बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

"विचारधन !":

"विचारधन !":

मुंंबई अस्मिता वाहिनीवरील चिंतन कार्यक्रम ऐकल्यानंतर मला दररोज प्रातःकाळी प्रेरणा मिळून मी स्वनिर्मित आणि अनुभव सिद्ध असे विचारधन न चुकता सोशल मीडियावर दररोज सामायिक करत असतो. त्याचीच झलक या खास लेखात आहे आणि ती तुम्हाला देखील अंतर्मुख करून तुुमच्या जाणीवा समृद्ध करेल अशी आशा आहे....

# 👍"भूतकाळाचे कांटे उलटे फिरविणे, केवळ अशक्यच असते. त्यांतून कुणी अट्टाहासाने तसे करायचा प्रयत्न केलाच, तर ते आत्मघातकी ठरू शकते. कालप्रवाहाबरोबर, वर्तमान जसजसे रुप घेईल ते खुल्या दिलाने स्विकारणेच अंतिमतः शहाणपणाचे ठरते !":👌

#👍"माणसाचं आयुष्य नशिबाच्या धनुकलीवर पिंजलं जात कुठे कसं वाहत जाईल, ते कळतच नाही. त्याचे गुण त्याला प्रकाशातले यश, तर अवगुण एखाद्या जहरी विषारी नागासारखे अपयशाचे फूत्कार काढत, त्याच्या र्हासाला कारणीभूत ठरतं !":👌

#👍"The Era of Mind Power !:👌                    "Data, when analysed, is Information and such Information when properly introspected, is Knowledge and Applying Knowledge to accomplish set goal is The Mind Power !":👌

# 💐"Most of the times, Information contains an Opportunity. One must try to identify such Opportunity and it's relation with his own needs to achieve the desired goal !":💐

#👍"माणसाचं जीवन हा बहुरंगी नात्यांचा अनुभव घेत, ती निभावून नेण्याचा स्वतंत्र प्रयोग असतो. त्याचे यशापयश प्रत्येकाच्याच हातात असूनही, त्याकडे काणाडोळा केला जातो !":👌

#👍"माणसाचे डोळे अन् देहबोली हे त्याच्या मनाचे आरसे असतात. ज्यांना माणसं वाचता येतात, त्यांनाच त्यांतील प्रतिमा दिसतात.....👌

#👍" जेव्हा आपण आपल्याला आवडणारे काम समाधानकारक रीतीने पूर्ण करतो त्या वेळेला आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जेच्या लहरी निर्माण होतात हे असे घडणे आपल्या आरोग्याला अत्यंत हितकारक असते !":👍

#👍"आज अचानक चमत्कार घडावा तसे जाणवले की, आमचे आडनाव 'नातू' हे किती प्रेरणादायी आहे ते ! 'नातू' म्हणजे इंग्रजीत 'Grandson' अर्थातच चांगली मुले-नातवंडं-अर्थातच दुधावरची साय जशी !":👍

#👍"आजही कालच्याच सारखे जाणवले की, आमच्या आईचे माहेरचे आडनाव 'विद्वांंस', हे देखिल किती अर्थपूूर्ण आहे ! 'विद्वांंस' अर्थातच विद्वान, बुद्धिमान माणसं !":👍

#"अर्थ" हाच सर्वार्थ आणि कमी श्रम जादा दाम ह्या प्रर्व्रुत्तीचे विदारक चित्र आपल्याला ठायीठायी नजरेस येते. आपण कुणाचे भले जरी करू शकलो नाही, तरी निदान आपण जे काही करतो, त्यामुळे इतरांचे जराही नुकसान होताच कामा नये" हा निदीध्यास जेव्हां, समस्तजन घेतील तोच सुवर्णदिन!":

# "तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सायबर क्राईमस् सारखे भयानक भस्मासूर आपल्यासमोर उभे राहिले आहेत. अशावेळी अक्षरशः सावधानता किती आवश्यक आहे याची प्रचिती सर्वांनाच येत आहे. मुद्दा मात्र वेगळा आहे, अशी गुन्हेगारी करायला दुसऱ्यांना फसवायला माणसे कां तयार होतात, याचे सखोल संशोधन मानसशास्त्रज्ञांनी व समाजशास्त्रज्ञांनी करावे अशी वेळ आली आहे."

# "नटवर्य बाबूराव पेंढारकरांचे 'चित्र आणि चरित्र' हे आत्मकथन मी नुकतेच वाचले. त्यामधील एक नोंद दखल घेण्याजोगी ! एके काळचा सुप्रसिद्ध प्रभात स्टुडिओ हा पुण्यामधील ज्या जागी होता, ती जागा पुण्याचे सरदार नातू यांची ! ती सुमारे 11 एकर आणि त्या जागेचे त्या काळात खरेदीखत 17 हजार रुपयात करून प्रभात स्टुडिओची उभारणी केली गेली. विष्णूपंत दामले हे प्रभातच्या संस्थापकांपैकी एक !:"

#👍"सुख क्षण हातात काही पकडून ठेवता येत नाहीत, जसे गुलाबी थंडी मध्ये पानावरील दंवबिंदू घरंगळत जातात, तसेच सुख क्षण हातातून क्षणार्धात कधी निसटून जातत, ते कळतच नाही !":👍

#👍"प्रात:काळच्या समयी मातीला आणि आसमंताला एक आगळावेगळा सुगंध असतो, निळ्याशार आकाशातील गुलाबी प्रकाशशलाका मंद गतीनेभवताल उजळत जात असतात आणि मंद सुगंधी वारा मनामनाला नव आशेची दुलई पांघरून जात असतो !":👌

#👍" सारे समजून उमजून न समजल्यासारखे जे करतात, अशा माणसांसमोर कुठलाही वाद घालणे व्यर्थ असते. मौनं सर्वार्थ साधनम् !":👌

#👍""एखादं पुस्तक वाचताना जेव्हा सद्भावनांमुळे सन्मतीमुळे आणि सत्क्रुत्यांमुळे सद्गतीत होऊन जेव्हा अश्रू येतात, ते म्हणजे आनंदाचे आत्मसमाधानाचे व क्रुतार्थतेचे अश्रू असतात. त्यांचे मोल, अमोल असते. म्हणूनच जे पुस्तक अशा तऱ्हेने तुम्हाला रडायला लावते, ती श्रेष्ठ, उत्तम कलाकृती !":👌

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार":

 "आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार":

आपणच आपल्या करणीची फळे भोगत असतो. आपला र्हास किंवा आपला विकास, हा नेहमी आपण काय काय केले, समस्यांकडे कशा दृष्टीने बघितले आणि त्यांतून मार्ग कसा काढला, ह्यावर अवलंबून असतो. रडत राऊंवर कायमच तसे रहाण्याची वेळ येण्याचा धोका असतो. 

संकटातून प्रतिकूल परिस्थितीतून देखील संधी शोधणारे, आपली प्रगती करून घेत असतात. त्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. पण ते न करता, आपण अपयशी ठरलो व मागे राहिलो, ह्याचेच केवळ दुःख बाळगत, त्याचे अवडंबर माजवत, अनुकंपा मिळवण्यासाठी झगडत रहाणे, शूरवीरांना शोभत नाही. आपली शक्ती, दयेची क्रुपेची पोटतिडकीने याचना करण्यात वाया घालवणे योग्य नव्हे. त्यापेक्षा आपण आपले प्रामाणिक, आत्मपरीक्षण करून, कुठे चुकले, काय चुकले अन् काय करायला हवे होते आणि आता काय पुढे केले पाहिजे याचा शोध घेणे आवश्यक आहे. नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की, समस्यांना विघ्ने आणि आपली सर्व शक्ती त्या समस्या दूर करण्यासाठी वापरणे जास्त श्रेयस्कर असते.

कोणे एके काळी वैभवात लोळणारे आणि समुदायाचे आपआपल्या गांवाचे नेतृत्व करणारे, केवळ त्यांच्या ऐतखाऊपणामुळे, निष्क्रियतेपायी अथवा आपल्या अहंकारापायी स्वतःचेच नुकसान करून घेणारे सापडतात. जिथे फुले वेचली, तिथे गोवऱ्या वेचायची वेळ कां व कधी आली, ह्याचे भान त्यांना राहत नाही.

केवळ आपल्याच श्रेष्ठत्वाच्या गुर्मीत मग्न राहून जर वेगाने बदलत्या परिस्थितीचा योग्य तो आढावा घेऊन, त्यातून मार्ग काढला नाही, तर आपली वेगाने पिछेहाट होणे अपरिहार्य असते. अनुकंपा मिळवण्यासाठी झगण्यापेक्षा, तशी वेळ आपल्यावर येणारच कशी नाही, ह्याचा सारासार विचार करून त्या मार्गाने जाण्यात, आपले तन मन धन वेचणे गरजेचे असते. ज्यांना असे शहाणपण सुचते, तेच योग्य तो मार्ग चोखाळून नेहमीच आघाडीवर राहतात, आपला विकास भरभराट करत राहतात. अशीही अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. तसे जे वागत नाहीत, त्यांच्यावर दुसऱ्यांच्या कृपेवर जगण्याची पाळी येणे अपरिहार्य असते.

काळाचा महिमा हा असाच असतो. असाच रहाणार.

सुधाकर नातू

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

👍"आठवणीतल्या साठवणी भाग 1":👌

👍"आठवणीतल्या साठवणी भाग 1":👌

पुष्कळ दिवस सादर करायचा संकल्प सोडलेला, आज कदाचित पूर्ण होईल असे दिसते. माझं आजोळ आंजर्ले, त्या गावाची आठवण विसरता म्हणून विसरत नाही. तेथील विद्वासांच्या कुटुंबात जन्माला आलेली माझी आई आणि तिची अकरा बहीण भावंडे यांच्यासंबंधी माझ्या आठवणीतली ओळख करून देण्याचा हा विचार प्रत्यक्षात आता येत आहे. तत्पूर्वी आंजर्ले या गावाविषयी, ह्या पहिल्या भागात.

आंजर्ले गांव नयनरम्य आणि समुद्राचा विशाल किनारा लाभलेले, नारळी पोफळीच्या वाड्यांनी विनटलेले असे रत्नागिरी जिल्ह्यातले, दापोली तालुक्यातले गांव ! तेथे असलेल्या कड्यावरच्या गणपती मंंदिरामुळे खूपच प्रसिद्ध आहे. गांवाच्या सुरुवातीला असलेली खाडी, तिच्या बाजूला एक डोंगर आणि समोरील किनार्यावरून गांवामध्ये येण्यासाठी असलेली पुळण मला अजून आठवते.

बालपणी मे महिन्यातील आमच्या तेथील वास्तव्यात बंदरावर जाणं हा दररोजच्या दिनक्रमाचा आमचा एक भाग असे. कधी मधी कड्यावरच्या गणपतीलाही जात असू. 

मुंबईहून आंजर्ल्याला जायचं हा एक मोठा काशीयात्रेसारखा प्रयोग असे. सायनहून स्टेशनवर गाडी पकडून मशिद बंदर स्टेला जाणे, मशिद बंदरवरून टांगा करून भाऊच्या धक्क्यावर बोट पकडण्यासाठी जाणे. बोट धक्क्याला लागली की डेकवर जाण्याची लगबग. जंजिरा श्रीवर्धन आणि नंतर येणार हर्णै बंदर, हा प्रवास जवळजवळ आठ तासाचा सुद्धा असू शके. डायरेक्ट हर्णै बंदर घेणारी एखादी बोट असायची कधी कधी. रोहिदास, चंद्रावती चंपावती आणि सेंट अंथुनी अशी नावं असलेल्या बोटी मला आठवतात. जंजिरा श्रीवर्धन आणि हर्णैला धक्का नसल्यामुळे बोट समुद्रातच उभी राहायची आणि पडावातून म्हणजे खपाट्यातून माणसं किनाऱ्याला नेली जायची. 

जंजिरा आणि श्रीवर्धन आले की आमच्यासारखी हर्णैवाले प्रवासी, डेेकवरून गंमत बघत ते हलणारे खपाटे आणि त्याच्यात उड्या मारणारे प्रवासी बघत असा प्रवास तो व्हायचा. काही लोकांना बोट लागायची, म्हणजे उलट्या व्हायच्या. हर्णैला बोटीतून पडावात उतरलं की अक्षरच्या डुलत डुलत उंच लाटांचा सामना करत, किनाऱ्यावर जायचं. तिथे तेव्हा एसटी एवढी प्रचलित नव्हती. त्यामुळे हर्णै ते आंंजर्लेसाठी दापोली मोटार संघाच्या बसेस असायच्या. त्या बसमधून आंंजर्ल्याच्या पलीकडे म्हणजे डोंगरावर ती बस उभी राहायची. तिथे उतरून तरी वा होडीमध्ये बसून किनाऱ्याला यायचं. वाळूतून चालत बंदरावरून पाखाडी हा जो भाग आहे तिथे, जर जमलं तर बैलगाडीने, बहुदा ती नसायचीच, चालत जाणे आणि मग एकदाचे आजीकडे पोहोचणे. त्यावेळेपर्यंत रात्र झालेली असे. वीज नव्हती. मिणमिणत्या कंदीलाच्या प्रकाशात आजी आमचे आनंदाने स्वागत करायची, ही ती आठवण मनात कोरलेली आहे.

पुढील भागात आईची अकरा बहीण भावंडे यांच्यासंबंधी माहिती उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे आजोबा अण्णांच्या पहिल्या बायकोचं आडनाव माहेरचं ओक होतं. तिला एक मुलगी झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला महाडमध्येच वाढवलं. नंतर तिचा विवाह सातारचे वकील साठे यांच्याशी झाला आणि तिला सहा मुलगे आणि दोन मुली होत्या. त्यातील सर्वात मोठा डॉक्टर दामोदर हा दादरला राहायचा शिवाजी पार्कला, त्याचा बंगला होता. त्याची बायको गायनाकालॉजीस्ट होती. त्याचा एक धाकटा भाऊ अशोक रूईयामध्ये माझ्या पुढे एक वर्ष होता, तोही डॉक्टर झाला.

आईच्या आधीची बहीण ताई, हिला दापोलीच्या परांजपेंकडे दिली होती. तिला एक मुलगी उषा म्हणून झाली, त्यानंतर ताई निवर्तली आणि त्या परांजप्यांनी नंतर दुसरे लग्न केले.

उषाचे यजमानांंचे आडनाव थत्ते होते, ते हर्णैला पोस्टमन असताना मी त्यांच्याकडे जाऊन आलेलो आहे. तसेच जालगाव दापोलीजवळ परांजपे यांच्याकडेही आम्ही लहानपणी गेलो होतो. एक गंमत म्हणजे त्या परांजपे यांचे वडील पोस्टात होते. जवळजवळ शंभर वर्षे जगले आणि 40 वर्ष त्यांनी पेन्शन मिळवले.

ताईच्या आधीच्या आईच्या दोन सख्ख्या बहिणी बालपणीच निवर्तल्या. अशा रीतीने आई धरून सख्खी दहा बहिण भावंडे आणि पहिली सावत्र साताऱ्याची अक्का साठे.

आजोबा गणू अण्णांचे दुसऱ्या लग्नात 24 25 चे आसपास वय होते आणि आपली आजी सावित्रीबाई ही लग्नात बारा वर्षाची होती असे ऐकले आहे ती 77 वर्षे जगली.

ताईनंतरच्या आईच्या इतर बहिण-भावंडांची कथा पुढील भागात.

धन्यवाद 

सुधाकर नातू

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

"Different Strokes!":

 😄"Different Strokes !"😄


Please Read this article carefully, think and Introspect:

"My FB Post-9 years ago!":
"It is really required at this stage of morally and ethically poor
people, to seriously and scientifically  probe, investigate the reasons, causes for such a moral downfall, generations after generations in the last century. Add to that there is a growing tendency not to follow set rules/laws or systems and 'Hum Kare so, Kayada' mentality is seen ever now and then. Let's find what went wrong during the last  century and onwards.. Despite present generations'  better economic status, we would get ashamed if we examine what was the Model, honest generation a century ago was and what pathetic we are today. It is just not easy to find the answer.
Is it due to 'LPG' factor or any genetic change over all  these years , or is it that our priorities, outlook towards  the way we should lead life has dramatically changed as economic, scientific advancement went on improving or is it that due to our rapid growth of comforts increased over the last century, there has been our  moral degradation? Thus Qs are plenty,
I believe this is a crucial Turning Point for all of us, as we walk fast
to future years of this century and such a meaningful probe is 
the most desirable right now. Remember the menace, monster of corruption and craze for easy fast prosperity, due to which all our Noble values are getting eroded. It is hence, high time that the genetic scientists, social thinkers/ reformers, economists come together to probe about the Mission Moral Revival of the coming Generations. Other wise I am afraid anarchy won't be fae away."
#############################
"My FB Post-9 years ago!":
In different areas of Mumbai and it's suburbs there  have been many instances of drainage water flowing out and making the surroundings dirty and filthy, thus endangering the health of citizens. It's an ironical paradox that the Civic Body-BMC which just cannot manage it's drainage system effectively, is going to have a cleanliness drive in Mumbai on 7th Nov'14 to combat the spread of Deadly Disease Dengue! It's further shameful that it's own KEM Hospital has been found to have a colony of the germs of Dengue and has been issued Notice by the parent body itself! What kind of health management is this?
The pot holed, uneven roads through out the city,  polution, unsettling noise, traffic jams, crowded local trains, unwanted, unplanned sky-walks, just to name the few,are yet many  'feathers' in the cap of India's Economic Capital. The BEST bus service is also in loss and going from bad to worst. Why should we have monopoly of BEST for public road transport? Can we not have more private players as is now in Power supply sector, for the same to improve the citizens' misery?
One can go on,on 'singing'  the sad songs of pains of the helpless citizens of Mumbai. Due to Pay commisions, salaries of 'Babus' are at very high level without any reasonable output and acoountability. All seem to be concerned about their 'Demands' but not bothered about their responsibilities and duties.Politicians and People in power have been busy in improving their fortunes and so on.In nutshell, the state of affairs here were never ever, so worst and pathetic in its history!
It is heartening to note that under these circumastances there is a hope of a competant, Honest CEO being appointed for Mumbai. One must welcome this move and hope to look for a radical turn arround in the affairs ofthe city. all those who oppose this move, may kindly introspect these facts and whole heartedly back this decision."
############################

"My FB Post-9 years ago!"

Taking into account the promises made at the Election time, are regularly either forgotten, side tracked, or just not fulfilled in the desired time frame, there must be a monitoring system in place to review their status annually. What we need now, is the results' hungry, development oriented, transparent Governance and for that power crazy, selfish politicians should not have any place in the same. The voters shld hv power to recall the inactive, selfish elected candidates. There is an acute need for the candidates who are self-less, genuinely committed for well being of the country, in the elections. Finally, emotional promotion in the elections should be out and pure developmental plans, with definite time frame must be in."
######################
Life is a roller coaster ride. It's only for few days, not going generally, beyond single digit, that u feel that there r no problems on your slate to tackle. All of a sudden,these gooddy, gooddy feelings get shadowed by the entry of an uncertain problem, thus making room for his 'fellow-brothers' to enter the fray. Then on, you struggle not, for just few days but for months, with an ocean of worries to tackle and swim thru'. But 'Lo', Life being a wheel of fortune, some magic wand appears on the scene and cleans the clouded slate, swiftly and you, then again have a clear blue 'sky' with the bright, shining 'Sun' of hope and joy. That's, what Life is, for one and All. Amen...
############################

Sudhakar Natu

"सोशल मीडियावरील दुर्मिळ माहिती !"


🤑 "सोशल मीडियावरील दुर्मिळ माहिती !":🤑
सोशल मीडियाला कितीही नावे ठेवली तरी कधी कधी नोंद घेण्याजोगी आणि संग्रह अशी उपयुक्त माहिती आपल्याला फॉरवर्ड केली जात असते फक्त तशा तऱ्हेची माहिती वेचण्याची दृष्टी हवी माझ्या नजरेत अशा काही नोंदी आल्या त्याच येथे देत आहे:

😗🤥"बोलावे कसे किती या संबंधी माझी आचारसंहिता !":😗☺️
"ही आचारसंहिता तयार करण्यापूर्वी मला आठवले की, केव्हातरी श्री संत तुकाराम यांनी वाणी कशी वापरावी यासंबंधी अभंग लिहिले होते.
फेसबुकवर आणि गुगलवर जाऊन मी ते शोधण्याचा आटापिटा केला आणि अखेरीस माझ्या गुुगलवरील प्रयत्नांना यश आले.

संत तुकारामांचे पुढील अभंग आपल्या सर्वांना बोलण्यासंबंधीची
आचारसंहिता सहजतेने सांगून जातात.....
😆 "घासावा शब्द | तासावा शब्द |
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||
बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके |
ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे
बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||
कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म | काढूच नये ||
थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |
मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला
शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान , कर्म ,भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||
जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये !"😆
इती संत तुकाराम!
#############################

😆 "इसे सेव कर सुरक्षित कर लें, ऐसी पोस्ट कम ही आती है।"😆

विश्व का सबसे बड़ा और वैज्ञानिक समय गणना तन्त्र (ऋषि मुनियों द्वारा किया गया अनुसंधान)

■ काष्ठा = सैकन्ड का  34000 वाँ भाग
■ 1 त्रुटि  = सैकन्ड का 300 वाँ भाग
■ 2 त्रुटि  = 1 लव ,
■ 1 लव = 1 क्षण
■ 30 क्षण = 1 विपल ,
■ 60 विपल = 1 पल
■ 60 पल = 1 घड़ी (24 मिनट ) ,
■ 2.5 घड़ी = 1 होरा (घन्टा )
■3 होरा=1प्रहर व 8 प्रहर 1 दिवस (वार)
■ 24 होरा = 1 दिवस (दिन या वार) ,
■ 7 दिवस = 1 सप्ताह
■ 4 सप्ताह = 1 माह ,
■ 2 माह = 1 ऋतू
■ 6 ऋतू = 1 वर्ष ,
■ 100 वर्ष = 1 शताब्दी
■ 10 शताब्दी = 1 सहस्राब्दी ,
■ 432 सहस्राब्दी = 1 युग
■ 2 युग = 1 द्वापर युग ,
■ 3 युग = 1 त्रैता युग ,
■ 4 युग = सतयुग
■ सतयुग + त्रेतायुग + द्वापरयुग + कलियुग = 1 महायुग
■ 72 महायुग = मनवन्तर ,
■ 1000 महायुग = 1 कल्प
■ 1 नित्य प्रलय = 1 महायुग (धरती पर जीवन अन्त और फिर आरम्भ )
■ 1 नैमितिका प्रलय = 1 कल्प ।(देवों का अन्त और जन्म )
■ महालय  = 730 कल्प ।(ब्राह्मा का अन्त और जन्म )

सम्पूर्ण विश्व का सबसे बड़ा और वैज्ञानिक समय गणना तन्त्र यहीं है जो हमारे देश भारत में बना हुआ है ।
#############################

धन्यवाद 
सुधाकर नातू

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०२३

💐 👍 "साधा, स्वत:च स्वत:शी संवाद !":👌

 👍"रंगांची दुनिया !":👌

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐

💐"शारदोत्सव!":💐

👍 "साधा, स्वत:च स्वत:शी संवाद !":👌

वाचनासारखा जाणिवा समृद्ध करत आत्मसमाधान आणि आनंद देणारा दुसरा कुठलाही छंद नाही. माझं भाग्य हे की, मला देखील वाचनाची आवड आहे आणि वाचनामध्ये मला शक्यतोवर व्यक्तिचित्रे आणि आत्मचरित्रे अधिक आवडतात, कारण त्यामुळे जीवनांचा विविध असा बरा वाईट भवताल, आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येतो. कारण प्रत्येक व्यक्तीचं जीवन म्हणजे एक कादंबरी असते. त्या त्या व्यक्तीचे अनुभव त्या वेळच्या प्रसंगांचा घटनांंचा परामर्श आणि त्या त्या काळांत आपण तेव्हा कुठे होतो, कसे होतो याचा पडताळा घेत, स्वतःशीच स्वतः संवाद साधत, आपल्याला एका वेगळ्या प्रकारच्या दुनियेत प्रवेश केल्याचा आभास देखील होतो. 

माझ्या आवडत्या लेखकांमध्ये रवींद्र पिंगे यांचं नांव पहिल्या रांगेतील आहे. नाट्यदर्पण रजनीच्या 'जीवनगौरव पुरस्कारां'च्या मानपत्राचे लेखन आणि अतिशय प्रासादिक अशी लेखनशैली असलेली रवींद्र पिंग्यांची बहुतेक पुस्तके मी आवर्जून मिळवली आहेत आणि वाचली आहेत. त्यातील 'सर्वोत्तम पिंगे' हे एक पुस्तक अचानक मला वाचनालयातून गवसले आणि अक्षरशः एका वेगळ्याच अशा अनुभूतीच्या प्रांगणात मी न्हावून निघालो. त्यांचे सर्वोत्तम असे हे बावन्नकशी लेख म्हणजे प्रत्येक जणू एक एक उत्कृष्ट शब्दशिल्प आहे. त्यामध्ये अनेक 

प्रथितयश व्यक्तींची जी व्यक्तिमत्वं आणि जीवनकहाण्या रेखाटल्या आहेत त्या अक्षरश: न विसरण्याजोग्याच आहे

त्यातील एक लेख तर मी कधीच विसरू शकत नाही, कारण त्यामधूनच मला जे गवसले, ते म्हणजे शारदेच्या खजिन्यातील कुबेराचे जणू शब्दभांडार आहे. 'स्वतःशीच स्वतः संवाद साधा' अशा स्वरूपाचा त्यांचा तो लेख त्यांचे संपूर्ण जीवन गाणे आपल्यासमोर रंगवतोच, पण त्यामधून आपल्याला प्रत्येकासाठी उपयुक्त अशी प्रश्नावली मिळते. तीच प्रश्नावली मी इथे संपादित करण्याचा प्रयत्न केला आहे. आपणही ती नजरेतून जरूर घालावी, त्या अनुषंगाने आपणच आपल्याशी संवाद साधावा, त्याची उत्तरे लिहून काढावीत. आपण कुठे होतो, यापुढे आपल्याला कुठे जायचंय आणि आपले खरोखर जीवन तत्वज्ञान काय आहे, आपण काय मिळवले अन् काय गमावले याचाही यथायोग्य मागोवा त्यामुुळे प्रत्येकालाच घेता येईल !

"संपादित प्रश्नावली":

: नांव, पत्ता, फोन नंबर, ई मेल, मूळ गाव, व्यवसाय, सध्या काय करता, कुटुंबातील व्यक्ती, शिक्षण, शाळा, महाविद्यालय, विशेष छंद, महत्त्वाकांक्षा काय होती, ती सफल झाली का, निखळ आनंदाची कल्पना, आनंदाचा प्रसंग, संस्मरणीय प्रसंग, देव मानता कां, आपला स्वभाव कसा आहे, आवडते लेखक, तुमच्या जवळची मौल्यवान गोष्ट, आवडलेली पुस्तके, आवडलेले चित्रपट व नाटके, आवडते कलावंत, आवडतं गाव, आवडती गाणी, मित्रपरिवार, आवडते गायक व गायिका,जीवनावर प्रभाव टाकणार्या व्यक्ती, सर्वात प्रिय गोष्ट, तुम्ही तुमच्या जवळ कोणती वस्तू नेहमी वापरता, उपजीविकेचे साधन, तुम्हाला तिटकारा येतो का, फावल्या वेळात काय करता, धन्यतेचा क्षण कोणता, दुःखाचे क्षण कोणते, काय करायचं राहून गेलं, कोण व्हायला आवडलं असतं, जीवनविषयक तत्त्वज्ञान, तुम्हाला वैताग कशाचा येतो,  स्वतःची आवडती कलाकृती, तुम्ही काय लिहिता, तुमचे खास गुण, जगून झालेल्या आयुष्याबद्दल काय विचार, तुमची स्मृती कशी उरावी, संकल्प, नवीन पिढीसाठी कान गोष्ट...

शेवटी जाता जाता सर्वोत्तम पिंगे या लेखसंग्रहात मला जाणवलेले सार हे असे आहे:

👍"माणसाचं आयुष्य नशिबाच्या धनुकलीवर पिंजलं जात कुठे कसं वाहत जाईल, ते कळतच नाही. त्याचे गुण त्याला प्रकाशातले यश, तर अवगुण एखाद्या जहरी विषारी नागासारखे अपयशाचे फूत्कार काढत, त्याच्या र्हासाला कारणीभूत ठरतं !":

👌

धन्यवाद 

सुधाकर नातू