"स्वातंत्र्योत्तर प्रगतीचा लेखाजोखा":
माझ्या एका मित्राचे विचार:
"नाण्याची एक बाजू":
"१५ आँगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत राजकीय, आर्थिक आणि लष्करी सामर्थ्यासाठी वेगळ्या स्थानावर होता. पूर्वेकडील बहुतेक देश उदा. जपान, चीन, मलेशिया, सिंगापोर, कोरिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलीपिन्स इत्यादी एकतर त्यामानाने नगण्य होते किंवा महायुद्धात त्यांचे अतौनात नुकसान झाले होते.
भारताच्या पश्चिमेला प्रवासी भटक्या जमातींनी आखाती देश वसविला होता. उत्तरेकडील सोव्हिएत युनियनमध्येही इराण, इराक आणि सीरिया यांना युद्धामध्ये सामना करावा लागला. भारताचे एकमेव दुर्दैव म्हणजे फाळणी आणि परिणामी अनागोंदी. त्याखेरीज सर्व घटक भारताच्या बाजूने होते. मुंबई, कलकत्ता, मद्रास, नवी दिल्ली, उत्कृष्ट प्रशासकीय यंत्रणा, हेवा करणारे सैन्य, विस्तृत रेल्वे व रस्ते पायाभूत सुविधा, सिंचन मालमत्ता, वीज केंद्रे, रस्ते वाहतूक आणि सुशिक्षित उच्चवर्गाचे लोक यासारख्या जागतिक दर्जाची शहरे होती.
आम्ही या सर्व फायद्यांसह काय केले? आता आमच्या शेजार्यांनी केलेल्या आश्चर्यकारक प्रगतीकडे परत पाहताना आपण असे, कसे म्हणू शकतो की आपण यशस्वी झालो? आपल्या राष्ट्राचे भवितव्य बदलणे अजूनही शक्य आहे की आम्ही १३५ कोटी लोकसंख्येसह आपल्या सर्व दुर्बलतेसाठी ब्रिटिशांना जबाबदार धरण्याचा आमचा आवडता उद्योग चालू ठेवतो?"
माझी प्रतिक्रीया:
"नाण्याची दुसरी बाजू":
"स्वातंत्र्यानंतर भारताची प्रगती" ह्या विषयावरील, वरील सुसंगत प्रतिपादन फेसबुकवर वाचले. नाण्याची दुसरी बाजू इथे मांडण्याचा मी प्रयत्न करतो.
स्वातंत्र्य लढ्यात आधी सुधारणा की आधी स्वातंत्र्य, हा सुधारककार आगरकर व लोकमान्य टिळकांमधला वाद प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने आधी सुसंस्कृत माणसं अन् समाज घडवू या आणि नंतर स्वातंत्र्य मिळवू या, असा आग्रह धरणार्या आगरकरांच्या अकाली निधनामुळे म्हणा वा अन्य कारणाने सुधारक पराजित झाले आणि स्वातंत्र्य योग्य तर्हेने स्विकारून ते राबविण्याची क्षमता असणारे नागरिक बनण्या आधी स्वातंत्र्य मिळाले.
यामुळे विहीत कर्तव्यांचे उत्तरदायित्व जबाबदारीने पाळणारे नागरिक नसणार्या आपल्या देशाचे "चालसे कल्चर"मध्ये रुपांतर कधी झाले ते कळलेच नाही. आपली प्रगती त्याच सुमारास स्वतंत्र झालेल्या देशांच्या तुलनेत मागे राहीली हयाचे हे एक महत्वाचे कारण असू शकते.
दुसरे कारण बहुभाषिक, बहुधर्मिय व प्रचंड वैविध्यपूर्ण लोकसंख्या असलेल्या आपली, लोकशाही प्रणाली आणि बहुतांश इतर देशांचा हुकूमशाही सद्रूष कारभार हे होय.
वरील संदेशामुळे, ह्या महत्वाच्या मुद्यावर विचार करायला प्रेरणा मिळाली आणि जे सुचले, ते मांडले.
"मित्राचा ह्याला प्रतिसाद":
"तुझे मत वाचुन बरे वाटले. मी बऱ्याचशा बाबतीत सहमत आहे. मुख्यत्वेकरून आगरकरांच्या मतप्रणालीशी. राष्ट्र चालवण्याची कुवत नसतांना स्वातंत्र्य मिळाले. त्यात लाखों लोकांचें फाळणीमुळे प्राण गेले व करोडो निर्वासित झाले. आपण इंग्रजांना दोष देऊन मोकळे झालो. आपले राज्यकर्ते हात झटकून मोकळे झाले. त्यांनी आपल्या जनतेला संरक्षण देण्याची क्षमता नसतांना आपल्या हट्टासाठी स्वराज्य घेतले व निष्पाप जीवांचा बळी दिला. स्वातंत्र्य मिळाल्यावर सुंदर देशाची दुर्दशा केली. आपल्या बाजूचे देश राखेतून वर आलें. आपण मात्र सगळी शहरं धारावी सारखी करतो आहोत. ३५ कोटीची लोकसंख्या १३५ कोटींवर आणली आहे. ह्याला फक्त लोकशाही राजवट जबाबदार आहे असे वाटत नाही. लोकशाहीचे बेबंदशाहीत केव्हाच रूपांतर झाले आहे."
सारांंश....
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याची वेळ जवळ आली असताना, आपण कुठे होतो, आता कुठे आलो तसेच त्यासाठी आपण काय बरोबर वा चूकीचे केले, खरोखर काय करणे गरजेचे होते आणि प्रगत आघाडीवर येण्यासाठी ह्यापुढे काय काय करायला हवे अन् काय टाळायला हवे ते सारे ऐरणीवर आणून चर्चा व्हायला हवी विचारांचा सांगोपांग उहापोह व्हायला हवा।
---------------------------------------
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा