"आजचे मुद्दे व गुद्दे":
# सत्ता मिळविणं जितकं सोपं असतं, त्यापेक्षा ती विहीत जबाबदारीनं संभाळणं महाकर्मकठीण असतं!
# सत्ताधारी सत्ता जबाबदारीपूर्वक राबविण्याऐवजी केवळ सत्तेचेच सत्तेसाठीचेच राजकरण करण्यात मग्न रहाण्यात भूषण मानीत असल्याने कारभाराची काय वाताहात झाली आहे, ते रोज घडणाऱ्या दुर्घटनातून व दररोजच्या मनुष्यहानीतून स्पष्ट दिसत आहे.
# केवळ मुंबईच नव्हे तर नाशिक पुणे आंबेगांव येथील दुर्घटना आणि आता चिपळूण येथील तिवरे धरण फुटण्याच्या दुर्दैवी घटनांमुळे व्यथीत होऊन महाराष्ट्रातील गेल्या पाच वर्षात जाणवलेल्या वास्तवतेचे भयचित्र ह्या संदेशात व्यक्त केले गेले.
# कै. शास्रीजीनी रेल्वेमंत्री
असताना, अपघाताबद्दल नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता. आता खुर्चीवर चिकटून रहाणे हाच नैतिक पराक्रम.
# नितीमत्तेची मुल्ये चिरंतन शाश्वत असतात, असायला हवीत.
# ठिकठिकाणच्या आगी, जीवघेण्या दर्घटना व अपघात जेवढे गेल्या पाच वर्षात घडले, तितके आधी कधी घडले होते कां, हा संशोधनाचा विषय आहे.
---------------------------------
"आजचे धडे":
# "ज्याला त्याला,
त्याने त्याची जबाबदारी तंतोतंत पाळण्यात खराखुरा आत्मानंद मिळत असतो,
ही उमज जर, सर्वांना लौकर आली,
तर समस्यांना पूर्णविराम मिळेल."
# "दुर्घटनांमागून जेव्हा दुर्घटना घडत रहातात, तेव्हा यंत्रणा जशी खिळखिळी झालेली असते, तशीच ती संभाळणारे कारभारीही बेफिकीर व दूरद्रुष्टी नसणारे व अकार्यक्षम असतात."
# "एकमेकावर जबाबदारी ढकलण्यात
हे मग्न,
नागरिक मात्र
सून्न सून्न!"
# "ध्येय घोषित करणार्यावरच
ते पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व येते. त्याचा विसर पडतो, तेव्हा
विश्वास गमावण्याचा, पतनाचा प्रारंभ येतो."
स्वातंत्र्यपूर्व काळात, समाज व देशहित सापेक्ष राजकारण त्याग व सेवाभावी व्रुत्ती असे होते. तर स्वातंत्र्यानंतर ते उत्तरोत्तर अधिकाधिक व्यक्तिहित सापेक्ष स्वार्थ भ्रष्टाचाराने माखलेले आपण पहात आहोत. जणु, सारेच इथून तिथून सारखेच भ्रष्टाचाराने बरबटलेले!
अशा वेळी स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा विरुद्ध राजकीय सुधारणा ह्या द्वंदात राजकीय सुधारणावाद्यांचा झालेला उदय व विजय आता कमालीचा महाग पडतो आहे. माणूस म्हणून, समाज म्हणून नितीमत्तेला प्राधान्य देत सुधारणा प्रथम पूर्ण होणे गरजेचे होते, असेच सध्याचे दिशाहीन, अर्थहीन भरकटत चाललेला भवताल पाहून वाटते. एका न परतीच्या अंध:कारमय वाटेवर आपण आता फरफटत तर चाललो नाहीत?
"कालाय तस्मै नम:"
----------------------------------
"आजचे विचार":
# "ध्येय घोषित करणार्यावरच
ते पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व येते. त्याचा विसर पडतो, तेव्हा
विश्वास गमावण्याचा, पतनाचा प्रारंभ येतो."
# "आपली व्रत वैकल्ये सणवार, शिस्त नियमन,
समाजमन निकोप ठेवत
सांस्क्रुतिक संस्कार करणारी,
आरोग्याचे रूतुमानानुसार भान ठेवणारी."
# "वाढती गुन्हेगारी घातपात,
जीवघेणे अपघात, संपता संपतच नाहीत. ह्यामागची प्रमुख कारणे:
अवाजवी अभिलाषा, घाई आणि वेग!"
# "कार्यतत्परता, सामंजस्य, परस्परावलंबन, क्रुतार्थता आणि चिरंतरता ह्या पंचसूत्री मूल्यांवरच, मानवतेचा हा प्रवाह अव्याहत रहाणार आहे."
# "नितीमत्ता, सदाचार प्रामाणिकपणा
दुर्मिळ झालेत.
भावी पिढीचे भवितव्य अंध:कारमय आहे. "When character is lost, everything is lost".
# "प्रत्येकाच्या आयुष्यात,
कधी ना कधी 'बहराचा काळ' येतो. त्याची वेळ, दर्जा व झेप ही ज्याच्या त्याच्या गुणमर्यादांवर निर्भर असते."
# "असूं द्यावे:
शब्द, फुलणार्या कळीसारखे
विचार, बहरणार्या फुलांसारखे
उच्चार, ध्यानस्थ व्रुक्षासारखे
आणि
आचार, निष्कलंक स्फटिकासारखे!"
-----------------------------------
👌"मन चंगा, तो कठौतीमे गंगा!"👌
(मनाची स्थिती + व्यक्तीचा द्रुष्टिकोन= स्वप्रेरणेची गुणवत्ता)÷(सभोवतालची परिस्थिती)~ निर्णय ~क्रुती=निष्पत्ती किंवा फळ
प्रत्येकाच्या जीवनाची वाटचाल ही अशी सतत चाललेली असते.
After all, Mind is the Driving force, that makes or destroyies your future.
If your Mind is Fit, You are Fit!
------------------------------------------
सुधाकर नातू
३/७/'१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा