बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

"छाप पडलेले शब्द-24" : "96 व्या साहित्य संमेलना नंतरचे कवित्व !":

 

👍"छाप(पड)लेले 👍"रंगांची दुनिया 

👍"छाप(पड)लेले शब्द-28 !":💐

"लोकमान्य फिल्ममेकर!":

👍" छोट्या पडद्यावरती "लोकमान्य" ही लोकमान्य टिळकांवरची मालिका उत्तरोत्तर विलक्षण लोकप्रिय होत चालली आहे. याच विषयावरच्या चित्रपटापेक्षा अगदी वेगळा अभिमानास्पद इतिहास त्यामधून उलगडला जात आहे. 

अशा महत्त्वाच्या विषयावरती मालिका निर्माण करणारे श्री नितीन वैद्य, हे खरोखरच 'लोकमान्य फिल्म मेकर' आहेत. त्यांच्या वैविध्यपूर्ण आणि समाज प्रबोधनासाठी धडपडणाऱ्या कारकिर्दीचे यथातथ्य चित्र उभे करणारे हे वृत्त निश्चितच प्रेरणादायी ठरावे.":

##########.

👍"छाप(पड)लेले शब्द-23 !":💐

          "ऐकावे ते नवलच !":

"रस्तोरस्ती वाहतूक कोंडी, ही तर सर्वच महानगरे, शहरे आणि आता कदाचित गावांमध्ये सुद्धा माणसांना त्रस्त करणारी गोष्ट झाली आहे. वेळेचा अपव्यय आणि मनस्ताप त्याचप्रमाणे आर्थिक नुकसान अशा अनेक गोष्टी त्यामुळे सहन कराव्या लागतात. वाहतूक कोंडीवर मुंग्यांच्या शिस्तीचा कसा उपयोग करता येईल, यासंबंधीचे हे वृत्त म्हणूनच थक्क करणारे आहे. त्यातून काही सकारात्मक मार्ग सापडला, तर सोन्याहून पिवळे !"

##@#######@


👌 "छाप(पड)लेले शब्द-13 !":👌

👍" शारदोत्सव 'श्री पुं'ची 'सत्यकथा' !":👌

😊 "सालाबाद प्रमाणे वर्धा येथे लवकरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहे. तेथे साहित्याचा जागर आणि मराठी भाषेच्या भवसागरात साहित्यप्रेमी रंंगून जाणार आहेत. 

अशा वेळेला एक महत्त्वपूर्ण मन्वंतर, मराठी साहित्यामध्ये आपल्या जातीवंत संपादकीय कारकीर्दीमुळे घडवणारे श्री भागवत आणि त्यांच्या 'सत्यकथेेच्या' मराठी साहित्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद घेतली जाणार आहे. 

सत्यकथेतील निवडक कवितांचा संग्रह प्रकाशित होणार आहे, त्यासंबंधीचे हे वृत्त !":👌

###########

👍"छाप(पड)लेले शब्द-2 !:👌

👍"आठवणी दाटतात !": 💐

"बोलका चेहरा, डोक्यावर दाट कुरळे केस आणि दमदार आवाज या जोडीला धडाडी, नैसर्गिक सहजसुंदर अभिनय असे अतुलनीय मिश्रण असलेल्या, विनय आपटे यांच्या स्मृतीनिमित्त जो वृत्तांत महाराष्ट्र टाईम्स पुरवणीतआला, तो येथे द्यावासा वाटला.

विनय आपटेचे वडील आणि माझे वडील दोघेही रुईया कॉलेजमध्ये होते. माझे वडील अकाउंटंट तर विनय आपटेचे वडील पी टी फिजिकल ट्रेनिंग शिकवायचे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा कौटुंबिक परिचय होत गेला. ते कधी कधी आमच्या सायनच्या घरी देखील यायचे. त्यानंतर योगायोगाने विनय आणि माझी गाठ मुंबईच्या दूरदर्शन केंद्रावर, जेव्हा जेव्हा मी काही निमित्ताने किंवा माझा सहभाग असलेले काही कार्यक्रम रेकॉर्डिंग करायला जात असे, तेव्हा त्याची आणि माझी भेट व्हायची.

आत्मविश्वास असलेला आणि अत्यंत तडफदार उत्साही असा हा तरुण माझ्या मनावर खूप छाप पाडून गेला. त्याला पुण्यातील नामांकित रानडे वक्तृत्व स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले होते अत्यंत प्रभावी असे त्याचे वक्तृत्व होते.

जेेव्हा, मी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये पब्लिसिटी डिपार्टमेंटमध्ये असताना, तेव्हा देखील काही व्यावसायिक निमित्ताने त्याची माझी थोडीफार भेेटगाठ होत गेली. त्याच्या दादरच्या डि एल वैद्य रोडवरील जाहिरात संस्थेमध्ये मी एकदा गेलोही होतो आणि तिथे तो त्यांच्या सहकार्यांबरोबर तो ज्या उत्साहाने काम करायचा तेही माझ्या चांगले लक्षात आहे. 

पुुढे खूूप उशिराने झालेेली, त्याची माझी भेट ही कदाचित शेवटचीच ठरली, असे नंतर लक्षात आले. माझ्या मुलाकडे मी लंडनला 2011 मध्ये गेलो असताना, तिथे विख्यात अभिनेते निर्माते श्री महेश मांजरेकर यांनी आयोजित केलेला भव्य दिव्य कार्यक्रम Mifta मी पाहायला गेलो होतो, त्या वेळेला जी मांदियाळी कलाकारांची आली, त्यामध्ये विनयची माझी भेट झाली. 

असा हा अत्यंत गुणवंत चतुरस्त्र कलाकार नंतर सात डिसेंबर 2013 रोजी निधन पावल्यावर खूप दुःख झाले. आता त्यांच्या स्मृतीनिमित्त जो कार्यक्रम त्यांच्या पत्नी सौ आपटे यांनी आयोजित केला, त्याच्या ह्या वृत्ताने, मला या सगळ्या आठवणी उलगडायला प्रवृत्त केले."

🙏🏼 🙏🏼🙏🏼 🙏🏼🙏🏼🙏🏼



"छाप पडलेले शब्द-24" :

"96 व्या साहित्य संमेलना नंतरचे कवित्व !":

"अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी साहित्य संमेलन आयोजिले जाते. त्याकरता जनतेतर्फे देणगी रूपात निधी उभारण्याचे काम पुरेसे झाले नाही, इतकी वर्ष झाली तरी. परंतु नेहमीच शासनाकडून घसघशीत देणगी मिळावी, ही अपेक्षा मात्र ठेवली जाते. यावर्षी तर महाराष्ट्र शासनाकडून उदार अंतकरणाने घसघशीत दोन कोटी रुपये इतकी अनुदानाची रक्कम या संमेलनासाठी दिली गेली. परंतु त्यानंतर सोहळा तर दिसण्यापुुता पार पडला. मोठाले भव्य सुशोभित मंडपही उभारले गेले. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने नंंतर प्रकाशात आली, ती म्हणजे रसिक वाचकांचा त्या संमेलनाला पुुरेसा प्रतिसाद नव्हता. रिकामे मंडप किंवा रिकाम्या खुर्च्या बघण्याची वेळ आली. शिवाय मोठी देणगी मिळाल्यामुळे खर्चही तसाच आवाक्या बाहेर गेला असे वृत्तांवरून समजते.

पण सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे साहित्याचा जो दोन विभागांमुुळे विस्तार आणि प्रसार होतो, तो लेखक आणि प्रकाशक ह्या जोडगोळी शिवाय साहित्य वाचकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या दोन्हीही आवश्यक अशा समूहांना  योग्य तो मानसन्मान व व्यवस्था मिळायला हवी. लेखकांचा बडेजाव केला जातो, मांडला जातो. परंतु प्रकाशक मात्र दुर्लक्षित राहतात अशी व्यथा या सोबतच्या वृत्तांत समजते.

ही खरोखर अयोग्य व चिंताजनक अशी गोष्ट आहे. अशा महत्त्वपूर्ण सोहळ्यात कुठल्याच प्रकारची अव्यवस्था होता कामा नये, याची दक्षता यापुढे तरी घेतली जावी. आगामी शतक महोत्सवी साहित्य संमेलनात, रसिक वाचक, लेखक आणि प्रकाशक तसेच आयोजक व शासन या सर्वांचा  चांगला खेळीमेळीचा सहयोग अपेक्षित आहे. त्याप्रमाणे संबंधितांकडून आतापासूनच तयारी व्हायला हवी, असे सुचवावेसे वाटते.

धन्यवाद
सुधाकर नातू

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

"छाप(पड)लेले शब्द-21":

"छाप(पड)लेले शब्द-17 !":

"धूमकेतू, काय त्याचा हेतू?":

"माझ्या आठवणींप्रमाणे, लहानपणी 'चांदोबा' सारख्या मासिकात किंवा इतरत्र धूमकेतू दिसणं म्हणजे संकटांची मालिका येणं, असं काहीतरी सांगितलं जायचं. परंतु आता विज्ञानामुळे विश्वाचा आकार अनंत आहे याची जाण जशी आली आहे, त्याचप्रमाणे आपली सूर्यमाला, पृथ्वी, त्यावरील आपणदेखील विश्वाच्या ह्या अवाढव्य फापटपसर्यापुढे नगण्य आहोत. 

साहजिकच आपली सुखदुःखे आणि अडीअडचणी यांचा आपण बाऊ करता कामा नये, असाही समंजस विचार अशा बातम्यांवरून येऊ शकतो."

##############

 "छाप(पड)लेले शब्द-21":

"जुनी पेन्शन योजना:
बिनकामाचा कां हा, बोजा?:

सध्या जुनी पेन्शन योजना पुन्हा चालू करावी यासाठी आंदोलने चालू आहेत. काही राज्यांमध्ये ती योजना पुन्हा चालू देखील केली आहे. परंतु केंद्र सरकारने याबाबतीत योग्य भूमिका घेऊन ती योजना पुन्हा कार्यान्वित न करण्याच्या निर्णयाचे आपण स्वागत केले पाहिजे. कारण शासनाच्या तिजोरीवर त्याचा नाहक भार पडून शेवटी दिवाळखोरीची वेळ येऊ शकते.

दुसरे असे की, जोपर्यंत नोकरी आणि त्यानुसार दिलेले योगदान चालू आहे, तोपर्यंतच,  त्याचा मोबदला त्याला मिळणं रास्त आहे. जो काही प्रॉव्हिडंट फंडाचा हिस्सा निवृत्तांना, सरकार किंवा शासनातर्फे देण्याची जबाबदारी आहे तितक्या रकमेवर सध्याच्या बँक व्याजाप्रमाणे जेवढे व्याज येईल, त्या प्रमाणात त्या कर्मचाऱ्याला पेन्शन देणे आपण समजू शकतो. परंतु सध्या ज्या तऱ्हेने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा बोजा उत्तरोत्तर वाढत आहे तो विचार करता ही योजना पुन्हा चालू करणे योग्य नव्हे. शिवाय अशा तऱ्हेची सवलत ईपीएस 95 या योजनेत जे अशासकीय कर्मचारी आहेत त्यांना अक्षरशः नगण्य असे दरमहा पेन्शन मिळते. असंघटित व खाजगी उद्योगांमध्ये निवृत्त झाल्यावर जी काही ग्रॅच्युइटी वा प्रॉव्हिडंट फंड ही देणे असतात, ती दिली जाऊन नंतर
त्यांना पेन्शन दिले जात नाही.
माझ्या आठवणीप्रमाणे मोफत
आरोग्यविषयक योजना ब्रिटनमध्ये शेवटी बंद करावी लागली. कारण शासकीय तिजोरीवर पडणारा नाहक भार.

एक प्रामाणिक कर्मचाऱी म्हणून आपण काम केले तर, आपण ठरलेला मोबदला घेणे योग्य आहे, पण ज्या सेवेतून आपण निवृत्त झालो, त्यामधून काम न करता दरमहा अशी अप्रस्तुुत आमदनीची अपेक्षा करणे, कितपत योग्य आहे? तेव्हा सार्वजनिक देेशहिताच्या दृष्टीने संबंधितांंनी योग्य तो विचार करून, आपली मागणी मागे घ्यावी. त्यातच अंतिमत: आपणा  सर्वांचे आणि देशाचे हित आहे.
म.टा. मधील वाचकांचा पत्रव्यवहारात प्रसिद्ध झालेले हे पत्र व त्यातील मुद्दे म्हणूनच गांभीर्याने घेण्याजोगे आहेत.

धन्यवाद 
सुधाकर नातू
#########
👍"छाप(पड)लेले शब्द-37 !":💐
👍"सर्वसमावेशक दूरदृष्टी असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व!":👌
👍"एकोणिसाव्या शतकापूर्वीच्या काही शतकांमध्ये, महाराष्ट्रात ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ, नामदेव अशी संतांची मांदियाळी होऊन गेली. तिने "ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान !" अशी निरपेक्ष स्थितप्रज्ञ वृत्ती दिली, तशीच अध्यात्म व मोक्ष प्राप्तीसाठी करावयाची साधना देखील. 

तर 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक थोर समाजसुधारक, राजकारणी आणि प्रतिभासंपन्न विचारवंत यांची मालिकाच येथे अवतरली. त्यांच्या असामान्य योगदानामुुळे, नव्या युगाची, स्वातंत्र्याची पहाट आपण पाहू शकलो. त्या साऱ्या थोरांंच्या मालिकेमध्ये अग्रणी शोभावेत असे, सर्वसमावेशक दूरदृष्टी असलेले कृतिशील नेतृत्व, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी दिले. त्यांच्या वैविध्यपूर्ण कहाणी, सोबतच्या वृत्तात आहे. 

अशी गुुणवंंत माणसे येथे होऊन गेली, म्हणून, आज आपण त्यांच्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे.":💐
###########
👍"छाप(पड)लेले शब्द-35 !":💐
👍 "स्नेहवन'- असामान्य प्रेरक प्रवास !":👌
👍"इथून तिथून सातत्याने नकारात्मक अशा घटना आणि बातम्या आपल्यासमोर येत असताना, अचानक या वृत्तातील स्नेहवन आणि ती स्थापन करणाऱ्या देशमाने दाम्पत्याची कहाणी वाचून आपले मन कौतुकाने भरून जाते.

आयटी कंपनीतील चांंगल्या पगाराची नोकरी सोडून, विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन, आपल्या पत्नीच्या सहकार्याने शेतकरी मुलांच्या सर्वांगीण जडणघडणीचे आणि विकासाचे व्रत अंगावर घेऊन ते यशस्वी पद्धतीने पार पाडणारे हे दाम्पत्य खरोखर सर्वांनी आदर्श ठेवावा असेच आहे.
अशी विलक्षण सेवाभावी, त्यागी माणसे जोपर्यंत समाजात आहेत, तोपर्यंत आपल्या आशेला वाव आहे.":💐
#########
👍"छाप(पड)लेले शब्द-3 !": 💐
"बदलत्या जीवनशैलीमुळे विविध प्रकारचे रोग होत आहेत. त्यामध्ये डायबिटीस हा प्रामुख्याने आढळून येणारा आहे. अनियंत्रित खाणे पिणे, आणि डायबिटीज अशा विविध कारणांनी माणसाचे मूत्रपिंड पूर्ण क्षमतेने काम करेनाहीशी होतात. अशा वेळेला डायलिसिस हाच एक उपाय असतो.हा खर्चिक उपाय करूनही अखेरीस अशी वेळ येते की मूत्रपिंड कामच करत नाहीत अशा वेळेला मूत्रपिंड प्रत्यारोपण अनिवार्य असते. त्यासंबंधी उपयुक्त माहिती देणारा हा वृत्तांत सगळ्यांनी गांभीर्याने घेणे, गरजेचे आहे."
############
👍"छाप(पड)लेले शब्द-15 !":👌
💐"सावध व्हा ऐका पुढल्या हाका !":💐

☺️ "कालचक्र अव्याहत पुढे चालू आहे, चालूच राहणार आहे. त्याचप्रमाणे माणसाचे जीवनचक्र असेच अव्याहत पिढ्यानपिढ्या चालत राहणार आहे. मात्र गेल्या शतकात विज्ञानाच्या प्रगतीमुळे, तसेच आरोग्य विषयीच्या माणसांच्या अधिकाधिक सजगतेमुळे, माणसांचे आयुर्मान वेगाने वाढत आहे.. वाढतच राहणार आहे. त्याचे दुष्परिणाम आता प्रगत देशांमध्ये दिसायला लागले आहेत. विशेषतः जपानमध्ये तर चिंताजनक इतक्या संख्येमध्ये जेष्ठ नागरिक आढळतात. तीच कथा अनेक पाश्चात्य प्रगत देशांचीही. 

वैयक्तिक स्वार्थ, अधिकाधिक व आत्मकेंद्री प्रव्रुत्ती वाढत चालल्यामुळे माणसांचे फक्त स्वतःच्या प्रगतीसाठी लक्ष केंद्रित होत आहे. साहजिकच करिअर, आर्थिक संपत्ती आदि गोष्टींना प्रचंड महत्व आले आहे. त्याचा परिणाम जन्मदर घटत आहे, तर दुसरीकडे आयुर्मान वाढत आहे, अशी ही विचित्र परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. 

स्वतःच्या हाताने आपापले उद्योग करता येणं, हे सर्वांना शक्य होत नाही. विशेषता जेष्ठांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. आर्थिक भार देखील अनेकांना इतरांवर टाकावा लागतो. 

बहुसंख्य पुुढारलेेल्या देशांमध्ये काम करणारे हात आणि जेष्ठ नागरिक घरामध्येच हात चोळत बसलेले, यांचा विषम अशा संख्येतील परिणाम हळूहळू सर्वांच्याच लक्षात यायला लागला आहे. त्यासंबंधी विशेष प्रकाश टाकणारे हे वृत्त आपल्या सगळ्यांना हेच सांगत आहे की, 'प्रत्येकाने आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा नव्हे, ज्येष्ठांसाठी तर हे अत्यंत अत्यावश्यक झाले आहे'.
म्हणूनच....
"सावध व्हा, ऐका पुढल्या हाका !":👌

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३

"रोख, ठोक !":

 "रोख, ठोक !":

# "लोकसभेेत, विरोधकांनी, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता त्यांना संपूर्ण डावलून, इतरच जुने मुद्दे उगाळत बसणे हे कदाचित वेळ मारून देणारे असले, तरी ते योग्य कसे नसते, हे आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधील अग्रलेखाच्या वाचनातून ध्यानात यावे.

# ते' चांगले आहेत की नाहीत हा मुळी इथे प्रश्नच अप्रस्तुत आहे. केवळ त्यामुळे 'हे' धुतल्या तांदळासारखे ठरु शकत नाहीत. ते सिद्ध करावे अशी अपेक्षा आहे.

# जळी स्थळी पाषाणी, एकाच नेत्याने हजेरी लावायची हा हट्टाहास कशाकरता? आपल्या सहकाऱ्यांना देखील संधी देणे, कुठल्याही आदर्श नेत्याचे आद्य कर्तव्य असते,  तेच इथे कायम विसरले जात आलेले आहे. स्वप्रदर्शनाचा हा तमाशा अक्षरश: हास्यास्पद नव्हे कां?

वेगवेगळी उद्घाटने विकास कामांची देशाला अर्पण करण्याचे कार्यक्रम यासंबंधी जो नेता कायम आपली छबी पुढे आणण्याचा अट्टाहास करतो. स्वयंप्रदर्शनाचा देशामध्ये कोणाला इतका हव्यास आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यासंबंधी आपले मत काय आहे ?

# या सगळ्या प्रकारामुळे गेल्या आठ वर्षात केंद्रीय मंत्रिमंडळात खरोखर तीन चार व्यक्ती सोडल्या, तर बाकी कोण आहेत ते काय करतात याची खचितच देशवासियांना काही माहिती असेल !

# प्रत्येक व्यक्तीमध्ये कितीही गुण जरी असले तरी त्यामध्ये काही ना काही दोष असतातच असतात हे विसरून चालणार नाही. गुणांचे प्रदर्शन करताना अवगुण वा दोषांना झाकणे बरोबर नव्हे. तेही खुल्या दिलाने मान्य करणे संयुक्त ठरते. केवळ गुणांचे गुणगान करणारे म्हणूनच 'भक्त' या नावाने ओळखले जातात. सुबुद्ध समंजस नागरिकाने समतोल बुद्धीने कोणत्याही व्यक्तीचे नेत्याचे आकलन करणे आवश्यक असते नाहीतर तो केवळ आंधळा वेडेपणा असतो.

#  पर्याय नाही अशी अवस्था कधीमधी निर्माण होऊ शकते यात वाद नाही मात्र पर्याय म्हणजेच उपाय असे म्हणणे योग्य नव्हे कारण अशा वेळेला केवळ ती एक परिस्थितीवर करावी लागलेली तडजोड असते परिस्थिती केव्हा ना केव्हा तरी बदलते आणि पर्याय हमखास निर्माण होतो हा आजवरचा इतिहास आहे हे विसरून चालणार नाही.....

# "कात्रजचा घाट" दाखविणे, ही कौतुकास्पद मर्दुमकी नसून, ती एक शुद्ध दगाबाजी आहे. अशी दगाबाजी वारंवार करणाऱ्या मंडळींना "जाणते राजे" म्हणून गौरव करणे, हे शहाणपण नव्हे. जनता सुज्ञ असते त्यामुळे अशा दगाबाजांवर शेवटी आपल्याच गल्लीत आपले 'राजेपण' टिकवताना नाकीनऊ येते. अशा पाठीत खंजीर खूूपसणाऱ्या 'शूरवीरां'(?)मुळे, इतिहासात देशाचे किती नुकसान झाले, ते कधीही विसरता कामा नये.
# "

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

"दिवाळी अंकांची मांदियाळी !": 'ज्योतिष विषयक अंक-ग्रहांकित'23 !":

"दिवाळी अंकांची मांदियाळी !":

'ज्योतिष विषयक अंक-ग्रहांकित'23 !":

"आजच्या समस्या कधी दूर होणार, याच बरोबर उद्या आपले भवितव्य काय असणार, याचे कुतूहल प्रत्येकालाच असते. साहजिकच दिवाळी अंकांपैकी ज्योतिष विषयक अंक आवर्जून वाचले जातात. त्यामध्ये 'ग्रहांकित' 'गृहसंकेत' आणि 'ज्योतिष ज्ञान' हे तीन दिवाळी अंक माझ्या वाचनात आले.

'ग्रहांकित दिवाळी अंक'23 यामधे, भरगच्च असे अभ्यासपूर्ण साहित्य आहे. सुरुवातच एका कुतुहूल वाढवणाऱ्या विषयाने केलेली असून, काही महिन्यांपूर्वी झालेल्या सत्ता बदलाच्या पार्श्वभूमीवर आसाम मधील 'कामाख्या' देवी संबंधी विस्तृत अशी मनोरंजक माहिती श्री आनंद साने, त्याचप्रमाणे हिना ओझा आणि राजेश ,वशिष्ठ यांनी दिलेली आहे. ज्योतिषाचार्य म्हणता येतील असे पंडित रूपचंद जोशी यांनी ज्योतिष विश्वाला दिलेली 'लाल किताब' ही विसाव्या शतकातील अमूल्य देणगी आणि त्यांच्याविषयी, तसेच त्या पुस्तकाविषयी उद्बोधक अशी माहिती डॉक्टर चंद्रकला जोशी आणि रमलतज्ञ 'ग्रहांकित'चे  संपादक श्री चंद्रकांत शेवाळे यांनी दिलेली आहे.
इंग्रजी महिन्यांची नावे आपल्याला नेहमी विचार करायला लावतात. प्रत्येक महिन्यामागे ग्रीक किंवा रोमन संस्कृतीचा कसा इतिहास दडला होता, त्याचे वैशिष्ट्य तसेच प्रत्येक महिन्याचा शेवटचा किंवा पहिला दिवस कसा पुन्हा येतो, याचेही उदाहरणासकट येथे विश्लेषण श्री विश्वास पटवर्धन यांनी करून दिले आहे. पूर्वी मार्चपासून कॅलेंडर वर्ष सुरू होत असे. योगायोगाने हल्लीचे फायनान्शियल वर्ष देखील मार्चपासून सुरू होते. कॅॅलेंडर जानेवारीपासून कसे बदलले गेले, याचीही माहिती या लेखांमध्ये आहे. पत्त्यांचा खेळ कुणाला माहिती नाही ? 52 पत्ते आणि त्यावरून भविष्य याविषयीचा एक आगळावेगळा लेख दिलीप गायकवाड यांनी दिलेला आहे. रत्नांची माहिती आणि त्या अद्भुत दुनियेची ओळख सौ गौरी कैलास केंजळे यांच्या लेखात आहे.

प्रयत्न आणि अपेक्षा यांचे गणित मांडून अनुकूल गुणांच्या सहाय्याने आपण आपले स्वतःचे भवितव्य कसे घडवू शकतो, हे राशीनिहाय अनुकूल गुणांवर आधारित 'वार्षिक भविष्य' माझ्या लेखामध्ये या अंकात आहे. ते आपण जरूर वाचावे आणि 'तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार' कसे ते जाणून घ्यावे.

नेपच्यून प्लुटो आणि हर्षल या ग्रहांना ज्योतिष सांगताना पुष्कळदा दुर्लक्षित केले जाते. परंतु त्यांचे महत्त्व आणि ज्योतिषा विषयी उद्बोधक माहितीपूर्ण विचार येथे लेखांत आहेत. 'नवमांंश वर्ग कुंडली' सुबोध पाटणकर, 'कुंडलीतील ग्रहवैभव' डॉक्टर जयश्री बेलसरे, तसेच नक्षत्रांविषयीची आगळीवेगळी माहिती डॉक्टर  मिस्त्री,  'खगोल आणि ज्योतिष'  श्री मधुकर लेले यांच्या लेखात आहे.

विवाहपूर्व गुणमेलन पत्रिका बघून, मंगळ दोष पाहून नेहमीच केले जाते. पण त्यापलीकडे जाऊन, समुपदेशाची किती आवश्यकता आहे, याचे मार्गदर्शक विचार पंडित विजय श्रीकृष्ण जकातदार यांच्या लेखात आहे. तरुण वर्गाला हुरहुर लावणारा 'विवाह योग कधी' आहे याची माहिती जयश्री देशपांडे यांच्या लेखात आहे.

याशिवाय व्यक्तिविशेष असे तीन लेख येथे आहेत भारतीय ज्योतिषाचा चमकता तारा शंकर बाळकृष्ण दीक्षित यांच्या व्यक्तिमत्त्वाची व कार्याची माहिती रमेश वायगावकर यांनी दिली आहे. तर 'जिओ हजारो साल' या लेखांमध्ये 'किंग चार्लस् जॉर्ज' त्याचप्रमाणे इतर राजकीय नेत्यांच्या पत्रिकांचा अभ्यासपूर्ण विचार विशाल अष्टेकर यांच्या लेखात आहे. अगदी आगळावेगळा आणि एखाद्या क्राईम थ्री व्हीलर सारखा लेख 'लॉर्ड ऑर्थर सेल्फी क्राईम' हा श्री धनंजय गोळे यांनी सादर केलेला लेख, ज्योतिष आणि क्राईम थ्रिलर स्टोरी यांची सांगड घालणार आहे. याशिवाय नेहमीप्रमाणे वार्षिक राशिभविष्य, 'मार्केट मधली तेजी मंदी' डॉक्टर सौ सविता महाडिक यांनी मांडली आहे. याशिवाय हस्तसामुद्रिक, वास्तुविशेष, 'देवी उपासना आणि समस्या निवारण' याविषयीचे अनेक लेख या अंकात आहेत.

अतिशय उत्तम असा ग्रहांकित अंक हा अत्यंत लोकप्रिय असून तो सर्वांनी वाचावा असाच आहे. त्याबद्दल संपादक श्री चंद्रकांत शेवाळे यांचे कार्य कर्तृत्व खरोखर प्रेरणादायी आहे,  असेच म्हणावे लागते.

धन्यवाद
सुधाकर नातू

रविवार, ५ फेब्रुवारी, २०२३

दिवाळी अंकांची मांदियाळी !": 'ज्योतिष विषयक अंक-ग्रहसंकेत !":

 "दिवाळी अंकांची मांदियाळी !":

'ज्योतिष विषयक अंक-ग्रहसंकेत !":

"आजच्या समस्या कधी दूर होणार, याचबरोबर उद्या आपले भवितव्य काय असणार, याचे कुतूहल प्रत्येकालाच असते. साहजिकच दिवाळी अंकांपैकी ज्योतिष विषयक अंक आवर्जून वाचले जातात. त्यामध्ये 'ग्रहांकित' 'गृहसंकेत' आणि 'ज्योतिष ज्ञान' हे तीन दिवाळी अंक माझ्या वाचनात आले.

'ग्रहसंकेेत' यामधे, नेहमीप्रमाणे तंतोतंत पडणारे वार्षिक राशिभविष्य श्री सुबय्या यांचे आहे. 17 जानेवारीला शनी मकरेतून कुंभेत जात असल्यामुळे, त्याविषयी 'शनी बदल आणि आपण' या विषयावर तीन खास लेख असून, त्यामध्ये साडेसाती आणि इतर मनोरंजक माहिती देण्यात आली आहे. जीवनाचे रहस्य काय याविषयी 'रहस्य जीवनाचे' हा विचार प्रवर्तक लेखही येथे आहे. जसं, प्रत्येकाला सौख्य आपल्याला हवे असे वाटत असते, त्यासंबंधी नामवंत ज्योतिषी श्रीराम भट यांनी पुढील पाच वर्षात 'सौख्याची दिशा' काय असेल याचा उहापोह केलेला आहे.

चमत्कारांवर विश्वास ठेवावा की नाही याचं ज्याचं त्याचं मत वेगळं असू शकतं. परंतु 'चमत्कार चिंतामणी' या मूळ संस्कृत ग्रंथाचा कल्पिता राजोपाध्ये यांनी केलेला समश्लोकी अनुवाद ज्योतिष अभ्यासाकांना संदर्भ म्हणून चांगला आहे. 'लक्ष्मीपूजन' सर्वत्र सगळेजण करतात. परंतु त्या मागचा हेतू काय असतो, याचा रंजक वेध घेणारा लेख प्रणव गोखले यांनी लिहिलेला आहे. साधना करावी असे प्रत्येकाच्या मनात येते, परंतु 'साधना सुफळ' करण्यासाठी आपल्याला काय करावे लागते, त्यावर मार्गदर्शन मंत्रशास्त्र जाणकार अभ्यासक श्री जयंत झरेकर यांनी समर्पकपणे केले आहे. सद्गुरु आपल्याला मार्ग दाखवतो आणि आपल्याला 'शक्ती जागरणा'तील अद्भुत अशी कुंडलिनी व प्राणशक्ती जागृत करण्याचा अनुभव येऊ शकतो. त्याविषयी दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे विषयी निगडित अनुभवाचा डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांनी घेतलेला आढावा देखील या अंकात आहे. शिवाा, अगदी वेगळा असा लेख येथे आहे. डलहौसी हे छोटेसे गाव आणि तेथे विमला ठकार या वर्षातील काही महिने रहात. साधकांना स्वतःच्या अनुभव त्यांनी 'डलहौसीची जीवनशाळा' या लेखांमध्ये मांडलेला आहे. तो प्रेरक दस्तावेज वाचावा असाच आहे.
याशिवाय इतरही काही विविध विषयावरचे लेख या अंकात आहेत 'तुमच्या मित्राची रास' 'राशींचे भावरंग', 'धातू आणि रत्ने' 'नात्यांचे गृहगणित' इत्यादी इत्यादी.
थोडक्यात वैविध्यपूर्ण असा हा 'ग्रहसंकेत दिवाळी अंक' अभ्यासकांनी जरूर वाचावा असाच आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू
Mb 9820632655