"तोल मोलके बोल":
पहिल्याच भेटीत एखाद्या व्यक्तीची आपली ओळख नसताना तिच्याबद्दल आपले जे मत तयार होते ते नीट विचार करून बोलायला हवे, नाहीतर त्या व्यक्तीचा उपमर्द होऊन परस्पर संबंध कटू होऊ शकतात. त्यादृष्टीने जिभेवर कायम संयम हवा.
तसा माझ्या एका मित्राचा एक अनुभव आहे. त्याला आले मनात की, बोलून टाकलं जनात अशी संवय आहे. एका ठिकाणी तो कुटुंबियांसमवेत पहिल्यांदाच जात होता. तिथे त्यांचे स्वागत एका वयस्क दिसणाऱ्या स्त्रीने आणि तिच्यापेक्षा तरुण वाटणाऱ्या पुरुषाने केले. तेव्हा त्या पहिल्याच भेटीत, एकमेकांची ओळख करून देताना, ह्याने त्या पुरूषाला विचारले "ही तुमची आई आहे कां?" खरं म्हणजे त्याने तसं बोलणं बरोबर नव्हतं. ते दोघं स्वत:ची काय ओळख करून देत आहेत, ते ऐकायला हवं होतं. कारण नंतर समजलं, की, ते दोघं नवरा-बायको आहेत! त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे ह्यांचे संबंध कायमचे बिघडले.
दुसरा अनुभव असाच विचित्र. मुलीला स्थळ शोधण्यासाठी ही मंडळी एका घरी गेली असताना, वयस्कर पुरुष व त्याच्या मानाने तरुण भासणार्या स्रीने त्यांचे स्वागत केले. तेव्हा ह्या मित्राच्या सौ.ने त्या बाईला विचारले की, हे ग्रहस्थ तुमचे सासरे आहेत कां? दुर्दैवाने तो तिचा नवरा निघाला. परिणाम काय झाला, ते सांगायची गरजच नाही!
गरज असेल तेव्हाच मुद्देसूद बोलावे. अति बोलणे, आपल्या प्रतिमेची हानी करते. अंतिमत: आपल्या तब्येतीवर व परस्पर संबंधांवर अनिष्ट परिणाम होतो.
आपले बोलणे काय परिणाम करेल, त्याचा विचार आपण बोलण्यापूर्वीच करायला हवा. आपल्याला अंतिमत: जे काम साध्य करायचे आहे, त्यासाठी आपले बोलणे, हा अडथळाच ठरत नाही ना, ह्याचे तारतम्य पाळायला हवे. जी व्यक्ती आपले काम तडीला नेणार आहे, तिला पहिल्याच भेटीत केवळ तर्कसंगत असे नियम कठोरपणे सांगत, तिच्याकडे असलेल्या अपुऱ्या माहितीबद्दल अवहेलना करणारे शब्द बोलूच नये. नेहमी त्या व्यक्तीच्या कलाने घ्यावे, नाहीतर मूळ काम होणे, तर दूरच पण वेगळेच काहीतरी होऊन, सगळं ठप्प होऊन बसते! तुसडेपणा झिडकारल्यागत वागणे, त्या प्रकारे बोलणे म्हणजे बेपर्वाई झाली. डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर ठेवावी.
माझाच एक अनुभव सांगतो. घरात रंगकाम करायचे होते. ते करणार्या कंपनीचा माणूस जेव्हा आमच्या घरी आला, तेव्हा त्याच्याजवळ विशेष काही माहिती नव्हती. तेवढ्या आधारावर, मी वाटेल तसं अद्वातद्वा बोललो आणि ग्राहकाकडे येण्यापूर्वी पूर्ण माहिती का करून घेतली नाही, अशा तर्हेचे त्याला खूप लागेल असे बोललो. परिणामस्वरूप, रंगकाम रखडले, नुसते वादविवादच होत गेले! म्हणून डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर हवी.
-------------------------
"लेेेथ जोशी": एक निरीक्षण
मी 'लेथ जोशी' चित्रपट ह्या लाँकडाऊनच्या काळातच टीव्हीवर बघितला आणि त्यामुळेच कदाचित तो मनावर अधिकच विलक्षण परिणाम करून गेला.
झपाट्याने बाजारू झालेल्या माहोलात इथे, एका मनस्वी, अंगभूत कलेत तपस्वी माणसाची जी ससेहोलपट अखेरपर्यंत होत जाते, तिने कुणाही संवेदक्षम माणसाचे ह्रदय पिळवटून निघेल. असे असामान्य व अप्रतिम चित्रपट कधी पडद्यावर येतात अन् अंतर्धान पावतात ते कुणाच्या खिजगणतीतही नसावे ही आपली दारुण शोकांतिका आहे.
---------------------------
"अनुभवाचे बोल":
# "जे जे करावयाचे, ते ते आपआपल्या परिने सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करणे, हे अवर्णनीय आत्मानंद देणारेच असते.
# "बेसावधपणे सारासार विचार न करता घेतलेले महत्वाचे निर्णय अखेर घातकच ठरतात."
# जो समाज कायदा व नैतिकता मानत नाही, त्याचा भविष्यकाळ अंध:कारमय राहील हेच खरे.
# "मी म्हणते ते तेव्हाच्या तेव्हाच झालं पाहिजे, मला जे वाटतं ते अन् तेच बरोबर", अशा दुराग्रही हट्टीपणापायी, संसारात बेबनाव होऊन शांती ढळते."
--------------------------------
"खास कोडे"व उत्तरे":
१ जगात सर्वात लांब कीडा कोणता?
Stick insect
२ जगात असा कोणता तलाव आहे जो बारा वर्षात गोड व नंतर बारा वर्ष खारट होतो?
तिबेटमध्ये उरुसी तलाव
३ वर्तुळात किती बाजू असतात?
दोन
४ Army चा full form सांगा.
Alert Regular Mobility Young
५ अकरामध्ये चार मिळवले, तर तीन होतात, ते कसे?
घड्याळात
६ २००० हजार रुपये १०० ची नोट न घेता २० नोटांमध्ये कसे विभागाल?
200 च्या 8, 50 च्या 6, 20 च्या 4, 10 च्या 2
७ Unbreakable पुस्तक आत्मकथा कोणी लिहीले आहे?
मेरी कोम
८ कोणता पक्षी सगळ्यात छोटं अंड देतो?
हमिंग बर्ड
९ युरोपची कोणती नदी कोळशाची नदी म्हटली जाते?
र्हाईन नदी
१० आठवड्यातील सात वार सोडून अजून तीन वार सांगा.
काल, आज व उद्या
११ गायत्री मंत्र कोणत्या ग्रथांत आहे?
आणि हेही सोडवता आले.नाही?
रुग्वेद
------------------------
'यक्षप्रश्न': व उत्तरे:
१ 'स्वामिनी' मालिकेमधील रमाच्या माहेरचे गांव कोणते?
गराडं
२ पाठीचा ताठ कणा या पुस्तकाचे लेखक कोण?
डॉ पी आर रामाणी
३ 'ऋणानुबंधाच्या ह्या, फिरून पडल्या गाठी' या गीताचे गीतकार व संगीतकार कोण?
बाळ कोल्हटकर
४ 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील राधिके च्या भावाचे नाव काय?
शिरीष-किशोर माने ह्यांनी सादर केलेली भूमिका
५ जयद्रथाचे पांडवांशी नाते काय?
पांडवांचा चुलतभाऊ दुर्योधनाच्या बहिणीचा-दुःशलाचा नवरा
६ 'धुंद मधुमती नाच रे, नाच रे' गीताचा चित्रपट कुठला?
चित्रपट कीचक वध
७ ' संकेत मिलनाचा नाटकाचे नाटककार कोण?
प्रा. वसंत कानेटकर
८ 'सारी सारी रात, तेरी याद सताये' या गीताचे गायक कोण? चित्रपट कोणता?
गायिका:लता मंगेशकर.
चित्रपट: अजी बस शुक्रीया
९ रामायणात लक्ष्मणाचा जीव वाचवण्याकरता हनुमान कोणता पर्वत आणि कोणती वनस्पती आणतो?
द्रोणागिरी पर्वत, संजीवनी वनस्पती.
१० सात चिरंजीव पुरुष कोण?
बली, अश्वत्थामा, पाराशर व्यास, विभीषण
क्रुपाचार्य, परशुराम, हनुमान आणि मार्कंडेय रुषी आठवे चिरंजीव
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा