👍"रंगांची दुनिया 👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !💐
👍"शारदोत्सव !":👌
☺️"वेचलेले आजही तपासावे असे !":💐
☺️ दररोज वर्तमानपत्र वाचल्यानंतर व्यवस्थित जबाबदाऱ्या थोड्याफार पूर्ण केल्यानंतर, मोबाईलवर माझा हात चालवला जातो. त्यामध्ये व्हाट्सअप आणि फेसबुक हे अनिवार्य असतात. फेसबुकमध्ये "माझी कथा" हा भाग मी नेहमी आवर्जून पाहतो. माझ्यातर्फे देखील त्यामध्ये काही ना काही नवनिर्मिती व जुने आठवणीतले फोटो प्रदर्शित करतो. त्यामुळे त्याचा जो प्रतिसाद मिळतो, त्यावरून आपल्या नवनिर्मितीची किती दखल घेतली आहे ते कळते.👌
💐फेसबुकवर त्या व्यक्तीरिक्त "आठवणी" म्हणून एक भाग छान असतो. दररोजच्या तारखेला पूर्वी फेसबुकवर आपण काय काय मांडले होते, कुठले संदेश प्रदर्शित केले होते त्याचा एक पटच आपल्यासमोर मांडला जातो. दररोज मी ते नक्कीच पुन्हा अवलोकन करत असतो. पण कधी कधी एखादा संदेश असा येतो की, ज्याला काय प्रतिक्रिया आल्या होत्या, असे मनामध्ये कुतुहूल निर्माण होते
त्या दिवशी, तसेच झाले. एक जुना संदेश त्या तारखेचा-सहा वर्षापूर्वीचा-२६ जुलै २०१६, मी मांडला होता आणि त्याला आलेल्या, प्रतिसादांमुळे मला हा लेख तयार करावासा वाटला.आधी तो संदेश देतो, नंतर त्यावरील प्रतिक्रिया देतो. मनापासून विचार करायला लावणारा ऐवज, तुम्हाला या लेखाद्वारे मिळेल असा विश्वास आहे.👌
😊 "माझा तो संदेश !:👌
"मुक्त अथॅकारणामुळे ऐहिक भरभराट होत राहिली हे ज़री खरे असले, तरी नैतिक अधःपतन वेगाने घडत आहे हे चांगले नाही. आत्मकेंद्रीपणा भयावहपणे वाढत आहे, भ्रष्टाचार तर वरपासून ख़ाली खोलवर पसरला आहे, माणसातली माणूसकी संपत चालली आहे असे एकंदर चित्र भासत आहे.
'आहे रे' आणि 'नाही रे' हयांंमधली दरी भयानक वाढली आहे. शांतता आणि संमजसपणा भंगत चाललेला दिसतो आहे. २५ वर्षानी मागे वळून पहाताना 'हेची फळ काय मम तपाला ?' असे वाटले तर ते चूक नाहीं !😢😢😢
पैशापेक्षा भावना व परंपराना आणि मूल्य महनीय मानणारा, मध्यम वर्ग, जो समाजाला नवी दिशा देत राहिलेला असे, पण आज हा वर्ग हरवला तर नाही ना? अशी शंका वाटते आहे 😷😷😷😢😢😢
👍( दुर्दैवाने आजही कुठलाही फरक नाही उलट अधिकाधिक अधोगती होत चालली आहे की काय अशी चिंता वाटावी !) 😢
👍ह्यावरील तेव्हाचे निवडक प्रतिसाद !:😊
# "सहनशीलतेची जागा आक्रमक/हिंसाचार घेत आहे."
# "75% society is focused on money, fun, and power. increased corruption and competition has put value based education behind. Both parent and politicians have failed instilling values. Parent have succeeded in giving monetary education but have failed in life oriented education.
Lack of spiritual aspect in life and when I said spiritual aspect doesn't mean karmakand like standing in line for 2 hrs to pray siddhi vinayak or doing rudrabhishek with fearful mentality, but instead I meant accepting God intellectually and knowing that this supreme power is with us 24×7.
Today's generation has forgotten greatfulness, good relations, and selflessness. Wish education system had incorporated the Bhagvad Geeta a "jeevan granth" and yoga along with other subjects. That would have resulted better society."
# "Very appropriate observation. In Education system Ethics and Home Science shld b made mandatory considering the need of the Gen.Next."
# "There is no comment on cash for vote. So many flimsy theories on other noble aspects. Let apart cash for education. Why do we go back only twenty five years? The misery is persistent from time as and when these hypocrites came to power. Curse them no end!"
#"Those who did not qualify in merit had to pay price! This practice enabled persons' to demerit, compromise,the quality and then it deteriorated to such an extent that there was no holds bar!"
सारांश सोशल मीडियावर विचाराला चालना देणारे जर काही मांडले, तर त्यामधून एकंदर वातावरणाचे सुष्पष्टचरित्र चित्र प्रतिसादामधून मिळत जाते असंच मला आता या सगळ्या प्रतिसादाकडे पाहताना वाटले. त्यामुळेच जणू एक नवीन संधी मिळाल्यासारखा हा नवा लेख त्यामधून तयार करता आला. आपणही त्यावर विचार करा, प्रतिसाद द्या.
धन्यवाद
सुधाकर नातू
.jpg)
.jpg)