मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१८

"शारदोत्सव":


"शारदोत्सव":

"शब्द व्हावे सारथी":
श्रीमती विजया वाड ह्यांचा "श्रेयस प्रेयस" ह्या विभागात दि.२२सप्टे१८ च्या लोकसत्ता चतुरंग पुरवणीत, "शब्द व्हावे सारथी" असे आगळे वेगळे शीर्षक असलेला लेख वाचला.

आरंभाच्याच "लंगडीच राह्यचंय कां तुला?" अशा प्रश्नाने कुतूहल जाग्रुत झाले, कोणाबद्दल हे काय लिहीते आहे ही लेखिका, असे मनात आले आणि लौकरच हा तुमच्याच सार्थ व क्रुतार्थ जीवनपटाचा हा शब्दवेध आहे, हे ध्यानात आले आणि अथ पासून इतिपर्यंत लेख पहाता पहाता वाचूनही झाला.

एक स्री आपल्या बुद्धिमत्तेच्या व आत्मविश्वासाच्या जोरावर व्यावहारिक जीवनातले विविध स्तरांवरचे असामान्य योगदानांचे मैलाचे दगड पार करत रहाते हे उमजून मन भरून आले. खरोखर कोणालाही भूषणावह वाटावा असा त्यांच्या आयुष्याचा चपखल शब्दातील आणि रसाळ भाषेतील हा दस्तावेज स्फूर्तिदायक आहे. अत्यंत वाचनीय असा हा लेख आहे. तो जरूर वाचा.
"पित्रुत्वाच्या प्रसववेदना":
२२सप्टेंबरचा तो रविवार खरोखर शारदोत्सवाचाच मला म्हणावा लागेल. कारण त्या दिवशी  श्रीमती मंगला सामंत, ह्यांचा लोकसत्ता चतुरंग पुरवणीतच "पित्रुत्वाच्या प्रसववेदना" असे आगळे वेगळे शीर्षक असलेला लेख वाचायला मिळाला. त्यावरील त्यांना मी दिलेल्या हा संक्षिप्त प्रतिसाद:
"रानटी युग ते आधुनिक युग ह्या प्रदीर्घ मानवेतिहासाची सामाजिक उत्क्रांती कशी होत गेली आणि बंधुप्रधान ते पित्रुप्रधान असे संक्रमण पुरुषांच्या बाबतीत कसे कां घडत गेले त्याचा संशोधनात्मक व अभ्यासपूर्ण अशा ह्या दस्तावेजाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा."
चोखंदळ वाचकांनी संग्रही ठेवावा असा हा लेख आहे.
आजची "रजनी":
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील, "नकळत सारे घडले" ह्या मालिकेत नायिकेच्या आईची ठसकेबाज भूमिका करणार्या अभिनेत्री
अनुराधा राजाध्यक्षांनी पाठवलेल्या यु ट्युब वरील लिंक पाहून मी त्यांना दिलेला हा प्रतिसाद:
"लिंक पहायला तसा उशीरच झाला आहे. ती संपूर्ण मन लावून ऐकावी अशीच आहे. प्रथम अभिनंदन व शुभेच्छा. अभिनेत्री असूनही तुम्ही व्यावहारिक जीवनातले योग्य व अयोग्य ह्यांच्यावर प्रिया तेंडूलकर रजनीच्या रुपात जे उभे करायची तसेच काहीसे योगदान ह्या लिंकमधील अनुभवावरून जाणवले.

रक्षक हे भक्षक होत चाललेले असताना, त्यांच्यामधील कर्तव्यदक्ष मंडळींपैकी एका कर्तव्यदक्ष पोलीसाचे हे उदाहरण खूप काही सांगून जाते. भ्रष्टाचार आणि त्याच्या विळख्यामुळे, प्रामाणिकांवर येणारा ताण व त्यांची अगतिकता, ह्या निवेदनांत कुणालाही अंतर्मुख व्हायला लावेल. जर प्रत्येक नागरिकाने त्याचे विहीत कर्तव्य, मग ते व्यावसायिक वा कौटुंबिक इ.इ. काहीही असो ते उत्तमपणे पार पाडले तर आपल्या पुष्कळच समस्या दूर होतील, ही जाण ह्या उत्तम निवेदनकौशल्यावरुन आली.

होतंय काय, जिथे तिथे वाईट अप्रस्तुतच विविध माध्यमातून समाजापुढे सातत्याने येत आहे. ह्या पार्श्वभूमीवर तुमच्यासारख्या मान्यवरांनी जे चांगले सुभग श्रेयस हितकारक घडतंय ते असे प्रदर्शित करणे हा एक दाद देण्याजोगा उपक्रम आहे.
शेवटी हेच म्हणतो, अंगभूत अभिनय, वाक् चातुर्याचा समाजाच्या भल्यासाठी विनियोग करणार्या तुम्हाला सलाम. आगे बढते रहो."
अनुराधाताई यु ट्युब वर व्यावहारिक जीवनातील तळमळीच्या मुद्द्यांवर नेहमी एक स्वत: सादर केलेला निवेदनाचा विडीओ अपलोड करतात. म्हणूनच त्यांना आजची "रजनी" असेच म्हणावेसे वाटते.
सर्वगुणसंपन्न कोणीही नसतो अगदी खरे यश मिळविणे, आपल्या हातात असते. ते टिकते की नाही ते आपल्या कर्तृत्वावर व प्रयत्नांवर अवलंबून असते. पण प्रसिद्धी किंवा कुप्रसिद्धी ह्या त्या यशात किंवा अपयशात हातात हात घालून चालतात. म्हणूनच जे सातत्याने यशाची शिखरे पार करतात ते आपल्या चुकांमधून धडा घेऊन वेळोवेळी आपले पवित्रे बदलतात. शेवटी वाऱ्याची दिशा ही पाहावीच लागते. सुनिल गावसकर सारख्या असामान्य फलंदाजाने आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत वयपरत्वे व खेळाच्या वेळेच्या परिस्थिती नुसार आपल्या पवित्र्यात व शैलीत किती बदल केले ते आपल्याला ज्ञात आहे का ? आपण फक्त त्याच्या यशाकडे व प्रसिद्धीकडे पहातो व त्याने केलेल्या अथक प्रयत्नांकडे दुर्लक्ष करतो. तेच सर्व क्षेत्रात प्रत्येकाच्या बाबतीत घडते.


जीवनशैलीची आव्हाने:
जुने ते सोने, हे "सोमि"वर फिरणार्या एका संदेशात छानपणे मांडलं आहे. चार पाच दशकांपूर्वी आतासारखी विविध संसाधाने नव्हती. त्यामुळे तेव्हांच्या शारीरिक श्रमांच्या अपहार्यतेमुळे स्विकाराव्या लागलेल्या जीवनशैलीचे गोडवे त्या संदेशात गायिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या स्पर्धात्मक घाई गर्दीचे दोष अप्रत्यक्ष मांडले आहेत.
 परंतु झालेल्या व नित्य होणाऱ्या प्रगतीचे लाभ नजरेआड करता येणार नाहीत. आयुर्मयादेत कितीतरी वाढ झाली आहे. विरंगुळ्याची करमणुकीच्या साधन सेवांची उपलब्धता विविध आहे. बदलत्या काळाच्या बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यातही वेगळा अनुभव आहे. असे भूतकाळात रममाण होऊन काहीच साधले जात नसते, कारण प्रगतीचे कालचक्र उलटे फिरवणे शक्यही नसते आणि त्यांत धन्यता मानणे म्हणजे स्वत:ची फसवणूकच होय.
टीका करणे ही देखील उपयुक्त निर्मितीच नव्हे कां कारण टीका करताना साधक बाधक दोन्हीचा विचार करून वास्तवतेचे पारदर्शी चित्र उभे केले जाते. जशी गरज, ही शोधाची अर्थात नवनिर्मितीची जननी, त्याचप्रमाणे टीका ही प्रगतीच्या बदलाची जननी असते. टीका खुल्या दिलाने स्विकारणारेच सुधारणेचे नवनवे मार्ग खुले करू शकतात. दुर्दैवाने टीका पचविणारे दुर्मिळ असतात. म्हणूनच जैसे थे अथवा पिछेहाट अपरिहार्य असते. उगाच नाही, संत तुकाराम म्हणतात "निंदकाचे घर असावे शेजारी"!
"बोल-अबोल":
बोलता येतं, म्हणून माणसं आयुष्यभर नको इतकं बोल बोल बोलतात. सहाजिकच, जग त्यांना बोल लावल्याशिवाय रहात नाही. आपल्याच करणीनं, अशी माणसं कमावलेलं गमावूनही जातात.
गरजेचं, जरूरीचं असेल, तेव्हांच व तेवढंच बोलायचं, हे ज्यांंना समजतं, अशी माणसं मात्र दुर्दैवाने शोधावी लागतात. बोलण्याचं महत्व, बोलती बंद झाल्याशिवाय कळत नाही. भावना, विचार व्यक्त करण्याची ही शक्ती नष्ट होणं, हे अंधत्वानंतरचं सर्वात मोठं दु:ख!
संवाद हा या कलियुगातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे  संवाद आणि सुसंवाद पण नको वाद हे सूत्र जपता आले तरच जीवनात आनंद तरंग हे मात्र नक्की.
"स्वप्नांच्या पलिकडले!:
स्वप्न केव्हां व कां पडतात?
स्वप्न खरी होतात कां? हो असेल, तर केव्हां?
स्वप्नांचे कोणते प्रकार असतात?
ह्या प्रश्नाला "सोमि" वर.आलेले उत्तर:
"मनी वसे ते स्वप्नी दिसे!आपल्या कंठामध्ये हिंता नावाची एक नाडी आहे. आपल्या केसाचा उभा हजारावा भाग केला तर तेवढ्या त्या नाडीमध्ये स्वप्नाचा जन्म होतो .काही स्वप्ने सूचक असतात आणि वेदांता प्रमाणे हे जग स्वप्नासारखे आहे. फक्त सत्य एकच .सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला!"
काही स्वप्ने सूचक असतात, हा अनुभव मलाही आलेला आहे. भविष्यात घडणार्या घटनांची कल्पना स्वप्नातून कां कशी कोणत्या शक्तीमुळे दिसते हे एक कोडे आहे!
ह्यावरून आठवले, एकदा अचानक  स्वप्नात ‘तेयुश’ हा शब्द येत राहिला होता. कां कसा कुणास ठाऊक! अधिक विचार करता, जहाल तेजाब मधला ‘ते’ आणि आयु मधला ‘यु’ , प्रकाशातला ‘श’,  हयांचा तो अदृश्य मिलाफ आहे हे जाणवले आणि वीज चमकावी तसे हे कोडे उलगडले़. जीवनात सतत वरिष्ठ वर्ग, कनिष्ठांवर आपले विचार व निर्णय लादत आला आहे. बिचारा कनिष्ठ वर्ग निमूटपणे हा जाच सहन करत आला आहे. तेजाबातील जहालपणा घेऊन आपल्यावरील आजवरचा होणारा अन्यायाची जाणीव ही वीज चमकावी, अशी प्रकाशात आता येत आहे हा ‘तेयुश’ चा मतितार्थ असू शकतो.
विविध क्षेत्रात आर्थिक, बौद्धिक, वैचारिक भावनिक, वा सामाजिक इ.इ. बाबतीत गुणात्मक असमानतेमुळे अनेक उच्च कनिष्ठ गट निर्माण होत रहातात, श्रेणी निर्माण  होऊन, वरचढपणाचे दबावाचे खेळ चालत रहातात. त्यांचा अतिरेक झाला की "तेयुश" विद्रोह निर्माण करतो. सभोलताली जे घडत आहे त्याची ही पारदर्शी मीमांसा आहे
जगा आणि जगू देवू या एकमेकांचा आत्मसन्मान जपू या, संयम आणि सहनशीलता अंगिकारूया. माणसा माणसांमधली कटूता दूर करून एकमेकांतली दरी मिटवू या. हाच हया विचारमंथनाचा संदेश आहे.
जन्मगांठ:
माणसाचा स्वभाव अनाकलनीय असतो. व्यक्ती तशा प्रकृती किंवा स्वभाव ! संसारात दोन वेगळ्या स्वभावाची माणसे जोडीने रहाताना मतभेद किंवा वाद होणे सहाजिकच असते. दुसरा असेच का वागतो ह्याचा विचार त्याच्या दृष्टिकोनांतून समजून घेवून मगच आपण वागले, तर संसारात गोडी येते. आपला संसार सुखाचा करणे हे आपल्याच हातात असते. हा सारीपाट खेळणे मोठेच आव्हान असते. तडजोड, समंजसपणा आणि त्याग ह्या तीन बाजू प्रत्येकाने संभाळल्या तर हा खेळ मनाजोगती फळे देतो.  

शेवटी एक मनोगत:
वाचन हा श्वास, लेखन हा निश्वास,
मालिका पहाणे हा ध्यास.
घडामोडींचा विचार हा अभ्यास,
सोशल मिडिया वापरणे हा विकास.
प्रवास करणे हा त्रास,
आरोग्य राखणे हा प्रयास.
सुधाकर नातू
माझ्या ब्लॉगची लिंक:
http//moonsungrandson.blogspot.com






गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८

नियतीचा संकेत६: जन्मपत्रिका व नशीब १:



नियतीचा संकेत-६:
स्थान महत्व-ग्रह पत्रिकेतली फळे:


पत्रिकेत एकूण बारा स्थाने असतात: चार चौकोन व आठ त्रिकोण. ह्या  विविध स्थानांची उपयुक्त विभागणी अशा प्रकारे गटांमध्ये केली जाते. त्या स्थानांतील ग्रह व स्थानेशांची पत्रिकेतील स्थिती ह्यावरुन कोणत्या फळांचा विचार केला जातो, ते येथे दर्शविले आहे. ढोबळ मानाने ह्या मार्गदर्शनाखाली आप आपल्या पत्रिकेचा अभ्यास करुन निष्कर्ष काढणे सुलभ होऊ शकेल:
१ ४ ७ १० ही केंद्र स्थाने कर्तृत्व यश व प्रसिद्धि
५ व ९ ही सर्वात महत्वाची त्रिकोण स्थाने-सहाय्य दैव नशीब
६ ८ व १२ ही त्रिक स्थाने दुस्थाने मानली जातात नाश कटकटी चिंता
१ ३ ९ ही बुद्धी कला संस्कार
३ ६ १० ११ ही उपचय स्थाने, उत्कर्ष भरभराट
१ २ ४ ५ ७ ८ ९ १२ ही अनुपचय स्थाने अशुभ ग्रह र्हास पीडा
२ ७ ही मारक स्थाने देहपीडा पैसा भोग मारकेशाची दशा अशुभ फळे
२ ५ ८ ११ ही पणफर स्थाने परावलंबित्व आयुष्यातली गती
३ ६ ९ १२ अपोक्लीम स्थाने मित्रपरिवार सामाजिक बांधिलकी
३ व ८ ही स्थाने आयुष्य दर्शक पीडा शारिरीक कष्ट कमनशिब
४ व ८ जीवनातील संकटे
चार त्रिकोण: धर्म त्रिकोण:१ ५ ९
अर्थ त्रिकोण: २ ६ १०
काम त्रिकोण: ३ ७ ११
मोक्ष त्रिकोण: ४ ८ १२
ग्रह व राशींचा संबंध:
प्रत्येक राशीमध्ये कोणता उच्चीचा ग्रह आणि नीचीचा ग्रह आणि ती रास कोणत्या ग्रहाची आहे याचा आपण आता अभ्यास करू:
१ मेष रास मंगळाची रास आहे, रवी उच्चीचा तर शनी नीचीचा असतो.
२  व्रुषभ ही शुक्राची रास तर येथे चंद्र उच्चीचा कोणीही नीचीचा नाही.
३. मिथुन राशीत कोणताही ग्रह उच्चीचा आणि नीचीचा होत नाही आणि ही रास बुधाची आहे
४. कर्क राशि मध्ये मंगळ नीचीचा तर गुरु उच्चीचा होतो व ही चंद्राची रास आहे
५ सिंह रवीची रास असून येथे कोणीही उच्चीचा वा नीचीचा होत नाही.
६ कन्या राशीचा मालक तसेच तेथे तो उच्चीचा आणि शुक्र नीचीचा होतो
७ तूळ राशीत शनी उच्चीचा तर रवी निचीचा. व ही शुक्राची रास.
८ वृश्चिक राशीत चंद्र निचीचा होतो आणि ही रास मंगळाची आहे, कोणीही उच्चीचा ग्रह नाही.
९ धनु राशी गुरूची रास असून येथे कोणीही उच्चीचा वा नीचीचा होत नाही.
१० शनीच्या मकर राशीत मंगळ उच्चीचा तर गुरु नीचीचा
११ कुंभ शनीची रास, कोणी उच्चीचा नाही आणि निचीचाही नाही.
१२ मीन रास गुरूची रास येथे शुक्र उच्चीचा तर बुध नीचीचा होतो.
ह्या प्रमाणे आपल्याला आपल्या पत्रिकेत कोणता ग्रह शुभ आहे, तर कोणता ग्रह त्रासदायक अवस्थेत आहे याचा आढावा घेता येईल.
जन्मपत्रिका व ग्रहांचे निष्कर्ष:
आता इतक्या पार्श्वभूमीवर, आमच्या चाळीस वर्षांच्या ज्योतिषाच्या अभ्यासावरून काही परामर्ष वा अंदाज, आम्ही येथे मांडू इच्छितो. विविध पत्रिकांचा अभ्यास करून त्यावरून आम्ही आमचे हे आडाखे मांडत आहोत ज्याचे त्याने त्यांची पडताळणी घ्यावी. ते बरोबर आले तर उत्तम, नाही तर सोडून द्यावे. प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक स्थान यांचा आम्ही येथे आम्ही विचार करत आहोत.
प्रथम स्थान:
१ लग्न स्थान हे पहिले स्थान तुमच्या स्वतःचा पूर्ण भूमिकेचा आरसा असतो. इथे कोणताच ग्रह नसला तरी काही बिघडत नाही. गुरु ज्यांच्या पत्रिकेत लग्नी असतो, ती माणसे
सुशील, मिळून-मिसळून वागणारी आणि त्यांचे जीवन बरेचसे शुभ फलदायी असते.
समाधानी वैवाहिक जीवनात ह्या शुभ गुरूचा नक्कीच हातभार लागतो.
शनी जर लग्न असेल तर अशी व्यक्ती चंचल आणि काही मानसिक चिंता, अस्वस्थता असणारी असू शकते. रोग स्थानापासून हे स्थान आठवे असल्यामुळे ही व्यक्ती अधून मधून सातत्याने आजारी पडत असते आणि त्यांना जीवनात मानसोपचार तज्ञाकडे जावे लागू शकते.
बुध जर स्वगृही असेल आणि लग्नी अर्थात प्रथम स्थानी असेल, तर अशी माणसे अतिशय बुद्धिमान, खंबीर आणि आपली बाजू उत्तम प्रकारे मांडणारी असू शकतात. ते वकील, आँडीटर वा अभिनेते होऊ शकतात. ही मंडळी विचार योग्य दिशेने करणारी असल्यामुळे इतरांशी चांगले जुळवून घेऊ शकतात लग्न स्थानाचा मालक स्वगृही असल्यामुळे तब्येतही त्यांची चांगली राहते.
रवी हा सर्व ग्रहांमध्ये महत्वाचा आहे आणि  रवी लग्नात असणे हे उत्तम तब्येत आणि उद्योगी असण्याचे लक्षण आहे. त्यातून तो स्वग्रुही असेल तर सोन्याहून पिवळे. शारिरीक मानसिक आरोग्य उत्तम. प्रभावी व्यक्तिमत्त्व असून, नेत्रुत्वाचे गुण असतात. लष्कर पोलीस खात्यात अधिकारी होऊ शकतात.
मंगळ प्रथमस्थानात असला तर अशा व्यक्तीला मंगळ दोष आहे असे मानतात त्यामुळे विवाह जुळवताना तसेच पत्रिका मंगळ दोष असणारी लागते अथवा शनीचा दाब आवश्यक असतो मंगळ लग्न असल्यामुळे तापट स्वभाव हट्टी मात्र दीर्घोद्योगी असतात त्यातून तो जर उच्चीचा म्‍हणजे मकर राशीचा असेल तर तिरसट स्वभाव असू शकतो आणि अशा माणसांची जुळवणे कठीण होऊन बसते रक्तदोष किंवा मानसिक दोष वा रोग होऊ शकतात.
शुक्र लग्न असेल तर ती व्यक्ती आकर्षक व्यक्तिमत्वाची छानछोकीची आवड असणारी कलाक्षेत्र अभिनय व आर्किटेक यामध्ये यश मिळवू शकणारे असते शुक्र जर मी नेता अथवा तूळ व वृषभेत असेल तर सोन्याहून पिवळे कारण अशा व्यक्ती आपल्या वागण्यामुळे आणि सौजन्यामुळे इतरांवर प्रभाव पाडू शकतात याउलट जर शुक्र नीचीचा म्हणजे कन्या राशीत असेल तर वैवाहीक जीवनात चिंता, काही ना काही अडचणी येणारी असे नशीब असू शकते.
चंद्र लग्न असणे म्हणजे भरपूर प्रवास नशिबी असू शकतो वृषभेचा उच्चीचा चंद्र असला तर अतिशय हळवी व उत्साही असतात. लेखक कवी होऊ शकतात. त्यातून कर्क राशीत प्रथम स्थानी चंद्र असेल तर भावनाप्रधान तरल कल्पनाशक्ती असते. संसारात खूप रस घेऊन जोडीदाराच्या कलेने वागतात.
राहू व केतू लग्न असणे मात्र चांगले नसते धरसोड वृत्ती असते. अतिशय चंचल स्वभाव हट्टाग्रही आणि जीवनामध्ये अडचणी निर्माण होऊ शकणारी असतात. वैवाहिक जीवनात असमाधान कुरबुरी व चढ उतार, तसेच मानसिक आरोग्यही तितकेसे चांगले नसते.
ह्याच अनुषंगाने आमच्या ज्योतिष चिकीत्सेचे निष्कर्ष आम्ही पत्रिकेतील इतर स्थानांचे बाबतीत पुढील काही लेखात मांडू.
हा अभ्यास उपयुक्त होईल अशी आम्हाला खात्री आहे.
सुधाकर नातू
१३/९/'१८
ब्लॉगची ही लिंक उघडा व इतर लेख जरूर वाचा:
http//moonsungrandson.blogspot.com







सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

"जन्मपत्रिकेवरुन नशिबाची गोळाबेरीज":

"जन्मपत्रिकेवरुन नशिबाची गोळाबेरीज"

"ग्रहांच्या महादशांचा भाग्यांक":
प्रत्येकाचे जीवन चक्र वेगळे असते किंवा सुरुवात केव्हा अंत याची कल्पना आपल्याला नसते. हा जणू एका गाडीचा प्रवास आहे आणि तो प्रवास नऊ ग्रहांच्या महादशा पार करत आपण करत असतो. अर्थात सहसा कोणालाच या नऊच्या नऊ महादशा जीवनात येतातच असे नाही. त्यापैकी अनिष्ट ग्रहांच्या महादशा तुम्हाला अनिष्ट फळे देतात. शनि मंगळ राहू केतू हे अनिष्ट ग्रह मानले आहेत. बुध शुक्र गुरू यांच्या महादशा त्यामानाने चांगली फळे देतात. रवीची महादशा तो कोणत्या स्थानाचा अधिपती आहे त्यावरून तिचा दर्जा कळू शकतो. पत्रिकेमध्ये 6 8 12 ही अनिष्ट स्थाने.

सहावे म्हणजे रोग स्थान, शत्रू स्थान आठवे स्थान म्हणजे मृत्यू स्थान किंवा एखाद्या गोष्टीचा अंत होणे, बारावे व्ययस्थान अशी ही तीन अनिष्ट स्थाने आहेत. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या स्थानांच्या अधिपतीच्या महादशा येत असतात. प्रत्येक स्थानाचे एक विशिष्ट फळ असते.

ह्या लेखात जन्मपत्रिकेतील स्थानपरत्वे ग्रह व त्यांच्या जीवनात येणार्या महादशा ह्यांच्या शुभशुभत्वाचा सखोल आढावा घेऊन, तिचा गुणात्मक दर्जा काढण्याची अभिनव पद्धत आम्ही चिकीत्सा करून मांडली आहे.

आम्ही गेले तीन दशके जसा राशीभविष्यासाठी, अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत, तसाच एक प्रयत्न जीवनातील नशिबाची गुणात्मक गोळाबेरीज काढण्याच्या पद्धतीसाठी ह्या लेखात केला आहे. तो नवी दिशा देईल अशी आशा आहे









10/9/'18

My blog’s link:
http//moonsungrandson.blogspot.com

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

"शनीचे प्रताप":


 शनीचे प्रताप:

शनि हा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे. त्याची साडेसाती ही सर्वांना परिचित आहे. शनीचे महत्त्व विवाह जुळवताना, शनीचा दाब असला, की मंगळाचा दोष ही जातो त्यामुळे आहे. याव्यतिरिक्त शनीचे काय प्रताप आहेत ते या लेखात सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.
प्रत्येक पत्रिकेमध्ये बारा स्थाने असतात प्रत्येक स्थानाचे काहीना काही महत्त्व असते. ते आपण नियतीचा संकेत ह्या लेखमालेत आधी पाहिले आहे. पत्रिकेमध्ये ६, ८, १२ ही स्थाने अनिष्ट मानली जातात, त्यापैकी आठवे स्थान त्याला मृत्यू स्थान असेही म्हणतात. ज्या स्थानापासून ते आठवे असते, त्या स्थानाच्या फळांमध्ये बाधा किंवा ती फळे वाईट मिळतात.

याच पार्श्वभूमीवर आपल्या पत्रिकेमध्ये शनि ज्या स्थानी आहे, ते स्थान ज्या स्थानापासून आठवे असेल, त्या स्थानाचे फळ वाईट त्रासदायक मिळते हा मुद्दा या लेखात मांडला आहे. प्रत्येक स्थानात शनी असला तर तो कोणत्या स्थानाबद्दल, कशी वाईट फळे देईल त्याचे दिग्दर्शन या लेखात करण्यात आले आहे.

पत्रिकेमध्ये प्रत्येकाला आपला शनी कुठे आहे हे पाहून आपल्याला कोणत्या स्थानाची जास्त वाईट फळे मिळतील याची कल्पना त्यामुळे येऊ शकेल. कुणाला नोकरीत व्यवसायात त्रास होतो, कुणी सारखा आजारी, तर कुणाची पैशाच्या बाबतीत, चणचण निर्माण होते, कुणाच्या प्रवासात त्रास होतात, तर कुणाचे वैवाहिक जीवन असमाधानकारक असते. अशी अनेक फळे ही त्या त्या स्थानाच्या पासून शनि कुठे आहे त्यामुळे मिळू शकतात. हा लेखामुळे, त्यादृष्टीने आपल्या जीवनात पत्रिकेप्रमाणे कोणती कमतरता कोणत्या विषयात आहे ते समजू शकेल. शनिमहात्म्य हे असे आहे!


सुधाकर नातू
४/९/'१८
ब्लॉगची लिंक:
http//moonsungrandson.blogspot.com


सोमवार, ३ सप्टेंबर, २०१८

"मालिकांचे 'महाभारत':


मालिकांचे 'महाभारत'
लेखक: सुधाकर नातू

करमणूक माध्यमे:
आज आपल्याला विरंगुळ्याबरोबर, करमणूक म्हणून अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. त्यापैकी नाटक अर्थात रंगभूमीवरील माणसांमधले जीवंत नाट्य सुरु होऊन जवळ जवळ पावणे दोनशे वर्षे झाली, तर चित्रपट अर्थात् पडद्यावर चाललेला चालता बोलता सावल्यांचा खेळ सुरू होऊन, एक शतक उलटले, त्या तुलनेत छोट्या पडद्यावरचे आविष्कार सुरू होऊन ४५ वर्षे गेली, तर डेली सोप अर्थात् नाट्यमय मालिकांचे दररोजचे खेळ हा २५/३० वर्षांचा इतिहास आहे.

चित्रपट हे एखादी गोष्ट रंगतदार पद्धतीने सादर करण्याचे प्रामुख्याने दिग्दर्शकाचे माध्यम, तर नाटक ही लेखकाच्या मनातले भावभावनांची गुंतागुंत कलाकारांच्या सहाय्याने रंगमंचावर नाट्यरूपात मांडणारी कलाक्रुती. चित्रपट आल्यावर रंगभूमीचे काय होणार आणि मालिका आल्यावर नाटक चित्रपटांचे काय होणार असे प्रासंगिक, तात्पुरते प्रश्न निर्माण झाले खरे, पण अखेर तसे काहीच होता, ही मनोरंजनाची तीन्ही माध्यमे आप आपल्या मार्गीने सुखनैव चाललेली आहेत. मालिकांमधील कामामुळे खूप व्यस्त असलेल्या कलाकारांची नाट्यप्रयोगांवर थोडाफार परिणाम होतो, इतकेच. 

माध्यमांचे हेतू:
चित्रपट नाटक ही मनोरंजनाबरोबरच, समाज प्रबोधन करणारी आणि माणसाला विचार करायला लावणारी, विचारांना बदलत्या परिस्थितीनुसार नवविचार देवू शकणारी माध्यमे आहेत. धंदा, कला मनोरंजन अशा तीन गोष्टींचा समतोल साधणे त्यांच्याकडून अपेक्षित असते. डेली सोप हे यथातथ्य मालिकांचे तसे काही नसते, इथे धंदा अर्थात् जास्तीत् जास्त जाहिराती मिळवत राहून आपला सो काँल्ड मनोरंजनाची कसरत कशीही चालवत ठेवणे हेच ध्येय असते. मालिका पहाणार्या प्रेक्षकांना देखील आपला टाईम पास करणं एवढीच माफक अपेक्षा असते. मूळ कथानकाला कशीही, काहीही वळणे देत हा रतीब असाच पाणी घालत ठेवला की झाले. निदान आज २५/३० वर्षांनी आमुलाग्र बदललेल्या वातावरणांत तरी मालिकांचे संसार असेच चालवलेले दिसतात.

दूरदर्शन वाहिन्या:
प्रथम केवळ शासकीय नियंत्रणाखालील दूरदर्शन वाहिन्या देशात उपलब्ध होत्या. पण १९८४ मधील आशियायी क्रीडास्पर्धा आणि नंतर हे प्रसारणाचे क्षेत्र खाजगी क्षेत्रालाही खुले केल्यानंतर पहाता पहाता अनेक प्रांतातील, अनेकविध भाषांमधील कार्यक्रम प्रसारित करणार्या शेकडो वाहिन्या आता दर्शकांच्या सेवेला हजर आहेत.

त्यामधील छोट्या पडद्यावर सर्वप्रथम कार्यक्रम सादर करणारी झी समूहाची कंपनी १५ डिसेंबर १९९१ रोजी लॉन्च करण्यात आली होती आणि पुढे २००६ पर्यंत ती नाव बदलून झी टेलिफिल्म्स झाली आणि त्यातील बातम्या आणि मनोरंजन विभाग चार छोटे विभागात विभागले गेले. Zee Entertainment Limited, अर्थात् झीअल सध्या 34 विविध दूरदर्शन वाहिन्या, केबल कंपनी सिटी केबल, रेकॉर्डिंग लेबल झी म्यूजिक कंपनी, एक उत्पादन कंपनी आणि इतर व्यवसायांसाठी देखील कार्यरत आहे. 

झी मराठी:
झी मराठी (मराठी: झी मराठी) हा भारतातील एक उपग्रह टेलिव्हिजन चॅनल आहे जो मराठीमध्ये प्रसारित करतो. हे १९९९ मध्ये भारतातील अग्रगण्य नेटवर्किंग नेटवर्क झी नेटवर्क द्वारे सुरू करण्यात आले होते. २८ मार्च २००५ रोजी अल्फा मराठी ते झी मराठी या नावाचे चॅनल झाले.

दरवर्षी झी मराठी मराठी झी मराठी आणि झी गौरव पुरस्कार प्रदान करते. झी मराठी पुरस्कार टेलिव्हिजन शो मध्ये उत्कृष्टता साजरा केला जातो. झी गौरव पुरस्काराने मराठी नाटके चित्रपटांना विविध प्रकारांतील उत्कृष्टतेचे पुरस्कार दिले आहेत. २०१३ मध्ये, झी मराठींनी विविध क्षेत्रांतील महिलांचे काम ओळखण्यासाठी आणि त्यांच्या उत्कृष्ट कथांमधून महाराष्ट्रातील जनतेला प्रूरणा देण्यासाठी, एक प्रयास म्हणून 'उंच माझा झोका गं' ह्या पुरस्काराची सुरूवात केली.

ह्या पार्श्वभूमीवर इतक्या वर्षात आठवणींत राहिलेल्या लोकप्रिय २०/२५ मालिकांचे महाभारत उलगडणे रास्त ठरावे. त्या मंथनातून हे ध्यानांत येईल, की 'जुने, ते सोने'!

लोकप्रिय झालेल्या मालिकां:
"हम लोग, रामायण महाभारत ह्या महा मालिकांपासून, दररोज टीव्ही बघणे ही एक कौटुंबिक गरज सवय बनून गेली. तेव्हापासून डेली सोप हा एक परवलीचा शब्द बनला. तेव्हापासून आजपावेतो मनांत घर करून गेलेल्या आणि लोकप्रिय झालेल्या काही मालिकांची ही नांवेच सारं सांगून जातील. 

देख भाई देख,
अंताक्षरी
तारा
फिलीप्स टाँप टेन
आँफिस आँफिस
शांती
स्वाभिमान
फिल्मी चक्कर
सांस
१० साराभाई Vs साराभाई
११ आहट
१२ हसरते
१३ अस्तित्व एक प्रेमकहाणी
१४ जस्सी जैसी कोई नही
१५ कोरा कागज
१६ सा रे गा मा
१७ कौन बनेगा करोडपती
१८ मूवर्स अँड शेकर्स
१९ क्राईम पँट्रोल
२० इंडियन आयडाँल
२१ ब्योमकेश बक्षी
२२ फौजी
२३ सर्कस
२४ मालगुडी डेज्
२५ उडान
२६ बुनियाद
२७ वागळे की दुनिया
२८ नुक्कड
२९ ये जो है जिंदगी
३० फ्लाँप शो

गाजलेल्या निवडक मराठी मालिका:
बिंब प्रतिबिंब, एक शून्य शून्य, दामिनी,अवघाची संसार, वादळवाट, ऊन पाऊस, कळत कळत,का रे दुरावा" असंभव, कुलवधू, कुंकू, होणार सून मी ह्या घरची, उंच माझा झोका गं, राधा ही बावरी,
श्रीमंत माधवराव पेशवा………….

बंड्या सातबंडे, फास्टर फेणे अशांसारख्या लहान बाळगोपाळांसाठीच्या मालिकांचे अस्तित्व जाणवत नाही, हे दुर्दैव होय. त्या तुलनेत इंग्रजी हिंदी मध्ये पुष्कळ पर्याय उपलब्ध आहेत.

मालिकांची साक्षेपी झलक:
ह्या लोकप्रिय हिंदी मालिकांची साक्षेपी झलक आता घेऊ:
. देख भाई देख : अतरंगी माणसं असलेल्या कुटूंबाची ही खुसखुशीत मालिका, त्यातील कलाकारांच्या अचूक टाइमिंगमुळे आणखीन बहारदार बनली जी डीडी मेट्रो वर दाखवण्यात आली. अशाच वर्गातील चुकता पहावीशी वाटणारी मालिका म्हणजे
'
ये जो है जिंदगी'!

अंताक्षरी : बुद्धीला चालना देत संगीतमय मनोरंजन करणारी, गाण्यांच्या भेंड्या खेळत रहाणारा, हा लोकप्रिय रिअँलिटी शो. त्याचा अँकर अन्नु कपूर.त्याने अनेक महिला सादरकर्त्या समवेत चपखलपणे आणि उत्साहाने अनेक भागात सादर केला. आठवड्याच्या एका दिवशी, जशी साप्ताहिकी पहाणे प्रेक्षक चुकवित नसत, त्याचप्रमाणे 'अंताक्षरी' देखील अगदी कान लाऊन, पहात असत. आता तोच वसा अन्नूनेरोज रात्री 'गोल्डन ईरा' हा जुन्या सुरेल मधूर हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सादर करत चालू ठेवला आहे.
जाता, जाता हे सांगायला हवे की, अंताक्षरीचा आनंद हा असा होता की प्रेक्षकांना शो मध्ये सहभाग घेता आला आणि ११ हंगामात सादर झालेल्या शो मध्ये पल्लवी जोशीही काही वेळा सहकारी सादरकर्त्यी होती.

  तारा : नारीवादाला प्रथमच छोट्या पडद्यावर आणणारी ही मालिका,
चार मैत्रिणींची मैत्री, महत्वाकांक्षा, प्रेम आणि रहस्य गुंफणारी जेव्हा झीवर प्रसारित झाली, तेव्हा तिने प्रेक्षकांच्या मनावर चांगला ठसा उमटविला होता. शहरी स्त्रियांच्या भावजीवनाचे चित्र वास्तविकपणे मांडत, प्रेक्षकांना नारीवादांची पहिली झलक पहायला मिळाली. पुष्कळ काळ चाललेली ही मालिका म्हणजे छोट्या पडद्यावरील मेगा सिरीयल.

. फिलिप्स टॉप टेनएक संगीत काउंटडाऊन शो:
गाजत असलेली गीते आणि जोडीला, हसवणारा सादरकर्ता असणारा, हा शो कोणे एके काळी रेडिओ सिलोन वरील अत्यंत लोकप्रिय अशा 'बिनाका गीतमाला' कार्यक्रमाची आठवण करून देणारा होता. हा पाच वर्षे चालला.
Wadda Kaun?
तुशिया. "ही ओळ आणि एका विशिष्ट पिढीच्या टीव्ही दर्शकांना ती, सांगा की हसणे सुरू होईल. झी वर प्रदर्शित केलेल्या फिलिप्स टॉप टेनची ही आठवण आहे.

. ऑफिस ऑफिस : सामान्य सरळमार्गी माणसाच्या विविधकारनाम्यांद्वारे, हसवणारी ही मालिका. हजारो टीव्ही दर्शकांसोबत सहजतेने जवळीक साधणारी. हा शो म्हणजे  आमच्या नोकरशाहीवर अचूक शरसंधान साधणारी एक मर्मभेदी टिप्पणी होता. शासनयंत्रणेतील लाल फित, भ्रष्ट अधिकारी आणि आपली कामं व्हावी म्हणून मध्यस्थांकडे वळणार्या व्यक्ती, अशा माहोलामधला, तो एक खळबळ उडवणारा सिलसिला झाला.

. शांती : लव, सेक्स, धोका आणि ड्रामा
मारुतीच्या शेपटासारखी लांबत, लांबत गेलीली हीसुद्धा एक मेगा मालिका, भारतीय टीव्हीवरील हा पहिला डेली सोप, डीडी नॅशनलवर प्रसारित झाला आणि नंतर स्टार प्लसवर पुन्हा प्रदर्शित केला गेला. दोन मित्रांची नाट्यमय कथा आणि त्यांच्या अत्यंत जबरदस्त भूतकाळातील घटना, आपल्या समोर गडद, थोडा भयानक, शांती प्रेम आणि विश्वासघात यांचे स्फोटक मिश्रण उभे करणारी ही एक लोकप्रिय मेगा मालिका होती.

. स्वाभिमान: ' अदर साइड ऑफ अदर वुमन' 
दररोज दुपारी सादर होणारी 'स्वाभिमान' पहाणे, हा त्या काळात, हजारो महिलांचा छान विरंगुळा होता.
ह्या मधील नायिका, 'स्वेतलाना' आपल्या जबर आत्मविश्वासाने, आत्यंतिक हल्ल्यांच्या विरोधात स्वाभिमान राखण्यासाठी कसे तोंड देते ते मांडणारी ही मालिका डीडीवर खूपच यशस्वी झाली आणि आज आघाडीवर असलेल्या, अनेक कलाकारांच्या करिअरची सुरुवात तीने केली.

. फिल्मी चक्कर : निवडक चित्रपट गीते योग्य प्रकारच्या गतीमान घटनांमध्ये कल्पकतेने, बांधत खुसखुशीतपणे सादर करणार्या ह्या शोचाही चांगला बोलबाला झाला. विनोदी पद्धतीच्या सादरीकरणात, अचूक टाईमिंग लागते आणि ते ह्या शोमध्ये परिश्रमपूर्वक घेतले गेले.

. माउथफुल ऑफ ऑफ स्काय: ही भारताची पहिली इंग्रजी भाषेतील दूरचित्रवाणी मालिका होतीपुनर्मिलन पासून सुरुवात आणि त्वरीत एक गूढ थ्रिलर आणि 'बोल्ड' द्रुष्यांमुळे, डीडी मेट्रोला उशिरा रात्री ११ वा. स्लॉटमध्ये प्रदर्शित करण्यात आली.

११. सांस : रियालिटीचा श्वास भासणारी मालिका. स्टार प्लसने सादर केलेल्या ह्या शोमध्ये, वैवाहिक जीवन आणि विवाहबाह्य संबंध ह्यांचा नाट्यमय आविष्कार काळाची बदलती चाहूल दर्शवली.

१2 आहट : थरकाप उडवणारी भयकथांची मालिका. सोनी वाहिनीवरील हंगाम चाललेला शो. त्या काळात, केबल आणि सॅटेलाइट टीव्हीचा सर्वात जास्त पाहिलेला शो. भीतीदायक मेक-अप, संशय, सखोल प्लॉट्स आणि विशेष प्रभावांवर भिती लावण्यावर येथे भर दिला गेला.

१3. साराभाई विरुद्ध साराभाई : १२/१३ वर्षे होऊनही, अजून चालत असलेली ही धमाल नर्मविनोदी नमुनेदार व्यक्तिमत्वे प्रभावीपणे एकत्र आणत, प्रेक्षकांची निखळ करमणूक करणारी मालिका होय. ती म्हणजे ' क्लास वॉर विथ रीअल क्लास'!

१4. हसरतें :
१९९० च्या दशकात, लहान पडद्यावर विवाहबाह्य नातेसंबंधाचे वर्णन करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीची गरज होती. पण दिग्दर्शक अजय सिन्हा यांनी हा धोका पत्करण्याचा निर्णय घेतला. सिन्हा यांनी परिपक्वपणे ही मालिका सादर केली. प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या मराठी कादंबरीवर आधारित, झीच्या सीरिअलने नायिका सावीच्या खळबळजनक आयुष्याचा पट प्रभावीपणे सादर केला होता, जी आपल्या पतीला सोडून आणि आपल्या विवाहित बॉसशी नातेसंबंध जोडते. कलाकारांच्या सशक्त कामगिरीमुळे हा शो स्त्री-पुरुष संबंधांतील ताणतणाव मांडण्यात  यशस्वी झाला. ही मालिका त्याद्रुष्टीने एक मैलाचा दगड ठरली.

१5. अस्तित्व-एक प्रेम कहानी : टीव्हीवर एक नवीन ओळख मिळवणारी ही मालिका आगळ्यावेगळ्या वयस्कर स्त्री, आणि धाकटा पुरूष ह्यांची प्रेमकथा उलगडते. ती दहा वर्षांनी लहान असलेल्या पुरुषाबरोबर पळाते आणि लग्न करते. या शोने हसरते नंतर, दिग्दर्शक अजय सिन्हा परत परिचित क्षेत्रामध्ये आले आणि त्यांनी एका प्रेम कहाणीच्या माध्यमातून नातेसंबंधांत स्त्रियांविषयीचे दृष्टिकोन बदलण्याचा येथे प्रयत्न केला.

१6. जस्सी जैसी कोई नहीं : 

जस्सी वालिया, तिच्या नेर्डी ग्लासेस, ब्रेसेस, फिकट केस आणि तिच्यातील आत्मविश्वास, तिचे सुंदर बॉस आणि आम्हाला एका सामान्य मुलीची कथा,क्षजबरदस्त बनवण्याच्या स्वप्नांसह, जस्सी जैसी कोई नही, त्या वेळी सास-बहू छापाच्या मालिकांपेक्षा वेगळे वळण देणारी निघाली. ह्या शोच्या स्क्रिप्टने प्रेक्षकांना आपलेसे केले. सोनी वाहिनीवरील ह्या मालिकेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त, इंडियन पोस्टल डिपार्टमेंटने, चांगली दखल घेतली. 

१7. सा रे : जेव्हा केवळ संगीत तना मनांशी जुळले!
१९९५ च्या उन्हाळ्यात गायक सोनू निगम यांनी सा रे ची पहिली आवृत्ती सादर केली. काही महिन्यांच्या आत, त्याची हुषारी आणि सर्वमान्य असे हिंदी भाषेवरील प्रभुत्व ह्यामुळे, सोनू निगम एक लोकप्रिय संगीतक्षेत्रातील प्रतिभावान शो अँकर बनला. सुरेल कंठी अनेक तरूण गायक गायिकांना उत्तम संधी देणारा हा एक स्तुत्य प्रयत्न ठरला. पुढे मराठीतही असाच स्पर्धात्मक कार्यक्रम निर्माण झाला. 
तसेच गीतकार संगीतकार गायक, गायिका ह्यांच्या कारकीर्दीची यथातथ्य ओळख करून देणारा विलक्षण लोकप्रिय असा नक्षत्रांचे देणे हा नादमधूर कार्यक्रम मराठी संस्कृतीचा ठेवा ठरला.

१8. कोरा कागज: एक पाऊल पुढे
स्टार प्लससाठी आशा पारेख यांनी कल्पकतेने सादर केलेल्या, कोरा कागजने एका ठळक विषयावर लक्ष केंद्रित केले: एक रूढीवादी कुटुंबातील एक स्त्री, तिच्या पतीकडे परत जाण्याचा निर्णय घेते, ज्याने तिला आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच सोडले होते. स्वत: ला दुःख भोगण्याऐवजी आपल्या मर्जीनुसार बिनधास्त आयुष्य जगण्याचा तिचा मार्ग म्हणजे एक पुढचे पाऊल होते.

१9. कौन बनेगा करोडपती : ह्या सर्वोत्तम कार्यक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. शोच्या अँकरची जबाबदारी शहेनशहा सुपरस्टार अमिताभ बच्चन ह्यांच्यासारख्या दिग्गजांने स्विकारल्याने रामायण महाभारत महामालिकांनंतर देशभर इतका लोकप्रिय मिळवणारा आजपर्यंत तरी एकमेव कार्यक्रम असावा. अमिताभ बच्चन ह्यांच्या 
"
कम्प्यूटरजी, लॉक कीया जाय" ने समस्त भारतीयांना मंत्रमुग्ध केले. बोर्न व्हिटा क्विझ काँटेस्ट च्या धर्तीवरील ह्या अविस्मरणीय शोने सर्वांचे सामान्य ग्यान आणि जाणीवा विशाल केल्याहू वाँटस् टू बी मिलियनेयरचे हे देसी वर्जन-केबिसी! Hats off to one and all.
२०. मूव्हर्स अँड शेकर्स : आपल्याला स्वर्गीय आनंद देणारा हसता खेळता
व्यंगचित्रात्मक, पहिला, स्टँड-अप कॉमेडी वा सेलिब्रिटी चॅट शो, शेखर सुमन ह्यांनी खरोखर दिलखुलास पद्धतीने सादर करून विलक्षण लोकप्रिय केला. ताज्या घडामोडी वा चर्चेतील विषयांवर मेचकी प्रसंगी बोचरी टीका, टिप्पणी निरीक्षण अशी ह्या शोची खास वैशिष्ट्ये होती.

२१. सीआयडी:
या जबरदस्त शोने भारतीय दूरदर्शन वर एक नवीन शैली उघडली: सत्यघटनेतील गुन्ह्याची पुनर्रचना आणि पोलीस तपास ह्यांची उत्कंठापूर्ण नाट्यमय कथा, तसेच गुन्ह्याची उकल -करण्यावर लक्ष केंद्रित करणे तसेच खरीखुरी वाटावी अशी द्रुष्ये ही वैशिष्ट्ये असलेला हा शो त्यातील एसीपी प्रद्युम्न बनलेल्या शिवाजी साटम ह्या ताकदीच्या कलाकारामुळे कायमचा लक्षात राहील.

क्राइम पॅट्रोल, एक शून्य शून्य, सावधान इंडीया फाईटस् बँक हे शोज् देखील त्याच मार्गावरचे. सर्वाधिक लोकप्रिय शोंपैकी गुन्हा त्याची उकल, हा रिऍलिटी टीव्हीचा चेहरा बनला आहे. 

२२. इंडियन आयडॉल (2004): आमची कथा म्हणजे एक आवाज. 
संगीत क्षेत्रातील टँलेंट शोधणारा हा सुरेल शो. पहिला भारतीय आयडॉलचा विजेता अभिजित सावंत.
जवळपास १२ वर्षांपूर्वी, इंडियन आयडॉल (ब्रिटनच्या पॉप आइडलचा फ्रॅन्चायझ) चे पहिले भाग सोनी टीव्हीवर प्रसारित केले गेले. आज, सहा सीझन नंतर, या शोने अगणित मिनी सेलिब्रिटींची निर्मिती केली आहे आणि भारतातील बहुतेकांनी प्रतिभावान किंवा योग्य आवाजासाठी मतदान केले आहे. टीव्ही परीक्षकांच्या टीकेला कसे सामोरे जावे आणि दूरदर्शनमधून बॉलीवुड प्लेबॅक सिंगर कसे बनावयाचे, त्यासाठी हा शो बेंचमार्क बनला आहे.
२3. 24 (2014): न्यू गेम-चेंजर

'24'
असे शिर्षक असलेल्या ह्या रहस्यमय मालिके मध्ये सुप्रसिध्द अभिनेता अनिल कपूरने लक्षांत राहील, अशी अदाकारी केली.
२००९ साली, लॉस एंजल्समध्ये लोकप्रिय झालेल्या, अमेरिकन नाटक टीव्ही मालिकेतील २४ चित्रपटांच्या मालिकेचे आयोजन, अभिनेता अनिल कपूर यांनी त्यावर आधारित, भारतासाठी मालिका बनविण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम म्हणजेच त्या सीरीज़ची ही देशी आवृत्ती होती, जी कलर्स वाहिनीवर प्रसारित करण्यात आली.
या कार्यक्रमाचे, चोखंदळ प्रेक्षकांनी तिच्या दर्जेदार निर्मितीमूल्यांचे आणि कलाटणी देणार्या सादरीकरणाचे कौतुक केले.

ही सर्व यादी अंतिम नसून सर्वसामान्य आवडीनुसार केलेली एक प्रातिनिधीक यादी आहे. ह्यांत आपल्याला आवडलेल्या मालिका कदाचित वगळल्या असू शकतात. 
ह्या विस्तृत निरिक्षणावरून लोकप्रिय मालिकांचे वर्गीकरण असे करता येईल:
निखळ कौटुंबिक नातेसंबंध दाखवणार्या,
स्री पुरुष संबंधामधील गुंता मांडणार्या,
अन्यायाविरुद्ध झगडणार्या स्री मुक्तीचे वेगवेगळे आयाम प्रदर्शित करणार्या
निर्भेळ विनोदी नाट्य फुलविणार्या,                                                    
गुन्हे आणि गुन्हांची उकल करणार्या,                                           
ऐतिहासिक वा पौराणिक विषयांवरील,                               
विविध संगीत वा सामान्य ग्यान विषयक स्पर्धात्मक शो ..
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बहुसंख्य चित्रपट जर नायकप्रधान असले तर मालिका मात्र प्रकर्षांने नायिका वा स्री प्रधानच दिसून येतात. कारणही उघडच आहे, टीव्ही कार्यक्रम घरांत बसून, घरांतल्या माणसांनी बघावयाचे आविष्कार असतात आणि स्री हाच कुटुंबाचा आधार पाया असतात.