☺️"मुक्तसंवाद-विचारांचे अम्रुतमंथन !":😊
#👍"कोड़े: कधीही न सुटणारे !":😢
-----------------------
"माणूस मरतो, तेव्हाच कां मरतो? कुणी जन्मत:च, तर कुणी बालपणी वा कुणी एेन तारूण्यात, तर काही प्रौढपणी, तर काही वृद्धापकाली हे जग सोडून जातात. प्रत्येकाचे मरतेवेळी वय भिन्न असते, असे कां?
आगगाडीतील प्रवास करताना, जसा जो तो आपले स्थानक आले की उतरून जातो, तसाच हा सारा प्रकार असतो ! पण आपले 'तिकीट कुठपर्यंतचे आहे, ते कुणालाच माहीत नसते. आयुष्य हे क्षणभंगूर आहे हयाची जाणीव, कुणी मरण पावल्याची बातमी कानी येते, तेंव्हाच होते.
हया जगांत प्रत्येकाचे काही विशिष्ट प्रयोजन असावे, तेव्हढे झाले की, त्याला 'राम' म्हणावा लागतो ! पुष्कल वेळी सारीच कामे वा आकांक्षा पूर्ण न करता, माणसाला येथून निरोप घ्यावाही लागतो. थोडक्यात, जीवन आणि मरण हे
कधीही न सुटणारे कोडे आहे ! "💐
#👍"उत्सव म्हणजे उन्माद नव्हे !":👌
☺️"संस्कृतीचा अर्थ संमजस, सुसंस्कृत समाज निर्माण होण्यासाठी केलेली संघटीत संयमी कृती होय. हा मूळ गाभा आणि प्रयोजन आनंदाने वेचण्यासाठी सणांची योजना केली गेली. हे सारे दुर्लक्षून, बेताल तंत्राने, ईषॅेने स्पर्धा करत, कर्णकर्कष्य संगीतासह, ऊन्मादाने नाचगाण्यात बेभान होणे, कोणत्याहीही सणाचा हेतू असूच शकत नाही. अशा वेळी आपण होवून आवश्यक बंधने न पालणे, हे संस्कृतीचे रक्षण कसे बरे मानता येईल?
उत्साहाचा जेंंव्हा अतिरेक होतो, तेंव्हा उन्माद निर्माण होतो आणि त्याचाच परिणाम प्रमादांत होवून नुक़सान होते, ह्याचे भान नेहमी ठेवायलाच हवे !"😊
#👍👍
दाद देण्यासाठी जशी नीरक्षीर विवेकबुद्धी गरजेची तसाच दिलदारपणाही हवाच हवा. त्यातून योग्य त्या व्यक्तीला अनुरुप योगदानासाठी दाद देण्यासाठी सूक्ष्म काकद्रुष्टीही आवश्यक.
सध्याच्या मनस्वी, वेगवान स्पर्धेच्या माहोलांत अहम् भावाला कमालीचे प्राधान्य असताना अशी अचूक "दाद(दा)गिरी जवळजवळ दुर्मिळच!👌👌
#👍"जादू"?":😊
-------
काही दिवसांपूर्वी, एक संदेश येथे वाचायला मिळाला, हा माणूस लिहीतो:
'मी कधीही छोटया पडद्यावरच्या मालिकाच बघत नाही, परवा,थोडया वेळासाठी केवळ अर्धा एपिसोड कसाबसा पाहिला आणि टीवी बंद केला'
हे वाचून मी मात्र, अक्षरश: आश्चर्यचकीत झालो, कारण हया मालिकाच, माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांचा दररोजचा अत्यावश्यक असा खुराक आहेत. सायंकाली ७ ते १० जणु रात्रपाळी असल्यासारखा मी टीवी समोर मालिकाच पहा़त असतो. मालिकांचा आणि माझा संबंध 'तुंझे माझे जमेना आंणि तुझ्यावाचून करमेना' असा आहे!
व्यसनी माणसाला उमजत असते की, आपण जे करतो, ते योग्य नाही, हानिकारक आहे, पण तो जसा तरीही व्यसन काही केल्या सोडू शकत नाही, तसेच माझे मालिका पहाण्याच हे वेड मला सोडता येत नाही !
' कॅथार्सिस' मध्ये जसा वेदनेतून आनंद मिळतो, तसाच काही तरी अनुभव मला मालिका पहाताना होतो. मालिका उगाचच लांबलचक केल्या जातात, त्यात 'पाणी' घातले जाते, त्यातील पुष्कळ गोष्टी निरर्थक असतात::::वगैरे वगैरे. तरीही माझ्यासारखे अनेक दुषणे लावत, लावत न चुकता परत मालिका पहातच रहातात. कुठे तो मालिकाच न बघणारा वरील संदेश पाठवणारा किंवा घरी बिलकुल टीवीच न घेणारा आमचा एक दोस्त आणि कुठे रोज़ रोज़ रतीब घातल्यासारखा मालिका पहाणारा मी ! असा वेळ वाया घालवण्यापेक्षा तोच वेळ, दुसर्या एखाद्या विधायक कामात घालवावा, हे पटूनही, काही केल्या वळत नाही, ही माझी खंत आहे ! कोणी सागेल कां हया ईडीयट बाॅक्समधे अशी कोणती जादू आहे?"
👍ह्या अनमोल अनुभवातून मी अंतर्मुख होऊन पुढील नवा मार्ग आता अवलंबत आहे:
😊"Making Day, more meaningful":👌
"For me, everyday, a particular time is now very precious because, instead of wasting it on seeing meaninglessly dragged serials, I use it for purposeful reading and introspection. That's how my Treasure Book, came about.
I Hope you too,
would follow this option !"👌
# 👍"एक सच्चा रयतसेवक !":👌
'अंतर्नाद'आॅगस्ट'१६ मधील 'एक सच्चा रयतसेवक' हा कै.कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्यावरील हृदयस्पर्शी लेख वाचून मन भरून आले. त्यातील त्यांनी घेतलेलया दोन शपथांची आठवण, ह्या पहाडाएवढ़या अद्भुत माणसाचे थोरपण दाखवून गेली.
पहिली शपथ, महात्मा गांधीजींपासून प्रेरणा घेऊन जीवनभर, उंची कपड्यांचा त्याग व अनवाणी चालण्याची शपथ आणि दुसरी, एका ग़रीब, अगतिक महिलेच्या तळतलाटामुळे,जीवनभर बाहेर कधीही दूध न मागण़याची शपथ ! हयातभर, हया महान कर्मवीराने शिक्षणाची गंगा तळागाळापयँत पोहोचावी, ह्या हेतूने रयत शिक्षण संस्थेचा सर्वदूरवरचा पसारा ज़िद्दीने उभा केला. कुठे त्या वेळचे समर्पित भावनेने शिकविणारे शिक्षक व साधे सरलमार्गी विद्यार्थी आणि कुठे आताचा शिक्षणसम्राटांचा विद्यादानाचा बाजार !
जाता जाता, मला अचानक आठवले-ह्याच सच्च्या रयतसेवका़च्या नांवे दिला जाणारा शैक्षणिक विभागांतील सर्वोत्तम पुस्तकाचा माझ्या एकमेव पुस्तकाला-'प्रगतिची क्षितीजे'ला मिळालेला, काही वर्षांपूवीॅचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार !
ह्या लेखामुळे माझेही काही ऋणानुबंध, वंदनीय कर्मवीरांशी जोडले गेल्याचे समाधान मला मिळाले.
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा