"अम्रुतमहोत्सवी शुभाशिर्वाद":
नुकतीच मी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. तेव्हा मला माझ्या भगिनीकडून आलेला हा शुभाशिर्वाद:
"जन्म दिनाचे गाणे सुदिनं सुदिनं जन्मदिन मं तव भव तुमंगलम जन्मदिनं चिरंजीवकुरुजिन जिव शरद : शतू शतम् पु०यवर्धन्म सुदिनं सुदिनं जन्मदिनं विजयी भव सर्वत्र सर्वदा जगती भव तुत वसुयश गान म सुदिन सुदिन जन्मदिन.
------------------------------
# "आजचा जमानिमा":
रोज आपण आपल्या वैयक्तिक क्षमतेमध्ये काहीना काही तरी, भर घातली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सभोवतालचे अवलोकन केले पाहिजे.
तसे झाले तर आपल्याला काही ना काही नवीन असे शिकायला मिळते, त्यालाच म्हणायचे आजचा जमानिमा!
१. वेळेची मर्यादा पाळून वक्तशीरपणा अंगिकारणे, हा एक खरोखर उत्तम गुण आहे. त्याचे अनेक फायदे आहेत.
आपण आपली प्रतिमा सुधारू शकतो हा एक फायदा, वेळेची बचत करू शकतो हा दुसरा फायदा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण त्याद्वारे दुसऱ्याच्या वेळेचीही कदर करतो हे दाखवून देऊ शकतो. सहाजिकच, आपली प्रतिमा अधिकच वृद्धिंगत होऊ शकते.
म्हणून वेळेचे महत्त्व जाणा व दिलेली वेळ पाळा.
२. येणारा प्रत्येक दिवस हा नवीन दिवस आहे. त्यासाठी रोज नवीन काहीतरी चांगले करायला सुरुवात करा आणि नव्याने रोज जगतो आहोत अशा तर्हेचा अनुभव सातत्याने घेत रहा.
--------------------------
# "निवडक भावगीतं!":
भावगीतं म्हणजे शब्द सूर लय आणि ताल ह्यांच्या संगमाद्वारे मनातले भाव टिपणारं आल्हाददायक प्रसन्न संगीत.
अशीच ही निवडक भावगीतं!:
1. नको देवराया अंत आता पाहू,
2. सखी मंद झाल्या तारका,
3. तू, सप्तसूर माझे
4. त्या तिथे पलीकडे,
5. या भवनातील गीत पुराणे,
6. चाफा बोलेना,
8. माझे माहेर पंढरी
9. दत्त दिगंबर दैवत माझे,
10. तुझ्या गळा, माझ्या गळा
11. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न,
12. ऋणानुबंधाच्या
13. आज कुणी तरी यावे
14. माझा होशील का,
15. ने मजसी ने
---------------------------
# "डोळे चिंब करणारी "साथसंगत"!:
"पोपटी चौकट" "देवचाफा"सारखे एकसे बढकर एक अनेक कथासंग्रह, "चक्र" "माता द्रौपदी" प्रमाणे महाभारतावर चाकोरीबाहेरचे भाष्य करणारी निवडक नाटकं आणि "आवडलेली माणसं" सारखे व्यक्तीचित्रणात्मक ललित लेखन करणार्या, ज्येष्ठ व श्रेष्ठ प्रतिभावंत साहित्यिक विद्याधर पुंडलिक, ह्यांच्याबरोबरच्या सदतीस वर्षांच्या सहजीवनाची "साथसंगत" त्याच चपखल शिर्षकाच्या पुस्तकांतून त्यांच्या सहधर्मचारिणीने-रागिणी पुंडलिक ह्यांनी उलगडली आहे.
असे पुस्तक हाती येणे, हा वाचकाला एका वेगळ्याच अद्भुत दुनियेत घेऊन जाणारा, अनुभव कसा असू शकतो, त्याची प्रचिती मला आली. दोघांच्या सहजीवनाच्या वाटचालीचा सुरूवातीपासून अखेरपर्यंत माग़ोवा घेत असताना, एखादी साहित्यकृती तिच्या बीजापासून पहाता पहाता अनपेक्षितपणे कसा आकार घेते, ते लेखिकेने अनेक उदाहरणे देत, सहजसुंदर भाषाशैलीद्वारे वाचकाशी ह्रदयसंवाद करावा अशा रितीने मांडले आहे. लेखक व माणूस म्हणून आपला जोडीदार अंतर्बाह्य कसा होता त्याची हुबेहूब प्रतिमा इथे लेखिकेने उभी केली आहे.
शेवटी शेवटी, अकाली मरण पावलेल्या आपल्या अत्यंत लाडक्या पुत्राच्या शोकाने हा बुद्धिमान सह्रदयी माणूस, कसा कोलमडून पडत गेला आणि त्या दु:खांतून बाहेर न येता त्याची अखेर कशी झाली, हे वाचताना तर कुणीही पाषाणह्रदयी माणसालाही पाझर फुटेल.
A Must Read Book.
----------------------------
# "जीवन'दायी पर्जन्य":
इतके दिवस ज्याने अचानक दडी, ज्याची वाट पाहून थकलो, तोच आज अचानक आकाशातून पावसाच्या धारा, अविरत पडू लागल्या आणि आतापर्यंतच्या कडकडीत उन्हाळ्याच्या तापाने, तना मनाची होणारी काहीली, अवचित थांबून, अवघ्या आसमंताला गारे गार करून गेली. अन् लहानपणीचा संस्कृत भाषेतील सुभाषित स्फुरले:
'आकाशात पतितम् तोयम्
यथा गच्छती सागरम्,
सर्व देवम् नमस्कारम् केशवम् प्रतिगच्छती.'
खरंच, निर्गुण, निराकार अपरंपार अनंतातून, आज चमत्कार घडावा, तसे नवजीवनाचे स्त्रोत अवखळपणे धरित्रीला साद घालत, जीवाच्या आकांताने कोसळले. समस्त जीवमात्राची तहान भागविण्यासाठी, जमिनीत नवचैतन्याचे लक्ष लक्ष अंकूर फुलविणाणरे, नावाप्रमाणेच, 'जीवन'दायी असे पर्जन्याचे थेंबच थेंब, अवघ्या मनामनांना प्रफुल्लीत करीत, प्रसन्न झाले.
ह्या निसर्गचक्राच्या अदभूत् चमत्काराला, त्या संस्कृत सुभाषितांतील, दयासागर केशवाला, आपण सारे नतमस्तक होऊन, साष्ठांग प्रणाम करूं या आणि प्रार्थना असूं द्यावी की, ही अशीच क्रुपाद्रुष्टि ह्या चराचरावर निरंतर असूं द्यावी!"
---------------------------
# "विचारशलाका":
"रंगीत पार्श्वभूमीवर, स्लाईडसारखे संदेश बनवणे,
हा बुद्धिला चालना, कल्पकतेला प्रेरणा आणि शब्दसामर्थ्याची परिक्षा घेणारा
छंद!"
"दररोज अर्थवाही, दिशादर्शक आणि विचारप्रेरक असे, मोजक्या शब्दातील निवडक एक वा दोन संदेशच "फेबु" वर मांडावेत."
"धावपळीच्या स्पर्धेच्या आजच्या माहोलांत, जिथे माणसामाणसांतला संवाद हरवत चालला आहे,
तिथे स्वत:च स्वत:शी कोण काय बोलणार?"
"जे 'सोशल मिडीया' वर दिवसेंदिवस
गैरहजर राहू शकतात, ते
आजच्या युगाचे जणु "मर्यादा पुरुषोत्तम"!
---------------------------
# "कुठे होतो, कुठे आलो!":
आमच्या तरुणपणी, काँलेजेस् बरोबर २० जूनला म्हणजे २० जूनलाच दरवर्षी सुरू होत असत आणि गुणांची अशी मुक्त खैरात होत नसे. कुणालाच शालान्त परिक्षेत १०० टक्के गुण मिळत नसत.
आता तर २० जूनला अजून काँलेजसाठी प्रवेश अर्जांची प्रक्रिया-तीही पहिल्याच दिवशी, सर्व्हर डाऊन होत, सुरू आहे.
कालाय तस्मैन् नम:,
दुसरे काय?
"ह्यावर एक प्रतिसाद":
😀👍🏽 अगदी खरे आहे. गेल्या अनेक दशकांत सुमार कर्तृत्वाच्या, निकृष्ट कुवतीच्या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांनी देशाची सर्वागीण दुर्दशा केली. आर्थिक, सामरिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सर्व सर्व क्षेत्रांत आपली पिछेहाट झाली. कर्तुत्ववान व बुद्धिमान अशा सामान्य माणसांच्या बळावर देश तगून राहीला. कशीबशी वाटचाल करत राहीला. खरेतर आज आपण सर्व प्रगत देशांना, चीनला मागे टाकायला पाहीजे होते. एकेकाळी जगात नावाजलेले आपले मुंबई विद्यापीठ आज प्रसिद्ध झालेल्या जागतिक क्रमवारीत कुठेही नाही. ही परिस्थिती बदलायला भगिरथ प्रयत्न करावे लागतील.
खरंच आपण *कुठे होतो, कुठे आलो!
---------------------------
सुधाकर नातू
२४/६/'१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा