"मोबाईल एक, कल्पना अनेक":
व्हाँट्सअँपवर आपल्याला अनेक संदेश येत असतात, काही आवडतात, काही दुर्लक्षित केले जाऊ शकतात. नंतर खूप दिवसांनी व्हाँट्सअँपवर विविध प्रकारची माहिती फोटो विडीओज्, ध्वनीफिती ह्यांची नको इतकी गर्दी जमा होते. अशा वेळेला मला आढळले की, आपल्या मोबाईलमध्ये जेवढी माहिती साठवण्याची क्षमता आहे, ती कमी कमी होत जात आहे. त्यामुळे ती whatsapp chats वरील माहिती, अधूनमधून साफ करण्याचा उद्योग मी नुकताच सुरु केला.
आज तोच उद्योग करत असताना, मला लक्षात आले की, अतिशय उत्तम, मनाला भिडणारे असे काही काही संदेश आपल्याकडून दुर्लक्षिले गेले आहेत, ते आपण कदाचित पुढे पाठवलेही नाहीत. ते बिचारे तसेच पडून आहेत. त्यामुळे मला अचानक एक कल्पना सुचली की, अधूनमधून ही संदेशांची भाऊगर्दी साफ करताना असे निवडक व कालातीत संग्राह्य संदेश एकत्र करत जायचे आपल्या मोबाईलच्या नोट पॅडवर !
नंतर जेव्हा केव्हा आपला वेळ जात नसेल तेव्हां विरंगुळा म्हणून काही वाचायचं असेल, तेव्हा ते उपयोगी पडू शकतात, किंवा अर्थातच आपल्याला त्यातील एखादा संदेश आपल्याला योग्य वाटतील अशा व्यक्तींना व्हाँट्सअप वर पुढे पाठवू शकतो. ही कल्पना मला आवडली. बघा तुम्हालाही आवडते कां?
करा बरे प्रयत्न तुम्हीही!
बघा हाच एक पुढे पाठविण्याजोगा एक बर्यापैकी दखल घेतली जाण्याजोगा संदेशच तयार झाला....
एवढे लिहून होते नाही तोच, त्यांतून एक अजून नवी कल्पना सुचली की आपल्या ब्लॉगवर लेखमाला सुरु करून त्यांत हे मनोज्ञ व विचारप्रवर्तक संदेश द्यावयाचे......
वेळ कां घालवायचा?
शुभस्य शीघ्रम्....
""मनाला भिडणारे forwrded संदेश whatsapp वरु
( ज्या कुणी अज्ञात व्यक्तींनी हे संदेश निर्माण केले, त्यांना प्रथम प्रणाम व आभार. )
आज निवडलेले दोन संदेश असे...
1
# "
*✍️मीच मला सांगतो✍️**
*******************
*झाली सत्तरी,येईल पंच्याहत्तरी*
*करत नाही मी चिंता*
*प्रत्येक दिवस मजेत जगतो*
*वाढवत नाही गुंता*
*वय झालं म्हातारपण आलं*
*उगीच बोंबलत बसत नाही*
*विनाकारण बाम लावून*
*चादरीत तोंड खुपसत नाही*
*तुम्हीच सांगा खेळायला जायला*
*वयाचा संबध असतो का ?*
*नेहमी नेहमी घरात बसून*
*माणूस आनंदी दिसतो का ?*
*पोटा पाण्यासाठी पोरं*
*घर सोडून जाणारच*
*प्रत्येकाच्या आयुष्या मधे*
*असे रितेपण येणारच*
*करमत नाही करमत नाही*
*सारखे सारखे म्हणत नाही*
*मित्रां सोबत दिवस घालवतो*
*घरात कुढत बसत नाही*
*घरातल्या घरात वा बागेत*
*हिंडाय-फिरायला जातो*
*वय जरी वाढलं तरी*
*रोमँटिक गाणं ऐकतो*
*गुडघे गेले , कंबर गेली*
*नेहमी नेहमी कण्हत नाही*
*आता आपलं काय राहिलं*
*हे बोगस वाक्य म्हणत नाही*
*पिढी दर पिढी चाली रीतीत*
*थोडे फार बदल होणारच*
*पोरं पोरी त्यांच्या संसारात*
*कळत नकळत गुंतणारच*
*तू-तू , मैं-मैं , जास्त अपेक्षा*
*कुणाकडूनही करत नाही*
*मस्तपैकी जगायचं सोडून*
*रोज रोज थोडं मरत नाही*
*स्वतःलाच समजून घेतो*
*पुढे पुढे चालत राहतोे*
*वास्तू तथास्तु म्हणत असते*
*हे उमजुन मी जास्तीच जगत असतोb*
_*💐🙏(सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ मंडळींना समर्पित) 🙏💐*_
________________________
2.
# "एक राजाला चार राण्या होत्या, पहिली राणी इतकी सुंदर होती! कि तो तिला फक्त प्रेमाने बघत रहायचा?
❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!
❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा ?
❕चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!!
❕राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणी म्हणाला, "मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?"
❕राणी म्हणाली मी तुला इथेच सोडुन देणार आहे.
❕राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली, "मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही.
❕राजाला अपारं दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, "तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ?
❕तिसरी राणी म्हणाली, "मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे, तुमच्याजवळ रहाणार नाही.
❕आता मात्र राजाच्या दुखाःला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे पुर्ण जीवन घालवले! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ?
❕माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकटं वेळ, पैसा, आयुष्य खर्च केले?
❕तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हते? तिला अंगभर कपडे नव्हते की, तिच्या अंगावर मुठभर मांस नव्हते कि, दागिने नव्हते.
❕ती म्हणाली, "तुम्ही जाल तिकडे येईल. नरकात असो की स्वर्गात, कोणत्याही प्रकारच्या जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हास वचनं आहे.
❕राजा थक्कं होऊन समोर पहात राहिला, विचार करू लागला कि,जीला मी प्रेम सोडा, साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, ना पुर्ण आयुष्यात जिचा कधी एक क्षणभर काळजी केली.
❕ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे? राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्यागं केला.
❕कोण होता तो राजा? कोण होत्या त्या तीन राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला..?
❕त्या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही, पण तरीही एवढा त्याग का केला..
❕तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसुन स्वतः आपणच आहोत.
🔸आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरचं सोडते ते म्हणजे आपले *शरीर* ज्याला आपण आयुष्यभर बघत रहातो.
🔸आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते, ते आपली मुले, आप्तेष्ट, मित्र थोडक्यात *समाज.*
🔸आपली तिसरी राणी, जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते म्हणजे, *धन-पैसा* आपल्या मृत्युनंतर आपली
लगेच दुसऱ्याची होते.
🔸 आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे *पुण्यकर्म* जे आपण सदभावनेने नि:स्वार्थपणे,आणि विणा अहंकाराने केले. जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ नाही, तरीपण जन्मोजन्मी आपल्याबरोबर येतचं असते...!
एक चांगला विचार.....करा विचार !
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चेनेल Subscribe ही करा......
https://www.youtube.com/user/SDNatu
त्यासंबंधी एक प्रातिनिधिक प्रतिसाद:
"तुमचे विडीओज् जरुर पाठवत रहा.
ते खूप छान असतात.
कोणालाही समजेल,
अशा सोप्या भाषेत असतात.
धन्यवाद."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा