मंगळवार, ३१ मे, २०२२

# 👍"टेलिरंजन-काही ही हं !"😊

 😊 "टेलिरंजन-काही ही हं हं !":😢


☺️ "अती तिथे माती !"😢
दूरदर्शन मालिकांमध्ये अतिशयोक्तीची हास्यास्पद परमावधी गाठली जाते आणि प्रेक्षकांना मूर्ख असल्याचे समजून आपले दृश्य रेटले जाते हा अनुभव सातत्याने येत असतो मनवा उडू मध्ये तर कहरच केला सानिकाचे स्वार्थी मतलबी आणि बिलकूल न पटण्याजोगे वागणे आणि कारणामुळे यांचा वीट आलेला असताना, ती तिचे गर्भवती नसल्याचे बिंग फुटल्यामुळे, धाकटी बहिण दीपुशी ज्या अमानुषपणे वाटते, ते अतर्क्य आहे. त्यातून तिला घराबाहेर ढकलून तिचा अपघात होतो त्यानंतर तर या मालिकेत अतिशयोक्तीचा परमावधी गाठला गेला आहे.

समोर आपली बहीण किंवा आणि मेहुणी गतप्राण अवस्था जणू असल्यासारखी पडलेली असताना कार्तिक आणि सानिका काहीही करत नाही अखेरीस कार्तिक मोठ्या भावाला इंद्राला फोन करतो आणि अपघाताची कल्पना देतो, त्यानंतर इंद्राने नुसती शिट्टी वाजवली तरी रिक्षा यायची, तो त्याची मोटरसायकल चालू न झाल्यामुळे, अक्षरशः धावत काय सुटतो ! ते म्हणजे कहर झाला. असे घडणे केवळ अशक्य आहे, हे कोणीही सांगू शकेल. पण मालिका वाल्यांना त्याची परवा नाही असेच दिसते अपघातानंतर बिचाऱ्या दिपूला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी काळ वाया जातो त्याचे काय ?

पुढचा अतिरेकी कळस, म्हणजे सानिकाने दीपूला ढकलले होते, हे मुक्ताकडून कळल्यानंतर तिला व कार्तिकला घरातून हाकलून दिल्यावर, ही दोघं निर्लज्जासारखी देशपांडे मास्तरांकडे येतात आणि तिथे आपले उरफाटे वागणे तसेच चालू ठेवतात ! इंद्रा किंवा त्याची आई दोघही देशपांड्यांना कुठलीही सानिकाच्या अपराधाबद्दल कल्पनाही देत नाहीत. त्यामुळे या नालायक जोडप्याचे संताप येईल असे देशपांड्याच्या घरी वागणे चालूच राहते, याला अमानुष अतिरेक नाही म्हणायचे तर काय ! त्यामुळे नको ही मालिका बघणे असे वाटू शकते.


असाच ऑफिस बॅक नको इतका लांबत जाणारा सुंदरी या मालिकेत केला जात आहे सुंदरी व आदित्यचे त्याच्या मनाविरुद्ध झाले लग्न आणि त्याचे अनु बरोबर प्रेम नंतर विवाह व तिला दिवस जाणे वगैरे सगळे मालिकेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत लपवणे हा कमालीचा अतिरेक ह्या मालिकेत झाला आहे अखेरीस सुंदरीला आदित्यचे कारनामे कळल्यावरही ही गोष्ट अनुला करणे वा न कळविली जाणे हेदेखील खरोखर विचित्र पण मालिका नाट्यमय होते अशा समजा खाली काहीही दाखवायचे ही सध्याची रित दिसते. त्यामुळे नको ही मालिका पहाणे असे वाटू लागते.

👍"आँप्शनला मालिकाच मालिका !":😊
"आई कुठे काय करते !";या मालिकेमध्ये आशुतोषचा एक्सीडेंट झाल्यापासून, जे काय चाललंय त्याला केवळ टाईमपास नाही तर काय म्हणायच ! कसही करून वेळ निभावायची अशा तर्‍हेने काहीही कसंही कंटिळवाणं दाखवलं जात आहे. त्यामुळे ही मालिका "सुंदरा मनामध्ये भरली", "जीव माझा गुंतला", "माझी तुझी रेशीमगाठ", "तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं !" या पाणी घालून लांबवत मेलेल्या मालिकांप्रमाणे ऑप्शनला टाकायची वेळ आलेली आहे !

😢 "उद्धटपणाची स्पर्धा !":😢
उद्धट, नालायक, बेमूर्वतखोर आपलं तेच खरं इतर सगळे फुटकळ असे समजणारी माजखोर पात्रं व त्यांची बनेलपणे वागण्याची स्पर्धाच, जणु मराठी मालिकांमध्ये सुरू आहे असे दिसते. "लग्नाची बेडी" मधली वडील आप्पा आप्पांचे स्तोम माजवत, अक्षरशः कुण्णा कुण्णाचीही-चक्क तिला संकटात आधार देण्यार्या नवर्याचीही पर्वा न करणारी 'सिंधू', "तू तेव्हा तशी" मधील अनामिकाची मुलगी "राधा" आणि या दोघींवर कडी करणारी म्हणून "मन उडू उडू झालं !" मधली देशपांडे सरांची आक्रस्ताळी स्वार्थी मुलगी "सानिका" या तिघींमध्ये सगळ्यात नालायक व वाईट कोण, हे समजणं खरोखर कठीण आहे ! अशा तऱ्हेने ही तीनही पात्रं आपलंच घोडं कायम पुढे दामटताना दिसतात ! अक्षरशः त्यांच्या बेभान, बेताल वागण्यामुळे प्रेक्षकाचा संताप संताप होतो, परंतु आपल्या हातात रिमोट वापरून चॅनेल बदलणे किंवा मूग गिळून गप्प रहाणे हातात असते.

👍"आवडणारी निवड !":💐
💐"कन्यादान !":💐
आवर्जून पहाव्यात अशा अगदी हाताच्या बोटावर मोजाव्या इतक्याच मालिका आता उरल्या आहेत. त्यामध्ये सन टीव्ही वरील "कन्यादान" ही मालिका अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत तरी उत्कंठावर्धक आणि नाट्यमय होत गेलेली आहे. पाच मुलींचे पितृत्व समर्थपणे सावरणारे अशोक वाडकर मास्तर आणि त्या मुलींच्या एक एकीच्या नशिबाच्या कहाण्या यामध्ये उलगडत जातात.

पहिल्या दोन मुलींचे विवाह तितकेसे यशस्वी होत नाहीत. कारण पहिली व्रुंदाचा नवरा भडक स्वभावाचा, कुठे कामकाजात स्थिर नाही आणि तर दुसरीचा नवरा समीर छुपा रूस्तुम विवाहापूर्वीच परस्रीशी अनैतिक संबंध ठेवणारा आणि त्याच्या विचित्र स्वभावाच्या, विघ्नसंतोषी आईवर अक्षरशः आंधळे प्रेम करणारा. त्यामुळे या दोन्ही संसारात नेहमीच काहीना काही असे त्रासदायक संकटांचे मारे होतच असतात. तिसऱ्या समंजस मुलीची- मुक्ताची व आकाशची अपयशी प्रेमाची करूण कहाणी, एवढे पुरे नाही म्हणून चौथ्या मुलीचे, वेधाचे भलतीकडेच वहावत जाणे, अशा प्रकारे "कन्यादान" ही मालिका रंगतदार करण्यात सारीच पात्रे आपल्या यथातथ्य अभिनयाने यशस्वी झालेली आहेत. विशेष कौतुकास्पद गोष्ट म्हणजे आईविना पाच मुलींचा मायाळूपणाने संभाळ करणारे वडील वाडकर मास्तरांच्या रुपातले अविनाश नारकर ह्यांची !

👍स्वराज्य सौदामिनी ताराराणी":👌
या मालिके शिवाय "आई कुठे काय करते !" या कंटाळवाण्या मालिकेच्या वेळी सोनी मराठीवर असलेली "स्वराज्य सौदामिनी ताराराणी" अभिमानास्पद इतिहासाला उजाळा देणारी आणि प्रेक्षकांची पकड घेणारी नाट्यमय मालिका, पाणीदार ध्येयवादी ताराराणीच्या रूपात समर्थपणे तोलून धरली जाते. सध्या "आई कुठे काय करते !" ट्रॅक सोडून कशीही भरकटत चाललेली असल्यामुळे तिच्या ऐवजी ही मालिका अधिक पसंतीची होत आहे.

😊" बॉस माझी लाडाची !"☺️
खुसखुशीत व रंगतदार गुंता असलेली प्रेमकहाणी सन मराठीवरील "बॉस माझी लाडाची ! " ही मालिका देखील न चुकता बघण्यासारखी आहे. त्यामधील कडक स्वभावाची, फॅमिली नको असलेली बॉसच्या रूपातील राजेश्वरी आणि तिचा आर्किटेक असिस्टंट, यांच्या दिलकी ही कहाणी, त्यांच्या लग्नात रुपांतर होणार की नाही, याची उत्कंठा वाढवणारी असल्यामुळे कदाचित सर्वोत्तम मालिका अशीच म्हणावी लागेल, अर्थात सध्यातरी !

😊"जे जे चांगले आहे, वा अनुकरणीय आहे, ते ते जसे कळेल, उमजेल, दिसेल अनुभव येईल त्याप्रमाणे नीरक्षीरविवेकाने गोळा करून त्याला दाद देणे म्हणजे रसिकता होय असे मी मानतो. म्हणून छोट्या पडद्यावर नजर ठेवणार्या रसिकांसाठी माझे वरील योगदान !

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
वरील लेखावर एक प्रतिक्रिया:
👍"तुम्ही धन्य आहात. अशा फालतू मालिका रोज पाहून त्यावर परीक्षण लिहायचे!!! तुमच्या सहनशीलतेला त्रिवार वंदन!!!! 🤔🤔🤔

👍माझा प्रतिसाद:
😊 "ह्या समर्पक प्रतिक्रियेतच लेखाचे शिर्षक व त्यातील गाभा
"टेलिरंजन-काही ही हं !" ह्याला दुजोरा मिळतो !":
"लाँ आँफ डिमीनिशिंग रिटर्नस्":
एखादी गोष्ट जरी खूप आवडली तरी, 
तिच्या जास्त वापरामुळे, 
ती हळूहळू नकोशी होते !"☺️

👍"नियतीचा संकेत-लेख ३: 'तुळ ते मीन राशीची वैशिष्ट्ये !":👌

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":
"रसिकमनांची रसिली यात्रा.....

👍"नियतीचा संकेत-लेख ३ !":👌
💐"तुळ ते मीन राशीची वैशिष्ट्ये !":💐

७ तुळ:
चित्रा नक्षत्राचे दोन चरण स्वाती पूर्ण व विशाखा नक्षत्राचे तीन चरण यांनी बंधारे तुळ रास शुक्राची असून शनि येथे उच्चीचा व रवि नीचीचा होतो, त्यामुळे तुम्हाला शनीच्या साडेसातीचा त्रास तितकासा जाणवत नाही. तराजू हे बोधचिन्ह विवेकबुद्धी व सारासार विचार करून विवेकाने कोणताही निर्णय घेण्याची वृत्ती तुमची असते. टापटीप छान दिसण्याची हौस व मौज-मजा तुम्हाला आवडते. वयाच्या तिशीनंतर उत्तम प्रगती होते. नाट्य-चित्रपट व प्रसिद्धी क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळते. विवाहाचे दृष्टीने मेष राशीबरोबर, तुमचे चांगले सूत जुळतंय तर मिथुन या नवपंचम राशीचे जोडीदार आनंदी समाधानी संसार दर्शवितात. मात्र मीन रास अष्टका मृत्यू षडाष्टक योगामुळे तुम्हाला वर्ज्य असते.

८ व्रुश्चिक:
सगळ्यात गुढ व आपल्या मनातील खळबळ इतरांना जाणवून देणारी ही मंगळाची रास, शक्यतो एकला चालो रे अशा वृत्तीची असते. चंद्र नीचीचा होतो. अतिरेकी अरेरावी तुमचा घात करू शकते. महत्त्वाकांक्षी, आपलाच अधिकार गाजवण्याच्या ईर्षैमुळे तुम्ही सुरक्षा क्षेत्रात व इंजिनीअरिंगमध्ये यश मिळवता. मात्र जीवनात वैफल्याचा धोका अधिक असतो, कारण तुमची सहनशक्ती मर्यादित असते. विवाहाचेदृष्टीने मिथुन रास मृत्यूषडाष्टक योगामुळे वर्ज्य. वृश्चिक राशीची माणसे वृश्चिक राशी बरोबरच विवाहाचे दृष्टीने योग्य ठरतात. येथे कोणतेही ग्रह उच्चीचे होत नाहीत. विशाखा एक चरण पूर्ण अनुराधा व जेष्ठा नक्षत्र यांनी ही रास बनते.

९. धनु:
ही गुरूची रास असून येथे कोणताही ग्रह उच्चीचा व नीचीचा होत नाही. मूळ पूर्वाषाढा ही नक्षत्रे पूर्ण व उत्तराषाढा चा एक चरण यांनीही राशी बनते. मूळ नक्षत्री जन्म असेल तर त्याची शांती करावी लागते. सोशिकता चांगुलपणा व कष्टाळू वृत्ती यामुळे अडचणीतून मार्ग काढून तुम्ही पस्तिशीनंतर जीवनात स्थैर्य मिळवता. मेष व सिंह राशीचे जोडीदार संसारात नवपंचम योगामुळे उत्तम साथ देतात. तर शुक्राची रास मृत्यू षडाष्टका मुळे चालत नाही.

१०. मकर:
उत्तराषाढा नक्षत्राचे तीन चरण पूर्ण श्रवण व धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण मिळून ही रास बनते. मकर रास ही शनिची रास असल्याने तुम्हाला, त्याच्या साडेसातीचा खास असा त्रास होत नाही. तिथे मंगळ उच्चीचा तर गुरु निश्चित होतो. ध्येय गाठेपर्यंत चिवटपणा, त्याला कष्टाची जोड यामुळे नोकरी-व्यवसायात धीम्या गतीने तुमची प्रगती होते. आपली फुशारकी तुम्ही मारत नाही. कर्तबगार थंड डोक्याने काम करणारी ही माणसे असतात. सिंह रास मृत्यू षडाष्टक योगामुळे विवाहासाठी अयोग्य. तर नव पंचमातील व्रुषभ व कन्या जोडीदार संसारात गोडी आणतात.

११.कुंभ:
मातीचा घडा असे कुंभ राशीचे चिन्ह आहे. ज्ञानाचा माहितीचा जणू सागर असे तुमचे स्वरूप असते. काहीशा अबोल पण हुशार माणसांची ही रास शनीने आपली मानली आहे. येथे कोणताही ग्रह उच्चीचा वा नीचीचा होत नाही. कुंभ व्यक्तीनाही साडेसातीचा तेवढा त्रास होत नाही. संसाराबाबतीत आपण उदास असता व एकंदर निरीच्छ. संशोधन अभ्यास वृत्ती व ज्ञानलालसा ही तुमची खास वैशिष्ट्ये. कर्क रास मृत्यू षडाष्टकामुळे विवाहासाठी टाळावी. मिथुन व तुला राशीचे जोडीदार तुमच्याशी कसेबसे जुळवून घेतात.

१२. मीन:
दोन विरुद्ध दिशेला धावणारे मासे असे तुमचे बोधचिन्ह आहे ही गुरूची रास असल्याने साधी सरळ माणसं धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात चंचलता व धरसोड वृत्ती तुमचे नुकसान करू शकते शुक्र येथे उच्चीचा तर बुध्दीची चाहो तो सहसा तुम्ही कुणावर विश्वास ठेवत नाही व्यावहारिक जीवनात ठेचा खात खात पुढे जावे लागते तूळ राशीचे जोडीदार मृत्यू षडाष्टक or मुळे मीन व्यक्तींना चालत नाही कर्क व कन्या रास विवाह हे दृष्टीने नवपंचम योग होत असल्याने चांगल्या असतात.
ह्यापुढील लेखांत जन्मलग्नपत्रिका व ग्रहांच्या महादशा ह्यांचा उहापोह करण्याचा मानस आहे, तिचाही अभ्यास व उपयोग करावा.
धन्यवाद
सुधाकर नातू

सोमवार, ३० मे, २०२२

# 👍"रंगाची दुनिया-'अनुभवाचे बोल !":👌

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":
"रसिकमनांची रसिली यात्रा.....

👍"अनुभवाचे बोल !":👌
💐"नियतीची किमया !!":💐
"लहानपणी शाळेत किंवा घरी केव्हा ना केव्हा तरी प्रत्येकाला हा प्रश्न विचारला जातो 'तो पुढे मोठा झाल्यावर कोण होणार?' मग प्रत्येक जण आपआपल्या कुवतीप्रमाणे वा स्वप्नातील इच्छेप्रमाणे मत व्यक्त करत असतोः मास्तर, कंडक्टर, इंजिन ड्रायव्हर, इंजीनियर, डॉक्टर वा अभिनेता वगैरे वगैरे !

पण पुढे तसं होतच असं नाही. असं कां होतं, हा प्रश्न प्रत्येकाने विचारात घेण्याजोगा आहे. प्रत्येकाचं आयुष्य आणि जीवनरेखा कसा मार्ग घेईल हे कोणीच कुणाला सांगू शकत नाही. मागे वळून पाहताना पुष्कळदा अनेक निर्णय चुकलेले वाटतात, तर कधी कधी अवचित असं वळण येतं की, त्यामुळे संधी मिळून, जे घडणार नाही तेही घडून जातं.

ह्या सगळ्यामागे एक मोठं गुढ आहे. परिस्थिती त्यानुसार निर्णय आणि कृती अथवा वागणं त्यातून निर्माण होणारी फलनिष्पत्ती अथवा फळ म्हणजे अर्थातच नवीन परिस्थिती, ही साखळी सातत्याने माणसाच्या आयुष्यात मार्गक्रमणा करत असते. त्याचं त्याला त्यावेळी काही लक्षातही येत नाही, परंतु या सगळ्या चार-पाच बाबींमागे एक अदृष्य शक्ती बहूदा असते आणि तीच कदाचित सगळ्या या साखळीला योग्य ती दिशा दाखवत असते. ती अदृश्य किंवा गुड शक्ती म्हणजे नियती अथवा नशीब होय.

कोणी मानो वा न मानो, प्रत्येकाच्या आयुष्यात नशिबाच्या खेळीचा प्रभाव सातत्याने पडलेला दिसतो. अजून तरी कुणालाही त्या नशिबाच्या अथवा नियतीच्या रुपाचे, प्रभावाचे योग्य ते विश्लेषण करता आलेले नाही. हीच तर जीवनाची गंमत आहे ! सारे गुढ अदभूत व अगम्य. म्हणूनच कदाचित प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे एक सुरस चमत्कारिक अशी कादंबरी असते, असे म्हणतात.
---------------------------
👍"अनुभवाचे बोल !":👌
😊 "आशा वा निराशेचा खेळ !"😢
"अपेक्षा आणि जबाबदारी या जुळ्या बहिणी असाव्यात, कारण एक आली की, तिच्या पाठोपाठ आपोआप दुसरी येते किंवा दुसरी जर अंगावर पडली, तर आपोआप पहिली आलीच आली. ह्या लपंडावाच्या खेळापासून माणसाची सुटकाच नाही.

एकमेकींवर अवलंबून असणाऱ्या अपेक्षा आणि जबाबदारी ह्या भावना, माणसाच्या जीवनात सातत्याने त्याच्या मागे लागलेल्या असतात. त्यामुळे त्याचे काम होते किंवा होतही नाही. सहाजिकच अपेक्षाभंग अथवा समाधान ह्याही भावना त्यांच्या परिणामांवर अवलंबून असतात.

शक्यतोवर आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जी जबाबदारी आपोआपच आपल्यावर येते, ती कसोशीने प्रामाणिकपणे व निष्ठेने कष्ट घेऊन पार करणे, हे सातत्याने प्रत्येकाचे कर्तव्य असते. पण सध्याच्या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या जगामध्ये, हे साधतेच असे नाही. कारण ज्याच्याकडून आपण अपेक्षा करतो, तो योग्य ती कृती न करता जबाबदारी टाळतो आणि दुसऱ्याला मनस्ताप होतो. माणसांच्या समस्यांचे, सुखदुःखाचे मूळ हे अपेक्षेनुसार जबाबदारी पूर्ण करण्यावर अवलंबून आहे."
--------------------------
👍"अनुभवाचे बोल !":👌
# "सोशल मिडीया" वरील कोणतेही पोस्टींग शेअर वा फाँरवर्ड करण्यापूर्वी प्रथम त्याची सत्यता आजमावली जाणे अत्यावश्यक आहे. तशी खात्री पटल्यानंतर त्याची उपयुक्तता ज्यांना असू शकते, त्यांनाच ते शेअर वा फाँरवर्ड करावे. आले पोस्टींग, न पूर्ण वाचता, केले शेअर वा फाँरवर्ड असे कधीही करू नये.

# कोणत्या गोष्टींना केव्हा व कां प्राधान्य द्यावयाचं आणि कोणत्या गोष्टींना दुर्लक्षित करावयाचं, हे ज्यांना अचूक जमतं, तेच परिस्थिती हवी तशी बदलू शकतात.
---------------------------
धन्यवाद
सुधाकर नातू

#👍"शारदोत्सव-अफलातून 'बोव्हेट डायरी''!":👌

 👍"शारदोत्सव-अफलातून 'बोव्हेट डायरी'!":👌

आपल्या कुटुंबात कुणीना, कुणीडॉक्टर असावं, अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु हे पुष्कळदा शक्य नसते अथवा दुर्मिळ असते. डॉक्टर कुटुंबात अनेक डॉक्टर होतात, पण इतर ठिकाणी मात्र तशी अवस्था नसते. डॉक्टर हा नेहमीच अत्यंत महत्त्वाचा व अत्यावश्यक सामाजिक घटक मानला जातो. अत्यंत चुरशीच्या अशा शैक्षणिक परीक्षेच्या स्पर्धेमधून मेडिकलला प्रवेश हा देखील एक अत्यंत कठीण आव्हानाचा भाग असतो.

सर्वसाधारणपणे आपल्याला डॉक्टर म्हटले की, अँलोपॅथिक, होमिओपॅथिक किंवा आयुर्वेदिक असेच माहित असते. परंतु पशुवैद्यक किंवा व्हेटर्नरी डॉक्टर नेहमीच्या भाषेत गुरांचा डॉक्टर बहुदा कुणाच्याच मनात सहसा येत नाही. निदान शहरी माणसांच्या तरी आणि ग्रामीण भागातसुद्धा केव्हा तरी गरज पडेल त्याप्रमाणे पशुवैद्यकाची आठवण येऊ शकते. त्यामुळे आतापर्यंत कुठलीही गोष्ट माहीत नसलेली कधी कल्पनाही करता येणार नाही, अशा या पशुवैद्यक शिक्षणासंबंधीची अनुभवाची अदभूत शिदोरी एका लेखामधून मौज दिवाळी अंक'२१ मध्ये मला जेव्हा वाचायला मला मिळाली, तेव्हा जणु अलिबाबाच्या गुहेतील मौल्यवान माहीती पदरी पडले !

लेख वाचू लागल्यावर पहिल्यांदा तरी वाटले अरेच्या ही 'बैल घोडा कॉलेज' भानगड काय आहे ! कारण मुंबईत इतकी दशके असूनही मला असे काही कॉलेज येथे आहे हे माहित नव्हते. तिथल्या निसर्गरम्य परिसराचा उल्लेख वाचताना तर मी चकितच झालो, तसेच गोरेगाव येथे देखील आरे कॉलनीच्या जवळपास व्हेटर्नरी कॉलेज आहे ही देखील माहिती माझ्यासाठी नवीनच होती. अशा कितीतरी विस्मयकारी, कदाचित कधीकधी धक्कादायक अशा गोष्टींची माहिती हे शिक्षण पूर्ण करणाऱ्या लेखिकेच्या 'बोव्हेटची डायरी' ह्या आगळ्यांवेगळ्या शिर्षकाच्या लेखातून लाभली. ज्ञानवर्धनाच्या व जिज्ञासेचे क्षेत्र विस्तारण्याचा हा खरोखर एक अद्भुत असा कपिलाषष्ठीचा योग होता, असेच आता म्हणावयाला हवे.

"बोव्हेट डायरी" ह्या अनाकलनीय शीर्षकामुळे मी मौज दिवाळी अंकातील हा लेख वाचणे, आत्तापर्यंत टाळले होते. कारण ही काय भानगड आहे असेच मला वाटले होते. परंतु जेव्हा माझ्या लक्षात आले की "बोव्हेट" म्हणजे बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेज अथवा बैल घोडा कॉलेज, तेव्हा माझे कुतुहूल वाढत गेले आणि पाहता पाहता मी तो लेख पूर्ण वाचून काढला. त्या चित्तथरारक वाचनामुळे जे मला मनात वाटले ते शब्दात व्यक्त करणे खरोखर कठीण आहे. कारण आजतागायत काहीही माहीत नसलेल्या अशा अनेक गोष्टींच्या अद्भुतरम्य कदाचित विचित्र अशा भावविश्वाची मला त्यामुळे ओळख झाली !

आधी पशुवैद्यकशास्त्र शिकणे हाच मुळी कधी आपल्या मनात न येणारा विचार. त्यातून मुली देखील पशुवैद्य होतात, हे जेव्हा मला समजले तेव्हा मला न भूतो न भविष्यती आश्चर्य जसे वाटले, तसेच त्यांचे कौतुकही वाटले. ही लेखिका तर जिद्दीने पशुवैद्यक व्हायचंच या ईर्षेने गावाहून मुंबईत आली आणि तिने मोठ्या जिद्दीने तिचा अभ्यासक्रम कसा पूर्ण केला, त्या संघर्षमय धडपडीची धावती अनुभव कहाणी या अविस्मरणीय लेखात आहे. हा लेख म्हणूनच चोखंदळ वाचकांनी मुळापासून संपूर्ण वाचावा असाच एकमेवाद्वितीय आहे.

इथे काय काय अफलातून आहे, किती गुढ गुपिते लपलेली आहेत हे कळेल. आतापर्यंत पशुवैद्यक म्हणजे काय हे माहीत नसते, फार तर आपला मांजरी कुत्रे गाई म्हशी बैल एवढ्या पशुंशी कदाचित संपर्क येतो. परंतु पशुंचा डॉक्टर, हा विषय तर आपल्या खिजगणतीतही नसतो. त्या विश्वाची ओळख म्हणजे अंधार्या गुहेतून प्रकाशाकडे जाणारी एक मोठी मजेशीर चित्तथरारक वाटचाल आहे हे या लेखावरून समजते.

त्यासंबंधीची ही थोडक्यांत झलक:
👍 "पशुवैद्यक महाविद्यालयाच्या आवारात बाहेरच्या रस्त्यावरील गाड्यांची धावपळ याचा कोणताही लवलेश दिसत नव्हता. चहूबाजूची दाट झाडी त्यामुळे जाणवणारा प्रसन्न गारवा, त्याचप्रमाणे ब्रिटिशकालीन गाँथिक शैलीतल्या बांधकाम केलेल्या दगडी इमारती होत्या. इमारतींच्या बाजूला गेलेल्या काळ्या डांबरी सडका दिसत होत्या.

आरे कॉलनीतील कॉलेज परिसर देखील हिरवागार आणि गावाची आठवण करून देणारा होता. हिरव्या झाडांवर नव्याने बसलेले पांढरी शुभ्र बगळे दिसायचे दगडी कुंपणाने बंदिस्त केलेला मोठा परिसर लक्ष वेधणारा."

👍"कॉलेजमध्ये सीनियर मंडळी ज्युनियर वा नवीन विद्यार्थ्यांना कसे छळत, रॅगिंग करतात त्याचाही येथे ओझरता उल्लेख आहे. एका सीनियरने ज्युनियर असलेल्या मुलीच्या समोर एक गांडूळ धरून
विचारले की 'हा नर आहे का मादी आहे?' त्यावेळेला त्या मुलीने तडफेने सांगून टाकले 'गांडूळ नर वा मादी नसतो, तो उभयलिंगी असतो' अशी हुशारी दाखवणार्या मुली तेथे होत्या !"

👍"शिक्षकांची अलिप्तपणे शिकवायची पद्धत होती. वर्गात प्रत्यक्ष जनावरांची हाडे आणली जाऊन त्यांची ओळख करून दिली जायची. कुत्र्याचे हाड वा एखाद्या गुराचे हाड, त्या प्रत्येकाची वैशिष्ट्ये सांगितली जायची. सगळ्यात भयावह अनुभव म्हणजे, एकदा एका म्हशीच्या रेड्याच्या शवविच्छेदनचा ! त्याचे प्रात्यक्षिक पाहताना एक मुलगी तर चक्क बेशुद्ध पडली. याची ही कहाणी येथे आहे. रवंथ करणाऱ्या प्राण्यांना नैसर्गिकरीत्या वरचे दात नसतात. जनावरांच्या मादीच्या कंबरेतील हाडाची तर मजेशीर माहिती दिलेली आहे. त्याच्या आतमध्ये गर्भाशय असते. गर्भीची संपूर्ण वाढ हे हाड तोलून धरते आणि गर्भाशयाला आधार देते. "

👍"लेखात केवळ वेगवेगळ्या प्राण्यांची विविधता बघायला मिळाली असे नाही, तर शिकायला येणारी मुले टोकाच्या विभिन्न आर्थिक परिस्थितीतून आलेली असायची. तर काही मुलं "एमपीएससी" करायचे असे ठरवून येथे ऍडमिशन घेऊन चक्क होस्टेलवर एमपीएससीचा अभ्यास करायची, पशुवैद्यक शास्त्रात त्यांना रस नसायचा. तीच पुढे पास होऊन उच्च सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी वगैरे झाली. त्याउलट श्रीमंत घरच्या मुले-मुली कुत्र्या मांजरांचा वेडापायी व्हेटर्नरी कॉलेजला यायची. त्यांना कुत्र्या मांजरांच्या सुखदुःखात रस असायचा.
एक गमतीशीर माहिती म्हणजे तेथे परिसरात वावरणारा 'रॉकी' नावाचा एक कुत्रा होता. तो नेहमी सगळीकडे बिनधास्त फिरायचा. एवढेच काय कधी टधी लेक्चरच्या वेळेला वर्गातही कोपऱ्यात बसायचा. पुढे विद्यार्थ्यांचा संप झाला. त्या वेळेला जी सभा झाली, त्या सभेमध्ये घोषणा जोरात दिल्या गेल्या. त्या ऐकून इतका वेळ तेथेच झोपलेला रॉकी जागा होऊन भुंकायला लागला, जणु तोही सामिल होता ! अशी गंमतही तेथे मांडली आहे."

👍 मुलींच्या होस्टेलवरील एका बंद खोलीची भयावह कहाणी आणि अनुभव येथे मांडला आहे. ती खोली कायम बंद होती, कारण तिथे पूर्वी एका मुलीने जाळून जीव दिला होता. लेखिका जेव्हा त्या खोलीत गेली, तेव्हा भिंतीवर भलामोठा काळा डाग तिला दिसला आणि ती भीतीने थरारली. तिला प्रश्न पडला माणसं जाळून घेण्याइतकी निराश कां होतात?

👍"इ.स. ९२/९३ च्या जातीय दंगलीची एक छोटीशी आठवणही चित्तथरारक आहे. तेथे एका गोड बारा वर्षाच्या हरवलेल्या मुलाची अखेर कोण कशी सुटका करतं व त्याला त्या भीषण वातावरणात त्याच्या घरी आणून सोडतं ! ती कहाणी खरोखर मनाला जाणवून देते की माणुसकी देखील जिवंत आहे."

👍"सगळ्यात लक्षात ठेवण्याजोगी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पशूंची रोगी म्हणून उपचारासाठी आल्यावर त्यांच्या रोगाचे दुखण्याचे निदान कसे करायचे, ह्याबद्दल सरांनी दाखवलेले प्रात्यक्षिक व त्यामधून शिकायचा धडा: "माणूस जेव्हा आजारी पडतो आणि डॉक्टरकडे जातो तेव्हा नातेवाईकांशी डॉक्टर बोलून, स्वतः रोगी त्याला काय काय त्रास होतो ते
डॉक्टरांना प्रत्यक्ष सांगू शकत असतो. साहजिकच रोग्याला तपासून डॉक्टरला योग्य ते रोगनिदान करता येते व उपचार सांगता येतात. पण पशुवैद्यकाच्या बाबतीत सारे वेगळे असते. कारण येथील पशुरूपातील रोगी डाँक्टरांबरोबर बोलू शकत नसतो. त्याला काय दुखणे होते आहे, हे समजून घेणे महाकर्मकठीण असते. अशा वेळेला डॉक्टरने नातेवाईकांबरोबर संपूर्ण पार्श्वभूमीचा, विविध घटनांचा अभ्यास कसा करायचा, त्याकरिता प्रश्न विचारून अचूक माहिती मिळवून रोगनिदान कसे करायचे, त्याचे प्रात्यक्षिक येथे वर्णिलेले आहे. खरोखर विचारात घेण्याजोगी गोष्ट आहे की मुक्या प्राण्यांना काय होतंय हे नीट समजून, त्याच्यावर अचूक उपचार करणारे पशुवैद्य म्हणजे खरोखर त्यांच्यासाठी देवदूतच !"

👍 नंतर पदवी मिळाल्यावर प्रॅक्टिस करण्यासाठी एका सीनियर पशुवैद्यकाने डाँक्टर लेखिकेला दिलेला नकार तिच्या जिव्हारी लागला. कारण तो म्हणाला की 'मुली वेगवेगळ्या पशूंच्या तबेल्यांमध्ये जाऊ शकणार नाहीत', त्यामुळे त्याने नकार दिला होता. पण तिने जिद्दीने ठरवले की, याच पशुवैद्यकशास्त्रात प्रगती करेन आणि त्याप्रमाणे पोस्टग्रॅज्युएशन देखील केले आणि पुढे ती एक नामांकित पशुवैद्य झाली !"

खरंच आगळीवेगळी सुरस चमत्कारिक अशीच आहे, नाही कां ही कहाणी "बोव्हेट डायरी"ची ! गमतीशीर गोष्ट म्हणजे हा लेख विनया जंगले ह्या अर्थपूर्ण नांवाच्या लेखिकेने लिहीला आहे ! म्हणजे 'शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले' असेच हे नाव आहे नाही कां !

सावित्रीच्या लेकी आता पुरुषांच्या बरोबरीने जवळ-जवळ सर्वच क्षेत्रात समर्थ कामगिरी करू लागल्या आहेत ही खरोखरच समाधानाची व भूषणावह गोष्ट आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

शनिवार, २८ मे, २०२२

👍"नियतीचा संकेत-लेख २-'मेष ते कन्या राशींचीवैशिष्ट्ये !":👌

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":

"रसिकमनांची रसिली यात्रा.....

👍"नियतीचा संकेत-लेख २ !":👌

"मेष ते कन्या राशींची वैशिष्ट्ये !”:        

आपला "रंगांची दुनिया" हा समूह उत्तरोत्तर चांगली प्रगती करत आहे असे दिसते. कारण विविध मनोरंजक कलाविष्कार, त्याचप्रमाणे माहितीपर ज्ञानवर्धक असा मजकूर आपल्या समूहावर प्रकाशित केला जात आहे. 

रसिक मन हे नेहमी कुतुहूल आणि जिज्ञासा यांना आपलेसे करत असते. नवनवीन विषय जाणून घेणे, हाही त्यातलाच एक भाग असतो. मी देखील माझ्या "नियतीचा संकेत" या डिजिटल लेखसंग्रहातील लेख, प्राथमिक ज्योतिष विषय घरबसल्या सर्वांना सुलभतेने समजावा, या हेतूने क्रमशः देत आहे. त्यातील हा दुसरा लेख. 


आता ह्या खास लेखांत प्रत्येक राशीसंबंधी उपयुक्त माहीती करून घेऊ. त्यात राशीस्वामी अर्थात् ती राशी कोणत्या ग्रहाची, त्या राशीतील नक्षत्रे कोणती, त्याराशी कोणता ग्रह उच्चीचा तर कोणता ग्रह नीचीचा होतो ह्याची ओळख करून दिली आहे.

१.    मेष: 

मेष रास मंगळाची रास आहे रवी येथे उच्चीचा होतो त्यामुळे तुम्ही शीघ्रकोपी महत्त्वाकांक्षी असतात. उद्योग करत राहणे हा तुमचा स्थायीभाव असतो येथे शनी नीचेचा होत असल्याने शनीच्या साडेसातीचा तुम्हाला जास्त असतो. वय वर्ष 28 नंतर सर्वसाधारणपणे तुमचा भाग्यदय येतो. विवाहाचे दृष्टीने तुला राशी तुमचे चांगले धागेदोरे जुळतात. सिंह व धनू राशीच्या व्यक्ती तुमचा संसार गोडीचा होऊ शकतो, कारण त्यांच्याशी नवपंचम योग होतो मात्र मृत्यू षडाष्टकतील कन्या रास मात्र तुम्हाला त्याकरता पूर्ण वर्ज्य असते.

२. व्रुषभ: 

क्रुत्तिका नक्षत्राचे तीन, पूर्ण रोहिणी व म्रुगाचे दोन चरण ह्यांनी ही शुक्राची रास बनली आहे. चंद्र इथे उच्चीचा होतो व कुणीही ग्रह नीचीचा नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी उत्साही आनंदी असून उद्योगमग्नता हे तुमचे वैशिष्ट्य आहे. रसिकता विलासी व्रुत्ती व खिलाडूपणा असतो. नेहमी नीटनेटके व प्रसंगानुसार व्यवस्थित रहाणे पसंत करता. आळस नसतो, तारुण्यात अडचणींवर मात करून तुम्ही स्वबळावर जीवनात स्थैर्य व प्रगती साधता. म्रुत्युषडाष्टकातील धनु राशी, विवाहासाठी वर्ज्य आणि व्रुश्चिक ह्या मंगळाच्या राशीबरोबर तसेच नवपंचम योग साधणार्या कन्या व मकर राशीच्या जोडीदारांबरोबर संसार सुख समाधानाचा होऊ शकतो. 

3.मिथून: 

मिथुन रास ही विचारी, बुद्धिमान बुधाची रास आहे. स्त्री-पुरुषाचे युगुल असे बोधचिन्ह असल्याने स्त्रीची कोमलता व तर पुरुषाचा अहंकार असे द्विस्वभावी रूप तुमच्या राशीचे असते. कोणताही ग्रह येथे उच्चीचा वा नीचीचा होत नाही. आपल्या मनात काय चाललंय हे तुम्ही कुणालाच कधी जाणवू देत नाही. बोलघेवडेपणा मिश्किल थट्टा तुम्हाला आवडते. तूळ व कुंभ या नवपंचम योगातल्या राशीचे जोडीदार तुमच्याशी संसार चांगला करतात, मात्र वृश्चिक ही बुधाचा शत्रू असलेल्या आणि तुमच्या षडाष्टकात असलेल्या मंगळाची रास तुम्हाला विवाह साठी टाळावी लागते. म्रुगाचे दोन चरण रोहिणी पूर्ण व पुनर्वसु नक्षत्राचे तीन चरण मिळून ही राशी बनते.

४ कर्क: 

कर्क रास ही चंद्राची रास असल्यामुळे भावनाप्रधान कल्पक व प्रतिभा माणसांची राशी आहे. मंगळ येथे नीचीचा तर गुरु उच्चीचा होतो. संसारात तुम्हाला खूप गोडी असते. तुम्हाला माणसे हवीहवीशी असतात. प्रेमात तुमच्या चंचल स्वभावामुळे नुकसान फसगत होऊ शकते. कवी-लेखक कलावंतांची ही रास जीवनात सुखदुःखाचे वादळवारे नेहमी पचवत असते. विवाहाकरता मृत्यू षडाष्टकातील कुंभ रास वर्ज्य, तर मीन व वृश्चिक राशी नवपंचम योगामुळे शुभ फळे संसारात देतात. पुनर्वसुचा एक चरण तर सर्वात शुभ नक्षत्र पुष्य पूर्ण व अनिष्ट आश्लेषा नक्षत्राने ही रास बनते.

५ सिंह: 

वनराज सिंहाची ही रास, सर्वांवर अधिकार गाजवते कुणाकडे हार जाणे तुम्हाला आवडत नाही. आपला शब्द हा अंतिम असावा असा तुमचा आग्रह असतो. एक प्रकारचा हट्टी स्वभाव हे तुमचे वैशिष्ट्य असते. मात्र तुम्ही दीर्घोद्योगी निश्चय व महत्त्वाकांक्षी असल्यामुळे जीवनात नेहमी अग्रेसर राहून यश मिळवू शकता. नवपंचम योगातील मेष व धनु राशीचे जोडीदार विवाहासाठी अनुकूल ठरतात, तर मृत्यू षडाष्टकातील मकर रास चालत नाही, पूर्ण मघा आणि पूर्ण पूर्वा नक्षत्र तर उत्तरा नक्षत्राचा एक चरण मिळून ही रास बनते. जीवनात मध्यम वयात तुम्हाला स्थैर्य व भरभराट अनुभवास येते.

६. कन्या: :

अत्यंत चिकित्सक कन्या राशीची माणसे संशयी व आतल्या गाठीची असतात अकाउंट्स ऑडिट वकिली पेशात उत्तम यश मिळवतात. ही बुधाची रास असून बुध येथे उच्चीचा होतो, मात्र शुक्र येथे नीचीचा होतो. शैक्षणिक यश, वाद-विवादात तुम्ही छाप पाडता. मात्र तुम्ही नेहमी काळजी किंवा चिंता करत असता, त्यामुळे कपाळावर कायमच्या आठ्या, असे हे माणसांचे स्वरूप असते. निर्भेळ सुख मिळवणे तुम्हाला कठीण होते. विवाहाचे दृष्टीने मृत्यूषडाष्टकातील मेष रास टाळावी तर व्रुषभ व मकर हे नवपंचम रात्रीतले जोडीदार तुमच्याबरोबर संसार आनंदाचा करू शकतात. उत्तरा नक्षत्रातील तीन चरण, पूर्ण हस्त व चित्रा नक्षत्राचे दोन चरण यांनी कन्या रास बनते.

तुळ ते मीन राशीची वैशिष्ट्ये पुढच्या लेखात. आपल्या प्रतिसादावर पुढची वाटचाल अवलंबून आहे.

धन्यवाद

सुधाकर नातू


शुक्रवार, २७ मे, २०२२

👍"ह्याला जीवन ऐसे नांव !" :😢

 

👍"ह्याला जीवन ऐसे नांव !" #:😢

👍"सबके साथ, जीवन भकास":😢

येथे मला, एका गंभीर वास्तवाकडे लक्ष वेधायचे आहे. सध्या कुणा विशीतल्या तरुणाला अचानक हार्ट फेल होऊन म्रुत्यु येतो, तर कुणी खेळाडू असाच मैदानावर खेळता खेळता राम म्हणतो. चाळीशींत कोणे एके काळी लागणारा चष्मा पहिली दुसरीतल्या मुलांना लागतो. पन्नाशी साठीनंतर येणारे उच्च रक्तदाब वा मधुमेहासारखे आजार आता वयाच्या पंचविशी वा तिशीत शिरकाव करताना दिसत आहेत.

कँन्सर सारखा भयावह जीवघेणा रोग कुणाला केव्हा जडेल ह्याचाही काही नेम राहिला नाही. विविध प्रकारच्या जीवघेण्या अपघातांमुळे तर माणसे दररोज किड्यामुंगीसारखी मरताना दिसत आहेत. एकीकडे शरीर विज्ञान व मेडीकल संशोधन अचंबित करणारे पराक्रम करत असताना, अनारोग्याची ही वयातीत अनिश्चितता भयावह आहे.

जीवनातील स्पर्धा विकोपाला गेली आहे, अपेक्षा उंचावत असताना प्रयत्न अपुरे पडत आहेत आणि ताणतणाव असह्य मर्यादा गांठत आहेत. दुसर्या बाजूला सार्वजनिक आरोग्यसेवेलाच अव्यवस्थेमुळे आयसीयुमध्ये घालण्याची वेळ आलेली दिसत आहे. खाजगी आरोग्यसेवा उत्तरोत्तर महागडी व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची झाली आहे. गरीब श्रीमंतामधली विविध आर्थिक स्तरांवरील दरी भयानक रूंदावत चाललेली आहे, ते वेगळेच!

हे असे कसे कां व कुणामुळे झाले त्याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. ऐहीक प्रगती व श्रीमंती म्हणजेच जीवनातील यश असे मानण्याच्या नवसंस्क्रुतीने जो तो अक्षरश: सुसाट धावत सुटला आहे. अशा तर्हेच्या जीवन तत्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर, तंत्रज्ञानाच्या अचाट प्रगतीमुळे जीवनशैलीत आमुलाग्र बदल होऊन माणूसामाणसातील आपुलकीचे नाते भंग पावताना दिसत आहे. माणसे एखाद्या रोबोटचा अवतार बनण्याचा व त्यांची बेटे बनण्याचा धोका आ वासून उभा आहे.

"सबका साथ, सबका विकास" ऐवजी
"सबके साथ जीवन भकास" असे म्हणायला लागण्याची वेळ आता खरोखर दूर नाही. जीवनविषयक आणि सार्वजनिक विकासविषयक मूलभूत संकल्पनांचाच गांभीर्याने पुन्हा सर्वांनीच विचार करणे ऐरणीवर येणे गरजेचे आहे."

😊"आशा वा निराशेचा खेळ !"😢

"अपेक्षा आणि जबाबदारी या जुळ्या बहिणी असाव्यात, कारण एक आली की, तिच्या पाठोपाठ आपोआप दुसरी येते किंवा दुसरी जर अंगावर पडली, तर आपोआप पहिली आलीच आली. ह्या लपंडावाच्या खेळापासून माणसाची सुटकाच नाही.

एकमेकींवर अवलंबून असणाऱ्या अपेक्षा आणि जबाबदारी ह्या भावना, माणसाच्या जीवनात सातत्याने त्याच्या मागे लागलेल्या असतात. त्यामुळे त्याचे काम होते किंवा होतही नाही. सहाजिकच अपेक्षाभंग अथवा समाधान ह्याही भावना त्यांच्या परिणामांवर अवलंबून असतात. 

शक्यतोवर आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जी जबाबदारी आपोआपच आपल्यावर येते, ती कसोशीने प्रामाणिकपणे व निष्ठेने कष्ट घेऊन पार करणे, हे सातत्याने प्रत्येकाचे कर्तव्य असते. पण सध्याच्या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या जगामध्ये, हे साधतेच असे नाही. कारण ज्याच्याकडून आपण अपेक्षा करतो, तो योग्य ती कृती न करता जबाबदारी टाळतो आणि दुसऱ्याला मनस्ताप होतो. माणसांच्या समस्यांचे, सुखदुःखाचे मूळ हे अपेक्षेनुसार जबाबदारी पूर्ण करण्यावर अवलंबून आहे."

"टी20"सामन्यांप्रमाणे, मर्यादित वेळेत राहून अधिकाधिक उत्कंठापूर्ण व हव्या हव्याशा वाटण्याचे कौशल्य टीव्हीवरील मालिका दाखवतील कां?

-----------------------------

👍""वारसा, खालसा!":😢

नामवंत घराण्याची मूळ व्यक्ती जितकी धोरणी, कर्तबगार व नेत्रुत्वगुण, दूरद्रुष्टि असणारी असते, तेवढे व तसे कार्यक्षम तिचे नंतरचे वारसदार अभावानेच निपजतात.

राणा भीमदेवी थाटाने अशा वारसदारांनी कितीही वल्गना केल्या, तरी केव्हा ना केव्हातरी त्यांचे पितळ उघडे पडतेच.

कुठल्याही क्षेत्रातील नावाजलेल्या घराण्यांची घसरगुंडी, जरी लगेच दुसर्याच पिढीत झाली नाही, तरी तिसर्या वा चौथ्या पिढीनंतर र्हास सुरु होतो, ह्याला इतिहास साक्ष आहे.

-----------------------------


गुरुवार, २६ मे, २०२२

#👍"वाचा, फुला आणि फुलवा !":👌

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":
"रसिकमनांची रसिली यात्रा.....💐

👍"वाचा, फुला आणि फु़लवा !":💐

👍"ज्याच्या हाती पुस्तक"
लेखकः जाँन गोन्सालविस.:👌

फक्त पुस्तक वाचूनच आनंद मिळतो असे नाही, तर पुस्तक प्रकाशन समारंभाचा जो व्रुत्तांत असतो त्यातूनही आगळेवेगळे समाधान मिळू शकते. असा अनुभव मला "शब्द' रूची" एप्रिल'२२ चा अंक वाचताना आला. त्यामध्ये अंकाच्या शेवटी विविध पुस्तक प्रकाशन समारंभांबद्दल मनोरंजक माहिती दिलेली होती. त्यातून अनेक पुस्तकांबद्दल उद्बोधक कल्पना आपल्याला येऊ शकते आणि आपल्या जाणिवांचा भवताल अधिक विस्तारित होतो.

या अंकामध्ये एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाच्या प्रकाशना संबंधी माहिती आहे. प्रत्यक्ष वाचनसवयी संबंधात हे पुस्तक आहे. त्याचे शीर्षकही मोठे आकर्षक असे आहे "ज्याच्या हाती पुस्तक" असे त्याचे शीर्षक आहे, किती अनुरूप असे हे शीर्षक आहे ! नेहमी आपण "जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी !"असे म्हणत असतो. तसेच "ज्याच्या हाती पुस्तक, त्याची ज्ञानकक्षा विविधस्पर्शी" ! असा अनुभव हे पुस्तक वाचल्यानंतर येऊ शकतो.

या पुस्तकाचे शीर्षक आगळेवेगळे आणि प्रेरणादायी आहे. कारण त्यामध्ये अभ्यासू, जातिवंत चोखंदळ, बहुश्रुत असे आदर्श वाचकांचे विविध पैलू पुस्तकात उलगडून दाखवले आहेत. वाचन संस्कृतीवर लिहिलेले हे पुस्तक, त्यावरून लेखकाच्या अफाट आणि चौफेर वाचनाच्या सवयीचे दर्शन घडवते. वाचनाविषयी तसेच एकंदर जीवनाविषयी महान असे विचारधन या पुस्तकात आहे.

या पुस्तकात काय काय नाही ! अनेकविध अशा विषयांना स्पर्श त्यामध्ये केलेला आहे, बालकवींचे काव्य, खांडेकरांचे तत्वज्ञान, कुसुमाग्रज अर्थात
वि वा शिरवाडकर यांचा क्लिष्ट विषय सोपा करून सांगण्याची पद्धत, पु ल देशपांडे यांचे नर्मविनोद इ.इ. अशी २६ प्रकरणे या पुस्तकात आहेत. विविध भाषांतील वेगवेगळ्या, भूभागातील, त्याचप्रमाणे अनेक लोकप्रिय साहित्यिकांच्या पुस्तकांचा अभ्यास करून, त्यांची वैशिष्ट्ये जणु अर्काच्या स्वरूपात या पुस्तकात व्यक्त केलेली आहेत. प्रकाशन समारंभाच्या विवेचनावरून मला जाणवले की, हे एकच पुस्तक जरी कोणी वाचले, तरी त्याला अनेक ग्रंथ वाचल्याचे ज्ञानसमाधान मिळू शकेल !

--------------------------------------------------------
👍"चाकोरी मोडणारे पुरुष"
लेखक हरीश सदानी.:👌
याच "शब्द रुची" अंकामध्ये अजूनही एका चाकोरीबाहेरच्या विषयाला स्पर्श करणाऱ्या पुस्तक प्रकाशन समारंभाची माहिती दिली आहे. जगामध्ये खूप लोक असे आहेत की, जे वेगळ्या प्रकारची कामे करत आहेत. त्यांचे काम हे त्यांच्या ध्यासाचा परिचय करून देत असते. त्याची दखल होणाऱ्या बदलांवर अवलंबून असते. हा बदल लहान स्वरूपात असेल, याचे उद्याचे स्वरूप व्यापक असेल अशी अपेक्षा त्यात अंतर्भूत असते. त्यासाठी विलक्षण चिकाटी, जिद्द ,परिश्रम व पदरमोड लागते. तिथे कुठलीही स्वार्थ भावना नसते, केवळ आणि केवळ एका ध्यासापायी ही मंडळी अहोरात्र झपाटल्यासारखी कामे करत असतात. अनेक विरोध व सहकार्य अपमान यांनाही सामोरे जावे लागले, तरी ती मंडळी विचलित होत नाहीत. कुणी दखल घेतली, न घेतली तरी पुढे जात राहतात. अखेर शेवटी अशी वेळ येतेच की, जाणकार होणाऱ्या बदलाची दखल घेतली जाणे.

"चाकोरी मोडणारे पुरुष", लेखक हरीश सदानी. या पुस्तकात असे पुरुष आहेत की, जे आपली पुरुषप्रधान संस्कृती वेगळ्या वळणावर आणू पहात आहेत आणि तसा प्रयोग करणाऱ्या संस्थेचे संबंधी येथे उद्बोधक अशी माहिती दिली आहे. काय आहे ही पुरुषप्रधान संस्कृती हे आज आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे. प्रत्येक पुरुष नांवाच्या बाळासोबत ती जन्माला येते आणि आयुष्यभर तिलाच घट्ट करण्यात सार्थकता सिद्ध होत राहते. पण हे कुणाविरुद्ध तर जिच्या पोटी जन्म घेतला, त्या स्त्री विरुद्ध जणू काही ती असते !

जिच्या पोटी जन्म घेतला ती स्त्री केंद्रस्थानी मानून, तिच्या जन्मापासून तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत स्त्री-पुरुष हे समान पातळीवर आहेत, हे वास्तव स्वीकारण्याची कोणाचीही तशी तयारी नसते. म्हणजेच ही संस्कृती लिंगभेद यावर अवलंबून आधारित आहे. अशा भेदाभेदाची मजबूत भिंत, ज्यांना अमान्य आहे अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांचे काम, त्यासाठी चाललेली त्यांची मनस्वी लढाई याचा परिचय या पुस्तकात दिलेला आहे. सहाजिकच त्या पुस्तकाचे शीर्षक "चाकोरी मोडणारे पुरुष" हीच त्याची ओळख म्हणायला हवी

स्रीयांचे अस्तित्व, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांचे विश्व, भावभावना संवेदना देहबोली वेगळी आहे. हे समजून मोकळेपणाने त्यावर चर्चा करणे, उपाय सुचवणे, आपसातला संवाद मोकळा करून अधिक व्यक्त करण्यास संधी देणे, स्त्री-पुरुषांना समानतेच्या पातळीवर आणून, माणूस म्हणून आपण सगळे सारखेच आहोत, यात जात धर्म वर्ण लिंग असा कुठलाही भेद नाही. आपसातले नाते समान पातळीवर आणायचे आणि त्यासाठी पुरुषांनीच पुरुषांचा अहंकार घालवण्यासाठी लढा केलेला आहे आणि त्याचाच, अशा पुरुषांचा शोध लेखकाने त्यांच्या कार्यासहित येथे मांडला आहे. अशा पुरुषांच्या मानसिकतेचा शोध देखील घेतलेला आहे. तो असाः "स्त्रीशी निरामय नाते निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या पुरुषांना जाण आहे की त्यांच्यातील पुरुषसत्तेने घालून दिलेल्या वर्चस्ववादी प्रवृत्तीपासून ते पूर्णपणे मुक्त नाहीत"

याचबरोबर ते आशा व्यक्त करतात 'लिंगभेद मिटवून स्त्रियांचं जगणं अधिक सशक्त, समृद्ध, सुरक्षित करण्याबरोबरच पुरुषांच जगणंही माणूसपणाच्या वाटेकडे जाण्यासाठी हे पुस्तक प्रेरित करते. सावित्रीच्या लेकी वाढण्याबरोबरच, ज्योतिबाचे लेकही समाजात निपजायला हवेत.

या दोन आगळ्यावेगळ्या पुस्तकांसंबंधी मला जे जाणवले, ते मी येथे व्यक्त केले आहे. ते प्रकाशन सोहळे जणु माझ्या नजरेसमोर उभा राहिले आणि त्या दोन्ही पुस्तकातील सारे भावविश्व उभे केले गेले.

धन्यवाद
सुधाकर नातू

गुरुवार, १९ मे, २०२२

👍"My Select Facebook Postings !":👌

 👍"My Select Facebook Postings !"👌


"कसं जगायचं, असं की तसं?!":
शरीर हे एकमेवाद्वितीय साधन,
तर मन आश्चर्यकारक शक्ती; त्यांच्या समन्वयाने,
होतं जीवनाचं सोनं, वा माती!

"Those, Dear to All":

The primary Life Goal of One and All, happens to make oneself happy and contented, all the time and the secondary Goal can be to make Others happy and contented, as is possible.

However, very Few achieve even the first one, forget, accomplishing the second ever. This is basically due to one's ignorance about this universal truth of Life Goals and also due to one's outlook, limited potential, difficulties in combating the dynamic circumstances, beyond one's control.

Very miniscule, who achieve both the goals are rare and hence dear to one and All.
(2jan 19)
---------
WhatsApp वा Facebook वरील ग्रुप हे वैयक्तिक कुटूंबीय, परीसरांतील/गांवातील वा समवयी, समव्यावसायिक अथवा समविचारी, शक्यतो सारख्याच आवडी निवडी असणार्या सभासदांचे बनविले जातात. एकाच वेळी, त्यामुळे आपल्याला अपेक्षित मंडळीं पर्यंत, आपले विचार, प्रतिक्रिया वा संदेश कमीत कमी वेळांत व श्रमांत अशा ग्रुपच्या माध्यमांतून पाठवता येतात, हा प्रमुख फायदा आहे. पुनरार्वुत्तीचा धोका पत्करून मी सांगतो की अशा सोशल मिडीयामधून मी शक्यतो माझे स्वत: निर्मिलेले स्वतंत्र विचार प्रतिसादपर संदेशच पाठवत असतो. आलेले संदेश शक्यतो पुढे पाठवणे वा शेअर करणे सहसा टाळतो. अशा द्रुष्टिकोनामुळे ह्या माध्यमांमधून, माझे वैयक्तिक विचारमंथन चिंतन होते आणि आपल्यातील कल्पकतेला, योग्य त्या शब्दांत मुद्देसुदपणे स्वतंत्रपणे, मांडण्याची कला सातत्याने विकसित होत रहाते. असा खटाटोप, मला मनापासून आवडतो, भावतो कारण त्यामुळे आत्मभानाबरोबरच, 'My Day is made' असे आत्मसमाधान मिळत रहाते.
'सुदिना' २/१/'१७
-------------
My firstThought to welcome the New Year: 'Being honest and committed to the Noble Values is the 'Character' and being concerned and trying to be in tune with 'Market' competition is the 'Personality'. The Irony of the day is, in today's 'Rat Race' the Noble Values, either probably have no place or have to take a back seat. We Must remember that Without 'Character' the 'Personality' is meaningless.
----------------------
My firstThought to welcome the New Year: 'Being honest and committed to the Noble Values is the 'Character' and being concerned and trying to be in tune with 'Market' competition is the 'Personality'. The Irony of the day is, in today's 'Rat Race' the Noble Values, either probably have no place or have to take a back seat. We Must remember that Without 'Character' the 'Personality' is meaningless.
(2nd Jan16)
--------------
The primary Life Goal of One and All, happens to make one self happy and contented, all the time and the secondary Goal can be to make Others happy and contented. However, very Few achieve even the first one, forget, accomplishing the second ever. This is basically due to one's ignorance about this universal truth of Life Goals and also due to one's limited potential, difficulties in combating the dynamic circumstances, beyond one's control. Very miniscule, who achieve both the goals are rare and hence dear to All.
(2jan15)
----------
Sudhakar Natu

मंगळवार, १७ मे, २०२२

#👍"नियतीचा संकेत: ज्योतिषविषयक लेखमालिका !:👌

 👍👍👍👍💐💐

👍"रंगांची दुनिया !": "रसिकमनांची रसिली यात्रा.....💐

👍"नियतीचा संकेत: ज्योतिष विषयक लेखमालिका :👌

आपला रंगांची दुनिया हा समूह उत्तरोत्तर चांगली प्रगती करत आहे असे दिसते. कारण विविध मनोरंजक कलाविष्कार, त्याचप्रमाणे माहितीपर ज्ञानवर्धक असा मजकूर आपल्या समूहावर प्रकाशित केला जात आहे. 

रसिक मन हे नेहमी कुतुहूल आणि जिज्ञासा यांना आपलेसे करत असते. नवनवीन विषय जाणून घेणे, हाही त्यातलाच एक भाग असतो. करमणूक आणि इतर आनंददायी कलाविष्कारांबरोबरच, जाणीववर्धक एका उपक्रमाद्वारे, आपल्या समूहात श्री उदय पिंगळे सर्वांना आर्थिक विषयाची उपयुक्त माहिती देऊन अर्थसाक्षर करत आहेत, याचा मला आनंद होतो.

त्यांच्या या प्रयत्नांवरून प्रेरणा घेऊन मी देखील ज्योतिष आणि व्यवस्थापन शास्त्र या वैयक्तिक व व्यावहारीक जीवनात उपयोगी विषयांवरील माझे लेख या समूहात देण्याचे योजिले आहे. 

सुरुवात अर्थातच सगळ्यांना आवडीच्या अशा ज्योतिषाची ! त्यासाठी माझ्या नियतीचा संकेत या डिजिटल लेख प्राथमिक ज्योतिष विषय घरबसल्या सर्वांना सुलभतेने समजावा असा या उपक्रमाचा हेतू आहे. आपल्या प्रतिसादावर पुढची वाटचाल अवलंबून आहे.

आज  माझा त्याविषयी पहिला लेख सादर करताना मला जो आनंद होत आहे, तो शब्दात सांगता येणार नाही.

जाता जाता एक सहज सुचलं म्हणून एक सुविचार देऊन जातो:

When there is a Will, there is a Way

And

Determination and Dedication alone takes one to the Desired Destination. 

मनःपूर्वक शुभेच्छा.

---------------------------

 1.“ज्योतिष: मानवी मन-प्रयत्नांची फळे !”

प्रास्ताविक:

भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य ज्योतिष रविला. त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना, जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. तर रवि प्रत्येक राशीचा प्रवास एका महिन्यात पूर्ण करत असल्याने त्या संपूर्ण महिन्याच्या कालखंडात जन्मलेल्या सर्वांची रास रवि ज्या राशीत असतो ती असते. सहाजिकच जन्मतारिख व महिना माहीत असला की पाश्च्यात्य ज्योतिष पध्दतीत जन्मरास ठरविता येते. जन्मसाल माहीत नसले तरी चालते. ह्या फरकावरून समजते की चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते. त्या तुलनेत, रविच्या भ्रमणावर आधारित पाश्च्यात्य ज्योतिष ढोबळ विचार करते.

आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणि प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार निर्णय व क्रुतीवर प्रभाव पाडत असते, हे ओघाने आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणार्या भारतीय ज्योतिषाविषयी मला कुतूहल वाटू लागले, त्यात तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.

चंद्र आपल्या जन्मवेळी ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास.

"जन्मरास व नक्षत्र आणि अवकहडाचक्र !":

एकूण १२ राशी अशा आहेत:

१ मेष २ व्रुषभ ३ मिथुन ४ कर्क ५ सिंह

६ कन्या  तुळा  व्रुश्चिक  धनु  मकर कुंभ मीन

ह्या बारा राशी एकूण सत्तावीस नक्षत्रांमध्ये विभागल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राशीत तीन नक्षत्रे असतात. सहाजिकच काही नक्षत्रांचे बाबतीत दोन वेगळ्या राशी संभवतात. प्रत्येक नक्षत्र चार चरणांचे बनलेले असते. नक्षत्र एक पण राशी दोन, अशी नक्षत्रे ही आहेतः

क्रुत्तिकाः मेष 1चरण व व्रुषभ 3 चर

म्रुग- व्रुषभ 2 चरण व मिथून 2चरण

पुनर्वसु-मिथून 1 चरण व कर्क 3 चरण

उत्तरा-सिंह 1 चरण व कन्या 3 चरण

चित्रा-कन्या 2 चरण व तुळा 2 चरण

विशाखा-तुळा 3 चरण व व्रुश्चिक 1 चरण

उत्तराषाढा-धनु1चरण व मकर 3 चरण

धनिष्ठा-मकर 2 चरण व कुंभ 2 चरण

पूर्वाभाद्रपदा-कुंभ 3 चरण व मीन एक चरण

पंचांगामध्ये अवकहडा चक्र हे ह्या पूर्ण राशीचक्राची साद्यंत माहीती दिलेली असते. प्रत्येक राशीचा स्वामी वर्ण वश्य तत्व, तसेच त्यामधील नक्षत्रांची नाडी गण योनी दिलेली असते. उदाहरणार्थ:

मेष स्वामी मंगळ, वर्ण क्षत्रिय, वश्य चतुष्पाद आणि तत्व अग्नी. मेष राशीतील अश्विनी नक्षत्राची नाडी आद्य, योनी अश्व, गण देवगण.

नाडी व गण तीन प्रकारचे असतात. आद्य मध्य व अंत्य नाडी तर देव मनुष्य राक्षस गण असे तीन प्रकार. ही सर्व माहिती म्हणजे त्या त्या व्यक्तीचा लेखा जोखाच जणु असतो. विवाह जुळवताना गुणमेलन करताना ह्या सर्वांचा उपयोग असतो.

"अवकहडाचक्र !":

अवकहडाचक्राच्या कोष्टकाप्रमाणे पंचांगात गुणमेलनाचे मार्गदर्शन करणारे एक अत्यंत उपयुक्त कोष्टक दिलेले असते. वर आणि वधुची रास नक्षत्र माहीत असेल तर ह्या कोष्टकावरून त्यांचे किती गुण जमतात ते ताबडतोब समजते. विवाहासाठी मंगळदोष आहे की नाही ते पाहिल्यानंतर ह्या कोष्टकाचा उपयोग करून एकुण किती गुण जमतात ते काढले जाते. ही दोन्ही कोष्टके ज्योतिष अभ्यासाकरिता महत्वाची असतात. विवाह जुळविताना अठरा गुण जमावेच लागतात, त्यापेक्षा कमी गुण असले तर त्या पत्रिका जुळत नाहीत. मंगळदोष व गुणमेलन ह्यांचे संक्षिप्त मार्गदर्शन पुढे दिले आहे. त्याचा यथोचित अभ्यास करावा.

ह्यापुढील लेखांत जन्मलग्नपत्रिका व ग्रहांच्या महादशा ह्यांचा उहापोह करण्याचा मानस आहे, तसेच बाराही राशींची वैशिष्ट्यपूर्ण माहीती ह्यानंतर दिली जाईल. तिचाही अभ्यास व उपयोग करावा.

सर्वसामान्यांना जोतिषासंबंधी प्राथमिक व नित्योपयोगी माहिती क्रमवार देण्याच्या ह्या अभिनव उपक्रमाचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा अशी इच्छा आहे.

===========================

ता.क.

*हा लेख कसा वाटला, ते आपण क्रुपया प्रतिसादात आवर्जून द्यावे.

* आपल्या रंगांची दुनिया समुहात अशा तर्हेची उपयुक्त माहिती दिली जाते, हे वैशिष्ट्य आपल्या परिचय वर्तुळात कळवा आणि अधिकाधिक सदस्य ह्या रंगतदार समुहात प्रविष्ट व्हावेत, म्हणून सहाय्य करा.

धन्यवाद

सुधाकर नातू

रविवार, १५ मे, २०२२

#👍"रंगांची दुनिया-टेलिरंजन !": 😊"अब जमाना बदल रहा है !"👌


👍👍👍👍💐💐
"रंगांची दुनिया":
"रसिकमनांची रसिली यात्रा.....💐

👍"टेलिरंजन !":👍"जमाना बदल रहा है !":😢
मराठी मालिका आता वयात आलेल्या आहेत, असे दिसते. कारण "मन उडू उडू झालं" मधील दीपिका आणि इंद्रा किंवा "कन्यादान" मधील समीर आणि ओवी तसेच व़ेधा व तिला फसवत असलेला विवाहीत तरूण या युगुलांच्या जोड्या, एकमेकांबद्दलच्या आकर्षणाचे जाहिर प्रदर्शन, बिनदिक्कतपणे नको इतकी जवळीक साधत असलेले दिसतात. त्यातील समीर आणि ओवीचं, एक वेळ आपण समजू शकतो, दोघांचा विवाह तरी झालेला आहे. परंतु दीपिका आणि इंद्रा तर बँकेच्या आँफिसमध्येसुद्धा बिनधास्त नाचतात काय- ती परमनंट झाल्याबद्दल ! सारे नवलच !! ऑफिसमध्ये असे धांगडदिंगे केलेले चालतात वाटतं ? त्यातून त्यांचा विवाहही अजून झालेला नाही आणि दीपिकाच्या पालकांकडून-विशेषतः वडिलांकडून परवानगीच नाही मिळणार. तरीही या युगुलाचे जे सातत्याने जवळिकीचे प्रसंग दाखवले जातात, हे कितपत योग्य ? अर्थात कुणाला ही बुरसटलेली विचारसरणी आजच्या काळात वाटू शकेल. "जमाना बदल रहा है ! इथे कुणाची कुणाला काही पर्वा नाही, असे म्हणून आपण निमूटपणे हे सारे प्रकार पहात राहायचे किंवा रिमोट वापरायचा, दुसरे काय !
------------------
👍"पसंद बदल रही है !":😊
"प्रेक्षक नव्या कथांच्या शोधात" असे एक स्फूट वर्तमानपत्राच्या पुरवणीमध्ये वाचले. त्याचा सारांश इतकाच की, 'कोरोना' काळानंतर बॉलीवूडचे जे चित्रपट प्रकाशित झाले, ते दिग्गज कलाकार असूनही बॉक्स ऑफिसवर एका पाठोपाठ एक आपटत आहेत "कोरोना"काळात प्रेक्षकांनी 'ओटीटी'वर जगभरचे अनेक भाषांमधले चित्रपट पाहिले. यामुळे त्यांची आवड-निवड बदलली आहे हेच खरे.

हिंदी बॉलीवूड चित्रपटांची ही कथा, तीच बहुदा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले चित्रपट वगळता, मराठी बोलपटांची देखील आहे वा असावी. यासंदर्भात सोशल मीडियावर एक मजेशीर संदेश वाचण्यात आला. त्याचा मतितार्थ असा होता की, दोन मित्र अमूक एक चित्रपट खूप गाजतोय या जाहिरातीमुळे, आगाऊ ऑनलाईन बुकींग करून चित्रपटगृहात जेव्हा गेले, तेव्हा ते दोघं आणि अजून दोन-चार फुटकळ प्रेक्षक वगळता संपूर्ण थिएटर रिकामे होते ! काहीही अवास्तव जाहिरात करायची आणि वास्तव मात्र वेगळेच हे यावरून म्हणायचे. थोडक्यात प्रेक्षकांना आवडेल असे काहीतरी मिळाल्याशिवाय कुठलाही बोलपट बॉक्स ऑफिसवर हीट होणं अशक्य आहे.
------------

👍"कशासाठी, कुणासाठी हे 'खेळ !":😢
फ्रान्स मधील "कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल"मध्ये "गोदावरी" हा मराठी चित्रपट गाजला अशीही एक बातमी वाचली. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जे चित्रपट निवडतात, गाजतात, ते कधी प्रदर्शित होतात? प्रत्यक्ष प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन बघायला मिळतात की नाही यावर शंका यावी. हा 'गोदावरी' चित्रपट कधी चित्रपटगृहात आला, याचे मला तरी स्मरण नाही. अथवा तो कधी प्रकाशित होणार या संदर्भातही काही माहिती वाचल्याचे स्मरत नाही. हे अशा बोलपटांबद्दलचे प्रकार म्हणजे, हसावे की, रडावे, हेच कळत नाही. कारण चित्रपट केवळ आंतरराष्ट्रीय फेस्टिवलसाठी निर्माण केला जातो कां? प्रेक्षकांसाठी हा एक यक्षप्रश्नच ! या साऱ्या खटाटोपातून वाटतो. 'क्लासेस' जे आवडते, ते 'मासेस'ना बिलकुल आवडत नाही, असे म्हणावयाचे दुसरे काय !
-------------------
☺️"माकडचाळ्यांचा 'स्वाभिमान !":😢
"निहारिके बरोबरचा साखरपुडा, शांतनुने नको इतका तमाशा करुन मोडल्यावर, स्वाभिमान मालिका बेलगाम भरकटत चाललेली दिसते. महाविद्यालयात म्हातार्या सुरक्षा रक्षकाच्या वेषांत ह्या प्राध्यापक महाशयांनी पल्लवीच्या मागे हात धुवून वेड्यासारखे मागे लागण्याचा जे माकडचाळे केले ते पहाता ही मालिका ताबडतोब बंद व्हावी असेच कुणाला वाटेल !"😢
------------

😊 "मोठा गाजावाजा करून, ढोल बडवत "झी मराठी"वर आणलेला "बँड, बाजा बरात" हा कार्यक्रम भावोजींच्या 'होम मिनिस्टर'चीच ( फसू शकणारी ?) संकरित आव्रुत्ती वाटू लागली आहे !"☺️
----------------
😊"पुरे झाला हा खेळखंडोबा !":😢
इतके महिने उत्कंठापूर्ण असलेली "आई कुठे काय करते" ही मालिका आता कशीही भरकटत फरफटत नेली जाताना पहाणे ही शिक्षा वाटू लागली त्यासाठी प्रथम अनिरूद्ध नंतर कांचन आजी ह्यांना बेलगाम उरफाटे चीड येईल असे वागायला लावले आणि हे कमी झाले म्हणून अखेर संजनाची सम्रुद्धी बंगला हडपण्याचा मीर्च मसाला घातला गेला. अप्पांचे कांचनच्या भयानक बोलांमुळे घर सोडणे सर्वांनी मिनतवारी करून त्यांना घरी परत आणण्याचा फार्स व आता कांचन आजीच्या वाढदिवसाच्या नांवाखाली वेळकाढूपणा. आता त्यात भर आशुतोष चा एक्सीडेंट तो कोमात जातो की काय हा भयग्रस्त स्वप्नाचा पोरखेळ त्यानंतर त्याने आपोआप शुद्धीवर येणे ..... ह्या सार्यामुळे ही मालिका आता एकदाचा आशुतोष व अरूंधतीचा विवाह उरकून बंद करून टाकणे शहाणपणाचे ठरेल.😢
--------------
😢"मुकी बिच्चारी !":😢
कोवळ्या वयातील मुलामुलींना विशेषतः मुलींना अभिनयाच्या खेळात गुंतवून मालिका फुलवायचा फंडा वा ट्रेंड नको इतका बोकाळत चाललेला आहे. "तुझी माझी रेशीम गांठ" "रंग माझा वेगळा" दुर्गा आणि आता "तुझेच गीत मी गात आहे मध्ये तर अशा मुलामुलींचा जणु कळपच ! ....ह्या मालिकात बच्चे कंपनीला वेठीस धरलेले दिसते. बालवयात हे त्यांच्यासाठी कितपत हितावह आहे, ह्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा...
------------

धन्यवाद
सुधाकर नातू

रविवार, ८ मे, २०२२

👍💐रंगदर्शन: मराठी रंगभूमी-एक चिंतन !":👍💐

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":

"रसिकमनांची रसिली यात्रा.....💐

👍💐"रंगदर्शन":👌💐

मराठी रंगभूमीसंबंधी माझे विचार मी ह्या लेखात मांडत आहे:

👍"मराठी रंगभूमी: एक चिंतन":😊

माणसाला एकदा एखादे व्यसन लागले की त्या गोष्टीच्या नादात तो वास्तवता विसरतो, त्या अनुभवांची जणू त्याला भूल पडते, भान हरपते. कोणाला दारूचे व्यसन असते, तर कोणाला दारुचे, तर कुणाला संगीताचे, नाटकाचे. दोन्ही व्यसनात जमीन-अस्मानाचा फरक असला तरी उद्देश एकच असतो, आपले मन रमविणे हा. मराठी माणसासाठी नाटक हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे नाट्यरसिकांना नाटकांची अशीच विलक्षण ओढ असते.

नाटक हा खरोखर एक रोमांचक अनुभव आहे. कोणत्याही व्यवसायात पैसा अथवा कँपिटल, मनुष्यबळ, भूमी अर्थात जागा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहक, ही मूलभूत तत्वे असतात. त्यांचा रंगभूमीवरही समावेश होतो, कसे ते सांगतो. रंगमंच हे त्या व्यवसायाचे ठिकाण म्हणजे भूमी, काम करणारे कलावंत हे मनुष्यबळ, तर व्यवसायाकरता पैसा हे भांडवल अर्थात कॅपिटल, तर आश्रयदाता रसिक प्रेक्षक हा ग्राहक, व्यवसायाकडून बाहेर पडणाऱ्या पक्या प्रोडक्टचा फायनल प्रॉडक्टचा नाटकाचा उपभोक्ता.

धंदा किंवा व्यवसायाचा मूळ उद्देश म्हणजे कष्ट करत, गुंतवलेल्या भांडवलावर अर्थातच जास्तीत जास्त फायदा मिळवणे. मात्र नाटक हा केवळ फक्त एक धंदा नसतो, तर कला, तसेच विचार अशा त्रिमूर्तीचा अद्भुत संगम घडवणारी गोष्ट आहे. विविध विषयांवर समाजाच्या मानवाच्या जीवनातील विविध समस्यांवर नाटकाच्या रूपातून भाष्य केले जाते तेव्हा एक नवा विचार नाटक नवी दिशा देत असते, तर नाटकाराच्या मनातले नाट्य कलाकारांनी यथातथ्य रंगभूमीवर जीवंत करणे ही कला होय. त्यामुळे धंदा, कला व विचार या त्रिवेणी संगमातून मिळणारा आनंद खरोखर शब्दातीत असतो. अर्थात प्रत्येक नाटक ह्या तीनही अत्यंत दुर्मिळ अशा गोष्टींचा एकत्रित परिणाम सादर करतेच असे नाही. मराठी रंगभूमीवर गाजलेली निवडक लोकप्रिय नाटके ही त्रिवेणी संगमाची किमया साधतात ही अभिमानाची बाब आहे. जगात मराठी रंगभूमी एक अग्रगण्य स्थान राखून आहे तेही ह्याच तीन पेडी चमत्कारामुळेच.

अशा त्रिगुणसंपन्न नाटकांची ही मांदियाळी पहाः

एकच प्याला, कुलवधू, उद्याचा संसार,

अश्वमेध, चारचौघी, गाठ आहे माझ्याशी, 

दुसरा सामना, ती फुलराणी, सुंदर मी होणार,

दोन स्पेशल, पुत्रकामेष्टी, पुरुष, 

व्हाईट लिली अँड नाईट रायडर, संकेत मिलनाचा

दादा एक गुड न्यूज आहे... .इ.इ.

आजवरच्या मराठी रंगभूमीवर आलेल्या नाटकांपैकी कोणती नाटके "धंदा, कला व दखलपात्र विचार" अशा त्रिगुणात्मक त्रिवेणी सादर करणारी होती, ते आपणही प्रतिसादात जरूर लिहा... 

आज ह्या निमित्ताने मराठी रंगभूमीवर "रायगडाला जेव्हा जाग येते", "अश्रुंची झाली फुले", ह्या नाटकां शिवाय प्रा वसंत कानेटकरांनी हिराबाई पेडणेकर यांच्या जीवनावर "कस्तुरीमृग, बाबा आमटे यांच्या जीवनावर "वादळ माणसाळतंय", इतिहासाचार्य वि का राजवाडे यांच्या जीवनावर "विषवृक्षाची छाया" आणि महर्षी कर्वे आणि त्यांची पत्नी यांच्या जीवनावर "हिमालयाची सावली" ही नाटके लिहिली. "संगीत मत्स्यगंधा" हे देखील त्यांचेच गाजलेले नाटक. चंद्रलेखा नाट्यसंस्थेचे, मोहन वाघ ह्यांनी तर चक्क इंग्लंड मध्ये कानेटकरांचे "गगनभेदी" हे नाटक जगप्रसिध्द नाटककार शेक्सपिअरच्या गांवात सादर करून मराठी रंगभूमीवर एक विक्रमी इतिहास नोंदविला.

अशा हसतमुख सदाबहार प्राध्यापक वसंत कानेटकरांचे यांची आणि माझी भेट व्हावी हा माझ्या आयुष्यातला एक एक सुवर्ण क्षण होता त्या क्षणाची आठवण पुढील लिंक उघडून आपल्याला वाचता येईल आणि रंगभूमीची थोरवी उत्तरोत्तर उंचावत नेणाऱ्या वसंतरावांच्या स्मृतीला वंदन करता येईल.

https://moonsungrandson.blogspot.com/2020/07/blog-post_28.html

ही आठवण आवडली......

तर लिंक शेअरही करा..........

धन्यवाद

सुधाकर नातू


माझ्या सॅमसंग गेलेक्सी स्‍मार्टफोन वरून पाठवले.

शुक्रवार, ६ मे, २०२२

#👍"हा खेळ, सावल्यांचा, अर्थात चित्रदर्शन !":👌

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":

"रसिकमनांची रसिली यात्रा.....💐

👍"हा खेळ सावल्यांचा, अर्थात चित्रदर्शन !":👌

😊 "मी वसंतराव !":😢

पुण्यातील नाटकांच्या वेळा विचित्र आणि कदाचित गैरसोयीच्या आहेत. शिवाय पुण्यातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील समाधानकारक नाही. कारण कदाचित पुष्कळ यांची स्वतःची वहाने आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या वाहने नसणाऱ्या आणि वाहन चालवता न येणाऱ्यांना नाटके पाहणे पुण्यामध्ये तसे कठीणच असते. म्हणून मी हवापालट म्हणून पुण्याला आल्यावर शक्यतोव चित्रपट पाहणेच पसंत करतो. त्यातून "सिटी प्राईड" कोथरूड हे चित्रपटगृह, जायला यायला सोयीचे आणि अतिशय आल्हाददायक वातावरण असणारे, प्रशस्त आहे. त्यामुळे न चुकता पुण्याच्या आमच्या भेटीत निदान एक तरी चित्रपट पाहिला जातो.

अर्थात "कोरोना"च्या गेल्या दोन वर्षांच्या काळात सारे अशक्य होते. गेल्या दोन वर्षात आम्ही केवळ मुंबईला '83' हा वर्ल्डकप विजेत्या भारतीयसंघाचा पराक्रम दाखवणारा हा प्रेरणादायी चित्रपट पाहू शकलो होतो. त्यानंतर आता नुकताच "सिटी प्राईड" कोथरूड येथे "मी वसंतराव" हा, महान गायकाचा चरित्रपट पाहिला. या जातिवंत कलावंताचे जीवन हे किती चमत्कृतीपूर्ण आणि नियतीची एकामागून एक आव्हाने पुढे उभी करणारे होते, हे अतिशय परिणामकारक रीतीने ह्या चित्रपटात दाखवले आहे.

गेल्या काही वर्षात, नजीकच्या काळातील महान व्यक्तींवरील जीवनपट उलगडणारे चित्रपट "बालगंधर्व" "लोकमान्य" पुलंचा "भाई" "आनंदी गोपाळ" इ.इ. येत गेले आहेत. त्याच माळेतील हा वसंतराव देशपांडे ह्यांचे रोमहर्षक संघर्षमय जीवन चरित्र दाखवणारा बोलपट आहे. बालवयातच जीव घेणाऱ्या एका विचित्र घटनेपोटी, आपल्या नवऱ्याला विरोध करून, स्वतःच्या लहान मुलाला घेऊन जाणाऱ्या, खंबीर आईच्या छत्राखाली वाढणार्‍या या माणसाने, जीवनात कर्तव्य सर्वश्रेष्ठ मानले आणि त्यासाठी खंबीरपणे, संघर्ष करत, कठीण परिस्थितीला धीरोदात्तपणे तोंड कसे दिले ते पाहताना, डोळ्यात अश्रू कधी उभे राहतात ते कळतच नाही. संगीतामध्ये घराणे महत्वाचे मानले जाते माझे देशपांडे घराणे माझ्या पासून सुरू होते, असे म्हणत स्वतःच्या टर्मस् वर जीवन जगणार्या मनस्वी तपस्वी माणसाची ही जीवनकहाणी परिणामकारक आहे.

परंतु 'भगवान के घर देर है' लेकिन अंधेर नही !' हे पटवणरी एक घटना, वसंतरावांच्या प्रौढावस्थेत, 'कट्यार काळजात घुसली'च्या निमित्ताने, खानसाहेबांच्ता रूपाने वसंतरावांच्या जीवनात सुवर्णसंधी येते आणि नंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. त्यांच्या बावन्नकशी सुरेल सुरांचे सोने झाले. शेवटी माणसाचे जीवन हा ऊन-पावसाचा सावल्यांचा खेळ असो असंच म्हणायचं ! 

संपूर्ण चित्रपट हा मधूर व श्रवणीय संगीतमय पार्श्वभूमीवर, विदर्भातील मूर्तिजापूर नागपूर ते चक्क लाहोर पुणे लखनौपासून नेफाअशा विविध माहोलात उलगडत जातो. इतके पुरे नाही म्हणून की काय स्वातंत्र्यपूर्व काळातील नाट्यमय घटना, जोडीला स्वरबहार मास्टर दीनानाथ खान साहेब बेगम अख्तर आणि अर्थातच वसंतरावांचे जीवाभावाचे जोडीदार पुल देशपांडे यांच्या प्रसंगोचित दर्शनाने रंगतदार झाला आहे आणि तो तुम्हाला खुर्चीत खिळवून ठेवतो. 

एखाद्या कादंबरी शोभावी अशी ही जीवन कथा, मनाला चटका लावून जाते. येथील विलक्षण योगायोग असा दुर्मिळ की, आजोबांची भूमिका स्वतः नातवाने परिणामकारक रीतीने सादर करणे हा, कदाचित चित्रपटसृष्टीत एकमेवाद्वितीय असावा ! राहुल देशपांडे ह्या तरुण गुणी कलाकालाने, अक्षरशः आपला जीव ओतून, आपल्या आजोबांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. तीच गोष्ट चित्रपटातील सर्वच अभिनेत्यांची, गीतसंगीताची आणि अफलातून दिग्दर्शनाची होय. खूप खूप दिवसांनी एक आगळावेगळा, मनाला आंतरिक अशी सहवेदना देणारा चित्रपट बघायला मिळाणे, हा मनभावन क्षणच म्हणायचा.

हा लेख नजरेखालून घालत, संपादित करत असताना, "मोबाईल सर्फिंग"मध्ये दुर्मिळ अशी ही चित्रफित, पहायला मिळाली. स्वतः वसंतराव,भारतरत्न भीमसेन जोशी आणि सुधीर फडके यांच्या सुरांतील गीताला पेटीवर साथ देणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व "पुल" !

ही लिंक उघडून पहा........

" अवघाची संसार सुखाचा करीन !"

https://youtu.be/x5RL64KTT6U

हा लेख जर आवडला....

तर लिंक शेअरही करा.....

😊"चाकोरीबाहेरील चित्रपट-कथा अन् व्यथा !":😢

नुकतीच एक बातमी वर्तमानपत्रात वाचली. फ्रान्स मधील 'कान्स' येथील आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवासाठी, तीन मराठी चित्रपटांची निवड झाल्याची ती बातमी होती. ते तीन चित्रपट- "पोटरा" "कारखानीसांची वारी" आणि "तिचं शहर होणं" ! हे चित्रपट एकूण ३२ चित्रपटांमधून निवडण्यात आले अशी ती बातमी होती. 

माझ्यासारख्या सर्वसामान्य रसिकाला हे तीन चित्रपट, चित्रपटगृहात कधी आले, किती दिवस चालले, याची काही कल्पना नाही. बहुदा बऱ्याच रसिकांना देखील असेच वाटत असेल. त्यातले त्यात "कारखानीसांची वारी" या चित्रपटासंबंधी काही ना काही, वाचल्याचे किंवा ऐकल्याचे उमजते. परंतु "पोटरा" आणि "तिचं शहर होणं" ही दोन नावे कधीच ऐकल्याचे स्मरते नाही. 

नवल हे वाटते की "Such films which classes or critics like, the masses reject or either don't get opportunity to see them at all !" हे तत्त्व आहे. ते नेहमी विशेषतः मराठी चित्रपटांच्या बाबतीत कां खरे ठरते ? तेच कळत नाही. महोत्सवात यशस्वी होणारे किंवा पुरस्कार प्राप्त चित्रपट हे लोकप्रिय कां नसतात, याचे उत्तर म्हणून शोधणे गरजेचे आहे. 

कदाचित अशा तऱ्हेचे चाकोरीबाहेरचे चित्रपट निर्माण करणाऱ्यांची व समीक्षकांची द्रुष्टी, प्रतिभा आणि सर्वसामान्य प्रेक्षकांची आस्वादक क्षमता यामधील जमीन अस्मानाच्मा फरकामुळे असे होत असावे. प्रश्न हा आहे की, चित्रपट कशाकरता निर्माण केले जावेत हा. करमणूक हा विचार तर प्राधान्याने आहेच, पण त्याचबरोबर समाजप्रबोधन हेही चित्रपटांनी करावे हेही खरे. परंतु ते सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत जावेत, त्यांना रूचतील अशा पद्धतीने निर्माण होणाऱ्या चित्रकृतींची अपेक्षा ठेवणे, गैर नव्हे.

तसे जर झाले, तर जे सर्वसामान्यांना आवडते, ते आणि तसे चित्रपट कदाचित महोत्सवात पुरस्कार देखील मिळवू शकतील !

आपल्याला काय वाटते, ते प्रतिसादात जरूर लिहा.

धन्यवाद.

सुधाकर नातू