रविवार, २९ जानेवारी, २०२३

👍"छाप(पड)लेले शब्द-15 !":👌 💐"सावध व्हा ऐका पुढल्या हाका !":💐

  👍"छाप(पड)लेले शब्द-9 !":👌

👍"वाचा ही, वाढदिवसाची कहाणी !":👌

☺️"वाढदिवस साग्र संगीत, सार्वजनिक रित्या, साजरा करण्याची पद्धत कधी सुरू झाली कोण जाणे ! खास वाढदिवसानिमित्त बनवलेला केक सजवून, त्यावर पेटलेली मेणबत्ती उत्सवमूर्तीने, ती मेणबत्ती विझवायची आणि बाकीच्या कोंडाळे करून उभे असलेल्या मंडळींनी, टाळ्या वाजवत इंग्रजी मधले "हॅपी बर्थडे हे टू यु" गाणे म्हणायचे हा प्रकार हल्ली सर्रास सगळीकडे आपल्याला दिसतो.

पण माझ्या आठवणीत, अशा प्रकारचे वाढदिवस आमचे कुणाचेच कधी साजरे केले गेले नव्हते. मला आठवते त्या दिवशी, बालपणी आजी ताकमेढी जवळच्या खांबाशी मला नेऊन, काही तरी 'कापसासारखा म्हातारा हो... 'वगैरे वगैरे अशी प्रार्थना करायची आणि माझे औक्षण करायची. 

वाढदिवसाची दुसरी आठवण, पुढे प्राथमिक शाळेमध्ये एखाद्या सुस्थितीतील कुटुंबातील विद्यार्थी वा विद्यार्थिनी, वाढदिवसाला सर्व वर्गाला अथवा जमल्यास सर्व शाळेला चॉकलेटस् वाटायची. हा अजून एक वाढदिवस लक्षात राहण्याचा प्रकार.

आपले मूल एक वर्षाचे झाले की सार्वजनिकरित्या हॉल वगैरे घेऊन शिवाय सजााच भोजन आदी व्यवस्था करून मोठ्या दिमाखाने त्याचा वाढदिवस साजरा करणारी दांपत्ये देखील आपल्याला आढळतात. आपणही अशा कुठल्या ना कुठल्यातरी वाढदिवसाला हजेरी लावलेले असते. अगदी छोट्यात-छोटे म्हटलं तरी कुटुंबातील कोणाचाही वाढदिवस असला तर वरील केक मेणबत्ती इ.इ. प्रकार एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन नंतर, सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेणे ही देखील प्रथा रूढ झालेली आपण बघतो.

खरं म्हणजे वाढदिवस, ही वैयक्तिक गोष्ट व कुटुंबापूर्ती मर्यादित असते. परंतु तिथे असे सार्वजनिक प्रदर्शन कदाचित माणसांतील उत्सवप्रियतेमुळे झाले असावे. फक्त माझ्यापुरते बोलायचे झाले, तर मला चॉकलेटस् किंवा केक कधीच आवडलेला नाही. त्यामुळे केकचे घास भरवणे वगैरे हे प्रकार माझ्यापासून तरी दूर असतात हे माझे भाग्यच !

या पार्श्वभूमीवर 'इंग्रजी गीता ऐवजी, एखादे मराठी गीत वाढदिवशी कां म्हटले जावू नये ?' ही अभिनेता श्री सुबोध भावेंची शंका असलेले वृत्त माझ्या नजरेत आले. ते इथे पुुढे देत आहे.

सरते शेवटी, हे जे काही वाढदिवस पुराण चालू आहे, त्याची सांगता एका वेगळ्याच विचाराने मी करतो:
'वाढदिवस म्हणजे खरं म्हणजे आपल्या जीवनातला एक एक दिवस किंवा एक एक वर्ष कमी होणं होय. त्यामुळे सर्वसाधारण अर्ध्या आयुष्यापर्यंत, म्हणजे आताच्या सरासरी  आयुर्मेनाचा विचार करता, वय वर्ष 35 ते 40 पर्यंत वाढदिवसाला वाढदिवस म्हणणे आणि तो साजरा करणे निश्चितच योग्य. परंतु त्यानंतरच्या वाढदिवसाला मात्र
'काढदिवस' असं म्हणावं, असं मला वाटतं ! आता
'काढदिवस' कां?, हे उघड करायची जरूर नाही, सुज्ञास अधिक सांगणे न लगे !!":☺️

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
☺️ 'हे सारे ( सु )विचार (?) आजच सुचायला, तारीख 25 असावी, जी आमच्या विवाहाची तारीख आहे; एवढेच नाही, तर माझ्या ती. कै. आईचाही जन्मदिवस 25 तारखेचाच, हा विलक्षण योगायोग दुसरे काय?

######@#####

👍"छाप(पड)लेले शब्द-15 !":👌
💐"सावध व्हा ऐका पुढल्या हाका !":💐

☺️ "कालचक्र अव्याहत पुढे चालू आहे, चालूच राहणार आहे. त्याचप्रमाणे माणसाचे जीवनचक्र असेच अव्याहत पिढ्यानपिढ्या चालत राहणार आहे. मात्र गेल्या शतकात विज्ञानाच्या प्रगतीमुळे, तसेच आरोग्य विषयीच्या माणसांच्या अधिकाधिक सजगतेमुळे, माणसांचे आयुर्मान वेगाने वाढत आहे.. वाढतच राहणार आहे. त्याचे दुष्परिणाम आता प्रगत देशांमध्ये दिसायला लागले आहेत. विशेषतः जपानमध्ये तर चिंताजनक इतक्या संख्येमध्ये जेष्ठ नागरिक आढळतात. तीच कथा अनेक पाश्चात्य प्रगत देशांचीही.

वैयक्तिक स्वार्थ, अधिकाधिक व आत्मकेंद्री प्रव्रुत्ती वाढत चालल्यामुळे माणसांचे फक्त स्वतःच्या प्रगतीसाठी लक्ष केंद्रित होत आहे. साहजिकच करिअर, आर्थिक संपत्ती आदि गोष्टींना प्रचंड महत्व आले आहे. त्याचा परिणाम जन्मदर घटत आहे, तर दुसरीकडे आयुर्मान वाढत आहे, अशी ही विचित्र परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

स्वतःच्या हाताने आपापले उद्योग करता येणं, हे सर्वांना शक्य होत नाही. विशेषता जेष्ठांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. आर्थिक भार देखील अनेकांना इतरांवर टाकावा लागतो.

बहुसंख्य पुुढारलेेल्या देशांमध्ये काम करणारे हात आणि जेष्ठ नागरिक घरामध्येच हात चोळत बसलेले, यांचा विषम अशा संख्येतील परिणाम हळूहळू सर्वांच्याच लक्षात यायला लागला आहे. त्यासंबंधी विशेष प्रकाश टाकणारे हे वृत्त आपल्या सगळ्यांना हेच सांगत आहे की, 'प्रत्येकाने आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा नव्हे, ज्येष्ठांसाठी तर हे अत्यंत अत्यावश्यक झाले आहे'.
म्हणूनच....
"सावध व्हा, ऐका पुढल्या हाका !":

बुधवार, १८ जानेवारी, २०२३

😊 'वेड', लागले? की 'वाळवी', भुलली?":👌

 😊 'वेड', लागले? की 'वाळवी', भुलली?":👌

कोरोना काळामुळे गेल्या अडीच वर्षांमध्ये जे जमले नाही, ते गेल्या पंधरा दिवसात जुळून आले. पूर्वीसारखे आम्हाला लागोपाठ दोन चित्रपट बघायची अशी संधी मिळाली, ती आत्ता !

सार्या रसिकांना वेड लावणारा 'वेड' हा चित्रपट तर त्या मागोमाग जो तो, 'किती फॅन्टॅस्टिक' अशी आरोळी सोशल मीडियावर करण्यात पुढाकार घेणारा, 'वाळवी' हा चित्रपट मला देखील दोनही आवडले.

💐प्रेम हा विषय ज्याने त्याने केव्हा ना केव्हातरी प्रेमात पडून, कधी ना कधीतरी कायमच आळवला आहे यात शंकाच नाही. पण प्रेमाचा खराखुरा भावगर्भ अर्थ आणि त्या मागच्या अतूट अशा भावना, जर कोणी चपखलपणे परिणामकारकपणे मांडले असतील तर ते 'वेड'या चित्रपटाने.

प्रेम म्हणजे वेड, वेड म्हणजे प्रेम हे गणित अशा खुबीने या चित्रपटात उलगडले आहे की, त्याला दाद द्यावी तेवढी थोडीच. साहजिकच ह्या दोन चित्रपटात जर कुणाला पहिला नंबर द्यायचा तर आम्ही तरी 'वेडाच्या मागे राहू.💐

👍अर्थात 'वाळवी' मध्ये काय काय नाही हे उगाचच शोधण्यापेक्षा, आजपर्यंत मराठी चित्रपटात जे कधीही आले नाही, ते ते काय आहे ते येथे मांडणे, म्हणजे ह्या चित्रपटाला योग्य तो न्याय देणे होईल. 

प्रारंभापासून ते अखेरपर्यंत, इतकी ती 'वाळवी' डोक्याला पिंजून काढते, की ती शब्दात मांडणे केवळ अशक्यच ! 

त्यासाठी प्रत्यक्षात थिएटरमध्ये जाऊन तो अनुभव घेणे अधिक श्रेयस्कर. उघड उघड विवाहबाह्य संबंध आणि त्यातून निर्माण होणारी टोकाची खुनी व्रुत्ती, त्यासाठी केलेले काटेखोर नियोजनाचे प्रयत्न आणि अर्थातच नियोजनाचा फुसका बार फसण्याचा, प्रेक्षकांना अधिकाधिक गोंधळात टाकणारा प्रसंग, यांनी चित्रपटाची उत्कंठा, क्षणाक्षणाला वाढत जाते. 👌

👍त्यानंंरचे, ज्ञात इंग्रजी थ्रीलर चित्रपटांच्या तोडीस तोड, एवढेच काय पण त्यांना तोंडात मारेल असे टेकिंग, यामुळे प्रेक्षक आपल्या खुर्चीतच अक्षरशः दिगमूड होऊन जातो. 

'क्लायमॅक्स' या शब्दाला साजेसा, असा तो धक्कादायक क्षण तर कधीही न विसरण्याजोगा ! 

म्हणूनच

चित्रपटगृहातून बाहेर पडताना,

'करावे तसे भरावे !' 

किंवा 'पेराल तेच उगवेल' 

हा मिळालेला संदेश 

हेच 'वाळवी'चे सार तो घोळवत रहातो !"👌

शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

"कावळ्यांची शाळा !"

 👍"👍"कावळ्यांची शाळा !": 😊

योगायोग काय बघा, काल आणि आज मी डॉक्टर

ज्ञानेश्वर मुळे यांचे "चिंतन", "मुंबई अस्मिता वाहिनी"वर ऐकले. निसर्ग आणि आपण यांचे नाते उलगडणारे, अंतर्मुख करणारे विचार, माझे डोळे उघडून गेले. 

पहिल्या भागात त्यांनी सांगितले की, माणूस निसर्गावर आपल्या विकासासाठी, सुखासाठी अन्याय करत आहे आणि त्यामुळे कित्येक प्रजाती हळूहळू नष्ट होत आहेत. हा सारा मार्ग विनाशाकडे नेणारा आहे, असा त्याचा सारांश होता. म्हणून माणसाने निसर्गाबरोबर राहायला शिकलं पाहिजे, नाहीतर विनाश अटळ आहे असे त्यांनी ठासून सांगितले. 

तर दुसऱ्या भागात त्यांनी दाखवून दिले की, निसर्ग आपल्याला कायम आवडतो, आपण निसर्गाकडे गेलो की आपले मन शांत होते,  अनेक कल्पना सुचू शकतात. विचारवंत नवतत्त्वज्ञान निर्माण करू शकतात आणि अध्यात्माकडे जाणाऱ्यांना मुक्तीचा, समाधीचा मार्ग सापडू शकतो, इतका निसर्ग अद्भुतरम्य आहे ! त्याची विविधता थक्क करणारी आहे. आपल्या डोळ्यांचे पाळणे फिटवणारे  सामर्थ त्या निसर्ग सौंदर्यात आहे. म्हणून सौंदर्य कुठे इतर ठिकाणी पाहायला जायची गरज नाही. निसर्गामध्ये अनेक अशा सामर्थ्याच्या खुणा आहेत. 

निसर्गापासून आपण दूर चाललो आहोत, ते थांबलं पाहिजे. निसर्गाला आपलंसं करा, कारण पंचमहाभूतांनी हा निसर्ग बनलेला आहे, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. आपलाही जन्म निसर्गापासून झाला आहे आणि लय देखील निसर्गातच होणार आहे. यास्तव अधून मधून तरी बाहेर पर्यटनाला जा, निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घ्या असा त्यांचा विचार, आपल्याला देखील एक नवा मार्ग दाखवतो, नवीन प्रेरणा देतो. 

साहजिकच आज सकाळी मी चहा पिताना आमच्या गॅलरीतल्या खिडकीतून समोर बघितले, वेगळ्या दृष्टीने. चांगली हिरवीगार झाडी, उंचच उंंच झाडं आमच्या सभोवताली आहेत. त्यावर मला दिसले की, "कावळ्यांची शाळा" भरली होती. सुरुवातीला कुठल्यातरी झाडावरच्या फांदीवर एखाद् दोन कावळे येऊन बसले, मग एकाचे दोन, दोनाचे चार असं करता करता, वेगवेगळ्या झाडांवरच्या वेगवेगळ्या उंचीवरच्या फांद्यांवर जवळजवळ 25 ते 30 कावळे जमा झाले आणि त्यांची शाळा सुरू झाली ! आश्चर्य असे की, वर्गात आपल्या जशी मुलं तासाला आहे तिथेच बसतात, तसं त्यांचं नव्हतं. त्यांना क्षणभर जरी बसलो तरी करमत नसावं. त्यामुळे क्षणाक्षणाला एक कावळा इकडून तिकडे, दुसरा कावळा तिकडून इकडे, असे रमत गमत फिरत होते आणि ते बघणं खरोखर गमतीशीर होतं.

प्रत्येक कावळा किती वेळ एका ठिकाणी बसतो, हे पाहण्यासाठी जणू आपल्याला स्टॉप वॉच वापरायला हवं. काय त्यांचं चालतं देव जाणे !  काळेभोर पिसांनी भरलेले अंग, राखाडी रंगाची मान आणि काळेभोर तोंड व चोच अणकुचीदार. मध्येच टोचायचं फांदीवर, काय वेचायचं देव जाणे आणि इकडे तिकडे मान वळवत राहायचं, भूरकन् उडायचं. अशी त्यांची शाळा पाहत राहिलो, किती वेळ ते कळलच नाही. पण पाहता पाहता बहुदा त्यांचा तास संपला आणि प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी दूरदेशी उडूनही गेला. 

काय काय चालतं त्यांचं कोण जाणे, कुठली त्यांची भाषा ! दिवसभर इकडे तिकडे फिरत असतील, पण रात्री ते कुठे राहतात, त्यांचं घर कसं असतं, ते झोपतात पण कुुठे, काय करतात आणि कसे झोपतात, सारा गुढ प्रकार. खरंच एका प्रजातीचे जर एवढे आगळेेवेेळे खेळ, तर शेकडो नव्हे हजारो प्रजाती सामावणाऱ्या  निसर्गामधील विविध प्रजातींचे जग किती वेगळे असेल !  माणसांच्या जगापेक्षा या प्रजातींचे जग, किती अद्भुत असेल, खरंच कल्पनाच करवत नाही. वनस्पती आणि त्यांचे जग, हे तर शिवाय विचारातच घ्यायला हवे. कारण ते सर्वच बिचारे आयुष्यभर एकाच ठिकाणी आपले पाय रोवून असतात !

खरंच, नवल आहे. आज मी वेगळ्याच जगात वावरत होतो आणि असे निसर्गाची नाते जोडणारे क्षण वेचत होतो. अधून मधून तसे तरी क्षण यावेत, ही प्रार्थना करतो. तुम्हीही विचार करा,  कधीतरी निसर्गाकडे डोळे उघडून उघडून पहा आणि नव्या जाणीवा, नवनवे अनुभव आपल्या मनामनात रुजवा !

धन्यवाद 

सुधाकर नातू


☺️ "क्रिकेटचा अतिरेक थांबवा !":☺️

 ☺️ "क्रिकेटचा अतिरेक थांबवा !":☺️

"श्रीलंका दौऱ्यानंतर, दरमहा रतीब घातल्यासारखा वेगवेगळ्या संघांबरोबर सामने ! खेळाडूंची दमछाक होईल, इतके खेळायला लावणे आणि क्रिकेटचा कोंबड्या झुंजवाव्या असा बाजार भरवणे,
कितपत योग्य आहे?

"अति तेथे माती !"
याकडे कोणी लक्ष देणार की,
नाही??
विचार करा
आणि....
तुमचे मत सांगा.....
Few selected responses to above....

1 Lalit:
Fully agree.

Stopped watching after the Fixing scam broke.

Crorepatis doing some sort of commercial sport and rest of us hard working folk  wasting time watching their antics to earn more money.

Many would not even know that there is no Nation involved here only Private Cricket Bodies.

2 Jayant:
I completely agree with this, Mama. We have way too much focus on Cricket. And that comes at the expense of much less focus on any other sport.

It hurts me to no end that India could not send a team in the recently concluded Soccer World Cup tournament; we couldn’t make it even to the field of 32 countries. Next time onwards, it’s going to be extended to a 48-country tournament but I won’t be surprised to not see India in it. In fact I am quite confident that India will not be in it.

I have been equally disappointed with no Indian showing up in any of the tennis grand-slams (Australian, French, Wimbledon, or US), when countries such as Kazakhstan have had champions. Half the population of the world won’t even be able to spot Kazakhstan on the World Map.

I can go on. I have suggestions to fix this as well, if anyone cares to listen. I don’t just come with criticism…

3 S

"कपिल देवने ह्या प्रश्नाला छान उत्तर दिले होते!
“अगर आपको ज्यादा खेलनेका pressure है तो आप खेलते क्यों हो? छोड दो खेलना. कोई जबरदस्ती नही है.”

वैसेही हमे देखने को किसने कहा है?"

4 Ajit
maze mat - mi sahamat aahe agadi barobar
especially Sri Lanka bilateral is a joke

koni laksha denar ki naahi - nahi bcci will not kill the golden goose!

5 Vidyadhar
I fully agree with you.

6 Manoj
Apan baghava ki nahi apla prashna aahe,shevati remote aplya hatat...nusate record ..pan quality cricket kadhich samplay.

7 Anuradha
मी सचिन रिटायर झाल्यावर एकही मॅच पाहिली नाही, 20 20 तर नाहीच नाही.

8 Pankaj
खड्यात गेलं क्रिकेट.

9 Vaibhav
अती प्रसिद्धी दिली जात्ये क्रिकेट ला.खूपच अतिरेक आहे आपल्याकडे.हे माझं वैयक्तिक आणि ठाम मत आहे.

10 Hemant
आपली टीम हारली की अशी बोलणी सुरू होतात  !! 😄😄....

11 Herabh
त्यांना खेळू दे
आपण नाही बघायचं
👍

इत्यलम्....

धन्यवाद
सुधाकर नातू