रविवार, १३ जून, २०२१

"कालाय तस्मै नमः २!":

 "कालाय तस्मै नमः २!":

खुप वर्षांपूर्वी, "नाट्यदर्पण" तर्फे श्री सुधीर दामले हे "कल्पना एक आविष्कार अनेक" अशी संकल्पना, एकांकिका स्पर्धांसाठी राबवत असतं. फुलाची जी अवस्था कळी पासून होते, तसाच हा प्रकार. ह्या एकांकिका स्पर्धांमधून अनेक नवोदितांना प्रोत्साहन मिळून, त्यामुळेच अनेक दिग्गज कलाकार पुढे आले.

आज ही अशी आठवण व्हायला, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझे वडील एका समस्यापूर्ती या अभिनव काव्यस्पर्धेमध्ये भाग घ्यायचे. मला वाटतं 'संजय' नावाचं गावकरी ग्रुप तर्फे प्रसिद्ध केलं जाणार एक मासिक होतं. त्यामध्ये कवितांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित कवी पुढे आणले जावेत, यासाठी एखादी छोटीशी समस्या अर्थात एका ओळीची कल्पना दिली जात असे आणि त्यावरून वाचकांमधील कवींनी आपल्या कविता पाठवायच्या, असा तो स्पर्धेचा प्रकार होता. त्यामधून ज्या निवडक कविता चांगल्या वाटायच्या, त्या अंकामध्ये प्रसिद्ध व्हायच्या आणि कवींना अंक विनामूल्य भेट म्हणून दिला जायचा. तर सर्वोत्तम अशा तीन कवितांना मला वाटतं, एक रुपयापासून पाच रुपये असे बक्षीस व अंक घरपोच भेट म्हणून पाठवला जायचा.

त्या स्पर्धेमध्ये माझे वडील-बापू नेहमी न चुकता भाग घ्यायचे. बऱ्याच वेळेला त्यांच्या कविता प्रसिद्ध व्हायच्या, अंक यायचा तर कधी कधी चांगली उत्तम कविता म्हणून प्रसिद्ध होऊन बक्षिसाची रक्कमही मनीऑर्डरने अंकासोबत यायची. त्या वेळेला आमच्या घरामध्ये अक्षरशः आनंदोत्सव व्हायचा. छोट्या-छोट्या अशा गोष्टींमधून आनंद उपभोगायची त्यावेळच्या माणसांची प्रवृत्ती होती. याच स्पर्धेमुळे त्यामध्ये भाग घेणाऱ्या एका बडोद्याच्या कवीची देखील माझ्या वडिलांची पत्रमैत्री झाली आणि ती उत्तरोत्तर चांगली वाढतही गेली. माझी आठवण जर बरोबर असेल तर, ते गृहस्थ एकदा आमच्या घरीदेखील मुंबईस येऊन गेल्याचे आठवते. त्या दोघांमधील शुद्ध मैत्री खरोखर "समान शीलेषु व्यसनेषु सख्यम !" या म्हणीला अगदी ओतप्रोत सिद्ध करणारी, अशी होती. खरंच ते दिवसच वेगळे होते.

नवीन नवीन अशा गोष्टीत भाग घेऊन त्यामधून काही ना काहीतरी आनंद मिळवायची, जी काही व्रुत्ती होती ती खरंच आगळीवेगळीच. आज सारी सुखं सभोवताली असताना, माणूस आनंदी आहे कां? हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याला कारण म्हणजे वाढती उपभोगवृत्ती आणि थोडक्यात समाधान न मानणे, तसेच आहे ती परिस्थिती स्वीकारून पुढे जाणे ही मनोवृत्ती आता या मार्केटींग युगात नष्ट झाली आहे. शिवाय मैत्रीच म्हणाल तर, शक्यतोवर व्यावहारिक दृष्टीने "मला काय त्यातून फायदा?" या प्रश्नाच्या उत्तरानंतरच मैत्री किंवा तो जनसंपर्क वाढविला जातो आणि तोही तेवढ्यापुरताच असतो असतो. दृढ शुद्ध व निरपेक्ष मैत्री ही आता दुर्मिळ होत चालली आहे. आपल्या हाती म्हणायचं एवढंच की,

"कालाय तस्मै नमः"! दुसरं काय?

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
हे असेच अंतर्मुख करणारे.......
लेख वाचण्यासाठी.... 
ही लिंक संग्रही ठेवा.....शेअरही करा........

https://moonsungrandson.blogspot.com





शनिवार, १२ जून, २०२१

"कालाय तस्मै नमः!": 

 "कालाय तस्मै नमः!": 

 सध्याच्या "कोरोना" महामारीच्या काळात, आपण जनसंपर्क टाळत तर आलो आहोतच, शिवाय नातेवाईकांकडे सगेसोयरे ह्यांच्याकडे जाणं देखील दुरापास्त झालं आहे. माणूस माणसाला पारखा झाला आहे, अर्थात यासाठी आरोग्य राखणं हे महत्वाचं कारण आहे, यात वाद नाही. परंतु त्यामुळे एकमेकांमधला जिव्हाळा, ममता दूर होत चालली आहे, सहसा कोणी कोणाकडे भेटायला सुध्दा जात नाही, तिथे राहायला जाणे तर दूरच राहिले, असं सर्व साधारण वातावरण आहे. अशा वेळेला अचानक आज मला माझ्या लहानपणची आठवण झाली. कां कुणास ठाऊक, म्हातारपणीच माणसाला लहानपणच्या आठवणी स्वच्छ आठवतात, मात्र काल काय टीव्हीवर बघितलं ते हे सांगणं कितीवेळा कठीण जातं. तर त्या वेळेला मी माझ्या मुंबईतल्या वेगवेगळ्या नातेवाईकांकडे शनीवार वा रविवारी सुट्टीच्या वेळेला अधून मधून रहायला जात असे. बारा-तेरा वर्षाचा असेन मी तेव्हा. तर आठवणारी गोष्ट अशी की, गिरगावातल्या एका चाळीत माझ्या वडिलांचे धाकटे मामा राहत असत. त्यांच्याकडे बसने गेलो आणि दोन दिवस राहिलो. तिथली ती आठवण माझ्या मनात कोरली आहे. ह्या मामांचे नुकतेच लग्न झाले होते. त्यावेळेला मामाने मला संध्याकाळी ट्रेन ने चर्नीरोड ते चर्चगेट असे नेले , तेव्हा गाड्यांना आजच्या सारखी गर्दी नसे. नंतर तिकडे मरीन ड्राईव्हवर मी त्यांच्याबरोबर फिरलो, समोर अथांग समुद्र व पाण्यात डुबकी घेणारे सूर्यबिंब. चमचमीत भेळ मामांनी मला खाऊ घातली आणि परत आम्ही त्यांच्या घरी आलो. दुसर्या दिवशी मला बाजूलाच असलेल्या सेंट्रल टॉकीजमध्ये "यूकी वारी सू" हा चित्रपट मामांनी दाखवला. खूप खूप मज्जाच मज्जा झाली माझी ! आता मला ही आठवण, खरंच अत्यंत ह्रद्य व जिव्हाळ्याची वाटते. त्या वेळेला माणसं कशी एकमेकांना धरुन होती, लहान थोरांचे, पै पाहुण्यांचे मनापासून जमेल तसे आदरातिथ्य ती करत असत. खरंच मामा-मामीने माझे जे काही स्वागत व आतिथ्य केले तसे आता दुर्मिळ झाले आहे. स्वतःच्या मुलांकडे जायचं असलं तरी कदाचित आता आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायला लागते, असे जिकीरीचे दिवस आहेत. करणार काय?: "कालाय तस्मै नमः" दुसरे काय !

धन्यवाद                                                                  सुधाकर नातू

ता.क.

माझी ही शहात्तराव्या वयात बहरत असलेली गद्धे पंचविशी !":
"माझा सोशल मिडीयावरील 'संसार'! ":

1. माझा ब्लॉग:
एकसे बढकर एक अडीचशेहून अधिक वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........
ही लिंक उघडा....

https://moonsungrandson.blogspot.com

लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....

2. I have you tube channel:

moonsun grandson

With over 75 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. Open this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

सोमवार, ७ जून, २०२१

"मुकेपणाचे बोल-१ !": "तुमचे आरोग्य, तुमच्याच हातात":

 "मुकेपणाचे बोल-१ !": "तुमचे आरोग्य, तुमच्याच हातात":


जेव्हा आपण एकटेच असतो आणि आपल्याच चिंतनात, मननात मग्न असतो, त्या वेळेला आपल्याला नवीन नवीन कल्पना सुचू शकतात आणि त्या कल्पनांचा पाठपुरावा जर केला तर आपल्याला उत्साही राहायला मदत होते, असा निदान माझा तरी अनुभव आहे. मलाही कधी मधी अशाच नवनवीन कल्पना सुचतात आणि त्या मी वेगवेगळ्या मार्गाने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत असतो.

आज चिंतन करत असताना मला लक्षात आले की, आपण आरोग्यासंबंधी काहीतरी विचार करावा आणि तेव्हां जे विचार सुचले, ते पुढे मांडत आहे. जसे जमेल तेव्हा, अशा प्रकारचा विचार मांडणारा उपक्रम करावा, ही कल्पनाही आज मनात आली आहे. आपणच आपल्याशी संवाद साधत असल्यामुळे, या संकल्पनेला मी "मुकेपणाचे बोल" असे समर्पक नाव देत आहे. त्या प्रमाणे आजचा हा एक मूलभूत विचार- "तुमचे आरोग्य तुमच्या हातात" असा आहे.

"कोरोना"च्या महामारीचा एक फायदा असा झाला की, प्रत्येकाला आपले आरोग्य सांभाळायची बुद्धी व प्रेरणा प्राधान्याने निर्माण झाली. आपले आरोग्य आपल्याच हातात आहे, हे जेव्हा लक्षात येते तेव्हा माणूस त्या दृष्टीने आपले आरोग्य निकोप, निरोगी कसे राहील यासाठी जे जे प्रयत्न आहेत ते ते करू लागतो. ज्या वेळेला आपण जे जे करत आहोत त्यातून आपल्या आरोग्याची सक्षमता आपण वाढवत आहोत, असा आत्मविश्वास जेव्हा त्या माणसाला निर्माण होईल त्या वेळेला आपोआपच त्याचे आरोग्य सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही. हा मोठा धडा या महामारीने आपणा सर्वांना दिलेला आहे.

आहार-विहार योग्य तऱ्हेने योग्य वेळी नियमीतपणे करणे जसे महत्त्वाचे, त्याचप्रमाणे आपले आचार आणि विचार, उच्चार विवेकाने केले तर मानसिक स्वास्थ्य देखील योग्य त्या पद्धतीने आपण नियंत्रणात ठेवू शकतो. असं कुठेतरी वाचलं की "प्रतिकारशक्ती अर्थातच रोगप्रतिकारशक्ती ही मुख्यतः तुमच्या मनस्वास्थ व समाधान यावर पुष्कळ अवलंबून असते." योग्य तो समतोल आहार, त्याच प्रमाणे आवश्यक असे व्यायाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक स्वास्थ्य समाधान राखलं तर आपोआपच तुमची योग्य दराने ईम्युनिटी वाढत राहील आणि तुम्ही निरामय निरोगी आनंदी जीवन जगू शकाल.

आज हा जो विचार माझ्या मनात आला, तो इथे मांडला. शेवटी आपला "हात जगन्नाथ" किंवा "तुमचे आरोग्य तुमच्याच हातात" हाच मंत्र आपण नेहमी पाळायला हवा.

सुधाकर नातू

ता.क. १
जे जे चांगले सुचते ते ते इतरांप्रती पोहोचवावे या केवळ निरपेक्ष हेतूने मी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे. तुम्हाला अशा तर्‍हेचे संदेश मिळावेत अशी जर इच्छा असेल, तर प्रतिसादात होकार जरूर कळवावा, ही विनंती.

ता.क. २
माझी ही शहात्तराव्या वयात बहरत असलेली गद्धे पंचविशी !":
"माझा सोशल मिडीयावरील 'संसार'! ":

1. माझा ब्लॉग:
एकसे बढकर एक अडीचशेहून अधिक वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........
ही लिंक उघडा....

https://moonsungrandson.blogspot.com

लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....

2. I have you tube channel:

moonsun grandson

With over 75 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. Open this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........
👍👍👍

शनिवार, ५ जून, २०२१

"संध्याछाया भिवविती ह्रदया !":

 "संध्याछाया भिवविती ह्रदया !":

व्रुद्धापकाळ हा अत्यंत कसोटीचा काळ असू शकतो. फारच थोड्यांना निरामय आरोग्य व आर्थिक स्वास्थ्य लाभते. संभाव्य कितीतरी प्रकारच्या अनिष्ठ अवस्थांतून जीवनाची ही संध्याकाळ अनेक अभाग्यांना काढावी लागते.

निसर्गचक्र म्हणा अथवा इतर काही म्हणा, वा प्रारब्ध, या साऱ्यावाचून कोणाचीही सुटका नाही. त्या संभाव्य दुर्दैवी अवस्था पहा:

हृदयरोग, कॅन्सर, स्मृतीभ्रंश, अल्झायमर, पार्किन्सन्स अतीतीव्र सांधे वा गुडघेदुखी, कोणत्याही कारणाने घरात खिळळून टाकणारे अपंगत्व व आपले व्यवहार आपल्यालाच न करता येण्याजोगे आजारपण, अंधत्व अथवा ऐकू न येणे वाचा जाणे, कुष्ठरोग, अंगभर पांढरे डाग व रूप विद्रूप होणे, तीव्र अशा प्रकारचा दमा, क्षय व इतर असाध्य रोग.....

या न संपणार्‍या यादीत कुटुंबामध्ये आपल्या माणसांनी पूर्ण दुर्लक्ष करून, एखाद्याला वृद्धावस्थेत वास्तव्य करावे लागणे आणि तीव्र आर्थिक ओढाताण अशा गोष्टीही सहन करायची वेळ काही अभागी माणसांवर येते, हे विसरून चालणार नाही.

सारांश वृद्धावस्था ही एक अपरिहार्य व सहन करायलाच लागावी अशी ही कसोटी आहे. जीवनाची ही अपरिहार्यता, आपण जेव्हा उमेदीत जगत असतो, तेव्हा विचारात घेतच नाही आणि मनाला येईल तसे आत्मकेंद्री सुखाच्या मृगजळामागे वेड्यासारखे धावून, आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत, प्रकृतीचा कणाकणाने नाश करत राहतो.

वृद्धावस्थेतील वरील सारखी दयनीय स्थिती प्रत्यक्षात आल्यावरच हे असे मागे वळून पहाण्याचे शहाणपण सुचते, हे पण दुर्दैवच. मात्र आपण हे विसरतो की, आपल्या स्वतःच्या जीवनशैलीतील चुकांचाच हा परिपाक असतो. ही जाणीव तरुणपणीच व्हायला हवी आणि भावी आयुष्यात येऊ शकणारी त्या अनिष्टतेची संभाव्यता, ह्याकडे डोळसपणे पाहून आपली जीवनशैली वेळीच तरुणपणीच नियंत्रणात ठेवावी, याकरता हे सुचलेले विचार.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
हे आणि असेच.....
अनेक विचारप्रवर्तक, अर्थगर्भ लेख....
लेख वाचण्यासाठी......
माझ्या ब्लॉगची ही लिंक संग्रही ठेवा....

https://moonsungrandson.blogspot.com

लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....

"हवी श्रीमंती जाणीवांची !";


"हवी श्रीमंती जाणीवांची !";

नुकतच "धूळपाटी" हे प्राध्यापिका, कवयित्री आणि लेखिका श्रीमती शांता शेळके यांचं पुस्तक वाचलं. रूढ अर्थाचे ते आत्मचरित्र नाही असे त्यांनी प्रस्तावनेतच सांगितले आहे. त्यातील बऱ्याचशा गोष्टी बालपणापासून त्यांच्या वैयक्तिक जीवनातील जडणघडणीच्या आणि एकंदर सामाजिक कौटुंबिक वातावरणाची शब्दचित्रे आहेत. मूलतः शब्द आणि शब्दांवरचं प्रेम या त्यांच्या मुलभूत आवडीमुळे लेखिका म्हणून त्यांची वाटचाल उलगडणार्या, साहित्यविषयक विचारमंथनाचा उहापोह त्यांनी ह्या पुस्तकात केलेला आहे. सहाजिकच एक हौशी लेखक म्हणून मला ते पुस्तक प्रत्ययकारी वाटले आणि त्यातील काही नोंदी तर मला जपून ठेवाव्यात अशाच वाटल्या. माझ्यासारख्या शब्दाचे शिल्पकार असलेल्या लेखकांना मार्गदर्शक आणि योग्य ती दिशा दाखवणारे असेच ते मूलभूत विचार आहेत. त्याची ही छोटीशी मी घेतलेली दखल:

"शब्दांचे शिल्पकार":
"लेखक जे लिहितो, ते चार लोकांसमोर आल्याखेरीज, त्यांनी ते पाहिल्या वाचल्या खेरीज त्याच्या निर्मितीच्या आनंदाला परिपूर्णता येत नाही. तो केवळ अहंकार नसतो, ती नुसती प्रसिद्धीची हावही नसते. ते त्याहून अधिक काहीतरी असते, असे मला वाटते. लेखन प्रसिद्ध झाल्यानंतर लिहिणाऱ्याला एक प्रकारचे आश्वासन मिळत असावे, एक सुरक्षिततेची भावना त्याच्या ठायी निर्माण होत असावी आणि मामुली लेखकाची गोष्ट सोडा, पण फार मोठ्या यशस्वी लेखकालादेखील या आश्वासनांची, या सुरक्षिततेच्या भावनेची, आतून निकडीची गरज भासत असावी."

"रेषेचे लाघव":
रेषेच्या सुरेल लडिवाळ वळणांना विविध असे आकार देत, चित्रकार आपल्या मनातील प्रतिमा कागदावर उमटवत, सर्जनशीलतेचा आविष्कार चित्रकलेतून निर्माण करत असतात. त्यांच्या रेषा वेगवेगळ्या भावना व्यक्त तर करतातच, कधी कधी उग्र, क्रूर पीडलेल्या दुःखाने पिळवटलेल्या असहाय्य आक्रंदन करणाऱ्या, तर कधी जाणीवेच्या पलीकडे नेऊन जाणार्‍या अशा असतात, तर कधी कधी आनंदाचा समाधानाच्या एका नव्या क्षितिजाकडे घेऊन जाणाऱ्याही त्या रेषा असतात. निसर्ग चित्रांतून तर हुबेहूब निसर्गाची पुनर्निर्मिती आपल्या रेषांच्या लाघवातून चित्रकार, रसिकांपर्यंत आणत असतो. खरोखर रेषांचे लाघव हे मनाला भिडणारे असे असते आणि म्हणूनच चित्रकला ही मूर्तीमंत अद्भुत अशी प्रतिभासंपन्न कला आहे यात वाद नाही."

"लेखकही एक चित्रकारच !"
ह्या पुस्तकाच्या वाचनांतून मला उत्साह तर वाटलाच, परंतु नव्याने साहित्य निर्मीतीकडे पहाण्याची प्रेरणा मिळाली. वाटून गेले, माणसाला वाणीसारखी अनमोल शक्ती मिळाल्यामुळे, या माध्यमातून त्याने शब्द आणि त्यांचे अर्थ निर्माण केले. शब्द निर्माण करताना त्यामागे मनातील स्पदनांची, विचारांची एकरुपतेची भावभावना जोडली. बहुदा साहित्य अशाच रितीने निर्माण होत असते. लेखक हा नेहमी विचार करत असतो, कल्पना करत असतो आणि त्या कल्पना, विचार शब्दांमधून व्यक्त करत असतो. अर्थातच चित्रकार जर रेषांची वळणे वळणे घेऊन, आपली कला समृद्ध अशा स्वरुपात सादर करतो, तर लेखकही नेहमी शब्दांशी खेळ करून शब्दांची जादू वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यातून मांडत असतो.

चित्रकाराचे जसे साधन रेषा, तसंच लेखकासाठी साधन शब्द, शब्द आणि शब्दच. लेखक आणि चित्रकार दोघेही प्रतिभासंपन्न असेच कलाकार. लेखनाची ज्याला आवड लागली, तो नेहमीच एखादा गायक जसा आपल्या शिकलेल्या विविध अशा सूर, तालांचा सातत्याने रियाझ करतो, त्याच प्रमाणे लेखकही नेहमी नवनवीन अशा अनुभवांचे, व्यक्तींचे, प्रसंगांचे त्याचप्रमाणे विचारांचे व कल्पनाविलासांचे अनेक विविध रंग तुमच्यासमोर उधळत असतो. त्यामागे त्याची वाचनाची तपश्चर्या, जीवनाकडे बघण्याचा डोळसपणा, वेगवेगळे अनुभव घेण्याची निरीक्षणशक्ती अशा कितीतरी गोष्टी असतात. तेव्हाच तो लेखक आपल्याला समर्थपणे त्याला काय वाटते ते चपखलपणेव्यक्त करू शकतो.

"हवी श्रीमंती जाणीवांची!";
अंतर्मुख होऊन मी विचार करू लागलो की,
माणसांची श्रीमंती, पैसाअडका जमीनजुमला व इतर साधनं सम्रुद्धी ह्यावर सर्वसाधारणपणे मोजली जाते, समजली जाते. पण खरं म्हणजे तोच माणूस खरा श्रीमंत, ज्याच्या जाणिवांचा भवताल अतिविशाल असतो. अशा माणसाला जाणिवा अर्थात विविध प्रकारचे अनुभव, माहिती आणि ज्ञान अवगत असतात, तर असा जो माणूस बहुश्रुत, विचारी तोच खरा श्रीमंत, असं मानायला हवं, असं मला वाटतं.

कारण माणूस माणूस म्हणून इतर सजीवां पेक्षा वेगळेपण जर काही माणसात असेल, तर ते म्हणजे सभोवतालच्या एकंदर परिस्थितीचे आकलन जाणिवांचा रूपात होते, ते करून घेण्याची त्याची अमोघ शक्ती हेच. प्रत्येकाची ती कुवत वेगवेगळी असते. ती विविध प्रकारची माहिती घेऊन, वाचन करून, प्रवास करून, अनुभव घेऊन वाढत जात असते. मात्र तशी ती सातत्याने वाढायला हवी, ही ईर्षा इच्छा मात्र माणसाजवळ हवी.

सारांश मला तरी असं वाटतं की, कायम माणसाने नवनवीन शिकत जावे. माहिती गोळा करत राहावे, विविधांगी अनुभव, सुख भोगत वा दुःख पचवत जावं आणि आपल्या जाणिवांचे क्षेत्र अधिकाधिक विस्तीर्ण करत जावे हेच. नाही तरी कोणीतरी म्हटलंय की, ज्ञान हे महासागरासारखं आहे आणि आपल्याला जे काही माहिती असतं ते म्हणजे एक जलबिंदू पण नाही. म्हणून आता एकांतात घरात बसलेले असताना, आपण हेच केलं पाहिजे की, आपलं एकंदर ज्ञान, माहिती, वाचन वेगवेगळ्या प्रकारे वाढवून अंतर्मुख होत, स्वतः कडे व आपल्या भवतालाकडे, भावविश्वाकडे नव्याने बघत, आपली जाणीवांची अधिकाधिक श्रीमंत केली पाहिजे. "कोरोना" संकटकाळातील ही एक हवीहवीशी वाटणारी तपस्या आत्मसात करत जावे.

धन्यवाद
सुधाकर नातू.

ता.क.
हे आणि असेच.....
अनेक विचारप्रवर्तक, अर्थगर्भ लेख....
लेख वाचण्यासाठी......
माझ्या ब्लॉगची ही लिंक संग्रही ठेवा....

https://moonsungrandson.blogspot.com

लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....

शुक्रवार, ४ जून, २०२१

"विचारांचे अम्रुतमंथन":

 "विचारांचे अम्रुतमंथन":


/// "गोत्र आणि स्री पुरुष समानता !":
गोत्र म्हणजे काय या विषयावर एक चांगली ऑडिओ क्लिप मी ऐकली. माणसाच्या मुलाचा मुलगा त्यापासून त्याच्या वंशाची सुरूवात, अशा संकल्पनेवर गोत्र बांधलेले असते. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपासून म्हणजेच महत्त्वाच्या आठ ऋषींपासून मानववंश पुढे पुढे कसे जात राहिले, यासंबंधीची माहिती गोत्र या विषयावर तेथे दिली होती.

त्या वेळेला हे लक्षात आले की गोत्राचा उल्लेख फक्त पुरुषाच्या बाबतीत कायम विविध वेळी म्हणजे विवाह समारंभ, मुंज, विविध प्रकारच्या पूजा अशा वेळी केला जातो. फक्त मातुल घराण्याच्या गोत्राचा उल्लेख केवळ कन्यादानाच्या वेळेलाच केला जातो. हे असं कां? स्त्री ही खरं म्हटलं तर पुरुषापेक्षा मानववंश पुढे जावा म्हणून झटणारी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असते, किंबहुना कांकणभर जास्तच योगदान तिचे यामध्ये असते. पुरुषाचे योगदान केवळ बीजारोपण करण्यापुरतेच असते आणि नंतर ती पुढची सारी उस्तवार करण्याची जबाबदारी स्त्रीवर नैसर्गिकरित्या येते, हे सर्वांना ठाऊक आहे. नऊ महिने प्रसववेदना सहन करून अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून वापस येऊन बाळ अंत पण अशा तऱ्हेने नवनिर्मिती बाळ निर्माण होत असते. शिवाय त्यानंतर चे संगोपन देखील स्त्रीच करत असते.

ह्याशिवाय संसाराचा गाडा कायम आयुष्यभर शक्यतो घरातील सगळी कामे स्त्रियाच करत असतात. हे असं पूर्वापार चालू असून सुद्धा आजतागायत स्त्रीच्या बाजूचा विचार केला नाही. मातुल घराण्यातल्या गोत्राचा उल्लेख नंतर कधीच कां येत नाही, हे प्रश्न माझ्या मनात ही ऑडिओ क्लिप ऐकल्यावर निर्माण झाले. स्त्री पुरुष समानता यावर कितीही कंठशोष केला, तरी खरोखर पुरुषप्रधान अशा या व्यवस्थेमध्ये स्त्रीला जे दुय्यम स्थान दिले आहे, ते पूर्णतः अनैसर्गिक आणा अयोग्य असे आहे. सहाजिकच यापुढे तरी स्त्रीला योग्य ते स्थान कसे देता येईल, कौटुंबिक व्यवस्थेमध्ये दोन्ही बाजूच्या गोत्रांचा विचार करून सांगड कशी घालता येईल, याचा विचार व्हावा. त्याप्रमाणे मार्ग शोधला जावा असंच मला यानिमित्ताने वाटलं.
जे वाटलं ते इथे मांडलं !

/// "उमलते बोल":
"उमलते बोल":
# ऐहिक संपत्तीपेक्षा उत्तम शरीरसंपदा
लाखमोलाची.
# निर्व्यसनीपणा हा मनोनिग्रहचा दर्शक असतो. # सत्संगतीमुळे आपणही चांगल्या विचारांच्या वातावरणात राहतो.
# उत्साह व आनंद म्हणजे जीवनातले खरे मित्र. # परिस्थिती व वेळ पाहून वागणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.
# बदलत्या परिस्थितीचा स्वीकार करून त्यानुरूप आपण बदलावे.
# स्वतःच्या मर्यादा ओळखण्याची हुशारी हवी.
# प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती त्याच वेळी
करावी.

/// 👍👍👍
"नवनिर्मितीची किमया":
परफॉर्मिंग आर्ट अर्थात नवनिर्मितीचा आविष्कार हा नृत्य नाट्य चित्रपट वा चित्र, संगीत लेखन कुठल्याही स्वरूपात असो, ते व्यक्त करणारा, एक अभिजात प्रतिभावंत असतो आणि त्याला ती निर्मिती करताना विलक्षण आनंद होत असतो. परंतु ती नवनिर्मिती जेव्हा इतरांपर्यंत पोहोचवली जाते, आणि रसिकांची त्याला दाद मिळते, तेव्हाच त्या निर्मितीची एकंदर पूर्तता, सार्थकता होत असते.........

/// "सोशल मिडियावरील संदेश":
माझ्यापुरते बोलायचे झाले तर, मी voice to text app वापरून माझे लेखन करतो. नंतर व्यावहारिक सुलभता म्हणून आपण contents द्वारे substance देत आहोत, ह्याला प्राधान्य असणे गरजेचे ह्या द्रुष्टीने त्याचा फक्त आढावा घेतो, भाषेची शुद्धता वा व्याकरण हे मुद्दे गौण आहेत असे मानून त्याकडे दुर्लक्ष करतो. सहाजिकच माझ्या भाषेत शुद्धलेखन विषयक चुका असू शकतात आणि त्यांवरील प्रतिसादापेक्षा, माझ्या संदेशातील substance संबंधीत दाद अथवा फिर्याद मी अपेक्षितो.
👌👌
आता सोशल मिडियावरील पुढे ढकललेला एक उपयुक्त संदेश:

/// 👍👍 "सन फ्लॉवर थिअरी" :
जसा जसा सूर्य पुढे पुढे सरकतो तसे हे सूर्य फुलं आपले तोंड त्या दिशेला करीत असतात. म्हणजेच सुर्य प्रकाश समोरून ग्रहण करीत असतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण याबाबतीतील एक रहस्य कदाचित आपणास माहिती नसावे. ढगाळ आणि पावसाळी वातावरणात जेव्हा सूर्य संपूर्ण झाकला जातो त्यावेळी काय घडते? तुम्हाला वाटेल की ती फुलं मिटत असतील किंवा जमिनीकडे तोंड करीत असतील, नाही कां?
नाही.
तर काय घडते त्यावेळी?
ही फुले खाली किंवा वरती नाही वळत तर ती वळतात समोरासमोर! एकमेकांना आपली साठवलेली ऊर्जा देण्यासाठी, इतरांनाही जगविण्यासाठी !! निसर्गाचं परिपूर्ण तेच वरदान खरंच आश्चर्यकारक आहे!! माणसाने ही निसर्गाची प्रतिक्रिया आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे. समाजात अनेक लोक काळजीने, चिंतेने, परिस्थितीने ग्रासलेले असतात. तेव्हा ही सूर्यफूल थिअरी उपयोगात आणली पाहिजे. जसे एकमेकांना मदत करणे आणि ऊर्जा प्रदान करणे, मनोबल वाढविणे ! तर सर्वांना सदिच्छा देऊ या की आपणही सूर्य फुलासारखे वागूया, संकटाच्या, निराशेच्या ढगाळ वातावरणात एकमेकांना साथ देऊ या, आपल्या चांगुलपणाची साक्ष देऊ या !!

/// "परिक्षा व प्रतिक्षा !":

"परीक्षे"चा खराखुरा निकाल वेगळा,
आणि अंदाज वेगळा!

"निकाल" अजून लागलेला नाही,
म्हणून कुणी अर्ध्या हळकुंडाने पिवळे
जसे होऊ नये,

तसेच निराश होऊन देखील कुणी
पाणी पाणी करू नये!

घोडामैदान जवळच आहे.
वाट बघायची.
शेवटी,
कुणाची तरी वाट लागायची आहेच!

/// "संधी गमावली की घालवली?":
काल रात्री, मुंबई इंडियन्सच्या बिनबाद ४५
धांवसंख्येवरून, जेव्हा त्यांचा डाव १५० धांवातच गडगडला, तेव्हाच निराशेची झुळूक मनात अवतरली होती.

नंतर चेन्नई, चक्क ७० धावा आणि एकच बाद, असा धावफलक पाहिल्यावर तर, आता मुंबईचा
पराभव निश्चितच, असे वाटून सामना बघणे बंदच करून मी झोपी गेलो.

आज सकाळी उठल्यावर, वर्तमानपत्रात मुंबई इंडियन्सचा एका धावेने विजय, हे वाचून थक्क झालो, एक सुखद धक्काही बसला. परंतु त्याच बरोबर आपण एका रोमहर्षक, आशा निराशेचे हिंदोळे असणारे एक झंझावाती वादळ पाहण्यास मुकलो याची खंत वाटली, रुखरुख वाटली.

पण वेळ गेलेली होती. मी संधी गमावली नव्हती, तर घालवली होती.

त्यातून मिळालेला धडा असा की,
"धोका पत्करला तर व तरच, संधी मिळण्याची शक्यता निर्माण होते" हा!
(My fb post of 13th May'19)

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच उत्तमोत्तम अंतर्मुख करणारे......
अनेक लेख वाचण्यासाठी..........
ही लिंक उघडा.......

https://moonsungrandson.blogspot.com

लेख आवडले.......
तर लिंक संग्रही ठेवा...... शेअरही करा.........

बुधवार, २ जून, २०२१

"प्राधान्य अचूक, तर प्रगती बिनचूक आणि सुख, समाधान आपसूक !":

 "प्राधान्य अचूक, तर प्रगती बिनचूक आणि सुख, समाधान आपसूक !":


कोरोनाचे महासंकट आल्याला आता वर्ष उलटून गेलं आणि पहिल्या लाटेनंतर आता दुसरी लाटही आपले भयानक प्रताप दाखवत आहे. ह्यातून सुटका कोण कधी, कशी करणार ह्याचे उत्तर कुणाहीजवळ नाही. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी आपली स्थिती झाली आहे. लहान थोर सर्वांचीच मती आणि आयुष्ये कुंठीत झाली आहेत. 'उद्या'चीच जिथे शाश्वती नाही, तिथे पुढचे भविष्य काय कुणाला ठाऊक नाही. ज्ञात ईतिहासात कदाचित अशी वेळ पूर्वी कधीच आली नसेल.

जीवनात पुष्कळ वेळा निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय घेताना आपल्या मनाची संभ्रमावस्था होते. अशा वेळेला आपण काय करायचे ते सुचत नाही. हे करू कां, ते करू? शेक्सपियरच्या हॅमलेट नाटकाप्रमाणे "टू बी ऑर नॉट टू बी" अशी मनस्थिती होण्याची बऱ्याच वेळेला वेळ येते आणि त्यामुळे आपण योग्य तो निर्णय नेहमी घेतोच असं नाही.

ज्या वेळेला माणूस विशिष्ट रितीने वागतो, तेव्हा त्याला वाटत असतं की, आपण योग्य निर्णय घेतला आहे. परंतु त्याचे बरे वाईट परिणाम पुढे आपल्यालाच भोगावे लागतात. योग्य वेळी योग्य विचार आणि त्याप्रमाणे कृती करणारी माणसे, नेहमी खूपच कमी असतात. त्यामुळे सहाजिकच जगामध्ये यशस्वी प्रसिद्ध नांव मिळवणारी, अशी खूप कमी माणसं असतात, त्या तुलनेत सर्वसामान्य जीवन जगायला वाट्याला येणारी माणसं जास्त असतात. याचं कारण ही द्विधा मनस्थिती किंवा आपल्याला नक्की कोणत्या वेळी काय करणं गरजेचं आहे हे न कळणं.

१.
"विद्यार्थी दशेत अभ्यास प्राधान्याचा":
उदाहरणार्थ सांगतो, हा मुलगा अतिशय हुशार सर्वसाधारणपणे तो नेहमी चांगले मार्कस् मिळवायचा, वर्गात पहिला यायचा. पण हे सारं एसएससी पर्यंत आणि नंतर महत्वाचे वेळी, अभ्यास सोडून तो भलत्याच गोष्टींत रमला. त्यामुळे त्याला अपेक्षित असा कोर्स करण्याची संधी होती, ती हुकली आणि मामुली कुठलीतरी डिग्री गटागळ्या खात घेऊन, त्याला कुठेतरी मास्तरकी करायची वेळ आली. अगदी कनिष्ठ मध्यमवर्गीय जीवन जगायची त्याच्यावर पाळी आली. त्याच्या क्षमतेपेक्षा जीवनामध्ये त्याला जे फळ मिळालं, ते खूप खूप कमी होतं. सहाजिकच तो नेहमी असमाधानी राहीला.

आता ह्याचं कारण काय, तर विद्यार्थीदशेत तुम्हाला कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं-तर अभ्यासाला, हे कळलं पाहिजे. साधारण तुमची जी काही भवितव्य घडविण्याचे १६ ते २२-२५ वय असते, तेव्हा गमतीजमती, मौजमजा याकडे जास्त लक्ष न देता आपल्या अभ्यासाचा मार्ग आहे त्यामध्ये पूर्ण लक्ष घालून, यश मिळवणे हे तुमचं प्राथमिक ध्येय असलं पाहिजे. परंतु या तरुणाची, या माणसाची चूक झाली आणि तो कॉलेजमध्ये संगत चांगली न मिळाल्याने, अभ्यासावरचं लक्ष उडालं व खेळात इतर नको त्यात भाग घेत राहिला.

याच्या उलट त्याचाच एक मित्र, जो अभ्यासात सर्वसाधारण होता, त्याला ssc ला मध्यम मार्क मिळाले, पण कॉलेजमध्ये गेल्यावर काय झालं कळेना, उत्तम प्रकारे लक्ष देऊन चांगला अभ्यास कर करून आय आय टीला अँडमिट झाला, पुढे तो उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेला आणि तिथल्या एका कंपनीत उच्चपदी पोहोचला. शाळेत दोघं एकाच वर्गात, हा पहिला मुलगा खरा त्याच्यापुढे होता, नंतर परंतु मित्र पुढे कां गेला? कारण योग्य त्या वेळी आपली प्राधान्यक्रम कोणता आहे, हे त्याला कळलं.
२.
"व्यावसायिक जीवनात माणसे योग्य रितीने हाताळणे महत्वाचे":
आता करीयर करताना, नोकरीमध्ये अशीच वेळ येते. आपण योग्य वेळी योग्य तऱ्हेने वागत नाही, कितीही झालं तरी बॉस इज ऑलवेज राईट हेच ज्यांना लक्षात येतं, ते यशस्वी होतात. बाँसशी पंगा घेतला, तर लॉंग टर्ममध्ये नुकसानच होणार, हे जर कळले नाही तर तुमची पिछेहाट नक्की. तुम्हाला अशी कितीतरी उदाहरणं आढळतील, तिथे शिक्षणात उत्तम यश असते, परंतु नोकरीमध्ये त्यांना तेवढं यश मिळत नाही, कां? तर एकीकडे माणसं कशी सांभाळायची हे ज्ञान त्यांना नसते. माणूस वरिष्ठ वा सहकारी असो, किंवा तुमचे
कनिष्ठ असोत, सगळ्यांना बरोबर घेऊन, त्यांच्याशी जसं वागायला हवं, तसं जर तुम्ही वागलात तर तुम्ही पुढे जाऊ शकता. पण पुष्कळ वेळा पुष्कळ माणसांना ह्यूमन इंजीनियरिंग म्हणतो, त्याचे अज्ञान असलेली माणसं दुय्यम स्थानावर, पण साधे कुठली तरी साधी डिग्री मिळवलेला एखादा माणूस व्हाईस प्रेसिडेंट पदापर्यंत पोहोचू शकतो, कां? तर माणसं हाताळण्याचे कौशल्य नोकरीतील जीवनामध्ये महत्त्वाचा असते. तरी जर तुमचा EQ अर्थात Emotional Quotient- भावनिक निर्देशांक चांगला नसेल, तर अपयश मिळणार. त्या उलट मनावर योग्य तो ताबा ठेवून, योग्य वेळी योग्य तऱ्हेने जी माणसं वागतात, जीवनात यशस्वी
होतात.
३.
संसारात तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचा जो काही संसाराचा गाडा आहे, त्यात समोर तोडायला एक, तर जोडीदार जोडायला बघतोय, एक पुढे जातोय, तर दुसरा मागे खेचतोय
तर असमाधानी सहजीवन मिळणरंच.
तुम्ही विवाह करता ज्या वेळेला तुम्ही ध्यानात ठेवले पाहिजे की, माझा विवाह मी जोडीदाराला बरोबर घेऊन यशस्वी करीनच. त्यासाठी काय करायला पाहिजे तर एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, त्याचप्रमाणे एकमेकांचे गुणदोष योग्य तऱ्हेने पारखून त्याप्रमाणे साथ दिली पाहिजे. काही झालं तरी वादविवाद भांडणं विकोपाला जातील या पद्धतीने न वागणं आवश्यक असते. संसारात एखादा योग्य वागतो, तर दुसरा कुरबुरी आणि काही ना काही तरी गडबड करत संसार दुःखी करतो. अशा तर्‍हेचेच अनेक संसार कुठून भलतीकडेच चाललेले असतात. आपल्या जोडीदाराचे दोष, योग्य पद्धतीने हाताळले पाहिजेत. एकमेकांना संभाळत गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे, तरच आणि तरच तुम्ही संसारात यशस्वी व्हाल.
४.
शेवटी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता सांगतो. म्हणजे सबंध जीवनामध्ये टॉप प्रायोरिटी कशाला हवी, तर ती म्हणजे आरोग्याला. तुम्हाला असं लक्षात येईल बहुतेक वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तरुणपणापासून, बालपणापासून योग्य ते संस्कार अंगिकारत, आयुष्यभर आपले आरोग्य सांभाळत रहाणे अत्यावश्यक आहे. परंतु वास्तवात आपण केव्हाही कसेही वागतो, वाटेल तेवढं कधीही खातो, वाटेल तसे वागतो, प्रसंगी व्यसनाधीन होतो, आणि त्यामुळे सगळ्याच माणसांना दीर्घायुष्य मिळतंच असं नाही. त्यातून दीर्घायुष्य जरी मिळालं तरी निरोगी मिळत नाही. पूर्ण जीवनामध्ये टॉप प्राँयाँरिटी कशाला दिली पाहिजे तर ती शरीर व मनाच्या आरोग्याला.

आज कोरोनाच्या महासंकटाने, एक प्रकारे प्रत्येक माणसाला जाणीव करून दिली की, सगळ्यात महत्त्व तुमच्या निरोगी जगण्याला, आरोग्याला संभाळण्याला आहे. त्यामुळे आता प्रत्येक जण जागृत होऊन ह्या गोष्टीला सर्वाधिक महत्व देऊ लागला आहे. वाईटात कधी चांगले घडते, ते हेच. निरामय निरोगी रहाणं हा सगळ्यांचा महत्त्वाचा मूलमंत्र बालपणापासून अखेरपर्यंत असला पाहिजे.

ह्या लेखात तुम्हाला जीवनामध्ये जे वेगवेगळे टप्पे असतात, त्या प्रत्येक टप्प्यामध्ये कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, कोणत्या गोष्टी करायच्या आणि आपलं जीवन यशस्वी कसं करायचं ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा लक्षात ठेवा कि तुमचा भवितव्य तुमच्या हातात आहे तुमचं मन, विचारशक्ती तुमच्या जीवनाचा मार्ग रेखाटत रहाणार आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

माझी ही शहात्तराव्या वयात बहरत असलेली गद्धे पंचविशी !":
"माझा सोशल मिडीयावरील 'संसार'! ":

1. माझा ब्लॉग:
एकसे बढकर एक अडीचशेहून अधिक वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........
ही लिंक उघडा....

https://moonsungrandson.blogspot.com

लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....

2. I have you tube channel:

moonsun grandson

With over 75 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. Open this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

मंगळवार, १ जून, २०२१

"सर्जनशीलतेचा असाही रसास्वाद":

 "सर्जनशीलतेचा असाही रसास्वाद":


मोबाईलच्या साफसफाई मधून कधी कधी अनमोल विचारांचा खजिना कसा अचानक गवसतो ते आज अनुभवास आले. सोशल मिडीयावरील माझा हा जुना संदेश नजरेत भरला. तो इथे संपादित रुपात मांडण्याचा प्रयत्न करत आहे:

"२ जून'१९ च्या महाराष्ट्र टाईम्समध्ये
श्री. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी मुखपृष्ठ कसे आकार घेते, ते अतिशय सुलभतेने व ओघवत्या भाषेत, दोन प्रत्यक्ष पुस्तकांची उदाहरणं समोर घेऊन मांडले आहे. हा लेख जसा अतिशय प्रत्ययकारी वाटला, तसाच मनोरंजकही.

वाटून गेले, हाती घेतलेले कोणतेही पुस्तक आपण वाचतो. पण मुखपृष्ठाकडे आपण जितके लक्ष द्यायला हवे, तेवढे ते देतोच असे नाही. दुसरे असे की मुखपृष्ठ चित्रकार त्याची कलाकृती सादर करण्यापूर्वी किती मेहनत घेतो आणि त्याच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर पुस्तकातला आशय हुबेहूब चित्र रुपात प्रकट करण्याचा आटापिटा कसा करतो हेही समजता आले. शेवटी रेषा आणि रेषेचे लाघव ह्यामधूनच तर चित्रकला आकार घेते.

व्यवस्थापन शास्त्रातील IPO, अर्थात् Input Process Output ही संकल्पनाच जणु लेखकाने मुखपृष्ठ निर्मितीमागे कशी असते ते सहजतेने मांडले आहे. कोणतीही नवनिर्मिती कशी होते, त्यासाठी किती किती कष्ट उपसावे लागतात, किती व कसकसा विचार करावा लागतो ह्याचा अंतर्बाह्य शोध घेण्याची चालना मला ह्या अप्रतिम लेखामुळे मिळाली.

जाणवले की, सर्जनशीलता ही काय चीज आहे! कोणतीही नवनिर्मिती तत्संबंधी स्फूर्ती आल्याशिवाय होऊच शकत नाही. ही स्फूर्तीच सर्जकाला अंतर्बाह्य ढवळून काढते, त्याला दिशा दाखवत inputs चा सर्वंकष ढांढोळा घ्यायला लावते. त्यापुढची process ही पायरी हा अत्यंत मूलभूत गाभा असते. ती अचूक तर output अर्थात नवनिर्माण उत्तम होण्याची शक्यता अधिक. अमूर्तातून, अव्यक्तामधून यथोचित अर्थ उलगडण्याचे सामर्थ्य म्हणजेच तर सर्जनशीलता नव्हे कां?

सजीव निर्मिती ही निसर्गामध्ये नवनिर्माणाची परमोच्च कलाकृती! ती होत असताना कळा वेदना होतच असतात किंबहुना म्हणूनच बाळ जेव्हा जन्माला येते, त्या प्रक्रियेला बाळ-अंत-पण अर्थात बाळंतपण असे म्हणत असावेत. वेदनेतून पुनर्निर्मिती होण्याची संभाव्यता अधिक असते. स्फूर्ती अथवा 'क्रिएटिव्ह अँबिलिटी' हीदेखील म्हणूनच एक प्रकारची अंतर्गत वेदनाच होय. ही वेदना मात्र सर्जकाला परमानंद देणारी असते, कारण त्यातूनच जगाला नवीन काहीतरी मिळत असतं!

ह्या लेखामुळे मला असे काही लिहिण्याची बुद्धी झाली, यातच सर्व काही आले अन् लेखाची श्रेष्ठता अधोरेखित झाली. लेखकाचे म्हणूनच अभिनंदन, तसेच अशा प्रकारचा मूलभूत संकल्पना विषद करून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेखमाला सुरु करण्यासाठी म. टा. चे देखील कौतूक. आपण हा लेख जरूर वाचा मला खात्री आहे की तुम्हालाही माझ्यासारखं काहीतरी वाटायला लागेल.

सुधाकर नातू,

"ताजा कलम":
"स्टार प्रवाह" वरील "साथ देशी, तू मला" या मालिकेतील नायक समीर, नेहमी आपल्या मनांतील खळबळ आणि तळमळ काचेच्या बाऊलमधल्या चंद्रमोहन ह्या गोडगुलाबी माशापाशी व्यक्त करत असतो, हे दृश्य मला प्रत्ययकारीपणे आठवले. हा असा अनोखा संवाद देखील सर्जनशील मनाचाच आविष्कार नव्हे कां?

याही पुढे जाऊन हा योगायोग पहा: समीर झालेलाही अभिनेता कुलकर्णी आणि येथील लेखकाचे नावही चंद्रमोहन कुलकर्णीच!
हा दुग्धशर्करा योग म्हणायला नको कां?"
-------------------------

ह्या विचारमंथनाचा सारांश हाच की, कोणतेही पुस्तक वाचण्यापूर्वी आणि ते वाचून झाल्यावरही त्याच्या मुखपृष्ठावर सखोल नजर फिरवा. पुस्तकात जे मांडले आहे, जो आशय आहे तो त्या मुखप्रुष्ठाद्वारे व्यक्त कितपत होते आहे, त्याचे मूल्यमापन हा चित्रकाराची सर्जनशीलतेचा मानदंड असेल.

धन्यवाद
सुधाकर नातू