"अनुभव सागर":
विविध प्रकारच्या वाचनातून जाणवलेल्या अनुभवांचे मनांतील रागरंग अगदी वेगळे व संस्मरणीय असतात. अनेक प्रकारच्या पदार्थांची चव जशी विविध रुचीची असते, तसेच हे अनुभव देखील आगळेवेगळे असतात.
अशा दखल घेण्याजोग्या, मनाला भिडलेल्या अनुभवांची ही नोंद करावीशी वाटली आणि लिहावीशी वाटली, ती कल्पना म्हणजे हा "अनुभव सागर":
१. मुली दत्तक म्हणून प्राधान्याने स्वीकारल्या जाणे!
२. अनुभव सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन कॉलेजमध्ये बसविण्यात याव्यात असा आग्रह स्त्रीमुक्तीचे पुढचे पाऊल!
३. काही दशकानंतर शाळेतील एका वर्गातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेले स्नेहसंमेलन त्या उभरत्या वयातील अविस्मरणीय आठवणी व काळाच्या ओघात प्रत्येक घातले विलक्षण बदल.
४. पहिले प्रेम जसे अद्भुत, तसाच पहिला पगार व त्याचा केलेला विनियोग ज्याच्या त्याच्या साठी न विसरता येण्याजोगा. कुणाची तरी कृतज्ञता आणि आपल्या कर्तृत्वाची ती पहिली पायरी!
५. संत रामदासांनी ज्या ठिकाणी बसून दासबोधासारखा मार्गदर्शक ग्रंथ लिहिला त्या महाडजवळील सह्याद्रीच्या कुशीतल्या शिवथर घळीतील वास्तव्यातील प्रत्यक्ष रोमांचक अनुभव!
६. "ज्या दिवशी बार्टर पद्धत जावून
कागदी चलन अस्तित्वांत आले,
तोच दिवस बहुधा कलियुगाचा प्रारंभ."
७. "आनंद घ्यायला,
वा द्यायला
पैशाची श्रीमंती नाही,
तर मनाची श्रीमंती हवी,
काय उत्तम अन् काय अयोग्य,
त्यासाठी हवी, सद्सद्विवेक बुद्धी!"
८. "पुराणातील वांगी पुराणातच ठेवणं उत्तम.
त्यांचा व्रुथा अभिमान बाळगल्याने आपला "आज" काय मोठे दिवे लावणार आहे?
----------------------------
"सांजपर्व":
माणसाच्या जीवनातील सर्वच अवस्था, ह्या त्या त्या वेळच्या परिस्थितीचे व मनोभूमिकेचे प्रतिबिंब असते.
त्यातील सांजपर्व, हे खरं म्हणजे दुर्लक्षितच रहाते. पण जर माणूस मनस्वी अन् तपस्वी असेल तर व्रुद्धत्वही हवेहवेसे वाटू शकते, कारण तेव्हां
आत्मसंवेदनांच्या सह्रदय अश्रुंनी चिंब होऊन जाते.
----------------------------
आणि जाता, जाता....
Whatsapp वर....
वाचायला मिळालेला....
हा ह्रद्य संदेश........
तुमचाही अनुभव सागर...
सम्रुद्ध करून जाईल......
"ओंजळीतली फुले":
'बोलताना जरा सांभाळून....
शब्दाला तलवारीपेक्षा
अधिक धार असते
फरक इतकाच की,
तलवारीने मान तर
शब्दांनी मन कापलं जातं.
फरक इतकाच की,
तलवारीने मान तर
शब्दांनी मन कापलं जातं.
जरी तलवारीच्या जखमेतून रक्त
आणि शब्दांच्या जखमेतून अश्रू
येत असले तरी,
दोघांपासून होणारी वेदना
मात्र सारखी असते..
शब्दच माणसाला जोडतात
आणि शब्दच माणसाला तोडतात....
हे शब्दच आहेत..
"जे कधी रामायण,
तर कधी महाभारत रचतात..
तपासून घ्या शब्दांना,
उच्चाराआधी,
कारण....
खोडरबर कुठलाच
कारण....
खोडरबर कुठलाच
जिभेवर चालत नाही!....'
सुधाकर नातू
१९/६/'१८
१९/६/'१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा