शुक्रवार, ३१ मे, २०२४

@मुक्तसंवाद-कावाकामि !":

👍"मुक्तसंवाद-'कावाकामि !":👌 💐'वाचनासारखा दुसरा कुठला छंद नाही. त्यामध्ये आपणच आपल्यामध्ये गुंगून, मनासमोरचे भावविश्व न्याहाळत अंतर्मुख होत जातो. आपली जिज्ञासावृत्ती वाढत जाते. मला देखील वाचनाची खूप आवड आहे आणि त्यामुळेच मला ही कल्पना सुचली की, आपण काय वाचले आणि काय त्यामधून मिळाले यासंबंधी आपले विचार व्यक्त करावेत. म्हणूनच हे लेखाला असे अनोखे शीर्षक -'कावाकामि"! मला जे काही सांगायचंय ते मी कुठे वाचलं किंवा कुठे पाहिलं किंवा कुठे अनुभवलं असं आहे ते प्रथम माहेर मे'24चा मी अंकातील आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की 'जनरेशन झेड' अर्थात 1997 ते 2012 यामध्ये जन्मलेली पिढी, यांचा मेंदू आधीच्या पिढीपेक्षा मोठा आहे; परंतु त्यांचा बुद्ध्यांक किंवा IQ कमी आहे. तसेच त्यांची जिज्ञासावृत्ती हळूहळू नष्ट होत चालली आहे. कारण अर्थातच मोबाईलचा अती वापर आणि वेगवेगळी सर्च इंजिन्समुळे सारं काही तयार असंच त्यांना समोर मिळत आहे ! दुसरं एक उपयुक्त ते म्हणजे स्ट्रेस टेेस्टसंबंधी. हृदयविकार हा आजकाल विशी तिशीपासून सापडणारा असा प्राणघातक विकार आहे. त्याला वयाचे बंधन नाही. अशी वेळ आली आहे कारण जीवनामध्ये वाढणारे ताण-तणाव. त्याकरता आपल्याला स्ट्रेस टेस्ट करणं गरजेचं असतं. त्यामध्ये VO2 मॅक्स'ची परीक्षा केली जाते. म्हणजे एकूण ऑक्सिजन जास्तीत जास्त व्यायामाच्या वेळेला किती वापरला जातो ते दाखवणारा आकडा. तो जितका जास्त तेवढी आपली हृदयाची ताकद अधिक. शक्यतोवर 30 ते 36 हा आकडा चांगला असतो. कमी असला तर अर्थात प्रयत्नपूर्वक आपल्याला तो वाढवता येतो, असेही त्या छोट्याशा लेखात म्हटले आहे डॉक्टर अनुराधा देशपांडे यांचे ते सदर आहे. माणसाच्या मनात काय चाललंय ते आपल्याला समजावं, अशी प्रत्येकाची खूप खूप इच्छा असते. पण अजून तरी समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय, ते कळत नाही. ही जर माणसांची कथा तर पशुंचा काय ! इजरायल मधल्या एका शास्त्रज्ञाने प्रयोग करून प्राण्यांचं मन जाणून घेण्याचा, त्यांची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वटवाघळांच्या वेगवेगळ्या आवाजामधून त्यांनी पुष्कळ डेटा गोळा करून हे संशोधन केले आहे. कदाचित आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI वापरून प्राण्यांची भाषा समजता येऊ शकेल अशी परिस्थिती आहे ! वाचावं ते नवलच असंच म्हणायचं !!:💐 #################### 2. 👍"छाप (पड)लेले शब्द !":👌 💐"परवलीचा शब्द-'पासवर्ड !":💐 👍"कोणतेही कुलूप उघडण्यासाठी जशी ठराविक किल्लीच लागते, तसंच नव्या जमान्यात तंत्रज्ञानाचा इतका विकास झाल्यामुळे, काहीही करायला जाण्यापूर्वी आपल्याला परवलीचा शब्द अर्थात पासवर्ड वापरायला लागतो. मग ते एटीएम असो ईमेल असो, कुठली फाईल असो अथवा आपला स्मार्टफोन उघडणं असो, 'जिथे जातो तेथे तू माझा सांगाती' अशा प्रमाणे पासवर्ड ही दररोजची आवश्यक गोष्ट बनली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या खाजगीकरणाची परिसीमा म्हणजे हे पासवर्डस् ! अर्थातच सारे पासवर्ड लक्षात ठेवून, ते ते योग्य वेळी वापरणे अथवा अधून मधून बदलणे हे सारे जे काम जिकीरीचे झाले आहे. तर अशा आजच्या युगातील सगळ्यात महत्त्वाच्या शब्दाचा अर्थात पासवर्डचा लेखाजोखा घेणारा हा महाराष्ट्र टाइम्स पुणे आव्रुत्तीमधील प्राध्यापक डॉ प्रमोद दामले ह्यांचा लेख खरोखर वाचनीय आणि संग्राह्य आहे, त्याबद्दल लेखकाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे !":👌 #################### 3. 💐'पुरुष उवाच'या दिवाळी अंक'23 मध्ये मेंदूमध्ये स्त्रवणाऱ्या विविध चार प्रकारच्या हार्मोन्सची माहिती आली होती. ती खरोखर वाचनीय आणि उपयुक्त होती. दुर्दैवाने ती नोंदण्याची मी विसरलो. साहजिकच आता तीच विशेष माहिती मी 'गुगल'वरून काढली ती अशी: 1 Dopamine acts on areas of the brain to give you feelings of pleasure, satisfaction and motivation. Dopamine also has a role to play in controlling memory, mood, sleep, learning, concentration, movement and other body functions. 2 Serotonin is a chemical that carries messages between nerve cells in the brain and throughout your body. Serotonin plays a key role in such body functions as mood, sleep, digestion, nausea, wound healing, bone health, blood clotting and sexual desire. 3 Endorphins are a type of neurotransmitter, or messenger in your body. They attach to your brain's reward centers and carry signals across your nervous system. Endorphin comes from the words “endogenous,” which means within the body, and “morphine,” an opiate pain reliever. 4 Oxytocin is a natural hormone that manages key aspects of the female and male reproductive systems, including labor and delivery and lactation, as well as aspects of human behavior. Your hypothalamus makes oxytocin, but your posterior pituitary gland stores and releases it into your bloodstream. आहे की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती ! थोडक्यात माणसाने जिज्ञासा जागृत ठेवावी. दररोज विविध प्रकारचे वाचन करावे आणि टिपकागदासारखं ज्ञान व उपयुक्त माहिती इथून तिथून कायम गोळा करत राहावी, त्यामुळे तुमच्या जाणीवांचे क्षेत्र उत्तरोत्तर विकसित तर होत जाईलच पण तुमच्या व्यक्तिमत्वातही एक प्रकारची प्रगल्भता येईल !":💐 धन्यवाद सुधाकर नातू

रविवार, १९ मे, २०२४

@बिंब-प्रतिबिंब:"प्रतीक्षा अवताराची !":👌 "

बिंब: 👍"प्रतीक्षा अवताराची !":👌 "सध्या राजकारणाचा चिखल झाल्याने, मतदान न करणे हा निर्णय मला योग्य वाटतो, कारण दोन्हीही बाजू विश्वासार्ह नाहीत. ह्यामुळे मी मतदानास गैरहजर राहण्याचे ठरवले आहे. NOTA चा देेखिल अंतिम अर्थ तोच होतो. जोपर्यंत चारित्र्यवान निष्ठावान समाजहितैषी, निस्वार्थी माणसेच राजकारणात जरूर ती CET सारखी परीक्षा देऊन येत नाहीत, तोपर्यंत तसे घडवून आणणार्या विभूतीची- जणू दहाव्या कलंकी अवताराची आपल्याला प्रतिक्षा करावी लागेल !": PLEASE REMEMBER: 'When Character is Lost, Everything is Lost !' //प्रतिबिंब CET सारखी परिक्षा राजकारणात येणे अवघडच. जगात कुठेही तसे होत नसते. मत वाया घालवून काहीच साध्य नाही. त्याउलट NOTA टक्केवारी नोंद झाल्यास, चिखलात राहणाऱ्यांना देखील मंथन करावेच लागेल. //बिंब: कुुठेेही होत नाही, असे नकारात्मक विचार कशाला करायचे? कोणत्याही नवीन संकल्पना या आधी अशाच कठीण वाटतात, एडिसनचे उदाहरण मनात ठेवा, हजारो प्रयोगांनंतर तो विजेच्या दिव्याचा शोध लावण्यात यशस्वी झाला. अश्मयुगापासून आजतागायत जी प्रगती होत गेली, तिचा विचार करा कठीण काहीच नसते. स्वप्न पाहणे आणि ती प्रत्यक्षात उतरवणे हे आज ना उद्या तरी कुुणाकडूून घडतेच घडते. सर्व जनमानसाने या संकल्पनेचा जर मनापासून पाठपुरावा केला, तर योग्य ते घटनात्मक बदल घडून ते प्रत्यक्षातही येऊ शकेल. तसे झाले, तर भारतातील लोकशाही ही जगातली सर्वोत्तम आदर्श लोकशाही ठरेल. //प्रतिबिंब: आपले मत वाया घालवून, घरी बसून, प्रार्थना करून म्हणजेच सहभाग न घेता काही साध्य होत नसल्याचे टिळक, सावरकर, चाफेकर, गोखले, रानडे आणि हेडगेवार इत्यादी इसमांनी वाट दाखवली आहे. // निष्क्रिय न बनता मी संकल्पना दिली आहे आपल्या प्रतिपादनामुळेच असे असेच विभूती अवतार निर्माण होतील हे सिद्ध होते //प्रतिबिंब: नकारात्मक नसून हा वास्तववादी विचार आहे. काही शतकांहून अधिक फ्रेंच, नंतर ब्रिटिश तसेच पुढे अमेरिकन घटनेत देखील ह्याचा विचार नाही. ह्या देशातील तसेच भारतीय रजघटनेच्या दिग्गज तज्ज्ञांनी चिंतन करूनही किंवा खुद्द टिळक, रानडे आणि हेडगेवार अश्या मंडळींना आवश्यक वाटले नाही त्यावर हट्ट धरून मत फक्त वाया जाईल. मत देणे आणि CET हे दोन वेगळे विचार आहेत. //बिंब: राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि गुंडगिरी अपेक्षित असेल तर बोलणेच खुंटले. आदर्श समाज निर्माण करायचा असेल तर अशा तऱ्हेचे गेम चेंजर बदल घडवावे लागतील. अखेरचा सवाल: राजकारण हा बिन भांडवली, कुठल्याही प्रकारची अर्हता असण्याची आवश्यकता नसलेला, सगळ्यात फायदेशीर धंदा बनला आहे, हे दुर्दैव नव्हे कां?

परिक्षे'चा 'निकाल'!": "Beginning of the End?."

वाचा आणि विचार करा.. "परिक्षे'चा 'निकाल'!": "Beginning of the End?." कधी नव्हे ती एकदाची परीक्षा आता लौकरच संपणार. ह्या वेळेस एक बरे होते, परिक्षेसाठी 'सात पेपरां'मध्ये तयारी करायला भरपूर दिवसांचा वेळ दिला होता. आता प्रतीक्षा निकालाची. जन्मानंतर म्रूत्यू जसा अटळ, तसंच ह्या परिक्षेनंतर 'निकाल-ही अटळच! आता हुरहुर, काळजी व धागधूग सुरू झाली. केव्हां एकदाचा तो निकालाचा दिवस येतो, अशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या नव्हे, तर परीक्षकांच्या सुद्धा मनात खळबळ, रुखरुख सुरू आहे. ही परीक्षा खूपच आगळी वेगळी होती. विचारलेल्या प्रश्नांना सोडून, हुशार विद्यार्थ्यांनी काहीबाही उत्तरे देणेच पसंत केले, त्यात नको नको त्या शब्दात उखाळ्या पाखाळ्या अधिक होत्या. हुशार मुलांनी आणि त्यांच्या मॉनिटरनी वर्षभर अभ्यास सोडून अक्षरश: उनाडक्या केल्यामुळे त्यांच्यापाशी दुसरे काहीच उरले नव्हते. बिचारी मागच्या बाकावर बसणार्या तथाकथित ढ मुलांपैकी जे जे विषयाला धरून उत्तरे द्यायचे प्रयत्न करत होते, त्यांनाही आपल्या निकालाची खात्री नाही. खरोखर अशी परीक्षा, पूर्वी कधीही झाली नाही आणि पुढेही कधी होऊ नये. विषयांना धरुनच ह्या पुढे 'परिक्षा' रितसर होणेच, सगळ्यांच्या हिताचे आहे. शेवटी निकाल लागायचा तो लागेलच, परंतु तसा कोणताही 'निकाल' लागला, तरी शेवटी परीक्षकांचीच गोची होणार, हे उघड सत्य आहे! ###################### "भक्तीतून शक्ती?": भक्ती ही संपूर्णपणे वैयक्तिक आणि खाजगी बाब आहे व असावी. परंतु तिचे जर प्रदर्शन मांडले गेले आणि त्यातून ते प्रदर्शन जर सार्वजनिक रित्या आधुनिक प्रसार माध्यमातून प्रसारित केले गेले तर, ते तितकेसे योग्य कां अयोग्य हे ज्याचे त्याने ठरवायचे. मात्र अशा प्रकारची कृती केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी असू शकते हे मत, कदाचित खोडता येणार नाही. आपल्या जवळच्या सामर्थ्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करता येऊ शकते आणि त्याचा मुद्दामून उपयोग करणे हेही खरेच. परंतु तितकेसे रास्त असते कां? अर्थात् जेव्हा वैयक्तिक सामर्थ्य आणि स्वार्थ कसाही करुन साधण्याची प्रवृत्ती अंगात असेल, तेव्हा अशा प्रकारचे प्रदर्शन करणे भूषणावह आहे असेच समजून ते केले जाते. काळाचा महिमा दुसरं काय! परंतु परिस्थिती बदलू शकते आणि तेव्हां मागे वळून पहाताना तर, हे खेळ अखेर हास्यास्पदही ठरू शकतात, ह्याचे भान ठेवणे अत्यावश्यक होय. ###################### 👍"बोल, अमोल !":👌 "सध्या राजकारणाचा झालेला चिखल पाहता लोकसेवक म्हणून राजकारणात मिळविण्यासाठी, CET वा NEET प्रमाणे केंद्रीय प्रवेश परीक्षा घेतली जावी आणि त्यामध्ये नीतिमत्ता, विश्वासार्हता, निष्ठा, निस्वार्थता आणि जनहितकारक सेवावृत्ती यांची तपासणी केली जावी. कुठल्याही शैक्षणिक कोर्सकरता अथवा शासकीय, खाजगी नोकरी करता जर स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, तर समाजाचे, देशाचे भवितव्य घडवण्याची निर्णयशक्ती ज्यांच्या हातात आपण देणार, त्यांचे चारित्र्य बावनकशी असलेच पाहिजे. तेच जाणण्यासाठी अशा केंद्रीय प्रवेश परीक्षेची अत्यावश्यकता आहे. तरच कदाचित राजकारणाला योग्य ते वळण मिळून विकास व प्रगती साधली जाईल. After all one must remember: "When Character is Lost, Everything is Lost !" ###################### अखेरचे हे भयावह वास्तव... 😂😂😂😂😂😂 1 अंध भक्तगण किती एकांगी, पूर्वग्रह दूषित द्रुष्टिकोन ठेवून त्यांच्या छुप्या मनसुब्यांची पाठराखण करतात, ते ह्यावरून ध्वनित होते आणि हेच देशाचे दुर्दैव आहे !" Ii इत्य अलम् ii 🤗🤗🤗🤗 2 देशांतर्गत जी मंडळी केवळ सत्तेसाठी धाकधपटशा दाखवून व इतर काही अनुचित माध्यमातून आपल्या विरोधकांना नमवून, आपल्या समवेत घेण्याचे राजकारण करतात, त्यांचे कसले व कां गोडवे गायचे? महाराष्ट्रातील उदाहरण अशोभनीय नव्हे काय? 🤗🤗🤗🤗🤗 ह्या सर्व मल्लिनाथीनंतर आपणास काय वाटते ?.... धन्यवाद श्री सुधाकर नातू