शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

"ह्रदयसंवाद-३१": "शुभस्य शीघ्रम् क्षणाक्षणांतच रंग भरा !"

 "ह्रदयसंवाद-३१":                                                    "शुभस्य शीघ्रम् क्षणाक्षणांतच रंग भरा !"


आपल्याला चांगलं जमणारं आणि आवडणारं, असं काही करायला मिळणं, याच्यासाठी कदाचित भाग्य लागत असावं. कारण तशी संधी मिळणारे, ती न मिळणाऱ्यांपेक्षा, कां, कुणास ठाऊक, आपल्याला नेहमीच कमी असलेले आढळून येतात.

तुमच्या अंगात काही कला असते, तुमची बुद्धिमत्ता तल्लख असते, कुठली ना कुठली तरी आवड वा छंद, अशा कितीतरी गोष्टी तुमच्याजवळ असतात. पण प्रत्यक्ष जीवनात मात्र खडतर असं, जे कदाचित भलतच, तुम्हाला जे जमत नाही किंवा जे आवडत नाही, तेच कधीकधी पुष्कळदा करायची तुमच्यावर वेळ येते. नीट विचार केलात, तर अशी अनेक उदाहरणं तुम्हाला तुमच्या अवतीभवती आढळतील. त्यातीलच काही वानगीदाखल प्रथम सांगतो:

# ह्या माणसाची बुद्धिमत्ता खरोखर दृष्ट
लागण्याजोगी. हा खरं म्हणजे एखादा मोठा शास्त्रज्ञ किंवा चांगला इंजिनियर झाला असता. पण प्रत्यक्ष जीवनात मात्र त्याच्यावर खर्डेघाशी करायची वेळ आली.
# दुसरं एक उदाहरण, बघितलं तर याच्या आवाजात उमाळा, ह्रदयांत जिव्हाळा आणि एकंदरच संगीताची तालासुरांची उत्तम जाण असलेला हा माणूस. खरं म्हणजे तो एक चांगला गायक संगीतकार होऊ शकला असता. पण याच्यावर वेळ कुठली आली, तर एखाद्या कारखान्यात निळा बाँयलर सूट घालून कामगार म्हणून जगायची !
# शालेय जीवनापासून या माणसाला खेळांची खूप आवड. त्यातल्या त्यात क्रिकेट हा त्याचा जीव की प्राण. सलामीचा फलंदाज म्हणून उत्कृष्ट अशी त्यांची कामगिरी असे. कॉलेजला कसं बस जायला मिळाल्यावर आपल्याला पुढे येता येईल असे वाटत असतानाच अचानक काही कौटुंबिक अशा घटनांमुळे शिक्षण सोडून, त्याला कुठेतरी पेढीवर नोकरी करायची वेळ आली आणि नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये तो इतका व्यग्र झाला की खेळ आणि क्रिकेट त्याला पारखे झाले. एका उत्तम सलामीच्या फलंदाजाला आपण मुकलो, असे वाटण्याइतपत गुणवत्ता त्याच्याजवळ होती.

# हा माणूस बालपणापासून बोलण्यात चिंमखडा आणि वाद-विवाद वक्तृत्व स्पर्धा यामध्ये कायम शाळेमध्ये बाजी मारणारा, तो विचार व्यवस्थित करून तर्कशुद्ध योग्य त्याच भाषेत कुठलिही बाजू मांडण्याचे, त्याचे कौशल्य वादातीत होते. त्यामुळे सगळ्यांना वाटायचे की तो उद्या चांगला वकील होणार. पण कसचे काय? अभ्यासांत त्या मानाने नेहमी मागे पडणारा, उगाचच उनाडक्या करणारा हा माणूस मॅट्रिकची परीक्षा काही पार करू शकला नाही. अनेक वेळा त्याचे प्रयत्न फोल ठरले. अखेर कुठल्यातरी दुकानांमध्ये पुड्या बांधत आयुष्य काढायची याच्यावर वेळ आली. कुठली आवड, कुठले कौशल्य आणि कुठले ते त्याचं वकील होणं !

ही केवळ आठवली म्हणून काही प्रातिनिधिक उदाहरणं. आपल्याला जे जमत नाही, आवडत नाही, तेच पुष्कळांच्या आयुष्यात करायची वेळ आलेली आपण बघतो. हे असं कां व्हावं? काही मोजक्याच जणांना आपल्या अंगचे गुण दाखवून, पुढे यायची संधी व काम मिळावे? असे प्रश्न त्यामुळे आपल्या मनात नेहमीच पिंगा घालत असतात. हे कुठल्या जन्मीचे भोग वा प्रारब्ध?

पण हे सारं मला सुचलं कधी? तर
लाँकडाऊनच्या काळात, कां? तर आत्ताच या
सहा महिन्यात मला लेखन, बोलणं, विचार निर्माण करणं, आवडतं याचा शोध लागला आणि त्याप्रमाणे मला करावसं वाटलं. मी मुक्तपणे ते करत गेलो व करतही राहणार आहे. ब्लॉगवर लेख, moonson grandson ह्या माझ्याyou tube चँनेलवर विडीओज्, whatsapp वर ध्वनीफिती असे माझे नवनव्या कल्पना व विचार ह्याचे रतीब मी घालत आहे. भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने मला प्रोत्साहन आपोआपच मिळत आहे.

पण ही अशी मला भावणारी, बर्यापैकी जमणारी कामे करायची वेळ, मला माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी मिळाली, हेही विसरता येणार नाही. आपल्याला आवडतं, आनंद देतं, असं काहीतरी आत्ता कां होईना, मला करायला मिळतंय हेही नसे थोडके. सहाजिकच ज्यांना तसं काही कधीच मिळत नाही, त्यांची मला आज आठवण झाली. त्याचेच फलित म्हणजे हा ह्रदयसंवाद.

आज नामवंत झालेल्या आणि आपापल्या क्षेत्रात खरोखर दिग्गजासारखी कामगिरी करणाऱ्या, मंडळींचा तुम्ही जर विचार केलात, तर तुम्हाला लक्षात येईल की, त्यांना ही स्वतःतील गुणवत्तेची खुबी आणि आपल्याला काय आवडतं काय जमतं याचा शोध लागला असावा असतो. त्यानंतर ते संधी शोधतात, संधी मिळाल्यावर त्यांचा पाठपुरावा करत अहर्निश कष्ट घेत, आपली योग्यताही ते सिद्ध करतात. त्यामध्ये अर्थातच त्यांचा सगळ्या बाजूने फायदा होतो, आवड जपली जाते, व्यवसाय मिळतो प्रसिद्धी आणि अर्थातच उत्तम अर्थार्जनही त्यांचे होते. अशाच आजच्या पुष्कळशा सेलिब्रिटीज निर्माण झालेल्या तुम्हाला दिसतील.

# सेलिब्रिटींचा विषय काढता काढता, अचानक मला आठवलं, आमच्याच ओळखीच्या एका गृहिणीचं उदाहरण. या बाई लहानपणापासून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत, संसाराला लागल्या आणि मुलं मोठी झाल्यावर पन्नाशी आली अन त्यांना आपल्या लहानपणची चित्रकलेची आवड आठवली. तिचा त्यांनी इतका प्रचंड पाठपुरावा नंतर केला की, त्यांची चित्रं आणि त्यांची प्रदर्शनं, जागोजागी भरली जाऊ लागली. आज त्यांना फुरसत नाही आणि त्यांच्या प्रदर्शनांमधून, त्यांना नाव तर मिळाले, परंतु आवडीचं असं काहीतरी उशिरा कां होईना, आपण करू शकतो, याचं अंतरी समाधान व आनंद प्राप्त झाला.

# याच विचारांच्या ओघात, मला आमच्या ऑफिसमधल्या दोन मित्रांची गोष्ट आठवली. चांगली नोकरी करून नंतर निवृत्तीनंतर, एकाने जपानची ओरिगामी कला आत्मसात केली आणि त्यातच त्याचे मन रमले. त्या कलेचे प्रयोग करायला लागला आणि त्यातच आपला आनंद मिळवायला लागला. दुसरा नोकरी संपल्यावर पूर्वीची त्याची आवडीची अशी गोष्ट म्हणजे जादूचे प्रयोग करणे. त्यामध्ये त्यांने लक्ष घातले आणि जागोजागी तो जादूचे प्रयोग करायला लागला. थोडक्यात आपल्याला जे आवडतं, तेच करायचं असेल त्यासाठी अमूकच वेळ लागते असं नाही. तुम्ही विचार करून शोध केव्हाही घेऊन त्यात पारंगत होऊ शकता, एवढेच म्हणायचे. अर्थातच तशी तुमची इच्छा व प्रेरणाही हवी.

अजूनही एक गोष्ट ध्यानात आली, ह्या नाण्याची दुसरी बाजू. ती अशी असू शकते की, खूप थोडे जण आपल्याला काय आवडतं, काय जमतं याचा अंतर्मुख होऊन, कधी स्वतःशी संवाद साधत, प्रयत्नपूर्वक शोध कधी घेत असतील. जे असा शोध घेतात आणि त्याच्या पाठीमागे लागून काहीही करून पाठपुरावा करतात, त्यांना आज ना उद्या अशा संधी मिळणार, यात शंका असू नये.

याकरता सांगतो, वेळ गेलेली नाही. वेळ कधीही अशी फुकट जात नसते. आजच, नव्हे आत्तापासूनच शोध घ्या, तुम्हाला काय आवडतं, काय चांगलं जमतं त्याचा. त्यासाठी काय करायला लागेल, कसं ते जमून येईल, याचाही मागोवा घ्या. असं केलं तर तुमचं तुम्हाला स्वतःचं आत्मसमाधान आणि आत्मानंद मिळणं दूर नाही.

म्हणून,
"शुभस्य शीघ्रम् क्षणाक्षणांतच रंग भरा !"

सुधाकर नातू

ता.क.
असेच एकसे बढकर एक वाचनीय २०० हून अधिक खुसखुशीत व वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक सेव्ह करा......

http://moonsungrandson.blogspot.com

आणि
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....

https://www.youtube.com/user/SDNatu

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

"👍👍👍 Eye openers all 👌👌👌":


"👍👍👍 Eye openers all 👌👌👌":

1 # Decision needs to be taken only after reviewing all angles; many times, we tend to ignore one little point, because for no reason, it just goes out of our mind. The adverse effects of it, result only after action/s are taken based on the decision so made.

2 # Spend at least some time every day in thinking within;
it's an excellent exercise for your mind & intelligence.

3 # The journey of Human race from it's Primitive to Modern age, can be summed up in these mile stones:

"Quiriosity and inquisitivenss, The path of search, Gathering and understanding the Mother Nature and surroundings, Exploring and experimenting, The learnt lessons, Innovating and adopting and so on. As one looks back, he is bound to be astonished to note, where we were and where we all, are now.

The inside out, almost total knowledge of the Human body and it's complex functions, has been accomplished and the search goes on and on....Behind this gigantic voyage, at it's Nucleus is the Human Brain, a super, duper computer with feelings as well. It is high time that instead of fighting amongst ourselves, we ought to remember all those, who must have done value additions from time to time, and hence salute to them with Great Respect and Gratitude.

4 # "Moderation is the Key":
Who said 'mistakes teach u to correct your Actions?' I am in dilema to believe it. Any addiction is very bad; even the addiction to eat your most liked food is equally bad.

Few months back, I just did that and virtually, I almost ate food of 4 days in just 2 days not bothering the adverse consequences. Since then, I had to be in bed, lost the taste of tongue, can't eat food or drink other than water for many days. Medicines too, are not much effective. I had to wait, see myself to be back on my feet and be normal.

The moral of the story is Moderation is the Key for peace of body and mind.

5 # "Being curious, and inquisitive is what for all living beings are born. The difference between them, and human beings is the better intellegence, application skills and above all, immence memory.

Honestly, from my own experience, to be a student through-out out your life, is an unique self satisfying experience."

6 # It’s said that you are the Driver
of your Destiny; but in reality,
you find Destiny drives you.

7 # Alzimer disease is on one side the 'Ultimate Mukti', and on the other it's the Worst punishment, one tends to get. Forgetting who u r, is virtually denying your very existance and that too, by your self.

8 # The 'Real' conceptual Truth is hidden very deep and is the 'Gloden' or now 'Platinum' Treasure of a Human thought. V need to analyse, probe, think and dissect to get to its 'Route'.

Surely, this is very interesting, well-Worth exercise, one can do from time to time. Even though, the Time, endlessly unfolds itself into unknown Future, if you get to the Route and Truth, it wld last for ever and ever.
Meaningful & creative thinking emerges not only from a sensitive soul but from proper time and an inspiring place. Do you agree? For me, the time is very early morning.

9 # In life, what one needs is to be always comfortable & be contented in any situation that one comes across; it’s a very difficult task and all one needs is an art of adjustment.

And
Finally, a practical one:

10 # # In any product portfolio, in today's competitive markets, finally, only 2 or 3 players remain while others either vanish or get merged with the big fish for survival.

Sudhakar Natu

P.S.
For My you tube channel:
moonsun grandson
Pl. Di save this link
to see.......
thought provoking videos......

https://www.youtube.com/user/SDNatu

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

"ह्रदयसंवाद-३०": "अपरिहार्य परस्परावलंबन !":

 "ह्रदयसंवाद-३०": "अपरिहार्य परस्परावलंबन !":

सध्या आत्मनिर्भरतेचे गोडवे गाणे आवश्यक आहे, ह्यात शंकाच नाही. मात्र अशा परिस्थितीतही आपण एका महत्वाच्या गोष्टीकडे कळत, नकळत विनाकारण दुर्लक्ष होतं, ते बरोबर नाही. आपण एकमेकांवर किती, किती अवलंबून असतो, हे आपल्या कधी लक्षातच येत नाही. आपण त्यापैकी किती तरी जणांना पाहिलेलेही नसते. कदाचित ती माणसे आपल्या जीवनात कधीही येत नाहीत आणि तरीही ती आपल्याला त्यांच्या परीने आपले जीवन सुकर, सुलभ होण्यासाठी मदत करत असतात, कष्ट घेत असतात.

हा विचार आज मनात यायचं कारण म्हणजे, मुंबईत पडलेला धुवाँधार मुसळधार पाऊस. संपूर्ण रात्रभर पाऊस पडत असल्यामुळे, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर माझ्या मनात आले की, आज दुध येणारच नाही. नेमका त्याच वेळेला आम्ही चांगला मोठा पाव आणला होता आणि तो टोस्टरवर भाजून, अमूल लोणी लावून छान पैकीन खायचा आमचा बेत होता. बहुधा, तो पाव फुकट जाणार असा विचार असतानाच, मी दार उघडले आणि बाहेरच्या पिशवीत बघतो, तर दुधाच्या पिशव्या टाकलेल्या होत्या.

मी थक्क झालो इतका पाऊस असूनही, नेहमी येणाऱ्या वेळेवरच दुधाचा रतीब टाकणारा माणूस आला होता. अर्थातच त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातून दुधाच्या गाड्या देखील आल्या होत्या. आपण घरामध्ये असतो, पण आधी आपल्याला दूध मिळण्यासाठी सुद्धा, त्या मागे किती हात असतात, हे लक्षात आले. म्हणूनच एकमेकांना मदत कशी, कोण अबोलपणे करत असतो, हा विचार मनात आला.

सध्या लाँकडाऊनमुळे घरातच मुक्काम करायला लागतोय आणि आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना तर छोट्या पडद्याशिवाय दुसरी काही करमणूकही नाही. वाचनालयेही बंद आहेत आणि काही चालू असली, तरी सध्याच्या कसोटीच्या काळात आम्हाला बाहेर जाणं कठीण आहे. त्यामुळे वाचायचा जो काही छंद आहे, त्याच्यावर मर्यादा आलेल्या आहेत.

अशा वेळेला, आपल्याला चांगल्या वाटणार्या निवडक मालिकांबरोबर, टाईमपास म्हणून, आवडत नसलेल्या लांबण लावणार्या मालिकाही, बघत वेळ काढावा लागतो. अंतर्मुख होता होता, मला जाणवले की, आपल्या समोर करमणुकीचे हे ताट येते, ह्याला कारण ही कलाकार मंडळी आणि पडद्यामागचे अनेक अनभिज्ञ सहाय्यक. मालिकेचा संसार साजरा व्हावा म्हणून आपले घरदार सोडून, दूर एकत्र येऊन, धोका पत्करून करमणुकीचे जे काही त्यांचे योगदान असते, ते ही सर्व माणसे देत असतात. त्यांचेही किती आभार मानावे, तेवढे थोडेच आहेत. कारण कोरोना सारख्या संकटामुळे, असे चित्रिकरणासाठी अनेकांनी एकत्र येणे हे किती धोक्याचे आहे. अशा वेळी, एखादा नामवंत कलाकार, कोरोनामुळे निधन पावला की, चटका तर बसतोच, त्याचबरोबर ध्यानात येते की, ही मंडळी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी खरोखर किती आणि काय काय करत असतात ते.

अशीच एकाहून एक नित्याची अनेक अद्रुश्य सहाय्याची, मदतीची उदाहरणे, आपण सजगतेने विचार केला की आपल्या ध्यानात येतील. मी म्हणून म्हणतो की, आपले जीवन सुकर, सुलभ होण्यासाठी अनेक अदृश्य, अज्ञात हात आणि व्यक्ती अहोरात्र झटत असतात. त्यांची आठवण आपण कायम ठेवली पाहिजे. आज हा ताजातवाना विचार मनामध्ये आला आणि तो मी या ह्रदयसंवादात मांडला, इतकेच.

तुम्हालाही असेच अनुभव येत असतील, यात शंकाच नाही. फक्त आपली त्या दृष्टीने बघण्याची तयारी असावी. पण आपण आपल्यातच मश्गुल असतो आणि त्यामुळे हे असे काही आपल्या सभोवती घडत असते, हे आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून काळजी तर घ्या स्वतःची. पण ती घेताना, अनेकांच्या ह्या निरलस मदतीची मनात आठवण ठेवून त्या सर्वांना प्रणिपात करा.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....

https://www.youtube.com/user/SDNatu

 

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

"ह्रदयसंवाद-२९": "नव्या दिशा नवे मार्ग आणि प्रेरणादायी स्फूर्ती!":

 

"ह्रदयसंवाद-२९": "नव्या दिशा नवे मार्ग आणि प्रेरणादायी स्फूर्ती!":

चालता चालता आपण एकटेच जेव्हा असतो, तेव्हा नव्या दिशा नवे मार्ग आणि ताजेतवाने विचार कसे निर्माण होऊ शकतात, याचा आपण ह्या खास सदरातील पहिल्या लेखात अनुभव घेतला. आज अचानक whatsapp grp वरचा एक विडीओ पाहता-पाहता आपल्याला आपणही असंच काहीतरी जगावेगळं, जगासाठी योगदान आपल्या शक्याशक्यतेतील जे असेल, ते करून दाखवायची, प्रेरणादायी स्फूर्ती निर्माण कशी होते ते उमजले.

आज मोबाईल तर लहान थोरापासून सगळ्यांच्याच हातातले एक खेळणे झाले आहे. त्यावर आपल्याला जसे काही ऐकायला मिळते, किंवा वाचायला मिळते, तसेच पहायलाही मिळते. Whatsapp ग्रुपवर आलेला तो व्हिडिओ पाहिला मात्र, तो वेगळीच प्रेरणा मनामध्ये उत्पन्न करून गेला.

त्यातील प्रसंग प्रमोशनचा होता, प्रचाराचा होता हे नंतर लक्षात आले. एक नविन चित्रपट "अनटोल्ड स्टोरी ऑफ अँन अनसंग हिरो "हवाईजादा" या चित्रपटाचे ते प्रमोशन होते. परंतु त्यासाठी अभिनेता आयुष्मान खुराणा याने केलेले सहजसुंदर स्फूर्तीदायी भाषण, भाषण नव्हे तर समोरच्या प्रेक्षकांबरोबर केलेला सहजसंवाद, कुठल्याकुठे सगळ्यांना घेऊन गेला, वेगळ्याच काळात, वेगळ्याच इतिहासात......

या व्हिडीओमध्ये जे पहाता पहाता ऐकलं, ते थोडक्यात जर सांगायचं झालं तर त्याचा मतितार्थ वा सारांश असा होता:
'आपण विमानाने आता सहजगत्या जगभर सैर करून येतो. पण एखाद्या पक्षाप्रमाणे भरारी घेणारे हे विमान शोधले कोणी? असा जर प्रश्न केला तर अगदी कोणालाही 1903 हे साल आणि राइट ब्रदर्स यांचेच नाव लक्षात येते. पण जर इतिहासाचा मागोवा आपण घेतला, तर लक्षात येते की हे काही खरे नव्हे. त्याच्याही आधी 1895 मध्ये शंकर बापूजी तळपदे या अवलिया भारतीयाने विमानाचा शोध लावला, विमान निर्माण करून त्याचे चक्क १८ मिनिटे गिरगाव चौपाटीवर, ५०० प्रेक्षकांच्या उपस्थितात प्रत्यक्ष करून दाखवले गेले होते आणि नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे, त्यावेळी स्वतः माननीय लोकमान्य टिळक या रोमहर्षक प्रसंगाचे साक्षी म्हणून तेथे उपस्थित होते!

त्यावेळेला आजच्यासारखे सोशल मीडिया फोन व जनसंपर्काची साधने कुठलीही नव्हती. त्यामुळे अशी अत्यंत आश्चर्यकारक व महत्वाची बातमी जगभर माहित होणे, केवळ अशक्य होते. आज कुठे कोणी हुं केले की, त्याचे सारे पडसाद सोशल मीडियाच्या रूपाने जगभर सहज पसरले जातात. पण त्यावेळेस ब्रिटिशराज असल्यामुळे तळपदेंना पेटंट काही घेता आले नाही आणि इतिहासात मात्र त्यांची विमानाचा शोध प्रथम लावणारा शास्त्रज्ञ म्हणून नोंदही झाली नाही. हे खरोखर दु्ःखदच. पण असा भारतीय ज्याने विमानाचा जगामध्ये प्रथम शोध लावला, तो धडपड्या माणूस आपल्या मुंबईचाच होता. त्यांचीच "हवाईजादा" ही कहाणी आहे.

आपल्या प्रेरणादायी इतिहासाच्या
पाऊलखुणा शोधता शोधता त्या भाषणांमध्ये तिथे गीता ग्रंथाचाही उल्लेख झाला.
हसत हसत बोलणार्या आयुष्मान खुराणाने असे पुढे आणले गेले, की त्याच्या खिशात नेहमी "पॉकेट गीताबुक" असते. गीताबुक असते. त्याने पुढे प्रतिपादित केले की, जगामधील आपल्या जीवनामधील, कुठल्याही समस्येला वा प्रश्नाला उत्तर हवे असेल, तर 'गीताबुक' उघडा. त्यामध्ये तुम्हाला उत्तर आणि मार्ग सापडेल.

खरंच, या छोट्याशा दोनच पण न विसरण्याजोग्या गोष्टी, त्या व्हिडीओमधून समोर उभ्या राहिल्या आणि आपल्याला जाणवले की, खरंच आपणही कधीही कमी नव्हतो. आपलेही पूर्वज असेच
जगावेगळ्या कितीतरी गोष्टी दुनियेला देऊन गेले.
निदान केव्हा तरी, आपण या सार्‍या महान योगदानांची जाणीव ठेवली पाहिजे. त्यापासून स्फूर्ती घेऊन प्रत्येकाने आपल्याला जे शक्य असेल, ते काही ना काही तरी उपयुक्त आणि जगावेगळे करून दाखवले पाहिजे. ही प्रेरणा पाहता पाहता त्या व्हिडिओने दिली आणि ती फक्त मी इथे ह्या ह्रदयसंवादात तुमच्या पुढे मांडली
इतकेच.

कशी वाटली? ते जमल्यास प्रतिसादात सांगा.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....

https://www.youtube.com/user/SDNatu


सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

"ह्रदयसंवाद-२८": "नव्या दिशा, नवे मार्ग अन् ताजेतवाने विचार-१":

 "नव्या दिशा, नवे मार्ग अन् ताजेतवाने विचार-१":


चालण्यासारखा दुसरा कुठला, चांगला व्यायाम नाही, दुसरी कुठली चांगली तपस्या नाही. कारण आपण चालताना, क्षणाक्षणाला सभोवतालचे वातावरण जसे बदलत असते, तसतसे आपल्या मनांतले विचारही बदलत असतात. अशावेळी आपण एकटेच असलो तर सोन्याहून पिवळे, कारण त्यावेळी आपणच आपले असतो, आपण एकाग्रतेने पुढचा मार्ग शोधत चालत जात असतो. स्वत:शी स्वत: संवाद साधण्यासाठी ही व हीच वेळ योग्य असते.

पाण्यामध्ये तुरटी फिरवल्यावर, वरती पाणी स्वच्छ पारदर्शक निर्मळ जसे राहते अन् गाळसाळ जसा तळाला जातो, तसं चालताना आपलं मन पूर्ण मोकळं होतं, प्रसन्न होत असतं. काल काय केलं, काय झालं वा काय निर्णय घेतले, काय निर्णय घेतले नाहीत, काय निर्णय घ्यायला नको होते असे आणि आपली पुढची वाटचाल कशी असावी अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ पिंगा घालतात व त्यांची उत्तरे पाहता पाहता सुटतही जातात, जावू शकतात....

अशावेळी आपणच आपले आपल्याच आरशात चित्र पहात असतो, बाहेरच्या जगातील स्पर्धात्मक जीवनाचा संग्राम तर आपल्याला सामना करायला बोलवत तर असतोच, पण त्या मोजक्या क्षणी आपण त्या सार्‍यापासून दूर होत, स्वतंत्र विचार करू शकतो. अशाच वेळी आपल्याला "नव्या दिशा नवे मार्ग किंवा ताजेतवाने विचार", कल्पना सुचत जातात किंवा जाऊ शकतात.....

कुठे फिरता हे महत्वाचे नसते. सध्याच्या कसोटीच्या काळात तर, घरातल्या घरात जरी फिरलात, तरी चालू शकते. चालण्यासाठी सूर्योदयानंतरची वेळ तर सर्वोत्तमच. दिवस कसा गेला हे पाठीमागे असतं आणि आता दिवस कसा घालवायचा ते आपल्या समोर असतं. त्यामुळे नेहमी असे चालत रहा, फिरत रहा, नवनवे मार्ग नव्या संधी शोधत राहा आणि आपल्या जीवनात सुखदुःखाचे क्षण असेच टिपत रहा.....

जसा माझा, आजच्या सकाळी चालताना सुचत व रुचत गेलेला हा ह्रदयसंवाद!

सुधाकर नातू

ता.क.
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....

https://www.youtube.com/user/SDNatu

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

"ह्रदयसंवाद-२७ ": "तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार!":

 "ह्रदयसंवाद-२७ ":                                                                                                                          "तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार!":


आपणच, वेळोवेळी घेतलेले निर्णय व कृती ह्यामुळे, आपले चांगले वा वाईट करत असतो.

माझ्या एका मित्राची ही गोष्ट आहे. SSC नंतर Science ला पहिल्या वर्षाला ७७% गुण त्याने मिळवल्याने इंटरसाठी त्याचा अभ्यास अधिक चांगला व्हावा, म्हणून वडिलांनी त्याला हॅास्टेलवर ठेवले. पण तेथे तो अभ्यास न करता तासन् तास मित्रांशी गप्पा वा कुठला ना कुठला खेळ खेळणे ह्यात वेळ घालवाव़याचा. एवढे पुरे नाहीं म्हणून की काय, तो काॅलेजमधे गणिताचे तास बुडवायचा.

ह्या सार्याचा परिणाम ह्या हुशार मुलाला इंटरला जेमतेम दुसरा वर्ग मिळण्यात झाला. पुढे पदवीपरिक्षेत तर तिसरा वर्ग मिळून त्याच्यावर अखेर कारकुनी करायची वेळ आली. जे खरं म्हणजे, अंगभूत हुशारीने इंजिनिअरिंग पदवी मिळवून, त्याच्या लायकीचे उच्चस्तरीय जीवन त्याला मिळू शकले असते, ते जावून त्याचे जीवन खडतर बनले. वडिलांनी दिलेली सुवर्णसंधी त्याने आपल्या चुकीच्या वागण्याने मातीमोल केली, निराश होत नशिबाला बोल लावत तो दिवस ढकलत राहीला.

सिगरेट किंवा दारू अशा अनिष्ट व्यसनांमुळे अकाली मरण येऊन कुटुंबाची दुर्दशा करणारे अनेकजण आपण पहातो. पत्ते जुगार ह्यापा़यी सोऩ्यासारखे जीवन वाया घालवून, भीकेला गेलेली माणसेही दिसतात. वेळोवेळी आपल्या आरोग्याला न जपता, डाँक्टरकडे जाणे टाळल्यामुळे दुर्धर रोगाची शिकार झालेलीही उदाहरणे आपल्या माहितीची आहेत. तसेच नोकरीतही कामचुकारपणा वा आपल्या वागण्यामुळे करीयरचे नुक़सान करून घेणारे अशांचीही हीच कथा!

सारांश 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार' # असे कुणी म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. आपला वर्तमानकाळच आपले भवितव्य घडवत असतो!
# लेखा शेवटी ह्यावरील एक प्रतिसाद वाचा.
---------------------------
"आपणच आता 'भीम' होऊ या!":
जीवनात कुठल्याही प्रकारचा बदल उरलेला नाही, त्याच त्याच चाकोरीतल्या त्याच त्याच वेळच्या कृती आणि रोजचे दैनंदिन सोपस्कार यामुळे जीवन अळणी झाल्यासारखे वाटत असू शकते. बदल हा निसर्गाचा नियम आहे, ह्या या नियमालाच आता तडा गेला आहे की काय, असे वैयक्तिक जीवन, विशेषतः ज्येष्ठांचे बाबतीत म्हणावेसे वाटते.

आकाशातले रंग, ढगांचे आकार, झाडांवरील पानांची सळसळ, समुद्राच्या लाटा...मनामनातील भावना... प्रत्येक क्षणाक्षणाला बदलत असतात आणि त्या बदला मध्येच माणसाच्या जीवनातील रंग-बिरंगी वैविध्य रहस्य दडलेले असते. पण आता सगळेच जणू चार भिंतीत ठप्प झाले आहे. रोज तेच तेच चेहरे आणि रोज त्याच त्याच गोष्टी यामुळे बदल हा शब्द खरोखर भूतकाळात जमा होतो की काय अशी भीती वाटत आहे. "The Change is the only Constant" असं मॅनेजमेंट कन्सल्टंटस् म्हणत असतात, त्याचे आता कुठलेही महत्त्व उरलेले नाही अशी स्थिती आहे. कधी बदलणार हे सारे?

महाभारतातील बकासुराला जसा रोज एकेका घरातला माणूस पाठवला जाऊन, तो त्याला भक्ष करायचा, त्याप्रमाणे कोरोना सारखा महान संकटाचा अद्रुश्य भस्मासूर आ वासून जगासमोर उभा आहे. आता महाभारतासारखा बलभीम कधी येणार आणि तो बकासुराचा, ह्या भस्मासूराचा नायनाट कधी करणार, याची प्रतिक्षा चातकासारखे सारे जण करत आहेत. शेवटी जेव्हा केव्हा हे घडेल, तो सगळ्यात मोठा महाबदल असेल.

अशावेळी जी मंडळी स्वतःचे आवश्यक दैनंदिन व्यवहार स्वतः करू शकत नाहीत असे एखाद्या दुर्धर रोगाने ग्रस्त असलेले, कोणत्याही वयाचे बहुदा ज्येष्ठ जास्तकरून ज्येष्ठ नागरिक,
त्यांच्या आयुष्यात कोणताही बदल नसतो. उलट दररोजचे विधी करण्यासाठी सुद्धा त्यांना इतरांकडे पाहावे लागते आणि त्यांच्या मदतीनंच त्यांचा दिवस पुढे ढकलला जाऊ शकतो. त्यांच्या मनस्थितीचे काय? त्या तुलनेत आपण जर स्वतःचं स्वतः सगळं करू शकत असलो, आपल्याला जे आवडतं ते तेव्हा करू शकत असलो, तर आपण कोणताही बदल होत नाही, ह्याचे दुःख करायचे कारणच काय? त्यांच्यापेक्षा आपण कितीतरी चांगल्या अवस्थेत आहोत याचे समाधान कां नाही मानायचे? शेवटी केव्हा ना केव्हा तरी प्रत्येकाला या अवस्थेतून जायचे असतेच हे विसरुन जाता कामा नये. शिवाय सध्याचे कोरोनासारखे महासंकट येणे आणि त्यामुळे कायम चलनवलन असलेले जग जवळजवळ ठप्प होणे हाही एक महाबदलच नव्हे कां?

अचानक अजून एक नकारात्मक विचार असा आला की, सध्या निदान प्रत्यक्ष कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यावरच, तो व्हायचा धोका आहे. परंतु विचार करा, जर असे घडले की टेलिफोनिक संपर्क जरी घडला तरी तरी कोरोनाचा धोका निर्माण झाला तर काय? सांगता येत नाही! निसर्गाचा चमत्कार -ज्या बाधीताला हा रोग झाला आहे त्याच्याशी टेलीफोन वरूनही संपर्क साधला गेला व त्या आवाजाच्या संपर्कातूनही तो ऐकणार्याला संक्रमित होईल तर काय होईल? हा खरोखरच अतिशय भीतीदायक विचार आहे. तसे काही घडेल, असे बिलकुल नाही. पण 'मन चिंती ते वैरी न चिंती' हे म्हणतात ते असे.

अशा बिकट समयी, शक्यतोवर असे कोणतेही नकारात्मक विचार करू नयेत, तशा बातम्या ऐकू नयेत. शक्यतोवर 'हेही दिवस जातील' अशा तऱ्हेची सकारात्मक भावना आणि आत्मप्रेरणा व आत्मस्फूर्ती, ह्या जोरावर जे आपल्याला आवडेल त्या कार्यात कायम मग्न राहणे हेच उत्तम. आता कुठला 'भीम' कधी येणार ह्याची वाट न बघता, स्वतःच प्रत्येकाने 'भीम' व्हायचे, नेहमी आनंदी व प्रसन्न उत्साही रहायचे. शेवटी सभोवताली ज्या कसोटीच्या परिस्थितीतमध्ये राहावे लागते त्या परिस्थितीशी जे जुळवून घेतात, तेच टिकून राहू शकतात, हेच व हेच मनोमनी ध्यानी ठेवायचे. आपण त्या प्रमाणे जुळवून घ्यायलाच हवे, आपण सार्यांनीच आता 'भीम' व्हवयाचेच, हाच शेवटी या अम्रुतमंथनाचा मतितार्थ! 

"करावे तसे भरावे!": 
दुनियेतील अनंत पापांचा अखेर भरला घडा, 
शिकवितो, निसर्ग कोरोनारुपी भस्मासुराचा धडा! 
आता तरी व्हा शहाणे, अन् गिरवा मुल्यांचा पाढा, 
पाळा नियम, घ्या काळजी, सुटेल संकटाचा वेढा!


अंधाराच्या किनार्‍यावर ही अशी आशेच्या किरणांची लाट येणं, हाही एक हवाहवासा बदलच.

सुधाकर नातू
# ह्या लेखावर आलेला एक प्रतिसाद:
"😀 यावर मी काय प्रतिसाद देऊ? हे वास्तव आहे. याची पाळेमुळे आपल्या पैदाशीत आणि मुख्यतः वृत्तीत असतात. एकाच घरातले, त्याच वातावरणात वाढलेले सख्खे भाऊ वेगवेगळ्या मार्गाने गेल्याची असंख्य उदाहरणे आहेत. असे का घडते? आपल्याला वेळोवेळी मिळालेली संगत यात मोठे योगदान देऊन जाते. आजचेच उदाहरण द्यायचे तर अंबानी बंधूंचे देता येईल. एक जगातील पहिल्या पाच श्रीमंत व्यक्तीत समाविष्ट तर दूसरा साफ कर्जबाजारी. दोघांचे जन्मदाते एकच पण थोडे खोलात जाऊन दोघांची वेळोवेळची मित्रमंडळी तपासुन बघावी. दोघांच्या पत्नींच्या उद्योगाचा मागोवा घ्यावा म्हणजे परिस्थिती बर्‍यापैकी स्पष्ट होईल."

ता.क.
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....

https://www.youtube.com/user/SDNatu

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

"समाधानाची सप्तपदी":


"समाधानाची सप्तपदी":

ह्या अत्यंत उपयुक्त लेखाच्या प्रारंभीच हे सात मंत्र देताना मला विलक्षण आनंद होत आहे:
१. डोके वापरा
२. दृष्टी बदला.
३. जीभेला आवरा
४. हाताने नेहमी देत रहा.
५. ह्रदयापासून प्रेम करा.
६. मन काबूत ठेवा.
७. पायाने चालत रहा.

प्रास्ताविक:
दरवर्षी दसऱ्याचे दिवशी मला एक चांगली संधी मिळत असे. आमच्या कंपनीतील दसऱ्याचे कार्यक्रमाचे वेळी पूजा व आरती झाल्यावर, कर्मचाऱ्यांसमोर काही मौलिक विचार मांडण्याची मला संधी दिली जाई. त्या संधीचा मी नेहमीच उत्तम उपयोग करून घेत असे. पाहिलेले, अनुभवलेले, ऐकलेले आणि वाचलेले जे जे काही असे त्याचे चिंतन करून मी पंधरा वीस मिनिटांचे मार्गदर्शक व उद्बोधक विचार साऱ्या सहकाऱ्यांसमोर मांडत असे. त्यात रंजकता यावी म्हणून दोन-तीन छोट्या छोट्या गोष्टी देखील फिरत असे.

व्यक्तिमत्व विकास आणि आपले जीवन खाजगी व व्यवसायिक क्षेत्रात, अधिक समृद्ध कसे करावे, ह्याबद्दलचे विचार त्या साऱ्या खटाटोपात मी देत असे. माणसाजवळ असलेल्या व तिचा परिपूर्ण उपयोग करण्याची आवश्यकता असलेल्या, विचारशक्ती चिंतनशीलता या दोन मूलभूत शक्तींच्या जोरावर माझे दसऱ्याचे हे सीमोलंघन पुष्कळांना प्रेरणादायी ठरत असे. आपण जिथे काम करतो तेथे उपयुक्त असे काहीतरी वेगळे आपण करत आहोत याचा आनंद तर त्यामुळे मला होतच असे, परंतु त्याचबरोबर सभाधीटपणा, आपले विचार परिणामकारक रीतीने कसे सांगावे ह्याची कला आणि अर्थातच प्रसिद्धी व जनसंपर्क त्यामुळे मला मिळत असे.
नेहमी आनंदाने समाधानाने कसे जगावे ह्याची गुरुकिल्ली असणारी सात पावले अशाच एका कार्यक्रमाच्या ओघात मला गवसली आणि त्याला अनुरूप असे "समाधानाची सप्तपदी" असे आकर्षक नाव मी दिले. 

आज श्रीगणेशाच्या, विद्येच्या देवतेच्या उत्सवात म्हणूनच माझे हे दुसरे लेख पुष्प: ह्या समाधानाच्या सप्तपदीची संकल्पना पूर्णपणे वाचकांसमोर उभे रहावी, म्हणून हा लेख आहे.
मानवी जीवनात समाधान शांती सुख व आनंद यांची सर्वच जण अपेक्षा करतात परंतु मृगजळा सारख्या या गोष्टी दूर दूर पळून जात असतात माणूस जन्माला येतो वाढतो कुटुंब कबिला करतो आणि एक दिवस निजधामाला जातो या मानवी जीवनाचे रहस्य काय हे गुण उकळण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु या प्रश्नाचे शाश्वत असे उत्तर अजून तरी कुणालाही सापडले नाही आणि मलाही नाही कदाचित ते कधी सापडेल असे वाटतही नाही या मूलभूत प्रश्नांचा प्रश्नही आयुष्यभर कित्येक जणांना पडत नाही हीच तर दुर्दैवाची बाब आहे या पार्श्वभूमीवर मी सुख व समाधान शांतीसाठी वर मांडलेली सप्तपदी सुचवू इच्छितो. आता प्रत्येक मंत्राची ओळख करून घेऊ:

१ डोके वापरा:
माणसाच्या जीवनात समस्या नेहमीच येत राहणार, खडतर प्रसंगांना तोंड द्यावेच लागणार. अशावेळी माणसाने सारासार विचार करून आपल्यापरीने डोके वापरावे आणि आपला मार्ग आपणच शोधून काढावा.

एक गोष्ट सांगतो एक खेडेगाव होते तिथे तात्या एका घरी दररोज पाणी भरायचा. त्याकरता त्याला बिचार्‍याला एक-दीड मैलभर पाऊलवाटेने खांद्यावर दोन मडक्यांची कावड घेऊन पायपीट करावी लागे अशा आठ दहा खेपा मारल्या की मग त्याचे त्या घरातले पाणी भरण्याचे काम पुरे व्हायचे. असेच काही दिवस गेले. दोन मडक्यापैकी, एका मडक्याला भोक पडले. साहजिकच नेहमी फेर्‍या मारताना पाणी गळून जायचे. आता तात्याला यामुळे अधिक फेऱ्या माराव्या लागायच्या. तात्याला होणार्‍या त्रासाचे त्या फुटक्या मडक्याला खूप खूप वाईट वाटायचं. पण करते काय असेच काही महिने गेले. तात्याजवळ आपले दुःख व्यक्त करावे असे त्या फुटक्या मणक्याला नेहमीच वाटायचे. 

शेवटी एका दिवशी त्याला ते फुटके मडके तात्याला म्हणाले: "तात्या माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो तुला अधिक पायपीट करावी लागते याचे मला वाईट वाटते". हे ऐकून तात्या हसला. तो असा हसत असलेला पाहून ते फुटके मडके आश्चर्यचकित झाले व ते म्हणाले "तात्या बाबा रे हसतोस का माझा त्रास सहन कां सहन करतोस?" त्यावर तात्या म्हणाला "अरे आपण पुन्हा त्या पुलावरून पाणी भरून परत येऊ तेव्हा तुझ्या पाऊल वाटेच्या दोन्ही बाजूला पहा म्हणजे मग मी तुला काय हसलो  ते कळेल"

खरोखरच नवलच घडले होते पुनश्च पाणी भरून येताना त्या मडक्याला काय दिसले? तर ज्या बाजूला पूर्ण भरलेले पाण्याचे मडके असे, त्या बाजूला उजाड माळरान होते, मात्र ज्या बाजूला ते फुटके मडके होते त्या बाजूला रंगीबेरंगी सुंदर फुलांची झाडे दिसत होती. तात्या म्हणाला "मला कळले होते तू फुटला आहेस, पण मी मालकाला ते सांगितले असते तर तो चिडला असता व तुला व मला त्याने दूर केले असते. अशावेळी मी डोके वापरले तुझ्या ज्या बाजूला कावडीत असावयाचास, त्या बाजूस विविध फुलझाडांच्या मी बिया फेकायचो. मला जरी थोड्या जास्त खेपा पाणी भरण्यासाठी माराव्या लागल्या तरी, त्याचमुळे पाणी मिळून त्या बियांच्या वेली झाल्या आणि त्या बहरल्या तुझ्यामुळेच ही फुले मालकाच्या दारी देवाला पूजेला वापरली जातात, घरातील बायकांना ती रोज आपल्या वेण्यात माळता येतात आणि उरलेली बाजारात विकून मालकाला पैसे मिळतात! तुझ्या फुटकेपणाचे आम्हाला सर्वांना हा असा फायदा झाला आहे" गोष्ट संपली.
आहे की नाही गंमत! डोके वापरल्याने अडचणीतून मार्ग तात्याला सापडला. तुम्हालाही म्हणूनच नेहमी डोके वापरून जीवनात समाधानाचे पहिले पाऊल टाकता येईल.

२ दृष्टी बदला:
आपण एका विशिष्ट नजरेने कोणत्याही गोष्टीकडे व्यक्तीकडे पाहतो, प्रसंगाकडे पाहतो, ती दृष्टी आपण बदलली पाहिजे, अगदी वेगळ्या नजरेने त्या गोष्टीकडे पाहायला शिकले पाहिजे. अर्धा ग्लास पाण्याने भरलेला कुणाला दिसतो तर तोच कुणाला अर्धा रिकामा आहे असे भासते. वरील गोष्टीतही तात्याने मडक्याच्या फुटकेपणाकडू वेगळ्याच दृष्टीने पाहिले आणि वाईटातून त्याला चांगलेच फळ मिळाले.

एक छोटीशी गोष्ट:
 दोन जुळे भाऊ असतात, दुर्दैवाने, त्यांचे वडील दारुडे जुगारी व नालायक असतात. ह्यापैकी एका भावाच्या डोळ्यांना, वडिलांचे वाईट गुण हेच अनुकरण करणारे वाटले आणि तो फुकट गेला, तर दुसऱ्या डोळ्याने त्यांच्या वाईट गुणांकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले आणि आपण जीवनात काय टाळले पाहिजे ते त्याला उमजले आणि तो जीवनामध्ये यशस्वी झाला.

शिक्षक व तीन विद्यार्थ्यांच्या बाबतीतली एक गोष्ट:  पाण्यातील पाठमोऱ्या माणसाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते ते सांगणारी. एकाला वाटले तो जीव द्यायला उभा आहे, तर दुसर्याला वाटले तो पाणी भरतोय तर तिसर्याला वाटले तो ओंजळीत पाणी घेऊन उगवत्या सूर्याला अर्घ्य देतोय! म्हणूनच नेहमी कोणत्याही प्रसंगाकडे व्यक्तीकडे गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिका. "The beauty lies in the eyes of the beholder" हे म्हटलय ते किती चपखल आहे! दुःखातून सुखाचा त्रासातून समाधानाचा तुम्हाला नवा मार्ग मिळेल तो अशा दृष्टी बदलातूनच! म्हणून समाधानाचे दुसरे पाऊल अर्थातच दृष्टी बदला हेच आहे.

३ जीभ आवरा:
 जीभेमुळे माणसाला चव कळते. मसालेदार चटकदार गोड खाण्याचे सौख्य हे जीभेच्या सामर्थ्यामुळे द्विगुणित होते. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक योग्य नव्हे ह्या न्यायाने जीभ जर आपण आवरली नाही तर आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते, मधुमेहासारखा रोग चिकटून आपल्याला ग्रासून टाकू शकतो किंवा लठ्ठपणा आणि त्यातून नवीन तब्येतीच्या कटकटी जीवनामध्ये त्यामुळे निर्माण होऊ शकतात.

त्याच्या दुसर्या दिशेने पहा: आपण जीभेने बोलतो देखील, म्हणून जीभ न आवरता नको तिथे, नको ते एखाद्याला जर आपण बोललो तर आपल्यातले परस्पर संबंध बिघडू शकतात. वाद-विवाद त्यातून भांडणे वितुष्ट निर्माण होते ते असे जीढ न आवरल्यामुळे! आपल्या सर्व दुःखांचे, असमाधानाचे मूळ वा कारण बऱ्याच वेळेला तेच असू शकते. म्हणून समाधानाच्या प्राप्तीसाठी तिसरे पाऊल:
"जीभ आवरा"!

४ हाताने नेहमी देत रहा:
आपले हात हे देण्यासाठी आहेत तसेच घेण्यासाठी आहेत, परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण जास्त देण्याचा विचार करायला हवा, घेण्याचा करू नये. जगामधले सर्वात उत्तम असे देणे कुठले असेल तर बाळंतपणात आई मुलाला जन्म देते ते होय! माणसाला एकदाच मिळणारे माणूसपणाचे जीवन ह्या सर्वोत्तम देण्यातून निर्माण होते हे लक्षात ठेवा. निसर्गाकडे पहा: काय दिसते तेथे तुम्हाला? एक बी पेरले की, झाड उगवते त्याला अनेक फळे येतात त्या अनेक फळातील बियांपासून पुनश्च अनेक झाडे फळे निर्माण होतात. अशा तऱ्हेने देण्याचे, भरभरून देण्याचे कार्य निसर्ग विविध रुपात अव्याहत, सातत्याने करत असतो. सूर्य  लाखो वर्षे अव्याहतपणे विश्वाला प्रकाश देत असतो, अखंड अव्याहत शक्ती देतो. पावसाच्या रूपाने निसर्ग अविरत जीवन देत असतो. अशी कितीतरी उदाहरणे सभोवताली दिसतील.

आपल्याजवळ असलेला एखादा चांगला विचार दुसऱ्यांना द्या, अधिक असलेला पैसा गरजूंना देऊन मदत करा, जिथे जिथे मदतीची गरज आहे, तिथे ती देता येणे तुम्हाला शक्य असेल, तर कुठलाही विचार न करता देत रहा. देण्याने जो आनंद मिळतो तो घेण्यात नाही. समाधानाचे मूळ खरोखर ह्या अशा देण्यात आहे. आपल्या करणीमुळे इतरांच्या हास्य चेहऱ्यावर हास्य समाधान होत असेल तर त्याहून कोणते देणे मोठे असेल आणि कोणता आनंद कोणता मोठा असेल? मी हा लेख लिहून तुमच्या जीवनात समाधान मिळवण्याचा मंत्र देत आहे आणि त्याचा मला खूप आनंद वाटतोय.
ह्याकरता ध्यानात ठेवा समाधानाचे चौथे पाऊल:
हाताने नेहमी देत रहा!

५ ह्रदया पासून प्रेम करा
माणसाला ह्रदय दिल दिले आहे ते चांगल्या विचारांवर प्रेम कराण्यासाठी, चांगल्या माणसांवर प्रेम करावे ह्यासाठी. आपल्याला पाच ज्ञानेंद्रिये दिली आहेत, ती जगातील सुंदर गोष्टींवर प्रेम करण्यासाठी! माणसाच्या सर्व दुःखांचे मूळ हे द्वेषात आहे, क्रोधात आहे हेवेदावे करण्यात आहे, त्यांचा त्याग करा. माणसांवर माणसांसारखे प्रेम करा. सुख समाधानाचे मूळ प्रेमात आहे. जीवनात आपल्याला मनापासून काय आवडते, काय केल्यामुळे आपणास खरेखुरे समाधान लाभते, त्याचा शोध घ्या. कुणाला चांगले सुर, संगीत आवडते, कुणाला निसर्गाचे भरभरून जागोजागी लुटले जाणारे अलौकिक निसर्गसौंदर्य पाहण्यात समाधान वाटते, कुणाला चांगले विचार ऐकायला तर कुणाला चांगले पुस्तक वाचायला आवडते. सुखी-समाधानी माणूस तोच की, ज्याला आपल्याला मनापासून आवडणाऱ्या आणि ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या करता येऊ शकणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रेम करता येते तो. आवडणाऱ्या गोष्टींवर म्हणून हृदयापासून प्रेम करा हे समाधान देणारे पाचवे पाऊल आहे.

६ मन नेहमी ताळ्यावर ठेवा:
जीवनामध्ये प्रचंड गती आली आहे, जिथे तिथे स्पर्धा आहे, रांगा आहेत. लांब पल्ल्याच्या अडथळ्यांच्या शर्यतीत सारखे सध्या माणसाचे जीवन अनिश्चित झाले आहे. ट्रॅफिक जॅम, बसगाड्यांना प्रचंड गर्दी, जिथे तिथे अडचणीच अडचणी, त्यांत आर्थिक मंदीचा फटका व्हीआरएसच्या स्वरूपात अधून मधून बऱ्याच जणांना बसतो, तर तरुण सुशिक्षितांना नोकऱ्या नाहीत. जिकडेतिकडे प्रश्नच प्रश्न, कूट समस्याच समस्या! घरात वृद्धांना थारा नाही, जो तो आपल्या घाईत आहे, आपापले प्रश्न सोडवायला धडपडतोय. अशा या परिस्थितीत, तोच टिकणार आहे जो ह्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो. पाण्यात पडलो आहोत मग पाणी ते कसेही कितीही असले तरी पोहणे भाग आहे. सहनशक्ती वाढवणे हे अत्यंत गरजेचे आहे. प्रतिकूल तेच घडणार. त्याही परिस्थितीत आपणाला मार्ग काढायचा आहे. आपण तो निश्चित काढणार आहोत याचे आत्मभान ठेवा. कितीही बिकट कठीण प्रसंगाला चक्रव्युहात अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तरी डगमगू नका, मन ताळ्यावर ठेवा. ज्याची मनशक्ती श्रेष्ठ, तोच आजच्या युगात टिकणार आहे. जीवनाला अर्थ देऊ शकणार आहे. ही खरोखर सारी तारेवरची कसरतच आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे, मन ताळ्यावर ठेवून स्थितप्रज्ञ राहणे अत्यावश्यक बनणार आहे.  म्हणून जीवनात शांती समाधान मिळविण्यासाठीचे 6 वे पाऊल आहे: मन नेहमी ताळ्यावर ठेवा. मनच तुमचे भविष्य घडवत असते. मनगटाच्या शक्तीपासून मशीनच्या शक्तीच्या जोरावर जग इथवर येऊन पोहोचले आणि आता आहे कसोटी मनाच्या शक्तीची, ह्याचे भान ठेवा.

 ७ पायाने नेहमी पुढे चालत राहा:
थांबला तो संपला ही म्हण कधी नव्हे ती, आजच्या युगात खरी ठरत आहे. मागे वळून बघायचे ते क्षणभरच, काय बरोबर केले वा काय चूक ह्याचा केवळ आढावा घेण्यासाठी. भूतकाळ बरा-वाईट कसाही असो, आज त्याचा उपयोग नाही, सतत पुढे पुढे जायला हवे. पायाने जमिनीवर राहून नेहमी उज्ज्वल भवितव्याकडे चालत राहा. नवा मार्ग नवीन दिशा शोधत रहा. जीभ आवरण्याचे जसे दोन फायदे, तसेच या पायाने चालत राहण्याच्या सातव्या पावला मध्ये आहेत: एक म्हणजे पायांना आणि आपल्या आरोग्याला फिरण्यासारखा उत्तम व्यायाम नाही. त्यामुळे तब्येत तंदुरुस्त राहण्यासाठी पायाने नेहमी चालत राहा, दुसरी बाजू म्हणजे नेहमी सकारात्मक उत्साहवर्धक विचार करून भूतकाळात न रमता, भविष्याकडे बघा. जीवनात शांती समाधान मिळवण्यासाठी चालत राहा, आपले कर्तव्य पूर्ण करायची पराकाष्टा करा.

अशा तऱ्हेने समाधान प्राप्ती साठीचे मंत्र व सप्तपदी सांगून झाले.आता फक्त स्वत:साठी दोन प्रश्न: एक नेहमी विचारला पाहिजे आणि दुसरा प्रश्न कधीही मनात आणायचा नाही असा! कायम प्रश्न विचारायचा तो असा: स्वतःला आता मी जे काय करतो आहे त्याचा इतरांना दुसऱ्या कोणाला त्रास तर होत नाही ना? आणि न विचारण्यासारखा प्रश्न म्हणजे  मी जे काय करतो त्यात मला काय मिळणार माझा फायदा काय हे विचारायचं नाही हा! गीतेमध्ये सांगितले आहे:
"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"
ते कायम ध्यानात असू द्या. आपले कर्तव्य सातत्याने करत राहा. शांती व समाधान तुमच्याकडे आपण होऊन येईल.
"शुभम् भवतु"!
सुधाकर नातू

ता.क.
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....

https://www.youtube.com/user/SDNatu

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

"टेलिरंजन-३": "काहीही, नाही ही हं'!:

 "टेलिरंजन-३": "काहीही, नाही ही हं'!:

"सत्ताधीश कसा असावा? कसा नसावा?":

छोट्या पडद्यावर टेलिरंजन करता करता, 'काही ही हं', असा भास पुष्कळ पाणी टाकत गेलेल्या कधीही बघू नयेत,अशा मालिका लांबण लावत कशा जातात, ते आपण मागच्या लेखात बघितले.

बिघडलेल्या, बेताल अशा गुरुनाथसारख्या बनेल रंगेल, माणसामुळे "माझ्या नवऱ्याची बायको" सारखी, मालिका समाजाला काय काय दिवे लावायचे, ते अजून दाखवतच आहे. पण कधी कधी, आपल्याला वेगळा अनुभव येऊ शकतो. मात्र त्यासाठी तशी छोट्या पडद्याकडे बघायची, त्यावरील कार्यक्रमातून काहीतरी वेचायची बुद्धी, मात्र आपल्याजवळ हवी.

ह्या लेखात तेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कधी कधी, नवल घडू शकते आणि आपल्याला छोट्या पडद्यावरील एखादा चित्रपट वा मालिका खूप काही ना काही शिकवून जाऊ शकतात, असं लक्षात येतं.

काही दिवसांपूर्वी, मी टेलिव्हिजनवर 'महाभारत' मालिका आणि 'रमा माधव' हा चित्रपट बघितला. त्यामधून योगायोगाने मला राजा कसा असावा आणि कसा नसावा, हे सांगणार्या, अत्यंत परिणामकारक व नाट्यमय दोन परस्पर विरोधी चित्रकथा पहायला मिळाल्या.

"सत्ताधीश कसा नसावा"?:
जेव्हा पांडवांना कौरव, द्यूताध्ये दुसऱ्याही वेळी हरवून बारा वर्षांच्या वनवासात पाठवतात, तेव्हाची ही गोष्ट. त्यापूर्वी पहिल्या द्यूत सामन्यात पांडव हरतात आणि नंतर दुर्योधनाच्या पापी, सूडभावनेने प्रेरीत इच्छेपोटी, भर दरबारात, कुलस्वामिनी द्रौपदीचं अतिशय लांच्छनास्पद असं वस्त्रहरण घडतं.

त्यामुळे महाराज धृतराष्ट्राची कान उघडणी करण्याकरता, प्रत्यक्ष योगीराज व्यासऋषी दरबारात रागारागाने येतात. ते ध्रुतराष्ट्राला म्हणतात" दुर्योधनासारख्या
नालायक अशा तुझ्या पुत्रामुळे, साध्वी द्रौपदी सारख्या, आपल्या घराण्याची सून असलेल्या स्त्रीचे भर दरबारात वस्त्रहरण करण्यात आलं. त्यावेळेला तू दुर्योधनाला, ते होण्यापूर्वीच कां नाही खडसावलंस, निक्षून कां नाही थांबवलंस? शिवाय हे सारे घडल्यानंतर तरी, त्याला कठोरांत कठोर अशी शिक्षा कां तू दिली नाहीस? राजा, हे तू लक्षात ठेव की, राजा हा जनतेचे रक्षण व हित करण्यासाठी असतो, न्यायाने वागण्यासाठी असतो. तुझं कुटुंब वेगळं आणि तू राजा म्हणून वेगळा. राजा म्हणून विहीत कर्तव्य बजावण्यात, तू तुझ्या आंधळ्या पुत्रप्रेमापोटी, संपूर्ण अपयशी ठरला आहेस, तू घोर अपराध केला आहेस. अखेर तू आपल्या कुळाचा नाश ओढवून घेणार आहेस." सत्ताधीश आंधळ्या ध्रुतराष्ट्रासारखा मतलबी स्वार्थी आणि न्यायाला पायदळी तुडविणारा नसावा, हेच ह्या चित्तथरारक गोष्टीतून आपल्याला उमजते.
👍👍
"स्वतःच्याच करणीने, बेताल सत्ताधीश स्वतःच खड्ड्यात पडतात आणि आपल्या बरोबर बिचार्या रयतेलाही खड्ड्यात ढकलतात, त्याचा हा इतिहास आहे."

"सत्ताधीश कसा असावा"?:
त्यानंतर 'रमा माधव'' चित्रपट छोट्या पडद्यावर पाहायचा योग मला आला आणि त्यामध्ये पेशवा माधवरावांच्या रूपाने, खरोखर राजा कसा असावा सत्ताधीश कसा असावा ते कळलं.
चित्रपटातील ही गोष्ट पेशवा असलेल्या माधवरावांची आहे. त्यांचे मामा, रास्ते मामा निजामाला मिळून जातात आणि त्यामुळे पुण्यावर संकट येते, ते दूर करण्यात येतं. त्यानंतर रास्ते मामांना रामशास्त्री प्रभुणे दंड करतात, शिक्षा ठोठावतात.

अशा वेळेला माधवरावांची आई- गोपिकाबाई, माधवरावांकडे येते आणि म्हणते " तुझ्या मामाला शिक्षा झाली, आहे ती, माधवा, तू माफ कर, तो तुझा मामा आहे आणि माझा भाऊ आहे. त्यावर माधवराव पेशवे, जे बोलतात ते खरोखर विचारात घेण्यासारखा आहे. ते सांगतात " आई, ज्याने गुन्हा केला की, त्याला शिक्षा ही आलीच व ती झालीच पाहिजे. मग तिथे कोणतेही आपले नाते होते, ते विचारात घेणे, ही न्यायाची अतिशय भयानक पायमल्ली आहे आणि म्हणून मी मामाला कदापिही माफ करणार नाही. त्याने गुन्हा केलाय, तो सिद्ध झालाय, म्हणून त्याला शिक्षा दिली आहे, ती त्याने ती शिक्षा भोगलीच पाहिजे." 

माधवरावांचे हे करारी उद्गार ऐकून त्याची आई गोपिकाबाई म्हणते "हे बघ माधवा, शेवटचं सांगते, तू माझ्या भावाला, तुझ्या मामाला माफ कर, नाहीतर मी हा शनिवारवाडा सोडून जाईन!" हे सारे ऐकूनही माधवराव  शांतचित्ताने म्हणतात "आई मी तुझा मनापासून आदर करतो, पण तू लक्षात ठेव. माझं पेशवा म्हणून कर्तव्य वेगळं आणि नातं वेगळं, इथे मला पेशवा ह्या नात्याने, मला सारे काही न्यायाने वागावे लागेल. त्यामुळे तू तुझा विचार आहे तो सोडून दे. मी काही झालं तरी माफ करणार नाही कारण माझं ते कर्तव्य आहे."

बघा किती दोन वेगवेगळे चित्र आहेत ही-एक आहे, महाभारत मालिकेतील पुत्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या धृतराष्ट्रासारख्या स्वार्थी अन्यायी सत्ताधीशांची आणि त्याउलट दुसरे चित्र, पेशवा माधवराव यांच्या न्यायबुद्धीची. यावरुन आपल्याला लक्षात हे येतं की आपली स्वतःची नाती गोती बाजूला ठेवून, कोणत्याही चांगल्या सत्ताधीशाने जनतेचे हित साधले पाहिजे, योग्य तो न्याय नेहमीच केला पाहिजे. तरच काही ना काही तरी चांगले घडेल. समाज हा नेहमी शांत सुखी असा होत असतो. पुढे महाभारत युद्ध झालं त्या मागे आंधळ्या धृतराष्ट्राच्या, अन्यायी, नालायक दुष्ट अशा दुर्योधन ह्या पुत्रावरील प्रेमामुळे.

सारांश काय, तर छोट्या पडद्यावरदेखील आपल्याला काही ना काही तरी शिकायला मिळतं. नवे विचार आपल्याला मिळू शकतात आणि हाच तो फायदा या छोट्याशा मंथनातून आपल्याला आता लक्षात आलं असेल की सत्ताधीश कसा असावा व कसा नसावा, ते.

धन्यवाद
सुधाकर नातू
P.S.
माझा you tube channel
moonsun grandson

विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........

moonsun grandson Channel link:

https://www.youtube.com/user/SDNatu

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

" Random Thoughts-2":

 "Random Thoughts-2":


# LD: 150th Day:
My Status Report:
# 0ver 100 articles on the Blog..
# 15 Videos on my you tube channel.
# Around 30 Audios on whatsapp
And the Most Outstanding:
# Around 120 days- भांडी घासणे!

The Momentum carries on and on....

---------------------------
# "Your Day Would be made!":

Noting my mind’s musings has been my off and on engagement since the many decades; but since my retirement, it is turning into a regular daily habbit, I am proud of.

Writing is the best exercise, I normally perform. Writing in a such manner for me is basically the mirror of the day or days gone by, from time to time. This creative process encompasses all of our 5 senses-what you are really doing is primarily listening to your mind; you see the time gone by; then read & talk to your inner self to finally come out with writing about all you have so now gone through in as Crystal clear manner as you are creatively capable of.

The real test is in transforming in correct & effective words what’s this mirror in your mind is! And this is what gives the writer a self-satisfying joy & satisfaction. The obvious outcome of these musings is to share them first, with your soul and edit it further to pass on to whom-so-ever you decide.

Whether I get a response or not frankly doesn’t matter. Selecting the correct medium for such sharing is important task and depends on the content of such musings and the probable receipient/s.

While I was sipping my first cup of tea in the morning today, this is what went on triggering in my mind and I am now just putting it in B/W!

All I can conclude for you folks, is that writing is an interesting and self-enlightening experience.
Please do test it yourself.

Your Day Would be made!"
----------------------------
# Thrust for rapid economic Development of the Nation is surely now essential but more than that, what should get emergency attention is cleansing of, upliftment of people's minds from within, to imbibe high moral character and values, like honesty, integrity, commitment, compassion. Must remember unless a creastal clean inside is in its place, 'shining outside' has no value. Thank u.

----------------------------
# "Kalai Tasmain namaha'!?:
The route cause of the present problems, is the monstrous Power hunger; it compells to get Power at any cost-by fooling, selling impossible dreams w/o thinking, thus playing on the emotions of the voters and what hv u.

After getting power, again to retain it, do anything good and may be more bad. This trend and practice is now mastered. On the other side, in the entire public life more selfish, self benefits-seeking attitude, every where, has virually corrupted the atmosmohere.

So, for anything and everything, almost every body, prefers self gains than sacrifice for others,then what The Nation can expect from such a cultural shock. This is more visible, rapidly so, after opening of economy thru' 'LPG' strategy, since last few decades. Grid for Prosperity, at the cost of losing Noble values and morals besides, much touted Pholosophy of Life, India has been proud of!

Now, the ball is set free and fast in this unending race and u just can't stop or reverse it's motion.

'Kalai Tasmain namaha'!?

----------------------------
# With the experience of few visits abroad and having noticed their Advanced Development, Dedication, Discipline on one side; And our indiscipline, 'Chalse Culture' rampant corruption and most importantly, Dirty Public Places on the other side,I fear,it would take at least a few hundred years to achieve what those Advanced Countries are at Present. But Alas, by that time,they would be obviously miles ahead of us. Please Wake up, Please Wake up!
---------------------------

# So many Advt spots on TV are too much; they r a great nuisance to viewers and must be curtailed considerably as they break his link to program he is viewing. Any specific rule for their duration in an episode?

Wonder How advertisers can afford so huge expenses for them and finally they go on to add on prices thus increasing already high inflation.
----------------------------
# "A Pertinent Question":
It's surely a pathetic irony that over the years the rich have become extraordinarily reacher and the poor are becoming alarmingly poorer in India. Such a dangerous skewed income strata of the population is a shame and speakes volumes of totally failed policies all these years.

So the Pertinent Question is:
"Can we really welcome the news of more and rich Indians are buying properties abroad?"
---------------------------
# Finally, Recalling my Facebook post 6 years ago:

"Today we had one of the most exciting and ecstatic experience, when we saw the film 'Mary Kom'. The unfolding of her struggles against all odds, overcoming the emotional trauma of a mother of two tiny twins,her total dedication and commitment to the art of Boxing finally culminates into the Grand Success in the form the Women's World Boxing Championships. Not only this is the most inspiring story of a young woman, that we witness once in a Life Time, but this is a Must See Film of once in a Century. Hats off, and proud Salute to all it's contributors.

Sudhakar Natu

P.S.
माझा you tube channel
moonsun grandson

विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........

moonsun grandson Channel link:

https://www.youtube.com/user/SDNatu

"ह्रदयसंवाद-२६" : "आजचा दिवस माझा !":

 "ह्रदयसंवाद-२६" : "आजचा दिवस माझा !":


# "जेव्हा जेव्हा मला एखादा मूलभूत मूलगामी असा नवविचार माझ्याप्रमाणे इतरांनाही अंतर्मुख करून विचार करून नवी दिशा नवा मार्ग दाखवणारा सुचतो तो क्षण माझ्यासाठी असतो आणि तो दिवस हा माझा असतो.
त्याची ही झलक':

# "यश मिळवून जेवढं कठीण असतं त्यापेक्षा यश पचवणं हे अधिक कठीण असतं याउलट अपयश मिळवणं सोप असतं मात्र पदरी आलेलं अपयश पचवणं कठीण असतं अर्थात यश पथक अपयश पचवणं यापैकी कोणता महाकठीण या प्रश्नाला कदाचित उत्तर नाही."

# "वास्तव":
"पोट संभाळता आलं,
तर अर्धी लढाई जिंकली, अन् मनं संभाळता आली, तर जीवनात सार्थकता आलीच, आली!"

# "जो पर्यंत सर्वच क्षेत्रात, समस्त स्थरांवर विहीत कर्तव्ये आणि त्यासाठीचे प्रत्येकाचे उत्तरदायित्व समाधानकारकरित्या पूर्ण करण्याची ईर्षा निर्माण होत नाही, तोपर्यंत उत्तरोत्तर भवितव्य अंध:कारमय होणार हे निश्चित."

# जो तो म्हणतो,
माझंच खरं,
हा हट्टीपणा, ना करे कुणाचंच भलं, बरं!"
"ह्रदयसंवाद-२६" : "आजचा दिवस माझा !":

# "एक खोटं, दहादा खरं म्हणून ठोकणारेच,
डोळ्यांवर झापड बांधून,
स्वत:चेच ढोल, स्वत:च बडव बडव बडवतात!

# "मनाचे कोडे":
आपले मन खरोखर कुठे असते, कसे असते, दिसते, माहीत नाही. पण मनांत काय असते, ते मात्र फक्त आपल्यालाच उमजत रहाते. X-ray, MRI CT scan वा सोनोग्राफी मुळे आपल्या शरीरात काय काय घडामोडी चालू आहेत ते दिसते, आपल्याला व इतरांनाही.
पण मनांतले असे इतरांना समजू, उमजू देणारे यंत्र निदान आजपर्यंत तरी अस्तित्वात नाही. ही जगातील, सर्वात महान क्रुपाच आहे. असे अद्भुतरम्य यंत्र जेव्हा केव्हा निघेल, तेव्हा काय हलकल्लोळ होईल, त्याची कल्पनाच करवत नाही.

शेवटी मन हे कोडे आहे आणि ते तसेच, कोडेच राहू दे!

# "योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी "संयम" असणे हीच खरी जीवनातील अवघड परीक्षा आहे...!*

# "चंचल लक्ष्मी":
लक्ष्मी चंचल असते, तिची देवाण घेवाण सतत चालू असते. हे चक्र न थांबणारे असते. लक्ष्मी नेहमी स्वकष्टांतून, प्रामाणिक मार्गाने यावी. ग़ैर मार्गाने कष्टांशिवाय आलेली लक्ष्मी कधीही चांगली नाही; अशी लक्ष्मी सुख शांती देत नाही. हाच निसर्ग नियम आहे, जो Newton च्या पहिल्या नियमानुसार आहे.

सध्याची अशांतता, ताणतणाव, हिंसा विध्वंसक वातावरण हा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या मार्गांनी येत असलेल्या लक्ष्मीचा परिणाम आहे. कारण अशा व्यवहारांत एका बाजूला कर्तव्याचा विसर, फ़क्त हाव असते, तर दुसर्या बाजूला अगतिकता असते.

कोण, कसा केव्हां, थांबवणार भ्रष्टाचाराचा हा विदारक भस्मासूर?

# "समीक्षेची समीक्षा":
समीक्षा करताना समीक्षक ते काम केवळ आपल्यापुरते करत नसतो, तर तो प्रेक्षंकांचा दिशादर्शक असतो. सहाजिकच त्याला सर्वसाधारण प्रेक्षकांची आवडनिवड माहीत असणे गरजेचे असते. जो हे नीट जाणून आपले परीक्षण लिहितो, त्याच्यावर सहसा टीका होत नाही. समीक्षक जसा निर्मात्या भाट नसावा, तसाच तो प्रेक्षकांचा शत्रुही नसावा, तर हितचिंतक असावा. प्रेक्षकांची नस ज्यांना जाणता येत नाही, अशांनी परीक्षणे न लिहीणे हेच चांगले!
'What 'classes' like, more often than not, masses reject And vice versa' appears unfortunately to be a reality.
-----------------------------------------------------------------

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
माझा you tube channel
moonsun grandson

विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........

moonsun grandson Channel link:

https://www.youtube.com/user/SDNatu

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

"Random Thoughts-1":

 "Random Thoughts-1":


Lockdwon-an Introspection":
This lock down due to present crisis of pandemic covid-19 has opened up new vistas of very useful and introspective guiding thoughts from various of my old Diaries which I could locate being at home all the time. One day, I just opened the page and saw the note of the year 2007.
it goes thus:

"The outlook towards life in the last few decades is changing and much faster in the last decade from being a noble good human being, the human race is more eager to have a cosy good life and material prosperity. the desire for today is good life, that comes in the form of external gadgets machines and facilities.

The good life concept does doesn't come from within but from outside. Naturally there is no place for Noble thoughts, ethics, values and above all honesty in the shape of things happening around. To become rich at any cost is the sole aim and tool for getting a cosy good life, rampant corruption and crimes, total self-centeredness selfishness have become the core practices..........

The material power doesn't give you true contentment one craves for. The beauty and miracles of nature, listening to Soul searching musical tunes, reading food for thought, helping the needy & making others happy, generating out of box ideas are few of the activities that can make you happy, keeping you to earn self control.

The present rat race for materialism consumerism is sure to take mankind towards total disaster. Earlier human beings realise their fally in the present day outlook towards the way one looks at life, better for all & the sanity prevails all over.

We are once again becoming more concerned for humans finding the zone of self-control, comfort is not easy but is surely needed to be searched for all the time. As life is dynamic, the zone of self-control too, is all the time changing. All one needs to do is to attempt a serious search for the same zone of self control. That is the way, you believe you can be happy and under self control"

In the present curcumstances, less said the better...
--+---------+-------------
# Power Games are deceiving; in that, one takes pride in undermining his competitors thru' his cunning tricks, in the own party or believes to have scored over his partner or opp. Parties, thru' his overconfidence, or oratory skills. But in the bargain, he tends to forget is that, he badly needs to win the condidence and the heart of Aam Aadmi, than be under illusion of his tricks or overconfidence and OS! history has proved this time and again.

# With Liberalisation, Money more Money and Only Money culture has been encamping our lives and in the bargain, unfortunately, the Character is getting lost. If this run for Money goes on, I am afraid, there may not be any difference between the Humans And Animals!

In Today's Kaliyug, Success is judged on 'Money Scale' rather than on 'Means & Methods Scale'; No wonder there is Majority of 'Mediocre Men on 'Moral Scale'.
---------------+------------
# # "4M LD: Different Strokes"

"Creativity, Innovation & Intelligence are the Three Great gifts in Life."

"Hope, Passion & Inspiration are the Three Great Drivers of Life."

"Attitude, Skills
& Knowledge are the Three Great weapons in Life."

"Love, Fragrance & Melody
are
the Three Great Delights in Life."
------------------------

# "Mind's Slavery":

Now a days a many second generation political leaders, without any notable contributions or abilities, are automatically getting undue importance & key positions in their parties. This is just due to their claims for inheritance to the past time leaders.

Any one like this, doesn’t & wouldn’t enjoy such a luxury in the advanced countries like USA/U.K.

The Irony very soon would be that such non leaders are going to sketch our future. God bless & Hell with true competence, long leave the mind’s slavery!

Sudhakar Natu

PS
For you tube channel:

moonsun grandson

 Open the link......
And see interesting videos.....

https://www.youtube.com/user/SDNatu



गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

"नियतीचा संकेत-७": "माहितीचा खजिना":

 "नियतीचा संकेत-७": "माहितीचा खजिना":


माझं काय आहे, मला अधूनमधून नवीन नवीन कल्पना सुचतात, त्या नेहमी सकाळीच चहा पिताना! लाँकडाऊनचा फायदा काय झाला, तर मला माझ्या इतके दिवस अडगळीत पडलेल्या जुन्या डायऱ्या मला पुन्हा वाचायला मिळाल्या. त्यातील व्यवस्थापन शास्त्राच्या आणि इतर काही साहित्यिक नोंदी असलेल्या खास डायरीमधून मला खूप उपयुक्त माहिती आणि विचारांचे भांडार मिळालं आणि गेले काही महिने मी त्यातूनच निवडक असे व्यवस्थापन शास्त्रावर तर ललित लेख लिहू शकलो.

त्या दिवशी, जेव्हा मी सकाळी अशीच एक माझी डायरी मला सापडली, जिला काळी डायरी म्हणतो. कारण तिचे कव्हर काळ्या रंगाच्या पुठ्याचे आहे. कदाचित आपलं भविष्य जसं अज्ञात असत, आपल्याला दिसत नसतं, तसा जणु हा ज्योतिषाच्या डायरीला काळा रंग !

ती तशी खूप खूप जुनी डायरी आहे आणि मी ज्योतिषी झाल्यानंतर जसजसा माझा अभ्यास वाढू लागला, तसतसा मी पत्रिकांचा संग्रह त्या डायरीत न चुकता करु लागलो. प्रत्येक पानावर कॅलेंडरमधली जी तारीख असेल त्या तारखेला ज्यांचा जन्म असेल त्यांची पत्रिका तिथे मी नोंदवत असे. लौकरच जवळजवळ ती संपूर्ण डायरी भरून गेली आणि जागोजागी अनेक पत्रिका लिहीलेल्या मला आता दिसत असत. आज मी पुन्हा ती जवळून बघितली तेव्हा मला लक्षात आलं की मधून मधून मला महत्त्वाच्या अशा नोंदी-जन्मतारखा जन्मवेळा आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या यांची माहिती गोळा करून ती लिहिण्याची सवय होती, त्यामुळे अनेक विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या जन्मासंबंधी जन्म वेळ स्थळ जागा वगैरे बद्दल मला नोंदी आढळल्या.

बहुधा ह्या नोंदी मी खरं म्हणजे त्यांच्या त्यांच्या पत्रिका बनवण्यासाठी अभ्यास म्हणून ठेवल्या असाव्यात. पण कारणपरत्वे इतर अनेक गोष्टीत मी गुंतल्यामुळे मला त्यावरुन पत्रिका काही बनवता आल्या नाहीत. अभ्यास करून सल्ला देऊन, विविध दिवाळी अंकात लेख गेली चाळीस वर्षे लिहून झालेले असताना, आणि वयाची पंचाहत्तरी पार केली असताना, मला काही वाटत नाही की, आता त्यांच्या पत्रिका बनवाव्यात.

त्यामुळे मला कल्पना सुचली की, एका लेखामध्ये जर त्या सर्व विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींच्या जन्मतारखांच्या ह्या नोंदी मांडल्या तर जे अभ्यासक ज्योतिषी त्या वाचतील, आपल्या ब्लॉगवर तसा लेख टाकल्यावर, तर त्यांना त्या त्या व्यक्तींच्या पत्रिका बनवता येऊ शकतील. म्हणून या लेखाचा प्रपंच.

प्रत्यक्ष भेटीतून असेल किंवा नसेल जसजशी अनेक संदर्भात माहीती मिळत गेली, ह्या जन्मतारिखांची त्या नोंदी मी आता पुढे मांडत आहे. त्या अचूक असाव्यात असा माझा समज आहे आणि अभ्यासकांना त्याचा फायदा व्हावा हाच केवळ उद्देश. मात्र चुक भूल द्यावी घ्यावी.

# निवडक प्रथितयश व्यक्तींच्या जन्मतारखा/वेळ
स्थळः

ग दि माडगूळकर ज. 1आँक्टोबर 1919
वेळ रात्री 11 शेटफळे जि. सातारा
मालतीबाई बेडेकर ज 1-10-1905
वेळ पहाटे 3-03 मुंबई
आशा पारेख ज 2-10-1942 वेळ दुपारी 12
मुंबई
लाल बहादूर शास्त्री ज 2/10/1904
वेळ स. 11/12 वाराणसी
राजकुमार ॲक्टर साऊथचा ज 8/9-10-1927
वेळ पहाटे 3/30
रेखा ज 11/10/1958 वेळ स.11/05 चेन्नई
अमिताभ बच्चन 11/1011942 वेळ सायं 4
अलाहाबाद
डॉक्टर विजय भटकर ज 11/10/1946
वेळ रात्री 11/30 अकोला
जयप्रकाश नारायण ज 11/12-10-1902
वेळ रात्री 3 पाटणा
अशोक कुमार ज 13/11/1911 वेळ दु.2/55
भागलपूर
व दा भट ज 16/11/1936 वेळ रात्री 1-30
पनवेल
सुभाष भेंडे ज 14/10/1936 वेळ फोंडा गोवा.
हेमा मालिनी ज 15/16-10-1948
वेळ रात्री 12/30 तिरुपती
श्रीकृष्ण जकातदार ज 17/10/1919
वेळ रात्री 12/45
गोपीनाथ मुंडे ज 18/10/1949 वेळ स 6
सातारा
शम्मी कपूर ज 21/10/1931 वेळ स 6/35
पुणे
डी वाय पाटील 21/22-10-1935
वेळ रात्री 1 कोल्हापूर
राम मराठे 23/10/1924 वेळ रात्री 9/48
पुणे
लक्ष्मीकांत बेर्डे ज 26/10/1954
वेळ सायन 6/15 मुंबई
बा भ बोरकर ज 30/11/1910 वेळ रात्री 12
गोवा
शरद तळवलकर ज 1/11/1918 वेळ रात्री 12
ऐश्वर्या राय ज 1/11/1973 वेळ स 7/20
हैद्राबाद
सोनाली कुलकर्णी ज 3/11/1973
वेळ रात्री 11/27 पुणे
पु ल देशपांडे ज 8/11/1919 वेळ दु 2/30
मुंबई
लालकृष्ण अडवाणी ज 8/11/1927
वेळ स 9-27 हैद्राबाद
माला सिन्हा ज 10-11-1936 वेळ रात्री 5/50
कलकत्ता
रोहिणी भाटे ज 14/11/1924 वेळ पहाटे 3
पाटणा
डॉक्टर श्रीराम लागू ज 16/11/1936
वेळ दु 12/10 सातारा
शिरीष पै ज 15/11/1929 वेळ स 9/15
पुणे
बेबी शकुंतला ज 17/11/1932 वेळ दु 2/30
व्ही. शांताराम ज 18/11/1901 वेळ स 9/30
कोल्हापूर
शिल्पा शिरोडकर ज 2011/1973
वेळ दु 11/16 मुंबई
प्रेमनाथ ज 20/11-11/1926 वेळ पहाटे 3/15
पेशावर.
शांता आपटे ज 25/26-11-1916
वेळ पहाटे 4/15 सोलापूर
यशवंतराव चव्हाण ज 12/03/1913
वेळ सायं 6/30 देवराष्ट्रे जि सातारा
धीरुभाई अंबानी ज 28/12/1932
वेळ स 6/37 चोरवाड
जे आर डी टाटा ज 29/7/1904
वेळ रात्री 12-29 पँरिस

मीनाकुमारी ज 1/8/1932 वेळ दु 11/56
मुंबई
किशोर कुमार ज 4/8/1929 वेळ सायं 4
खांडवा
दिलीप प्रभावळकर ज 4/8/1944
वेळ सायं 4/8/1944 मुंबई
दादा कोंडके ज 8/8/1932 वेळ दु 12 मुंबई
राखी ज 15/8/1943 वेळ रात्री 11/30
कलकत्ता
कीर्ती शिलेदार ज 16/8/1952 स 8/03
पुणे
सचिन पिळगावकर ज 17/8/1957
वेळ स 7/20 मुंबई
विजयालक्ष्मी पंडीत ज 18/8/1900
वेळ स 6/50
राजीव गांधी ज 20/8/1944 वेळ स 9/15
मुंबई
सुधाकरराव नाईक ज 21/8/1934
वेळ रात्री 9/15 पुसद
गंगाधर गाडगीळ ज 25/8/1923 वेळ स 9/55
मुंबई
शिवाजी सावंत ज 30/31-8-1940
वेळ रात्री 12/35

ज्योतिष अभ्यासकांनी ह्या मौलिक माहीतीवरुन जन्मलग्नपत्रिका बनविण्याचा सराव जरूर करावा.
त्यावरून पत्रिकेचे ग्रहयोग, महादशा आदिंवरुन विश्लेषण करून त्या व्यक्तीच्या कर्तृत्व व योगदानाची मीमांसा करावी. हा खास हेतू असा माहितीचा खजिना जिज्ञासू वाचकांपुढे खुला करण्याचा आहे.

माझ्या ह्या अनोख्या प्रयत्नाचे यथोचित स्वागत होईल अशी आशा आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
माझा you tube channel
moonsun grandson
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........

https://www.youtube.com/user/SDNatu

शिवाय....
२०० हून अधिक असेच खुसखुशीत व वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com