कापा कामि":
या शीर्षकावरून चक्रावून जाऊ नका हे शीर्षक म्हणजे काय पाहिले व त्यामधून मला काय मिळाले, याचा तो शॉर्टफॉर्म आहे.
आपण नेहमी काही ना काही तरी पहात असतो' म्हणजे नाटक, चित्रपट वा मालिका. ते पाहताना आपल्याला काहीतरी नवीन असे अनुभवायला मिळत असते, अंतर्मुख होऊन विचार करायला लावत असते. ह्या सदरामध्ये मी जे काही असे कधी पाहतो, त्याच्यातले कधी केव्हा चांगले घेण्याजोगे तसेच इतरांना देण्याजोगे असं काही उमजलं तर ते तुमच्याबरोबर शेअर करायचा विचार आहे.
ह्या संदर्भात विचारमग्न असताना, "अनन्या" हे 'सुयोग" चे नाटक पाहिल्याचे स्मरले. आज ह्याच नाटकाचा विक्रमी २५० वा प्रयोग मुंबईत होत आहे, त्यानिमित्ताने पुनश्च हा रसास्वाद!:
"अनन्यसाधारण "अनन्या!":
क्लोरोफाँर्म" हे जर झोपी गेलेल्याला खडबडून जागे करणारे पुस्तक असेल, तर "महास्वप्न" पुस्तक त्याला आत्मप्रेरणेची संजिवनी देवून स्वयंविकासाच्या "एक्सप्रेस वे" वर घोडदौड करायला लावणारे संप्रेरक असेल.......
स्वयंप्रेरणा! असामान्य इच्छाशक्तीचे जे अदभूत् दर्शन "अनन्या" रंगभूमीवर उभे करते, हा एक खरोखरच चित्तथरारक अनुभव आहे..........
एका पाठोपाठ ही अशी विस्मयकारी पुस्तके आणि नाटक मला अवचितपणे मला अनुभवायला मिळावा, हा एक "सोने पे सुहागा" योगायोगच नव्हे कां?.........
दुर्दैवाने अपघात होऊन दोन्ही हात गमावणार्या अनन्या ह्या जिद्दी तरुणीची ही मेलोड्रँमँटिक कहाणी आहे. नायिकेची झट मंगनी, झटपट अपघात आणि पटकन ब्रेक अप्, खटाखट स्वयंपूर्ण होत सीए , चटाचट प्रेमाचा ट्रँगल आणि obvious असा गोड शेवट असे ह्या नाटकाचे स्वरुप आहे.
खरे म्हणजे सारा फिल्मी मामलाच आहे. पण येथे, जगावेगळे आहे ते, दोन्ही हात गमावलेल्या, नायिकेच्या भूमिकेत रूजूता बागवेने कमालीची मेहनत घेऊन स्वयंप्रेरणेच्या जोरावर अत्यंत बिकट अवस्थेवर मात कशी करता येते, ते द्रुष्ट लागावी असे सादर केले आहे, ते. खरोखरच तिचे हात गमावले आहेत असेच वाटते आणि हे बेमालूमपणे कसे काय जमले, हा प्रश्न रसिकांच्या मनात शेवटपर्यंत अनुत्तरित रहातो. हेच ह्ना नाटकाचे यश आहे.
प्रेक्षक हे तसे रन आँफ द मिल नाटक बघावयाला येतात, ते बहुदा रूजूताच्या असामान्य जीवंत सादरीकरणामुळे. नाटकाचे नेपथ्य, प्रकाशयोजनाही ह्या ह्रदयस्पर्शी नाट्याला अनुरुप होते.
अचानक आगांतूकासारखे येऊन अनन्यावर एकतर्फी प्रेम करणार्या तरूणाची भूमिका करणार्या अभिनेत्याची बुलेट ट्रेनस्पीडची संवादफेक खटकते. तो काय बोलतो ते स्पष्टपणे मुळीच कळत नाही. शिवाय त्याच्या एंट्री नंतर, सारा खेळ एका गंभीर नाटकाला विनोदी टच देण्यासाठी, पूर्णपणे अस्थानी व ओढून ताणून जमवलेला वाटतो. त्यामध्ये थोडेतरी गांभीर्य व संयमाचे भान ठेवणे गरजेचे आहे.
मात्र संकटांना न घाबरता ताकदीने तोंड कसे द्यावयाचे, हे चटका लावत पेश करणारे हे नाटक, तरुण पिढीसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक असल्याने निश्चितच अनन्य आहे.
बिकट प्रसंग नेहमीच येत असतात सारे जीवन काही सुरळीत नसते अनिश्चितता हेच तर जीवनाचे वैशिष्ट्य आहे तेव्हा कुठले संकट आपल्या समोर उभे टाकेल याचा नेम नसतो अशा वेळेला खचून न जाता आपल्या अंगभूत शक्ती स्थळांचा जास्तीत जास्त उपयोग करून त्या संकटांचा मुकाबला करत राहणे हाच खरा जीवनाचा मतितार्थ आहे हे या नाटकामुळे मला समजून गेले.
अशीच विविथस्पर्शी लेखांची "अनन्यसाधारण महास्वप्न" पहाण्यासाठी...
माझ्या ब्लॉगची लिंक उघडा........
http//moonsungrandson.blogspot.com
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा