सोमवार, २८ मार्च, २०२२

# 😊"अती तिथे माती-पुरे झाले हे गौरव सोहळे !"😢

 😊"अती तिथे माती-पुरे झाले हे गौरव सोहळे !"😢

☺️ "गेली दोन दशके आपण "झी मराठी"चे गौरव सोहळे पहात आलो आहोत. आता त्यात इतर वाहिन्या व अन्य माध्यमांचेही तसेच सन्मान/ पुरस्कार कार्यक्रम गाजावाजा करत उतरले आहेत. परंतु दुर्दैवाने ह्या सगळ्याच जल्लोषात, तोच तोपणा आलेला दिसतो. ठराविक पात्रांची सो काँल्ड विनोदी प्रहसने, तोच तो विविध गीत संगीत आधारित सेलिब्रिटींच्या न्रुत्यांंचा धांगडधिंगा, तशीच विविध मानांकने ते सन्मानचिन्हे प्रदानांची साचेबद्ध कवायत आणि प्रेक्षकवर्गातही नटून थटून आलेले तेच ते मिरवायला आलेले चेहरेमोहोरे, मोठ्या उसन्या आवेशानिशी साजरे केले जातात.

पूर्वी ज्या उत्सुकतेने तमाम मराठी रसिक गौरव सोहोळ्याची आतूरतेने प्रतिक्षा करावयाची, ती धुंदी आता संपूर्ण नाहीशी झाल्याचे चित्र आहे. म्हणूनच वाटते कशाला इतके हवे हे कंटाळवाणे खेळखंडोबे !

सार्या प्रसारमाध्यमांनी एकत्र येऊन फक्त एकच गौरव सोहळा नव्या दमाने, नव्या आटोपशीर रुपांत साजरे करण्याचा कां विचार करू नये ?👍👌💐

सुधाकर नातू
ता.क.
👍"मी अक्षरशः काही मिनिटं झी मराठी वरील "मटा" गौरव सोहळा पाहिला आणि उबग आल्याने पोटतिडकीने वरील माझा संदेश प्रसारित केला. त्याला 'फेबु'वर पुष्कळ पाठिंबा देणारे प्रतिसाद आले. असे नीट विचारपूर्वक चपखल मुद्दे मांडणारे संदेशच ह्यापुढे प्रसारित केले पाहिजेत हा वस्तुपाठ मला त्यामुळे मिळाला.👌
😊 काही निवडक प्रतिसाद:
१ खरंच खूप तोच तो पणा आहे, कंटाळा येतो पाहून नाहीतरी रोजच्या सिरीयल मध्ये काय असते! पहिल्या दिवसापासून एक खलबत्ता किंवा एक खल बाई शेवटच्या दिवसापर्यंत कुटत रहातात,क्रूरतेचा कळस !
२ खरंतर सगळ्या मालिका भिकार च आहेत अन वर यांना कसले पुरस्कार देतात उलट लाथा घालायला हव्यात?
३ आम्ही असले कार्यक्रम कटाक्षाने टाळतो आणि कारण तुम्ही सांगितलेच आहे.
४ अहो हे त्या कलाकार मंडळींचे रोजगार हमी योजना उपक्रम आहेत.
५ तुम्ही हे.... "असले" कार्यक्रम बघता ???!!!!! धन्य आहे तुमची.
👍ह्याला माझे उत्तर: "अक्षरशः काही मिनिटं हा गौरव सोहळा पाहिला आणि उबग आल्याने पोटतिडकीने वरील माझा संदेश प्रसारित केला."
ह्यावर उत्तर:
"Sudhakar Natu आपण असं पोटतिडकीने लिहितो पण त्यांना काहीही फरक पडत नाही. उलट ते आपल्यालाच मूर्ख ठरवतात. हा सगळा प्रकार म्हणजे

उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः |
परस्परं प्रशंसन्ति अहो रूपम् अहो ध्वनिः ||"

६ दर्जा घसरला हे नक्कीच. सैराट आल्यापासून दुसरी गाणीच यांना सापडत नसावीत. झिंग झिंग ऐकून कंटाळा आलाय. हे गाणी आणि मंजुळे हे समीकरण झालंय. दुसरी गाणी शोधा.
७ दहा पर्यंत संपवायला हवा सोहळा, फार लांबतायत हे कार्यक्रम.
८ मी हा कार्यक्रम पाहीला नाही.
९ हिंदी गाण्यांवर नाच का करावे लागतात? मराठी गाणी ढीग पडली असताना??

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

#👍"आठवणींच्या हिंदोळ्यावर !"💐

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":

"रसिकमनांची रसिली यात्रा.....💐

👍"आठवणींच्या हिंदोळ्यावर !"💐

#👍"तुम्हीच, तुम्हाच्या जीवनाचे शिल्पकार, हेच खरे आहे कां?":👌

विशिष्ट काळात विशिष्ट निर्णय व क्रुती होते आणि त्यातून तुमचे भवितव्य घडते. ह्या सगळ्यामागे तुमच्या मनाची त्या त्या वेळी असलेली स्थिती जबाबदार असते. 

सातत्याने गतीमान असलेल्या सूर्यमालेतील ग्रहस्थितीनुसार ती तशी मनस्थिती प्रभावित होते कां, ह्यावर सुरवातीच्या प्रश्नाच्या उत्तराची सत्यासत्यता अवलंबून आहे.

--------------------

# 👍"तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार !":

आपणच, वेळोवेळी घेतलेले निर्णय व कृती ह्यामुळे, आपले चांगले वा वाईट करत असतो.

माझ्या एका मित्राची ही गोष्ट आहे. SSC नंतर Science ला पहिल्या वर्षाला ७७% गुण त्याने मिळवल्याने इंटरसाठी त्याचा अभ्यास अधिक चांगला व्हावा, म्हणून वडिलांनी त्याला हॅास्टेलवर ठेवले. पण तेथे तो अभ्यास न करता तासन् तास मित्रांशी गप्पा वा कुठला ना कुठला खेळ खेळणे ह्यात वेळ घालवाव़याचा. एवढे पुरे नाहीं म्हणून की काय, तो काॅलेजमधे गणिताचे तास बुडवायचा.

ह्या सार्याचा परिणाम ह्या हुशार मुलाला इंटरला जेमतेम दुसरा वर्ग मिळण्यात झाला. पुढे पदवीपरिक्षेत तर तिसरा वर्ग मिळून त्याच्यावर अखेर कारकुनी करायची वेळ आली. जे खरं म्हणजे, अंगभूत हुशारीने इंजिनिअरिंग पदवी मिळवून, त्याच्या लायकीचे उच्चस्तरीय जीवन त्याला मिळू शकले असते, ते जावून त्याचे जीवन खडतर बनले. वडिलांनी दिलेली सुवर्णसंधी त्याने आपल्या चुकीच्या वागण्याने मातीमोल केली, निराश होत नशिबाला बोल लावत तो दिवस ढकलत राहीला.

सिगरेट किंवा दारू अशा अनिष्ट व्यसनांमुळे अकाली मरण येऊन कुटुंबाची दुर्दशा करणारे अनेकजण आपण पहातो. पत्ते जुगार ह्यापा़यी सोऩ्यासारखे जीवन वाया घालवून, भीकेला गेलेली माणसेही दिसतात. वेळोवेळी आपल्या आरोग्याला न जपता, डाँक्टरकडे जाणे टाळल्यामुळे दुर्धर रोगाची शिकार झालेलीही उदाहरणे आपल्या माहितीची आहेत. तसेच नोकरीतही कामचुकारपणा वा आपल्या वागण्यामुळे करीयरचे नुक़सान करून घेणारे अशांचीही हीच कथा!

सारांश 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार' # असे कुणी म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. आपला वर्तमानकाळच आपले भवितव्य घडवत असतो!

# लेखा शेवटी ह्यावरील एक प्रतिसाद वाचा.**

-------------------------

# 👍"जीवन अन् म्रुत्यू,

फक्त एका क्षणाचं अंतर,

म्हणून पदरी पडणारे, 

क्षण अन् क्षण जपावे, 

सत्कारणी लावावेत !👌

---------------------

# 💐 "ह्या ह्रदयीचे, त्या ह्रदयी,                                  जाणवे, शब्दांवाचून मनोमनी !                                        मनी समर्पणाची आस ठेवूनी,                                        युगुलाचे ते, प्रेम जुळे खुळे !!💐💐

-----------------------

# ☺️"करावे तसे भरावे!": 😢

"दुनियेतील अनंत पापांचा अखेर भरला घडा,            शिकवितो, निसर्ग कोरोनारुपी भस्मासुराचा धडा!              आता तरी व्हा शहाणे, अन् गिरवा मुल्यांचा पाढा,              पाळा नियम, घ्या काळजी, सुटेल संकटाचा वेढा !"

-----------------------

धन्यवाद

सुधाकर नातू

ता.क.

** ह्या लेखावर आलेला एक प्रतिसाद:

"😀 यावर मी काय प्रतिसाद देऊ? हे वास्तव आहे. याची पाळेमुळे आपल्या पैदाशीत आणि मुख्यतः वृत्तीत असतात. एकाच घरातले, त्याच वातावरणात वाढलेले सख्खे भाऊ वेगवेगळ्या मार्गाने गेल्याची असंख्य उदाहरणे आहेत. असे का घडते? आपल्याला वेळोवेळी मिळालेली संगत यात मोठे योगदान देऊन जाते. आजचेच उदाहरण द्यायचे तर अंबानी बंधूंचे देता येईल. एक जगातील पहिल्या पाच श्रीमंत व्यक्तीत समाविष्ट तर दूसरा साफ कर्जबाजारी. दोघांचे जन्मदाते एकच पण थोडे खोलात जाऊन दोघांची वेळोवेळची मित्रमंडळी तपासुन बघावी. दोघांच्या पत्नींच्या उद्योगाचा मागोवा घ्यावा म्हणजे परिस्थिती बर्‍यापैकी स्पष्ट होईल."


बुधवार, २३ मार्च, २०२२

👍# "टेलिरंजन !":👍 "काही ही हं !":👌

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":
"रसिकमनांची रसिली यात्रा.....💐

👍"टेलिरंजन !":👍"काही ही हं !":😢

😢 "सुंदर आमचं घर" मालिकेतील कोल्हापूरच्या उद्योजकाची बायको अजून त्या सुंदर घरात चुलीवरच स्वयंपाक करते वाटतं ? गँस नाही वाटतं ह्या सुंदर घरात ? अरे रे !

😊 "ह्याच मालिकेत नायिका, नायकाला स्कूटर वरुन मुंबई एअर पोर्टवर कोल्हापूरच्या फ्लाईटवर सोडायला जाताना, कुठल्या रस्त्यावरून जाते ते तिचं तिलाच ठाऊक ! तो पश्चिम द्रुतगती मार्ग काही वाटतच नाही. अरे रे !😢

😢 "दुसरं सर्वात महत्वाचे सकाळी सातचे सुमारास निघालेला हा नायक, साडेअकराला कोल्हापूरच्या आँफिसमध्ये काय जादूच्या कांडीने पोहोचणार कां?
त्यांचे एअरलाईनचे टाईमिंग कुठले आहे बरे !
कुठलाही प्रसंग दाखविताना वास्तव परिस्थिती काही ही दाखवणार वाटतं? अरे रे !
👍मी विमानाचे वेळापत्रक गुगलवर तपासले. त्यावेळी असे अडीच/तीन तासात कोल्हापूरला पोहोचणारे कुठलेही फ्लाईट नाही. प्रेक्षकांना उल्लू बनवणे बरे नव्हे. 😊

😊 "अशी कशी उचलेगिरी ?":😢
"नायक व नायिकेने हरवलेली अंगठी कचर्याच्या गाडीतून शोधणे, झी मराठीवरील "माझा होशील ना" ह्या मालिकेतील प्रसंग, जवळ जवळ जशाचा तसा सोनी मराठीवरील "सुंदर आमचे घर"मध्ये दाखवला गेला आहे. ह्याला उचलेगिरी म्हणायचे की नाही?

☺️ "शेवटी, असे हे यक्षप्रश्न !":😢
😢 "अक्षरश: कशाही भरकटत चाललेल्या ' सुंदरा मनामध्ये भरली', 'मुलगी झाली हो' आणि आता त्याच मार्गाने चाललेली 'स्वाभिमान' या अर्थहीन मालिका कधी बंद होणार? पुरे नाही कां झाले, हे सारे पोरखेळ?😊😢 (त्याच दिशाहीन मार्गावरून जाणारी "येऊ कशी मी नांदायला" ही मालिका एकदाची बंद होणार, ही त्यातले त्यात आनंदाची बातमी !)😊

👍"टी-20 किंवा ओडीआय सारखे लिमिटेड षटकांचे सामने जसे असतात, तशाच मालिकादेखील 13, 26 वा जास्तीत जास्त 52 आठवड्यांच्या कां असू नयेत?"👌

👍"सर्व कुटुंबियांच्या देखत आपल्या प्रौढ पत्नीला चक्क बिनदिक्कतपणे थोबाडीत मारणाऱा नवरा दाखविणारी,
कालबाह्य पुरुषी अहंकाराला खतपाणी घालणारी आणि त्याच्या वर्चस्वाच्या अविष्काराला प्रोत्साहन देणारी "सुंदर आमचे घर" सारखी नवीन मालिका पाहता, मालिकांवर सेन्सॉर बोर्ड असायलाच हवे, नाही कां?👌

धन्यवाद
सुधाकर नातू
------------

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

"Different Strokes !":

 "Different Strokes !":

# Economic Decline, to Uncertainty, to Attempts to Recovery, to Stability, to Consolidation, to Upward Trends, to Growth, to Prosperity, to Economic Power, is the Road Map.


Where does India stands now, in this long and difficult journey, is the Mute Q. In the developing country like India, where there happens to be diverse and contrasting stakeholder-population, from different economic strata, the formation of policies and executive decision making, for upward journey, is compelled to satisfy opposing interests.

Therefore, where do we stand today,
in this long development struggle, and where and when would we reach in the next few years is almost impossible to guess. Till then, the dreams of ' Across the Board, Acche Din' shall remain in the cold storage.
------------------

# Reading History,especially that of the Peshavas, is really a fascinating & inspiring experience. Here is a Worldwide canvas of courage, valour, shrewdness and above all, of loyalty, dignity & honesty. Added to that, you have here, a full length drama of emotions, unbelievable events and spice of pure culture, tradition, romance & love. The hundred years of the Peshavas is undoubtedly an unforgettable historic century that saw a pathetic,shameful & sad end.
---------------

# This is Kali Yug full of selfishness, dishonesty and crimes, criminal minds. The challenges before the simple, straight forward honest persons in this cruel world are very many & tough. Wonder when the last & 10th Avatar Kalki is going to appear.
---------------
# "The Eternal Cycle!":

The Past-Present and Future are the interconnected, unbreakable Links of The Eternal Time Machine.

If we want to visualiase the Future, we need to (in the famous Management Guru-Peter Drucker's Words)-'Analyse and Understand what can happen, due to whatever has happened.'

Thus, it is the Past History, that creates the Present and this cycle goes on and on; as the Present becomes History, while the Future occupies the place of the Present, as the Time Machine unfolds.

Finally, it is the skill of the logical, transparent study of the Past, in the context of Present, that determines the Road Map of the Future.
-------------
#"Don't expect, Accept and Adopt to what you get, that's the wise way to lead Life."
----------------
# Along the passage of ever changing Time, the Lives of millions of people too, continue their complex journeys. Among these millions, there happen to be very very few-who can be just counted on the finger tips, in every Century, emerge as truly Iconic Movers, Shapers and Game changers. What is it, that makes these Icons and How? Who mould their destinies? 

These are the obvious few Qs, which need to be probed into and answered to. By the great Grace of the Nature, more or less physical, Natural environments remain more or less, unchanged in the passage of Time. In all possibilities, many other interwoven variables like Social, Cultural, religious and economic as well as, the 

National/International relations, do influence the Mindsets of these would be Icons, to form their path breaking Visions and outlooks.
Arising out of these forces, specific fields of their contributions get set depending upon their individual strengths and activities. 

This is a derived logic in my mind due to the impact of reading 'The Week Annual Double Issue' that has classically covered 25 Iconic personalities who have helped to build up our Glorious History. 

Under the back ground of this Logic, it would be really a worth while exercise for the Historians, Social Scientists and Thinkers to carry out an unbiased, critically logical analysis of such Icons and Game Changers and their valuable contributions. After all, it is such Iconic Classes pave the ways for the Masses, as Time Machine moves on.
----------------

रविवार, १३ मार्च, २०२२

#👍"शब्दांच्या पलिकडले!:👌

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":

"रसिकमनांची रसिली यात्रा.....💐

#👍"शब्दांच्या पलिकडले !":👌

संस्कृत ही मजेशीर भाषा आहे इथे शब्द चालवायला लागतात क्रियापद चालवायला लागतातळ म्हणजे अहम आवाम् वयम किंवा चुकोप चुकूपुतु चुकूपुतूः

अशाप्रमाणे तसाच हा प्रकार दोन शब्दांचा पहाः

"धाडस आणि धीटाई या शब्दांमध्ये, संकटाला सामोरं जाणं हे अभिप्रेत असतं, हे खरं आहे परंतु त्या दोन्ही मध्ये सूक्ष्म फरक आहे, हे असं मला वाटतं. धीटाई म्हणजे ज्ञात, परिणामांच्या व्याप्तीची पूर्ण कल्पना असलेल्या संकटाला सामोरं जाणं, तर धाडस म्हणजे अज्ञात अंधकारात काहीही कल्पना नसणाऱ्या परिणामांची कुठलीही पर्वा न करता उडी घेणं, म्हणजे धाडस असा सूक्ष्म फरक धाडस आणि 

-----------------------------

# 👍"ज्याची त्याची आवडनिवड !":👌

प्रवासाची आवड ही सर्वसामान्य आहे बहुतेक जणांना ती असते काहीजण मात्र प्रवासाला एवढे उत्सुक नसतात मी देखिल कदाचित त्या वर्गात मोडतो. अशा लोकांना घरकोंबडा म्हणतात. प्रवासाला जाणारे मोठ्या मजेत सांगत असतात "मी हम्पीला वा कुर्गला गेलो, मी अलिबागला गेलो, मी वाईला गेलो तर काही पुढारलेले फाँरेन ट्रीपस् चे तुणतुणे फुशारकीने ओरडून ऐकवतात...वगैरे वगैरे 

निसर्गाच्या सानिध्यात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रवासात आणि वेगवेगळ्या माणसांच्या सहवासात जाणं अनुभव त्यांना खूप आवडतं. परंतु मला मात्र तसं काहीही वाटत नाही, कां ते माहित नाही, परंतु वाटत नाही हे खर आहे. कशाला उगाचच आपल्या जीवाला प्रवासातील अनिश्चिततेचा घोर लावून घ्या ! हे सर्व आपल्याला घरबसल्या एखाद्या फोटोंमधून किंवा व्हिडिओज मधून बघता कां येणार नाही ! तंत्रज्ञानाच्या किमयेने तुम्ही जगातील म्हणाल त्या शहरात सैर करून आल्याचा अनुभव घेऊ शकता ! 

माझे विचार कसे खरोखरच जगावेगळेच आहेत. तरी मला असल्या खटाटोपापेक्षा वाचन आवडतं. पुस्तकं वाचावीत, दिवाळी अंक वाचावेत. त्यामध्ये प्रत्येक लेख प्रत्येक कथा प्रत्येक कलाकृती म्हणजे जणू काही माझ्यासाठी पंढरपूर काशी किंवा नैनिताल असते. कारण तिथे अनेकांच्या वैविध्यपूर्ण अनुभवांचा जो काही घोषवारा लाभतो, त्यामधून जो आनंद ह्या प्रवास करणाऱ्यांना मिळतो, तसाच मला मिळतो. आत्ताच उदाहरण पहा: "वाडा चिरेबंदी" नाटकासंबंधी चंद्रकांत कुलकर्णी यांचा लेख वाचत होतो. त्या खेडेगावातील कौटुंबिक जीवनाचा भावकल्लोळाचे गहिरे रंगरूप समोर आलं. त्यामधून मला ते, जे अनुभवायला मिळालं ते जणू त्या त्या गावाला त्या माणसांत वावरल्यासारखच भासलं ! म्हणूनच कशाला जायचं बाहेर भरपूर वाचावं. विविध वयोगटातील व तितक्याच विविध सामाजिक आर्थिक स्थरावरील मंडळींच्या जीवनातले विविधांगी अनुभव मनोमन वेचावेत, अशा मताचा व अशा प्रवृत्तीचा मी आहे. खुशाल तुम्ही घरकोंबडा मला त्याची पर्वा नाही.

😊 "चवीने जीवन कसे जगत रहावे व मन अधिकाधिक समाधानाने सम्रुद्ध कसे करावे", 

हे अशा वाचनप्रेमामुळे उमजते!"☺️

-----------------------------

# "आर्थिक गरिबीचीच नेहमी खूप चर्चा होते. तशी ही गरिबी, हा एक जटील व न सुटलेला प्रश्न राहिला आहे, हे सत्य जरूर आहे. पण माणूस म्हणून जगताना, ठायी ठायी दिसणार्या 'वैचारिक आणि नैतिक गरिबी' चं काय? ती दूर होणं, नितांत आवश्यक नाही कां? प्राधान्याने, ह्याच समस्येवर विचारमंथन घडणे, अत्यावश्यक नव्हे कां?"

-----------------------------

# 😢 "'गरिबी हटाओ !":😊

आर्थिक गरिबीचीच नेहमी खूप चर्चा होते. तशी ही गरिबी, हा एक जटील व न सुटलेला प्रश्न राहिला आहे, हे सत्य जरूर आहे. पण माणूस म्हणून जगताना, ठायी ठायी दिसणार्या 'वैचारिक आणि नैतिक गरिबी' चं काय? ती दूर होणं, नितांत आवश्यक नाही कां? प्राधान्याने, ह्याच समस्येवर विचारमंथन घडणे, अत्यावश्यक नव्हे कां?

-----------------------------

धन्यवाद

सुधाकर नातू

शुक्रवार, ११ मार्च, २०२२

#👍"मनभावन क्षण !":👌 💐 "नवीन जन्मेन मी !":💐

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":

"रसिकमनांची रसिली यात्रा.....💐

👍"मनभावन क्षण !":👌

💐 "नवीन जन्मेन मी !":💐

सोमवार ते शुक्रवार कामाचा धीबिडगा आणि डेडलाईनस् चे ताणतणाव,एकंदरच सध्याच्या जीवनशैली मध्ये जीवघेणी धावपळ स्पर्धा यामुळे काय करावे, कां व कसे करावे, आपण कुठे चाललोय तेच उमगत नाही. आपण आपले धावत सुटलेलो असतो कशाच्या ना कशाच्या पाठीमागे !विशेषतः आजच्या एकविसाव्या शतकातील तरुण वर्गाला तर अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे उसंत घेऊन कधी ना कधीतरी सिंहावलोकन करावे आणि काय करायला हवे, शांती समाधान कसे मिळवायला हवे, सकारात्मकता कशी रुजवायला हवी, अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांना धडाडीने सामोरे गरजेचे असते. 

विकएंड कदाचित यासाठीच ठेवलेला असतो. विशेषत आज शनिवार, याला न कर्त्याचा वार असे कां म्हणतात माहीत नाही. उलट दुसऱ्या दिवशी रविवारी सुट्टी असल्यामुळे, हा एक निवांत वार असतो आणि त्या वेळेला गेल्या आठवड्याचा आढावा घेऊन, पुढे काय करायचे हे ठरवणे सोपे असते. 

अशा या विचारांच्या माहोलात आज शनिवारी मी असताना, मला अचानक युट्युबवर सर्फिंग करताना जगप्रसिद्ध व्याख्याते गौर गोपालदास यांच्या 'माझा कट्ट्या'वरील संवाद नजरेस आला. त्याच्या छोट्या छोट्या क्लिपच्या, मी लिंक्स देत आहे. त्या उघडून जरूर पहा. त्या पाहून मला तर एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे, साक्षात्कार झाल्यासारखे वाटले. 

नव्याने नवीन असे काहीतरी करावेसे वाटत राहिले आणि जणू काही मनभावन क्षण गवसून जणु माझा पुनर्जन्म झाल्यासारखा भासला ! तुम्हीही तो आत्मानंद मिळवा. जर तुम्हाला हे सारे बोल आवडले, तर या लिंकस् जरुर इतरांबरोबर शेअर करा आणि स्वतःही पुढे जा इतरांनाही पुढे जायला नवप्रेरणा द्या.....

।। शुभस्य शीघ्रम् ।।

😊 "मनाला स्थिर कसं करायचं ?":👌

https://youtu.be/UtN1jwsdyxI

👍"पुष्कळ कष्ट करूनही यश कां नाही ?":😢

https://youtu.be/ZZXDgRw0aaQ

आणि......आणि....

सर्वात महत्त्वाचे........

👍💐 "काय आहे सुखी जीवनाचे रहस्य ?":👌💐

https://youtu.be/G_qq4E1f1sI

धन्यवाद

सुधाकर नातू

गुरुवार, १० मार्च, २०२२

#👍"ह्रदयसंवाद-२ !:👌😢 "झाली बेफिकिरी, नुकसान लै भारी !😢:

 👍"ह्रदयसंवाद-२ !":👌

😢 "झाली बेफिकिरी, नुकसान लै भारी !":😢
कुठलीही गोष्ट कधीही गृहीत धरू नका. जे काही समोर आहे, त्याचा सखोल अभ्यास करा विचार करा माहिती मिळवा आणि नंतरच कृती किंवा निर्णय घ्या. तसे केले नाही, तर त्या बेफिकीरीपायी नुकसान होते त्याचा अनुभव अनेक वेळा येतो.

विवाहजुळणीच्या वेळी तर पुष्कळदा नीट माहिती घेतली जात नाही किंवा सखोल चौकशी करून ती काढली जात नाही आणि आपला आपण काहीतरी समज करून बऱ्याच गोष्टी गृहित धरतो आणि त्यामुळे शेवटी नुकसान होण्याचा अनुभवही पुष्कळांना येतो. कारण एकदा विवाह झाला की, आपण ज्या गोष्टी गृहीत धरल्या होत्या, तशा त्यानंतर अनुभवास आल्या नाहीत की मागे जायचा मार्ग बंद झालेला असतो ! म्हणून विवाह जुळवताना अत्यंत चोखंदळपणा दाखवणे नितांत गरजेचे आहे. ह्या संबंधीची अनेक उदाहरणे प्रत्येकच कुटुंबापाशी असतात, त्यामुळे ती पुनरुक्ती मी येथे टाळतो.

एका गृहस्थाचा एका राष्ट्रीय कमर्शियल बँकेसंबंधीचा अनुभव असाच बेफिकीरीमुळे नुकसान झाल्याचा आहे. त्याची पत्नी आजारी होती, ऑपरेशन करणे आवश्यक होते. त्यामुळे त्याने आपल्या फिक्स डिपॉझिटस्ची रक्कम, मुदती आधी कुठलीही चौकशी न करता काढून घेतली. डिपॉझिटच्या रसीटस आवश्यक ते सौपस्कार करुन बँकेला दिल्यानंतर, ही रक्कम जेव्हा त्याच्या सेविंग अकाउंट ला जमा झाली, तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याचे काही हजार रुपयांचे नुकसान झाले होते. त्याला वाटले होते की निदान मूळ मुद्दलाची रक्कम तरी मिळेल.

परंतु चौकशी न केल्यामुळे नुकसान झाले. नंतर त्याने 'ह्यासाठी बँकेचे नियम काय आहेत' अशा बद्दलची चौकशी केल्यानंतरही यासंबंधीही बँकेने कुठलीही माहिती दिली नाही, संबंधित कर्मचार्याने वजा कजलेल्या रकमेचा सविस्तर खुलासा करणे टाळले. शेवटी डोक्याला हात लावणे एवढेच त्यांच्या हातात राहीले ! सर्टिफिकेट देतानाच त्याने चौकशी करायला हवी होती, ती किती रक्कम वजा केली जाईल आणि नंतरच ती सर्टिफिकेटस् त्याने द्यायला हवी होती. राष्ट्रीयीकरण झालेल्या बँकांमध्ये सेवा देताना बेफिकीरी दाखवली जाते हा नेहमीचा अनुभव आहे सहाजिकच जमीन प्रसंगावधान राखावे सखोल चौकशी करावी आणि नंतरच निर्णय घ्यावा हा धडा त्याला या अनुभवामुळे आला.

दुसरा, नुकताच एका नामांकित वाचनालयास संबंधी बेफिकीर राहण्याचा अनुभव एका परिचित ग्रुहिणीला आला आणि त्यामुळे तिचे टाळता येण्याजोगे नुकसान झाले. कसे ते त्या वाचनालयाच्या whatsapp समुहावर पाठवलेल्या संदेशातून पहा:

"सादर वंदन,
मी, सौ...... 70 वर्षाची डायबेटीस पेशंट असलेली, ज्येष्ठ नागरिक आहे. आपल्या वाचनालयाची मी सभासद असून माझा सभासद क्रमाक ***** आहे.

मार्च 20 मध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यामुळे, तेव्हापासून लायब्ररीमध्ये वाचनालयामध्ये आलेली नाही आणि पुस्तक किंवा मासिके घेतलेली नाहीत. मार्च 20 पावेतोची वर्गणी भरलेली आहे. त्यानंतर आता दोन वर्षांनी आता पुनश्च वाचनालयात येऊन पुस्तक मासिक मी घेऊ इच्छिते.

यासंदर्भात माझ्या यजमानांनी काल आपल्याशी फोनवरुन चौकशी केली असता, असे समजले की, गैरहजर असलेल्या कालखंडाचीही वर्गणी भरायला लागेल. यासंदर्भात आम्हाला एप्रिल 20 नंतर
आतापर्यंत कोणतीही तशी सुचना आपणाकडून मिळालेली नाही. तसेच कधीही आपणाकडून वर्गणी न भरल्याबद्दल तेव्हापासून व्हाट्सअप वर सूचना कधीही आलेली नाही. जर आपण तशा सूचना व माहिती सभासदांना दिली असेल, तर ती कोणती आणि ती कशी दिली ते कळवावे. ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्हाला असा भुर्दंड देणे कितपत योग्य आहे, याचाही विचार करावा आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.

धन्यवाद
सौ...."

लॉकडाउन लागल्यापासून कोणत्याही प्रकारची कल्पना वाचनालयाने सभासदांना दिली नव्हती हे खरेच परंतु सभासद गृहिणीने देखील गृहीत धरले की ज्या अर्थी यापुढे वाचनालयात जाऊन पुस्तक घेत नाही त्यामुळे आपल्याला वेगळी वर्गणी भरायची गरज नाही परंतु हे तिचे गृहीतक चुकीचे ठरले ती दोन वर्षांनी सारा करुणा महामारी चा एकंदर माहोल निवळल्यावर वाचनालया वरील वाचनालयाला वरील संदेश पाठवला खराब परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही ही आश्चर्य याचे वाटते की सभासदांनी वर्गणी भरली नाही याचा त्याच्या तगादा च्या कालखंडात वाचनालयाने देखील सभासदा मागे लावला नव्हता.

सात महिन्याने लॉक डाऊन मध्ये शिथीलता दिल्यानंतर व्हाट्सअप स्टेटसमध्ये केवळ त्यांनी उल्लेख केला होता असे वरील संदेशानंतरच्या चौकशीत समजले. पण सहसा जर आपल्याला संदेश आला नसेल व्हाट्सअपवर तर आपण उगाचच कुणाचेही स्टेटस पहात नाही. त्यामुळे वाचनालयाने व्हाट्सअप ग्रुप वर प्रत्यक्ष माहिती देऊन यासंबंधी आपले धोरण काय आहे याचा खुलासा सभासदांना संदेशाद्वारे करायला हवा होता. पण त्यांनी देखील गृहीत धरले की स्टेटस वर टाकलं म्हणजे आपली जबाबदारी संपली. शेवटी त्या गृहिणीने आपले वाचनालयाचे सभासदत्व बंद केले. पण तेव्हा तिला लाँकडाऊनचे सात महिने सोडून उरलेल्या सतरा महिन्यांची वर्गणी, वाचनालयाकडे असलेल्या तिच्या अनामत रकमेचा हिशोब वजा करून चुकती करावी लागली.

येथे हलगर्जीपणा दोघांकडून झाला होता अथवा गृहीत धरणे दोन दोघांकडून झाले होते. पण त्यात वाचनालयाचा फायदा झाला आणि सभासदाचे नाहक नुकसान झाले. ही एकप्रकारे न दिलेल्या सेवेबद्दलची लूटच नव्हती कां? हा सभासद जेष्ठ नागरिक स्री आहे, कोरोना महामारीतील एकंदर भीषण परिस्थितीची जाण ठेवून निदान वाचनालयाने तिला काही सूट देणे गरजेचे होते. पण लक्षात कोण घेतो? शेवटी "इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा" असे म्हणून गप्प राहायचे. आपणच आपल्या बेफिकीरीबद्दल आपल्यालाच दोष देत.

सारांश...
👍"दिसतं तसं नसतं, आणि म्हणून जग फसतं! 
पहिली फसवणूक ही एक सुधारण्याची संधी, 
पुन्हा फसाल, तर ती मूर्खपणाची घोडचूक असते! 
म्हणून, 
जागे व्हा, जागे रहा; जाणते व्हा, आणि जाणतेच रहा!" 👌

धन्यवाद
सुधाकर नातू                                                            
ता.क.
दुर्दैवाने हा लेख लिहिण्यापूर्वी, स्वयंपाकघरात गॅसवर पाणी तापत ठेवून, मी बाहेर आलो आणि मोबाईलवर हा लेख बडवत बसलो खरा, पण लेख लिहून झाल्यावर जेव्हां स्वयंपाकघरात गेलो, तेव्हा लक्षात आले की, गॅस बंद केल्यामुळे, पाणी जवळजवळ तळाला गेले होते. माझ्या बेफिकीरीपायी कितीतरी गॅस हा असा वाया गेला होता ! म्हणजे मी म्हणतो तेच खरे "करा बेफिकीरी, होईल नुकसान लय भारी !"

मंगळवार, ८ मार्च, २०२२

# "काळ अन् वेळेचा जमाखर्च!":

 "काळ अन् वेळेचा जमाखर्च!":

कुणालाही न सांगता काळ हा जातच असतो पुढे पुढे. त्याला मागे वळणे माहीत नाही, तो अव्याहत पुढेच जात रहाणार असतो. मागे गेलेला काळ आणि वेळ फुकट गेली की, चांगल्या समाधानकारक अशा गोष्टींसाठी वापरली गेली, ह्याची आपल्याला कायमच रुखरुख लागली पाहिजे. कारण उपलब्ध वेळ तुम्ही कसा वापरता, कशा करता वापरता, ह्यावर आणि फक्त ह्यावरच तुमचे समाधान, यश अवलंबून असते. ध्यानात ठेवा, आयुष्य हा लिमिटेड ओव्हर्सचा सामना असतो आणि ज्याचा "रन रेट" अधिक तोच जिंकणार! थांबला, तो संपला!

पण दुर्दैवाने, आपल्याला वेळेचे भान राहत नाही, आपण नको त्या गोष्टीत वेळ घालवत राहतो, आणि नंतर फक्त पश्चाताप करायची पाळी येऊ शकते. कायम सजग राहून आपण वेळ कसा घालवला, वा कसा अधिक चांगल्या प्रकारे घालवता येईल किंवा घालवण्यापेक्षा वापरता येईल, ह्याचाच सातत्याने विचार केला पाहिजे.

त्यासाठी दररोज सकाळी, कालचा दिवस समाधानकारक आणि कोणत्या उपयुक्त योगदानांमध्ये गेला, ह्याची नोंद ठेवणे उपयुक्त ठरू शकते. 

हे अंतिम सत्य आहे की, काळ, वेळ ही सगळ्यांना सारखी असते. कदाचित मृत्यु आणि वेळ ह्या, दोनच गोष्टी अशा आहेत की, जिथे कुठलीही भेदभावाची सुतराम शक्यता नाही. ते लक्षात ठेवून, समोर आलेला प्रत्येक क्षण अधिकाधिक उपयुक्त गोष्टींसाठी, स्वतःला किंवा इतरांना समाधान देण्यासाठी वापरता आला तर आपला दिवस चांगला गेला असे म्हणता येईल.

धन्यवाद

सूधाकर नातू

गुरुवार, ३ मार्च, २०२२

# 👍"सिंहावलोकन, गेल्या दोन वर्षांचे !":

 "सिंहावलोकन, गेल्या दोन वर्षांचे !":

९ मार्चला, करोना महामारीचे महासंकट आपल्या येथे सुरू झाल्याला दोन वर्षे पूर्ण होतील. ही दोन वर्षे संपूर्ण जीवनशैलीमध्ये उलथापालथ घडवणारी आणि आणि माणसा माणसांमधल्या नात्यांमध्ये नको ते बदल आणि दुरावा निर्माण करणारी, अनेक प्रकारची कौटुंबिक, आर्थिक, व्यावसायिक आणि इतर अनेक प्रकारच्या आव्हानांना संकटांना सामोरे जायला लावणारी ठरली.

माणसाचे हे वैशिष्ट्य की, तो अशा प्रसंगी डगमगून न जाता, आपल्या समोरच्या सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देतो, त्यातून मार्ग काढतो, नव्या संधी शोधतो, असा इतिहास आहे. त्याच्या या विजिगीषू वृत्तीवरच ही मानवजात पृथ्वीवर आतापर्यंत टिकून आहे. अशावेळी, अकस्मात युक्रेन रशिया युद्धाचे काळे ढग, साऱ्या जगावर पुनश्च दुःखाचे संकटांचे वर्षाव करणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, हे खरेच. परंतु आता मागे वळून पाहताना, आपण प्रत्येकाने ही दोन वर्षे कशी घालवली त्याचा आढावा घेणेही गरजेचे आहे. काय काय पाहिले, काय अनुभवले आणि त्यामधून काय मिळवले, काय दिले ह्याचे सिंहावलोकन करण्याची ही संकल्पना आहे.

म्हणूनच, इतर सर्व वैयक्तिक, खाजगी बाबी वगळून, आपल्या मागील दोन वर्षांतील अनुभवांसंबंधीची

ही छोटीशी प्रश्नावलीः

#आपण फावल्या वेळाचा उपयोग कसा केलात?

#आपले आत्मनिरीक्षण केले कां?

#आपल्या छंदांसंबंधी व वैयक्तिक

आत्मविकासासाठी काय केले?

# आपण काय वाचले, त्यातील काय भावले?कां?

# आपण नाटक चित्रपट पाहू शकलात कां आणि ते कोणते, त्यातून काय पाहिले, काय मिळाले?

# ऑनलाइन कार्यक्रम पाहिलेत का सहभागी झालात कां? त्यांचा अनुभव काय?

# इतरांना वा समाजाला उपयोगी अशी काही कामे व योगदान देण्याचा तुम्हाला योग आला कां आणि तो कोणता? कसा?

या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद निरीक्षण करायचे असले तर तेही नमूद करावे.

अशा निरीक्षणातून, आपल्याला पुष्कळशा नव्या नव्या गोष्टी एकमेकांपासून शिकता येतील, देता वा घेता येतील, म्हणून हे सुचले. ही संकल्पना यशस्वी व्हावी यासाठी आपल्या सक्रिय सहभागाची, प्रतिसादांची अपेक्षा आह

धन्यवाद.

सुधाकर नातू