'डायरी'तील शायरी' १: गीता बोध:
प्रास्ताविक:
नुकतीच मला, कपाटाची आवरा आवर करताना, माझी ७ वर्षापूर्वीची डायरी सापडली. ती चाळली आणि मला वैविध्यपूर्ण माहिती, अनुभव, विचार आणि व्यक्तीविशेष उलगडणारा अनमोल खजिनाच गवसला. जवळ जवळ प्रत्येक दिवसाच्या प्रूष्ठावर न चुकता मी त्या विविध प्रकारच्या नोंदी केल्या होत्या. 'डायरीतील ह्या शायरी' चा प्रारंभ विनोबांनी गीतेवरील केलेल्या प्रवचनांवर आधारित 'गीताई' पुस्तकांतील गीतेच्या अठरा अध्यायांच्या संक्षिप्त सारांशाने मी करत आहे. हा ऐवज तुम्हाला उद्बोधक वाटेल, अशी आशा आहे.
गीता बोध:
अध्याय पहिला:प्रत्येक माणूस वेगळा आहे, ज्याचा त्याचा पिंड भिन्न आहे. कुणी ना मोठा, ना छोटा, कुणी चांगला किंवा वाईट नसतो. ज्याचा त्याचा स्वभाव असेल, तो स्विकारुन, त्याबरहुकूम आप आपले कर्तव्य करत रहाणे हाच जीवनाचा हेतु होय. गीतेचा प्रमुख उद्देश स्वकर्तव्य विरोधी मोहाचा त्याग करणे हा आहे.
अध्याय दुसरा:
आत्मा अमर आहे, देह नाशवंत आहे. म्हणून त्याच्यात मर्यादेबाहेर गुंतुन जाऊ नका.निज स्वकीयांचा मोह टाळा. आपले कर्तव्य कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता, सातत्याने करत रहा. पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा करण्याचे व्रत, समोर साक्षात श्री विठ्ठल आलेला असूनही सोडले नाही. म्हणूनच तो पंढरीचा राया युगानुयुगे तेथेच विटेवर उभा आहे. स्थितप्रज्ञ बनण्याचा प्रयत्न करा. निर्विकार राहून आपली कर्तव्ये करत रहा.
अध्याय तिसरा:
येथे कर्मयोगाचे महत्व सांगितले आहे. "असेल हरी, तर देईल खाटल्यावरी" ही व्रुत्ती सोडून, कर्म हाच धर्म , हीच उपासना, हीच पूजा होय. नेहमी कार्यरत रहा, त्यायोगे शरीर व मन नेहमी शुद्ध राहील. आपण हाती घेतलेल्या काम सर्वोत्तम कसे होईल हाच ध्यास धरा.
चौथा अध्याय:
हाती घेतलेले काम मन लावून आवडीने अधिकाधिक चांगले करत रहाण्याची साधना म्हणजे विकर्म होय. कर्म आणि विकर्म एकरूप झाले की अकर्मरुपी आविष्कार घडतो. कितीही काम केले तरी ते न केल्यासारखे वाटते, अशी स्थिती, म्हणजे अकर्म होय. निष्काम कर्मयोगासाठी कर्म विकर्म आणि अकर्म अशी साखळी आवश्यक आहे. गुणवंत गायक वा खेळाडू आपल्या आत्मानंदात उत्तम गात वा खेळत रहातात. त्यांचे अनुकरण आपल्या कामात करत रहा.
पाचवा अध्याय:
साधन म्हणून बाह्यकर्म व आतून मनाचे विकर्म, ह्या दोघांचीही गरज आहे. मनाची निर्विकार अलिप्तता साधणे म्हणजे संन्यास तर क्रुती म्हणजे योग. कर्माचे अकर्म होणे हे ह्या साधनेचे अंतिम ध्येय होय.
जे जे सर्वोत्तम असेल, ते ते करत रहाण्याचा हा संकल्प सिद्धीस जावो हा निदिध्यास ठेवा.
सहावा अध्याय:
जीवनाचा व्यवहार अधिकाधिक शुद्ध कसा करावा, हेच सांगण्यासाठी गीता आहे. चित्तव्रुत्तीवर काबू मिळवण्यास ती प्रव्रुत्त करते. चित्ताची एकाग्रता, जीवनाची परिमितता आणि समद्रुष्टी अशा तीन गोष्टींमुळे ध्यानयोग साधतो. जसजसे वय वाढेल, तसतसे मन अधिक परिपक्व सम्यक द्रुष्टि दाखविणारे व्हायला हवे.
अध्याय सात:
ईश्वराला शरण जा, असं हा अध्याय सांगतो. स्वकर्तव्य करून फळाची अपेक्षा न ठेवता, ते परमेश्वराला अर्पण करा. मनापासून ईश्वरभक्ती करा. कर्ममार्ग ध्यानमार्ग आणि भक्तिमार्ग असे त्रिविध मार्ग गीता दर्शविते.
आठवा अध्याय:
चांगल्या संस्कारांचे महत्व येथे मांडले आहे. जसजसा काळ जातो, तसतशा आपण अनेक गोष्टी विसरतो, निवडकच लक्षात ठेवतो. त्या चांगल्या सन्मार्गी असाव्यात, म्हणजे 'शेवटचा दिवस' गोड होईल. म्रुत्यु अटळ आहे, त्याचे भान ठेवून जीवन सत्कारणी लावा.
अध्याय नववा व बारावा : शेवटी दिलेली टीप पहा.
दहावा अध्याय:
विभूती चिंतनाकडे येथे मार्गदर्शन केलेले आहे. परमेश्वर, आई बाप आणि गुरू ह्यांच्या बरोबर सर्व प्राणीमात्रांत व सर्वत्र आहे, ह्याची जाण ठेवावी. त्या विश्वकर्म्याच्या ह्या जगड्व्याळ यंत्रणेपुढे नतमस्तक व्हावे. एवढेच काय पण दुर्जनातही ईश्वराचा अंश असतो.
अकरावा अध्याय:
ईथे विश्वरूप दर्शन घडविले आहे. आपली प्रुथ्वी म्हणजे अवकाशातील सूर्यमाला आकाशगंगा आदिंच्या महाप्रचंड आकारापुढे, वाळूच्या कणाएवढीही नाही. आपण तर म्हणूनच ह्या विश्वरूप अस्तित्वासमोर अणुमात्रही नाही. काळ हा अव्याहत कदापिही न थांबणारा आहे. हे असे विश्वाचे अन् काळाचे विराट रूप पचणारे नाही. पूर्वस्मरणाने विकार वाढतो. जग जसे आहे, तसेच ते मंगल आहे, हे माना. अध्याय सहा ते अकरापर्यंत, गीता आपणास एकाग्रतेकडून समग्रतेकडे नेते. हा अध्याय सगुण व निर्गुणाचे वैशिष्ट्य उभे करतो. सगुण हे सुलभ व सुरक्षित आहे, परंतु सगुणाला निर्गुणाचीही आवश्यकता आहे. भक्तिचा झरा जरी प्रथम सगुणातून निघाला, तरी तो शेवटी निर्गुणाकडे पोहोचतो. सहाजिकच 'सगुण,निर्गुण दोन्ही विलक्षण'! हेच खरे.
अध्याय तेरावा:
देहासक्ती ठेवू नका, आत्मचिंतन करा, हे येथे ठसविले आहे. देहासक्तीमुळे जीवन अडगळीचे होते. देहापलिकडे, शाश्वत निरंतर व नश्वर असा आत्मा आपल्यात आहे, तो म्हणजेच मी असे जाणा. त्या अविनाशी आत्मतत्वासाठी हा देह मिळाला आहे, तो साध्य नसून एक साधन आहे. परमात्मशक्ती हीच अंतिम शक्ती आहे. नम्रता, निर्भरता व ज्ञानसाधना आत्मोन्नतीकरिता हव्यात.
अध्यात चौदावा:
आत्मा अविनाशी असून, त्याला बरोबर काहीही घेऊन जावयाचे नाही. देहाच्या सुखदु:खाशी आत्म्याचा काही संबंध नाही. तमोगुणाचा परिणाम म्हणजे आळस, त्यातून झोप वा प्रमाद. ह्या तिघांवरही विजय मिळवायला हवा. त्याकरिता अथक परिश्रम करायला हवेत. म्हातारपणीही कार्यरत रहा, तरूण रहाल. Use it, or lose it वा थांबला, तो संपला, हे ध्यानात ठेवा. रजोगुण उत्साहाचा, कामाचा अतिरेक करतो. उताविळपणे न झेपणार्या जबाबदार्या अंगावर घेतो. तमोगुण व रजोगुण परस्पर सहाय्यक होवून आयुष्याचा नाश करतात. सत्वगुण त्यातले त्यात उत्तम, पण त्याचाही अतिरेक अहंकार निर्माण करतो. व्रुथा अभिमान निर्माण करतो. अशा सत्वगुणाला निरंहकारी करावयाचे. कुठलाही अतिरेक नको, हेच ह्या अध्यायाचे सांगणे आहे. आत्मज्ञान व भक्तीचा आश्रय घ्यावा.
ईश्वराला शरण जा, असं हा अध्याय सांगतो. स्वकर्तव्य करून फळाची अपेक्षा न ठेवता, ते परमेश्वराला अर्पण करा. मनापासून ईश्वरभक्ती करा. कर्ममार्ग ध्यानमार्ग आणि भक्तिमार्ग असे त्रिविध मार्ग गीता दर्शविते.
आठवा अध्याय:
चांगल्या संस्कारांचे महत्व येथे मांडले आहे. जसजसा काळ जातो, तसतशा आपण अनेक गोष्टी विसरतो, निवडकच लक्षात ठेवतो. त्या चांगल्या सन्मार्गी असाव्यात, म्हणजे 'शेवटचा दिवस' गोड होईल. म्रुत्यु अटळ आहे, त्याचे भान ठेवून जीवन सत्कारणी लावा.
अध्याय नववा व बारावा : शेवटी दिलेली टीप पहा.
दहावा अध्याय:
विभूती चिंतनाकडे येथे मार्गदर्शन केलेले आहे. परमेश्वर, आई बाप आणि गुरू ह्यांच्या बरोबर सर्व प्राणीमात्रांत व सर्वत्र आहे, ह्याची जाण ठेवावी. त्या विश्वकर्म्याच्या ह्या जगड्व्याळ यंत्रणेपुढे नतमस्तक व्हावे. एवढेच काय पण दुर्जनातही ईश्वराचा अंश असतो.
अकरावा अध्याय:
ईथे विश्वरूप दर्शन घडविले आहे. आपली प्रुथ्वी म्हणजे अवकाशातील सूर्यमाला आकाशगंगा आदिंच्या महाप्रचंड आकारापुढे, वाळूच्या कणाएवढीही नाही. आपण तर म्हणूनच ह्या विश्वरूप अस्तित्वासमोर अणुमात्रही नाही. काळ हा अव्याहत कदापिही न थांबणारा आहे. हे असे विश्वाचे अन् काळाचे विराट रूप पचणारे नाही. पूर्वस्मरणाने विकार वाढतो. जग जसे आहे, तसेच ते मंगल आहे, हे माना. अध्याय सहा ते अकरापर्यंत, गीता आपणास एकाग्रतेकडून समग्रतेकडे नेते. हा अध्याय सगुण व निर्गुणाचे वैशिष्ट्य उभे करतो. सगुण हे सुलभ व सुरक्षित आहे, परंतु सगुणाला निर्गुणाचीही आवश्यकता आहे. भक्तिचा झरा जरी प्रथम सगुणातून निघाला, तरी तो शेवटी निर्गुणाकडे पोहोचतो. सहाजिकच 'सगुण,निर्गुण दोन्ही विलक्षण'! हेच खरे.
अध्याय तेरावा:
देहासक्ती ठेवू नका, आत्मचिंतन करा, हे येथे ठसविले आहे. देहासक्तीमुळे जीवन अडगळीचे होते. देहापलिकडे, शाश्वत निरंतर व नश्वर असा आत्मा आपल्यात आहे, तो म्हणजेच मी असे जाणा. त्या अविनाशी आत्मतत्वासाठी हा देह मिळाला आहे, तो साध्य नसून एक साधन आहे. परमात्मशक्ती हीच अंतिम शक्ती आहे. नम्रता, निर्भरता व ज्ञानसाधना आत्मोन्नतीकरिता हव्यात.
अध्यात चौदावा:
आत्मा अविनाशी असून, त्याला बरोबर काहीही घेऊन जावयाचे नाही. देहाच्या सुखदु:खाशी आत्म्याचा काही संबंध नाही. तमोगुणाचा परिणाम म्हणजे आळस, त्यातून झोप वा प्रमाद. ह्या तिघांवरही विजय मिळवायला हवा. त्याकरिता अथक परिश्रम करायला हवेत. म्हातारपणीही कार्यरत रहा, तरूण रहाल. Use it, or lose it वा थांबला, तो संपला, हे ध्यानात ठेवा. रजोगुण उत्साहाचा, कामाचा अतिरेक करतो. उताविळपणे न झेपणार्या जबाबदार्या अंगावर घेतो. तमोगुण व रजोगुण परस्पर सहाय्यक होवून आयुष्याचा नाश करतात. सत्वगुण त्यातले त्यात उत्तम, पण त्याचाही अतिरेक अहंकार निर्माण करतो. व्रुथा अभिमान निर्माण करतो. अशा सत्वगुणाला निरंहकारी करावयाचे. कुठलाही अतिरेक नको, हेच ह्या अध्यायाचे सांगणे आहे. आत्मज्ञान व भक्तीचा आश्रय घ्यावा.
अध्याय पंधरावा:
भक्तीमार्ग म्हणजे प्रयत्नमार्गाहून निराळा नाही. भक्ती व आत्मज्ञान मिसळले की पूर्णता येते. गीता जीवनाचा अर्थ, ते कसे, कां आणि कुणासाठी जगावे हे सांगणारे तत्त्वज्ञान आहे. स्रुष्टितील विविधता अव्याहतता आणि नियमितता अवर्णनीय आहेत. प्रभाते करदर्शनम् सेवा कर असेच सांगत़ो.
अध्याय सोळावा:
येथे मनाच्या आतला व बाहेरचा ह्यामधील झगड्याचा उहापोह केला आहे. अहिंसा हिंसा, अपप्रवृत्ती व सद्प्रव्रुत्ती ह्यामध्ये नेहमी संघर्ष चालू असतो. एकीकडे दैवी तर दुसरीकडे आसुरी संपत्ती ह्या दोहोत आसुरी टाळून, दैवी संपत्ती घ्यावी. हिंसेवर विजय मिळवण्याचा मानवाचा प्रयत्न अजूनही अपयशी ठरला आहे. सत्ता, संस्कृती व संपत्ती, ह्या तीन महत्वाकांक्षा, आसुरी संपत्तीच्या असतात. सर्वांनी माझेच ऐकावे माझ्या प्रमाणे व्हावे माझे अंकित व्हावे असे वाटणे, आसुरी होय. थोडक्यात हम करे सो कायदा अशी मनोवृत्ती! काम, क्रोध व लोभ ह्यापासून मुक्ती हवी असेल, तर केवळ सत्य व संयमाची कास धरा. बेताने, धीराने वागा, असे हा अध्याय सांगतो.
अध्याय सतरावा:
साधकाने कसा कुठला जीवनक्रम अंगिकारावा, ह्याचे येथे मार्गदर्शन आहे. प्रथम निश्चित असे ध्येय हवे, योग्य ते कर्तव्य कष्टपूर्वक उत्तमपणे पार पाडावे. आपले कुटुंब आपला समाज, देश व विश्व ह्या सार्यांसाठी आपण काही देणे लागतो, त्याची जाण ठेवून त्या प्रमाणे ते देणे द्यायला हवे. दररोज एखादे तरी चांगले क्रुत्य आपल्याकडून व्हायला हवे. आहार व आचारशुद्धी, अविरोधी जीवनसाधना हवी. पोटाला पाहिजे ते, योग्य ते व तितकेच अन्न प्राशन करा. आपली सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करा.
अध्याय अठरावा:
येथे सर्व अध्यायांचा उपसंहार केलेला दिसतो. गीतेचा जणु सारांशच येथे मांडला आहे. कर्म करत रहा, मात्र कर्मफळाची अपेक्षा ठेवू नका. त्याग करणे, हीच सार्वभौम कसोटी आहे. ज्ञान, भक्ती व सेवा अहिंसा ह्यांचा अंगिकार करा. साधकाने आपला स्वधर्म कोणता, ह्याचा शोध घेवून निरपेक्षपणे स्वधर्माचरण करावे हाच जीवनमंत्र आहे. विठ्ठलाला युगानुयुगे, विटेवर उभा ठेवणार्या भक्त पुंडलिकाचा आदर्श कायम नजरेसमोर ठेवा.
आचार्य विनोबा भावे ह्यांनी अत्यंत सुलभ भाषेत ७ आँक्टोबर १९३० ते ६ फेब्रुवारी १९३१ ह्या कालखंडात गीतेवर प्रवचने दिली. त्यावर आधारित त्यांचे 'गीताई' हे गीता-बोध सर्वसामान्य जनतेला समजेल अशा भाषेतील पुस्तक योगायोगाने माझ्या वाचनात काही वर्षापूर्वी आले. ते मला जसे उमजले तशी मी माझ्या डायरीत नोंद केली. आज पुष्कळ वर्षांनी ती डायरी मला गवसली. माझ्या ब्लॉगवर हा गीता-बो़ध लिहीताना मला खूप आंतरिक समाधान मिळाले. एक नवल मात्र हे सारे इथे मांडताना अवचितपणे ध्यानात आले: कसा कोण जाणे अध्याय ९ व १२ ह्यांचा सारांश मला डायरीत कुठेच सापडला नाही. त्यामुळे तो येथे मला मांडता आलेला नाही. क्षमस्व. पण जे काही गीता-,बोधाम्रुत मला गवसले ते गोड मानून, आपण सारे आपली जीवनद्रुष्टि व जीवनशैली बदलून समाधानाने जगण्याचा प्रयत्न करू या. धन्यवाद
शुभम् भवतु
सुधाकर नातू माहीम मुंबई१६
Mb 9820632655
भक्तीमार्ग म्हणजे प्रयत्नमार्गाहून निराळा नाही. भक्ती व आत्मज्ञान मिसळले की पूर्णता येते. गीता जीवनाचा अर्थ, ते कसे, कां आणि कुणासाठी जगावे हे सांगणारे तत्त्वज्ञान आहे. स्रुष्टितील विविधता अव्याहतता आणि नियमितता अवर्णनीय आहेत. प्रभाते करदर्शनम् सेवा कर असेच सांगत़ो.
अध्याय सोळावा:
येथे मनाच्या आतला व बाहेरचा ह्यामधील झगड्याचा उहापोह केला आहे. अहिंसा हिंसा, अपप्रवृत्ती व सद्प्रव्रुत्ती ह्यामध्ये नेहमी संघर्ष चालू असतो. एकीकडे दैवी तर दुसरीकडे आसुरी संपत्ती ह्या दोहोत आसुरी टाळून, दैवी संपत्ती घ्यावी. हिंसेवर विजय मिळवण्याचा मानवाचा प्रयत्न अजूनही अपयशी ठरला आहे. सत्ता, संस्कृती व संपत्ती, ह्या तीन महत्वाकांक्षा, आसुरी संपत्तीच्या असतात. सर्वांनी माझेच ऐकावे माझ्या प्रमाणे व्हावे माझे अंकित व्हावे असे वाटणे, आसुरी होय. थोडक्यात हम करे सो कायदा अशी मनोवृत्ती! काम, क्रोध व लोभ ह्यापासून मुक्ती हवी असेल, तर केवळ सत्य व संयमाची कास धरा. बेताने, धीराने वागा, असे हा अध्याय सांगतो.
अध्याय सतरावा:
साधकाने कसा कुठला जीवनक्रम अंगिकारावा, ह्याचे येथे मार्गदर्शन आहे. प्रथम निश्चित असे ध्येय हवे, योग्य ते कर्तव्य कष्टपूर्वक उत्तमपणे पार पाडावे. आपले कुटुंब आपला समाज, देश व विश्व ह्या सार्यांसाठी आपण काही देणे लागतो, त्याची जाण ठेवून त्या प्रमाणे ते देणे द्यायला हवे. दररोज एखादे तरी चांगले क्रुत्य आपल्याकडून व्हायला हवे. आहार व आचारशुद्धी, अविरोधी जीवनसाधना हवी. पोटाला पाहिजे ते, योग्य ते व तितकेच अन्न प्राशन करा. आपली सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करा.
अध्याय अठरावा:
येथे सर्व अध्यायांचा उपसंहार केलेला दिसतो. गीतेचा जणु सारांशच येथे मांडला आहे. कर्म करत रहा, मात्र कर्मफळाची अपेक्षा ठेवू नका. त्याग करणे, हीच सार्वभौम कसोटी आहे. ज्ञान, भक्ती व सेवा अहिंसा ह्यांचा अंगिकार करा. साधकाने आपला स्वधर्म कोणता, ह्याचा शोध घेवून निरपेक्षपणे स्वधर्माचरण करावे हाच जीवनमंत्र आहे. विठ्ठलाला युगानुयुगे, विटेवर उभा ठेवणार्या भक्त पुंडलिकाचा आदर्श कायम नजरेसमोर ठेवा.
उपसंहार:
आचार्य विनोबा भावे ह्यांनी अत्यंत सुलभ भाषेत ७ आँक्टोबर १९३० ते ६ फेब्रुवारी १९३१ ह्या कालखंडात गीतेवर प्रवचने दिली. त्यावर आधारित त्यांचे 'गीताई' हे गीता-बोध सर्वसामान्य जनतेला समजेल अशा भाषेतील पुस्तक योगायोगाने माझ्या वाचनात काही वर्षापूर्वी आले. ते मला जसे उमजले तशी मी माझ्या डायरीत नोंद केली. आज पुष्कळ वर्षांनी ती डायरी मला गवसली. माझ्या ब्लॉगवर हा गीता-बो़ध लिहीताना मला खूप आंतरिक समाधान मिळाले. एक नवल मात्र हे सारे इथे मांडताना अवचितपणे ध्यानात आले: कसा कोण जाणे अध्याय ९ व १२ ह्यांचा सारांश मला डायरीत कुठेच सापडला नाही. त्यामुळे तो येथे मला मांडता आलेला नाही. क्षमस्व. पण जे काही गीता-,बोधाम्रुत मला गवसले ते गोड मानून, आपण सारे आपली जीवनद्रुष्टि व जीवनशैली बदलून समाधानाने जगण्याचा प्रयत्न करू या. धन्यवाद
शुभम् भवतु
सुधाकर नातू माहीम मुंबई१६
Mb 9820632655
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा