"वाचा, फुला आणि फुलवा-७":
"कोरोनाशी युद्ध आमुचे सुरू":
# २६ एप्रिल च्या महाराष्ट्र टाईम्स मुंबई मधील श्री. सुनील चावके ह्यांचा "उत्तर भारतातील हाहाकार" हा लेख, एकंदर कोरोनारुपी महामारीच्या संकटाची, वस्तुस्थिती किती विदारक आहे, हे दाखवणारा आहे. नको त्या गोष्टींना प्राधान्य देऊन संकटाच्या संभाव्य विघातक स्वरूपाकडे व त्यावर उपाययोजना करण्याच्या तयारीकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने, आजची भयानक स्थिती निर्माण झाली आहे.
# शनीवार दि. २४ एप्रिल'२१ लोकसत्ता मधील संपादक श्री गिरीश कुबेर ह्यांचा "फरक" लेख ब्रिटनने शिस्तबद्ध पद्धतीने पहिल्या लाटेपासून पुढील संभाव्य दुसर्या लाटेलाही तोंड कसे द्यायचे ह्याची तयारी कशी केली ते सविस्तर उलगडणारा लेख तर डोळ्यात अंजन घालणारा जसा आहे. तसाच पीटर ड्रकरच्या मँनेजमेंट मंत्राचा* रास्त उपयोग कसा होऊ शकतो ते मांडणारा आहे.
* World famous Management Guru Peter Drucker's one of the mantras for Business Success and Sustenance:
"We must introspect on, 'What can happen, due to whatever has happened';
If this mantra was remembered & followed in toto, the present Grim, Pathetic situation would not have probably happened."
वरील श्री कुबेरांचा लेखही डोळ्यात चांगले अंजन घालणारा आहे. आपले तहान लागल्यावर विहार खणणे हे धोरण कुठे आणि ही शिस्तबद्ध कारवाई कुठे, ते त्यामुळे समजेल.
दिवसेंदिवस अक्राळविक्राळ स्वरूप धारण करणार्या कोरोना महासंकटाच्या सद्यस्थितीला नाकारता येणार नाही. पुढे काय काय भयावह घडू शकेल ह्याकडे पहिल्या लाटेनंतर पूर्ण दुर्लक्ष करून वेगळ्याच प्राधान्यांना कवटळण्याच्या क्रुतीचे ही सारी फलनिष्पत्ती आहे.
तिखट प्रतिसादांमधून ती ध्वनीत होत आहे.
शेवटी कोणाही माणसाच्या कुवतीला मर्यादा असतात आणि त्या आज ना उद्या उघड होतातच, हेच खरे. 😢😢
"भितीचा वेढा":
एखादा दिवस किती चित्रविचित्र असतो आणि दुःखद अशा बातम्या एकापाठोपाठ देणारा असतो. नुकताच त्याचा अनुभव अचानक आला.
"भितीचा वेढा":
एखादा दिवस किती चित्रविचित्र असतो आणि दुःखद अशा बातम्या एकापाठोपाठ देणारा असतो. नुकताच त्याचा अनुभव अचानक आला.
कोरोनाच्या महासंकटामध्ये, आतापर्यंत पहिल्या लाटेमध्ये तो आपल्याला होईल कां, ही भीती वाटत होती; परंतु या दुसऱ्या लाटेचे अक्राळविक्राळ रूप त्या दिवशी, अनेकांच्या मृत्यूच्या बातम्या कानावर आल्यामुळे लक्षात आले. त्यामुळे आपल्याही भोवती मृत्यू घोंगावत आहे की काय अशा तर याची चिंता वाटण्याजोगी परिस्थिती आणि वातावरण अनुभवास येऊन थरकाप उडाला.
प्रथम एक वृद्ध गृहस्थ कोरोनामुळे गेल्याचे अचानक समजले, ते समजते तोच परिचित असा एक तरुण त्याच व्याधीमुळे मरण पावल्याचे वृत्त तर अविश्वसनीय.व धक्कादायक होते एवढे पुरे होत नाही तो काय छोट्या पडद्यावरील बातम्यांमध्ये तर एका मागोमाग एक अशा चार तारखेच्या बातम्या समजल्या बॉडी बिल्डर वृत्तनिवेदक आणि एक लहानगे बाळ देखील ह्या कोणाचा महामारी जा बळी ठरल्याचे समजले त्यामुळे अक्षरशः मन व्यथित झाले आणि वाटले की काय हे मृत्यूचे थैमान पहिल्या लाटेमध्ये आपल्याला करुणा होईल की काय एवढी भीती वाटायची तर या दुसऱ्या प्रचंड वेगाने पसरणाऱ्या लाटेमध्ये आता आपल्याभोवती मृत्यू फास टाकेल की काय, अशी चिंता वाटण्याजोगे वातावरण निर्माण झाल्याचे भासले. एखादा दिवस काळाकुट्ट चिंताजनक कसा असतो, त्याची प्रचिती आली आणि कहाणींच्या गोष्टींमध्ये आतापर्यंत आपण महामारीच्या गोष्टी वाचल्या होत्या, त्याचे प्रत्यक्ष रूप आपल्या सभोवती आहे ही विचित्र जाणीव झाली. रूग्णसंख्या जशी झपाट्याने देशभर वाढत आहे, त्याच बरोबर आता म्रुत्युंचे आकडेही वाढत असल्याचा हा परिणाम आहे.
""दैनिक लोकसत्ता चतुरंग पुरवणी":
सध्याच्या कोरोना महामारी च्या संकटामध्ये तर प्रत्येकाच्या मनाचे ताणतणाव प्रचंड वाढत चालले आहेत आणि घरात राहिल्यामुळे तर बेचैनी आणि इतर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत या पार्श्वभूमीवर लोकसत्ता चतुरंग पुरवणी मधील डॉक्टर आशिष देशपांडे यांची लेखमाला वाचनीय होती.
सध्याच्या कोरोना महामारी च्या संकटामध्ये तर प्रत्येकाच्या मनाचे ताणतणाव प्रचंड वाढत चालले आहेत आणि घरात राहिल्यामुळे तर बेचैनी आणि इतर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत या पार्श्वभूमीवर लोकसत्ता चतुरंग पुरवणी मधील डॉक्टर आशिष देशपांडे यांची लेखमाला वाचनीय होती.
दैनिक लोकसत्ता शनिवारच्या चतुरंग पुरवणी मध्ये चांगला वाचनीय मजकूर असतो. त्यापैकी मानसिक आरोग्याबद्दल अतिशय सोप्या भाषेत विविध प्रकारचे मार्गदर्शन करणारे लेख डॉक्टर आशिष देशपांडे लिहीत असातात. ते लेख मी न चुकता ते नेहमी वाचत असतो. सध्याच्या कोरोना महामारी च्या काळात सर्व जणांचे ताणतणाव वाढत चालले आहेत. त्याचप्रमाणे बेचैनी, नैराश्य अशा सारख्या व्याधींना तोंड द्यावे लागत आहे.
ही लेखमाला चांगली मार्गदर्शक आहे. तेथे जे सांगितले आहे, ते आपल्याला व्यवहारात उपयोगी पडणारे आहे. त्यांतील सार आता मांडतो.
# बेचैनी तर सगळ्यांनाच येत असते. आपल्याला असे लक्षात येते की मनासारखे काही घडले नाही किंवा एखादी कठीण असे संकट वा परीक्षा समोर उभी राहिली तर आपले ताणतणाव वाढत जातात चित्त थार्यावर रहात नाही, कुठलेही काम करायला वा जबाबदारी पाडायला मन लागत नाही.
याबाबतची अतिशय चांगली मार्गदर्शक माहिती डॉ. आपल्या लेखांद्वारे देत असतात.
जगविख्यात नाटककार शेक्सपिअर ह्यांच्या
'हॅम्लेट' नाटकाचे उदाहरण घेऊन, हँम्लेटला to be or not to be अशी सभ्रमावस्था व बेचैनी निर्माण झाले असताना त्याने शांतचित्ताने व सारासार बुद्धी वापरून समस्येला तोंड कसे दिले हे समर्पक उदाहरण मांडून, त्या त्याद्वारे भ्रम भ्रांती आणि अज्ञानापासून दूर राहून सत्य काय ते शोधा, झटपट आनंदाच्या भरात न पडता, नेहमी दूरदृष्टी ठेवा. आपल्या "ध्येयापासून नजर हटी ,दुर्घटना घटी" 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' पण ते करताना आपल्या जवळच्यांना समजून समजून घेतलेलं बरं. यापैकी तीन पेक्षा अधिक नियम पाळणारा विचार विवेकी असण्याची शक्यता जास्त. मानसशास्त्र म्हणतं की, होता होईस्तोवर
सारासार विचार करा. पण आपल्याला लक्षात येतं की हा तऱ्हेने सारासार विचार करणे, सगळ्यांना जमतंच असं नाही.
# तुकाराम महाराज म्हणतात "तुका म्हणे आम्हा भांडवल चित्त, देवोनी दुश्चित्त पाडियले" हे दुश्चित्त म्हणजे नियम भंग.
आपल्या बेचैनी वरील लेखांत डॉ देशपांडेंनी उपयुक्त असे विचार, एका प्रसिद्ध इंग्रजी कविचे उदाहरण घेऊन एक लेखात मांडले आहेत. ते विचार खरोखर घेण्यासारखे आहेत. अलेक्झांडर पोप या कवीने १७११ मध्ये एक प्रदीर्घ कविता लिहिली "अँन एसे ऑन क्रीटीसीजम". त्यांतील ह्या तीन ओळी मोलाच्या आणि कायम आचरणात आणाव्यात अशाच आहेत:
#Little knowledge is a dangerous thing"
# Fools rush in where angels fear to trade.
# To err is human and to forgive is divine"
किती मोलाचे विचार ह्या लेखमालिकेतून आपल्याला मिळतात. सध्याच्या कोरोना महामारी च्या संकटामध्ये तर वरील तीन ओळींमधून, जे सांगितले आहे ते आपल्याला व्यवहारात उपयोगी पडणारे आहे. सध्या जवळ जवळ प्रत्येक जण स्वतः तज्ञ असल्यासारखं कोणत्याही विषयावर
काही ना काही आपले विचार व्यक्त करत असलेले सोशल मीडियावर दिसतात. त्यामधील कोणतंही ज्ञान वा माहिती, ही सत्य आहे की नाही याची पारख करणे गरजेचे आहे. तसे केलेल्या नाही तर उगाचच संभ्रमातून नको त्या गोष्टी उगाचच भीती निर्माण होऊ शकते हे सर्वांनीच ध्यानात घ्यायला हवे आजच्या काळात सगळेजण घर कोंबड्या सारखे खोलीत कोंडले गेले असताना तर ताण तणावावर नियंत्रण मिळवणे किती गरजेचे आहे ते हि प्रकर्षाने आपल्याला ध्यानात घेतले पाहिजे त्या दृष्टीने ही मानसिक आरोग्य विषयीची जी लेखमाला आहे ती खरोखर सगळ्यांना उपयोगी अशीच आहे.
ह्या संदर्भातील माझी ही छोटीशी कविता:
"जगण्यातील खराखुरा अर्थ कळतो,
येते जेव्हा जीवनाची संध्याकाळ !
स्वातंत्र्याची नितांत गरज किती ते कळते, कोरोनामुळे घरकोंबडा बनायची वेळ येते तेव्हा !!
पण...पण...
तोपर्यंत अर्थाचा अनर्थही झालेला असतो,
येई ना आता बदलता, झालेले वा होणारे !!"
ही लेखमाला चांगली मार्गदर्शक आहे. तेथे जे सांगितले आहे, ते आपल्याला व्यवहारात उपयोगी पडणारे आहे. त्यांतील सार आता मांडतो.
# बेचैनी तर सगळ्यांनाच येत असते. आपल्याला असे लक्षात येते की मनासारखे काही घडले नाही किंवा एखादी कठीण असे संकट वा परीक्षा समोर उभी राहिली तर आपले ताणतणाव वाढत जातात चित्त थार्यावर रहात नाही, कुठलेही काम करायला वा जबाबदारी पाडायला मन लागत नाही.
याबाबतची अतिशय चांगली मार्गदर्शक माहिती डॉ. आपल्या लेखांद्वारे देत असतात.
जगविख्यात नाटककार शेक्सपिअर ह्यांच्या
'हॅम्लेट' नाटकाचे उदाहरण घेऊन, हँम्लेटला to be or not to be अशी सभ्रमावस्था व बेचैनी निर्माण झाले असताना त्याने शांतचित्ताने व सारासार बुद्धी वापरून समस्येला तोंड कसे दिले हे समर्पक उदाहरण मांडून, त्या त्याद्वारे भ्रम भ्रांती आणि अज्ञानापासून दूर राहून सत्य काय ते शोधा, झटपट आनंदाच्या भरात न पडता, नेहमी दूरदृष्टी ठेवा. आपल्या "ध्येयापासून नजर हटी ,दुर्घटना घटी" 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' पण ते करताना आपल्या जवळच्यांना समजून समजून घेतलेलं बरं. यापैकी तीन पेक्षा अधिक नियम पाळणारा विचार विवेकी असण्याची शक्यता जास्त. मानसशास्त्र म्हणतं की, होता होईस्तोवर
सारासार विचार करा. पण आपल्याला लक्षात येतं की हा तऱ्हेने सारासार विचार करणे, सगळ्यांना जमतंच असं नाही.
# तुकाराम महाराज म्हणतात "तुका म्हणे आम्हा भांडवल चित्त, देवोनी दुश्चित्त पाडियले" हे दुश्चित्त म्हणजे नियम भंग.
आपल्या बेचैनी वरील लेखांत डॉ देशपांडेंनी उपयुक्त असे विचार, एका प्रसिद्ध इंग्रजी कविचे उदाहरण घेऊन एक लेखात मांडले आहेत. ते विचार खरोखर घेण्यासारखे आहेत. अलेक्झांडर पोप या कवीने १७११ मध्ये एक प्रदीर्घ कविता लिहिली "अँन एसे ऑन क्रीटीसीजम". त्यांतील ह्या तीन ओळी मोलाच्या आणि कायम आचरणात आणाव्यात अशाच आहेत:
#Little knowledge is a dangerous thing"
# Fools rush in where angels fear to trade.
# To err is human and to forgive is divine"
किती मोलाचे विचार ह्या लेखमालिकेतून आपल्याला मिळतात. सध्याच्या कोरोना महामारी च्या संकटामध्ये तर वरील तीन ओळींमधून, जे सांगितले आहे ते आपल्याला व्यवहारात उपयोगी पडणारे आहे. सध्या जवळ जवळ प्रत्येक जण स्वतः तज्ञ असल्यासारखं कोणत्याही विषयावर
काही ना काही आपले विचार व्यक्त करत असलेले सोशल मीडियावर दिसतात. त्यामधील कोणतंही ज्ञान वा माहिती, ही सत्य आहे की नाही याची पारख करणे गरजेचे आहे. तसे केलेल्या नाही तर उगाचच संभ्रमातून नको त्या गोष्टी उगाचच भीती निर्माण होऊ शकते हे सर्वांनीच ध्यानात घ्यायला हवे आजच्या काळात सगळेजण घर कोंबड्या सारखे खोलीत कोंडले गेले असताना तर ताण तणावावर नियंत्रण मिळवणे किती गरजेचे आहे ते हि प्रकर्षाने आपल्याला ध्यानात घेतले पाहिजे त्या दृष्टीने ही मानसिक आरोग्य विषयीची जी लेखमाला आहे ती खरोखर सगळ्यांना उपयोगी अशीच आहे.
ह्या संदर्भातील माझी ही छोटीशी कविता:
"जगण्यातील खराखुरा अर्थ कळतो,
येते जेव्हा जीवनाची संध्याकाळ !
स्वातंत्र्याची नितांत गरज किती ते कळते, कोरोनामुळे घरकोंबडा बनायची वेळ येते तेव्हा !!
पण...पण...
तोपर्यंत अर्थाचा अनर्थही झालेला असतो,
येई ना आता बदलता, झालेले वा होणारे !!"
धन्यवाद
सुधाकर नातू