गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

"सुधा" दिवाळी अंक-२०१८:-"टेलिरंजन"III


🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

















🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂





🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂



            "सुधा" दिवाळी अंक-२०१८:
                      "टेलिरंजन"III




                                                           🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂




अनुक्रमणिका:
भरकटत जाणार्या मालिका.
अंकूश हवा.मराठी मालिकाएका शब्दात.अब जमाना बदल.रहा है!१०मालिकांचे महाभारत.

सुधाकर नातू           


🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂


                                            श्रीगणेशाय नम:

मनोगत:
सादर वंदन.
प्रथमआपण वेळात वेळ काढूनमाझ्या ब्लॉगची ही लिंक उघडूनहा खास दिवाळीचा वैचारिक  सांस्कृतिक "फराळआस्वादायला सुरवात केलीतत्याबद्दल तुमचा मी शतशआभारी आहेहाच वसा तुम्ही तुमच्या परिचय वर्तुळालाही घ्यायला लावालअशी मी आशा करतो.
दिवाळी म्हणजे उत्साह आनंदाचा उत्सवनूतन दिवाळी आणि आगामी वर्षतुम्हा सर्वांना सुखासमाधानाचेआनंदाचे शांतीचे जावो ही मनोमनी इच्छा.
आज मला माझ्याच ह्या संदेशाची आठवण होत आहे:                                     "One should always consistantly do that, which one is best at. Respected great Achievers do it, why not You?"
खूप खूप उशीरा कां होईनामला विचार कल्पना करायला आणि त्या समर्पक शब्दात मांडता येतात आणि तेच मला मनापासून आवडतेसमाधान देते ह्याची जाण झालीसातत्याने दोन वर्षांपासून सुरू असलेल्या माझ्या ब्लॉगमुळे हा आत्मसुखसमाधानाचा शोध असाच चालत रहाणार आहेत्याचीच परिणती हा एक हाती विविध विषयांवरीलघसघशीत पाच अंकांचा "सुधादिवाळी अंकही आहे.
आपण पुढील काही दिवस सवड काढून हा 
"
ह्या ह्रदयीचे त्या ह्रदयी सोपवण्याचा प्रयत्नजरूर अनुभवावात्यामुळेआपल्या जाणीवांच्या कक्षा निश्चितच विस्तारतीलअशी मला आशा आहे.
धन्यवाद.सुधाकर नातूमाहीम मुंबई१६
/११/२०१८ 


🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂




                  9. अब जमाना बदल रहा है!                                  

मराठी मालिकांमधील एक से बढकर एक खडूस खलनायिका: :

आतापर्यंत मुळूमुळू रडणार्या, आंतल्या आंत कुढणार्या आणि निमूटपणे, त्यांच्यावर होणार्या अन्यायाचे घांव सहन करत जगणार्या, सती सावित्री रूपातल्या नायिकाच मराठी मालिकांमध्ये पहायला मिळत असत. त्यांच्या पीडा जितक्या जास्त, जेवढे त्यांचे अश्रु अधिक तेवढा टीआरपी वाढणारच असे सारे गणित होते.

बिनधास्त मोनिका:
पण
आता जमाना बदलला आहे नायकाशी विवाह होऊनही मालिकेतली बायको नायिका नसून एक पोहोचलेली खलनायिकाच आहे, हे 'खुकखु' मालिकेतील मोनिकाने आपल्या बेछूट बिनधास्त वागण्याने दाखवून देत आहे. ती विवाहापूर्वीच गर्भवती असूनही बावळट, नेभळट नायकाच्याच नव्हे, तर सर्वच कुटूंबियांपासून हे पाप लपविण्यात ती यशस्वी झाली आहे. इतकेच पुरे नाही म्हणून ती मुलीला जन्म दिल्यानंतरही आपल्या खलनायिकी व्रुत्तीचा कडेलोट बिनदिक्कतपणे करते आहे, तेही नायकाने घटस्फोटाचा बागुलबुवा उभा केला असताना! माहेरची तर राहोतच पण सासरच्याही सर्व 'शहाण्या' (?) मंडळींनी जणु बुद्धि सारासार विचार गहाण टाकला आहे! डाँक्टर असलेल्या ह्या नायकाला साधी DNA टेस्टही, मामला रफादफा करण्यासाठी आठवत नाहीये, म्हणजे दर्शकांना ग्रुहित धरण्याची शर्थ झाली. 

करणार काय, अब जमाना बदल रहा है, सोशिक पापभिरू नायिकांची जागा त्याहूनही अधिक 'ताकदी' (?)ने मालिकांमध्ये नायकांनी घेतली आहे. इथला विक्रांत त्याबाबतीतले किती विक्रम प्रस्थापित करतो CT, तेवढेच पहाणे आपल्या हाती आहे!!

'विभा': हेरा फेरी करून वडिलांना रस्त्यावर आणते!
'
अस्सं सासर सुरेख बाई', मधली थोरली बहिण 'विभा' प्रथम आपल्या धाकट्या बहिणीच्या जुईलीच्या संसारांत जेव्हढी म्हणून विघ्ने आणता येतील, तेवढी पुरेशी नाहीत म्हणून चक्क सगळी मालकी, हेरा फेरी करून आपल्या वडिलांना दुसर्या विवाहीत बहिणीला घराबाहेर काढून, जवळ जवळ रस्त्यावर आणते! 'टीआरपी'साठी खलनायिकेला हे असे दुष्ट उद्योग केवळ मालिकाच करू जाणे!

धाकटी वहिनीच खलनायिका!
'तुझ्यात जीव रंगला' मध्ये धाकटी वहिनीच आपल्या हाती घरातील सारा कारभार सत्ता रहावी, म्हणून भोळ्या सरळमार्गी पेहलवान असलेल्या थोरल्या दीराचे राणाचा विवाहच होऊ नये म्हणून अंजली राणाच्या मैत्रीत काय काय विघ्ने आणते, ते पाहून प्रेक्षकांच्या कपाळावर आठ्ठया आणत रहाते. त्यासाठी आपल्या सासर्यांच्या डोळ्यांत धूळ तर फेकतेच, पण आपल्या नवर्याला मुठींत ठेवत, त्याचा ही खलनायिका बिनदिक्कत खेळण्यासारखा उपयोग करताना दिसते.

तीन तीन खलनायिका!
काहे दिया परदेस मधील आपल्या मुलाचे-शिवचा विवाह मुंबईवाली गौरीशी होऊ नये म्हणून तिच्याच नणंदेला-निशाला हाताशी धरणार्या अम्मा-जौनपूरवाली कोणत्या कोणत्या युक्त्या करतात! निशा, त्याना साथ देता देता, आपल्याला नवर्याला आँस्ट्रेलीयाला जाऊ देणार्या सासर्याना-सावंतांना कशी छळत रहाते, तेही पुरे नाही म्हणून गौरीचा विवाह जुळविण्याच्या बहाण्याने ही सून आपल्या महा बिलंदर आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे रहाते घरच बेमालूमपणे ही खलनायकी निशा विकते! ह्या तीन तीन खलनायिका असल्यावर मालिकेची गाडी फाँर्मांत येणार नाही तर दुसरे काय होणार. आता सारेच डाव उलटल्यावर ही नाठाळ सून साळसूदपणाचा आव आणत सगळ्या कुटूंबियांची सहानुभूती मिळवत आहे खरी, पण जर गौरीच्या बनारस मधील सासरचे दिल अभी भरा नही स्टाईल बाबूजी अम्मांचा उगाचच लांबत जाणारा दुरावा जर कंटाळवाणा होऊ लागला, तर ही भोळी भाबडी (?) निशा परत बदलेकी आग लावायला समर्थ आहेच!!

‘शयाना’: राधिकेच्या सुखी संसारावर निखारे:
'माझ्या नवर्याची बायको' मधील शयाना, नायक गुरूनाथला केवळ स्वार्थापोटी, मोहांत पाडून त्याच्या राधिकेच्या सुखी संसारावर निखारे टाकते. एवढेच नव्हे, तर ती गुरूनाथला राधिकेला चक्क घराबाहेर काढायला लावते आणि बिनदिक्कत त्याच्याबरोबर त्याच्या घरांत राहू लागते. तारुण्य आणि सौंदर्य ह्या जोरावर ही खलनायिका आपला कार्यभाग साधत रहाते. तिला ह्या ना त्या प्रकारे मदत करणारी शेजारच्या नानाजींची सून शयाना बरोबर मैत्री साधणारी तिची मैत्रिण ह्या दोघीही मिनी खलनायिकाच आहेत.

सावत्र आई; खलनायिकाच.
सरस्वती मालिकेतही मोठ्या मालकीणबाई देखिल आपले अधिराज्य सरस्वतीच्या आगमनामुळे जाणार म्हणून तिच्या संसारात बिब्बे घालण्याचे नाना प्रयत्न करतच असते. शिवाय ती, मोठ्या मालकांच्या पित्याशी मतलब ठेवून विवाह केल्यानंतर, आपल्या भावाच्या मदतीने स्वत:च्या पतीचा कपटीपणाने अंत घडवून आणते, हे रहस्यच लपवण्याचे डाव खेळते. अर्थांत अखेर तिचा हा खलनायिकी मुखवटा सरस्वती केव्हा ना केव्हां उघडकीस आणेलच! सावत्र आईच्या रूपांतील ही खलनायिकाच.

खलनायिकेच्या ट्रेंडचा पाया:
मराठी मालिकांमध्ये नायिका खलनायिकेच्या रूपात आपले दुष्ट कारनामे करण्याच्या अशा ट्रेंडचा पाया बहुदा विलक्षण गाजलेल्या लांबलेल्या 'चार दिवस सासूचे...' मालिकेतील मोठी सूनबाई सुप्रियाने घातला. नवर्यालाच घरगडी बनविणार्या ह्या खलनायिकेने आपली एका मागोमाग एक क्रुष्णक्रुत्ये चालूच ठेवली होती. हाच अंधारमार्ग असावा अपुला स्वप्नांचा बंगला मधील नायिका कम खलनायिका अंकीताने लाज वाटतील असे अनेक उपद्व्याप करुन सजवला (?) होता!

मालिकेतील कारस्थानी पात्रे:
मालिकेतील पात्रे, सामान्य प्रेक्षकांच्या मनाला रूचेल असे रास्त वागता, अगदी उरफाटे वागत त्यांच्या रागाची संयमाची अक्षरश: परिक्षा पहातात असे दिसते. ह्यामध्ये पहिला क्रमांक अर्थातच जगावेगळे वागण्याचा विक्रम करणारा, चक्रम विक्रांतचा! प्रेक्षकांना राग येईल असे वागणारी पात्रे मुद्दामून प्रत्येक मालिकेत आपला धुडघूस घालतच रहातात. बहुदा टीआरपी वाढवण्याकरताच अशा भूमिका निर्माण करतात. विक्रांतला फसवून त्याचा अंत पहाणारीखुकखु’ मधली मोनिका काय, ‘सख्या रे’ मधील निष्ठूरपणे आपल्याच सुनेला जीन्यावरून ढकलून देणारी   पुन्हा तिने आपण आपल्याच चुकीमुळे पडलो अशी कबूली द्यायला लावणारी, मतलबी कजाग सासू-आकाशराजांच्या मातोश्रीची भूमिका, ह्याच तर्हेची. ‘अस्सं सासर सुरेख बाई’ मधली चक्क आपल्या वडिलांनाच फसवून घराबाहेर काढणारी विभा, ‘सरस्वती’ मालिकेतील भैरवकरांचे खुनशी जावईबापू, ‘लेक माझी लाडकी’ मधली मीराच्या जन्माचं रहस्य उघडकीस आणताना कावेबाजपणे आदित्य ईरावती आणि आजोबा ह्यांचा अक्षरश: कचरा होईल इतकी बदनामी होईल हे बेमालूमपणे साधणारी कारस्थानी सानिका,सूर्यवंशी खानदानाचा नायनाट व्हावा ह्या अघोरी ईर्षेने झपाटलेला एक मामा उर्फ दुष्ट बल्लाळ आणि त्याला साथ देणारा बहुरूपी बबन हेदुहेरी’ मध्ये सगळ्यांना सळो की पळो करून सोडतात. मधुराला अडचणीत आणून तिचा छळ करणारी पार्थची आजी ह्यांत त्यांना मदत करणारी पार्थची बाँस तनुश्रीआम्ही दोघं राजा, राणी’ मालिकेंत असाच प्रेक्षकांना संताप आणतात. ही सगळी पात्रे ह्याच रांगेतील! दूरदर्शन माध्यमाचा उपयोग समाजाला घडवण्याऐवजी बिघडवण्याचेच काम अशा पात्रांमुळे मालिका करतात. अगोदरच गुन्हेगारीच्या विविध प्रकारांनी उच्छाद मांडला असताना असे विघातक आविष्कार, ह्या माध्यमाला सेन्साँरची किती आवश्यकता आहे, तेच अधोरेखीत करतात.

दूरदर्शन सारख्या माध्यमातून खलप्रव्रुत्तीना हे असे महत्व प्राधान्य मिळावे आणि नायक, नायिकांपेक्षा खलनायिकांच्या खांद्यांवर मालिकांचे यशापयश ठरावे, हीच दुर्दैवाने आजची वस्तुस्थिती आहे!

थोडक्यांत काय, अब जमाना बदल रहा है!

जादू?
नुकताच एक संदेश  वाचायला मिलाला, हा माणूस लिहीतो:'मी कधीही छोटया पडदयावरचया मालिकाच बघत नाही,परवा,थोडया वेलासाठी केवल अर्धा एपिसोड कसाबसा पाहिला आणि टीवी बंद केला' हे वाचून मी मात्र, अक्षरश: आशचयॅचकीत झालो,कारण हया मालिकाच, माझयासारखया ज्येष्ठ नागरिकांचा दररोजचा अत्यावश्यक असा खुराक आहेत. सायंकाली ते १० जणु रात्रपाली असलयासारखा मी टीवी समोर मालिकाच पहा़त असतो. मालिकांचा आणि माझा संबंध 'तुंझे माझे जमेना आंणि तुझयावाचून करमेना' असा आहे! व्यसनी माणसाला उमजत असते की आपण जे करतो,ते योग्य नाही, हानिकारक आहे,पण तो जसा तरीही व्यसन काही केलया सोडू शकत नाही, तसेच माझे मालिका पहाण़याच् हे वेड मला सोडता येत नाही! 
'
कॅथारसिस' मध्ये जसा वेदनेतून आनंद मिलतो, तसाच काही तरी अनुभव मला मालिका पहाताना होतो. मालिका उगाचच लांबलचक केलया जातात,तयांत 'पाणी' घातले जाते, तयांतील पुष्कल गोषटी निरर्थक असतात::::वगैरे वगैरे दुषणे लावत, लावत चुकता परत मी मालिका पहातच रहातो. कुठे तो मालिकाच बघणारा किंवा घरी बिलकुल टीवीच घेणारा आमचा एक दोस्त आणि कुठे रोज़ रोज़ रतीब घातलयासारखा मालिका पहाणारा मी! असा वेल वाया घालवणयापेक्षा तोच वेल, दुसरया एखादया विधायक कामात घालवावा, हे पटूनही, काही केलया वलत नाही, ही माझी खंत आहे! कोणी सागेल कां हया ईडीयट बाॅक्समधे अशी कोणती जादू आहे
झी वाहिनीवरील बहुतेक प्रत्येक मालिका अशा असंभवनीय लपवा छपवीचाचआधार कां घेताना दिसतात?  दर्शक इतके मूर्ख नाहीत. मोनिकाचे रहस्यउघड़ झाल़यानंतर 'ख़ु  खु' ही मालिका दिशाहीन  निरर्थक होताना दिसते आहे. मोनिकाचे रहस्य ती नायक विक्रांतच्या नांविवर बिनदिक्कत खपवते आणि सुजाण आजी त्यावर विश्वास ठेवते, म्हणजे कहरच झाला!  एक गुणवंत दिग्गज दिग्दशॅक  अनेक नामवंत कलावंत इथे असूनही, ही गोषट तेसमजू शकत नाहीत हयाचेच आश्चर्य वाटते. ही मालिका लौकरच बंद करावी. तेच शहाणपणाचे ठरेल. 
नाटक वा चित्रपट असो, हया दोनही माध्यमांचा आस्वाद घयायला दर्शक काही विचार करून जातो. तयामुले निवडक व्यक्तींसमोर तयांच्े प्रदर्शन होतअसते. तरीही ईथे censorship असते. संपूर्ण कलाकृतीचे यथोचित निरीक्षण  परिक्षण अगोदरच केले जाते. परंतु दूरदर्शन वरून दाखविले जाणारेकार्यक्रम मालिका .. सर्वांसमोर विशेषत; लहान मुलांसमोर प्रदर्शित होत असतात, तरीही त्याना censorship नसणे, हे चुकीचे नाही कां?

'चला हवा येऊ दया' हया

आता हया कार्यक्रमाने थोडी विश्रांती घेणे जरूरीचे आहे. ठुकरटवाडीचा हया तमाशांत तोच तोपणा तर येतो आहेच, पण थिल्लरपणा पांचटपणाचाही अतिरेक होत आहें. शिवाय तेच ते चेहरे पहाणे कठीण होते आहे. एखादया नाटक वा चित्रपटाची जाहिरात होणयाऐवजी नको ते पहायला लागत आहे. हया संकलपनेचा नवयाने विचार करावा, थोड़े गांभीयॅ आणावे नाटकाचा वा चित्रपटाचा आस्वाद, परामर्श घेतला जाईल हयाकडे पहावे असे वाटते.

जाहिरातींचा अतिरेक 
महीनों महीने चालणार असलेलया मालिकांचे रोजचे दलण 'पाणी' घालणे व ते पहाणे, त्रासाचे होतअसते. कोणत़या जाहिराती कोणत़या वेलीदाखवणयातरता ठेवायच़़या, त्याची शहानिशा करायची नाही. उदा: रात्री भोजनाचे वेळी, शौचालयात वापरल्या,जाणार्या  गोष्टींची जाहिरात...कारणनसताना मालिका लांबवा़यच्या अणि ग़रीब बिचारया प्रेक्षंकंाचा अंत पहायचा. हे सारे खेल खंडोबे कधी कोण थांबवणार?जाहिरातदारांचा पैसा वाया,प्रेक्षंकंाचा वेल वाया घालावायचे हे तमाशे आता पुरे झाले. ठराविक कालांत संपणारया अर्थपुणॅ मालिका आता हवया आहेत. महणून TV वर दाखविलेजाणारे news  चर्चा सोडून सर्वच करमणूकीचया कार्यक्रमांवर censorship असावी. सर्वांचा बहुमूल्य वेल चांगलाच वापरला जावा हया करता, हे गरजेचेआहे. अत्यंत गरजेची अशी शिस्त तर अस्तित्वांत येईल आणि हे महत्वाचे माध्यम योग्य तो मार्ग अंगिकारेल.

Tail Piece:
जाता जाता टीव्हीवरील जाहिराती आणि मराठी बातम्यांसंबधीची एक नोंद. ताज्या बातम्यांचा दुष्काळ, पूर्वी टीव्हीवर दर तासानी प्रक्षेपित केल्या जाणार्या बातम्या बंद झाल्यावर सुरू झालाहल्ली नीट पाहिले तर जवळ जवळ त्याच त्याच मराठी बातम्या सारख्या दाखवल्या जातात, फक्त त्या देणारे निवेदक बदलतात इतकेच! पुन्हा इथेही बातमीपत्राच्या अर्ध्या वेळात, जाहीरातींचा मारा चालू असतोच!

महाराष्ट्राच्या इतिहासांत जसे शत्रूपक्षाला संताजी आणि धनाजी, जिथे तिथे, जळी स्थळी पाषाणी दिसत, तसेच आपले सुपर डूपर स्टार अँग्री यंग मँनडोक्याला लावावयाच्या तेला पासून वाँटरप्रूफींगच्या, शौचालयांपासून, बेबी शूजस्वैपाकाच्या मसाल्याच्या, तसेच गुजरातचे ब्रँड अँबँसेडर पासून, महाराष्ट्रात वाघ वाढताहेत ते सांगणार्या अनेक जाहिरातीत आपल्या सर्वांना आवडणार्या दमदार आवाजांत आणि कदाचित पहावणार्या म्हातार्या अवतारात पहावे लागतात! Too much familiarity breeds contempt वा अती परिचयांत अवद्न्या हे कोण कोणाला कधी सांगणार?





                       
 कर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा