शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२

 👍"दैनंदिन पाऊलखुणा-१३ !":👌

 👍"दैनंदिन पाऊलखुणा-१३ !":👌


@ "21 ऑक्टोबर !":💐

☺️ दिनविशेष👌
# जागतिक आयोडीन कमतरता अभाव नियंत्रण दिन
# 1789 पेशवाईतील मुख्य न्यायाधीश रामशास्त्री प्रभूणे यांचा मृत्यू
# 1805 ट्राफल्गार लढाईत ब्रिटिश आरमार प्रमुख नेल्सन यांचा गोळी लागून मृत्यू. त्याने नेपोलियनचा धुव्वा उडवला.
# 1833 ज्याच्या भरघोस निधीतून नोबल पुरस्कार दिला जातो त्या नोबेलचा जन्म.
# जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन केला
# 1943 नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सेना सरकारची स्थापना केली. 
# 1977 मिमांसाकार श्रीपादशास्त्री हिंजवडीकर यांचे निधन
###########################

👍"विशेष नोंद ":👌
# 15 ऑगस्टला दक्षिण कोरियाचा स्वातंत्र्य दिन साजरा होतो.
# युनोचे सध्याचे सरचिटणीस बाम की मुन हे आहेत # इस्तंबूलचे पूर्वीचे नाव कॉन्स्टंटटीनापोल होते. 
# मिस्टर बीन्स विनोदी मालिकेत प्रमुख भूमिका रोवन अँटकिन्सनने केली आहे.
# फ्री कीक, थ्रो व ट्रिबल हे शब्द फुटबॉलशी निगडित आहेत.
###########################

@ 22 ऑक्टोबर 💐

👍"विशेष नोंद ":👌
# बलून व पॅराशुटचे सहाय्याने हवेत झेप घेऊन नंतर जमिनीवर उतरणारा जॅक्स गँगेरियन हा पहिला माणूस
# 1962 पंडित नेहरूंच्या हस्ते पाखरा नांगल धरण देशाला अर्पण
# 1978 मराठी लघुनिबंध कादंबरीकार ना सी फडके यांचा मृत्यू
# कोकाकोला चा शोध 1885 मध्ये लागला. 
# पहिल्या स्पेस रॉकेट चा शोध प्राध्यापक जोसेफ गोडार्ड यांनी लावला
# ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय नॉर्मल प्रिचार्ड
#########################

@ 23 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष 👌
# 1629 रामायणकार संत तुलसीदास यांचे निधन. # 1772 अहमदशहा अब्दालीचे निधन
# 1915 इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू जी ग्रेस यांचे निधन
# 1921 रबरी टायरचे संशोधक डनलाँप यांचे निधन
# 1924 व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचा जन्म 
# 1924 पंडित राम मराठे, नाट्यसंगीत अभिनयपटू यांचा जन्म
# 1940 असामान्य फुटबॉलपटू पेले यांचा जन्म.
 # 1979 कवी नारायण सुर्वे यांना मध्य प्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार
###########################

👍"विशेष नोंद !":👌
# KVIB -खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री बोर्ड
# अँडाल्फ हिटलरचा जन्म ऑस्ट्रिया देशात झाला
 # ईटली मध्ये 13 आकडा शुभ फलदायी मानतात. 
# माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात लहान व्यक्ती उत्तर प्रदेश मधली अर्जुन वाजपेयी
# पहिले शब्दकोडे लंडन संडे एक्सप्रेशन या वृत्तपत्राने 
1924 मध्ये छापले
###########################

@ 24 ऑक्टोबर 💐

☺️ "दिनविशेष !":👌
# 1577 शीख धर्मगुरु रामदास यांनी अमृतसर शहराचे नामकरण केले
# 1868 औध संस्थांचे अधिपती भवानराव पंतप्रतिधींचा जन्म
# 1898 इतिहासकार रा वि ओतुरकर यांचा जन्म
 # 1964 झांबियाचा स्वातंत्र्य दिन
# 1989 लष्कर प्रमुख म्हणून पहिले महाराष्ट्रीयन जनरल बेवूर यांचा मृत्यू
###########################

@ 25 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष !:👌
# 1296 संत ज्ञानेश्वर आळंदीला समाधीस्थ
# 1890 ह ना आपटे यांचे करमणूक साप्ताहिक सुरू
# 1919 कुलाबा (आत्ताचा रायगड ) समाचार चा पहिला अंक प्रसिद्ध
# 1881 जगप्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार पिकासो चा जन्म
# 1937 नाट्यछत्र लोकसंगीताचे जाणकार अशोक रानडे यांचा जन्म
# 1980 गीतकार साहीर लुधियानवी यांचे निधन
 # 2005 स्वाध्याय परिवारचे संस्थापक पांडुरंग शास्त्री आठवले यांचा मृत्यू
# 2009 नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर यांचा मृत्यू
###########################

👍विशेष नोंद !":👌
# 2012 मध्ये दिल्ली येथे दक्षिण आशियाई स्पर्धा होतील
# EPFO -एम्प्लॉईज प्राव्हीडंट फंडऑर्गनायझेशन # हाँर्वर्ड विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय प्राध्यापिका गीता गोपीनाथ
# सूर्यापासून सर्वात दूर सूर्यमालेतील ग्रह प्लुटो 
# स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे1893 ला जगप्रसिद्ध भाषण केले.

###########################

धन्यवाद
सुधाकर नातू

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

 👍"दिवाळी अंकांची मांदियाळी -१":👌

 👍"दिवाळी अंकांची मांदियाळी -१":👌


दिवाळी म्हटली की फराळ जसा आठवतो, त्याचप्रमाणे मराठी माणसाला दिवाळी अंक हा एक ऋणानुबंधाचा भाग वाटतो. दरवर्षी कोरे करकरीत दिवाळी अंक वाचण्याची गंमत काही वेगळीच असते. गेल्या एक-दोन वर्षात ग्रंथाली आणि मॅजेस्टिक यांचे खास दिवाळी संच घेण्याचे आम्ही सुरू केले आणि त्याचा वर्षभर खूप फायदा झाला.

निवांतपणे एक एक दिवाळी अंक वाचत जाणे, ही एक मोठी आनंददायी गोष्ट असते. यावर्षीचेही दिवाळी अंक सगळे त्याप्रमाणे आलेले आहेत आणि एका मागोमाग एक असे दिवाळी अंक वाचनाला मी सुरुवात केली आहे. कुठलाही दिवाळी अंक म्हटला, की प्रथम मी संपादकीय नजरे खालून घालतो.
पुष्कळशी संपादकीय तितकीशी दखल घेण्याजोगी असतातच असं नाही. पण आज पहिलाच दिवाळी अंक "पद्मगंधा" घेतला आणि मला त्यातील संपादकीय खूपच उद्बोधक रोचक आणि प्रेरणादायी वाटले, म्हणून ही दखल.

सर्वसाधारणपणे संपादकीय त्या अंकामध्ये कोणत्या साहित्याचा ऐवज आहे याची यथासांग ओळख करून दिली जाते. खरं म्हणजे, मला नवल वाटलं की पद्मगंधा हा दिवाळी अंक निघाला याची. कारण संपादकीयातच म्हटल्याप्रमाणे मागच्या वर्षी त्याचे संस्थापक, संपादक अरुण जाखडे यांचे दुर्दैवाने आकस्मित निधन झाले. तरी देखील त्यांच्या साहित्य प्रेमाचा वारसा पुढे त्यांचे सुपुत्र श्री अभिषेक चालवत आहेत, ही एक खरोखर कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे.

संपादकीयातील सुरुवातीचेच वाक्य म्हणून आपल्या मनात रुजून जाते. अरुण जाखड्यांचे शब्द आहेत: "एखाद्याला कायम आपल्या सोबत ठेवायचे असेल, तर त्याचे कार्य पुढे घेऊन चला !" किती प्रेरणादायी वाक्य आहे हे ! साहजिकच संपादकीय पुढे आपोआपच वाचले गेले. 'वारसा आणि सलगता' हा विषय घेऊन यावेळचा पद्मगंधा दिवाळी अंक १७ वेगवेगळ्या विचारवंतांनी सजवलेला आहे हे त्यामध्ये नमूद केले गेले होते. तसेच इतर कथा कविता यांची योग्य ती ओळख संपादकीयमध्ये देण्यात आली होती आणि त्यामुळेच मला वाटले की हा अंक आपण प्रथम वाचलाच पाहिजे.

त्याप्रमाणे मी आता सुरुवात करणार आहे. त्यासाठी जशी सुरुवात अरुण जाखडेंच्या चटका लावणाऱ्या निधनाच्या बातमीने संपादकीय सुरुवात झाली, त्याचप्रमाणे पद्मगंधाचे लेखक कुमार नवाथे यांना "सी ऑफ कॉपीज" याच्या अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार झाला मिळाला ही आनंददायी घटना आहे परंतु ती ऐकायला आणि अनुभवायला कुमार नवाथे हे आपल्यात नाहीत ही दुःखद बाब आहे. हा मजकूर खरोखर चटका लावून देणार होता.

या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रख्यात कथाकार आणि आपल्या विशिष्ट अशा प्रकारच्या शैलीने एकमेवाद्वितीय असे ठरलेले, जीए कुलकर्णी या कथाकाराची आणि नुकतीच जन्मशताब्दी संपली त्या कवी शंकर रामाणी यांच्या कार्यकर्तृत्वाची साहित्यिक योगदान किती त्यांनी दिले याची दखल घेणारा वाचनीय मजकूर या अंकात आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नर्मदा प्रदक्षिणा नर्मदा आंदोलन फेम समाजसेविका श्री मेधा पाटकर यांच्या काव्यरचना.

जाता जाता, सगळ्यात महत्त्वाची आणि दखल घेण्याजोगी ह्रद्य बाब म्हणजे अंकाच्या सुरुवातीलाच श्री अभिषेक जाखडे यांनी, त्यांच्या वडिलांना-अरुण जाखडे यांना वाहिलेली शब्दरूप आदरांजली ! तिची सुरुवातच सगळ्यांनी मनामनात रुजवण्याजोगी आहे:

👍" प्रत्येक व्यक्तीने एक कला तरी जोपासावी आपली प्रतिभा त्यात आपापल्या परीने विकसित करण्यासाठी सतत कार्यरत राहावे आपले मन समृद्ध करण्यासाठी टवटवीत ठेवण्यासाठी रोजच्या जीवनात उत्साह निर्माण करण्यासाठी याचा सर्वाधिक उपयोग होतो त्यातून करिअरच घडले पाहिजे असे नाही पण सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे.":👌
-अरूण जाखडे

धन्यवाद
सुधाकर नातू

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

👍" दिवाळी-तेजोमय प्रकाशाची आणि विचारांचीही !":👌

 👍" दिवाळी-तेजोमय प्रकाशाची आणि विचारांचीही !":👌


# चिंतन व मुक्तसंवाद #
👍चिंतन हा स्वतःचा, स्वतःशी केलेला मुक्तसंवाद असतो. एखादा मुद्दा मनात घ्यायचा आणि त्यावरील आपल्या जाणिवांच्या क्षितिजापर्यंत संचार करून, वेगवेगळ्या विचारांचे मणी जोडत जायचे, म्हणजेच चिंतन होय. अशा प्रकारचे चिंतन प्रत्येकाने केव्हा ना केव्हातरी विशेषतः सकाळच्या रामप्रहरी करणं गरजेचं आहे. कारण त्यामधून आपण आपला वैचारिक विकास तर साधत असतोच, शिवाय आपल्या अनुभवांच्या शिदोरीमध्ये भर पडत असते. हे असं व्यक्त होणं, हा देखील एक मुक्तसंवाद अथवा चिंतन आहे !👌

# गुन्हेगारी #
👍गुन्हेगारी हा मुद्दा मनात घेतला की पहिला विचार मनात येतो, तो म्हणजे नुकतीच वाचलेली यासंबंधीची माहिती. उत्तरोत्तर वर्षानुवर्षै विविध प्रकारची गुन्हेगारी विलक्षण गतीने वाढत आहे, विशेषता स्त्रियांवरील अत्याचार किंवा चोर्या, दरोडे, फसवणूक, भ्रष्टाचार, दुसऱ्याची गोष्ट हडप करण्याच्या प्रवृत्तीचा प्रचंड असा झंजावात सभोवताली फोफावत जाणाऱ्या गुन्हेगारीच्या आकडेवारीवरून दिसतो.

हे असं का व्हावं, हा विचार गांभीर्याने निरीक्षण करण्याचा मुद्दा आहे. कारण माणूस जन्मतःच कधीच गुन्हेगार नसतो, तो जसजसा वाढत जातो, वयाने मोठा होत जातो, तसतसा त्याच्या वृत्ती- प्रवृत्तीत बदल घडत जातो आणि अनिष्ट संगत, चुकीचे संस्कार यांचा मोठा परिणाम त्याच्यावर होतो. कदाचित परिस्थिती देखील त्यावर प्रभाव टाकते, हे सगळं जरी असलं, तरी जे आपलं नाही जे दुसऱ्याच आहे, ते असं ओरबाडून घेण्याची वृत्ती प्रवृत्तीत रूपांतरित होते आणि ती प्रवृत्ती शेवटी कृतीमध्ये प्रत्यक्ष आल्यावर, हे गुन्हेगारीच झाड असं उंच उच भरारी घेत जातं !

इथे, कुठेतरी त्याच्यावर "मुळे कुठारः" म्हणतात तसा घाव घातला गेला पाहिजे. समाजाने, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणसाने यावर गांभीर्याने विचार करून गुन्हेगारी कमी कशी होईल ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी एक नवा मार्ग असा असू शकेल कां?:👌
☺️ "अपराधी अपत्यांच्या गुन्ह्यांबद्दल, त्यांच्या बरोबरच त्यांच्या आईवडील
वा पालकांनाही शिक्षा देणारा कायदा करणे गरजेचे
आहे कां?":👌
निदान ह्यामुळे तरी वाढती गुन्हेगारी कमी व्हावी.

👍"परोपकारी व्रुत्ती !":👌
गुन्हेगारी वृत्ती म्हणजे दुसऱ्याचं दुःख म्हणजे आपले सुख आणि त्या दुःखातूनच आपला सुख समृद्धीचा मार्ग शोधणे. खरोखर ही व्रुत्ती अत्यंत वाईट आहे. याच्या उलट मला अचानक आज एक अनुभव आला आणि तो यायचं कारण ठरलं ते म्हणजे "कॅरवान मिनी"!

ज्यावेळेला आम्हाला रेडिओची गरज वाटली तेव्हा आम्ही हा छोटासा 'कॅरावान मिनी' घेतला आणि त्याचं कारण म्हणजे आमची पूर्वीची रेडिओ वरती मुंबई केंद्रातील 'मंगल प्रभात'चु गीते ऐकणे. त्यासाठी खरं म्हणजे हा 'कॅरवान मिनी' घेतला. तेव्हापासून आम्ही दररोज सकाळी त्या सुमारास उठून, साडेसहा वाजता 'चिंतन' हा कार्यक्रम आवर्जून ऐकतो. त्यापूर्वीची मंगल प्रभाती गाणी मात्र पूर्वीच्या इतकी आनंद देत नाहीत. कारण कुठली तरी अपरिचित अशीच गीते पुष्कळदा वाजवली जातात.

एका 'चिंतन' कार्यक्रमात दिवाळीबद्दल डॉक्टर अनुराधा कुलकर्णी यांचे विचार ऐकले. किती छान सांगितलं त्यांनी ! त्याचा सारांश एवढाच होता की, दुसऱ्याचे सुख हे आपले सुख मानणे, त्यासाठी आपल्या मनाला मुरड घालायला लागली तरी चालेल हा संदेश त्यामधून दिला गेला होता. दिवाळी म्हटलं की तेजाची आरती, सगळीकडे तेजोमय वातावरण. पण एवढ्या पुरतंच दिवाळीकडे बघायला नको. मनाची देखील तेजोमय अशी विचारसरणी किंवा बुद्धी, भावना तुम्हाला अंतर्बाह्य प्रकाशित करते. असाच त्या चिंतनाचा मतीतार्थ होता.
त्या चिंतनात सांगितलेली एक गोष्ट तर न विसरण्याजोगी होती:

एका जोडप्याचं पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा तो दिवस. त्या वेळेला त्या वहिनींनी आपल्या नवऱ्याला आवडते अशी साडी नेसली होती आणि नवरा मात्र दिवसभर एका अनाथ मुलांना संभाळणाऱ्या संस्थेत त्यांची आरोग्याची आणि इतर विचारपूस करायला गेला होता. त्यांना हे असं काम आवडतं म्हणून या वहिनी घरी थांबल्या होत्या. त्याचही कारण मोठं विलक्षण होतं. घरी एकट्या वृद्ध सासूबाई ज्या विकलांग आहेत त्या कशा राहतील या विचाराने व आपल्या नवऱ्याला देखील बरं वाटेल, स्वतःला देखील बरं वाटेल, ह्या निर्मळ हेतूने, त्यांनी त्यांच्या सासूबाईंच्या बरोबर त्यांची सेवा करत, घरी राहणं पसंत केलं होत. म्हणजे बघा दुसऱ्यांच्या सुखात आनंद शोधणे हा जणू द्विगुणीत करणारा आनंद असतो, हा मुद्दा त्या चिंतनातून कळला.

कुठे ती गुन्हेगारी वृत्ती आणि कुठे ही
सत्सद् विवेकबुद्धीने चालणारी मानवी मनाला, श्रीमंत करणारी अशी परोपकारी व्रुत्ती !

धन्यवाद
सुधाकर नातू

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

👍"पुढचे पाऊल":👌 अर्थात संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य":👌

 👍"नियतीचा संकेत":👌:

👍"पुढचे पाऊल":👌
अर्थात संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य":
१नोव्हें’२२ ते ३१ डिसें''२३💐

👍प्रास्ताविक:

भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य
 ज्योतिष रविला.  त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र 
ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली 
जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही 
राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते. 

आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली
क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणि प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे 
सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के 
पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार 
निर्णय व क्रुतीवर प्रभाव पाडत असते, हे ओघाने 
आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत 
मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.

👍अनुकूल गुण पद्धती:

कालचक्र अव्याहत फिरत असते, माणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतात. हा क्रम प्रत्येकाला अनुभवाला येतो. उद्याचा दिवस, आजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या आशेवर माणूस जगत असतो. उद्याचे पुढचे पाऊल कसे असेल, येणारा काळ कसा असेल, अनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो दर वर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात असतो.

माणूस उंच वा बुटका आहे, जाडा किंवा बारिक आहे, तो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशी काही कल्पना येत नाही. ती येण्यासाठी कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यक असते. जसे उंची 
सेंटी मीटर, वजनासाठी किलोग्राम, आर्थिक 
स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने 
दाखवता येते. ह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस कोणाला कसे जातील, हे भविष्याच्या ज्ञानाच्या 
आधारे सांगण्याची पद्धत म्हणजे राशीभविष्य होय. 

👍नशिबाच्या परिक्षा: 

पहिल्या स्तंभात प्रत्येक राशीच्या खाली डाव्या बाजूला त्या राशीचा नशिबाचा ह्या वर्षीचा तर उजव्या बाजूस मागील वर्षीचा अनुक्रम दाखवला आहे.  

३१ दिवसांचा महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे जास्तीत जास्त गुण १८६, तर ३० दिवसांच्या महिन्यांचे जास्तीत जास्त गुण १८० आणि फेब्रुवारी २०२३चे जास्तीत जास्त अनुकूल गुण १६८. याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ग्रह किती शुभ दिवस आहेत ते अनुकूल गुण 
दाखवले आहेत. त्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल राखत समाधान मिळवण्याची युक्ती 
तुम्हाला मिळू शकेल अशी अनुकूल गुणांची कल्पना आहे. 

👍अनुकूल गुणांच्या पद्धती: नियम
आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत. प्रत्येक राशीला सहा प्रमुख ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण 
देतो. ते नियम असे आहेत:

रवि: ३,६, १० व ११ वा शुभ
मंगळ: ३,६, व ११ वा शुभ
बुध: २,४,६,८,१० व ११ वा शुभ
गुरू: २,५,७,९, व ११ वा शुभ
शुक्र: १,२,३,४,५,८,९,११ व१२ वा शुभ
शनी: ३,६, व ११ वा शुभ

👍"नशिबाची गटवारी":👌

आगामी १४ महिन्यांच्या कालखंडात वरील महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ आहेत, ते आजमावून माहवार शुभदिवस अर्थात अनुकूल गुण देऊन, त्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे
१.उत्तम पहिला गट: धनु, कन्या व मीन राशी
२.उजवा दुसरा गट: कर्क, सिंह व मेष राशी
३.मध्यम तिसरा गट: व्रुश्चिक व मिथुन राशी.
४.डावा चौथा गट: व्रुषभ व तुळ रास
५.त्रासदायक पाचवा गट: कुंभ आणि मकर रास.

👍"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":👌
सोबत राशीने हाय या संपूर्ण कालखंडातील माहवार अनुकूल गुणांचे कोष्टक दिले आहे प्रत्येक महिन्यामध्ये राशीचा नशीबाचा क्रमांक ही खाली दिलेला आहे वर्ष कालखंडाच्या अखेरीस मागच्या वर्षीच्या तुलनेत अनुकूल गुण तसेच क्रमांक नशिबाच्या बाबतीत कुठला ते देखील दिले आहे त्यावरून तुमचे तुम्हालाच समजू शकेल की आपले नशीब इतरांच्या तुलनेत कसे आहे. या पद्धतीमुळे आपण आपल्या अपेक्षा आणि प्रयत्न यांची सांगड घालून योग्य ते कृती करून आपल्या समाधानाचा मार्ग शोधू शकता तुमचे नशीब तुमच्या हातात असाच जणू काही हा एकंदर मार्ग.
मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल:

मेष: मागच्या वर्षी सातवा नंबर होता आता सहावा आहे म्हणजे प्रगती आहे.
वृषभ: बरोबर उलटं झालंय मागच्या वर्षी आठवा क्रमांक होता बारा राशींमध्ये तो आता नववा झालाय.
मिथुन: राशीची प्रगती आहे कारण गेल्यावर्षी बारा राशींमध्ये त्याचा तळाला 11 वा क्रमांक होता तो आता उडी मारून आठ झाला आहे.
तर कर्क रास नवव्या क्रमांकावरून प्रगती करत चौथ्या क्रमांकावर पोचली आहे.
सिंह: रास दिमाखाने दुसऱ्या क्रमांकावर होती तिची घसरगुंडी होऊन ती पाचव्या नंबरवर स्थिरावणार आहे, म्हणजे दिवस मागच्यापेक्षा आता जरा तेवढे चांगले नाहीत.
कन्या: राशीचे बरोबर उलट झालं आहे कारण तिने मागच्या वर्षी पाच क्रमांक वरून दुसऱ्या क्रमांकावर ह्या वेळेला उडी मारणार आहे म्हणजे त्यांची चांगली प्रगती आहे.
तुळ: जैसे थे तळाला दहाव्या क्रमांकावर कठीण दिवस तसेच पहात राहणार आहे.
वृश्चिक रास मागच्या वर्षी दिमाखात पहिल्या क्रमांकावर होती ती आता घसरून सातव्या क्रमांकावर कटकटी पाहणार आहे.
धनु: त्याउलट अगदी बरोबर मागच्या वर्षी मध्यममार्गी ६ व्या क्रमांकावरून चक्क पहिला क्रमांक मिळवणार आहे.
मकर : रास बिचारी बाराव्या तळाच्या क्रमांकावर यावर्षीही किया मारुन कठीण दिवसांना तोंड देणार आहे.
कुंभ: राशीची जबरदस्त घसरगुंडी होऊन ती तिसर्या नंबरवरून चक्क अकराव्या क्रमांकावर तळाला जाणार आहे.
मीन: रास आहे त्या परिस्थितीत किंचित सुधारणा करत चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर उडी मारणार आहे.
अशा तऱ्हेने राशींचे नशिबाचे आगामी वर्षांतील चढउतार तुम्हाला मार्गदर्शक ठरतील.

👍"शनीची साडेसाती":

साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हां 
तुमच्या चंद्रराशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा  
साडेसाती सुरू होते व  तुमच्या राशीच्या पुढील 
राशीनंतर येणार्या राशींत जातो, तोपर्यंत साडेसाती 
असते.
उदा: 
सध्या मकर राशींत शनी वक्रीआहे, म्हणून आता 
धनु, मकर  कुंभ राशींना साडेसाती आहे. शनी कुंभेत 
१७ जानेवाली'२३ रोजी जेव्हा करेल, तेव्हा धनु राशीची साडेसाती 
संपेल, मात्र तेव्हा पुन्हा मीन राशीला साडेसाती सुरु होईल.
✴९. धनु▪ २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु झालेली असुन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.​
✴१०. मकर▪२६ जानेवारी २०१७ रोजी  सुरु 
झालेली असुन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.​
११. कुंभ:
शनीची साडेसाती २४ जानेवारी'२०२० पासून सुरु झाली, ती २३ फेब्रुवारी'२०२८ पर्यंत असेल.
१२ मीन: शनीची साडेसाती २९ एप्रिल'२२ ते १२ जुलै'२२ व नंतर पुन्हा १७ जाने'२३ ते पर्यंत ती राहील.

👍वयोमानानुसार आता मी वैयक्तिक ज्योतिष सल्ला देणे बंद केले आहे, ह्याची क्रुपया नोंद घ्यावी.

👍सर्व वाचकांना आगामी दिवाळी तसेच कालखंड सुख शांती व समाधानाचा जावो ही मनःपूर्वक शुभेच्छा.

धन्यवाद
सुधाकर नातू

।। शुभम् भवतु ।।

👍राशीनिहाय अनुकुलगुण कोष्टक:'२२/२३ 👌
ज्या इच्छुक वाचकांना हे गोष्ट हवे असेल, त्यांनी 
आपले नाव देऊन 9820632655 येथे व्हाट्सअप संदेश करावा.

Bhavishya 2022-23.png

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

👍"दिवाळी आली अन् वाचनसंस्कृती निकाली ?"😢


👍"दिवाळी आली अन् वाचनसंस्कृती निकाली ?"😢

दिवाळी आता आली जवळ आणि त्यामुळे आपल्याला आनंदाचे असे अनेक क्षण मिळणार आहेत. आज लक्षात आले की, या वेळेला दिवाळी फक्त दोन दिवसांची आहे आणि असा अनुभव मला तरी माझ्या आयुष्यात यापूर्वी कधी आल्याचे आठवत नाही.

नेहमी दिवाळी चार दिवसांची असायची, फार तर तीन दिवसांची. पण फक्त दोन दिवसांची असा अनुभव हा प्रथमच येत आहे. सारे काही आक्रसत चालले आहे असे वाटावे असेच हे सारे लक्षण नव्हे कां? त्यातून दिवाळीच्यामध्ये सूर्यग्रहण हा एक अनिष्ट म्हटलं तर आणि कदाचित जगावर प्रभाव पाडणारा असा प्रसंग देखील उद्भवणार आहे.

थोडक्यात कोरोनाच्या संकटानंतर येणारी ही दिवाळी, आपल्याला हेच सांगते आहे की,
"राजा, वैऱ्याची रात्र आहे, सावध राहा !" आणि याचं कारण म्हणजे एकंदर बिकट आर्थिक परिस्थिती, वाढती महागाई आणि जगावरती येणारे मंदीचे संकट चक्क 'आ' वासून उभे आहे. त्यातून युरोपमध्ये युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध चाललं आहे, त्यावरून कोणते प्रसंग भयानक परत येणार ही चिंता जगाला लागली आहे.

सर्वसाधारण वेळेला दिवाळी म्हटली की, मराठी माणसाला 'दिवाळी अंक' हा जिव्हाळ्याचा एक अविभाज्य भाग आहे. तसे मार्केटमध्ये हळूहळू दिवाळी अंक येऊही लागले आहेत. दिवाळी अंक जास्तीत जास्त खपावेत, म्हणून बरेच जण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्नही करत आहेत. त्यासाठी, वेगवेगळी अशी आकर्षणे, पुस्तकांच्या भेटी म्हणा किंवा ध्वनिफितींचा एखादा काही संच, काही दिवसांसाठी विनामूल्य देणं म्हणा किंवा 'दिवाळी पहाट' सारखे कार्यक्रम म्हणा. अशी प्रलोभनं दाखवून पाच-सहा दिवाळी अंक एकदम संचाच्या स्वरूपात आपल्या प्रकारे वितरित करायचा प्रयत्नही करत आहेत.

त्यामुळे नेहमीसारखीच दिवाळी अंकांची ही दिवाळी चालूच राहणार हे खरे आहे. दिवाळीत अंक म्हटले की विचारांची देवाण-घेवाण, अंतर्मुख करणाऱ्या अशा भावनांची, अनुभवांची उजळणी हा एक पुढे तीन-चार महिने आनंद देणारा असा कार्यक्रम आपल्याला सातत्याने अनुभवायला येणारच आहे.
मराठी माणसाचं हे तर वैशिष्ट्य आहे की, जशी रंगभूमी त्याला प्रिय, त्याचप्रमाणे मराठी माणसाला दिवाळी अंक देखील अजून तरी हवेहवेसेच !

ह्या पार्श्वभूमीवर, आज एक दिवाळी अंक वाचताना मला बातमी कळली-त्याच्या संपादकीयामध्ये की, आता यापुढे दरमहा अंक न निघता केवळ वार्षिक दिवाळी अंकच काढले जातील. तसं बघितलं तर, बहुतेक मराठी मासिके हळूहळू अस्ताला गेलेली आहेत. कदाचित हाताच्या बोटावर मोजावी एवढीच मराठी मासिकं सध्या अस्तित्वात असतील आणि ही एक खेदाची बाब आहे. कारण दिवाळी अंक फक्त याच्यापुढे निघणार, म्हणजे वाचनाची जी काही आपली संस्कृती आहे ती आटत जाणार.....

वाचनाचे मानवी जीवनातील महत्त्व वेगळे काही सांगायला नको. आज माणूस इथपर्यंत यायला, त्याची प्रगती करायला विज्ञानाबरोबरच वाचन संस्कृतीचा प्रचंड मोठा हात लागलेला आहे हे विसरता येणार नाही. माणूस आणि इतर प्राणी यांच्या मधला जो फरक आहे, तो इथेच आहे. मानव विचार करू शकतो विचार देऊ शकतो आणि त्यासाठी वाचन हे अत्यावश्यक आहे. वाचन संपले तर कदाचित माणूस देखील संपेल, अशी भीती आहे. म्हणून हा सारा लेखाचा प्रपंच.

धन्यवाद
सुधाकर नातू

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

👍"दैनंदिन पाऊलखुणा-१३ !":👌

 👍"दैनंदिन पाऊलखुणा-१३ !":👌

ह्या वैशिष्ट्यपूर्ण लेखमालिकेला "जुने ते सोने"म्हणतात ते काही खोटे नाही. माझ्या 2010 च्या डायरीमध्ये ज्या दररोज नोंदी मी घेतल्या, त्यांचा थोडक्यात परामर्श या लेखमालिकेत घेत आहे.

@ 15आँक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌

#1542 मुघल सम्राट अकबराचा जन्म
# 1888 गो ग आगरकरांचे सुधारक पत्र सुरू
# 1918 साईबाबा पंचत्वात विलीन
# 1920 लेखक मारियो पूझो यांचा जन्म
#1926 कवी नारायण सुर्वे यांचा जन्म
# 1932 टाटांनी कराची ते मुंबई अशी विमान सेवा सुरू केली
#2002 विनोदी लेखक वसंत सबनिसांचा मृत्यू
# 1997 अरुंधती रॉय यांना गोड ऑफ स्मॉल थिंगस् बद्दल बुकर पुरस्कार
##########################

👍विशेष नोंद 👌
#साहित्यातील नोबल पारितोषक पेरूचे व्हर्गास सोया यांना
# आठ मे जागतिक थँलौस्मिया दिन
# आय एस ए एसः इंटरनॅशनल सिक्युरिटी असिस्टंट फोर्स
##########################

@ 16 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌
# 1905 बंगालच्या फाळणी विरोधात कायदेभंगावरील चळवळीला आरंभ
# 1886 लेखिका नाटककार गिरीजाबाई केळकर यांचा जन्म
# 1921 प्रबोधनकार ठाकरेंच्या 'प्रबोधन' चे प्रकाशन
#1944 ओगले काच कारखान्याचे संस्थापक गुरुनाथ ओगले यांचे निधन
# 1950 पुणे अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक दादासाहेब केतकर यांचे निधन
#1998 भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांना नोबेल पुरस्कार
# 2002 इतिहास कादंबरीकार ना स इनामदारांचा मृत्यू
##########################

👍 विशेष नोंद 👌
# ब्रेड बनविण्यासाठी यीस्ट वापरतात
# फायनान्स कमिशन दर बारा वर्षांनी नेमतात
# हवेतील आर्द्रता 'हायग्रोमीटर' ने मोजतात
# दुरंद रेषा भारत आणि अफगाणिस्तान मध्ये आहे # 2014 मध्ये स्कॉटलंडमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा होतील
##########################

@ 19 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌
# 1761 ब्रिटिश सेनापती लॉर्ड कॉर्नवाँलिसने अमेरिकन सेनापती जॉर्ज वॉशिंग्टन समोर शरणागती पत्करली
# 1902 मराठी लघुकथेचे शिल्पकार दिवाकर केळकर यांचा जन्म
# 1920 'स्वाध्याय परिवार'चे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म : हा दिवस मनुष्य गौरव दिन म्हणून पाळला जातो
#1936 गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म # 1973 इंग्लिश पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा मृत्यू
##########################

👍 विशेष नोंद 👌

# RDX: रिझर्व डेव्हलपमेंट एक्स्प्लॉजिव्ह
# गोवळकोंडा किल्ला हैदराबाद जवळ आंध्र प्रदेशात आहे
# भारतात ओरिसा राज्याचे दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे
# राज्यसभेचे अध्यक्ष पद उपराष्ट्रपती भूषवतात #जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे
##########################

@ 20 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌

# 1915 अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचा जन्म
# 1917 शाहीर अमर शेख यांचा जन्म
# 1932 गायक संगीतकार कमलाकर भागवत यांचा जन्म
# 1969 अकोला येथे पंजाबराव विद्यापीठाची स्थापना
# 1974 गायक संगीतकार कृष्णराव फुलंब्रीकर यांचे निधन
# 1995 देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी पुरस्कार जाहीर
# ☺️1970 डॉक्टर नॉर्मन बोरलॉक यांना हरितक्रांतीसाठी नोबल पुरस्कार
# 2001 पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरव पदक
##########################

👍 विशेष नोंद 👌

# गँमन इंडिया लिमिटेड कंपनी 1922 मध्ये स्थापन झाली
# क्रॉम्प्टन ग्रीव्हज लिमिटेड कंपनी 1937 मध्ये स्थापन झाली
# व्होल्गा ही युरोपातील नदी कॅस्पियन समुद्राला जाऊन मिळते
# चीनचे राष्ट्रीय फळ किवी
# नोबल पारितोषक मिळालेल्या पहिल्या पाकिस्तानी नागरिकाचे नाव अब्दुल सलाम
# लॉंग कॉर्नर व शॉर्ट कॉर्नर ह्या संज्ञा हॉकीशी निगडित आहेत
##########################

धन्यवाद
सुधाकर नातू

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

👍 "अधुरी जीवनरेखा- अधुरी एक कहाणी !":😊

👍 "अधुरी जीवनरेखा- अधुरी एक कहाणी !":😊

☺️ सुमारे पाच दशकांपूर्वी मी ज्योतिषाचा अभ्यास सुरू केल्यापासून मी कोणाचीही ओळख झाली की, त्याची जन्मतारीख, जन्मवेळ व जन्मस्थळ विचारत असे आणि घरी आल्यावर त्या त्या तारखेला एका डायरीमध्ये त्या व्यक्तीची पत्रिका करून ठेवत असे. त्यासाठी एक छोटी डायरी होती काळ्या पुठ्ठ्याच्या कव्हरची. ती अजूनही माझ्याकडे आहे.👌

👍हल्ली सकाळी चहा पिण्याच्या वेळेला, मला काहीतरी वाचायला किंवा निरीक्षण करायला लागतं. त्या दिवशी, मी सहज ती काळी डायरी उघडली आणि उघडल्याबरोबर पहिली पत्रिका समोर आली, ती व्यक्ती 32 व्या वर्षीच मरण पावली होती. मला वाटले हे असं का व्हावं, तो एक कर्तबगार तरुण होता, विवाह झाला होता तसेच एक मुलगी पण झाली होती आणि अचानक 32 व्या वर्षी, हार्ट अटॅक घेऊन हा तरुण गेला. पत्रिकेत बघितलं तर काय बाबा कारण असेल ? अभ्यास केला. 😊

☺️ त्यामुळे वाटलं आणि इतरही अशाच अल्पायुषी व्यक्तींच्या पत्रिका, मी त्या डायरीतून बघितल्या. त्यातून मला जो निष्कर्ष सापडला, तो आज इथे मांडतोय:
👍शनि व मंगळ हे मोठे महाप्रतापी आणि अनिष्ट ग्रह आहेत. विवाह विलंब आणि विवाहसुखामध्ये काही ना काहीतरी अडचणी, अडथळे याच्यामागे सप्तमेश, सप्तम स्थान आणि त्याच्यावर शनी वा मंगळाची दृष्टी वा युती, अथवा एखादा षडाष्टकासारखा अनिष्ट योग ही कारणं हे सर्व ज्ञात आहे. 👌

☺️ तशीच एक बाब मला या बहुतेक अल्पायुषी पत्रिकांमध्ये आढळली व ती मला इथे नोंद घ्यावीशी वाटली. अनुभवाचे बोल म्हणून सप्तमेश जसा विवाहा साठी महत्त्वाचा, तसाच आयुर्मान चांगले मिळण्यासाठी लग्नेश, षष्ठेश व अष्टमेश हे महत्त्वाचे आणि त्यांच्या अधिपतींवर शनी वा मंगळाच्या अनिष्ट दृष्टी जर असल्या, तर कदाचित ती माणसं अल्पायुषी ठरत असावीत, असं मला आढळलं. मंगळाचा वा शनीचा षडाष्टक योगाची त्यांच्यावर दृष्टी, मंगळ शनीचा पाप कर्तरी योग आणि षडाष्टक योग अथवा लग्नेश अष्टमात अशा तऱ्हेची काही निरीक्षणे मला सापडली. 👌

👍थोडक्यात लग्न स्थान खूप महत्त्वाचं. लग्नेश महत्त्वाचा. तसाच षष्ठेश, अष्टमेश महत्वाचे. या तीन स्थानांच्या अभ्यासावरून आणि मंगळ शनी, तसेच राहू व केतू यांच्या त्या संबंधित योगांचा सखोल अभ्यास करून एखादी व्यक्ती अल्पायुषी ठरणार आहे कां, याचा कदाचित अभ्यास करता येईल, असं मला वाटतं. 😊

👍विशेषतः गेल्या दोन-तीन वर्षात कोरोना संकट झाल्यावर देखील अचानक अनेक व्यक्तींचे अल्पायुष्यात मरण पावलेले आलेले दिसते तरुण मंडळी ही कुठे गरबा खेळता खेळता, किंवा क्रिकेट व तत्सम खेळ खेळताना किंवा एखाद्या धावण्याच्या स्पर्धेत मध्ये धावताना, अचानक कोसळून मृत्यू पावल्याचे आपल्याला सातत्याने ऐकायला मिळते आहे. हा मृत्यूचा खेळ खरोखर व्यथित करणारा आहे. सध्याची वेगवान जीवनशैली, ताण-तणाव आणि वाढत्या अपेक्षा हे तर कारण नक्कीच आहे, परंतु आपली जीवनशैली कोणी बदलायला तयार नाही किंवा तो बदलू शकत नाही हे सत्य आहे. परंतु अशाच वेळी ज्योतिष अभ्यासकांनी या अत्यंत महत्वाच्या विषयाचा सखोल अभ्यास करावा आणि माणसाचे आयुर्मान पत्रिकेवरून कसे काढता येईल त्याचा विचार करायला हवा. 💐

☺️ माझ्या आठवणीप्रमाणे दीर्घायुष्यी माणसांच्याही मी पत्रिका कधीतरी अभ्यासल्या होत्या आणि त्यातूनही वेगळे निष्कर्ष मी काढले होते. पण तेव्हा देखील लग्नेश षष्ठेश द्वादशेष आणि अष्टमेश यांचा अभ्यास केला होता हे मला स्मरते. तो लेख कुठे पुन्हा मला माझ्या संग्रहात आढळला, तर तो पुन्हा अभ्यासेन व निष्कर्ष मांडेन. 😊

👍 याशिवाय माझ्या स्मरणाप्रमाणे, जन्मपत्रिकेत प्रत्येक ग्रह किती अंश कला विकला आणि कोणत्या राशीत आहे, त्याचा विचार करायचा आणि त्यावरून एकूण त्याचे आयुर्मान काढायचे, याचे एक सूत्र मला आढळले होते. प्रत्यक्ष हयात नसलेल्या व्यक्तींच्या आयुर्मानांच्या उदाहरणांवरून, त्या सूत्राचे मी अवलोकनही केले असता 90% ते सूत्र बरोबर आढळले होते. ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बहुदा ग्रहांकीत मासिकात मी यासंबंधी एक लेखही लिहिला होता. पण दुर्दैवाने त्याची प्रत आता माझ्याकडे नाही. तसेच तो शोधण्याचा प्रयत्नही अजून अयशस्वी झाला आहे. तो जर लेख मिळाला तर या विषयावर अधिक प्रकाश टाकता येईल, असं मला वाटतं.👌

विचित्र अशा सद्यस्थितीमुळे, ही अशी आयुर्मानासंबंधी अभ्यासाची वेळ आली आणि मी हा लेख लिहू शकलो. चूक भूल, द्यावी घ्यावी.

धन्यवाद
सुधाकर नातू

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

 👍"The Fundamental Realities in Life !":👌 

 👍"The Fundamental Realities in Life !":👌 

1. Hope, Inspiration and Hard Work are the three Great accomplishments in Life.            

 2. Nature, Time and Patience are the three Great Doctors.                         

3. Wonders, Coincidences and Calamities are the three Great Surprizes in Life.                            

4. Attitude, Skills and Knowledge are the three Great Weapons in Life.     

5. Love, Fragrance and Melody are the three Delights in Life.                                                           

 6. Creativity, Innovation and Intelligence are the three Gifts in Life.  

7. Systems, Structures and Methods are the three Great Essentialities in Life.                  

 8. Success is an End of the Journey, whereas, Failure is the Ongoing Journey.                                            

9. Accidents, Probabilities and Mistakes are the three Great Uncertainties in Life.

10. Co-ordination, Commitment and Co-operation are the three main  needs of the Collective Actions.      

11. Human Error, Nature's Fury and Failed Technology are the three main reasons for Disasters.             

12. Cause, Reason and Result are the three the most Interconnected Factors.                              

13. Misunderstandings, Different Intents and Enmity are the three roots of the Conflicts.


Thank you

Sudhakar Natu

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-१0!":😊

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-१0 !":😊

दैनंदिनी लिहीणे, हा एक मोठा चांगला अनुभव असतो कारण त्यामधून आपल्याला स्वतःशीच स्वतःला संवाद साधता येतो. याचं कारण म्हणजे आपण त्या वेळेला एकांतात असतो आणि आपल्या समोरची रोजनिशी, आपण आणि आपले मन, मनातला आरसा त्यातून जाणीवांच्या दृष्टीने आपण सभोवतालचा घडलेल्या घटनांचा आणि आपल्या स्वतःच्या विचारांचा आढावा घेत असतो, त्याची नोंद करत असतो. साहजिकच अशा दैनंदिनी लिहिण्याच्या सवयीचा खूप फायदा होतो. 

पुढे, मागे वळून पाहताना आपण काय केले कुठे बरोबर होतो, कुठे चुकलो, काय नवीन शिकलो हे देखील बघता येते. अशी सवय नेहमी पाळता येणं फार कठीण असतं. माझ्या वाचनाप्रमाणे किंवा ऐकल्याप्रमाणे मला आठवतंय की श्री सुधीर गाडगीळ सातत्याने अशा तऱ्हेची दैनंदिनी वर्षानुवर्ष लिहीत आले आहेत. परंतु माझे मात्र तसे काही झालेले नाही. मी फक्त कधी मधी कुठल्या ना कुठल्या वर्षी हे व्रत पाडू शकलोय. आता माझ्या २०१० सालातील रोजनिशीतील नोंदी, मी दैनंदिनी तेल पाऊलखुणा असं नाव देऊन त्यावर माझी ही लेखमालिका देखील ब्लॉगवर लिहीत आहे.

# आपल्या इच्छेप्रमाणे नेहमी सगळं घडतच असं नाही आणि तसं समजणं मोठं चुकीचं असतं, असा अनुभव अजून मधून येतो. याबाबतीत अपेक्षाभंगामुळे आपले नुकसान होते. प्रकृतीत विपरीत परिणाम होतो आणि ते महागात पडू शकते. दोन्ही बाबतीत शेवटी आपल्यालाच त्रास होतो. यावर उपाय शोधून सापडत नाही आणि 'कालाय तस्मै मः' ! व्यक्ति त्याच्या प्रकृती ( की विकृती) असे म्हणून गप्प बसणे आपल्या हातात असते.

# कोण कसा केव्हा वागेल सांगता येत नाही. त्यामुळे कठीण वाटणाऱ्या गोष्टींचा त्रास होतो. अर्थात त्यांचाही केव्हातरी अंत होतो आणि सर्वसाधारण सुसह्य असे वातावरण परिस्थिती केव्हातरी निर्माण होतेच होते. तिचा इंतजार करण्यासाठी धीर धरायला हवा, असेच अनुभवांती समजते. 

# अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा, विचार करून त्या ठेवा. त्या न पूर्ण झाल्यास समजूतदारपणा हवा. कधी कधी आपल्या मनाप्रमाणे होत नाही. सगळेच आपल्याच मनाप्रमाणे होईल असा हट्ट कधीही नको. आपल्या उपेक्षेचे कारण आपल्या अपेक्षा असतात, म्हणून नेहमी योग्य अपेक्षा ठेवायला शिकायला हवं.

# नियमित आहार एकपट खाणे, दुप्पट पाणी पिणे तिप्पट चालणे आणि चौपट हसून आनंदी राहणे. शक्यतो शाकाहारी असणे, निर्व्यसनी असणे. दुसऱ्याचे भले करता नाही आले, तरी निदान दुसऱ्यांचे वाईट न चिंतणे, यामुळे मानसिक समाधान मिळते.

धन्यवाद

सुधाकर नातू

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

 👍"दैनंदिन पाऊलखुणा-11 !":👌

 👍"दैनंदिन पाऊलखुणा-11 !":👌

ह्या वैशिष्ट्यपूर्ण लेखमालिकेला "जुने ते सोने"म्हणतात ते काही खोटे नाही. माझ्या 2010 च्या डायरीमध्ये ज्या दररोज नोंदी मी घेतल्या, त्यांचा थोडक्यात परामर्श या लेखमालिकेत घेत आहे.

@ 10 आँक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌

# 1731 हायड्रोजन वायूचे संशोधक कॅव्हेंडीश यांचा जन्म
# 1844 स्वातंत्र्य सेनानी काँग्रेसचे दुसरे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यदजींचा जन्म
# 1899 कम्युनिस्ट नेते कॉम्रेड डांगे यांचा जन्म
# 1902 कन्नड साहित्यिक डॉक्टर के शिवराम कारंथ यांचा जन्म
# 1906 इंग्रजी साहित्यिक आर के नारायण यांचा जन्म
# 1910 चीनमध्ये वैद्यकीय सेवा देणारे
डॉ द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म
# 1954 आचार्य अत्रेंच्या श्यामची आई चित्रपटाला
पहिले राष्ट्रपती पदक
# 2000 श्रीलंकेच्या माजी पंतप्रधान सिरीमावो बंदरनायके यांचा मृत्यू
##########################

@ 11 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌
# 1492 कोलंबसने बहामा बेटांचा शोध लावला # 1916 समाजसेवक भाजप नेते नानाजी देशमुख यांचा जन्म
# 1902 लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म
# 1968 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पंचत्वात विलीन
# 2001 व्ही एस नायपॉल यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार
##########################

👍 विशेष नोंद 👌
# नोबेल पारितोषक स्वीडन तर्फे दिले जाते
# डीएनए चा शोध फ्रीडरिश मिशर यांनी लावला
# इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटीचे मुख्य कार्यालय जिनिव्हा येथे आहे
# इन्फोसिस ची स्थापना 1981 साली झाली
# भारतीय विद्यापीठाचे संस्थापक डॉ पतंगराव कदम
#########################

@12 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌
# 1688 इराणचा बादशाह नादिरशहा चा जन्म
# 1911 क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचा जन्म
# 1921 लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक यांचा जन्म
# 1922 कवयित्री शांता शेळके यांचा जन्म
# 1946 क्रिकेटपटू अशोक मंकड यांचा जन्म
# 1961 अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचा जन्म
# 1967 स्वातंत्र्यसेनानी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा मृत्यू
# 1999 पाकिस्तानात लष्करी क्रांती व जनरल परवेज मुशर्रफ सत्ताधीश
# 1968 इक्विटोरियल 'गिनी' देश स्वतंत्र
# 1942 अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांचा जन्म
##########################

👍 विशेष नोंद 👌

# गोल्फ हा खेळ, सर्वप्रथम स्कॉटलंड येथे खेळला गेला
# जगातील सर्वात जुनी संसदीय लोकशाही ब्रिटनची
# नॉर्वेची राजधानी आँस्लो
# व्हायोलीनला चार तारा असतात
# इलेक्ट्रॉनचा शोध सर जे जे थॉमस यांनी लावला
##########################

@ 13 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌
# युनोचा नैसर्गिक आपत्ती निवारण निधी निवारण दिन
# 1833 नोबेल पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो त्या अल्फ्रेड नोबेलचा जन्म
# 1884 'GMT' ग्रिनीज जवळून जाणाऱ्या रेखांशाला शून्य मानून जगाची वेळ निश्चित केली गेली
# 1980 साहित्यिक पु भा भावे यांचे निधन
##########################

👍विशेष नोंद 👌
# जगात सर्वाधिक सोन्याची खरेदी व वापर भारतात होते
# राणी एलिझाबेथ 2 ह्यांच्या आधी किंग जॉर्ज सहावे हे ब्रिटनचे सम्राट होते
# टॉम अँड जेरी कार्टूनला 69 वर्षे झाली
# ग्रीस मध्ये द्राक्मा हे जलन होते.
##########################

@14 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌
# 1947 साहित्यसम्राट न चिं केळकर यांचा मृत्यू # 1953 कुटुंब नियोजनाचे पहिले प्रसारक रं धों कर्वे यांचा मृत्यू
# 1958 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लाखो अस्पृश्यांसह बौद्ध धर्मात प्रवेश
# 1993 उद्योगपती लालचंद हिराचंद यांचे निधन
# 1994 इतिहासकार सेतू माधव पगडींचे निधन 2004 भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडीचे निधन
# 1989 शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता व धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले
# 2005 महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक द्वा भ कर्णिक ह्यांचे निधन
##########################

👍 विशेष नोंद 👌
#' न्युझीलँड'ची राजधानी वेलिंग्टन
# युरोपच्या इतिहासात 1848 हे वर्ष क्रांतिकारी वर्ष म्हणतात
# झांबिया तांब्याचा देश, or ए कंट्री ऑफ पॉवर कॉपर म्हणून ओळखली जातो.
##########################

धन्यवाद
सुधाकर नातू

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०२२

 👍"दैनंदिन पाऊलखुणा-10 !":👌

 👍"दैनंदिन पाऊलखुणा-10 !":👌

"जुने ते सोने"म्हणतात ते काही खोटे नाही. माझ्या 2010 च्या डायरीमध्ये ज्या दररोज नोंदी मी घेतल्या, त्यांचा थोडक्यात परामर्श या लेखमालिकेत घेत आहे.

@ 6 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष👌
# 1893 शास्त्रज्ञ मेघनाथ सहा यांचा जन्म
# 1913 कविवार वा रा कांत यांचा जन्म
# 1949 पंडित नेहरूंच्या हस्ते खडकवासला येथे एनडीएचा पायाभरणी समारंभ
# 1963 आकाशवाणीच्या सांगली उपकेंद्राचे उद्घाटन
# 1979 म. म. दत्तो वामन पोतदार यांचा मृत्यू
# 2004 अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेट मध्ये
400 बळी घेतले
##########################

👍 विशेष नोंद 👌
# आतापर्यंत रसायनशास्त्रात भारतीयाला कोणतेही नोबल पारितोषक मिळालेले नाही
# पीओएस म्हणजे पॉईंट ऑफ सेल
# राष्ट्रकुल 2010 मध्ये 54 देश सामील आहेत
##########################

@ 7 ऑक्टोबर 💐

☺️ दिनविशेष 👌
# वन्य पशु दिन
# आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन

#1708 पठाणांच्या हल्ल्यात शिखांचे गुरु गोविंदसिंग ठार
# 1866 कवी केशवसुत तथा केशव कृष्णाजी दामले यांचा जन्म
# 1867 पुण्याच्या ससून हॉस्पिटलचे उद्घाटन
#1897 शास्त्रज्ञ मादाम क्युरी यांचा जन्म
# 1885 अणुअंतरंग स्पष्ट करणारे शास्त्रज्ञ नोबेल पारितोषक विजेते निल्स बोहर यांचा जन्म
#1914 गानसम्राज्ञी बेगम अख्तर यांचा जन्म
##########################

👍विशेष नोंद 👌
# रशियन राज्यक्रांती 1917 मध्ये झाली
# माऊंट एव्हरेस्ट सर करणारी भारतीय पहिली महिला बचेंद्री पॉल
# आग्रा येथील भारतातील पहिली मुघल गार्डन बाबराने बांधली
# अमेरिकेतील टोनी पुरस्कार रंगभूमीसाठी दिला जातो
##########################

@ 8 आँक्टोबर 💐

☺️ दिनविशेष 👌
# 1860 लॉस एंजलिस आणि सँनफ्रँस्निस्को दरम्यान पहिली टेलिफोन लाईन कार्यान्वित
# 1891 किर्लोस्कर मासिकांचे संपादक
शं वा किर्लोस्कर यांचा जन्म
#1922 नोबल पारितोषक विजेते डॉक्टर रामचंद्रन यांचा जन्म
#1931 साहित्यिक उद्धव ज शेळके यांचा जन्म
# 1931 भारतीय वायुसेना स्थापनेचा वायुसेना दिन # 1936 हिंदी साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांचे निधन # 1962 लोकमान्य टिळकांचे साप्ताहिक केसरी दैनिक झाले
#1991 सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड गोदावरीबाई परुळेकरांचे निधन
#1979 स्वातंत्र्यसेनानी आणीबाणीचे विरोधक जयप्रकाश नारायण यांचे निधन
# 1999 वीणा मासिकाचे संपादक उमाकांत ठोंबरे यांचा मृत्यू
##########################

@ 9 आँक्टोबर💐

☺️ दिनविशेष 👌
# 1876 ज्येष्ठ धर्मपंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म
# 1892 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचे निधन
# 1914 मराठी बालसाहित्याचे जनक विनायक एडक यांचे निधन
# 1955 विख्यात हार्मोनियम वादक गोविंदराव टेंबे यांचे निधन
# 1976 मुंबई लंडन थेट टेलिफोन सेवा सुरू
# 1987 आँपरैशन 'ब्लू स्टार' योजनाकार जनरल अरुणकुमार वैद्यांची हत्या
# 2009 अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांना
शांततेचे नोबल पारितोषक
##########################

👍विशेष नोंद 👌
# ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम चे लेखक स्टीफन हॉकिंग
# पक्षांशी संबंधित अभ्यास आँनिपोलाँजी
# "लोकांचे, लोकांनी चालवलेले आणि लोकांसाठीचे सरकार म्हणजे लोकशाही" ही व्याख्या अब्राहम लिंकन ह्यांची
##########################

धन्यवाद
सुधाकर नातू

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-९ !":👌

 👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-९ !":👌


"जुने ते सोने"म्हणतात ते काही खोटे नाही. माझ्या 2010 च्या डायरीमध्ये ज्या दररोज नोंदी मी घेतल्या, त्यांचा थोडक्यात परामर्श या लेखमालिकेत घेत आहे.

आता कालानुसार त्या त्या दिवसाची नोंद एकदा आणि नंतर फेब्रुवारी पासूनच्या दिवसांची नोंद, असा क्रम या लेखमालिकेमध्ये राहणार आहे. तेव्हा ही माहिती आपणास मनोरंजक व माहितीपूर्ण वाटेल अशी आशा आहे.

@ ८ फेब्रुवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌
#1897 माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर झाकीर हुसेन यांचा जन्म
# 1907 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालक गुळवलकर गुरुजींचा जन्म
# 1871 डॉक्टर के एम मुंशींचा जन्म
# 1981 कपिल देव ने 431 कसोटी क्रिकेटमध्ये बळी घेण्याचा विश्वविक्रम केला
##########################

👍"विशेष नोंद !":👌
# डीएनए म्हणजे डीऑक्सिरीबोन्यूलिक अँसिड
# ऑस्ट्रियाची भाषा जर्मन
# सर्वात प्रथम टीव्ही टेलिकास्ट केलेली बर्लिन मॅरेथॉन 8 फेब्रुवारी 1936
##########################

@ 9 फेब्रुवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌
# 1874 स्वातंत्र्यवीर कवी गोविंद यांचा जन्म
# 1897 मुंबई गिरणी संघाचे संस्थापक नारायण
# 1951 स्वतंत्र भारताची पहिली जनगणना
# 1979 अभिनेते दिग्दर्शक राजा परांजपे यांचे निधन
# 2009 तबलावादक झाकीर हुसेन यांना ग्रँमी पुरस्कार
##########################

👍"विशेष नोंद !":👌
# नियमित आहार एकपट खाणे, दुप्पट पाणी पिणे, तिप्पट चालणे, चौपट हसून आनंदी राहणे, शक्यतो शाकाहारी असणे, निर्व्यसनी राहणे, दुसऱ्यांचे भले करता आले नाही तरी, दुसऱ्यांचे निदान वाईट न चिंतणे, यामुळे माणसाला चांगले आरोग्य व शांती लाभते.
##########################

@ "10 फेब्रुवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌
# 1809 मुंबईचे आधुनिक शिल्पकार नाना शंकर शेठ यांचा जन्म
# 1910 लेखिका दुर्गा भागवत यांचा जन्म
# 1923 किरण संशोधक विल्यम रॉंटजेन यांचा मृत्यू
# 1926 बी ई एस टी च्या बसेस मुंबईत सुरू
# 1949 पुणे विद्यापीठाची स्थापना
# 1982 लेखक नरहर कुरुंदकर यांचा मृत्यू
# 2009 विख्यात गायक भीमसेन जोशींना भारतरत्न पुरस्कार जाहीर
##########################

👍"विशेष नोंद !":👌
# पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद
# पोलिओची लस विकसित करणारा संशोधक जोनास साल्के

# कार्बन-डाय-ऑक्साइड ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन दर माणशी ( दशलक्ष टन):
चीन 4.58 अमेरिका 19.78 रशिया
भारत 1.16 जपान 9.78 जर्मनी 10.40
कॅनडा 18.81 दक्षिण कोरिया 10.53 इंग्लंड 9.66

# वर्ष 1800 मध्ये जगाची लोकसंख्या 100 कोटी
1930 मध्ये 200 कोटी
1960 मध्ये 300 कोटी
1999 मध्ये 400 कोटी
आता 2010 मध्ये 600 कोटी
##########################

@11 फेब्रुवारी 💐

☺️ 'दिनविशेष":👌

# 1800 छायाचित्र निगेटिव्ह चा प्रथम वापर करणारे हेन्री तालबोट यांचा जन्म
# 1847 संशोधकांचा मुकुटमणी थॉमस एडिसन चा जन्म
# 1942 उद्योगपती जमनालाल बजाज यांचे निधन
# 1850 मराठी शुद्धलेखन चळवळीचे पुरस्कर्ते शंकर हातवळणे यांचा जन्म
##########################

👍"विशेष नोंद !":👌
# भारतातील पहिला बोलपट अलामारा 1931 मध्ये प्रसिद्ध प्रकाशित
# श्रीलंकेचा राष्ट्रीय प्राणी: सिंह
# मोबाईलचा उपयोग नुसता टेलिफोन करणे, एस एम एस पाठविणे एवढाच नाही, तर इंटरनेट सेवा कॅमेरा म्हणून फोटो काढून पाठविणे, रोज संस्मरणीय नोंदीचे फोटो एसएमएस द्वारे पाठविणे, दररोजच्या घडामोडी तासा तासाच्या त्या तारखेला ठेवणे, आरोग्य विषयक बीपी शुगर पी आर नोंदी तारीखवार ठेवणे इत्यादी इत्यादी
थोडक्यात ही चिमुकली डबी म्हणजे अनेक सुविधांचा, सेवांचा खजिनाच आहे !
##########################

धन्यवाद
सुधाकर नातू