शनिवार, २३ जून, २०१८

"राशीभविष्य: "अनुकूल गुणांची किमया":


"राशीभविष्य: अनुकूल गुणपद्धत":

कालचक्र अव्याहत फिरत असते, माणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतात. हा क्रम प्रत्येकाला अनुभवाला येतो. उद्याचा दिवस, आजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या आशेवर माणूस जगत असतो. उद्याचे पुढचे पाऊल कसे असेल, येणारा काळ कसात असेल, अनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो दर वर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात असतो.

माणूस उंच वा बुटका आहे, जाडा किंवा बारिक आहे, तो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशी काही कल्पना येत नाही. ती येण्यासाठी कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यक असते. जसे उंची सेंटी मीटर, वजनासाठी किलोग्राम, आर्थिक स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने दाखवता येते. ह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस कोणाला कसे जातील, हे भविष्याच्या ज्ञानाच्या आधारे सांगण्याची पद्धत म्हणजे राशीभविष्य होय.

आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत. प्रत्येक राशीला सहा प्रमुख ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण देतो. ते नियम असे आहेत:

रवि: ३,६, १० व ११ वा शुभ
मंगळ: ३,६, व ११ वा शुभ
बुध: २,४,६,८,१० व ११ वा शुभ
गुरू: २,५,७,९, व ११ वा शुभ
शुक्र: १,२,३,४,५,८,९,११ व१२ वा शुभ
शनी: ३,६, व ११ वा शुभ

आता एका महिन्याचे-समजा जून'१८ मधील ग्रहस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येक राशीला हे गुण कसे दिले जातात ते गणित पाहू. १ जून ते ३० जून'१८ ह्या कालखंडात वरील सहा ग्रहांचा प्रवास असा आहे:

रवि: १५ जूनला व्रुषभेतून मिथूनेत
मंगळ: महिनाभर मकरेत
बुध: १० जून मिथूनेत २५ला कर्केत
गुरू: महिनाभर तुळेत
शुक्र: ८जूनला मिथूनेतून कर्केत
शनी: महिनाभर धनुमध्ये

आता एका प्रातिनिधिक राशीचे, समजा मेष राशीचे जून'१८ करीता ग्रहांच्या अनुकूलतेनुसार कसे गुण काढतात ते पाहू:
वर दिलेल्या नियमांप्रमाणे मेष राशिला कोणते ग्रह, किती दिवस जून'१८ ह्या महिन्यात शुभ आहेत ते पाहू:

रवि: १५ ते ३० जून मिथूनेत ३रा शुभ-१५दि.
मंगळ: महिनाभर मकर-दहावा-०दि शुभ
बुध: प्रथम ९ दि व्रुषभेत २रा व नंतर २५ ते ३०जून कर्केत ४था असे एकूण १५ दि शुभ
गुरू: पूर्ण महिना तुळेत ७वा शुभ-३० दि.
शुक्र: प्रथम ८जूनपर्यंत मिथूनेत ३रा व नंतर कर्कैत ३०ता पर्यंत कर्केत ४था शुभ-३०दि.
शनी:धनु मध्ये महिनाभर ९वा-०दि.

आता ह्यांची बेरीज आपल्याला मेष राशीला किती गुण जून'१८ मध्ये मिळतील ते सांगेल:
रवि-१५, बुध-१५ तर गुरू शुक्र मिळून ६० असे ९०अनुकूल दिवस अर्थात ९० गुण.

ही पद्धत अजून नीट समजावी, ह्यासाठी आता मकर राशीचे जून'१८ करीता ग्रहांच्या अनुकूलतेनुसार कसे गुण काढतात ते पाहू:
वर दिलेल्या नियमांप्रमाणे मकर राशिला कोणते ग्रह, किती दिवस जून'१८ ह्या महिन्यात शुभ आहेत ते पाहू:

रवि: व्रुषभेत१५ पर्यंत ५वा-० नंतर ३० जून मिथूनेत ६वा शुभ-१४दि.
मंगळ: महिनाभर मकर-१ला-०दि शुभ
बुध: प्रथम ९ दि व्रुषभेत ५वा-०दि शुभ, नंतर २५ पर्यंत मिथूनेत ६वा-१६दि शुभ पुढे  ३०जून कर्केत ७वा-०दि असे एकूण १६ दि शुभ
गुरू: पूर्ण महिना तुळेत १०वा-० दि शुभ
शुक्र: प्रथम ८जूनपर्यंत मिथूनेत ६वा-०दि शुभ व नंतर कर्केत ३० पर्यंत ७वा शुभ-०दि.
शनी महिनाभर धनुत १२वा-०दि.शुभ

आता ह्यांची बेरीज आपल्याला मकर राशीला किती गुण जून'१८ मध्ये मिळतील ते सांगेल:
रवि-१५, बुध १६, असे मिळून मकर राशीला जून'१८ मध्ये ३० अनुकूल दिवस-३० गुण.

ह्याच पद्धतीने बारा राशींकरता जून तसेच उरलेल्या अकरा महिन्यांचे अनुकूल गुण काढता येतील. सर्व राशींकरता हे गणित करण्यासाठी, प्रत्येक महिन्याचे गुण काढण्यासाठी जो तक्ता वापरला जातो, तो जून'१८ महिन्याकरता कसा असेल ते ह्या लेखाच्या अखेरीस दाखवले आहे.

दिवाळी अंकाकरता, वार्षिक भविष्य लिहीताना १नोव्हे. ते त्या वर्षांच्या पुढील वर्षाच्या ३१ डिसें असे १४ महिन्याचे कोष्टक मी तयार करतो. ह्या गुणांची विभागणी पाच सुलभ गटात अशी केली जाते:

पहिला उत्तम गट
दुसरा उजवा गट
तिसरा मध्यम गट
चौथा डावा गट
पाचवा तळाचा गट

वरील पद्धतीने जून'१८ ची राशीनिहाय चित्र:

Jun'18.     अनुकूल गुण      गट
Mesh              ९०               १
Vrishabh        ४५               ४
Mithun            ६५               ३
Kirk                  ८५                २
Sinha                ११५            १
Kanya                ९५            १
Tula                  ५३             ४
Vrishchik           ७५            ३
Dhanu                ८२            २
Makar                ३०             ५
Kumbha              ८३            २
Meen                  ६०             ३

अशा अनुकूल गुणामुळे आपल्याला हे वर्ष (वा महिनाही) मागील वर्षाच्या ( वा महिन्याच्या) तुलनेत किती चांगला वा त्रासाचा ते समजेल. इतर राशींच्या-म्हणजेच व्यक्तींच्या  तुलनेत आपली काय स्थिती आहे तेही ह्या अनुकूल गुण व गट ह्या आधारे समजेल. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता किती जास्त प्रयत्न करावे लागतील त्याचा अंदाज घेता येतो. जीवनात समाधान मिळण्यासाठी प्रयत्न व अपेक्षा ह्यांचा योग्य समतोल आपल्या राशीला मिळालेल्या अनुकूल गुणांवरून ठरवता येते.

अनुकूल गुण पद्धतीचा उपयोग, व्यवस्थापन शास्त्र, संख्या शास्त्र आणि ज्योतिषज्ञान ह्यांचा त्रिवेणी संगम घालण्यासाठी करून मी अभिनव वार्षिक राशीभविष्य दर वर्षी दिवाळी अंकासाठी लिहीतो. ह्या लेखाद्वारे मी ही अनुकूल गुण पद्धती वाचकांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त सोप्या शब्दात येथे मांडण्याचा यत्न केला आहे.
धन्यवाद.

सुधाकर नातू,

जून'१८: अनुकूल गुण तक्ता:
व २०१७/१८ चा तक्ता:




शुक्रवार, २२ जून, २०१८

माहितीचा खजिना-१:


"माहितीचा खजिना-१":

गेल्या सत्तर वर्षात देशात जणु काहीच चांगले घडले नाही असा प्रचारकी थाटाचा डंका पुकारला जातो. तो किती अप्रस्तुत आहे, ह्याची प्रचिती देणारी उद्बोधक माहिती पहाण्यात आली. ह्या कालखंडात विविध क्षेत्रातील कितीतरी उत्तम देणार्या संस्था, आस्थापने निर्माण झाली, त्यांचाच हा लेखाजोखा पुढे दिला आहे.
आज आपण इतकी प्रगती करून इथवर येऊन पोहोचलो आहोत, ह्यामागे हजारो पूर्वसूरींची दूरद्रुष्टि ज्ञान कौशल्य आणि परिश्रम कारणीभूत आहेत, ह्याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्या अशा असामान्य योगदानाबद्दल क्रुतज्ञता जरी कोणी व्यक्त केली नाही तरी एकवेळ चालू शकेल, परंतु केवळ विरोधासाठी विरोध करण्याचा असा अट्टाहास अक्षम्य व अश्लाघ्य आहे, कारण ती आपल्या इतिहासाची जाणून बुजून केलेली मोडतोड आहे.
एकदा नजरेखालून घाला हा माहितीचा खजिना:

संस्था                     स्थापना
ताज हाँटेल्स            १९०३
हिंदुस्थान युनीलिव्हर  १९३३
ओबेरॉय                   १९३४
CSIR रिसर्च              १९४२
महेंद्र & महेंद्र              १९४५
ग्रासीम सिमेंट              १९४७
एअर इंडिया                १९४६
NDA संरक्षण              १९५४
टायटन घड्याळे            १९८४
झंडू बाम                      १९९०
कँम्लिन स्टेशनरी           १९८०
इंडियन पोस्ट                १८५४
दिल्ली मेट्रो                   १९९५
मारूती मोटर्स               १९८१
BARC अणुविज्ञान        १९५४
हिरो सायकल्स              १९८४
भारती एअर टेल            १९९५
गोदरेज                        १८९७
इंडियन आँईल              १९५९
ONGC पेट्रोलियम        १९५६
टाटा स्टील                   १९०७
BSES Stock Exchange  १८७५
MMTC मिनरल्स & मेटल्स  १९६३
भाक्रा नान्गल धरण       १९६३
BHEL वीज क्षेत्र         १९५६
Larson & Toubro   १९३८
SAIL स्टील                १९७३
NTPC.  वीज क्षेत्र      १९७५
हिंदाल्को अँल्युमिनियम  १९५८
C DoT. कम्प्युटर         १९८४
AIIMS हाँस्पिटल         १९५६
अपोलो हाँस्पिटल्स        १९५१
IIT तंत्रविज्ञान खरगपूर १९६१
IIM व्यवस्थापन क्षेत्र    १९६१
केंद्रीय विद्यालये           १९६३
BEST वहातूकव्यवस्था वीज  १९०५
मुंबई पुणे एक्सप्रेस वे   १९९९
SBI बँकिंग                 १८०६
HDFC ग्रहकर्ज          १९७७
बालाजी टेलिफिल्मस्  १९९४
Indian Institute of Science  १९०९
TIFR संशोधन           १९४५
National I of Design  १९६१
TISS समाजविज्ञान       १९३६
फिल्म इंस्टिट्युट            १९६०
NSD रंगभूमी               १९५९
NHAI राष्ट्रीय महामार्ग   १९८८
इंडिगो विमानसेवा         २००६
कोचीन शिपयार्ड           १९७२
निर्वाचन आयोग            १९५०
अमूल दुग्धव्यवसाय       १९४६
Infosys माहिती तंत्रज्ञान १९८१
झी एंटरटेनमेंट                १९९२
आधार कार्ड                   २००९
रिलायन्स इंडस्ट्रीज्          १९८२
खादी ग्रामोद्योग               १९५७
BCCI क्रिकेट                 १९२८
TCS कम्प्युटर सर्विस       १९६८
अग्नी क्षेपणास्त्र विभाग     १९८९
Iconic Indian Brands
दीपस्तंभ असे भारतीय ब्रँडस्:
Lifebuoy. 1964.
हाँकीन्स प्रेशर कुकर १९६६
अमूल बटर १९६६
कँम्पा कोला १९७०
कायनेटिक लूना १९७२
विमल  १९७५
ग्लुकोज बिस्कीट १९७६
प्रेस्टीज प्रेशर कुकर १९८०चे दशक
निरमा साबण १९८०
लिज्जत पापड  १९९०
बजाज स्कुटर्स  १९८१
रसना  १९८४
इ.इ..........

साहित्यिकांच्या नवलकथा:

आता, अगदी वेगळ्या विषयांवर-निवडक साहित्यिकांसंबंधी गोळा केलेली अवखळ, नवलपूर्ण माहिती:

रविकिरण मंडळामधले बुजुर्ग कवि यशवंत ज्यांची आई ही डोळ्यातून पाणी काढणारी चिरस्मरणीय कविता प्रसिद्ध आहे, ते प्रथम कारकून नंतर शिक्षक होते, त्यांचा निव्रुत्तीचे वेळी ऐशी रुपये पगार होता आणि त्यांना २७ रुपये पेन्शन मिळे. कवि यशवंत ह्यांना बडोद्याचे राजकवी म्हणूनही मान होता आणि त्यांना महिना ५० रुपये मानधन प्राप्त होई. गंमतीची बाब ही की, त्याना पत्ते खेळण्याचा खूप नाद होता.

"ती पहा ती पहा बापूंजींची प्राणज्योती" हे अजरामर काव्य लिहीणारे लोककवी मनमोहन नातू, ही एक मनस्वी व अवलिया असामी होती. ते शाळेत खूप द्वाड होते. त्यांच्या झपूर्झा ह्या कादंबरीवर अश्लिलतेचा आरोप करून खटला भरण्यात आला होता. पत्नी निधन पावल्यानंतर दु:खातिरेकाने ह्या विक्षिप्त माणसाने अंगावर बादल्यामागून बादल्या ओतून घेतल्या होत्या.

नवकथाकारांच्या मांदियाळीत प्रसिद्धी परांगभूत असलेले दिवाकर क्रुष्ण ह्यांनी ३५ कथा व २ कादंबर्या-किशोरीचे ह्रदय आणि विद्या व वारुणी ह्या लिहील्या. ते व्यवसायाने वकील असून हैद्राबाद येथे रहात.

तरुण भारत नागपूरचे संपादक गं.त्र्य. माडखोलकरांना शाळेत असताना एकदा गणितात शून्य मार्क मिळाले होते. ते मँट्रिकला नापास झाले. प्रथम कविता करत नंतर कादंबरीकार, पत्रकार टीकाकार म्हणून प्रसिद्ध पावले. माडखोलकरांनीच मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र विषयक ठराव मांडला होता.

विख्यात लघुनिबंधकार, कथाकार व कादंबरीकार आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले वि.स. खांडेकर, ह्याना त्यांच्या काकांनी दत्तक घेतले होते. शिक्षक म्हणून लोकप्रिय असे खांडेकर गुणग्राहक होते, त्यांनीच कविराज कुसुमाग्रजांचा विशाखा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला होता. श्रीपाद क्रुष्ण कोल्हटकरांना ते गुरु मानत.
शंभराहून अधिक कादंबर्या लिहिणारे ना.सी.फडके उत्तम वक्ते आणि विद्यार्थ्यांप्रिय प्राध्यापक होते. त्यानी पहिली कथा मेणाचा ठसा ही वयाच्या अठराव्या वर्षी लिहीली. त्याबद्दल मिळालेला मानधनाचा चेक त्यांनी पुना बँकेत भरला. पण दुर्दैवाने नंतर आठच दिवसात ती बँक बुडाली!

श्रीमती दुर्गाबाई भागवत ह्या विद्यार्थीदशेत विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून पीएचडी करण्यासाठी एकट्याच मध्य प्रदेशात  आदिवासी भागात वास्तव्यास होत्या. दुर्दैवाने तेव्हा त्यांना विषबाधा होऊन प्रक्रुती चिंताजनक झाली होती. परिश्रम घेऊन त्यांनी पाचशे पानी प्रबंध लिहीला खरा, पण त्यांचे गाईडबरोबर तीव्र मतभेद झाल्याने त्यानी तो प्रबंध विद्यापीठकडे सादरच केला नाही. ग अशी की, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी दुर्गाबाईना मिळालेल्या शिष्यवृत्तीची संपूर्ण रक्कम विद्यापीठाला परत केली!

पाणकळा, सराई अशा ग्रामीण शेतकी पार्श्वभूमीवर कादंबर्या लिहीणारे र.वा.दिघे बी.ए. एल्एलबी होते व वकीली करत. त्यानी कायम खेड्यात वास्तव्य केले. ते जर रशियात असते, तर त्यांना मानमरातब मिळून त्यांचे चांगले नांव झाले असते. वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी त्यांनी सूर्य उगवला ही कविता लिहीली होती!

अजातशत्रू विख्यात लघुनिबंधकार अनंत काणेकरांनी आयुष्यात कोळशाची वखार काढून बदामी कोळशाचा व्यापार, जाहिरातसंस्था काढणे, चित्रा सारखे लोकप्रिय साप्ताहिक काढणे असे नाना उद्योग केले. नंतर ते सिद्धार्थ महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांचा चांदरात हा काव्यसंग्रह व नाटक निशिकांताची नवरी गाजले. काणेकरच त्याकाळी कोणत्याही कार्यक्रमाचे अध्यक्ष असत. अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहीण्याचे कामही त्यांनी नेकीने केले.

'तेथे कर माझे जुळती' सारखी संस्मरणीय कविता लिहीणारे बाकीबाब बोरकर मराठी व पोर्तुगीज २ यत्ता, इंग्रजी ३ यत्ता पास झाले आणि शिक्षक बनले. केवळ २० व्या वर्षी त्यांचा प्रतिभा हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला होता.

सुधाकर नातू

22/6//'18








बुधवार, १३ जून, २०१८

"अनन्यसाधारण महास्वप्न!":


👍"अनन्यसाधारण "अनन्या !":👌


☺️"आज "अनन्या" हे 'सुयोग" चे नाटक पाहिले.
दुर्दैवाने अपघात होऊन दोन्ही हात गमावणार्या अनन्या ह्या जिद्दी तरुणीची ही मेलोड्रँमँटिक कहाणी आहे.  नायिकेची झट मंगनी, झटपट अपघात आणि पटकन ब्रेक अप्, खटाखट स्वयंपूर्ण होत सीए , चटाचट प्रेमाचा ट्रँगल आणि obvious असा गोड शेवट असे ह्या नाटकाचे स्वरुप आहे. खरे म्हणजे सारा फिल्मी मामलाच आहे.

👍पण येथे, जगावेगळे आहे ते, दोन्ही हात गमावलेल्या, नायिकेच्या भूमिकेत रूजूता बागवेने कमालीची मेहनत घेऊन स्वयंप्रेरणेच्या जोरावर अत्यंत बिकट अवस्थेवर मात कशी करता येते, ते द्रुष्ट लागावी असे सादर केले आहे, ते. अपंगत्वामुळे घरातील माणसांवर आपण आता ओझे बनलो आहोत असे वाटून  तिच्यापुढे यक्षप्रश्न पडतो की, स्वाभिमान विसरून, लाचारी पत्करून दुय्यम भूमिका स्वीकारावी, की, निधड्या छातीने स्वबळावर एकला चालोरे? अशा विचित्र अवस्थेत तिला जाणीव होते की आपल्याला दोन हात नसले तरी आपण आपल्या दोन पायांचा उपयोग करून पुनश्च हरी ओम् करू शकतो. ही जाणीव म्हणजे काही वेगळे अवघड क्रुत्य करण्याची स्वयंप्रेरणा! ह्या अवस्थेला Achievement Motivation म्हणतात. त्यानंतर तिच्या असामान्य इच्छाशक्तीचे जे अदभूत् दर्शन रंगभूमीवर घडलेले पहाणे हा एक खरोखरच चित्तथरारक अनुभव आहे.
 
खरोखरच तिचे हात गमावले आहेत असेच वाटते आणि हे बेमालूमपणे कसे काय जमले, हा प्रश्न रसिकांच्या मनात शेवटपर्यंत अनुत्तरित रहातो. हेच ह्ना नाटकाचे यश आहे. प्रेक्षक हे तसे रन आँफ द मिल नाटक बघावयाला येतात,  ते बहुदा रूजूताच्या असामान्य जीवंत सादरीकरणामुळे. नाटकाचे नेपथ्य, प्रकाशयोजनाही ह्या ह्रदयस्पर्शी नाट्याला अनुरुप होते.

अचानक आगांतूकासारखे येऊन अनन्यावर एकतर्फी प्रेम करणार्या तरूणाची भूमिका करणार्या अभिनेत्याची बुलेट ट्रेनस्पीडची संवादफेक खटकते. तो काय बोलतो ते स्पष्टपणे मुळीच कळत नाही. शिवाय त्याच्या एंट्री नंतर, सारा खेळ एका गंभीर नाटकाला विनोदी टच देण्यासाठी, पूर्णपणे अस्थानी व ओढून ताणून जमवलेला वाटतो. त्यामध्ये थोडेतरी गांभीर्य व संयमाचे भान ठेवणे गरजेचे आहे.👌

👍मात्र संकटांना न घाबरता ताकदीने तोंड कसे द्यावयाचे, हे चटका लावत पेश करणारे हे नाटक, तरुण पिढीसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक असल्याने निश्चितच अनन्य आहे.💐

👍"शेवटी जीवनात जर समाधान मिळवायचे असेल, तर आपले अपेक्षा आणि प्रयत्न ह्यांच्यात बदलत्या परिस्थितीत अचूक समतोल साधता येण्याचे कौशल्य अंगी हवे. तुमची द्रुष्टी बदला, एक नवी स्रुष्टी दिसेल. जे नाही, त्याचा विचार करत चिंता करण्यापेक्षा जे आहे, त्यात आनंद शोधायला शिका....👌💐💐


☺️ "अनन्या" नाटकाच्या जाहिरातीसाठी पुढील मजकूर मला सुचला:
👍"स्वाभिमान विसरून, लाचारी पत्करून दुय्यम भूमिका न स्वीकारता, स्वबळावर एकला चालोरे यशस्वी करणारी "अनन्या"........👌💐

☺️" स्वयंप्रेरणा! असामान्य इच्छाशक्तीचे जे अदभूत् दर्शन "अनन्या" रंगभूमीवर उभे करते,हा एक खरोखरच चित्तथरारक अनुभव आहे.......👌😊

👍जाता जाता....निरिक्षण...😊
पुण्यात नाट्यप्रयोग: दुपारी १२-३०, रात्री ९-३० गैरसोयीच्या वेळा. मुंबई प्रमाणेच सकाळी १०-३० व रात्री८वाजता नाट्यप्रयोग कां नाहीत?

मराठी नाटकं, एखाद दुसरा अपवाद वगळता कधीही वेळेवर सुरू होत नाहीत. त्यामुळे अनाठायी किती तरी समुह-वेळाचा अपव्यय होतो. प्रेक्षकांच्या सहनशक्तीची परिक्षा अशी बिनदिक्कतपणे पहाणे सर्वथैव गैर नव्हे कां?              

☺️"डोळे उघडणारा "क्लोरोफाँर्म": 😊                 

दोन संपूर्ण विभिन्न क्षेत्रातील नामवंत माणसांची आत्मव्रुत्तांसारखी पुस्तके वाचनात आली. पहिले एक १९७८ साली प्रसिद्ध झालेले डॉ. अरुण लिमयांचे "क्लोरोफाँर्म" हे "आधुनिक अश्विनीकुमार" डॉक्टरमंडळी आणि आरोग्य सेवेशी संबंधित समस्त स्टेक होल्डर्स ह्यांच्या विश्वातली "आतल्या गोटातील" (पुष्कळशी) वेदनादायी रहस्ये उघडी करुन वाचकांना भयग्रस्त करू शकणारं खुलम् खुल्ला बिनधास्त पुस्तक. खरं म्हणजे "क्लोरोफाँर्म" हे गुंगी आणून माणसाला बेशुद्ध करणारं रसायन, मात्र हे पुस्तक जर चार दशकांपूर्वीचे आरोग्यसेवेचे वाभाडे काढणारे वस्तुनिष्ठ चित्र असेल, तर आताच्या सर्वथैव बाजारु माहोलांत अक्षरश: म्रुत्युशय्येवरील माणसालाही खडबडून जागे करणारा भयपट तर, चालू नसेल ना, अशी शंका येऊ शकते. स्वत: डॉक्टर असूनही आपल्याच क्षेत्रातील अयोग्य गोष्टी अशा उघड्या करण्याचे डॉ. लिमयांचे धैर्य असामान्य नाही कां?

👍"अनन्यसाधारण 'महास्वप्न " :👌

ह्याच्या अगदी उलट असणारी, विलक्षण प्रेरणादायी आणि अभिमान वाटणारी कहाणी आहे भारतात काँप्युटर आणि डिजीटल विश्व आणणार्या डॉ. सँम पिट्रोडांची "महास्वप्न" ही आत्मकथनाची! ओरिसातील कोपर्यातल्या खेड्यात एका सुतारकाम करणार्या माणसाचा हा कर्तृत्ववान सुपुत्र कल्पना करता येणार नाही अशा अडचणींवर मात करुन साता समुद्रापलिकडे जावून अमेरिकेत जातो
  काय आणि स्वर्गीय राजीवजींच्या प्रोत्साहनामुळे टेलिकॉम-क्रांतीचे महास्वप्न अथक परिश्रमांती जिद्दीने प्रत्यक्षात आणतो काय, सारेच चित्तथरारक व अद्भूत! लेखकाच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अक्षरश: पान अन् पान आवर्जून वाचावे असा सुमारे चारशे पानी अनुवाद श्रीमती शारदा साठे ह्यांनी ओघवत्या भाषेत केला आहे.

"क्लोरोफाँर्म" हे जर झोपी गेलेल्याला खडबडून जागे करणारे पुस्तक असेल, तर हे महास्वप्न त्याला आत्मप्रेरणेची संजिवनी देवून स्वयंविकासच्या एक्सप्रेस वे वर घोडदौड करायला लावणारे संप्रेरक असेल.
एका पाठोपाठ ही अशी विस्मयकारी पुस्तके मला अवचितपणे वाचायला मिळावी, हा एक "सोने पे सुहागा" योगायोगच नव्हे कां?

👍काही वाचनीय पुस्तके:👌

झगमगत्या दुनियेत: सुधीर गाडगीळ
कुणा एकाची भ्रमणगाथा: गो. नी. दांडेकर
प्रथम पुरुषी एकवचनी: पु भा भावे
जीवलग: विजय पाडळकर
टिवल्या बावल्या: शिरीष कणेकर
जीनियस: अच्युत गोडबोले
कार्यमग्न: अनिल अवचट
आठवणींचे असेच असते: अरुण शेवते
अध्यात आणि मध्यात: हेमंत कर्णिक
अन्यथा: गिरीश कुबेर

धन्यवाद
सुधाकर नातू