"मनांतले, जनांत!-१":
"भूतकाळाचा गर्भितार्थ समजत, वर्तमानातील अन्वयार्थाच्या दिशेने मार्गक्रमणा केली
तर, भविष्यात क्रुतार्थता लाभते."
"भाऊबंदकी, फितुरी आणि निष्क्रियता ह्यामुळे भवितव्याचा कायम र्हास होत रहातो."
"स्वार्थ सोडून, निस्वार्थ बुद्धिने चरितार्थ करायचे ठरवले, तरच जीवनांत खराखुरा चिरस्थायी अर्थ निर्माण होऊ शकतो."
आणि अखेरीस,
"कोड़े: कधीही न सुटणारे":
---------------------------------
माणूस मरतो, तेव्हांच कां मरतो? कुणी जन्मत:च, तर कुणी बालपणी वा कुणी एेन तारूण्यांत, तर काही प्रौढपणी, तर काही वृद्धापकाळी हे जग सोडून जातात. प्रत्येकाचे मरतेवेळी वय भिन्न असते, असे कां????....
--------------------------------
"चूक की बरोबर?":
आपण चूका करतो त्याची कल्पना तेव्हा येत नाही. त्यावेळेला घेतलेले निर्णय हे बरोबरच आहेत असं वाटत असतं. परंतु गंमत अशी घडते की, जे काही निर्णय घेतले, ते चूकीचे होते ते आपण घ्यायला नको होते असे केवळ
कालांतरानेच ध्यानात येतं.
चूक आणि बरोबर यांचा लपंडाव असा सतत चाललेला असतो आपल्या आयुष्यात! त्यामुळेच आपल्या सुखदुःखांच्या ऊन सावल्या आपल्याला जीवनात येतच रहातात. कदाचित त्याच्यावर उपाय नसावा.
२५/७/'१९
######################
सगळ्या आयाराम, गयारामांना मतदारांनीच शहाणपणाने, पराभवाच्या वनवासांत पाठवणे अत्यावश्यक नाही कां?
########################
" सोशल मिडियाचा वापर":
शक्यतो मी माझे स्वनिर्मित संदेशच सोशल मिडीयावर पोस्ट करतो. हा नवनिर्मितीसाठी उत्तम प्लँटफाँर्म आहे असा माझा समज आहे. त्यामुळे २०० हून अधिक लेख मी माझ्या ब्लॉगवर लिहू शकलो आणि कदाचित चांगले आवडीची पावती मिळविणारे स्वनिर्मित शेकडो संदेश मी सोमिवर पोस्ट करू शकलो.
सर्वात महत्वाचे मी जवळ जवळ कधीच मला आलेले संदेश पुढे ढकलत नाही. ते मी वाचल्यावर डिलीट करत़ो. अनामिक विडिओ न उघडताच डिलीट करतो. फोटोही पुष्कळदा असे डिलीट करतो. त्यामुळे माझा वेळ, डोके वापरण्याचा त्रास व डेटा वाचू शकतो.
आपण पाठवलेला संदेश पुढे किती जणांना कदाचित कोणाकोणाला देखील, पुढे ढकलला जातो, ते तो संदेश पाठवणार्याला कळले पाहिजे. दुर्दैवाने आपला संदेश पाठविणार्याने वाचला एवढेच सध्या तरी कळते.
########################
"कोरडे पाषाण":
उपदेशाम्रुत फक्त क्षणिक आणि वाचण्यापूरते उपयुक्त असते. अशा तर्हेच्या टिप्स पैशाला पासरी दररोज समोर येतात. असे असूनही आपण कोरडे पाषाणच रहातो.
व्यक्ती तितक्या प्रक्रुती, ह्या न्यायाने जो तो आपल्या कुवतीनुसार व अनुभवाप्रमाणे शिकतो, धडपडतो आणि चुकांमागून चुका करतच रहातो. 'करावे, तसे भरावे' ह्यानुसार जगरहाटी चालते, चालणार आहे व चालत राहील, हेच खरे!
#######################
।। "जीवन त्यांना कळले हो"।।
माणूस जेव्हा एकांतात स्वतःशी हृदय संवाद करायला बसतो, तेव्हा तो मागे वळून आयुष्याचा लेखाजोखा घेतो. काय चुकले, काय मिळाले, काय गमावले, काय भोगले आणि कुठे आलो, कुठे होतो असा त्याच्या जीवनाचा तो जमाखर्च असतो.
असे करताना कळत नकळत त्याच्या मनात विचार येतो, जीवनाचे प्रयोजन काय, अर्थ काय, हे अहंकार राग लोभ गर्वाचे खेळ, सारे कशासाठी, कुणासाठी?
आणि अशा वेळेला, त्याला अचानकपणे, लहानपणी शाळेमधली ती कविता आठवते, आणि त्यातील ते अविस्मरणीय उद्गार त्याला सांगतात:
"जीवन त्यांना कळले हो।
ज्यांचे मीपण, पक्व फळापरी गळले हो"।।
#########################
केव्हाही कोणताही चॅनेल लावावा,
तेव्हा कायम जाहिरातींचा पाऊसच कसा असतो? इतक्या जाहिराती कोण कशा देऊ शकतो? हे म्हणजे "आशय थोडा, सोंगे फार"!
--------------------------------
"घरकोंबडा":
कमाल आहे, एवढे लांबवर प्रवास करून व न चुकता नेहमी पर्यटनाच्या नवनवीन स्थळी जाणार्यांची. अभिनंदन. मी त्यामानाने घरकोंबडा आहे. सहाजिकच अशी पर्यटनाची आवड असणार्यांचे मला जसे कौतुक वाटते, तसाच नकळत हेवाही!
#########################
"न सुटणारे प्रश्न":
कालप्रवाहाच्या ओघात, घडामोडी
चांगल्याकडून अधिकाधिक वाईटाकडेच
कां होतात?
----------------------------------
"मिठी आणि तीर!":
मारली एकच एक अशी "मिठी",
जणु ठोक ठोक ठ़ोकणारी काठी!
मारला एकच एक नजरेचा "तीर",
करून जातो, चमत्कारच चमत्कार!!
----------------------------------
सुधाकर नातू
२७/७/'१९