शुक्रवार, ३१ मे, २०१९

"रंगबिरंगी":


 "रंगबिरंगी":

°ईडियट बाँक्स"चे पोरखेळ":

"तुपारे" मधला विक्रांत, सध्या कमर्शियल ब्रेक घेऊन लंडनला त्याच्या अश्रुंची फुले वेचायला बहुधा गेला असल्यामुळे, राजनंदिनीच्या पुनर्जन्माचा पोरखेळ मांडत वेळकाढूपणा तेथे चालला आहे........

" अशा ह्या दोघी" मध्ये तर देवाशिष कामत खून तपास चक्क 'युगानुयुगे' होल्डवर ठेवून तो तपासणारी जोडगोळीच केव्हांची गायब झाली आहे. आदित्यने सूड म्हणून, मीराला तिच्या सहीच्या एका फटकार्यानिशी बेघर करून चक्क चाळीत फेकण्याचा तमाशा त्यामुळे नाईलाजाने पहावा लागतो आहे.........

दुर्गाबाई देखील लंडनलाच पसार झाल्याने, सगळ्यांचे "सुखांच्या सरींनी मन बावरे" झाल्याने अनु, सिद्धार्थ जोडी पाण्यात जलसमाधी घेत असून, स्वार्थी वहिनी टु बेडरूममध्ये कधी शिफ्ट व्हायचे हा प्रश्न सोडवत आहे........

फिरवा हो फिरवा कथानकं, कशीही! पाणी घालत राहून मालिकांचे असे फदफदे करण्याचा उद्योग कधीच संपणार नाही........

कुठलेही ठरीव कथानक नसलेला, शोमध्ये भाग घेणार्या महाभागांवर ती जबाबदारी जणू सोडलेला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाच्या सहनशक्तीचा अंत पहाणारी परिक्षा असलेला बाष्कळ, पांचट अशी कुठलीही विशेषणे सार्थ करणारा "बिग बाँस" हा कार्यक्रम तर, तो पहाणार्या दर्शकांच्याही सहनशक्तीचा अंत पहात असतो.

हे असले तमाशे लोकप्रिय होतात, ह्यातच अभिरुची किती रसातळाला गेली आहे, ते समजेल.........

"ये लोग नही सुधरेंगे", दुसरं काय!
--------------------------
दोन रसास्वाद:
१.
"रंगरेषा व्यंगरेषा": मंगेश तेंडूलकर.
अनुबंध प्रकाशन पुणे.
एक रसास्वाद:

एका अफलातून व मनस्वी माणसाच्या तितक्याच अफलातून जीवनाचे, अफलातून चित्र उभे करणारे हे पुस्तक! रेडिओ दुरुस्ती करणारा मेकँनिक, तंत्रज्ञ, सेल्समन, व्यंगचित्रकार, नाट्यसमीक्षक, अभिनेता आणि नेपथ्यकार अशा एकाहून एक अधिक भूमिका यशस्वीपणे वठवणार्या, मंगेश तेंडूलकरांच्या जीवनाचे, एखाद्या अद्भुत चलत् चित्रपटासारखे दृश्यमय नाट्यमय व प्रत्ययकारी शब्दात व्यक्त होणारे हे पुस्तक खरोखर वाचनीय असेच आहे.

माणसाचं जीवन कल्पनेपलिकडच्या परिस्थितीच्या चढ उतारांनी व चित्र विचित्र प्रसंगांनी पहाता पहाता कसं घडत जातं ते इथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. त्यातून आपल्याला अंतर्मुख करीत, दिशा देणारे, मार्गदर्शक असे कितीतरी विवेकी विचार आपल्यापुढे उलगडत जातात, हे ह्या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे.

एवढेही पुरे नाही, म्हणून तेंडूलकरांची उत्तमोत्तम निवडक व्यंगचित्रे,  त्यामागची पार्श्वभूमी आणि उद्देशासहित प्रेरणा जशी येथे आहेत, तसेच त्यांचा जीवनपट प्रसंगोचित रंगीत व क्रुष्ण धवल छायाचित्रांनी ह्या पुस्तकाची श्रेष्ठता अधोरेखित करतो.

पुस्तकासाठी शब्दांकन करणाऱ्या स्वाती प्रभुमिराशी यांच्या ह्रदयस्पर्शी मनोगतातून, हे पुस्तक दुर्दैवाने मंगेश तेंडूलकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालं असं कळतं, तेव्हां मात्र मन व्यथीत होऊन जातं.

त्रिवार वंदन.
----------------------------
२.
""वाळवंटातील ओयासिस":

आजच्या-२६मे'१९ महाराष्ट्र टाईम्स मध्ये "आक्का" हा श्री. अशोक राणे यांचा लेख वाचला. ह्या आक्का म्हणजे प्रसिद्ध डॉक्युमेंट्री फिल्मस् मधील महर्षी शोभाव्यात, अशा श्रीमती विजया मुळ्ये!

ह्या सहजसुंदर भाषेतील लेखामध्ये आक्कांचे ९८ वर्षांच्या जीवनातील, प्रदीर्घ कार्य पाहून अक्षरष: मी भारावून गेलो. समाज प्रबोधनासाठी डॉक्युमेंट्री फिल्म सारख्या माध्यमातून जागतिक कीर्तीचे योगदान देणार्या ह्या विदुषीचे म्हणूनच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

एक व्यक्ती आपल्या आयुष्यात काय काय आणि किती किती विविधस्पर्शी उपयुक्त काम, समाजासाठी करू शकते आणि अंगीकृत ध्येयामागे निष्ठेने रहात, आपले सारे जीवन वेचू शकते, हे ह्या लेखावरून जाणवले आणि मी मनापासून नतमस्तक झालो.

अशा असामान्य व्यक्ती आपल्याला, आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात, पुन्हा उमेदीने उभे राहण्यासाठी प्रेरणा देत असतात आणि असे क्वचितच नजरेत येणारे लेख, जणू वाळवंटातल्या एखाद्या ओयासिस सारखे आपल्याला तृप्त, धन्य करून जातात!
---------------------------

"उडदामाजी काळे नि गोरे":

ईडीयट बाँक्सवरील पोरखेळ मांडणार्या संदेशाला जेव्हा 'रिमोट वापरा' असा टोमणा जेव्हां मारला जातो, त्याला माझे प्रत्युत्तर असे:
"रिमोट वापरायची वेळ येण्यापर्यंतचा अनुभव ते अजून न वापरणार्यांना सांगणे हा एक उद्देश आणि हे प्रभावी माध्यम कसेतरीच वापरले जातय ह्याची जाणीव सर्वांना करून देण्यासाठी हा प्रपंच!"

""सोमि" वर पोस्टींग करताना ते कां, केव्हां, कुणासाठी आणि कशाकरता करायचे ह्याचे तारतम्य ठेवणे, अत्यावश्यक आहे."

"सोमि" वरील कोणतेही पोस्टींग शेअर वा फाँरवर्ड करण्यापूर्वी प्रथम त्याची सत्यता आजमावली जाणे अत्यावश्यक आहे. तशी खात्री पटल्यानंतर त्याची उपयुक्तता ज्यांना असू शकते, त्यांनाच ते शेअर वा फाँरवर्ड करावे. आले पोस्टींग, न पूर्ण वाचता, केले शेअर वा फाँरवर्ड असे कधीही करू नये.

"कोणत्या गोष्टींना केव्हा व कां प्राधान्य द्यावयाचं आणि कोणत्या गोष्टींना दुर्लक्षित करावयाचं, हे ज्यांना अचूक जमतं, तेच परिस्थिती हवी तशी बदलू शकतात."
--------------------------

"काल नको, आज हवा"!:

द्वेष नको, आपुलकी हवी!
भक्ती नको, शक्ती हवी!
प्रौढी नको, शालीनता हवी!
विक्रुती नको, संस्क्रुती हवी!

सांगणे नको, करणे हवे!
बोल नको, मोल हवे!
स्वप्न नको, सत्य हवे!
गर्व नको, मर्म हवे!

रोष नको, जिव्हाळा हवा!
राग नको, लोभ हवा!
धिक्कार नको, सत्कार हवा!
अहंकार नको, सहकार हवा!

"काल नको, आज हवा"!
-------------------------
सुधाकर नातू
३१/५/'१९

मंगळवार, २८ मे, २०१९

"सबके साथ, जीवन भकास":


 "सबके साथ, जीवन भकास":

येथे मला, एका गंभीर वास्तवाकडे लक्ष वेधायचे आहे. सध्या कुणा विशीतल्या तरुणाला अचानक हार्ट फेल होऊन म्रुत्यु येतो, तर कुणी खेळाडू असाच मैदानावर खेळता खेळता राम म्हणतो. चाळीशींत कोणे एके काळी लागणारा चष्मा पहिली दुसरीतल्या मुलांना लागतो. पन्नाशी साठीनंतर येणारे उच्च रक्तदाब वा मधुमेहासारखे आजार आता वयाच्या पंचविशी वा तिशीत शिरकाव करताना दिसत आहेत. कँन्सर सारखा भयावह जीवघेणा रोग कुणाला केव्हा जडेल ह्याचाही काही नेम राहिला नाही. विविध प्रकारच्या जीवघेण्या अपघातांमुळे तर माणसे दररोज किड्यामुंगीसारखी मरताना दिसत आहेत.

एकी कडे शरीर विज्ञान व मेडीकल संशोधन अचंबित करणारे पराक्रम करत असताना, अनारोग्याची ही वयातीत अनिश्चितता भयावह आहे. जीवनातील स्पर्धा विकोपाला गेली आहे, अपेक्षा उंचावत असताना प्रयत्न अपुरे पडत आहेत आणि ताणतणाव असह्य मर्यादा गांठत आहेत. दुसर्या बाजूला सार्वजनिक आरोग्यसेवेलाच अव्यवस्थेमुळे आयसीयुमध्ये घालण्याची वेळ आलेली दिसत आहे. खाजगी आरोग्यसेवा उत्तरोत्तर महागडी व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची झाली आहे. गरीब श्रीमंतामधली विविध आर्थिक स्तरांवरील दरी भयानक रूंदावत चाललेली आहे, ते वेगळेच!

हे असे कसे कां व कुणामुळे झाले त्याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. ऐहीक प्रगती व श्रीमंती म्हणजेच जीवनातील यश असे मानण्याच्या नवसंस्क्रुतीने जो तो अक्षरश: सुसाट धावत सुटला आहे. अशा तर्हेच्या जीवन तत्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर,
तंत्रज्ञानाच्या अचाट प्रगतीमुळे जीवनशैलीत आमुलाग्र बदल होऊन माणूसामाणसातील आपुलकीचे नाते भंग पावताना दिसत आहे. माणसे एखाद्या रोबोटचा अवतार बनण्याचा व त्यांची बेटे बनण्याचा धोका आ वासून उभा आहे.

"सबका साथ, सबका विकास" ऐवजी
"सबके साथ जीवन भकास" असे म्हणायला लागण्याची वेळ आता खरोखर दूर नाही. जीवनविषयक आणि सार्वजनिक विकासविषयक मूलभूत संकल्पनांचाच गांभीर्याने पुन्हा सर्वांनीच विचार करणे ऐरणीवर येणे गरजेचे आहे.

---------------------------

प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. ज्याच्या त्याच्या निवडीचा आदर करणे गरजेचे आहे. आपल्या नजरेतून इतरांच्या निवडीबद्दल प्रतिकूल मत व्यक्त करणे, योग्य नसते. जे जे निवडतो, त्यातून इतरांना कुठलाही त्रास न होता, निवडींतून आनंद व समाधान मिळाले तर सारे भरून पावले.

----------------------------
आता पेट्रोलचा, लिटरला शंभर रुपये दर कधी होतो ते पहाण्याविना गत्यंतर नाही. ह्यालाच कँथार्सिस म्हणजे वेदनेतला आनंद म्हणतात. सोप्या भाषेत जाणून बुजून केलेला छळ. चुकलेल्या वा फसलेल्या धोरणांपायी, कदाचित इतर उत्पन्नाचे स्रोत आटल्यामुळे इंधन तेलाचा असा सहारा घेण्याविना गत्यंतर नसावे, त्यामुळेच बहुदा अशी टोलवा टोलवी.
----------------------------

"महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या विस्ताराचे गाजर आतापर्यंत महिनोंमहिने पिकले नाही. बहुधा लौकरच त्या गाजराचा हलवा खिलवणार!"

----------------------------

"वाळवंटातील ओयासिस":

आजच्या-२६मे'१९ महाराष्ट्र टाईम्स मध्ये "आक्का" हा श्री. अशोक राणे यांचा लेख वाचला. ह्या आक्का म्हणजे प्रसिद्ध डॉक्युमेंट्री फिल्मस् मधील महर्षी शोभाव्यात, अशा श्रीमती विजया मुळ्ये!

ह्या सहजसुंदर भाषेतील लेखामध्ये आक्कांचे ९८ वर्षांच्या जीवनातील, प्रदीर्घ कार्य पाहून अक्षरष: मी भारावून गेलो. समाज प्रबोधनासाठी डॉक्युमेंट्री फिल्म सारख्या माध्यमातून जागतिक कीर्तीचे योगदान देणार्या ह्या विदुषीचे म्हणूनच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

एक व्यक्ती आपल्या आयुष्यात काय काय आणि किती किती विविधस्पर्शी उपयुक्त काम, समाजासाठी करू शकते आणि अंगीकृत ध्येयामागे निष्ठेने रहात, आपले सारे जीवन वेचू शकते, हे ह्या लेखावरून जाणवले आणि मी मनापासून नतमस्तक झालो.

अशा असामान्य व्यक्ती आपल्याला, आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात, पुन्हा उमेदीने उभे राहण्यासाठी प्रेरणा देत असतात आणि असे क्वचितच नजरेत येणारे लेख, जणू वाळवंटातल्या एखाद्या ओयासिस सारखे आपल्याला तृप्त, धन्य करून जातात!

--------------------

"कामात अधून मधून बदल,
हा एक विरंगुळा."

"The Eternal Icons":

मला कधीही वेळ मिळाला की, मी माझ्या जुन्या डायऱ्या काढून, त्या चाळत असतो.

परवा सहज अशीच एक डायरी चाळत असताना, तिच्या शेवटच्या पानांवर अतिशय उत्तम आणि उपयुक्त व प्रेरणादायी नोंदी आढळल्या.

ती यादी मी केली होती Eternal Icons ची! म्हणजे आपापल्या क्षेत्रात अद्वितीय path breaking असे योगदान देणार्या माणसांची यादी!

ही यादी मी केव्हा लिहिली, याची नोंद नाही. बहुदा एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला ही नोंद घेतली असावी. सहाजिकच त्यामध्ये अनेक आधीच्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश केल्याशिवाय ती परिपूर्ण होणार नाही याची मला जाणीव आहे.

मला ती यादी येथे तुमच्याबरोबर शेअर करण्यात अतिशय आनंद होत आहे:

१. अटल बिहारी बाजपेयी: राजकारण
२. फील्ड मार्शल सँम माणेकशा: मिलिटरी
३. लता मंगेशकर: संगीत- चित्रपट गायन
४. डॉ. अमर्त्य सेन: इकॉनॉमिक्स
५. डॉक्टर नारायण मूर्ती: उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान
६. पंडित रविशंकर: संगीत सितार
७. ज्योती बसू: राजकारण आणि आयडिऑलॉजी ८. एम एफ हुसेन: पेंटिंग
९. बिस्मिल्ला खान: संगीत सनई
१०. अमिताभ बच्चन: अभिनय
११. डॉक्टर कुरियन वर्गीस: रूरल डेव्हलपमेंट
१२/१३. सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर: क्रिकेट
१४. श्याम बेनेगल चित्रपट: दिग्दर्शन
१५. ई श्रीधरन्: कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो इंजिनिअरिंग
१६. बिरजू महाराज: कथक
१७. बाबा आमटे: समाज सेवा
१८. नौशाद: चित्रपट संगीत दिग्दर्शन
१९. बी आर चोप्रा: चित्रपट निर्मिती
२०. मिल्खा सिंग: खेळ धावणे
२१. दिलीप कुमार: अभिनय
२२. रतन टाटा: उद्योग
२४. डॉ. खुशवंतसिंग: लेखक संपादक
२५. भीमसेन जोशी: शास्त्रीय संगीत
२६. इब्राहिम अल्काझी: नाटक आणि दिग्दर्शन २७. आर के लक्ष्मण: व्यंगचित्र
२८. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम: अंतरिक्ष तंत्रज्ञान
२९. विंदा करंदीकर: काव्य
३०. डॉक्टर मनमोहनसिंग: अर्थशास्त्र
३१. बिल गेट्स: माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग.

आणि.......
आज आता, अजून एक नांव समाविष्ट करावेच लागेल.....
ते म्हणजे
३२. श्री. नरेंद्र मोदी: राजकारण व नेत्रदीपक यश!

----------------------------

सुधाकर नातू
२८/५/'१९

शनिवार, १८ मे, २०१९

" वाचा आणि विचार करा!":

" वाचा आणि विचार करा!":

"परिक्षे'चा 'निकाल'!":
"Beginning of the End?."

कधी नव्हे ती एकदाची परीक्षा संपली. ह्या वेळेस एक बरे होते, परिक्षेसाठी सात पेपरांमध्ये तयारी करायला भरपूर दिवसांचा वेळ दिला होता. आता प्रतीक्षा निकालाची. जन्मानंतर म्रूत्यू जसा अटळ, तसंच परिक्षेनंतर निकालही अटळच!

आता हुरहुर, काळजी व धागधूग सुरू झाली. केव्हां एकदाचा तो निकालाचा दिवस येतो, अशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या नव्हे, तर परीक्षकांच्या सुद्धा मनात खळबळ, रुखरुख सुरू आहे. ही परीक्षा खूपच आगळी वेगळी होती. विचारलेल्या प्रश्नांना सोडून, हुशार विद्यार्थ्यांनी काहीबाही उत्तरे देणेच पसंत केले, त्यात नको नको त्या शब्दात उखाळ्या पाखाळ्या अधिक होत्या. हुशार मुलांनी आणि त्यांच्या मॉनिटरनी वर्षभर अभ्यास सोडून अक्षरश: उनाडक्या केल्यामुळे त्यांच्यापाशी दुसरे काहीच उरले नव्हते. बिचारी मागच्या बाकावर बसणार्या तथाकथित ढ मुलांपैकी जे जे विषयाला धरून उत्तरे द्यायचे प्रयत्न करत होते, त्यांनाही आपल्या निकालाची खात्री नाही.

खरोखर अशी परीक्षा, पूर्वी कधीही झाली नाही आणि पुढेही कधी होऊ नये. विषयांना धरुनच परिक्षा रितसर होणेच, सगळ्यांच्या हिताचे आहे. शेवटी निकाल लागायचा तो लागेलच, परंतु तसा कोणताही 'निकाल' लागला, तरी शेवटी परीक्षकांचीच गोची होणार, हे उघड सत्य आहे!
(१९/५/'१९-सार्वत्रिक निवडणूक पूर्ण.)

--------------------------------------
"परीक्षे"चा खराखुरा निकाल वेगळा,
आणि अंदाज वेगळा!

"निकाल" अजून लागलेला नाही,
म्हणून कुणी अर्ध्या हळकुंडाने पिवळे
जसे होऊ नये,

तसेच निराश होऊन देखील कुणी
पाणी पाणी करू नये!

घोडामैदान जवळच आहे.
वाट बघा.
शेवटी,
कुणाची तरी वाट लागायची आहेच!
-----------------------------------------
## "गतम् न शोच्यम्"!
मागे वळून पहा आणि त्याच त्या चुका पुन्हा न करता, आपल्यात सुधारणा करत नेहमी पुढे पहा, पुढे जात रहा.
----------------------------------------------------------------------
"अति तेथे, दुर्गती!":

काही माणसांना काहीही करून चर्चेत राहण्याचं व्यसन असतं. स्वतःचं, स्वतःवरच अति प्रेमाचं जेव्हा दर्शन अशा मुळे घडत असतं, त्याचं त्यांना कधीही भान नसतं. परंतु अतिपरिचयात अवज्ञा, हे त्यांच्या लक्षातच येत नाही.

आपली प्रतिमा जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्व आसमंताला दिसत राहिली पाहिजे म्हणजे पाहिजे, ह्या ईर्ष्येमुळे ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. अशा माणसांचं काय करायचं, हा नेहमी प्रश्नच असतो.

परंतु काळ हाच शेवटी ह्यावर औषध असतो. जे आज चर्चेत असतात, ते उद्या विस्मृतीत कधी जातात, ते कुणाच्या नंतर कधीही लक्षात राहतच नाही.

"अति तेथे माती" आणि "अति तेथे दुर्गती" हे अशा माणसांनी लक्षात ठेवलं तर फारच चांगलं!

---------------------------

"भक्तीतून शक्ती?":

भक्ती ही संपूर्णपणे वैयक्तिक आणि खाजगी बाब आहे व असावी. परंतु तिचे जर प्रदर्शन मांडले गेले आणि त्यातून ते प्रदर्शन जर सार्वजनिक रित्या आधुनिक प्रसार माध्यमातून प्रसारित केले गेले तर, ते तितकेसे योग्य कां अयोग्य हे ज्याचे त्याने ठरवायचे.

मात्र अशा प्रकारची कृती केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी असू शकते हे मत, कदाचित खोडता येणार नाही. आपल्या जवळच्या सामर्थ्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करता येऊ शकते आणि त्याचा मुद्दामून उपयोग करणे हेही खरेच. परंतु तितकेसे रास्त असते कां?

अर्थात् जेव्हा वैयक्तिक सामर्थ्य आणि स्वार्थ कसाही करुन साधण्याची प्रवृत्ती अंगात असेल, तेव्हा अशा प्रकारचे प्रदर्शन करणे भूषणावह आहे असेच समजून ते केले जाते. काळाचा महिमा दुसरं काय!

परंतु परिस्थिती बदलू शकते आणि तेव्हां मागे वळून पहाताना तर, हे खेळ अखेर हास्यास्पदही ठरू शकतात, ह्याचे भान ठेवणे अत्यावश्यक होय.

----------------------------

## "वाचाल, तर वाचाल":

माणसाचं सर्व सजीवांमध्ये एकमेवाद्वितीय असं वैशिष्ट्य कुठलं असेल, तर ते म्हणजे त्याला स्वयंभू विचार करू शकणारं अन् विचार मांडू शकणारं एक मन असतं, हे!

त्यांत, वाचन हे शोभादर्शकासारखे विविधरंगी व विविधढंगी विचार करायला लावू शकणारं, एक शक्तीशाली साधन असतं. ते ज्यांच्या हाती अन् ध्यानी मनी, ते महाभाग्यवान!

--------------------------

जे घडतं, ते घडणारच असतं. आपण फक्त त्याचे साक्षी असतो, वा नसतो. त्यातून आपल्याला काय काय शिकता येऊ शकतं, हे आजमावण्याची व्रुत्ती असली तर वाईटातूनही काही ना काही चांगलंच निघतं!

----------------------------

Catharsis, अर्थात वेदनेतून आनंदाचा अनुभव घेणे: उदाहरण: "अच्च्छे दिन" अंतर्धान पावलेले, उभी केलेली सारी स्वप्ने भुईसपाट असे असताना त्याच म्रुगजळामागे धावणे!

---------------------------

## "नाश":

# क्रोध, बुद्धीचा नाश करतो.
# गर्व, ज्ञानाचा नाश करतो.
# प्रायश्चित्त, पापाचा नाश करते.
# लालच, प्रामाणिकपणाचा नाश करते.
# लाच, ईमानाचा नाश करते.
# शिक्षण, अज्ञानाचा नाश करते.
तर,
# आळस, आयुष्याचा नाश करतो.

----------------------

## "नको असे आंधळेपण!":

"कोणी कोणत्याही कारणाने, कधीही इतके आंधळे होऊ नये की, जे समोर ढळढळीत घडतंय, भासतंय, ते तसे होतच नाही, ते तसे नाहीच नाही, असे अट्टाहासाने म्हणत राहावे."

------------------------

"हसे असे, अन् तसे!":

"आपणच आपल्या वागण्याने व बोलण्याने आपलेच हसे करून घेत असतो. ते आपल्या सहसा लक्षात येत नाही, हे दुर्दैव. त्यामुळे आपण त्याच त्याच चुका, पुन्हा पुन्हा करत राहतो.

पण जे व्हायचे ते होतेच होते आणि शेवटी आपल्यालाच आपले हसे येऊ शकते आणि आपणच आपले तोंड लपवावे, अशी वेळ केव्हाही येऊ शकते!"

---------------------

## "संधी गमावली की घालवली?":

काल रात्री, मुंबई इंडियन्सच्या बिनबाद ४५
धांवसंख्येवरून, जेव्हा त्यांचा डाव १५० धांवातच गडगडला, तेव्हाच निराशेची झुळूक मनात अवतरली होती.

नंतर चेन्नई, चक्क ७० धावा आणि एकच बाद, असा धावफलक पाहिल्यावर तर, आता मुंबईचा
पराभव निश्चितच, असे वाटून सरळ सामना बघणे बंद करून मी झोपी गेलो.

आज सकाळी उठल्यावर, वर्तमानपत्रात मुंबई इंडियन्सचा एका धावेने विजय, हे वाचून थक्क झालो, एक सुखद धक्काही बसला. परंतु त्याच बरोबर आपण एका रोमहर्षक, आशा निराशेचे हिंदोळे असणारे एक झंझावाती वादळ पाहण्यास मुकलो याची खंत वाटली, रुखरुख वाटली.

पण वेळ गेलेली होती. मी संधी गमावली नव्हती, तर घालवली होती.

त्यातून मिळालेला धडा असा की,
"धोका पत्करला तर व तरच, संधी मिळण्याची शक्यता निर्माण होते" हा!

---------------------

## "सारेच मुसळ केरात"!:

संधी, ही प्रगती भरभराट व कीर्ती व्रुद्धिंगत करू शकणारी, एक गुरू किल्ली असते. संधी मिळणं, हा जीवनाला चांगली कलाटणी देणारा सांधा असतो. अवगत झालेल्या संधीचं सोनं करणं सर्वांना जमतच असं नाही.

उलट संधीमुळे मिळणार्या संभाव्य फायद्यापायी नको इतके हुरळून जाऊन, प्रसंगी अहंकार व गर्वाने फुलून जाऊन, आवश्यक प्रयत्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणं अखेर महागांत पडतं. संधी पूर्ण वाया जाऊन, सारंच मुसळ केरात जातं. नंतर, हळहळ अन् पश्चात्ताप निरर्थक ठरतो.

हे सुचले कसे, ते सांगतो:
आज मागे वळून पहाताना, माझ्या व्यवस्थापन शास्त्रातील पोस्ट ग्रँज्युएशननंतर, पी.एचडी. करण्याची संधी मी अशाच तर्हेने वाया घालवली, त्या आठवणीमुळे!

--------------------------

सुधाकर नातू


गुरुवार, ९ मे, २०१९

"असेही, तसेही व काहीही!:


"असेही, तसेही व काहीही!:
"जन्मगांठीचं रहस्य-२!":

मानवी जीवनात विवाहाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जन्म मृत्यू या दोन गोष्टी जशा माणसाच्या हातात नसतात, तद्वतच जीवनाला नवीन कलाटणी दिशा देणारी, विवाह जुळणी सारखी महत्वपूर्ण घटना, ही माणसाच्या हातात नसावी असे वाटण्याजोगे अनुभव येतच असतात.

कुणा स्त्रीचे कुणाशी लग्न व्हावे हे खरोखर गुढ व अनाकलनीय कोडे! कुणाचा प्रेमविवाह होऊनही, नंतर बेबनाव होतो, तर कुणाचे एकमेकांना न बघताही, परस्पर ठरविलेले विवाह कमालीचे यशस्वी होतात.

ही जन्मगाठ जणू सात जन्मांसाठी कुणीतरी अज्ञात शक्ती बांधत असावी असे वाटण्याजोगे क्षणही येत राहतात. कळपाने राहणाऱ्या मानव समाजात जेव्हा तेव्हा विवाहाच्या बंधनाची सुरुवात झाली, तो क्षण मानवी इतिहासात क्रांतिकारक मानावा लागेल. त्यामुळेच मानवी जीवनाला स्थैर्य आले, एक योग्य ती सामाजिक संस्कृती अशी दिशा लाभली.

पुष्कळदा विवाह जुळविताना घाई होते, अनेक महत्वाच्या गोष्टिंकडे अनवधानाने दुर्लक्ष होऊन जातं. नंतर आपली फसगत झाली असे ध्यानात येते. पण दुर्दैवाने वेळ निघून गेलेली असते. दोन्ही बाजूंना Win/Win असा अनुभव अपवादानेच येतो. असे माझे निरीक्षण आहे.

"जन्मगाठ ही जणू ब्रह्मदेवच बांधतो" असे समजून ज्याला त्याला समाधान मानावे लागते!

ह्यावर आलेला दाते अरुण ह्यांचा
एक विचारप्रवर्तक प्रतिसाद:

"लग्नगाठ ही प्रत्येक जिवाच्या पुर्वजन्मातील देण्याघेण्याचा व्यवहार पुर्ण करण्यासाठी असावी. ज्या क्षणी हा देण्याघेण्याचा व्यवहार संपतो त्या क्षणी जोडी संपुष्टात येते मग ती कोणा एकाच्या मृत्युने असु शकते किंवा दोन्ही जिवंत असले तरी फ़ारकतीने असु शकते किंवा दोघे एका छपराखाली असुन फ़ारकत घेतल्या समान रहातात, फ़ारकत झाल्यावर काही वेळा जोडीतील दोघेही पुन्हा लग्न करतात, काही वेळा एक लग्न करतो एक तसाच रहातो, काही वेळा तारुण्यात जोडी फ़ुटली तर मागे राहिलेला गेलेल्याची जबाबदारी मरे पर्यंत पार पाडतो. अशा अनेक शक्यतांपैकी काहीही घडु शकते किंवा जोडीतील एक मरे पर्यंत अभेद्य राहु शकते.

तेव्हा जोडी मरेपर्यंत अभेद्य राहील यासाठी उभयपक्षी प्रयत्न जरुर जरुर करावा परंतु जोडी मरेपर्यंत अभेद्य राहिलीच पाहिजे असा अट्टाहास कधीच धरु नये.

माझ्या माहितीत एक उदाहरण आहे जोडीतील दोघेही छान जिवन जगत आहेत पण गम्मत अशी की तारुण्यात यांचे एकमेकांवर अबोल प्रेम होते त्यामुळे विवाह झाला नाही. मुलाचे एकीकडे लग्न झाले, मुलीचे दुसरीकडे लग्न झाले, दोघांचे संसार मुले मोठी होई पर्यंत उत्तम झाले पुढे दोघांनीही आपले जोडीदार गमावले, तेव्हा आता तरी धीर करुन बोलावे असे ठरवुन बोलणे झाले आता ते धर्माने नवरा बायको म्हणुन जिवन व्यतीत करीत आहेत दोघांची मुले त्यांची उत्तम देखभाल करीत आहेत.

आता बोला काय बोलणार अशा वेळी."
-----------------------
"वाचनाची सप्तपदी":

१. एखादं पुस्तक जर अथपासून इतिपर्यंत वाचलं गेलं, तर ते आवडलं, भावलं म्हणायचं.
२. पण जर ते जागा भरल्यासारखं पान उलटून अधून मधून वाचल्यासारखे झालं, तर ते नावडतं म्हणायचं.
३. शेवटी कुणाला कुठल्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात, हे "पसंद अपनी अपनी खयाल अपने अपने" सारखंच असतं.
४. त्यामुळे कुणी कुणाला प्रमाणाबाहेर, वंदू नये किंवा कुणी कुणाला निंदू नये.
५. कुणी काही तरी का होईना वाचतोय आणि वाचत राहणार आहे, तोपर्यंत समाज सजग राहू शकणार आहे.
६. ते समाधान जर कधी संपलच, तर माणसांतलं माणूसपण कदाचित संपलेलं असेल.
७. कारण तेव्हा विचार करणारे आणि विचार समजून घेणारेही संपलेले असतील.

---------------

"कालाय, तस्मै नमः!":

आपल्या पिढीने काही जवळ असण्याचा जसा अभिमान बाळगला नाही, तसंच काही नसण्याचं दुःख केलं नाही किंवा त्यासाठी त्रागा केला नाही.

"असून नसण्याचं आणि नसून असण्याचं" अशी जी किमया आहे, ती आपल्या पिढीला साधली. म्हणूनच कितीतरी ताण-तणावापासून आपण मुक्त झालो.

तंत्रज्ञानाचा विकास, हा भावी जीवन असे भकास, उदास करेल, असे कदाचित ते तंत्रज्ञान शोधणार्‍यांना वाटलेही नसेल.

सारी सुख एका बोटावर असूनही आपण आज, समाधानी आहोत.

"गती गती, अतीगती आणि शेवटी दुर्गती!", याचा अनुभव आता आपण सारेच घेत आहोत.

"कालाय तस्मै नमः!" दुसरं काय ?

----------------

"पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना-१!":

"तुला पाहते रे" मालिकेतील प्रेक्षकांची उत्कंठा पराकोटीला ताणून अखेरीस अवतरलेली, "राजनंदिनी" तितकासा प्रभाव पाडू शकलेली नाही. कारण कदाचित ह्या पात्रासाठी निवड करताना, अभिनेत्रीचे वय व तत्सम व्यक्तिमत्व लक्षात घेतलेले दिसत नाही.

कदाचित राजनंदिनीच्या वयाला शोभेल अशी तरुण अभिनेत्री, जर राजनंदिनी म्हणून अवतरली असती, तर ती त्या भूमिकेला अनुरुप वाटली असती. प्राजक्ता माळी किंवा प्रिया बापट राजनंदिनी म्हणून विक्रांतबरोबर आपला प्रभाव अधिक पाडू शकल्या असत्या.

इतक्या दिवसांच्या चातकासारख्या प्रतिक्षेचा अखेर काहीसा हिरमोड झाला. हे बरोबर की चूक, ते ज्याचे त्याने ठरवावे.

"पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने"
हेच खरे!

-------------------

"पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना-२!":

"तुला पाहते रे" मालिकेतील प्रेक्षकांची उत्कंठा पराकोटीला ताणून अखेरीस अवतरलेली, "राजनंदिनी", त्यासाठी अभिनेत्रीचे वय व तत्सम व्यक्तिमत्व लक्षात न घेतल्याने तितकासा प्रभाव पाडू शकलेली नाही.

कदाचित तेच, २० वर्षांंपूर्वीची कहाणी उभी करताना, जसा नवा छोकरा जयदीप उभा केला गेला, तसंच त्या वेळेच्या विक्रांतसाठी, तरुण व्यक्तिमत्वाच्या अभिनेत्याचा विचार करणे जरुर होते. अनिकेत विश्वासराव अथवा, उमेश कामत त्याकरता यथार्थ ठरले असते.

इतक्या दिवसांच्या चातकासारख्या प्रतिक्षेचा अखेर काहीसा हिरमोड झाला आणि दुर्दैवाने आतापर्यंत, जी कलात्मक, नाट्यमय उंची "तुपारे" ने गांठली ती नाहक घसरताना पहावी लागत आहे. हे बरोबर की चूक, ते ज्याचे त्याने ठरवावे.

"पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने"
हेच खरे!

-----------------
"सारेच मुसळ केरात"!:

संधी, ही प्रगती भरभराट व कीर्ती व्रुद्धिंगत करू शकणारी, एक गुरू किल्ली असते. संधी मिळणं, हा जीवनाला चांगली कलाटणी देणारा सांधा असतो. अवगत झालेल्या संधीचं सोनं करणं सर्वांना जमतच अस नाही. उलट संधीमुळे मिळणार्या फायद्यपायी नको इतके हुरळून जाऊन, प्रसंगी अहंकार व गर्वाने फुलून जाऊन, आवश्यक प्रयत्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणं अखेर महागांत पडतं. संधी पूर्ण वाया जाऊन, सारंच मुसळ केरात जातं. नंतर, हळहळ अन् पश्चात्ताप निरर्थक ठरतो.

हे सुचले ते कसे, ते सांगतो:
आज मागे वळून पहाताना, मला पोस्ट ग्रँज्युएशननंतर व्यवस्थापन शास्त्रातील पी.एचडी. करण्याची संधी मी अशाच तर्हेने वाया घालवली, त्या आठवणीमुळे!

"जीव झाला वेडापिसा"!

परस्पर विरोधी, चांगल्या आणि वाईट मानवी स्वभावांचा व प्रवृत्तींचा, ग्रामीण राजकारणाच्या पार्श्वभूमीवर, विलक्षण नाट्यमय संघर्ष दाखविणारी कलर्सवरील, मालिका बघून, तिचे नांव सार्थ करत, खरोखरच
"जीव झाला वेडापिसा"!

सुधाकर नातू