रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

"हार जीतचा हा लपंडाव !":

 "हार जीतचा हा लपंडाव !":

क्रिकेट हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आणि अत्यंत आवडीचा विषय. गल्लीबोळात क्रिकेट खेळणे बालपणापासून जे सुरू होते ते अगदी प्रौढत्व येईपर्यंत. त्यातून आमच्या वेळी क्रिकेट मॅच बघायला न जाता प्रत्यक्ष मॅच बघायला मिळाल्याचा आनंद देणारा टीव्ही नव्हता. त्यामुळे रेडिओ वरच विजय मर्चंट डिकी रत्नगर आदींच्या कॉमेंट्रीज् ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो.

मी साधारण दहा वर्षाचा असतानाची आठवण अशी की, आमच्या पंचक्रोशीतील कुठल्याशा संमेलनात मी इंग्रजीमध्ये क्रिकेटची रनिंग कॉमेंट्री अगदी विजय मर्चंट यांच्या अविर्भावात सादर केली होती. इंग्रजी मुळाक्षरे नुकतीच गिरवायला लागलेल्या मला त्या प्रयत्नाबद्दल बक्षीस व कौतुक प्राप्त झाले होते. योगायोगाने नोकरीत असताना प्रत्यक्ष विजय मर्चंट यांच्याशीही पत्रव्यवहार आणि नंतर त्यांच्या मिलमधील आलिशान ऑफिसमध्ये प्रत्यक्ष भेट देखील होऊन गेल्याचे स्मरते. दुसरी आठवण: आमच्या स्नेहसंमेलनाचे वेळी क्रिकेट मॅचेस व्हायच्या आणि त्यामध्ये मला आठवते की, एका संमेलनात बक्षीस समारंभात तर, सर्वोत्कृष्ट बॉलर म्हणून मला चक्क प्रमुख पाहुणे असलेल्या रुबाबदार व देखण्या श्री फरुक इंजिनियर यांच्या हस्ते बक्षीसही मिळाले होते. तो फोटोही माझ्या संग्रही आहे. या अशा मधूर आठवणी संभाळत आम्ही लहानाचे मोठे कधी झालो ते कळलेच नाही.

पहाता पहाता कदाचित आता मी हा प्रवाहाविरुद्ध जाणारा बनलोही असेन आणि त्याचे कारणही तसेच आहे. क्रिकेटची एवढी क्रेझ आता माझ्यापुरती तरी उरली नाही हेच खरे. त्याला कारण एक म्हणजे आमच्या वेळेला फक्त पाच दिवसांची ब्रेबाँर्न स्टेडियमवरची क्रिकेट टेस्ट मॅच नाँर्थ स्टँडमधून बघणे वा इतर ठिकाणच्या कॉमेंट्रीज् ऐकणे एवढाच क्रिकेटचा बोलबाला होता.

पण आता काळ बदलला आणि क्रिकेटला बाजारू स्वरूप आले आहे वा जाणीवपूर्वक आणले गेले आहे. टी ट्वेंटी आयपीएल आयसीसी वर्ल्ड कप अशा अनंत प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊन, त्यांतून पैशांचा पाऊस पडण्या व्यतिरिक्त खरंच काय वेगळं साधलं गेलं कळतच नाही. म्हणूनच कदाचित आता माझी ही अशी क्रिकेटची आवड कमी झाली असेल.

त्यातून टीवीवर क्रिकेट मॅच बघणे हा प्रकार मला तितकासा आवडत नाही. त्या तुलनेत बॅडमिंटन किंवा टेनिस वा फुटबॉल यांच्या मॅचेस बघणे अधिक उत्कंठा पूर्ण असते. जवळजवळ प्रत्येक क्षणाला पारडे बदलत असते आणि ती जी काही गंमत असते ती अवर्णनीयच. लंडनच्या वास्तव्यात चक्क विम्बल्डन स्पर्धेचा खेळ मला टीव्हीवरून बघायला मिळाला होता व तोअनुभव न विसरण्या जोगा असाच होता. T20,ओडीआय आणि टेस्ट मॅच हे सर्व क्रिकेटचे प्रकार किती झालं तरी वेळ काळ काढू आणि थ्रील न निर्माण करणारेच. आणि क्रिकेट म्हटलं, तर मला फक्त भारताबरोबर कुठल्या देशाची मॅच असली, तरच बघाविशी वाटते. इतर देशांच्या मॅचेस कारण नसताना मी सहसा बघतच नाही.

अर्थात इतरांना आयपीएल t20 वर्ल्ड कप इ.इ. अशा स्पर्धात्मक मॅचेस बघायला खूप खूप आवडतात, आणि म्हणूनच मी म्हटलं मी प्रवाहाविरुद्ध जाणारा आहे हे कदाचित सांगत असेन. तरुण व मध्यमवर्गीयांचे सोडा, शाळकरी, नातवंडं शोभतील अशा मुलांना तर आजकाल प्रत्येक मॅच बघायला हवीहवीशी वाटते. गंमत अशी की, त्यांना बहुधा सर्व देशांच्या, सर्व खेळाडूंचा पूर्ण कारकीर्दीचा इतिहास माहीत असतो. आता या वयात आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना ते काही ध्यानात ठेवणे अशक्यच असते.

अजून एक मुद्दा प्रामाणिकपणे सांगायचा तर, भारताबरोबर जर इतरांची मँच चालू असेल, तर शक्यतोवर मला भारताची बॅटींग बघायला आवडते आणि प्रतिस्पर्धी संघाचे बॅटिंग जर जिंकण्याच्या दिशेने जात असेल, असा जर खेळ चालू असेल. तर मी ती बॅटिंग नंतर बघतच नाही. आज सारं हे आठवायला कारण म्हणजे कालची भारत पाकिस्तान मधील World cup मधील, टी-20 ची सलामीत, मी फक्त भारताची अडखळत ठेचकाळत जाणारी बँटिंग पाहिली आणि नंतर पाकिस्तानची पहिली जोडी जेव्हा 50 धावा झाल्या तरी आऊट झाली नाही, ते पाहून मी चक्क टीव्ही बंद करून झोपी गेलो.

माझा मागचा एक अनुभव बरोबर उलटा होता, तो आठवला. अशाच स्थितीत भारत असताना व आपल्या विजयाची शक्यता कमी आहे असे वाटून मी टीव्ही बंद केला होता. पण दुसऱ्या दिवशी खरोखरच चमत्कार घडला आणि अशक्य असा भारताचा विजय खेचून आणला गेला होता. तसेच काही तरी आता घडेल असे मनोरथ करीत, काल
मी झोपी गेलो.

आज सकाळी उठताना, तसाच काहीतरी चमत्कार घडेल असे वाटून, मनात धडधडत बातम्या बघायला गेलो खरा आणि आपला दारुण पराभव झाला, हे कटू सत्य उमजले व माझे मन निराश झाले. भूतकाळात न गुंतता, वर्तमानात घट्ट पाय रोवूनच उज्वल भविष्य घडविता येऊ शकते, ह्याची जाणीव झाली. हार जीत हा तर जीवनातील व खेळांतील लपंडाव तर असतो, हे देखील मनाला पटले. नेहमी आपलीच जीत होईल असे मांडे खाणे योग्य नव्हे हे पटून गेले.

एक मात्र खरे, आपण काल नंतर मॅच बघितली नाही हे बरे झाले असेच वाटून गेले.

सुधाकर नातू

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

वाचाल, तरच वाचाल !" आणि लिहाल, तर सावराल !":

 "वाचाल, तरच वाचाल !" आणि लिहाल, तर सावराल !":


वाचनासारखा दुसरा कुठला छंद नाही. वाचता वाचता आपणही स्वत:शी संवाद कळत, न कळत करत रहातो, आपलेही अनुभव पडताळून पहातो. नवीन माहिती वा ज्ञान तर मिळतेच, पण माणसांचे स्वभाव, भावभावना ह्यांचेही चित्र, विविध वाचनातून उभे रहाते.

पण आज संगणक, मोबाईल ह्यामुळे माहितीचा महासागर, बोटाच्या एका क्लिकवर मिळत असल्याने, हातात एखादे पुस्तक घेवून ते वाचायचे कुणी कष्ट घेत नाही. शिवाय जीवन अधिक धकाधकीचे, स्पर्धेचे झाले आहे. सहाजिकच सारे वेगाने, झटपट हवे असते आणि ते नवतंत्राच्याद्वारे मिळू शकते. वर्तमानपत्रे,पुस्तके, काय अडले, ते ते संगणक वा मोबाईलवर उपलब्ध असते. म्हणूनच आजकाल वाचनालयांचे सभासद प्रौढ माणसेच असलेली दिसतात. फेसबूक, वाँटस्अँप इ.इ... अशांसारख्या सोशलमिडीयांमुळे तर सर्वांना अक्षरश: वेड लावले आहे. सहाजिकच वाचनसंस्क्रुती हळू हळू कमी होत चालली आहे, हे चांगले नव्हे. माणसाला स्वतंत्रपणे विचार करायला लावणारी वाचनाची सवय इतिहासजमा होण्याचा धोका आहे.

"सिंहावलोकन":

गेल्यावर्षी मार्चनंतर कोरोना महामारी आल्यामुळे वाचनासारखा आपल्याला दुसरा कुठलाच विरंगुळा नव्हता. कर्मधर्मसंयोगाने दिवाळीनंतर व आसपासच्या काळात, माझ्याकडे दहा/बारा दिवाळी अंक तसेच बरीच पुस्तके माझ्या मुलाने मला उपलब्ध करून दिली होती. त्यांची मी नोंद घेतली होती. आज मागे वळून पाहताना काय वाचले आणि अजून काय वाचावयाचे राहिले, ते याप्रकारे आहे. खरंच वाचनाची मला जर आवड नसती, तर हा पावणेदोन वर्षांचा काळ कसा गेला असता, कुणास ठाऊक. म्हणून म्हणतो "वाचाल तरच वाचाल !":

माझी नोंद:
पुस्तके /दिवाळी अंक # - वाचलेले
पुस्तकाचं नांव:
# 1 आठवणींचे असेच असते # वाचले
लेखक संपादक अरुण शेवते
2 पुस्तकाचे नांव:आनंद पर्व
लेखक: गुरूमाऊली भागवत
# 3आपण यांना ओळखता # वाचले
बिपिनचंद्र ढापरे
# 4 इसापनीतील छान छान गोष्टी वाचले
बाबा भांड
5 आसपासच्या गोष्टी
भारती पांडे
# 6 इंडस्ट्री 4 नव्या युगाची ओळख # वाचले
डॉक्टर भूषण केळकर
7 गुरुचरित्र कथासार
जितेंद्रनाथ ठाकूर
# 8 किस्से शास्त्रज्ञांचे # वाचले
प्राध्यापक सुनील विभुते
# 9 एकशे एक प्रेरणादायी कथा
जी फ्रान्सिस झेवियर# वाचले # वाचले
# 10 कर्हेचे पाणी-खंड 7
मीना देशपांडे
# 11आनंद योगी पुल # वाचले
ना धो महानोर
# 12 युगंधर नेते यशवंतराव चव्हाण
संपादक वा ह कल्याणकर
13 बिल गेट्स
डॉक्टर अनंत लाभसेटवार
14 खरं सांगायचं तर, (स्मरण रंजन)
माधव खाडिलकर
# 15 शहाण्या माणसांची फॅक्टरी
डॉक्टर सलील कुलकर्णी
# 16 सुखाचा शोध # वाचले
वि स खांडेकर
# 17 कर्म सिद्धांत # वाचले
हिराभाई ठक्कर

# सर्वच वाचले "दिवाळी अंक-२०२०"
ऋतुरंग, पद्मगंधा, लोकमत उत्सव, महाराष्ट्र टाइम्स, मौज, दीपावली, मणी पुष्पक, अक्षर, कालनिर्णय,
अंतर्नाद, ग्रहांकित, जय जप तप.

--------------------------
हे सर्व वाचता वाचता दिवाळी अंक व पुस्तकांच्या बाबतीत हे जाणवले की पुस्तके वाचली की आपण घरातच न ठेवता इतरांना देत जावी. त्यामुळे
वाचनसंस्कृती वृद्धिंगत होऊ शकते. तेव्हापासून मी शक्य होईल तशी, पुस्तके अथवा दिवाळी अंक इतरांना वाचल्यावर देत आलो आहे. त्यातही मला आनंद व समाधान मिळवून गेले आहे......

"लिहाल तर सावराल !":
वाचण्याप्रमाणे मला घेण्याचाही चांगला धंदा आहे आणि आतापर्यंत माझे अनेक लेख विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत स्मार्टफोन मिळाल्यापासून मी उत्तरोत्तर प्रगती करत स्वतःचा ब्लॉग आणि व्हिडिओ चॅनेल, युट्युबवर, त्याचप्रमाणे ऑडिओ अर्थात ध्वनिफिती बनवणे यात देखील माझा उपलब्ध वेळ उपयोगात आणत गेलो. त्यामुळे ह्या कसोटी पहाणार्या काळात, कधीही निराशा तर आली नाहीच, परंतु नवनवीन कल्पना सुचत, उत्साह आणि आनंद व्रुद्धिंगत होत गेला.

लिहिण्यासारखा देखील उपयुक्त आणि अंतर्मुख होऊन, स्वतःची स्वतःला ओळख करून देणारा दुसरा कुठलाही छंद नाही. त्यामध्ये तुम्हाला तुमची निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती यांना चांगल्यापैकी उपयोगात आणून अनुभवसंपन्न, नवनिर्मिती करता येते आणि झालेली नवनिर्मिती, कविवर्य विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे, "घेता घेता, देणाऱ्याचे हात हजार घ्यावेत", तसेच आपण आपले हे विचारधन आणि अनुभवधन अनेकांना सोशल मीडियाच्या साहाय्याने देऊ शकतो आणि त्यांच्या भावभवतालाला अधिक समृद्ध करू शकतो.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....

खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......

ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......

आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....

धन्यवाद
सुधाकर नातू

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

"Noble Thoughts":

 °Noble Thoughts":


# "Unparallel Determination":

Stones, Mountains, buildings and all the non-living beings have size, shape and mass but they don’t have Life. What they have is unparallel determination to be stationary and remain where they are for ages. We must take that unparallel determination from them.

# "Be Firm to your Roots" :

The Trees have roots, enabling them to remain put, firmly and solidly there and then, come rain or storm, all their Lives. We, human beings should take a lesson from them and must remain firm to our roots-i.e. values and virtues. The World would be really, a heavenly place to live in and cherish.

# "Knowledge is Power":
In the modern World today, no one can afford to be illiterate and every one for his survival needs to know how to read, write and to comprehend. Further on, the computer literacy to be a MUST is now the need of the hour in 21st Century.

On similar lines, to understand the probable Road map of one’s own Life & to face the ever changing challenges appropriately, one must be literate with basic knowledge of Astrology. Such an unawareness would enable him to build up a responsive Mindset from Time to Time, to face the good or bad experiences as they come along.

Unfortunately, very few accept this reality & are prepared themselves, while all others walk Life blindly. In line with this ideology, as a hobby, I have been trying to understand Indian Astrology for the last few decades.
With Moral Power virtually being a thing of the Past, now unfortunately, only the Money Power & Muscle Power rule.

# With Moral Power virtually being a thing of the Past, now unfortunately, only the Money Power & Muscle Power rule.

# "Wonder of Self Motivation":

I was always wondering why an audio clip can't be uploaded on Face book page. Therefore I sought advice on whatsapp and I was guided by one of my friends to use Google drive to create a link of an audio clip.

I followed the steps in the advise given and to my surprise I was able to create the link for my one year old audio file. As a coincidence the clip happens to be on Self Motivation.

Moral of the story is 'After all, Inquisitiveness leads to an urge for self learning, which culminates into some Achievement & that further triggers of Self Motivation.'

# "Motivation &
Inspiration":

The meanings of the two words, Inspiration and Motivation appear to be look a like but they do have a difference. While Inspiration is a force that triggers creative ideas, the Motivation is an inner urge to take actions to convert those ideas, into reality. Thus the Concept herein is an outcome of Inspiration and apt explaination
Of it, is the child of the Motivation.

# It is high time now, that the Responsibility and Accountability get the Priority and Place, they deserve.

# "Unfulfilled ambitions haunt till the end & the person doesn't bother about adverse consequences of his actions."

# "Elections-Reforms !":
To get the correct picture of the opinion of the people in Elections, Voting must be made compulsory and one's Vote should have a value according to his age group.

If the life expectancy is assumed to be 70 years then value of Vote for age group-61 to 70 + onwards to be 1, for age group 51 to 60 it should be 1.1, for 41 to 50 it should be 1.2, for 31 to 40 it should be 1.3, finally for the youngest group upto 30 it should be 1.4;

This is because the future of younger group is more at stake than the older one.
Any takers/responses?.....

( 👍N.B. These have been few of my Select Postings on Social Media.👌)

Thank you
Sudhakar Natu

"अजून काय काय भयानक होणार, हा यक्षप्रश्न !":

 अजून काय काय भयानक होणार ? हा यक्षप्रश्न !"


"यक्षप्रश्न":
धकाधकीच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जीवनामध्ये, विरंगुळा म्हणून करमणुकीचे काही चार क्षण प्रत्येकालाच हवे असतात यात वाद नाही. सुखदुःखे नेहमीचे ताण-तणाव यापासून काही क्षण असे समाधानाचे मिळणे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असते. विविध माध्यमांतून आपल्या कलाविष्कारातून कलाकार आपआपल्या परीने दर्शकांचे समाधान करत असतात. त्यामुळे त्यांना कदाचित अवाजवी प्रसिद्धीही मिळते, तसेच त्यांचे एकंदर आर्थिक आर्थिक जीवनमानही पूर्वीपेक्षा, पुष्कळच चांगल्या दर्जाचे आहे. त्यामुळे सेलिब्रिटी म्हणून कलाकारांचे नांव नेहमीच अग्रणी असते.
पण कदाचित आज-काल अशा सेलिब्रिटींच्या मागे वेड्यासारखे धावणे आणि त्यांना माध्यमांनी ही अवास्तव असे महत्त्व व प्रसिद्धी देणे हे योग्य आहे कां, याचा सगळ्यांनीच विचार करायला हवा. निकोप समाजमनाचे हे निश्चितच लक्षण नव्हे.

खरं म्हणजे करमणूक हा फक्त जीवनाचा एक छोटासा भाग, त्यासाठी कलाकारांना इतके
डोक्यावर चढवणे, निश्चितच अनिष्ट व अप्रस्तुत म्हणायला हवे. दुर्दैवाने काळाचा महिमा असा की, कोणे एके काळी घरातून पळून गेलेली माणसे नाटक सिनेमातून कलाकार होत असत, परंतु त्यांना आजच्या कलाकारांएवढी प्रसिद्धी ,आमदनी आणि मानसन्मान खचितच मिळत होता. त्या तुलनेत आजकाल जे चालले आहे, त्याचा निश्चितच गांभीर्याने सगळ्यांनीच विचार करायला हवा आहे. शास्त्रज्ञ, प्राध्यापक, उद्योगपती असे इतर कितीतरी समाजातील घटक हे आपापल्या परीने समाजहितासाठी योगदान देत असतात. परंतु एकंदर
समाजमनाच्या महत्त्व, प्राधान्य देण्याच्या उतरंडीमध्ये, त्यांचे स्थान कलाकारांइतके तर नसतेच, नसते. उलट कलाकार हे अगदी वरच्या पायरीवर मांडलेले आपल्याला दिसतात. समाजाची एकंदर विचारसरणी व नीतीमत्ता यांच्यात नको असा हा आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसत आहे.

हे सारे आपल्याला कुठे नेऊन ठेवणार, याचा कोणी विचारच करत नाही. त्या जोडीला,नित्यनवीन घोटाळे, गुन्हेगारी वा अनाचार, भ्रष्टाचार आदी जे जे अयोग्य आणि अनिष्ट तेच सातत्याने घडत असते आणि दिवसेंदिवस "हे कलियुग आहे", असे सामान्यजनांनी म्हणत राहून येणारा दिवस पुढे ढकलावयाचा, हे वास्तव भयावह नव्हे कां?

उद्या काय आणि कसे होणार हा यक्षप्रश्नच आहे.

###################### ##

"प्रेक्षकांची ऐशी की तैशी !!":
मोठ्या सुनेला पुढे शिकू न देणारी जहांबाज हम करे सो कायदावाली, जीजीअक्कासारखी सासू आणि तिच्या समोर नेहमी नांगी टाकणारे सारे कुटुंबीय, नाना क्लुप्त्या वापरत, येनकेन प्रकारेण स्टार प्रवाह मालिकेतील "फुलांचा सुगंध" शाबूत ठेवण्याचा आतापर्यंत आटोकाट प्रयत्न करत होते खरे, पण आता अवतारी बाबा की बुवांचे आगंतूक पात्र आणून अंधश्रद्धेच्या पोरखेळांमुळे बहुधा त्याची माती करणार असे दिसते ! त्याचे दोन फायदे-एक तर मालिकेला वळण देत लांबवता येते आणि दुसरा कामाच्या शोधात असलेल्या बुजुर्ग कलाकारांचा मीटर बंद होत नाही, हे जरी खरे, तरी "प्रेक्षकांची ऐशी की तैशी" हेही तितकेच खरे !!

प्रसिद्धी माध्यमांनी देखील अशा आगांतुक बुवाबाजी पात्रांना अवास्तव महत्व न देता उल्लेखाने त्यांना टाळणे इष्ट नव्हे का मालिकांमध्ये उगाचच पाणी घालून त्या लांब होणार्‍या अशा पद्धतीला त्यामुळे प्रोत्साहन दिले जाते.
###################### ##

फेसबुकवरील....
मेघना वैद्य ह्यांचा हा संदेश:

"कलाकारांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याबद्दल गंभीरतेने विविध पातळीवर विचार करण्याची वेळ आली आहे असं वाटतं. Rather it's high time. काम आणि पैसे मिळण्याबाबतची असुरक्षितता हे सगळं स्वीकारूनच तुम्ही या व्यवसायात येता ना? हा प्रश्न कलाकारांच्या तोंडावर फेकणं सोप्पं आहे. पण तरीही Reality shows / Serial shootings चे
1)hazardous working hours (14 to 16 hrs per day 😦)
2) त्यातून कमी विश्रांती मिळाली तरी चेहरा नीट फ्रेश दिसला पाहिजे याचा येणारा ताण.
3) हे करत असताना पैसे वेळेवर मिळेपर्यंत वाटणारी anxiety

यामुळे त्या कलाकाराची आणि पर्यायाने त्याच्या कुटुंबाची न भरून येणारी हानी होत असते म्हणून हा प्रश्न ऐरणीवर येणं गरजेचं आहे.
काय वाटतं तुम्हाला?

ह्यावर माझा प्रतिसाद:
"कलाकारांच्या कामकाजाविषयी येणाऱ्या अडचणींची ही बाजू जरी विचारात घेण्याजोगी असली तरी, त्यांना अनाहुतपणे मिळणाऱ्या फायद्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सर्वसाधारणपणे कोणत्याही नोकरी-व्यवसायात वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी अथवा आव्हाने असणे हे स्वाभाविक असते. परंतु कलाकारांना त्यांच्या कामगिरीमधून जी विशेष प्रसिद्धी आणि आत्मसन्मान मिळतो, तसेच कलाविष्काराला दाद मिळाल्याने आत्मसमाधान मिळते, त्या प्रकारचा अनुभव इतर नोकरदार व व्यावसायिकांना येतोच असे नाही..

सहाजिकच देणाऱ्या या अधिकच्या फायद्यांकडे कलाकारांना दुर्लक्ष करता येणार नाही. आपण व्यक्त केलेल्या व्यथेची दुसरी बाजू म्हणून हे म्हणणे मी मांडले. चुकभूल द्यावी घ्यावी घ्यावी."

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच इतरही अनेक उत्तमोत्तम लेख......
वाचण्यासाठी........
ही लिंक उघडा...........

https://moonsungrandson.blogspot.com

लेख आवडले तर.......
लिंक शेअरही करा..........

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

"मुक्तसंवाद-जन्मगांठी, कडू गोड, बर्या वाईट की, गुळपीठ?":

 "मुक्तसंवाद-'जन्मगांठी, कडू गोड, बर्या वाईट की, गुळपीठ?":

मागच्या मुक्तसंवादात "टेलीरंजन" मधून जन्मगांठ म्हणजे एकमेकांच्या फसवणुकीचा लपंडाव कसा असते ते मराठी मालिकांचे उदाहरण घेऊन दाखवले होते. आता या व्हिडिओमध्ये जन्मगांठी काही कडू काही बऱ्या वाईट किंवा विचित्र वा गुळपीठासारख्या असू शकतात, ते मराठी मालिकेमधील जोडप्यांच्या उदाहरणावरून उलगडणार आहे.

प्रथम आपल्याला सध्या गाजत असलेल्या "आई कुठे काय करते" मध्ये आढळलेली जोडपी पाहू या. पहिलं आम्हाला जोडपं नजरेसमोर येतं ते म्हणजे शेखर आणि संजनाचं. ती एक सुशिक्षित, सुस्वरूप व महत्वाकांक्षी आधुनिक स्त्री आहे. ती कदाचित अयोग्य माणसाच्या प्रेमात पडते आणि शेखरसारखा काहीसा कमी शिकलेला, चांगले कामधाम नसलेला व रावडी असलेला असा जोडीदार प्रेमात आंधळे होऊन तिने केला आहे. दुसरं उदाहरण आपल्याला अनिरुद्ध व अरुंधतीचे दिसते. अनिरुद्ध संजनाच्या सौंदर्याला भाळून तिच्याशी बारा वर्ष गुपचूप संबंध ठेवतो. संजनाचे व आपल्या नवऱ्याचे अनैतिक संबंध आहेत हे अरुंधतीच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी तिच्या लक्षात येते व तिचा भ्रमनिरास होतो, ती अक्षरशः उन्मळून जाते. साधी भोळी अरुंधती, ग्रहक्रुत्यदक्ष आणि सुस्वभावी स्त्री त्याउलट अनिरुद्ध बुद्धिमान पण बेरकी लंपट स्वतःचा सार्थ बघणारा पुरुष अशीही विचित्र जोडी.

अनिरुद्धचा धाकटा भाऊ अविनाश आणि नीलिमा यांचा संसार तर असाच धेडगुजरी किंवा तितकासा सुसंवाद जोडीदारांमध्ये नसलेला असा. कारण अविनाश तसा साधा सरळ मार्गी, मेहनती आईवडिलांची गरज जाणणारा, स्वाभिमानी तर बायको निलीमा आळशी, पक्की स्वार्थी उधळी परिस्थितीची जबाबदारीची जाणीव नसणारी आपमतलबी स्त्री. ही अशी विजोड जोडी म्हणजे मारून मुटकून संसार करणारी जोडी.

याउलट एकमेकांशी समजून-उमजून संसार करणारं जोडपं म्हणजे अर्थात अप्पा माणिक कांचंनच. त्यांनी आपला पन्नास वर्षांचा संसार गोडीगुलाबीने व खेळीमेळीच्या वातावरणात केला आहे आणि तो एक खरोखर आदर्श असाच म्हणून समजला जावा. कदाचित जी माणसं सरळ मार्गी असतात त्यांच्या बाबतीत हे असे समजूतीने व शहाणपणाने केलेले संसार असू शकतात. नशिबाने आई-वडिलांचं अनुकरण करणारी त्यांची मुलगी आणि त्यांचा समंजस जावई यांचं जोडपे तसंच अनुरूप आणि
मध्ये कारण नसताना संसारात संशयाचे वादळ येऊनही एकमेकांना सांभाळून घेणारं.

एकाच मालिकेत दिसणारी ही आगळीवेगळी जोडप्यांची उदाहरण बघून तुम्हाला पटलं असेल की दोन माणसं का एकत्र येतात कुणास ठाऊक ! ती एकमेकांशी जुळवून घेतात की नाही हेही कोणी आधी सांगू शकत नाही. साग्रसंगीत कांदे पोहे प्रोग्रॅम करून म्हणा किंवा प्रेमात पडून म्हणा विवाह केला तरी जोडीदारांना एकमेकांच्या सार्‍या व्यक्तिमत्वाची ओळख होतेच असं नाही. त्याबद्दलचं एक छान उदाहरण एका नाटकामधून आता नजरेस आणतो. ते म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानामुळे एकमेकांच्या प्रेमात पडलेले "व्हाईट लिली आणि नाइट रायडर" या नाटकातील जोडपे. माहितीच्या मायाजालात गुरफटून ओळखी होऊन परस्पर एकमेकांच्या प्रेमात ही जोडी पडते खरी,पण विवाह करण्यापूर्वी लिव्ह-इन-रिलेशनशिप सारखं आयुष्य जगायचं असं जेव्हा ती ठरवतात, तेव्हा कुठे त्यांना एकमेकांची व्यक्तिमत्वे किती विभिन्न आहेत आणि एकत्र संसार करणे किती कठीण आहे हे त्यांना ध्यानात येते. अर्थातच नंतर त्यांचा संसार सुरू होण्यापूर्वीच मोडतो हे उघडच !

विवाहाच्या वेळेला तरूण तरुणी आंधळी कां होतात याला उत्तर नाही. कदाचित वास्तव अशा जीवनात नाटकांमधून म्हणा मालिकांमधून म्हणा आपल्याला असेच अनुभव येतात. याउलट सर्वांना आदर्श ठरावे असे दोन जोडप्यांचे मी अनुभव आता सांगतो. एक जोडपं ज्यांचा प्रेमविवाह झालेला, त्यातील तरुणाशी मी जेव्हा ह्यासंबंधी संवाद साधला तेव्हा तो म्हणाला "मी प्रेमात पडलो खरा, परंतु अशाच एका तरुणीच्या जी मला सर्वस्वी अनुरूप अशीच असेल आणि मी अशी निवड केली मी आहे की माझे आई वडील झालं तर मी नकार देऊ शकणार नाहीत ! त्याचे बोलणे अगदी खरे होते दोघेही एकाच व्यवसायातील हुशार बुद्धिमान आणि एकमेकांना दिसण्यात, आवडीनिवडी देखील समान अशी अनुरूप. त्याचप्रमाणे जातीचाही प्रश्न येणार नाही अशी. शिवाय पत्रिकाही जुळतात अशी. दुसराही प्रेमविवाह आणि ही जोडीही अगदी अशीच एकमेकांना सर्वस्वी अनुरूप अशीच !

अर्थात अशी उदाहरणे अपवादानेच आढळतात. इतर वेळेला मात्र अगदी विरुद्ध असे चित्र दिसत असते. एकमेकांना पाहून केलेला विवाह असो व प्रेमविवाह तो यशस्वी होईलच याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. कारण कदाचित जन्मगांठ हा जणू काहीही न समजणारा असा जुगारच जणु असावा. एकमेकांना समजून उमजून, गुणदोष स्वीकारून समंजस व शहाणपणाने संसार करणारी जोडपी विरळाच असतात. कारण अशा तर्‍हेचे ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण दिले जात नाही. प्रत्येकाने आपापल्या स्वभावाप्रमाणे संसाराचा हा सारीपाठ खेळायचा असतो वा उधळायचा असतो. "जन्मगांठी, कडू गोड, बर्या वाईट की, गुळपीठ?": साराच अगम्य असा हा नियतीचा खेळ दुसरं काय म्हणायचं ?

धन्यवाद
सुधाकर नातू