"ह्रदयसंवाद-संकल्पांवर बोलू काही":
संकल्प केव्हाही करावेत आणि माणसं नेहमी काही ना काही तरी संकल्प करूनच पुढची कृती करत असतात. दररोजचे व्यवहारही त्यामुळेच पुढे पुढे जाऊन रोजचं जीवन घडत असतं. संकल्प करायला दोन मुहूर्त चांगले असतात एक म्हणजे नववर्ष आणि दुसरा म्हणजे वाढदिवस जेव्हा असेल ते त्या वेळेला आपल्याला स्फूर्ती येते आणि आपण संकल्प करत असतो.
त्यातील विशेषतः नववर्षाचे संकल्प केले जातात, पण सहसा ते पाळले जातात असे नाही. जे वर्ष गेले त्यामध्ये आपल्या कमतरतांचा आढावा घेऊन सुधारणा करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे माणूस नेहमी निश्चयाने नववर्षाला संकल्प करतो. मात्र जसजसे वर्ष सरत जाते, तस तसे ते संकल्प विरत, विसरत जातात, दरवर्षीचा हा अनुभव सालोसाल आढळतो परंतु तरीही संकल्प केले जातातच.
या पार्श्वभूमीवर काही प्रातिनिधिक संकल्प असे असू शकतात:
१. प्रामुख्याने प्रत्येकाने तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. त्याकरता सकाळी फिरायला जावे, आंघोळीनंतर वा अगोदर माफक कां होईना, व्यायाम करावा आणि योग्य तो आहार, योग्य वेळी घेणे आणि भरपूर पाणी रोज पीणे. त्याचप्रमाणे झोप देखील पुरेशी घेणे.
२. सगळ्या गोष्टी वेळच्यावेळी कराव्यात. त्याकरता आवराआवर नियमित करावी, पसारा करू नये, व्यवस्थितपणा हवा. "तहान लागली की विहीर खोदायची" हा प्रकार थांबूवून, कोणतीही गोष्ट जिथल्या तिथे, जेव्हाचे तेव्हा आणि ज्याचे त्याला" हा सोपा मंत्र अंगीकारावा.
३. जवळची नाती बिघडू शकतील असे वागणे टाळावे. त्याकरता काही कृती करण्यापूर्वी किंवा काही बोलण्यापूर्वी, कुणाशी काय, कशाकरता बोलतो आणि त्यांचे काय परिणाम होतील याची जाणीव ठेवूनच कृती करावी अथवा बोलावे. नाती सुधारता आली, तर ती सुधारावी.
४ दिवसातून एकदा स्वतः अंतर्मुख होऊन, विचार करणे, ते तपासणे आणि प्रसंगी ते लिहिण्याची संवय लावून घेणे, ही आपल्या प्रत्येकाच्या जवळची सर्जनशीलतेची, आनंद देणारी कृती असते. त्यामुळे मनातील नवनवीन कल्पना तर्कशास्त्राच्या आधारे तावून-सुलाखून पाहण्याची सवय आपल्यात अंगीकारा. केवळ वाहवा मिळवण्यासाठी नव्हे, तर आपल्यासाठी हा एक विरंगुळा आहे, असे समजून नियमित काही ना काही लिहित जावे.
५. समस्या या जीवनात अधून मधून प्रत्येकाच्याच आयुष्यात येत राहतात. त्या समस्यांचे वेळच्यावेळी जर काही कृती करून निराकरण केले नाही, तर चिंतेत रूपांतर होते. चिंता ही स्वयंभू अग्नी सारखी असते, ती जितकी जास्त करावी, तितकी वाढत जाऊन, त्या काळजीच्या काजळीत, आपण एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात अडकावे, तसे गुरफटत जातो. त्या चिंतेच्या फेऱ्यातून बाहेर न पडता आल्यामुळे, आपण शक्यतोवर समस्ये पासून दूर दूर पळतो आणि तितकी ती समस्या अधिक तीव्र होते.
त्याचा परिणाम चिंतेची आग भडकण्यात होऊ लागतो. काय करावे, कशी सुटका करावी, काहीच उपाय न मिळाल्याने, आपण हतबल निराश आणि उदास होतो. अशा वेळी खरे शहाणपण समस्येचे चिंतेत रूपांतर होण्याआधीच, आपण त्या समस्येकडे तिच्या संभाव्य परिणामांकडे, अधिक समंजस डोळसपणे पहावे. तसेच गरजेचे असते, त्या परिणामांना तोंड देण्याची आपण तयारी ठेवणे. समस्येच्या कारणांचा विचार करून, समस्येची उकल काय आहे आपण ती सुलभतेने कशी सोडवू याचा विचार करावा. हे उपाय प्रत्यक्षात आणण्याचा स्वतः प्रयत्न करावा, त्यातूनही जमले नाही तर दुसऱ्या कुणाची मदत घेता येईल कां, याचा शोध घ्यावा. त्या माणसाकडून त्या समस्येवरील उपाय प्रत्यक्षात आणावे. एवढे होईपर्यंत शांत अलिप्त राहावे. पुष्कळशा समस्या अशा रीतीने सुटतात किंवा सुटू शकतात.
६ सरते शेवटी....
असे वाटले तर........
चालावे असे वाटले तर-सन्मार्गाने चाला,
धरावे असे वाटले तर-चांगली संगत धरा,
पळावे असे वाटले तर- दूर्जनांपासून दूर पळा,
सोडावे असे वाटले तर-वाईट संगत सोडा,
सोडावे असे वाटले तर-दुर्व्यसन सोडा,
टाळावे असे वाटले तर-आळस टाळा,
गिळावे असे वाटले तर-राग गीळा,
द्यावे असे वाटले तर-प्रेम द्या,
घ्यावे असे वाटले तर-सद्गुण घ्या,
रहावे असे वाटले तर-समाधानाने रहा,
गावे असे वाटले तर-थोरांचे गुणगान गा !
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....
खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......
ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......
आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....
धन्यवाद
सुधाकर नातू
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....
खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......
ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......
आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा