शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

☺️।।आनंद घ्या, आनंद द्या।।😊 ☺️"विमुक्ताफळे !":😊

 👍👍👍👍💐💐

👍"रंगांची दुनिया":👌

☺️।।आनंद घ्या, आनंद द्या।।😊

☺️"विमुक्ताफळे !":😊

👍दारुण अपयशासारखेच अतोनात यश पचवणे कठीण असते. अहंकार, मग्रुरी आणि गर्व ह्यांचा कैफ डोक्यात भिनून पहाता मिळवलेले सारे गमावते.

👍सातत्याने आपला दिनक्रम, काग्रता ठेवून वेळेवर पाळला, की तो आपल्या नैसर्गिक बाँडी क्लाँकबरोबर जुळतो. आपले आरोग्य त्यामुळे सुधारते.

👍टीका करणे ही देखील उपयुक्त निर्मितीच नव्हे कां? कारण टीका करताना साधक बाधक दोन्हीचा विचार करून वास्तवतेचे पारदर्शी चित्र उभे केले जाते. जशी गरज, ही शोधाची अर्थात नवनिर्मितीची जननी, त्याचप्रमाणे टीका ही प्रगतीच्या बदलाची जननी असते. टीका खुल्या दिलाने स्विकारणारेच सुधारणेचे नवनवे मार्ग खुले करू शकतात. दुर्दैवाने टीका पचविणारे दुर्मिळ असतात. म्हणूनच जैसे थे अथवा पिछेहाट अपरिहार्य असते. उगाच नाही, संत तुकाराम म्हणतात "निंदकाचे घर असावे शेजारी"!

👍आश्वासित निर्मिती जर झाली नाही 

तर टीका होणे अपरिहार्य नव्हे कां? अशक्य आश्वासने देणे सोपं असते पण त्यांची पूर्तता करणे कठीण असते!

आणि....

अखेरीस.....

👍सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकणारे पुष्कळसे अनिष्टच घडत असल्याने त्यावरील प्रतिसाद हा टीकात्मक भासणे, सहाजिकच! त्या अनुषंगाने कुठल्या कुठल्या चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या समजल्या तर आनंदच होईल.

धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा