मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

☺️"दैनंदिनीतील पाऊलखुणा ३ !":😊

 ☺️"दैनंदिनीतील पाऊलखुणा ३ !":😊


@ 16 जानेवारी
-------------------
💐दिनविशेष:
1901 न्यायमूर्ती महादेव रानडे यांचे निधन
1920 घटना तज्ञ नाणी पालखीवालांचा जन्म 1954 चित्रपट निर्माते बाबुराव पेंटर यांचा मृत्यू

👍विशेष नोंद:
-----------------
कालपासून आज दीड दिवसात "तें दिवस" हे विजय तेंडुलकरांचे आत्मवृत्तात्मक पुस्तक वाचून संपवले. गरिबी, आई-वडिलांना आपल्या वागण्यापायी दिलेला मनस्ताप, शाळा बुडवून चित्रपट पाहणे व अखेर शाळा अर्धवट सोडून देऊन, घरीच काहीही न करता, "खायला कहार भूईला होईल भार" अशा स्थितीतले तारुण्य तेंडुलकरांनी अनुभवले. हा असा तरुण पुढे इतका मोठा प्रतिभावान लेखक होईल, असे कुणालाच वाटले नसेल.

जीवनाची पहिली दोन दशके अशी दिशाहीन
कष्टदायी जशी गेली, तसेच शेवटचे दशक कौटुंबिक संकटांमुळे- मुलगा, मुलगी व पत्नीचा वियोग यामुळे अत्यंत क्लेशकारक गेले. एक वादळी आयुष्य जगणाऱ्या, या संवेदनक्षम माणसाचे जीवन खरोखर चित्तथरारकच होय. मानवी जीवन कल्पनेपेक्षाही अद्भुत असते हेच ह्या पुस्तकाच्या वाचनाने समजले.
###########################

@17 जानेवारी
------------------
💐दिनविशेष
1706 बेंजामिन फ्रँकलिनचा जन्म
1906 कुटुंब नियोजन पुरस्कर्त्या शकुंतला परांजपे यांचा जन्म
2000 गायब सुरेश हळदणकर यांचे निधन
###########################

@18 जानेवारी
------------------
💐दिनविशेष
1842 न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म
1889 नाट्यछताकार दिवाकर उर्फ शंकर गर्गे यांचा जन्म
1895 रविकिरण मंडळातील कवी वि द घाटेंचा जन्म
1944 भारतीय ज्ञानपीठाची स्थापना
1947 गायक नट कुंदनलाल सैगल यांचा मृत्यू 1971 बॅरिस्टर नाथ पैंचे निधन
1983 बँक ऑफ महाराष्ट्राच्या स्थापनेचे प्रेरक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक आ रा भट यांचे निधन
2003 कवी श्रेष्ठ हरिवंश राय बच्चन यांचे निधन
##########################

@ 19 जानेवारी
-------------------
💐दिनविशेष
1736 वाफेच्या इंजिनचा जनक जेम्स वॅटचा जन्म 1892 विनोदी लेखक चिं वि जोशींचा जन्म
1910 चित्रपट निर्माते मास्टर विनायक यांचा जन्म 1886 गायक सवाई गंधर्वांचा जन्म
1949 पुणे महानगरपालिकेची स्थापना
1970 तारापूर अणुवीज केंद्राचे उद्घाटन
1990 आचार्य रजनीश उर्फ ओशो यांचे निधन

👍विशेष नोंद
-----------------
👍एका अनुभवः दोन पॅन्टचे फाटलेले सर्वच खिसे दुरुस्तीला टाकले, 210 रुपये सात खिशांसाठी खर्च. एका नवीन पॅन्टचा कापड, शिलाईचा खर्च जमेस धरता, हा खर्च किंवा फी खूपच नगण्य. कारण केवळ 210 रुपये घालून दोन नवीन पॅन्ट्स पुन्हा वापरण्यालायक होऊ शकतात.
खिसे नीट करण्यासाठी पॅंट प्रथम उसवावी लागते व नंतर खिसा शिवावा लागतो, हे समजता हा खर्च योग्यच.
👍वर्तमानातला क्षणच मानवाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा. जे काम कार्य हाती घेतले आहे, ते निष्ठेने सर्वस्व ओतून करत राहणे, म्हणजेच वर्तमानात क्षण जगणे होय. झेन गुरुची "दोन किलो वादळ म्हणजे जीवन" रूपककथा याचं तत्वाचे रहस्य समजावून सांगणारी,डॉ उल्हास कोल्हटकर यांचा हा लेख वाचून ते उमजले.
👍कोणतेही काम करताना, त्याबद्दलची नीट माहिती गरजा व करावी लागणारी कृती यापैकी कशातही त्रुटी राहता कामा नये. न पेक्षा ते काम अर्धवटच राहते.
##########################

संग्राहकः सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा