रविवार, १४ डिसेंबर, २०२५
"अरे वेड्या मना, कां तळमळशी !":👍
👍"अरे वेड्या मना, कां तळमळशी !":👍
🤣 "सध्या सुरू करण्यास स्पर्धेमुळे आणि वाढत्या अपेक्षांमुळे, जीवनशैली ताणतणावाची संघर्षाची मतभेदांची झाली आहे. त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो आणि त्याला ब्लड प्रेशर डायबिटीस किंवा मानसिक नैराश्य अशा सारख्या त्रासाला अन आरोग्याच्या वेगवेगळ्या प्रकारांना तोंड द्यायची वेळ येते कारण काय तर पहिलं कारण म्हणजे आपल्याला जे अपेक्षित असतं त्याला अनुसरून आपण कृती करत असतो आणि त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत असतो परंतु हे करत असताना आपल्याला इतरांच्या बरोबरी संपर्क येतो आणि प्रत्येकच व्यक्ती वेगळी असल्यामुळे तिच्यापेक्षा तिच्या एकंदर त्यासाठी करायची कृती यांचा एकमेकांशी संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि बऱ्याच वेळेला मनाविरुद्ध असं व्यावसायिक जीवनात किंवा कौटुंबिक जीवाला करावं लागतं.
आपण येथे व्यावसायिक जीवनाचा विचार नंतर करू शकतो. कौटुंबिक जीवनात विशेषता निवृत्तीनंतर ही वेळ अनेक वेळा येत असते जवळजवळ 24 तास एकत्र असतात त्यापूर्वी जर पुरुष एकटाच जरी नोकरीला असला त्या व्यवसायात तरी दिवसांचे बरेच तास तो बाहेर असतो आणि त्या मानाने दोघांनी एकत्र असण्याचे प्रसंग तासांच्या वेळ विचार करता खूपच कमी असतात त्यामुळे त्या काळामध्ये तेवढे मतभेद जरी झाले तरी त्यांचे प्रमाण कमी असू शकते.
वयाच्या साठीनंतर जेव्हा ज्येष्ठ दांपत्य एकत्र राहायला लागतं तेव्हा सलोख्याने एकमेकांना सांभाळून वागायचं असं दोघांनाही वाटलं तर त्यांच्यामध्ये कुठल्याही तर्हेचे मतभेद होऊ शकत नाहीत. एकमेकांना एकमेकांची जी काही उणीदुणी बाजू असेल त्या बाजूला स्वीकारून त्या व्यक्तीच्या चांगल्या प्रेरणादायी गुणांचा आणि विशेष शक्ती यांचा विचार करून प्रोत्साहन देणे आणि नकोसे आपल्याला न पडणाऱ्या गोष्टींना शक्यतोवर विसरून जाणे अशा तऱ्हेची समजूतीची धारणा ज्या संपत्त्यामध्ये राहते त्यांचे त्यामानाने आयुष्य पुढे सुलभ जातं.
परंतु होतं काय की पुष्कळदा एखादं तरी व्यक्तिमत्व याबाबतीत स्त्रियांचं प्रमाण बहुदाा अधिक आहे आणि त्यामुळे त्यांचा त्रागा, त्यांची कधीही आपल्याला काही कोणी बोललं तर ते आपल्या विरुद्धच काहीतरी कारस्थान करतात असा दृष्टिकोन होऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा वेळेला सहसा एखाद्या संबंधित डॉक्टरकडे जाण्याची तयारी नसते. आता त्यामानाने ते प्रमाण कसं कमी होत चाललंय लोकांना कळून चुकलं की आपल्याला जर काही मानसिक त्रास शहर Anxiety किंवा ड्युअल पर्सनॅलिटी अशा विविध प्रकारच्या त्रासांना तोंड देण्याची वेळ येत असेल तर आपण काहीतरी मार्ग शोधून डॉक्टर कडे जाणे आवश्यक आहे असं हळूहळू समाजामध्ये झिरपत चाललंय. त्यामुळे पूर्वी कोणीच जाण्यास टाळाटाळ करत असे त्या मानाने आता तेथे उलट मानसिक समस्या हाताळणाऱ्या डॉक्टरकडे रिघ लागते.
रूग्णाला जे संतुलन रासायनिक संतुलन मेंदूमध्ये करायला हवं ते शोधण्याचा प्रयत्न ते डाॅक्टर करतात.
पण होत काय, संबंधित पेशंट त्याप्रमाणे सुचवलेली औषधे घेत नाहीत ह्या कारणामुळे त्यांच्यात तेवढी काही सुधारणा होत नाही आणि अधिकच तर विकोपाला जाऊन शेवटी
Dementia Alzomir Scezenofrenia
यासारखे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे अशी व्यक्ती कुटुंबामध्ये खरोखर ताण तणाव तर निर्माण करतेच पण शांतता समाधान यालाही त्यामुळे मूठ माती देवू शकते. नाहीतर सुबत्ता असते, तरी ही माणसं दुःखी असतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही दुखी करतात. सतत बडबडीचा चिडचिडीचा तारस्वरामध्ये जो काही त्यांचा आक्रोश निर्माण होतो, तो सबंध त्या कुटुंबाला हैराण करतो. विशेषतः जोडीदाराची खरोखर कोंडी होते आणि त्याला स्वतःला सांभाळणं कठीण होत जाते. आपली दुःख इतरांकडे व्यक्त करून कितपत योग्य ते समजत नाही आणि त्याचे परिणाम तब्येतीवर होऊ शकतात. काही उपयोग नसतो कारण ही व्यक्ती व्यक्ती स्वतः काय करेल याचा नेम नसतो. पीडित व्यक्तिञएकटी राहिली तर ती काय करेल याचा नेम नसतो. त्यामुळे जोडीदाराला त्याच्या साऱ्या दुःखाबरोबर मन मारून जगायला लागते !":🤣
शनिवार, १३ डिसेंबर, २०२५
" सोमि वरील माझ्या योगदानाची सरमिसळ भाग दोन
👍"असेही एक रंगदर्शन !"😢
😊 "कथा कुणाची, व्यथा कुणा !!"😢
किंवा
👍"केली बेफिकीरी, नुकसान लै भारी !"😢
खूप दिवसांपासून जे नाटक पहाण्याचा योग कर्मधर्मसंयोगाने येऊ शकला नव्हता, तो आज येऊ घातला खरा, पण झाले विपरीतच ! तो अनुभव येथे मांडत आहे:
"Book my show साईटवर जाहिरातीची लिंक आपण जेव्हा उघडतो, तेव्हा उघडणार्या फोटोप्रमाणे, नाटकाचे स्थळ बालगंधर्व नाट्यग्रुह व १३ एप्रिल'२२ ही तारीख फक्त दिसली. परंतु नाटकाची वेळ नाही. ती book ही लिंक उघडल्यावर न पहाता दोन तिकीटे बुक केली गेली. दुर्दैवाने नाटकाची वेळ चक्क रात्री साडेनऊ आहे हे मात्र समजल्यावर पायाखालची वाळूच घसरली.
पश्च्यातबुद्धी अशी की, नाटकाची वेळ आधीच समजणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे पुढे तिकीट आरक्षित करावयाचे की नाही ते ठरवता येऊ शकते. वरील नाटकाची वेळ रात्री साडेनऊ ही गोष्ट न ध्यानात घेता दोन तिकीटे बुक केली गेली. पुण्यातील आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे स्वतःचे वहान नाही, त्यांनी हे नाटक सुटल्यावर मध्यरात्री घरी कसे जायचे ! त्यात दुर्दैवाने book my show वर तिकीटे रद्द करावयाची सोय नाही.
तेव्हा नाट्यप्रयोगाची वेळ, स्थळ, तारीख ह्याचबरोबर त्यांनी न चुकता द्यावी, अन्यथा तिकीट रद्द करण्याची सुविधा (योग्य ती रक्कम कमी करुन) द्यावी अशी कळकळीची विनंती करणेच फक्त आमच्या हातात आहे. बावधनहून ह्या नाटकाला आम्हा दोघांना जाता येणे केवळ अशक्यच आहे. अक्कलखाती पैसे वाया गेले दुसरे काय ?
ह्यापुढे book my show च्या फंदात न पडणे उत्तम, कारण नाट्यग्रुहावर phone booking फक्त वीस रूपये एका तिकिटामागे सेवाशुल्क आकारले जाते, तर book my show साठी त्याच्या जवळजवळ दुप्पट आकारले जाते.
अखेर "कथा कुणाची, व्यथा कुणा" असा अनुभव म्हणायचा दुसरे काय !
############
# 😢"घडलेलं बिघडतंय !":😢
"घोटाळ्यांमागून घोटाळे, हा अडचणीत, त्याच्या अडचणीत वाढ, हा जेलमध्ये तर अमके तमके लौकरच जाणार जेलमध्ये इ.इ. शिवाय सध्या कोणत्याही बातम्या सहसा प्रसार माध्यमातून प्रसारित होत नाहीत.
नितीमत्ता खुंटीला बांधून ठेवली आहे बिचारी. अजून किती खोलवर रसातळ गांठणार कोण जाणे. सरळमार्गी सज्जन माणसांनी अशा वेळी करायचे ते काय? म्हणूनच इतर कोणत्याही क्षेत्रात प्रवेशासाठी जशा CET अनिवार्य असतात, त्याचप्रमाणे राजकारणात येण्यासाठी, लोकसेवक पात्रता स्पर्धात्मक परिक्षा अनिवार्य कां करू नये ?"
######==
" सोमि वरील माझ्या योगदानाची सर मिसळ
👍 चारदोत्सव--अनुभवाचे बोध !":💐
'Beauty, lies in the eyes of the beholder':
एका नांवाजलेल्या लेखकाचे, तितकेच प्रसिद्ध पुस्तक, मोठ्या हौसेने मी घेतले आणि वाचायला लागलो, तेव्हाच माझ्या ध्यानात आले की, त्यांतील मजकूर खूपच लहान फाँट वापरून छापला आहे. हळुहळू ते पुस्तक चाळताना, मला उमगलं, की त्यामधील विषय आणि मुद्देही आता कालबाह्य झाले आहेत. शेवटी तर, समजून चुकले की, जुन्या काळी गाजलेले, केवळ त्याच्या नांवावरून हातात घेतलेले, हे पुस्तक मी नेट लावून जिद्दीने जर वाचले, तर माझे डोळे निश्चितच बिघडतील. म्हणून, नाईलाजाने मी पुस्तक वाचणे बंद केले आणि शांतपणे डोळे मिटून पडलो.
माझी निवड चुकली, ह्याचा विषाद आणि मनस्ताप व्हायला लागला. पण, अचानक मनात वीज चमकली आणि मला साक्षात्कार झाला की, आपली ही चूक क्लेशकारक तर खरीच, पण आपल्याला ती, अशी चटकन् ध्यानात येणे, हे तर किती तरी फायद्याचेच नव्हे कां?
तथ्यांश हा की, 'नांव' होणे' हे शेवटी कालसापेक्ष असते; कोणतीही निवड वा निर्णय साधक बाधक विचार करूनच घ्यावा; आणि सर्वांत महत्वाचे हे की, काहीही घडले, तरीसुध्दा अंतिमत: ते आपल्या हिताचेच असते, फक्त त्यासाठी आपली द्रुष्टि यथार्थपणे बदलायला हवी!
सुधाकर नातू
//////
प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे !":👌
Looking Back and Forward":
With just around few hours to pass behind, the New Year 2023, is eager to usher in. From 'Known' to 'Unknown' this Journey of Life would go on..and on, what remains is your treasure of experience.
After the never ever horrible & the most challenging experience of combatting the threats of Covid19 pandemic in the year 2020 & 2021, the year 2022 has brought in flow of Hope, teaching us the art of Living. However dark shadows of likely repeatition of sorrows and setbacks of a possible Corona wave looming large on the horizon, with a mixed feelings, I am wishing one & all a Happy New year 2023.
I wish to be different & share the thoughts in my mindset as follows:
"The Learning lessons are":
# Never ever lose hope, Stay Firm ferociously, watch and experience the Bad & Good times with more equal zeal and a balanced mind.
# Do have a definite Goal/s all the time & attempt with your total commitment to achieve, come what may. This is because this process is the best triggering tool for Self Motivation & Satisfaction, possibly adding additional time to your Life.
# But Do learn to adapt and gracefully accept the 'outcomes' as and when they come.
# Moderation is the 'Key' in every such step, for a healthy, smooth passage of this 'really a once in a Life time journey.
# Remember your Life is only, repeat only yours and no one else's and that 'Time' is irreversible and the most precious gift to you. Hence, learn to Use it in such a way, that your life becomes meaningful and Best lived for'.
Finally,
and frankly all the above is to remember that some-one, some-where cares for you, is with you to understand & support you. Therefore
Let’s join minds to welcome the New Year with all our strength & determination ! 👌👌💐💐🎂🎂
""सध्याच्या स्पर्धात्मक जीवनामध्ये सातत्याने प्रयत्न करत राहणे, नवनवीन काही ना काही शिकत राहणे, आणि जे जे चांगले आहे, उपयुक्त आहे ते वेचत राहणे हा मंत्र देणारा, हा व्हिडिओ तुम्हाला देखील प्रगतीचा नवा मार्ग दाखवेल....!":👌
हा विलक्षण प्रेरणादायी व्हिडिओ पहाण्यासाठी......
ही लिंक उघडा.......
https://youtu.be/gbli_FpSAHM
विडीओ आवडला......
तर वरील लिंक शेअरही करा......
" नियतीचा संकेत- शनीची साडेसाती
👍"नियतीचा संकेत-१० !":👌
☺️"शनिमहात्म्य”:😊👌
😢"शनीची साडेसाती !":😢
✴ साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हा भ्रमण करताना तुमच्या कुंडलीतील जन्मस्थ चंद्राच्या मागे ४५ अंशावर येतो, म्हणजेच तुमच्या राशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा साडेसाती सुरू होते व ४५ अंश जन्मस्थ चंद्रा पुढे शनि जाईपर्यंत, म्हणजेच तुमच्या राशीच्या पुढील राशीनंतर येणार्या राशींत जातो,तोपर्यंत साडेसाती असते.....
उदा: सध्या मकर राशींत शनी आहे, म्हणून आता धनु व मकर कुंभ राशींना साडेसाती आहे. शनी कुंभेत जेव्हा प्रवेश करेल-१७/१/'२३, तेव्हा धनु राशीची साडेसाती संपेल.
✴मेष▪दिनांक २९ मार्च २०२५ रोजी सुरु होईल व दिनांक ३१ मे २०३२ रोजी संपेल.
✴वृषभ▪ ३ जुन २०२७ रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३४ रोजी संपेल.
✴मिथुन▪८ अॉगष्ट २०२९ रोजी सुरु होईल व दिनांक २७ अॉगष्ट २०३६ पावेतो.
✴कर्क▪ ३१ मे २०३२ रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३९ पावेतो.
✴सिंह▪ १३ जुलै २०३४ रोजी सुरु होईल व दिनांक २६ सप्टेबर २०४१ पावेतो.
✴कन्या▪२७ अॉगष्ट २०३६ रोजी सुरु होईल व दिनांक ३० अॉगष्ट २०४४ पावेतो.
✴तुला▪ १० सप्टेंबर २००९ रोजी सुरु झालेली असुन दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ रोजी संपेली.
✴वृश्चीक▪५ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु झालेली असुन दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी संपेली.
✴धनु▪ २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु झालेली असुन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.
✴मकर▪२६ जानेवारी २०१७ रोजी सुरु झालेली असुन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.
✴कुंभ▪२४ जानेवारी २०२० रोजी सुरु व दिनांक २३ फेब्रुवारी २०२८ पावेतो.
✴मीन▪२९ एप्रिल २०२२ रोजी सुरु व दिनांक १७ एप्रिल २०३० पावेतो.
(👍चुक भूल, द्यावी घ्यावी.)
माझा अनुभव असा आहे की, कोणाच्याही आयुष्यात तीनदाच साडेसाती येते व माणूस ८५ वर जगला तर चौथी साडेसाती येऊ शकते जर त्याला जन्मतःच साडेसाती असेल तर.
🛑 तुमची तुमच्या साडेसातीच्या वेळी जी महादशा चालू असते त्याला फार महत्व आहे व दुसरे म्हणजे तुमच्या कुंडलीत जन्मस्थ चन्द्र जर बिघडलेला असेल व चन्द्राचा जवळपास रवी असेल तर शनि त्या दोन्ही ग्रहाना त्रास देतो . चंद्र म्हणजे मन आणि रवि म्हणजे आत्मा. हया दोन ग्रहाना छळणे म्हणजे साडेसाती.
शनीची छोटी साडेसाती:
ही झाली मुख्य शनीची साडेसाती. ह्या शिवाय शनी जेव्हा आपल्या चंद्रराशीपासून चौथ्या किंवा आठव्या स्थानी असतो, तेव्हा शनीची छोटी साडेसातीचा काळ असतो. चौथ्या स्थानी शनी असेल तर मानसिक सौख्य बिघडू शकते अथवा स्थावरविषयक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तर आठवा शनी नुकसान, अपयश, अपघात, आरोग्याचे गंभीर प्रसंग निर्माण होऊ शकतात.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
वयोमानामुळे वैयक्तिक पत्रिका बघून सल्ला देणे मी आता बंद केले आहे. त्यामुळे त्याकरिता संपर्क साधू नये ही विनंती.
""आजचा मुक्तसंवाद-आजचा प्रश्न असा आहे की वर्तमानपत्र हवीतच कशाला? :
👍""आजचा मुक्तसंवाद!":👌
💐"आजचा प्रश्न असा आहे की वर्तमानपत्र हवीतच कशाला? कां, ते सांगतो:
दररोजची सकाळ वर्तमानपत्र वाचनाने होते. पण चंगळवादाचा अतिरेक होत असताना, आजची वर्तमानपत्रे ही
समाजाभिमुख न होता व्यवसायाभिमुख
प्रचारपत्रे होत चाललेली दिसतात.
वर्तमानपत्राच्या पृष्ठांची वाढ अतोनात झाली खरी. परंतु त्यामध्ये जाहिरातबाजी जवळजवळ 50 ते 60 टक्के इतकी, 20 ते 25 टक्के नकारात्मक 'कुठेतरी काहीतरी चुकलंय', अशा सध्याच्या भ्रष्टाचारी माहोलाची सतत आठवण करून देणाऱ्या वृत्तांनी व्यापलेली, साहजिकच चिमूटभर सकारात्मक, मार्गदर्शक प्रेरणादायी मजकूर असल्याने आजचा प्रश्न असा आहे की,
👍"वर्तमानपत्र हवीतच कशाला ?":👍
🤣 "कालाय तस्मै नम"!: 🤣
😇 "दुसरे काय !":😇
👍 " दररोजच्या पैकी जवळ जवळ अधिक वेळ केवळ वर्तमानपत्र वाचून त्यावरील बऱ्या वाईट वाईट जास्त वृत्तांबद्दल योग्य ती प्रतिक्रिया शब्दरूपात करत ती समाज माध्यमांवर निवडक संदेशांद्वारे पाठवण्यात जात असे. साहजिकच नकारात्मक अशा विचारांची भाऊ गर्दी मनात साठवली जात असे. आज जाऊन साक्षात्कार झाला आणि लक्षात आले की मी माझी मर्यादित उपलब्ध विचार क्षमतेची व कल्पनाशक्तीची ऊर्जा नाहक वाया घालवत आहे.
शिवाय ध्यानात आले ते असे:
स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतरही बहुदा अर्थव्यवस्था खुली होईपर्यंतच्या काळात वर्तमानपत्रे ही निश्चितच समाजाभिमुख असत त्यातून स्वातंत्र्यपूर्व काळात तर पूर्णपणे समाजहित राजकीय जागृती स्वातंत्र्यासाठी आणि त्या दृष्टीने , अनेक समाज दुर्णांनी व थोर व्यक्तीने स्वतः पुढाकार घेऊन वर्तमानपत्रे काढली हा इतिहास विचारता येणार नाही.
ह्यामुळे सध्याच्या स्थितीतील वर्तमानपत्रे हवीतच कशाला हा प्रश्न आणि त्यावरील माझा आजचा मुक्तसंवाद म्हणूनच निर्माण झाला.
आपणही ही पार्श्वभूमी जरूर ज्ञानात घ्यावी.
ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व त्यांच्या मनातील स्पंदने, विचार शब्दरूपात येथे व्यक्त करावीत अशी विनंती !":👍
👍"आजच्या विचारा-वर्तमानपत्र हवीत कशाल? :
दाद प्रतिवाद !":👍
🙏. 🙏 " ह्या उपक्रमाची निवडक व्यक्तिंनी घेतली दखल, यासाठी आभार. आपले प्रतिसाद हे बिंब व प्रतिबिंब न्यायाप्रमाणे दुसर्या बाजू दर्शवितात. आजचा विचार या संकल्पनेचा मूलभूत हेतू तोच आहे. समाज माध्यमांवर नुसती नजर न फिरविता त्याची जेथे आवश्यक आहे तेथे दखल घेऊन प्रतिसाद देत राहणे याच्यातूनच विचारमंथन होऊन, महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फूटू शकते.
नकारात्मक बातम्या आणि जाहिरातींचे पिक यामुळे वर्तमानपत्र नकुशी वाटणे हे जरी साहजिक असले तरी त्याला जबाबदार फक्त वर्तमानपत्रांना धरता येणार नाही कारण तेही समस्त लोक समूहाचे व्यावहारिक जगत असे भाग आहेत.
ब्रेन ड्रेन विषयी पुष्कळ काही बोलले गेले आहे प्रथम मध्यपूर्वेला आणि नंतर प्रगत अशा पाश्चिमात्य वापरात्य देशांमध्ये बरीच तरुण मंडळी आपले भवितव्य उज्वल करण्यासारखी साठी जात राहिली हे वास्तव आहे त्यांतील प्रगत देशात सर्वसाधारणपणे बुद्धिमान आणि कर्तबगार उच्च शिक्षित व्यक्ती तिकडे जाऊन भारतात स्वप्नातही विचार करता येणार नाही अशा तऱ्हेची श्रीमंती उत्तरोत्तर मिळवत राहिले. त्यांच्या भारतभेटी मुळे तिकडच्या सुबत्त्याची आणि सुख साधनांची सहज ओळख इथल्या समस्त समाजाला होत राहिली त्यात मुक्त अर्थव्यवस्था 1991 मध्ये सुरुवात झाली आयटी बूम देखील आत्याच्या आसपासच येत राहिले त्यामुळे चंगळवादाची लॉट साऱ्या समाजाला व्यापून राहिली आणि पैसा हेच सर्वात पैसा हेच प्रतिष्ठेचे आणि सुख साधनांचे मूळ अशी धारणा होत गेल्यामुळे जनसामान्यांच्या आकांक्षा वाढत गेल्या आणि प्रत्येकाला कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त कमाई याचे वेड लागले भ्रष्टाचार जो फोफावला तो आधीपासून थोडाफार होता पण नीतिमत्तेची जाड होती. साहजिकच गेल्या दोन-तीन दशकात सारा माहोल हा बिघडून गेला जाहिरात बाजीला ऊत आला. वर्तमानपत्र चालवणे हे समाजप्रबोधनापेक्षा अधिकाधिक नफा मिळविण्याचे साधन झाले. त्याचीच परिणती सध्याच्या भ्रष्टाचारी गोंधळात घोटाळ्या मागून घोटाळे व नकारात्मक अशा बातम्यांचे प्रेम त्यामुळे येत राहिले आहे.
त्यातले त्यात केवळ एकच दिलासा आता वर्तमानपत्रांच्या बाबतीत राहिला आहे तो म्हणजे संपादकीय पान. कारण पुरवणीमध्ये कितीही मनोरंजक समाज प्रबोधन करणारी जागा जरी वापरात येत असली तरी तिथेही जाहिरात बाजी ने बऱ्यापैकी शिरगाव केलेला आहे.
संपादकीय पृष्ठावर नशिबाने जाहिरातीचा ओरखडा ही नसल्यामुळे केवळ तेच एक पान वाचावे असे सजक सुबह सुबुद्ध आणि सज्जन माणसांना वाटले तर चूक काय?
म्हणून जाता जाता एक सूचना करावी अशी वाटते ती म्हणजे अशा माणसांना केवळ तेवढे एकच पान थोड्याफार कमी किमतीत देता आले तर वृत्तपत्र मालकांनी व संपादकांनी त्यावर सकारात्मक विचार करावा.
या साऱ्या विवेचनावर आपल्याही यथायोग्य दाद व प्रतिवादाची अपेक्षा करतो !":🙏. 🙏
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५
" बदलत्या काळातील भावनांची घुसमट !":
"बदलबदलत्या काळातील भावनांची घुसमत !":
सोशल मीडियावर सरफिंग करताना गवसलेली अनामिक लेखक व लेखिकेची एक रुदयस्पर्शी कथा
सोबत
सकाळी सकाळी कविताला आईचा फोन आला म्हणून ती गडबडली पण आई ठीक होती.
“कवी, मला बरचं सामान आणायचं आहे गं वाण्याकडून. संध्याकाळी जाऊया?” आईला नेहमी काही ना काहीतरी हवं असायचं.
“अगं आई दोन दिवसांपूर्वी तर सगळं सामान आणलय ना! आता काय हवयं अजून?” कणिक भिजवत फोन कानाला धरून कविता नवऱ्याला चहा तयार आहे असे डोळ्याने दाखवत होती..
“अग,परवा बदाम, पिस्ते व कोको वगैरे बरंच काही घ्यायचं राहिलं..उद्या कोकोच्या वड्या कराव्यात म्हणते..शिवाय काही डाळी पण विसरल्या घ्यायच्या” आईला अजिबात घाई नव्हती.
“आई मला लिस्ट दे. मी करते ॲार्डर ॲानलाईन.” कविता नवऱ्याचा चहा व मुलांचं दूध ओतत होती. कोकोच्या वड्या ही कुणालाही करतेय कोण जाणे..स्वत:ला तर डायबेटिस आहे..
आईकडून काही उत्तर आलं नाही..
“आईं.. कविताने फोन चालू आहे का नाही बघितलं. तेवढ्यात आईचा आवाज आला, “ॲानलाईन नको बाई! मला डोळ्यांनी बघून सगळं घ्यायला आवडतं.
कविता बरं म्हणाली. आई मुद्दाम काही गोष्टी यादीमधे लिहित नाही याची तिला खात्री होती. कविताला मुलांचे अभ्यास, ॲाफिसचं काम, स्वयंपाक पाणी यात रात्रीचे सात वाजत असतं आणि जवळच राहणाऱ्या आईला कायम खरेदीला जावसं वाटत असे. कविता संध्याकाळी येते म्हणाली पण ॲाफिसमधे काम संपायलाच सात वाजले.
“आई, उद्या येते ग. अजून ॲाफिसातच आहे”. तिनं फोन बंद करून काम संपवायला सुरूवात केली.
दुसरे दिवशी मात्र ती संध्याकाळी पाच वाजता आईकडे जाऊन पोचली. एका गावात रहात असल्या तरी रहदारीमुळे आईकडे पोचायला चांगला अर्धा तास लागायचा..
आई फोनवर कुणाशी तरी बोलत होती.. टेबलावर कोको, बदाम, पिस्ते, डाळी सगळं आणलेलं दिसत होतं. कविताचा राग अनावर झाला..कळवायचं तरी की मी आणलयं सगळं म्हणून! हेलपाटा पडला ना मला!
“हे बघा, पुष्पाताई, मुली कामात असतात. नुसतं या म्हटलं तर तुम्हाला त्या दोन दोन आठवडे दिसणार नाहीत.. काही निमित्त सांगा म्हणजे येतील पण आजारांचं निमित्त नका सांगू बरका.. मी बरेचदा काही गोष्टी “विसरते” खरेदी करायला! नंतर कवितास विचारते मला घेऊन जाशील का म्हणून! ओरडली तरी भेटते हो! आणि त्यातून मुलगी आली नाही तर वाईट वाटून घेऊ नका बरं.. अहो त्यांना त्यांचा संसार आहे.. “ कविता चमकली.
आईला केवळ आपण सोबत हव्या आहोत..खरच बिचारी आप्पा गेल्यापासून ती एकटी पडली आहे..पण माझ्याकडे ये म्हटलं तर मात्र येत नाही. मी माझ्या घरीच बरी म्हणते..पण एकटेपणानं घर खायला उठत असेल! तिच्या सामानाच्या यादीतील सर्वात महत्वाची गोष्ट आहे “लेकीची कंपनी”! जी गोष्ट कधीच पूर्ण होणारी नाही..एकेकाळी नातेवाईकांच्या गोतावळ्यात राहिलेली बाई ही.. आता माणूस दृष्टीस पडत नाही तिच्या आणि वयानं कुठे एकटं जावसं वाटत नाही.
आईनं चपापून मागे बघितलं. आपलं बोलणं कविताने ऐकलं नसलं म्हणजे झालं म्हणून ती कविताचा अंदाज घेत होती.
“कवी, काल तुला वेळ झाला नाही म्हणून मी समोरच्या नंदूला ॲानलाईन ॲार्डर कर म्हणून हे सगळं मागवलं पण तुलाच कळवायला विसरले.. काय म्हणावं बाई मला तरी!”आई सारवासारव करत होती.
“बरं झाले कळवलं नाहीस ते! आपण भेटलो ना त्यामुळे!
चल मस्त चहा करते.. अगबाई बटाटेवडा केलेस? अगं नको करत जाऊ तळणी एकटी असताना!” कविताने एक बटाटा वडा तोंडात टाकला..
“अहाहा.. काय केलायस ग बटाटा वडा! तुला आठवतंय मी सातवीत असताना बटाटा वडा कर म्हणून तुझ्यामागे लागले होते आणि तुला शाळेतील परीक्षांचे पेपर तपासायचे होते.. मी रडारड केली म्हणून तू बटाटे घेऊन आलीस व वडे केलेस आणि रात्री एक पर्यंत पेपर तपासत बसली होतीस..
“हो ग.. किती छान होते ते दिवस! आप्पांचा आवडता पदार्थ! म्हणायचे - बाईसाहेब तुमच्या हाताची चव इतरत्र कुठेही नाही.. आईचे डोळे भरून आले..
चहा घेत आईनं अनेकदा सांगितलेल्या चार गोष्टी परत तेवढ्याच नवलाईनं सांगितल्या पण यावेळी “माहित्येय ग” हे वाक्य कविता बोलली नाही. तिनं शांतपणे आईचं बोलणं ऐकून घेतलं. आप्पांच्या आठवणीत दोघी रडल्या.. देवमाणूस ग आप्पा.. आई पदरानं डोळे पुसता पुसता आप्पांनी केलेले विनोद सांगून हसत होती.
“पुष्पाताई फार एकट्या पडल्या आहेत. त्यांची लेक दोन दोन महिने गावांत असून त्यांना भेटत नाही कारण तिची नोकरीच तशी आहे.. विशाखाताईंची लेक सिंगापूर मध्ये असते आणि अलाकाताईंची मुलगी अमेरिकेत.. त्या मानाने मी किती नशीबवान आहे बघ.. जेवतेस का? पिठलं भात खाऊ..” आईनं कविता नाही म्हणणार याची तयारी ठेऊन विचारलं.
एक मिनिट थांब.. तिनं घरी फोन करून मुलांना व नवऱ्याला मी आज आईकडेच झोपेन सांगितलं. ॲाफिसमधे दुसऱ्या दिवसाची रजा टाकली व पिठलं भात खात ती आईशी सुखदु:ख बोलत राहिली..गप्पा मारताना रात्री कधी झोप लागली कळलं नाही.
दुसरे दिवशी दोघी पुष्पाताईंकडे गेल्या..
“पुष्पामावशी मस्त शिरा कर ग.. केव्हापासून तुझ्या हातचा शिरा खावासा वाटतो आहे..”
पुष्पाताई उत्साहाने उठून स्वयंपाक घरात जाताना त्यांचे गुडघे दुखले नाहीत! बदाम, वेलदोडे, केशर घातलेला शिरा खात पुष्पामावशीच्या कुशीत शिरून थॅंक्सु ग मावशी म्हणताना शिऱ्यात साखर कमी पडलेली असून शिरा तिला गोड लागत होता..
गप्पागोष्टी करताना तिनं निश्चय केला की ज्यांच्या मुली लांब आहेत अशा आईच्या मैत्रिणींना असचं जाऊन भेटायचं.. त्यांचे सुरकुतलेले हात हातात घेऊन त्यांचं सुखदुःख ऐकून घ्यायचं.. त्यांचे डोळे पुसायचे.. तुमची मुलं असेनात का लांब.. मी आहे ना म्हणायचं..
त्यांचा एक कंटाळवाणा दिवस सोनेरी करायचा..
एक दिवस ती खुर्ची मोकळी असणार आहे..
एक दिवस ते डोळे कुणाचीच वाट बघणार नाहीत..
जे करायचं ते आज आत्ता करायला हवं!
तिनं निर्धार केला
बुधवार, १० डिसेंबर, २०२५
Inside story of Indigo's Shameful Fiasco
https://www.moneylife.in/article/indigo-nation-pays-a-steep-price-for-what-cofounder-rakesh-gangwal-called-pan-ki-dukaan-governance/79062.html
But, in July 2019, Mr Gangwal did something unusual. He sent a detailed letter to market regulator Securities and Exchange Board of India (SEBI), publicly raising what he saw as serious governance lapses at the airline he had built. This was not a private complaint aired in boardroom disputes. This was a co-founder going public with concerns about the institutional integrity of one of India's most successful companies.
@@@@@@@@@@
A forwrded msg noticed on surfing social media. An eye opener indeed on Indigo fiasco...:
"Rahul Bhatia, Chief Executive of IndiGo Airlines, the so called cheap airline in India, after arriving at a hotel in Mumbai, went to the bar and asked for a pint of Guinness.
The barman nodded and said, "That will be ₹50 please, Mr. Bhatia."
Somewhat taken aback, Rahul replied, "That's very cheap," and handed over his money.
"Well, we do try to stay ahead of the competition", said the barman. "And we are serving free pints every Wednesday from 6pm until 8pm. We have the cheapest beer in Mumbai."
"That is remarkable value!" Rahul comments.
"I see you don't seem to have a glass, so you'll probably need one of ours. That will be ₹150 please."
Rahul scowled but paid up.
He took his drink and walked towards a seat. "Ah, you want to sit down?" said the barman. "That'll be an extra ₹150. You could have pre-booked the seat and it would have only cost you ₹100."
"I think you may be too big for the seat sir, can I ask you to sit in this frame please."
Rahul attempts to sit down, but the frame is too small and when he can't squeeze in he complains, "Nobody would fit in that little frame".
"I'm afraid if you can't fit in the frame, you'll have to pay an extra surcharge of ₹250 for your seat, Sir."
Rahul swore to himself, but paid up.
"I see that you have brought your laptop with you," added the barman. "And since that wasn't pre-booked either, that will be another ₹300."
Rahul was so incensed that he walked back to the bar, slammed his drink on the counter and yelled, "This is ridiculous, I want to speak to the manager!"
"I see you want to use the counter.." says the Barman, "that will be ₹200 please."
Rahul's face was red with rage. "Do you know who I am?"
"Of course I do, Mr. Bhatia!"
"I've had enough! What sort of hotel is this? I come in for a quiet drink and you treat me like this? I insist on speaking to a Manager!"
"Here is his E-mail address, or if you wish, you can contact him between 9.00am and 9.01am every morning, Monday to Tuesday at this toll free phone number. Calls are free, until they are answered, then there is a talking charge of only ₹10 per second, or part thereof."
"I will never use this bar again!!" hollers Mr. Bhatia.
"OK Sir, but remember, we are the only star hotel in Mumbai selling pints for ₹50."
And that my friends, is how IndiGo works in India!! 😂😂😂
मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५
" बिंब प्रतिबिंब- इंडिगो प्रकरण प्रवासी बेहाल सुशासनाचे थींंडवडे
"बिंब प्रतिबिंब !"
सोशल मीडियावर भिन्न मते व्यक्त करणारी जुगलबंदी कधीकधी नजरेस येते इंडिगो चा जो फियास्को झाला त्याच्यावरील मतमतांतरांचा हा लेखाजोखा म्हणजे जणू काही बिंब प्रतिबिंब
A:
https://moonsungrandson.blogspot.com/2021/01/blog-post_23.html
//
लिंक उघडून माझ्या ब्लॉग वरील एक नमुना म्हणून हा लेख जरूर वाचा...
: Today’s Indigo situation visualised a long time ago by Jaspal Bhatti
ही लिंक उघडा https://www.facebook.com/share/p/1Dp3GJUHgf/
// "नियमांची व प्रवाशांची ऐशी तैशी,
अशी ही 'हवेत' उडण्याची (?)
व
सुशासनाची करूण कहाणी
https://www.facebook.com/share/p/17apgM6MuY/All said & done onus lies on MCA who has been a mute spectator over the Indigo chaos, it's just worst Governance.
संजीव चांदोरकर लिहितात -
"इंडिगो”च्या निमित्ताने, “इंडिगो”च्या पलीकडे!
हे फक्त गैरव्यवस्थापन नाही, मक्तेदारी आणि वित्त भांडवलशाही युतीची केस स्टडी आहे.
इंटरग्लोब एविएशन ( इंडिगो विमान वाहतूक कंपनी) कंपनीच्या शेअरची किंमत गेल्या पाच वर्षात दुप्पट होणे, या कंपनीने भारतातील विमान प्रवासी मार्केटमध्ये 65 टक्के वाटा हिसकावणे….. आणि या कंपनीने गेल्या दोन दिवसांत देशातील लाखो विमान प्रवाशांचे हाल करणे यांचा परस्पर संबंध आहे.
इंडिगो कंपनी कडे 900 पेक्षा जास्त विमाने आहेत आणि ती विविध हवाई मार्गांवर दररोज सरासरी 2100 पेक्षा जास्त उड्डाणे करते. गेल्या दोन तीन दिवसात इंडिगो कंपनीने हजार पेक्षा जास्त उड्डाणे रद्द केली, अनेक विलंबाने उडाली.
कमीतकमी ऑपरेटिंग कॉस्ट, जास्तीतजास्त तास विमाने हवेत असणे आणि एका ठिकाणी पोचून अर्ध्या तासात तेच विमान पुन्हा नवीन प्रवाशांना भरून दुसरीकडे रवाना करणे….हे इंडिगोच्या व्यवस्थापनाचे ट्रेड सिक्रेट राहिले आहे. उदा. इंडिगोचे विमान 24 तासांपैकी सरासरी 11 पेक्षा जास्त तास हवेत असते. इतर कोणतीही भारतीय विमान कंपनी हे साध्य करू शकलेली नाही.
कमीत कमी ऑपरेटिंग कॉस्ट आणि उत्पादन क्षमतेचा , ( म्हणजे विमान हवेत राहण्याचा) जास्तीत जास्त वापर…. याचा अर्थ जास्तीत जास्त ऑपरेटिंग नफा, म्हणजे जास्तीत जास्त शेअरची किंमत..असे ते समीकरण आहे.
शेअर्स मधील गुंतवणूकदार व्वा, व्वा म्हणणार. कारण त्यांचे बाजारमूल्य वाढत राहते. इंडिगो व्यवस्थापकांना उच्च उत्पादकता साठी पुरस्कार मिळणार. त्यांचे परफॉर्मन्स बोनस आणि स्टॉक ऑप्शन्स अनेक कोटींनी वाढणार.
पण याची किंमत कोण मोजते?
या व्यवस्थापन प्रणालीचा ताण, खूप तास काम करायला लागणाऱ्या पायलट आणि सहाय्यक स्टाफ वर येतो. येत विमानांच्या नियमित तेलपाण्याला, अत्यावश्यक पार्टस बदलण्याला वेळच दिला जात नव्हता. गेल्या वर्षभरात पुरेशा मेंटेनन्स अभावी इंडिगोला आपली ७० विमाने उडवता आली नव्हती. आणि परदेशातून भाड्याने घ्यावी लागली होती.
वरील दोन्ही मुळे छोट्या मोठ्या अपघातांची शक्यता वाढते. आणि विमान अपघात म्हणजे मौत का कुंवा. हे कळण्यासाठी कोणी विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ञ असण्याची गरज नाही.
Directorate General of Civil Aviation (DGCA) हे केंद्र सरकारचे नियामक मंडळ भारतातील विमान वाहतूक उद्योगासाठी नियम बनवते. आंतरराष्ट्रीय मानांकानुसार DGCA ने पायलट साठी दर आठवड्याला किती तास विश्रांती मिळाली पाहिजे, रात्रीच्या वेळेत विमान चालवणे अशा अनेक गोष्टींसाठी दोन वर्षापूर्वी नियमावली जारी केली. त्या दोन वर्षाची मुदत नोव्हेंबर अखेरीस संपली.
त्या नियमांची अंमलबजावणी करायची तर इंडिगो कंपनीला नवीन पायलट, तंत्रज्ञ, सहाय्यक स्टाफ असे काही शे नोकर भरती करावी लागणार होती. जी कंपनीने केला नाही. कारण वाढीव ऑपरेटिंग कॉस्ट मुळे कंपनीचा नफा कमी झाला असता. शेयर प्राईस कमी झाली असती. गुंतवणूकदारांना आम्ही पुढच्या तिमाहीत, वर्षात एवढा नफा कमावू म्हणून दिलेली आश्वासने पाळता आली नसती…इत्यादी
नोव्हेंबर संपल्यावर नवीन नियम लागू होऊ लागले. एअर इंडिया वगैरें कंपन्या नी त्याची अंमलबजावणी करत आपल्या उड्डाणांची संख्या देखील कमी केली असे सांगितले जाते. पण इंडिगोने आपले वेळापत्रक रेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आधीच आत्यंतिक ताणलेले शेड्युल कोसळले..
इंटरग्लोबचे बाजारमूल्य 25000 कोटींनी कोसळले. आता वित्त भांडवल गुंतवणूकदार विचार करत आहेत …इंटरग्लोबचे शेअर विकत घ्यावेत का ?
प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रातील स्पर्धा लयाला जाणे, एका कंपनीकडे दोन त्रितीयांश मार्केट असणे, इतर स्टेकहोल्डर्सपेक्षा वित्तीय गुंतवणूकदारांच्या हिताला प्राधान्य मिळणे ..... सर्व काही मार्केट ठरवेल ही आर्थिक विचारधारा … या सगळ्याचा परिपाक आहे हा.
नेहमी मोठ्या मथळ्यांच्या बातम्यांच्या पलीकडे जायचा सवय लावू या. खूप इंटरेस्टिंग असते हे जाणे म्हणून.
ताज्या बातमीनुसार अपेक्षेप्रमाणे DGCA ने इंडिगोला नवीन नियम अमलात आणण्यासाठी काही महिने मुदत वाढ दिली आहे
संजीव चांदोरकर (6 डिसेम्बर 2025)
(सर्व माहिती, आकडेवारी मुख्यत्वे मनी कंट्रोल)
हा लेख संजीव चांदोरकर यांचा आहे. ते एक अर्थशास्त्राचे अभ्यासक भारतीय उद्योग जगतातील अभ्यासक मानले जातात.
// This is the eye opener for those who trumpet Good Governance//
आता त्यावरील प्रतिसाद
B
: 🙋♂️😂 *निश्चित. या भयानक गोंधळाची जबाबदारी नक्कीच केंद्रीय मोदी सरकारची आहे हे वादातीत आहे. माझी मोदी सरकारबाबत नेहमीच एक तक्रार असते ती म्हणजे हे सरकार लुच्च्यांना, देशविघातकांना नियम पाळण्यासाठी उगाचच मोठी सुट देते, ते सुधारतील हा चुकीचा आशावाद घेऊन बसते. हा प्रश्न गेले वर्षभर चर्चेत आहे. या व्यवसायाचा ६० टक्के ताबा घेऊन बसलेल्या या कंपनीला सरकारने कधीच फैलावर घ्यायला पाहिजे होते. या कंपनीचे भारताच्या शत्रूंशी लागेबांधे असल्याचे आता निष्पन्न होऊ लागले आहे. हे सरकारच्या गुप्तहेर खात्याला माहिती नाही असे होऊ शकत नाही. ही कंपनी प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीचे नियम वारंवार सांगुन देखील पाळत नव्हती. तेव्हाच त्यांचे ऑपरेट करण्याचे हक्क कापायला सुरुवात करायला पाहिजे होते. कदाचित त्यामुळे काँग्रेसी भ्रष्टाचारी विजय मल्ल्याच्या "किंगफिशर" सारखी आणखीन एक भारतीय विमान कंपनी दिवाळखोरीत गेली असती. त्यात देशाचे नुकसान नक्की झाले असते पण त्यातुन उभारण्याची एक संधी मिळाली असती. तेच आता पण होईल. ही कंपनी सुधारणार नाही. सरकारने त्यांना तात्पुरते सांभाळून घेतले असले तरी सरकार त्यांच्यापुढे आता नमणार नाही. त्यांना सेफ्टीनॉर्म्स पाळाव्याच लागतील. त्यानी आपल्या एव्हिएशन सेक्टरला नक्की फटका बसेल आणि सरकारला यावर पर्यायी व्यवस्था करावीच लागेल. बाकीच्या भारतीय कंपन्यांना विशेष सहाय्य करुन पुढे आणावे लागेल.*
: 🙋♂️ *संजिव चांदोरकरांचा लेख चांगला आणि वास्तवाला धरुन आहे. त्यातली काही विधाने सत्याला धरुन नाहीत. ह्या कंपनीच्या ताफ्यातली सर्व विमाने युरोपीय कंपनी "एअरबस" ची आहेत. त्यांच्याकडे अमेरिकन "बोईंग" कंपनीचे एकपण विमान नाही. तसेच त्यांची बहुसंख्य विमाने एअरबसशी संलग्नित कंपनीकडुन भाड्याने घेतलेली आहेत. आणि त्यात काहीच गैर नाही. त्यांच्या ताब्यात ४०० पेक्षा जास्त विमाने आहेत आणि एव्हढ्या विमानांचे तेल पाणी सांभाळण्याची मोठी व्यवस्था आज भारतात नाही. त्यांची वर्षभरात फक्त ७० विमाने वेळेवर उडाली नसतील तर तो एक चांगला विक्रम म्हणावा लागेल कारण ते वर्षांत हजारो उड्डाणे करत आहेत. काळजीचा आणि अस्विकारार्ह भाग हा आहे की ते कर्मचाऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जरुर ती काळजी घेत नाहीत. आणि त्यासाठी सरकारला त्यांचा योग्य तो बंदोबस्त करावाच लागेल. मी अलिकडच्या काळात इंडिगोच्या विमानाने अनेक वेळा प्रवास केला आहे. त्यांची सेवा छानच आहे. त्यांचे "बिझनेस मॉडेल" अद्वितीय आहे. मी क्वालालंपूर, मलेशियाला मलेशियन, सिंगापूर किंवा थाई एअरवेजनी गेलो तर मला एक वेळचे, वनवे तिकीट ₹२५०००/- ते ₹३००००/- पडते. आणि त्यासाठी मला पुण्याहुन रात्री अपरात्री मुंबईला जावे यावे लागते. या फ्लाईटमधे अनिवार्य जेवण असते जे मला आवडत नाही आणि नको असते. इंडिगो विमानात कुठलेही गरम पेय देत नाहीत कारण ते विमानात जड वजनाच्या ओव्हन घेऊन जात नाहीत. त्यामुळे विमानाला कमी वजन उचलावे लागते आणि तेव्हढी इंधनाची बचत होते. त्यात काहीच गैर नाही. त्यांच्या फ्लाईटमधे तुम्हाला खाणे पाहीजेत असेल तर तिकीट बुक करताना ते सांगुन त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. तसेच ऐत्या वेळेला योग्य ते पैसे देऊन पण ते मिळते. परंतु ही सेवा न घेतल्याने विमान तिकीटांचे पैसे खुप कमी होतात. वर सांगितलेल्या इतर विमान कंपन्याच्या ₹२५०००/-ते ₹३००००/- ऐवजी इंडिगो ₹१४०००/- ते ₹१५०००/- मधे मलेशियाला घेऊन जाते. महत्वाचे म्हणजे मी पुण्यातुन दिवसाढवळ्या प्रवासाला निघुन चेन्नई किंवा बेंगलोरहुन पुढे जाऊ शकतो. म्हणुनच त्यांच्या फ्लाईट फुल जातात. त्यांच्या फ्लाईट वेळेवर सुटतात आणि वेळेवर पोहोचतात. थोडक्यात सुरक्षेसाठी जरुरी उपाययोजना त्यांना करावीच लागेल. ती मुख्यतः पायलट आणि तत्सम कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांची आहे आणि त्याच्याशी प्रवाशांची सुरक्षा निगडित आहे. आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे.*
A:
प्रवाशांच्या सुरक्षे संबंधी विमानवाहकांसंबंधी नियम दोन वर्ष मुदत देऊनही इंडिगो ने काहीही केले नाही त्यामुळे प्रवाशांचे हाल करणारी ही आणीबाणी सारखी स्थिती निर्माण झाली. त्यासाठी इंडिगो विरुद्ध कुठलीही शिक्षेची कृती न करता इंडिगोच्या पुढे सरकारने उलट नियम स्थगित करून सहा महिने मुदत दिली, याला कुठले सुशासन म्हणावयाचे ? तर monopoly ला दिलेले प्रोत्साहन नव्हे कां?
Republic हा चॅनेल पूर्णतः
सरकारधार्जीणा आहे ! Not at all interested to see
B:
🙋♂️ *भारतात आज किती भारतीय विमान कंपन्या आहेत? माहीत आहे? त्यांची तथाकथित मोनोपॉली कशामुळे झाली? त्यांनी मार्केटचा मोठा भाग सरकारी पाठींब्यानी नाही तर त्यांच्या बिझनेस मॉडेलमुळे व्यापला आहे. हे नविन वेळापत्रक एअर इंडिया आणि इतर कंपन्या पण पाळत नव्हत्या. सरकारने त्याबाबत सक्ती केली नाही ही सरकारची चुक आहे.*
🙋♂️ *सरकारनी एका चुकीच्या माणसाची DGCA पदी नियुक्ती केली आहे. त्या व्यक्तीची ताबडतोब तीथुन उचलबांगडी होणे गरजेचे आहे. या समस्येत तुर्कीए गुंतलेली आहे. सरकारनी काही महीन्यांपूर्वी तुर्कीए कंपनी विरुद्ध कारवाई केल्याने त्यांचा इंडिगो बरोबरचा युरोप मधला धंदा बंद झाला आहे. त्यामुळे या सर्वांनी मिळून हा उद्योग केला आहे. सरकारने या धोक्याचा आधीच विचार करायला पाहिजे होता हे निश्चित.*
A:
गेली अकरा वर्षे विशेषत: मागची पाच वर्षे देशाच्या Moral fabric ची संपूर्णतया धुळधाण उडवली गेली आहे. दुर्दैवाने सक्षम व सुयोग्य पर्याय नसल्यामुळे ही मनमानी चालू राहिली आहे.
But what goes up, has to go down ह्या नैसर्गिक नियमामुळे असहाय्य सामान्य जनतेला वाट पाहणे अपरिहार्य झाले आहे.
जसा अमावस्येच्या अंध:कारानंतर प्रतिपदेचा चंद्र उगवतोच उगवतो, तसे "फिटे अंधाराचे जाळे, झाला मोकळा प्रकाश प्रकाश !" तो क्षण येणार हे निश्चित.
B:
🙆🏼♂️🤷🏻♂️🤦🏻♂️ *ही वैचारिक दिवाळखोरी आहे. जनरल कॉमेंट्स करुन चालत नाही. पुराव्यानिशी आरोप केले तरच त्याला अर्थ असतो. अन्यथा त्याची किंमत काँग्रेसच्या पप्पुच्या आरोपांसारखीच असते. न्यायालयात जाऊन मग तो बेशरमपणे माफी मागतो. कसली नैतिकता? या देशाने आधीच्या ६०/७० वर्षांतल्या अराजकतेचे आणि अनैतिकतेचे चटके खाल्ले आहेत. आतंकवाद्यांसमोर आणि देशविघातकांसमोर नैतिकता काय कामाची? १९४७ नंतर लोकांनी तीच तर चूक केली. त्यांना समजेल अशी भाषाच त्यांच्या बरोबर कामी येते. आज देशात देश आणि धर्मभक्त पर्यायांची नक्कीच गरज आहे. भाजपला पर्याय निश्चित पाहिजे आहे. कोणीतरी देशभक्त पुढे येईल अशी आशा करायला काहीच हरकत नाही. परंतु देशविघातक काँग्रेस, लालसलामवाले आणि जिहादी या देशात राज्यावर येणार नाहीत हे निश्चित.*
A:
😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭
👍"गेली कित्येक शतके एकसंध नसलेल्या आपल्या देशाचा इतिहास ध्यानात न घेणार्या,
स्वातंत्र्यलढ्यात जेलमध्ये जाणार आहोत कुठल्याही चळवळीमध्ये भाग न घेणाऱ्या, हुकूमशाही पद्धतीचे एकचालकानुव्रुत्तीने चालवला जाणारा हा एकेकाळी बंदी घातलेला समूह, ज्याच्या एका माथेफीरू तरुणाने स्वातंत्र्यासाठी फकीरी वृत्तीने आयुष्य वेचणाऱ्या महात्मा गांधींचा केलेला खून
आणि याच समूहाचा सत्तेपाठी धावणार्या राजकीय पक्षाचा, सातत्याने पाठपुराव्या करणाऱ्याने देशभक्तीचे डोस पाजणे या परते दुसरे दुर्दैव व विरोधाभास असूच शकत नाही !":👍
शेवटी A कडून चपखल परखड समारोप
🤣 "आधीच अंधभक्ती त्यातून काळा चष्मा, मनात असेल, तेच जळी स्थळी काष्टी पाषाणी दिसणार, वाटणार सांगणार बोलणार !"🤣
रविवार, ७ डिसेंबर, २०२५
"👍 "सहज सुचलं म्हणून- मराठी भाषा अभिजात भाषा !":👍
👍 "सहज सुचलं म्हणून- मराठी भाषा अभिजात भाषा !":👍
💐 " मराठी भाषिक असूनही इंग्रजीचा वापर बहुतेक व्यक्ती व्यावहारिक वा समाज माध्यमांवर जनसंपर्क करताना कां करतात हे एक कोडे आहे. मराठी असाल तर मराठीतच संपर्क साधा, हा आग्रह धरणार्या एका ज्येष्ठ नागरिकाचा कळकळीचा संदेश....💐
बऱ्याच वेळेला काय होत असतं, आपण जेव्हा आपले आपण एकटे असतो किंवा इतरही वेळी आपल्या मनात विचार हे चाललेलेच असतात. विचार कोणी सहसा थांबू शकत नाही. विचारांना व्यसन घालून मौनाव्रत पाळणा हे केवळ तपस्वी लोकांना जमते, हे खरं आहे. पुष्कळदा अशाच तारेचे अब सुचलो म्हणून विचार माझ्या मनात येत असतात तेच इथे व्यक्त करायचा मानस आहे पहिली गोष्ट हे सांगण्यास मला आनंद वाटतो की माझ्या स्मार्टफोन मोबाईलवर डिफॉल्ट म्हणजे अनिवार्य भाषा पहिली भाषा ही मराठी आहे आणि मी नेहमी माझे संदेश या प्रकारे बोलून मराठीतच व्यक्त करत असतो आणि ते प्रसारित करत असतो त्याचप्रमाणे मला आलेल्या संदेशावरती किंवा इतरही जर मला प्रतिसाद द्यायचा असला तर तेही मी असेच मराठीतच देत असतो. मला वाटतं जर तुम्ही मराठी असाल आणि एकीकडे तुम्हाला अभिजात भाषा आमची मराठी भाषा असं वाटत असेल, तर तुम्ही नेहमी कुठेही संपर्क साधताना व्यवहारात म्हणा इतर समाज माध्यमात म्हणा किंवा इतरही जनसंपर्क करता तेव्हा प्रथम मराठी भाषा वापरायला काय हरकत आहे ? तुम्हाला टाईप करून जमणार नाही, कमीत कमी आवाज ते मजकूर ही प्रणाली वापरून तुम्ही संदेश निर्माण करून प्रदर्शित करू शकता.
मी निवृत्ती झाल्यापासून आणि स्मार्टफोन हातात आल्यापासून व्रत केल्यामुळे, मी नेहमी अनेक संदेश असे प्रसारित करत असतो किंवा ऑडिओ, व्हिडिओ देखील बहुतशः मराठी भाषेतच माझे असतात आणि त्याचा मला एक प्रकारे आनंद वाटतो, अभिमान वाटतो. हे सारे व्यक्त करण्यामागे माझा कुठलाही राजकीय हेतु वा प्रसाराचा भाग नाही, हे मला प्रामाणिकपणे व्यक्त करायचे आहे. संस्कृती टिकवायची असेल तर तुम्हाला अशा प्रकारे मराठी असलात तर मराठी भाषेतच बोलणे आवश्यक आहे. नाही तर, केव्हाही कोणत्याही भविष्यकाळात आपली मराठी भाषा खरोखर लुप्त होईल, संस्कृती लुप्त होईल हा धोका ध्यानात घ्या.
सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हाच जर 75 वर्षे झाली तर इंग्रजीचा वापर जिथे तिथे समाज माध्यमांवरही आपण मराठी असूनही, आपण कां चालू ठेवला आहे ? इंग्रजी वापरली की श्रेष्ठत्व अशी आपली समजूत का म्हणून आहे?
एक वेळ मी मान्य करतो तांत्रिक भाषा आपल्या मराठीमध्ये तेवढी अजून निर्माण करू शकलेलो नाही. कारण जेव्हा यंत्रयुुग औद्योगिकरण युरोप विशेषत: इंग्लंडमध्ये सुरू झाले तेव्हा आपल्याकडची स्थिती वेगळी होती. आपण अध्यात्म, भक्ती वा माणूस कसा असावा व त्याने नीतिमत्तेने शहाणपणाने कसे जीवन जगावे या मध्येच लक्ष घातले होते. "ठेविले अनंते, तैसेची रहावे', ही प्रवृत्ती असल्यामुळे आपले भाषा समृद्धीकडे दुर्लक्ष झाले.
शेवटी तुम्हाला विनंती किंवा आवाहन असे आहे की निदान यापुढे तरी संपर्कामध्ये आपण मराठी भाषाच वापरावी. ही माझी इच्छा कितपत फलद्रुप होते हे तुमच्या प्रतिसादावरूनच सिद्ध होईल, यात वादच नाही. पण आता मला अधिक याविषयी जास्त बोलायचं नाही एवढंच सांगतो की इंग्लंड अमेरिका अशा परदेशात राहू नये काही मराठी माणसं अशी आहेत की जे आपल्या दैनंदिन व्यवहारात घरामध्ये व येथील मराठी समाजामध्ये तरी निदान मराठीत वापर करतात. आपल्या मुलांनाही तसेच मराठी बोलण्याचे सांगत वाढवले आहे. हा आपल्यासारख्यांना खडा आहे आदर्श आहे.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
शनिवार, ६ डिसेंबर, २०२५
"सोमि'वरील माझे योगदान भाग 6 !":👍
👍"सोमि'वरील माझे योगदान भाग 6 !":👍
😁 " वाचाल, तर( च?) वाचाल !":😁
💐 "जी गोष्ट आपल्याला भावते, आवडते, आपल्याला करावीशी वाटते, ती करताना आपण आपले राहत नाही, आपले देहभान हरपते. माझ्या बाबतीत बोलायचे झाले, तर वाचन करायला मला आवडते आणि एखादे आत्मभान विसरून, आत्मसमाधान देणारे पुस्तक वाचायला मिळाले की, "याची देही याची डोळा स्वर्गसुख" मिळाल्याचा आनंद मला होतो. काळाचा महिमा अघाध आहे, आता आयुष्याच्या उतरंडीवर अशा तऱ्हेची एकापेक्षा एक 'जीवा-शिवा'ची भेट घडवणारी पुस्तके, पाठोपाठ वाचायला मिळणे, यासारखे सद्भाग्य नाही ! आणि वाचून झाल्यावर जे अनुभवले, जे रुचले, जे भावले ते असे इतरांसाठी व्यक्त करण्यासारखा मणीकांचन योग नाही !
ह्या पार्श्वभूमीवर नुकतेच एक वृत्त माझ्या वाचनात आले:
"शालेय विद्यार्थ्यांचा वाचनाचा छंद किती आहे व त्यांना किती गोडी आहे यासंबंधीचे एक सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. त्यामध्ये दुर्दैवाने ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये वाचनाची आवड खूपच कमी विद्यार्थ्यांना आहे हे ध्यानात आले, तसेच ग्रामीण भागातीलही वाचनाची गोडी तितकीशी उत्साहवर्धक नव्हती."
मोबाईल संस्कृती आणि तयार उत्तरे देणारी तंत्रज्ञानाची झेप यामुळे भावी पिढ्यांचे कल्पनादारिद्र्य वाढत जाईल आणि म्हणूनच त्यांचे भवितव्य कठीण आहे !":😭
@@@@@@@@@!@@@
👍"साठवणीतल्या आठवणी !":👍
👍"5 वर्षांपूर्वीचा माझा 'फेबु'वरील संदेश !":👍
😭 "Is it writing on the wall?:
बँक टू बेसिक्स?:
1
मालिका भरकटलेल्या, बातम्या काही दम नसलेल्या, चर्चा अर्थहीन आणि जाहिरातींचा अतोनात सुळसुळाट:
ईडीयट बाँक्स बंद! रेडिओ चालस !
2
सोशल मिडीयाच्या वापराचा अतिरेक, माणसा माणसांमध्ये दुरावा, कौटुंबिक शांती समाधानाचा भंग:
स्मार्ट मोबाईल फोन बंद!
प्रत्यक्ष संपर्काचा सुसंवाद सुरू.
3
आरोग्यासाठी हवे ताजे अन्न: शिळेपाके ठेवण्याचे गोडाऊन-फ्रिज बंद!
मोदकपात्राची चलती.
4
बदलत्या जीवनशैलीपायी धोकादायक रोग टाळण्यासाठी: वाँशिंग मशीन, मिक्सर ग्राईंडर आदि ग्रुहोपयोगी गँजेटस् बंद !
रामा गडी व आपली मेहनत बरी !!
5
चढे इंधन दर, मर्यादित जागतिक इंधन साठा आणि ट्रँफीक जँम, प्रदुषणाचा विळखा:
कार व टू व्हीलर्स बंद.
सायकल आणि दोन पाय झिंदाबाद !
6
शहरात नागरी सेवा सुविधांचा चुथडा, सिमेंट काँक्रीटीकरण आणि झोपडपट्ट्यांचा, प्रदुषणाचा विळखा, दूध उतू जावं तशी माणसांची गर्दीच गर्दी, घाईच घाई:
चला खेड्यांकडे आणि बारा बलूतेदारीकडे !
7
आणि आणि????:
विकासाला खिळ पाडणारी अमर्याद लोकसंख्या म्हणून????:
म्हणून मर्यादित आयुष्याचा कठोर कायदा???..."🤣🤣🤣
🤣 "एक वेदनादायी नोंद !":🤣
🙏🏽"एकेक पान लागले गळावयाला":🙏🏽
👍"आज सकाळी नाश्ता करताना मोबाईलवर फेसबुक सर्व्हिंग मध्ये पहिलीच पोस्ट डॉक्टर अच्युत गोडबोले यांची दिसली.
त्यांचे आयआयटी मधील सहकारी आणि नंतरचेही अनेक वर्ष स्नेही असलेले आनंद करंदीकर यांच्या निधना निमित्त त्याने वाहिलेली ती श्रद्धांजली वाचून मन हळहळले. आनंद करंदीकरांसारखे सामाजिक बांध असलेले ऑल राऊंड गुणवंत आता आपल्यात नाहीत हे उमजून वाटून गेले की,
"एकेक पान लागले गळावयाला !"
माझ्या आनंद करंदीकरांसंबंधीची एक आठवण ताबडतोब मला आठवली.
त्यांचे एक प्रकारचे आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचून, मी तेव्हा अगदी भाराहून गेलो होतो. जेव्हा जेव्हा मला काहीही वाचलेले भावते, तेव्हा तेव्हा मी प्रत्येक लेखकाला काही ना काही प्रतिसाद देत आलो आहे. पण त्यांच्या पुस्तकाला मी दिलेला प्रतिसाद हा लिखित स्वरूपात नसून, तो मी ध्वनिफिती रूपात त्यांना व्हाट्सअप वर पाठवला होता ते स्मरले.
अशा या सर्वांगीण कर्तृत्व सहजतेने करत राहिलेल्या मनस्वी माणसाला आदरांजली वाहत असताना, त्यांच्या कर्तृत्वाची
तोंडओळख करून देणारी माझ्या प्रतिसादाची पुढील ध्वनिफीत उघडून जरूर ऐका...
II ओम शांती ओम II II ओम शांती ओम II🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
####################
आजच्या म्हणी:
१. कथा कुणाची, व्यथा कुणा?
२. डोंगर पोखरून ऊंदीर काढला!
३. केले 'तुका', झाले 'माका'!
४. ह्या 'गरीब' बिचार्या २०००रु. च्या नोटेला
घेवून, सुट्टे देता कां कुणी सुट्टे?
५. नांव मोठे, लक्षण खोटे!
६. बैल गेला आणि झोपा केला.
७. आज उधार, उद्या रोख.
८. आंधळा मागतो ५००, देव देतो २०००.
९. असेल हरी, तर देईल एटीएमवरी!
१०. लावली रांग, फिटले पांग, आहेत कां नोटा, सांग!
११. आमचा तो बाब्या, तुमचा तो पाग्या!
--------------------
मी कुठल्याही पक्षाचा पाठीराखा नाही. जस जशा घटना घडत जातात, त्यांची, निरपेक्ष बुद्धिने, कार्य-कारणभाव ध्यानांत घेत, मी मीमांसा करतो. राजकारणाकडे मी, व्यक्ती आणि समूह ह्यांच्या अपेक्षा, धोरणे व अंमलबजावणीकडे पहाण्याची मानसिकता, हातावर पोट असणार्या आम आदमीसाठी बरोबर कां चूक आहे ह्यांचा विचार करून माझा संदेश 'सोमि' वर मांडतो. चर्चेला सामोरे जायचे जाणीवपूर्वक टाळून, अनावश्यक ठिकाणी विडीयोद्वारे संवाद साधण्यात भूषण मानणे, किंवा रा़ंगेमधील अश्राप जीवांच्या म्रुत्युकडे असंवेदनशीलतेने दुर्लक्ष करणे,परिस्थितीचे गांभीर्य लक्षांत न घेता होणारे, शाही विवाह सोहळे पाहिल्यावर, मोठ्या खेदाने मी माझ्या वेदना मांडतो. 'पार्टी विथ ए डिफरन्स' असे आपण कुणाला म्हणायचे हा आता मोठा प्रश्नच आहे!राज्यकर्त्यांनी आम जनतेकडे, कसे बघू नये, ह्याचा वस्तुपाठही मिळतोच आहे. चक्रव्यूहांत अडकलेल्या अभिमन्यूचीहि आठवण येते आहे! इत्यलम्!!
-------------
१२/९
'बदला'नंतरची आव्हाने:
नित्य बदल, ही निसर्गांतील एकमेव स्थिर गोष्ट आहे. बदल म्हणजे जीवनांतील आव्हाने स्विकारायला लावणारी जीवंत प्रेरणा होय. सुयोग्य वेळी, विचारपूर्वक नंतरच्या संभाव्य परिणामांची रास्त दखल घेवून केलेला बदलच गतीमान विकास व प्रगती घडवत असतो. अवेळी, अविचाराने लादला गेलेला बदल पचविणे, जड जाते खरेच; परंतु अशाही वेळी प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याचा शहाणपणाही अंगी येत असतो. नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या कष्टकारक अन्यायाकडेही ज्या सकारात्मकतेने सामान्य जनतेने संयम बाळगत प्रतिकूल परिस्थिती स्विकारली, तिला तोड नाही व त्यामधून गरजांचे व खर्चाचे योग्य ते प्राधान्य राखणे शिकत, काटकसरीचा, साध्या रहाणीचा मार्ग स्विकारला आहे. वायफळ नाहक खर्च टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे.
३०डिसेंबर'१६ नंतर खरी परिक्षा 'नोटाबंदी'चा निर्णय घेणार्यांचीच असणार आहे. प्रथम ज्या उद्देशांसाठी हा कठोर निर्णय घेतला, त्यापैकी कोणती उद्दिष्टे कशी यशस्वी झाली त्यांचा प्रामाणिक लेखाजोखा जनतेला द्यावा लागणार आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे, जनतेने प्राधान्यानुसार उपलब्ध पैसा जसा सुयोग्य मार्गाने वापरण्याचा आदर्श दाखवला, तसाच सरकारही आता बँकांम़ध्ये जमा झालेला प्रचंड पैसा सर्व स्तरांतील जनतेच्या अपेक्षांनुसार वापरून 'अच्छे दिन'चे अधुरे स्वप्न आता तरी खरे करू शकते कां, त्याची कसोटी लागणार आहे. शिवाय उपयोगांत आणला जाणार्या पैशाची मध्येच 'भ्रष्टाचारी गळती' न होता, त्यांतील पै अन् पै अंतिम लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल ह्याची काटेखोर दक्षता सरकारला घ्यावी लागणार आहे.
घोडामैदानही आता फार दूर नाही.
'सुदिना' ८/१२/'१६
शुक्रवार, ५ डिसेंबर, २०२५
" मल्लिनाथी भाग 3 !":
👍"मल्लिनाथी !":👌
😚 "गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात
अनेेक खळबळजनक आणि वेदनादायी अशा सामुहिक गद्दारी, पक्ष फोडी, अशा तऱ्हेच्या अनेेक अनाकलनीय घटना घडत राहिल्या. आमदार अपात्रतेचा आणि पक्षांच्या चिन्हांचा कुठलाही न्यायनिवाडा न होता, निवडणुकही झाली. परंतु राक्षसी बहुमत मिळून सरकार स्थापन झाल्यापासून जवळ जवळ दररोज नीतीमत्तेचे धिंडवडे ऊडवणार्या एकापेक्षा एक मान खाली घालवणार्या घटना घडत आहेत. लाज, शरम वाटेनाशी झाली आहे.
अशा पार्श्वभूमीवर शासन प्रमुखांच्या आणि नेत्यांच्या उठसूठ जणू टॅक्सीने बांद्रा-मंत्रालय, मंत्रालय-बांद्रा अशा
मुंबई-दिल्ली, दिल्ली -मुंबई, विमानाने ज्या वाऱ्या चालल्या आहेत, आधीच महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी असूनही, या वाऱ्यांचा खर्च कोण करतो, कुठे आणि कसा नोंदवला जाणार आहे माहित नाही !
परंतु एकीकडे जर 'डिजिटल इंडिया' करायच्या वार्ता चालल्या असल्या, तर नेत्यांनी असे प्रत्यक्ष भेटण्याऐवजी, व्हिडिओ मीटिंगज् घेता येणार नाहीत कां ?
त्यामुळे वेळ, श्रम आणि पैसा यांचा योग्य तो विनियोग होणार नाही कां?
उगाचच नेत्यांच्या बिचाऱ्या तंगडतोडीला तरी आळा घालता येणार नाही कां ?":😚
------
टोका'ची भूमिका घेणे,
हे,
सत्तेचा 'गुळ' न सोडता आल्यामुळे विसरले,
करून करून भागले अन् 'देव' पुजेला लागले'!
----
" दृष्टी बदला मत बदलेल !":
"दृष्टी बदला मत बदलेल !":
कोणीतरी म्हटलं रिमोट वापरा कशाला बघता येईल तरीही मालिकांचा हा खेळ असा चालू आहे वाहिन्या वाढतायेत मालिका वाढत आहेत त्यामुळे एक मात्र झालंय करमणूक क्षेत्रातील कलाकारांना काम मिळायला लागले आणि कुठेही काम नसलं तर कुठल्यातरी मालिकेत आपली वर्णी लावून घेणे हेही आपल्याला बघायला मिळतं आज हा जो व्हिडिओ बनवतोय तो मी मालिकांना नाव ठेवण्यासाठी नाही कदाचित मला जणू साक्षात्कार झाला की मालिकांमधून सुद्धा आपल्याला खूप खूप काही शिकता येऊ शकतं हा तू कसा झाला त्याला कारण म्हणजे झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला काय काय आणि खावं या मालिकेमधील एका प्रसंगामुळे साधाच प्रसंग आहे मालिकेतील गुळपोळी गावातलं जे ग्रामीण शेतकरी कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये आपली मुलगी एकुलती एक जाणार हे ज्या बाईला पटत नाहीये अशी ही सासूबाई काय काय कारस्थान करते आणि गुळपोळी वाल्यांना ट्रक बस पाठवून बोलून घेते बोलावताना एकदा गाडी बंद पडते तिथे सगळ्यांना होणार घायल उभारायला लागतो आणि त्या वेळेला देखील आजोबा त्यातून मार्ग काढतात तिथे जणू काही हुरडा पार्टी केल्यासारखा सर्वजण आनंद उपभोक्ता पुन्हा मुंबईला आल्यावर ह्या सासूबाईंनी आपल्या मुलीला दूर पाठवलेला असतो आणि जो आपल्या बंगल्यामध्ये प्रवेश करणार द्वार आहे तिथल्या द्वारपालाला सांगितलं की काही करून त्याला हात सोडू नका हे दमले भागलेले जेव्हा इकडे येतात त्यावेळेला त्याला काही केल्या आत जाऊ दिलं जात नाही दहा पंधरा कुटुंबातली माणसं जमून आलेली खरं म्हणजे त्यांनी खेळायला हवं पण त्या वेळेला आजोबा सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी काय काय क्लुप्त्या करतात आईस्क्रीम आणि मिसळ किंवा अशी अरेंजमेंट करून सगळ्यांना आपल्यासमोर आलेल्या संकटातून आनंद शोधायला लावतात आणि तेच आपल्या नातवाला ते सांगतात क्या रे संकटात येत असतात पण आपल्याला काय करायला हवं त्यातून देखील आनंद शोधायला हवा मुद्दा मला त्या आजोबांनी तात्यांनी दिला त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला आणि वाटलं की मालिकांमधून सुद्धा कसंही असो काही काही पात्र अशी रंगवलेले असतात की त्यांच्याकडून काही ना काही शिकायला मिळतं हे उदाहरण झालं त्यातली पल्लवी आणि शंतनु चे वडील ही दोन आदर्श अशी पात्र आहे त्यातील शंतनुचे वडील प्रभाकर तर खरोखर आपण नेहमी इतरांची वागताना कसं वागाव आपला मुद्दा कसा मांडला संयम सामान्यजपणा आणि तारतम्य याचं अलौकिक मिश्रण असलेलं हे व्यक्तिमत्व खरोखर आदर्शच आहे सध्या जिकडे तिकडे हेवे दावेपणा वाढलेला असताना हे प्रभाकर जे ग्रस्त आहेत ते अतिशय संयमाने वागतात आपला मुद्दा पटवून देतात तो आपल्याला वाघावर कसं याचा गोष्टी मधून मला जाणवलं की मालिका मधून देखील आपल्याला काहीतरी नवीन मिळू शकतात नवीन आपण शिकू शकतो फक्त त्याच्या करता ही अशी दृष्टी हवी जी त्या तात्यांनी आजोबांनी दिली की आहे त्या परिस्थितीला नर्मदा सामोरे जा आणि त्यातून पॉझिटिव्ह विचार करून आनंदाने मार्ग काढा हा जो विचार आहे हा मला तात्यांमुळे मिळाला आणि म्हणून मी आता या माझ्या व्हिडिओच्या मालिकेमध्ये हेच अतिशय विस्ताराने वेगवेगळ्या भागात सांगणार आहे त्याकरता तुम्हाला देखील त्या दृष्टीने करमणूक नुसकी करून न घेता आपल्याला यातून जगण्यासाठी वागण्यासाठी काय मिळू शकतो हे पाहिलं पाहिजे आणि ह्या माझ्या व्हिडिओचा हेतू तोच आहे धन्यवाद
" आत्मनिर्भर व्हा-One Msn Communication Industry !":
😀 "आत्मनिर्भर व्हा ! नोकरी नको,
तुम्हीच तुमच्या व्यवसायाचे मालक व्हा !"😀
स्वतःच्या कल्पना आणि कौशल्यांचा वापर करून आर्थिक लाभ मिळवण्याचे संभाव्य मार्ग. या खास लेखात उलगडलेला आहे.
आत्मनिर्भर होणं हे खरोखर गरजेचं आहे हे मला जाणवलं आणि त्यामुळे स्मार्टफोन हातात आल्यापासून मी निवृत्त झाल्यानंतर काही वर्षांनी उद्योग असे वेगवेगळ्या प्रकारचे करायला लागलो ते म्हणजे माझ्या मधली जी कल्पना शक्ती लेखन करण्याची आवड बोलण्याची आवड यामधून कम्युनिकेशन वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्री अशा तऱ्हेच स्वरूप त्याला दिलं आणि त्याचा एक लेटेस्ट रिपोर्ट मी पुढे आपल्या पुढे मांडतो आहे:
👌 Monthly Progress Report 30/9/'25:👌
💐"Moonsun Grandson !":💐
👌"One Man Communication Industry !": 👌
Mr. Sudhakar Natu ":
# 'प्रगतीची क्षितीजे' ह्या महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट पुस्तक पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे लेखक...
# रंगांची दुनिया-फेसबुकवरील समुह: संस्थापक व Admin 3 years
1 moonsun grandson blog:
679 articles
2 मुक्तसंवाद channel on you tube: videos:
3 आकाशातील पाळणे whatsapp अभिवाचन मंच: 403
4 स्वरानंद: 122
5 बोल अमोल: 340+
6 छाप (पड)लेले शब्द: 130+
7 माझी कथा: आठवड्यात 2/3
8 bookganga.com वर 17 ebooks
Latest...
9 कुठेतरी काहीतरी चुकतंय: 9
10 आशेला अजून वाव आहे: 5
Mission: "ह्या ह्रदयाचे त्या ह्रदयी !"
Be a witness to
कल्पनांची आकाशगंगा !!....
One Man Communication Industry":
Sudhakar Natu ":👌
त्यामधून लक्षात येईल की उत्तरोत्तर नवनवीन कल्पनांना योग्य ते रूप देऊन मी माझा हा जो सध्याच्या परिस्थितीत कुठलाही इन्कम नसणारा व्यवसाय म्हणा किंवा उद्योग केला त्यामध्ये मला चांगल्यापैकी यश मिळत गेले आहे एक साधं उदाहरण म्हणजे आम्ही माझ्या मनामध्ये कल्पना आली की माझे जे लेख आहेत माझं जे लिखाण आहे त्याचा ऑडिओ स्वरूपात आपण जर लोकांपर्यंत मांडलं तर चांगलं होईल मला नाव पण चांगलं सुचलं आकाशातील पाळणे सुदैवाने मला माझा भाचा उदय पिंगळे हाही या कल्पनेला साथ देणारा मिळाला आणि तो उत्तम असा अभिवाचक असल्यामुळे त्याने माझ्यासाठी आपल्या या कल्पनेसाठी रेकॉर्डिंग करून ध्वनिफीती बनवायचं मान्य केलं मी स्वतःही माझ्या स्वतंत्र अशा ध्वनिफीती बनवतच असे आमच्या दोघांच्या या सहकार्याने आम्ही तीन वर्षांपूर्वी आकाशातील पाळणे हा अभिवचन मंच सुरू केला आणि मला सांगायला आनंद वाटतो की योग्य त्या प्रचार अशा शैलीमुळे माझा ऍडव्हर्टायझिंग पब्लिसिटी चा बॅकग्राऊंडचा अनुभव असल्यामुळे आम्ही उत्तरोत्तर आमची ही संकल्पना विलक्षण लोकप्रिय करू शकलो आणि आज तीन वर्ष पूर्ण झाल्यावर सुमारे 400 हून अभिवाचने आम्ही प्रकाशित केली आहेत त्यामध्ये अनेक विषयांना हाताळणी केलेली आहे साहित्य कला नाटक व्यवसाय उद्योग अर्थव्यवसाय ज्योतिष अशा अनेकानेक विषयांचा परामर्श घेणारा अभिवाचन मंच उत्तरोत्तर पॉप्युलर होतोय आणि आमचे जवळजवळ पावणे 400 सदस्य आहेत अर्थात या अशा वळणावर आज सकाळी मला वाटलं की आपण आता आपल्या या ज्या कल्पना आहेत त्यामधून काही व्यावसायिक आर्थिक असा लाभ मिळवू शकतो का असं वाटलं आणि म्हणून मी विवेचन करत आहे पहिली संकल्पना अशी आहे की माझा स्वतःचा एक स्वतंत्र youtube चॅनेल आहे त्यामध्ये देखील जवळजवळ पावणे 200 व्हिडिओज प्रकाशित केले आहेत त्यामधील निवडक अशा व्हिडिओंचा ज्यामध्ये कदाचित ऑडिओचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्या त्यामधील जो ध्वनिरूप पोर्शन असेल त्या पोर्शनचा ऑडिओ टू टेक्स्ट असं रूपांतर करून त्याचं एखादं पुस्तक ई बुक बनवता येईल का कारण ऑडिओ टू टेक्स्ट हे ॲप वापरून त्या तऱ्हेची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल निवडक असे 10 ते 15 असे व्हिडिओज मी निवडू शकतो आणि जर शक्य असलं तर त्याचं ऑडिओ टू टेक्स्ट बनवून ई बुक्स द्वारे बुकगंगा सारख्या प्लॅटफॉर्म वर प्रकाशित करू शकतो हीच कल्पना मी मनात ठेवून माझी अनेक ई बुक्स देखील बुकगंगा डॉट कॉम या प्लॅटफॉर्मवर प्रकाशित केली आहेत आणि उत्तरोत्तर त्याला आज नाही उद्या योग्य ते असे आर्थिक लाभ होऊ शकतील तर ही पहिली संकल्पना आहे की त्या ऑडिओ पोर्शन सिलेक्ट अशा ऑडिओ पोर्शन योग्य अशा स्वरूपात ई बुक बनवणं छापील नव्हे पण वर्ड मध्ये टेक्स्ट मध्ये बनवणं ही पहिली कल्पना आहे दुसरी कल्पना अशी आहे की आजचा आकाशातील पाळणे हा जो काही आमचा अभिवाचन मंच आहे तो अशाच एखाद्या रेगुलर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जोडला जाऊन त्यामध्ये आपल्याला दोन कल्पना मांडू शकतो एक म्हणजे आठ ते दहा अशा याचा संच निर्माण करून ऑडिओ पोर्शनचा दिवाळी अंक काढू शकतो आणि तो प्रकाशित करू शकतो तेव्हा ते सिलेक्टेड 10 ते 15 ज्याप्रमाणे योग्य अशा योग्य अशा टाईम फ्रेम अर्धा तास योग्य असेल तर अर्धा तास 15 मिनिटं योग्य असेल तर 15 मिनिटं अशा तऱ्हेचे ऑडिओ किंवा साधारण एक तासाचे ऑडिओ बनवू शकतो आणि त्यात ते दिवाळी अंक म्हणून प्रकाशित करू शकतो इथे ऑनलाईन प्लॅटफॉर्म सारखे व्यावसायिक असेंबलिंग वगैरे अशी करू शकतात तसेच नंतर हा जो दिवाळी अंक आहे तो त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करू शकतात ही ती संकल्पना आहे अजून एक या मुद्द्याचीच तिसरी संकल्पना अशी आहे की हे जे काही आमचे 400 आतापर्यंत भाग झाले आहेत हा जणू काही एक डेटा बँक आहे असं समजून बुकगंगा सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्याच्यामधील सिलेक्टेड उत्तमोत्तम असे ऑडिओ प्रकाशित करायचे आणि त्यासाठी योग्य वर्गणी ठेवायची की तुम्ही याचे सभासद व्हायची तयारी असेल तर एक ठराविक रक्कम महिना म्हणा वार्षिक म्हणा अशी चार्ज करायची तेव्हा ह्या कल्पना मी मांडल्या आहेत आणि त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्या मधलं कौशल्य आणि कल्पना यामधून तुम्हाला आर्थिक लाभाचे मार्ग सापडू शकतात तेव्हा आजचा हा जो आपली ही मालिका चालली आहे की आत्मनिर्भर व्हा तुम्हीच तुमच्या व्यवसायाचे मालक व्हा याचा दुसरा भाग हा इथे मांडला आहे आपण जरूर विचार करा आणि मला त्याचा प्रतिसाद द्या धन्यवाद मी सुधाकर नातू
" नको रे शेजारी असे हे शेजारी !":
"नको रे शेजारी असे हे शेजारी"
जसे आपण कुठल्या कुळात जन्म घ्यायचा आणि आपले कोण आई-वडील असू शकतात हे आपण ठरवू शकत नाही ते आपले प्रारब्ध असते तसेच काहीसे शेजाऱ्यांच्या बाबतीत म्हणता येईल नवीन घरात जाताना कोण शेजारी असतील ते आपण सांगू शकत नाही साहजिकच कधी कधी अशी वेळ येते की नको रे शेजारी असे हे शेजारी असे म्हणण्याची !
मुंबईमध्ये उंच उंच टावर बांधले जात आहेत आणि त्यामध्ये राहायला गेल्यावर रिनोवेशन करताना अनेक समस्या उद्भवतात आणि जे शेजारी राहतात त्यांना अतोनात त्रास होतो त्याचेच एक प्राथमिक अनुभव उलगडणारा हा लेख.....
आमच्या सोळाव्या मजल्यावर आमचा A×××आणि श्री /// आणि A ×××आम्ही दोघांनी नियमाप्रमाणे shoe racks घरामध्येच बनवून घेतले व घरातच ठेवले आहेत.
परंतू जवळजवळ गेले वर्षाहून अधिक काळ
श्री ÷÷÷यांच्या A×××फ्लॅटचे रीनोवेशन चालू आहे आणि तिथे नोव्हेंबर25 मध्ये आम्ही दोघांनी तीव्र विरोध करूनही त्यांनी तो shoe rack बनवणे चालूच ठेवले आणि आता तो फ्लॅटच्या बाहेरच मेसेज मध्ये त्यांनी
ठेवला आहे.
"आपल्याला इतरांचे भले जरी करता आले नाही, तरी आपल्यामुळे इतरांना कुठलाही त्रास होऊ नये" हे प्राथमिक तत्व जर पाळले जात नसेल, तर कोण काय करणार !
थोडक्यात सहनिवासामध्ये राहताना आवश्यक ते नियम पाळत इतरांना सहकार्य करणे गरजेचे असते, हे जेव्हा आपल्या सोसायटीमधील सर्व सदस्यांच्या ध्यानात येईल तेव्हाच काही सुधारणा होऊ शकते.
--------
More than 1 year prolonged Renovation Work is going on & on, in Flat A÷÷÷of Mr××× without any signs of ending. And this has been causing uncalled for nuisance & harassment to us-Sr citizens.
Many a times it contiues.
beyond stipulated time, as shown here (photo @ 7/30pm yesterday) that too for Shoe rack in Common Passage ! As per bylaw, You would agree that it needs to be removed inside their flat immediately.
As per SOP for any internal renovation work the Flat owner needs to provide in advance, full details & expected time of it's completion to MC of Society.
With that, I sincerely request you to please look into this unplanned renovation
work personally & please let us know when it will be completed by them.
Thanks
Mr ///
Flat A×××
@ "श्री ÷÷÷
सरळ मुद्द्यावरच येतो.
दुर्दैवाने सदनिका नूतनीकरणासंबंधित विहित नियम न पाळले गेल्यामुळे, आपल्या सोसायटीमध्ये 52 सदनिका असूनही त्यामधील कदाचित तुमच्या एकट्याच A××× या सदनिकेमध्येचा ताबा घेतल्यापासून नूतनीकरणाचे काम अजून प्रदीर्घकाळ रेंगाळत राहिले आहे.
सर्वसाधारण असा अनुभव आहे की, प्रारंभ केल्यापासून तीन ते चार, जास्तीत जास्त ते सहा महिन्यांमध्ये सदनिकेचे नूतनीकरणाचे काम पूर्ण होते. त्यामुळे आपल्याला माझी नम्र विनंती आहे की, आपल्या सदनिकेचे रजिस्ट्रेशन झाल्यापासून, बांधकाम चालू असताना त्यानंतर तुम्ही सदानिकेचा ताबा घेतल्यानंतर आपण हे नूतनीकरणाचे काम कशा तऱ्हेने हाताळले ते जरूर सर्वांच्या माहितीसाठी, Sumit व्हाट्सअप ओनर्स ग्रुपवर जरूर टाकावे.
नाईलाजाने असा संदेश प्रसारित करण्याचा हेतू हाच आहे की, कुठल्याही यंत्रणेसाठी (for Systym) ती अव्याहत सुलभतेने चालू राहण्यासाठी, तिच्यासंबंधीचे नियम काटेकोरपणे व प्रामाणिकपणे पाळणे किती गरजेचे असते, ते माननीय नियामक मंडळासह सर्व सन्माननीय सदस्यांना समजावे.
उदाहरणार्थ, विश्वाचा अवाढव्य फापटपसारा कोट्यवधी वर्षे अव्याहत चालू राहण्यामागे, एवढेच काय आपल्या शरीरातील विविध यंत्रणांचे नियमबद्ध पद्धतीमुळेच त्यांचे काम कसे अविरत चालू रहाते, ते ध्यानात घेणे गरजेचे आहे.
धन्यवाद
श्री ///
--#-------
" माझ्या यूट्यूब चॅनेल वरील व्हिडिओज भाग दोन
👍" मुक्तसंवाद-वाचता वाचता, वेचलेले!":👌
👍"SAVERS Mantra & Artificial Intelligence-AI संबंधी वाचता वाचता, वेचलेले व आत्मविकासासाठी महत्त्वपूर्ण असा हा मुक्तसंवाद जरूर ऐका:
S Silence-Meditation A Affirmations -Positive Thinking V Visialise E Execercise R Reading S Scribing-Writing !"
याशिवाय AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील समजून घ्या
त्यासाठी पुढील लिंक उघडा......👍
https://youtu.be/0cA9SVIBsSM?si=ipm-nQCTh3e-VAzB
" पहिल्या घडीचा मुक्तसंवाद-Repair-Reuse -Recycle !":
दररोजच्या अनुभवातून खूप काही कसे शिकता येते, ते मनमोकळेपणाने उलगडणारा हा उपयुक्त विडीओ जरूर पहा.":
त्यासाठी पुढील लिंक उघडा...
https://youtu.be/1i172pKVfpI?si=VCP7PfuYM4mArOil
महाराष्ट्र टाइम्स रविवार पुरवणी पुरवणी मध्ये वेचलेल्या आणि भावलेल्या माझ्या धडपडीचा कारनामा लेखक आनंद करंदीकर
ह्या वाचनीय पुस्तक परीक्षणाचा मतितार्थ येथे उलगडला आहे...
व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक उघडाhttps://youtu.be/aFYmh_FqLoI?si=OQlGins5uI_zrvby
👍"मुक्तसंवाद-कल्पनांची भरारी ध्वनी ते मजकूर !":👍
💐"आज कधी नव्हे ते शं ना नवरे यांचे एक खुसखुशीत लेख असलेले 'शन्ना डे' हे पुस्तक वाचत होतो. त्यावरून मला सुचलेला हा मुक्तसंवाद आपल्यालाही वेगळ्या दुनियेत घेऊन जाईल अशी खात्री आहे....💐
व्हिडिओ पाहण्यासाठी....💐
पुढील लिंक उघडा.......💐
https://youtu.be/UUNbEWfQvKI?si=LwwAhWjzU25D9y49
👍" मुक्तसंवाद-गाढ झोप कशी लागू शकते?":👍
💐" ते जाणण्यासाठी....💐
पुढील लिंक उघडा......💐
https://youtu.be/GG3MkZbfDV8?si=-ke1DskX4Y731YcO
👍 "मुक्तसंवाद- विवाह विलंब कारणे आणि उपाय !":👍
💐" ग्रहमान किंवा मागील काही घटना विवाह असतात का याचा वापर करणारा व्हिडिओ !":💐
कल्पनांची भरारी: ध्वनी ते मजकूर !":👍
💐 "आज कधी नव्हे ते शं ना नवरे यांचे एक खुसखुशीत लेख असलेले 'शन्ना डे' हे पुस्तक वाचत होतो. त्यावरून मला सुचलेला हा मुक्तसंवाद आपल्यालाही वेगळ्या दुनियेत घेऊन जाईल अशी खात्री आहे.,,,,,💐
व्हिडिओ पाहण्यासाठी......💐
पुढील लिंक उघडा......💐
https://youtu.be/UUNbEWfQvKI?si=Bods3zDKB-0e3SRR
👍"मुक्तसंवाद-नव्या युगाची नवी आव्हाने आणि नवनव्या संधी": 'जागते रहो !':👍
💐 "बदल हाच निसर्गाचा स्थायीभाव आहे. नित्य नवीन बदल आणि त्या बदलांना स्विकारून त्यांच्याशी जुळवून घेणे आणि सातत्याने नवनवीन शिकत रहाणे आता नितांत गरजेचे आहे, हे मांडणारा हा विडीओ सर्वांनी आवर्जून पहावा असाच आहे......💐
पुढील लिंक उघडा.....💐
https://youtu.be/rNdZYChlweE?si=HHMclaXB8OACRQje
मुक्तसंवाद-सहज सुचलं म्हणून, सावध रहा सावध व्हा
हल्लीचे दिवस मोठे चिंता वाढवणारे आले आहेत विशेषता सायबर क्राईमच्या धोक्यामुळे सगळ्यांनाच त्यातले त्यात ज्येष्ठ नागरिकांना तर फसवले जाण्याचे आणि त्या पायी अनेक प्रकारचे मनस्ताप आर्थिक नुकसान सहन करायला लागलेला आहे.
अशावेळी एका ज्येष्ठ नागरिकाला फोनचे सिम कार्ड बदलताना आणि पार्सल घेण्यासंबंधी जे विचित्र अनुभव आले आणि त्यातून तो काय शिकला ते उलगडणारा हा मुक्त संवाद आपल्यालाही जागे राहिला सांगेल.
पहाण्यासाठी पुढील लिंक उघडा...
👍"मुक्तसंवाद- जन्मगाठी: फसलेल्या, तुटलेल्या !":👍
💐" जन्मगाठी म्हणे स्वर्गात बांधल्या जातात परंतु सगळ्यात जन्मगाठी यशस्वी आणि टिकाऊ होतातच असे नाही काही जन्म गाठी स्वस्तात तुटतात त्यासंबंधी उदाहरण सह विचार व्यक्त करणारा हा व्हिडिओ...
पाहण्यासाठी पुढील लिंक उघडा...
इंटरनेट आणि टेलीकम्युनिकेशन यांचा मिलाफ झाल्यापासून अक्षरशः क्रांती झाली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला संपर्क साधता येतो. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप अशा अनेक रूपात सोशल मीडिया हे आपल्या जीवनाचे एक अत्यावश्यक अविभाज्य अंग बनले आहे. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर सोशल मीडिया ही देखील एक जीवनावश्यक चीज बनली आहे ! त्याचाच हा लेखाजोखा.....💐
कसे? ते समजण्यासाठी.....💐
पुढील लिंक उघडा.....💐
https://youtu.be/4UQrdpajVrU?si=EzLdgBR57sqOl5Fk
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌
👍"मुक्तसंवाद-'अरे वेड्या मना, तळमळसी !":👌
"अभिवाचन क्रमांक-425 !":
💐 "सध्याचे जीवन ताणतणावाचे आणि मानसिक व्याधी वाढण्याचे झालेले आहेत.
माणसाचे मन हे खरोखर एक गुढ आहे, अथांग आहे आणि त्याचा कोणालाही काहीही थांंगपत्ता लागलेला नाही. विशेषतः जेष्ठ दाम्पत्याच्या बाबतीत वादविवाद, मतभेद ह्यापायी काय होते, त्याचे येथे विवेचन आहे.......💐
ते उलगडण्यासाठी....💐
पुढील लिंक उघडा.......💐
https://youtu.be/ZBlMs0CU4hc?si=cztpkS-WydOBBY0U
👍 मुक्तसंवाद- नको रे मनोरे असे हे मनोरे- भाग 5 !":👍
💐"ह्या अभिवाचनाच्या भागात सदनिका टॉवर मधली सदनिका ताब्यात घेतल्यानंतर नूतनीकरणासंबंधी विहित नियम न पाळल्यामुळे काय काय होऊ शकते याचा उहापोह येथे केला आहे.....💐
त्यासाठी पुढील लिंक उघडा.....💐
👍 "सहज सुचलं म्हणून- मराठी भाषा अभिजात भाषा !":👍
💐 " मराठी भाषिक असूनही इंग्रजीचा वापर बहुतेक व्यक्ती व्यावहारिक वा समाज माध्यमांवर जनसंपर्क करताना का करतात हे एक कोडे आहे मराठी असाल तर मराठीतच संपर्क साधा हा आग्रह धरणारा एका ज्येष्ठ नागरिकाचा कळकळीचा संदेश....💐
त्यासाठी पुढील लिंक उघडा....💐
https://youtu.be/27RXN0gDrhg?si=mbUMJll9rKVndizI
सोमवार, १ डिसेंबर, २०२५
👍"दिवाळी अंकांची मांदियाळी !"👍:👍"अनुराधा दिवाळी अंक'-भाग 2":👍
👍"दिवाळी अंकांची मांदियाळी !"👍:👍"अनुराधा दिवाळी अंक'-भाग 2":👍
💐"अनुराधा दिवाळी अंकातील बहुतेक ललित लेख मी एकाग्रतेने वाचले. ते निश्चितच वाचनीय, विचार प्रवर्तक वैविध्यपूर्ण विषयांवरील आहेत. निवडक वेचक वेधक पाच विषयांवरील आशय अर्थ गर्भ असे व्यक्त करणारी ही नोंद पहा: म्हणजे मला काय म्हणायचे ते समजेल:
👍"वाचता वाचता वेचलेले, भावलेले !":👍
1
👍"पैसा आणि पैशाचा खरी किंमत !":👍
💐 "जगण्यासाठी पैसा अत्यावश्यक आहे हे कोणीच नाकारणार नाही पण हा पैसा स्व कष्टार्जीत असावा स्वतः कमावलेला असावा जे धन माझे नाही किंवा माझ्या
हक्काचं नाही त्यावर डोळा ठेवायचा नाही नजरही ठेवायची नाही कधी चुकून आपल्याकडे जास्त पैसे येतात ते प्रामाणिकपणे परत करायला हवेत कुणाकडून घेतले असतील उष्ण तर ते परत करेपर्यंत खरंतर चैन पडू नये मग ते दोन रुपये असून 200 असून वा दोन लाख असो आयुष्यात लहानपणी असो तरुणपणी असो पैशाचा अभाव पैशाची चणचण ज्याने अनुभवली असते त्यालाच पैशाची खरी किंमत कळते !
पैसा धन संपत्तीला एक शाप आहे तो म्हणजे चोरीला जाण्याचा माणसाला सदैव भीती असते कष्टाना मिळवलेला पैसा धन सुरक्षित राहील ना चोरीला जाणार नाही ना कोणी बसून तर त्यावर डल्ला मारिन मारणार नाही ना अगदी पूर्वीच्या काळी घरातच ते ठेवलं जायचं रोग किंवा दागिन्यांच्या स्वरूपात चोरांना पत्ता लागू शकणार नाही अशा ठिकाणी पण मग नंतर घरी सोनवणे भरायचे चोऱ्या व्हायच्या आणि सगळे दोन ते संपत्ती ते चोर घेऊन जायचे पण आता अशा तऱ्हेचे गुन्हे तर होत आहेतच परंतु आता त्यात सायबर फ्रॉड ही नवी भर पडली आहे चोर-तोड फोड करत नाहीत आभासी पद्धतीने चावीने ते कुलूप दारे उघडतात काही वेळा निष्काळजीपणे आपणच ती कुलप त्यांना उघडून देतो चोर तुमची आभासी तिजोरी साफ करून जातात हे चोर तर दिसत नाहीत कोण आहेत याचा पत्ताही लागत नाही हा काळाचा महिमा आहे कमालीची जागरूकता सदैव डोकं ताळ्यावर ठेवून मेंदू जागृत ठेवून धनाचं रक्षण करावं लागतं ही आजच्या काळाची नवीन तर्हा आहे !:💐
शेवटी
II कालाय तस्मै म:II
# कल्पना भागवत
2
💐" वाचन- 'एक माणूस घडवणारी किमया' !":💐
👍"Man is known by the books he keeps !" असं म्हणतात एकूणच वाचन ही एक कला आहे असं म्हटलं जातं "अन्नाने जसे शरीराचे पोषण होते तसे वाचनाने मनाचे होते"- विष्णुशास्त्री चिपळूणकर. अनेक कौशल्यांचा भारदस्त मेळ म्हणजे वाचन मूल्य विचार स्वप्न सगळं वाचनातून फुलतं डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर पुस्तक वाचली महात्मा गांंधीजींना टॉलस्टॉयने मार्गावर चालवलं आजही अनेक यशस्वी व्यक्तींचा बालपण वाचनाच्या सहवासातच घडलेलं असतं वाचन म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही तर ती माहिती रूपांतरित करून स्व घडवणं खरवाचन म्हणजे शब्दाची ओळ नाही ती एक अंतर्गत प्रवासाची सुरुवात आहे.
उत्तम वाचक घडवण्यासाठी अमृत देशमुख ने पुस्तक लिहिले:
"7 Habbits of Highly Effective Readers "
या पुस्तकातील अनुक्रमाणिका देखील किती आगळी वेगळी आहे पहा:
1 Don't take reading too seriously
2 Fill in the time pockets
3 Read Random
4 Get the Big Picture
5 Read and Discuss
6 Read and Pass it on
7 The secret Habit
हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला वाचनाविषयीच्या गैरसमजुती घालवायला नक्कीच मदत होते !":👍
# मेघा आंबर्डेकर
3
👍"काळ, एक कालातीत शाश्वत सत्य !":👍
💐"येणाऱ्या प्रत्येक दिवसाला प्रसन्न मनाने सामोरे जाणे हेही केव्हाही चांगले त्या करता काळाच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जागणे जाण्यासाठी आपण सदैव सज्ज असले पाहिजे काळावर मात करण्याची दांभिक बाचा करण्यापेक्षा भलेभुरे हे घडून गेले विसरून जाऊ सारक क्षणभर जरी विसाऊ या वळणावर हे जे गाणे आहे ते खूप काही सांगून जाणारे आहे लाटेमागून लाट ही येणारच असते तरीपण अशा लाटांना कधी कधी किनारा भेटत असतो. काळाचे पण तेच आहे म्हणून आपण मावळतीच्या माथ्यावर उगवती आहे आणि अंधारातून प्रकाश अवतरणारच आहे अशा उमेदीने काळाला सामोरे जात जात पुढे पाऊल पुढे टाकणे हेच केव्हाही श्रेयस्कर नव्हे काय ?"💐
# वैजनाथ महाजन
4
💐 'क्यू कॉमर्स':"झटपट सारे घरोघरी !":💐
👍"सर्व वस्तूंची बारा महिने उपलब्धता आणि हातात खेळणारा भरपूर पैसा यामुळे गरजेच्या वस्तू आणि चैनीच्या वस्तू यामधला फरकच दूर झाला आहे किंवा नष्ट झाला आहे आणि याकरता कारण म्हणजे मनात आले खरेदी केले अशी सवय लागली आहे यात जेवढे पैसे खर्च होत आहे त्यापैकी किती आवश्यक होते आणि किती अनावश्यक याचा विचार प्रत्येक कमावत्या व्यक्तीने करायला हवा ही आळशी आणि बेफिकीर वृत्ती हळूहळू दैनंदिन जीवनातही येते आणि त्याची सवयच होते हे लोण म्हणून समाजात सर्वत्र पसरत आहे हा सगळ्यात मोठा धोका आहे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक कल्पनातीत गोष्टी प्रत्यक्षात अनुभवायला मिळतात अशी प्रगती व्हायलाच हवी आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला तिचा लाभ मिळायलाच हवा पण प्रत्येक तंत्रज्ञानाच्या वापराची एक किंमत असते तिच्याकडेही सजगतेने प्रत्येकाने पाहणे आवश्यक आहे आणि जैन आणि सोय यामध्ये सीमारेषा पुसट असते त्यांच्यामध्ये समतोल राखला तरच तंत्रज्ञान आपल्या मित्राप्रमाणे शेजारी येऊन बसते अन्यथा ते भुतासारखे बानगुटीवर बसून आपल्याला अनेक प्रकारे खेळू शकते ई-कॉमर्स क्यू कॉमर्स कृत्रिम प्रज्ञा रोबोट आपल्या आयुष्यात रोज काही ना काहीतरी घेऊन नवीन नवीन येणार आहेतच त्यांचा वापर किती मर्यादेपर्यंत करायचा याचा निर्णय प्रत्येकाने आपल्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून घ्यावा !":👍
# पूनम छत्रे
5
👍"मध्यमवर्गीय नातेसंबंध"-'एक कोरडे वाळवंट' !":👍
💐 "एक जुना समाजशास्त्रीय सिद्धांत आहे त्यानुसार कुठलाही समाज जसा जसा अधिक आर्थिक व बौद्धिक दृष्ट्या उन्नत होत जातो तस तसा तो भावनिक दृष्ट्या अधिक रुक्ष अधिक कोरडा व रोखठोक व्यवहारी होत जातो आपल्या सर्वांचे हेच तर झालंय आपल्या सर्वांना चांगले शिक्षण मिळत गेले व्यवसायाच्या नोकरीच्या उत्तम संधी व साहजिकच उत्तम पैसा मिळत गेला आणि अशा आर्थिक उन्नत समाजात फक्त उपभोग्य वस्तूंकडेच तर माणसं व नातेसंबंधांकडे आपण उपयोगिता मूल्याचा निकष म्हणून पाहू लागलो माणसे फक्त नुसती माणसे आपल्याला नको असतात हाती मुबलक पैसा आल्याने माणसांची निकड व गरज आपल्याला वाटेनाची होते आणि जे उपयोग काचे नाही ते सारे बाजूला सारायचे या नियमानुसार आपण अशा माणसांचा व नातेसंबंधांचा ना दूर चारू लागतो व ती माणसेही आपल्यासारखीच असल्याने ती देखील आपल्याला दूर चारू लागतात नीट विचार केला तर आजकालच्या नात्यात भांडणे भाऊबंदकी मालमत्ता वाद वैमनस्य असले कुठलेही कारण नसते तरीही ती नाती संपुष्टात येतात आणि त्याचे एकच कारण आधी संपर्क व नंतर सहवास संपतो पर्यायाने प्रेम संपते कुठल्याही नात्यात ते नाते संपायला प्रेम संपते हेच एक कारण असते. आपल्या मध्यमवर्गीयांच्या नातेसंबंध बाबत त्यामुळे त्याची स्थिती वरवर तरी 'दिसतात मनोहर, परि गमतात उदास !' अशी आहेत, असेच म्हणावे लागेल !":💐
# चंद्रशेखर देशपांडे
या दिवाळी अंकातील कविता आणि कथा याविषयी रसास्वाद पुढच्या भागात !
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५
" कारण हे असे नकोसे राजकारण ":
🤣 " कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र":🤣
😊 " महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच/सहा वर्षे ज्या उचापती आणि उलथा पालथी झाल्या आणि निवडणुकीनंतर राक्षसी बहुमत मिळवूनही, पुन्हा 'येरे माझ्या मागल्या'प्रमाणे गोंधळात गोंधळ चालू आहेत, त्यांचे जर सोप्या भाषेत विश्लेषण आणि सार काढायचे झाले तर....
"A Selfish Leader in hurry, takes a (wrong) decision suitable for his short term gains at the cost of his long term losses; whereas a shrewd leader politely accepts his short term losses and ensures his elusive long term gains and stability at the cost of 2 hoots to ethics & morality !"
पिक्चर अभी बाकी है !.....
'कराल घाई, तर होईल पळता भुई थोडी !
अन्
'संयम आणि सबुरी यशाची खात्रीच न्यारी !
:💐
शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५
" कशासाठी आक्रोश ?":
" 9 वर्षापूर्वीचा माझा "फेसबुकवरील संदेश !":
आताही काही बदल नाही ?":
११/१२
क्रुपया नीट वाचा आणि कशा कशासाठी, आक्रोश करावयाचा ते ठरवा:
१. आपण काळा पैसा निर्माण होणे थांबवू शकलेलो नाही व काळा पैसा बाळगणार्यांवर कारवाई करू शकलेलो नाही. 'गोंधळी' नोटबंदीसारखा, सरळमार्गी जनसामान्यांचे हाल करणारा उपाय, आपल्या यंत्रणेचा ह्या समस्येची सोडवणूक करण्याबाबतच्या अकार्यक्षमतेची, पराभवाची कबूली देतो.
२ आपण स्त्रियांवरील अत्याचार नाहिसे वा कमी करू शकलेलो नाही.
३ आपण बड्या कर्जदारांकडून कर्जाचे पैसे, जसे परत मिळवू शकलेलो नाही, वा त्यांना यथोचित शिक्षा करू शकलेलो नाही.
४ आपण परदेशातील काळा पैसा परत आणू शकलेलो नाही.
५ आपण परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगाराना परत आणून जबर शिक्षा देवू शकलेलो नाही.
६ आपण, कार्यक्षम सुरक्षित, सार्वजनिक वहातूक व्यवस्था निर्माण करू शकलेलो नाही.
७ आपण, सगळीकडे होत असलेला भ्रष्टाचार व सत्तेचा दुरूपयोग थांबवू शकलेल़ो नाही.
८ आपण, देशातील वाढती बेकारी नाहीशी करू शकलेलो नाही.
९ आपण, रस्त्यांवरील खड्डे, व पार्कींगचे प्रश्न जसे सोडवू शकलेलो नाही, तसेच वाढते अपघातही कमी करू शकलेल़ो नाही.
१० आपण सुरक्षित रेल्वेप्रवास देऊ शकलेलो नाही.
११ आपण, वाढती अनधिक्रुत बांधकामे व झोपडपट्ट्या नाहीश्या करू शकलेलो नाही.
१२ आपण सार्वजनिक आरोग्यव्यवस्था व स्वच्छता सुधारू शकलेलो नाही.
१३ आपण निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवू शकलेलो नाही व गुन्हेगारांना दिला जाणारा राजकीय आश्रय तसेच घोडेबाजार थांबवू शकलेलो नाही.
१४ आपण व्यवसायाभिमूख शिक्षणव्यवस्था निर्माण करू शकलेलो नाही.
१५ आपण आरक्षणाचा प्रश्न, सर्व घटकांंना समाधान होईल अशा तर्हेने सोडवू शकलेलो नाही, त्यामुळे होणारा गुणवत्तेचा ह्रास थांबवू शकलेलो नाही.
१६ आपण, काश्मिरचा व पाकिस्तानच्या छुप्या दहशतवादाचा प्रश्न सोडवू शकलेलो नाही.
१७. आपण, युनोच्या सुरक्षा परिषदेतील प्रवेश मिळवू शकलेलो नाही.
१८ आपण लोकाभिमूख सर्वांगीण विकास साधू शकलेलो नाही, तशीच विदारक आर्थिक विषमता, जीवघेणी गरिबी नष्ट करू शकलेलो नाही.
१९. निरक्षरता, वाढती लोकसंख्या, मुलींचे कमी होत जाणारे प्रमाण, हिंसाचार, गुन्हेगाराना वेळीच पकडून शिक्षा देणे, ह्यासारखे मुलभूत प्रश्नही सोडवू शकलेलो नाही.
२०. आपण समान नागरी कायदा आणू शकलेलो नाही.
२१. आपण पर्या्वरणाची होणारी हानी रोखू शकलेलो नाही.
दुर्दैवाने, ही कदाचित पूर्ण यादी नसेल व आक्रोश करण्याशिवाय, आपल्या हातात काहीही नसेल. अर्थात, तो केला वा न केला, तरी हे सारे आपण कधी, कसे बदलू शकणार हाच आजचा यक्षप्रश्न आहे.
'सुदिना' २७/११/'१६
" शारदोत्सव- अनुराधा दिवाळी अंक 25 !":
संपादक
अनुराधा दिवाळी अंक'25
सादर वंदन,
मी, श्री सुधाकर नातू एक ज्येष्ठ नागरिक. वाचनाची मला खूप आवड आहे. दरवर्षीचे अनेक दिवाळी अंक मी नेेहमी वाचत असतो.
आपल्या ह्या वर्षीच्या दिवाळी अंकातील अनुक्रमाणिकेसंबंधी मला हा अनाहूत संदेश पाठवावासा वाटला:
सहसा कुठल्याच दिवाळी अंक मला तरी अशी अनुक्रमणिका पाहिल्याचे आठवत नाही. म्हणून प्रथमच मत व्यक्त करतो की,
😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭
आपल्या दिवाळी अंकात 35 कथा 13 लेख आणि 13 कविता आहेत. त्यातील प्रत्येक साहित्यकृतीचे शीर्षक त्या त्या लेखकाच्या नांवासमोर कां दिले नाही, हे मला पडलेले कोडे आहे. कोणतेच विशेष प्रसिद्ध लेखक व लेखिका या नसताना केवळ नावे आणि पृष्ठ क्रमांक आपण देऊन काय साधले, कुणास ठाऊक !
अशा वाचकांना त्रासदायक अनुक्रमणिका असलेल्या तुुमच्या दिवाळी अंकातील
साहित्यकृती वाचताना वाचताना प्रथम पान नंबर अनुक्रमणिकेत बघायचा आणि मग त्या प्रुष्ठावरील शीर्षकावरून ती साहित्यकृती वाचायची की नाही ठरवायचे असेच मला करावयास लागले. हा असा द्राविडी प्राणायाम निदान आपण कविता विभागाचे बाबतीत तरी टाळू शकला असतात.
कदाचित लेखकाचे नांव, व शीर्षके प्रत्येक साहित्यकृती बरोबर देण्यासाठी अजून एक पान अधिक खर्ची घालावे लागले असते, म्हणून आपण अशी खटकणारी अनुक्रमाणिका बनवली की काय, एवढेच मला शेवटी वाटले.
कथा मला विशेष वाचाव्याशा वाटतच नाहीत- "पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने !" मात्र कथेबरोबर चौकटीमध्ये त्याचा सारांश आपण दिला असतात तर बरे झाले असते. बहुतेक संपादक असा वेधक सारांश कटाक्षाने नेहमी देतात.
उदाहरणार्थ 'यू टर्न' या कथेच्या बाबतीत "एक तरुणी, तिच्या मागे लागलेला तिचा बॉस आणि तिसराच एक तरुण तिच्यावरील त्याचे प्रेम व्यक्त करतो. परंतु ती त्याला, तिला वाटणारे संयुक्तिक कारण देऊन नकार देते: कारण तिला मूल होऊ नये असे वाटत असते. पण त्या तरुणाच्या कोकणातील घरी मी दोघे जाऊन आल्यावर तिथे मतपरिवर्तन कसे होते ते या कथेत वाचा..."
'इच्छामरण' ही कथा नसून एक वैचारिक लेख असल्यामुळे तो त्या विभागात समाविष्ट केला असता तर चांगले.
मात्र अंकातील बहुतेक ललित लेख आणि कविता मी वरील सोपस्कार पूर्ण करून वाचले. ते निश्चितच वाचनीय, विचार प्रवर्तक वैविध्यपूर्ण विषयांवरील आहेत, हाच काय तो मला या दिवाळी अंकांने दिलेला दिलासा.
परखड मताबद्दल क्षमस्व.
धन्यवाद.
सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५
"सोमिवरील वेचक वेधक !":
*तसंच जाऊ नको !*
————————
घरी आलेल्या कुणालाही *‘तसंच’* पाठवायचं नाही आणि आपण कुणाकडे जाताना *‘तसंच’* जायचं नाही हा आमच्या घरचा शिरस्ता!
या *‘तसंच’* मधे जगभरचा पाहुणचार सामावलेला होता.
माझे कुणी मित्रमैत्रीण ठरवून आले की बटाटेवडे कर, अचानक आले तर त्यांच्या आवडीचा गोडाचा शिरा नाहीतर सांजा कर.. अगदीच वेळ नसेल तरी धडपडत उठून किमान “सफरचंदाची एक फोड तरी खा” म्हणत ती हातावर दे..
आई-बाबांचे ऑफिसमधले कुणी पाहुणे आले तर किमान चहा तरी कर ..
नातेवाईकांपैकी कुणी येणार असेल तर खास आवडी-निवडी जप हे सारं अध्याहृत होतं.
हे सगळं करताना आई-आजीच्या चेहऱ्यावर कधी आठी यायची नाही, श्रम दिसायचे नाहीत, त्यांचं स्मितहास्य लोपायचं नाही… *इतकं ते सारं सहज होतं! सहज होतं म्हणून सुंदर होतं!*
पाहुण्यांसाठी असलेल्या ह्या नियमाला एक पोटनियमही होता. आपल्याच घरातून निघतानाही *‘तसंच’* निघायचं नाही घरातल्या सर्व माणसांसाठी उपनियम!
सकाळचा चहा पिऊन झालेला असला तरी, “‘तशीच’ जाऊ नको कॉलेजला!” असं म्हणत आजी तूपसाखर लावलेली एक पोळी घेऊन माझ्या मागे उभी असायची.
मनसुखानी नावाचा प्रोफेसर त्यावेळी आम्हां मुलींमध्ये भारीच फेमस होता. आमच्या गप्पातून आजीला हे कळलं असावं. आणि मग..
“आजी, उशीर होतोय ग.. नकोय मला.. मी जाते तशीच” असं म्हणण्याचा अवकाश…
ती त्या मनसुखानीच्या नावाने बोटं मोडायची.
“त्या मनसुखानीला म्हणावं एवढी पोळी खाल्ल्याशिवाय माझी आजी काही मला *‘तशीच’* सोडत नसते. बाकी तू तुझं बघ” असा तिचा राग उफाळून यायचा पण घरातून निघताना *‘तसंच’* जायचं नाही हा तिचा नियम आम्हाला पाळायलाच लागायचा.
आपण कुणाकडे जातानाही *‘तसंच’* जायचं नाही हा या सगळ्याचा व्यत्यास.. तो ती तितकाच खरा होता. आत्याकडे जाताना खास ठेवणीतल्या *लोणच्याची बाटली* भरली जायची. मावशीला आवडतात म्हणून घारगे व्हायचे.. एक ना दोन! यातलं काहीच नाही जमलं आणि अचानक कुणाकडे जावं लागलं तर *जाता जाता द्राक्ष घे.. चिकू घे*, असलं काही न काही त्या करायच्या.
हे सगळे सोपस्कार आई-आजी पाळायच्या इथपर्यंत ठीक! पण मी माझ्या शाळा-कॉलेजच्या वयात काही कामासाठी कोणाकडे एकटीच जातेय तरी या *‘तशीच’ जाऊ नको गं* म्हणायच्या आणि मग मात्र माझी चिडचिड व्हायची. मी कधी ऐकायचे पण अनेकदा त्या-त्या वयातल्या न ऐकण्याच्या नादात ‘तशीच’ निघून जायचे. लहान आहे.. मोठी होईल तेव्हा कळेल असं म्हणून सोडूनही द्यायच्या!
एकदाच आजीने या चिडचिडीवरचा उतारा केला.
मला म्हणाली, *“कपभर चहाही न देता कुणाला ‘तसंच’* पाठवशील किंवा *रिकाम्या हाताने कोणाकडे जाशील..* तर आपल्या घरातलं काही जाणार नाही.. पण ‘पत’ मात्र जाईल. ज्याला *ऐपत* आहे, त्याने *पत* सांभाळावी”
आजही माझ्या आणि माझ्या सारख्या अनेक घरातून *‘तसंच’* कुणी जात नाही आणि आपणही *‘तसंच’* कुणाकडे जात नाही.
*काय करणार..?*
*आजी नावाची मौल्यवान विद्यापीठं शब्द पेरून आसपासच वावरत असतात.*
*...सुप्रभात...*
##########₹
Another fire—this time in a Goa nightclub—and dozens dead. India finds itself at the same place every few months: Non-existent safety regulations, businesses running illegally and reactive action over proactive precaution. We continue to live from one firefight to another. The culture of safety remains up in flames.
IndiGo wants sympathy for a crisis of its own making. Govt must hold the line
IndiGo’s meltdown isn’t an innocent mistake, a “misjudegment” or a mystery. FDTL norms were a long time coming. Instead of preparing, the country’s biggest airline fought the reform and continued to squeeze its staff. It now wants sympathy for a crisis of its own making. Government must hold the line.
Telangana naming roads after Trump, Tata shows CM Reddy is letting economics drive politics
Telangana government’s decision to name roads after US President Trump, Ratan Tata and Google is laudable. Competition between states to attract investors is prompting them to adopt novel strategies. CM Revanth Reddy is letting economic imperatives drive political priorities. It’s good to see a Congress CM wearing a thinking cap
🌺🌺 🌺🌺
शनिवार, २२ नोव्हेंबर, २०२५
😀 "आत्मनिर्भर व्हा ! नोकरी नको, तुम्हीच तुमच्या व्यवसायाचे मालक व्हा !"😀
😀 "आत्मनिर्भर व्हा ! नोकरी नको,
तुम्हीच तुमच्या व्यवसायाचे मालक व्हा !"😀
स्वतःच्या कल्पना आणि कौशल्यांचा वापर करून आर्थिक लाभ मिळवण्याचे संभाव्य मार्ग. या खास लेखात उलगडलेला आहे.
आत्मनिर्भर होणं हे खरोखर गरजेचं आहे हे मला जाणवलं आणि त्यामुळे स्मार्टफोन हातात आल्यापासून मी निवृत्त झाल्यानंतर काही वर्षांनी उद्योग असे वेगवेगळ्या प्रकारचे करायला लागलो ते म्हणजे माझ्या मधली जी कल्पना शक्ती लेखन करण्याची आवड बोलण्याची आवड यामधून कम्युनिकेशन वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्री अशा तऱ्हेच स्वरूप त्याला दिलं आणि त्याचा एक लेटेस्ट रिपोर्ट मी पुढे आपल्या पुढे मांडतो आहे.
👌 Monthly Progress Report 30/9/'25:👌
💐"Moonsun Grandson !":💐
👌"One Man Communication Industry !": 👌
Mr. Sudhakar Natu ":
# 'प्रगतीची क्षितीजे' ह्या महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट पुस्तक पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे लेखक...
# रंगांची दुनिया-फेसबुकवरील समुह: संस्थापक व Admin 3 years
1 moonsun grandson blog:
679 articles
2 मुक्तसंवाद channel on you tube: videos:
3 आकाशातील पाळणे whatsapp अभिवाचन मंच: 403
4 स्वरानंद: 122
5 बोल अमोल: 340+
6 छाप (पड)लेले शब्द: 130+
7 माझी कथा: आठवड्यात 2/3
8 bookganga.com वर 17 ebooks
Latest...
9 कुठेतरी काहीतरी चुकतंय: 9
10 आशेला अजून वाव आहे: 5
Mission: "ह्या ह्रदयाचे त्या ह्रदयी !"
Be a witness to
कल्पनांची आकाशगंगा !!....
One Man Communication Industry":
Sudhakar Natu ":👌
त्यामधून लक्षात येईल की उत्तरोत्तर नवनवीन कल्पनांना योग्य ते रूप देऊन मी माझा हा जो सध्याच्या परिस्थितीत कुठलाही इन्कम नसणारा व्यवसाय म्हणा किंवा उद्योग केला त्यामध्ये मला चांगल्यापैकी यश मिळत गेले आहे एक साधं उदाहरण म्हणजे आम्ही माझ्या मनामध्ये कल्पना आली की माझे जे लेख आहेत माझं जे लिखाण आहे त्याचा ऑडिओ स्वरूपात आपण जर लोकांपर्यंत मांडलं तर चांगलं होईल मला नाव पण चांगलं सुचलं आकाशातील पाळणे सुदैवाने मला माझा भाचा उदय पिंगळे हाही या कल्पनेला साथ देणारा मिळाला आणि तो उत्तम असा अभिवाचक असल्यामुळे त्याने माझ्यासाठी आपल्या या कल्पनेसाठी रेकॉर्डिंग करून ध्वनिफीती बनवायचं मान्य केलं मी स्वतःही माझ्या स्वतंत्र अशा ध्वनिफीती बनवतच असे आमच्या दोघांच्या या सहकार्याने आम्ही तीन वर्षांपूर्वी आकाशातील पाळणे हा अभिवचन मंच सुरू केला आणि मला सांगायला आनंद वाटतो की योग्य त्या प्रचार अशा शैलीमुळे माझा ऍडव्हर्टायझिंग पब्लिसिटी चा बॅकग्राऊंडचा अनुभव असल्यामुळे आम्ही उत्तरोत्तर आमची ही संकल्पना विलक्षण लोकप्रिय करू शकलो आणि आज तीन वर्ष पूर्ण झाल्यावर सुमारे 400 हून अभिवाचने आम्ही प्रकाशित केली आहेत त्यामध्ये अनेक विषयांना हाताळणी केलेली आहे साहित्य कला नाटक व्यवसाय उद्योग अर्थव्यवसाय ज्योतिष अशा अनेकानेक विषयांचा परामर्श घेणारा अभिवाचन मंच उत्तरोत्तर पॉप्युलर होतोय आणि आमचे जवळजवळ पावणे 400 सदस्य आहेत अर्थात या अशा वळणावर आज सकाळी मला वाटलं की आपण आता आपल्या या ज्या कल्पना आहेत त्यामधून काही व्यावसायिक आर्थिक असा लाभ मिळवू शकतो का असं वाटलं आणि म्हणून मी विवेचन करत आहे पहिली संकल्पना अशी आहे की माझा स्वतःचा एक स्वतंत्र youtube चॅनेल आहे त्यामध्ये देखील जवळजवळ पावणे 200 व्हिडिओज प्रकाशित केले आहेत त्यामधील निवडक अशा व्हिडिओंचा ज्यामध्ये कदाचित ऑडिओचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्या त्यामधील जो ध्वनिरूप पोर्शन असेल त्या पोर्शनचा ऑडिओ टू टेक्स्ट असं रूपांतर करून त्याचं एखादं पुस्तक ई बुक बनवता येईल का कारण ऑडिओ टू टेक्स्ट हे ॲप वापरून त्या तऱ्हेची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल निवडक असे 10 ते 15 असे व्हिडिओज मी निवडू शकतो आणि जर शक्य असलं तर त्याचं ऑडिओ टू टेक्स्ट बनवून ई बुक्स द्वारे बुकगंगा सारख्या प्लॅटफॉर्म वर प्रकाशित करू शकतो हीच कल्पना मी मनात ठेवून माझी अनेक ई बुक्स देखील बुकगंगा डॉट कॉम या प्लॅटफॉर्मवर प्रकाशित केली आहेत आणि उत्तरोत्तर त्याला आज नाही उद्या योग्य ते असे आर्थिक लाभ होऊ शकतील तर ही पहिली संकल्पना आहे की त्या ऑडिओ पोर्शन सिलेक्ट अशा ऑडिओ पोर्शन योग्य अशा स्वरूपात ई बुक बनवणं छापील नव्हे पण वर्ड मध्ये टेक्स्ट मध्ये बनवणं ही पहिली कल्पना आहे दुसरी कल्पना अशी आहे की आजचा आकाशातील पाळणे हा जो काही आमचा अभिवाचन मंच आहे तो अशाच एखाद्या रेगुलर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जोडला जाऊन त्यामध्ये आपल्याला दोन कल्पना मांडू शकतो एक म्हणजे आठ ते दहा अशा याचा संच निर्माण करून ऑडिओ पोर्शनचा दिवाळी अंक काढू शकतो आणि तो प्रकाशित करू शकतो तेव्हा ते सिलेक्टेड 10 ते 15 ज्याप्रमाणे योग्य अशा योग्य अशा टाईम फ्रेम अर्धा तास योग्य असेल तर अर्धा तास 15 मिनिटं योग्य असेल तर 15 मिनिटं अशा तऱ्हेचे ऑडिओ किंवा साधारण एक तासाचे ऑडिओ बनवू शकतो आणि त्यात ते दिवाळी अंक म्हणून प्रकाशित करू शकतो इथे ऑनलाईन प्लॅटफॉर्म सारखे व्यावसायिक असेंबलिंग वगैरे अशी करू शकतात तसेच नंतर हा जो दिवाळी अंक आहे तो त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करू शकतात ही ती संकल्पना आहे अजून एक या मुद्द्याचीच तिसरी संकल्पना अशी आहे की हे जे काही आमचे 400 आतापर्यंत भाग झाले आहेत हा जणू काही एक डेटा बँक आहे असं समजून बुकगंगा सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्याच्यामधील सिलेक्टेड उत्तमोत्तम असे ऑडिओ प्रकाशित करायचे आणि त्यासाठी योग्य वर्गणी ठेवायची की तुम्ही याचे सभासद व्हायची तयारी असेल तर एक ठराविक रक्कम महिना म्हणा वार्षिक म्हणा अशी चार्ज करायची तेव्हा ह्या कल्पना मी मांडल्या आहेत आणि त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्या मधलं कौशल्य आणि कल्पना यामधून तुम्हाला आर्थिक लाभाचे मार्ग सापडू शकतात तेव्हा आजचा हा जो आपली ही मालिका चालली आहे की आत्मनिर्भर व्हा तुम्हीच तुमच्या व्यवसायाचे मालक व्हा याचा दुसरा भाग हा इथे मांडला आहे आपण जरूर विचार करा आणि मला त्याचा प्रतिसाद द्या
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
😄"सध्याच्या काळात मुलांना कसं वाढवायचं ?":😀
"आज-काल मुलांना खूप लाडानं वाढवलं जातं आई वडील दोघेही मिळवले असतात त्यामुळे बराच वेळ खराब आहे रस्ता साहजिकच ते मूळ वाढत असताना प्रथम डे केअर आणि नंतर शाळेमध्ये आणि कोणाच्यातरी पालकत्व खाली दिवस काढत असते त्याचा वेळ जावा म्हणून त्याचे सगळे लाड पुरवले जातात अशा तऱ्हेने वाढलेली मुले जेव्हा मोठी व्हायला लागतात आणि स्पर्धेच्या जीवनामध्ये प्रवेश करतात तेव्हा आई-वडिलांच्या अपेक्षा खूप वाढत जातात आणि त्यामुळे त्या मुलाने किती मार्क मिळाले इतरांनी किती मार्क मिळवले याचा पुढे कसं होणार अशा चिंता त्यांना ग्रस्त करतात आणि त्याच त्या मुलांच्या मागे लावून त्यांचे जीवन अक्षरश: वेगवेगळे क्लासेस अभ्यास याच्यात घालवायची वेळ येते त्यामुळे ती मुलं एकांगी बनतात.
सगळे लाड पुरवले गेल्यामुळे अशी मुलं शेवटी खरोखर नैराश्याच्या अशा विचित्र विश्वास ढकलली जाऊ शकतात अशा वेळेला प्रश्न पडतो की पालकांनी आई-वडिलांनी मुलांना वाढवायचं कसं खरोखर आजच्या पिढीला हा एक मोठा असा प्रश्न समोर उभा राहिला आहे आणि त्याचं निश्चितच उत्तर सध्याच्या अत्यंत संघर्षमय जीवनात नाही हे खरं असलं तरी या पार्श्वभूमीवर मला एका मित्राची गोष्ट आठवते माझ्याच वयाचा त्या मित्रांनी मला सांगितले तो जेव्हा मॅट्रिकला होता त्यावेळेला त्याला जास्त मार्क मिळाले नाही 40 /45 टक्के त्यामुळे इतर मुलांच्या तुलनेत त्याला खरोखरच कमी मार्क होते पास झाला एवढंच तो घरी आल्यावर वडिलांना त्यांनी सांगितलं मी पास झालो तेव्हा वडिलांनी त्याला ओरडले नाहीत. पण आईला वाटले की याने शक्यतोवर पेढे वाटलेले फरक पडेल. तिने मुलाला सांगितले तू पेढे घेऊन ये. तो चकित झाला पण आई मागेच लागली त्यामुळे तोही पेढे आणायला गेला पेढे आणले घरातल्या सगळ्यांना दिले मग आई म्हणाली आता बाकीच्या बाहेरच्यांना जाऊन ते दे !
तो गेला आणि अक्षरश: एक-दोन घरी गेल्या गेल्याच परत आला आई म्हणाली अरे परत का आलास वेळेचं भरपूर आहे तो मला नाही ग आई मी जेव्हा मावशींकडे गेलो त्यांना सांगितलं मी पास झालो अरे पण किती टक्के मार्क कमी म्हटलं पण जास्त टक्के तर त्या म्हणाल्या अरे एवढे कमी टक्के आणि तू पेढे वाटतो कमाल आहे ! ते मला खरोखर मनाला लागलं. दुसऱ्या घरी गेलो तिथे तेच म्हणून मी परत आलोय आणि मला काही आता पेढे वाटायचे नाहीत. मुलगा आईला म्हणाला कसं बोलणार काय बोलायचं ते सांग. आईने त्याला सांगितले की तू कमी मार्क का मिळवलेस ते कारण सांग मी अभ्यास नाही केला. मला कमी मार्क मिळाले खरं आहे पण त्यामुळे मला कळलं की, मागच्या वर्षी मी काय करायला हवं होतं आणि काय करायला नको होतं ते !
हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला माझी आठवण झाली माझ्या आई-वडिलांनी मला कसं वाढवलं याची मला आठवण नाही मी तसा हुशार मुलगा साधारण एफवाय सायन्स पर्यंत मला उत्तम 70 75 टक्के मार्क मिळाले म्हणून माझ्या वडिलांनी मला चांगल्या प्रकारे अभ्यास करायला कोणी मिळेल आणि अभ्यास करणे बऱ्यापैकी गप्पा मारत टाइमपास करत वेळ घालवला त्यामुळे मला त्या मानाने कमी मार्क मिळाले आणि म्हणून मला मुंबई बाहेरच्या एका गावामध्ये बाजार शहरांमध्ये इंजिनिअरिंगची ऍडमिशन त्यामुळे मी खरोखर मनातून नाराज होतो पण वडील त्यामानाने मला काहीही बोलले नाही ऍडमिशन मिळाल्यावर माझे एडमिशन करण्यासाठी ते स्वतः माझ्याबरोबर त्या गावाला आले ऍडमिशन करून दिली रायची व्यवस्था केली आणि ते परत झालं काय लहानपणापासून मी मुंबईत वाढलेला आणि त्याच्यातून घर कोंबडा सारखे आई वडील आणि आपले नातेवाईक या रमलेला त्यामुळे राहिलं नाही आणि असे पाच सहा महिने गेल्यानंतर मी एकदम आजारी पडलो मी लगेच घरी तयार करून हा सिरियस आहे तर आई वडील विचारले आणि अधिक चांगलं बरं वाटावं म्हणून त्यावेळेला सुट्टी कॉलेजला असल्यामुळे माझ्या आई-वडिलांनी मला कुठल्याही प्रकारे काहीही बोलले नाही आणि असेच दिवस झाले गेल्यावर मी बरा झालो आणि जायचा दिवस आहे कसं चालेल तर तू जा कारल्याप्रमाणे उलटी बस पकडून सामान घेऊन परत ये आपण जून नंतर तुला बीएससी ला घालू एवढेच फक्त कुठल्याही प्रकारचा राग नाही समताप नाही काही अत्यंत शांतपणे होती मी दुसऱ्या दिवशी गेलो तिथे गेल्यावर काय झालं गंमत मला माहित नाही मला चांगल्या प्रकारे मला जाणवलं की आपले आई-वडील आपल्याला तुमच्या कला मी असे वाढवत होते त्यामुळे आम्ही दोघांनी आणि माझ्या पत्नीने देखील आमच्या मुलांना तसेच वाढवलं इतर पालक हात धुवून मागे लागायचे आम्ही कधीही मुलांवर कोणतही अभ्यासाचं दडपण आणलं नाही आणि त्यामुळे त्या मुलांना कधीही आम्ही ओरडलो नाही. तुम्हाला ज्या कोर्सला जायचंय त्या कोर्सला जा असा त्यांना नेहमी सल्ला देत आलो या मनमोकळ्या वागण्यामुळे त्यांनी देखील आपापले कर्तृत्व सिद्ध केले.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
😇 "पुणे तिथे काय उणे !":😇
😇 "पुणे तिथे काय उणे !":😇
"इथे मला सांगायची आहे, अचानक ती घटना घडली आणि आमच्या पायाखालची वाळूच घसरली. सकाळी नेहमीप्रमाणे आम्ही फिरून घरी आलो आणि घरी आल्यावर सौभाग्यवतीने डायबिटीसच्या गोळ्या नाष्ट्याआधी घ्यायच्या, त्याच्यातली एक जरा मोठी असणारी गोळी घ्यायचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने ती घशातच अडकली आणि अडकल्यामुळे तिचा जीव कासावीस व्हायला लागला. मी त्या वेळेला बाजूलाच होतो आणि आम्ही खूप प्रयत्न केला ती गोळी बाहेर काढायचा, परंतु काही केल्या ती गोळी निघेचना.
अखेर एवढी वेळ आली की तिला कासावीस व्हायला लागलं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये जायचा आम्ही विचार केला.
पण आमच्याकडे कुठलेही वाहन नव्हते जवळपास बाहेर जायचे तरी त्या कॉम्प्लेक्स मधून चालायला लागले असते आणि बाहेरही रिक्षा तर नाहीच आणि उभर टॅक्सी वगैरे बोलवायला खूप वेळ ही लागला असता त्यामुळे काय करावे हे अक्षरच्या सुचेना.
तेवढं होत असताना आमचे प्रयत्न चालूच होते तिच्या घशातली गोळी बाहेर काढायला पण प्रत्यक्ष महत्त्वाचा होता देवाचे नाव घेण्याविना दुसरे काहीच हातत नव्हते !
प्रश्न असा आहे की, आम्ही इथे पुण्याला बावधनला काही दिवसांसाठी आलो होतो आणि या जीवघेण्या प्रसंगामुळे आणीबाणीच्या वेळी लक्षात आलं की पुण्यामध्ये काय होऊ शकते. ह्या अनुभवामुळे तर आम्हाला अधिक जाणवलं की इथे कुठे रिक्षा जवळपास नाही उबर किंवा कोणी बोलवायचं तर त्यालाही वेळ लागणार हॉस्पिटल कसं बऱ्यापैकी लांब जवळपास इथे फॅमिली डॉक्टर सारखे डॉक्टरच नाहीत. त्यामुळे खरोखरच आम्हाला त्या क्षणाला काय करायचं काय करायचं नाही काही सुचतच नव्हतं इतकी त्रास भीषण अवस्था झाली होती कारण घशामध्ये अडकलेली गोळी प्राणाखात काही ठरू शकते या कल्पनेने आम्हा दोघांना खरोखर थरारक असा हा अनुभव आला .
मुंबईमध्ये कुठेही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खरोखरच त्यामानाने चांगली आहे. परंतु पुण्यामध्ये स्वतःच वाहन नाही, ज्याला स्वतःला गाडी चालवता येत नाही, त्याचे अशा कठीण आणीबाणीच्या प्रसंगी काय हाल होत असतील त्याची कल्पना आली. त्या दृष्टीने खरोखरच सर्वांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे की, इथे चांगल्यापैकी वाहतूक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्हायला हवी. मुंबईला जशा काळ्यापिवळ्या taxis आहेत त्याचप्रमाणे इथेही का नाही हा एक प्रश्न मनात येतो. तेव्हा सर्व नागरिकांनी आणि संबंधित शासनव्यवस्थेने पुण्यासारख्या शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा जातीने प्रयत्न केला पाहिजे. आता कोणी म्हणेल की मेट्रो ही देखील त्याच्यावरचा उपाय आहे. परंतु मेट्रो कितीही झालं तरी सगळीकडे पोहोचणारे नाही. तर त्या दृष्टीने बस वाहतूक सुरळीत करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये आमुलाग्र सुधारणा होणं आवश्यक आहे.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५
😃 " युक्तीची किमया !":😃
😄 "युक्तीची किमया !":😄
😆 आज मला दैनंदिन व्यवहारात युक्तीचे महत्त्व किती आहे, त्याबद्दल महाभारतातील उदाहरणे घेऊन सांगायच आहे. महाभारतात दुर्योधन आणि अर्जुन क्रुण्णाकडे जातात आणि अर्जुन मात्र कृष्णाकडे यालाच मागतो आणि दुर्योधन नारायणी सेना मागून शेवटी हरतो. खरोखर नंतर फक्त इथे अर्जुनाला क्रुष्ण जे जे सहाय्य करतो ते त्याच्या प्रतिज्ञाप्रमाणे. तो काय म्हणतो न धरी शस्त्र करी मी, सांगेन गोष्टी युक्तीच्या चार !
जेेव्हा महाभारताच्या कुरुक्षेत्रावरील महायुद्धाच्या आरंभी, जेव्हा अर्जुन गल्लीतगात्र होतो आणि युद्धास तयार होत नाही, तेव्हा खरोखर कृष्ण जे करतो ते अजरामरच. त्यावेळेला तो गीतेतून त्याला जो काही उपदेश करतो आणि त्याची एकंदर मनोवृत्ती बदलून टाकतो, युद्धाला त्याला तयार करतो, कर्तव्याला तयार करतो. ही त्याची पहिली अशी युक्ती असं म्हणावं लागेल.
त्यानंतर जागोजागी प्रसंग आले की, त्याची युक्ती शेवटी फळाला येते. खरं म्हणजे पांडवांकडे अर्जुन आणि भीम हे दोन महायोद्धे सोडता, कौरवांच्याकडे त्यामानाने अतिरथी महारथी असूनही हंया महायुद्धात त्यांचा पराभव झाला कारण कृष्णाची युक्ती ! द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण असे एकाहून एक सर्वच महायोद्धे, महावीर असूनही शेवटी पांडवांचा विजय झाला. याला कारण कृष्णाची युक्ती.
भीष्म ज्या वेळेला खरोखर अजेय अशा तऱ्हेचा पराक्रम करत असतात, त्या वेळेला कृष्णच शिखंडाला अर्जुनाच्या रथावर घ्यायला सुचवतो आणि अर्जुन भीष्मांचा वध करतो ही युक्ती नाहीतर काय ! त्यानंतर जयद्रथ ज्यावेळेला खरोखर मारला जाणं कठीण असतं, अभिमन्यूच्या मृत्यूनंतर अर्जुन पण करतो की, 'मी जयद्रथाला मारीन- सूर्यास्त होण्यापूर्वी'. त्यावेळेला देखील कौरव जयद्रथाला योग्य तऱ्हेने लपवून ठेवतात व ते खरोखर त्याच्यात यशस्वी होऊ शकतील, हे जाणून हाच कृष्ण युक्ती करतो: सूर्याला झाकून टाकतो. त्यामुळे सगळ्यांना वाटतं, युद्ध समाप्तीची वेळ आली. परंतु खरं तसं नसतं. पण तसं वाटल्यामुळे कौरव व जयद्रथ गाभील राहतात आणि अर्जुन त्याचा वध करु शकतो, कारण सूर्य त्यावेळेला कृष्ण ज्याने झाकलेला असतो तो झाकलेला सूर्य बाहेर आणतो आणि अर्जुनाला म्हणतो 'हा सूर्य, हा जयद्रथ'!
ही युक्ती त्याला अशी कारणीभूत होते.
दुसरी जी काही युक्ती कृष्ण युद्धाच्या शेवटी अवलंबितो, ती खरोखर तसं म्हटलं तर योग्य नव्हे. भीम आणि दुर्योधन यांच्या युद्धात दुर्योधन नियमाने शरीराच्या वरच्या भागावरती तो अजय असतो, कारण गांधारीच्या वरामुळे त्याचे वरील शरीर वज्राहून कठीण झालेले असते. परंतु श्रीकृष्ण मांडीवर थाप मारून दुर्योधनाला तिथे 'जणू गदा मार' अशी भीमाला सूचना करतो. त्यामुळे दुर्योधनाचा अखेर मृत्यू होतो आणि पांडवांचा विजय होतो.
थोडक्यात बुद्धी शक्ती आणि युक्ती या तिघांचा जर संगम झाला तर अशक्य ते शक्य होऊ शकते आणि त्यामध्ये युक्ती ही जणू सध्याच्या काळातल्या 'व्हॅल्यू इंजीनियरिंग', सारखी म्हणावी लागेल !:😄
श्री सुधाकर नातू
"सोशल मिडीयावरील मुशाफिरी-2 !":
*_अस्सल पुणेकरांना समर्पित :_*
*पुण्याची कहाणी* कालची अन् आजची !!!
आटपाट नगर होतं
विद्येचं माहेरघर होतं
सह्याद्रीच्या कुशीत होतं
टेकड्यांच्या मुशीत होतं
मुळा-मुठा निर्मळ होती
गोड पाण्याची चंगळ होती
काळ्या मातीत कस होता
वरण भात बस्स होता
निसर्गाचं देणं होतं
पाताळेश्वरी लेणं होतं
नाव त्याच पुणं होतं
खरंच काही उणं नव्हतं
शिवबाचं बालपण होतं
जिजामातेचं धोरण होतं
मोगलाई कारण होतं
पुण्याचं ज्वलन होतं
छत्रपतींचं स्वराज्य होतं
पेशव्यांचं अटकेपार राज्य होतं
निधड्या छातीचे मावळे होते
पराक्रमाने न्हायले होते
पर-स्त्री मातेसमान होती
कोल्ही-कुत्री गुमान होती
नवसाला पावणारे गणपती होते
तालमीसाठी मारुती होते
चिरेबंदी वाडे होते
आयुर्वेदाचे काढे होते
अंगणात रांगोळी होती
घराची दारं उघडी होती
संध्याकाळी दिवेलागणी होती
घरोघरी शुभंकरोती होती
गृहिणी अन्नपूर्णा होत्या
तडफदार स्वयंसिद्धधा होत्या
जेवायला साधी पत्रावळ होती
चौरस आहाराने परिपूर्ण होती
वेदांचा अंगिकार होता
विद्वान लोकांचा संचार होता
टिळकांची सिंहगर्जना होती
आगरकरांची सुधारणा होती
फडके चाफेकरांचं बंड होतं
सावरकरांचं अग्निकुंड होतं
रानडे, फुले, कर्वे झटले होते
बायकांचे जगणे फुलले होते
विद्वत्तेची पगडी होती
सन्मानाची भिकबाळी होती
घरंदाज पैठणी होती
शालिन नथणी होती
काटकसरीचा वारा होता
उधळपट्टीला थारा नव्हता
सायकलींचे शहर होतं
निवृत्त लोकांचे घर होतं
एका दमात पर्वती चढणं होतं
दुपारी उसाचा रस पिणं होतं
पुण्याची मराठी प्रमाण होती
शुद्धतेची कमाल होती
कलाकारांची कर्मभूमी होती
पुणेकरांची दाद जरूरी होती
सवाई गंधर्व, वसंत उत्सव होते
पुणेकरांना अभिमानास्पद होते
सार्वजनिक मंडळे विधायक होती
समाज-स्वास्थाला तारक होती
:
:
:
--------------
पण परंतु किन्तु....
🤔
औद्योगिक क्रांती झाली
पुण्यामध्ये पिंपरी आली
चारी दिशांनी कामगार आले
स्थानिक मात्र बेरोजगार झाले
कारखाने धूर ओकू लागले
पुणेकर सारखे खोकू लागले
संगणकाची नांदी झाली
हिंजवडीची चांदी झाली
पुण्याची आय-टी पंढरी झाली
तज्ञांची मांदियाळी आली
तांत्रिक भाषा ओठावर रूजली
मराठी मात्र मनातच थिजली
उंच इमारतींचे पीक आले
शेती करणे अहित झाले
टेकड्यांवर हातोडा पडला
सह्याद्रीच तेवढा कळवळला
मुळा-मुठा सुकून गेली
सांडपाण्याने बहरुन आली
रस्ता गाड्यांमध्ये हरवत गेला
चालताना श्वास कोंडत गेला
पिझा बर्गर 'जेवण' झाले
सार्यांनाच आजारपण आले
डॉक्टरांनी आपली दुकाने थाटली
बँकांनी आरोग्यासाठी कर्जे दिली
'युज अँड थ्रो' प्रतिष्ठेचे झाले
जागोजागी ढीग कचऱ्याचे आले
तरुणाई रेव पार्टीत रंगली
चारित्र्याची कल्पना मोडीत निघाली
मारामारी, खून, बलात्कार झाले
निर्ढावलेल्या मनांचे साक्षात्कार झाले
एकेकाळची पुण्य नगरी
होतेय आता पाप नगरी
भिन्न प्रांतीयांची भाऊगिरी
कुठे हरवला अस्सल पुणेरी...
*सर्वांना पाठवा*
बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५
"सोशल मीडियावरील माझे योगदान":
सोशल मीडियावरील माझे योगदान":
"Vigyan
&
Adhyatma:"
The Misuse of Vigyan can turn into Distruction and extintion, the misuse of Adhyatma takes the shape of 'Buabaji' which is equally destructive.
Vigyan is the study of what exists and is visible, while Adhyatma is the study of what's invisible and invinvinsible.
Vigyan looks 'outside', while Adhyatma looks 'within'. Vigyan takes a rational, logical path, while Adhyatma is the imagination of random path.
Vigyan seeks an experiment, while Adhyatma seeks an experience. If Vigyan is the Life after Birth, Adhyatma is the Life after Death and so on....
वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्री या नात्याने या हृदयीचे त्या हृदयी करण्याचा माझा सिलसिला सातत्याने सुरू असतो त्यामधीलच सोशल मीडियावरील माझ्या योगदानाची येथे मी यथोचित मांडणी करत आहे आपल्यालाही ते वाचनीय आणि मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे.
🤣 "एक वेदनादायी नोंद !":🤣
🙏🏽"एकेक पान लागले गळावयाला":🙏🏽
👍"आज सकाळी नाश्ता करताना मोबाईलवर फेसबुक सर्व्हिंग मध्ये पहिलीच पोस्ट डॉक्टर अच्युत गोडबोले यांची दिसली.
त्यांचे आयआयटी मधील सहकारी आणि नंतरचेही अनेक वर्ष स्नेही असलेले आनंद करंदीकर यांच्या निधना निमित्त त्याने वाहिलेली ती श्रद्धांजली वाचून मन हळहळले. आनंद करंदीकरांसारखे सामाजिक बांध असलेले ऑल राऊंड गुणवंत आता आपल्यात नाहीत हे उमजून वाटून गेले की,
"एकेक पान लागले गळावयाला !"
माझ्या आनंद करंदीकरांसंबंधीची एक आठवण ताबडतोब मला आठवली.
त्यांचे एक प्रकारचे आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचून, मी तेव्हा अगदी भारावून गेलो होतो. जेव्हा जेव्हा मला काहीही वाचलेले भावते, तेव्हा तेव्हा मी प्रत्येक लेखकाला काही ना काही प्रतिसाद देत आलो आहे. पण त्यांच्या पुस्तकाला मी दिलेला प्रतिसाद हा लिखित स्वरूपात व ध्वनिफिती रूपात त्यांना व्हाट्सअप वर पाठवला होता ते स्मरले.
अशा या सर्वांगीण कर्तृत्व सहजतेने करत राहिलेल्या मनस्वी माणसाला आदरांजली वाहत असताना, त्यांच्या कर्तृत्वाची
तोंडओळख करून देणारी माझ्या प्रतिसाद व पुढील ध्वनिफीत ही लिंक उघडून जरूर ऐका...
https://drive.google.com/file/d/17X1HL1WG-Kvg1UPKyQoSTmI_wG5ivt9I/view?usp=drivesdk
II ओम शांती ओम II
II ओम शांती ओम II
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
11 December 2022
श्री आनंद करंदीकर,
सादर वंदन,
आजच्या महाराष्ट्र टाइम्स पुरवणी मध्ये तुमच्या "माझ्या धडपडीचा कारनामा" या पुस्तकाचे परीक्षण मानसी होलेहून्नूर यांनी केलेले वाचले. मनाला प्रेरणादायी वाटले आणि म्हणूनच आपल्याला ताबडतोब प्रतिसाद द्यावा असे ठरवले.
गुगल वर जाऊन आपली माहिती तसेच आपला हा क्रमांक मिळवला आणि आपल्याला हा अनाहूत संदेश मी पाठवत आहे. एका आगळ्यावेगळ्या अशा स्वरूपात माझा प्रतिसाद पुढील ध्वनिफितीत आपण जरूर ऐकावा.
आपण आपला यथोचित प्रतिसाद द्यावा ही विनंती.
धन्यवाद
सुधाकर नातू,
माहिम मुंबई 16
@@@@@!@@@@!@@@@@@@@@
"Destiny and Dynasty":
Bringing an end to the rule and prominence of Family dynasty oriented political parties, seems to be the right step forward for the political clean up. This is what's most desirable, considering the fact that no where in the World, is there a trend of dynastic Politics.
Weaknesses of dynastic politics are obvious, as in that quality, capability and efficiency are compromised. Study of hierarchy shows that siblings of great personalities,
more often than not happen to be just mediocre and less worthy.
The driving forces, the undercurrents for the quest for development, continous improvement, in the long run are bound to make this happen in the nearest future.
India's dream of being a Super Power in the World will not be then far away, if and only if,
this goal is accomplished.
" रंगांची दुनिया !":
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍" स्वरानंद. ! ":👌
💐 "
पुढील लिंकस् उघडून ती सुमधुर गीते ऐका...
🤣 "एक वेदनादायी नोंद !":🤣
🙏🏽"एकेक पान लागले गळावयाला":🙏🏽
👍"आज सकाळी नाश्ता करताना मोबाईलवर फेसबुक सर्व्हिंग मध्ये पहिलीच पोस्ट डॉक्टर अच्युत गोडबोले यांची दिसली.
त्यांचे आयआयटी मधील सहकारी आणि नंतरचेही अनेक वर्ष स्नेही असलेले आनंद करंदीकर यांच्या निधना निमित्त त्याने वाहिलेली ती श्रद्धांजली वाचून मन हळहळले. आनंद करंदीकरांसारखे सामाजिक बांध असलेले ऑल राऊंड गुणवंत आता आपल्यात नाहीत हे उमजून वाटून गेले की,
"एकेक पान लागले गळावयाला !"
माझ्या आनंद करंदीकरांसंबंधीची एक आठवण ताबडतोब मला आठवली.
त्यांचे एक प्रकारचे आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचून, मी तेव्हा अगदी भाराहून गेलो होतो. जेव्हा जेव्हा मला काहीही वाचलेले भावते, तेव्हा तेव्हा मी प्रत्येक लेखकाला काही ना काही प्रतिसाद देत आलो आहे. पण त्यांच्या पुस्तकाला मी दिलेला प्रतिसाद हा लिखित स्वरूपात नसून, तो मी ध्वनिफिती रूपात त्यांना व्हाट्सअप वर पाठवला होता ते स्मरले.
अशा या सर्वांगीण कर्तृत्व सहजतेने करत राहिलेल्या मनस्वी माणसाला आदरांजली वाहत असताना, त्यांच्या कर्तृत्वाची
तोंडओळख करून देणारी माझ्या प्रतिसादाची पुढील ध्वनिफीत उघडून जरूर ऐका...
II ओम शांती ओम II II ओम शांती ओम II🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल !":👌
👍"कालाय तस्मै नम"!:
मनोरंजन विश्वात, सामान्यत्व ते असामान्यत्व हा प्रवास सोपा नसतो, खूप कालापव्यय करणारा असू शकतो, मात्र परिस्थिती बदलल्याने लादलेला असामान्यत्व ते सामान्यत्व हा प्रवास झपाटय़ाने तर होतोच, परंतु तो पचविणे महाकर्मकठीण असते !":👍
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल !":👌
👍"माणसाचं जीवन हा बहुरंगी नात्यांचा अनुभव घेत, ती निभावून नेण्याचा स्वतंत्र प्रयोग असतो. त्याचे यशापयश प्रत्येकाच्याच हातात असूनही, त्याकडे काणाडोळा केला जातो !":👌
👍"बोल, अमोल !":👌
😀 "दुनिया न्यारी, खारी !"
जोवर माणूस कामाचा, स्वावलंबी,
तोवर महत्व अन् लक्ष व दक्ष.
झाला बिनकामाचा, परावलंबी,
होईल दुर्लक्षच दुर्लक्ष !": 😀
👍"Different Strokes !":👍
💐 "A Model Leader in politics, is appreciated, not by the way, he celebrates his win, but by the way, he accepts his mistakes, in his defeat and honestly commits himself to rectify them. Otherwise, he deceives, not only the public in general, but himself. Finally, to accept one's mistakes, the size of the chest is not as important, as the strength of his mind !":💐
👍"शारदोत्सव-वाचता वाचता, वेचलेले भावलेले !":👍
🤣 "एक वेदनादायी नोंद !":🤣
🙏🏽"एकेक पान लागले गळावयाला":🙏🏽
👍"आज सकाळी नाश्ता करताना मोबाईलवर फेसबुक सर्व्हिंग मध्ये पहिलीच पोस्ट डॉक्टर अच्युत गोडबोले यांची दिसली.
त्यांचे आयआयटी मधील सहकारी आणि नंतरचेही अनेक वर्ष स्नेही असलेले आनंद करंदीकर यांच्या निधना निमित्त त्याने वाहिलेली ती श्रद्धांजली वाचून मन हळहळले. आनंद करंदीकरांसारखे सामाजिक बांध असलेले ऑल राऊंड गुणवंत आता आपल्यात नाहीत हे उमजून वाटून गेले की,
"एकेक पान लागले गळावयाला !"
माझ्या आनंद करंदीकरांसंबंधीची एक आठवण ताबडतोब मला आठवली.
त्यांचे एक प्रकारचे आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचून, मी तेव्हा अगदी भारावून गेलो होतो. जेव्हा जेव्हा मला काहीही वाचलेले भावते, तेव्हा तेव्हा मी प्रत्येक लेखकाला काही ना काही प्रतिसाद देत आलो आहे. पण त्यांच्या पुस्तकाला मी दिलेला प्रतिसाद हा लिखित स्वरूपात व ध्वनिफिती रूपात त्यांना व्हाट्सअप वर पाठवला होता ते स्मरले.
अशा या सर्वांगीण कर्तृत्व सहजतेने करत राहिलेल्या मनस्वी माणसाला आदरांजली वाहत असताना, त्यांच्या कर्तृत्वाची
तोंडओळख करून देणारी माझ्या प्रतिसाद व पुढील ध्वनिफीत ही लिंक उघडून जरूर ऐका...
https://drive.google.com/file/d/17X1HL1WG-Kvg1UPKyQoSTmI_wG5ivt9I/view?usp=drivesdk
II ओम शांती ओम II
II ओम शांती ओम II
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
11 December 2022
श्री आनंद करंदीकर,
सादर वंदन,
आजच्या महाराष्ट्र टाइम्स पुरवणी मध्ये तुमच्या "माझ्या धडपडीचा कारनामा" या पुस्तकाचे परीक्षण मानसी होलेहून्नूर यांनी केलेले वाचले. मनाला प्रेरणादायी वाटले आणि म्हणूनच आपल्याला ताबडतोब प्रतिसाद द्यावा असे ठरवले.
गुगल वर जाऊन आपली माहिती तसेच आपला हा क्रमांक मिळवला आणि आपल्याला हा अनाहूत संदेश मी पाठवत आहे. एका आगळ्यावेगळ्या अशा स्वरूपात माझा प्रतिसाद पुढील ध्वनिफितीत आपण जरूर ऐकावा.
आपण आपला यथोचित प्रतिसाद द्यावा ही विनंती.
धन्यवाद
सुधाकर नातू,
माहिम मुंबई 16
👍"मुक्तसंवाद-आजचा दिवस अर्थपूर्ण कसा करावयाचा?": तर तो हा असा !":👍
💐 "दिवसाचे सर्वांनाच 24 तास असतात त्यामधील अर्धा वेळ किंवा त्याहून थोडा जास्तच कधीमधी झोपेत किंवा वैयक्तिक कारभारासाठी वापरला जातो तर उरलेले जे काही तास आपल्या वाट्याला येतात त्याचा अर्थपूर्ण अशा योगदानात की जे आपल्याला स्वतःला आवडतं करता येतं आनंद देतो ते करत कसं राहायचं आणि त्याची नोंद घे प्रत्येक दिवस माझा दिवस हे कसं करायचं ते उलगडणारा हा व्हिडिओ सर्वांना अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरावा !
"या हृदयीचे त्या हृदयी"
हे करणं ही माझी मनीषा आहे...💐
त्यासाठी पुढील लिंक उघडा....💐
https://youtu.be/SyafnNK5RL0?si=Nl1Wv6WBSIXqF35g
" सोशल मिडिया वरील मुशाफिरी !":
सर्फिंग करताना फेसबुक वर आलेला हा लेख
जर कोणी प्रकाशित केला त्यांचे आभार मानून पुनश्च आपल्यासाठी
*ज्यांचा जन्म १९६०, १९६१, १९६२, १९६३, १९६४, १९६५ १९६६ १९६७ १९६८ १९६९ १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९८५ ,१९८६ , १९८७ , १९८८ , १९८९ , १९९० साली झाला आहे खास त्या पिढी साठी हा लेख*
ही पीढ़ी आता 3० ओलाडून ६२ कडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....
१,२,५,१०,२०,२५,५० पैसे बघीतलेली ही पीढीत पाहुणे कडून लाज न बाळगता पैसे घेत होती. शाई-बोरु/ पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लॕप्टाॕप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे*.
ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....
*टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर* ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती.
*मार्कशीट* आणि *टिव्ही* च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी.
कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी *गाडी गाडी खेळणं* यात त्यांना काहीही कमीपणा वाटला नव्हता.
*'सळई जमिनीत रूतवत जाणं'* हा काही खेळ असू शकतो का ? पण होता.
*'कैऱ्या तोडणं'* ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि
कुठल्याही वेळी कुणाचंही *दार वाजवणं* या मध्ये कसलेही *एथीक्स* तुटत नव्हते.
*मित्राच्या आईने जेवू घालणं* यात कसलाही उपकाराचा भाव आणि *त्याच्या बाबांनी ओरडणं* यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी.
वर्गात किवा शाळेत *स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचरत बोलणारी* ही पिढी.
दोन दिवस जरी मित्र
शाळेत नाही आला तर
शाळा सुटल्या सुटल्या
दप्तरासकट
त्याच्या घरापर्यंत जाणारी
ती पीढी..
कुणाचेही बाबा शाळेत
आले की..मित्र कुठेही
खेळत असो .सत्तरच्या स्पीड ने *"तुझे बाबा आलेय चल लवकर* "
ही बातमी मित्रापर्य॔त पोहोचविणारी ती पिढी
पण गल्लीत *कुणाच्याही घरात कसलाही कार्यक्रम असलं* तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी.
*कपील, सुनिल गावसकर , वेंकट, प्रसनाच्या बोलिंग वर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या टेनिस वर तर राज, देव,दिलीप ते राजेश,अमिताभ आणि धर्मेंद्र,जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर, अगदी आमिर,सलमान, शाहरुख माधुरी,अनिल वर वाढलेली ही पिढी*
भाड्याने VCR आणुन ४-५ पिच्चर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी.
*लक्ष्या-अशोक* च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, *नाना, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, सोनम, किमी ,सोनाली,* हे कलाकार पाहिलेली पिढी.
*'शिक्षकांचा मार खाणं'* यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण *'घरात परत धुतात'* ही भावना जपणारी पिढी.
ज्यांच्या शिक्षकांवर *आवाज चढवला नाही* अशी पिढी. हीत कितीही *धुतलं* तरी दसऱ्याला शिक्षकांना *सोनं देणारी* आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता *खाली वाकून नमस्कार* करणारी पिढी. कॉलेज ला सुट्टी असली तर् आठवणीत स्वप्न रंगवनारी पिढी ...
ना मोबाईल ना SMS ना व्हाट्सअप .... भेटण्या साठी आतुरतेने वाट पाहणारी पीढ़ी.
पंकज उधासच्या *_'तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया'_* या ओळीला डोळे पुसणारी,
दिवाळीच्या *पाच दिवसांची कथा* माहित असणारी
लिव्ह इन तर सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार *मोठं डेरिंग* समजणारी ही पिढी, अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी.
पुन्हा डोळे झाकुया ?
दहा, वीस....... ऐंशी, नव्वद...........पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ
*गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....असं न समजणारी सुज्ञ पिढी, कारण आजचे दिवस हेच उद्याच्या आठवणी असणार असं मानणारी ही पिढी ?*
धन्य ते जीवन जे खर जगण्✍आमचाही एक जमाना होता
पुर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता .पुढे ६ /७ वर्षानंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे . जर शाळेत गेलो नाही तरी कोणाला काही वाटायचे नाही.
सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती,
मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी
भीती आमच्या आईवडिलांना कधी वाटलीच नाही.
☺️😊☺️😊☺️
पास / नापास हेच
आम्हाला कळत होतं...
% चा आणि आमचा
संबंध कधीच नव्हता.
😆🥹😆🥹😆
शिकवणी लावली,
हे सांगायला लाज वाटायची....
कारण "ढ" असं
हीणवलं जायचं...
🤣🤣🤣🤣🤣
पुस्तकामध्ये झाडाची
पानं आणि मोरपिस ठेवून
आम्ही हुशार होऊ शकतो,
असा आमचा दृढ विश्वास
होता...
😏🥳😏🥳😏
कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं.
😳😳😳😳😳
दरवर्षी जेव्हा नव्या
इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि
वह्यांना कव्हर्स घालणे,
हा आमच्या जीवनातला
एक वार्षिक उत्सव
असायचा...
🤗🤗🤗🤗🤗
वर्ष सम्पल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे.
😝😜😝😜😝
आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते.
🙂🙃🙂🙃🙂
कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून,आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो
हे आता आठवतही नाही...🤭🫢🤭🫢🤭
सरांचा शाळेत मार खाताना
आणि पायांचे अंगठे धरुन
उभं राहताना,कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा
'ईगो' कधीही आडवा
येत नव्हता, खरं तर
आम्हाला 'ईगो' काय
असतो हेच माहीत
नव्हतं...
😀😄😀☺️😄😀😄
मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती.
मारणारा आणि मार खाणारा
दोघेही खुष असायचे.
मार खाणारा यासाठी की,
'चला, कालच्यापेक्षा तरी
आज कमी धोपटला गेलो
म्हणून आणि मारणारा
आज पुन्हा हात धुवून
घ्यायला मिळाले म्हणून......
🙂😉🙂😉🙂
बिनचपला ,बुटांचे कोणत्याही चेंडू आणी लाकडी बॅट ने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट
खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते.
☺️😊☺️😊☺️☺️😊
आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही.
आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करून टाकायचे.सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळालाच तरी आम्ही बेहद खुश होतो.
दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून एकेक फटका उडवत बसणे यात काहीअपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही.कोणी दुसरा फटाके फोडत असेल त्याच्या मागे मागे धावायचो.
😉😉😉😁😉😉😉
आम्ही आमच्या
आईवडिलांना कधी सांगूच
शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला
आय लव यू'
म्हणणं माहीतच नव्हतं...
😘😘❤️😘😘
आज आम्ही असंख्य
टक्के टोमणे खात, संघर्ष
करत दुनियेचा एक हिस्सा
झालोय. काहींना जे हवं
होतं, ते त्यांनी मिळवलंय
तर काही 'काय माहीत....?
शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीट वर फिरवलेले आणि स्कूल बाहेरच्या त्या हापपॅन्ट वाल्या गोळीवाल्याकडून काय काय ज्या मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र,
कुठे हरवलेत ते...!
😂😂👍😂😂
आम्ही जगात कुठेही
असू पण हे सत्य आहे की,
आम्ही वास्तव दुनियेत
जगलो, आणि वास्तवात
वाढलो........
😉🙄😉🙄😉
कपड्यांना सुरकुत्या पडू
न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं
आम्हाला कधी जमलंच
नाही.भाकरी आणि भाजी शिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं.
😘😘❤️😘😘
आपल्या नशिबाला
चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत.
जे जीवन आम्ही
जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार
नाही.,,,,,,,,,,,,,,,,,,
😃😃😃🌹😃😃😃
आम्ही चांगले असू
किंवा वाईट, पण आमचाही
एक 'जमाना' होता.....
♥️♥️♥️🚩🚩🚩
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)