सोमवार, ३१ मे, २०२१

"आजोबांचा बटवा-१" "मन मनास उमगत नाही !":

 "आजोबांचा बटवा-१" "मन मनास उमगत नाही !":


मी हल्ली save केलेले फोन आले तरच घेतो, नाहीतर अनोळखी नंबर असलेला फोन सहसा घेत नाही, तो लगेच डिस्कनेक्ट करतो. त्याला प्रमुख कारण म्हणजे हल्ली पुष्कळदा तुमची झोपमोड करायला अथवा तुमच्या कामात व्यत्यय आणायला मार्केटिंगवाले काही ना काही तरी स्क्रीम्स घेऊन फोन करायचा उद्योग करत असतात. आपल्याला त्यांच्या विविध योजना बद्दल कुठलेही देणेघेणे नसते, त्यामुळे "आय एम नॉट इंटरेस्टेड" हे उत्तर देऊन देऊन मी अक्षरशः थकलो. त्यामुळे तेव्हापासून अनोळखी क्रमांक आला तर तो घ्यायचा नाही असा माझा रिवाज आहे. त्यामुळे फक्त माझ्या संग्रही असणारे फोनच मला जर आले, (अर्थात ते सहसा कधी येतही नाहीत, हे वेगळे) तरच मी ते घेतो.

या पार्श्वभूमीवर मी एका घरगुती कार्यक्रमाला जात असताना प्रवासात वाटेतच एका अनोळखी क्रमांकावरून कोणीतरी "मी ### बोलत आहे" त्याला मी सौजन्याने उत्तर दिले की, "मी प्रवासात आहे नंतर फोन करा" प्रतिसाद आला "नंतर म्हणजे कधी"? मी सांगून बसलो "दुपारनंतर पाचच्या आसपास करा" मग नंतर घरगुती कार्यक्रमात मी हा मामला विसरुनच गेलो.

संध्याकाळी परत आल्यावर काही काम करत असताना पुन्हा एक फोन आला, तो बहुदा त्याच व्यक्तीचा होता. "मी अमुक अमुक बोलतोय" त्याला माझे उत्तर "कुठून बोलताय, कशाकरता बोलायचंय?" ह्या प्रश्नावर त्यांनी "आधी माझे ऐकून घ्या" मी देखील मग उद्विग्नपणे म्हटले "तुम्ही अनोळखी आहात, कुठून बोलता कशा करता बोलायचय? ते प्रथम सांगा, नाहीतर बोलण्यात अर्थ नाही." याप्रमाणे मी जसे तोडून टाकणारे बोललो, तसेच या गृहस्थाने देखील माझ्या साध्या प्रश्नांना उत्तरे न देताच फोन कट केला !

आता यामध्ये प्रत्येकाने एक प्रकारे अतिरेकी अशाच स्वभावाचं दर्शन घडवलं. मी म्हणतो तेच खरं, अशा पद्धतीने वागणं दोन्हीकडून झालं. यात नक्कीच आश्चर्य वाटू नये किंवा यात तथ्य आहे, फक्त माझे प्रश्न चुकीचे नव्हते, या गृहस्थाने आपण कोण कुठून आणि कशा करता बोलयचं आहे, हे आधी प्रास्ताविकात सांगुन मगच बोलायला हवे होते. पण त्याने तसे केले नाही, कां? ते त्याचे त्यालाच ठाऊक ! त्याचेच नुकसान त्यामुळे झाले.
त्यामुळे मला नंतर रुखरुख वाटली की आपण तुसडेपणाने बोललो हे तसं योग्य की अयोग्य असं काही काळ वाटत गेलं. म्हणूनच म्हणतो "मन मनास उमगत नाही !".

असाच एक अनुभव काही महिन्यांपूर्वी आला मला होता. माझा एक लेख एका लोकप्रिय साप्ताहिकात पाठवला होता. तो स्वीकारल्याचे आणि यथावकाश प्रसिद्ध करू. अशा तऱ्हेचा फोनवर संदेश मला आला होता. त्यामुळे माझा लेख कधी एकदा प्रसिद्ध होतो हे मला वाटत होते. शेवटी न राहवून मी त्या संपादक मंडळीना फोन केला. त्यापैकी हा जो सदराचा भाग होता तो बघणाऱ्या व्यक्तीने मला सांगितले की "तुमचा लेख कधी प्रसिद्ध होईल हे निश्चित आम्हाला सांगता येणार नाही." त्यावर मी म्हटले की "जेव्हा तो लेख प्रसिद्ध होईल, तेव्हा तुम्ही तो अंक पाठवा, म्हणजे मला कळेल." त्यावर त्या व्यक्तीने उत्तर दिले "Sorry, तशी आमच्याकडे पद्धत नाही. आम्ही लेखकांना प्रत पाठवत नाही. तुम्ही मार्केटमधून विकत घ्या आणि केव्हा प्रसिद्ध होतो ते पहा !" हे उत्तर ऐकल्यावर, मग मी देखील राग येऊन बोललो की "अशी तुमची लेखकांना हाताळण्याची पद्धत असेल, तर मला ती चुकीची वाटते." पुढे तिरीमिरीत मी बोलून गेलो "माझा लेख नाही तुम्ही प्रसिद्ध केलात तरी चालेल."

म्हणजे हा अनुभव देखील योग्य ते न बोलण्याचा होता. संपादकीय विभागातील त्या व्यक्तीने देखील जरा सौजन्याने बोलायला हवे होते. 'तुम्हाला वाटलं तर तुम्ही अंक घेत बसा व दरवेळेला ते शोधत बसा आपला लेख आला आहे की नाही', अशी ही पद्धत दिसत होती. त्यामुळे त्यांचे जसे चुकले, तसेच मी त्या उत्तरावर गप्प बसायला हवे होते आणि यथावकाश जसे मला जमेल तसे त्या साप्ताहिकाचे अंक मिळवण्याचा प्रयत्न करून माझा लेख आला आहे कां हे पाहायला हवे होते. माझ्याही बोलण्यातील बेपर्वाईमुळे, मला एक मोठी संधी मिळू शकली असती ती मी माझ्या बोलण्याने अशी घालवून बसलो. याबाबतीत साप्ताहिकाचे काहीही नुकसान झाले नाही, माझे मात्र झाले. थोडक्यात For short term gains, we overlook and lose long term benefits, असे झाले. दुसरे काय? थोडक्यात आपले मन कधी केव्हा थाऱ्यावर नसेल याचा थांगपत्ता लागत नाही. अचानक आपण योग्य तो प्रतिसाद देण्याऐवजी अचानक काही ना काही नको असा दूरूत्तराचा मारा करतो.

अजूनही अगदी लहानपणचा एक प्रसंग मला यासंदर्भात आठवतो आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी स्नेहसंमेलन व्हायचे आणि त्या संमेलनात विविध अशा विभागात जनरल नॉलेज किंवा सामान्यज्ञानाची एक स्पर्धा घेतली जायची. अशात एका स्पर्धेत लहान मुलांच्या गटाला अतिशय कठीण असे प्रसिद्ध प्रश्न विचारले होते.

माझ्या शेजारचा छोटा बाळू त्या गटात होता. अशा वेळेला त्या स्पर्धेचे संचालक होते, ज्यांनी प्रश्न काढले होते, ते गृहस्थ शेजारी आले होते.
फार कठीण प्रश्न विचारले होते त्यामुळे इतर मुलांप्रमाणेच बाळूलाही त्यांची उत्तरे देता आली नाहीत. तो मनातून उद्विग्न झाला होता. सर्वसाधारणपणे त्याला सामान्यज्ञान स्पर्धेत नेहमी पहिले बक्षीस मिळायचे. त्यामुळे ते ग्रहस्थ उंबरठ्यामध्ये उभे असतानाच तो बेदरकारपणे त्यांना बोलला "तुम्हाला काही अक्कल नाही, यूसलेस, किती कठीण प्रश्न तुम्ही आजच्या स्पर्धेत काढलेत, बरोबर नाही केलंत." हे बोलणं ऐकून ते ग्रहस्थ चकीत झाले. मात्र गृहस्थांची थोरवी अशी की या दुखवणाऱ्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि शांतपणे आंत जाऊन गप्पा मारू लागले.

आज त्या प्रसंगाची आठवण झाली की खरंच हसावं की रडावं ते कळत नाही अचानक असं काय झालं की बाळूने असा अतिरेकी अविचारीपणा केला. आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली, तर माणूस चिडतो, संतापतो. या भरात तो काहीही कसा वागून जातो, त्याचं हे उदाहरण. कुणाचं मन कधी कसं वागेल हे कळत नाही, तुम्ही लहान असा अथवा मोठे असा ! ह्याचसाठी म्हणायचे "मन मनास उमगत नाही."

आणि शेवटचा अनुभव जर कधी आठवला तरी कुणालाही लाज वाटण्यासारखं होईल. आपण एखाद्या नियमाला किती चिकटून राहायचं याला काही मर्यादा असते. ते ग्रुहस्थ ज्योतिष सल्ला देत असत. ते ग्रुहस्थ एककल्ली व त्यांचा स्वभाव विक्षिप्त होता. शक्यतोवर भेट घेण्यापूर्वी वेळ मुक्रर आधी करावी आणि नंतरच पुढचे काम ते करत.

एकदा एक वयोव्रुद्ध गृहस्थ, असेच दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे आले, त्यांनी ह्या ज्योतिषाचार्यांच्या घराची जबेल दाबली. दरवाजा उघडला गेला. नंतरचा संवाद असा:

"कोण आपण, कशाला ह्या अवेळी आलात?
ही वेळ माझ्या वामकुक्षीची असते."

"मी माझी मुलाची पत्रिका दाखवायला आलो आहे"

"आपण माझी अपॉइंटमेंट घेतली आहे कां? तर नाही, असा अगांतूक कुणालाही मी भेटत नाही."

तो थकलेला ग्रहस्थ बिचारा अजिजीने विनंती करु लागला,
"अहो मला अत्यंत गरज आहे हो, खूप प्रयत्न करूनही माझ्या मुलीचे लग्न जमत नाहीये. त्यामुळे मला तुम्हाला तिची पत्रिका दाखवायची आहे. मी फक्त पाहिजे तर आता जन्मतारीख वगैरे माहिती देतो. नंतर तुमची अपॉईंमेंट घेतो."

त्यावर उत्तर "त्याप्रमाणे तुम्ही पत्र पाठवा. मी काही आत्ता ते डिटेल्स लिहून घेणार नाही. कारण मी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कुठलंच काम करत नाही."

" मग निदान भेटीची वेळ ठरविण्यासाठी तरी तुमचा फोन नंबर आत्ता द्या."

ह्यावर त्या ज्योतिषाचार्यांचे उत्तर तर संतापजनक होते:
"Sorry, पत्र पाठवा, त्यात तुमचा फोन नंबर द्या. मी whatsapp ने माझा फोन नंबर कळवेन."


त्या दिवशीच्या रणरणत्या दुपारी, बिचार्‍याला हात हलवित परत जायला लागलं. आधीच तो वयस्क माणूस पत्ता शोधत शोधत खूप लांबवरून देखील आला होता. पण ह्या विक्षिप्त (की माजखोर? ) ज्योतिषमार्तंडांनी साधे सौजन्यही त्याला दाखवले नाही. उलट हा अनुभव मला नंतर आमच्या भेटीत, त्यांनी 'आपण तत्व कशी काटेकोरपणे पाळतो' अशी फुशारकी मारत आवर्जून सविस्तर सांगितला !
आहे की नाही कमाल !

अचानक मन असे तिरपकड्या सारखे, सारासार विचार न करता,कां वागते ते नंतर आपल्याला कळत नाही. माझ्या ह्या ज्योतिषाचार्य मित्राची निश्चितच फार मोठी चूक झाली होती यात शंकाच नाही. "मन मनास उमगत नाही" हा मुद्दा मला जो सांगायचा आहे तो याचकरता की, कोणत्या क्षणी कोणत्या प्रसंगात आपण कसे वागू हे आपलेच आपल्याला कळतच नाही.

तुम्हाला देखील कदाचित असेच अनुभव येत असतील, वा येऊ शकतील. तेव्हा सावध रहा. शक्यतोवर इतरांच्या भावनांची कदर करा. त्यांना लागेल असे शक्यतोवर काही बोलू नका, तारतम्याने वागून नेहमी सौजन्य ठेवा. अर्थातच "जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवणे गरजेचे आहे" हे प्रसिद्ध वाक्य पुन्हा पुन्हा आठवत राहा.

धन्यवाद
सुधाकर नातू

असेच अनेक विचारप्रवर्तक लेख वाचण्यासाठी 
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडा.....

http//moonsungrandson.blogspot.com

लेख आवडले तर लिंक शेअरही करा....

शुक्रवार, २८ मे, २०२१

"कालसर्पयोग समाप्तीनंतर, पुढे काय?": !":

 "कालसर्पयोग समाप्तीनंतर, पुढे काय?": !":


कोरोनासारख्या महामारीला तोंड देण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय, वैयक्तिक दृष्ट्या तसेच सार्वजनिक दृष्ट्या आवश्यक आहेत, हे आता माहीत झाले आहे. वैयक्तिक दृष्ट्या, नेहमी बाहेर जाताना मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, सतत शक्य होईल तेव्हा साबणाने हात धुणे आणि शक्यतोवर गरज असेल तरच घराबाहेर पडणे आणि गर्दी टाळणे, अशा तर्‍हेचे उपाय वैयक्तिक दृष्ट्या पाळणे गरजेचे झाले आहे. दुर्दैवाने आवश्यक निर्बंध पाळणे, ही बाब सर्वच क्षेत्रात, सर्व स्तरावर अंगिकारली जात नाही आणि त्यामुळेच बहुदा पहिली लाट ओसरल्यावर जणू काही सारे आकाश मोकळे झाले आहे, या भावनेने मुक्त संचार केला गेला, हेही एक कारण दुसरी लाट येण्यामागे होते.

असे असले तरी, पहिल्या लाटेच्या ओसरण्याचे वेळेलाच आपण संभाव्य असे हे महासंकट पुन्हा येऊ शकेल, याची जाण ठेवून सार्वजनिक स्तरावर आरोग्यव्यवस्था आमूलाग्र बदलणे आणि सक्षम आणि आदर्शवत करणे गरजेचे होते. परंतु झाले काय तर, पहिल्या लाटेमध्ये ज्या काही सार्वजनिक व्यवस्था केल्या गेल्या, त्या हळूहळू गुंडाळल्या गेल्या आणि सर्वात लसीकरणाकडे तर पूर्णच अक्षम्य दुर्लक्ष झाले, अनाठायी मोठेपणा मिळविण्याच्या आविर्भावात लाखो लशी परदेशात पाठविण्यात धन्यता मानली गेली.

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आपण आतापर्यंत या क्षेत्राला काडीचेही महत्त्व दिले नव्हते आणि आपल्या आर्थिक बजेट मध्ये या व्यवस्थेसाठी त्यामानाने नगण्य अशी तरतूद असे, हीच गोष्ट अत्यावश्यक शैक्षणिक क्षेत्राचे बाबतीत. आता यापुढे श्वेतपत्रिका, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल अभ्यासपूर्ण अशा तऱ्हेचा आढावा घेऊन पुढे आणली पाहिजे. आदर्श उत्तम असे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे जे काही घटक असतील त्यांची सर्वांगीण अशी सक्षम व्यवस्था कधी, कशी करता येईल त्याचा एक मास्टर प्लॅन केला जावा आणि त्याची सत्वर अंमलबजावणी व्हावी. ही एक बाजू झाली.

दुसरी बाजू, कोरोनासारख्या महामारीवर, लाँकडाऊन हाच शक्यतोवर हातात असलेला उपाय प्रतिबंधक म्हणून असल्यामुळे व तो दुसऱ्या लाटेवेळी अधिक कठोरपणे पाळला जायला हवा होता. परंतु तिकडेही हलगर्जी, चालढकल झाली, राज्यांवर जबाबदारी टाकून हात झटकले गेले. त्या कसोटीच्या कालखंडात अनावश्यक अशा अनेक गोष्टींना- निवडणूक प्रचार व कुंभमेळा ह्यांना नको इतके प्राधान्य दिले गेले. त्याचा भयावह परिणाम आता आपण सहन करत आहोत.

अपरिहार्य अशा लाँकडाऊनमध्ये अर्थकारण हे
हात बांधून ठेवणारे कारण असते, यात वाद नाही. मात्र त्याकरता आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल घटकांसाठी केवळ मोफत धान्य देण्याशिवाय, एक वेगळीच उपाययोजना करायला हवी होती. ज्याप्रमाणे मागील शतकाच्या पूर्वार्धात 'ग्रेट डिप्रेशन'मध्ये अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणावर सार्वजनिक बांधकामे काढली जाऊन, त्यांत प्रचंड पैसा त्यात ओतण्यात आला. त्यामुळे त्यांचे अर्थचक्र, जे कुंठित झाले होते, ते पुनश्च व्यवस्थित मार्गावर आले. त्याचप्रमाणे आपल्या इथे लाँकडाऊनच्या काळात, ज्या 'नाही रे' वाल्यांचे पोट केवळ हातावर आहे अशा वर्गाला आवश्यक तेवढी रक्कम निर्वाह निधी म्हणून दरमहा सातत्याने तरी देणे गरजेचे होते. त्या करता वेळप्रसंगी जागतिक बँकेकडून वा 'आय एम एफ'कडून कितीही कर्ज जरी काढायला लागले तरी ते काढले जाणे हा मार्ग विचारात घ्यायला होता. इंधनाची बेसुमार भाववाढ हा एकमेव झटपट महसूल मिळवण्याचा मार्ग चोखाळल्यामुळे महागाई आवाक्यात राहिलेली नाही आणि जनतेच्या हालात त्यामुळे अधिक भर पडते आहे.

दरमहा निर्वाहनिधी वाटपाचे दृष्टीने कोणतीच हालचाल झालेली दिसत नाही. त्यामुळे
लाँकडाऊन' जास्त काळ पर्यंत ठेवता येत नाही. तर दुसर्या बाजूला, गोंधळी लसीकरण मंदगतीने चाललेले, त्यामुळे आज अशी विचित्र परिस्थिती झाली आहे, ती म्हणजे 'कोरोना' महासंकटामध्ये आपली चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यू सारखी स्थिती झाली आहे. ज्यावेळेला मुक्त अर्थव्यवस्था सुरु झाली तेव्हापासून आपली प्रचंड लोकसंख्या ही आपली एक जमेची बाजू होती. साऱ्या जगाला मार्केटिंगसाठी एक उत्तम अशी संधी, असे रूप असल्यामुळे, आपली प्रचंड लोकसंख्या ही आपली शक्ती होती. परंतु तीच शक्ती, आज आपल्या एका दुखऱ्या नसे सारखी झाली आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येचे लसीकरण करणे, त्याचप्रमाणे आरोग्यव्यवस्था पुरवणे, हे खरोखर कठीण असेच संकट किंवा आव्हान झाले आहे हे विसरता येत नाही.

"लसीकरणाची कथा आणि व्यथा !":

हल्ली कधी ना कधी, कुठे ना कुठे लसीकरण बंद असल्याचे ऐकायला येते, याकडे आपण गांभीर्याने बहुदा बघत नसू. परंतु ज्या वेळेला एखाद्या केंद्रावर लसीकरण संपूर्ण दिवस बंद असते, तेव्हा त्या केंद्रावर किती संभाव्य अशा व्यक्तींना लस दिली जाऊ शकली असती, याचा हिशोब जर केला तर, तसेच एकूण सर्वच देशभर अथवा राज्यभरच्या लसीकरण बंद असणाऱ्या सर्व केंद्रांवर ही अशी हुकलेली संधी किती हजारो
व्यक्तींसाठी होती याचा हिशोब जर केला तर लक्षात येईल की किती महाभयंकर संकट त्यामुळे त्या त्या दिवशी निर्माण होत असते.

कारण तेवढी माणसे संभाव्य कोरोना लागणीच्या शक्यतेच्या धोक्यात येऊ शकतात. त्यापैकी कुणालाही लागण झाली तर त्याचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे केवळ एका दिवसाच्या लसीकरण चुकण्या मुळे किती नुकसान सबंध देशभरात होते याचा विचार व्हायला हवा. थोडा वास्तवतेचा अभ्यास केला तर, असं लक्षात येतं की लसीकरण चालू असलेले दिवस, हे न चालू असलेल्या दिवसांपेक्षा नेहमी कमीच आहेत ! त्यातून मोठा गाजावाजा करून भरपूर संख्येने लसीकरण केंद्रे निर्माण तर केली, शिवाय प्रसंगी २४ तास देखील लस देण्याची व्यवस्था करू अशी गर्जनाही झाली.

स्पर्धा परीक्षेमध्ये ह्याप्रमाणे यश मिळवण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून अभ्यास करायला लागतो त्याचप्रमाणे या महा संकटावर विजय मिळविण्यासाठी एक एक दिवस आपल्याला जागृत राहून त्याप्रमाणे लस उपलब्ध व्हायला हवी प्रत्येक दिवशी याचा विचार गांभीर्याने करायला हवा.

परंतु ह्या खटाटोपाचा परिणाम किती भयानक झाला याचाही विचार करा. कारण इथे लसीकरणाची यंत्रणा आहे, पण दुर्दैवाने लसच नाही. म्हणजे नियोजनामध्ये दूरदृष्टी दाखवण्यात व लसीकरण योग्य तर्हेने राबविण्यात, आपण किती कमी पडलो ते कळून येईल. अर्थात एकंदर आपले सद्य कारभाराचे रूप बघितले तर चालसे कल्चर पूर्वी होते, तसेच आताही आहे.

सहाजिकच कदाचित कुणालाच ह्या दररोजच्या लसीकरण बंद घटनेकडे योग्य त्या शास्त्रीय व व्यावहारिक दृष्टीने बघताच येत नाही. कारभार जर असाच चालत राहिला तर आपली प्रगती तर दूरच, पण पिछेहाट होणे हे अपरिहार्य आहे. महामारीच्या संकटाची तीव्रता दूर होणे कठीण आहे.

यासाठीच कर्तव्य आणि उत्तरदायित्व याचा योग्य तो विचार करून यंत्रणेच्या, समाजाच्या प्रत्येक घटकाच्या बाबतीत ह्या दृष्टीने महत्त्व जाणून योग्य ती आमुलाग्र सुधारणा व्हायला हवी आणि त्याप्रमाणे प्रत्येकाची वाटचाल हवी तरच काही आशेला वाव आहे.

धन्यवाद.
सुधाकर नातू

ता.क.
माझीही शहात्तराव्या वयात बहरत असलेली गद्धे पंचविशी:
"माझा सोशल मिडीयावरील 'संसार'! ":
माझा ब्लॉग:
एकसे बढकर एक अडीचशेहून अधिक वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........
ही लिंक उघडा....

https://moonsungrandson.blogspot.com

लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....
I have you tube channel:

moonsun grandson

With over 75 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. Open this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

सोमवार, २४ मे, २०२१

"वाचा, फुला आणि फुलवा-८: दीड दमडी, गद्धे पंचविशी आणि शब्दकोडे !":":


"वाचा, फुला आणि फुलवा-८":

वाचनासारखा आनंद नाही. त्यातून सध्याच्या कोरोनाच्या महामारीमध्ये lockdown मुळे एकांतवास सहन करायला लागत असताना तर वाचन हाच एक अत्यंत महत्त्वाचा विरंगुळा ठरला आहे. वाचनासाठी आपल्याला आता सध्या वर्तमानपत्रांवरच जास्त अवलंबून राहावे लागत आहे, कारण वाचनालयातून मासिके पुस्तके आणणे अशक्य झाले आहे. अशा वेळेला शनिवार रविवार चे वर्तमानपत्रांचे अंक व त्यामधील पुरवण्या, ही एक आवडीची बाब आपल्याला उपलब्ध असते. अशा लेखांमध्ये वर्तमानपत्रातील मला भावलेल्या काही लेखांचे अथवा विषयांचे- "दीड दमडी" "गद्धेपंचविशी" आणि शब्दकोडे ह्यांचे
परामर्श मी येथे घेतले आहेत.

ते तुम्हाला सद्य परिस्थितीतील विविधता दाखवत, मनोरंजक तर वाटतीलच, परंतु अंतर्मुख करून स्वतंत्र विचार करायला लावतील अशी आशा आहे.

1
"शब्दकोडे आणि आयुष्यांतील कोडी !":
वर्तमानपत्रातील कोडी, विशेषतः शब्दकोडे सोडवणं, हे एक बुद्धीला चांगलं खाद्य असते. आपले भाषाज्ञान किती चांगले वा कसे आहे, ते यावरून समजते. त्याचप्रमाणे आपल्या स्मरणशक्तीलाही हा एक व्यायाम असतो. त्यामुळे वर्तमानपत्रात येणारे शब्दकोडे मी दररोज सोडवायचा प्रयत्न करतो. पुष्कळ वेळा मात्र दिवस अखेरीपर्यंत कोडं सुटत नाही आणि मग मात्र मनाला जरा अस्वस्थता येते.

माझा अनुभव असा आहे की, झोपेमध्ये विशेषतः पहाटे जाग आली की, मला अशा न सुटलेल्या शब्दकोड्याची आठवण होते आणि मी बुद्धीला चालना देत, वेगवेगळे अडलेल्या शब्दांचे उत्तर काढण्याचा प्रयत्न करतो. न सुटलेले सारे कोडे मला अशाच साखरझोपेच्या वेळी, पहाटे पहाटे पुष्कळदा सुटते आणि खूप आनंद होतो.

त्या दिवशीचं उदाहरण सांगता येईल, चार-पाच शब्द मला अडले होते. आडवे असलेले-तकलादू वा अशक्त, अल्पवयस्क,
नीतिमान, तर उभे शब्द कन्या, वरवर वाचणे, समीक्षक, सचोटी आणि व्यवसाय असे. काही केलं तरी एकमेकात अडकलेली ही शब्दांची साखळी, सुटतच नव्हती.

पण अचानक मला तकलादू वा अशक्त ह्यासाठी, लेचापेचा असा शब्द सुचला आणि पाहता पाहता प्रत्येक उभ्या शब्दांचे कन्या साठी लेक, तर वरवर वाचणे साठी चाळणे त्याच प्रमाणे नंतर सचोटी साठी नेकी आणि चौथा जो उभा शब्द होता तो व्यवसाय ह्याकरता, पेशा, समीक्षक
साठी परीक्षक अशी उत्तरे मिळून गेली. मला खूप आनंद झाला आणि समाधान वाटले. खरंच कोडे कधी कसे सुटेल काही सांगता येत नाही. ते सुटेपर्यंत आपला पिच्छा पुरवत असते. त्यातून कदाचित झोप झाल्यानंतर पहाटेच्या वेळी आपली बुद्धी व स्मरणशक्ती तल्लख होत असावी आणि न सुटलेली शब्द कोड्यांची ही जाळी, आपण योग्य तऱ्हेने मार्गी लावू शकतो, हे अनुभवावरून मला समजले.

ह्या साध्या अनुभवावरून, माझ्या लक्षात आले की, आपले आयुष्य हे देखील एक कोडे आहे, न सुटणारे आणि कायम आपल्या भोवती फिरत राहणारे ! परंतु शब्दकोडे, शब्दकोडे जसे असे अचानक अलगदपणे सुटून जाते, त्याचप्रमाणे आयुष्यातली कोडी, अर्थात आपल्या आयुष्यात येणाऱ्या चित्रविचित्र माणसांचे तसेच आगळेवेगळे अनुभव, त्यांचे स्वभाव, त्यांच्या बरोबरचे आपले परस्पर संबंध, जे अगदी कधी कसे येतील ह्याचा पत्ता नसणे, अशा तऱ्हेच्या आडव्या-उभ्या शब्दांच्या कोड्याप्रमाणे, अनेक साखळ्या आपल्या आयुष्यात सारख्या आपल्याभोवती फेर धरत असतात. आपला चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यूही कधी कधी होतो.

कोणतेही कोडे जर सोडवायचे असेल, तर आपल्याला थोडा विचार करावा लागतो, स्मरणशक्तीला ताण द्यावा लागतो. हे असेच आयुष्याच्या बाबतीत जर वापरायचे झाले, तर त्याला उत्तर म्हणजे, आपण ज्या ज्या माणसांच्या मग ते निकटचे वा दूरचे असो किंवा कुणाशीही आपला संबंध येतो ती माणसे, आपल्याला चांगली वाचता यायला पाहिजेत. कोण कोणत्या परिस्थितीत कसा वागेल याचा आडाखा आपल्याला बांधता आला, तर आपण आयुष्या पुढील कोड्यांचे चोख उत्तर मिळतेच, आपण आयुष्यही अधिक आनंदी व समाधानी करू शकतो. एक साधे शब्द कोडे सोडवणे, पण त्यावरून आयुष्याचे कोडे असे सुटले की, आहे की नाही गंमत !

####################
2
"दीड दमडी":
रविवारच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये आज एक वेगळेच स्फूट वाचले-'दीडदमडी' ह्या सदरामध्ये तंबी दुराई नेहमी उपरोधिक अशा पद्धतीचे लेखन करत, सांप्रतच्या एकंदर व्यवस्था व परिस्थितीवर प्रकाश टाकत असतात. या अशा छोट्याशा लेखांमधून म्हणून मटामधली पुरवणी हातात घेतली की, पहिल्यांदी मी हे 'दीड दमडी' वाचतो.

ह्यावेळी 'दीड दमडी'तील "देह वाहत राहिले" हे आगळेवेगळे स्फुट वाचायला मोठी उत्सुकता होती. त्यामध्ये अकाली कोरोनामुळे मृत्यू पावलेले दोन देह गंगेमधून वाहत चालले आहेत आणि एकमेकांच्या जवळ आल्यामुळे एकमेकांच्या सहवासात गप्पा मारत चालले आहेत असा प्रसंग ह्या दीड दमडी मध्ये वर्णिलेला आहे.

त्या दर्दभर्या संवादातून कोरोना सारख्या महामारी मध्ये ती हाताळताना आपल्या सगळ्यांचेच विशेषतः राजकारणी नेतृत्वाच्या धोरणांचे अक्षरशः पीतळ उघडे केले आहे. दुसऱ्या लाटेमधील अक्षम्य दुर्लक्ष व हलगर्जीपणा, त्याच प्रमाणे , सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती भयानक कमकुवत आणि तीचा बोजवारा उडालेला, त्यामध्ये सुधारणा करण्याऐवजी इतर नको त्या बाबींवर कसे प्राधान्य दिले गेले ते नकळत ऐरणीवर येते. लसीकरणा सारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या बाबतीतही धोरण पूर्णपणे कसे अदूरदर्शी व चुकीचे ठरले यावर प्रकाश टाकला आहे. ते वाचून मन विषण्ण होते.

कोरोनाची महामारी हाताळण्यात खरोखर सगळ्यांनी विशेषता राजकीय धुरीणांनी व धोरणकर्यांनी जी काही हलगर्जी व बेपर्वाई दाखवली त्यावर मनापासून विचार करून सुधारणा करायला हवी आहे, ही बाब या लेखातून पुढे आली.

सहाजिकच संपूर्ण कारभार यंत्रणेच्या व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर असलेल्या माणसांचे कर्तव्य आणि उत्तरदायित्व यासंबंधी गांभीर्याने विचार करायला हवा आणि विहीत कर्तव्य बजावण्यात अथवा उत्तरदायित्व पूर्ण करण्यात अपयश आले, तर त्या प्रमादा बद्दल काही ना काही तरी योग्य ही दंडात्मक शिक्षा असायला हवी हाही विचार या 'दीडदमडी'ने ने दिला.

ह्या विचारधारेला पुरक असा एक लेख माझ्या वाचनात आला:
"लस का लांबली?"

'दीड दमडी' या मटा मधील सदराचा असा परामर्श घेऊन झाल्यावर, अचानक बुधवार दिनांक २५ मे चा महाराष्ट्र टाईम्स वाचनात आला. आपल्या देशात "लस का लांबली?" हा मटा मधील प्राध्यापक सुधीर पानसे यांचा लेख, कोरोना महामारीला तोंड देताना, आपण कोणत्या अक्षम्य चुका केल्या, त्यामधील लसीकरणाचा विषय येथे विस्ताराने मांडला आहे.

सारे देश जेव्हा लाखो डॉलर्स गुंतवून करोनाच्या लशींची खूप आगाऊ मागणी नोंदवत होते, तेव्हा आपण नुसते बसून होतो. यामागे नुसती दिरंगाई नाही तर तज्ञ आणि वैज्ञानिकांबद्दल व त्यांच्या सल्ल्यांबद्दल जी अनास्थेची भावना सत्ताधाऱ्यांमध्ये होती, त्याचीच आपल्याला आता भयावह अशी किंमत मोजावी लागते आहे, अशा तऱ्हेचा घोषवारा, लेखकाने गेल्या वर्षातील इतिहासांतील घडामोडींचा पट मांडत आपण किती दुर्लक्ष दिरंगाई आणि हलगर्जीपणा तसेच दूरदृष्टीचा अभाव दाखवला, त्याचा हा लेख निदर्शक आहे.

शेवटी संकटांचा मुकाबला हा विद्वानांचा योग्य तो आदर त्यांच्या मताला योग्य ती किंमत देऊनच करता येतो हे आपण मानले नाही. त्याउलट आपलं म्हणणं तेच खरं, यामागे समर्थकांचा तांडाही असतो, त्यामुळे जे योग्य आहे, बरोबर आहे आणि संयुक्तिक आहे, त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते असे एकंदर आपल्याला म्हणता येईल.

##############

3
गद्धे पंचविशी !":

From: सुधाकर नातू
To
डॉ. रविन थत्ते
नमस्कार.

तसा दररोज आमच्याकडे महाराष्ट्र टाइम्स तो सुरू झाल्यापासून दररोज येतो. हल्ली मात्र मी दर शनिवारी लोकसत्ता घेतो, कारण त्यातील चतुरंग पुरवणी आणि त्या चतुरंग पुरवणीमधील गद्धे पंचविशी हे सदर मी प्रथम नेहमी वाचत असतो.

परवाच्या शनिवारी, सहज असाच सकाळी नाष्टा झाल्यावर पहुडलो असताना लोकसत्ता चतुरंग पुरवणींत आपण लिहिलेल्या गद्धेपंचविशी लेख वाचला व त्याला अलौकिक, अविस्मरणीय की दिलखुलास काय म्हणू कळत नाही. हा लेख एका दमात वाचला आणि मी अक्षरशः भारावून गेलो, आपण पाहता-पाहता गद्धेपंचविशी बद्दल जे भाष्य केलं आहे त्या संदर्भात माझी ही दाद त्याला देत आहे.

गद्धेपंचविशी हा आयुष्यातला सगळ्यात रोमांचक आणि वळण देणारा कलाटणी देणारा असा कालखंड. या वयामध्ये तारुण्य सळसळते, उत्साह उतू जात असतो आणि काहीना काहीतरी नवनवीन करावे असे वाटत असते. म्हणजेच नाविन्याची ओढ, धोका पत्करण्याची तयारी आणि काही तरी कसेही करून आपल्याला स्वतःला सिद्ध करणे, ह्या इर्षेचा तो रोमहर्षक पंचविशीचा काळ असतो. आपण म्हटल्याप्रमाणे तुमची ही गद्धे पंचविशी सातत्याने पुढे तशीच अक्षरशः उतू जावी अशीच होत राहिली आहे, ह्याचे आश्चर्य मिश्रीत कौतुक वाटते.

आपली गद्धेपंचविशी केवळ त्या काळापुरतीच मर्यादित न राहता, आज ८२ व्या वर्षापर्यंतही अबाधित राहिली आहे, ते अनेक 'उचापतीं'मधून, आपल्या यशस्वी वाटचाली वरून सिद्ध केले आहे त्याबद्दल अभिनंदन. माझे काही चुकत नसेल तर "ग्रंथाली" च्या नोबेलनगरीची नवलकथा अर्थात नोबेल पुरस्कार मिळविणार्यां विषयीचे आपले लेखन ह्या लेखात कसे नाही, हे जाणवलं.
आपल्या लेखामधील काही काही वाक्यांतून, तर खरोखर शाश्‍वत, सनातन, चिरकाल टिकणारी अशी सत्येच आपण मांडली आहेत असे जाणवले, ती अशी:

* झालेली चूक कबूल करणे, यात थोडा त्रास होतो, मात्र नंतर खूप शांतता मिळते.
* तुम्हाला झोप येवो अगर न येवो काळ पुढे चालतच राहतो, तेव्हा झोपमोड करण्यात काहीच हशील नसतो.
* अमेरिकेला चलाख लोक हवे असतात, शहाणे नव्हे.
* गोष्टी घडत जातात, त्या कोणी करत नाही, त्यावर काळाची छाया असते, असे म्हणतात ते खोटे नाही.
* कर्माचे काहीना काही फळ मिळतेच, परंतु अध्यात्म दुष्कर आहे.

आपली ही गद्धे पंचविशी अशीच यापुढेही अविरत नवनवे योगदान देत राहो, ही मनःपूर्वक सदिच्छा.

आपला
सुधाकर नातू
माहीम, मुंबई १६
Mb 9820632655

ता.क.
माझीही शहात्तराव्या वयात बहरत असलेली गद्धे पंचविशी:
"माझा सोशल मिडीयावरील 'संसार'! ":
माझा ब्लॉग:
एकसे बढकर एक अडीचशेहून अधिक वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........
ही लिंक उघडा....

https://moonsungrandson.blogspot.com

लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....
I have you tube channel:

moonsun grandson

With over 75 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. Open this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

ह्याला आलेला प्रतिसाद:
"प्रिय सुधाकर मनःपूर्वक आभार. मी लिहिलेल्या विधानांमध्ये तत्त्वद्न्यान दडलेले होते हा आपल्या शोधामुळे माझे मन हरखले . शेवटी प्रत्येक माणूस लेखक आणि तत्त्ववेत्ता असतो हेच खरे. नोबेल वर लिहिणारा सुधीर माझा आडनाव बंधू आहे आणि मित्रही परंतु तो मी नव्हेच. तो माझ्या इतका खट्याळ नाही सज्जन आहे. .सवड मिळताच तुमचे लिखाण वाचण्याचा प्रयत्न करीनच 

तुमचा रवीन थत्ते"

#####################

धन्यवाद
सुधाकर नातू

शुक्रवार, २१ मे, २०२१

"विचारांचे अम्रुतमंथन":

 "विचारांचे अम्रुतमंथन":

/// "गोत्र आणि स्री पुरुष समानता !":
गोत्र म्हणजे काय या विषयावर एक चांगली ऑडिओ क्लिप मी ऐकली. माणसाच्या मुलाचा मुलगा त्यापासून त्याच्या वंशाची सुरूवात, अशा संकल्पनेवर गोत्र बांधलेले असते. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपासून म्हणजेच महत्त्वाच्या आठ ऋषींपासून मानववंश पुढे पुढे कसे जात राहिले, यासंबंधीची माहिती गोत्र या विषयावर तेथे दिली होती.

त्या वेळेला हे लक्षात आले की गोत्राचा उल्लेख फक्त पुरुषाच्या बाबतीत कायम विविध वेळी म्हणजे विवाह समारंभ, मुंज, विविध प्रकारच्या पूजा अशा वेळी केला जातो. फक्त मातुल घराण्याच्या गोत्राचा उल्लेख केवळ कन्यादानाच्या वेळेलाच केला जातो. हे असं कां? स्त्री ही खरं म्हटलं तर पुरुषापेक्षा मानववंश पुढे जावा म्हणून झटणारी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असते, किंबहुना कांकणभर जास्तच योगदान तिचे यामध्ये असते. पुरुषाचे योगदान केवळ बीजारोपण करण्यापुरतेच असते आणि नंतर ती पुढची सारी उस्तवार करण्याची जबाबदारी स्त्रीवर नैसर्गिकरित्या येते, हे सर्वांना ठाऊक आहे. नऊ महिने प्रसववेदना सहन करून अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून वापस येऊन बाळ अंत पण अशा तऱ्हेने नवनिर्मिती बाळ निर्माण होत असते. शिवाय त्यानंतर चे संगोपन देखील स्त्रीच करत असते.

ह्याशिवाय संसाराचा गाडा कायम आयुष्यभर शक्यतो घरातील सगळी कामे स्त्रियाच करत असतात. हे असं पूर्वापार चालू असून सुद्धा आजतागायत स्त्रीच्या बाजूचा विचार केला नाही. मातुल घराण्यातल्या गोत्राचा उल्लेख नंतर कधीच कां येत नाही, हे प्रश्न माझ्या मनात ही ऑडिओ क्लिप ऐकल्यावर निर्माण झाले. स्त्री पुरुष समानता यावर कितीही कंठशोष केला, तरी खरोखर पुरुषप्रधान अशा या व्यवस्थेमध्ये स्त्रीला जे दुय्यम स्थान दिले आहे, ते पूर्णतः अनैसर्गिक आणा अयोग्य असे आहे. सहाजिकच यापुढे तरी स्त्रीला योग्य ते स्थान कसे देता येईल, कौटुंबिक व्यवस्थेमध्ये दोन्ही बाजूच्या गोत्रांचा विचार करून सांगड कशी घालता येईल, याचा विचार व्हावा. त्याप्रमाणे मार्ग शोधला जावा असंच मला यानिमित्ताने वाटलं.
जे वाटलं ते इथे मांडलं !

/// "उमलते बोल":
"उमलते बोल":
# ऐहिक संपत्तीपेक्षा उत्तम शरीरसंपदा
लाखमोलाची.
# निर्व्यसनीपणा हा मनोनिग्रहचा दर्शक असतो. # सत्संगतीमुळे आपणही चांगल्या विचारांच्या वातावरणात राहतो.
# उत्साह व आनंद म्हणजे जीवनातले खरे मित्र. # परिस्थिती व वेळ पाहून वागणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.
# बदलत्या परिस्थितीचा स्वीकार करून त्यानुरूप आपण बदलावे.
# स्वतःच्या मर्यादा ओळखण्याची हुशारी हवी.
# प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती त्याच वेळी
करावी.

/// 👍👍👍
"नवनिर्मितीची किमया":
परफॉर्मिंग आर्ट अर्थात नवनिर्मितीचा आविष्कार हा नृत्य नाट्य चित्रपट वा चित्र, संगीत लेखन कुठल्याही स्वरूपात असो, ते व्यक्त करणारा, एक अभिजात प्रतिभावंत असतो आणि त्याला ती निर्मिती करताना विलक्षण आनंद होत असतो. परंतु ती नवनिर्मिती जेव्हा इतरांपर्यंत पोहोचवली जाते, आणि रसिकांची त्याला दाद मिळते, तेव्हाच त्या निर्मितीची एकंदर पूर्तता, सार्थकता होत असते.........

/// "सोशल मिडियावरील संदेश":
माझ्यापुरते बोलायचे झाले तर, मी voice to text app वापरून माझे लेखन करतो. नंतर व्यावहारिक सुलभता म्हणून आपण contents द्वारे substance देत आहोत, ह्याला प्राधान्य असणे गरजेचे ह्या द्रुष्टीने त्याचा फक्त आढावा घेतो, भाषेची शुद्धता वा व्याकरण हे मुद्दे गौण आहेत असे मानून त्याकडे दुर्लक्ष करतो. सहाजिकच माझ्या भाषेत शुद्धलेखन विषयक चुका असू शकतात आणि त्यांवरील प्रतिसादापेक्षा, माझ्या संदेशातील substance संबंधीत दाद अथवा फिर्याद मी अपेक्षितो.
👌👌
आता सोशल मिडियावरील पुढे ढकललेला एक उपयुक्त संदेश:

/// 👍👍 "सन फ्लॉवर थिअरी" :
जसा जसा सूर्य पुढे पुढे सरकतो तसे हे सूर्य फुलं आपले तोंड त्या दिशेला करीत असतात. म्हणजेच सुर्य प्रकाश समोरून ग्रहण करीत असतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण याबाबतीतील एक रहस्य कदाचित आपणास माहिती नसावे. ढगाळ आणि पावसाळी वातावरणात जेव्हा सूर्य संपूर्ण झाकला जातो त्यावेळी काय घडते? तुम्हाला वाटेल की ती फुलं मिटत असतील किंवा जमिनीकडे तोंड करीत असतील, नाही कां?
नाही.
तर काय घडते त्यावेळी?
ही फुले खाली किंवा वरती नाही वळत तर ती वळतात समोरासमोर! एकमेकांना आपली साठवलेली ऊर्जा देण्यासाठी, इतरांनाही जगविण्यासाठी !! निसर्गाचं परिपूर्ण तेच वरदान खरंच आश्चर्यकारक आहे!! माणसाने ही निसर्गाची प्रतिक्रिया आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे. समाजात अनेक लोक काळजीने, चिंतेने, परिस्थितीने ग्रासलेले असतात. तेव्हा ही सूर्यफूल थिअरी उपयोगात आणली पाहिजे. जसे एकमेकांना मदत करणे आणि ऊर्जा प्रदान करणे, मनोबल वाढविणे ! तर सर्वांना सदिच्छा देऊ या की आपणही सूर्य फुलासारखे वागूया, संकटाच्या, निराशेच्या ढगाळ वातावरणात एकमेकांना साथ देऊ या, आपल्या चांगुलपणाची साक्ष देऊ या !!

/// "परिक्षा व प्रतिक्षा !":

"परीक्षे"चा खराखुरा निकाल वेगळा,
आणि अंदाज वेगळा!

"निकाल" अजून लागलेला नाही,
म्हणून कुणी अर्ध्या हळकुंडाने पिवळे
जसे होऊ नये,

तसेच निराश होऊन देखील कुणी
पाणी पाणी करू नये!

घोडामैदान जवळच आहे.
वाट बघायची.
शेवटी,
कुणाची तरी वाट लागायची आहेच!

/// "संधी गमावली की घालवली?":
काल रात्री, मुंबई इंडियन्सच्या बिनबाद ४५
धांवसंख्येवरून, जेव्हा त्यांचा डाव १५० धांवातच गडगडला, तेव्हाच निराशेची झुळूक मनात अवतरली होती.

नंतर चेन्नई, चक्क ७० धावा आणि एकच बाद, असा धावफलक पाहिल्यावर तर, आता मुंबईचा
पराभव निश्चितच, असे वाटून सामना बघणे बंदच करून मी झोपी गेलो.

आज सकाळी उठल्यावर, वर्तमानपत्रात मुंबई इंडियन्सचा एका धावेने विजय, हे वाचून थक्क झालो, एक सुखद धक्काही बसला. परंतु त्याच बरोबर आपण एका रोमहर्षक, आशा निराशेचे हिंदोळे असणारे एक झंझावाती वादळ पाहण्यास मुकलो याची खंत वाटली, रुखरुख वाटली.

पण वेळ गेलेली होती. मी संधी गमावली नव्हती, तर घालवली होती.

त्यातून मिळालेला धडा असा की,
"धोका पत्करला तर व तरच, संधी मिळण्याची शक्यता निर्माण होते" हा!
(My fb post of 13th May'19)

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच उत्तमोत्तम अंतर्मुख करणारे......
अनेक लेख वाचण्यासाठी..........
ही लिंक उघडा.......

https://moonsungrandson.blogspot.com

लेख आवडले.......
तर लिंक संग्रही ठेवा...... शेअरही करा.........

सोमवार, १० मे, २०२१

"उडदामाजी काळे गोरे !":

 "उडदामाजी काळे गोरे !":

१.
"सत्तेचे गुलाम":
सत्तेचं राजकारण पहाता पहाता, काँर्पोरेट कल्चर अनुसरताना दिसत आहे. जसे कोणत्याही कंपनीत आपले भवितव्य तितकेसे समाधानकारक नाही, म्हणून महत्वाकांक्षी माणसे, ह्या कंपनीतून त्या कंपनीत, अशा उड्या मारत अल्पावधींत अधिक सत्ता, अधिकार आणि संपत्ती प्राप्त करतात, तसेच धोरणी व मुरब्बी राजकारणी आयाराम, गयारामचा खेळ खेळताना दिसतात.

काँर्पोरेटमध्ये, निदान उघड, उघड वैयक्तिक विकास व प्रगती अन् भरभराट हा हेतू असतो; मात्र राजकारणांत तसे न दर्शविता, ह्या इथून तिथे अशा उड्या, आपण केवळ जनतेचे हित व अधिक गतिमान विकास व्हावा, म्हणून मारत आहोत, असा आव आणला जातो.

विशिष्ट ध्येये, तत्त्वे आणि प्रामाणिक निष्ठा, ह्या सत्तेसाठीच्या पक्षीय राजकारणांतून पार हद्दपार झालेल्या त्यामुळेच दिसतात. मात्र दुर्देव एवढेच नाही, तर ह्या सार्या विधीनिषेधशून्य व स्वार्थाने बरबटलेल्या खेळांचे कुणालाच-ना तो करणार्यांना काही वाटत नाही अथवा बहुदा, तो उघड्या डोळ्यांनी पहाणार्या सर्वसामान्य जनतेलाही त्याचे काहीच वाटत नाही, समजा चुकून खंत वाटली, तरी काहीही फरक पडत नाही हे!

उत्तरोत्तर हा आयाराम गयारामचा तमाशा अधिक वेगाने व बिनदिक्कतपणे वाढत जाणार आहे आणि सत्तेसाठीचे राजकारण हे राजकारण न रहाता, फक्त फायदे व तोटे बघणारा व्यावसायिक व्यापार-उद्द्योग बनणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि सर्वांसाठीचे हित व विकास हे शब्द इतिहासजमा होणेही, आता कदाचित् फार दूर नाही.
२.
"जाणीवांची श्रीमंती !":
माणसांची श्रीमंती पैसाअडका, सोनेनाणे, जमीनजुमला व इतर स्थावर, इत्यादींवर सर्वसाधारणपणे मोजली जाते, समजली जाते. पण खरं म्हणजे तोच माणूस खरा श्रीमंत, ज्याच्या जाणिवांचा भवताल अतिविशाल असतो तो.

माणसाला जाणिवा अर्थात विविध प्रकारची माहिती ज्ञान अवगत असले तर तो जो माणूस बहुश्रुत तोच खरा श्रीमंत असं मानायला हवं. कारण माणूस माणूस म्हणून इतर सजीवां पेक्षा वेगळेपण जर कोणतं माणसात असेल, तर ते म्हणजे सभोवतालच्या एकंदर परिस्थितीचे आकलन जाणिवांचा रूपात होते ते करून घेण्याची त्याची अमोघ शक्ती, जी प्रत्येकाची वेगळी असते. ती वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेऊन वाचन करून प्रवास करून अनुभव घेऊन वाढत जाते.

मात्र तशी ती वाढायला हवी ही ईर्षा इच्छा मात्र माणसाजवळ हवी. मला तरी असं वाटतं की, कायम माणसाने नवनवीन शिकत जावे, माहिती, विविधांगी ज्ञान गोळा करत राहावे आणि आपल्या जाणिवांचे क्षेत्र अधिकाधिक विस्तीर्ण करत जावे. नाही तरी कोणीतरी म्हटलंय की, ज्ञान हे महासागरासारखं आहे आणि आपल्याला जे काही ज्ञात असतं, ते एक जलबिंदू इतके पण नाही. म्हणून आता एकांतात आता घरात बसलेले असताना, आपण हेच केलं पाहिजे की आपलं एकंदर ज्ञान माहिती वाचन वेगवेगळ्या प्रकारे वाढवून आपल्या जाणीवांचा भवताल सातत्याने विस्तारत राहीले पाहिजे.
तीच आपली खरी श्रीमंती !
३.
"जग ही एक रंगभूमी आहे !":
माणूस लहानाचा मोठा होताना, त्या त्या वेळेला जसे वागतो, ते कदाचित बरोबर अथवा चूक असू शकते. मात्र ते ठरवायला त्याचा पुढचा काळ जावा लागतो आणि बऱ्याच वेळेला मागे वळून पाहतांना, बहुतेकांना कळून चुकतं की, आपण त्या त्या वेळेला जे वागलो हे चुकीचंच होतं. हे असं याकरता की, अगदी बरोबर तंतोतंत योग्य असे, योग्य वेळी वागणारे थोडेच असतात आणि तेच कदाचित पुढे आयुष्यात यशस्वी झालेले दिसतात.

ज्या अर्था, तसे यशस्वी झालेल्या, प्रसिद्धी मिळवणार्या, नांव कमावलेल्या व्यक्तींचं प्रमाण बहुतांश नगण्य असते, हे जर गृहीत धरलं तर बरीच माणसं, नको ते नको त्यावेळी वागत जातात आणि म्हणून आयुष्यात कायम धडपडत किंवा अयशस्वी असलेले दिसतात. हे जरी खरं असलं तरी प्रत्येकाला त्याच्या कुवतीप्रमाणे काही ना काही तरी मिळतच मिळतं आणि हे मिळताना अनेक अचानक संधी आणि अदृश्य हात त्याला सहाय्य करत असतात हेही आपल्याला ध्यानात येईल.

शेवटी ही जीवन हे एक न सुटलेले कोडे आहे आणि प्रत्येक जण जर ठरावीक चाकोरीबद्ध वागत गेला, तर मग आयुष्यातली जी गंमत आहे ती निघून जाईल. एकेक आयुष्य हे म्हणजे जणू एक रोमांचक कादंबरी अथवा नाटक असतं. अखेर खरंच आहे की, शेक्सपीयरने म्हटल्याप्रमाणे "जग ही एक रंगभूमी आहे" हेच खरे !
४.👍👍👍
# "नवनिर्मितीची किमया":
परफॉर्मिंग आर्ट अर्थात नवनिर्मितीचा आविष्कार हा नृत्य नाट्य चित्रपट वा चित्र, संगीत लेखन कुठल्याही स्वरूपात असो, ते व्यक्त करणारा, एक अभिजात प्रतिभावंत असतो आणि त्याला ती निर्मिती करताना विलक्षण आनंद होत असतो. परंतु ती नवनिर्मिती जेव्हा इतरांपर्यंत पोहोचवली जाते, आणि रसिकांची त्याला दाद मिळते, तेव्हाच त्या निर्मितीची एकंदर पूर्तता, सार्थकता होत असते.........

# "Accept, Adopt & Adjust":
सध्याच्या कसोटी पहाणार्या काळात लक्षात ठेवा, प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेणे, अत्यावश्यक आहे. काळ हा सतत बदलत असतो, हेही दिवस संपणार आहेत ही खात्री मनाशी बाळगा....
५.
"शहाणपण देगा, देवा !":
कधी कधी, एखादी व्यक्ती मनाविरुद्ध वागली किंवा तिच्या चुकीमुळे नुकसान झाले, तर आपले ताणतणाव असह्य होतील इतके वाढत जातात. परस्पर संबंधांतही कटूता येते. भांडण तंटे, वितुष्ट शत्रुत्व ह्या त्या नंतरच्या अनिष्ट गोष्टी असतात. अपेक्षा भिन्नता, स्वभावां प्रव्रुत्तींमधले फरक ह्या सार्याच्या मुळाशी असतात..........

व्यक्तिगत, व्यावसायिक जीवनांत हे तर पुष्कळदा असेच घडत असते, घडत रहाते आणि राहील. सामंजस्य, परस्पर सहकार ह्यांची नितांत गरज आहे, हेच खरे. हा महत्वाचा शहाणपणा कसा असतो, ते ज्याचे त्याने स्वानुभवातून शिकायचे असते. "पुढच्यास ठेच, मागचा शहाणा", हे नेहमी ध्यानात असूं द्या......

अखेर,
सोशल मीडियावर दररोज आपल्याला खूप खूप काही मिळू शकतं, फक्त त्याकरता दृष्टी हवी, विचारांची दिशा हवी आणि मोकळे मन हवे, तरच तुमच्याही असं काही ना काही पदरात पडू शकते, हे लक्षात ठेवा......

तसेच,
"सुखवणारी गोष्ट सांगितल्याने द्विगुणीत होते, तर दुःख उलगडण्याने निम्मे होते.....
ह्या मनीचे, त्या मनी देणे अन् घेणे, ही शांती, समाधान देणारी किमयाच......

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच उत्तमोत्तम अंतर्मुख करणारे......
अनेक लेख वाचण्यासाठी..........
ही लिंक उघडा.......

https://moonsungrandson.blogspot.com

लेख आवडले.......
तर लिंक संग्रही ठेवा...... शेअरही करा.........

शनिवार, ८ मे, २०२१

"नशिबाचा हा खेळच न्यारा !":


"नशिबाचा हा खेळच न्यारा !":
प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. कुणाला व्यावहारिक जीवनात यश मिळते, तर कोणाला सांसारिक आयुष्यात. कोणाच्या वाट्याला कसे फासे पडतील नशिबाचे, हे काही केल्या सांगता येत नाही.

प्रत्येकाच्या जीवनाचा अर्थ, प्रयोजन आणि अखेर पदरी पडलेले फळ व म्रुत्युनंतर काय होते, ह्याचा कितीही शो़ध घेतला तरी ते गुढ, आजतागायत ना कुणाला उलगडले वा कधी ते कुणाला उमजेल !

"सुखदुःख्खांचा लपंडाव":
हा गृहस्थ हुशार, चतुर व्यावहारिक जीवनात स्वतःच्या हिमतीवर आणि करामतीवर अत्युच्च पदावर पोहोचला. मानमरातब पैसाअडका सगळ्या प्रकारचं सौख्य त्याला लाभलं. ही झाली व्यावहारिक जीवनाची बाजू. पण संसारिक बाबतीत काय झालं तर, आई वडिलांच्या मनाविरुद्ध अशा तरुणीशी लग्न केल्यामुळे आई वडिलांशी त्यांच कधीही पटलं नाही. वडीलां मागोमाग सासू आणि सुनेचे कायमचे भांडणे-तंटे होत राहिले. त्यामुळे मुलांवर देखील परिणाम झाला आणि ती कुढी आणि अबोल बनली. म्हातारी आई गेल्यानंतर तरी ह्या ग्रहस्थाच्या संसाराला चांगलं वळण लागेल असं म्हणावं, तर मोठ्या मुलीने प्रेमविवाहात नको त्या तरुणाशी पळून जाऊन विवाह केला खरा, पण ती त्यांत सपशेल फसली आणि हाल हाल सहन न झाल्याने, तिच्या घटस्फोटाची फरफट ह्या माणसाला करायला लागून ती परत आली. त्यानंतरच्या दोन मुलांचाही विवाह होणे कठीण बनून गेले. तिशी पस्तीशी उलटली तरी ही तीनही मुलं घरात आणि हा माणूस बिचारा सत्तरीला आलेला. खडतर नशीब ह्याच्या सांसारिक जीवनात, कधीही सुख समाधान शांती न लाभणे ह्याला काय म्हणायचे?

"दैव जाणिले कुणी?":
ही दोन बहिणींची कहाणी. दोन बहिणी आपापल्या मार्गाने विवाह करून संसारात मग्न होत्या. मोठी आणि छोटी, त्या दोघींची परिस्थिती तशी साधारण समानच होती. पण नंतर झालं काय, तर धाकट्या बहिणीच्या नवऱ्याने कुठेतरी एका बिल्डरकडे पैसे गुंतवले, जी काय पुंजी होती, गांवचं अमुक-तमुक सारं विकून चांगली मोठी प्रॉपर्टी किंवा फ्लॅट घेण्यासाठी पैसे गुंतवले. मोठ्या बहिणीच्या नवऱ्याने मात्र हा कितीही मागे लागत असला तरी, हे टाळलं.

मग झालं काय, तर त्या बिल्डरने दगा दिला आणि त्या माणसाची होती नव्हती तेवढी पूंजी तर नष्ट झालीच आणि परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली. पुढे अशी वेळ आली की मोठ्या बहिणीचे नशीब उत्तरेकडे भरारी, तर हया धाकट्या बहिणीचे दक्षिणेकडे घसरगुंडी, अशी दोघांच्या नशिबाची फडफड झाली. त्यामुळे मोठ्या बहिणीचा संसार चांगला सुखसमृद्धीचा झाला, तर धाकट्या बहिणीच्या संसारात फरफट, मुलांना शिक्षणाची पण वानवा. हे असं कां व्हावं? दोन्ही बहिणी सख्या, फक्त वेगवेगळ्या वेळी जन्माला आलेल्या त्याच्या आई-वडिलांच्या पोटी, पण दोघांची आयुष्ये मात्र वेगळी, असं कां होतं, आहे उत्तर ?

"मनमनास उमगत नाही !":
आता ही दोन उदाहरणे बघा. हा माणूस अतिशय हुशार कर्तबगार आणि लोकांमध्ये मिळून मिसळून आनंदाने राहणारा, तसा जीवनात यशस्वी इतरांनाही कायम आनंदी ठेवणारा. परंतु पुढे काय झालं कुणास ठाऊक, त्याच्या आयुष्यात असं काय झालं की त्याने सार काही यश समृद्धी संसार चांगला असूनही त्याने कुणाच्याही ध्यानी मनी नसताना आत्महत्या केली ! खरंच, कुणास ठाऊक, काय काय एकेकाचं नशीब असतं, ते कधी कळत नाही, हेच खरे ! अक्षरशः विश्वास बसू नये अशीच कहाणी होती ह्या हरहुन्नरी माणसाची.

दुसरी कहाणी एका स्त्रीची. तिचा संसार तिला अनुरूप अशा माणसाचे साथीने सुरू झाला. दोन मुलगेही जन्माला आले, पण दोन्ही मुलगे वेगवेगळ्या प्रकारचे निघाले. धाकटा अतिशय हुशार आणि नोकरी-व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती करत जाणारा, तर मोठा परीक्षांमध्ये नापास, वाईट संगत आणि कायम काही ना काही तरी भानगडी करून आई-वडिलांना व्याप देणारा. पन्नाशी आली तरी त्याच्यात काही सुधारणा नाही. या वृद्ध आई-बाबांना मात्र कायम काहींना काही काळजी. जवळ होती नव्हती ती पुंजी या मुलाच्या भानगडी निस्तरण्यात गेली आणि अखेर धाकट्या मुलाकडे हात पसरायची वेळ आली. खरंच असं का व्हावं? याला उत्तर नाही.

प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं, एवढं म्हणून गप्प राहायचं, दुसरं काय ! खरंच जीवन म्हणजे एक गुढ कोडेच आहे. माणूस आपल्या करणीने आपलं भविष्य घडवत जातो, हे खरं आहे. परंतु फुकट जाणारी आयुष्य अशी काय होतात की ती माणसे, नको त्या गोष्टी, नको त्या वेळी करून आपले आयुष्य वाया घालवतात ?

"दुर्दैवाचे खडेच खडे !":
अखेरीस या बाईची कहाणी बघा. या बाईचा नवरा कधी घरात काही मदत करायचा नाही, कुठल्याही व्यवसायात नीट लक्ष घालायचा नाही. मध्येच संसारातून मुक्त होऊन कुठे तरी निघून जायचा, पुन्हा यायचा. असा ऊन पावसाचा खेळ करत त्या बाईचा संसार रुठू खुटू चालला होता. अखेर नवरा छोट्या आजाराने मरण पावला आणि त्याच्या मागे या बाईने आपल्या संसाराचा गाडा, मसाले लोणची पापड अशाच काही गोष्टी विकून पुढे नेला. दोन मुलींचे विवाह योग्य ठिकाणी करून दिले, पण नशीब बघा मोठा करता सावरता मुलगा देखील त्याच्या वडिलांसारखाच निघाला ! हरी हरी करत, मध्येच कुठे यात्रेला जायचा व अचानक परथ यायचा. आईला मदत राहिली दूरच, वापस आला की तिच्या डोक्यावर ह्याचा भार. त्यामुळे त्याच्यावर काही तिची भिस्त नव्हती. धाकटा मुलगा मात्र गुणी, आपल्या हुशारीने मॅट्रिक होऊन कुठेतरी नोकरीला लागला. आतातरी बाईला चांगले दिवस येतील, असं वाटतं न वाटतं तोच ह्या मुलाला काय अवदसा आठवली देवच जाणे. ऑफिस मधल्याच कुठल्यातरी मुलीशी त्याचं प्रेम जुळले आणि आईला न विचारता परस्पर विवाह करून देखील तो आला. त्याला अगदी विजोड अशी ती मुलगी होती आणि ह्या अभागी बाईची सारी स्वप्न धुळीला मिळाली होती. पण हाय, इथेच नशिबाची कहाणी संपत नाही. विवाह झाल्यावर कंपनी मध्ये संपन्न झाला त्याची आणि त्याच्या पत्नीची नोकरी गेली आणि घरामध्ये केवळ
भांडणं वाद विवाद अशीच होत राहिली. या सार्या फुटक्या नशिबाची अखेर, तो मुलगा कंपनीमधून घरी येत असताना अपघात झाला आणि त्यात मरण पावला. पसंत नसलेल्या विधवा झालेल्या सुनेबरोबर, या बाईला दिवस काढायची वेळ आली आणि अखेर शेवटी व्हायचं तेच झालं. ह्या म्हातारी झालेल्या बाईने देखील शेवटी आयुष्याला कंटाळून आत्महत्या केली ! आहे की नाही दर्दभरी करूण नशिबाची कहाणी?
हे असं का होतं आहे उत्तर?

सुधाकर नातू

ता.क.
असेच उत्तमोत्तम अंतर्मुख करणारे......
अनेक लेख वाचण्यासाठी..........
ही लिंक उघडा.......

https://moonsungrandson.blogspot.com

लेख आवडले.......
तर लिंक संग्रही ठेवा...... शेअरही करा.........