचा विषय आहे. तीन दिवस चाललेल्या या आनंदसोहळ्याला, मला स्वतःला एक स्वयंसेवक म्हणून जातीने उपस्थित राहण्याचा सुयोग आला. तेथे काही विविध असे नाट्यक्षेत्रासाठी उपक्रम केले जाणार होते. त्यामध्ये पुण्याच्या भरत नाट्य मंदिरातर्फे नाट्यविषयक एक प्रदर्शन भरवले जाणार होते. या प्रदर्शनामध्ये निवडक स्वयंसेवक हवे होते. त्यामध्ये माझ्या नशिबाने माझी निवड झाली. सहाजिकच तीन दिवस झालेल्या त्या सुखद सोहळ्याला मला जातीने उपस्थित राहता आले.

आधीच मराठी माणूस नाट्यवेडे, त्यातून हा असा कधी मधीच येणारा योग. त्यामुळे अवघ्या रुपारेल परिसराला नाट्यपंढरीचे स्वरुप आले होते. मला आठवते, नाट्यसंमेलनाची व्यवस्था कशी झाली आहे, हे जातीने पाहण्यासाठी या नाट्यसंमेलनातचे नियोजित अध्यक्ष स्वरराज छोटा गंधर्व आणि स्वागताध्यक्ष पु ल देशपांडे आदल्या रात्री त्या मैदानावर आले होते. त्यांना अगदी जवळून पाहण्याचा मला जो योग आला तो अविस्मरणीयच.

स्वरश्रेष्ठ छोटा गंधर्वांची संमेलनात अवीट गोडीची संगीत मैफिल, तेथे लागून असलेल्या जागेत सर्वांगीण उभी अशी नाट्य रंगमंच रंगभूषा इ.इ. विषयक दोन प्रदर्शने, संगीत नाटकांच्या शतसंवत्सरीनिमित्त सुहासिनी मुळगावकर आणि इतर लोकप्रिय कलावंतांच्या सहाय्याने सादर केलेला शतरंग हा कार्यक्रम अशी काही या सोहळ्याची माझ्या मनात राहिलेली वैशिष्ट्ये. आणि हो, आपल्या नेहमीच्या व्यवसायातून अंग काढून संध्याकाळ रात्रीचा वेळ नाट्यवर्तुळात मला घालवायला मिळाले हा प्रमुख फायदा. अनेक नाट्य निर्मात्यांच्या कलकारांच्या बरोबर संवाद करण्याची संधी मला मिळाली.

गेल्या वर्षात तिसरा टप्पा म्हणजे
राजा शिवाजी विद्यालयातील संगीत नाटकांची शंभरी पूर्ण झाल्याबद्दल भव्य पटांगणात झालेला आठ संगीत नाटकांचा अविस्मरणीय नाट्योत्सव! मुंबईच्या गुलाबी थंडीची चाहूल त्यावेळी या सोहळ्याला लाभली होती. पहिल्या दिवशी माननीय मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. याप्रसंगी वरुणराजाने प्राजक्तांच्या फुलासारखी नाजूक बरसात करून निसर्गाची पसंतीची पावती जणू या सोहळ्याला प्रदान केली.

छोट्या गंधर्वांची दोन सदाबहार नाटके: मृच्छकटिक, संगीत सौभद्र हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण होते. बेस्टने आपल्या नांवाला साजेशी अशी उत्तम बससेवा रात्रीच्या नाट्य प्रयोगानंतर उपलब्ध केल्यामुळे खराखुरा नाट्यप्रेमी अगदी मुक्त मनाने सामील होऊ शकला. चार पाच हजाराच्या आसपास असा प्रेक्षकवर्ग रात्रीचे अडीच तीन रोजच नाट्यप्रयोग संपेपर्यंत हे भाग्यवंत उपस्थित राहू शकले त्यामुळे. खरोखरच त्यांचा आनंद काय वर्णावा?

श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा प्रवेश छोटा गंधर्व व आशालता यांनी इतक्या बहारीने सादर केला की काय सांगू ! आयुष्यात अशा सुसंधी फारच मोजक्या वेळा येतात एवढेच काय ते मी म्हणेन. इतर सहा नाटके अशी होती: संगीत संशयकल्लोळ, स्वयंवर, मानापमान, शारदा होनाजी बाळा आणि एकच प्याला. मराठी संगीत रंगभूमीवरील नामवंत अशा सर्वच कलावंतांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. ह्या सोहळ्याला मध्यंतराचे वेळी आपल्या आवडीचे नट आणि अभिनेत्री अगदी जवळून पाहण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा, अनेक दिवसांनी कॉलेजच्या गॅदरींग सारखा खेळकर खोडकर अनुभवही या निमित्ताने
मला आला.

माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या शाळेत मी शिकलो, मॅट्रिक झालो, त्या माझ्या आवडत्या किंग जॉर्ज इंग्लिश स्कूलच्या (आता राजा शिवाजी विद्यालय) आवारात जवळ जवळ दोन तपांनंतर प्रवेश करायची मला संधी मिळाली. केवढा बदल झाला होता, आता त्या आसमंतात! चारी बाजूला चार पाच मजली इमारतींची माळ पसरली होती. आमच्या वेळी मैदानामध्ये एका बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये असलेले गरम गरम बटाटेवडा आणि तिखट तिखट लसणाची चटणी देणारे दिवाडकरांचे कँटीन कुठे लुप्त झाले होते. तिथे चार मजली इमला राहिला होता. तर आमच्या शाळेच्या कौलारू दुमजली इमारतीच्या कोपऱ्यात गॅलरीत असलेली खूप खूप मोठी पितळेची शाळेची घंटाही आता हरवलेली दिसली!

किती काय काय म्हणून स्मृती माझ्या मनात त्यावेळेला चाळवल्या गेल्या. पौगंडावस्थेतील अनुभवांचा उंबरठा मी पुन्हा उघडून पाहिला. त्या क्षणाला मनाच्या आतल्या गाभ्यातून मला एक वेगळीच अनुभूती झाली. हरवल्या बरोबरच काहीतरी अविस्मरणीय गवसलेही होते. संगीताचा नादब्रह्म सामर्थ्यशाली आनंददायी ठेवा मला या संगीत नाट्य महोत्सवाच्या रूपाने सापडला. सुखाची रुपेरी किनार उजळविण्याचे व दुःखाची/क्लेशाची अंधेरी झालर नाहीशी करण्याचे सामर्थ्य संगीताच्या त्या गोडव्यात असते ते मला कळले. तो आनंद आपल्या कंठातून देणाऱ्या नाट्य कलावंताच्या भाग्याचा हेवा मनात ठेवत मी हा सोहळा मनमंजूषेत ठेवला.

गेल्या वर्षातल्या नाट्यक्षेत्रात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संख्यात्मक दृष्ट्या झालेली वाढ. अनेक नवीन नाट्यसंस्था आपल्या नवीन नाटकांसह उदयाला आल्या. त्यामुळे केवळ मान्यवर अशा संस्थांच्या काम उपलब्ध होण्याव्यतिरिक्त विशाल क्षेत्र संबंधित नाटयकर्मींना उपलब्ध झाले. मात्र संख्या वाढली तर निर्मितीचा दर्जा सुधारला, असे मात्र नव्हे. उलट प्रक्षोभक केवळ शरीरवासना चाळवणारे, चावटपणाच्या धाग्यांभोवती गुंफलेले आणि शरीर प्रदर्शनाला महत्त्व देणारी, धंदा या केवळ एका दृष्टिकोनातून बेतलेल्या नाटकांची आंबटशौकी लाटच १९८० मध्ये रंगमंचावर आली. त्यात नाटकात उरलेल्या दोन महत्त्वाच्या विषयांना- कला व विचार यांना स्थान नव्हते. केवळ वासना चाळवणारे काही ही, एवढाच उद्देश जणू या नाटकांचा होता. दुर्दैवाने अशा नाटकांची संख्या त्या वर्षी वाढती होती.

अंतर्मुख होऊन वेळीच नाटकांविषयी प्रेम असणार्या आपण सर्वांनी, गांभीर्याने विचार करण्याजोगा हा विषय आहे. निर्भेळ करमणूक करता करता, एखादा नवा विचार, नवीन मार्ग, नवी दृष्टी न देता, नाटकात काहीतरी भलतंच दाखवणं हे योग्य नव्हे. तशा नाट्यकृतींचा सुकाळ होणे, हे रंगभूमीचे दुर्दैव! हे नको असलेले वादळवारे कुठवर फोफावत जाणार देव जाणे! नाट्यक्षेत्राचा आढावा घेताना मला दिसलेला हा एक विचित्र मैलाचा दगड.

एका मोक्याच्या वळणावरच आज आपली रंगभूमी एका भीषण ज्वालामुखीच्या तोंडाजवळ उभी आहे. त्यातून तावून सुलाखून ती बाहेर कशी पडते, ते येणारा काळच सांगेल. या अंधारात काजवा चमकावा, वादळात मार्ग दिसावा असा गेल्या वर्षी आलेल्या काही नाट्यकृतींच्या रूपाने जरूर आशावादाचा अंकुर मनात उपजला आहे. धंदा कला आणि विचार या त्रिमूर्तींचा थोडासा कां होईना विचार करणारी मोजकी नाटके १९८० साली रंगभूमीवर आली, हेच त्यातले भाग्य.

सुधाकर नातू

ता.क.
हा लेख "रोहिणी मासिक-फेब्रुवारी१९८१" अंकात प्रसिद्ध. तो येथे पुनःप्रकाशित केला आहे.

ह्या शिवाय......

माझा you tube channel
moonsun grandson
त्यावर एकसे बढकर एक मार्गदर्शक व प्रेरणादायी अनेक विडीओज् ........

आजच ही लिंक उघडा...........
शेअरही करा........

https://www.youtube.com/user/SDNatu

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

"टेलिरंजन: काही ही हं" ! भाग२:

 "टेलिरंजन: काही ही हं" ! भाग२:


टीव्हीवरील मालिका नेहमी तेच तेच घीसेपीटे फॉर्म्युले वापरतात असे दिसून येते.

त्यातील एक:
आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या जोडीदारा बद्दल नेहमी असूया तिटकारा बाळगून, ते दोघे दूर कसे होतील, अशा तऱ्हेचे कारनामे येथील संभाव्य वा सांप्रतच्या सासूबाई नेहमी करत असताना दिसतात. उदाहरणार्थ "माझा होशील ना?" या मालिकेमध्ये आपली लाडाची मुलगी सई आणि आदित्य एकत्र येऊ नयेत आणि सईने श्रीमंत डॉक्टर सुयश पटवर्धन बरोबर लग्न करावे, म्हणून तिची आई कायम काहीना काहीतरी आटापिटा करते. शेवटी तर तिची इतकी मजल जाते की, आपल्या मुलीला असाध्य रोग आहे अशी थाप मारून, सईने डॉक्टरशीच विवाह करावा असा प्रयत्न करायला आदित्यला भाग पाडते! तिच्या मनात कोण आहे ह्याची ह्या आयांना फिकीर नसते. हम करे सो कायदा!

अगदी तशीच गोष्ट आपल्याला इतर मालिकांमध्येही दुर्दैवाने पाहावी लागते. "रंग माझा वेगळा" मधली माजखोर आई सौंदर्या इनामदार काळ्या रंगाचा कां इतका पराकोटीचा दुस्वास करते कुणास ठाऊक. त्यामुळे आपला चांगला डॉक्टर मुलगा कार्तिक आणि त्याच्यावर प्रेम करणारी काळी दीपा, हे नेहमी दूर राहतील, असा प्रयत्न करत राहते. परंतु अखेर त्यांचा विवाह करून द्यावा लागतो. तो विवाह मोडावा म्हणून, ऐन लग्नाच्या वेळी तिने केलेला भयानक प्रकार कोणालाही राग यावा असाच होता. गंमत अशी की दीपाची सावत्र आई राधाई ह्या कटु कारस्थानांत सामील होते !

दीपा व डॉ कार्तिक ह्या दोघांचा विवाह झाल्यावर सुद्धा सौंदर्या, कार्तिकच्या जीवाला धोका आहे, असे एका 'विकत' घेतलेल्या ज्योतिषाकर्वी सांगून दीपाला आणि त्याला दूर करायचा आटोकाट प्रयत्न आई सौंदर्या करत राहते! "जीव झाला वेडा पिसा" मध्ये देखील अशीच कहाणी पहायला मिळते. नायक शिवा आणि त्याची पत्नी सिद्धी यांनी वेगळे व्हावे, घटस्फोट द्यावा म्हणून त्याची आई, काका आणि गांवची बिलंदर पुढारी असलेली आत्याबाई देखील अशाच कारवाया करत असतात.

वर्तमानांतीलच नव्हे तर ऐतिहासिक घटनांवर आधारित "स्वामिनी" मालिकेमध्ये देखील आई पेशवीणबाई, गोपिकाबाई आपल्या मुलाचा माधवरावांचा त्यांना पसंत नसलेला विवाह
रमाबरोबर नाईलाजाने झाल्यावर, ती दोघं दूर कसे रहातील, अखेर विभक्त कसे होतील आणि त्याचे दुसरे लग्न कसे करून देता येईल, ह्याची चिंता करत विविध उचापती करत असलेल्या दिसतात. म्हणजे आईने आपल्या मुलांच्या मनाची, त्यांचे कुणावर खरे प्रेम आहे, त्याची पर्वा न करता आपल्याला योग्य वाटते तसंच व तेच करत राहायचं, करण्यात हा काय अनिष्ट प्रकार?
बहुतेक वेळा अशा आयांना वा सासूबाईंना आपल्या मुलाचा किंवा मुलीचा जोडीदार हा नेहमीच नावडता असतो ही त्यातली समान बाजू.

मालिकांच्या दुसरा फाँर्मुला:
बनेल पती-सीधीसाधी पत्नी आणि वो-त्याची छचोर प्रेयसी हा प्रेमाचा त्रिकोण. हा प्रकार इतका गुळगुळीत झालाय, अक्षरशः सगळ्यांना कंटाळा, वीट यावा इतका जर कुठे ताणला जात असेल, तर तो म्हणजे, "माझ्या नवऱ्याची बायको" मध्ये! इथे बिनदिक्कत कहरच केला जात आहे. प्रथम पत्नी राधिका, नंतर शनाया त्यानंतर माया अशा एकामागोमाग एक, बायका व माशुका बदलून गुरुनाथचे चाळे चालू आहेत, ते खरोखर
नालायकपणाचा कळस आहेत. समाजापुढे कुठला आदर्श या मालिका दाखवतात, ते त्यांचे त्यांनाच जाणे.

तोच त्रिकोणी अभिलाषेचा प्रकार एक ग्रामीण वातावरणात आणि तर दुसरी शहरी, अशा दोन मालिकांत दिसतो. "लग्नाची बायको आणि वेडिंग वाईफ" असे उघड उघड विवाहबाह्य प्रेमाचे समर्थन करणार्या मालिकेमध्ये, फाँरेन रिटर्नड (टँक्सी ड्रायव्हर) मदन चक्क आपल्याबरोबर आणलेली (प्रेयसी) म्हणजे इंग्लंडची राजकुमारी आहे, अशी थाप मारून तिला आपल्याच घरी काय आणतो आणि कुटुबियांच्या गांवकर्यांच्या डोळ्यात धूळ फेकून त्या प्रेयसीबरोबर चक्क लग्नही काय लावून घेतो! त्याची भोळीभाबडी पत्नी काजोल इतकी बावळट कशी, असाच आपल्याला प्रश्न पडत राहतो. त्यांचे इतर कुटुंबीयही मदनच्या कायमच विश्वास ठेवत राहतात. हा ग्रामीण प्रकार झाला.

अगदी तसाच प्रकार सध्या गाजत असलेल्या "आई कुठे काय करते?" ही बाकीदृष्ट्या चांगली कौटुंबिक मालिका शोभावी अशी मालिका असूनही, इथे खलनायक छुपा रुस्तुम अनिरुद्ध आपल्या भोळ्याभाबड्या बायकोला अरुंधतीला न कळू देता, ऑफिसमधल्या संजना बरोबर दहा वर्ष विवाहबाह्य संबंध ठेवतो. एवढेच नाही तर, नंतर तिच्या आग्रहाने चक्क संजनाशी लग्न करायला तयार होईपर्यंत त्याची मजल गेली आहे! आश्चर्य हे की ह्या लंपट मतलबी, तीन तरुण अपत्यांच्या बापाला एवढा आत्मविश्वास आहे, की तो त्याच्या बायकोला पटवू वा गुंडाळू शकेल!

"सुखांच्या सरींनी मन बावरे" या मालिकेत तर हे दोन्ही फॉर्मुले वापरलेले दिसतात. उद्योजिका श्रीमती सत्यवादीबाईसाहेब, आपल्या मुलाचा सिद्धार्थचा विवाह अनु बरोबर होऊ नये म्हणून प्रचंड जंग जंग पछाडत रहाते, परंतु
त्यात त्यांना यश येत नाही. नंतर विवाह होण्या आधी, नंतर हे दोघे वेगळे व्हावे, म्हणून चक्क विवाहापूर्वी अनुकडून सहा महिन्याने घटस्पोट देण्याचे कागदपत्र ही बाई तयार करते. नंतर त्रिकोणाची प्रेमाच्या-एक तर्फी प्रेम इथे अर्थात हे सानविच्या वेगवेगळ्या खलनायकी कृत्यांमुळे पुढे येते. सिद्धू आणि अनु यांनी वेगळे व्हावे आणि आपण सिद्धुला मिळवावे म्हणून ही तरुणी कदाचित वेडसर असावी मनोरुग्ण असावी, अशा तर्‍हेच्या अनेक कृत्यांनी मालिका भरून टाकते

प्रेमत्रिकोण संकल्पनेचे हे सगळे आणि अत्यंत अश्लाघ्य असे अवतार मालिकांना पूर्व नियंत्रण वा सेन्सॉरशिप नाही म्हणून बिनधास्तपणे दाखवले जातात. हे मालिकांमधील प्रकार बघून वाटतं की आपण कुठे चाललो आहोत? कदाचित चंगळवादी सध्याच्या समाजाची एकंदर नीतिमत्ता पूर्वीसारखी राहिलेली नसल्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी चालू शकतं, असाच समज अशा मालिकांवरून होतो. सहाजिकच आंबटशौकीन प्रेक्षक जोपर्यत हे स्वीकारत काय राहतात, तोपर्यंत पाणी घालत राहिलेल्या या मालिकांचे इमले उभे राहतील. परंतु कधीकधी इतका कळस होतो की मजल्यावर मजले घडवणाऱ्या मालिका शेवटी कंटाळवाण्या होऊन हा सारा खेळ फसतो.

दूरदर्शन अर्थात टीव्हीसारखे माध्यम कसे वापरू नये याचा जणू काही वस्तुपाठच इथे नेहमी गिरवला जातो आहे, हे कितपत योग्य? ह्यासाठी म्हणायचे:
"टेलिरंजन: काही ही हं" !

सुधाकर नातू

ता.क.
"१ रंगभूमी-रसिकांना आत्मानंद देणारा अपूर्व त्रिवेणी संगम".....
२ "तुझे आहे तुजपाशी":
जे आपल्याजवळ आहे त्यांत समाधान मानायला कां हवे ते चटका लावणारा विडीओ....
३ "आशावादी रहा, हेही दिवस जातील, ही खात्री बाळगा."....
४ "सोशल मिडीयावरील सहभाग कशासाठी, कुणासाठी हा अट्टाहास?.....
५ "माणसं वाचायला शिका........
६ "जीवनातील ताणतणाव घालविण्यासाठी एक व्यावहारिक गुरुमंत्र......
७ "वैयक्तिक विकास आत्मप्रेरणेसाठी सुलभ मार्गदर्शन.....
हे व असेच चाळीसहून अधिक एकसे बढकर एक विडीओज् पहाण्यासाठी.........

माझा you tube channel
moonsun grandson

आजच ही लिंक उघडा...........
शेअरही करा........
moonsun grandson
open the link.....

https://www.youtube.com/user/SDNatu

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

"फोनचे धक्के!":

"फोनचे धक्के"!: ---------------------;;;---------;;;------- फोन आल्यावर समोरून कोण बोलत आहे हयाची खात्री न करता एकदम बोलत सुटणे किती चुकीचे व धोकादायक असते, त्याचा मी काही दिवसांपूर्वी एक अनुभव घेतला होता. त्याचे झाले असे : मला फ़ोन आला व आवाजावरून तो ओळखीचा वाटला आणि मी अघळपघळ बोलू लागलो. पण ती समोरची व्यक्ती अनोळखी निघाली आणि मला खजील व्हायला झाले. Sorry म्हणत मला तिची क्षमा मागावी लागली. तेव्हापासून फ़ोन आला की, प्रथम आपण आपले नांव सांगावे, नंतर आपण कोण बोलत आहात ते विचारावे, आपले काय काम आहे, वा आपण फोन कां केलात ते कृपया सांगता कां असे विचारावे, हाच धड़ा मला मिळाला! ह्याहीपेक्षा चमत्कारिक व क्लेशकारक अनुभव, जेव्हां आपण एखादा फोन पुष्कळ दिवसांनंतर आपल्याच कुणा परिचीताला करतो, तेंव्हा येऊ शकतो. सुमारे २५/३० वर्षांपूर्वीचा हा अनुभव आहे. तेंव्हा घरी फोन मिळण्यासाठी खूप प्रतिक्षा करावी लागे आणि एकदा कां तो फोन आला की, कुणाकुणाला फोन करूं असे होत असे. घरी नवीन फोन आल्याने, एकामागोमाग मी असेच फोन करत असताना, मला माझ्या बरोबर असलेल्या काॅलेजमधील एका मित्राची आठवण झाली. तिथे फोन लागल्यावर मी 'मि.+++ हे आहेत कां?' अशी विचारणा केली मात्र, तो फोन घेणार्या महिलेच्या रडण्याचाचा आवाज़ ऐकू येवू लागला. हुंदके देत ती म्हणाली "ते, माझे यजमान, काही दिवसांपूरवीच एका आॅपरेशनचे वेळी ते मरण पावले". हे ऐकताच माझा नवीन फोन घरी आल्याचा आनंद कुठल्या कुठे उडून गेला आणि मी जवळ जवळ कोसळलोच. दुसरा असाच विचित्र अनुभव दिवाळीच्या शुभेच्छा पाठविताना मला आला होता. नेहमी प्रमाणे अनेकांना मी तसे ई मेल पाठवले होते. प्रथेप्रमाणे त्यांची उलट शुभेच्छा देणारी उत्तरे येत होती. पुष्कळ दिवस झाले तरी एका जेष्ठ परिचिताकडून काहीच उत्तर न आल्याने मी चिंतेत होतो. थोड्या दिवसांनंतर त्यांच्या मुलाचा मला मेल आला आणि मला अक्षरशः धक्काच बसला: त्या जेष्ठाच्या पत्नीचे नुकतेच एका भीषण अपघातांत निधन झाले होते. त्यामुळे मला इतके दिवस मला पोच दिली गेली नवहती; वाटले, आपण आनंदात, तर ज्यांच्याकडे आपण तो व्यक्त करू पहातो, तो अशा दु:खांत असताना त्यांना काय यातना, कळत न कळत आपण दिल्या. तिसरा अनुभव ह्याहूनही अधिक भयानक होता. असाच पुष्कळ वर्षानी मी एका शहरात कामासाठी गेलो होतो. कामे आटोपून सायंकाळी त्या शहरातील ओळखीच्या मंडळींशी बोलायचे मी ठरवले आणि अचानक मला मि@@@ हयांची आठवण झाली, हे महाशय काही वर्षांपूवीॅ आमच्याच शहरात आमच्या परिसरांत रहात होते, एक खेळकर, हौशी व सर्वांना आपलेसे वाटणारे कर्तबगार व्यक्ति होतें. आमचे शहर सोडून त्यांना त्या शहरात येवून बहुधा पुष्कळ वर्षें झाली होती. त्यांची विचारपूस करावी, ह्या हेतूने मी त्यांचा फोन नंबर शोधला व तेथे फोन केला. फोनवर एका तरूणाचा आवाज़ ऐकू आला. पण मला जे ऐकायला मिळाले, ते भयंकर होते. तो तरूण त्यांचाच मुलगा होता. तो सागत होता "Sorry, मला सांगायला खूप दु:ख होते की माझे बाबा आता ह्या जगांत नाहीत, त्यांनी काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली" डोके बधीर करणारी, मन कुंठीत करणारी ती बातंमी होती. अशा समंजस, हुशार व हरहुन्नरी माणसाने आत्महत्या करावी, हा धक्का सहन न करता येणारा होता. मी करायला काय गेलो होतो आणि झाले होते हे असे भलतेच विपरीत व अतर्क्यच वास्तव हे कल्पनेपेक्षाही भयंकर व चमत्कारिक असते, हेच खरे! सुधाकर नातू ता.क. हा लेख कसा वाटला ते प्रतिसादात अवश्य सांगा. असेच वैविध्यपूर्ण अनुभवण्यासाठी. "१ रंगभूमी-रसिकांना आत्मानंद देणारा अपूर्व त्रिवेणी संगम".... २ "तुझे आहे तुजपाशी": जे आपल्याजवळ आहे त्यांत समाधान मानायला कां हवे ते चटका लावणारा विडीओ... ३ "आशावादी रहा, हेही दिवस जातील, ही खात्री बाळगा.".. ४ "सोशल मिडीयावरील सहभाग कशासाठी, कुणासाठी हा अट्टाहास?.... ५ "माणसं वाचायला शिका........ ६ "जीवनातील ताणतणाव घालविण्यासाठी एक व्यावहारिक गुरुमंत्र..... ७ "वैयक्तिक विकास आत्मप्रेरणेसाठी सुलभ मार्गदर्शन..... हे व असेच शंंभराहून अधिक एकसे बढकर एक विडीओज् पहाण्यासाठी....... माझा blog ची ही लिंक उघडा...संग्रही ठेवा.... www.moonsungrandson.blogspot.com माझा you tube channel moonsun grandson आजच उघडा... शेअरही करा........ <

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

"टेलिरंजन-१-काही ही हं"!:

  "टेलिरंजन-१-काही ही हं"!:


"अग्गबाई सासूबाई" मालिकेने तर सुरूवातीपासूनच "काही ही हं, दाखवण्याचा जणु चंगच बांधला आहे. झट मंगनी पट ब्याह करून कुळकर्ण्यांची आगाऊ सून ग्रहप्रवेश करण्यापासून "काही ही हं" प्रसंग दाखवण्याचा सिलसिला जो सुरू, तो तसाच आताही नव्या वेडेपणाने सुसाट चालूच आहे.......

उच्चभ्रू सोसायटींतील पाच सहा बायका नटून थटून, एकत्र माँलमध्ये शाँपिंगला न जाता, चक्क भाजी आणायला बाजारात काय जातात.....अन् तिथे शेफ अभिजीतच येऊन योगायोगाने चक्क एक भाजीविक्रेता काय बनतो....मेचक्या तिथेच, हे महिला मंडळ वाटेतल्या इतर कोणाकडे न जाता, भाजी खरेदीसाठी काय जाते....काही ही हं!

असावरी व शेफ अभिजीतनी "काही ही हं" करून एकत्र यावे म्हणून, घरातला सासरा गांवी, सून कंपनीच्या कामासाठी लोणावळ्याला आणि त्याच दिवशी मुसळधार पावसाचे थैमान अन् सोहमचे घरी न जाणे.... एकट्या असावरीला अशा वेळी ना शेजारी पाजारी, ना जवळचे नातेवाईक वा ना सोहमचे मित्र ह्यांची आठवण येतच नाही, मेचकी शेफसाहेबांचीच मदत घ्यावी लागणे, हे सारे "काही ही हं"!....

नंतर एक ओढून ताणून एकदाची घोडनवरी बनणार्या असावरीला आपल्या मुलाचा ना मोबाईल नंबर ठाऊक ना त्याच्या आँफीसचे नांव पत्ता इ.इ. माहिती....मुलगा सोहम इतका बेपर्वा की मित्राकडे गेलोय हे सांगतही नाही....अन् ही जगावेगळी आई त्याला एखाद्या कुक्कूलं बाळ असल्याप्रमाणे बबड्या बबड्या काय संबोधते.... (सारे काही चिड आणणारे, बुद्धीला न पटणारे) सारं "काही ही हं"!....

इतके बाष्कळपणाचे पोरकट खेळ झाल्यानंतर असावरी अभिजीत राजेंच्या विवाहानंतर, खरं म्हणजे "अग्गबाई सासूबाई" ही मालिका बंद करून टाकायला हवी होती, नाहीतरी लाँकडाऊनचा मुहूर्त लाभला होताच की! परंतु करणार काय? जित्याची खोड! पाणी घालून मालिका कशाही पुढे नेत राहायच्या, हा तर गुरुमंत्र आहे सर्वांचा. त्यामुळे बबड्या बबड्या करणाऱ्या असावरीचा पोरकटपणा मागे पडून आता ह्या खलनायकी बबड्याला पुन्हा काम करायला आणि मार्गावर आणायला, जे काही खुळचट कारनामे व बालीशपणा अभिजीत राजे आणि इतरांचे चाललेत, ते पाहून हसावे की रडावे कळत नाही.

प्रेक्षकांनी नेहमी कदाचित डोके गहाण ठेवून मालिका बघाव्यात अशीच सर्वांची इच्छा दिसते. तशीच मारुतीच्या शेपटासारखी लांबत चाललेली आणि अक्षरशः उबग आणणार्या "माझ्या नवऱ्याची बायको" मध्ये शनाया, मायाच्या पाठोपाठ पिंकीच्या रूपाने पांचटपणाची जी हद्द होत आहे, ती पाहून, ह्या दोन्ही मालिका खरं म्हणजे ताबडतोब बंद करून एखादी नवीन ठराविक भागांची चांगले परिणामकारक कथानक असलेली मालिका आणण्याचा शहाणपणा ह्या वाहिनीकडून दाखवला जावा, हीच अपेक्षा.

जी कहाणी ह्या दोन मालिकांची, तीच "तुझ्यात जीव रंगला" ची, तीच " जीव झाला वेडा पिसा" ची, तीच अनु सिद्धार्थच्या " मन बावरे" ची...आणि बहुधा सगळ्याच मालिकांची.....खरं म्हणजे लाँकडाऊनमुळे तीन साडेतीन महिन्यांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर ह्या बहुतेक सर्व जुन्या जीर्ण शीर्ण खोडांना कायमची रजा देऊन पुनश्च हरी ओम् करत नव्या कल्पनांच्या नवनवीन मालिका वाहिन्यांनी सादर कराव्यात अशी अपेक्षा होती..पण सारेच मुसळ केरांत. म्हणून तर वेळ भरुन काढण्यासाठी होणार सून...व चार दिवस सासूचे ह्या पुराण्या मालिकांचा पुनर्जन्म घडवून आणला. उत्तमोत्तम कथा कादंबर्या नाटके चित्रपट इतकेच काय गाजलेल्या मालिका असा इतिहास असतानाही आज करमणूक क्षेत्रांत कल्पनादारिद्र्याची इतकी परिसीमा यावी ह्यापरते दुर्दैव कोणते?

कारण सगळ्यांनी मालिका पाहून, " काही ही हं" म्हणावं ही स्पर्धाच जणु ईडियट बाँक्सवर चालू होती, चालू आहे आणि चालूच रहाणार आहे!

हे म्हणजे अगदीच "काही ही हं!"

सुधाकर नातू
ता.क.१
त्यातले त्यात सोनी व स्टार प्रवाह ह्या वाहिन्या वेगळी वाट धरत आहेत हेच एक समाधान.

येथपर्यंत आल्याबद्दल आभार. ह्या लेखावरील तुमच्या प्रांजल प्रतिसादाची मी अपेक्षा ठेवतो.

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.२
माझा you tube channel
moonsun grandson
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........

https://www.youtube.com/user/SDNatu

शिवाय....
२०० हून अधिक असेच खुसखुशीत व वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com

दोन्ही लिंकस् सेव्ह करा...शेअरही करा....

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

"वाचा, फुला आणि फुलवा-८":

"वाचा, फुला आणि फुलवा-८":
"शब्द रुची" दिवाळी अंक'१८":

महान चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर ह्यांच्या जगमान्य योगदानाचे चित्र मांडणारा लेख
श्री. रंजन जोशी ह्यांनी ह्या अंकात लिहीला आहे.
त्यामध्ये त्यांनी विविध बिरुदे आणि त्यामागील सामाजिक मानसिकता ह्यांचा समग्र वेध घेतला आहे, तो नोंद घेण्याजोगा आहेः

"विविध बिरुदे आणि सामाजिक मानसिकता":

'अठराशे तीस नंतरच्या काळात रावबहादुर, लोकहितवादी, न्यायमूर्ती, महात्मा आणि लोकमान्य ही बिरुदे लोकोत्तर व्यक्तींना दिली जात असत. लोकहितवादी देशमुख हे इंग्रज सरकारच्या नोकरीत असून भारतीय समाजाला इंग्रजी राजवटीत आलेला आधुनिक विचार मानणारे होते. भारतीय रूढीग्रस्त मानसिकता त्यामुळे नाही शी होईल अशी त्यांची धारणा होती. महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी राजवटीचे समर्थक होते कारण भारतातील हजार वर्षे चार वर्ण आणि जातीव्यवस्थेचे उच्चाटन होऊन शूद्र म्हणून हिणवला गेलेला कष्टकरी मुक्त होईल, या हेतूने त्यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली. त्यातूनच लोकांनी महात्मा हे सन्माननीय विरोध त्यांना दिले. कोल्हापूरचे शाहू महाराज प्रजाहितदक्ष राजा म्हणून ओळखले गेले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे ब्रिटिशांच्या नोकरीत होते, तरी त्यांचे भारतीय समाज सुधारणांचे प्रामाणिक प्रयत्न लोकांनी अनुभवले. ते सर्वार्थाने न्यायमूर्ती म्हणून ओळखले गेले.

लोकमान्य हे बिरूद बाळ गंगाधर टिळक यांना लोकांनीच लावले, कारण ते कष्टकरी तसेच अगदी सुशिक्षित वर्गात देखील देशपातळीवर स्वातंत्र्य चळवळीचे नेते मानले गेले. समाजसुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर ओळखले गेले. महर्षी म्हणून धोंडो केशव कर्वे यांच्या शिक्षण देण्याच्या कार्यामुळे समाजाने दिले.

महात्मा गांधी अहिंसावादी सामाजिक व राजकीय विचारांच्या धोरणांनी नवयुगाची सुरुवात करणारे म्हणून त्यांची जागतिक पातळीवरही घेण्यात आली. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन करणारे म्हणून मान्यता पावले. अशी काही बिरुदे देशप्रेम व स्वातंत्र्य चळवळीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील लोकनायक जयप्रकाश नारायण अशा पद्धतीने मान्य झाले. नंतरच्या काळात ह्रदयसम्राट हे बिरूद उदयाला आले."
-------------------------

रावबहादुर आणि थोर चित्रकार महादेव धुरंधर यांचा व्यक्ती म्हणून आणि चित्रकलेचा एक महान उपासक म्हणून, आपण संशोधनपूर्वक, अत्यंत अभ्यासपूर्ण असा जो हा लेख लिहिला आहे, तो खरोखर एखाद्या डॉक्टर पीएचडी साठी लिहिलेल्या प्रबंधाचा जणू सीनाँपसिस अथवा सारांश असावा इतक्या दर्जाचा झाला आहे. माहितीबरोबरच त्यांनी चितारलेली विविध पद्धतीची अशी प्रत्यक्षदर्शी चित्रे, आपण या लेखासोबत दिली आहेत. त्यामुळे या लेखाची शोभा वाढून दर्जा उच्च झाला आहे.

चित्रकला हा खरं म्हणजे आमच्यासारख्या सामान्यांच्या दृष्टीने एक ऑप्शनला टाकू शकणारा विषय. पण त्याचे इतके काही संदर्भ, रूपे आणि प्रकार असू शकतात, हे आम्हाला त्यामुळे कळले. शेवटी चित्रकार आणि लेखक यांच्यात काहीतरी साम्य आहे आणि तेही एक लेखक म्हणून मी जाणू शकतो. ही चित्रे जेव्हा त्यांनी काढली असतील, तेव्हा विचारांची त्यामागे बैठक मजबूत असणार, एवढे निश्चित. एक वाचनीय आणि चित्रकलेबाबत संपूर्ण नवी दृष्टी देणार्या, या
लेखाबाबत लेखकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
--------------------------
"शब्द रुची" दिवाळी अंक'१८ मधला श्री. दिलीप पांढरीपट्टे ह्यांचा "नव्या वाटा, नवे ठसे हा लेख वाचला आणि त्यांनी आपल्या जीवनप्रवासाची विशेषतः साहित्यिक आणि शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीचा लेखाजोखा अगदी मोजक्या शब्दात येथे मांडला आहे. गझल पासून सुरुवात करून विविध साहित्यिक योगदानाप्रमाणे, शैक्षणिक आणि व्यावसायिक अधिकारपद त्यांनी मिळवल्याचे त्यावरून समजले.

असाच आपआपल्या क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा संक्षिप्त आढावा ह्या अंकात रत्नाकर मतकरी, डॉक्टर अविनाश सुपे, रामदास भटकळ यांनी देखील घेतला आहे. त्यामुळे आपल्याला माणूस कसा असतो आणि तो अंगभूत गुणांच्या आणि परिश्रमांच्या जोरावर आपल्याला आवडीचे असे क्षेत्र कसे निवडतो आणि त्यामध्ये आपले गुण प्रदर्शित करत मान्यता कशी मिळवतो ते समजते त्यामुळे विविध अशा क्षेत्रांची तर माहिती होतेच परंतु त्या त्या लेखकाच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात आपल्याला प्रत्यवाय येतो.
-----------------------------------------------
"कल्पनाशक्तीची व्यायामशाळा !":

मी whatsapp व फेसबुक हे सोशल मिडिया म्हणजे कल्पनाशक्ती व्रुद्धिंगत करणारी व्यायामशाळाच आहे, असं मानतो. त्यांत मी नवनवीन कल्पना विचार व दिशा मांडत असतो.
एखाद्या मातेला जसे आपले मुल, सर्वगुणसंपन्न आहे असेच वाटत असते, त्याप्रमाणे मलाही माझी ही कल्पनांची भरारी नेहमी प्रिय भासते....

# "बिचारी लाचारी":
स्वाभिमानाच्या राणा भीमदेवी थाटात, विरोधी वल्गना करत, लाचारी एकदा स्विकारली की, ती सुटता सुटत नाही.

आपल्या अकार्यक्षमतेची आपणच दिलेली ती कबुली असते. परिस्थितीवर धैर्याने मात करणं आपल्याला अशक्य असल्याची ती दवंडी असते.

लाचारांची जागा, नेहमीच घराबाहेर असते.

# जे सुधारणे आवश्यक व शक्यही आहे,
अशा मुद्दयांवर
"सोमि" मध्ये विधायक संदेश प्रदर्शित करणे, सार्वजनिक हिताचे द्रुष्टिने गरजेचं आहे.

# विभूतीपूजा व सरंजामशाही ही आपली पूर्वापार अटळ अढळ परंपरा (समस्या?) आहे.
राजकारण त्यात अपवाद अशक्यच !

# सार्वजनिक ठिकाणी बिनदिक्कतपणे धुम्रपान करणारे, आपल्या आनंदासाठी इतरांच्या आरोग्याची हानी कां करत रहातात?
कधी व कसे,
ते सुधारणार?

# निष्क्रियता व चालढकलीचे, दुष्परिणाम होतात. 'जेव्हांचं तेव्हा,
ज्याचं त्याला,
जिथली गोष्ट जिथल्या तिथे.'
हा मंत्र नेहमी उत्तम!

# "आज हरलो, पण उद्या जिंकणार नाही कशावरून?"
ह्या जाहिरातीच्या धर्तीवर,
"काल हरलो,
पण आज जिंकणार नाही कशावरून?"

# "घराणेशाही होती, आहे आणि रहाणारच आहे.
अगदी
'घराणेशाहीला नाकं मुरवडणार्यांकडे'ही!"

# ह्रदयी धरा, हा बोध खरा!":
"'मूर्ती' लहान, पण 'कीर्ती' महान": मौलिक विचार!

# "काही मिळवण्यासाठी, काही द्यायलाच लागते, 
मात्र,
काही न देताच, मिळतो, 
तो फक्त जन्म!"

# आपल्यामुळे दुसर्याचे जरी भले करता आले नाही, तरी इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही हे ध्यानात घ्या......

# मन हळवं असावं पण दुबळं नसावं...!
कारण
हळव्या मनास भावना कळतात तर
दुबळ्या मनास नेहमी वेदना छळतात...!*

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
ह्या शिवाय
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट तसेच ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे विडीओज् पहाण्यासाठी........

आजच ही लिंक उघडून......
एकसे बढकर एक विडीओज् पहा.....
subscribe करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

ही लिंंक तुमच्या whatsapp grps वर शेअरही करा.........

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

"फेसबुकवरील 'माझं पान":

 "फेसबुकवरील 'माझं पान":

फेसबुकवर दररोज चौविस तास तेथील पोस्टींग ठेवणारी 'माझी कथा' अशी एक सोय आहे, हे मला त्या मानाने खूप उशिरा समजलं. केव्हातरी 'फेबु' उघडल्यावर मुखप्रुष्ठावर सर्फिंग करताना, फेसबुक'च्या पेजवर एका मराठी अभिनेत्रीचे दररोज वेगवेगळ्या पेहेरावातील फोटो पहायला मिळाले, आपले बदलते आधुनिक रूप अशा तऱ्हेने दाखवण्याची तो प्रयत्न दिसत होता. त्यामुळे मला समजले की ही काहीतरी फेसबुकवर 'माझी कथा' अशी खास सोय आहे, तिलाच मी भक्त ध्रुवासारखे कुणीही हलवू न शकणारे केवळ आणि केवळ माझ्याचसाठी असलेले 'माझं पान' असं समजून तिथे हजेरी लावू लागलो.

नवनिर्मिती करू इच्छिणाऱ्या माझ्या सारख्या माणसाला "सोशल मीडिया" ही एक प्रतिभाशक्तीची जोपासना करणारी जणु एक Gymnasium च आहे, असे मी समजत असल्यामुळे 'माझं पान' ही एक आव्हानात्मक संधीच होती. चांगल्यात चांगलं सर्वोत्कृष्ट असं आपलं मनातलं, येथे मी तेथे अधूनमधून शब्दरूप विचार सादर करू लागलो. तर कधीमधी प्रसंगानुरूप योग्य ती आकर्षक शीर्षके देऊन माझे छायाचित्र देऊ लागलो. पहाता पहाता "माझं पान" ही मला एक प्रेरणादायी अशी कल्पक दौड वाटू लागली.

त्यातून एकदा लक्षात आले की, इथे किती जणांनी विहीत चोवीस तासात हजेरी लावून आपली निर्मिती पाहिली, याची नोंद समजू शकते. त्यामुळे 'बेटर दँन द बेस्ट' अशा हेतूने दररोज आपल्या views चा-वाचटहजेरी संख्येचा आंकडा कसा वाढत जाईल यासाठी मी प्रयत्न करू लागलो. एकदा तुम्हाला अशी ईर्षा निर्माण झाली की उत्तरोत्तर अधिकाधिक चांगलं काहीतरी द्यावं असं वाटू लागतं.

मी स्वतः काही सेलिब्रिटी नाही. त्यामुळे माझा तो आंकडा "वाचकहजेरी" चा त्यांच्यासारखा कदाचित चार आकडी होणे अशक्य आहे, याची मला जाणीव आहे. परंतु उत्तरोत्तर माझी त्या दिशेने प्रगती सुरू आहे. प्रथम मी फक्त माझ्या स्नेह वर्तुळासाठी, फेबुवरील 'माझं पान' बघण्याची सोय उपलब्ध करून देत होतो हे माझ्या लक्षात आलं. त्यानंतर आता सर्व साधारण सर्वांना अशा तर्हेची निवड मी केल्यापासून निदान तीन आंकड्यांचा मैलाचा दगड गाठण्याची वेळ कदाचित दूर नसेल. या प्रयत्नांचा अजून एक फायदा मी करून घेणार आहे. भाग घेतल्यापासूनचे इथे मी जे जे काही सादर केले, त्यातील उत्तमातील आपले उत्तम निवडून मी माझ्या आगामी दिवाळी अंकात एक लेख लिहीणार आहे.

हळूहळू मला लक्षात आले की फोटोच जास्त मंडळी बघतात. तेवढे विचार शब्दबद्ध असलेले काही वाचण्याचा त्रास सहन करत नाहीत. कदाचित यामध्ये वेळेचा चांगल्यापैकी उपयोग होऊन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आस्वाद घेता येऊ शकतो हे कारण असू शकेल. A picture is better than a thousand words असं उगाच कुणी म्हणत नाही. शब्दबद्ध संदेश हे वाचायला लागत असल्यामुळे यासाठी वेळ बुद्धी व श्रम हे आकलन करण्यासाठी अधिक लागणार हे उघड आहे. सर्वाधिक हजेरी अर्थातच माझ्या तरुणपणच्या चट्टेरीपट्टेरी धर्मेंद्र स्टाईल पँट व रंगीत फुल शर्ट व बुल्गालिन स्टाईल दाढी ठेवलेल्या चित्ताकर्षक फोटोला मिळाले आहेत.

"ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।।"

या मंत्रावरील ध्वनीफितीसंबंधी माझा जो संदेश मी माझ्या पानावर प्रसारित केला * * तो कदाचित ह्या फोटोच्या हजेरीसंख्येला पारही करेल अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे, आज मी उत्साहित होऊन, हे माझे विचार व्यक्त करत आहे. विचारगर्भ शब्दांचे सामर्थ्य त्यातून वादातीत सरस असते, हा माझ्यासाठी एक आंनंददायी अनुभव आहे.

ह्या निमित्ताने एक प्रामाणिक आवाहन असे की, आपणही वेळात वेळ काढून फेबुवरील माझ्या कथेला, नव्हे 'माझं पान' न चुकता पहाच पहा.

धन्यवाद
सुधाकर नातू

* * मंत्राविषयी 'माझं पान'वरील संदेश:
👍👍हा चिरस्मरणीय मंत्र, अर्थासह उलगडून दाखविणारी ध्वनीफित ऐकायला मला नुकतीच मिळाली. ती सादर करणाऱ्या अनाहूत व्यक्तीचे कौतुक वाटले. अभिनंदन.

तसा मी तो मंत्र अनेक वेळा आधी ऐकला होता व आपणही ऐकला असणारच. परंतु त्याचे महत्त्व आणि गांभीर्य मला आजपर्यंत समजले नव्हते. परंतु आज ज्या पद्धतीने ही ध्वनिफीत हया साऱ्या मंत्राचा आणि त्यामागचा गर्भित अर्थाचा उलगडा करते, त्यावरून ह्या मंत्राची मूलगामी महती समजली.

विश्व व विश्वातील जाणीवा असणारे आपण, ह्यांचे अव्याहत प्रवाहित रहाणार्या कालप्रवाहातील अस्तित्वाचे क्षणभंगुरत्व, अधोरेखित करणारा हा मंत्र, चिरशांतीच्या शाश्वतेचा आहे.

"देणार्याने देत जावे, देता देता,
घेणार्याने देणार्याचे हात घ्यावे.!"

सर्वांनी कायम मनात ठेवण्यासारखा हा मंत्र सध्याच्या आव्हानात्मक काळात तर नितांत आवश्यक आहे.

।। 'कालाय तस्मै: नम:'।।

ता.क.
इथपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, मी असेच वैशिष्ट्यपूर्ण लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्टला Share करायला विसरू नका.

असेच चित्ताकर्षक साहित्य आणि तसेच १५० हून अधिक वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com

तसेच
अनोख्या नांवाचा माझा you tube चँनेल:

moonsun grandson

Subscribe करा....
त्याची ही लिंक उघडा....

https://youtu.be/45NFWw1_nLg

अनेक वैशिष्ट्यपूर्ण विडीओज् पहा

लिंकस् संग्रही जरूर ठेवून शेअरही करा.....

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

"आजोबांचा बटवा-१०": "हे प्रणयगंध किती अनंत-४":

"आजोबांचा बटवा-१०":
"हे प्रणयगंध किती अनंत-४":

'मुखवटे आणि चेहेरे':
माणसाला स्वतःला विसरायला लावणारी ही प्रेमभावना. तिच्या विळख्यात प्रत्येकजण केव्हा ना केव्हा सापडत असतो हेच खरे. जगात आपण चाकोरीतून जाण्याकरता मुखवटे घालून नाटकी चेहर्यांनी वागत असतो. पण प्रत्येकाने मनाच्या आरशात डोकावले, तर कित्येकांना लक्षात येईल की अभिलाषेचे अनेक आवेगी तरंग वा कोमल स्नेहमय प्रेमभावनेचे अनेक रंग उधळत असलेले आढळतील. या साऱ्यांचे अर्थ तर्का पलीकडले आहेत, ते गवसता गवसत नाही इतकी ही आपुलकी आणि प्रेमभावना गहन आहे.

संसार अर्ध्यावर होऊन गेल्यावर केवळ विरंगुळा म्हणून शिकायला बाहेर जाणारी उषा, एका प्राध्यापकाचा प्रेमात पडते. तो सुमार रूप असलेला, किडकिडीत शरीरयष्टीचा विश्वास, तिच्याहून दहा वर्षांनी खरं म्हणजे लहान असतो. उषेच्या संपूर्ण समर्पणाच्या एकंदर वर्षावाखाली तो अक्षरशः गुदमरून जात, स्वतःला विसरून जातो. एवढं कशासाठी अभिसारिकेसारखे उषाचे असे वागणे? तिच्याकरता तो स्वतः लग्न न करता चाकोरीबाहेरच्या प्रेमात गुंतून आयुष्य भरकटवत रहातो? याला काय म्हणायचं?

खेड्यात राहून आपल्या मुलांचे भले होणार नाही, अशा विचाराने शिक्षक असलेल्या मनोहरला-आपल्या नवर्याला सोडून, शहरात दूरच्या परिचीताच्या-रघूच्या घरी, त्याच्या आधाराने उभे राहू पाहणारी रागिणी, सहवासात पोटी, त्या परिस्थितीचा गुलाम होऊन जाते. स्वतःच्या नवऱ्याबरोबरचे कधी तरी अधून मधून उपभोग घेणारे क्षण कसेबसे रंगवत राहते. तर दुसऱ्या बाजूला रघूच्या आपल्याबद्दलच्या त्यागामुळे, संपूर्ण मदतीमुळे तिची मुले खूप पुढे येतात. पण त्यांच्या अवैध संबंधांबद्दलचा विखार विसरू शकत नाहीत. शिवाय तिच्या नवऱ्याचा ह्यात काय दोष?

तिसरे उदाहरण, घरी सोन्यासारखी बायको सुस्वरूप सुशिक्षित आणि सुस्वभावी आणि तीन मुले असूनही, प्रौढ वयात, चंचलासारख्या मादक, उच्छ्रुंखल स्रीच्या आहारी जाणारा गणेश, कित्येक वेळा ऑफिसमध्ये न जाता सरळ तिच्या घरी जातो किंवा दौरा आहे सांगून तिच्याबरोबर इष्काची मौजमजा करून परत येत असतो. इथे गणेश स्वतःबरोबर स्वतःच्या बायकोला मुलांनाही फसवत असतो आणि चंचला देखील आपल्या नवऱ्याला.

ही आणि अशी अनेक उदाहरणे आपल्याला प्रेमाच्या गावा जावे तेव्हाच बघायला मिळतात. खरंच ही मदनबाणांची दुनिया अनोखी हेच खरे! माणसाला मन असते, तसेच वासनेच्या आहारी जाणारे शरीरही. मन हे जणू एखाद्या प्रलयकारी महासागरा सारखे असते. पण ह्या अशा जगावेगळी परस्पर आकर्षणाची ओढ कुणाला कुणाबाबतीत होऊन जाईल ते सांगणे कठीण असते.
असे रंगढंग पाहून वाटतंः

"हे प्रणयगंध किती अनंत.....
दोन जीवांचे मिलन ज्वँलंत,
अनंगरंगी हे अनंगरंग....
 हे प्रणयगंध किती अनंत....."

सुधाकर नातू

ता.क.
(ही कथा 'रोहिणी' मासिक जून १९८३ च्या अंकात प्रकाशित)

इथपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, मी असेच वैशिष्ट्यपूर्ण लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्टला Share करायला विसरू नका.

असेच चित्ताकर्षक साहित्य आणि तसेच १५० हून अधिक वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com

तसेच
अनोख्या नांवाचा माझा you tube चँनेल:

moonsun grandson

Subscribe करा....
त्याची ही लिंक उघडा....

https://youtu.be/45NFWw1_nLg

अनेक वैशिष्ट्यपूर्ण विडीओज् पहा

लिंकस् संग्रही जरूर ठेवून शेअरही करा.....

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

"सोशल मिडीया":"प्रतिभाशक्तीची व्यायामशाळा-२!":


"सोशल मिडीया":
"प्रतिभाशक्तीची व्यायामशाळा-२!":

फेसबुक, whatsapp अशी माध्यमे, माणसांतील अंगभूत कल्पनाशक्तीला वाव देत लेखनकौशल्य सुधारण्यासाठी आहेत, असे मी सुरवातीपासून मानत आलो आहे. माझ्याप्रमाणेच, त्यांचा उपयोग अनेकजण आपल्या लेखनगुणांत उत्तरोत्तर उत्तम सुधारणा होण्यासाठीच करताना दिसतात.

माझ्यापुरते बोलायचे झाले, तर मी देखील स्वनिर्मित संदेशच शक्यतो तेथे प्रदर्शित करत आलो आहे. ते मी सोशल मिडीया, म्हणजे
प्रतिभाशक्तीची व्यायामशाळाच आहे असे मानत आल्या मुळेच.

अचानक सहज कल्पना आली की, माझी सोशल मिडीयावर जे विचारगर्भ व कल्पकतेचा आविष्कार असलेले व संवेदनशील व्यक्तींना अंतर्मुख करणारे निवडक कल्पक विचारपुष्पे वाचकांसाठी एकत्रित मांडावित.
ती जरूर अवलोकन कराः

#सोशल मिडीयावरील सहभाग, कसा असावा? तर असा": सोशल मीडियावर विचारपूर्वक कलात्मक भाग घेणे हे एक कौशल्य असते. ते साऱ्यांनाच जमते असे नाही. आपण जे काही पुढे पाठवतो, ते समयोचित आहे ना हे जसे बघायला लागते, त्याचप्रमाणे ते कुणाला कशाकरता पाठवतो, त्यालाही आपल्याला प्राधान्य द्यावे लागते. उगाचच कोणतेही संदेश, कुणालाही कसेही पाठवणे हे योग्य नसते. आलेले वा स्वतःला सुचलेले नवीन विचार, नवीन दिशा, नवीन कल्पना किंवा उपयुक्त व सत्य अशीच माहिती वा आठवणी अथवा संगीत नाट्य नृत्य आदि कलांसंबंधी योग्य ते आविष्कार, योग्य अशा मुहुर्तावर पाठवले तर, ते पाठवणार्या व्यक्तीचा ठसा उमटू शकतो. त्या व्यक्तीकडून येणार्या संदेशांची जेव्हा उत्सुकतेने प्रतिक्षा केली जाणे, हे यशाचे द्योतक ठरते. सहाजिकच हे साधणे, चिकीत्सक रसिक कल्पक बुद्धीचे तसेच प्रयत्न आणि कष्टांचे आहे. त्याकरता आपल्या संदेशांच्या स्विकारकांची योग्य ती ओळख त्यांच्या आवडी-निवडीची जाण असणे नितांत आवश्यक आहे, म्हणून हे काम खरोखर येरागबाळ्याचे नाही. हे माध्यम अंगभूत कल्पनाशक्तीला वाव देत, लेखनकौशल्य सुधारण्यासाठी आहे आणि त्याचा उपयोग आपल्या लेखनगुणांत उत्तरोत्तर उत्तम सुधारणा होत रहाण्यासाठी केला जावा असेच मला शेवटी म्हणावेसे वाटते.  

# "हा हंत, हा अंत!":
काळ हा आहे, कलियुगाचा
अपेक्षा कां आता, सत्ययुगाच्या?
करु या, विश्वासघात मतदारांचा
उड्या मारु या, झटपट पक्षांतरांच्या!
कास धरु या, खुर्च्या त्या सत्तेच्या!!
आला कां जवळी अंत, तो लोकशाहीचा??
"विक्रीयोग्य सेवा देणार्याने,
प्रामुख्याने पैशांपेक्षा,
ग्राहकाच्या हिताला व समाधानाला,
प्राधान्य देणे अत्यावश्यक असते."

# लाजिरवाणी अधोगती:
वाढती गुन्हेगारी, विशेषत: महिलांवरील अत्याचार, खूप विलम्बाने न्याय, भ्रष्टाचाराचा महाराक्षस, जीवघेणी महागाई, खड्डयानी भरलेले रस्ते, वेगाने वाढणारी अनधिकृत बांधकामे आणि झोपड़पट्टी, हे साधण्यासाठी मतपेटीकड़े लक्ष ठेवून कसेही वाकवले जाणारे क़ायदे, सार्वजनिक वहातूकीची दयनीय स्थिती, रखडत चाललेली व खर्च नाहक वाढणारी विकासकामे ही यादी अशीच वाढतच जाईल. सरकार कोणतेही येवो, सर्वसान्यांचे जीवन जिकीरीचे झाले आहे, हेच खरे आहे. आज ७ दशकांनंतरही असे चित्र असणे, हे निश्चित भूषणावह नाही. ही अधोगती कोण कशी आणि किती कालानंतर थांबवणार?

# कोणत्याही गांवांत, शहरात वा महानगरांत वहातूक खड्डयानी अत्यंत जिकीरीची बनवली आहे. अपघात विलंब, मनसताप रोजचे झाले आहेत. ७ दशकांनंतरही ही विदारक अवस्था असणे, हे दूर्दैव व लांछनास्पद होय. हयाचे कारण आपली अकार्यक्षमता की वैयक्तीक फ़ायद्यासाठी सार्वजनिक हिताचा दिलेला बळी ?
सर्वसामान्यांना कोणी वाली नाही हेच खरे!

# मालिकांचे 'महाभारत'":
"पुनश्च हरी ओम्":
लॉकडाऊनच्या विश्रांती वा विसाव्यानंतर मालिकांचे पुनश्च हरि ओम् आता १३ जुलैपासून चालू होईल. तेव्हा......

१ जुन्या चावून चोथा झालेल्या आणि कथानकात काहीही नाविन्य न उरलेल्या मालिका पुढे दाखविल्या जाऊ नयेत. प्रेक्षकांचा जरा तरी मान राखला जावा, त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये......

२ ह्या पुढे तरी शक्यतोवर टी-20 सामन्यांप्रमाणे मर्यादित भागांच्या आणि निश्चित कथानकाचा शेवट असलेल्या नवीन मालिकाच दाखविल्या जाव्यात......

३ तसेच अनुषंगाने कुठल्याही मालिकेत प्रचलित कायद्यांच्या विपरीत असे काहीही दाखवले जाणार नाही ना, असे यापुढे तरी त्यांच्यावर सेन्सॉर नियंत्रण ठेवले जावे........

४ ज्याप्रमाणे महाभारत मालिकेमध्ये प्रत्येक भागाच्या शेवटी त्या त्या भागातील कलाकारांचा सहभाग असे, त्यांच्या नावाची श्रेयनामावली दाखवली जायची, तीच पद्धत यापुढे मालिकांमध्ये सुरू केली जावी.......

५ कोणत्या वेळी, कोणत्या जाहिराती दाखविल्या जाव्यात ह्याचे तारतम्य ठेवले जावे......

६ बातमीपत्रांच्या वाहिन्यांनी त्याच त्याच बातम्या केवळ अँकर बदलत, न दाखवता ताज्या नवीन बातम्याच दाखवाव्यात. जाहिरातींच्या रतीबाचा अतिरेक टाळवा.....

याशिवाय
काय?....काय?... काय?...
जे तुम्हाला वाटते ते प्रतिसादात जरूर लिहा."

# "भाऊबंदकी, फितुरी आणि निष्क्रियता ह्यामुळे भवितव्याचा कायम र्हास होत रहातो."

# "काही मिळवण्यासाठी,
काही द्यायलाच लागते,
मात्र,
काही न देताच, मिळतो,
तो फक्त जन्म!"

# "भूतकाळाचा गर्भितार्थ समजत,
वर्तमानातील अन्वयार्थाच्या दिशेने मार्गक्रमणा केली तर,
भविष्यात क्रुतार्थता लाभते."

# "स्वार्थ सोडून, निस्वार्थ बुद्धिने चरितार्थ करायचे ठरवले,
तरच जीवनांत खराखुरा चिरस्थायी अर्थ निर्माण होऊ शकतो."

# "सौहार्द, निष्ठा आणि क्रुतीशीतलता ह्यामुळे उज्वल भवितव्याचा मार्ग गवसत रहातो."

# "हे" 'असे', अन् "ते"ही 'तसे',
सांगा, आपले व्हायचे कसे?
त्यातून निवडायचे कसे, कसे?
जुळवतो, बापुडे कसेबसे!"

# "आजचा दिवस माझा"!
लाँक डाऊन होऊन आता चार महिने उलटून गेले. जेव्हा तू लाँक डाऊन सुरू झाला तेव्हा त्याच्यातील काही नाविन्य होते नवे आव्हान होते आणि तेव्हा आशा होती की ही दशा, जशा एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यावर रिझल्ट लागतात जून जुलैला पुन्हा नवीन वर्ष उमेदीने सुरू होते, त्याप्रमाणे हे कोरोनाचे महासंकट तेव्हा दूर होईल, सर्व काही पूर्ववत होईल आणि लालक डाऊन वगैरे जाऊन, आपल्याला पुन्हा पहिल्यासारखं मनमोकळेपणाने बाहेरही जाता येईल. पुनश्च आपल्या इतर कामांना सुरुवात करता येईल आणि जीवनाला काहीतरी चांगला अर्थ भरेल, रंग भरेल.

परंतु तसे काही सध्या होताना दिसतच नाही. तसेच ही परिस्थिती केव्हा संपेल,याची काही शाश्वती नाही. त्यामुळे पुष्कळ जण खरोखर निराश झालो आहेत, काही जणांना सैरभैर होऊन, तर काय करावं याची त्यांना कुठलीही कल्पना येत नाहीये. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना तर जखडल्यासारखे होऊ शकते, कारण त्यांनी बाहेर जाणं हा एक मोठा धोका असू शकतो. त्यांना घरातच बसणे भाग आहे.

अशा वेळेला काही ना काहीतरी वेगळी दृष्टी देणारे आणि मनामध्ये योग्य ती जाणीव करून देणारा येणार्‍या परिस्थितीला जुळवून कसं घ्यायचं, त्याच्यातच आनंद कसा मानून घ्यायचा, हे आपण शोधत रहा. तो शोध नवी दृष्टी नवी दिशा, नक्की देईल. आणि समजू लागाल,
"आजचा दिवस माझा"!

# *मन हळवं असावं पण दुबळं नसावं...!*
*कारण*
*हळव्या मनास भावना कळतात तर*
*दुबळ्या मनास नेहमी वेदना छळतात...!*

# "वाट पहाणे,
वाटेला लावणे,
वाट गवसणे,
वाटेला लागणे आणि वाट लावणे, ह्या पंचसूत्रीने आयुष्य बनते!"

# मारली एकच एक अशी
"मिठी",
जणु ठोक ठोक ठ़ोकणारी काठी!
मारला एकच एक नजरेचा "तीर",
करून जातो, चमत्कारच चमत्कार!!

सध्या इतके पुरे.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच चित्ताकर्षक साहित्य आणि तसेच १५० हून अधिक वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com

ह्या शिवाय
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट तसेच ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे विडीओज् पहाण्यासाठी........

आजच ही लिंक उघडून......
एकसे बढकर एक विडीओज् पहा.....
subscribe करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

ह्या लिंकस् संग्रही जरूर ठेवून शेअरही करा.....