शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

# 👍 "ईये मराठीचिये नगरी !":💐🎂#

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":
"रसिकमनांची रसिली यात्रा.....💐

👍"ईये मराठीचिये नगरी !"💐

"शारदोत्सव !":
आज मराठी राजभाषा दिन त्याच प्रमाणे ज्ञानपीठ विजेते कविराज कुसुमाग्रज यांचा जन्मदिन या निमित्ताने मी सोशल मीडिया वर संदेश पाठवला तो असा:

👍"शाश्वत सत्य?!"👌😢:
मराठीबद्दल प्रेम केवळ मराठीभाषादिनीच दरवर्षी २७ फेब्रुवारीलाच फक्त कां येते, आणि नंतर त्याचे काय होते, याचा विचार करायलाच हवा.

👍😢 यानंतर मराठी भाषेची सध्या काय अवस्था आहे आणि आपण कुणाशीही बोलताना मराठीत न बोलता बहुधा हिंदीतून अथवा इंग्रजीतून कसे बोलतो याचा एक विदारक अनुभव व्हिडीओ मधून मर्म स्पर्शी आवेगाने सादर केला होता तो व्हिडिओ पहायला मिळाला त्या व्हिडिओची लिंक अशी:

"ईये मराठीचिये नगरी !":

https://drive.google.com/file/d/1oJPoDQv2y3yBYj2QlTcsi91hycx_RAWb/view?usp=drivesdk

"अशीच जर शाश्वत परिस्थिती मराठी भाषेची असेल, तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकेल कां, ह्माचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करायला हवा !👌😢

यानंतर की गंमतच झाली ! सोशल मीडियावर मला हा एक संदेश माझ्या मित्राने पाठवला. तोही विचार करावा असाच आहेः

"😀 👍 छोटीशी पण बरेच काही शिकवून जाणारी एक घटना. मी एकदा तेहरानमधे , इराणला गेलो असताना आमच्या कंपनीच्या प्रतिनिधीच्या आॅफिसमधे बसलो होतो. तेव्हढ्यात तिथला एक जण मला येऊन म्हणाला की त्यांच्या पँट्री मधला एक माणुस मला भेटु इच्छितो कारण तो पूर्वी अनेक वर्ष मुंबईत होता. थोड्या वेळाने तो मला भेटायला आला आणि त्याने हिंदीत बोलायला सुरवात केली. सर्व इराण्यांना त्याचे खुप कौतुक वाटले. मी त्याला हिंदीतच तो कुठे काम करत होता ते विचारले. तो म्हणाला, दादर पोर्तुगीज चर्च. त्यावर माझ्या तोंडून सहज मराठीत प्रतिक्रिया आली " म्हणजे तुम्ही कॉरोनेशन बेकरी आणि स्टोअरमधे तर नव्हते? ". आणि काय आश्चर्य तो चक्क मराठीत बोलु लागला. इराण्यांनी तर टाळ्या वाजवल्या. त्या कंपनीचा मालक देखिल त्यात सामील झाला. 👍🏽👍🏽!"

योगायोग असा की आजच मराठी राजभाषा दिनी आणि कुसुमाग्रजांच्या वाढदिवसाला त्यांच्यावरील "प्रतिभा आणि प्रतिमा" हा दूरदर्शन सह्याद्री वरील कार्यक्रम पाहण्याचा योग आला. त्या अप्रतिम संस्मरणीय कार्यक्रमाची ही लिंक उघडून तो पाहावा:

https://youtu.be/A3SGATdP1Tg

मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळण्यासाठी आपणा सर्वांना आहे हे पुष्कळ प्रयत्न करावे लागणार आहेत आणि मराठी भाषेला ज्ञानभाषा बनविण्यासाठी त्याचे शब्द भांडार अधिकाधिक विस्तारित कसे होत जाईल याचाही गांभीर्याने विचार करायला हवा एवढेच म्हणावे लागते.

लेख आवडला, तर तो जरुर शेअर करावा

धन्यवाद
सुधाकर नातू

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

# 👍"टेलिरंजन !":👌 👍"वाहता वाहे, 'मालिका'माई"!:💐

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":
"रसिकमनांची रसिली यात्रा.....💐
आज शुक्रवार. टेलिरंजन विषयक हा खुसखुशीत लेख सादर करत आहे.

💐"टेलिरंजन !":👌
👍"वाहता वाहे, 'मालिका'माई"!:💐

# 😢 "तुझं माझं जमेना !":😢
मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्रेन्डस् येत असतात. अलीकडच्या काळात जोडीदारांपैकी एकाला त्याच्या मनाविरुद्ध विवाह करायला लागल्यामुळे नाराजी आणि अर्थातच जोडीदारांमध्ये शत्रुत्व अथवा एकाच पुरुषाच्या दोन बायका असे ट्रेन्ड्स आपण पहात आलो. उदाहरण म्हणजे, 'जीव माझा गुंतला' मधील अशाच मनाविरुद्ध विवाहामुळे मल्हार आणि रिक्षावाली अंतरा या जोडप्यांमधील शत्रुत्व. दुसरे उदाहरण सन मराठीवरील "सुंदरी" मालिकेचं. मनाविरुद्ध आई-वडिलांच्या दबावामुळे व मेव्हण्याच्या आग्रहामुळे त्याला न आवडणाऱ्या खेडूत सुंदरीशी आदित्य विवाह करतो व नंतर तोच दुसरीकडे सुरेख आणि सुस्थितीत असलेल्या शहरी 'अनु'वर मनापासून प्रेम व गुपचूप लग्न करतो हे !

#👍 "अशी, ही लपवाछपवी !" :💐
आता एक वेगळीच बाजू मला त्या मालिकांमधून लक्षात आली आहे. ती म्हणजे आपल्याजवळ असलेली महत्त्वाची माहिती, योग्य त्या व्यक्तीपाशी न बोलता, मुद्दाम दडवून ठेवणे. अशी लपवाछपवी माहितीची आणि त्यामधून गैरसमज वितुष्ट किंवा असेच काही नको ते, नाट्यमय प्रसंग, असा हा ट्रेण्ड आहे असं मला वाटतं.

उदाहरण घ्यायचं झालं तर झीमराठीवरील "मन उडू उडू उडू जालं" या मालिकेचं घेता येईल. कर्तव्यदक्ष परंपरा पाळणाऱ्या प्रामाणिक देशपांडे सरांच्या तिन्ही मुली, आपल्या आई-वडिलांपासून काही ना काहीतरी माहिती दडवून ठेवतात, लपवून ठेवतात. त्याच प्रमाणे आपल्या आईबद्दल तिने चोरी केली आहे, हे लक्षात येऊनही दीपू वडिलांना ते सांगत नसते. त्यामुळे निर्माण होणारे घोळ पेचप्रसंग ताणतणाव. मोठी मुलगी दिदी हिला तर नयन व त्याच्या आई-वडिलांनी भयानक फसवलेले आहे आणि तिथेचे हाल हाल चालू आहेत. ते ती कोणाजवळ बोलत नाही, लपवून ठेवते.

मधली मुलगी, ताई तर कशी बनेल, आपले प्रेम दडवून ठेवते, पळून जाते, नंतर परत येते तेव्हा तिचा विवाह झालेला आहे, हे ती, तिचा नवरा कार्तिक आणि मोठा दीर 'इंद्रा'सुद्धा लपवून ठेवतात. म्हणूंन "अशी, ही लपवाछपवी !" असं नाव या मालिकेला द्यायला हरकत नाही.

दीपूची कमाल तशीच. ती प्रथम ताईचे प्रेम वडिलांपासून दडवते, नंतर आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो गुंड इंद्रा आहे व बाबा समजतात तसा हुशार सरळमार्गी आदर्श मुलगा नाही, हे लपवून ठेवते. तसेच ती देशपांडे सरांची मुलगी आहे हे 'इंद्रा'जी पासून लपवते. एवढेच नाही तर, 'इंद्रा'जीच्या मित्राला 'सत्तू'ला शपथ घालून ही गोष्ट 'इंद्रा'जीला न कळवण्याची शपथच घालते ! म्हणजे "लपवाछपवी" चे इथे किती प्रयोग या मालिकेमध्ये आपल्याला आढळून आले !

दुसरे उदाहरण: सुंदरीशी एक विवाह करून आदित्य दुसरीकडे सुरेख आणि सुस्थितीत असलेल्या शहरी अनुशी लग्न करतो, हे आई-वडिलांपासून लपवलेलं तसंच आपली बायको सुंदरीपासूनही लपवलेलं ! त्यामध्ये त्याचा मित्र कृष्णा हाही त्याला साथ देतो. म्हणजे लपवाछपवी आणि त्यातून निर्माण होणारे नाट्य या मालिकेतही आढळते.

# 😊 "विसंगत वागणे":☺️
मराठी मालिकांमध्ये बहुदा पात्रं कधीही तर्कसंगत वागत नाहीत. सर्वसाधारण प्रसंगांमध्ये माणूस जो विचार करेल आणि जी कृती करेल असे अपेक्षित असेल, त्याच्या बरोबर उलट बहुतेकवेळा, निदान एक तरी पात्र उरफाटे वागताना दिसते आणि दुर्दैवाने ते महत्त्वाचे पात्र असते, ज्यामुळे कथानक पुढे पुढे जाऊ शकते.

# 💐"एंट्री नवीन पात्राची":💐
दुसरे निरीक्षण असे की, ज्या वेळेला एखादी मालिका आता पुढे काय करायचं काय दाखवायचं, हे न समजण्याइतकी रटाळ होते, तेव्हा एखादं नवीनच पात्र त्यात प्रवेश करते आणि कथानकाला वेडीवाकडी वळणे देत मालिका सुरू ठेवली जाऊन प्रेक्षकांचा अंत पाहिला जातो.

येनकेनप्रकारेण मालिकेचा खेळ अव्याहत चालू रहावा याकरता काही ना काही खूप या ही मंडळी करत असतात आणि आपल्याला ते अशी लपवाछपवी का करतात असा प्रश्न तर निर्माण होतोच पण हे वागणं बरं नव्हं असही ही मालिका पाहताना वाटतं आणि पात्रांचा रागही येतो

# 👌 "तोच तो खेळ, पुन्हा पुन्हा !": 💐
अजून एक दुसरा ट्रेन्ड किंवा ट्रिक मालिकांमध्ये असते ती म्हणजे प्रणय युगुलाची पूर्वीची दृश्येच पुन्हा पुन्हा प्रसंगी दाखवत राहणे. त्यातील एखादे पात्र विचारमग्न आहे आणि जुन्या आठवणी त्याला काढावयाच्या वाटतात आणि ते उमाळे उसासे, जुन्या दृश्यांच्या मार्यामधून दाखवले जातात. "मन उडू झालं" मधलं दीपू आणि इंद्राजी यांचे प्रणयाचे, जोडीचे खेळ किंवा "स्वाभिमान" मध्ये शांतनु आणि पल्लवी यांची जवळीक. वेळ काढूपणा आणि नवीन दृश्यांसाठी वेळ व श्रम वाचवणे, एपिसोड कसाही करून भरून काढणे, हा हेतू त्यामागे असावा. पण त्यापायी प्रेक्षकांचा संताप होतो, त्याचं कुणालाच काही नाही. जुने दृष्ये, जरूर कधीमधी अपवादाने जरूर दाखवावी, पण त्यामध्ये असे नको इतके सातत्य नसावे.

#👍 "जुन्या लोकप्रिय मालिका";💐
मराठी मालिका खूप लोकप्रिय होत्या. त्यांचा आढावा घ्यावा असे मनात आले आणि त्यावरून मी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अर्थात गुगल वरून काही मालिकांचा उपयुक्त घोषवारा गोळा केला. चोखंदळ रसिकांसाठी, मालिकेचे नांव, ती केव्हा सुरू झाली, आणि एकूण एपिसोड्स या क्रमाने ही मनोरंजक माहिती पुढे देत आहे:

अस्मिता पाच फेब्रुवारी14 468
अनुबंध 31 ऑगस्ट 2009 267
तुझ्यात जीव रंगला 1262
माझ्या नवऱ्याची बायको 1354
होम मिनिस्टर 1 सप्टेंबर 1999 सतरा वर्ष झाली. चार दिवस सासूचे नोवेंबर2001 3177 आभाळमाया 16 ऑगस्ट 1999 1182
अवघाची संसार 22 मे 2006 1169
असंभव 12 फेब्रुवारी 2007 774
एका लग्नाची दुसरी गोष्ट 16 जानेवारी 2012 ?
एका लग्नाची तिसरी गोष्ट 14ऑक्टोबर13 271 अरुंधती 10 नोव्हेंबर 11 162
उंच माझा झोका 5 मार्च 2012 432

धन्यवाद
सुधाकर नातू

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

# 👍""शारदोत्सव !":👌 💐"फुले वेचिता, गवसले मोती !":💐

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":

"रसिकमनांची रसिली यात्रा.....💐

👍"शारदोत्सव !":👌

💐"फुले वेचिता, गवसले मोती !":💐

👍💐 "गीत, संगीतबहार !":👌💐

"कोणतेही गीत विलक्षण लोकप्रिय श्रवणीय आणि जनमान्य होते, तेव्हा त्याचे श्रेय गीतकार, संगीतकार, गायक व गायिका यापैकी कोणाला प्रामुख्याने द्यायला हवे, हा प्रश्न महत्वाचा आहे यात वाद नाही. परंतु जरा सखोल विचार केला तर ध्यानात येईल की, गीत जेव्हा नुसते शब्दबद्ध कागदावर असते, तेव्हा ते उमजणे, समजणे आणि त्यामुळे लोकप्रिय जनमान्य होणे कठीण असते. सहाजिकच त्या शब्दांना जेव्हा संगीतकार योग्य ते सूर, स्वर, लय आणि ताल देऊन संगीतमय करतो, तेव्हाच value addition मुळे, या गीताचे महत्त्व वाढते आणि त्यामुळेच गीतकारापेक्षा, संगीतकार हा या बाबतीत तरी वरचढ मानायला हरकत नसावी. 

हाच तर्काचा मुद्दा तसाच पुढे नेऊन आपण विचार केला, तर संगीतकाराने जे सूर बांधले आहेत ते प्रत्यक्ष श्रोत्यांपर्यंत, आपल्या मधुर गळ्याने पोहचवणारे गायक आणि गायिका हे यामध्ये अजून अधिक असे value addition रुपी योगदान देतात, ते ह्यामुळेच विलक्षण लोकप्रिय होते असं मानायला वाव आहे. म्हणूनच मला असं वाटतं की, श्रेयामध्ये क्रमवारी लावायची झाली, तर पहिला गायक-गायिका, दुसरा संगीतकार आणि शेवटी गीतकार. तोच ह्या निर्मितीचा, मुळात जनक असल्याने, हा अर्थातच हा मुद्दा वादाचा ठरू शकतो. परंतु, "पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने !" यादृष्टीने याकडे बघावे लागेल.

-----------------------------

👍💐"बंध अनुबंध !":👌💐

"माणसामाणसांमधील संबंध हे चांगले राखणे कठीण असते. परस्पर नाती गोडी गुलाबीची जेव्हा असतात, तेव्हा सारे कसे आलबेल आहे असेच वातावरण असते. परंतु निसर्गनियमाप्रमाणे कोणतीही गोष्ट स्थिर नसते, बदलत असते. त्याप्रमाणे आज ज्यांचे गुळपीठ आहे, खडीसारखे पाण्यात एकमेकात विरघळलेले आहे, तेच उद्या एकमेकांचे वाभाडे काढत असताना आपल्याला घरादारात, व्यवहारात एवढंच काय, राजकारणातही पाहायला मिळते."

----------------------------

👍💐"घडविते हात !":👌💐

"महाराष्ट्र टाईम्स मधील 'मुंबईचे षड्दर्शन' या सदरामध्ये विविध क्षेत्रातील असामान्य अशा सेवाव्रतींचे चरित्र आणि समाजाच्या प्रति हितकारक असे योगदान यांचा धावता आढावा नेहमी वाचनीय असतो. त्याचप्रमाणे प्रेरणादायी असतो. अशी थोर माणसे शेवटी समाजाला आकार देत असतात आणि त्या त्या शहराचा असा चेहरा बनवत असतात. मुंबई आणि सभोवती यामधील इतिहासाच्या वेगवेगळ्या अशा पाऊलखुणा ह्या स्तुत्य प्रयत्नाला म्हणायला हवे. हे अचंबित करणारे शब्दचित्रमय दर्शन या सदरातून मी नेहमी वाचतो, जसा आनंद मिळतो, तद्वतच काही तरी आपणही चांगले करावे, आपल्याकडून निदान इतरांना नवीन विचार, नवी द्रुष्टी देता यावी, अशी उर्मी त्यामधून निर्माण होते. याकरिता साहाजिकच म टा टीमचा मी ऋणी राहीन."

----------------------------

👍💐"गृहिणींना शतशः सलाम !":👌💐

दररोज घरात वावरणारी गृहिणी एकापाठोपाठ एक अशी आपली कामे कशी पटापट निगुतीने आणि निमूटपणे पार पाडत असते, हे आतापर्यंत कधी माझ्या लक्षातच आले नव्हते. परंतु कोरोना महामारीच्या काळात अशीच घरातली काही निवडक कामे माझ्या अंगावर आल्यामुळे, विशेषतः पाणी भरणे वगैरे, तेव्हा हे मला लक्षात आले की, आपल्यासमोर आपोआपच पुढचे पुढचे काम पुढे उभे राहते आणि ते केल्याशिवाय आपल्याला करमत नाही.

ही भावना माझ्या मनात आल्याबरोबर मला कळून चुकले की, गृहिणीही कशी मन लावून सकाळपासून रात्रीपर्यंत, समोरचे एक एक काम करून पुढच्या कामांकडे वळते, खरंच एक प्रकारची लयबद्धता त्यामध्ये आपोआप येते.

मॅनेजमेंट क्लास मधील खूप वर्षांपूर्वी प्रोफेसरने सांगितलेले एक महत्वाचे वाक्य त्या क्षणी, मला आठवले. त्यांनी म्हटले होते:

"द हाऊस वाइफ इस द बेस्ट अँड द मोस्ट ईफीशिअंट मटेरियल्स मॅनेजर इन द वर्ल्ड !"

सकाळपासून रात्री झोपेपर्यंत घरासाठी ती झटत असताना, कुठलं काम केव्हा करायचं, कोणत्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत, काय काय संपलेलं आहे, वगैरे वगैरेंची नोंद ठेवून आपोआपच कधीही काहीही कमतरता भासणार नाही, अशा तऱ्हेने संपूर्ण व्यवस्था सांभाळून घर कायम समाधानी आणि आनंदी ठेवत असते. हे सारं करताना ना तिला कुठला कॉम्प्युटर लागतो, ना कुठली नोंदवही. सारे डोक्यात ठेवत, आपली जबाबदारी अचूकपणे अव्याहत आनंदाने ती पार पाडत असते. Thanks & Hats off to her.

थोडक्यात काय तर आपण समोर जे घडत असते, त्याकडे इतक्या डोळसपणे, तोपर्यंत कधी बघत नाही, जोपर्यंत आपल्याला स्वतःला तसा अनुभव येत नाहीं !"

----------------------------

धन्यवाद

सुधाकर नातू

👍"टेलिरंजन-"ऐका हो ऐका..... 'इडियट बॉक्स'वरील पुनर्जन्मांची कहाणी !":💐

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":
"रसिकमनांची रसिली यात्रा.....💐
💐"टेलिरंजन !":👌

👍"ऐका हो ऐका.....
'इडियट बॉक्स'वरील पुनर्जन्मांची कहाणी !":💐

👍"प्रारंभी एक प्रामाणिक सूचना !"
जसे अभ्यासू पुस्तकातले किडे असतात तसंच छोट्या पडद्याला चिकटून डोळे वटारुन टीव्ही मालिका बघणारे मालिकाप्रेमी असतात, त्या मालिकाप्रेमींना हा खास खुसखुशीत लेख अर्पण !👌

👍"अशीही, 'बनवा-बनवी' की अंताक्षरी !"💐

💐पुनर्जन्मावर तुमचा वा आमचा विश्वास असो वा नसो, पण मालिकांमधले कलाकार मात्र या मालिकेतून त्या मालिकेत असे सारखे पुनर्जन्म घेत असलेले दिसतात. आता हेच बघा ना "चंद्र आहे साक्षीला" मालिकेमधली विसरभोळी कदाचित स्मृतिभ्रंश झालेली विधवा आई, "अजूनी बरसात आहे" मध्ये डॉक्टर पाठकांची, कुटूंबवत्सल सुलक्षणा पत्नी, आता तर "कन्यादान" मधली सूनेला-ओवीला छळ छळ छळणारी विधवा आशालता देखील तीच ! "चंद्र आहे साक्षीला" मधला मूल व्हावं, म्हणून गरीब बिचाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवणारा बनेल माणूस, पूर्वी तरुणपणी "कळत नकळत मध्ये असाच मुलींना फसवत होता हे कसे विसरता येईल? तर "कळत नकळत" मध्ये जी तरुणी मधुरा फसली गेली, ती आता छोटीशी ओळख म्हणून "रंग माझा वेगळा" मधील दीपाचा आधार बनली ! हीच पुढे अगदी सालस गरीब बिचाऱ्या रूपात "सोनी"वरील "जाऊ नको रे बाबा दूर" मधली गौतम जागीरदार यांची पत्नी की हो झाली ! हे गौतम जागीरदार "चंद्र आहे साक्षीला" मध्ये त्या बनेल माणसाला शह देणार्या दमदार व्यक्तिमत्व पहायला मिळाले !💐

💐"कलर्स" वरील 'कमला' मालिकेतील देवाशिष या पत्रकाराची पत्नी, आता झी टीव्ही मराठीवरील "येऊ कशी मी नांदायला" मधल्या स्वीटूची आई 'शकू' बनली आहे. तर 'कमला' मधला धडाडीची शोधपत्रकार देवाशिष, आता "स्टार प्रवाह" वरील "स्वाभिमान"मालिकेतला प्राध्यापक शांतनु सूर्यवंशी झाला आहे. कमला मधली देवाशिषची आई ही तर खूप खूप पूर्वी सह्याद्री वरील त्यावेळेच्या दूरदर्शन वरील श्वेतांबराची आई झाली होती. सह्याद्री वरून आठवले तेव्हाचे दूरदर्शन वरून आठवले, पहिली मालिका आभाळमाया मधली प्राध्यापिका आता कलर्स मध्ये 'घाडगे अँड सून'मधील सासू बनूली, तीच पुढे कलर्स वरती "शुभमंगल ऑनलाईन मध्ये शर्वरीची सासू झाली. या मालिकेतील शर्वरीचे वडील आता कन्यादान मध्ये अशोक वाडकरांच्या डॉक्टर मित्र बनून प्रॅक्टिस करत राहिले! तर तरीही शर्वरी 'काहे दिया परदेस' मध्ये गौरी झालेली, तर गौरीचे वडील सावंत हे आता 'तुझी माझी रेशीमगांठ' मध्ये उद्योगपती जग्गू चौधरी बनले 💐

💐"जिवलगा" मालिकेमधील मधुरा चे सासरे हे आता डॉक्टर पाठक बनून "अजुनी बरसात आहे" मध्ये डॉक्टर मीरेचे सासरे आणि डॉक्टर अधिराजचे वडील म्हणून अवतरले आहेत. "स्वामिनी" मालिकेतील माधवराव पेशव्यांची पत्नी रमा बनलेली अभिनेत्री आता 'लग्नाची बेडी' या स्टार प्रवाह वरील मालिकेत पोलीस अधिकारी राघव रत्नपारखीच्या प्रेयसीच्या नव्या रुपात आली आहे. तीच गोष्ट 'लेक माझी लाडकी' या मालिकेतील लाडकी लेक आता "लग्नाची बेडी" मध्ये पोलिस अधिकारी असलेल्या आप्पांची लाडकी मुलगी बनून आलेली आहे ! तिच्या मागे हात धूवून लग्नाची मागणी करणारा मवाली हा अभिनेता तर "फुलाला सुगंध मातीचा" मालिकेत दहशतवादी अतिरेकी होता !👌

💐या मालिकेवरुन आठवले, तिथे पोलीस इन्स्पेक्टर बनू पहाणारी नायिका कीर्ती ही "लक्ष्मी सदैव मंगलम" मधली अडाणी 'लक्ष्मी' होती ! तसंच या मालिकेतील नायिकेचा भाऊ जो अमेरिकेला जाण्यासाठी, तिचं लग्न तिला अंधारात ठेवून, अडाणी भजी तळणाऱ्या तरुणाशी शुभम् बरोबर करून देतो. त्याची गर्भवती पत्नी, आता सोनी वाहिनीवरील "अजूनही बरसात आहे" मालिकेमधल्या मल्हार ची विवाहापूर्वी गर्भवती राहणारी 'मनु' आहे ! हाच शुभम सोनी वरील "सारे तुझ्याच साठी" असे जिला सांगत होता, ती तर झीमराठीवर "माझा होशील ना?" असा "अवंतिका" च्या मुलाला प्रश्न करीत राहीली!💐

ही बहुरूपी पुनर्जन्माची कहाणी, मारुतीच्या शेपटासारखी, म्हणावी तितकी लांबवत नेता येईल, जशा मालिका लांबवत नेतात तशी ! कोणतीही मालिका केव्हाही पहा, त्यामधील एखादे पात्र घेऊन तुम्हाला ही अशी अंताक्षरी खेळता येईल, इतक्या मालिकांचा महासागर पात्रांच्या पुनर्जन्मा सहित आपल्या भोवती आपल्याला वेढा देऊन बसला आहे. इंडियट बॉक्स वरील पुनर्जन्मांच्या या कहाणीचा सखोल अभ्यास करून पीएचडी मिळवण्या इतकी क्षमता प्रस्तुत लेखकाला आहे, हे आता ध्यानात आले असेलच. पण सध्या इतकेच पुरे. आपण देखील चौकस व सूक्ष्म नजरेने टीवीवर मालिका बघत राहा आणि कोण कुठला अवतार घेतं, त्याचे असेच मजेशीर निरीक्षण करत राहा !

( "या मालिकेतून त्या मालिकेत पुनर्जन्म" घेत रहाणारी ही पात्रे म्हणजे कोण कोणते कलाकार ते ओळखा पाहू!)

👍"अशी ही (बनवा बनवी ?) जवळीक !":
"माझ्या वडिलांच्या आईचं माहेर जरी जोगळेकरांकडे असलं, तरी "आई कुठे काय करते" या मालिकेतील अरुंधती जोगळेकरच, तिच्याशी काही नातंच नाही ! मात्र याच मालिकेतील "कांचन" आजींच गांव आहे, ते आंजर्ले गांव मला खूप जवळचं आहे, कारण माझं आजोळ आहे आंजर्ले आहे ! अर्थातच कांचनआजी जशी आंजर्ल्याची माहेरवाशीण तशीच माझी आई देखील ! 'अरुंधती' नांवावरून आठवलं की, माझं ज्योतिषविषयक लेखन जसं प्रथम पुण्याच्या "रोहिणी" मासिकातून सुरू झालं, तसं चित्रपट/नाटक विषयक "हा खेळ सावल्यांचा !" हे माझं सदर प्रथम "अरुंधती" या नागपूरच्या मासिकातून सुरू झालं होतं !

हे या मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर "जीव माझा गुंतला" मालिकेमधील "सुधाकर" हा मल्हारचा काका, तसा मी नव्हे, त्याचा माझा काहीही संबंध नाही, कारण या "सुधाकर"काकासारखा मी बनेल नाही ! तसंच "एकच प्याला" नाटकामधला "सुधाकर" देखील मी नव्हे, कारण मी तर दारूला कधीही स्पर्शही करत नाही ! "सन" टीव्ही वरील 'कन्यादान' मालिकेमधला "समीर" हा जसा कमालीचा मातृभक्त आहे, तसाच माझा मुलगा समीर देखील, परंतु तो 'समीर' बनेल आहे, नको इतका स्वार्थी आहे, माझा 'समीर' मात्र साधा सरळमार्गी आणि कर्तव्यदक्ष आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

#👍"शारदोत्सव !":👌 "मन चिंब चिंब !"💐

 👍👍👍👍💐💐

👍"रंगांची दुनिया":💐:"रसिकमनांची रसिली यात्रा.....💐

👍"शारदोत्सव !":👌 "मन चिंब चिंब !"💐

जो तो नेहमी कशाच्या ना कशाच्या तरी मागे धावत आहे, काहीतरी मिळवण्यासाठी धापा टाकत आहे. या साऱ्या धिबीडग्यामध्ये, लोकसंख्या हरणाच्या गतीने वाढली. परंतु संधी मात्र मुंगीच्या पावलाने लुप्त होत गेल्या. असे ताणतणाव वाढत असह्य होताना, अर्थातच माणूस कुठे ना कुठे तरी 

अधूनमधून विसाव्याचे क्षण शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये त्याची इच्छा असते की, आपल्याला "कम्फर्ट झोन" मध्ये वावरता यावं. ज्यामध्ये आपल्याला सुख समाधान आणि शांती मिळेल. 

मात्र त्याचे प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. असा "कम्फर्ट झोन" वा समाधानाचे क्षण अनुभवण्यासाठी हॉटेलमध्ये जाणे किंवा चित्रपट नाटकांना जाणे, संगीत ऐकणे वा पर्यटनातून दुनिया पहाणे अथवा मित्रमंडळी यामध्ये गप्पा-टप्पा कट्ट्यावर बसून मारणे वा पत्त्यांचा फड रंगविणे, अशा अनेक प्रकारे माणूस समाधानाचे, आपल्या आवडीचे क्षण शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्या सार्यांमध्ये मला तरी वाटतं की, वाचनासारखा आनंद आहे तो आगळावेगळा अनोखाच !

कारण इथे तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरज भासत नाही. तुम्ही आणि तुमच्या समोरचं एक अद्भुत शब्दविश्व एवढेच काय ते असतं. साहजिकच तुम्ही त्या शब्दांमधील अनुभवांशी, विचारांशी एकरूप होऊन जाऊ शकता आणि त्यातूनच तुम्हाला पुनःप्रत्ययाचे अनेक प्रसंग आठवू शकतात. आपले अनुभवविश्व, आपल्या जाणिवांचा भवताल अधिकाधिक विशाल होत जातो. म्हणूनच मी म्हणतो: "आनंद सुख समाधान मिळवण्यासाठी कुठे बाहेर जायची गरज नाही, ते तुमच्याजवळच आहे, असे वाचनाच्या रूपाने !

माणसाच्या अंगावर पाणी पडलं की तो ओला होतो, पावसात भिजण्याचा, तशा नैसर्गिक ओलेपणाचा तर खरोखरच वेगळाच आनंद असतो. त्यामुळे ओला चिंब चिंब माणूस झाला शरीराने, पण खरं तर जेव्हा माणसाचं मन चिंब चिंब होतं, तो क्षण भाग्याचा !

प्रत्येकाचं माणसाच्या मन चिंब-चिंब करणारं वेगळं कारण असतं. मला तरी एखादं चांगलं वाचायला मिळालं- असं की, ज्या वाचनातून मन अगदी प्रफुल्लित अचंबित व तृप्त होतं, तरी देखील चिंब चिंब झाल्यासारखं मला होतं. 

त्यातले त्यात माणसांच्या व्यक्तिरेखांचा जीवन चरित्रांचा जणु आरसा असलेलं कधीमधी वाचनात येतं आणि तर अनेक जीवनानुभव जवळून बघायला मिळाल्यासारखा अनुभव गांठी येऊन, विशाल दृष्टी तयार झाल्यामुळे आपलं मन चिंब चिंब होऊन जातं !

शेवटी जीवनात दोन गोष्टींची गरज आहे, एक म्हणजे कशाने तरी भारावून जाणं आणि दुसरी म्हणजे आपल्यामुळे आपल्या कृतीमुळे कोणीतरी भारावून जाणं ! या दोन गोष्टी घडत राहिल्या तर आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत राहील....

ह्या पार्श्वभूमीवर मी "मुंगीचं महाभारत" ह्या प्रा. गंगाधर गाडगीळांच्या आत्मकथनाची कहाणी असलेल्या पुस्तकाचा रसास्वाद असलेल्या माझ्या एका विडीओची लिंक पुढे देत आहे....

ती उघडा आणि ऐका....

https://youtu.be/emHc-RgJyIU

धन्यवाद

सुधाकर नातू

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

"टेलिरंजन-'द्रुष्टि बनवते स्रुष्टी !":

 👍"रंगांची दुनिया":👌

💐रसिकमनांची रसिली यात्रा !...💐

👍"टेलिरंजन":💐
👍"तुम्हाला काय वाटते"?:👌

# "कार्यक्रमांच्या पुन:प्रक्षेपणाचा खटाटोप दर रविवारी न चुकता करण्यापेक्षा, मनोरंजन वाहिन्यांनी रविवारी पूर्ण दिवस सुट्टी घ्यावी कां?"

#" जवळजवळ सगळ्याच खाजगी वृत्तवाहिन्या दर अर्ध्या तासानंतर तेच तेच बातमीचे रतीब टाकत असतात, त्यामध्ये अर्ध्याहून अधिक वेळ जाहिरातींचा मारा केला जातो. त्यापेक्षा सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्र अशा फक्त चार वेळा अर्धा तासाच्या बातम्या दाखवणे श्रेयस्कर असेल इतक्या वाहिन्यांची देखील गरज खरोखर आहे कां?
तुम्हाला काय वाटते?

# " मर्यादित षटकांच्या क्रिकेट मॅचेस प्रमाणे मालिका देखील १३, २६ वा फार तर ५२ आठवडे एवढ्याच मर्यादेच्या असणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते कां? तशातर्हेचे वैधानिक बंधन वाहिन्यांवर आणले जाणे गरजेचे आहे कां?

# " सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'टीव्ही'वरील वा 'ओटीटी' वरील मालिकांवर केंद्रीय निरीक्षण बोर्डाचेचे नियंत्रण असणे, सध्याच्या धरबंद नसलेल्या, मर्यादा ओलांडणार्या प्रक्षेपणामुळे आवश्यक आहे असे वाटते कां?

👍इतके सगळे खरे असले तरी "द्रुष्टि बनवते स्रुष्टी" किंवा "Beauty lies in the eyes of beholder !" असं म्हटल्यानुसार मालिकांमधील पात्रांकडून खूप काही घेण्यासारखे कसे असते ते उलगडणारा हा विडीओ टीव्ही पहाताना तुम्हाला वेगळी दिशा दाखवेल........
त्यासाठी ही लिंक उघडा...........
https://youtu.be/ZcussSLeH-Qविडीओ जर आवडला......
तर ही लिंक शेअरही करा........

धन्यवाद
सुधाकर नातू

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

# 👍"रंगांची दुनिया-रंगदर्शन: "तिला काही सांगायचंय !":

 👍"रंगांची दुनिया":👌                                                💐रसिकमनांची रसिली यात्रा !...💐

👍 "रंगदर्शन-नाटकांची नांदी !":👌

कोरोना नियंत्रण विषयक विहीत निर्बंध पाळून, आता मराठी माणसाला प्रिय अशी रंगभूमीवरील नाटकांची नांदी पुनश्च सुरु झाली आहे. त्या निमित्ताने मी अगोदर पाहिलेल्या व आता पुनश्च रंगभूमीवर सादर होणार्या, निवडक नाटकांचा रसास्वाद आपणासाठी सादर करण्याचा मी उपक्रम सध्या करत आहे. त्यातील हा रसास्वाद.......

👍"तिला काही सांगायचयं !":

"एक गंभीर संशयकल्लोळ!:👌

एका तसबिरी वरून सुखवस्तू अशा एका दांपत्यामध्ये संशयाचे बीज कसे रोवले गेले आणि त्यातून हलकेफुलके संगीतमय असे नाट्य "संशय कल्लोळ" ह्या गाजलेल्या नाटकामुळे आपल्या परिचयाचे झाले आहे. परंतु तिथे केवळ दोन पात्रेच नव्हती, तर इतरही अनेक पात्रांचा त्या नाटकात समावेश होता. परंतु हे श्री. हेमंत एदलाबादकर लिखीत व दिग्दर्शित"तिला काही सांगायचय्" नाटक केवळ दोन तरुण व्यक्तींचे आहे. सहाजिकच केवळ नावावरूनच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करण्याचे सामर्थ्य असलेले हे नाट्य उत्तरोत्तर रंगत जाते.

"तिला काही सांगायचंय" हे नाटक "झी मराठी" तर्फे सादर केलेले आहे. तर निर्मिती श्री. चिंतामणी थिएटर्सची आहे. "चारचौघी" सारखी चाकोरीबाहेरची नाट्ये सादर करणार्या ह्या नामवंत नाट्यसंस्थेची, नेहमीच विचार प्रवर्तक आणि सामाजिक कौटुंबिक समस्या ऐरणीवर आणणाऱ्या नाटकांची परंपरा आहे. रसिक त्यांचे उत्तम स्वागतही करतात. त्यातून "झी मराठी" सारख्या मीडियातील अग्रगण्य संस्थेचे पाठबळ मिळाल्यामुळे या नाटकाची जाहिरात अतिशय उत्कंठापूर्ण व अनोखे रहस्य प्रकट करणारी होती. 

सहाजिकच हे नाटक आम्ही पहाणे क्रमप्राप्त होते. लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच जाणार्या ह्या कलाक्रुतीमध्ये केवळ नायक व नायिका अशी दोनच पात्रे दिसतात. अर्थात् फक्त दोन पात्रे असलेली नाटके मराठी रंगभूमीला नवीन नाहीत. "आरोप" हे त्यातले एक प्रमुख रहस्यप्रधान नाटक. तर दुसरे "संकेत मिलनाचा" असे कुतूहल जाग्रुत करणारे. दरवर्षी एका ठराविक दिवशी विभिन्न जोडीदार असलेल्या विवाहित स्री व पुरुषाने पंचवीस वर्षे, एकत्र एकाच ठिकाणी भेटून हितगूज करायचे, अशा त्यावेळच्या काळाच्या पुढच्या, अद्भुत संकल्पनेवर बेतलेले हे नाटक पूर्वी विलक्षण गाजले होते. तर त्याच धर्तीवर त्या नाटकाची जागा एका वेगळ्या पद्धतीने घेणार्या नवविवाहित जोडप्याचे असलेले "तिला काही सांगायचय" हे नाटक रसिकांनी पाहण्यासारखे आहे.

"ती" आणि "तो" ह्यांच्या विवाहाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच्या रात्री, त्यांचा एकमेकांमधला रंगत जाणारा व रहस्य निर्माण करत रहाणारा संवाद, असे या नाटकाचे थोडक्यात स्वरूप आहे. पण प्रसंग आणि संवाद अशा खुबीने रंगवत नेले आहेत की, मॅक्रम बद्दलच्या संशयाचे वादळ घोंगावत जाऊन, त्यामधून दोघांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीची प्रेक्षकांना हळूहळू कल्पना येत जाते आणि तिथेच नाटकाचे यश आहे.

कोणत्याही नवपरिणीत जोडप्यांचे एकमेकांतील भावबंध हे परस्परांना नीट समजून उमजून घेऊन त्यांच्या गुणदोषांसकट जेव्हा स्वीकार होतो तेव्हाच ते अधिक चांगले बनतात. पण संशयाचे भूत आणि त्यातून आपला जोडीदार दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नादी लागून आपल्याला फसवतो आहे, असे काही ढग जर निर्माण झाले तर त्यातून प्रक्षोभक भांडण वितंडवाद, प्रसंगी फारकत हा वास्तव परिणाम असतो.

एकमेकांतील खेळकर संवादातून हे जोडपे रंगमंचावर, संशयाच्या पुलावरून पहाता पहाता प्रेमाकडून विद्वेषाकडे, सुसंवादाकडून विसंवादाकडे कसे वहावत जाते ते पहाणे, हा एक ह्रदयाची धडधड वाढविणारा जीवंत अनुभव आहे. एकमेकांच्या वागणुकीबद्दल संशय घेत, ते अशा बिंदूला येऊन पोहोचते की वर्षाचा विवाहाचा वाढदिवस साजरा होतो की नाही, अशीच शंका निर्माण व्हावी. 

मालिकांमध्ये एखादी भूमिका करणारी जशी पात्रे बदलली जातात, त्याचप्रमाणे या नाटकाचेही झाले आहे. नायिका असलेल्या "ती"ची भूमिका पूर्वी समर्थपणे पेलली होती, तेजश्री प्रधान (अर्थात "होणार सून मी ह्या घरची" मधली जान्हवी) ह्या अभिनेत्रीने आणि आता तिची जागा घेतली आहे, प्रिया मराठे ह्यांनी. तर "तो" मात्र बदललेला नाही, तिला सडेतोड उत्तरे देणारा आणि प्रसंगी अभिनयाच्या क्षेत्रात उजवा वाटणारा अभिनेता आस्ताद काळे हा नायक आहे.

जुन्या गाजलेल्या "संगीत संशय कल्लोळ"मध्ये गमतीशीर विनोदी असा संशयाचा गुंता खेळकरपणे गुंफलेला होता, तर "संकेत मिलनाचा" मध्ये स्री पुरुषामधील अतूट स्नेह व हळूवार प्रेमसंबंधांची उत्कटतेने उलगडणारी कथा होती, मात्र इथे दोन तरुण पात्रांचे पूर्वायुष्यातील एखाद्या भानगडीच्या संशयाचे जाळे विलक्षण उत्कंठा वाढवणारे आणि भेदक नाट्यमय प्रसंगांची चाहूल देणारे आहे.

ह्या नाटकामध्ये, एकमेकांच्या चारित्र्यावरून घेतलेल्या संशयाचे भूत परमोच्च बिंदूला, "ती" जेव्हा बोलू लागते आणि रहस्यामागून रहस्ये उलगडतात तेव्हा धक्क्यावर धक्के बसत जातात. पुढे काय होते, सत्य काय असते, अन् शेवट काय कसा होतो हे पहाण्यासाठी हे रंगतदार नाटकच अवश्य प्रत्यक्ष पहायला हवे.

धन्यवाद

सुधाकर नातू

ता.क.

हा प्रयत्न तुम्हाला भावला, आवडला, वा कसा वाटला, त्याचा प्रतिसाद जरुर द्या......

वैविध्यपूर्ण तीनशेहून अधिक लेख वाचण्यासाठी,

माझ्या ब्लॉगची पुढील लिंक सेव्ह करा.....

https://moonsungrandson.blogspot.com

ती लिंक अधूनमधून उघडून, वैविध्यपूर्ण ललित लेख वाचण्याची संवय लावून घ्या.......

योग्य वाटल्यास, ही लिंक......

आपल्या परिचय वर्तुळात शेअरही करा.......



मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

#👍""रसिकमनांची रसिली यात्रा !💐#

 👍"रंगांची दुनिया 👌

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !💐

# "काळाच्या तात्कालिक गरजेप्रमाणे, काळाच्या ओघात, नेहमीच समर्थ पर्याय निर्माण होत असतात. Nobody is indispensable. अमूकच व्यक्ती पर्याय होईल, ह्याची कुणालाच कधीही खात्री देता येत नाही, आजवरचा इतिहास हेच सांगतो. भाबडी आशा बाळगण्याखेरीज, आपण काहीही करू शकत नाही. जे जे जसे जसे घडत रहाते, त्याचाच परीपाक उद्या घडत असतो आणि हे चक्र अव्याहतपणे चालू रहाणे हा निसर्गनियम आहे. अखेरीस, सुयोग्य परिस्थितीच अपेक्षित पर्याय पुढे आणते."

-------------------------

# "नियतीचे खेळ!":

"गरज ही शोधाची जननी, तशी वेदना ही नवनिर्मितीची, प्रतिक्षा ही फळाची, मीमांसा ही टीकेची, अन्याय वा उपेक्षा प्रतिशोधाची, बंधने ही मुक्ततेची, स्फूर्ती ही प्रतिभेची माता होय. देणे-घेणे, सोसणे-पुसणे, करणे-भरणे, रूसणे-हसणे, उमलणे-फुलणे-कोमेजणे असे नियतीचे खेळ हे सारे चालती अव्याहत !"

--------------------------

# "माणसे ओळखा !":

"जगात नेहमी तीन प्रकारची माणसं असतात. पहिला प्रकार त्यांचा जी तुमच्या वर निरपेक्ष, प्रामाणिक प्रेम करतात, त्यांची तुमच्याकडून काहीही अपेक्षा नसते. तर दुसऱ्या प्रकारच्या माणसांचे असे असते की, ती तुमची नेहमी द्वेष करतात त्यांच्याशी तुमचे पटणे कधीच शक्‍य नसते. तर तिसऱ्या प्रकारची माणसे ही आपल्या स्वार्थापोटी प्रेम आहे असे तुमच्यावर दाखवत राहतात, त्यामुळे त्यांचा स्वार्थ पुरा करूनच तुम्हाला त्यांना मॅनेज करावे लागते."

👍 "कन्यादान" सन टीव्ही मालिका: माधवकाकांचे बोल.

---------------------------

#" खेळखंडोबा बातम्यांचा?:

बहुतेक सर्वच व्रुत्तवाहिन्या दर अर्ध्या तासानंतर जवळजवळ त्याच त्याच बातम्या, नेहमी दाखवतात. आत्ताही जुनीच दुपारची टेप वाजवलेली पहायला मिळत आहे. फक्त बातम्या देणारे बदलले जातात. ताज्या बातम्या अपवादानेच दाखवल्या जातात. ( पूर्वी 

ई टीव्हीवर दर तासाभराने शक्यतो ताज्या घडामोडींचा परामर्ष घेतला जाई. ) त्यात मधे मधे जाहिरातींचा मारा तो वेगळाच.

अक्षरशः उबग येतो तेच तेच ऐकून व पाहून. कधी कोण कसे बदलणार हा खेळखंडोबा बातम्यांचा?

-----------------------------

# "कोड़े: कधीही न सुटणारे !":

माणूस मरतो, तेव्हाच कां मरतो? कुणी जन्मत:च, तर कुणी बालपणी वा कुणी एेन तारूण्यांत, तर काही प्रौढपणी, तर काही वृद्धापकाळी हे जग सोडून जातात. प्रत्येकाचे मरतेवेळी वय भिन्न असते, असे कां?

आगगाडीतील प्रवास करताना जसा जो तो आपले स्थानक आले की उतरून जातो, तसाच हा सारा प्रकार असतो ! पण आपले 'तिकीट कुठपर्यंतचे आहे ते कुणालाच माहीत नसते. आयुष्य हे क्षणभंगूर आहे ह्याची जाणीव, कुणी मरण पावल्याची बातमी कानी येते, तेंव्हाच होते.

ह्या जगांत प्रत्येकाचे काही विशिष्ट प्रयोजन असावे, तेव्हढे झाले की त्याला 'राम' म्हणावा लागतों ! पुष्कळ वेळी सारी कामे वा आकांक्षा पूर्ण न करता, माणसाला येथून निरोप घ्यावा लागतो. थोडक्यात, जीवन आणि मरण हे कधीही न सुटणारे कोडे आहे !

--------------------------

# "समाधानाची सप्तपदी": लिंक उघडा:

https://youtu.be/g_OqskZbfxg

व मिळवा ताणतणावापासून मुक्ती:

१. डोके वापरा

२. दृष्टी बदला.

३. जीभेला आवरा

४. हाताने नेहमी देत रहा.

५. ह्रदयापासून प्रेम करा.

६. मन काबूत ठेवा.

७. पायाने चालत रहा.

--------------------------

धन्यवाद

सुधाकर नातू