👍👍💐💐👍👍💐💐
👍"रंगांची दुनिया !": 👌👍"आनंद घ्या, आनंद द्या !":👌
☺️ "सोशल मिडीयावरील माझी मुशाफिरी-'टेलीरंजन !":😊💐
👍" दृष्टी, बनवते सृष्टी !":👌
☺️"झी मराठीवरील 'तू चाल पुढे': या सध्या विलक्षण लोकप्रिय होत असलेल्या मालिकेची नायिका अश्विनी, तिच्या स्वतंत्र बांधकाम व्यवसाय करणाऱ्या नवऱा, श्रेयसचा मोठा साहेब चक्क त्यांच्या घरी भोजन करायला येणार असताना अचानक वीज गेल्यामुळे घरात अंधकार होऊन निर्माण झालेला संकटसमय आणि साऱ्यांनाच काय करावे ते सुचत नसताना, ती जे प्रसंगावधान राखते आणि घरामध्ये जणू दिव्यांची दिवाळी निर्माण करून भारतीय पारंपारिक पंक्तीचे भोजन या साहेबांना सादर करते.
त्या प्रसंगातून शिकण्यासारखे आहे की आव्हाने संकटे किती आली तरी त्यातून संधी शोधायचे असते आणि आपल्या समस्येचे चांगल्या फळात सोने करायचे असते अशाच स्तरीची शिकवण देणारा हा व्हिडिओ आवर्जून पहा.....
----------------------
😆 "छोट्या पडद्यावरील धडे-1 !":😆
"सन मराठी" वाहिनीवरील "कन्यादान" मालिकेतला, ऋषी त्याला फसवणाऱ्या पत्नीला-वेधाला माफ करतो आणि तेव्हा तो राणाशी बोलताना जे म्हणतो, ते सर्वांनीच धडा घेण्यासारखे आहे.
तो म्हणतो:
"मी काही मोठं काम केलं नाही, मला नेहमी दुसऱ्याच्या जागी उभं करून त्याच्या बाजूने विचार करता येतो, एवढंच !"
खरंच किती महत्त्वपूर्ण असा हा दृष्टिकोन आहे. वादविवाद, भांडणतंटे वा रुसवे फुगवे अशा तऱ्हेची फसवणूक जेव्हा होते, तेव्हा हा असा ऋषीसारखा गुण सर्वांनीच अंगीकारला तर किती चांगलं होईल !
----------------------
"टेलीरंजन-"रसभंग !":
"मराठी मालिकांमध्ये, पात्रांमधील संवादांपेक्षा, पदोपदी येणारे उच्चारवांतील पार्श्वसंगीत रसभंग करते. हा अनावश्यक वाद्यमेळा टाळणे योग्य ठरेल.
तसेच पात्रांचे संवाद योग्य तऱ्हेने ऐकायला मिळत नाहीत विशेषतः ज्येष्ठ नागरिक कांची तर जास्तच अडचण होते. म्हणून ते संवाद टायटलच्या रूपाने सोबत पडद्यावर दाखवले जावेत.
माझ्या निरीक्षणाप्रमाणे, एखाद दुसऱ्या मालिकेत अशा तऱ्हेने संवाद शब्दरूपात दाखवले जातात. त्यामुळे रसभंग होणे टळते. विविध वाहिन्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा."
----------------------
👍"टेलीरंजन: काही ही हं !":👌
# "सन' टीव्ही मराठीवरील 'सुंदरी' मालिकेची नायिका 'सुंदरी' आपल्या नवऱ्याला- आदित्यला,
स्वतःच्या सवतीपासून-अनुपासून कां वाचवते, सातत्याने ते कळतच नाही.
# " तुझ्या नवऱ्याने पहिल्या रात्रीच तू मला बायको म्हणून नको असे झिडकारले आहे, त्याला घटस्फोट देण्याचा विचार केल्यावरही मंगळसूत्र 'सुंदरी' का काढत नाही हेही पटतच नाही!
# 'आपला नवरा आदित्य आपल्यापासून सातत्याने काय लपवतोय हे कधीही न लक्षात येणारी त्याची बायको अनु इतकी बावळट आणि भोळी कशी ?'
# "सर्वात कळस म्हणजे इतक्या उचापती करून सुद्धा, 'सुदरी' IAS च्या प्रिलीमनरी (?) परीक्षेत राज्यात पहिली येते हे नवलच !"
ही सारी मालिका लेेखकाची कृपा !!!
# "अक्षरश: कशीही भरकटत चाललेली 'स्वाभिमान' ही अर्थहीन मालिका संपणार कधी?
पुरा नाही कां झाला,
हा पोरखेळ?"
# "कोणताही, कसाही
'माल इका'
=
मालिका भरकटत चाललेल्या!"
# "अरे, आवरा रे ह्यांना!":
"सध्या आधीच भरकटलेल्या मालिकांमध्ये "टाईम पास" चा
प्रयोग चालू असलेला दिसतो."
----------------------
👍"रंगांची दुनिया !": 👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
"वाहता वाहे, 'मालिका'माई"!:
"विसंगत वागणे":
मराठी मालिकांमध्ये बहुदा पात्रं कधीही तर्कसंगत वागत नाहीत. सर्वसाधारण प्रसंगांमध्ये माणूस जो विचार करेल आणि जी कृती करेल असे अपेक्षित असेल, त्याच्या बरोबर उलट बहुतेकवेळा, निदान एक तरी पात्र उरफाटे वागताना दिसते आणि दुर्दैवाने ते भविष्यात महत्त्वाचे पात्र असते, ज्यामुळे कथानक पुढे पुढे जाऊ शकते.
"एंट्री नवीन पात्राची":
दुसरे निरीक्षण असे की, ज्या वेळेला एखादी मालिका आता पुढे काय करायचं काय दाखवायचं, हे न समजण्याइतकी रटाळ होते, तेव्हा एखाद्या नवीनच पात्र त्यात प्रवेश करते आणि कथानकाला वेडीवाकडी वळणे देत मालिका सुरू ठेवली जाऊन प्रेक्षकांचा अंत पाहिला जातो.
----------------------
# ☺️"रंगाचा बेरंग !":😊
☺️"हे एक नवलच !":😊
"बहुतेक वाहिन्यांवरील अनेक मालिका बंद व्हाव्या असे वाटत असूनही पुढे ढकलल्या जात असताना, "सोनी" मराठीवरील "बॉस माझी लाडाची" ही मालिका कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक बंद करून काय साधले?"
----------------------
☺️"क्या, अब जमाना बदल रहा है?!:👌😢
मालिकांमधल्या
नायकांच्या दोन दोन बायका?:
पूर्वी.....
'मानबा': गुरुनाथ-राधिका-शनाया,
'घांवसू': अक्षय-अम्रुता-टियरा,
'राप्रेरंर': प्रेम-राधा-दीपिका,
'नसाघ': प्रताप-नेहा-माया,
'लसमं': मल्हार-लक्ष्मी-आर्वी.
आणि
आता,
'रंमावे': डॉ कार्तिक-दीपा-आयेशा?
'आईकुकाक': अनिरुद्ध-अरुंधती-संजना,
'स्वाअ': शंतनु-पल्लवी-निहारिका?
'लबे': राघव-सिंधू-मधु/राणी?
'बाँमाला': मिहीर-राजेश्वरी-माधुरी?
'कदा': समीर-ओवी-xgf?
यह क्या हो रहा है छोटे पर्देपे?!"😢
----------------------
And
Finally,
"कार्यक्रमांच्या पुन:प्रक्षेपणाचा खटाटोप रविवारी न चुकता करण्यापेक्षा, मनोरंजन वाहिन्यांनी पूर्ण दिवस सुट्टी घ्यावी कां?"
☺️Instead of wasting precious Time,
seeing meaninglessly dragged serials on TV,
use it for purposeful constructive work.👌
-------------------------------------------
धन्यवाद
सुधाकर नातू
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा